icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पेट्रोल-डिज़ल के दाम तीन रुपए बढ़े, नागरिकों के लिए भारी फटका

Shirdi, Maharashtra:राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपयांनी वाढ झाल्यानंतर नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याने वाहनधारकांची धावपळ सुरू झाली आहे. ज्या पेट्रोल पंपावर टँकर पोहोचतो, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असून पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडत आहे. काही ठिकाणी तर इंधन संपण्याच्या भीतीने वाहनधारकांकडून अतिरिक्त इंधन साठवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. तर काही प्रेटोल पंपांना मुबलक प्रमाणात डिझेल पेट्रोल मिळत नसताना दोन दोन तीन Three दिवस पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप मालकांवर आलीये.दरवाढ आणि तुटवडा या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने तातडीने मुबलक इंधन पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिर्डी नजीक असणाऱ्या पेट्रोल पंपाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report

पेट्रोल-डीजल महँगाई ने गरीबों पर डाला भार, पुणे के ग्रामीण इलाकों में आक्रोश

Shirur, Maharashtra:देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा भडकल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं असलं, तरी वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे केवळ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवरच परिणाम होत असल्याच्या भावना आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. 'पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम फक्त सर्वसामान्य लोकांवरच होतो, बड्या व्यापाऱ्यांना किंवा श्रीमंतांना याचा काहीही फरक पडत नाही,' अशा शब्दात वाढत्या इंधन दरवाढीच्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याात
0
0
Report
Advertisement

शिंदे के आदेश से अकोला में शिवसेना कार्यकारिणी बरखास्त, नई टीम निर्माण की तैयारी

Akola, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, कार्यकारणी बरखास्त करण्यामागे पक्षातील अंतर्गत वाद कारणीभूत आहेत का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेला अपयश यामागच कारण आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक राजकारण आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या पत्रात अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पुढील काही दिवसांत नव्या कार्यकारिणीची घोषणा होतेका आणि पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सातारा में शिंदे-देसाई एक मंच पर, पीएम आवास उद्घाटन में राजनीतिक संदेश की उम्मीद

Satara, Maharashtra:सातारा : जिल्हा परिषदेत झालेल्या राडा प्रकरणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलेले कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हे आज साताऱ्यात एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 5 लाख घरांच्या लोकार्पण सोहळा आणि लाभार्थी मेळावा आज साताऱ्यात आयोजित झाला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.हा राज्याचा शासकीय कार्यक्रम असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र या कार्यक्रमाला येणार नसल्याने देखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या गोंधळानंतर महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा रंगली होती. अशातच दोन्ही नेते आज एका मंचावर उपस्थित राहणार असल्याने राजकीय संदेश काय जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही उपस्थिती राहणार आहे.
0
0
Report

नागपुर में बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित को भाऊ काणे स्मृति पुरस्कार, 1 लाख नकद

Nagpur, Maharashtra:नागपूर बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित यांना भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेय. त्यांना एक लाख रुपये रोख विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ आणि चैतन्य स्पोर्ट्स योगा व कल्चर फाउंडेशन तर्फे यंदा भाऊ काणे स्मृति उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्याचे तिसरे वर्ष आहे. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय महेंद्र पाटील यांना खो-खो खेळाकरता तर समशेर खान यांना ॲथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. प्रत्येकी 21 हजार रुपये, स्मृतीचिन्ह असे त्यांच्या पुरस्काराचे स्वरूप होते
0
0
Report
Advertisement
Advertisement

वाशीम गोठे में आग: 45 बकरियाँ मर गईं, लाखों का नुकसान—कारण जांच के दायरे में

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील तोरणाळा गावातील शेतकरी सुभाष काशीराम मुठाळ यांच्या गोठ्याला मध्यरात्री भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत तब्बल 45 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून एक बैल गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय गोठ्यात साठवून ठेवलेले सुमारे 20 क्विंटल हळद बेन, मोटार पंप, केबल, पाईप, स्प्रिंकलर तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही आग अपघाती होती की कोणीतरी लावून दिली, याबाबत शेतकऱ्यांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top