icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी के दहिवली में पहाड़ टूटने से पिता-पुत्र की मौत, शव बरामद

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दहिवलीत डोंगरकडा कोसळून बाप लेकाचा मृत्यू.. तब्बल २१ तासानंतर मृतदेह हाती..७५ वर्षीय वृद्देला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढले बाहेर.. पाच घरे जमीन दोस्त.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवली येथे मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या sुमारास डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाले घरासह गाडले गेलेले शांताराम बाळा शेलार आणि सतीश शांताराम शेलार या बाप लेकांचे मृतदेह २१ तासानंतर हाती लागले तर दुर्घटनेनंतर चार तासांनी कल्पना शांताराम शेलार या वृद्धेला ढिकाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले.. दरम्यान येथील १५ कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले..
0
0
Report

नागपुर के फुकेश्वर में कार लूट: चाकू दिखाकर डराने-धमकाने आरोपी फरार

Nagpur, Maharashtra:कार ने यात्रियों को रास्ते में चाकू दिखाकर लूट ली... नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर शिवारातील 5 जुलै रोजीची घटना... कृषी विभागाचे कर्मचारी सुहास चंद्रकांत हजारे हे पाच जुलै रोजी आपल्या कार ने नातेवाईकांसोबत जात असताना फुकेश्वर भागात निर्जन ठिकाणी दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांची कार थांबवली आणि त्यांना लूटल्याची घटना घडली आहे... कार मध्ये पाठीमागे बसलेल्या सहकार्याने व्हिडिओ शूट केला.. - या घटनेत सोनं आणि काही रोकड लुटल्याची माहिती - सुहास हजारे परिवारासह आपल्या अल्टो कारने बुटीबोरीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केली लुटमार - चार तोळे सोनं आणि काही रोकड लुटली - पाच जुलै सायंकाळी पाच वाजताची घटना, आरोपी अजून हि फरार आहेत..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में 181 गांवों के लिए भूस्खलन खतरा, खेड में अलर्ट जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील 181 गावांना दरडीचा धोका. दहिवलीतील भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क; खेड तालुक्यात सर्वाधिक गावे. खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीमध्ये भूस्खलन होऊन तीघे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यातील एका महिलेला वाचविण्यात आले आहे. मात्र या घटनेने खेड तालुक्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या पोसरे दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकारानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व शहरात जिल्ह्यात 181 गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यात अतिसंवेदनशील 13 गावांचा समावेश आहे. सर्वाधिक धोका असलेली 50 गावे खेड तालुक्यात आहेत.
0
0
Report

MIDC भूखंडों पर उद्योग शुरू करने की अंतिम तिथि तय की गई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून  भूखंड घेतल्यानंतरही पाच वर्षात तेथे सुमारे ४० टक्के बांधकाम करून तेथे उद्योग सुरू करणे उद्योजकांना बंधनकारक आहे. मात्र असे असूनही छत्रपती संभाजी नगर  विभागातील अनेकानी बांधकाम सुरू केले नाही,  एमआयडीसीकडून घेतलेल्या २५४ भूखंड मालकांना डिसेंबरअखेरपर्यंत उद्योग सुरू करण्याची आता अखेरची मुदत देण्यात आली आहे. सुमारे 250 भूखंड विनावापराचे पडून असल्याचे एमआयडीसीच्या सर्वेक्षणात आढळून आले होते. या भूखंडमालकांना नोटीस बजावण्यात आली होती. आता वरिष्ठ कार्यालयाकडून विना वापराच्या भूखंडासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल. यानंतर पुढील कार्यवाही होईल
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में भारी बारिश से भारी नुकसान, 21 जानवर मरे, बिजली खंभे गिरे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाऊस,वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोटीहून अधिक नुकसान.. घरें,गोठे,शाळा,रस्ते,पुल,मोऱ्या बाधित.. २१ जनावरे दगावली,महावितरणाचे १० खांब कोसळले.. अँकर जिल्ह्यातील घरे,गोठे,शाळा,अंगणवाड्या,रस्ते,पूल,मोऱ्या आदींना मोठ्या फटका बसला आहे.. या पावसाने जिल्ह्यात आठवड्याभरात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.. जुलैपासून पावसाने वादळी वाऱ्यासह मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यातील घरे,गोठे,शाळा,अंगणवाड्या,रस्ते,पूल,मोऱ्या आदींना मोठ्या फटका बसला आहे.. यात २१ जनावरे दगावली असून महावितरणाचे १० विद्युत खांब कोसळले आहेत.. या पावसाने जिल्ह्यात आठवड्याभरात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..
0
0
Report

राज्य के अधिकतर स्कूल कल बंद, टीईटी और पदोन्नति पर शिक्षक संघों का विरोध

Chendhare, Maharashtra:राज्यातील बहुतांश शाळा उद्या बंद राहणार सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या ऑन लाईन टीईटी परीक्षेला शिक्षकांचा विरोध आझाद मैदान आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन राज्यातील सर्व माध्यमांच्या ८० टक्के शाळा उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. टी इ टी परीक्षेतील घोळ आणि सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलून केली जाणारी पदोन्नती या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहे. ऑन लाईन टी इ टी परीक्षा घेण्यास शिक्षकांचा विरोध आहे. उद्या शाळा बंद ठेवून मुंबईत आझाद मैदान आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे.
0
0
Report

वाशीम में SIR मोहिम के चलते स्कूल समय 7:30 से 1 बजे तक बदला गया

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासनाने ७ ते २९ जुलैदरम्यान शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. संबंधित खासगी अनुदानित, अंशतःअनुदानित तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत भरतील. बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दुपारी २ नंतर घरभेटी देऊन मतदार पडताळणी, गणनापत्रके भरणे आणि त्यांचे डिजिटलायझेशन करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यां च्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक आदेश जारी केले असून, २९ जुलैपर्यंत ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे。
0
0
Report
Advertisement

नागपुर: हिरा स्वीट्स के उत्पादन यूनिट में मृत उंदीर मिलने पर लाइसेंस रद्द

Nagpur, Maharashtra:- नागपुरातील पाचपावली परिसरातील हिरा स्वीट्सच्या उत्पादन युनिटमध्ये तपासणीदरम्यान मृत उंदीर आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई - अन्न सुरक्षा अधिकार्यानी कारखान्याची तपासणी केली असता स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन उघड. - कारखान्यात तयार होणाऱ्या मिठाई, विशेषतः सोनपापडीच्या उत्पादन प्रक्रियेत मृत उंदीर आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. - तपासणीचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सादर करण्यात आला. - हिरा स्वीट्सचा अन्न व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला. - नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

कोकण के घोणसरी जलप्रपात खुला, जंगल सफारी के साथ पर्यटकों के लिए आकर्षण

Oras Bk., Maharashtra:निसर्गाने कोकणात मुक्त हस्ताने उधळण केलीय. पावसाळ्यात तर कोकणाचे सौन्दर्य अजून öpp खुलत आणि त्याला कारण असत डोंगर दऱ्यातून खळखळत वाहणारे नयनरम्य धबधबे, तळकोकणात अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत मात्र काही धबधबे प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहेत त्यापैकी एक धबधबा म्हणजे कणकवली तालुक्यातील घोणसरी धबधबा... अगदी जंगलमय भागात असलेला घोणसरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. धबधब्या सोबत जंगल सफारीचा आनंद लुटण्याठी एकवेळ नक्की घोणसरी धबधब्याला भेट द्या आणि कसा आहे हा धबधबा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report

पुणे के क्षेत्र में घोड नदी में भीषण बाढ़, कई गाँव संपर्क टूट गए

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार उडाला असून, सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे घोड नदीला भीषण पूर आला आहे. माळीन, भीमाशंकर आणि अहुपे खोऱ्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीने रौद्ररूप धारण केले असून ती सध्या धोकादायक पातळीवरून वाहत आहे. घोड नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने शेतीचं ही प्रचंड नुकसान झालंय घोड नदीचा पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top