416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
विधान परिषद में भावना गावली की उपस्थिति पर प्रश्न, रिकॉर्ड की जाँच की जाएगी
Washim, Maharashtra:अधिवेशन दरम्यान बहुतेक दिवस उपस्थित नसल्याची बाब समोर आल्यानंतर भावना गवळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली。“रेकॉर्ड तपासलं तर मी कोणत्या अधिवेशनाला उपस्थित होते किंवा नव्हते हे स्पष्ट होईल.या उन्हाळी अधिवेशन दरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली होती.ती जखम महिना-सव्वा महिना बरी झाली नाही,त्यामुळे मला अधिवेशनाला उपस्थित राहता आला नाही,” असं त्यांनी सांगितलं.तसेच, “आता माझी प्रकृती चांगली आहे. इतर अधिवेशनांमध्ये माझी उपस्थिती राहिली आहे. त्यामुळे संपूर्ण रेकॉर्ड तपासूनच निष्कर्ष काढावेत,” असंही त्यांनी म्हटलं आहे.0
0
Report
नागपुर जलक्रांति परिषद 2026: नाना पाटेकर और मकरंद अनासपुरे की उपस्थिति
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात जलक्रांती परिषद 2026 चे आयोजन.... - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलक्रांती परिषदेचे आयोजन.... यंदाचे हे 25 वे वर्ष... - रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात.... सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. - तसेच राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, पंकज भोयर डॉ. पंकज भोयर उपस्थित आहे - पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे - विदर्भातील विविध भागातून नागरिक, शेतकरी, अभ्यासक या कार्यक्रमात सहभागी झाले आहे..0
0
Report
नीट पेपर लीक: नांदेड के कोचिंग क्लास पर घातक आरोप, CID जांच शुरू
Nanded-Waghala, Maharashtra:नीट चा निकाल येण्यापुर्वीच नांदेडमधील एका कोचिंग क्लासेसस ने अपकमिंग रिझल्ट म्हणून जाहिरात करून ती जाहिरात व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. ही जाहिरात सध्या व्हायरल होत आहे. नांदेड मध्ये खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेतून आपले विद्यार्थी कसे गुणवंत आहेत याची जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र नांदेड मधील एका खाजगी कोचिंग क्लासेसला अशी जाहिरात महागात पडण्याची शक्यता आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने शनिवारी नांदेड मध्ये कदम कुटुंबाची चौकशी केली. पाच लाख रुपयांत आपल्या मुलीसाठी तिच्या वडीलांनी नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. आणि याच मुलीचा फोटो छापून नांदेड मधील एका खाजगी कोचिंग क्लासेसने जाहिरातबाजी केल्याचे समोर आले आहे. चौकशी करण्यात आलेल्या मुलीला केमिस्ट्री या विषयात 180 पैकी 180 गुण मिळाल्याची ही जाहिरात आहे. विशेष म्हणजे नीट परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच संबधित क्लासेसने असे भाकीत जाहिरातीतून वर्तवले आहे. अन्य दोन विद्यार्थ्याचे फोटो देखील जाहिरातीत छापण्यात आले. सद्या ही जाहिरात समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. दरम्यान या जाहिरातबाजीमुळे संबधित कोचिंग क्लासेस चालक तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.0
0
Report
Advertisement
बेकायदे गर्भपात की दवाएं देने वाले आयुर्वेदिक डॉक्टर के खिलाफ एफडीए की छापा कार्रवाई
Vasai-Virar, Maharashtra:बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या BAMS आयुर्वेदिक डॉक्टर वर फूड्स अँड ड्रग्स च्या अधिका-याने छापा टाकून रंगेहाथ पकडले आहे. आरोपी डॉक्टरकडून फूड्स अँड ड्रग्स अधिकारी यांना धक्काबुक्की करत, पुरावा केला नष्ट शैलेश महाजन असे बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टर चे नाव असून, याने नालासोपारा पश्चिम निर्मळ नाका येथे गुरुकृपा नावाचे क्लिनिक चालवत होता. हा केवळ BAMS डॉक्टर असून, सर्रास पणे गर्भपाताच्या गोळ्या देत होता. सतीश चव्हाण असे धक्काबुक्की झालेल्या औषद निरीक्षक चे नाव असून, गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132 शासकीय कामात अडथळा, कलम 221 सरकारी आदेशाचे उल्लंघन करून, चौकशीत अडथळा निर्माण करणे, कलम 3(5) कट रचून सामूहिक गुन्हेगारी केल्या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केले आहे. रविवार ता 17 रोजी न्यायालयात हजर केले असता, 19 मे पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिली आहे.0
0
Report
मिरा-भायंदर में 21–22 मई पानी आपूर्ति पूरी तरह बंद, नागरिक सहयोग जरूरी
Vasai-Virar, Maharashtra:मिरा-भाईंदरकर मध्ये आगामी भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, २१ मे दुपारी १२ ते शुक्रवार, २२ मे दुपारी १२ वाजेपर्यंत 'एमआयडीसी'कडून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. 'अलनिनो'च्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या काळात केवळ 'स्टेम'चा पुरवठा सुरू राहील, त्यामुळे पाणी कमी दाबाने आणि उशिराने येण्याची शक्यता असून नागरिकांनी सहकार्य करने आवाहन पालिकेने केले आहे.0
0
Report
पंढरपुर में सीएनजी संकट: सिर्फ दो पंप, भारी कतारें लग गईं
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये सीएनजीचा तुटवडा, वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लागल्या रांगा. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने रोज हजारो भाविकांची वाहने या ठिकाणी येत असतात. अनेक जन सीएनजी असलेल्या गाड्या वापरतात. मात्र पंढरपूर मध्ये सीएनजी पंप संख्या दोन असल्याने त्यात सीएनजी तुटवडा असल्याने सर्वच वाहनांना सीएनजी मिळत नाही. तीन तीन तास रांगेत थांबूनही सीएनजी मिळत नसल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत.0
0
Report
Advertisement
वैजापूर के कांदा किसान आंदोलन ने समृद्धी महामार्ग रोककर ट्रैफिक बाधित किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. यावेळेस आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला आणि जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन होतं. यावेळेस समृद्धी महामार्गावर टायर सुद्धा पेटवण्यात आले आणि वाहतूक रोखून धरली. महामार्गावर वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्या. पोलिसांनी समजूत घातल्यावर ही आंदोलक हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी काही आंदोलकांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं आणि महामार्ग मोकळा केला. जवळपास 15 ते 20 मिनिटं आंदोलकांनी महामार्ग रोखून ठेवला होता त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवून महामार्ग वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. अंबादास दानवे यांना ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कांद्याला हमीभाव दिला नाही तर यापेक्षा मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंबादास दानवे आणि आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
नागपुर में इलेक्ट्रिक बस दुर्घटना; कंटेनर की टक्कर से चालक-परिचालक घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील महापालिकेच्या आपली बसचा अपघात - सकाळच्यावेळी झालेला इलेक्ट्रिक बसचा अपघात - समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने दिली बसला धडक - चालक आणि वाहक किरकोळ जखमी - बस अजनीकाडून बर्डीकडे येत असताना पंचशील चौकात झाला अपघात.. - बसमध्ये 5 प्रवाशी होते, सुदैवाने प्रवाश्यांपैकी कोणीही जखमी नाही0
0
Report
रत्नागिरी में हापूस आमों की कीमतें गिरीं, मानसून से किसान परेशान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत हापूसचा अंतिम टप्पа.. कोसळते दर आणि पावसाच्या सावटात बागायतदार संकटात!.. अँकर रत्नागिरीत हापूस आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मान्सूनच्या धास्तीने बागायतदारांची काढणीसाठी मोठी धावपळ सुरू आहे.. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची मोठी घट झाली आहे,त्यातच आता बाजारात आवक वाढल्याने हापूसचे दरही कमालीचे कोसळले आहेत... एकीकडे घसरलेले भाव आणि दुसरीकडे पावसाचे संकट यामुळे आंबा उत्पादक शेतकरी "इकडे आड तिकडे विहीर" अशा कात्रीत सापडला आहे... हाता-तोंडाशी आलेले पीक मान्सूनपूर्वी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची झाडांवर शेवटची धडपड सुरू आहे..0
0
Report
Advertisement
खेड के किसान घोड़े से खेत में, ईंधन महंगाई के बीच पारंपरिक खेती की मिसाल
Shirur, Maharashtra:*बुलेट-कारच्या युगात खेडच्या शेतकऱ्याचा घोड्यावरून प्रवास; इंधन बचत आणि पारंपरिक शेतीचा अनोखा संदेश* ANC :आजच्या काळात माणूस अलिशान गाड्या आणि महागड्या प्रवासामागे धावत असताना, खेड तालुक्यातील पाईट गावातील शंकर हेंगले मात्र रोज घोड्यावरून शेतात जातात. वाढते पेट्रोल दर, खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेती यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला आहे. VO :पाईट गावातील शंकर खेंगले यांनी आधुनिक वाहनांऐवजी घोडीला आपल्या जीवनाचा भाग बनवलेय शेतातील खराब रस्ते आणि वाढत्या इंधन दरांमुळे ते रोजच्या प्रवासासाठी घोडीचाच वापर करतात.गोवंशाचे संगोपन करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या खिल्लार गाईच्या संगोपनाचा ध्यास घेतलाय ट्रॅक्टरपेक्षा बैल आणि गोपालनावर आधारित शेतीच जमीन टिकवते, असा विश्वास व्यक्त करत कप पेट्रोल शंभरी पार करत असताना, दुचाकीऐवजी घोड्यावरून प्रवास करणारा हा शेतकरी इंधन बचतीचाही संदेश देतोय. मुंबईतील आयुष्य सोडून गावाकडे परतलेल्या शंकर हेंगले यांनी पारंपरिक शेती आणि गोवंश संवर्धनाची वाट निवडत आधुनिक दिखाऊ जीवनशैलीसमोर वेगळा आदर्श उभा करत खिल्लार गाईचे संगोपन, इंधन बचत आणि पारंपरिक शेती जपत आधुनिक जीवनशैलीला चपराक दिलीय Byte: शंकर धोंडीबा खेंगले (शेतकरी ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...0
0
Report
रत्नागिरी में कृत्रिम रेत परियोजना से रोजगार के नए अवसर, ग्रामीण अर्थव्यवस्था को नई दिशा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कृत्रिम वाळू प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीला बळ.. साई क्रश सॅन्ड जिल्ह्यातील पहिला प्रकल्प.. ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही मिळणार नवी दिशा.. उद्योजक अनिकेत कदम यांचा विश्वास.. नदीपात्रातील अवैद्य वाळू उपसा रोखून पर्यावरण संवर्धनासाठी कृत्रिम वाळू अर्थात एम सॅन्ड उद्योगाला शासनाने प्राधान्य देत धोरणात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.. वेरळ येथील साईक्रश सॅन्ड प्रकल्प जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.. पर्यावरणाचा समतोल राखत बांधकाम क्षेत्रासाठी पर्यायी साधन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या प्रकल्प अंतर्गत अवजड दगड, बेसॉल्ट किंवा ग्रॅनाईट दगड मोठ्या क्रशर मशीनद्वारे बारीक करून त्याद्वारे कृत्रिम वाळू तयार करण्यात येते.. या कृत्रिम निर्मितीला चालना मिळून भविष्यात अशा उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल असा विश्वास युवा उद्योजक अनिकेत कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली..0
0
Report
कांदा भाव गिरावट के विरोध में रोहित पवार ने लासलगाव किसान आंदोलन शुरू किया
Lasalgaon, Maharashtra:सातत्याने होत असलेल्या कांदा दर घसरणी मुळे लासलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे दाखल झाले असून कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कांद्याला हमीभाव द्यावा विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे अशी प्रमुख मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीला जाणारा रस्ता महाराष्ट्रातून बंद करून असा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
विदर्भ में गर्मी का कहर: 46°C के पास, वार्धा-अमरावती-आकोला पर ऑरेंज अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उष्णतेचा प्रकोपामुळे सर्वसामान्यांना नागरिक हैराण.... सूर्यनारायण काढतोय होरपळून वर्धा, अमरावती आणि अकोला येथे उष्णतेचा *ऑरेंज अलर्ट* तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 46 अंश सेल्सिअस च्या जवळपासच्या तापमानाची नोंद0
0
Report
रत्नागिरी: अशोक पाटील के बांधकाम पर सरकार ने कार्रवाई की घोषणा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आमदार अशोक पाटील यांच्या बांधकामावर होणार कारवाई.. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या तक्रारीनंतर शासनाचा दणका.. डापोली तालुक्यातील हर्णे येथील कथित सीआरझेड उल्लंघन प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी केलेल्या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.. सरकारने त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.. अशोक पाटील हे शिंदे शिवसेनेचे भांडुप येथील आमदार असल्याने या प्रकरणामुळे हर्णे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.. अशोक पाटील यांनी केलेल्या बांधकामा बाबत प्रसाद कर्वे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.. या तक्रारीच संबंधित बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.. तसेच बिनशेती परवानगी रद्द झाल्यानंतर ही बांधकाम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते..0
0
Report
1.5 किलो चांदी की कोल्हापुरी चप्पल: शादी में नई परंपरा बनती दिखी
Kolhapur, Maharashtra:जगभरात मंदीचे सावट आहे.. भारतातदेखील त्याचा मोठा प्रभाव जाणवतो.. असाच प्रत्येय कोल्हापुरात आला आहे.. सासर्याच्या ऑर्डर नुसार एका चांदी कारागीराने अधिक मासाचे वाण म्हणून चक्क चांदीचे कोल्हापुरी चप्पल बनवले आहे. दीड किलो वजनाचे हे चप्पल असून कोल्हाबूरचे कारागीर विक्रांत माळी यांनी आठ दिवसाच्या परिश्रमानंतर हुबेहूब चांदीची कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे. अधिक महिन्यात जावयाला चांदीचे दागिने देण्याची परंपरा असते. त्यानुसार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वास्तव्याला असणाऱ्या एका श्रीमंत बापाने लाडक्या लेकीचं लग्न नुकताच झाल्याने लेकी बरोबर जावयाची हौस झाली पाहिजे या उद्देशाने चांदीचे चप्पल बनवण्याचे काम सराफाला दिले.. त्यानंतर सराफाने तब्बल दीड किलो चांदी वापरून कोल्हापुरी चप्पल बनवून दिले आहे. विशेष म्हणजे याच कारागिराने पिण्याच्या पाण्याचे चार आणि पाच किलो वजनाचे दोन पिंपदेखील बनवले आहेत.. यावरून हौसेला मोल नसते याचा प्रत्यय येत आहे. कारागिराने कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी 22 हजार रुपयांची मजुरी घेतली आहे.0
0
Report
Advertisement
