icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बुलढाणा के पंपों पर पेट्रोल-डीजल के लिए भीड़, पुलिस सुरक्षा में वितरण

Buldhana, Maharashtra:चिखली स्टोरी - पुलिस सुरक्षा में पेट्रोल डिझेल वाटप. अनेक पंपावर वाहन चालकांत वाद. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पंपावर ठणठणाट. तर पेट्रोल डिझेल असणाऱ्या पंपावर तोबा गर्दी. बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद असून त्यांच्याकडे स्टॉक नसल्याचे फलक लावले आहे. ज्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहन चालकांची गर्दी झाल्याचे चित्र आहे. शिवाय पंपावर वाढणाऱ्या गर्दीमुळे वाहन चालकांमध्ये नंबर लावण्यावर वाद होत असल्यामुळे अनेक पंपावर पोलिस सुरक्षा पेट्रोल डिझेल वाटप सुरू आहे. वाहनांच्या रांगा एक ते दीड किलोमीटर लांबीच्या आहेत. ट्रॅक्टरलाही डिझेल मिळत नसल्याने शेती कामे विस्कळित झाली आहेत.
0
0
Report

केडीएमसी की घंटागाड़ी की टक्कर से 2-वर्षीय बच्चे की मौत

Ambernath, Maharashtra:केडीएमसीच्या घंटागाडीच्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू सुमित कंपनीच्या घंटागाडी चालकाचा निष्काळजीपणा अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातली घटना पोलिसांनी चालकाला नोटीस देऊन सोडून दिल्याचा आरोप वसार गावातील गायकर नगरमध्ये सुनील राठोड हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. शनिवारी १६ मे रोजी सकाळी ७ वाजता सुनील राठोड हे त्यांचा २ वर्षांचा मुलगा शिवम याच्यासह कचरा टाकण्यासाठी गेले होते. तिथून परत येताना केडीएमसीचा कचरा उचलणाऱ्या सुमित कंपनीच्या घंटागाडीने शिवम याला जोरदार धडक दिली. यात शिवमच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात घंटागाडी चालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून त्याची घंटागाडी ताब्यात घेण्यात आली, मात्र चालकाला पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल्याचा आरोप केला जातोय. याबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
0
0
Report

अकोला डाबकी रोड में घरेलू विवाद पर पति ने पत्नी की चाकू से हत्या

Akola, Maharashtra:शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन नगर परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदा दीपक गुडडे असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती दीपक गुडडे याच्यासोबत काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान, पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मंदा गुडडे या दूध आणण्यासाठी जवळच्या किराणा दुकानाकडे गेल्या असता आरोपी पतीने त्यांचा पाठलाग केला.भररस्त्यात गाठून आरोपीने पत्नीवर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदा गुडडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी दीपक गुडडे याला ताब्यात घेत अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के मुंबई-गोवा मार्ग पर यातायात भारी बाधित, ईंधन संकट से पर्यटक बेहाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(chiplun) मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची कोंडी.. उन्हाचा तडाखा आणि इंधनाच्या तुटवड्याने पर्यटक बेहाल!.. अँकर मे महिन्याचा तिसरा आठवडा उजाडताच कोकणातून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमानी आणि पर्यटकांची मुंबई-गोवा महामार्गावर मोठी कोंडी झाली आहे... रत्नागिरी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे... एकीकडे उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे महामार्गावरील पेट्रोल पंपांवर झालेला इंधनाचा तुटवडा यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत... रखरखत्या उन्हात लहान मुले आणि कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकले असून,प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे...
0
0
Report

बीड़ के घोसापुरी में खेत विवाद, हिंसक टकराव, महिलाएं SP कार्यालय पहुंचीं

Beed, Maharashtra:बीड : घोसापुरी गावात शेती वादातून तुंबळ हाणामारी; महिलांची एसपी कार्यालयात धाव दोन्ही गटातील दहा ते पंधरा लोक जखमी जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू Anc : बातमी बीडच्या घोसापुरी गावातून... शेतीच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक रक्तरंजित संघर्षात बदलला. दोन गट आमनेसामने आले आणि गावात अक्षरशः तुंबळ हाणामारी झाली.. लाठ्या-काठ्या आणि मारहाणीत दोन्ही गटातील दहा ते पंधरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत... या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे... धक्कादायक म्हणजे, भयभीत झालेल्या महिलांनी जखमी अवस्थेत थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत न्यायाची मागणी केली आहे.
0
0
Report

कोल्हार नदी में 14 वर्षीय दिनेश जाधव की डूबकर मौत, परिजनों में शोक

Shirdi, Maharashtra:सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या चौदा वर्षीय मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. नदीपात्रात वडिलांसोबत पोहणे शिकत असतानाच नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कुटुंबीयासमोरच मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावात घडली आहे... राहाता तालुक्यातील कोल्हार गावात नदीपात्रात असलेल्या बांधावर आई वडिल आणि मामासोबत गेलेल्या चौदा वर्षीय दिनेश जाधव याला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. दिनेश सुट्टीसाठी श्रीरामपूर येथून मामाच्या गावाला आलेला होता. काल आई वडिल आणि मामा असे सगळेजण प्रवरा नदीपात्रात असलेल्या बांधावर गेले. दिनेशला पोहता येत नसल्याने वडिल त्याला पोहण्याचे धडे देत होते तेाचे व्हिडिओ देखील त्यांनी काढले अशातच दिनेश एकटाच नदीपात्रात दूरवर पोहत गेला आणी खड्ड्यात बुडाला. वडिलांनी आणि मामाने त्याला वाचवण्यासाठी शोधाशोध केली मात्र त्यांना तो सापडला नाही. पोलीस अग्निशमन दल आणी ग्रामस्थांनी काल संध्याकाळपर्यंत शोध घेऊनही तो सापडला नाही अखेर आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह सापडला आहे. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.
0
0
Report
Advertisement

कल्याण रेलवे स्टेशन पर 14 वर्षीय लड़की के साथ लैंगिक अत्याचार; सौरभ सोनवणे गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार अत्याचार करणाऱ्या आरोपी सौरभ सोनवणे याला कल्याण जीआरपी पोलिसांनी घेतला ताब्यात 14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचे होते खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनचा प्रतीक्षेत होती. रेल्वे स्थानकात सौरभ सोनवणे भेटला पीडित अल्पवयीन मुली सोबत काहीही ओळख नसताना सौरभ याने पीडित मुलीचे मोबाईल हिसकावून घेतले मुलीने जेव्हा मोबाईल परत मागितले सौरभ याने सांगितलं मोबाईल परत पाहिजे तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल पीडित मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता सौरभ सोनवणे तिला कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला सौरव यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केलं कशीबशी अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली सीसीटीव्ही च्या साह्याने कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी सौरभारला शोधून काढले
0
0
Report

नाशिक के मालेगांव में घटसर्फ बीमारी से दो भाइयों की मौत, लसीकरण तेज

Nashik, Maharashtra:इनाशिक ( मालेगाव ) - नाशिकच्या मालेगावला घटसर्फ आजाराने दोघा सख्या भावांचा मृत्यू झाला. नाशिकच्या मालेगाव चाळीसगाव फाटा भागातील मदारी यांच्या दोघांमुलांच्या घटसर्फ या आजाराच्या लक्षणाने दोघांमुलांचे निधन झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. चाळीसगाव फाटा भागात राहाणारे सुनील मदारी हे मुळ अजमेर कडील आहे. सुनील यांच्या गावोगावी जावुन खेळ दाखविणे व मागुन खाणे हा व्यवसाय आहे. बाराही महिने ही लोक भटकंती करतात. त्यामुळे त्यांना लसीचे महत्व कळत नाही. सुनील यांच्या एक वर्षीय व पाच वर्षीय या दोन्ही मुलांच्या घटसर्फ या आजाराने दोन दिवसात मृत्यू झाला. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी त्यांच्या वैद्यकीय समुहाला पाठवून चाळीसगाव फाटा येथे संपर्कात आलेल्यांना लसीकरण केले.
0
0
Report
Advertisement

सोलापूर में युवा कांग्रेस का भाजपा कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन, पुलिस ने रोका

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर युवक काँग्रेसचे भाजप कार्यालयासमोर आंदोलन - सोलापूर युवा काँग्रेसचे भाजप कार्यालयात समोर आंदोलन - पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर तसेच नीट पेपर फुटीच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक - शहरातील सिव्हिल हॉस्पिटल पासून भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा - युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - भाजप कार्यालयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
0
0
Report

बच्चू कडू ने शिवसेना से किसान नीति स्पष्ट करने की मांग की

Pandharpur, Maharashtra:शिवसेनेला शेतकऱ्यांबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. विभागनुसार पीक पद्धती बदलत आहे. त्यामुळे विभागनुसार शिवसेनेने शेतकऱ्यांचे धोरण तयार केले पाहिजे. शिवसेनेने धोरण तयार केले तर त्या शेतकरी धोरणावर सरकारला कसे घेऊन जाता येईल. हे ठरवता येईल. असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. आमदार बच्चू कडू हे आज पंढरपुरात आले होते. पंढरपुरात आल्यावर आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी धोरणाविषयी बोलत असताना. शिवसेनेने शेतकरी धोरण स्पष्ट करावे अशी थेट आणि स्पष्ट मागणी केली आहे. तसेच , आपण आज विठ्ठलचे दर्शन घेऊन विठ्ठलाकडे इतकेच प्रार्थना केली आहे. की सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्या प्रतीच्या भावना चांगल्या आल्या पाहिजेत. ही प्रार्थना असल्याचेही आमदार बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे साहेब हे रात्री दोन वाजता सामान्यांसाठी दरवाजा उघडणारे नेते आहेत. त्यामुळे अशा ताकतीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. सध्या सर्वेक्षण जरी केले तरी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे देवाला सकाळी घालण्यापेक्षा आपण जनतेच्या पुढे जाऊन एकत्रित एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना करू असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
0
0
Report

पालघर में 18–21 मई तक CNG आपूर्ति घटेगी, गैस स्टेशन प्रभावित

Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्यात उद्यापासून सीएनजी कपात 18 मे ते 21 मे गुजरात सीएनजी गॅसचा तुटवडा सीएनजी अभावी नागरिकांचे हाल, तासंतास वाहन चालक तात्काळत शहरी तसेच ग्रामीण भागातील 20 पंपांना सीएनजी कपातीचा फटका पालघर जिल्ह्यातील गुजरात गॅस कंपनीच्या बोईसर येथील मुख्य सीएनजी स्टेशनचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने 18 मे ते 21 मे या तीन दिवसात जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा होण्याची शक्यता आहे... जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात एकूण 20 सीएनजी पंपांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.. अनियमित वीज पुरवठा तसेच सीएनजीची आधीच कपात सुरू असल्याने सीएनजी अभावी नागरिकांची गैरसोय होणार आहे... त्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे..
0
0
Report
Advertisement

अकोला नगर परिषदच्या नाल्यांवर आक्रोश: पावसाळ्याआगमनाआधी साफसफाईची मागणी जोरदार

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाले कचऱ्याने तुडुंब भरले असून नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नेमकी काय आहे परिस्थिती, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट... मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील राम मंदिर परिसर, जुनी वस्तीतील देवरण रोड तसेच लकडगंज परिसरात नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून नाले अक्षरशः तुडुंब भरले आहेत. पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर आला असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना पावसाचे पाणी घरात शिरण्याची भीती सतावत आहे. विशेष म्हणजे लकडगंज परिसरात भाजप आमदारांचे निवासस्थान असतानाही येथील नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे “जर इथेच अशी परिस्थिती असेल, तर उर्वरित शहराचं काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नालेसफाई न झाल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तातडीने साफसफाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासन कधी लक्ष देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top