icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे में ज्ञानेश्वर पालखी भवानी पेठ में तय, देवस्थान ने समय-सारणी जारी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:याबाबत अखेर आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं होणार आहे. आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब दिलं. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करुन, परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं असून तशी प्रक्रिया ही सुरु झालीये, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.
0
0
Report

डोंबिवली की भावना इमारत खाली कराने नोटिस से 29 परिवारों में सनसनी

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील भावना इमारत खाली करण्याच्या नोटिसीने रहिवासी हवालदिल, केडीएमसी मुख्यालयात धाव.. डोंबिवली पूर्वेतील मुखर्जी रोडलगत असलेल्या चार मजली भावना इमारत खाली करण्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिकेकडून बजावण्यात आल्याने 29 कुटुंबातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी इमारतीतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि लोकप्रतिनिधींना भेट घेत निवेदन सादर केले. 2002 मध्ये महापालिकेने इमारत तोडण्याची नोटिस दिल्यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने इमारत तोडण्यास स्थगिती दिली होती. कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संबंधित व्यक्तीने मागे घेतल्याने उच्च न्यायालयातील स्थगिती आदेश रद्द झाला.यानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी इमारत खाली करण्याची नोटिस बजावली आहे. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून इमारत उभारण्यात आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला असून रहिवाशांनी १५ दिवसांत इमारत खाली न केल्यास पाडकामाचा खर्च वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच रहिवाशांनी सहकार्य न केल्यास पोलिस बळाचा वापर करण्यात येईल, तसेच वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे इमारतीतील 29 कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका आम्हाला बेघर करणार असेल तर आम्ही जायचे कुठे ? असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
0
0
Report

NEET प्रकरण: CBI ने शुभम खैरनार के घर पर छापा मारा

Nashik, Maharashtra:- नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत CBI ऍक्शन मोडवर... - शुभम खैरनार याच्या घरी जाऊन झाडाझडती सुरू.. - आरोपी शुभम खैरनार याच्या नांदगाव येथील घरी CBI आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती... - अधिकाऱ्यांकडून कमालीची गोपनीयता.. - NEET प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार यांच्या नांदगाव येथील घरी CBI चा छापा.... - एक तासाहून अधिक वेळेपासून शुभम च्या कुटुंबीयांची चौकशी सुरू... - CBI पथक व स्थानिक पोलीस यांच्याकडून शुभम च्या घराची झाडाझडती सुरू... - NEET प्रकरणात शुभमच्या घरून काही धागे दोरे लागतात का ? हे पाहणे महत्वाचे... - NEET पेपर प्रकरणात शुभम खैरनार यास काल CBI च्या पथकाने ताब्यात घेतले होते...
0
0
Report
Advertisement

27 गांवों के पानी की समस्या छह महीने में खत्म होगी, शिंदे ने दी जानकारी

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांचा पाणी प्रश्न मिटणार. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती. 27 गावांमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून वाढीव 50 कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केलाय. त्यासाठीचा अध्यादेश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने महापौरांना सादर करण्यात आला. शिवाय महापालिकेच्या 50 कोटी अशा जवळजवळ 100 कोटीच्या माध्यमातून 27 गावातील पाणी समस्या सहा महिन्यात संपेल अशी माहिती शिंदे यांनी दिली. जुन्या जलवाहिन्या बदलून पानीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 268 कोटीचा प्लॅन महानगरपालिकेने तयार केलाय. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे कसे उभे करायचे यावर कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.
0
0
Report

नांदगाव विधानसभा चुनाव केस: छह अपराधी और गवाह अदालत में पेशी

Nashik, Maharashtra:नांदगाव (नाशिक): ब्रेकिंग विशाल मोरे नांदगाव विधानसभा निवडणुक काळात दाखल ६ गुन्ह्यासंदर्भात आज नांदगाव न्यायालयात या गुन्ह्यासदर्भात साक्षीदारांची साक्ष... विधानसभा निवडणुकातील उमेदवार आ.सुहास कांदे, समीर भुजबळ, गणेश धात्रक, डॉ.रोहन बोरसे आज न्यायालयात हजर.. गुणे दाखल प्रकरणात फिर्यादी आणि साक्षीदार तपासणी... एकूण ६ गुन्ह्यांमधील आरोपी आणि साक्षीदार न्यायालयात हजर... नांदगाव न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ; न्यायालयाला छावणीचे स्वरूप.. या सहाही गुन्ह्यातील आरोपींना पुढील ३ जून या तारखेस पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश... नांदगाव नगरपरिषद कर्मचारी व गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी या प्रकरणात केली होते गुन्हे दाखल.. यातील एका प्रकरणात साक्ष नोंदविण्यात आली.. नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम.अग्निहोत्री यांच्यासमोर खटल्याचे आजपासून कामकाज सुरू
0
0
Report
Advertisement

Satara: अचानाक बारिश ने किसानों को बड़ा नुकसान, 18 भेड़ें मृत

Satara, Maharashtra:सातारा -सातारा शहरासह ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे...वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं..., या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठं अस्मानी संकट कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे...माण तालुक्यातील म्हसवड येथील हनुमंत मासाळ हे सध्या कोंडवे गाव परिसरात मुक्कामी राहत आहेत...शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गेले असताना अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने मोठा अनर्थ घडला...विजेच्या धक्क्याने तब्बल 18 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे...आधीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यावर आता अवकाळी पावसाचं नवं संकट कोसळलं आहे...शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हनुमंत मासाळ यांनी केली आहे...
0
0
Report

केमिस्ट-ड्रिगिस्ट संघ ने 20 मई को 24 घंटे की देशव्यापी बंदी का आह्वान किया

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- विविध मागण्यांसाठी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 20 मे रोजी देशव्यापी व्यापार बंद चा इशारा, देशभरातील साडेबारा लाख केमिस्ट दुकाने केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणावरोधात राहणार बंद अँकर:-- विविध मागण्यांसाठी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 20 मे रोजी देशव्यापी व्यापार बंद चा इशारा देण्यात आलाय. या संपात देशभरातील साडेबारा लाख केमिस्ट दुकाने केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणावरोधात 24 तासांसाठी बंद राहणार आहेत. चंद्रपुरात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी ही माहिती दिली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये या बंदकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा पुरवठा सुकर व्हावा यासाठी नंबर जारी करण्यात आले आहेत. ऑनलाइन औषध विक्री बंद करा कार्पोरेट औषधे निर्मिती कंपन्या द्वारे अव्यावसायिक सवलती बंद करा बनावट औषधी पासून देश वाचवा या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली में एयरपोर्ट के लिए 104 करोड़ की मंजूरी; जमीन अधिग्रहण शुरू

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली येथे नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी व वन विभागाच्या 311.81 हेक्टेअर जमीन संपादन करण्यासाठी 104 कोटी 48 लाख 64 हजार 239 रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीने हा प्रस्ताव ठेवला होता. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी 31.38 हेक्टर जमीन विनामोबदला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. 311.81 हेक्टेअर जमीन भूसंपादनासाठी भूसंपादन संस्था व अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या कंपनीला नियुक्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच्या मौजे मुरखळा, पुलखल व कनेरी गावांमधील जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी जारी शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मागील आठवड्यात या गावांमधील ग्रामपंचायत व ग्रामसभा, नागरिक यांना कुठलीही सूचना न देता नागपूरहून जमीन मोजणीसाठी आलेल्या काही उच्चपदस्थ अधिकारी ग्रामस्थांनी कोंडून ठेवले होते. जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका झाली होती. आता याच परिसरात विमानतळ उभारणीसाठी निधी मंजूर झाल्याने आगामी काळात हा प्रश्न अधिक क्लिष्ट होण्याची चिन्हे आहेत.
0
0
Report
Advertisement

बीजेपी ने मोदी- कुंभ पर व्हॉट्सऐप स्टेटस विवाद पर कड़ा आंदोलन शुरू किया

Satara, Maharashtra:सातारा - कोरेगावातील माजी नगरसेवक तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते फिरोज इसाक काझी उर्फ मुन्नाभाई काझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रयागराज कुंभमेळ्याबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालय आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तालुकाध्यक्ष निलेश यादव आणि शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करणे आणि देशाच्या सर्वोच्च पदाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.एकूणच कोरेगाव तालुक्यात भाजप आणि शिवसेनेत या घटनेमुळे तू तू में में सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top