416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर में तहसीलदार ने रास्ता रोको प्रदर्शनकारियों के साथ बैठकर उनकी मांगें सुनीं
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मराठा आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी चक्क तहसीलदार बसले रस्त्यावर - सोलापुरात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांसोबत तहसीलदारही बसले रस्त्यावर - मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या रास्ता रोकोमध्ये आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तहसीलदार किरण जमदाडे आणि पोलीस अधिकारी कुंदन गावडे बसले रस्त्यावर - दिवसेंदिवס मराठा आंदोलकांची भावना तीव्र होत असताना प्रशासनाची सामंजस्याची भूमिका - तहसीलदार किरण जमदाडे हे एका पायाने दिव्यांग असताना, आंदोलकांसोबत रस्त्यावर बसून म्हणणे ऐकून घेतल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले - मराठा आंदोलकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर महामार्गावरील रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली - मराठा आंदोलकांच्या भावना ऐकून घेण्यासाठी रस्त्यावर बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे होतेय सर्वत्र कौतुक0
0
Report
वाशीम में बारिश से खरीफ पर संकट, जलस्रोतों के सूखने का खतरा
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यां कडून विहिरी, बोअरवेल, नदी, तलावातून आणि शेततळ्यांमधून सिंचन सुरू आहे. मात्र, जलसाठे पुरेसे भरले नसल्याने पाण्याचा उपसा असाच सुरू राहिला तर नोव्हेंबरअखेर अनेक प्रकल्प, तलाव, विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे आज खरीप वाचवण्या साठी वापरले जाणारे पाणी उद्या पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठी संकट ठरू शकते. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने आतापासूनच गावनिहाय जलसाठ्यांचा आढावा घेत पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.0
0
Report
जलजीवन मिशन में भ्रष्टाचार के आरोप, जिल्हा परिषद विभागवार श्वेतपत्र जारी करेगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जि.प.तील २०२२ ते २०२६ या ४ वर्षाच्या प्रशासकीय काळात जलजीवन मिशन शाळा खोल्या दुरुस्ती, सीसीटीव्ही बसवणे बांधकाम विभागा अशी कोट्यवधींच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे या ४ वर्षात प्रत्येक विभागातील निधी योग्य कामावर व योग्य पद्धतीने खर्च करण्यात आला का, कामे कोणती व कशी केली, याची श्वेतपत्रिका जिल्हा परिषद काढणार आहे. शिंदेसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी केलेल्या मागणीनुसार विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी गावनिहाय कामांची श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिले. अध्यक्षांनी सर्व खातेप्रमुखांना विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले. तसेच बीडीओंनीही कोणत्या गावात, कोणत्या योजनेतून किती रकमेची कामे केली, ती कशी झाली, याची श्वेतपत्रिका १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. जि.प.तील कामांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
मोहगव्हाण में अवैध गावठी दारू का 1600 लीटर सड़ा कर नष्ट, आरोपी फरार
Washim, Maharashtra:मोहत मोहळे? (Note: Original Marathi content cleaned for news relevance) मोहत मोहळे, वाशीम अँकर:वाशिम तालुक्यातील मोहगव्हाणच्या शेतशिवारात अनसिंग पोलिसांनी अवैध गावठी दारूविरोधात कारवाई करत तब्बल १ हजार ६०० लिटर मोहाचा सडवा नष्ट केला आहे.या सडव्याची अंदाजे किंमत १ लाख २८ हजार रुपये असून,पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचले असता घटनास्थळी असलेले संशयित इसम पोलिसांना चकवा देत पसार झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सडवा नष्ट करूनही या कारवाईत एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.मोहगव्हाण परिसरात अवैध दारू निर्मितीविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते, मात्र आरोपी कारवाईपूर्वीच पसार होत असल्याने पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे आव्हान कायम आहे.0
0
Report
झीलों धारणों की सुरक्षा के लिए जलसंपदा के सभी धरणों का स्ट्रक्चरल ऑडिट मंजूर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यातील जलसंपदा विभागाच्या ५ हजार ४१० सिंचन धरणांची सद्यस्थिती आणि सुरक्षितता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ऑडिटमध्ये अनेक बाबी समोर येतात. त्यात धरणांच्या भिंती, सांडवा आणि अन्य ठिकाणी झाडे उगवतात. तर काही धरणांची पिचिंग खराब होते. भराव निघून जातो. अशावेळी धरणांची दुरुस्ती सुचविण्याचे काम स्थानिक अधिकारी करतात. मात्र निधीअभावी सर्वच धरणांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होत नाही. यातून धरणे फुटण्यासारख्या घटना घडतात. धरण बांधण्यासाठी होणाऱ्या खर्चासारखाच खर्च यावर करावा लागतो. शिवाय शेतीची आणि बऱ्याचदा जीवित हानीही होते. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने विभागाच्या जलसंपदा अधिपत्याखालील सर्व धरणांचे एका योजनेंतर्गत स्ट्रक्चरल थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांच्या सुरक्षिततेतील त्रुटी आढळल्यास आवश्यक दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या अहवालाचा उपयोग होणार आहे. हे ऑडिट करण्यासाठी एका मंडळातील पाच अभियंत्यांचे पथक दुसऱ्या जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगरच्या जायकवाडी सह मराठवाड्यातील अकरा मोठ्या धरणांचाही यात ऑडिट होणार आहे..0
0
Report
मराठवाड़ा drought: 158 crore fund allocated to tackle drought planning
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यावर सध्या पावसाऐवजी दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले आहेत. पावसाळा सुरू असतानाच टंचाई आराखडा तयार करण्याचे संकट प्रशासकीय यंत्रणेवर ओढवले आहे. मागील दीड दशकामध्ये सहाव्यांदा असा प्रसंग प्रशासनासमोर आला आहे. विभागातील आठपैकी पाच जिल्हे डेंजर झोनमध्ये आले असून त्या जिल्ह्यातील ४ हजार ७३९ गावांतील ९ हजार १२२ योजनांसाठी आराखडा तयार केला आहे. जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी या पाच जिल्ह्यांसाठी डिसेंबर २०२६ पर्यंत १५८ कोटी रुपयांची तरतूद पाण्यासाठी करावी लागेल. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन झाल्यानंतर नियोजन करण्यात येईल,0
0
Report
Advertisement
बंजारा समाज का तीज उत्सव: परंपरा और एकजुटता का चित्ताकर्षक उत्साह
Washim, Maharashtra:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा तांड्यावर बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि युवतींनी तीजच्या टोपल्या डोक्यावर घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. पारंपरिक गीतांनी संपूर्ण तांडा दुमदुमून गेला. सती आई मंदिरापासून निघालेली मिरवणूक भवानी माता संस्थान आणि सेवालाल महाराज संस्थान येथे पोहोचली. त्यानंतर तलावात तीजचे विधिवत विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी भावुक वातावरण निर्माण झाले. तीज हा धार्मिक उत्सवासोबतच बंजारा समाजाची एकजूट आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.0
0
Report
ओझर विघ्नहर्ता गणपति द्वारयात्रा आज उत्साह के साथ शुरू
Barav, Maharashtra:अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर्त्याचा भाद्रपद द्वारयात्रा उत्सव आजपासून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला आहे. पहाटेची विधीवत महापूजा संपन्न झाल्यानंतर विघ्नहराला आकर्षक पोषाख आणि सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले असून, मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. गणरायाला त्याच्या बहिणींना निमंत्रण देण्यासाठी पालखीतून घेऊन जाण्याची येथील शेकडो वर्षांची परंपरा असून, हजारो भाविक अनवाणी पायांनी या द्वारयात्रेत सहभागी होत आहेत. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात कुस्त्यांचा आखाडा, कीर्तन महोत्सव आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा थेट ओझरमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
यवतमाळ दौरे में किसानों ने दुष्काळ बताई; सूखा घोषित और फसल बीमा मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांसमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. पुसद येथे समिती सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन दाखवून दुष्काळी स्थिती बाबत अवगत केले. खरीप हंगामातील पिकांचे पावसाअभवी प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी या 27 आमदारांच्या समितीने प्रवृत्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासोबतच शेतकऱ्यांना रखडलेला पिक विमा द्यावा, माळपठारावरील पाणी प्रश्न दूर करावा अशाही मागण्या करण्यात आल्या.0
0
Report
Advertisement
वाशिम रेलवे स्टेशन के पास तीन आरोपी गिरफ्तार, हथियार और मोबाइल जब्त
Washim, Maharashtra:वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात दरोड्याचा डाव आखत टपून बसलेल्या तीन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन चाकू, मिरची पुडी, लांब खिडा, छोटी टॉमी, हँडग्लोज आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. विशाल कालाबाल्या चव्हाण, यशवंत चव्हाण आणि शंकेश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा संभाव्य प्रकार घडण्यापूर्वीच उधळून लावण्यात आला. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.0
0
Report
अकोला में मिट्टी की गणेश मूर्तियाँ, अनाज से सजीं; 65 हजार बीज वितरित होंगे
Akola, Maharashtra:गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना अकोल्यात पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. महिला मूर्तिकार रेवती भांगे गेल्या १० ते ११ वर्षांपासून लाल मातीपासून गणेशमूर्ती साकारत आहेत.यंदा त्यांनी गहू, तांदूळ, चणे, विविध डाळी, राजमा, ज्वारी, वाटाणा अशा विविध धान्यांपासून अनोखी गणेशमूर्ती तयार केली आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. विशेष म्हणजे विसर्जनानंतर या मूर्तीतील धान्याचा वापर करता येणार आहे.यासोबतच गणेशमूर्तीच्या माध्यमातून लिली, कर्दळी आणि तुळशीच्या बियांचे वाटप करण्यात येणार असून, यंदा तब्बल ६५ हजार बियांचे वाटप करण्याचा संकल्प आहे.त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अकोल्यातून दिला जात आहे.0
0
Report
नागपुर में ऑपरेशन शक्ती: होटल्स-लॉजों पर पहचान और CCTV अनिवार्यता
Nagpur, Maharashtra:नागपूर ब्रेकिंग - OYO आणि हॉटेल्सवर ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत नागपूर पोलिसांच्या वॉच राहणार आहे....नियम तोडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल होणार... - मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे कडक निर्देश - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची अधिसूचना - नागपूर शहरातील OYO, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्ट stem मध्ये होणाऱ्या बेकायदेशीर घडामोडींना आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. - हे नियम सप्टेंबर 2026 ते 9 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहेत. - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसच्या मालक किंवा व्यवस्थापकांविरुद्ध थेट कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. - प्रत्येक OYO आणि हॉटेलच्या मुख्य भागात ‘मानवी तस्करी आणि बेकायदेशीर कामांना थारा दिला जाणार नाही’ असा ‘झिरो टॉलरेंस’ बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. - ग्राहकांना खोली देण्यापूर्वी मूळ ओळखपत्र तपासून त्यांची संपूर्ण माहिती रजिस्टर किंवा डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवावी लागणार आहे. - ओळखपत्रावर जन्मदिनांक आणि स्थायी पत्ता असणे आवश्यक असून, PAN कार्ड सामान्यतः ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाणार नाही. - दोन्ही व्यक्ती 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असल्यास संमतीने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर आहे, मात्र त्यांची वयाची आणि निवासाची पडताळणी करून नोंद ठेवणे बंधनकारक असेल. - अल्पवयीन व्यक्तींच्या प्रवेशाबाबत कडक पडताळणी केली जाणार असून, पालक सोबत नसल्यास त्यांना प्रवेश देता येणार नाही. - हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून लॉबीपर्यंत 24 तास CCTV सुरू ठेवणे आणि त्याचे किमान 1 वर्षाचे फुटेज जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. CCTV कॅमेरे नादुरुस्त आढळल्यास ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. - हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ओळखपत्रे, रहिवासी दाखले आणि फोन नंबरची अद्ययावत माहिती मालकांकडे ठेवणे बंधनकारक असेल. - दरम्यान, नागपूर पोलीस आणि OYO कंपनीने संयुक्त कारवाई करत अनधिकृतपणे OYOचे नाव वापरणाऱ्या 20 पेक्षा जास्त हॉटेल्सचे साईनबोर्ड हटवले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. - ‘ऑपरेशन शक्ती’च्या माध्यमातून हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायातील बेकायदेशीर प्रकारांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.0
0
Report
Advertisement
सटाणा-नागपूर मार्ग पर अज्ञात ने डाळिंब बाग में कीटनाशक डाला, लाखों का नुकसान
Nashik, Maharashtra:सटाणा-नागपूर रस्त्यावर संतापजनक प्रकार! अज्ञात माथेफिरूने डाळिंबाच्या बागेवर मारले तणनाशक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान. सटाणा-नागपूर रस्त्यालगत असलेल्या गौतम रमेश सोनवने यांच्या डाळिंब बागेवर शेतकऱ्याचे तब्बल ५ ते ६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सटाणा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.0
0
Report
सांगली सांसद विशाल पाटील ने सरकार पर आरोप, सड़क पर जनता शासन करती है
Sangli, Maharashtra:अँकर - जनता ही रस्त्यावर राज्य करते,हे सरकारने विसरू नये,मंत्रालय व सचिवालयाच्या जीवावर तुम्ही राज्य चालवू शकत नाही,असा इशारा सांगली खासदार विशाल पाटिलांनी मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनावरून सरकारला दिला आहे.तसेच आंदोलनक ऐवजी आंदोलकांच्या मुख्य लोकांना मॅनेज करायचे हे सरकारची सवय, दुर्दैवी असल्याची टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे-पाटलांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून सरकारकडून घेण्यात येणाऱ्या भूमिकेवरून विशाल पाटलांनी हे टीका केली आहे, सांगलीमध्ये मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.0
0
Report
पुणे के वसूलीवाले पुलिस अधिकारी ने आयुक्त को मरने की धमकी भेजी, गिरफ्तार
Pune, Maharashtra:पुण्यातील वसुलीवाल्या पोलिसाची आयुक्तांना गुगली देण्याचा प्रयत्न फसला जीवाचे वाईट करतो म्हणाला अन् काही तासांत झाला हजर!!! पुणे- शहरात गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचे नियोजन सुरू असताना स्पा सेंटरमधील तत्कालीन वसुली वाल्या पोलीस अमलदाराने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच जीवाचे बरेवाईट करण्याचा मेसेज केला. मोबाइल बंद करुन अंडरग्राउंड होण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता आपल्याला सहानभूती मिळेल, साईट पोस्टिंगवरुन चांगल्या ठिकाणी बदली होईल अशी त्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, पोलीस प्रशासनाने तात्काोल संबंधित अमलदाराचा शोध घेऊन त्याला आयुक्तालयात येण्यास भाग पाडले. अखेर आयुक्तांनी दिलेल्या कानपिचक्यानंतर कर्मचार्याची चांगलीच तंतरली होती. हा कर्मचारी अडीच वर्षांपुर्वी शहरातील बहुतांश स्पा, मसाज सेंटर व्यावसायिकांकडून वसुलीचे काम करत होता. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांनी ६४ वसुलीबाज अमलदारांना वठणीवर आणले होते. तेव्हापासून त्याच्यासह ბევಷ್ಟು वसुलीवाले अमलदार पोलीस मुख्यालयासह साईट पोस्टिंगवर आहेत. अद्यापपर्यंत त्यांना अपेक्षित गुन्हे शाखा, तपास पथकासह महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती नाही. दरम्यान, संबंधित अमलदार मुख्यालयातील नियुक्तीला कंटाळला होता. त्यामुळे पोलीस मुख्यालयातील अधिकार्याच्या त्रासाला कंटाळून वाईट विचार करण्याचा निर्णय घेत असल्याचा मेसेज त्याने आयुक्तांना करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्याविरुद्ध वारंवार nिनावी तक्रारी अर्ज केले जात असल्याचा उल्लेख त्याने अर्जात केला होता. मात्र, उलटेच घडल्यामुळे त्याचा गुगली डाव फसल्याची पोलीस दलात चर्चा रंगलीय.0
0
Report
Advertisement
