416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सह्याद्री की हरियाली में ओझर्डे नवजा झरना पर्यटकों का प्रमुख आकर्षण
Satara, Maharashtra:पाटण, सातारा- सह्याद्रीच्या कुशीत पावसाने रंगवलेलं निसर्गाचं अप्रतिम चित्र... हिरवागार डोंगर, धुक्याची शुभ्र चादर आणि त्या चादरीतून दिमाखात कोसळणारा ओझर्डे-नवजा धबधबा... हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वळू लागली आहेत. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा, त्याच्या सभोवतालचं मनमोहक वातावरण आणि निसर्गाने उधळलेली हिरवाई पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. पावसाळ्यात खुललेलं हे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येथे दाखल होत असून, ओझर्डे-नवजा धबधबा सध्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.0
0
Report
FDA ने कराड की शामगाव दूध डेयरी में मिलावट का खुलासा, पाम तेल मिला
Satara, Maharashtra:कराड तालुक्यातील शामगाव येथील राधे डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मध्यरात्री धाड टाकून दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आणला. दुधामध्ये पामतेल व दूध पावडर मिसळून भेसळ केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भेसळ करणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून संबंधितांना आज कराड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एपीआय पंकज पवार व एफडीए अधिकारी वंदना रूपवनकर यांनी दिली.0
0
Report
खड्डे के कारण दुचाकी गिरने से महिला व बच्चे घायल, प्रशासन से मरम्मत की मांग
Kalyan, Maharashtra:खड्ड्यात पडली दुचाकी मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना महिला दुचाकीसह पडली खड्ड्यात लहान मुलाला दुखापत अहिल्याबाई चौक परिसरात खड्ड्यामुळे एक अपघात झालाय .आपल्या लहान मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना दुचाकी सह महिला खड्ड्यात पडली.या अपघातात चिमुकल्याला दुखापत झालीय.त्याला उपचारार्थ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलाय .खड्डे बुजवावेत नाही तर खड्यात झाडें लावून आंदोलन करण्याचा इशारा कॉग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
वसई: मांडवी के जिल्हा परिषद स्कूल में अभिभावकों का प्रदर्शन, कक्षाएं ठप
Vasai-Virar, Maharashtra:वसई तालुक्यातील मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेला संतप्त बालकांनी टाळे ठोकून आंदोलन सुरू केलं ..शाळेच्या वर्ग खोल्यांची दयनीय अवस्था आणि दोन शिक्षक मंजूर असताना गेल्या दीड वर्षांपासून केवळ एकच शिक्षक पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे १००% आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडल्याचा आरोप करत पालकांनी आंदोलन छेडले आहे. शिक्षण विभागाला अनेक तक्रारी करून देखील दाद घेतली जात नसल्याचा आरोपाने आज पालकांना पालकांनी थेट वर्गालाच टाळे लावल्याने वर्गा बाहेरच शाळा भरवण्याची वेळ आली है. तातडीने मागण्या मान्य न केल्यास शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरणार असल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.0
0
Report
SC उपवर्गीकरण के विरोध में विराट मोर्चा: राज्य सरकार पर दबाव बढ़ा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात SC उपवर्गीकरणाविरोधात काढण्यात आला विराट महामोर्चा सोलापुरात SC उपवर्गीकरणाविरोधात काढण्यात आला विराट महामोर्चा SC आरक्षणाचे उपवर्गीकरण न करण्याची करण्यात येतेय जोरदार मागणी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन डॉ. बाबासाहेब उद्यान ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात उपवर्गीकरण करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार SC आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप0
0
Report
बीड की अनुजा हवाले इस्रो दौरे के लिए चुनी गई पहली छात्रा, गांव में उत्साह का माहौल
Beed, Maharashtra:शेतकऱ्याच्या चिमुकल्या लेकीची इस्रोकडे झेप! बीडच्या अनुजा हावळेची राज्यात दुसरी येत ऐतिहासिक कामगिरी ANC - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, satra येथील इयत्ता दुसरीत शिक्षण घेणारी अनुजा हावळे हिने बीटीएस (भारत टॅलेंट सर्च) परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या बळावर तिची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) येथे शैक्षणिक संशोधन व विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी निवड झाली आहे. चार दिवसांच्या या शैक्षणिक दौऱ्यात अनुजाला इस्रोमधील संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि अंतराळ तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, इस्रोच्या शैक्षणिक संशोधन पाहणीसाठी निवड झालेली अनुजा ही बीड जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. अनुजा ही एका शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे गावासह संपूर्ण बीड जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. इस्रोच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी आज गावात आणि शाळेत अनुजाचा सत्कार करून तिला शुभेच्छांसह निरोप देण्यात आला. शिक्षणप्रेमींनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.0
0
Report
Advertisement
भंडारा पंचायत समिति के सभापति से पैसा मांगने का आरोप, दिव्यांगों ने किया भीख मांगो आंदोलन
Bhandara, Maharashtra:भंडारा पंचायत समिति की दालान में भीख मांगो आंदोलन... दिव्यांग बांधवाने भीख के पैसे सभापती को देण्यासाठी त्यांच्या दालनात पोहचले... Anchor : - भंडारा पंचायत समिति येथून दिव्यांग बांधवांना कही योजनेचा लाभ दिला जातो. यात १० हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी प्रत्येक दिव्यांग बांधवानी २ हजार रुपये द्यावं अशी मागणी पंचायत समिती सभापती यांनी केली होती. म्हणून आज दिव्यांग बांधवानी भीख मांगो आंदोलन केला. भिखित मिळालेले पैसे घेऊन सभापती यांच्या दालनात पोहचले. आधीचा दिव्यांग असल्याने त्यांच्याकडून एका सभापतीने पैशाची मागणी करणे चुकीचे आहे.. म्हणून सर्व दिव्यांग पंचायत समिती येथे धडक दिली. यात जर आपली चुक झाली असेल तर पैसे परत करेन असे आश्वासन सभापती यांनी दिले आहे.0
0
Report
Kolhapur के ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह निजीकरण के प्रस्ताव पर कलाकारों का भारी विरोध
Kolhapur, Maharashtra:Kolhapur के ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह को دوبارہ रंगभूमि पर लाने की तैयारी चल रही है। पुनर्बांधणी और नवीनीकरण का काम अंतिम चरण में है और जल्द उद्घाटन की योजना नगर पालिका की ओर से बनाई गई है। हालांकि उद्घाटन से पहले ही इस नाट्यगृह के निजीकरण के निर्णय पर नया विवाद खड़ा हो गया है। शाहू महाराज ने स्थापित की गई इस ऐतिहासिक वास्तु को निजी संस्थान के हाथों में देने को रंगकर्मी विरोध कर रहे हैं। कोट्यवधी रुपये खर्च करके बने इस नाट्यगृह को किराये पर चलाने के निर्णय को शाहू महाराज की पहचान के साथ जोड़कर देखा जा रहा है, और रंगकर्मी सड़कों पर उतरने की तैयारी में हैं। इस बीच महापालिका ने रंगकर्मी की भूमिका सुनने का दावा किया और समाधान निकालने का आश्वासन दिया गया है। नाटकगृह के प्रशासनिक नियंत्रण को लेकर सवाल उठते रहे हैं और कुछ प्रश्न अब भी unresolved हैं।0
0
Report
बीड़ में पंकजा मुंडे के जन्मदिन पर-banner चर्चा का केंद्र, जनता के मन में मुख्यमंत्री
Beed, Maharashtra:‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’... पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये झळकला चर्चेचा बॅनर; राजकीय वर्तळात रंगल्या चर्चा ANC - राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. मात्र बीड शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर "पंकजा मुंडे... जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा ठळक उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बीड येथील शासकीय विश्रामगृहासमोर लावण्यात आलेल्या या आकर्षक बॅनरवर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो, मंत्री पंकजा मुंडे यांचे मोठे छायाचित्र तसेच शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोटो झळकत आहेत. विकास ढोरमारे आणि साहस आदोडे यांनी हा शुभेच्छा फलक उभारला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा उल्लेख केल्याने या बॅनरची राजकीय अर्थाने चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बॅनरकडे राजकीय निरीक्षक आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले असून, बीडच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. बाईट: साहस आदोडे0
0
Report
Advertisement
मेळघाट के चार आदिवासी आश्रम विद्यालयों में भोजन से विषाक्रण, 143 छात्र प्रभावित
Amravati, Maharashtra:मेळघाटात चार आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण १४३ विद्यार्थी बाधित झाले आहेत. सुरुवातीला टीटबा आदिवासी आश्रम शाळेतील ७०, त्यानंतर बिजूधावडी आश्रम शाळेतील ४०, सुसरदा आश्रम शाळेतील ३ आणि सावलीखेडा येथील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धवट शिजवलेले अन्न जेवणात दिले जात असल्याने विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मेळघाटात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून पालकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मेळघाटातील आदिवासी आश्रम शाळांना सेंट्रल किचनद्वारे जेवण पुरवले जाते. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान धारणी पोलीस स्टेशनमध्ये sेंट्रल किचनच्या मालकासहित सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.0
0
Report
महाबळेश्वर में भारी बारिश, किसानों की फसलें रंगीली, पर्यटन भी तेज
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वरमध्ये बरसणाऱ्या मुसळधार पावसाने आपली दीड शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे. गत दहा ते बारा दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असाच پाऊس पुढील काही दिवस राहिल्यास हा पाऊस हा दीडशे इंचाचा टप्पा लवकरच पार करेल. सध्या दाट धुकं कडाक्याची थंडी संततधार पावसात देखील पर्यटक येथे येत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. तसेच जोरदार वाऱ्यामुळे मुख्य बाजारपेठेत काही ठिकाणी दुकानांचे फलक पडून नुकसान झाल्याची माहिती मिळाली तर परिसरात झाड कोसळण्याचेही प्रकार घडत आहेत.महाबळेश्वर तालुक्यात यंदा पावसाने काहीशी संथ सुरुवात केली आहे. अर्धा जून महिला कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगला जोर धरला. यानंतर ०१ जून ते ०१ जुलैपर्यंत ४७०.२८ मिमी १८.५२ इंच पावसाची नोद झाली. त्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसाने अवघ्या ६ दिवसात २० इंच त्यानंतर १५ इंच अशी उच्चांकी पावसाची नोंद झाली. यानंतर दुसऱ्याच आठवड्यात वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला.यानंतर दुसऱ्याच आठवड्यात पावसाने १०० इंचाचा टप्पा सहज गाठला. यानंतर तिसऱ्या आठवाड्यात पुन्हा महाबळेश्वरमध्ये जोरदार सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार इंच दररोज पावसाची नोंद होत असून आता या पावसाची दीडशे इंचाकडे वाटचाल सुरु आहे. या पावसाने शेतीच्या कामांना देखील वेग आला असून भातशेती जोरदार सुरु असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन सुरू झाले असून वीकएंडला पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.0
0
Report
जालना में 40 मौसम केंद्रों में छेड़छाड़: प्रशासन ने कड़ी कार्रवाई की चेतावनी
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड झाल्यानं खळबळ निर्माण झाली आहे; जिल्हा प्रशासनाकडून दखल. यापुढे असे प्रकार घडल्यास दोषींवर कठोर कारवाई करणार, जिल्हाधिकाऱ्यांचा ईशारा. स्वयंचलित हवामान केंद्राच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात 49 स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. यातील 40 हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड झाल्याचं समोर आलं असून काही गावात गेल्या आठवड्यात पावसाचा अंदाज खोटा नोंद झाल्याचे आढळले. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त आहेत. स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे वातावरणातील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा आणि पावसाच्या अचूक, रिअल-टाइम मोजणारी अत्याधुनिक टेक्नॉलजी प्रणाली आहे. या माहितीचा उपयोग हवामान अंदाज, कृषी नियोजन, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादींसाठी होतो; मात्र गेल्या अडीच ते तीन महिन्यांत या यंत्रणेत छेडछाड झाल्यानं शेतकरी चिंतातुर झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे; हा खोडसाळपणा स्कायमेट कंपनीच्या गलथान कारभारामुळेच घडला असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर स्पष्ट केले आहे की यंत्रणेत छेडछाड केल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि हवामान केंद्रांच्या सुरक्षेसाठी CCTV लावण्याचेही आदेश दिले गेले आहेत. 49 पैकी 40 केंद्रांत झालेल्या छेडछाड प्रकरणी 5 पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल झाली आहे; मात्र गुन्हा अजून नोंद झाला नाही. अधिकाऱ्यांनी असे प्रकार पुन्हा घडले तर प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले."0
0
Report
Advertisement
आदिती तटकरे कहतीं: पंद्रह सौ रुपये खरीद में नहीं बचते, गरीब महिलाएं परेशान
Mumbai, Maharashtra:आदरणीय संपादक साहेब आणि माझ्या पत्रकार बंधू भगिनींनो आपल्यासाठी पॉइंटर... विषय: आदिती तटकरे म्हणतात पंधराशे रुपये सर्व "खरेदीमध्ये संपवू नका..." त्या वेळचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून गोरगरीब महिलांना किरकोळ खर्च भागविण्याकरिता त्यांचे राहणीमान उंचविण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आदिती तटकरे ताई म्हणतात सर्वच्या सर्व पंधराशे रुपये खरेदीमध्ये संपवू नका. माझ्याकडे व्यापारी वर्ग येतो आणि म्हणतो डीबीटी द्वारे पंधराशे रुपये वेळच्या वेळीच देत जा का ? तर म्हणे तुम्ही पंधराशे रुपये दिल्याबरोबर आमचा व्यापार वाढतो. व्यापाराला तेजी येते. परंतु सत्य परिस्थिती तशी नाही महिन्याकाठी पंधराशे रुपये आल्या बरोबर दारात वाणी उभा असतो, पेपरवाला उभा असतो, डॉक्टर आपलं बिल मागत असतात, तर मुलांच्या ट्युशन चे शिक्षक त्यांची फी मागत असतात. सरते शेवटी या माय भगिनींच्या हाती पंधराशे मधील पंधरा रुपये सुद्धा उरत नाहीत याची सुद्धा नोंद मंत्री महोदयांनी घ्यावी.0
0
Report
NEET में कम अंकों से छात्रा ने की आत्महत्या, परिवार और प्रशासन में हड़कंप
Ahilyanagar, Maharashtra:NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे... दोन वेळेस परीक्षा दिली दुसऱ्या वेळेस दिलेल्या परीक्षेमध्ये कमी गुण आल्याने अंकिताने आत्महत्या केली आहे NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक अणुकिता सांगळे या विद्यार्थिनीने NEET ची परीक्षा दोन वेळेस दिली दुसऱ्या वेळेस तिला NEET परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले आहेत... अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती... बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले... अंकिताच्या आत्महत्यामुळे घरातील कुटुंब अस्वस्थ झाल आहे... अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात गळफास घेऊन आत्महत्या केलीचे घरच्यांचे म्हणणे आहे... मात्र पेपरफुटीच्या आधी जे पेपर झाले होते त्यात तिला चांगले गुण मिळाले होते... खासदार निलेश लंके यांनी सांगळे कुटुंुबीयांची भेट घेतली अंकितांच्या पालकांचा सांत्वन केलं आणि या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे ... अंकिता च्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले आहे ... NEET पेपर फुटीमुला दिल्लीमध्ये झालेल्या तरुणांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे राजीनामा देण्याआधी देशात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मात्र कमी मार्क आल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा सत्र अजूनही थांबत नाहीये0
0
Report
चिपळुण में दूषित पानी के खिलाफ ग्रामीणों ने MPCB कार्यालय के बाहर प्रदर्शन
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. लोटे एमआयडीसीतील दूषित पाण्याविरोधात चिपळूणमध्ये जनक्षोभ; एमपीसीबी कार्यालयावर शेकडो ग्रामस्थांचा ठिय्या.. पावसाचा फायदा घेत लोटे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांनी दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कार्यालयावर जोरदार ठिय्या आंदोलन छेडले.. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते.. आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत प्रदूषणकारी कंपन्यांवर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला..0
0
Report
Advertisement
