icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई महापालिका: सोमनाथ केकाण की कार्यमुक्ति महासभेत मंजूर

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेचे नगररचनाकार सोमनाथ केकाण यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव आज महासभेत मंजूर करण्यात आला. तर अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यावर कार्यमुक्त करण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात ठिय्या मांडला होता. वाशीतील नैवेद्य इमारतीला नियमबाह्य पद्धतीने पूर्णत्व प्रमाणपत्र (CC) आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC) दिल्याचा ठपका सोमनाथ केकाण यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणातील चौकशीनंतर त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे सोमनाथ केकाण यांना कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्याची माहिती महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तसेच, नगररचना विभागात त्यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या इतर प्रकरणांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तर चुकीच्या पद्धतीने पदावर आलेले अग्निशमन अधिकारी पुरषोत्तम जाधव याच्यावर कारवाई न करता केकाणी यांच्यावर कारवाई केली असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

नागपुर में भाजपा- कांग्रेस के संघर्ष के बीच पुलिस ने रोका प्रदर्शन

Nagpur, Maharashtra:नागपूर में भाजप युवा मोर्चा के द्वारा काँग्रेस के शहर कार्यालय देवड़ीया भवन के पास निषेध आंदोलन किया गया. दिल्लीत राहुल गांधी और काँग्रेस नेताओं द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के निवासस्थान के बाहर किए आंदोलन का प्रतिउत्तर नागपूर में भाजपाकडून शहर काँग्रेस के कार्यालय को घेरने का प्रयास किया गया. चिटनीस पार्क के पास काँग्रेस विरुद्ध घोषणाबाजी के बाद भाजप कार्यकर्त्योंने पुलिस की रोके-बांधे बाड़ों को पार कर काँग्रेस कार्यालय की ओर बढ़े. इस दौरान काँग्रेस कार्यालय में पहले से ही अनेक काँग्रेस कार्यकर्त्ता थे, जिससे भाजपा और काँग्रेस के कार्यकर्त्यों के बीच संघर्ष की स्थिति बन गई. इसके बाद पुलिस ने काँग्रेस कार्यालय के बाहर भाजप कार्यकर्त्यों को रोका और उन्हें ताब्यात लिया. इस समय ग्राउंड ज़ीरो से आंदोलन स्थल का आकलन हमारे प्रतिनिधियों ने किया.
0
0
Report

अंधेरी पश्चिम में दुकानदार के रोल पर मक्खियाँ बैठने का वीडियो वायरल—खाद्य सुरक्षा पर सवाल

Mumbai, Maharashtra:अंधेरी पश्चिम परिसरातील मेरवांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या रोलमध्ये माशा फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अन्नसुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हिडिओमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या Rollवर माशा बसलेल्या आणि फिरताना स्पष्टपणे दिसत आहेत. खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जात असल्याने स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत आहे का, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या दुकानातून खाद्यपदार्थ खरेदी करत असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे
0
0
Report
Advertisement

फडणवीस के जन्मदिन पर शिवराज राजस्व शिविर: 3000 से अधिक लाभार्थी लाभ उठाते नजर

Yeola, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तथा स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती निमित्त महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर दिनांक 22 जुलै रोजी वर्मा लॉन्स एरंडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी 3000 हून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये वितरित केला गेला या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी आमदार मारुतीराव पवार, शिक्षक आमदार किशोर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे, जिल्हा परिषद चे माजी सभापती राधाकिसन आप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, संभाजी राजे पवार, यांच्यासह येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
0
Report

साड़ी नहीं मिली, पति की हत्या: कुकर से घातक हमला

Ambernath, Maharashtra:साडी दिली नाही म्हणून पतीची डोक्यात कुकर घालून हत्या! बदलापूरच्या शिरगावातील धक्कादायक घटना पोलिसांनी ठोकल्या आरोपी पत्नीला बेड्या बदलापूरच्या शिरगाव परिसरात 35 वर्षीय हरेराम सिंग हा पत्नी सुनीता देवी आणि सात वर्षांच्या मुलासोबत राहत होता. हरेराम हा अपंग असल्याने अंथरुणाला खिळलेला होता. त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. अशातच त्यांच्यात साडी देण्यावरून पुन्हा एकदा वाद झाला आणि याच वादात सुनीताने हरेरामच्या डोक्यात कुकर घातला. त्यानंतर त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. यानंतर तिने पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सात वर्षांच्या मुलाचा जबाब घेतल्यानंतर सत्य समोर आलं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पत्नी सुनीताविरोधात गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

NEET मामले पर विरोधी आंदोलन ने बदनाम किया, नेताओं की राजनीति उजागर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत Delhi आंदोलन: आंदोलनाच्या ठिकाणी राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले. जेवढे नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील पक्ष आहेत, त्यांचे प्रमुख या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन केवळ NEETपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्याचे काम सर्व विरोधक करत आहेत. विरोधकांना यात काहीही यश येणार नाही. स्वतःचा पक्ष संपत असताना दीपक यांच्या नावावर स्वतःच्या पक्षाची उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. On सर्वोच्च न्यायालय टिपण्णी: सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले, यावर आपण इथे बसून चर्चा करू शकत नाही. अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लाठीचार्जला शिवसेना समर्थन करत नाही. लाठीचार्जमध्ये मार लागलेल्यांमध्ये नेते कोणी होते का? त्यामध्ये कोणतेही नेते नव्हते. CJPचा प्रवक्ता त्या ठिकाणी बर्गर खात होता. CJP कोणत्या मार्गाने जात आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनीही केला पाहिजे. NEETच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या आंदोलनात पक्षांचे नेते येऊन मार्गदर्शन करत आहेत. या मुलांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपल्या देशासाठी योग्य नाही. On शरद पवार–मोदी भेट: ही एक प्रक्रिया आहे. शरद पवारांनी भेट घेतली, हा राजकारणातील संस्कार आहे. बाकीचे संपलेले पक्ष CJPच्या आंदोलनावर स्वार होत आहेत. आपण विद्यार्थ्यांसाठी मोठे काम करत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसची सत्ता असतानाही दोन-दोन्हां महिन्यांनी पेपर फुटायचे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना त्यात राजकारण नको. या आंदोलनावर आरूढ होऊन अनेक लोक आपल्या पोळ्या भाजत आहेत. ते महाराष्ट्राला आणि देशालाही कळत आहे. On उद्धव ठाकरे: एक महिन्यानंतर उद्धव ठाकरे तिथे गेले, खूप चांगले आहे. आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी कदाचित ऑनलाइन बोलले असते. पण ते गेले, आम्हाला आनंद आहे. (असे म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.) डाव्या विचारांत आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही सामील होत आहे. काँग्रेसदेखील डाव्या पक्षांमध्ये सामील झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळ्या ट्रॅकवर आणले गेले आहे. याला जबाबदार एनडीएच्या विरोधातील सर्व पक्ष आहेत. On सरकार भूमिका: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हा एक राजकीय दृष्टिकोन आहे. CJPच्या आंदोलनात RSSविरोधी घोषणा होतात. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा होतात. CJPला समर्थन देताना उद्धव ठाकरे गट एवढा खाली गेला की दादरमधील आंदोलनात औरंगजेब आमचा आयडॉल आहे, असे फलक दाखवण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन कोणत्या मार्गाने जात आहे, ते पहा. औरंगजेब हा नेता म्हणून जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि CJP एकत्र जाणार असतील, तर पुढची पिढीने काय घ्यायचे? दीपक यांचे आंदोलन विरोधकांच्या ट्रॅकवर आले आहे. हे सरकारच्या लक्षात आले. एनडीएविरोधात टोकाची भूमिका घेणारेच या आंदोलनात सहभागी झाले. मुलांच्या आंदोलनाचा फायदा इंडिया आघाडी घेत आहे. On हिंदू पेपर: चौथ्या स्तंभाचा मला आदर आहे。 बाहेरुन आलेल्या विरोधी पक्षांच्या घुसखोरांनी सर्वप्रथम पोलिसांना मारहाण केली. म्हणूनच लाठीचारдж झाला. लाठीचार्ज होण्याचे सर्वात मोठे पाप विरोधकांचे आहे. आंदोलनात घुसखोरी झाली नसती, तर कधीच लाठीचार्ज झाला नसता. On सरकार प्रतिमा: सुधारण्यासाठी राजीनामे नाही NEET पेपरफुटी प्रकरणात राजीनाम्याची मागणी केली जात आहे. कुठल्याही भ्रष्टाचाराच्या संदर्भात राजीनामा मागितला जात नाही. मुद्दा मंत्र्यांना टार्गेट करण्याऎक्षा व्यवस्था सुधारण्याचा असला पाहिजे. आणि ती व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. On आंदोलनाचा फायदा: आंदोलनाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे होता. विरोधक विद्यार्थ्यांच्या आडून या आंदोलनावर स्वार झाले. त्यामुळे हे आंदोलन बदनाम झाले. दीपक यांच्या बाबतील भूमिका नक्कीच सहानुभूतीची आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता विद्यार्थी बोलू लागले आहेत की, ज्या आंदोलनासाठी आलो होतो, त्या NEETबाबत कुणीच बोलत नाही. विरोधक फूस लावत आहेत. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. On अजित पवार; अजित पवार यांनीच मला प्रशासन चालवायला शिकवले. On मनोज जरांगे: जरांगे पाटील शुद्ध हेतूने आंदोलनस्थळी गेले. त्यांना पक्ष काढायचा नाही किंवा कोणतेही मंत्रिपद भूषवायचे नाही. बाकीच्यांच्या भावना शुद्ध नव्हत्या. बाकीच्यांची भावना, हा कधी खाली येतो आणि मी कधी बसतो, अशी आहे. हा भारताला बदनाम करण्याचा डाव आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top