icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजी नगर में नई पानी आपूर्ति योजना तेज़ 40 MLD जून में शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आता मोठी गতি मिळाली आहे. नवीन योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात आले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहराला तब्बल ४० एमएलडी पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे, अशी अधिकृत माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली.  यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत गढूळ पाणी आल्याने मुख्य जलवाहिनीची अंतर्गत स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यानच्या ३८ किमी अंतरावरील मुख्य जलवाहिनीची १२ ते १९ मेदरम्यान दोनवेळेस स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर २० मे रोजी जलवाहिनी रिकामी करून पुन्हा उपसा सुरू करण्यात आला. २१ मे रोजीच्या मध्यरात्री दीड वाजता जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले.
0
0
Report

सोलापुर में हर घर के सामने एक पेड़: 5000 पौधे लगाने का खास अभियान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - वाढत्या उन्हाचा विचार करता सोलापुरात एक घर एक झाड लावण्याचा उपक्रमाला सुरुवात सोलापुरात उन्हाचा पारा 44 अंशांवर, घरोघरी 5000 झाड लावण्याचा अनोखा उपक्रम.. सोलापुरात एक घर एक झाड संकल्पना राबवण्याचा निर्णय आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे आणि डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून सोलापुरात 5000 झाडांचा प्रकल्प सोलापूर ग्रीन मिशन, एक घर एक झाड या उद्देशाने सोलापुरातील तरुणाई सरसावली.. सोलापुरातील बारा लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्याची संकल्पना.. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून बारा लाख नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे करण्यात आलं आवाहन..
0
0
Report

जिला जलकिल्लत: 92 गांवों के लिए 73 टैंकर से पानी पहुंच रहा है

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाईच सवट गडद होत आहे. जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार लोकांची तहान भागवण्यासाठी ७३ टँकर्सद्वारे ९२ गावे आणि ५०० वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे उष्म्याची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे वाढलं आहे. पाण्यासाठी गावं वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश आहे, नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरीवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत आहे त्यामुळे गावाला पूर्णपणे पाणी मिळत नाही त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो. काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात हजारो कोटी रुपये खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरल्याच चित्र पाहायला मिळत आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

गोंडिया जिले में दुकान में सोए व्यवसायी की धारदार हथियार से हत्या, आरोपी फरार

Bhandara, Maharashtra:गोंदियात खळबळजनक हत्या... दुकानात झोपलेल्या व्यावसायिकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या, आरोपी फरार गोंडिया जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत शमी पी रोड परिसरात दुकानात झोपलेल्या एका व्यावसायिकाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। राजकुमार हरिनखेडे (वय ४५) असे मृतकाचे नाव आहे.. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। आरोपी घटनेनंतर फरार झाल्याची माहिती समोर येत आहे। राजकुमार हरिनखेडे हे नेहमीप्रमाणे रात्री दुकानातील कामकाज आटोपून झोपले होते। याचदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी दुकानात घुसून धारदार शस्त्राने डोके व गळ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली। सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली।
0
0
Report

मराठा समाज की मांग पर शिष्टमंडल आज अंतरवाली में वार्ता, समाधान की उम्मीद

Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग:जरांगेंच्या मागण्यांबाबत तोडगा निघणार. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज अंतरवालीत प्रसाद लाड यांच्यासह आणखी काही मंत्री येण्याची शक्यता सकाळी 9 वाजता शिष्टमंडळ अंतर वालीत पोहचणार मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत करणार चर्चा अँकर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत जाणार आहे.या शिष्टमंडळात प्रसाद लाड यांच्यासह आणखी काही मंत्र्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे.हे शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सोबत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करणार आहे.जरांगे यांनी 30 मे पासून अंतरवालीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमरण उपोषणाचा ईशारा दिलेला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली होती. त्यानंतर जरांगे यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीत चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं.त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी अंतरवालीत येत आहे.या चर्चेतून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे- सोलापूर रोड पर धनश्री लॉज में अनैतिक कारोबार पकड़ा गया, 10 महिलाएं छुड़ाईं

Rui, Maharashtra:पुणे-सोलापूर रोडलगत लॉजमध्ये सुरू होता अनैतिक व्यवसाय... धनश्री लॉजवर पोलिसांची कारवाई... 10 महिलांची सुटका...दोघांवर गुन्हा दाखल... दौंड तालुक्यातील वाखारी परिसरातील धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या कारवाईदरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम कंडोमची पाकिटे तसेच ग्राहकांच्या नोंदीचे रजिस्टर जप्त केले आहे. या कारवाईत 10 महिलांची सुटका करण्यात आली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहे....
0
0
Report

उजनी बांध के लिए जमीन मोजणी पर किसानों का तीव्र विरोध, प्रदर्शन तेज

Rui, Maharashtra:उजनी धरणग्रस्तांचा संताप.. जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध.. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी.. उजनी धरण व्यवस्थापनाच्या. लेखी पत्रानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे.. . पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता तैनात... जलसंपदा मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या दहा प्रतिनिधींची होणार बैठक.. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव आणि तरटगाव येथील उजनी धरणासाठी अतिरिक्त संपादित जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शासनाच्या विरोधात रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तीन वेळा प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चा फिस्कटली तब्बल चार तासानंतर जलसंपदा विभागाच्या उजनी धरण व्यवस्थापनाकडून लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान यावेळी अडीचशे हून अधिक पोलिसांचा पाऊस फाटा तैनात करण्यात आला होता.
0
0
Report

उल्हासनगर में गोलीबारी: सात राउंड, दो मौतें, एक घायल

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात भररस्त्यात थरारक गोळीबार; सात राउंड फायरिंगमध्ये दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. उल्हासनगरातील प्राचीन शिवमंदिर रोड परिसर पुन्हा एकदा गोळीबाऱ्याच्या घटनेने हादरला आहे. कैलास कॉलनी चौकातील के.सी ग्रुप कार्यालयाजवळ आज संध्याकाळी एका टोळीने अचानक गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात तब्बल सात राउंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबाऱ्यात अमोल चव्हाण, अनिल चव्हाण आणि अर्जुन चव्हाण हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तાતडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अर्जुन चव्हाण याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिसर सील केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे के ओतूर में बिबट्या हमला, 10 वर्षीय बच्ची घायल, सुरक्षा उपायों की मांग

Shirur, Maharashtra:पुण्यात बिबट्याचा पुन्हा एकदा हल्ला, दहा वर्षीय चिमुरडी जखमी Anc:पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्ह्या एकदा बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडलीये. गुरुवारी पहाटे १० वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काव्या महेंद्र वाकचौरे (वय १०, रा. वाकचौरे मळा, ओतूर) ही मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास काव्या ही आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. काव्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ओतूर येथील १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्यापही सुरू न झाल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी हेळसांड झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे तसेच मुलीच्या पालकांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, वाकचौरे मळा परिसरात वारंवार बिबट्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
0
Report

पुणे के पर्यटक मालवण समुद्र में डूबे, एक बचा, एक लापता; खोज जारी

Oras Bk., Maharashtra:मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्यातील दोन पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. यातील एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले आहे तर एक जण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत दुसऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. समर्थ गणेश कर्पे (आंबेगाव, पुणे) असे पाण्यात बुडून बेप्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, ऋषभ रविकिरण कदम असे वाचवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषभवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बेप्ता पर्यटकाचा समुद्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

Abhijeet Dipke के पिता बोले- राजनीति से डरना नहीं, समर्थन जरूरी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अभिजीत दिपके तसा एकलकोंडा होता फारसे बोलत नव्हता हे असे काही करेल असे कधीच वाटले नाही अशी प्रतिक्रिया सध्या ट्रेंडिंग असलेला अभिजीत दिपके चे वडील भगवान दिपके यांनी दिली आहे खरंतर राजकारणाची आम्हाला भीती वाटते त्याला अनेक वेळा आम्ही नोकरी कर म्हणून सांगितलं स्पर्धा परीक्षा दे म्हणून सांगितलं मात्र तो शिकागो मध्ये बहिणी सोबत शिकायला गेला आणि तिकडेच नोकरी करेल असं सांगून गेला अशी प्रतिक्रिया भगवान दिपके यांनी दिलीय, राजकारणात जाईल त्याबाबत भीती वाटते पण नाईलाज असतो पाठिंबाही द्यावा लागणार असेही त्याचे वडील म्हणाले त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोल gave यांनी
0
0
Report

वसई कोर्ट में सरकारी वकील के रिश्वत मामले में एसीबी ने रंगे हाथ गिरफ्तार किया

Vasai-Virar, Maharashtra:*वसई न्यायालयाच्या आवारात लाच स्वीकारताना सरकारी वकिल ACB च्या जाळ्यात* ANC : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) वसई न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता भूपेश अजित पुरंदरे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराच्या क्लायंटने मणिपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त मालमत्ता परत मिळवण्यासाठी वसई येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर अनुकूल अभिप्राय देण्यासाठी पुरंदरे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top