416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के खड्डों पर सियासत गरम, 100 से अधिक घायल, मोर्चे की धमकी
Nashik, Maharashtra:खासदार संजय राऊत, बाईट पॉइंटर - नाशिकमध्ये येताना स्विमिंग पूल मध्ये पोहत आलो - मी खड्ड्यांमध्ये पोहत नाशिक पर्यंत आलो - नाशिक शहरात सात लोक खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडले आहेत - इकडचे मंत्री , कुंभ मंत्री चंपत राय सगळ डोळ्याने पाहतात - चेष्टा करतात लहान मुलासारखे - आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वर ला जाऊन आले - 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत - नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य आहे - नाश्क म्हणे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे - पंतप्रधान म्हणतात आम्ही देशातले रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनवले आहे. - आम्ही नाशिककर यांना उद्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आव्हान केला आहे शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. - उद्याचा मोर्चा देवेंद्र फडणवीस सरकारचे वस्रहरण करणारा आहे. - काही साधुमंतांनी सांगितलं मी वाचलं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे - ज्यांना खड्डे बुजवता येत नाही ते कुंभमेळा घ्यायला निघाले.0
0
Report
नाशिक में संजय राऊत के मोर्चे की तैयारी, शिवसेना कार्यालय में झंडे बन रहे
Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिकमें संजय राऊत यांच्या नेतृत्वातील मोर्चाची तयारी सुरू - ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयात स्वतः नगरसेवकांकडून बनवले जात आहेत झेंडे - कार्यकर्त्यांसोबत बसून मोर्चाची केली जात आहे तयारी - नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन0
0
Report
रामदास आठवले चिपळूण दौरे पर, आरपीआई के जिल्हा मेळावे को संबोधित करेंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज चिपळूण दौऱ्यावर.. आरपीआयच्या जिल्हा मेळाव्याला करणार संबोधित.. आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.. चिपळूण सकाळी 11 वाजता आरपीआय पक्षाचा रत्नागिरी जिल्हा मेळावा होणार असून यावेळी आठवले कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांत कार्यालया जवळील शिक्षक पतपेढी सभागृहात हा मेळावा होणार आहे.. आठवले यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे..0
0
Report
Advertisement
चाकण एमआईडीसी में 35 हजार उद्योग बंद, रोजगार संकट गहरा रहा है
Chakan, Maharashtra:चाकण पुणे.... युवासेना नेते आदित्य ठाकरे प्रेस पॉईंटर... उद्योगांचे स्थलांतर व रोजगाराचे संकट ३५,३०० उद्योग बंद/बाहेर: खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट झाले की, गेल्या ५ वर्षांत राज्यातून ३५,३०० उद्योग बंद पडले किंवा स्थलांतरित झाले. चाकणमधून २० कंपन्यांचे स्थलांतर: पायाभूत सुविधांअभावी चाकणमधून २० लघुउद्योग बाहेर पडण्याच्या तयारीत असून, यामुळे ५,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्थानिक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तरुणांचे भवितव्य व जागतिक स्पर्धा: वर्ल्ड बँकेनुसार पुढील १० वर्षांत १२ कोटी तरुण-तरुणी जॉब मार्केटमध्ये येतील, मात्र राज्यात रोजगार निर्मितीऐवजी आहे ते उद्योग पळवले जात आहेत. चाकण व एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे भयानक रस्ते व वाहतूक कोंडी: उद्योगज आणि कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी २ ते ३ तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागते, ज्यामुळे उत्पादकता आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. दौऱ्याच्या आधी डागडुजीचा बनाव: नियोजित दौऱ्यानंतर रस्त्यांवरील खड्डे चपला व तात्पुरत्या मलमपट्टीने बुजवून कचरा लपवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. ५ कोटींचा रस्ता गायब: दीड वर्षांपूर्वी ५ कोटी खर्च दाखवलेला रस्ता उखडून गेला असून सर्वत्र केवळ खड्डेच शिल्लक आहेत. समिती नेमण्यावरून टोला: १४ लोकांची समिती स्थापन करून काही होणार नाही, कामात सुधारणा करण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखा धडक निर्णय घेणारा एक सक्षम अधिकारी द्यावा. भ्रष्टाचार आणि प्रशासकीय वसुलीचे आरोप एक्सप्रेस टॉवरमधून वसुली: एमआयडीसीत एक-एक प्लॉट क्लिअर करण्यासाठी प्रति चौरस मीटर १५०० रुपयांचा रेट ठरलेला असल्याचा थेट आरोप. उद्योजकांना नोटीसा व त्रास: प्लॉटच्या आत किरकोळ कारणांवरून उद्योजकांना दंड व नोटिसा बजावल्या जातात, मात्र प्लॉटबाहेर गटारे, वीज आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. खास मर्जीतील लोकांना सवलती: मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यांना कोट्यवधींचे कर्ज व स्पेशल केस म्हणून मंजुरी मिळते, मग चाकण-अंबडच्या उद्योजकांसाठी स्पेशल केस का नाही? . इतर राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भूमिका महिला आरक्षण विधेयक: २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण बिल त्वरित लागू करावे; डिलिमिटेशनचा बहाणा करून राजकीय फायद्यासाठी ते टांगणीला ठेवू नये. जीशान सिद्दीकी धमकी प्रकरण: महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला असून सत्ताधारी केवळ फोडाफोडीच्या राजकारणात मग्न आहेत. सार्वजनिक वाहतूक व मेट्रो: चाकण-पिंपरी-पुणे दरम्यान मेट्रो व जलद रेल्वेची आवश्यकता असून पीएमपीएमएल/बसेसची वारंवारता वाढवून स्वस्त दरात सेवा देणे गरजेचे आहे. नाशिकची स्थिती: नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाचेच आमदार आणि महापालिका असतानाही तिथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे; अंबड एमआयडीसीतून शहरात पोहोचणेही कठीण झाले आहे. स्थानिक आमदारांचे ऐकले जात नाही: सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार स्वतः तक्रार करत आहेत की प्रशासन त्यांचे ऐकत नाही; मग प्रशासन नक्की कोणाचे ऐकते असा सवाल. मिसिंग लिंक रस्त्याची दुरवस्था: मुंबईहून येताना नुकत्याच उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकच्या अप्रोच रोडची अवस्था लगेचच खडबडीत झाली आहे. . अपघातातील मदत व दुजाभावाचा मुद्दा मदतेवरून सरकारवर निशाणा: क्रिकेट मॅच जिंकणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधी रुपये देणारे सरकार खड्ड्यांमुळे आणि अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मात्र तुटपुंजे मदत देते किंवा वाऱ्यावर सोडते. अपघातग्रस्तांची हद्दवादावरून होणारी हेळसांड: खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातात जखमींना मदत मिळण्यासाठी पोलीस ठाण्यांमधील हद्दीचा वाद आडवा येतो, अशा प्रकरणांवर सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रशासनाचा ढिम्म कारभार दिसून येतो. विरोधकांचे आरोप आणि राष्ट्रीय राजकारण पंतप्रधानांच्या 'नक्षल' वक्तव्यावर पलटवार: अभ्यास करून गुण मिळवणारे, हुशार तरुण आणि प्रश्न विचारणाऱ्या Gen-Z पिढीची भाजपला ॲलर्जी असल्यामुळेच त्यांना अशी नावे दिली जात आहेत; अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या वेळची भाजप आता उरलेली नाही. वंदे मातरम आणि राष्ट्रगीत वाद: देशभक्ती आणि राष्ट्रगीताच्या मुद्द्यांवरून विरोधकांवर टीका करणारे सत्ताधारी स्वतः संसदेत वंदे मातरमच्या वेळी गैरहजर राहून त्याचा अपमान करतात. गोपीनाथ मुंडे व काँग्रेस प्रवेशाचा दावा: गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केल्या गेलेल्या दाव्यांवर फार खोलात न जाता, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी त्यांना काय सल्ला देऊन थांबवले होते हे आपल्याला ठाऊक असल्याचे स्पष्ट केले. . अंधश्रद्धा आणि सामाजिक गैरप्रकारांवर भाष्य पुण्यातील भोंदूबाबा प्रकरणावर ताशेरे: स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेत मुलींचे शोषण करणाऱ्या आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्याऐवजी, सत्तेत बसलेले नेतेच बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप. . स्थानिक आमदार आणि राजकीय हालचाली बाबाजी काळे यांची उपस्थिती: खेडचे आमदार बाबाजी काळे कौटुंबिक लग्नामुळे दौऱ्यातून लवकर निघाले; त्यांनी स्वतः फोन करून आंदोलनासाठी बोलावले होते, त्यामुळे त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही दबावाचा प्रश्न येत नाही. मिलिंद नार्वेकर व महायुती नेत्यांच्या भेटीवर स्पष्टीकरण: ध्वजारोहण किंवा सार्वजनिक कार्यक्रमात समोरासमोर येऊन हस्तांदोलन केले म्हणजे राजकीय जवळीक होत नाही, असा खुलासा केला. Byte: आदित्य ठाकरे (युवासेना प्रमुख) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे....0
0
Report
रत्नागिरी में मासेमारी बंदी 15 अगस्त तक, 2030 तक 30–70 हजार नौकरियाँ
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..नितेश राणे.. मासेमारी और सागरी सुरक्षा. मासेमारी बंदीचा कालावधी... स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक फायद्यासाठी व सागरी जीवांच्या प्रजननासाठी मासेमारीची बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.. नवीन हंगाम.. मासेमारीचा नवीन हंगाम १६ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. मच्छीमारांचे हक्क.. राज्यातील मच्छीमारांच्या अधिकारांचे आणि रोजगाराचे पूर्ण संरक्षण केले जाईल; कोणाचाही हक्क हिरावून घेऊ दिला जाणार नाही. बंदर विकास (पंतप्रधान प्रकल्प).. कोणत्याही पोर्ट/बंदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व राजकीय ताकद आणि इच्छाशक्ती सरकारकडे आहे.. रोजगार उद्दिष्ट (२०३०).. २०३० पर्यंत जहाज बांधणी (Shipbuilding) क्षेत्रातून सुमारे ३०,००० ते ७०,००० नवीन नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सुरक्षा व ओळखपत्र अनिवार्य.. सागरी क्षेत्रात काम करणारा प्रत्येक खलाशी भारतीय असणे बंधनकारक आहे. त्याच्याकडे वैध आधार कार्ड आणि मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे. किनारपट्टी सुरक्षा.. संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी "जिहाद मुक्त" आणि सुरक्षित ठेवण्यावर सरकारचा भर असेल. पायाभूत सुविधा व राजकीय मुद्दे.. मुंबई-गोवा महामार्ग.. महामार्गाचे काम आता केवळ ५% शिल्लक असून हे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. मराठा आरक्षण.. महायुती (देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील) सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे.. हिंदू समाज संरक्षण.. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्व आवश्यक निर्णय घेत आहे. मुंब्रा नाव बदल.. 'मुंब्रा' या क्षेत्राचे नाव बदलून लवकरच 'मुंब्रा देवी' केले जाईल. काँग्रेसवर टीका.. पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेस पक्षाची दुरवस्था केली होती, ज्यामुळे काँग्रेस आज विरोधी पक्षात आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये. संजय राऊत व विरोधकांवर निशाणा.. शिवसेना आणि निवडणूक आयोग.. संजय राऊत यांनी पक्षाबाबत केलेल्या दाव्यांवर टीका करताना, "निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राऊत काय चहा पाजायला उपस्थित होते का?" असा सवाल उपस्थित केला. अर्बन नक्षलवाद.. हिंदू संस्थांना बदनाम करून तुष्टीकरणाला खतपाणी घालणाऱ्या विचारसरणीमध्ये 'अर्बन नक्षलवादी' मानसिकतेचे लोक सक्रिय आहेत आणि त्यात संजय राऊत यांचा समावेश असू शकतो..0
0
Report
नाशिक: Ring Road-affected farmers stage self-immolation protest at Collectorate
Nashik, Maharashtra:- रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन - नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात - काही दिवसांपूर्वी याच शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते - कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेचे आश्वासन मात्र अद्याप चर्चा नाही - कुंभमेळा मंत्र्यांनी शब्द न पाळल्याचा आंदोलकांचा आरोप - जिल्हा प्रशासनाकडूनही योग्य कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप - आंदोलनादरम्यान गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर आंदोलकांची जहरी टीका - मागणी मान्य झाली नाही तर सर्व बाधित शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर जाऊन करणार आंदोलन आंदोलनाचा आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
यवतमाळ में स्वतंत्रता दिवस पर ध्वजारोहण और जल-संरक्षण के साथ किसानों को राहत की घोषणाएं
Yavatmal, Maharashtra:भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदू व जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, युवा यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलसंवर्धन अभियानाअंतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाया केल्या गेल्या. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्याचं काम शासन करीत आहेत. 82 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी ची रक्कम वाटप करण्यात आली आहे. अल निनो चे सावट असल्याने पाणी वापराबाबत नियोजन प्रशासनाने केले आहे. तसेच पिक विमा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.0
0
Report
भोंदू बाबा मनोहर मामा भोसले के अघोरी प्रथाओं से ठगी, 25 आरोपी, 10 गिरफ्तार
Pandharpur, Maharashtra:भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यांच्या अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात पुणे जिल्ह्यातील भिगवन मधील प्रसिद्ध शिक्षण संस्था चालकाचा सहभाग निष्पन्न ,रामदास झोळ आणि त्याचे साथीदार यांचा सहभाग सोलापूर गुन्हे शाखेनं निष्पन्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी पोलीस स्टेशन सह भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात तब्बल सहा गुन्हे दाख्ल आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक विशेष एसआयटी स्थापन केली. यामध्ये भोंदू मनोहर भोसले याला मदत करणारे तब्बल 25 आरोपींचा सहभाग आढळून आला आहे.यापैकी दहा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे कुर्डूवाडी पोलिसात दाखल असलेल्या पुण्यातील प्रमुख आरोपी मनोहर मामा भोसले असून त्याने अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा, अशा अघोरी पुजेच्या माध्यमातून अनेक पिडीतांची फसवणूक करुन त्या कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट लावण्याकरीता दत्तकला इनस्टिटयूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, दौंड पुणे चे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचे मार्फतीने त्याची विल्हेवाट लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांना सदर गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे. तसेच त्यांचेबरोबर त्यांच्या इनस्टिटयूट (शिक्षण संस्था) मध्ये त्यांना मदत करणारे, त्यांचे इतर साथिदार यांना देखील गुन्हयात आरोपी करुन त्यापैकी राजेंद्र गोकुळ हुंबे, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक करण्यात आली आहे. याचा तपास गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड हे करत आहेत0
0
Report
भागवत नागपुर में युवाओं से बोलते: भारत का विश्वगुरु बनने का मार्ग
Nagpur, Maharashtra:नागपुर: नागपुरात आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ‘जेन-झी’शी संवाद साधणार आहे. कस्तुरचंद पार्कवर एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसह तरुणांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी ते ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावर येतील. यावेळी सरसंघचालकानी केलेले भाषण मार्गदर्शन. नागपूर - डॉ मोहन भागवत,सरसंघचालक,भाषण. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला त्यावेळी लोक बोलायचे की हे स्वातंत्र्य टिकणार नाही पण स्वातंत्र्य टिकलं. प्रसंग सगळेांशी संवादाचा आहे पण मला तरुणांशी संवाद साधायला सांगितलं. प्रसंग सर्वांसोबत संवादाचा आहे मात्र तरुण हे डेमोक्रॅटिक आहे, त्याचा योग्य लाभ झाला तर आपण विश्वगुरू बनणार आणि नाही झाला तर पुढे खूप बोजा येईल. तीस वर्षांनंतर आजची पिढी जुनी पिढी बनेल, आजच्या पिढीला पुढच्या पिढी बद्दल विचार करणे आवश्यक आहे. आपली तुलना इतर लोकांशी करू नये, आपण अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नाही, हे तरुणांनी समजायला पाहिजे की आम्ही भारत आहोत. उन्नतीचे जे निकष पाहिजे त्यासाठी आपल्याला आपला आणि आपल्या देशाचा विचार करावा लागेल, इतर केवळ त्यांच्या भौतिक उन्नतीचा विचार करतात मात्र भारतात आपण भौतिक उन्नतीचा विचार करत नाही. संतुलन ठीक करून पुढील मार्ग दाखवणे हे भारताच्या प्रती आपलं दायित्व आहे यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. रोजगार केवळ नोकरी होत नाही; हाताने काम करणाऱ्याला ही प्रतिष्ठा पाहिजे, उद्दमिता यालाही प्रतिष्ठा पाहिजे. अधिक साधन संपन्न देश नोकरीचा विचार करू शकतात, मात्र भारतासारखे विशाल जनसंख्या असलेला आपल्या देशाला वेगळा विचार करावा लागेल. प्राण गेले तरी चालेल असा विचार करणारे तरुण असतात, कारण वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक हे हिम्मत करू शकत नाही तरुणांमध्ये ही हिंमत असते. जग ज्याला अविचार म्हणते तेच साहस पुढे कामात येणार; एकट्याचा भाग्य नाही बनत आपल्याला देशाचं भाग्य बनवायचं आहे. जगात प्रतिष्ठा पाहिजे असेल तर जेव्हा पर्यंत आपला देश, समाज प्रतिष्ठित नहीं, तोपर्यंत ते मिळणार नाही. आम्ही तेव्हा वैभव संपन्न आहोत जेव्हा भारत वैभव संपन्न आहे.0
0
Report
Advertisement
GEN Z को मार्गदर्शन देकर युवाओं के साथ संवाद का क्रम जारी रहा
Nagpur, Maharashtra:सरसंघचालक ने GEN Z को मार्गदर्शन किया। इसके बाद वहां मौजूद GEN Z युवाओं से संवाद किया गया, उनकी प्रक्रियाओं को हमारे प्रतिनिधियों ने लिया.0
0
Report
अगस्त की छुट्टियों में शिर्डी में भक्तों की भारी भीड़
Shirdi, Maharashtra:सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.. साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झालेत.. आज 15 ऑगस्ट आणि उद्या रविवार अशी सलग सुट्टी असल्याने पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तिर्थस्थळे हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र आहे.. साई मंदिराच्या दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.. सलग दोन दिवस शिर्डीत गर्दीचा ओघ असाच कायम राहणार आहे.. साई मंदिरातून गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
नागपुर में बनावट देशी-विदेशी शराब बनाने वाले कारखाने पर आबकारी विभाग की बड़ी कार्रवाई
Nagpur, Maharashtra:नागपुर - *नागपुरातील काटोल तालुक्यातील चिखलागढ शिवारात बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर राज्य उत्पादन्न शुल्क विभागाची मोठी कारवाई* - *शेतातील घरावर छापा टाकून देशी-विदेशी बनावट दारू आणि निर्मितीसाठी लागणारं साहित्य असा ५४ लाख ८१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त* - रॉकेट संत्रा आणि टँगो पंच देशी दारूचे ३६০ बॉक्स, रॉयल स्टॅगच्या ४०८ बाटल्या जप्त - बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, ब्लेंड आणि इतर साहित्यही जप्त केले.. - दारू आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी बोलेरो पिकअप आणि ह्युंदाई आय-२० कार जप्त - कारवाईप्रकरणी चार आरोपीं विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल - चिखलागढ येथील शेतातील घरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची विक्री आणि वाहतूक केली जा असल्याचा माहिती मिळाली होती... - आता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? आर्थिक पाठबळ कुणाचं? साहित्य कुठून येत होतं? याचा तपास सुरू... - तयार दारूची विक्री आणि वितरण कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून होत होतं, याची सखोल चौकशी करण्याची मागणी - केवळ कारखाना चालवणाऱ्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क आणि मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचं आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे...0
0
Report
Advertisement
स्वतंत्रता के पथ पर विराट संकल्प: भारत विश्वगुरु बनेगा
Nagpur, Maharashtra:नागपूर सरसंघचालक मोहन भागवत, (संघ मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेले मार्गदर्शन ) - स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा विषय आहे. १८५७ पासून जवळपास ९० वर्षे अनेक प्रकारचा त्याग आणि बलिदान देऊन आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या त्याग आणि बलिदानाचा गौरव आपल्या मनात आहे आणि त्या संघर्षाची यशस्वी सांगता झाल्याचा आनंदही आपल्या मनात आहे. - मात्र, त्यासोबतच आपल्याला आणखी एका गोष्टीचे भान असणे आवश्यक आहे. एवढे परिश्रम करून, एवढा त्याग आणि बलिदान देऊन मिळालेले हे स्वातंत्र्य कायम टिकवणे आणि त्याचा योग्य परिणाम देशात घडवून आणणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. - सावरकरांनी म्हटले आहे....स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून जे काही उत्तम, उदात्त, उन्नत, महान आणि मधुर आहे. ते सर्व आपल्या देशात अवतरले पाहिजे. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. - आपण आपल्या तिरंग्याचे ध्वजारोहण करतो. त्यातील तीन रंगांकडे पाहिल्यावर आपल्याला हाच संदेश मिळतो. - केशरी रंग हा कर्मशीलता, ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक आहे. ज्या प्रकारच्या परिश्रमातून एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळते आणि स्वातंत्र्यानंतर ते राष्ट्र उत्कर्ष, वैभव आणि सामर्थ्याने संपन्न व सुरक्षित बनते, त्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा हा केशरी रंग आहे. - आपल्या जीवनात त्याग, बलिदान, कर्मशीलता आणि ज्ञान असेल, तर समाजात शांतता निर्माण होते. पांढरा रंग आपल्याला शांती आणि पवित्रतेचा संदेश देतो. आपण जे तप करीत आहोत ते योग्य दिशेने सुरू आहे की नाही, याची परीक्षा घेत राहण्याची प्रेरणा हा रंग देतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे समृद्धी. त्याचे प्रतीक म्हणून आपल्या तिरंग्यात हिरवा रंग आहे. - या सर्व गोष्टी करताना आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळे असलो, तर आपले विचारही वेगवेगळे असतील. मात्र ही विविधता हीच एकतेची अभिव्यक्ती आहे. - धर्मचक्राच्या अनेक आऱ्यांप्रमाणे आपण वेगवेगळ्या दिशेने जात असलो, तरी हे सर्व आरेएका धर्माच्या, एका शिस्तीच्या मर्यादेत ठेवण्यात आले आहेत. - समाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी ज्या अनुशासनाचे पालन करणे आवश्यक आहे, - राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करताना या सर्व प्रतीकांमागे असलेल्या विचारांचे आपण चिंतन केले पाहिजे. त्या चिंतनातून मिळणारे सार आपल्या जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. - कारण आपले राष्ट्र स्वतंत्र झाले आहे आणि ते स्वतंत्रच राहील, ही गोष्ट निश्चित आहे. मात्र या राष्ट्राला सुखी, संपन्न आणि सुरक्षित बनवायचे आहे. जगामध्ये आपले निश्चित आणि महत्त्वपूर्ण योगदान देणारे राष्ट्र बनवायचे आहे. - आपल्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. आपल्या विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड न करता संपूर्ण जगामध्ये या आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचे आहे. संपूर्ण मानवतेच्या जीवनात सार्थक योगदान देणारा देश म्हणून भारताला उभे करायचे आहे. - हे कर्तव्य आज आपल्या सर्वांसमोर आहे. याचे आपण चिंतन करूया आणि आजचा हा संदेश घेऊन येथून पुढे जाऊया.0
0
Report
FDA ने महाप्रसाद आयोजनों के लिए अनिवार्य परमिट और सुरक्षा नियम जारी किए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:श्रावण महिन्यात मंदिरे, सार्वजनिक मंडळे आणि भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधेचे प्रकार घडू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आता अॅक्शन मोडवर आले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी महाप्रसाद आयोजकांना एफडीएचा परवाना अनिवार्य करण्यात आला आहे, स्वयंपाक आणि पिण्यासाठी केवळ स्वच्छ किंवा आरओ पाण्याचाच वापर करावा. अन्न बनवणाऱ्या व वाढणाऱ्या स्वयंसेवकांना मास्क, हँडग्लोव्हज आणि हेड कॅप वापरणे अनिवार्य आहे. प्रसाद जास्त वेळ उघड्यावर ठेवू नये. शिळे अन्न वाटल्यास कठोर कारवाई केली जाईल. अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा सुरक्षित भांड्यांचाच वापर करावा, असेही नियमावलीत नमूद आहे.0
0
Report
ठाणे महापालिका स्कूलों में हर घर तिरंगा से देशभक्ति उपक्रम
Thane, Maharashtra:हर घर तिरंगा अभियानांतर्गत मनपा शाळांमध्ये देशभक्तीपर उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पातलीपाडा, दिवा, गायमुख आणि इतर मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा व देशभक्तीवर आधारित कलाकृती साकारल्या. तसेच घोषणाबाजी करत रॅली काढून परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर आणि देशप्रेमाचा संदेश दिला.0
0
Report
Advertisement
