icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राजे गट ने शिवसेना के साथ जुड़कर फलटण में पार्टी ताकत बढ़ाई

Satara, Maharashtra:सातारा:फलटण येथे 'राजे गटा'च्या वतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावून फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली, तरी आता संपूर्ण ‘राजे गट’ अधिकृतपणे पक्षासोबत आला आहे. या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी स्थानिक राजकारणावर भाष्य करत पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधी पक्षांशी छुपे संधान बांधणी करत असल्याबाबत त्यांचे कान टोचले. काही मतदारसंघांमध्ये ‘माझ्याशिवाय पदाधिकारी होऊच शकत नाही’ अशी भाषा काही लोक करत आहेत. मात्र शिवसेनेत कोणाचीही मनमानी आणि मक्तेदारी चालणार नाही. शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल, तर मी स्वतः आणि खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसू, पण संघटना वाढवण्यापासून कोणालाही रोखू देणार नाही.यावेळी त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांशी असलेली छुप्या जवळीकतेवर बोट ठेवत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही. पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले स्टेज बाईट: मंत्री उदय सामंत
0
0
Report

अमरावती में रोहयो क्षेत्र की मजदूरी बकाया: 3.17 करोड़ रुपये, 17,765 मजदूर प्रभावित

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या ३ कोटी १७ लाख रुपयांची मजुरी थकीत; १७ हजार ७६५ मजुरांना फटका अमरावती जिल्ह्यात रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ३ कोटी १७ लाख रुपयांची मजुरी थकीत आहे. जिल्ह्यात सध्या ६२३५ विकास प्रकल्प सुरू असून १७ हजार ७६५ मजूर कार्यरत आहे त्यामुळे या मजुरांना फटका बसल्याच पाहायला मिळत आहे. मजुरांना दररोज सरासरी ३९७ रुपये मजुरी मिळते मात्र देयकांमध्ये मोठा विलंब होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर ५३७० कामे सुरू असून विविध यंत्रणांमार्फत ८६५ प्रकल्प राबवले जात असून वरूड तालुक्यात सर्वाधिक ७४१६ मजूर, चिखलदऱ्यात २४०७ तर धाणीत १६४८ मजूर कार्यरत आहे. मजुरी वेळेवर न मिळाल्याने अनेक कामगारांना कर्ज काढून घरखर्च भागवावा लागत असून उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी थकीत मजुरी तात्काळ खात्यात जमा करण्यासह वेतन वितरण प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

दुर्गाडी किले आंदोलन पर शिवसेना-भाजपा में तू-तू मैं-मैं, लाज के बहाने आंदोलन

Kalyan, Maharashtra:भाजपाला लाजिरवाणे वाटत असल्यामुळे आंदोलनात सहभागी होत आहेत दुर्गाडी किल्ले आंदोलनात शिवसेनेचा भाजपाला टोला.. सरकार हा हिंदुत्ववादी संघटनेचा आहे त्यांना देखील आंदोलन करावे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.. उपनेते विजय साळवी दुर्गाडी किल्ले परिसरात बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते. याच्या निषेधार्थ दोन्ही शिवसेनेकडून गेल्या ४० वर्षांपासून घंटानाद आंदोलन केलं जातं. यावर्षी भाजपाने देखील या आंदोलनात पहिल्यांदा सहभागी होण्याचा इशारा दिला होता. मात्र दुर्गाडीच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने भाजपवर जोरदार प्रहार केलाय. या आंदोलनात सहभागी होण्याची भाजपला उशिरा का होईना जाग आली. निवडणुकीच्या वेळेला हिंदूंच्या मताची भीक मागतो, म्हणून लाजिरवाला वाटत असल्याने ते आंदोलनात सहभागी होत आहेत, मात्र यात कोणीही राजकारण करू नये असा टोला शिवसेनेने भाजपला टोला लागवलाय. आतिश भोईर
0
0
Report
Advertisement

वाशीम समेत जिलों में ईद-उल-अजहा शांति और उत्साह के साथ मनाई गई

Washim, Maharashtra:वाशीम शहरासह रिसोड,मालेगांव, मंगरूळपीर, कारंजा,मानोरा तालुक्यात देखील हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. वाशीम येथील ईदगाहवर ईद उल अजहाची सामूहिक नमाज सकाळी पठण करण्यात आली. नमाज पठण केल्यावर जगात शांतता राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रार्थना झाल्यावर मुस्लिम बांधवानी एकमेकांच्या गळाभेटी देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्यने ईदगाहवर मुस्लिम बाँडव उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ईदगाहसह शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0
0
Report

उदयनराजे भोसले फिर सक्रिय मोड में, सातारा राजनीति में नई हलचल

Satara, Maharashtra:साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा “राजे” ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे…जवळपास वर्षभर शांत असलेले छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करत संघटनेला नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या..जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा… सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहा आणि सातारा जिल्ह्यातील एकाही नागरिकाला अडचण येऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देत..जनतेची सेवा हेच प्रथम उद्देश असेल पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळालं, तर दुसऱ्या कडे या बैठकीनंतर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून…“उदयनराजे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत का?” अशी चर्चा आता रंगू लागली आहे.राजकीय शांततेनंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसलेले उदयनराजे… आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट फोकस…यामुळे आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
0
0
Report

सोलापुर सलगरवस्ती में सौ से अधिक देशी पेड़ अवैध तरीके से काटे, नागरिक भड़के

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सलगरवस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल सोलापुरातील सलगरवस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता ही झाडे तोडण्यात आली असल्याची माहिती खासगी जागेत असलेली जवळपास दीडशेहून अधिक झाडे विकासकांकडून तोडण्यात आली आहे झाडे तोडणार आणि विरोधात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने पर्यावरण प्रेमींकडून महापालिका प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात येते 70 ते 80 वर्ष जुनी असलेली ही देशी झाडे रातोरात तोडण्यात आलीत दरम्यान वनविभागाकडून गाडीत भरलेली झाडे ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे मात्र बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही
0
0
Report
Advertisement

पंढरपूर के बुरुड गल्ली में मैला मिला पानी, स्वास्थ्य संकट से स्थानीय परेशान

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील बुरुड गल्ली परिसरातील रहिवाशांच्या घरात मैला मिश्रित पाणी जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निमार्ण झाला आहे. सदर मैला मिश्रित पाणी त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या इमारती लगत बुरुड गल्ली परिसर आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षातील शौचालय मधील मैला मिश्रित पाणी येथील रहिवाशांच्या घरामध्ये जात आहे. त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात तातडीने हे पाणी बंद करावे अन्यथा हेच पाणी नगरपालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे
0
0
Report

दर्गाड़ी किले में घंटानाद आंदोलन, हिंदू-मुस्लिम प्रार्थनास्थल पर विवाद, भारी पुलिस तैनाती

Kalyan, Maharashtra:शिवसैनिकांचा दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन,मोठा पोलीस बंदोबस्त बकरी ईद निमित्त शिवसेनेचे घंटा नाद आंदोलन कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.आज बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिकांकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत.बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केली जाते,मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही.त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करतात.शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र येणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय.या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे
0
0
Report

नांदेड के लोहा शहर में सड़क चौड़ाई के लिए मुस्लिम परिवारों ने भूमि दान

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिलेातील लोहा शहरात रस्ता मोठा करण्यासाठी नागरिकांनी मालकीची जागा स्वखुशीने दिली. विशेष म्हणजे हातावर पोट असणाऱ्या मुस्लिम कुटुंबानीही कुठलाही मोबदला न घेता जागा दिली. लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरून जुन्या लोहा शहरात जाण्यासाठी छोटा रस्ता होता. काही दुकाने आणि घरांमुळे हा रस्ता खूपच अरुंद झाला होता. नगराध्यक्ष शरद पवार यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी जागा देण्याची विनंती केल्यानंतर तीन मुस्लिम कुटुंबानी आणि दोन इतर कुटुंबानी आपली छोटी दुकाने आणि पत्राच्या घराची जागा देण्यास संमती दिली. नारापरिषदेने दुकानं आणि घरं पडून रस्ता मोठा केला. रस्ता मोकळा झाल्याने जुन्या लोहा शहरात जाणाऱ्या नागरिकांचा दररोजचा त्रास कमी होणार आहे.
0
0
Report
Advertisement

सोनाळा जलप्रकल्प से शहर को बढ़े पानी का फायदा, किसानों की चिंता बढ़ी

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेऊन सोनाळा प्रकल्पातून शहरासाठी वृद्धि पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू आहे. मात्र या निर्णयामुळे शेलुबाजार परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंताचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण सोनाळा प्रकल्पातील पाण्यावर शेलूबाजार,वनोजा, तऱ्हाळा तसेच परिसरातील अनेक गावांतील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन अवलंबून आहे. त्यामुळे शहरासाठी अतिरिक्त पाणी वळवण्यात आल्यास शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठा कमी होईल आणि आगामी हंगामात सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

वाशिम में पानी की कमी से 1000 शेवंती की फसल बर्बाद, किसान संकट में

Washim, Maharashtra:वाशीम में ग्रामीण भागात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. याचाच मोठा फटका आता शेवंती फुलशेतीला बसताना दिसत आहे. वाशिमच्या खंडाळा शिंदे येथील नंदकिशोर सुर्वे या शेतकऱ्याने मोठ्या आशेने तब्बल १ हजार शेवंती फुलांच्या रोपट्याची लागवड केली होती. सुरुवातीला पिकाची वाढ चांगली होती मात्र त्यानंतर पाण्याचा टंचाई निर्माण झाल्याने पाण्याअभावी फुलांची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातच बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निर्णय कठीण झाल्याने आता त्यांच्यावर ही फुलझाडे उपटून टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात sापडला आहे.
0
0
Report

वाशीम: मानसून पूर्व आपदा प्रबंधन प्रशिक्षण से आपदा तैयारी तेज

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यातील पूर व इतर आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. SDRF पथकाने पूरस्थितीतील बचावकार्य, बोटींग, प्रथमोपचार आणि CPR चे प्रात्यक्षिक सादर केले. जिल्ह्यातील १७३ पूरप्रवण गावांपैकी ६ गावे अतिसंवेदनशील असल्याची माहिती देण्यात आली.तसेच १४८ ग्रामपंचायतींना आपत्ती प्रतिसाद किटचे वितरण करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के मोहोळ में चोरों का धावा: हराळवाडी में रात में छह घर फोड़े

Solapur, Maharashtra:सोलापूर - मोहोळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; हराळवाडीत एका रात्रीत सहा घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास... सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हराळवाडी गावात एका रात्रीत सहा घरफोड्या केल्या आहेत. अंधाराचा आणि उन्हाळ्या असल्याने उकाडयामुळे नागरिक बाहेर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या घरफोड्यांमध्ये जवळपास १० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गाव मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांच्या निशाण्यावर आले. गावातील नागरिक उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपले असताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत एकामागून एक तब्बल सहा घरे फोडली. चोरट्यांनी घरातील कपाटे आणि लॉकर फोडून सोने-चांдиचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. प्राथमिक माहितीनुसार जवळपास ६ तोळे सोन्यासह सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
0
0
Report

प्याज के भाव गिरने के बावजूद डाळींब के दाम स्थिर, किसान खुश

Shirdi, Maharashtra:Anc - एकिकडे कांद्याचे दर कोसळत असताना डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासादायक चित्र पाहायला मिळतंय... राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींबाची आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत असल्याने बाजारात आनंदाचे वातावरण आहे... एक नंबरच्या डाळींबाला तब्बल २५० रुपये दर मिळत असून वर्गवारीनुसार दर सध्या स्थिर आहेत... दररोज सुमारे १५०० क्रेट डाळींबाची आवक बाजार समितीत होत आहे...राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या डाळींबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे...गेल्या काही दिवसांपासून डाळींबाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे...विशेष म्हणजे एक नंबर दर्जाच्या डाळींबाला तब्बल २५० रुपये दर मिळत आहे...तर इतर वर्गवारीनुसारही दर स्थिर असून बाजारात चांगली मागणी कायम आहे...दररोज अंदाजे १५०० क्रेट डाळींबाची आवक होत असून व्यापाऱ्यांकडूनही चांगली खरेदी केली जात आहे...कांद्याचे दर कोसळल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी डाळींबाने काहीसा आधार मिळाल्याच पाहायाला मिळतय...
0
0
Report

विवेक कोल्हे की चुनाव जीत से अहिल्यानगर में विखे-कोल्हे संघर्ष तेज

Shirdi, Maharashtra:कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.. त्याचाच प्रत्यय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात आयोजित कोल्हे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्या दरम्यान आलाय.. या कार्यक्रमासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधक नव्हे, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top