icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मनसे ने नारायण गौड़ा से मुलाकात से सीमांत क्षेत्र में मराठी-कन्नड़ तनाव बढ़ा

Kolhapur, Maharashtra:मनसे नेत्यांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा यांची भेट घेतल्याने सीमाभागातील मराठी भाषिक संतप्त झालेत. मराठी भाषिकांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेचे प्रमुख नारायण गौडा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी भेट घेतल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी बांधवांच्या विरोधात नेहमी गरळ ओकणाऱ्या नारायण गौड़ा यांची मनसे नेत्यांनी भेट घेतलीच कशी?, असा सवाल महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी उपस्थित केला आहे. नारायण गौडा यांची भेट घेऊन मनसे नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रथम रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही शेळके यांनी केला. मनसेने सीमाभागातील मराठी बांधवांच्या ७० वर्षांच्या संघर्षाचा अपमान केला, अशी टीका देखील शुभम शेळके यांनी केली आहे. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये कन्नड रक्षण वेदिकेची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप करत, अशा संघटनेच्या नेत्याची मनसेने घेतलीली भेट सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचे शेळके म्हणाले. यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सीमाप्रश्नाबाबत सीमावासीयांच्या भावनांच्या विरोधात भूमिका मांडल्याचा दावा शेळके यांनी केला आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात सीमावासीय लढा उभारतील, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला आहे.
0
0
Report

सिंधुदुर्ग किल्ले के पास मछुआरे नाव डूबने से मालिक समेत दो की मौत

Oras Bk., Maharashtra:अकरे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना ‘सागरिका’ ही मासेमारी नौका बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मालवणच्या दांडी येथील नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे हे तिघे ‘सागरिका’ या नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. मात्र सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक नौका बुडाली. या दुर्घटनेत सुयोग परब यांना स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप बाहेर काढलं. मात्र नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन मृतदेह सापडले असून, या दुर्घटनेमुळे मालवणच्या दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

नागपुर में ओबीसी महासंघ के आंदोलन पर बहस, गणेश उत्सव के समय सरकार की भूमिका पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर - बाइट - डॉ बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ On मनोज जरांगे आंदोलन - सरकारने जे काही ठरवले आहे त्याचे पालन करायचे की नाही हा मनोज जरांगे पाटील यांचा संघटनेचा प्रश्न आहे - इकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आंदोलन करणे,आजपासून ते मुंबईला जात आहेत पण त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत - आंदोलकांनी कोणती भाषा वापरावी,कोनाविषयी काय बोलायचे हा त्यांचा प्रश्न आहे,सरकारने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे - पण या राज्यात एक सभ्यता आणि संस्कृती आहे,त्या संस्कृती आणि सभ्यतेचे पालन करूनच सर्वांनी वागावं अस अपेक्षित आहे - गोपनीय आता राहील नाही,त्यांनी जाहीर केलं आहे, 14 पासून गणपती उत्सवाला सुरवात होत आहे,मुंबई आणि कोकणात सर्व धर्मीय गणपती उत्सव साजरा करतात,लाखो लोक गणपती उत्सवात सहभागी होतात - अशा वेळी आंदोलक आणि लाखो लोक सर्व रस्त्यावर आल्यास मुंबईतील वातावरण सलोख्याचे राहील का याविषयी चिंता व्यक्त होत आहे - सामान्य माणसाच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे हे आंदोलकाचे कर्तव्य असतं - आंदोलकांच्या मागे जनसमुदाय मागे राहतो तेंव्हा भावनांचा विचार करावा लागतो म्हणून सरकार त्यांच्याकडे जात असतो,त्यावर टीका करणे योग्य नाही - मुळात हे आंदोलन कशाकरता आहे हे संलर येत नाहीय,म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्याविषयी कुठलीही भूमिका घेतली नाही
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में 2.7 करोड़ मतदाताओं के नाम सूचियों से गायब, पुनः नामांकन संभव

Ratnagiri, Maharashtra:राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे यादीतून वागळली.. प्रारूप मतदार यादी जाहीर.. वगळल्यांमध्ये १७ लाख दुबार तर ३४ लाख मृत्यू झालेले मतदान.. पात्र मतदारांना पुन्हा नोंदवण्याची मिळणार संधी.. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.. ही यादी निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल सह state मुख्य निवडणूक अधिकारी तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे यादीत समाविष्ट झालेले नाहीत,मात्र या त्यापैकी सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली असून त्यांचा समावेश यादीत आहे.. त्यामुळे प्रत्यक्षात वगळलेल्या गेलेल्या मतदारांची संख्या १ कोटी ९० लाख याशिवाय सुमारे ३४ लाख मतदारांचे मृत्यू झाल्याने त्यांची नावे वगळली आहेत..
0
0
Report

नाशिक-धुले में सीएनजी की कीमतें बढ़ीं, प्रति किलोग्राम 98.50 रुपये

Nashik, Maharashtra:नाशिक और धुळे जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी… सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीसाठी वाहनधारकांना ९८ रुपये ५० पैसे प्रतिकिलो मोजावे लागणार आहेत. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमार्गे एलएनजी वाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जागतिक आढावा जारात स्पॉट एलएनजीच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम आता सीएनजीच्या दरावर झाला आहे. नाशिकमध्ये सुमारे एक लाख सीएनजी वाहनधारक असून, आधीपासूनच पुरेसा सीएनजी पुरवठा होत नसल्याने अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत
0
0
Report

बालभारती की गणित पुस्तिका में 15 त्रुटियाँ: शिक्षा व्यवस्था पर सवाल

Kolhapur, Maharashtra:इयत्ता सहावीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील त्रुटींवरून आता बालभारतीच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पायथागोरसच्या सिद्धांतापासून ते त्रिकोणाच्या चुकीच्या प्रश्नापर्यंत. आकृत्यांपासून ते भाषिक चुका आणि अवास्तव उदाहरणांपर्यंत तब्बल 15 त्रुटी माजी गणित तज्ज्ञ समिती सदस्यांनी बालभारतीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत…विशेष म्हणजे या त्रुटींची दखल घेत बालभारतीने संबंधित चुका दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन दिलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या आणि चौथीच्या गणित पुस्तकात देखकर अशाच चुका असल्याचं दिसून आला आहे. या पाठातील काही उदाहरणंही सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पातळीपेक्षा अवघड असल्याचं दावा करण्यात आलाय. दुसरीकडे, गणितासाठी महत्त्वाचा सममिती हा संपूर्ण पाठच पुस्तकातून वगळण्यात आल्याची हरकत घेण्यात आली आहे. तर शेकडेवारीच्या पाठात शेकडेवारीपेक्षा सूट आणि अनुदानाशी संबंधित उदाहरणांवर अधिक भर असल्याचं निदर्शनास आणण्यात आलंय. महागाई दराची तुलना करण्यासारखी उदाहरणंही सहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या दृष्टीने योग्य आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गणिताच्या पुस्तकातील सर्वाधिक ठळक त्रुटींपैकी एक म्हणजे पृष्ठ क्रमांक 119 वरील प्रश्न. 12 मीटर, 7 मीटर आणि 5 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाची परिमिती काढण्यास सांगितलं आहे. पण 7 आणि 5 ची बेरीज 12 इतकीच होते. त्यामुळे या तीन बाजूंनी त्रिकोण तयारच होत नाही. गणिताच्या मूलभूत नियमानुसार कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असणं आवश्यक आहे. प्रश्न तयार करताना ही प्राथमिक गणिती पडताळणी झाली होती का, असा सवाल यामुळे उपस्थित होतो. या पाठातील काही भागांमध्ये अचूकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. VO 2 :- याशिवाय पुस्तकातील दिनदर्शिकेच्या आकृतीत महिना आणि वर्ष नसल्याची हरकत घेण्यात आली आहे. पृष्ठ क्रमांक 47 वरील भिन्नछेद अपूर्णांकाच्या लेखनात दोष असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुणोत्तर आणि प्रमाणाच्या पाठात काही ठिकाणी प्रमाण ऐवजी गुणोत्तर शब्द अपेक्षित असल्याची सूचना करण्यात आली आहे. तर पृष्ठ क्रमांक 105 वरील कोन दुभाजकाची आकृती सदोष असल्याचा दावा करण्यात आला आहे. गणितातील उदाहरणं ही वास्तवाशी संबंधित असणंही तितकंच महत्त्वाचं. पृष्ठ क्रमांक 142 वरील प्राण्यांच्या आयुर्मानाच्या उदाहरणात मांजराचं 25 वर्षे आणि कुत्र्याचं 22 वर्षे आयुर्मान दिलं आहे. ही माहिती वास्तवाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. VO 3 :- पाठ्यपुस्तक हे विद्यार्थ्यांसाठी प्रमाण मानलं जातं. त्यामुळे त्यातील प्रत्येक गणिती प्रश्न, आकृती आणि माहिती अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सरडे यांनी बालभारतीकडे 15 बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. बालभारतीने त्याची दखल घेऊन संबंधित चुका दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे. आता या त्रुटी प्रत्यक्षात दुरुस्त करून विद्यार्थ्यांना निर्दोष आणि गुणवत्तापूर्ण पुस्तक मिळणं हीच अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या चुका फक्त सहावीच्या गणित पुस्तकात आहेत असं नाही. तर तिसरी आणि चौथीच्या गणित पुस्तकात देखील अनेक चुका आढळून आल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील चूक ही केवळ पुस्तकापुरती मर्यादित राहत नाही. तीच चूक विद्यार्थी शिकतो. आणि पुढे त्याच ज्ञानाचा आधार घेतो. आणि भविष्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घडवणाऱ्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक शब्द, प्रत्येक आकृति आणि प्रत्येक गणिती उदाहरण निर्दोष असणं गरजेचं आहे.. त्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे या पुस्तका संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report
Advertisement

बीड: मराठा आरक्षण मामले में मनोज जरांगे पाटील के अनशन का समाधान मांगा गया

Beed, Maharashtra:बीड: मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, खासदार बजरंग सोनवणे يांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी..! ANC - मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता आणि मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी तातडीने संवाद साधावा आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आली आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपला ठाम पाठिंबा असून, समाजाच्या न्याय्य मागणीसाठी सकारात्मक विचार करून आपण उपोषण सोडवण्यासाठी कारवाही करावी अशा विनंतीचे पत्र सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

अण्णा हजारे की तबीयत बिगड़ी, मुंबई के बॉम्बे अस्पताल में भर्ती

PP13h ago
Ahilyanagar, Maharashtra:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे... अण्णा हजारे यांना तीन-चार दिवसांपासून त्रास होत आहे व्यवस्थित जेवणही जात नव्हतं आज प्रकृती जास्त अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तपासणी करण्यासाठी मुंबई हलवण्यात आलं आहे स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डिहायडरेशन चा त्रास असल्याचं सांगितलं आहे अण्णा हजारे यांची प्रकृती जास्त बिघडू नये याची खबरदारी घेत राळेगण येथील कार्यकर्त्यांनी अण्णांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे तपासणी करण्यासाठी दाखल केलं आहे
0
0
Report

मराठी विरोध के बीच रिक्षाचालकों के लिए मराठी अनिवार्यता स्थगित, भाजपा और सरकार पर हमला

Ratnagiri, Maharashtra:रिक्षाचालकांसाठी मराठीच्या सक्तीला स्थगिती; भास्कर जाधवांचा मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल.. मुख्यमंत्री मराठाद्वेष्टे आहेतच, पण आता मराठीद्वेष्टेही निघाले"; भास्कर जाधवांचा घणाघात.. भाजपच्या मागणीनंतर मराठी भाषेच्या निर्णयाला स्थगिती देणे म्हणजे दादागिरी – भास्कर जाधव.. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे समर्थन.. विरोधी पक्षात असलो तरी रिक्षा व्यावसायिकांनी मराठी बोललेच पाहिजे, या भूमिकेसाठी प्रताप सरनाईक यांचे आभार. त्यांनी मराठी शिकण्यासाठी व्यवस्था आणि मुदतही दिली होती.. भाजपवर निशाणा.. मराठी भाषेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भाजपच्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मागणी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी रिक्षाचालकांसाठीच्या मराठी सक्तीला वर्षभरासाठी स्थगिती दिली.. मायुथीमध्ये समन्वयाचा अभाव.. आघाडी किंवा युतीचे सरकार असताना मित्रपक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करणे गरजेचे असते; मात्र केवळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीवरून निर्णय रद्द करणे ही 'दादागिरी' आहे.. मराठी भाषेबद्दल भाजपचा द्वेष.. त्रिभाषा सूत्राच्या वेळीही मराठीला बाजूला सारण्याचे काम फडणवीस सरकारच्या काळात झाले, तेव्हाही मुख्यमंत्री गप्प होते.. रिक्षाचालकांना केवळ प्राथमिक मराठीची गरज.. प्रवाशांशी बोलताना रिक्षाचालकांना फार मोठी भाषा बोलण्याची गरज नसते,केवळ भाडे आणि पत्ता समजण्यापुरते तीन-चार शब्द बोलावे लागतात; तरीही त्याला स्थगिती देण्यात आली.. मराठीद्वेष्टे सरकार.. या निर्णयामुळे राज्यातील मुख्यमंत्री व सत्ताधारी हे मराठी माणूस आणि मराठी भाषेचा द्वेष करणारे आहेत, हेच स्पष्ट होते..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top