Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Apr 15, 2025 12:56:13
Sangli, Maharashtra
सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Dec 04, 2025 17:35:05
Parbhani, Maharashtra:अँकर- भाजप नेते किरीट सोमय्या हे आज परभणी शहरात आले होते,त्यांनी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत बांगलादेशी नागरिक आपल्याजडे आढळत असल्याचे म्हटले आहे. आम्ही 109 लोकांची यादी दिलीय ज्यात आधार कार्ड वर इक तारीख आहे तर जन्म तारखेवर दुसरीच तारीख आहे,आता पोलीस कारवाई सुरू होणार असून महाराष्ट्रात 2 लाख 24 हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहेत. आता पर्यंत महाराष्ट्रात 27 एफआयआर दाखल झाली असून 5 हजार बोगस लाभार्थ्यांवर पोलिस कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकर मुख्यमंत्री यांचा आहे,माझं काम देशाची सुरक्षा करणे आहे,जो व्यक्ती अपात्र आहे, तो व्यक्ती कुठला आहे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाहीये, ज्यांच्याकडे हिंदुस्थान मधील जन्मल्याचा एक ही कागद नाही,त्यांनी पुरावा द्यावा किंवा मग त्यांना भारताबाहेर पाठवून द्यावं, अधीकारी चुकले ki नजर अंदाज झाले यावर मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली होती. निवडणुका नंतर पुन्हा बैठक होणार आहे,त्यात ते अधिकाऱ्यांच काय करायचं हे ठरवणार आहेत. परभणीत यापूर्वी सात एफआयआर झाले आहेत,त्यात आता वाढ होणार आहे, On नितेश राणे वृक्षतोड मला वाटते प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायच नसत,एखाद झाड तोडून जर चूक झाली असेल तर ती चूक दोन झाड लावून दुरुस्त केली पाहिजेत, On मुंबई निवडणूक मुंबईची निवडणूक आमच्यासाठी एकतर्फी आहे, राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो हे यांच्यामध्ये अर्धा गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहे, मुंबईतला हिंदु मराठी किंवा अमराठी असो जे उद्धव ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधेलाेला ठोकल यावर आता मुंबईतला हिंदू कधी ही विश्वास करणार नाही.त्यामुळे या सगळ्यांना आपल्या खान ला उमेदवार बनवायच ते त्यांनी बनवावं, मुंबईला वाचवणं महत्वाचं आहे, टाटा इन्स्टिट्यूटने असा रिपोर्ट दिलाय की 2050 पर्यंत 30 टक्के मुस्लिम होणार आणि मुंबई हातातून निघून जाणार,उद्धव ठाकरेंना त्याची चिंता नाहीये, त्यांना फक्त परसेंटेज ची काळजी आहे,
125
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 04, 2025 16:31:03
Dhule, Maharashtra:दत्त जयंतीच्या रात्री सुपर मून चा दुर्मिळ योग सातपुडा पर्वत रांगेतून सुपरमूनचे मनमोहक दृश्य अनुभवायला मिळाला. दत्त जयंती आणि मार्गशीष पौर्णिमेच्या रात्री तेजस्वी चंद्राचे दृश्य दिसले. चंद्र पृथ्वी जवळ असल्याने दिसला आज सुपर मून दिसला. दत्त जयंतीच्या मंगलमय रात्री आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सुपर मून चा एक दुर्मिळ योग जुळून आला. या रात्री तेजस्वी चंद्राचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आल्याने तो नेहमीपेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसत होता. विशेषत सातपुडा पर्वत रांगेतून दिसणारे हे सुपर मून चे दृश्य अत्यंत विलोभनीय होते.
328
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 04, 2025 16:17:21
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग : कवचलवाडी शिवारातुन एक कोटी रुपयांचा 400 किलो गांजा जप्त जालना ए.टी.एस.आणि अंबड पोलिसांची  कारवाई अंबड तालुक्यातील कवचलवाडी शिवारातुन शेतातून केला गांजा जप्त अँकर : जालन्यातील अंबड तालुक्यातील गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गांजा लागवड केल्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.अंबड तालुक्यात कवचलवाडी शिवारातील एका शेतातून सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा तब्बल चार क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. जालना ए.टी.एस आणि अंबड पोलिसांनी हा गांजा जप्त करत मोठी कारवाई केली. कवचलवाडी शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा सुकवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट शेतात धाड टाकली. या धाडीत अंदाजे एक कोटी रुपयांचा चारशे किलो गांजा जप्त करत पोलिसांनी ढवळीराम चरावंडे या 60 वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
164
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 04, 2025 14:00:43
261
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 04, 2025 13:47:29
Pandharpur, Maharashtra:माढा तालुक्यातील तडवळे गावात रस्ता मोजणीसाठी गेलेल्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला एका शेतक-याने पिस्तौल दाखवत रस्ता मोजणी करायला विरोध केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. माढा तालुक्यातील तडवळे येथे जुना शिव रस्ता आहे. हा रस्ता वापरण्यासाठी खुला करून मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तहसीलदार पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी रस्ता मोजणीसाठी गावात गेल्यानंतर तेथील शेतकरी शहाजी पाटील याने मोजणी करायला विरोध दर्शवला. या पूर्वी इथे रस्ता नसल्याचे सांगत त्याने पिस्तौल दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी कोणतीही कारवाई अद्याप पिस्तौल दाखवणाऱ्या शहाजी पाटील या व्यक्तीवर झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
119
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 04, 2025 12:58:44
Pandharpur, Maharashtra:Anchor - राज्य निवडणूक आयोगाने सरकारची इज्जत वेशीवर टांगली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांची निवडणूक प्रक्रियेवर कडक शब्दात टीका राज्यात भयानक चित्र आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय भेलकांडत आहे. कधी कुणाची निवडणूक थांबवतो. कुणाची निवडणूक सुरू करतो. भयानक दहशती खाली काम सुरू आहे आहे. कोण या सगळ्या यंत्रणेला दाबत आहे. सोलापूर जिल्ह्यात कुण्या पुरुषाने निवडणूक लढवायची नाही. सगळे भाजपचे हवेत. त्यांच्या मित्र पक्षानं सुद्धा नगराध्यक्ष निवडणूक लढण्याच्या परवानगी नाही. क्यूआरटी पथकाच्या नळ्या लावून निवडणूक लढवावी लागते. काय पारदर्शकात आहे. एकावर अन्याय दुसऱ्याला पैसे वाटण्याची परवानगी देतात. पोलिसांच्या वाहनातून पैसे वाटायचे. निवडणूक निर्णय अधिकारी हे सांगतात तसे निर्णय देतात. ईव्हीएम मशिन फोडल्या. सोलापूरच्या पालकमंत्री सांगतात विरोधात काम करणाऱ्याची चिठ्ठी पाठवा त्याचा कार्यक्रम लावतो. सैराट मध्ये आर्ची परशाला सांगते थेट रस्ता शेतात जातो. पालकमंत्र्याला कुठे थेट मानच्या खोऱ्यात नेऊन कार्यक्रम लावायचा आहे. सध्या 20 दिवस मतदान यंत्र ठेवली असं वाटतं न्यायालय सुद्धा यांची कीव आली नाही. सगळ्या देशावर राज्यावर काळोख पसरलेला आहे वाटायला लागले . आता कोणी वाचवेल अशी परिस्थिती नाही राज्यात सध्या सरकारची इज्जत घालवणारा आक्रोश सुरू आहे बेधुंद झालेला आहे. कोलमडलेला निवडणूक आयोग, त्यांची ही अवस्था सरकार म्हणत हे आवडल नाही मग केले कोणी अधिकारी ऐकतात कुणाचे.. राज्य सरकारची इज्जत वेशीवर मांडली. निकाल तात्काळ लावा. बंद पेट्या उघडा.. देशात राजेशाही हुकुमशाही एकत्र आली अशी अवस्था आहे
147
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 04, 2025 12:15:42
Baramati, Maharashtra:नीरा-भीमा साखर कारखान्याची उच्चांकी कामगिरी – एका दिवसात 6400 मे.टन ऊस गाळप. शाहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाण्याने गाळप हंगामात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने एका दिवसात तब्बल 6400 मे.टन ऊस गाळप करून नवीन उच्चांक नोंदवला. कारखान्याच्या 25 व्या ऊस गळीत हंगामात आतापर्यंत जवळपास 1.89 लाख मे.टन ऊस गाळप आणि 140360 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा 10.60 टक्के तर सरासरी उतारा 9.95 टक्के नोंदवला आहे. तसेच सहवीज, इथेनॉल, बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्पही पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी दिली. एका दिवसातील या उच्चांक कामगिरीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे...
145
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 04, 2025 11:38:31
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालय परिसरात आज एक अनोळखी ड्रोन कोसळल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी अचानक आकाशातून खाली पडलेली वस्तू पाहताच परिसरात गर्दी केली. नेमका हा ड्रोन कुठून आला आणि कोणाचा आहे, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. ड्रोन कोसळल्याची माहिती मिळताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून परिसराची पाहणी केली. काही क्षणांसाठी भीतीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र काही वेळाने ड्रोनविषयीचा गैरसमज दूर झाला. चौकशीअंती हा ड्रोन शाळकरी मुलांनी विज्ञान प्रकल्पासाठी तयार केलेला असल्याचे स्पष्ट झाले. ड्रोन खाली पडताच संबंधित मुलांनीच तेथून ते उचलून नेल्याची माहिती मिळाली. ड्रोन शालेय प्रकल्पाचा असल्याचे उघड होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळ निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा नेहमीची स्थिती परतली.
197
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 04, 2025 11:15:40
115
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 04, 2025 11:15:19
118
comment0
Report
Advertisement
Back to top