icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल के पुסद में विहार लॉज से नकली नोट छापने वाला गैंग गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद येथील विहार लॉज मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. तेलंगणातील मंचेेरियाल येथील चौघेजण या लॉज मध्ये बनावट नोटा छापत होते. कारवाईत दोन लाख 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करताना रंगेहात आढळले. छाप्यामध्ये टीचर आयोडीन, सोडियम थायोसल्फेट, स्पिरिट, कागद, प्रिंटर, विविध रासायनिक साहित्य आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. सर्व आरोपी तेलंगणातील मंचरियाल येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
0
0
Report

दिल्ली diesel स्टॉक के बावजूद कुछ पंपों पर बिक्री बंद, प्रशासन ने शुरू की जांच

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठা उपलब्ध असतानाही काही पेट्रोलपंपांवर इंधनविक्री बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या असताना साठा असूनही वाटप का बंद ठेवण्यात आले, याबाबत संतप्त नागरिकां प्रश्न उपस्थित करताय. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी संबंधित पेट्रोलपंपाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर बंद असलेला पंप पुन्हा सुरू करण्यात आला आणि इंधनविक्री पूर्ववत झाली. यानंतर पुरवठा विभाग आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पंपाची सखोल तपासणी सुरू केली आहे. उपलब्ध साठा, विक्रीची नोंद, वितरण प्रक्रिया आणि पंप बंद ठेवण्यामागील कारणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तपासणीचा सखोल अहवाल तयार करून नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात डिझेल व पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. Byte प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी
0
0
Report

अरुणावती परियोजना से नदी में एक लाख घन मीटर पानी छोड़ने का आदेश

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठावरील तीन ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ ग्रामस्थ व जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी अरुणावती प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी यांनी सन २०२५-२६ मधील उन्हाळी टंचाई कालावधीसाठी आरक्षित दोन दलघमी पाणीसाठ्यातून एक दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली होती. हे पाणी संबंधित गावांतील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. प्रकल्पातून पिण्याच्या पाणीकरिता विसर्ग होणार असून नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जनावरे किंवा स्वतः जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे
0
0
Report
Advertisement

डोंबिवली के खोणी पलावा उच्चभ्र सोसाइटी से २४ नाइजीरियाई गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील खोणी पलावा उच्चभ्र सोसायटीत २४ नायजेरियना घेतला ताब्यात डोंबिवलीच्या खोणी पलावा या उच्चभ्र सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या 24 नायजेरियांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई ,ठाणे आणि डोंबिवली मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाई मध्ये 24 नायजेरियन त्यात महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. या ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकां वर नवी मुंबई आणि ठाणे पोलीस ठाण्यात ड्रग संदर्भात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या नायजेरिया नागरिकांकडे पासपोर्ट विजा संदर्भातले कागदपत्र आहेत का? याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. यातील सात नायजेरियन रहिवाशांकडे हे कागदपत्र असून आठ नायजेरियन रहिवाशांकडे या संदर्भाची कागदपत्र नसल्याचे पोलिसांनी सांगितले .दरम्यान डोंबिवली आणि कल्याण परिसरात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक वास्तव्य करत असून पोलिसांमार्फत त्याची तपासणी सुरू आहे .शिवाय घर भाड्याने देताना आपण कोणाला घर भाड्याने देत आहोत याची मालकांनी चौकशी करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर किंवा एजंट वर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
0
0
Report

सांगली के अस्पताल में 108 रुग्णवाहिका के डॉक्टरों की लापरवाही से मौत

Sangli, Maharashtra:सांगली मध्ये मिरज तालुक्यात देशिंग येथे अरविंद कुंभार नामक रुग्णाला वेळेत उपचार मिळावे म्हणून शेजारील लोकांनी 108 रुग्णवाहिका बोलावली होती. रुग्णाला शुगर कमी असल्याबाबत त्रास होता. परंतु रुग्णवाहिकेवरील डॉक्टराने रुग्णाची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता थेट मिरज शासकीय रुग्णालयात घेऊन आले. रुग्ण अरविंद हा ज्यावेळी रुग्णवाहिकेत स्वतःहून चढला होता, त्यावेळी तपासणी झाली नाही. डॉक्टर हे रुग्णासोबत न बसता ड्रायव्हर सीट शेजारी बसले आणि तपासणी व प्राथमिक उपचार न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश रकटे यांनी केला. यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. या रुग्णाचे काहीच दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले आहे. आता एकुलता एक मुलगा डॉक्टराच्या हलगर्जीपणाने दगवल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटल आवारात मयत अरविंद ची आईने हंबर्डा फोडून सांगत होती.. तो व्यवस्थित होता त्याला शुगरचा त्रास होता. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला कोणतेही उपचार दिले नाहीत किंवा तपासले नाही, असे आरोप मयत रुग्णाच्या आईने केले.
0
0
Report

शशिकांत शिंदे: विलीनकरण पर स्पष्ट संकेत, महायुति में एकजुटता—कोल्हापुर

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट शशिकांत शिंदे ऑन बैठक पक्षाच्या बांधणी करण्यासाठी कोल्हापूर मध्ये सुरवात करतोय येत्या दीड महिन्यात राज्यात सर्व जिल्ह्यात पक्ष बांधणीचे कामं करणार आहे पक्ष विलिनिकारण हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे पवार साहेबांचा चेहराच पक्षासाठी महत्वाचा आहे नियोजन आणि निर्णय घेण्यास चूक झाली तर सामान्य जनतेला त्रास होतोय सरकारचे काही निर्णय चुकले आहे ऊस, साखर निर्यात बंदी केली, त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार शशिकांत शिंदे ऑन हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ भूमिकेचे आश्चर्य वाटतं, पण ते ज्येष्ठ नेते आहेत दादा गेल्या नंतर विलिनीकरण बाबत बातम्या पसरवण्यात आल्या आणि तो आरोप आमच्यावर झाले आम्ही आता यावर तोंड उघडले तर बात दूर तक जायेगी दादा विलीनकरणाची चर्चा करत होते, विलीनीकरण करण्याची त्यांची इच्छा होती पण दादा गेल्यानंतर आम्हाला गरज आहे असे दाखवण्यात आले या सर्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, पण आज स्पष्ट मत आहे जे दाखवले जातंय ते स्पष्ट व्हावे म्हणून आम्ही निर्णय घेतला भाजप ज्या पद्धतीने मित्र पक्षाची कोंडी करत आहेत त्याला सावध होत दादांनी हा निर्णय घेतला असावा त्यामुळे आता विलिनीकरण हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे शशिकांत शिंदे ऑन जयंत पाटील जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना पक्ष वाढीसाठी त्यांनी काम केलं माझ्याकडे अध्यक्ष पद आल्यानंतरही ते सक्रिय आहेत रोहित पवार सुद्धा आपल्या पद्धतीने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत पक्ष वाढीसाठी सर्वांना स्वातंत्र्य दिलं गेलं आहे एखाद्या विषयावर वेगळं मत असेल तर ते मांडण्याचे स्वातंत्र्य आमच्या पक्षात आहे याचा अर्थ पक्षामध्ये मतभेद आहेत असा होत नाही पण संकट आणि संघर्षच्या काळात जयंत पाटील यांनी चांगले कामं केले लोकसभा आणि विधानसभा काळात महत्वाचे कामं केले जयंत पाटील आणि पक्षात कोणतेच मतभेद नाहीत शशिकांत शिंदे ऑन महायुती महायुती मध्ये एकवाक्यता नाही, प्रत्येकासोबत कुरघोड्या सुरु आहेत त्यांच्यामध्ये समन्वय नाही, हे वारंवार दिसून येत आहे शशिकांत शिंदे ऑन पेट्रोल दरवाढ निवडणूक होईपर्यंत कोणतीच दरवाढ केली नाही अजून काही दिवस 90 पैशाने वाढ करत ही दरवाढ 20 रुपयांपर्यंत वाढेल सध्याचे राजकारण म्हणजे व्यावसायिक मानसिकता, काहींच्या हातामध्ये व्यवसाय दिला आहे येत्या काही वर्षात डिपेंड पॉलिसी निर्माण होईल, त्यामुळे लोकांना काही लोकांवरच अवलंबून राहावे लागेल शशिकांत शिंदे ऑन कॉकरोच जनता पार्टी विरोधी पक्ष हा नेहमी आवाज उठवत असतो, सध्याचे राजकारण पाहिल्यास लोकशाहीत न्याय मागितला तर तो मिळत नाही. आपल्या सोयीने लोकशाही प्रशासन राबवण्याचा प्रयत्न होतोय पण विरोधी पक्षाने आवाज उठवल्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न होता कॉकरोच पार्टीने आवाज उठवल्यानंतर त्यांचे सर्व अकाउंट हॅक झाले आहेत, त्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक दीपके यांचे आई वडील भीती व्यक्त करत आहेत हीच सध्याची भीतीची लोकशाही आहे कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाली आहे त्याचा उद्रेक होईल तेव्हाच क्रांती होईल.. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग करताना नागपूरचे मायलिंग गोव्यापर्यंत कसे येईल यासाठी प्रयत्न, नाव फक्त शक्तिपीठ मात्र व्यवसाय केला कसा फायदा होईल यासाठी नियोजन केले जात आहे देशाचा आणि राज्याचा कारभार धन दांडगी आणि व्यावसायिकांसाठी पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी सुरू आहे शशिकांत शिंदे ऑन पेट्रोल डिझेल भाव वाढ देशातील जनता शोषित आहे असा भ्रम राज्यकर्त्यांना झाला आहे, हे लोक धोक्याने राज्य चालवत आहेत, निवडणूक होईपर्यंत कोणत्याही प्रकारची भाव वाढ केली नाही मात्र निवडणुकीनंतर दोन दोन दिवसात दर वाढतील सध्याची दरवाढही 20 रुपयांपर्यंत जाईल, देशातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी सरकारने मदत केली नाही तर फार मोठा धोका निर्माण होईल शशिकांत शिंदे ऑन खरात प्रकरण अशोक खरात प्रकरणातील संस्थेच्या खात्यावर एका दिवसात साडेतेरा कोटी जमा झाले, हे पैसे कोणाचे झाले याचा शोध घेतला पाहिजे खरातांकडे साडे 13 कोटी कुठे कोणाकडून आले याचाही शोध घ्यावा, हे पैसे कोणी राज्यकर्त्यांनी दिले ,उद्योगपतींनी दिले का आणखीन कोणी दिले याचा शोध लावणं गरजेचं आहे खरात ऑपरेशन नेमकं कशासाठी झालं, याचसुद्धा स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे शशिकांत शिंदे ऑन कोल्हापूर महाविकास आघाडी मतभेद पहिल्यांदा कोल्हापुरात राष्ट्रवादी पवार पक्षाची ताकदं वाढवणार आपली ताकद दिसत नाही तोपर्यंत समोरुन प्रतिसाद मिळणार नाही येत्या काळात महाविकास आघाडीमधील मतभेदावर समन्वयाने मार्ग काढू..मात्र त्यापूर्वी पक्ष वाढवण्यावर आमचा भर असेल कोल्हापूरात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला सन्मान पुर्वक जागा मिळवण्यासाठी पहिल्यांदा ताकद दाखवून देवू..त्यानंतर सन्मानपूर्वक जागा आपोआप मिळतील
0
0
Report
Advertisement

बालापूर केस: शाला कर्मी ने माँ से शारीरिक संबंध की मांग की, मामला दर्ज

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेकडे तेथील कर्मचाऱ्याने शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहे. या धक्कादार प्रकारानंतर महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी आरोपीला कोणत्याही वकिलाने मदत न करण्याचे आवाहन केले असून राज्य सरकारवरही टीका केली आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
0
0
Report

लातूर के ट्यूशन एरिया में प्रशासन का बड़ा कदम: क्लासेस बंद, विद्यार्थियों में हलचल

Latur, Maharashtra:लातूर जिले के इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी में मंजूर गाळों में शुरू हुए क्लासेस, हॉस्टेल, खानावली, अभ्यासिका और अन्य व्यावसायिक उपक्रम तत्काल बंद करने के आदेश दिए गए हैं. एमआईडीसी क्षेत्र के उद्योगों के लिए निर्मित गाळों में चल रहे व्यवसायों का यह निर्णय आए परीक्षा-घटना के मद्देनजर लिया गया है. शिक्षण क्षेत्र में बढ़ती चर्चाओं के बीच प्रशासन ने इसे कड़ाई से लागू करने की घोषणा की है. विद्यार्थियों के विरोध के बीच यह सवाल उठ रहे हैं कि राह कहाँ से मिलेगी, पढ़ाई कैसे होगी.
0
0
Report
Advertisement

भंडारा-गोंदिया सीट पर महायुती बनाम महाविकास आघाडी की प्रतिष्ठा दांव पर

Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा बिगुल... महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये रंगणार प्रतिष्ठेची लढत... ४५७ मतदारांच्या समीकरणात महायुती मजबूत... भाजपकडे २०० पेक्षा अधिक मतदार असल्याचा दावा... २०१६ प्रमाणे पुन्हा रंगणार राजकीय रणनीतींचा खेळ... नाना पटोले नव्या समीकरणांची जुळवाजुळव करणार का?... महाविकास आघाडीसमोर उमेदवाराचा पेच... काँग्रेसकडे अद्यापही सक्षम चेहरा नसल्याची चर्चा... उमेदवारीवरून महायुतींत रस्सीखेच... भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची विधान परिषद जागेवर दावेदारी... भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ४५७ मतदार असून या मतदार संघात सध्या महايوतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं चित्र आहे. या जागा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात ही जागा प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला जात होती. २०१६ च्या निवडणुकीत भाजपने परिणय फुके यांना मैदानात उतरवत मोठा राजकीय डाव खेळला. त्या वेळी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्या निवडणुकीत तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी स्वतंत्र रणनीती आखत प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभावाला थेट आव्हान दिलं. जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याच्या उद्देशाने त्यांनी परिणय फुके यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला आणि अखेर त्यांची रणनीती यशस्वी ठरली. परिणय फुके विजयी झाले आणि प्रफुल्ल पटेल यांना मोठा राजकीय धक्का बसला... आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. नाना पटोले काँग्रेसमध्ये गेले आहेत, तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत महायुतीत सहभागी आहे. सध्याच्या संख्या गणितानुसार महायुतीकडे ३०० पेक्षा अधिक मतदार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला अपक्षांची साथ मिळाली तरी १५० चा आकडा पार करणं कठीण मानलं जात आहे. त्यामुळे सध्यातरी या जागेवर भाजप- महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे... मात्र उमेदवारीवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. विद्यमान आमदार भाजपचे असल्याने आणि एकट्या भाजपकडेच २०० पेक्षा जास्त मतदार असल्याने भाजपाची बाजू मजबूत असल्याचं मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केलं आहे... दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोर उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील काही इच्छुक नेते देखील भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र भाजप नेहमी आयात उमेदवारांच्या जोरावर घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. काँग्रेस ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून स्थानिक नेतृत्वालाच संधी दिली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे... भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत सध्या महायुतीची ताकद स्पष्ट दिसत असली तरी उमेदवारी, नाराजी आणि स्थानिक राजकीय समीकरणं निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण करू शकतात. आता पुन्हा एकदा नाना पटोले काही नवं राजकीय समीकरण घडवतात का, की ही जागा भाजप सहज राखून ठेवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे...
0
0
Report

अमरावती में भीषण गर्मी, रेड अलर्ट जारी, महापौर ने घरों में रहने को कहा

Amravati, Maharashtra:सलग अकराव्या दिवशी अमरावती शहरात हिटवेव्ह कायम; आज आणि उद्या उष्णतेचा जिल्ह्यात रेड अलर्ट आजही अमरावतीचा पारा 46 च्या अंशाच्या वरच; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन अँकर :- अमरावती शहरात विक्रमी सलग उष्णतेची लाट कायम आहे. अमरावती जिल्ह्यात सूर्याने रुद्ररूप धारण केले आहे. काल अमरावतीचा तापमानाचा पारा ४६.४ अंशावर होता. सलग ११ व्या दिवसापासून अमरावती तापमान कहर माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून अमरावती सध्या अक्षरशः भट्टी प्रमाणे तापत आहे. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी रस्त्यावर येऊन नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. दिवस-रात्र उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना अमरावतीकर करीत असून आजही अमरावती उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे. उकड्यापासून कोणताही दिलासा मिळत नसल्याने वाढत्या तापाच्या थेट परिणाम आता मानवी आरोग्यावर जाणू लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अमरावतीत उन्हाचे तीव्रचटके जाणवू लागतात त्यामुळे शहरातील दुचाकी स्वार किंवा पादचारी लोक दुपट्टे किंवा स्कार्फ बांधून फिरताना दिसतात त्यावेळी सुद्धा गरम वाऱ्याच्या झाळा कायम असतात मागील अनेक वर्षातील हा सर्वाधिक तीव्र उन्हाळा असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकाकडून नियुक्त होत आहे तर आणखी चार दिवस तरी उष्णतेपासून नागरिकांना सुटका होण्याची शक्यता नाही.
0
0
Report

नांदेड में दुकान से 703 हथियार पकड़े गए, मूल्य 14 लाख

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - नांदेड पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा पकडला. स्थानिक गुन्हेगारी आणि अवैध शस्त्र विक्री रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम सुरु केलीये. नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालाना शॉपिंग प्लाजा येथील एका दुकानात शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार एलसीबीने छापा टाकला. पोलिसांना पाहून दुकान मालक रणजित सिंघ सरदार हा पळून गेला. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली तेव्हा पोलीसांना मोठा शस्त्र साठा आढळला. यात 470 तलवारी, 209 खंजर आणि चाकु 24 पंच असे एकुण 703 शस्त्रे पोलीसांना आढळली. त्याची किंमत 14 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगीतले. विक्रीसाठी ही शस्त्रे आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात सात तारखेला ग्रामीण पोलिसांनी 4800 शस्त्र पकडली होती. आज एलसीबीने ही दुसरी मोठी कारवाई केली.
0
0
Report
Advertisement

किसानों की महंगाई पर युवा मंच से सवाल, सरकार पर दबाव बढ़ा

Yeola, Maharashtra:मुख्यमंत्री दौरा कांद्याचा शेतकरी अडचणी आहे.. डिझेल पेट्रोलचे दर वाढताहेत.. त्यांची टंचाई निर्माण झाली आहे... शेतकऱ्यांनी मशागत कशी करायची हा प्रश्न आहे.. खते मिळत नाही.. किंमती तर वाढविल्याच डबल केल्या... खते मिळत नाही बियाणे मिळत नाही.. खरं तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की खरीप जवळ आला की सर्व शेतकऱ्यांची काळजी. घेण्याची...जो शेतकरी पिकवेल त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाव देण्याची.. मात्र केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्याकडून असे होताना दिसत नाही, शेतकरी , तरुणांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही.. कॉक्रोज पार्टीच्या निमित्ताने. तरुणांची खदखद बाहेर पडत आहे.. नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती होईल असे वाटत नाही.. मात्र तरुण वेगळ्या रूपाने आपली खदखद दाखवेल... राज्य घटनेला बांधिल राहून ही खदखद दाखवून देईल.. राज्य घटना वाचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे महत्त्वही युवकांना कळेल.. सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद युवक दाखवताहेत ही चांगली गोष्ट आहे.... आतापर्यंत राहुल गांधी यांनी हे काम केलेच आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी हे प्रश्न विचारलेच आहे... आता तरुणांना या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे...असे माझे मत आहे... आपल्याकडे लोकशाही आहे का अशी विचारण्याची परिस्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. न्याय व्यवस्थेवर दबाव आहे, स्वायत्त संस्थेवर दबाव आहे, निवडणूक आयोग निवडणूक आयोग राहिला नाही... सरकारच्या विरोधात प्रश्न मांडला की त्याला त्रास होतो...त्याचे ट्विट डिलीट केले जातात.. खाते बंद केले जातात दुर्दैवाने आपला मिडीयाचा नंबर कितवा आहे... असे मी म्हणणार नाही मात्र याबाबत जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे... काँग्रेसचे कार्यकर्ते रस्ता रोको मध्ये सहभागी होईल. हा प्रश्न जनतेचा आहे... रोहित पवारांनी हा प्रश्न घेतला आहे. आमच्या आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख ते आहेत... कांद्याचा प्रश्न आहे, जिवाभावाचा प्रश्न आहे... जो कोणी याबाबत आवाज उठवेल त्यासोबत जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे.. काँद्याचा उत्पादन खर्चच दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.... अश्यात 12 रुपये 35 प्रतिकिलो भाव देण्याचे हे योग्य आहे... "राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला* अशी अवस्था आहे...
0
0
Report

हर्षवर्धन सपकाळ बोले: डीज़ल-पेट्रोल महँगाई और कांदा महँगाई से लोकतंत्र पर सवाल

Yeola, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ on डिझेलचा पुरवठा सुरळीत - सरकार खोटारडे आणि बेजबाबदार लोकसत्तेत बसल्यावर वाताहात देशाची आणि महाराष्ट्राची अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचे उदाहरण... तुटवडा आहे तर तुटवड्याचे नियोजन झाले पाहिजे... तुटवडा पहिल्यांदा जागत भारतात आणि महाराष्ट्रात आलेला नाही... मात्र सर्व करून नाम निराळे कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारे आम्हाला जबाबदार असे सरकार.. नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी बाहेर यावं... त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे... त्यापूर्वी आम्ही केलेल्या आरोपाला त्यांनी खोडून काढला होता मात्र त्यांच्यावर हा आरोप चिटकलेला आहे.... नियोजन झालं पाहिजे... नियोजन प्राधान्य कष्टकरी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे... त्याची संहिता ठरली पाहिजे... सरकारच अफवा पसरवत की टंचाई नाही... त्या अफवा न पसरवता जबाबदारी घेऊन योग्य नियोजन करावे... हर्षवर्धन सपकाळ on पेट्रोल, डिझेल दर वाढ 2014 साली मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते... तेंव्हा क्रूड ऑईल ची किंमत 108 डॉलर होती... आज ही 108 डॉलर आहे... 55 रुपयांमध्ये मनमोहन सिंग साहेब डिझेल देत होते... त्यानुसार हा आकडा आता 100 च्या घरात कुठेतरी चालला... क्रूड ऑइल चा भाव तसाच असताना मनमोहन सिंग साहेबांनी नियोजन केले होते त्या आठवणी आता येतात हा भाग पहिला... दुसरा भाग कोणत्या माणसाने कोणाच्या किराणा दुकानातून तेल घेऊन सामान घ्यावे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ठरवायला लागले... तर आपण लोकशाहीत आहे का असा प्रश्न स्वाभाव निर्माण होईल... भारत स्वतंत्र राष्ट्र असताना ड्रम आपल्याला सांगतात कोणाकडून डिझेल घ्या कोणाकडून नका घेऊ... रशिया, इराण कडून तेल घेत असताना आपण बंधनेंचा निषेध आपण भारतीय म्हणून केला पाहिजे... पंतप्रधानांनी न जुमानता स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र महान दाखवत असताना उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून घेतले पाहिजे... हर्षवर्धन सपकाळ on कांदा दर कोसळले बांगलादेशामध्ये पंतप्रधानांच्या मित्राची रिफायनरी आहे... भारतातून सर्रास बांगलादेशाला डिझेल त्या ठिकाणी दिले जाते... परंतु तूच बांगलादेश आपल्याकडून कांदा खरेदी करत नाही... त्या संदर्भात आपले पंतप्रधान काही बोलायला तयार नाही... आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गलथान फटका कांदा, काजू, अंबा, सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांना आणि सरसकट सर्वांना त्रास होऊ लागलाय... हे नरेंद्र मोदी यांचे पाप आहे... हर्षवर्धन सपकाळ on विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस किती जागेवर दावा करणार या संदर्भात आम्ही आमच्या मित्र पक्षांशी चर्चा करतोय... या निवडणुका भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने आणि कोणत्या थराला नेऊन ठेवल्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे... संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख... अशा स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाने जो पैसा वाटला त्यातून निवडून आलेले नगरसेवक त्याचा जो घोडेबाजार आहे हा भारतीय जनता पक्षाने मांडला... दुर्दैव आपल्या लोकशाहीचे अशा निवडणुकींना सामोरे देशाला आणि महाराष्ट्राला जावे लागते... मात्र निवडणुक आहे आणि आमच्या मित्र पक्षांशी चर्चा करून या महिन्याच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय होईल... हर्षवर्धन सपकाळ on 30 तारखेला मनोज जरांगे उपोषण करणारा जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे... ही काँग्रेस पक्षाची राहुल गांधींची मागणी... या मागणीची आता योग्य वेळ आलेली... जनगणना सुरू झाली आहे त्याच्यामध्ये ताबडतोब जातीचा कॉलम टाकावा... जातन्याय जनगणनेनुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवावा... ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे... भाजपने तातडीने जातनिहाय जनगणना करावी... हर्षवर्धन सपकाळ on अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली नीट एमपीएससी च्या परीक्षांच्या निकालांमध्ये घोळ करून तुंबळ पैसा कमावण्याचे रॅकेट समोर आले... याच रॅकेटचा भाग दोन म्हणजे 11 वी च्या प्रवेशाच्या वेळेस पुन्हा भ्रष्टाचार करण्याच्या अनुषंगाने हा ऑनलाईनचा घोळ सरकारने घातला... हर्षवर्धन सपकाळ on अशोक खरात ईडी कारवाई अशोक खरात हा एक हस्तक होता... तो हस्तक कोणाचा होता तर सत्ताधाऱ्यांचा होता... सत्ताधाऱ्यांना जवळच ठेवून मनी लॉटरीचे काम करत होते... अंधश्रद्धेचा प्रसार प्रचार करून भारतीय जनता पार्टीाला पोषक वातावरण तयार करत होते... याचे अनेक उदाहरण आहे... नासिक आणि लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामतारा नावाचे सदृश्य एक कॉल सेंटर चालवले जात होते... दोन्ही ठिकाणचे जे एस पी आहे हे मुंबईच्या लगत काम करत होते... या जाम तारा या ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या... आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो पैसा कमवत होते... मनी लॉन्ड्री देखील घराच्या माध्यमातून होत होते... आम्ही देखील हा जुना केलेला आरोप या निमित्ताने सिद्ध होताना दिसत आहे... हर्षवर्धन सपकाळ on रोहित पवार यांचे 26 मे रोजी चांदवड येथे आंदोलन काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे... या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून आम्ही देखील सहभागी होणार आहोत...
0
0
Report

शिर्डी डिफेन्स क्लस्टर से रोजगार के बड़े अवसर, विपक्ष के आरोप खारिज

Shirdi, Maharashtra:विरोधक राज्यातील उद्योगावरुन आमच्यावर नेहमी आरोप करतात... शिर्डी डिफेन्स क्लस्टर हे त्याला दिलेले उत्तर आहे... राज्यात पाच ठिकाणी असे डिफेन्स क्लस्टर होताय... यातून फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे... ही सरकारने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई नाही... विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही... इराण अमेरिका युद्धामुळे हे संकट निर्माण झालयं... राष्ट्रीय संकटात राजकारण करणे आणि पंतप्रधानांना बदनाम करणे ही घाणेरडी प्रवृत्ती... राष्ट्रीय संकटाचा सामना सर्वांनी एकत्रपणे केला पाहिजे... कसलाही घोळ नाही... सर्व 17 जागा महायुती एकमेकांच्या सल्ल्याने लढेल... तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील... तुम्हाला रोज ब्रेकिंग मिळाली पाहिजे... सर्व 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे... आम्ही सर्व 17 जागा जिंकू... हे राष्ट्रीय संकट... विरोधक यात राजकारण करून किती दिवस पोट भरणार?... कुणीही कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये... कुणीही गैरसमज पसरवू नये... मुख्यमंत्र्याप्रमाणे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी देखील हे आवाहन करतो...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top