icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कराड में बिबट्या पकड़ा गया: वन विभाग ने जाल में फंसाया

Satara, Maharashtra:कराड,सातारा -कराड तालुक्यातील कोळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी... गेल्या महिनाभरापासून परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. कोळे येथील कराळे मळा परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून विशेष मोहीम राबवली होती. याच मोहिमेला यश मिळत बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे..या बिबट्याने यापूर्वी दोन शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने हालचाली करत बिबट्याचा मागोवा घेतला आणि बिबट्याला पकडण्यात यश मिळवले.वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. बिबट्या जेरबंद झाल्याने कोळे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत वनविभागाचे आभार मानले आहेत.
0
0
Report

Amravati Legislative Council election: Sunil Deshmukh's sharp comment fuels political heat

Amravati, Maharashtra:हर्षजित देशमुख हा ॲटम आमच्यासाठी संपला आहे त्यांची उमेदवारी आम्ही गांभीर्याने घेत नाही; काँग्रेस नेते सुनील देशमुख यांचे मोठे वक्तव्य मतदानाला उरले केवळ 24 तास तरी देखील काँग्रेसचा निर्णय नाही; अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला केवळ 24 तास उरले आहे त्यापूर्वी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हा ॲटम आमच्यासाठी संपला आहे त्यांची उमेदवारी आम्ही अजिबात गांभीर्याने घेत नाही असं कडक शब्दात त्यांनी सुनावलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान झाले. तर दुसरीकडे वंचितचे बहुजन निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा द्यायचा याबात अद्याप निर्णय झाला नाही आज सकाळी पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता अमरावती महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळ पर्यंत नेमकी काय भूमिका घ्यायची याचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. गटनेत्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, किंवा तटस्थ राहण्याची भूमिका काँग्रेस आज निर्णय घेऊ शकतो अशी माहिती सूत्राने दिली आहे.
0
0
Report

खामगाव में किसानों के उग्र आंदोलन में एसडीओ कार्यालय जलाने की कोशिश

Buldhana, Maharashtra:रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा भडकला! खामगावात "एसडीओ" कार्यालय जाळण्याचा प्रयत्न! पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळले... शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता चांगलाच भडकला आहे. ठीक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीचा जीआर जाळत आहेत. काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्री किनगाव जट्टू येथे बस पेटवल्याची घटना ताजी असताना आता खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. मध्यरात्री २ ते अडीच वाजेच्या sुमारास अज्ञात आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर १५ जूनपासून त्यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. विविध स्थरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान आता आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. काल, दिवसभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत जीआर जाळले. रात्री किनगाव जट्टू येथे देखील एसटी बस पेटल्याचा प्रकार समोर आला, मात्र पोलिसांकडून बस शॉर्टसर्किटने पेटल्याचा दावा केला जात असला तरी संतप्त शेतकरी आंदोलकांनीच बस पेटवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान रात्री खामगाव येथील एसडीओ कार्यालय पेटवण्याचा अज्ञात आंदोलकांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे चिखली खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर रात्रीच्या सुमारास संतप्त शेतकरी आंदोलकांनी भर रस्त्यावर टायर पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
0
0
Report
Advertisement

वाशीम में शिंदे समर्थकों के पक्षांतरण पर सोशल मीडिया पोस्ट से माहौल गर्म

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांदरम्यान वाशीमच्या राजकीय वर्तुळात एका सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.उबाठाचे उपतालुका प्रमुख विजय शेंडगे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. 'जर वाशीमचे खासदार संजय देशमुख फुटले, तर त्यांनी पुन्हा वाशीममध्ये येऊ नये, अन्यथा त्यांच्या सगट गाडी पेटवून देऊ. जायचे असेल तर पहिले राजीनामा देऊन जावे असा मजकूर पोस्टमध्ये केली आहे.' 'आम्ही शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात संजय देशमुख यांना निवडून आणलं आहे त्यामुळे त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा व नंतर पक्षांतर करावे असं आव्हान उभाठाचे उपतालुकाप्रमुख विजय शेंडगे यांनी केलं आहे.'
0
0
Report

दिल्ली दौरे के बाद भाऊसाहेब वाकचौरे की नई भूमिका पर उठे सवाल, शिंदे गट से मिलने से बदलेगी सियासत?

Shirdi, Maharashtra:ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काल सायंकाळी विमानाने दिल्ली दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या संपर्काच्या चर्चांमुळे वाकचौरे चांगलेच चर्चेत होते. त्यांच्या थेट भूमिका घेणं टाळत 'मौनम् सर्वार्थ साधनम्' अशी प्रतिक्रिया दिली होती. आता वाकचौरे देखील शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनीही वेळोवेळी वाकचौरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. मतदारसंघातील कार्यक्रम आणि राजकीय निर्णयांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याचे आरोपही करण्यात आले होते. त्यामुळे एकीकडे शिंदे गटाच्या चर्चांमुळे आणि दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांची नेमकी पुढची भूमिका काय असणार , याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के फत्तेगड़ में 60 परिवारों को खतरा, प्रशासन ने स्थानांतरण के निर्देश दिए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक फत्तेगडावरील ६० कुटुंबांवर पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटले आहेत. गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळत असून दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने तातडीच्या स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जीव वाचवण्यासाठी घर सोडायचे, पण जायचे कुठे? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. अनेक वर्षांपासून संरक्षण भिंत उभारण्याची मागणी होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. दरवर्षी पावसाळा आला की नोटिसा येतात, भीती वाढते आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. फत्तेगडावरील नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
0
0
Report

बीड के गेवराई में गोदावरी नदी घाट पर अवैध रेती खनन पर 19 गिरफ्तार

Beed, Maharashtra:बीड: गोदावरी नदी पात्रात असणाऱ्या राक्षसभुवन रेती घाटातील कथित अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात दोन तलाठी, एक महसूल सेवक आणि एका पोलिसासह इतर खाजगी व्यक्ती अशा 19 जणांवर गुन्हा नोंदवला गेलाय. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदीपात्रातून घरकुलाच्या नावाखाली शंभर कोटींच्या वाळूचे उत्खनन झाल्याचा आरोप केला होता. याची वरिष्ठ पातळीवर तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी फिर्याद दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला. ऑगस्ट 2025पासून राक्षसभुवन घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून शासकीय खनिज संपत्तीची चोरी, डिजिटल डेटामध्ये छेडछाड करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान आणि विद्रुपीकरण, तसेच शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 199/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS), IT अ‍ॅक्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा 1984 अंतर्गत विविध गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. तसेच तहसीलदारांवर देखील आमदार पंडित यांच्याकडून आरोप केल्या गेल्याने त्यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

बीड: सरपंच हत्या केस में आज सुनवाई; जमानत और लैपटॉप क्लोन पर अदालत निर्णय

Beed, Maharashtra:बीड: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी; 17 महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच दोन दिवसांच्या कालावधीत सुनावणी. आरोपी विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच नवनियुक्त न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या समोर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटेला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्याच्या वकिलाच्या माध्यमातून करण्यात आला. आणि यालाच उज्वल निकम यांनी विरोध केला. आज विष्णू चाटे आणि जयराम चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देणार आहे. तसेच आरोपीच्या वकिलांना डिजिटल पुरावा म्हणून वापरण्यात आलेल्या लॅपटॉप मधील क्लोन कॉपी बाबत निर्णय होईल. 17 महिने उलटले असताना देखील हा खटला मंद गतीने सुरू असून खटल्याची सुनावणी त्वरित केली जावी असं म्हणणं उज्वल निकम यांनी मांडले होते. तर आरोपींकडून या प्रकरणात डी टू ऑपरेशन राबविले जात असल्याची प्रतिक्रिया उज्वल निकम यांची होती. दरम्यान 17 महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच या प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांमध्ये होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष आहे.
0
0
Report

रत्नागिरी में मानसून देरी से फसल संकट, किसान पंप से कृत्रिम पानी दे रहे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पावसाची दडी..फवारणी पंपाने पाणी देऊन भातरोपे जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न!.. जून महिना अर्धा संपत आला तरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.. सुरुवातीच्या किरकोळ पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या तर केल्या,मात्र आता पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी भात रोपे जळू लागली आहेत.. डोळ्यांदेखत हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून कोकणातील बळीराजा सध्या जीवाची धडपड करतोय.. उपलब्ध पाण्याचे स्त्रोत शोधून,तर कुठे कृषी फवारणी पंपाच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या पाणी देऊन रोपे जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे भागातील शेतकऱ्यांचीही सध्या अशीच बिकट अवस्था पाहायला मिळत आहे.. आता संपूर्ण कोकणचे डोळे वरुणराजाच्या आगमनाकडे लागले आहेत..
0
0
Report

येवला के पैठणी विणकरों के लिए गणेशोत्सव भत्ता और मुफ्त बिजली योजना: प्रस्ताव आमंत्रित

Yeola, Maharashtra:अँकर :महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील हजारो नवीन पैठणी विणकर बांधवांना गणेश चतुर्थी उत्सव भत्ता तसेच दरमहा २०० युनिट मोफत वीज मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हजारो पैठणी विणकर आपले प्रस्ताव येवल्यातील विणकर प्रकोष्ठ कार्यालयात सादर करत आहेत.मागील महिन्यात शासनाच्या विविध योजनांअंतर्गत येवला तालुक्यातील विणकरांच्या खात्यात सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली होती. या मदतीमुळे अनेक विणकरांना दिलासा मिळाला असून आता नव्याने नोंदणी झालेल्या व लाभापासून वंचित राहिलेल्या विणकरांनाही गणेशोत्सव भत्ता व मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी पुढे आली आहे.यासाठी विणकर प्रकोष्ठ कार्यालयामार्फत आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव संकलित करून ते शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनस्तरावर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या विणकर बांधवांनाही या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती विणकर प्रकाशचे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

कोकण में मानसून के आगमन की उम्मीद, रत्नागिरी-रायगढ़ में यलो अलर्ट जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..कोकणात उकाडा वाढला..पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट!.. अँकर Jun महिना अर्धा संपला तरी कोकणात मान्सूनने अद्याप म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. मान्सूनची वाटचाल दापोलीतील हर्णे परिसरामध्येच रेंगाळल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या तीव्र उकाडा आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे.. त्यामुळे कोकणातल्या बळीराजावरती संकट उडवला आहे.. अजून काही दिवस मानसून लांबविला तर पेरणी केल्यानंतर शेतात वर आलेले रोप करपण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.. अशा परिस्थितीत हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिलेय.. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल होत असून,कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.. हवामान विभागाने आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.. या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर,मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच समुद्रात उतरावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे。
0
0
Report

नांदूर मधमेश्वर बांध पर जलपर्णी फैलाव से पानी आपूर्ति खतरे में

Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यात गोदावरी, दारणा आणि कादवा या three नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेलेल्या नांदूर मधमेश्वर धरणामध्ये सध्या जलपर्णीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. धरणाच्या पृष्ठभागावर जलपर्णीचा घट्ट विळखा तयार झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच सध्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तालुक्यांसाठी बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू असल्याने धरण १०० टक्के भरलेले आहे. अशातच मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो; मात्र विसर्गावेळी मोठ्या प्रमाणातील जलपर्णी धरणाच्या वक्राकार गेटमध्ये अडकल्यास पाण्याचा प्रवाह बाधित होऊन बॅक वॉटरला असलेले निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे आणि करंजगाव या गावांना पाण्याच्या फुगवट्याचा आणि पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने नांदूर मधमेश्वर धरणातील जलपर्णी हटवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top