Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Apr 15, 2025 12:56:13
Sangli, Maharashtra
सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 09:04:00
Junnar, Pune, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या मातीतून पिकलेला आंबा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. जुन्नरमधील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ आंबा वाणाला केंद्र शासनाकडून जीआय टॅग/शेतकरी वाण म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. जुन्नर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये पिकलेला आंबा देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हापूसचा स्वाद, केशरचा रंग आणि राजापुरीचा आकार — तिन्ही गुणांचा अनोखा संगम. जवळपास ९०० ग्रँम ते १ किलो वजनाचे फळ, आकर्षक रंग आणि चव यामुळे बाजारात याला मोठी मागणी आहे. या यशामुळे भरत जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत असून, जुन्नर तालुक्याच्या कृषी परंपरेला नवी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे हा वाण विकसित करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. एका शेतकऱ्याच्या जिद्दीतून जन्माला आलेला ‘जुन्नर गोल्ड’ आता जुન્નरच्या नावाला सुवर्णमुद्रा ठरतोय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 08:32:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगरचा लखन सध्या राज्यात गाजतोय. या पठ्ठ्याने सांगलीच्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत मालकाला फॉर्च्यूनर जिंकूवुन दिली. 5 वर्षाच्या या लखन ने गेल्या चार ते पाच वर्षात मालकाला दीड कोटींची कमाई सुद्धा करून दिलीय. दिवसाला 10 लिटर दूध पिणारा हा पैलवान स्पर्धेत उतरला की भल्या भल्याना घाम फोडतो. कोण आहे लखन आणि काय करतो पाहुयात. घोड्याला लाजवणारी गती, वाऱ्याला चिरण्याची हिम्मत, आणि हत्तीची ताकद घेऊन शर्यतीत उतरणारा हा छत्रपती संभाजी नगरचा लखन आहे. नोव्हेंबर महिन्यात सांगली मध्ये झालेली श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत या पठ्ठ्याने बाजी मारली आणि मालकासाठी 35 लाखांची फॉरचुणर गाडी जिंकली. संभाजी नगर जिल्ह्यातील करोडी गावतील चव्हाण कुटुं biographiesचा हा लखन सर्वांचाच लाडका आहे. चव्हाण कुटुंबांनी लखनला दोन वर्षांचा असताना जालन्याच्या गावातून साडेबाराएक लाखात विकत घेतले आणि त्यानंतर सुरू झाला त्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रवास. तासगाव इथं हिंद केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील 2400 बैल आले होते; त्यात लखन ने बाजी मारली. ही ही काही त्याची पहिली स्पर्धा नव्हती; त्याने या आधी 150 वर स्पर्धा जिंकल्या, एक फॉरचुणर आणि 16 दुचाकी जिंकल्या आहेत; त्यात तीन बुलेटसुद्धा आहेत. स्वतःची वाहतूक करण्यासाठीसुद्धा एक गाडी जिंकली आहे. लखन ने हिंद केसरी स्पर्धा तब्बल 4 वेळा जिंकली आहे. 2024 सातारा जिल्ह्यातील पेडगाव येथे पहिल्यांदा, 2024 मध्ये फलटण दुसऱ्यांदा, 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशेर तिसऱ्यांदा, डिसेंबर 2025 महिन्यात पुणे हवेली तालुक्यातील वडकी येथे झालेल्या स्पर्धेत चौथ्याांदा हिंद केसरी जिंकून सर्वांची मने जिंकली. मालिक मनोहर चव्हाण, लखन चे मालक. लखनचा आहारही तितकाच तगडा आहे; सकाळ-Sanskrit संध्याकाळ त्याला पाच पाच लिटर दूध पाजले जाते, पंधरा प्रकाराचा सुका मेवा वापरून लाडू तयार करून गावरान तुपामध्ये भिजवून खाद्य दिले जाते. दर दोन दिवसाला पळण्याचा सराव देण्यात येतो, काही वेळा पाण्यात पोहण्याचा सराव देऊन शरीर तंदुरुस्त ठेवतात. लखन चा रुबाब इतका असतो की तो खाली बसताना देखील त्याला गादी लागते. लखन ची देखभाल करणाऱ्या साठी 24 तास एक माणूस त्याचा सेवेत असतो; प्रत्येकाचा एक शुभ अंक असतो, तसा लखनचा 1197 हा शुभ अंक आहे. ज्यावेळी या क्रमांकावर तो शर्यतीत उतरला तो अव्वल आला, तेव्हा हा क्रमांक त्याचा शुभ अंक म्हणून ओळखला. प्रत्येक स्पर्धेत हा नंबर घेऊन तो सहभागी झाला आणि जिंकू देखील लागला. लखन ला अनेकांनी दीड कोटी रुपयात मागितले आहे, मात्र चव्हाण कुटुंबाचा हा रांगडा मुलगा त्यांना प्रिय आहे. लखन आता इन्स्टाग्राम वर पण स्टार आहे; अल्पावधीत त्याचे 27 हजार फॉल्लोअर झाले आहेत.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 13, 2025 08:16:12
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 13, 2025 07:24:04
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 13, 2025 07:04:26
Nanded, Maharashtra:नांदेडमध्ये एका पक्ष कार्यालयाच्या उदघाटन दिवशी टेंट टाकला होता; दीड महिन्यापासून रस्त्यावर तसाच राहिला आहे. महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करण्यास धजावत नाही. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे गेल्या 22 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. नांदेड शहरातील नाना नानी पार्कसमोरील मुख्य रस्त्यावर उदघाटन प्रसंगी रस्त्यावर टेंट टाकण्यात आला होता. जवळपास 60 फुटाच्या या रस्त्यावर हा टेंट काही भागात बसवण्यात आला आहे. उदघाटन कार्यक्रमानंतर हा टेंट काढला जाईल असं वाटत होते. मात्र दीड महिने उलटूनही हा टेंट रस्त्यात तसाच कायम आहे. महापालिका सध्या शहरात रस्त्यावर अतिक्रमणावर कारवाई करत आहे; पण या अतिक्रमणाकडे महापालिकेचे लक्ष गेले नाही. रस्त्यावर ठीकठिकाणी गाडे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या रस्त्यातील पक्ष कार्यालयाच्या टेंटवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे सेनेने केलीये.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 13, 2025 07:03:44
Pune, Maharashtra:स्लग:- चार बिबटे जेरबंद फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात तीन दिवसात चार बिबटे जर बंद झाले आहेत तर एका बिबट्याने पिंजऱ्या जवळ येऊन पळ काढला आहे दोन दिवसांपूर्वी कीन्ही या गावांमध्ये एका दिवसात दोन बिबटे वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकले 3क दिवसानंतर याच परिसरात तिसरा बिबट्या देखील जेरबंद झाला तर काही अंतरावर असलेल्या पिंपरी गवळी गावात चौथा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय...आतापर्यंत पारनेर तालुक्यात चार बिबटे जेरबंद झालेत...तर याचं तालुक्यात एका बिबट्याने पिंजऱ्याला चकवा दिल्याचेही समोर आले आहे...पिंजऱ्याला चकवा देतानाचा व्हिडीओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरा कैद झालाय...दोन डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता...तर पारनेर तालुक्यातील बिबट्तांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं...दरम्यान चार बिबटे जेरबंद झाल्याने पारनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 13, 2025 06:16:45
Thane, Maharashtra:Thane लोकमान्य नगर याठिकाणी असणाऱ्या करुमेदेव सोसायटी १६ वर्षे जुने बांधकाम या सोसायटीच्या टेरेस वरील रूम हॉलचे प्लास्टर पडले होते. सदर घटनास्थळी मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंतालोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अतिक्रमण विभागाचे कर्मचारी लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते. रूमचे प्लास्टर पडले तेव्हा सदर रूम मध्ये चार व्यक्ती झोपल्या होत्या त्यामधील ०२ व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे येथे प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे Sadar घटनेत मनोज मोरे यांना छातीला दुखापत झाली असल्याने उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे व पुढील कार्यवाही वर्तक नगर पोलीस यांच्यामार्फत सुरू आहे. सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे. टसेच, सदर तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळविणे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 13, 2025 05:36:21
Kolhapur, Maharashtra:कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावरील रेणुका यात्रेनंतर कोल्हापूरात होणा-या यल्लम्मा देवीच्या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही यात्रा उदं ग देवी उदं च्या जयघोषात आज सुरू आहे. या यात्रेला ओढ्यावरच्या यात्रा म्हणुनही ओळखलं जातं. या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्हयातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी मार्गशीर्ष चतुदर्शीला कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुका देवीची यात्रा होते. याला कंकण विमोचन सोहळा म्हणुन ओळखलं जातं. श्री जमदग्नीच्या वधानंतर रेणुकादेवीला वैधव्य येते. या विधीसाठी कोल्हापूरातील मानाचे जग कर्नाटकातील सौंदत्तीला रवाणा होतात. तीथली यात्रा झाली की यल्लमादेवी आणि तिच्यासोबत विधवा होऊन देवदासीँ कोल्हापूरात परततात. या सगळ्याचं सांत्वन करण्याचा दिवस म्हणजे यल्लम्मा देवीची यात्रा होय. या यात्रेच्यास येताना भाविक यल्लमादेवीचे आवडते अन्नपदार्थ म्हणजे दहीभात , अंबिल, वडी -भाकरी , वरना -वांग्याची आणि मेथीची भाजी गाजर , केळी , कांद्याची पात ,लिंबू आणि फळे देवीला अर्पण करतात. हे पदार्थ देवीला अर्पण करुन देवीचे दुख हलक करण्याची प्रथा अनेक वर्षांची आहे. राज्यात अनेक ठिकाणी भरणा-या यात्रा जत्र्यांना वेगवेगळे धार्मिक महत्त्व आहे. असंच महत्त्व कोल्हापूरातील या यल्लाम्मादेवीच्या यात्रेला आहे. त्यामुळचं कोल्हापूर जिल्ह्यातील भक्त आवर्जुन देवीच्या यात्रेला हजेरी लावतात.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 13, 2025 05:06:02
Nashik, Maharashtra:गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळ मजुराचा खून करणाऱ्या एकास बिहार, तर दुसऱ्यास उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. दारूच्या वादातून दोघांनी खून केल्याची कबुली दिली. अरविंद ऊर्फ पप्पू पशुपतिनाथ पांडे असे मृत्यू मजुराचे नाव आहे... २९ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळी आढळून आला होता. मुख्य संशयित धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती व मंजय केशव पंडित अशी अटका केलेल्या संशयितांची नावे आहेत. मजुर अरविंदवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत अनोळखी पुरुषाबाबत अंबड, सातपूर एमआयडीसी परिसरात शोध घेण्यात आला.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 05:04:24
0
comment0
Report
Advertisement
Back to top