416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशिम में मातंग समाज का आरक्षण उपवर्गीकरण को लेकर जोरदार आक्रोश
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ,ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या हजारो समाजबांधवांनी मोर्चात सहभाग घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करून मातंग समाजाला न्याय द्यावा, अशा मागणी आंदोलकांनी केली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
NDA में संभावित सहयोगी बदलाव: महाराष्ट्र की राजनीति में वार्ता आगे बढ़ रही
Mumbai, Maharashtra:आमदार मिहिर कोठेचा On 2029 उमेदवारी पक्ष जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे आणि 2029 चा काही दावा नाही केला आहे आम्ही त्यांचे स्वागत करतो आमच्या मित्र पक्षात ते आले आहेत NDA मध्ये जे कोणी येणार मी त्यांचे स्वागत करणार On ईशान्य मुंबई उमेदवार आमचे नेतृत्व जे काही ठरवणार ते योग्य ठरवणार आमची काही मागणी नसते मित्र पक्ष मिळून वाटाघाटी करतात ते आम्हाला मान्य आहे On संजय पाटील निर्णय राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अध्यक्ष ते योग्य वेळी करतील मी मिहिर कोठेचा म्हणून माझा याचा काडीचा संबंध नाही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र अध्यक्ष यांना विचारूनच हा निर्णय झाला असेल किंवा नाही मी त्यांचे स्वागत करतो ज्या प्रकारे पक्ष अध्यक्ष त्याचे आम्ही कार्य करते जर पक्ष बोले की दुसरी कडे जाऊन कार्य कर मी माझा बोजा विस्तार उचलून कार्य करेल0
0
Report
ठाकरे गट के शिवसैनिकों पर पुलिस की सतर्कता, वाकचौरे के भागीदारी को लेकर तेज़ चर्चा
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा, पोलीस प्रशासन सतर्क. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरेला तुडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खा.भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात येणार असल्याने शिर्डी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. इशारा दिलेल्या ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जातेय. वाकचौरे मतदार संघात येणार असल्याने पोलिसांकडून खबरदारी.0
0
Report
Advertisement
ठाकरे गट के शिवसैनिकों का इशारा, पुलिस सतर्क, शिर्डी में सुरक्षा तैनात
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा , पोलीस प्रशासन सतर्क ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवलं नजर कैदेत बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरेला तुडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शshivसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खा.भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात येणार असल्याने शिर्डी पोलिसांचा बंदोबस्त तैनात इशारा दिलेल्या ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवलय नजरकैदेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून घेतली जाते खबरदारी वाकचौरे मतदार संघात येणार असल्याने पोलिसांकडून खबरदारी0
0
Report
राजुरा तहसील कार्यालय, किसान ने बैल पर प्रवेश किया, कर्ज माफी की मांग
Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसील कार्यालयात आज एका शेतकऱ्याने बैलावर बसून केला प्रवेश, या शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा अँकर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसील कार्यालयात आज एका शेतकऱ्याने चक्क बैलावर बसून प्रवेश केला. तहसील कार्यालयात प्रवेश केलेल्या या शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. दिवाकर पाहानपटे असं त्याचे नाव असून तो राजुरा तालुक्यातील भोयेगाव येथील रहिवासी आहे. दिवाकर पाहानपटे यांनी केलेल्या या विचित्र प्रकारामुळे काही काळ तहसील कार्यालयात गोधळ उडाला. कार्यालय परिसरात या बैलावरील स्वार शेतकऱ्याच्या कृतीची चर्चा होती. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
चंद्रपुर में 70 हजार मतदारों के नाम हटे, BLO घर-घर पहुंचेंगे
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेमध्ये तब्बल 70 हजार मतदारांची नावे वगळली गेली आहेत. SIR अंतर्गत जिल्ह्यात 86.56% मतदारांचे आजवर मॅपिंग झाले असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत जिल्ह्यात SIR अंतर्गत BLO च्या घरभेटीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. या कार्यक्रमाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रुटिरहित व सर्वसमावेशक ठेवणे हा आहे. महाराष्ट्र राज्याचा समावेश विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यामध्ये करण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी 01 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांची नोंदणी, मतदारांच्या तपशीलांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे, दुबार नोंदींची तपासणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.0
0
Report
Advertisement
रायगड पेण में मनसे को झटका, सामूहिक राजीनामे; शिंदे गुट में जाने की चर्चा
Chendhare, Maharashtra:रायगडच्या पेण मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. पेण तालुक्यातील मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत. जिल्हा कार्यकारिणीतील नियुक्त्यांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हा नाराज गट लवकरच आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.0
0
Report
शिर्डी सांसद भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गुट में प्रवेश, निधि खर्च पर मतदाताओं का गुस्सा
Shirdi, Maharashtra:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. निधी मिळत नसल्याने मी शिंदे गटात गेलो असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणलं. भाऊसाहेब वाकचौरे यांना 14 कोटींचा निधी दिला गेला आहे मात्र त्यापैकी त्यांनी 71 लाख रुपये विकास कामांसाठी खर्च केले आहेत. 135 कामांपैकी फक्त दोनच विकासकामे पूर्ण झालं असल्याचं समोर आलेलं आहे. याबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांशी झी 24 तासने संवाद साधलाय. वाकचौरे हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदे गटात गेले आहेत. ते कधीही सर्वसामान्य नागरिकांना भेटले नाहीत. आम्ही त्यांना फक्त ठाकरेचे उमेदवार म्हणूनच मतदान केलं होतं. मात्र आता त्यांनी मतदारांचा विश्वास घात केलाय. पुढच्या निवडणुकीला आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांनी झी24तास सोबत बोलताना दिल्या आहेत.0
0
Report
कोपरखैरणे की साई कुटीर इमारत: निवासियों ने बिल्डर के अस्पताल निर्माण पर आरोप
Navi Mumbai, Maharashtra:anchor - कोपरखैरणे येथील साई कुटीर इमारतीतील रहिवासी आणि बिल्डर यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. इमारतीच्या सामाईक मालकीच्या जागेचा वापर रुग्णालयासाठी करण्यासह संरचनेत बेकायदेशीर बदल केल्याचा तसेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा एका बिल्डर व डॉक्टरांच्या हितासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच संबंधित निर्णय मागे न घेतल्यास सामूहिक उपोषण छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. कोपरखेरने मधील के.टी.रिऍलिटी या बिल्डरकडून सदनिका खरेदी करताना इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रुग्णालय सुरु होणार असल्याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मंजूर बांधकाम नकाशामध्येही त्याचा उल्लेख नव्हता. नंतर रुग्णालय सुरु होणार असल्याचे समजल्यावर केवळ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) असेल, असे सांगण्यात आले. मात्र ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रुग्णालय व बिल्डर कार्यालयासाठी सामाईक जागांमध्ये मोठÎा प्रमाणावर अंतर्गत बदल करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांच्या मते, सोसायटीचा सामाईक प्रवेशमार्ग रुग्णालयासाठी वापरण्यात आला असून तळमजल्यावर ऑक्सिजन फ्लांट, डीजी सेट आणि भूमिगत पाण्याची टाकी उभारण्याचे काम करण्यात आले. या सर्व कामांसाठी केवळ अंतर्गत बदल मंजुरीचे पत्र दाखवून कामे सुरु ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महानगरपालिकेने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राच्या आधारे संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याची नोंद न्यायालयाने केल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे। महापालिका आयुक्तांकडे रहीवशीयनी तक्रार केली होती ,याबाबत आयुक्तांनी सावध भूमिका घेत या प्रकरणात कोणाला ही पाठीशी घातलं जाणार नाही ,हे प्रकरण न्यायालयात देखील गेले होते , चे चुकीचं आहे त्यावर कारवाई केली जाईल असे मत व्यक्त केले आहे। विशेष म्हणजे बिल्डर ने रुगणल्याला देण्यात आलेली जागा बाबत सोसायटी ची कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे रहिवाशीयांचे म्हणणे आहे। तर पालिकेच्या सगळ्या परवानगी घेऊन हे रुग्णालय सुरू असल्याचे बिल्डर ने सांगितले आहे。0
0
Report
Advertisement
हिंगोली सांसद नागेश पाटील आष्टिकार बोले—पिछले दो साल में सिर्फ 10 करोड़ रुपये मिले
Hingoli, Maharashtra:अँकर-ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्यानंतर हिंगोली के खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आपल्या मतदारसंघांमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांची कामे मतदारसंघात निधी मिळत नसल्यामुळे ठाकरे शिवसेना सोडावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मागील दोन वर्षांमध्ये 19 कोटी रुपयांचा निधी आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये खर्च केलेला निधी पाच कोटी तर एकूण 79 कामापैकी 28 कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नागेश पाटील आष्टीकर यांनी हा दावा फेटाळला आहे. दोन वर्षांमध्ये केवळ दहा कोटी रुपये येत असतात; माझ्याकडे सध्या सात कोटी रुपये शिल्लक आहेत. मागील दोन महिन्यापासून पोर्टल बंद आहे. एवढ्या निधीवर काही होत नाही; अनेक कार्यकर्त्यांना निधी द्यावा लागतो अशी माहिती हिंगोली के खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी आहे.0
0
Report
राहाता तालुक्यात भारी बारिश से जनजीवन प्रभावित, सड़कें जलमग्न
Shirdi, Maharashtra:Rahata News Flash राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस... रस्ते झाले जलमय... मान्सूनच्या पावसाची जोरदार हजेरी... गेल्या एक तासापासून पाऊस सुरू... अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ... बळीराजाच्या आशा पल्लवीत...0
0
Report
चंद्रपुर में अवैध रेत खनन दौरान कांग्रेस नेता के 3 हाईवा व एक पोकलेन जप्त
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करतांना काँग्रेसच्या बड्या नेत्याचे ३ हायवा आणि १ पोकलेन जप्त, मूल महसूल विभागाची उमा नदीच्या राजोली घाटावर कारवाई अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करतांना काँग्रेसच्या बड्या नेत्याचे ३ हायवा आणि १ पोकलेन जप्त करण्यात आले आहेत. मूल महसूल विभागाने उमा नदीच्या राजोली घाटावर ही कारवाई केली. महसूल विभागाच्या कारवाईत जवळपास २ कोटींच्या वरील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेले हायवा काँग्रेसचे माजी चंद्रपूर तालुकाध्यक्ष शामकांत थेरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. मूल तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत तीन हायवा आणि एक पोकलेन मशीन जप्त केली. कारवाईनंतर सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून त्यांच्यावर महसूल नियमांनुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाईट १) विजय पंडिले, नायब तहसीलदार, मुल आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र: ऊस वाहतूकदारों पर कागदपत्रों के दुरुपयोग का आरोप; 100 कारखानों पर करोड़ों का कर्ज
Kolhapur, Maharashtra:राज्यातील ऊस वाहतूकदारांनी वाहतूक आणि तोडणीचे करार करताना दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेने केला आहे...राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मुद्रा योजना आणि इतर योजनेतून कर्ज उचल केल्याचा दावा या संघटनेने केलाय. राज्यातील जवळपास 100 कारखान्यांनी शेकडो कोटींचे कर्ज वाहतूकदारांच्या कागदपत्रांववर उचलल्याचं समोर आलं आहे.धक्कादायक म्हणजे काही वाहतूकदारांच्या नावावर कर्नाटकामधील बँकेमधून कर्ज उचललं आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऊस वाहतूकदारांचे सिबिल खराब करत त्यांना देशोधडीला लावण्याचं काम कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..या विरोधात महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. वाहतूकदारांचे हे प्रश्न निकाली न काढल्यास यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने दिला आहे.0
0
Report
धैर्यशील मोहिते पाटील ने मंत्री गोरे पर निशाना, पवार गट की चुनाव चर्चा गर्म
Pandharpur, Maharashtra:सोलापूर विधान परिषद निवडणूक निकाला नंतर माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असते तर विधान परिषदेची निवडणूक वैचारिक दृष्ट्या बिनविरोध झाली असती असा मोठा गौप्यस्फोट ही खासदार मोहिते पाटील यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झाले असले तरी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना मिळालेल्या मतांची जोरदार चर्चा आहे. काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावर टिका केली.0
0
Report
बीड़ में मानसून नहीं—पेयजल बाधित, खेतों के लिए पानी संकट गहरा
Beed, Maharashtra:बीड: "पाऊस" गायब, पाण्यावर बंदी! बीडच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट..! ANC : मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाणी प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शेतीसाठी धरणं आणि प्रकल्पांमधून बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकीकडे पावसाचा दुष्काळ आणि दुसरीकडे कारवाईची भीती, त्यामुळे बीडचा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट... VO-1 गतवर्षी पावसाने बीड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजवला होता. मात्र यंदा मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जिल्ह्यातील 173 मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा 17.25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक प्रकल्प मृतसाठ्यात पोहोचले असून काही पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. प्रकल्पांमधून शेतीसाठी अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून पाईप, मोटार आणि इतर साहित्य जप्त केले जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. बाईट : विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी ग्राफिक्स : - बीड जिल्ह्यातनेकून 173 मध्यम लघु प्रकल्प आहेत. - प्रकल्पात केवळ 17.25 टक्के पाणी साठा शिल्लक - 79 लघु प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत - 81 पाणीसाठा प्रकल्प कोरडे पडले आहेत - 13 प्रकल्पातील पाणी शून्यावर आहे - बीडला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात केबल 21.22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. VO-2 यंदा पावसाने साथ न दिल्यामुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या खरিপाच्या पेरण्या अद्यापही रखडलेल्या आहेत. पावसाअभावी अनेक शेतकरी सिंचन प्रकल्पांच्या पाण्यावर अवलंबून होते. मात्र आता प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे त्यांच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र उद्योगांना सुरू असलेला पाणीपुरवठा आधी बंद करावा आणि त्यानंतर शेतीसाठी नियंत्रित स्वरूपात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत. बाईट : भाई मोहन गुंड, शेतकरी नेते END VO एकीकडे आकाशाने पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे उपलब्ध पाणीसाठाही झपाट्याने आटत चालला आहे. त्यामुळे प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलत असले, तरी शेतीच्या भवितव्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत आहे. आता सर्वांच्या नजरा मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागल्या असून, पाऊस वेळेत बरसला नाही तर बीडसमोरील पाणी आणि शेतीचं संकट आणखी गडद होण्याची चिन्हं आहेत.0
0
Report
Advertisement
