icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ में पुल ऊँचाई से मार्ग जाम, ग्रामवासियों ने ऊँचाई बढ़ाने की मांग

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरील कमी उंचीच्या पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पावसामुळे पिपळगाव–आसेगाव देवी मार्ग बंद झाला. पुलावरून पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू झाल्याने, मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. पुलाची उंची कमी असल्याने पाणी थेट पुलावरून वाहू लागले. तसेच पुलाखाली झाडांच्या फांद्या व इतर कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा मंदावून परिस्थिती अधिक गंभीर झाली. दरम्यान, काही नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पुलाखाली अडकलेला कचरा तातडीने हटविण्याची तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, खोलीकरण करावे व पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
0
0
Report

नीट-टीईटी पेपर फूटे आरोप: मंत्री-सहमती का दावा, सोलापुर میں काँग्रेस मशाल मोर्चा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नीट-टीईटी पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार हा मंत्रालयातच, सर्व प्रकार मंत्र्यांच्या सहमतीनेच होत असल्याचा काँग्रेस खा. प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप - नीट आणि टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसने काढला मशाल मोर्चा - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा परिसर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन - नीट किंवा टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार मंत्रालयात बसलाय खा. प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप - या मागचा कटकारस्थान करणारा मजेत फिरतोय - हे सर्व मंत्रालयातून,गव्हर्मेंटकडून मंत्र्यांच्या सहमतीने होत असल्याचा खा. प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
0
0
Report
Advertisement

ठाणे TDCC बैंक चुनाव: किसन कथोरे के सहकार पैनल ने 17 सीटों पर जोरदार जीत

Ambernath, Maharashtra:ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या 'सहकार पॅनेल'ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत कथोरे यांच्या पॅनेलने २१ पैकी तब्बल १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालानंतर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खासदार कपिल पाटील यांच्या गटाला हा अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. बदलापूरात विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या जल्लोष केला, या वेळी समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरवून हा मोठा विजय साजरा केला. ठाणे जिल्हा बँकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी द्वै पक्षांमध्ये मोठी प्रतिष्ठा लागली होती. आमदार किसन कथोरे आणि खासदार कपिल पाटील यांच्यातील राजकीय मतभेद या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते; मात्र आज जाहीर झालेल्या निकालांनी सर्व चित्र स्पष्ट केले. कथोरे यांच्या रणनीतीपुढे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले असून, २१ पैकी १७ जागा जिंकत त्यांनी बँकेवरील आपली पकड मजबूत केली आहे.
0
0
Report

समृद्धि एक्सप्रेसवे पर भीषण दुर्घटना: चंद्रपुर के एक परिवार के 5 की मौत

Chandrapur, Maharashtra:समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या बाबुपेठ भागातील ५ जणांचं एक कुटुंबच संपले. चंद्रपूर वरून अकोलाकडे चारचाकी वाहनाने अमरावतीच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ५ जण जागीच ठार झाले. मृतकांमध्ये ६५ वर्षीय महादेव जिवाजी जीवने, ६० वर्षीय लताबाई महादेव जीवने, ४३ वर्षीय भास्कर महादेव जीवने, ४१ वर्षीय आरती भास्कर जीवने आणि १२ वर्षीय जीज्ञा भास्कर जीवने यांचा समावेश आहे. जीवने कुटुंब अकोला च्या दिशेने समृद्धी महामार्गावरून जात होते, धामणगाव रेल्वेजवळील चॅनेल क्रमांक १०५ जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा था. इतक्यात जीवने कुटुंबाचे चारचाकी वाहन त्या लेनवर आली. मात्र चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरला जाऊन धडकली. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस व महामार्ग पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. कार मधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताचे वृत्त बाबुपेठ परिसरात पोहोचल्यावर परिसरात शोककळा पसरली. भास्कर जीवने सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीत मायनिंग अभियंता होते त्यांनी १५ दिवसांपूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला होता. सोबतच त्यांची पत्नी आरती शासकीय नोकरीवर असून त्यांच्या बदली अकोला जिल्हा परिषदेत झाली होती. तिथला पदभार घेण्यासाठी कुटुंब अकोला येथे निघाले होते. मात्र वाटेतच कुटुंबावर काळाने घाला घातला.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई के होटेलों में खाद्य सुरक्षा नियम कड़ाई से पालन के निर्देश जारी

Navi Mumbai, Maharashtra:Anchor - अन्न व औषध प्रशासनाने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये बैठक घेऊन, नवी मुंबईतील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायिकांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेलची स्वयंपाकघरे, अन्न साठवणूक, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित हॉटेल किंवा आस्थापने विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय.
0
0
Report

नवी मुंबई एयरपोर्ट के नाम DB पाटील रखने की मांग पर भारी प्रदर्शन

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावंयासाठी प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे. येत्या 7 जुलै रोजी हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार असून विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. पनवेल मधील चिंचपाडा ते विधिमंडळ पायी पदयात्रा काढत विधिमंडळाला घेराव घालून प्रकल्पग्रस्त विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणार आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करत मोठ्या संख्येने या आंदोलनात प्रकल्पग्रस्थान्नी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी प्रकल्पग्रस्थान्नी आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आलेय.
0
0
Report

पुणे-अहिल्यानगर महामार्ग पर भारी बरसात, पानी भरा, यातायात बाधित

Shirur, Maharashtra:मुसळधार पावसाचा मोठा फटका पुणे-अहिल्यानगर महामार्गाला बसला आहे. कारेगाव परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडालीये. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहात असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. या पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के पडोली में 5 वर्षीय बच्ची के साथ बलात्कार का प्रयास; आरोपी पूर्व विधायक गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरालगतच्या पडोली पोलीस ठाणे हद्दीत चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, शेजारी राहणारी 5 वर्षीय चिमुकली घरल्यावर तिला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या सदनिकेत अत्याचाराचा केला प्रयत्न. सोबत असलेल्या वयाने मोठ्या बहिणीने पळ काढत ही घटना कुटुंबियांना सांगितली. यानंतर परिसरातील नागरिकांनी धिटाईने पोलिसांना माहिती दिली. यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बल्लारपूर क्षेत्राचा माजी विधानसभा प्रमुख असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य बघता तातडीने कारवाई करत आरोपी ओंकार गेडाम (64) याला ताब्यात घेतले. पोलिसांची गुन्हे अन्वेषण पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पडोली पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
0
0
Report

चाकण में भारी बारिश से पुणे-नाशिक हाईवे डूबा, यातायात बेहाल

Shirur, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावर चाकण शहराला पावसाने जोरदार झोडपले असून, या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक हायवे पूर्णपणे जलमय झाला आहे. रस्त्यावरील गटारी पुन्हा एकदा तुंबल्याने पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर आले आहे, ज्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून, हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यांचे या पावसाने पुरते वाभाडे काढले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच मोठ्या पावसात चाकणकरांना जलमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के मोरया ज्वेलर्स में चोरी: सीसीटीवी से पकड़ी गई महिला

Nashik, Maharashtra:सोन्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून हात सफाईने चोरी करणारे एका महिलांना अंबड पोलिसांनी अटक केलीये... ही घटना नाशिकच्या छत्रपती शिवाजी चौक जुने सिडको येथील मोरया ज्वेलर्स या दुकानांमध्ये घडलीये.. चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे...सदर महिला दागिने घेण्यासाठी या दुकानात आली होती... सेल्समनचे लक्ष विचलित करून या महिलेने या दुकानातील तीन अंगठ्या चोरी केल्या होत्या.. मात्र सीसीटीव्ही फुटेज मुळे ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे सदर महिलेला कोणी ओळखत असेल व याआधी असा चोरीचा प्रकार कुठे घडला असेल तर त्यांनी अंबड पोलीस स्टेशन नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी करण्यात आले आहे。
0
0
Report

डोंबिवली कॉलेज पास ट्रैफिक चेक के दौरान चालक ने पुलिसकर्मी से मारपीट, वीडियो वायरल

Kalyan, Maharashtra:डोंबिवली पेंढारकर कॉलेज परिसरात भर रस्त्यात राडा वाहतूक तपासणीसाठी गाडी थांबवल्याने चालकाचा संताप अनावर आपल्या साथीदारासोबत मिळून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि भर रस्त्यात मारहाण करत मोबाईल हिसकावला मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांसमोरही आरोपींची हुज्जत .. यानंतर संतप्त जमाव आणि वाहतूक पोलिसांनी आरोपींना चोप देत शिकवला धडा ..संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मानपाडा पोलिस ठाण्यात वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ , मारहाण सह इतर कलम अंतर्गत गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू
0
0
Report

सोशल मीडिया पोस्ट के कारण मदापूर ग्राम में तनाव, घायल, सीसीटीवी से आरोपियों की तलाश

Shirdi, Maharashtra:Anc - राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सोशल मीडियावरील एका पोस्टच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आलीय.. या वादातून एका तरुणाला अडवून मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी संबंधिताच्या मोबाईल दुकानात घुसून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय..या घटनेनंतर गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज ममदापूर गाव बंद ठेवत मारहाणीच्या‌ घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय...या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल असून CCTV च्या आधारे आरोपींचा‌ शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top