416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमरावती में 35 दिन से बारिश नहीं: खरीप फसलों पर भारी असर
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात 35 दिवस पावसाची दडी; सहा तालुक्यांत सरासरीच्या 50 टक्क्यांपर्यंतच पाऊस अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 35 दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये केवळ 25 ते 50 टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला. 6 तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ 50 टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. सलग पावसाच्या खंडामुळे नगदी पीक असलेले सोयाबीन मोठ्या प्रमाणात हातचे गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा आता प्रामुख्याने कपाशी आणि तुरीला होणार आहे.. पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून तूर आणि कपाशीच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे. एकूणच पावसाच्या तुटीमुळे अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात सापडला. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे..0
0
Report
गोंदिया में गणेश उत्सव के उत्साह के बीच रूट मार्च से सुरक्षा का संदेश
Bhandara, Maharashtra:गोंदिया शहर पोलिसांचा रूट march शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन गणपती उत्सवानिमित्त गोंदिया शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शहरातील प्रमुख बाजार परिसरातील मुख्य मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच गणेश मंडळांच्या परिसरातून पोलिसांनी संचलन केले. गणपती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.0
0
Report
पाकिस्तानी हैंडलर से धमकियाँ देने वाले आरोपी की मुंबई में गिरफ्तारी
Satara, Maharashtra:सातारा: मुंबईतील एका व्यावसायिकाला धमक्या दिल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन या ३९ वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीचे पाकिस्तानमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'शी थेट संबंध असल्याचे उघड झाले असून, त्याचा भाऊ याच संघटनेत कमांडर आहे. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलरशी संपर्क साधून धमक्या दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल व एक डायरी जप्त केली असून, या रॅकेटमधील अन्य सहकाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम के पांगरी-धनकुटे मार्ग की दुरुस्त नहीं, ग्रामस्थों ने प्रशासन विरोध किया
Washim, Maharashtra:वाशिम के मालेगाव तालुक्यातील पांगरी धनकुटे ते काटा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वेळा करण्यात आली, मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी टाकून रस्ता तयार करण्यात आला असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच जवळच रेल्वे स्टेशन असल्याने अनेक नागरिक या रस्त्याचा प्रवासासाठी वापर करतात. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अखेर ग्रामस्थांनी रस्त्यावरच बसून प्रशासनाचा निषेध केला असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
नागपुर में संतिच्या गणपति उत्सव की धूम, 69वां वर्ष सफलतापूर्वक मनाया गया
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात संतीच्या गणपतीचं वाजत गाजत आगमन झालंय... नागपूरतील प्रतिष्ठित आणि मोठ्या गणेश मंडळ असलेल्या पण संतिच्या गणपतीचे यंदाचे हे 69 वे वर्ष आहे. एकीकडे पावसाच्या सरी कोसळत असतानाही चितारपोळ येथून बाप्पाची मूर्ती स्थापने करता मंडळाच्या गणेशभक्त कार्यकर्त्यांनी उत्साहात मिरवणुकीसह नेली0
0
Report
अमरावती के आश्रमशाळेत विद्यार्थी की मौत: शवविच्छेदन के बाद सच उजागर होगा
Amravati, Maharashtra:26 दिवसांनंतर राजेश बेठेकरचा कुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर; राजेशच्या मृत्यूचे गूढ उलगडणार अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. तब्बल 26 दिवसांनी राजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून या अहवालानुसार राजेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. राजेशच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचेही गंभीर आरोप झाले आहेत. अमरावतीचे अपर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संदीप गोलाईत यांनी आश्रमशाळेची पाहणी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, निवास, शालेय गणवेश आणि औषधोपचार यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले होते. आता शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजेशच्या मृत्यूचे खरे कारण काय? आणि या प्रकरणात दोषी कोण? याचा उलगडा अहवालानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार का याकडेही मृताच्या कुटुंबीयांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव से पहले शेवंती फूलों के दाम गिरने से किसान परेशान
Barav, Maharashtra:गणेशोत्सवाच्या तोंडावर शेवंतीच्या फुलांचे बाजारभाव कोसळल्याने उत्पादन शेतकरी हवालदिल झाला आहे. मागच्या वर्षी अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो मिळणारा दर यंदा थेट चाळीस ते पन्नास रुपयांवर आला आहे. हवामानातील बदल आणि बाजारातील प्लॅस्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
धुळे में फिर बारिश से खरीफ फसलों को मिली नई उम्मीद; किसान उत्साहित
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने माना टाकलेल्या पिकांना काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध भागांत पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतशिवारात पाणी साचले. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले होते. पावसाअभावी अनेक भागांतील पिके कोमेजण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे झालेल्या या पावसामुळे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांच्या वाढीसाठी अद्यापही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे. बळीराजाचे आता जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
सोलापुर के विंचूर में गैस सिलेंडर विस्फोट; जानहानि नहीं, घरों को नुकसान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट गॅसच्या स्फोटामुळे तीन घरांना लागली आग दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान गॅसचा स्फोट होताना आवाज मोठा आल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण अग्निशामक दल स्थानिक पोलीस गावकऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला0
0
Report
Advertisement
यवतमाळ में बिना अनुमति डीजे मोर्चा, 81 लोगों के खिलाफ केस दर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये डीजेच्या समर्थनार्थ विनाअनুমती मोर्चा काढणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सण उत्सवात ध्वनी प्रदूषण होणार नाही याकरिता डीजे बंदीचा निर्णय जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला मात्र, डीजे साठी आधीच ॲडव्हान्स दिला आहे त्यामुळे डीजे व इतर वाद्य वाजविण्याची परवानगी द्या अशी मागणी करीत काहींनी आठवडी बाजार येथून मोठ्या संख्येने मोर्चा काढला. हा मोर्चा काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या 11 जणांसह इतर 70 जणांविरुद्ध आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.0
0
Report
गणेशोत्सव के लिए एसटी बसों की कमी, मुंबई-ठाणे में यात्रियों को भारी देरी
Yeola, Maharashtra:मुंबई, ठाणे येथून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यातील विविध एसटी आगारांमधून मोठ्या संख्येने एसटी बसेस मुंबई और ठाणे परिसरात पाठवण्यात आल्या आहेत परंतु, या बसेस संबंधित आगारातून रिकाम्या पाठवण्यात आला एसटी बसेसची संख्या कमी झाल्याने अनेक मार्गांवर प्रवाशांना तब्बल एक ते दोन तास बसची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, वेळेवर इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण झाले तसेच याचा सर्वाधिक फटका शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बसत आहे. शाळा-कॉलेजला जाण्यासाठी तसेच सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनीही नाराजगी व्यक्त केली0
0
Report
बुलढ़ाणा मंत्री के बयानों पर हंगामा, महिलाओं के सम्मान पर सवाल
Buldhana, Maharashtra:ऑन दुष्काळसदृश्य परिस्थिती.. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्यासोबत बैठक झाली. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होतील, असे वाटते. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसावरून आ. गायकवाड यांनी केलेल्या आरोपाबाबत आ. महाले म्हणाल्या की, या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन विद्याधर महाले यांच्या मित्र परिवाराने केले होते. मित्रपरिवार स्वतःच्या खर्चाने वाढदिवसाच्या सहभागी झाला, त्यामुळे कुठलाही खर्च झालेला नाही. ऑन बाप अजून मैदानात... कोण आहे बाप? माझ्यासाठी जनताजनार्दन मायबाप आहे. मी बुलढाण्याची सून तर चिखलिची लेक आहे. त्यामुळे बुलढाणाकराची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे. मला एकच सांगायचं आहे कुठल्याही, दडपशाहीला बळी पडू नका. ऑन बाप तो बाप रहेगा डान्स.. बाबा सारखं शरीर कोठून आणणार? हे महिलांबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान आहे. तुम्ही आमदार जरी असले तरी तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार नाही.0
0
Report
Advertisement
येवला शहर में गणेशोत्सव के लिए रूट मार्च, शांतिपूर्ण उत्सव की अपील
Yeola, Maharashtra:येवला शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता आगामी गणेशोत्सव काळाच्या तयारीसाठी येवला شہر पोलिसांच्या पथकाने शहर पोलीस स्टेशन पासून संपूर्ण शहरांमध्ये रूट मार्च चे आयोजन केले होते या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी सन उत्सव शांतते साजरे करावे असे आवाहन केले0
0
Report
विरार में भारी बारिश से जलभराव, मुंबई-आहमदाबाद राजमार्ग पर पानी भर गया
Vasai-Virar, Maharashtra:विरार गणपती उत्सवासाठी विरारहून गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुसळधार पडणाऱ्या पावसाने वाट अडवली विरार कडून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे गुडघाभर रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहनांची गती मंदावली असून अनेक वाहने साचलेल्या पाण्यात अडकली आहेत वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून पडायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे0
0
Report
सोलापूर के दुष्काळ में किसान संकट, जिलाधिकारी ने खरीफ फसलों पर समीक्षा शुरू की
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुरु, जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर - यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर शेतकरी मोठ्या संकटात - जिल्ह्यातील मुख्य तालुक्यांमध्ये खरीपाची पिके वाया - जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने माहिती गोळा करण्यास सुरुवात - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी एकत्रितपणे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिकांची केली पाहणी - जिल्ह्यातील खरीपांची अवस्था बिकट असून दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामाकडे लक्ष द्यावे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन - सरकारकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे आश्वासन अक्कलकोट तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....0
0
Report
Advertisement
