416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में मानसून पूर्व बारिश ने सड़कों की हालत बिगाड़ दी, पानी भरा
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात पहिल्याच मानसूनपूर्व पावसामध्ये शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये बसला आहे. बहुतेशी रस्ते खड्ड्यामध्ये असल्यामुळे अर्ध्या रस्त्यांवर चिखल साचल्याने वाहने अडकत आहेत तर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे नाशिक महापालिकेची गटार योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा समोर येत आहे; अनेक दुकानांमध्ये सातपूर परिसरात पाणी घुसले आहे.0
0
Report
जालना में 20 लाख बीमा के लिए मित्र की हत्या का नकली मौत प्लान
Jalna, Maharashtra:जालना: विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये दिला मित्राचा बळी (पॅकेज) अँकर: जालन्यातील जाफ्राबादमध्ये 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी एकाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत स्वतःच्या कारला आग लावून मित्राचा बळी दिल्याचं समोर आलं आहे. ही घटना पोलिसांनी सखोल तपास केली असून मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. नितीन गवळी हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असून आकाश गवळी आणि आकाश फुलारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जाफराबाद-चिखली रोडवर ही घटना घडलीय. या घटनेत एक मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृतदेह नाशिक येथील नितीन गवळी याचा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र तपासात नितीन गवळी यानेच 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी सहकारी असलेल्या संदीप चव्हाणचा खून करून कार पेटवून दिल्याचं निष्पन्न झालं आहे. बाइट: तेगबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक, जालना. ग्राफिक्स व्हिओ: मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला संदीप चव्हाण हा नाशिक येथे पेंटरचे काम करत होता. दरम्यान त्याची ओळख नितीन गवळी आणि राजू फुलारे यांच्याशी झाली. गावाकडे पेंटिंगचे काम आहे, आपण गावी जाऊ असे सांगून आरोपींनी संदीप चव्हाणला सोबत नेलं. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरमार्गे सिल्लोड येथे येत असताना आरोपींनी दारू प्राशन केली. त्यामुळे मुख्य फरार आरोपी नितीन गवळी याने त्याचा चुलत भाऊ आकाश गवळीला सिल्लोड येथे बोलावून घेत तिघांनी मिळून संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील जंजाळवाडी परिसरात आकाश गवळी यांनी आणलेल्या गाडीला दोरी बांधून गाडी झाडावर आदळल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. नितीन गवळी हा आर्थिक अडचणीत असून, त्याने स्वतःचा सुमारे २० लाखांचा विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आला. तपासात बनाव असल्याचे निष्पन्न झालं आहे. बाइट: विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना (टक्कल असलेले). व्हिओ: या घटनेबाबत 31 मे रोजी डायल 100 वर जाफराबाद-चिखली रस्त्यावर अपघात होऊन कारला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृत व्यक्ती नितीन गवळी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा रक्कम मिळविण्यासाठी आणि इतर कारणांमधून सुटका मिळवण्यासाठी संदीप चव्हाणचा खून केल्याचे निष्पन्न झालं असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. बाइट: तेगबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक, जालना. व्हिओ: दरम्यान या प्रकरणात कारमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची प्रक्रिया चालू आहे. या प्रकरणात आकाश गवळी आणि राजू फुलारे यांनी जबाब दिल्याची माहिती आहे. या कार जळीत प्रकरणानंतर मुख्य आरोपी नितीन गवळी हा फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला गुजरात मधून अटक केली आहे. सध्या नितीन गवळीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते.0
0
Report
रत्नागिरी के आरे समुद्र तट पर 41 छात्रों में से एक की मौत
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग रत्नागिरी.. आरे समुद्रात 41 विद्यार्थ्यांच्या ग्रुप पैकी दोघे बुडाले एकाचा मृत्यू.. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे वरील समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोल्हापूरहून सहलीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.. तर त्याच्या मित्राला स्थानिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचवण्यात यश आले.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.. मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार वय 17 राहणार कोल्हापूर असून मयूर विष्णू खाडे वय 16 राहणार कोल्हापूर याला वेळीच बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील एका खाजगी शिकवणी वर्गातील 41 विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता.. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे समुद्रात दोघेजण बुडाले.. या दुर्दैवी घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच परिसरात शोककळा पसरली असून समुद्रकिनारी सुरक्षितेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..0
0
Report
Advertisement
नागपूर में सुप्रिया सुळे के परिवार के साथ सारंग लखानी का विवाह समारोह
Nagpur, Maharashtra:नागपूर सुप्रिया सुळे यांची पुत्री रेवती आणि भाजपचे चंद्रपूर- गडचिरोली-वर्धा विधान परिषदेचे उमेदवार अरुण लखानी यांचे पुत्र सारंग यांचा विवाह होणार आहे... त्यांच्या विवाहपूर्वी विविध पारंपारिक कार्यक्रम होत आहे... महत्त्वाचं म्हणजे काल अरुण लखानी यांनी भाजपाकडून चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केली. त्यानंतर या सगळ्या धावपळीनंतर ते कुटुंबासहसंध्याकाळी वाया नागपूर मुंबईला पोहोचले... त्यानंतर लखानी कुटुंबाच्या मुंबईतील निवासस्थानी सुप्रिया सुळे, त्यांचे पती आणि पुत्री रेवती तखानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर रात्री विवाह सोहळ्याच्या परंपरेतील एक खास कार्यक्रम पार पडला... त्याचे काही फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेय0
0
Report
सूरत-बारडोली बस हादसे में भीषण भिड़ंत, सीएनजी बस आग पकड़े से कई मौतें
Dhule, Maharashtra:सुरतजवळील बारडोली येथील उवा गावाजवळ दोन बसमध्ये झालेल्या भीषण धडकेनंतर एक बस उलटली आणि तिला आग लागली. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्रारंभिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारडोलीच्या उवा गावाजवळ दोन सरकारी एस.टी. बसेसमध्ये झालेल्या भीषण धडकेमुळे हा थरारक अपघात झाला. या दोन्ही बसेस महाराष्ट्र पासिंगच्या आहेत. घटना अशी घडली की, हायवेवर एक टँकर उलटला होता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बस चालकाने टँकरसोबत होणारी धडक टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा बसवरील ताबा सुटला. यादरम्यान बस दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून पलीकडच्या बाजूने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला जोरदार धडकली. या भीषण अपघातातील एक बस सीएनजी (CNG) असल्याने, धडकेनंतर तिने तात्काळ पेट घेतला आणि ती आगीचा गोळा बनली. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बस अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.0
0
Report
पुणे ग्रामीण क्षेत्र में बारिश से छप्पर गिरने से 69 वर्षीय वृद्ध की मौत
Ambegaon, Maharashtra:ब्रेकींग न्युज... आंबेगाव पुणे.... पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे वादळी वाय्राच्या पावसाने घराचे छप्पर अंगावर कोसळून 69 वर्षाच्या जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू...हरिभाऊ थोरात असं मृत शेतकय्राचं नाव... वादळी वाऱ्याच्या पावसाने अनेक घरांचे छप्पर उडाले तर मुक्या प्राण्यांचा हि मृत्यू शेतीमाल ही जमीन दोस्त...पॉलिहाऊस हि जमिनदोस्त होऊन शेतकय्रांचे झाले लाखो रूपयांचे नुकसान... वादळी वाय्राच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रृ... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...0
0
Report
Advertisement
आंबेगाव खाडकी में आंधी-बारिश से खेत-घर भारी क्षति, बिजली पोल गिरे
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव परिसराला वादळी वाऱ्याच्या मान्सूनपूर्व पावसाने झोडपल्याने शेती मालासह घरांचे प्रचंड नुकसान झालंय, उभा शेतीमाल आडवा झालाय विद्युतवाहक पोल जमिनदोस्त झालेत, अनेक घरांचे छप्पर उडून गेल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावरती आलाय बँकेचे कर्ज काढून उभं केलेलं घर, घरात रहायला जाण्यापूर्वीच वादळी वाऱ्याच्या पावसाने उडून गेल्याने अब राहायचं कुठं याची चिंता शेतकऱ्यांपुढे उभी राहिलीय.0
0
Report
कल्याण में बाइक में अचानक आग, दुकानदारों ने पानी से बुझाया
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिम येथील बेतूरकर पाडा येथील हनुमान मंदिर च्या रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बाईकने अचानक पेट घेतला यामध्ये बाईक जळून खाक झाली आहे उष्णता वाढल्या ने अचानक गाडीने पेट घेतल्याचे प्राथमिक अंदाज आहे सुदयावाने गाडी वर कोणीही बसेलेला नव्हतं बाईकला आग लागताच समोर असलेल्या दुकानदारांनी पाणी मारून आग विजवण्यात आली.0
0
Report
महिलाओं ने जल्द गिरफ्तारी के लिए अकोला पुलिस कार्यालय کے سامنے मोर्चा निकाला
Akola, Maharashtra:अकोल्यातील अलंकार मार्केट परिसरात झालेल्या राहुल उर्फ दादु कालु सारसार खूनप्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज अकोला पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. खून होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतरही सर्व आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.महिलांनी घोषणाबाजी करत तपासाला गती देण्याची मागणी केली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमावे, तसेच खुनात वापरलेली शस्त्रे जप्त करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के अंजर्ले-सावने समुद्रकिनारे पर्यटक की कार डूबने से बची, स्थानीय नागरिकों ने बचाव
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पर्यटकांची कार समुद्रात वाहून जाता जाता वाचली.. अंजर्ले-सावने किनाऱ्यावर स्थानिक ठरले देवदूत!.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले-सावने समुद्रकिनाऱ्यावरून एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे... किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची एक कार भरतीच्या पाण्यात अडकून थेट समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत पोहोचली होती.. भरतीचे पाणी वाढल्यामुळे कार हळूहळू समुद्राच्या दिशेने खेचली जात होती.. कारमधील पर्यटकांचा जीव टांगणीला लागला असतानाच,तिथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या ही गोष्ट निदर्शनास आली.. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली.. जीवाची पर्वा न करता पाण्यात अडकलेल्या कारला चहुबाजूंनी वेढा घातला आणि जोरदार धक्का देत तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.. स्थानिक नागरिकांच्या या अद्भुत प्रसंगावधानामुळे आणि धाडसी कृतीमुळे आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली असून पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसानही वाचले आहे.. सध्या या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून,अंजर्ले-सावने येथील ग्रामस्थांच्या या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
शिर्डी मेळाव्यात संजय राऊत यांनी विखे पाटीलवर जोरदार टीका केली: ठाकरे गटाची राजकीय ताकद दाखवली
Shirdi, Maharashtra:Anc - खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा संपन्न झाला..माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे हे देखील मेळाव्यासाठी उपस्थित होते.. या मेळाव्यातून पक्षवाढीसह SIR बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.. शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मात्र मेळाव्यासाठी अनुपस्थित होते.. खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये..0
0
Report
नागेश भोसले ने गलत हस्ताक्षर पर कांग्रेस कार्यकर्ता नहीं होने का दावा, कोर्ट में जाएंगे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, मी कोणतीही सही केलेली नाही - नागेश भोसले. काँग्रेसचे कथित सूचक नागेश भोसले यांची प्रतिक्रिया. मी कोणतीही सही केलेली नाही. माझी बोगस सही करण्यात झालीय. मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. मी आघाडीचा नगरसेवक आहे. मी या विरोधात आता न्यायालयात दाद मागणार आहे. बोगस सही करण्यात अयल्याचे मी कोर्टाला सांगणार आहे. माझ्यावर कोणताच दबाव नाही. मला कोणीही किडनॅप केलेलं नाही. मी पैसे घेणारा माणूस नाही पैसा पुरवणारा माणूस आहे.0
0
Report
Advertisement
भास्कर जाधव ने तटकरे पर तीखा हमला, भानामती की धार पर सवाल
Chiplun, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. तटकरेंकडे नक्की कौनती भानामती? भास्कर जाधवांचा जोरदार टोला!.. अँकर आमदार भास्कर जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे.. शिवसेनेच्या जागेवर हक्क: सरळ सरळ ही जागा शिवसेनेचीच होती आणि ती शिवसेनेलाच मिळायला हवी होती, असा स्पष्ट दावा भास्कर जाधव यांनी केला है.. तटकरे यांच्या भानामतीवर प्रश्नचिन्ह: सुनील तटकरे यांच्यावर खोचक टीका करताना जाधव म्हणाले, "तटकरे यांच्याकडे नक्की कोणता जादूटोणा किंवा कोणती भानामती आहे,हेच कळायला मार्ग नाही." विरोधाभासावर आश्चर्य: ज्य पक्षाची मतं सर्वात जास्त आहेत, त्या पक्षाला ही जागा मिळाली; परंतु पूर्वी टोकाचा विरोध करणारे लोकसुद्धा आता या गोष्टीचे समर्थन करत आहेत. रहस्य शोधण्याची गरज: तटकरे यांच्या कडे अशी कोणती जादू किंवा भानामती आहे, जी विरोधकांनाही आपल्या बाजूने वळवून घेते, हे आता समजून घ्यावे लागेल, अशी टोमणा जाधव यांनी लगावला..0
0
Report
इंदापुर के कर्मयोगी शक्कर कारखाने में ऊस वाहक किसानों ने धरना; 2025-26 के बकाया भुगतान अटका
Rui, Maharashtra:इंदापुरतील कर्मयोगी साखर कारखान्यावर ऊस वाहतूकदारांनी ठिय्या आंदोलन छेडले आहे. 2025-26 च्या हंगामातील ऊस वाहतूकदारांचे वाहतुकीचे आणि तोडणीचे पैसे अद्याप कारखान्याने दिलेले नाहीत. वाहतूकदारांच्या लाखो रुपयांच्या रकमा कारखान्याकडे अडकल्या आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत, तर हा कारखाना ओंकार ग्रुपला सहयोगी तत्वावर चालवण्यास दिलेला आहे.0
0
Report
शिवसेना उभरते गट में वाकचौरे की अनुपस्थिति पर खैरे ने कहा, निष्क्रिय नहीं रहेंगे
Shirdi, Maharashtra:शिवसेना उभाता गटाच्या वतीने आज साईंच्या शिर्डीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडला... मात्र इस मेळाव्यात विद्यमान सेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती याची चर्चा दिसून आली.. गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे आणि त्यातच त्यांच्या अनुपस्थिती असल्याने चंद्रकांत खैरे यांनी भाषणातून त्यांना वेगळे न वागण्याचा सल्ला दिला... चंद्रकांत खैरे भाषण पॉइंटर ऑन वाकचौरे अनुपस्थिती आज मेळाव्याला खासदार दिसत नाही... कदाचित कुठे गावाला गेले असतील.. यापूर्वी देखील असे एकदा झालं होतं.. त्यावेळी मी दोघा नवरा बायकोला दिल्लीला बोलावून चर्चा केली होती.. ( सेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचा किस्सा ) त्यावेळी त्यांना तिकीट देण्यात माझा सर्वात मोठा वाटा होता.. त्यावेळी तुम्ही गेले.. मात्र त्यांनंतर उद्धव साहेबांनी तुम्हाला माफ केलं.. आता आज तुम्ही पुन्हा सेनेचे खासदार झालेात.. मात्र ते कार्यकर्त्यांना भेटत नाही अशा तक्रारी येतात.. त्यांच्या अपरोक्ष हा मेळावा आज घेतला त्याबदल अभिनंदन.. मला वाटत नहीं ते आजही अधिकृतपणे गेले नाहीत.. त्यांनी जाऊ नये ही माझी विनंती. बाकी त्यांची मर्जी.. मात्र अस बरोबर नाही, स्टेज स्पीच - चंद्रकांत खैरे0
0
Report
Advertisement
