416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रोहित पवार ने रमेश म्हात्रे के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की
Kalyan, Maharashtra:इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला ka ? श्रीकांत शिंदे आलेत ka ? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत कडचे आमदार आहेत चौथ्यांदा निवडून आले ते तरी आलेत ka पाठबळ देण्यासाठी .. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात ठेवी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाही असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा शंभर टक्के निवडून नाही दिला पाहिजे श्रीकांत शिंदेने ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस न पाठबळ द्यायला पाहिजे होतं हे अत्यंत दुर्दैव आहे आज संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रे याला अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू0
0
Report
गुहागर में भारी बारिश से मुख्य मार्ग ध्वस्त, विसापूर पंगारी में यातायात बंद
Ratnagiri, Maharashtra:गुहागर ब्रेकिंग गुहागर मधील विसापूर पंगारी येथील मुख्य रस्ता खचला.... गावात जाणारी वाहतूक बंद. मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्यामुळे वाहतुकीला धोका. शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल वाहतूक बंद झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर. मुसळधार पावसामुळे गावात जाणारा रस्ता साडेतीन ते चार फूट खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीती. डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे उर्वरित रस्ता वाहून जाण्याची भीती。0
0
Report
डोंबिवली KDMC हॉस्पिटल में डॉक्टर-स्टाफ हड़ताल से सेवाएं ठप्प, मरीज परेशान
Kalyan, Maharashtra:सलग दुसऱ्या दिवशी केडीएमसी चे हॉस्पिटल ची सेवा ठप्प. आपत्कालीन व्यवस्था सुरू, रुग्णांचे हाल. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या शस्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे नगरसेवक यांनी डॉक्टर, नर्सेस और कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कालपासून हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीदेखील डॉक्टरांनी नर्स, कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे, त्यामुळे रुग्णांची हाल होत आहे. डॉक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि चार जणांवर विष्णूनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे, परंतु अद्याप अटक केले नसल्याने आजही काम बंद आंदोलन ठेवण्यात आलेला आहे. तसेच कल्याण आयएमए संघटना यांनी देखील खाजगी हॉस्पिटलचे ओपीडी आयपीडी सेवा देखील बंद केल्यात. जो पर्यंत आरोपी ला अटक केली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असे स्पष्ट केलं आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष भोईर यांनी0
0
Report
Advertisement
वाशीम-हिंगोली टोल प्लाजा जप्ती: अदालत ने एनएचएआई को बढ़ा हुआ मोबदला देने के आदेश दिए
Washim, Maharashtra:वाशीम: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका दिला आहे. वाढीव मोबदला न दिल्याने वाशीम -हिंगोली महामार्गवरील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक जमिनीतून अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्ग गेला होता. मात्र मोबदला देताना प्लॉटचा मोबदला देण्यात आला, तर रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला देण्यात आला नव्हता. तसेच प्लॉटचाही मोबदला कमी दराने देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले. मात्र आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.20 जुलैपर्यंत वाढीव मोबदला न दिल्यास टोल प्लाझावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गर्जे यांचे वकील उदय देशमुख यांनी दिली. बाईट : उदय देशमुख,वकील बाईट : दिनकर गर्जे,शेतकरी.0
0
Report
नवी मुंबई रेलवे स्टेशन भुयारी मार्ग में बारिश के पानी से यात्रियों को जूझना पड़ा, लोगों की परेशानी बढ़ी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में सकाल से ही बारिश ने काफी असर डाला था ... कोपरखैरने रेलवे स्टेशन के भुयारी मार्ग में बारिश के पानी ने 찬чәला है... प्रवासी फलाटा पर जाने के लिए इस भुयारी मार्ग के अलावा दूसरा कोई विकल्प नहीं होने के कारण बारिश के पानी में ही रास्ता निकालना पड़ रहा है... बारिश थमने के बावजूद पानी की निकासी अभी तक पूरी तरह से नहीं हुई है0
0
Report
डोंबिवली के अस्पताल में डॉक्टर-नर्स के विरोध से सेवाएँ ठप, गिरफ्तारी की मांग तेज
Kalyan, Maharashtra:सलग दुसऱ्या दिवशी केडीएमसीच्या रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवलं आहे. आपत्कालीन सेवा सुरू असल्याने ओपीडी आणि इतर नियमित सेवा बंद असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद अद्याप कायम आहेत. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत कालपासून रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असून रुग्णालयातील नियमित आरोग्य सेवा ठप्प झाल्या आहेत. आपत्कालीन सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ओपीडी, तपासण्या आणि इतर सेवांवर परिणाम झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.0
0
Report
Advertisement
भंडारा में शिक्षकों की मांग पर कांग्रेस का डीएम कार्यालय मोर्चा; ग्रामीण स्कूल खतरे में
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात ७९४ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यात ८०० च्या जवळपास शिक्षक नाही आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले यांचा भविष्य अंधारात आहे. म्हणुन आज काँग्रेसच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.. या मोर्च्यात शाळकरी मुले देखील सहभागी झाले आहेत. शिक्षण हा आमचा हक्क आहे. व ग्रामीण भागातील शाळा बंद झाल्या तर मुलांचा भवितव्य कसा होणार आहे...0
0
Report
हिंगणघाट में स्मार्ट मीटर विरोधी प्रदर्शन, महावितरण कार्यालय पर मोर्चा पहुँचा
Wardha, Maharashtra:अँकर : स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात हिंगणघाट शहरात बुधवारी नागरिकांचा तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकडोजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो नागरिकांच्या सहभागाने निघालेला हा मोर्चा महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकला.मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार आणि विद्युत विभागाविरोधात संताप व्यक्त केला.स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, नागरिकांना पारंपरिक वीजमीटरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच स्मार्ट मीटरमुळे निर्माण होत असलेल्या अडचणींचे निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. बाईट - अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट0
0
Report
अकोला के अकोट में भारी बारिश नालों की सफाई दावों की पोल खोल रही
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात झालेल्या धुवाधार पावसाने नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. 23 जूनला आलेल्या जोरदार पावसात या ठिकाणच्या नाल्या तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. आज पुन्हा या ठिकाणच्या नागरिकांच्या घरात नाल्यांचा पाणी शिरलं असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी, गजानन नगर आदी भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत घरांमध्ये घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याचे या पावसातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी या ठिकाणची पाहणी करतात मात्र आतापर्यंत कोणताही ठोस उपाय यावर करण्यात आला नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे साचलेल्या पाण्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नाल्यांची संपूर्ण साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे. Byte : स्थानिक नागरिक ..0
0
Report
Advertisement
भीषण बारिश से बीड-मुंबई highway जलमग्न, शिक्रापुर-तळेगांव मार्ग ठप्प
Shirur, Maharashtra:Anc: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेळ नदीला महापूर आला असून, नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. या महापुराचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे. वेळ नदीला आलेल्या पुरामुळे बीड-मुंबई महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील पुलावरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्याने शिक्रापूर-न्हावरे-तळेगाव ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिस्थिती केवळ रस्त्यांपुरती मर्यादित नसून, तळेगाव ढमढेरे शहरातही पुराचे पाणी घुसले आहे. अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
रत्नागिरी के मंडणगड में भारी बारिश से सड़कों पर नदी जैसे हालात
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मंडणगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला.. सखल भागात पाणी.. मंडणगड तालुक्यात पाऊसाचा जोर वाढल्याने भिंगळोली समर्थनगर येथील समर्थ कृपा अपार्टमेंट व राजू नगरकर यांच्या घराच्या पायरी पर्यंत अंगणात पाणी शिरल्याने रस्त्यावर नदीचे स्वरूप तयार झाल्याने भितीने वातावरण निर्माण झाले होते. असाच पावसाचा जोर वाढत गेल्याने पुरं परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच मंडणगड एसटी डेपो समोरील रस्त्यावर सुद्धा पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती.0
0
Report
सांगली के अंकली में कृष्णा नदी का जलस्तर बढ़ा
Sangli, Maharashtra:अँकर - सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरूच आहे,नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे,मात्र पडलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.वारणा नदी अजूनही पात्रा बाहेर आहे,तर चांदोली अतिवृष्टी कायम आहे,तर कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील वाढ सुरूच आहे,त्यामुळे सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीचे पात्र अजस्त्र बनल्याचं चित्र पाहायला मिळत,तेथून आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
नागपुर के फुकेश्वर शिवार में चाकू दिखाकर कार लूट: चार तोला सोना चोरी
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर शिवारात 5 जुलाई सायंकाळी कार चालकांना चाकूचा धाक दाखवत लुटपाट केली गेली. कृषी विभागाचे कर्मचारी सुहास चंद्रकांत हजारे आपल्या कारने नातेवाईकांसोबत जात असताना निर्जन ठिकाणी दोघांनी त्यांच्या कारला थांबवून चाकूचा धाक दाखवला आणि लूट केली. कारमध्ये पाठीमागे बसलेल्या सहकार्याने हा व्हिडिओ शूट केला. या घटनेत सोना आणि काही रोकड लुटल्याची माहिती आहे. सुहास हजारे आपला अल्टो कारने बुटीबोरीकडे जात होते तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लूटमार केली. चार तोळे सोनं आणि काही रोकड लुटली गेली. पाच जुलाईची सायंकाळी साडे पाचचे समय होते; आरोपी फरार आहेत. या घटनेची तक्रार सुशांत हजारे यांनी देताना आपबीती सांगितली.0
0
Report
शिर्डी-नगर महामार्ग पर दलदल, खड्डे ने भक्तों की यात्रा कठिन बना दी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash नगर-मनमाड महामार्ग चिखलमय ; रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप... सावळीविहीर ते अहिल्यानगर मार्ग चिखलाच्या विळख्यात.. शिर्डीकडे येणाऱ्या - जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांची महामार्गाहून प्रवासादरम्यान कसरत... सावळीविहीर ते शिर्डी महामार्गाचे खोदकाम करून रस्ता अर्धवट ; पावसाने महामार्ग बनला दलदलीचा मार्ग... हजारो साईभक्तांचा प्रवास धोकादायक ; दुचाकीस्वारांचा जीव मुठीत धरून प्रवास.. महामार्गावर वाहनांच्या रांगा ; चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीने भाविकांची नाराजी... महामार्गाच्या संथ कामकाजाचा भाविकांना फटका ; महामार्ग प्राधिकरणावर प्रश्नचिन्ह..? संथ गतीने सुरू असलेलं महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावं , साई भक्तांसह नागरिकांची मागणी... नगर मनमाड महामार्गाहून वाहतूक कुंडीसह महामार्गाच्या दुरावास्येचा आढावा घेत महामार्गावर प्रवास करणाऱ्या साई भक्तांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
NDM में शामिल होने की चर्चा पर निलेश लंके का साफ जवाब, कोई गुप्त बैठक नहीं
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- निलेश लंके ऑन एन डी ए फीड 2C Anc- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीएमध्ये सहभागी होईल अशा राजकीय चर्चा रंगत आहेत.... याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून या केवळ राजकीय चर्चा आहेत...जयन्त पाटील आणि विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची देखील चर्चा आहे...त्यावर बोलताना कोणत्याही गुप्त बैठका झाल्या नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केल आहे....अनेक नेते हे एकमेकांना भेटत असतात, त्यांचे वैयक्तिक देखील काम असू शकतं...मात्र अद्याप तरी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा विषय आमच्यासमोर आलेला नाही... दरम्यान विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले की , निवडणूक लढवत असताना आपण एका पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतो, मात्र निवडून आल्यानंतर आपण संपूर्ण राज्यातील जनतेच्या विकासाचा विचार केला पाहिजे... असंच धोरण सत्ताधाऱ्यांच देखील असलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.0
0
Report
Advertisement
