416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
9 साल के राजवीर राऊत का जवाब वायरल: पालक बैठक में उम्मीद जगाई
Kolhapur, Maharashtra:सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे… आणि हा व्हिडिओ आहे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या राजवीर राऊत या चिमुकल्याचा… कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरंबे येथील ज्ञानोबा तुकाराम आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पालक बैठकीदरम्यान गुरुजीनी राजवीरला एक साधा पण मनाला भिडणारा प्रश्न विचारला… तुझे आई-वडील बैठकीला येऊ शकले नाहीत, मग काय करायचं?” यावर अवघ्या नऊ वर्षांच्या राजवीरने दिलंलं उत्तर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारं होतं. राजवीर म्हणाला, ते पुढच्या पालक बैठकीला येतील… ते कामात असतील… या चिमुकल्याच्या निरागसतेतून आणि समजूतदारपणातून एक हळवं चित्र समोर आलं आहे. आई-वडिलांच्या अनुपस्थितीची खंत न करता, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत दिलेलं हे उत्तर अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारं ठरत आहे. याच राजवीर राऊत या चिमुकल्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी。0
0
Report
सोलापुर: हत्या प्रकरण में भाजप नगरसेविका शालन शिंदे को 7 महीने बाद जमानत मिली
Solapur, Maharashtra:सोलापूर - खूनप्रकरणी भाजप नगरसेविका शालन शिंदेंना 7 महिन्यांनी जामीन. अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका शालन शिंदेंना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सात महिन्यांच्या कोठडीनंतर शिंदे यांना जामीन मिळाला असून दोष निश्चिती होईपर्यंत जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शालन शिंदे यांचे राहते घर जोशी गल्लीत आहे. जय जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे त्यामुळे जामीन मिळवणे त्यांच्या घरी राहता येणार नाही.0
0
Report
पोस्को मामले में अमन अंदेवार के खिलाफ FIR, नाबालिगों की पहचान उजागर का आरोप
Chandrapur, Maharashtra:महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ता सेना जिल्हा अध्यक्ष Aman Andevar यांच्यावर पोस्कोच्या सहकलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल झाले असले. दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितांची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी ही गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचं चार दिवसांपूर्वी बल्लारपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका अनुदानित खाजगी आश्रमशाळेत उघडकीस आलं होतं. अमन अंदेवार यांनी पीडित मुलांची ओळख काही व्हाट्सअप ग्रुप वर आणि व्यक्तींना शेअर केली होती. त्यामुळे पीडित बालकांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका ठेवत अमन अंदेवार यांच्यावर गुन्हा दाखल केला.0
0
Report
Advertisement
बारामती में पति को जिंदा दफनाने की कोशिश: पत्नी के खिलाफ मामला दर्ज
Rui, Maharashtra:बारामतीत महिलेचा जिवंतपणि पतीला समाधी देण्याचा प्रयत्न... सासऱ्याच्या तक्रारीवरून सुनेच्या विरोधात बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल... संबंधित महिलेला बारामती शहर पोलिसांकडून अटक बारामती मधील एका महिलेने तिच्या पतीला दोन दिवस गुंगीचे औषध देत बॅटने मारहाण करीत त्याला जिवंतपणीच घरातच समाधी देण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवीण जगताप यांच्या खुनाचा प्रयत्न उधळून लावला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांच्या फिर्यादीवरून शर्मिला प्रवीण जगताप या 38 वर्षीय महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हा संपूर्ण प्रकार दिनांक 30 जुलै 2026 च्या रात्री साडे अकरा ते एक ऑगस्ट सकाळी साडे अकराच्या दरम्यान बारामती शहरातील जामदार रोड इंद्रप्रस्थ सोसायटीमधील फ्लॅट नंबर नऊ मध्ये घडला आहे。0
0
Report
मराठवाड़ा मंत्रिमंडल की घोषणाओं पर खेद, कई काम अभी बाकी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अंबादास दानवे : 3 वर्षांपूर्वी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली त्यात घोषणा केलेली किती काम झाली याची माहिती मी घेतली, मात्र काहिही झालं नसल्याचं पुढं आलाय, दुर्दैवी आहे, समाधानकारक स्थिती नाही नरेंद्र पाटील खंत बाबत : त्यांच्या बोलण्यात सत्यता आहे, अनेकांना कर्ज मिळत नाही जाचक अटी आहेत, सर्वच महामंडळाची अशीच अवस्था आहे, महामंडळ म्हणजे फक्त घोषणा असते मात्र मंडळ अपंग असते, त्यांची व्यथा योग्य आहे ते भाजपचे आहे आणि सरकार भाजपचे आता लोकांनी ठरवावे, मुख्यमंत्री कुणाचं ऐकतील असे मुळीच नाही, सरकार आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्यामुळं असते घडते आहे असे मला वाटते ओन प्रमाणपत्र रद्द : कुणबी प्रमाणपत्र शैक्षणिक हेतूने आपण घेतले आहे नोकरी साठी घेतले आहे या प्रमाणपत्र चा राजकीय लाभ घेऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे...0
0
Report
ठाणे सत्र न्यायालय ने विनायक राऊत समेत छह आरोपी को जमानत मंजूर की
Thane, Maharashtra:शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि सून गिरीजा राऊत कौटुंबिक प्रकरणात विनायक राऊत यांच्या सह सहा आरोपींना अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने केला मंजूर.. विनायक राऊत यांना ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा न्यायाधीश एस पी अग्रवाल मॅडम यांच्या सत्र न्यायालयात जामीन मंजूर.. गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता..0
0
Report
Advertisement
नरेंद्र पाटील ने MD विजयसिंग देशमुख पर आरोप, सरकार को रोष, मराठा समाज में तनाव
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नरेंद्र पाटील पत्रकार परिषदहिं.... अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळचं एमडी विजयसिंग देशमुख यांनी वाटोळं केल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय, हा एमडी सरकारला अडचणीत आणतोय, मराठा समाजाचे नुकसान करतोय असे नरेंद्र पाटील यांनी आरोप केलाय, एक व्यवस्थापकीय संचालक शासनाचे नुकसान करतोय तर शासनाने कारवाई करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले...यांच्या पाठीशी कुणीतरी आहे त्यांना शासनाला यांच्या माध्यमातून बदनाम करायचे आहे असेही नरेंद्र पाटील म्हणाले... एमडी ने प्रमाणपत्र देतांना अटी सांगितल्या कर्ज देताना, उत्पन्नाची अट घातली, या अटी शर्ती मूळ मराठा समाज मागे पडला... एमडी च्या मनमानी मूळ फटका बसला आहे...अनेकांना कर्ज मिळू शकले नाही...2024 25 अनेक प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे...शासनाच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण करण्याचे काम महामंडळाचे एमडी करताय...या मुळे मराठा समाज नाराज झालाय...याबाबत समाजाने मुख्यमंत्री सोबत बैठकीचे मागणी केलीय...मी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळ सांगितले आहे आणि पुन्हा एकदा भेटणार असे नरेंद पाटील म्हणाले..अधिकार्यामुळे सरकार बद्दल रोष निर्माण होतोय असा आरोप त्यांनी केलाय..विजयसिंग देशमुख हे एमडी आहेत.. याना सरकारला अडचणीत आणण्यासाठी कुणीतरी सुपारी दिली असल्याचं आम्हाला वाटतंय, याबाबत मी मुख्यमंत्री आणि विखे पटलांकडे तक्रार केली आहे...महामंडळाचे एमडी अध्यक्षला विचारात न घेता काम करतात असे स्पष्ट आहे...अध्यक्ष पद आता शोभेचे राहिले आहे, आम्हाला वाईट वाटतेय, हाथ बांधले आहे, हे पद ठेवून करू काय, मी आता महामंडळाची सेवा वापरात नाही, त्यामुळं आता मला पद सोडावे लागेल असे दिसतेय... ( पद सोडू असे संकेत )0
0
Report
नागपुर पुलिस ने ऑनलाइन धोखाधड़ी करने वाले गैंग کا पर्दाफाश किया; 209 ATM कार्ड जब्त
Nagpur, Maharashtra:नागपूर पोलिसांनी म्युल अकाउंट गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी एका महिलेसह तीन आरोपीना पोलिसांनी अटक केलीय. आरोपीकडून 209 ATM कार्ड, 50 सिमकार्ड, 45 धनादेश आणि 45 बँक पासबुक, विविध कंपन्यांचे शिक्के जप्त केलेय. उज्वला राजगिरे, पठाण उर्फ इरफान इकबाल शेख, आयुष रामटेके असे अटकेतील आरोपीची नावे आहेत. आरोपी आमिष दाखवून हे म्युल अकाउंट बनवायचे.. त्यानंतर त्याचा वापर ऑनलाईन फसवणूकची रक्कम या खात्यात जमा करून व नंतर ती दुसऱ्या अकाऊंटला वर्ग करून त्याततून ते पैसे काढून घेत. सायबर गुन्हातील सोर्स लपवण्यासाठी ही म्युल खाती उघडण्यात आली होती.. तसेच सायबर फसवणूकीतून मिळालेला पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा पोलिसाना संशय आहे. सायबर पोलिसानी या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणाची व्याप्ती अनेक राज्यात पसरली असल्याची माहिती पुढे येतेय....त्यादृष्टीने त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकही पोलीस तपासत आहे.0
0
Report
मराठवाडा कुणबी आरक्षण: अर्ज वैधता 77.4%, 0.30% अवैध; जरांगे की चौंकाने वाली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कुणबी जात वैधता पडताळणी संदर्भातील माहिती: मराठवाड्यात शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले. त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्याचं प्रमाण अवघं 0.30 टक्के आहे. तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत. मराठवाडा : कुणबी जात वैधता पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल 77 टक्क्यांहून अधिक अर्ज वैध ठरले आहेत. अवैध अर्जांचे प्रमाण केवळ 0.30 टक्के असल्याने फेटाळणी अत्यंत कमी आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्या सगळ्यांवर आता जरांगे यांनी पुन्हा भूमिका मांडली आहे. हे प्रमाणपत्र खरे होते मग रद्द का केले जरंगे च्या आंदोलनानंतर हे रद्द झाले असा संभ्रम पसरवण्याचा कट असल्याचा आरोप जरंगे यांनी केलाय. शिंदे चे मंत्री चूक झाली मान्य करताय भाजपनेही मान्य करावे, आमच्या नाराजीचा प्रश्न नाही अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे. तर दरेकर यांनी केलेल्या टिकेकर जरांगे यांनी शिवराळ भाषेत उत्तर दिलाय. यात प्रत्येक जिल्ह्यात अर्ज का फेटाळले याची कारणे पुढे आली आहेत: जात वैधता का फेटाळ्याची कारणे: छत्रपती संभाजीनगर – अर्जावरील दावा आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य न ठरल्यामुळे जात दावा सिद्ध झाला नाही; जालना – अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवजी पुरावा नसल्याने तसेच दावा सिद्ध न झाल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आले; धाराशिव – अर्जदारांनी दावा मागे घेतल्यामुळे/प्रकरण निकाली काढण्यात आले; Hingoli – एकही अर्ज अवैध ठरलेला नाही; नांदेड – कागदपत्रांतील विसंगती आणि कुणबी असल्याचा पुरावा पुरेशा पुरावा नसल्याने अर्ज अवैध ठरले; बीड – केवळ 1 अर्ज अवैध; संबंधित प्रकरणात जात दावा सिद्ध झाला नाही; परभणी – कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध न झाल्याने अर्ज अवैध ठरले. लातूर – एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. या निष्कर्षांवर आता जरांगे विरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिसत आहेत. देशाच्या अन्य भागातील मतदार आणि राजकारणात झालेले परिवर्तन या प्रकरणाला वेग देत आहेत. सामान्य नागरिकांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र वितरणाची स्थिती स्पष्टपणे समजावून देण्यात आली आहे. अर्जांची संख्या कमी असली तरी अवैध अर्जांचे प्रमाण तुलनेने सर्वाधिक नांदेडमध्ये आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत वैधता प्रमाणपत्रांची वितरणाचे विश्लेषण जारी आहे.0
0
Report
Advertisement
युवा उबाल पर भाजपा-शिंदे-शाह की रणनीति, संवाद के बीच सियासत गर्म
Kolhapur, Maharashtra:शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी Byte मुद्दे On सरसंघचालक युवा भेट माझ्या माहितीप्रमाणे जेनजीच्या आंदोलनाचं गांभीर्य घेतलेलं दिसतंय. देशाचे पंतप्रधान सुद्धा आता युवकांशी संवाद करतात इतके वर्षे कधी त्यांनी अशा प्रकारचा संवाद केला नव्हता. याचा अर्थ देशातील तरुण हा अस्वस्थ आहे आणि त्यांच्या मनामध्ये विरोधी भावना आहे हे माहिती पडल्यानंतर या तरुणाना परत आपल्याकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं की युवा वर्ग हा विरोधात जातोय याची कल्पना आल्यामुळे या संदर्भामध्ये आता सगळेजण या युवा वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थाने युवा वर्गाला जर प्रेरित करायचं असेल तर जाति धर्माच्या वादामध्ये त्याला न अडकवता भविष्यकाळातल्या असलेल्या त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला जो काही अन्याय आहे त्याच्या संदर्भामध्ये युवा वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. इतर राष्ट्रामध्ये ज्या प्रकारे युवा वर्गाने क्रांती केली आणि सत्तेला उलटून टाकलं तशा प्रकारची परिस्थिती ही भारतामध्ये होऊ शकते. म्हणून आता त्या युवा वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रशांत किशोर भेट याची मला कल्पना नाही आहे. खरं म्हटलं तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. त्यांच्या अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत हा विषय असल्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. ऑन OBC नेते हाके मला वाटतं की हे पेरलं ते आता उगवलं. मताच्या राजकारणासाठी ज्यावेळेला मराठा आणि ओबीसी वाद निर्माण केला. काल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ओबीसीचे दाखले रद्द करायला लागले. म्हणजे याचा अर्थ फसवणूक केली. मत मिळतात पण ती मत मिळवण्याच्या संदर्भातली दिलेली आश्वासन आहे ती पूर्तता करण्याची तारेवरची कसरत सध्या भाजपला करावी लागते. मुख्यमंत्रींचं कालचं मी स्टेटमेंट बघितलंलं आहे. ते स्टेटमेंट असं होतं की आम्ही कुठल्याही समितीच्या किंवा कुठल्याही आरक्षणाच्या कोर्टाच्या निर्णयासंदर्भात हस्तक्षेप करत नाही. पॉलिसी मॅटर ठरवताना ज्यावेळेला तुम्ही चुकता त्याचे परिणाम पुढे होतो. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, भाजपची आहे, त्यांच्या महायुतीची आहे. ऑन शिंदे आणि खासदार पंतप्रधानांची भेट ते पंतप्रधानांना भेटत असतील त्यांचे काही विषय असतील. राजकारणामध्ये महायुतीमध्ये सगळे काही आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला वाटतं एकमेकाचे खच्चीकरण संदर्भात स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची केस सुरू आहे त्यासह इतर गोष्टीसाठी ते पंतप्रधानांना भेटत असतील.0
0
Report
कोल्हापुर के ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह का 9 अगस्त मुख्यमंत्री के हाथों लोकार्पण
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज संपूर्ण नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्यगृहातील बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, लाईट व्यवस्था, मेकअप रूम यांसह परिसराची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटना बरोबरच 3200 कोटी रुपयांच्या पूर नियंत्रण प्रकल्प, रंकाळा परिसर सुशोभीकरण लोकार्पण, सीपीआर हॉस्पिटलचा उद्घाटन, शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण या सह जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे.0
0
Report
ममहायुती के खेल: महाराष्ट्र में सत्ता के मलिदे पर सबकी निगाहें
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर नाना पटोले महायुती वाद केंद्रीय किंवा राज्यातलं सरकार सत्तेतला मलिदा खाण्यासाठी एकत्र आलेली आहेत सत्तेसाठी सगळं सहन करतील महायुतीमध्ये कलह तर आहेत वाद असला तरी सत्तेचा मलिदा खाण्यासाठी आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी ते एकत्र राहतील ऑन मोहन भागवत चिडिया खेत चुघ गई अशी अवस्था संघाची आणि भाजपची झाली आहे ज्या जेन झी ना देशद्रोही म्हटलं त्यांनाच आता हे देश प्रेमी म्हणत आहेत हे कोणी प्रमाणपत्र देणारे नाहीत जेन झी आता आम्हाला सत्तेतून बाहेर काढेल असं यांना वाटते जेन झी पुन्हा आता आपल्याकडे आता येईल का हा यशस्वी प्रयत्न मोहन भागवत यांनी केला आहे संघाच्या लिमये यांनी या जेन झी ला देशद्रोही म्हटलं होतं त्यांच्यावर भागवत करणार आहेत का? ऑन दिपके कारवाई दिपके आणि त्यांच्या कुटुंंबावर कारवाई केली जाईल हे सूर्यप्रकाशात सत्य आहे जो कोणी भाजप आणि मोदींच्या कार्यपद्धतीवर बोलेल तो देशद्रोही घोषित केला जातो सोनम वांगचुक यांना देशद्रोही म्हणून आत टाकलं तसेच कारवाई दिपकेंच्या बाबतीत केली जाईल या सरकारला आपल्या आणि मोदींच्या विरोधात काही ऐकायची सवय नाही त्याचे परिणाम दिपकेंना भोगावे लागणार आहेत ऑन दिपके मोहीम तरुणाच्या भविष्या आणि आयुष्याची भाजप खेळला आहे त्यामुळे तरुण अस्वस्थ आहे आमचं भविष्य भाजप खराब करत आहे अशी भावना या तरुणांमध्ये आहे त्यामुळे झेन झी विदाऊट फेस समोर आल्याचा पण बघतोय ऑन सुनील तटकरे प्रशांत किशोर बिहारमध्ये आत्ता आमदार झाले आहेत मात्र त्यांचं पहिलं काम एखाद्या पार्टीला प्रमोट करण्याचं आहे त्यांनी राष्ट्रवादी ला काय सल्ला दिला यामध्ये काँग्रेसला त्यात पडायचं कारण आहे असं वाटत नाही ऑन प्रशांत किशोर वरून भाजप नाराज राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा वापर संपला की त्यांना संपवलं जाईल हे कृत्य भाजपचा पहिल्यापासून आहे गरज संपली की त्यांना संपवा अशीच त्यांची वृत्ती आहे ऑन हाके इशारा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेला नाही महाराष्ट्राची संस्कृती भाजप आणि महायुतीच्या सरकारमध्ये संपलेली आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून काही लोकांना प्रमोट करून राज्याला विकायची व्यवस्था यांनी केली आहे देशातील दोन उद्योगपतींची पोट भरण्यासाठी,त्यांच्याकडे राज्य देण्याचे काम हे सरकार करतय ऑन कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था उरला नाही याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस सपशेल फेल ठरले आहेत त्यांनी गृहमंत्री पद दुसऱ्याला द्यावे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयानक आहे ऑन प्रमाणपत्र या लोकांनी वेगवळ्या जातीतील लोकांना दुरुस्ती करून आरक्षण देऊ असा आश्वासन दिलं होतं आता केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना दोन जातींमध्ये भांडण लावण्याचं काम हे करतय जरांगे पाटील आणि हाके यांच्यामधील वाद भाजपनेस राज्यात लावला आहे या तोंडातून काढायचं त्या तोंडात घालायचं आणि महाराष्ट्राची संस्कृती बिघडवायचं एवढेच काम हे सरकार करते ऑन खड्डे महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त झाला आहे कर्नाटकचा सरकार 40% वर गेलं तसंच हे सरकार 60 टक्क्यावर जाणार आहे राज्यात टक्केवारीमुळे कामाचा दर्जा संपला आहे भाजप आणि महायुती मधील भ्रष्टाचाराचा परिणाम आता अख्खा महाराष्ट्र बघतोय ऑन कर्जमाफी हे घोषणाबाज सरकार आहे या कर्जमाफीच्या माध्यमातून उलट कर्ज वसुलीचे काम सरकार करत आहे.. ऑन बाळूमामा घोटाळा जेवढे देवस्थान सरकारने ताब्यात घेतले आहे तिथे तिथे भ्रष्टाचाराच्या बाबी समोर येत आहेत मंदिर ही भाजपसाठी आता आस्थेने लुटण्याची केंद्र झाली आहेत ऑन प्रवीण दरेकर जरागे स्टेटमेंट आंदोलन करणाऱ्यांना भडकवण्यासाठी भाजपने काही लोक नेमली आहेत गम ते जरांगे पाटलांचा आंदोलन असेल किंवा हकेंचा आंदोलनसेम यामध्ये पेट्रोल टाकण्याचे काम काही लोक करतात या माध्यमातून भाजपला राज्य पेटवत ठेवायचं आहे एकनाथ शिंदे भेट शिंदे आपलं दुःख आणि त्रास सांगण्यासाठी अमित शहाना भेटण्यासाठी जातात उच्च न्यायालयात चिन्हाचा प्रश्न आहे त्यावरही चर्चा करण्यासाठी ते गेले असतील ऑन प्रमाणपत्र अवैध तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळत मात्र ते वॅलेट करताना काही पुरावे द्यावे लागतात मराठा समाजाला फसवू नका वास्तविकता सांगा असं मी विधानसभेत देखील बोललो होतो गरीब मराठा समाजातील लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारने घ्यावी..0
0
Report
Advertisement
नागपूर बस सेवा ने दैनिक यात्री रिकॉर्ड बनाया, डिजिटल टिकट से कैशलेस यात्रा बढ़ी
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर बससेवेतील बससेवा पुरवणारी आपली बससेवेच्या यशात आणखीन एक टप्पा ओलांडला आहे. एका दिवसात 2 लाख 12 हजार 663 प्रवाशांनी दैनंदिन प्रवासाचा नवा टप्पा पूर्ण केला आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील बहुतांश प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करत कॅशलेस प्रवासाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे नागपूरकरांचा वाढता विश्वास व सातत्यपूर्ण पाठिंबामुळे आपली बस अधिक स्मार्ट वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे0
0
Report
सांगली सड़क हादसे में नागपुर की डॉ खुशी पवन मुंधड़ा की मौत
Nagpur, Maharashtra:नागपुर • नागपूरच्या युवा डॉक्टरचा सांगलीत रस्ते अपघातात मृत्यू. • मृत डॉक्टरचे नाव डॉ. खुशी पवन मुंधडा (रा. शिवाजीनगर, नागपूर) असून त्या एमएसचे शिक्षण घेत होती. • एमबीबीएसनंतर त्यांनी सांगलीतील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. • रुग्णालयातील काम आटोपून दुचाकीने निवासस्थानी परतत असताना भरधाव कारने चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. • अपघातात खुशी गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. • शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, आज नागपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.0
0
Report
मराठवाडा में कुणबी जात वैधता प्रमाणपत्र: बीड में सबसे अधिक वैध
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप केला... मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असल्याचे दिसतंय, शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून 20 हजार 143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखল झाले. त्यापैकी 15 हजार 597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्याचं प्रमाण अवघं . 30 टक्के आहे. तर 2 हजार 528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत. तर अर्जांची संख्या कमी असली तरी नांदेडमध्ये अवैध अर्जांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचं या आकडेवारीतून दिसतं. Hoffman: बहुतेक अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असून फेटाळणीचं प्रमाण अत्यल्प आहे.0
0
Report
Advertisement
