icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भंडारा के खोडगाव में सूर नदी में युवक की डूबकर मौत, परिजनों में शोक

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या खोडगाव येथे सूर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. शलाब मोहन कडव (वय ३२, रा. शिवनगरी, भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. धार्मिक कार्यक्रमानिमित्त खोडगाव येथे आलेल्या कडव कुटुंबातील शलाब हा दर्शनानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात उतरला होता. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात ओढला गेला. त्याचा भाऊ विक्रमने मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु जोरदार प्रवाहामुळे त्याला वाचवता आले नाही. वरठी पोलिसांच्या सुमारे तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

सिंहस्थ कुंभमेळे के साधुग्राम के लिए बजट: 2287 करोड़ रु भू-सम्पादन

Nashik, Maharashtra:- सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर - तपोवन परिसरातील साधुग्राम उभारणीसाठी १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनाला मिळणार गती - राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी २,२८७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी - कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक आणि साधू-महंतांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय - निधीचा वापर केवळ भूसंपादनासाठीच करण्याची शासनाची अट - भविष्यातील वाद टाळण्यासाठी सेटलमेंटची जबाबदारी महापालिकेवर - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग, प्रशासनाकडून नियोजनाला चालना
0
0
Report
Advertisement

निलेश लंके ने पाटबंधारे कार्यालय के स्थानांतरण पर विरोध जताया, आंदोलन की चेतावनी

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर पाटबंधारे विभाग आणि मुळा पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतराला खासदार निलेश लंके यांनी विरोध केला आहे पाटबंधारे विभागाच कार्यालय राहाता तालुक्यातील लोणी येथे स्थलांतर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरातील मोक्याच्या जागेवर हे कार्यालय असल्यामुळे कार्यालय आपल्या सोयीच्या ठिकाणी नेऊन कार्यालयाची जागा हडपण्याचा डाव विखेंचा असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला आहे या स्थलांतराला कर्मचाऱ्याकडून देखील विरोध होतं आहे. गेल्या 100 वर्षांपासून हे कार्यालय नगर शहरात आहे आम्ही स्थलांतरीत होऊ देणार नाही वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा खासदार लंके यांनी दिला आहे....
0
0
Report

Chudawa में सिमेंट स्लीपर प्लांट के विरोध में किसान, परियोजना रद्द करने की मांग

Parbhani, Maharashtra:अँकर - परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे होत असलेल्या सिमेंट स्वीपर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.. चुडावा येथे कृषी शेतजमीनीवर सिमेंट स्लीपर उत्पादक Prकल्प होत असून प्रकल्पाला चुडावा सोनपेठ वाई या गावासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे या प्रकल्पामुळे बाजूच्या शेतकऱ्यांचे सिमेंट धूळ औद्योगिक उत्सर्जनामुळे पिकाचे उत्पादन भाजीपाला उभी पिके बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी सिमेंट प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
0
0
Report

रत्नागिरी में पानी संकट: बांध सूखे, टैंकर से पानी बाँटना मजबूरी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीवर पाणीबाणीचे संकट धरणांमधील पाणीसाठा आटल्याने टँकरची धाव.. मान्सून लांबल्यास चिंता वाढणार! अँकर रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंतेची बातमी समोर येत आहे..जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीत प्रचंड घट झाली असून,पाणीसाठा कमालीचा खालावला आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे.. सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की,अनेक तीव्र पाणीटंचाईग्रस्त गावांना प्रशासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार,जर यंदा मान्सून आणखी लांबणीवर पडला,तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे गडद सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.. नागरिक आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.. धरणातील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी
0
0
Report
Advertisement

सरकार ने मराठा विद्यार्थियों के लिए ओबीसी लाभ लागू करने की घोषणा

Nagpur, Maharashtra:नागपूर बबनराव तायवाडे, अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ -OBC च मुळीच नुकसान नाही.आपल्या राज्यामध्ये आधी एससी आणि എസ്टी प्रवर्गाला मिळायाच्या... 2016 मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला.. ज्या सोयी सवलती SC आणि ST मिळतात त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला लागू करून घेतल्या. सरकारकडून आज त्या योजनेचा लाभ ओबीसी समाजातील विद्यार्थी घेत आहे. तेच लाभ त्याच योजना याच्यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो. -- समाजातील प्रत्येक घटकाला ज्या ज्या सोयी सवलती आहेत त्यांचं जीवनमान वाढविण्याकरता त्या सर्व सुविधा पुरविण्याचा सरकारचं कर्तव्य आहे ते कर्तव्य सरकारने आज निभवला. आणि ज्या सुविधा मिळतात त्या यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळतील अशा प्रकारचा हा निर्णय आहे --- दोन निर्णयांवर माझा आक्षेप आहे. OBC समाजातील विद्यार्थी परराज्यामध्ये शिकायला जातात त्या विद्यार्थ्यांना अजून पर्यंत फ्रेंडशिप योजना सरकारने लागू केलेली नाही तसेच व्यावसायिक संस्था स्तरावर ज्या ऍडमिशन होतात आणि त्याला कॅप मंजुरी देते त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व या दोन्ही योजनेचा जीआर सरकार लवकर काढत नाही आणि त्या योजनेपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. आणि म्हणून या दोन्ही योजनेचा स्वतंत्र GR सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकडून काढावा लागू करावा आणि त्याच प्रकारे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना द्यावा.. आमची कोणती हरकत नाही --- ज्याप्रकारे सांगण्यात आले ज्या ज्या योजना ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यापुढे जाऊन सांगेन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ज्या योजना लागू आहे मात्र ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना लागू नाही.. या सर्व योजना ज्या मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू कराव्या आणि त्यांना दिल्यास हा द्यावा अशी आमची मागणी
0
0
Report

राजस्थान से नकली नोट के साथ आरोपी गिरफ्तार, 10 लाख रुपये जप्त

Washim, Maharashtra:राजस्थानमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले.आरोपींनी यापूर्वी वाशिम बायपासवरील पानटपरीवर 500 रुपयांची बनावट नोट वापरल्याचे उघड झाले.पानटपरी चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे टोलनका कर्मचाऱ्यांनी आरोपीला अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी राजस्थान पासिंगची स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात वाशिम जिल्ह्यात नकली नोटांवरील ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वी 23 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
0
0
Report

विद्यार्थियों ने 353वां शिवाजी महाराज राज्याभिषेक पर 150 वर्गफुट प्रतिमा बना कर अभिवादन किया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखं अभिवादन केलंय...जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डाळ, तांदूळ, गहू यांच्यामाध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा साकारली आहे...यासाठी विद्यार्थ्यांना 18 तास वेळ लागलाय, तर ही प्रतिमा साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रमोद उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिति चुनाव: 18 सीटों के लिए 300 आवेदन जमा

Shirur, Maharashtra:शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी १८ जागांसाठी एकूण ३०० अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. महत्त्वाचं म्हणजे स्वप्निल गायकवाड या उमेदवाराने कांद्याचे बाजारभाव गडगडल्या च्या निषेधार्थ गळ्यात कांद्याच्या माळा घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी-आडते, महिला, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच हमाल-मापाडी मतदारसंघांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. विशेषतः सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात सर्वाधिक अर्ज आल्याने या गटातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. विविध राजकीय पक्ष, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधी रिंगणात उतरल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
0
0
Report

नातेपुते में मंगल कार्यालय से सोने के गहने चोरी: पुणे से महिला आरोपी गिरफ्तार

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील मंगल कार्यालयातील सोन्याच्या दागिन्याची चोरी उघड, पुणे येथून महिला आरोपिकडुन नातेपुते पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात लग्नाच्या गडबडीत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरट्याला नातेपुते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे येथून अटक केली आहे. आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले तब्बल ३ लाख ९८ हजार ७५५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
0
0
Report
Advertisement

शिरूर में थार ट्रैक्टर की मदद से निकला चिखल में फंसा, इंटरनेट पर चर्चा गर्म

Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे चिखलात अडकली 'थार', अखेर ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला. शिरूरमध्ये नुकताच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे एका पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. या चिखलामध्ये एक 'महिंद्रा थार' गाडी रुतून बसली. चालकाने गाडी बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र चिखल जास्त असल्याने थार गाडी जागेवरून हलत नव्हती. अखेर, त्या गाडीला ट्रॅक्टरच्या साह्याने ओढून बाहेर काढावे लागले. एरवी अत्यंत शक्तिशाली आणि ऑफ-रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या थारला चिखलातून निघण्यासाठी थेट ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागल्याची मिश्कील चर्चा आता संपूर्ण शिरूर परिसरात चांगलीच रंगू लागली आहे.
0
0
Report

अकोला महापालिका ने अतिक्रमण हटाने की मुहिम शुरू की, ट्रैफिक खुला, नागरिकों में खुशी

Akola, Maharashtra:अकोला शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, वादविवाद, मारहाणीच्या घटना तसेच महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, प्रमुख वर्दळीचे रस्ते आणि वादग्रस्त ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत इंदोरी गल्ली परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील इंदोरी गल्ली परिसरात कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली आहे. अनेक दिवसांपासून या भागातील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता तसेच नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता.स्थानिक नागरिकांच्या मते, अतिक्रमणामुळे अनेकदा किरकोळ कारणांवरून वाद निर्माण होत होते. काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडल्या असून महिलांनाही त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेच्या कारवाईमुळे आता रस्ता मोकळा झाला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम केवळ काही दिवसांसाठी न राहता नियमित आणि कायमस्वरूपी राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी महापालिकेने सातत्याने देखरेख ठेवून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top