416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में शिंदे गट से मुलाकात के चलते राजनीतिक हलचल तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बाळ माने शिंदेसेनेच्या वाटेवर? सचिन अहिर यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!.. बाळ माने यांनी नुकतीच विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली आहे.बाळ माने यांनी स्वतः या भेटीचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केल्यामुळे ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जातील असे तर्क लढवले जात होते,मात्र भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते.. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळ माने यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवल्याचे दिसत असून,या अनपेक्षित भेटीमुळे आगामी काळात रत्नागिरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..0
0
Report
नाशिक के नकली शालार्थ ID केस में बड़ा मोड़: आरोपी प्रशांत वाडीले गिरफ्तार
Dhule, Maharashtra:नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळे येथून अटक केली आहे. आज त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेले जाणार असल्याची माहिती आहे. नाशिक मधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रशांत वाडीले यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अटकेनंतर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रशांत वाडीले यांच्या धुळे येथील निवासस्थानी दाखल झाले असून, तेथे सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या सुमारे एक तासापासून ही कारवाई सुरू असून, पहाटेच नाशिकहून आलेल्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा तपासाशी संबंधित इतर पुरावे हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रशांत वाडीले यांच्या अटकेमुळे बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची अपेक्षा आहे.0
0
Report
योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज की पालखी पंढरपूर के लिए भक्तिमय प्रस्थान
Shirdi, Maharashtra:Go davari tiri vaslelya Yogr gaze Sadguru Gangagiri Maharaj yanchya Sarla Bet yethun Pandharpur paid dindi che mothya bhaktimay vatavaranat Pandharpur kadhe prasthan jhale ahe. 200 varshachi parampara aslele ya palkhi sohalyat hazaror warakari sahabhagi jhale ani Shri Ramapur Shaharata palkhiche jalloshat swagat karwale gela. V/o - Sarala Betache mathadhipati Mahant Ramgiri Maharajanchya adhipattyaakhale tal mridung ani harinamacha jaIyghosh kart palkhine Pandharpukade prasthan kele ahe. Shri Ramapur nagaritat palkhiche ajalya swagat kele jhale. Shaharatil that te maidan ya thite bhaktimay vatavaranat pahila rihang sanhota savd dekhila gelay. Bite - Mahant Ramgiri Maharaj, mathadhipati Godavari dham Sarla Bet0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र सरकार ने किसानों के लिए 2 लाख रुपए लाभ की घोषणा
Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी या पूर्वीच्या कर्जमाफीत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांचा लाभ मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यानंतर पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संत नामदेव पायरीजवळ पेढे वाटून जल्लोष केला. आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर मधून कर्जमाफी आंदोलनाची अन्नत्याग करून सुरुवात केली होती. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला0
0
Report
मुंबई-कोकण जैसी भारी बारिश अभी विदर्भ मराठवाड़ा में नहीं, किसानों को राहत की प्रतीक्षा
Yavatmal, Maharashtra:मुंबई आणि कोकणात ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस झाला तसा पाऊस अद्यापही विदर्भ मराठवाड्यात झालेला नाही. विदर्भ मराठवाडा अजूनही कोरडाच असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. झालेली पेरणी साधली पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.0
0
Report
मान्सून पावसात विदर्भातील मोठी कमी: 1 जून–10 जुलैमध्ये एकूण कमी 18%
Nagpur, Maharashtra:नागपूर मुंबई आणि पुण्याकडे मान्सूनचा मुसळधार पाऊस झाला असला तरी विदर्भात मान्सूनच्या पावसाची मोठी तूट आहे. 1 जून ते 10 जुलै दरम्यान सरासरीच्या 18% मान्सूनच्या पावसाची तूट विदर्भात आहे. 1 जून ते 10 जुलै दरम्यान मान्सून पावसाची विदर्भातील स्थिती अकोला (-13) अमरावती (-15) भंडारा- (-34) बुलडाणा (0) चंद्रपूर (-25) गडचिरोली (-46) गोंदिया (30) नागपूर (-12) वर्धा (-2) वाशिम (-29) यवतमाळ (-10) एकूण (-18)0
0
Report
Advertisement
लोणावळा में बाढ़ पीड़ित क्षेत्रों के लिए मावळ विधायक सुनील शेळके का दौरा
Varsoli, Maharashtra:Headline: लोणावळ्यातील पूरग्रस्त भागांना मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट Anchor: लोणावळ्यातील पूरग्रस्त भागांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती घेतली.यावेळी पूरग्रस्तांनी घरांमध्ये शिरलेले पाणी, झालेले आर्थिक नुकसान तसेच प्रशासनाकडून अपेक्षित मदतीबाबत आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या. नागरिकांना धीर देताना आमदार शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद आणि टाटा धरण प्रशासनाशी समन्वय साधून पूरग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवल्या जातील, असे आश्वासन दिले..0
0
Report
शेरीराला प्रकल्प जल्द पूरा करने की मांग, कांग्रेस विधायक कदम ने विधानसभा में उठाई
Sangli, Maharashtra:सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषण आणि शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या शेरीनाला प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील कदम यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करत केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सांगली आणि कृष्णा नदीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शेरीनाला प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी केली आहे. शेरीनाल्या लाखो लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे, त्यामुळे नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर शेरीनाल्यामुळे पाणी तुंबल्याने पावसाळ्यात पुरपट्ट्यात पूरस्थिती निर्माण होण्याचाही धोका दरवर्षी निर्माण होतो, त्यामुळे राज्य सरकारने रखडलेल्या शेरीनाल्याचा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी आमदार कदम यांनी विधान सभेत केली आहे.0
0
Report
लोणावळा बाढ़: जलपर्णी हटाने में ढिलाई से नागरिकों में भारी नाराज़गी
Varsoli, Maharashtra:Headline : जलपर्णीचा हलगर्जीपणा की नैसर्गिक आपत्ती? लोणावळ्यातील महापुरानंतर नागरिकांचा संताप Lozda: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः जलसमाधी दिली. अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्याने हजारो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, हा पूर केवळ अतिवृष्टीमुळेच नव्हे, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ओढवला, असा गंभीर आरोप आता स्थानिक नागरिक करत आहेत. विशेषतः हुडको कॉलनीतील रहिवाशांनी इंद्रायणी नदीतील जलपर्णी वेळेत हटवली असती, तर एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली नसती, असा दावा केला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... VO-1 : ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये तब्बल पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने फर्निचर, घरगुती साहित्य, धान्य, इलेक्ट्रिक उपकरणांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासन, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुमारे १२०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. VO-2 : पूराचा सर्वाधिक फटका हुडको कॉलनी परिसराला बसला. टाटा धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर साचलेल्या जलपर्णीमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे नदीचे पाणी शहराच्या दिशेने वळले आणि अनेक वस्त्यांमध्ये पूर शिरल्याचा दावा नागरिकांनी केला. इंद्रायणी नदीतील जलपर्णी वेळेत हटवण्यात आली असती, तर नुकसानाची तीव्रता कमी झाली असती, असा संतप्त आरोप नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर केला आहे. VO-3 : दरम्यान, नागरिकांच्या या गंभीर आरोपांनुसार लोणावळा नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेणार आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूर ओसरला असला तरी या महापुराच्या जखमा आणि प्रशासनावरील प्रश्न मात्र अद्याप कायम आहेत.0
0
Report
Advertisement
पिंपरी चिंचवड़ मोशी इमारत में फंसे 8 लोगों के लिए बचाव अभियान युद्धस्तर पर
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड च्या मोशी मध्ये इमारतीत अडकलेल्या ८ जणांना काढण्याच बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे... दरम्यान ज्या इमारती मध्ये ही दुर्घटना घडली आहे त्या बाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांना परवानगी नसल्याचं स्पष्ट झालंय... ज्य्या पर्यावरण विभागाच्या देखरेखीत हा प्रकल्प सुरू होता त्या विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय... नैसर्गिक आपत्ती आहे असा दावा करणाऱ्या आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं होत. त्यामुळे पालिका कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न उपस्थित झालाय..दरम्यान सुरू असलेल्या बचाव कार्याचा आणि उपस्थित प्रश्नांसंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
वन नेशन वन इलेक्शन पर भाजपा के खिलाफ भारी विरोध, महाराष्ट्र में मंत्रिमंडल फेरबदल चर्चा
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन एक देश एक निवडणूक जॉईन पार्लमेंटरी कमिटी आहे एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन निर्माण केली त्यात भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या बहुमत आहेत त्याच्यामुळे इतर पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी किती वेगळी भूमिका मांडली लोकशाही विरुद्ध आहे संविधान विरोधी आहे संघराज्य जी आपली रचना आहे त्याला हे मानवणार नाही हे त्या बैठकीमध्ये त्या मीटिंगमध्ये अनेक खासदाराने मत व्यक्त केलं तरीही बहुमत असल्यामुळे त्या कमिटीचा बीजेपीचा त्यांचा जो अजेंडा आहे तो रेटून न्यायचा प्रयत्न करत आहेत एक देश एक निवडणूक त्याची गरज नाही हे आमचे मत आहे या देशांमध्ये विविधता आहे राज्य वेगवेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या हवामान असतं मासिकता वेगळे आहे प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत पण भारतीय जनता पक्षाला व नेशन वन इलेक्शन पेक्षा वन इलेक्शन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे वन पार्टी वन इलेक्शन ही त्यांची जी वाटचाल आहे ती या माध्यमातून वन पार्टी दुसरा कोणताही पक्ष राहता कामा नये आणि त्यानंतर महिला आरक्षण च्या नावाखाली डी लिमिटेशन बिलाचा जो विषय चालू आहे 850 खासदार करण्याचं आणि त्या माध्यमातून भाजपाला आपला देश ताब्यात घेण्याचा तो काय त्यांचा सरळ हेतू नाही आहे 850 खासदार झाल्यावर ते संविधानामध्ये बदल करून भारतामध्ये राष्ट्र अध्यक्ष पद्धत आणण्याचा विचारत आहेत ट्रम्प मूर्ख पद्धतीने राज्य करतो असा एखादा मूर्ख आपल्याकडे जो आहे तो त्या पद्धतीने राज्य करू शकतो प्रेसिडेन्शिअल डेमोक्रॅटिक पद्धत म्हणजे राष्ट्र अध्यक्षाला अमर्यादा अधिकार तिकडे निवडणुकांची गरज नसते प्रेसिडेंट मंत्रिमंडळ जे आहे आपल्याला हवी असल्याने माणसं नेमतो निवडून आलेल्या लोकांतून तुम्हाला मंत्री म्हणून बनवायला पाहिजे असं नाही कॅबिनेट भाजपची वाटचाल आता त्या दिशेने सुरू आहे आता त्या बैठका आणि काम सुरू आहे म्हणून आधी डी लिमिटेशन बिल मंजूर करायचं डी लिमिटेशन बिल मंजूर झाल्यावरती घटनेमध्ये पूर्णपणे बदल करून संविधान बदलून मोडून या देशातील लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष आणि परत या परत या देशाच्या छातीवर राष्ट्र अध्यक्ष म्हणून मोदींना बसवायचं अशा पद्धतीची वाटचाल लोकशाही मोडण्याच्या दिशेने सुरू आहे त्याच्यामुळे हे सगळं चाललं आहे वन नेशन वन इलेक्शन वगैरे हे सगळे बरोबरचे बुडबुडे आहेत आमचा विरोध आहे त्याला या देशांमध्ये परंपरेने भारतीय घटनेनुसार जी पद्धत सुरू आहे भारतीय संविधानाने जी दिशा लोकशाहीला दिली आहे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे तो मार्ग कोणालाही असं उकडून फेकता येणार नाहीस या देशाच्या संविधानानुसार या देशाची संसद लोकशाही आणि निवडणुका होतील ही आमची भूमिका आहे ऑन पावसाळी अधिवेशन केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल महाराष्ट्रातील नाव चर्चेत 20 तारखेला संसदेचा अधिवेशन सुरू होईल आणि 20 तारीख आता लांब राहिली नाही आता मिरीट वरती कोणांना प्रधान मंत्री पद मंत्री पद मिळण्याचे दिवस संपले आहेत गुणवत्तेवर आता हडकं फेकली जातात आणि हडका कोणामुळे फेकली जातात ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी आणि शहा यांनी पट्टा बांधला आहे अशा ना हाडके जातात त्याच्यामध्ये आता कोणाच्या पुण्यामध्ये हारकर फेकले जातील मिंध्ये गट असेल किंवा आमच्याबद्दल फुटलेले सहा आहेत त्यांना कोणाच्या तोंडात हाडुक दिले जाईल हे पाहू एक मात्र नक्की केंद्रामध्ये विशिष्ट हालचाली सुरू आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यासाठी गेले अनेक काळात सुरू आहे त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील कोणी म्हणतात राजनाथ सिंग बदलले जातील अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने केंद्रातील असं म्हटलं जातं आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत 2029पूर्वी तुम्हाला जर पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत कारण 2029 नंतर भाजपचे राज्य इकडे येणार नाही त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते 2029 आधी तुम्ही करा 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्या कुणी राहणार त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वीच्या हालचाली करायचे आहे त्या करून घ्यावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत ऑन एकनाथ शिंदे ते फोडत आहेत फोडण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचंड पैसे आहेत पैसे त्यांच्या दरेगावातला शेतामध्ये उगवत नाहीत ते पैसे मिसिंग लींक अडीच हजार कोटीचा ओव्हर बजेट म्हणजे लुटलेले पैसे आहेत अशा पैशातून आमदार खासदार विकत घ्यायचे हे त्यांचे धोरण आहे अशा प्रकारची माणसं देशाला घातक आहेत राजकारणाला नाही देशाला घातक आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेची खेळ करणं हा एक आर्थिक दहशतवाद आहे तुम्ही आजच महालेखा पालांचा रिपोर्ट पाहिला असेल त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्त वरती अत्यंत कठोर शब्दांमध्ये कोरडे ओढले आहेत आर्थिक बेशिस्त अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राला कोणी यापुढे एक रुपया सुद्धा कर्ज देणार नाही आता हे तर विरोधी पक्षाने सांगितले नाही महाराष्ट्राचे बदनामी आम्ही केली नाही केंद्र सरकार यांचे महालेखापाल आहेत त्यांनी बदनामी केली असेल महाराष्ट्राचे इतर देवेंद्र फडणवीस यांनी महालेखापालना बघून घेतले पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तुम्ही महाराष्ट्र विषयी असं काही कसं म्हणू शकता जरी ते सत्य असलं तरी असे मला त्यांना आता सांगायचे आहे ऑन फडणवीस मंत्री पद केंद्र राज्याची सूत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येतील तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन तर मला जे चित्र दिसत आहे त्यानुसार विदर्भातल्या चंद्रशेखर बावनकुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसत सगळ्यांशी संवाद ठेवणारे सांभाळून घेणारे एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले आम्ही तर म्हणून प्रधानमंत्री व्हा 2029 च्या आधी तर मला शंभर टक्के वाटतं चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीस करतील हे माझं आकलन आहे राज्याच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजे तो राज्याचं हेच पाहिल जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि तो या राज्याचे स्वाभिमान असं कोणीही व्यक्ती असेल त्याला शुभेच्छा देणे हे आमच्या कर्तव्य आहे त्या चुकीचं काय मी तुम्हाला माझा अंदाज आणि आकलन सांगितलं त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे ऑन राम मंदिर चोरी एकनाथ शिंदे आणि सिद्धिविनायक मंदिर डल्ला उद्धव ठाकरे सरकार सिद्धिविनायक मंदिर ज्या पद्धतीने आम्ही सांभाळलं ज्याचा निधीचा सामाजिक कार्यासाठी केला तो या आधी कधीच झाला नव्हता आताच मला एक कार्यकर्ते भेटायला आले ते घाटकोपर परिसरामध्ये डायलिसिस केंद्र उभा करत आहेत जागा त्यांची स्वतःची आहे आणि आदेश बांदेकर अध्यक्ष असताना डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी रक्कम मंजूर केली त्यानंतर सत्ता बदलल्यावर जे कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते डायलिसिस केंद्र निधी रद्द केला आणि म्हटलं जर तू आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच तुला हा निधी मंजूर केला जाईल हे जे असे लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासानं आदेश बांदेकर संकेत सावंत हे लोक असताना जेवढा उत्तम काम केलं तेवढा कधीच काम होऊ शकला नाही 18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत राम मंदिर लुटीच्या प्रकरणात जो देशात असंतोष आहे आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाही आजही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्ये मध्ये आहेत त्यांनी राम मंदिराची आणि रामाचे पूर्ण बदनामी केली आहे आणि म्हणून शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केलं त्याचा पहिला टप्पा मुंबईत पार पडला दुसरा टप्पा महाराष्ट्राचा उपराजधानी मध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि असंख्य आमचे मुंबईतले नेते आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील 18 जुलै साडेचार वाजता ऑन नाशिक ठाकरे नगरसेवक संपर्क काही कोटीच्या विकास निधीचा नाही तर काही कोटींच्या लाचेची गेल्या एक महिन्यापासून त्यांचे काही लोक मिन्धे यांचे बॅगा घेऊन नाशिकमध्ये फिरत आहे हे खर आहे घरोघरी जात आहेत पण आमच्या एकाही नगरसेवकांनी त्यांना घराच्या उंबरठा ओलांडू दिला नाही हे सुद्धा सत्य आहे ऑन लाडकी बहीण कॅग यासंदर्भात खरं म्हणजे 85 लाखापेक्षा जास्त बोगस लाभार्थींना जो लाभ दिला ती गंभीर चिंता आहे आता हे तुम्ही वसुली कसे करणार आहात आर्थिक बेशिस्त तर यालाच म्हणतात जे ज्यांची गुणवत्ता नाही ज्यांना मेरिटवर हा लाभ घेता येत नाही अशा लाखो बोगस लोकांना मत विकत घेण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये दिले ही बेशिस्त आहे आता काय करणार आहात तुम्ही सांगा ही जी बदनामी महाराष्ट्राची होत आहे आर्थिक बेशिस्त संदर्भात त्याच्यामध्ये खरं म्हणजे राजाच्या मुख्यमंत्र्यांनी पदत्याग केला पाहिजे इतका कलंका लागला आहे महाराष्ट्राला ऑन मार्च महिना गुन्हा सिद्धिविनायक चोरी हिंदी मार्च महिन्यात कोणाचे सरकार होतं बघाना एकनाथ शिंदे यांना जाऊन कोणी सांगितले पाहिजे तुमचा चेअरमन आहे तुम्ही त्या ठिकाणी जरा बोट दाखवा0
0
Report
महाराष्ट्र राजस्व विभाग में बड़े भ्रष्टाचार के आरोप, कई अधिकारी निलंबित
Nagpur, Maharashtra:Ngp Bawankule byte live u ने फीड पाठवले नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री - On महसूल अधिकारी/कर्मचारी निलंबन - - महाराष्ट्रात महसुली कायद्यात 155 कलमांतर्गत शुद्ध लेखनाचा अधिकार आहे, शुद्धलेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, नावात दुरुस्तीचा अधिकार आहे, परंतु महसूल विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी 155 कलमाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि फौजदारी सारखे मोठे गुन्हे केले आहेत - चौकशी समितीने अहवाल दिला आहे या अहवालात जवळपास अति गंभीर प्रकरणाचे निघाले, ज्यामध्ये केवळ आता आम्ही निलंबित केला आहे परंतु सविस्तर रिपोर्ट गुन्हे दाखल करण्याचा आहे - गंभीर गुन्हा केलेला आहे, या गंभीर गुन्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या मालमत्ता बिल्डरच्या नावाने करणे, चुकीच्या पद्धतीने फेरफार करणे, त्यामुळे हे निलंबन झाले आहे - कोकणात 70 ब या कलमाचा दुरुपयोग केला गेला, हे निलंबन प्राथमिक कारवाई आहे यानंतर मोठी कारवाई करावं लागेल, मोठे प्रकरण आहे On विरोधी पक्ष महसूल विभाग कौतुक - - माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार सामान्य व्यक्तींच्या कल्याणाकरता महत्त्वाचे निर्णय घेत आहे, पारदर्शक आणि गतिमान शासन देण्याचा प्रयत्न केला आहे - मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसानिमित्त 22 जुलैला तीन दिवस राज्यभर विशेष शिबीर घेण्याचा निर्णय केला आहे, आम्ही दहा लक्ष परिवारांना सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत - महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे आम्ही विचार केला आहे या महाराष्ट्रात जास्तीत जास्त सेवा द्यायचे त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनाही उत्तम वागणूक देण्याचा प्रयत्न करत आहोत, भेदभाव करत नाही - अनेक दिवसांपासून महसूल संहितेचा वापर करून जनतेला सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकता असं महसूल खाते आहे, गडचिरोली ४०,००० बंगाली समाजाची कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुेच्याघ? On कॅग अहवाल - - त्याचा अहवाल हा कॅगने द्यायचा असतो पण जेवढं काही इन्वेस्टमेंट झाला आहे राज्यात, या राज्याच्या समृद्धी किंवा शक्तिपीठ महामार्ग असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, हे जे इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे फ्युचर आहे - कर्जाची चिंता करत बसलो तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार नाही, भविष्यात महाराष्ट्र पुढे जाणार आहे, हे आजचा कर्ज हे इनकमचा सोर्सेस आहे - तूट जरी असेल तरी ते भरून काढायला वेळ लागत नाही, महाराष्ट्राला जे मजबुतीकरण मिळेल ते तूट भरून काढणार On बोगस बियाणे - - ज्यांनी हे विकलं,ज्या एजन्सी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे, परवाच कमिशनर शी बोलणं झालं, अमरावतीमध्ये अनेक लोकांना फटका बसला, अनेक तक्रारी आल्यात, कृषी केंद्र आणि सप्लायरला सरकार सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आणि या शेतकऱ्यांना पुन्हा कसं बी बियाणे देण्यात येईल याचा आम्ही प्रयत्न करू On कर्जमाफी - - मुख्यमंत्री फडणवीस यांचा सर्व विधिमंडळांनी अभिनंदन केलं, सरसकटचा मार्ग आता मोकळा झालाय, महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे On अमरावती निमंत्रण पत्रिका - - ते निमंत्रण पत्रिका शासकीय नाही, ती पत्रिका छापलेली वेगळी आहे त्यांना जे पटेल ते नाव टाकले, त्यांना ते पटत नाही ते नाव टाकले नाही On शरद पवार एनडीए - - मला माहिती नाही, जे काही होणार नाही त्यावर बोलून फायदा नाही On रमेश म्हात्रे कोरे सात बारा - - आमच्या महसूल खात्याशी चर्चा केली असेल, कोणी असेल तर कारवाई करू0
0
Report
Advertisement
ATS raids on 157 locations, over 100 questioned
Nagpur, Maharashtra:नागपूर (पंकज भोयर 121... गृहराज्यमंत्री ) शोधात भट्टी नावाचा आतंकवादी पाकिस्तानमध्ये बसून महाराष्ट्रात आतंकवादी कारवाई करण्याच्या प्रयत्नात होता --- समाजमाध्यमातून त्यांनी काही तरुणांना हाताशी घेण्याचा प्रयत्न केला --- काही जणांच्या खात्यात पैसेही दिले आणि त्या पैशांच्या माध्यमातून प्रलोभन दाखवून या प्रकारचे कृत्य करून घेण्याचा प्रयत्न करत होता --- परंतु वेळीच ATS ला माहिती मिळाली.. 157 ठिकाणी छापे... आणि ताब्यात घेऊन 100 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली --- समाज माध्यमातून त्या लोकांचे विचार कसे आहे हे अगोदर हेरण्यात आले... त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले त्यांना प्रललोभीत करण्यात आले.. असं कृत्य करणार का? --- वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी होती (on संभाजीनगर स्लीपर सेल ) --- संभाजीनगर असो विदर्भातील इतर काही जिल्हात कारवाई होतेय.. चौकशी होतेय... चौकशीनंतर अजून विस्तृत माहिती पुढे येईल0
0
Report
नीलोबाराय की दिंडी आज पंढरपुर के लिए प्रस्थान, हजारों वारकरी शामिल
Ahilyanagar, Maharashtra:विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत अहिल्या नगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय यांची दिंडी आज प्रस्थान ठेवल आहे राज्यातील मानाच्या दिंड्यांपैकी नवव्या क्रमांकाची असलेली ही दिंडी गेल्या अनेक वर्षांपासून आपली परंपरा जपत आहे निळोबारायांच्या दिंडीमध्ये पन्नास ते साठ हजार वारकरी सहभागी होतात पिंपळनेर पंचक्रोशी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अनेक गावातून वारकरी या दिंडी मध्ये सहभागी होतात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार काशिनाथ दाते यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी या दिंडी प्रस्थानासाठी उपस्थित होते0
0
Report
बीड जिला अस्पताल में लिफ्ट बंद, गंभीर मरीज को नीचे ले जाना पड़ा—वीडियो वायरल
Beed, Maharashtra:बीड जिला अस्पतालातील लिफ्ट सुरू नसल्याने रुग्णाला झोळीतुन करावे लागले दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर नेले जात होते. मात्र लिफ्ट सुरू नसल्याने त्यांना झोळीत टाकुन पायऱ्यावरून घेऊन जावे लागले. याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ सोबत जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरू नसल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ वरून जिल्हा rुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.0
0
Report
Advertisement
