दुष्काळात तेरावा धाराशिव शहरात मुख्य रस्त्यावरील उजनी धरणावरून पाणी पुरवठा करणारी पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली लाखो लिटर पाणी वाया.आधीच पाणी टंचाई मुळे धाराशिव शहरात सात दिवसाला मिळत आहे पाणी फुटलेल्या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाणी वाया नगरपालिका कर्मचारी यांची धावपळ कर्मचारी करत आहेत पाईपलाईन दुरुस्ती नालीचे बांधकाम करत असताना फुटली पाईपलाईन.

Dharashiv - शहरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर वाया
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील माजी आमदार निर्मलकुमार सुराणा यांचे पुत्र आदित्य सुराणा यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट दिल्या. तसेच मंदिर संस्थानला अकरा हजार रुपयांची देणगी देखील अर्पण केली. आदित्य सुराणा हे बेंगळुरूमधील नामवंत उद्योगपती असून, प्रज्ञा ऑटोमोबाइल्स या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुराणा दांपत्याने आपल्या कुटुंबीयांसह आज तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि भक्तांच्या सेवेसाठी दोन ई-रिक्षा मंदिर संस्थानला भेट दिल्या ई-रिक्षांचे लोकार्पण आदित्य सुराणा व त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. या ई-रिक्षा मंदिरात येणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग भक्तांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यांना मंदिर परिसरात येण्या-जाण्यास सहज मदत होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या वारंगा फाटा येथील सराफा दुकानात गर्दीचा फायदा घेऊन चांदी सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे, दागिने बघण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी तब्बल सात लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने असलेली बॅग लंपास केल्याचे दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे. या बॅग चोरणाऱ्या चोरट्या महिलांवर आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्ञानेश्वर बहीवाळ यांचे वारंगा फाटा येथील ज्वेलर्स मध्ये ही चोरी झाली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्या महिलांची पोलिसांनी ओळख पटवलीये,सदर महिला दुकांना बाहेर पडतांना त्यांच्या पिशवीत चांदीच्या डब्बा टाईप सदृश्य वस्तू दिसलीय. घटनेचा अधिक तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.
यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.