416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई में मनसे ने गोदाम पर छापा, इथिलीन स्प्रे से उगाए आम सील
Navi Mumbai, Maharashtra:केमिकल स्प्रे से कृत्रिम रूप से आम उगाने वाले गोदाम पर मनसे की धाड; खाद्य एवं दवा प्रशासन ने लाखों रुपये के आम सील किए। नवी मुंबई में केमिकल स्प्रे से आम उगाने वाले व्यापारी के गोदाम पर मनसे ने दबिश दी। सनपाडा सेक्टर 10 क्षेत्र में एक हॉल किराये पर लेकर अमाबाद आदि कारोबार करने वाले गोदाम पर दबिश दी गई। इस दौरान इथिलीन नामक ऐसा स्प्रे जिसका मानव शरीर पर हानिकारक प्रभाव हो सकता है, के दुरुपयोग का मामला सामने आया। इस प्रकरण में मनसे ने खाद्य व औषध प्रशासन को बुलाया; FDA ने लाखों के माल को सील कर खतरनाक रसायन से उगाए गए आमों की जांच के लिए कब्जे में लिया गया।0
0
Report
अमरावती में पेढ़ी बैरेज प्रकल्प प्रभावित किसानों ने पुनर्वसन की मांग, नहीं तो परियोजना रद्द
Amravati, Maharashtra:अमरावतीत पेढी बॅरेज प्रकल्पग्रस्त गावकरी आक्रमक; भूसंपादन विभागात मांडला ठिय्या, पुनर्वसन करा नाही तर प्रकल्प रद्द करा गावकऱ्यांची मागणी अँकर :- अमरावतीच्या रोहनखेडा, पर्वतापूर आणि दोनद या तीन गावात पेढी बॅरेज प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये गावातील लोकांची शेतजमीन घेण्यात आली. मात्र कित्येक वर्षापासून गावातील लोकांचे पुनर्वसनाचा मुद्दा निकाली काढला नाही यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले मात्र तरी देखील शासनाने दखल घेतली नाही त्यामुळे आज अमरावतीच्या भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्री चव्हाण यांच्या कार्यालयात शेकडो गावकऱ्यांनी धडक देत आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आमचे पुनर्वसन करा नाहीतर थेट प्रकल्प रद्द करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 2007 पासून या प्रकल्पाचे काम सुरू झालं आहे मात्र ते काम 60 टक्केच पूर्ण झालं आहे. या प्रकल्पासाठी 365 हेक्टर शेत जमीन भूसंपादन करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन करा अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट :- पारसराम सुखदिवे, गावकरी बाईट :- सतीश गोठे, गावकरी0
0
Report
राजेंद्र राऊत के अर्ज पर शिवसेना बंडखोर उमेदवारों की आपत्ति, सुनवाई एक बजे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर अपक्ष शिवसेना बंडखोर उमेदवारांकडून हरकत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांकडून हरकत शिवसेना बंडखोर उमेदवार रमेश बारस्कर यांनी चार हरकती घेतल्या. नावाच्या नोंदी बाबत हरकत, एकापेक्षा अधिक नामनिर्देशक पत्रामधील माहितीची पडताळणी, आमदार असताना शासकीय निवासस्थाना संदर्भातील माहिती बाबत हरकत, उमेदवाराच्या वयासंदर्भातली हारकत.. रमेश बारस्कर यांनी राजेंद्र राऊत यांच्या बाबतीत घेतल्या हरकती.. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कार्यालयात एक वाजता सुनावणी होणार0
0
Report
Advertisement
विरार कोपरी में महावितरण केखंडित बिजली: 12 घंटे से अधिक अंधेरा, जताया गुस्सा
Vasai-Virar, Maharashtra:विरार ब्रेक विरारच्या कोपरी गावात महावितरणचा तब्बल बारा तासाहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित महावितरणच्या वीज लाईनच्या दोन वायरी जळाल्याने कोपरी गाव रात्रभर अंधारात तब्बल बारा तास उलटूनही विद्युत पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने नागरिक त्रस्त. रात्रभर वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे प्रचंड हाल. वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून तत्काळ दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप. "बिले वेळेवर भरतो, मग सुविधा कधी मिळणार?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित. वाढत्या उकाड्यात आणि अंधारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण. कोपरी गावातील वीजपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार?0
0
Report
सोलापुर विधानसभा परिषद चुनाव: कांग्रेस उम्मीदवार के नामांकन पर गंभीर आक्षेप
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर गंभीर आक्षेप काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जात नमूद असलेल्या सुचकाची सही बोगस असल्याचा आक्षेप पंढरपूरचे नगरसेवक आणि सूचक म्हणून नाव असलेल्या नागेश भोसले यांनी आक्षेप घेतला या गंभीर आक्षेपामुळे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी आज वैध होणार की अवैध याकडे लक्ष0
0
Report
Miraj के काननवाडी में नाबालिग के साथ यौन अत्याचार का प्रयास; आरोपी गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरज तालुक्यातील काननवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचं प्रकार घडला आहे. घर शेजारी राहणाऱ्या संशयताकडून शेजारच्याच अल्पवयीन मुलीवर आलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाडा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात विनयभंग आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अनिकेत कांबळे वय 26, असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.0
0
Report
Advertisement
आमरावती में पिता-पुत्र की गुप्त मुलाकात से महायुती में उथल-पुथल
Amravati, Maharashtra:भाजप उमेदवार प्रवीण पोटे और अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची जिल्हाधिकर्य कार्यालयात गुप्तगुह झाली; चर्चांना उधाण आले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामांकन अर्जाच्या छानीच्या पूर्वी दोघांमध्ये ही भेट झाली. अर्ज छाननीपूर्वी दोघांमध्ये गुप्तगुहल झाल्याने चर्चा झाली असून विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीमध्ये बंडखोरी केली आहे, अकोल्याच्या बाजोरिया पिता-पुत्रांनी अमरावतीत येऊन प्रवीण पोटे यांना आव्हान दिले आहे.0
0
Report
कोल्हापुर में ईंधन वृद्धि के खिलाफ राष्ट्रवादी SP का आक्रामक प्रदर्शन
Solapur, Maharashtra:कोल्हापूर ब्रेकिंग - इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादी SP आक्रमक इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादी SP आक्रमक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी SP पक्षाकडून मूक निदर्शने निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा राष्ट्रवादी SP कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार शाब्दिक बाचाबाची पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी विचारला पोलिसांना जाब पोलीस आणि आंदोलकातील शाब्दिक चकमकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न बाईट- गणेश जाधव - सरचिटणीस राष्ट्रवादी SP0
0
Report
औसा के किल्लारी बैंक शाखा में नकद तंगी, सिर्फ 20 हजार तक सीमित नकद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज औसा तालुक्यातील किल्लारीच्या महाराष्ट्र बँकेत रोकड टंचाई...फक्त 20 हजारांची मर्यादा, ग्राहकांना अर्धा तास ताटकळत प्रतीक्षा... बँकेत पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांनाच आता स्वतःचे पैसे काढण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. औसा तालुक्यातील किल्लारीच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत रोकड टंचाईमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून, बँकेत फक्त 20 हजार रुपयेच दिले जातील असा फलक लावण्यात आला आहे. त्यातच व्यवहारासाठी कमीत कमी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, बँक प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
अकोला: सायखेड में रेल्वे के धक्के से चार गायों की मौत, दो घायल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील सायखेड शिवारात अकोला-पूर्णा ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत चार गुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोहगड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातात दोन गाई सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, सायखेड शिवारातील रेल्वे रुळांवरून गुरांचा कळप जात असताना भरधाव रेल्वेची धडक बसली. या भीषण अपघातात चार गुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गाई गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सायखेड आणि चोहोगाव परिसरातील अनेक गुरे सध्या चारा आणि पाण्याच्या शोधात मोकाट फिरत असल्याचे सांगितले जात आहे. अशाच प्रकारे फिरत असताना ही गुरे रेल्वे रुळांवर आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मोकाट जनावरांमुळे रेल्वे मार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.0
0
Report
खानापूर के खेतों में तूफानी हवाओं से केले की बागें उजाड़, किसानों को बड़ा नुकसान
Sangli, Maharashtra:स्लग - वादळ वाऱ्यामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरयांच्या केळी बागा भुईसपाट.. अँकर - सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा भुईसपाट होऊन शेतकरयांना मोठा फटका बसला आहे.रविवारी रात्री उशिरा वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील साळशिंग, लेंगरे,नागेवाडी येथील केळीच्या बागा भुईसपाट झाले आहेत.नुकसानग्रस्त केळी बागांची भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी,अशी मागणी वैभव पाटील यांनी केली आहे.0
0
Report
शिंदे गट बनाम भाजपा: भोंडेकर के बयानों से राजनीति गर्म
Bhandara, Maharashtra:भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून नाराजीचा सुरु.... कालच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाची अनुपस्थिती.... काम पडला तर फोन करायचा काम झालं की विसरून जायचा.... नरेंद्र भोंडेकर....0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में दो गुटों के बीच हिंसक भिड़ंत, दगडफेकी और गाड़ियों को तोड़फोड़
Solapur, Maharashtra:कोल्हापूर ब्रेकिंग - कोल्हापुरात दोन गटात तुंबळ हाणामारीसह दगडफेक, सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद कोल्हापूरातील गंजीमाळ, टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी तरुणांच्या जमावाने या परिसरातील दुचाकी चार चाकी गाड्यांची केली तोडफोड किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसान वाहनांच्या तोडफोड़ीत आणि दगडफेकीत तरुणांच्या टोळक्यांनी अनेक वाहनांसह घरांवर देखील केली दगडफेक दगडफेक आणि तोडफोड करून पळून जाणारे तरुण सीसीटीव्ही कैद0
0
Report
महंगाई के बीच पीएम विदेश दौरे में मेलडी चॉकलेट बाटे? कांग्रेस ने विरोध किया
Yeola, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल युद्धानंतर भारत देशामध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले असून देशात महागाई वाढली आहे असे असताना देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन मेलडी चॉकलेटचे वाटप करतात. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नाशिकच्या येवल्यात पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.0
0
Report
अकोला में भारी बारिश से यातायात बाधित, पुल के निर्माण से पानी भराव पर ट्रक पलट—आरोप कंपनी पर
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात काल तेल्हारा आणि अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे परिसरातील छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले होते. दरम्यान, अकोट तालुक्यातील आडगाव येथून जाणाऱ्या अमरावती–बुलढाणा मार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्याय्री वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या वळण रस्त्याखालून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरच साचून राहिले. याच दरम्यान एका ट्रक चालकाने साचलेल्या पाण्यातून वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रकचा तोल जाऊन वाहन पलटी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंपनीने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने योग्य व्यवस्था करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
