icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में भारी बारिश से नदियाँ पुनः प्रवाहित, उद्योग फिर चालू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गेले दोन दिवस जिल्ह्यामध्ये दमदार सुरुवात केली आहे.. जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रवाहित झाल्यामुळे पाण्याच्या गंभीर समस्येवर सध्या तरी या पाण्याने मात केली आहे.. गेले दोन आठवडे लोटे एमआयडीसी तील पाणीपुरवठा बंद असल्यामुळे अनेक उद्योग कारखाने बंद पडले होते आता पडलेल्या पावसामुळे वाशिष्टी नदी पुन्हा प्रवाहित झाल्याने तेथील पाण्याचे पंप सुरू झालेत.. आज पौर्णिमा असल्यामुळे पावसाची संततधार जिल्ह्यात सुरूच आहे.. या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में बाघ के हमले से किसान की मौत, बफर क्षेत्र में दहशत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार , ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून चोरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. संजय माधवराव सिडाम (मूळ. रा. केळझर, ता. राजुरा), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. संजय सिडाम चोरगाव येथील सासऱ्याची शेती पाहण्यासाठी आला होता. हे शेत ताडोबा बफर जंगलाला लागून आहे. चार दिवसांपूर्वीच संजयने शेतात कपाशीची लागवड केली होती. शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. विशेष म्हणजे वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती सौरऊर्जेवर चालणारे बॅटरीचे कुंपण (वायर) लावण्याचे काम सुरू होते. वनपथक अधिक तपास करत आहे.
0
0
Report

नाशिक के आखतवाडे गाँव में विषबाधा से दंपत्ति की मौत, जांच शुरू

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडे गाव हादरले! मटनाचे जेवण जीवावर बेतले; पत्नीचा मृत्यू. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावात संशयित विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. उपचारादरम्यान ६८ वर्षीय द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू झाला, तर ७८ वर्षीय शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगावमध्ये उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासासाठी अन्नाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
0
0
Report

अंबरनाथ में रिक्षा पर पेड़ गिरा; बुजुर्ग घायल, नगर परिषद पर आरोप

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये मोठे झाड रिक्षावर कोसळले; वयोवृद्ध प्रवासी जखमी, नगरपरिषदेवर दुर्लक्षाचा आरोप अंबरनाथ येथील लोकनगरी परिसरात मोठे झाड रिक्षावर कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत रिक्षामध्ये बसलेले एक वयोवृद्ध प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी वयोवृद्ध व्यक्तीला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हे झाड धोकादायक अवस्थेत असल्याने ते हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच अंबरनाथ नगरपरिषदेकडे केली होती. मात्र, नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. संबंधित घटनेबाबत अधिक तपास सुरू असून, प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे शिर्डी में साईं दर्शन के बाद कार्यकर्ता मेळावा

Shirdi, Maharashtra:उद्धव ठाकरे साई मंदिरात पोहचले... उद्धव ठाकरे साईंच्या चरणी लीन , शिर्डी माझे पंढरपुर आरती करत ठाकरेंनी घेतलं साईंच्या समाधीचं दर्शन... ठाकरेंचा आज शिर्डीत कार्यकर्ता मेळावा... शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज धडाडणार ठाकरेंची तोफ... मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे पोहचले साई दरबारी... खासदार संजय राऊत, खा, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, खा. राजाभाऊ वाजे, खा. अनिल देसाई, ठाकरेंसोबत... साई दर्शनानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा... उद्धव ठाकरे हे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर काय टीका करणार..? याकडे लक्ष...
0
0
Report

सांगली में घरपट्टी बढ़ोतरी पर कांग्रेस का ताली-प्रदर्शन; विपक्ष उग्र

Sangli, Maharashtra:वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीमध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत, सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य सर प्रणाली अंतर्गत घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र यालाच नागरिकांचा प्रचंड विरोध सुरू झाला आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी सांगली महापालिकेतील विरोधक आता एकवटले आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर टाळ वादन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना सह सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता, आंदोलनाच्या ठिकाणाहून टाळ आंदोलनाचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी ..
0
0
Report

च-chipलूण के परशुराम घाट में गैबियन वॉल में दरार, भारी बारिश से गिरने का खतरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या परशुराम घाटात 'गॅबियन वॉल'ला मोठमोठ्या भेगा; पावसाचा जोर वाढल्यास कोसळणार संकट!. चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या भरावाला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.. त्यामुळे गॅबियन वॉलच आता धोक्यात आली असून पावसाळ्यात महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या गॅबियन वॉलला अवघ्या काही दिवसांतच भेगा पडल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला,तर हा भलामोठा भराव खाली कोसळून पायथ्याशी असलेल्या पेढे वासियांवर मोठे संकट ओढवण्याची भीती वर्तवली जात आहे.. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निकृष्ट कारभारामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून,यावर आता तातडीने काय उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे शिर्डी साईं मंदिर पहुंचे, चरण स्पर्श के साथ मेळावा शुरू

Shirdi, Maharashtra:उद्धव ठाकरे साई मंदिरात पोहचले... उद्धव ठाकरे साईंंच्या चरणी लीन , शिर्डी माझे पंढरपुर आरती करत ठाकरेंनी घेतलं साईंच्या समाधीचं दर्शन... ठाकरेंचा आज शिर्डीत कार्यकर्ता मेळावा... शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज धडाडणार ठाकरेंची तोफ... मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे पोहचले साई दरबारी... खासदार संजय राऊत, खा, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, खा. राजाभाऊ वाजे, खा. अनिल देसाई, ठाकरेंसोबत... साई दर्शनानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा... उद्धव ठाकरे हे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर काय टीका करणार..? याकडे लक्ष...
0
0
Report

पुणे के ग्रामीण इलाकों में वटपौर्णिमा पर महिलाओं का जोरदार उत्साह, परंपरा बनी नवीन ऊर्जा

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अखंड सौभाग्यासाठी सुवासिनींनी एकत्र येत वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत महिलांनी वडाला सुती धागा गुंडाळून सात जन्माच्या साथीची प्रार्थना केली. पूजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावले. एकमेकींना फळांचे आणि धान्याचे 'वाण' देऊन हा सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. आधुनिकतेच्या काळातही ग्रामीण भागात हा पारंपरिक संस्कृतीचा ठेवा आणि उत्साह मोठ्या प्रमाणावर टिकून असल्याचं आज या निमित्ताने पाहायला मिळालं.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग में पुरुषों ने भी वटपौर्णिमा मनाई: पति की दीर्घायु हेतु अनोखी परंपरा

Oras Bk., Maharashtra:वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव मंदिर येथे गेल्या १७ वर्षांपासून पुरुष मंडळी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी करीत असून यावर्षीचे १८ वे वर्ष आहे. गाऱ्हाणे घालून विधीवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात. पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करता तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी पूजा करतात. पुरूषांच्या या अनोख्या वटपोर्णिमेचे सर्वांनाच कौतूहल वाटत आहे. सर्वत्रच अशा पद्धतीने पुरुषांनी वटपोर्णिमा साजरी करण्याची प्रथा अंमलात आणण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

गडचिरोली- छत्तीसगढ़ सीमा पर नक्सली हथियार निर्माण कारखाना उद्ध्वस्त, 5 टन लेथ मशीन बरामद

Chandrapur, Maharashtra:टायटल:---गडचिरोली- छत्तीसगड सिमेवर नक्षल्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त , पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट, सामुग्रीत 5 टन वजनी लेथ मशीनचा समावेश, जवानांकडून विविध नक्षली साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट अँकर:-- नक्षल्यानी महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील बालबेडा जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता उपमुख्यालय यांच्या संयुक्त 6 तुकड्या, बिडीडीएसचे 01 पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले. बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, 5 ते 6 टन वजन असलेली एक लेथ मशीन, 150 नग क्लेमोर आणि बिजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप, 20 नग रायफल रॉड मेटल पट्टी आदी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. पथकातील जवानांच्या सहाय्याने काही साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. सक्रीय नक्षलवाद काळात विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी हा साठा नक्षल्यानी लपवून ठेवला होता.
0
0
Report

सोलापुर के माढा अस्पताल में प्रसूता की सफाई जबरदस्ती; 14 माह बाद 9 कर्मी निलंबित

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात एप्रिल 2025 मध्ये नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेला तिच्या खोलीची स्वच्छता करायला लावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आता 14 महिन्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे या घटनेने सार्वजनिक आरोग्य विभागाचा अमानवी कारभार समोर आला होता त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाणे व इतर आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केला आहे.यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top