416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
کوлھاپور میں چندرکانت پٹیل کے خلاف شیواجی پٹیل کے شدید الزامات، گوکُل پر تناؤ
Kolhapur, Maharashtra:Kolhapur Big Breaking गोकुळच्या राजकारणातून चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप. आमदार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापुरात भाजप वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले ? चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप म्हणून आम्हाला जवळ केलेलं नाही.. मोठे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप समजून घ्यावे आणि कार्यकर्त्यांना बळ द्यावे.. *आमदार शिवाजी पाटील Byte मुद्दे* *ऑन गोकुळ पात्र संस्था* नेमकं काय सुरू आहे हे मीडियाच्या माध्यमातून कळत. अपात्र केलेल्या संस्था पात्र केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घालणार आहे.. हसन मुश्रीफ यांच्या घरात अनेक संस्था.. हा संस्था आल्या कुठून.. अपात्र संस्था पात्र झाल्या तर गोकुळ राहणार नाहीत.. एका नेत्याच्या घरात गोकुळ निघून जाईल.. गोकुळमध्ये शेतकऱ्यांच्या वाटेला नेमकं काय येत .? माझ्या मतदारसंघात आणि सर्वत्र साम-दाम दंड आणि गोकुळची दहशत या जोरावर शेतकऱ्यांच्याकडून ठराव गोळा केले जात आहेत. *ऑन शिवजी पाटील एकाकी* आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला गोकुळच्या बैठकीला बोलावलं नाही.. हसन मुश्रीफ यांना बोलावलं.. पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुमित कदम यांना बोलावलं.. कोल्हापूर जिल्ह्याचा, गोकुळचा सुमित कदम यांचाशी संबंध नाही.. पण आम्हाला बोलावले नाही.. हे जर आम्हाला जमेत धरत नसतील तर सतेज पाटीलला आमचे विरोधक नाहीत. मुख्यमंत्री कडक शिस्तीचे आहेत. चुकीला माफी नाही.. हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे मंत्री राहिले आहेत.. त्यांनी चंदगड साठी काय केले ? आम्हाला देखील भावना असतात आम्ही किती सहन करायच गोकुळ मध्ये तुम्ही.. कोल्हापूर जिल्हा बँकेत तुम्ही... मंत्री तुम्ही... आम्ही जायचे कुठे.. आम्ही फक्त झेंडे घेऊन फिरायचे का.. *ऑन चंद्रकांत पाटील* चंद्रकांत दादा पाटील हे देखील मंत्री होते.. त्यांच्याकडे खूप मोठे पद आहे.. दादांनी देखील चंदगड साठी काही नाही केलं याची खंत. चंद्रकांत दादा पाटील आता मुश्रीफ साहेब यांना घेऊन चालले आहेत.. पण चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप म्हणून आम्हाला जवळ केलेलं नाही.. आम्ही चंद्रकांत दादा पाटлांवर आरोप करत नाहीत पण या आमच्या भावना आहेत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही खंत बोलावून दाखवायची होती... पण विधान परिषद माघारी मुळे भेटता आले नाही. मला आमदारकीचे स्वप्न किंवा लालच नाही.. लाचार होणे हा माझा स्वभाव नाही.. मला माझ्या नेत्यांनी असं शिकवलेलं नाही.. *ऑन सतेज पाटील युती* गोकुळ मध्ये राजकारण आणि भाजप काय करायचे.. मी अपक्ष आमदार होतो निवडून आलो.. निवडून आल्यानंतर मी भाजप झालो.. भाजपा आमच्या रक्तात आहे.. *ऑन भाजप ताकद* कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना स्ट्रॉंग आहे.. भाजप कुठे आहे ? भाजप म्हणजे जिल्ह्यामध्ये महाडिक परिवार खूप सक्षम आहे, अमल महाडिक आमदार आहेत.. दुसरे आमदार आवडे साहेब आहे.. मग पक्ष वाढणार कधी ? त्यामुळे मी थांबणार नाही कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही.. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मी लढत राहणार.. कार्यकर्त्यांनी काय करायचं हे कोणीही समजून सांगत नाही.. प्रत्येक जण स्वार्थ पाहत आहे.. एका घरात अनेक पद आहेत.. प्रत्येकाला वाटतं माझ्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत.. तेच मला बोलायला सांगत असतील.. माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत.. पण गोकुळ बाबतचा लढा माझा होता.. तेराशे दहा संस्था आमच्यावर लादल्या नसत्या.. तर आम्ही आहे तसं निवडणुकीला सामोरे गेलो असतो. *ऑन प्रशासक दबाव* काही चुका होत्या म्हणून गोकुळवर प्रशासक लागला. याच प्रशासकाला मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सकाळ – दुपार – संध्याकाळ फोन करतात आणि मेसेज करतात. गोकुळचे प्रशासक सुद्रिक यांनी तुमचे ऐकू मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादा पाटील यांचे ऐकू असं बोलत आहेत.. मी प्रामाणिक काम करत असेल तर मुख्यमंत्री पाठीशी असतील.. मी जर चुकीचं काम करत असेल तर मुख्यमंत्री मला थांबवतील मला कोणी टार्गेट करण्यासारखा मी कार्यकर्ता नाही.. मी घाबरणारा आणि लाचार होणारा कार्यकर्ता नाही.. *ऑन चंद्रकांत पाटील* आमचे जिल्ह्याचे नेते.. मोठे नेते.. चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप समजून घ्यावे आणि कार्यकर्त्यांना बळ द्यावे.. गोकुळ ही सुरुवात आहे.. नंतर केडीसीसीची निवडुक आहे, मी लढत राहणार. माझ्या भावना ह्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या लक्षात ग्राउंड चे राजकारण लक्षात आलं पाहिजे.. ग्राउंड लेव्हलवर काय चाललंय हे दादांच्या कानावर कोणी घालत नाही.. मी असं बोलल्यामुळे परिणाम काय होतील माहित नाही.. पण मी अन्यायावर बोलत राहील. *ऑन सतेज पाटील* ते थोडे माझे विरोधक आहेत. ते राजकीय विरोधक आहेत.. पण गोकुळ मध्ये राजकारण सोडून येईन. या लोकांनी मानसन्मान द्यायला पाहिजे.. मी लाचार होऊन कोणाच्या मागे झुकून जाणार नाही..0
0
Report
महाराष्ट्र: महायुती के बागी उमेदवारों के कारण महाविकास आघाड़ी में उथलपुथल
Kolhapur, Maharashtra:शंभूराज देसाई मुद्दे On विधानपरिषद निवडणूक एखादा दुसरा अपवाद सोडला तर महायुती म्हणून आम्ही एकत्र लढतोय महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेऊन ही निवडणूक सोडली आहे महायुतीसमोर टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी महायुतीत मिठाचा खडा पडू नये याची काळजी घेण्याचे सांगितले. On संजय राऊत संजय राऊत यांना काही काम नाही संख्याबळ महायुतीचे असल्याने त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतली संजय राऊत हे नेहमी मोठे आकडे बोलून लक्ष वेधून घेतात त्यांनी पुरावे द्यावेत, उगाच सकाळी सकाळी काहीतरी बोलून लक्ष वेधून घेतात On बाळा माने बाळ माने यांनी उबाठा गटाकडून अर्ज भरला होता पण माने यांना टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अर्ज मागे घेतला संजय राऊत हे बाळा माने यांनी स्तुती करत होते, माघार घेतली की लगेच वाईट झाले का? बाळा माने यांच्या वक्तव्याने ठाकरे गटात काय चाललंय हे महाराष्ट्रातील जनतेला कळालं बाळा माने यांच्या माहिती नाही उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री बनायचं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत उदय सामंत यांच्याकडे शंकेकडे बघावं असा हेतू बाळा माने यांचा असावा On खाजगी सावकारी खासगी सावकारी बाबत मी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर प्रश्न घालेन मुख्यमंत्री या प्रश्नाकडे पूर्णपणे लक्ष घालतील अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे योग्य निधी देतील मराठा समाजातील तरुणांना यामध्ये अडचणी येणार नाही गेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे On नाशिक बंडखोरी नाशिक मध्ये उदय सामंत ठाण मांडून आहेत त्यामुळे नाशिकमध्ये कुठलीही अडचण येणार नाही माघारी साठी आमचा उमेदवार वेळात पोचू शकला नाही त्यामुळे त्या ठिकाणी अर्ज राहिला आहे मात्र त्या ठिकाणी उदय सामंत योग्य तो निर्णय घेतील0
0
Report
पराजय से बेहतर माघार: सुधीर मुनगंटीवार का बयान
Chandrapur, Maharashtra:पराभवत होण्यापेक्षा यशस्वी माघार उत्तम, विधानपरिषद निकालावर आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया ऑन काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची माघार पराभवापेक्षा यशस्वी माघार घेणे हा उत्तम गुण आहे, आचारसंहितेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातल्या बैठका थांबल्या होत्या, त्यांच्या माघारी मुळे आता गोरगरिबांच्या प्रश्ना संबंधातल्या बैठका घेणे सोपी झालंय ऑन संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांनी माघार घेण्यासाठी दीडशे कोटी वाटप केले, विधानपरिषदेत घोडेबाजार झाल्याच्या केलेल्या आरोपावर त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती इन्कम टॅक्स विभागाला द्यावी, त्यांचं नाव संजय आहे, महाभारतातल्या संजयला जसं सगळं समजत होतं तसं त्यांनाही समजं असा त्यांना भास झाला आहे.0
0
Report
Advertisement
परभणी-गंगाखेड मार्ग पर ऑटो और बाइक की भीषण दुर्घटना, चालक गंभीर रूप से घायल
Parbhani, Maharashtra:अँकर परभणीच्या परभणी गंगाखेड महामार्गावर परभणी शहरा लगत असलेल्या गंगाखेड जाणाऱ्या महामार्गावर ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये ऑटोसह दुचाकीचा चक्काचूर झाला आहे..0
0
Report
जुन्नर-नाशिक हाईवे पर भीषण दुर्घटना, तीन वाहनों की भिड़ंत CCTV में कैद
Shirur, Maharashtra:जुन्नर पुणे... पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारणे दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली असून यानंतर या कारणे लेन ओलाडून विरुद्ध दिशेला जाऊन दुसय्रा कारला जोरदार धडक दिलीय तीन वाहनांच्या या विचित्र अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेय्रात चित्रित झाला असून अपघाता नंतर दुचाकी स्वार चेंडू सारखा हवेत जाऊन लांब जाऊन पडलाय सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेय्रात चित्रित झालाय。0
0
Report
विदर्भ की बेटी डॉ. नमीरा सिद्दीकी NEET MDS में देशभर में टॉप रैंक
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याची डॉ. नमीरा सिद्दीकी 'नीट एमडीएस' में देशात अव्वल. स्व. काळमेघ दंत महाविद्यालयातून केले बीडीएस. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विदर्भाने अभिमान बाळगावा अशी कामगिरी भंडाऱ्याच्या मुलीने केली आहे. नागपूरच्या दंत महाविद्यालयातून बीडीएसची पदवी मिळालेल्या डॉ. नमीरा सिद्दीकी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. डॉ. नमीरा यांनी 'नीट एमडीएस' प्रवेश परीक्षेत देशभरातील ३१ हजार विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक ८०२ गुण प्राप्त करीत प्रथम ऑल इंडिया रैंक प्राप्त केली आहे.0
0
Report
Advertisement
भूमिधारक किसान रातभर धरना: गडचिरोली में स्टील प्लांट और विमानतळ भूमि अधिग्रहण के विरोध की ठियोया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अधिग्रहीत पीडितांचा रात्रभर मुक्काम, काँग्रेसच्या वतीने भूमी अधिग्रहणाबाबतचे निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कालपासून सुरू आहे ठिय्या आंदोलन अँकर:-- गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अधिग्रहित पीडितांचा रात्रिभर मुक्काम बघायला मिळाला. काँग्रेसच्या वतीने भूमी अधिग्रहणाबाबतचे निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कालपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. बैलगाडी आणि अन्नधान्य- शिधा घेऊन विमानतळ भूमी अधिग्रहण आणि चामोर्शी तालुक्यातील स्टील प्रकल्पाच्या भूमी अधिग्रहणातील त्रस्त शेतकरी या ठिय्या आंदोलनात आपल्या कच्च्या-बच्चांसह सहभागी झाले आहेत. या सर्वांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालया समोरच्या मिळेल त्या जागेत आपले बस्तान मांडत आपला विरोध दर्शविलाय. याबाबतचा सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय इथून हलायचे नाही असा या शेतकरी कुटुंबांचा निर्धार आहे. दरम्यान शहरातील विविध सामाजिक संघटनांनी या शेतकऱ्यांसाठीची मदत पोहोचविली.0
0
Report
यवतमाळ विधान परिषद चुनाव: महाविकास आघाडी के समर्थक प्रस्ताव के बावजूद नितीन भुटडा ने बगावत से इनकार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता असा गोप्यस्फोट महायुतीच्या उमेदवाराविरोध बंडाचे निशाण फडकविलेले भाजप नेते नितीन भुतडा यांनी केला आहे. काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क केला मात्र आपण 32 वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहोत, आमदारकीसाठी पक्षात आलो नाही, देश सेवेसाठी आलो त्यामुळे असल्या प्रलोभनांना मी बळी पडलो नाही, मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे म्हणून महाविकास आघाडीचा प्रस्ताव विनम्रपणे नाकारला अशी माहिती नितीन भुतडा यांनी दिली.0
0
Report
चंद्रपुर में विश्व पर्यावरण दिवस पर विशाल वृक्षारोपण, सुधीर मुनगंटीवार की मौजूदगी
Chandrapur, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूरात भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन, सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. नागरी समिती, चंद्रपूर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ अंतर्गत सोनचाफा मंदिर, पठाणपुरा गेट जवळ, चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. वाढते प्रदूषण, हवामान बदल व पर्यावरणीय असंतुलन ह्या आव्हानांसमोर आपण उभे आहोत. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा उपाय असल्याची भावना व्यक्त केली गेली. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था, युवक, महिला, विद्यार्थी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी एकात्मतेचा संदेश देत परिसर हिरवागार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे प्रतिज्ञा व्यक्त केली.0
0
Report
Advertisement
उजनी डैम में 25 किलो वजन का कटला मछला मिला, जैवविविधता का संकेत
Pandharpur, Maharashtra:Anchor सोलापूरच्या उजनी धरणात 25 किलो वजनाचा कटला मासा सापडलेला आहे. उजनी धरणाच्या जैव विविधता आणि पोषक पर्यावरणाचा हा पुरावा मानला जातो. करमाळा तालुक्यातील केतूर चांडगाव परिसरात स्थानिक मच्छीमार खानेवाले यांच्या जाळ्यात पंचवीस किलो वजनाचा कटला मासा आढळला. एवढ्या वर्षांत असा मोठा मासा पहिल्यांदाच आढळला आहे0
0
Report
चार आरोपी गिरफ्तार: 24 मोटरसाइकिल सहित 20 लाख का माल जप्त
Nashik, Maharashtra:मालेगावी तब्बल 24 मोटारसायकलींसह चार संशयितांना पोलिसांनी केली अटक... - 20 लाखांचा मुद्देमाल केला जप्त... - मालेगाव, चांदवड, संभाजी नगर, जळगाव जिल्ह्यातून संशयितांकडून दुचाकींची चोरी... मालेगाव शहरातील पवारवाडी भागात तीन गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांनी तपास करत मालेगावातील चार संशयित आरोपींना आधी तीन मोटारसायकलींसह अटक केली. नंतर त्यांना विश्वासात घेत विचारपूस केली असता त्यांच्याांकडून अजून 21 मोटारसायकल मिळून आल्याने तब्बल 20 लाखांच्या 24 मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या. सदर या आरोपींनी या मोटरसायकल चांदवड, मालेगाव तालुका, संभाजी नगर, जळगाव जिल्हा तसेच किल्ला, छावणी पोलीस स्टेशन हद्द मालेगाव येथून चोरी केलेल्या आहे. यांच्यासोबत आणखी कोण संशयित सहभागी होते. अजून काही मोटर सायकल त्यांच्या कडून जप्त होतात का ? याचा पोलिस तपास करत आहे.0
0
Report
मावळ में एमआईडीसी पुलिस ने अवैध शराब कारोबार के खिलाफ धावा की
Varsoli, Maharashtra:Headline : मावळात एमआयडीसी पोलिसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाई Anchor: राज्यात गाजलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारू प्रकरणाची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तल्यातील पोलीसांनी चांगलीच धास्ती घेतली असून मावळ तालुक्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सलग दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये आंबी एमआयडीसी येथील कंजारभट वस्तीत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे ३०० लिटर कच्चे रसायन आणि ३० लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. तर मिंडेवाडी येथे विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे मावळात धाबे दणाणले आहेत..0
0
Report
Advertisement
यवतमाळ विधान परिषद चुनाव: साहेबराव कांबळे के निष्कासन का प्रस्ताव कांग्रेस ने भेजा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी घेऊन ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेणाऱ्या साहेबराव कांबळे यांना पक्षातून निष्कासित करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सचिन नाईक यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केली आहे. साहेबराव कांबळे च्या कृतीमुळे महाविकास आघाडीला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची नामुष्की आली. या झालेल्या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून साहेबराव कांबळे यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावरून आणि पक्षातून निष्कासित करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे.0
0
Report
मावळ में कृषी सेवा केंद्र افتتاح: किसानों के लिए वरदान, खरीप में बढ़ेगी पैदावार!
Varsoli, Maharashtra:Headline : मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन Anchor: मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी. शेतीसाठी आवश्यक असणारे दर्जेदार बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन कामशेत येथे मोठ्या उत्साहात पार पडले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आणि शेती औषधांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे पहिलेच कृषी सेवा केंद्र असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. गेल्या काही वर्षांत खासगी विक्रेत्यांकडून इंद्रायणी तांदळाच्या बोगस बियाण्यांची फसवणूक झाल्याने अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दर्जेदार आणि विश्वासार्ह कृषी साहित्य उपलब्ध करून देणारे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे मावळातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून शेती उत्पादन वाढीसही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.. बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.05)0
0
Report
नाशिक विधान परिषद चुनाव: प्रसाद हीरे की बगावत महायुती में तिरंगी लड़ाई
Nashik, Maharashtra:नाशिक (मालेगाव) - भाजप नेते प्रसाद हिरे यांची बंडखोरी... प्रसाद हिरे यांना हिरे कुटुंबाचा वारसा... महायुतीच्या उमेदवारांमध्ये रंगणार तिरंगी लढत... भाजपचे निष्ठावान मतदार माझ्यासोबत आहे... 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असे त्यांनी दावा केला... प्रसाद हिरे यांनी दिलेला दावा... बंडखोरी भाजपच्या उमेदवारांशी नाही... शिंदे सेनेच्या उमेदवार मतदारांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी... नाव न घेता नरेंद्र दराडेंवर केला आरोप... नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुتيमध्येच बंडखोरी पहायला मिळत आहे. भाजप नेते व माजी मंत्री दिवंगत डॉ.बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांची उमेदवारीही कायम असल्याने महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात हिरे कुटुंबियांचे नाव आहे. प्रसाद हिरे यांची उमेदवारी कायम राहिल्याने या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आला आहे. हिरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीय. आपणास हिरे कुटुंबीयांचा वारसा आहे. भाजपचे निष्ठावान मतदार माझ्यासोबत आहे. शिवसेनेच्या काही मतदारांचा मला छुपा पाठिंबा आहे. आपण 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असा दावाही त्यांनी केलाय. उमेदवार भाजपचा नाही. शिंदे सेनेचा आहे. त्यांना मिळालेल्या संधी काळात ते मतदारांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले. मतदार त्यांच्या्यावर नाराज या निवडणुकीत ते दाखवतील असा विश्वासही पक्ष व पक्ष नेतृत्वावर आपला विश्वास आहे. पक्ष निष्ठा आम्हीच दाखवायची का जळगावमध्ये शिंदे सेनेही दाखवावी. असेही प्रस 추 haore हिरे म्हणाले. हीरे यांच्या उमेदवारी महायुतीचे उमेदवार नरेंड दराडे यांची डोके दुखी मात्र वाढणार हे नक्की…0
0
Report
Advertisement
