icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिरोडा केरवाड़ी में तेज हवाओं से मछुआरी नाव डूब, राजन सारंग लापता

Oras Bk., Maharashtra:अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने शिरोडा - केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाली. यात केरवाडी येथीलच राजन सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तोड होडीचे मालक प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा दाजी सारंग यांना वाचवण्यात दुसर्या होडीला यश आले आहे. शिरोडा केरवाडी येथून नेहमीप्रमाणे एकाच कुटुंबातील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी व त्यांचा भाऊ राजन सारंग हे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली. यात प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा बोटीवर असणाऱ्या ऑइल टँकर मध्ये राहिले. यानंतर त्यांना वाचवण्यात दुसऱ्या बोटीला यश आले. मात्र राजन सारंग हे समुद्रात बुडाले. दरम्यान राजन सारंग यांचा समुद्रात शोध घेणे सूरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. केरवाडी येथील मच्छिमार सीसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
0
0
Report

देवेन्द्र फडणवीस ने गोदाम लॉजिस्टिक पार्क पर खुशी जताई; राहुल गांधी के बयान पर प्रतिक्रिया

Nagpur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट गोदाम लॉजिस्टिक पार्कमध्ये शंभर एकरांवर ही सुविधा उभारण्यात आल्याचा आनंद आहे. ग्लोबल सप्लाय चेनमध्ये अशा प्रकारच्या सुविधा उभारणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य (केंद्र सरकार वर्षभरात कोसळेल) यावर प्रतिक्रिया देताना— मुंगेरी लाल के हसीन सपने ही मालिका यायची, त्याचाच प्रत्यय राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून येतो. नाना पटोले यांच्या इंधन टंचाईवरील टीकेबाबत नाना पटोले यांना त्यांच्या पक्षात कोणी गंभीरतेने घेत नाही. त्यांना एक साधा शहराध्यक्षही त्यांचा करता आलेला नाही. आता विनाकारण राग आमच्यावर का काढत आहेत?
0
0
Report

रत्नागिरी में मानसून के संकेत, कोकण में आकाश घने बादलों से घिरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात मान्सूनची जोरदार पाऊलचिन्हे.. रत्नागिरीत पसरला अंधार, आकाशात काळेभोर ढग वरुणराजाच्या आगमनासाठी पोषक वातावरण.. उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासियांना दिलासा मिळण्याची शक्यता.. अँकर गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि उष्णतेचा सामना करणाऱ्या कोकणवासियांसाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.. रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे.. आज दुपारपासून रत्नागिरी शहरासह लगतच्या परिसरामध्ये अचानक आकाशात काळेभोर ढग दाटून आले आणि बघता बघता संपूर्ण वातावरणात गडद अंधार पसरला.. निसर्गाचे हे बदललेले रूप पाहून मान्सून कोणत्याही क्षणी सक्रिय होईल, अशी चिन्हं दिसत आहेत.. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement

नाशिक में पेट्रोल-डीजल की आपूर्ति बाधित, कई पंप बंद

Nashik, Maharashtra:पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत न होण्या कारणामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद अँकर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंधन टंचाईचा सामना करत असताना नाशिक शहरात देखील इंडियन टँचाईचा सामना करावा लागतोय... नाशिक शहरातील अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने बंद अवस्थेत दिसून येत आहे..दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये कोणताही प्रकारचा इंधन तुटवडा नाही मात्र प्रत्यक्षात आता चित्र वेगळे असून काल संध्याकाळपासून नाशिक मध्ये अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा हा जाणवू लागला आहे... फक्त अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल हे उपलब्ध करून देण्यात येत आहे... ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा टँकर भरला जातो त्या ठिकाणी वेटिंग जास्त असल्याने पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचं पेट्रोल डिझेल विकले त्यांनी सांगितला आहे या संदर्भात पेट्रोल पंपा वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी…
0
0
Report

डिलीप वळसे पाटील ने विवाह समारोह में विवेक वळसे पाटील पर मजाक किया

Shirur, Maharashtra:राज्याचे माजी गृहमंत्री आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मिश्किल आणि टोलेबाजी करणाऱ्या स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. आदक-गोरडे विवाह सोहळ्यादरम्यान बोलताना त्यांनी आपले पुतणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यावर जाहीर मंचावरून मिश्किल टिप्पणी केली. "हा विवाह सोहळा विवेक वळसे पाटील यांनी जमवला आहे, हे ऐकून आनंद झाला. पण भविष्यात आम्हालाही काही मदत लागली, तर नक्की संपर्क करू," असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांमध्ये एकच हसला. नक्की काय म्हणालेत दिलीप वळसे पाटील, पाहूयात...
0
0
Report
Advertisement

मुंबई में भाजपा में प्रवेश: शिवसेना के दिग्गज सुरेश मापारी के साथ बड़ा पल

Washim, Maharashtra:वाशीम जिले में उद्धव ठाकरे की शिवसेना के पूर्व जिल्हा प्रमुख सुरेश मापारी ने मुंबई में भाजपा के प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण की मौजूदगी में भाजपा में प्रवेश किया। इसके बाद UBT के जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे की प्रतिक्रिया सामने आई। शिवसेना के सभी नगरसेवक और पदाधिकारी हमारे साथ कायम हैं और हमें कोई धक्का नहीं लगा। मापारी को शिवसेना ने दो बार जिल्हा प्रमुख बनाया, जिला परिषद और नगर परिषद चुनावों में उन्हें उम्मीदवार बनाने के बावजूद नाराजी क्यों थी, यह हम समझते हैं। आगामी स्थानीय चुनावों के संदर्भ में यह उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष को बंटा हुआ मान लिया गया है।
0
0
Report

बीड आष्टी: पत्ता पूछने के बहाने बुजुर्ग महिला से सोना छीनने वाले दो गिरफ्तार

Beed, Maharashtra:बीड:पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध आजींच्या गळ्यातील पोत हिसकावणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी केली अटक Anc: बीड जिल्ह्यातील आष्टी येथे वाढत्या चेन स्नेचिंगच्या घटना लक्षात घेता, पोलीस अधीक्षकांनी सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली होती. याच पथकाने मागील आठवड्यात एका वयोवृद्ध आजींना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोने लंपास केलेल्या दोघांना अटक केलीय. अटक केलेले दोघेजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मागील महिनाभराच्या कालावधीत आष्टी परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. अशातच आजीबाईंच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली होती. या वाढत्या घटना लक्षात घेता महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर याला रोख लावण्याची मागणी स्थानिकांमधून करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या दोघांना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध घेतला जातोय.
0
0
Report
Advertisement

ओबीसी नेता लक्ष्मण हाके का प्रसाद लाड पर तंज: सत्ते में आए तो जेल भेजने की धमकी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मी जर सत्तेत आलो तर पहिल्यांदा प्रसाद लाडला जेलमध्ये घालीन - लक्ष्मण हाके (EXCLUSIVE) - ओबीसी नेते लक्ष्मण हाके ऑन प्रसाद लाड - झी २४ तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीवरून ओबसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांची आ. प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका - विमानातून फिरणाऱ्या प्रसाद लाड यांना लक्ष्मण हाके कसा माहिती असणार ? मला नाही ओळखलं तरी चालेल मी एक मेंढपाळाचा मुलगा आहे - प्रसाद लाड यांना देश नाही तर अख्खा जग ओळखतो - प्रसाद लाड यांनी भाजपचा कैवार घेण्याच्या भानगडीत पडू नये... आपली पक्षातील लायकी भाजपला जाऊन विचारावी - ओबीसीला भाजपने काय दिले? हे नेतृत्वाला विचारले पाहिजे - प्रसाद लाड यांनी अजून एखादा हॉटेल कसे काढता येईल... हाताने अंबानी नंतर प्रसाद लाडच आहेत म्हणून सिंगापुरात कसा हॉटेल काढता येईल हे बघावे - मी जर सत्तेत आलो तर पहिल्यांदा प्रसाद लाडला जेलमध्ये घालीन... एवढी काय तुमच्याकडे इच्छा खर आहे की एवढे श्रीमंत झालात याची पहिल्यांदा ईडी चौकशी लावेन ( शड्डू ठोकत ) - जसं जसं सरकार म्हাতारा होतय तसं तसं इडी, सीबीआय कुलप लावून बसले आहेत - निवडणुका आल्या की लाखमोला मताचा बाजार मांडता तुम्ही - प्रसाद लाड यांनी एखादा हॉटेल बांधावं.. तुम्ही काय समाजासाठी सेतू बांधणार? - विधान परिषदेचे तुम्ही आमदार या पलीकडे तुमची काय ओळख? म्हणून मी तुमची भेट घ्यावी? याविषयी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( 1 to 1 )
0
0
Report

बुलढाणा: अदालत ने संजय गायकवाड के बयान पर जांच की अनुमति दी; शिवराय के अपमान के लिए माफी की घोषणा

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग .. आमदार संजय गायकवाड बयट्स.. ऑन न्यायालयाने चौकशीची परवानगी दिली. छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जी काही मी शिवीगाळ केली होती त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोयापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दगलबाज, शिवाजी शिवाजी कोण होता या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्री साहेबांना आग्रही असणार आहे. याविषयी माननीय न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे.. ऑन नोटीस.. पोलीस जसे मला सांगतील तसं मी त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे.. ऑन राज्यात इंधन तुटवडा.. राज्यात कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही... शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे साठेबाजी वाढली आहे. ऑन नरेंद्र मोदी आवाहन... नैसर्गिक शेतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. रासायनिक शेतीमुळे आपल्या सर्वांचा आरोग्य धोक्यातला आहे. भविष्यात नैसर्गिक शेतीचाच काळ येणार आहे. ऑन कोकरोच जनता पार्टी... कॉकरोच जनता पार्टी.... तरुण मुलं भावनेच्या आहारी जातात.... ऑन इंधनाची टंचाईला जबाबदार कोण... इंधन टंचाई ला देशातील कोणताही पक्ष जबाबदार नाही तर जागतिक युद्धजन्य परिस्थितीच याला कारणीभूत आहे. आंबी यांना समर्थक करून अद्याप शिबिगा धमकी सुरूच आहे. माझे महाराष्ट्र भर समर्थक आहेत अशा अज्ञात समर्थकांकडून प्रशांत आम्ही धमक्या दिल्या जात असतील. त्यांच्या भावना भडकत असतील तर त्यांनी काही करू शकत नाही.
0
0
Report

ईंधन संकट के बाद कृषि माल की लिलाम फिर से शुरू, किसानों को राहत

Yeola, Maharashtra:इंधन टंचाईमुळे शेतीमाल वाहतुकीत निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाने दैनंदिन लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू असून आवश्यक उपाययोजनांचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आश्वासन मिळाल्यानंतर व्यापारी असोसिएशनने सोमवार, दि. २५ मे २०२६ पासून पुन्हा लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील दैनंदिन कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
0
0
Report
Advertisement

इंदापुर में बारिश से फसलों को नुकसान, अधिकारी पंचनामे के निर्देश दे रहे

Rui, Maharashtra:इंदापुर\nकृषिमंत्री दत्तात्रय भरणे बाईट\n\nऑन_पाऊस नुकसान\n\nपावसामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे.\n\nकाही ठिकाणी दुष्काळ पडला आहे पाण्यावरून शेती पिके जळून चालले आहेत.\n\nजिथे पावसामुळे नुकसान झाले आहे तिथे कृषी विभागाचे आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन पंचनामे करण्याचे आदेश मी दिले आहेत.\n\nनुकसानीचा अहवाल प्राप्त होताच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल.\n\nऑन_इंधन तुटवडा\n\nयाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.\n\nशेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मी करतो.\n\nराज्यात कुठेही पेट्रोल आणि डिझेलचा साठा अपुरा नाही साठा व्यवस्थित आहे.\nकोणीतरी विनाकारण आपोआपसरवत आणि रोजचा खप त्या भागात 20% वाढला आहे.\n\nडिझेल पेट्रोलचा साठा व्यवस्थित आहे रांगा लावण्याची गरज नाही..\n\nऑन_इंदापूर पाणी प्रश्न\n\nशेतकऱ्यांची मागणी रास्ता आहे ज्याचं जळतो त्याला कळतं.\n\nइंदापूरला खडकवासला कॅनॉलच्या पाण्याची अडचण आहे.\n\nअधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हे पाणी इंदापूरकरांना मिळाले नाही.\n\nफुरसुंगी पासून पुढे कॅनॉल पूर्ण दाबाने वाहीला नाही.\n\nउन्हाळी आवर्तनाच्या पूर्वीच जलसंपदा विभागाने फुरसुंगी येथील काव्याचे काम पूर्ण करायला पाहिजे होते.\n\nइंदापूर टेल चा तालुका आहे त्यामुळे इंदापूरला याचा फटका बसलेला आहे.\n\nउद्या सिंचन भवन येथे जाऊन मी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार आहे.\n\nचुकीचे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
0
0
Report

संजय गायकवाड पर धमकीभरे फोन: पुलिस से कार्रवाई की मांग

Nashik, Maharashtra:आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की हा आवाज माझाच आहे. धमकीचा फोन त्यांचाच होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी. अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येत आहे आई-बहिणी वरून फोन करून शिव्या देत आहे. आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही मात्र आता पोलीस या प्रकरणात गंभीर होणार आहे का? असा माझा सवाल आहे. याआधी आम्ही काही तक्रार दिली नव्हती काही तरुण हे स्पर्धा परीक्षा देणारे होते मात्र आता त्यांचे धाडस वाढत आहे. मला चार दिवसापूर्वी देखील धमकीचा फोन आला. दोन ते तीन हजार कॉल मला पेंडिंग आहे. सोमवारी म्हणजे उद्या लेखी अर्ज कोल्हापूर पोलिसांना देणार आहे. आठ ते दहा दिवसांपास पूर्वी आम्ही कोर्टाची लढाई लढण्यासाठी तयारी केली आहे. पानसरेंना न्याय मिळाला की नाही हा संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आमचा पोलिसांवर अजिबात विश्वास नाही, पोलीस जे पुरावे कोर्टासमोर आणतील त्यावरच कोर्ट निर्णय देईल. आम्ही दूध भोळे नाही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. गृहमंत्री मुख्यमंत्री यांचाच या प्रकरणावर दबाव आहे, त्यांचा दबाव नसता तर आत्तापर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता त्यांच्यावर कारवाई झाली असती. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार नाही मात्र रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top