icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में ठाकरे गट ने बाळ माने को कोकण विधानपरिषद के लिए उम्मीदवार घोषित किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. उबाठा पक्षाचे उपनेते बाळ माने यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी.. आगामी कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.. मुईंबात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळ माने यांना 'एबी फॉर्म' अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.. एबी फॉर्म हाती पडताच बाळ माने यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतलं. या घडामोडींमुळे कोकणच्या राजकीय मैदानात आता अधिकृतपणे बिगुल वाजलं आहे.. बाळ माने यांची ही उमेदवारी केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण कोकणात ठाकरे गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे...
0
0
Report

राहुरी में चुलत नातवे ने आजोबा पर गोलीबारी, दगडू कोहकडे गंभीर घायल

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे चुलत नातवानेच आजोबांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या घटनेत 65 वर्षीय दगडू कोहकडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. गेल्या काही दिवसापुर्वी आरोपी प्रवीण कोहकडे आणि चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यात एका नाजूक कारणातून वाद होता.. त्यातून पुढे हाणामारी आणि गाड्या पेटविण्याच्या घटना घडलेल्या होत्या.. त्यासंदर्भात राहुरी पोलीसात गुन्हा देखील दाखल आहे.. याच कारणावरून प्रवीण कोहकडे याने चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यावर गोळीबार केला.. गोळी छातीत लागल्याने दगडू कोहकडे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.. आरोपी प्रवीण कोहकडे याच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे..
0
0
Report
Advertisement

अक्कलकोट में दिनदहाड़े ज्वेलर्स लूट: चार चोरों में एक महिला, 14.5 लाख के गहने चोरी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोटमध्ये भरदिवसा चाकूचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटले, तब्बल साडेदहा लाखांचे दागिने लंपास - अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ते करजगी रस्त्यावर ज्वेलर्सचे करण्यात आले अपहरण - ज्वेलर्सला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेदहा लाखांचे दागिने लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस - करजगी शिवारातील जेऊर ते करजगी रस्त्यावर सकाळी 11 च्या दरम्यान घडला प्रकार - अभिनंदन पोतदार हे ज्वेलर्स सकाळी दुचाकीवरून दुकानाकडे जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी दागिन्यांवर मारला डल्ला - विशेष म्हणजे चौघ्या चोरट्यांपैकी एक जण महिला असल्याची प्राथमिक माहिती समोर - ज्वेलर्सची लूट करणाऱ्या चोरट्यांचा शोधासाठी अक्कलकोट ग्रामीण पोलीसांची विविध पथके रवाना - सदर घटनेची नोंद अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
0
0
Report

रत्नागिरी में यूरिया संकट: किसान और दुकानदार मिलकर कंपनियों के खिलाफ विरोध

Ratnagiri, Maharashtra:मॉन्सून तोंडावर आला है. बळीराजा शेती कामामध्ये व्यस्त होत आहे अशातच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे नवे संकट त्यांच्यासमोर उभे राहणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण भटकावे लागत आहे. कंपन्या इतरत्र माल पुरवत आहेत पण, रत्नागिरी साठी माल देण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. याच अन्याय विरुद्ध रत्नागिरी चा बळीराजा आणि दुकानदार एकत्र येऊन युरिया कंपन्यांविरुद्ध एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. युरिया खताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे याचा फटका शेतीला बसणार आहे.
0
0
Report

Diesel theft gangs on highways threaten motorists as fuel shortage and price hike strain wallets

Shirdi, Maharashtra:एकीकडे इंधन तुटवड्यासह पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहन धारक हवालदील झाले आहेत.. इंधन मिळवण्यासाठी रांगा लावून तासंतास पेट्रोल पंपावर ताटकळत उभे राहण्याची वेळ वाहन धारकांवर आली आहे.. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात इंधन चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरीच्या घटनांमुळे वाहन धारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.. V/O - अहिल्यानगर पोलिसांनी गेल्या सात दिवसात नगर मनमाड महामार्ग आणि समृद्धी महामार्ग अशा दोन महामार्गावर डिझेल चोरांच्या टोळ्या गजाआड केल्या आहेत.. आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर डिझेलने भरलेले कॅन जप्त करण्यात आले असून, चालकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून ट्रकमधून डिझेल चोरी केली जात होती.. आधीच इंधन तुटवडा आणि वाढत्या दरामुळे मेटाकुटीस आलेल्या वाहन चालकांना डिझेल चोरीच्या घटनांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.. पोलिसांनी डिझेल चोरांसह ते विकत घेणारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ट्रक चालक मालक संघटनेने केली आहे.. Byte - अयुब कच्छी, पदाधिकारी ट्रक चालक मालक संघटना, अहिल्यानगर V/O - महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून डिझेल चोरत ते कमी दराने विकणाऱ्या टोळ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय आहेत.. त्यामुळे इतर गुन्ह्यांसोबतच डिझेल चोरीच्या या घटनांना पायबंद घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे..
0
0
Report
Advertisement

वासिम-कोंडाला सड़क खस्ताहाल, खड्डे दुर्घटना का साया, मरम्मत की मांग

Washim, Maharashtra:वाशीम ते काँडाला झामरे दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला आहे.तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून निघाले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे बाहेर आले आहेत.त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.जुन्या मुंबई-नागपूर मार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते. मात्र खड्डे चुकवताना अनेक अपघात घडले असून वाहनांचेही नुकसान होत आहे.पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत,अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में अपने गर्भ के दो बच्चों की बिक्री का चौंकाने वाला मामला; गिरफ्तारी

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर शहरात स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांनी सतर्कतेने केली कारवाई अँकर:-- स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याच्या तयारीत ही महिला असताना रामनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मुख्य आरोपी असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या पतीचा 4 वर्ष आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला 26 वर्षीय अजय फुलझेले या तरुणासोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होती. अजय फुलझेले पासून झालेल्या दोन बाळांची या महिलेने जून 2024 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तेलंगानाच्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील एका महिलेला अंदाजे चार ते पाच लाख रुपयांमध्ये विक्री केली. याच दरम्यान आरोपी प्रियकर अजय फुलझेले याने मुख्य आरोपी असलेली महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणाचा रामनगर पोलिसांना सुगावा लागल्याने त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला. पीडितेच्या जबाबावरून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेली 40 वर्षीय महिला आणि बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील दोन महिलांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामागे नवजात बाळांची विक्री करणारं रॅकेट सक्रिय आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

दीपाली सय्यद को धमकी: कुश्ती आखाड़े के पहलवानों ने सुरक्षा का भरोसा जताया

Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या कुस्ती आखाड्यातून पैलवानांचा इशारा, दीपाली सय्यद यांचे भाऊ म्हणून त्यांचे रक्षण आम्ही करू. सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांना भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातील चित्रपटात भूमिक करू नये म्हणून धमकी आली. यानंतर दीपाली सय्यद थेट कुर्डुवाडी मधील कुस्ती आखाड्यात दाखल झाल्या. कुस्ती सम्राट अस्लम काझी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी हजेरी लावली. यावेळी अस्लम काझी आणि इतर उपस्थित पैलवानांनी दीपाली सय्यद यांनी या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका करावी. त्यांनी धमकी देणाऱ्यांना आम्ही आहोत. आमच्या सारखे पैलवान भाऊ सोबत असताना दीपाली सय्यद यांना कोण धमकी देतो आणि काय करतो हे पाहू. सय्यद यांचे रक्षण करण्यास भाऊ म्हणून आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ स्टेशन पार्किंग में 700 रुपये वसूली, 400 रुपये के आधिकारिक दर के उलट

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ स्टेशन पार्किंगमध्ये प्रवाशांची लूट ४०० च्या पाससाठी ७०० रुपयांची वसुली मराठी बोलणार नाही म्हणत कर्मचाऱ्याची मुजोरी पार्किंगमध्ये गोंधळ चाकरमान्यांच्या खिशाला कात्री पार्किंग पाससाठी ३०० रुपये जादा स्टेशन पार्किंगमध्ये ठेकेदाराची दादागिरी अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील पालिकेच्या पार्किंगमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . महिन्याच्या पार्किंग पाससाठी पालिकेने ४०० रुपये दर निश्चित केल असताना, ठेकेदाराकडून तब्बल ७०० रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जादा वसुलीला विरोध करणाऱ्या कर्मचारीने नागरिकांशी उर्मट वर्तन केल्याचाही प्रकार समोर आला असून मी मराठीत बोलणार नाही अशी भाषा वापरल्याने संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला. नगरपालिकेने मासिक पार्किंग पाससाठी ४०० रुपये शुल्क निश्चित केलेलं असतान..., कार साईन या ठेकेदाराकडून तब्बल ७०० रुपये आकारले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पार्किंगमधील अधिकृत दरपत्रकावर पांढरी पट्टी मारून मूळ दर झाकण्यात आला आहे. जादा वसुलीबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांशी पार्किंगवरील कर्मचाऱ्याने उर्मटपणे वर्तन केल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच मराठी बोलण्यास नकार देत, “शेठ जितके सांगतील तितकेच पैसे घेणार” अशी भाषा वापरल्याने नागरिक संतप्त झाले. यानंतर पार्किंग परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचे आरसे तुटणे, स्टँड खराब होणे आणि इतर नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे जादा वसूल केलेले पैसे परत करावेत, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि पार्किंगमधील मनमानी तात्काळ बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या सर्व प्रकारामुळे पालिकेच्या वाहनतळ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन यावर काय कारवाई करतं, याकडे अंबरनाथकरांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top