icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला भू-राजस्व अधिकारी पंकज पवार पर गंभीर अनियमितताओं के आरोप, मामला दर्ज

Akola, Maharashtra:अकोला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना विविध महसुली प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपांवरून तत्कालीन उपअधीक्षक तथा सध्या निलंबित असलेले पंकज पवार यांच्याविरुद्ध अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली आहे. पंकज पवार यांनी जून २०२३ ते जून २०२५ या कालावधीत उपअधीक्षक पदावर कार्यरत असताना अधिकाराचा गैरवापर करून विविध महसुली प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप आहे. तपासात जमीन मालकी हक्काशी संबंधित सातबारा नोंदींमध्ये बदल, मृत व्यक्तींच्या नावाने अर्ज स्वीकारणे, भाडे तत्त्वावरील मालमत्तांची पत्रके तयार करणे, सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जमीन खासगी व्यक्तींच्या नावावर दाखविणे तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रमाणपत्रे देणे अशा गंभीर बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणात शासनाचा विश्वासघात, महसुली नोंदींमध्ये फेरफार आणि शासकीय कामकाजातील अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा नोंदविला.
0
0
Report

अनिकेत तटकरे की जीत से रायगढ़ में NCP कार्यकर्ताओं में उत्साह

Chendhare, Maharashtra:अनिकेत तटकरे यांच्या विजयानंतर रायगडात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तटकरे यांचे होमग्राउंड रोह्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष ढोलताशांच्या गजरात आणि फटाके वाजवत केला आनंद साजरा मंत्री आदिती तटकरे देखील जल्लोषात सहभागी विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आल्यानं रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. सुनील तटकरे यांच्या होमग्राउंड असलेल्या रोह्यात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. ढोलताशांच्या गजरात फटाके वाजवत , एकमेकांना पेढे भरवले. सुनील तटकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है असा जयघोष सुरू होता. कार्यकर्त्यांच्या या जल्लोषात मंत्री आदिती तटकरे यादेखील सहभागी झाले होत्या.
0
0
Report

UBT के देवयानी डोंगावकर ने नाम वापस लिया; गणेश लोखंडे शिवसेना के आधिकारिक उम्मीदवार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीत मोठी घडामोडी घडली त्यांचा विधान परिषद अधिकृत उमेदवार ubt च्या देवयानी डोणगावकर यांनी त्यांचा अर्ज परत घेतला त्यामुळे ubt शिवसेनेचेच अपक्ष म्हणून अर्ज भरलेले गणेश लोखंडे आता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील शिवसेनेच्या दाव्यानुसार त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म दिला असल्याचं म्हणणं आहे.. देवयानी डोनगावकर यांच्या पतीने या वेळी प्रतिक्रिया दिली आंबादास दानवे यांनी मला उमेदवारी साठी माझ्या पत्नीचे फोटो मागितले, तेंव्हाच त्यांना सांगितले होते की पर्याय उमेदवार तयार ठेवा बिनविरोध निवडणूक होऊ नयेत म्हणून आमचे दोन उमेदवार होते, पण निवडणूक खर्चिक होती, लढण्यात काही मला फायदा नव्हता, शिंदे यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळाली नाही त्यांचे युतीचे ठरले, त्यात मला नोटीस मिळाली की माझ्या गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ बरखास्त करण्याची, त्याला मी घाबरत नाही, भाजपचे हे दबाव तंत्र आहे पण मला रस नव्हता त्यामुळं माघार घेतल्याचे कृष्णा पाटील डोनगावकर यांनी सांगितले आता बँक निवडणूक वर जोर लावणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर उमेदवार गणेश लोखंडे यांनी पक्षाने जबाबदरी दिलीय ती पार पाडणार असल्याचे सांगितले...
0
0
Report
Advertisement

अपक्ष उम्मीदवार दत्तात्रय पानसरे के उमेदवारी वापस लेने के दावे पर राजनीतिक घमसान

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर बिग ब्रेकिंग अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणालाही प्राधिकृत केलं नसल्याचा दावा... दत्तात्रय पानसरे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल... दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज प्राधिकृत केलेल्या शहाबाज सय्यद यांनी घेतला होता मागे अहिल्यानगर विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपकडून प्राजक्त तनपुरे आणि अपक्ष दत्तात्रय पानसरे या दोघांची उमेदवारी अर्ज राहिले आहेत बाकी.... माझा अर्ज बाद ठरवल्यास आत्महत्या करण्याचा दत्तात्रय पानसरे यांचा इशारा...
0
0
Report

कल्याण स्टेशन परिसर में रिक्षाचालक के पैसे और मोबाइल चोरी का मामला CCTV में कैद

Kalyan, Maharashtra:रिक्षात बसला,तोच रिक्षा चालकाचे पैसे,मोबाईल घेऊन झाला पसार घटना सीसीटीव्हीत कैद तो आधी रिक्षात प्रवासी म्हणून बसला. रिक्षात बसल्यानंतर काही वेळातच त्याने रिक्षा चालकाचे पैसे आणि मोबाईल चोरून धूम ठोकली. कल्याणच्या स्टेशन परिसरातला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. दुपारी दोन वाजता सुमारास कल्याण स्टेशन परिसरात एक प्रवासी रिक्षात बसला. रिक्षा चालक आणखी दोन प्रवाशांची वाट पाहत होता. मात्र त्याच वेळी रिक्षात बसलेल्या प्रवाशान मोठ्या चलाखीने पुढे बसलेल्या रिक्षा चालकाचा मोबाईल आणि पैसे चोरत धूम ठोकली. रिक्षा चालक त्याला पकडण्यासाठी मागे धावला मात्र तो हाती लागला नाही. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्याचा शोध घेत आहेत.
0
0
Report

गोवा के कैसिनो वीडियो से कोल्हापुर राजनीति गर्म, क्षीरसागर पर नैतिकता सवाल

Kolhapur, Maharashtra:गोवा के कैसिनो वीडियो से कोल्हापुर राजनीति गर्म, क्षीरसागर पर नैतिकता सवाल. गोव्यातील एका कॅसिनोमधील कथित व्हिडिओमुळे कोल्हापुरातील राजकारण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा कथित व्हिडिओ सादर केला. नगरसेवक म्हणून अशा ठिकाणी जाणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित करत इंगवले यांनी ऋतुराज क्षीरसागर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मात्र या आरोपांना ऋतुराज क्षीरसागर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 2022पासून रविकिरण इंगवले सातत्याने क्षीरसागर कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसच या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचही सांगितल. व्हायरल करण्यात आलेल्य व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली आहे का, याचीही तपासणी केली जाईल, अस देखील ऋतुराज क्षीरसागर यांनी यांनी म्हटलंय.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा में अरुण लखानी की जीत अब केवल औपचारिक

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानीय स्वराज्य संस्थे के विधान परिषद में बड़ी घडामोड सामने आई है. कांग्रेस उम्मीदवार शैलेश कुमार अग्रवाल और अपक्ष उम्मीदवार सुधीर कोठारी ने अपनी उमेदवारी वापस लेने की घोषणा की. इसके परिणामस्वरूप अब भाजपा उम्मीदवार अरुण लखानी का विजय केवल औपचारिकता बाकी है. शैलेश अग्रवाल और सुधीर कोठारी दोनों चंद्रपूर जिलाधिकारी कार्यालय में दाखिल होकर आधिकारिक माघार लीं. अग्रवाल ने कहा कि पार्टी के वरिष्ठ नेताओं से चर्चा के बाद यह निर्णय लिया गया. सुधीर कोठारी ने भी राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेताओं के आग्रह पर संयुक्त महायुती में बने रहने का निर्णय लिया और उमेदवारी वापस लेने की बात कही.
0
0
Report

कर्ज़माफी की कड़क शर्तें: किसान बोले, किडनी बेच दूँगा—सरकार के खिलाफ प्रदर्शन

Buldhana, Maharashtra:BREAKING: 'आमچی किडनी घ्या, पण कर्जमाफी करा!' - बुलडाण्यात शेतकऱ्यांचे थेट स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र Anchor - कर्जमाफीच्या जाचक अटींना कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांनी चक्क आपली किडनी विकण्याची तयारी दाखवली आहे. "आमची किडनी घ्या, पण कर्जमाफी करा," अशी उद्विग्न मागणी करत या शेतकऱ्यांनी थेट स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञानपत्र लिहून सरकारकडे पाठवले आहे. बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील शुभम घोंगटे आणि अमोल देशमुख या युवा शेतकऱ्यांनी हे अनोखे आणि संतापजनक आंदोलन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, या कर्जमाफीमध्ये सरकारने अनेक कडक आणि जाचक अटी टाकल्या आहेत. वास्तविक पाहता, सततची नापिकी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. त्यातच बियाणे आणि खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्जमाफी तर जाहीर केली, पण अटींमुळे हजारो शेतकरी यातून बाद होणार आहेत. दरवेळी कर्जमाफीची केवळ घोषणा होते, पण अटींमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही, असा आरोप आता शेतकरी करत आहेत. याच जाचक अटीांचा निषेध म्हणून या शेतकऱ्यांनी थेट स्वतःची किडनी विकून कर्ज फेडण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. या आंदोलनामुळे आता प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

नितेश राणे की पहल से कोकण विधान परिषद बिनविरोध, बाल माने ने उमेदवारी वापस

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध! नितेश राणेंच्या पुढाकाराने ठाकरे गटाच्या बाळ मानेंची उमेदवारी मागे.. मविआवर केला 'घोडेबाजारा'चा आरोप.. कोकण विधान परिषद निवडणुकांत अत्यंत नाट्यमय घडामोड घडली असून आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे, मंत्री नितेश राणे हे स्वतः बाळ मानेंना सोबत घेऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.. अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. अनेकवेळा मागणी करूनही मित्रपक्ष आणि घटक पक्षांनी मला सूचक म्हणून सह्या दिल्या नाहीत. तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले. अशी संस्कृती कोकणाची नाही, म्हणूनच मी विचार करून अर्ज मागे घेतला, असे बाळ माने यांनी स्पष्ट केले आहे. नितेश राणेंच्या या पुढाकारामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महायुतीची सरशी झाली आहे.. मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय.. महायुतीच्या प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उपस्थित आहे.. आज सब कुछ देव भाऊ अशीच परिस्थिती आहे.. सगळ्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळलेल आहे राज्याला पुढे घेऊन जायचं असेल किंवा आम्हाला आमचं भविष्य घडवायच असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही.. बाळमानींना बरं वाईट काय हे सर्व माहिती आहे.. वरिष्ठ पातळीवरती जो काही निर्णय ठरला होता त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मी करतोय.. मी कलेक्टरांकडून माहिती घेतली की सगळ्याच लोकांनी फॉर्म मागे घेतलेले आहेत.. नितेश राणे..
0
0
Report

Yavtamal विधान परिषद चुनाव निर्विरोध: दुष्यंत चतुर्वेदी की जीत पक्की

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणूक अवरोध झाली आहे, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पर्यंत निवडणूक रिंगणातील पाच उमेदवारांपैकी चौघांनी आपले नामांकन मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांची निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपाचे नितीन भुतडा यांच्या बंड शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साजिद बेग तसेच अपक्ष उमेदवार फारुक सय्यद यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. काँग्रेसचे साहेबराव कांंबळे यांनी देखील नाट्यमय रित्या कालच माघार घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.
0
0
Report
Advertisement

मिठी नदी में गाळ उपश पर आमदार नाराज़, अभियंता गैरहाज़र रहने से काम रोक दिया

Mumbai, Maharashtra:मिठी नदी गाळ उपशावर आमदारांचा संताप अभियंता गैरहजर राहिल्याने काम बंद पाडले मे महिना संपून जून उजाडला तरी मिठी नदीतील केवळ 75 टक्के गाळ उपसा झाल्याचे समोर आले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदारांनी क्रांतिनगर परिसरातील मिठी नदीतील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली 30 मेपर्यंत गाळ उपसा पूर्ण करण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते मात्र काम अपूर्ण असल्याने त्यांनी वरिष्ठ अभियंत्यांना घटनास्थळी बोलावले अभियंता उपस्थित न राहिल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी गाळ उपशाचे काम तात्पुरते बंद पाडले.
0
0
Report

मालेगाव के महात्मा फुले शिक्षण संस्थान भर्ती घोटाला: पूर्व शिक्षा अधिकारी जमानत अर्जी खारिज

Nashik, Maharashtra:मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्था शिक्षक भरती घोटाळा प्रकरण. माजी शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मालेगाव न्यायालयाकडून फेटाळला... मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेत बोगस शिक्षक, कर्मचारी भरती प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांचा मालेगाव अपर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने या घोटाळ्यात सहभागी असणारे गुन्हा दाखल असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या गुन्ह्यात माजी वेतन अधिकारी उदय देवरे, माजी शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव, काही शिक्षक यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल आहे.
0
0
Report

हिंदी: खत वितरण के लिए फ्रेमवर्क शुरू, किसानों में ऑनलाइन पंजीकरण को लेकर विरोध

Kolhapur, Maharashtra:केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होत आहे. या नव्या व्यवस्थेनुसार शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खताची मागणी नोंदवावी लागणार आहे. मात्र, शेती हा ऑनलाइनचा विषय नसून या नव्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढणार असल्याची भूमिका घेत शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. खतांचा गैरवापर रोखणे आणि अनुदानित खतांचे समन्यायी वितरण करणे हा या योजनेमागील उद्देश असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे मत याच्या अगदी उलट आहे. सरकारने शेतकऱ्यांवर नवनवे प्रयोग करण्याऐवजी शेतीतील वास्तविकता समजून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. पाऊस पडल्यानंतर तातडीने खताची गरज भासते. अशा वेळी ऑनलाइन प्रक्रियेत वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट खत उपलब्ध करून द्यावे असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामागे या संपूर्ण प्रक्रियेतील ऑनलाइन नोंदणीची किचकट पद्धत हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला खत मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया: - ॲपमध्ये आधार क्रमांक आणि ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागेल. - स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती भरावी लागेल. - पिकाचा हंगाम, आवश्यक खताचा प्रकार आणि गोण्यांची संख्या नमूद करावी लागेल. - जवळील नोंदणीकृत खत विक्रेत्याची निवड करावी लागेल. - स्वतः खत घेणार असल्यास स्वतःचा पर्याय, अथवा प्रतिनिधी पाठविणार असल्यास त्याची माहिती भरावी लागेल. - नोंदणी पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड आणि टोकन नंबर तयार होईल. - संबद्ध कृषी सेवा केंद्रात खताचा साठा पुढील तीन दिवसांसाठी राखीव ठेवला जाईल. - तीन दिवसांच्या आत दुकानात जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून खत स्वीकारावे लागेल, त्यानंतर विक्रेत्याकडून पावती घेणे आवश्यक असेल. पिक नोंदणीसारख्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे आधीच अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता खताची मागणीदेखील ऑनलाइन करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. शेतीमध्ये अनेक निर्णय तातडीने घ्यावे लागतात. पिकाला खताची गरज निर्माण झाल्यानंतर लगेच खत उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र, नव्या व्यवस्थेमुळे खत मिळण्यास विलंब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अद्याप स्मार्टफोन नसल्याने त्यांनी या प्रक्रियेत सहभागी कसे व्हायचे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खतांचे लिंकिंग, वेळेवर उपलब्धता आणि पुरवठ्याच्या समस्यांमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत खत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सक्ती केल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडेल, असे मत व्यक्त होत आहे. त्यामुळेच कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पाला विरोध होत आहे. उद्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याने प्रत्यक्षात ही व्यवस्था कितपत यशस्वी ठरते आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top