416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर के गोसीखुर्द घोटाले में चार वरिष्ठ अधिकारियों समेत ठेकेदार पर केस दर्ज
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यात घोटाळाप्रकरणी चार बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द उजवा मुख्य कालवा बांधकामात सुमारे 14 कोटींच्या घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून चार बड्या अधिकार्यांसह कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करणे, नियमबाह्य अद्ययावतीकरण करणे, निविदेची किंमत वाढविणे यासह विविध गैरप्रकार या अधिकारी आणि कंत्राटदारांनी संयुक्तपणे केल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभाग नागपूरचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता संजय कोल्हापूरकर, विभागीय लेखाधिकारी सुधाकर घेगारे, कार्यकारी अभियंता देवेंद्र शिर्के यांच्यासह दोन खाजगी कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.0
0
Report
शिर्डी के अवैध जमीन केस में अशोक खरात और कल्पना खरात के खिलाफ FIR, कल्पना फरार
Shirdi, Maharashtra:शिर्डीतील बहुचर्चित बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरात सह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.. याप्रकरणी अशोक खरात याचा ताबा मिळवत शिर्डी पोलिसांनी तपास देखील केला.. मात्र गेल्या 70 दिवसांपासून कल्पना खरात अद्यापही फरार आहे.. शिर्डी पोलिसांकडून तिचा शोध घेण्यासाठी दोन पथक तैनात करण्यात आली असून पोलिसांना अद्याप यश आले नाही.. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती असून त्या अनुषंगाने तिचा शोध सध्या सुरू आहे..0
0
Report
ऑपरेशन टायगर पर शिंदे की भूमिका पर मची सियासी घमासान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर... मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर ऑन ऑपरेशन टायगर - आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करीत नाही. जण यायचे त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. आता आमची मानसिकता नाही मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असे वाटत नाही. ऑन मुंबई चालक मराठी भाषा. - सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही वेळ दिला होता. अनेक राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. मग मुंबईत मराठी का नाही. एवढे करूनही ऐकत नसतील तर ही मुजोरी म्हणावे. मग कारवाई होईल. ऑन दीपके मोदी भेट.राऊत विधान. - हवेत गोळ्या मरण संजय राऊत यांचं काम आहे. आता पर्यंत त्यांचे एकही विधान सत्य झाले नाही. ऑन रोहित पवार आंदोलन. - आमचा विरोध होण्याचा कारण नाही.राजकीय पोलिस भाजून घेण्याचे काम रोहित पवार करीत आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. - विरोधकांच्या पाणी फिरले आहेत. आमचे 17 चे 17 उमेदवार निवडून येतील. ऑन चाकणकर पोस्ट - यावर भाष्य करणे योग्य राहणार नाही. ऑन मंत्री भरणे विवादित विधान. - मंत्री भरणे यांचा बोलण्याचा उद्देश चुकीचा न्हवতা, शेतकरी राज्याला कुणीही हिणवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ऑन वेरूळ हत्या. - वेरूळची घटनेत 307चा आरोपी होता त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले होते. या प्रकरणात जो आरोपी असेल त्यावर कारवाई केली जाईल. ऑन FDA कारवाई. - Fda च्या मोहिमेचा अभिनंदन केलं पाहोजे. मोठी कारवाई सुरू आहे. त्याचा स्वागत आहे जे प्रोटेक्शन पाहिजे ते सरकार देईल. - आतापर्यंत जे अधिकारी झोपले होते, अधिकारी काय करीत होते हा प्रश्न आहे. का आपल्याकडे लॅब नाहीत, तपासणी होत नाही. काही लोकांचे लागेबांधे व्यापाऱ्यासोबत होते. ही कारवाई थांबता कामानये. ऑन खत विक्री. - मुख्यमंत्र्यांनी परवाच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आपल्याकडे मुबलक साठा आहे. असे सचिवांनी सांगितले आहे. बोगस खत विक्रीवर कठोर करावी करणार. - काँग्रेसचे अस्तित्व संपलेलेलं आहे. उमेदवार म्हणतो मी का खपू, उमेदवाराने निर्णय घेतले असेल तर गैर नाही. ऑन यशोमती ठाकूर आरोप. - तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा का आरोप केला नाही. 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होता, तुम्ही किती देऊन मंत्रिपद दिले. ऑन ऑनलाइन खातविक्री आणि शेतकरी अडचणी. - ऑफलाईन खते मिळत नसल्याने शेतकरी कुठेही अडचणीत येऊ नये याबाबत सचिवाना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.0
0
Report
Advertisement
घाटसावळी में रेलवे पुल के लिए जमीन के मुआवजे में भारी फर्जीवाड़ा सामने: आम के पेड़ों को लाखों, घरों को कम?
Beed, Maharashtra:बीड: घरांपेक्षा आंब्याच्या रोपांना लाखोंचा मावेजा; घाटसावळी भूसंपादनावर संशयाचे सावट..! घाटसावळी येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहत्या घरांपेक्षा आंब्याच्या छोट्या रोपांना लाखों रुपयांचा मावेजा मंजूर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही झाडांना लाखोंचा मोबदला, तर काहींना केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे. पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट... हातात मावेजाची कागदपत्रे घेऊन ती तपासणारे हे ग्रामस्थ आहेत बीड जिल्ह्यातील घाटसावळी गावचे. या गावातून रेल्वेचा उड्डाणपूल गेल्याने परिसरातील अनेक नागरी वसाहतींचे भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र या भूसंपादनातील मोबदल्याच्या आकडेवारीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण राहत्या घरांपेक्षा तब्बल पाच पट अधिक मावेजा आंब्याच्या रोपांना मंजूर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बॅरलमध्ये लावलेल्या एका आंब्याच्या रोपाला तब्बल आठ लाख रुपयांचा मावेजा मंजूर झाला आहे. तर जमिनीत लागवड केलेल्या काही आंब्याच्या झाडांना केवळ दोन हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. एवढी मोठी तफावत कशी, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. घाटसावळी गावातील अनेक नागरिकांनी घरासमोर आंब्याची झाडे लावली आहेत. परिसरात सुमारे पन्नास आंब्याची झाडे असून त्यापैकी तब्बल तीस झाडांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा मावेजा मंजूर करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. दुसरीकडे काही झाडांना अत्यल्प मोबदला देण्यात आला, तर काही झाडांची नोंदही करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. ज्यांना चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला, त्याच निकषांवर इतर पात्र झाडधारकांनाही मावेजा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घाटसावळी गावातून गेलेल्या या रेल्वे उड्डाणपुलासाठी सर्वे क्रमांक १८ मधील सुमारे चारशे मीटर परिसरातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत अनेक घरे आणि नागरी वसाहतींचा समावेश आहे. मात्र इथेही मोबदल्यातील मोठी विसंगती समोर आली आहे. काही मोठ्या इमारतींना केवळ दहा लाख रुपयांचा मावेजा मिळाल्याचा दावा केला जात आहे, तर तुलनेने साध्या घरांना तब्बल चाळीस लाख रुपयांचा मोबदला देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून यात भ्रष्टाचार झाला असावा, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भूसंपादनात घोटाळा झाल्याची तक्रार ग्रामस्थानी करताच जिल्हा प्रशासन देखील आता सतर्क झाले आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल मागितला जाईल त्यानंतर रीतसर कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. त्यामुळे भूसंपादन अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आंब्याच्या रोपांपासून ते घरांच्या मोबदल्यापर्यंत दिसून येणारी ही मोठी तफावत अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. भूसंपादन प्रक्रियेत नेमके कोणते निकष लावण्यात आले, मोबदल्याचे दर कसे ठरविण्यात आले आणि या सर्व प्रकरणात कोणाची जबाबदारी आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महेंद्रकुमार मुधोळकर Zee 24 तास बीड..0
0
Report
चंद्रपुर के सावली तालुका के खेतों में रानटी हाथियों का दल ड्रोन से कैद
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या शेत शिवारात रानटी हत्तींच्या कळपाचा वावर, वनविभागाच्या ड्रोन मध्ये कैद झाले विहंगम दृश्य. गडचिरोली जिल्ह्यातून कोरडी पडलेली सीमेवरची वैनगंगा नदी पार करून रानटी हत्तींचा कळप चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील तलाव आणि शेतशिवारात मुक्काम ठोकून आहे. कळपाने काही ठिकाणी नुकसान केले आहे. मात्र बहुतांशी कळप शांत आहे. एका रेषेत आणि लयबद्ध पुढे सरकणारा कळप खरीप हंगाम पुढ्यात असताना शेतकऱ्यांना मात्र धडकी भरविणारा आहे...0
0
Report
बीड़ परळी में पैसों के विवाद पर लिपिक की मारपीट, तीन के खिलाफ मामला
Beed, Maharashtra:बीड : परळीत पैशांच्या वादातून लिपिकाला दोन तास बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल. परळी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
Advertisement
सोलापूर के जिलाधिकारी ने तूफानी हवाओं से नुकसान वाले केले के बागों का निरीक्षण किया
Pandharpur, Maharashtra: Solapur के जिलाधिकारी एस कार्तिकेएन यांनी आज माढा तालुक्यातील वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या केळीच्या बागांची पाहणी केली. शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसान ची माहिती त्यांनी घेतली आहे. कृषी आणि महसूल विभागाने समन्वय साधून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दिलासा जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे0
0
Report
अकोला के अकोट तालुके में सातबारा अनिवार्य, यूरिया-डीएपी वितरण पारदर्शी और शिकायत कम
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया आणि डीएपी खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. खतांच्या उपलब्धतेबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रशासन आणि कृषी विभागाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला आधार कार्डच्या आधारे टोकन पद्धतीने युरिया वाटप सुरू करण्यात आले होते. मात्र या निर्णयावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत, केवळ आधार कार्डच्या आधारे शेती नसलेले लोकही युरिया खरेदी करून साठेबाजी किंवा काळाबाजार करू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने निर्णयात बदल केला असून आता युरिया खरेदीसाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांनाच खताचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.अकोला जिल्ह्यासाठी एकूण 7 हजार 101 मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध होणार असून, अकोट शहरात आज 818 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच सातबारा अनिवार्य केल्यानंतर कृषी सेवा केंद्रांवरील गर्दीही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.अकोट तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया आणि डीएपी खतांची मागणी वाढली होती. पुरवठा कमी पडत असल्याने कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने टोकन पद्धत सुरू केली.मात्र केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप केल्यास गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आधार कार्डसोबत सातबारा उतारा बंधनकारक करण्यात आला.आज अकोट शहरात 818 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाल्याने खत उपलब्धतेची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. तसेच नवीन नियम लागू झाल्यानंतर कृषी केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. Final Vo : सातबारा अनिवार्य केल्याने युरियाच्या वितरणात पारदर्शकता वाढणार असून साठेबाजीक आणि काळाबाजाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
जालना में पूर्व सरपंच पर 17 वर्षीय के दुष्कर्म का मामला दर्ज
Jalna, Maharashtra:जालना | माजी सरपंचाचा एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nजालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल\nनवनाथ सोपान आयंदे असं संशयित आरोपीचं नाव\nअँकर- जालना जिल्ह्यातल्या एका गावात माजी सरपंचाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीये.. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादेवरून जिल्ह्यातल्या आष्टी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.. नवनाथ आयंदे असं संशयित आरोपीचे नाव आहे.. पीडित मुलीचे वडील आरोपीचे मित्र आहेत.. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने मुलीला पैशांचे अमिष दाखवून अत्याचार केला. पीडितेचे 12 वीचे शिक्षण पूर्ण झाले असून ती पालकांना शेती कामात मदत करत असे. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा मित्र असल्याने शेतात आणि घरी येणे-जाणे होते. चार महिन्यांपूर्वी पीडिता शेतात काम करत असताना आरोपीने शरिरसुखाची मागणी केली. तरुणीने वारंवार नकार दिला. तरिही आरोपीने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी तिला रुग्णालया नेले असता पीडित चार महिन्यांची गरोदर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.0
0
Report
Advertisement
पंढरपूर में अन्नत्याग आंदोलन: प्रशासन के विरोध के बाद विपक्षी दल की तैयारी
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर में आमदार रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर प्रशासन ने अनुमति न देने के बावजूद राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष के पदाधिकारियों की छत्रपति शिवाजी महाराज चौक में आंदोलन की तैयारी शुरू हो गई है. कर्जमाफी योजना में किसानों पर लगाई गई जाचक अटी रद्द करने के लिए हम शांतिपूर्ण तरीके से खुद को क्लेश देकर अन्नत्याग आंदोलन कर रहे हैं, पर प्रशासन किसी भी कारण से इन आंदोलनों को अनुमति नहीं दे रहा है. यह गलत है—राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारियों ने यह भावना व्यक्त की है.0
0
Report
मिरा भाईंदर: शिवाजी महाराज के पुतले के पास खुलेआम दारू, संदीप राणे ने कड़ी चपत दी
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांना भरचौकात मनसे शहर अध्यक्ष संदीप राणेने दिला चोप. काशिमिरा नाका परिसरात उघड्यावर मद्यपान करून महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला होता. मनसे कडून बॅनर लावण्यात आला आहे कीं दारू पिणाऱ्या बेवड्यानो सावधान इथे दारू पियाल्यास चांगलाच चोप दिला जाईल. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे आणि कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेत तळीरामांना चांगलाच चोप दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या pुतळ्याच्या परिसरात दारू पिऊन पावित्र्य भंग करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा सज्जड दम मनसेने दिला.0
0
Report
एकबुर्जी पर्यटन स्थल की हालत सुधारने की मांग तेज़
Washim, Maharashtra:वाशीम शहरालगत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची सध्या दयनीय अवस्था झाली असून पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने येथे गार्डन, लहान मुलांसाठी खेळण्यांची सुविधा तसेच बोटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष झाल्याने ते धूळखात पडले आहे. पावसाळ्यात एकबुर्जी प्रकल्पावरील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र लगतचे पर्यटन स्थळ बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे पर्यटन स्थळ तातडीने सुरू करून आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी जोर धरू लागली आहे.0
0
Report
Advertisement
पोल्ट्री फार्म में नाग ने चूजे खाये, मौके पर रेस्क्यू के बाद सुरक्षित बचाव
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये नागाने अचानक शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली खाद्याच्या शोधात आलेल्या नागाने कोंबड्यांच्या तीन ते चार पिल्लांना फस्त केल्याची घटना घडली यावेळी शेकडो पिल्लांमध्ये मुक्तपणे फिरणारा नाग पाहून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कोंबडीचे पिल्ले पचवण्यासाठी नागाने पोल्ट्रीमध्ये असलेल्या लोखंडी गल्डरला घट्ट विळखा घालून बसलेलो होता याची माहिती सर्पमित्राला मिळतात त्या ठिकाणी येऊन सर्पमित्राने यशस्वीरित्या या विषारी नागाचे रेस्क्यू केले पोल्ट्री फार्ममध्ये अशा प्रकारे नागाचा प्रवेश होत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे0
0
Report
शिर्डी साई संस्थान नियुक्ति पर बहस, कुंभ तैयारी पर असर
Shirdi, Maharashtra:देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान शिर्डीचे साईबाबा..राज्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या या देवस्थानला गेल्या सात वर्षांपासून विश्वस्त मंडळ नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असलेली त्रिसदस्यीय समिती विश्वस्त मंडळाचा कारभार पाहत आहे. मात्र अनेकदा मोठे धोरणात्मक निर्णय घेताना न्यायालयाच्या परवानगीची गरज असल्याने अनेक निर्णय प्रलंबित आहे. त्यातच आगामी कुंभमेळा लक्षात घेता विश्वस्त मंडळ लवकर यावे अशी अपेक्षा आजी-माजी खासदारांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलीय... जगाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या देवस्थानलाच विश्वस्त मंडळासाठी गेल्या सात वर्षांपासून सबुरी ठेवण्याची वेळ आलीये. गेल्या सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाचा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू आहे. राज्यात महायुती सरकार आल्यावर विश्वस्त मंडळ येईल अशी अपेक्षा होती मात्र अद्याप विश्वस्त मंडळ घोषणेला मुहूर्त मिळालेला नाही. अनेक मोठे निर्णय घेताना न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत... त्यातच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता व नियोजनासाठी विश्वस्त मंडळ असणे गरजेचे असल्याचे मत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केलं... बाईट - भाऊसाहेब वाकचौरे , खासदार शिर्डी V/O - विश्वस्त मंडळ याव ही शिर्डी ग्रामस्थांची आधीपासूनच मागणी आहे.मात्र मुख्यमंत्री लवकरच काम करणारे विश्वस्त मंडळ देईल असा मला विश्वास असल्याचे सांगताना सुजय विखे यांनी कोणतीही निवड करायची वेळ आली کی माझं नाव चर्चेत येतं.. कृपा करून माझं नाव चर्चेत आणू नका हे स्पष्ट केले.. तर पद्मभूषण, विभूषण सह अभ्यासू व्यक्तींना विश्वसमंडळात स्थान दिले पहिजे अशी मागणी सुजय विखे यांनी केली... बाईट - सुजय विखे, माजी खासदार, अहिल्यानगर V/O - साईबाबा संस्थान हे केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नसून देशातील सर्वात महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक शिर्डीत दाखल होत असताना संस्थानच्या कारभारासाठी सक्षम आणि निर्णयक्षम विश्वस्त मंडळ असणं गरजेचं मानलं जात आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी भाविकांची संख्या, पायाभूत सुविधा, नियोजन आणि विविध विकासकामांसाठी प्रलंबित निर्णय तातडीने घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून रखडलेली विश्वस्त मंडळाची नियुक्ती आता तरी होणार का, याकडे साईभक्तांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर0
0
Report
नांदेड़ के सोनखेड पेट्रोल पंप पर हत्या, सीसीटीवी से आरोपी की तलाश
Nanded-Waghala, Maharashtra:भरदिवसा पेट्रोल पंपावर एकाचा खूण करण्यात आला. नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथे ही घटना घडली. नांदेड शहरातील पिरबुर्हान नगर येथील राहीवाशी साजिद अली हे प्लंबरचे काम करत होते. पेट्रोल पंपावर पाईपने पाणी मारण्याच काम साजीद अली करत होते. पेट्रोल पंपावर आलेल्या दोघानी साजीद अली याच्यासोबत वाद घातला. दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लोखंडी रॉडने साजिद अली याच्या डोक्यावर वार करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोनखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु आहे. खुनाचे कारण अजुन स्पष्ट झाले नाही.0
0
Report
Advertisement
