416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रायगढ़ के 28 डैमों में जल भंडार 18.82% तक पहुंचा, किसानों को राहत
Chendhare, Maharashtra:स्लग - जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ...... दोन दिवसात साठा १८.८२ टक्क्यांवर ....... शेतकरी , नागरिकांना मोठा दिलासा ...... अँकर - रायगड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील २८ धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण साठा १८.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात हा साठा सुमारे १३ टक्के होता. वावे धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून सुतारवाडी, आंबेघर, भिलवले आणि मोरबे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या जलसाठ्यामुळे पिण्याचे पाणी व भातशेतीबाबत दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने sाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.0
0
Report
रेलवे ट्रैक टूटने से मध्य रेलवे बाधित, कई लोकल ट्रेनें धीमी गति से चल रहीं
Kalyan, Maharashtra:रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत कल्याण स्थानक के पास रेल्वे रुळाला तडा गेलाय. त्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे .अनेक लोकल गाड्या यामुळे धीम्या गतीने धावत आहेत. विशेष करून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झालाय. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून पुढे चालायला सुरुवात केली. सध्या रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलंय.0
0
Report
वाशिम में खरीफ पेराई गति पकड़, पिछले तीन दिनों की बरसात से किसान खुश
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाला वेग आला आहे.शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणी सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सोयाबीन,तूर,मूग आणि उडीद या पिकांची पेरणी सुरू असून,अनेक ठिकाणी ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी केली जात असून कपाशीची लागवड केली जातं आहे.जूनच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते.मात्र,मागील तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे शेतकरीांना मोठा दिलासा मिळाला असून,पुढील काही दिवसांत उर्वरित क्षेत्रातील पेरणीही पूर्ण होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में दो नक्षत्रों के चलते गधों के लग्न की खबर चर्चा में
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात दोन नक्षत्रे कोरडी केल्याने बळीराजा चिंतेत, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी लावण्यात आले गाढवाचे लग्न - संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन नक्षत्रे कोरडी गेल्याने बळीराजा प्रचंड चिंतेत - वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पापरी गावामध्ये लावण्यात आले गाढवाचे लग्न - एक नर आणि एक मादी अशी दोन गाढव निवडत त्यांना स्वच्छ धुऊन वधू-वरासारखे सजवून गावातून काढण्यात आली मिरवणूक - पापरी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात मिरवणुकीत संपूर्ण गावकरी सहभागी - अंतर पाठ धरून अक्षता टाकत लग्न लावल्यानंतर गावकऱ्यांसाठी साबुदाण्याचा आखण्यात आला बेत - वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी लावण्यात आलेले गाढवाचे लग्न संपूर्ण जिल्ह्यात ठरला चर्चेचा विषय0
0
Report
शिंदे ने विमुक्त समुदाय के सशक्तिकरण हेतु संजय राठोड की नियुक्ति की
Yavatmal, Maharashtra:शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या या नेमणुकीतून देशातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याच्या व्यापक दृष्टीकोन दिसून येत आहे. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. या समाजांना एकत्रित नेतृत्व आणि सक्षम संघटन देण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी शिवसेनेने सोपविली आहे.0
0
Report
खुराणा ट्रैवल्स की बस रेलवे पुल के पास दुर्घटनाग्रस्त, चालक समेत तीन यात्री गंभीर घायल
Washim, Maharashtra:वाशिम शहराजवळील रेल्वे उड्डाण पुलानजीक आज सकाळी खुराणा ट्रॅवल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. कारंजावरून वाशिमकडे येत असताना भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला जात चिकन,मटण व पानपट्टीच्या टिनपत्र्यांच्या दुकानांचा चुराडा केला. अपघातात दुकानांतील लोखंडी रॉड आणि लाकडी बल्ल्या बसच्या चालक केबिनमध्ये घुसल्याने चालकासह केबिनमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना वशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानाही या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
पहली बरसात में येवला की सड़कों पर जलजमाव, गड्ढे दिखे, मरम्मत पर सवाल
Yeola, Maharashtra:यंदाच्या पहिल्याच पावसामुळे येवला शहरातील शनि पटांगण परिसरात रस्त्यांवर व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे अलीकडेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवरही पाणी साचल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, विंचूर चौफुली येथे शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून एका ठिकाणी मोठा खड्डा असल्याने पाण्याखाली खड्डा दिसत नसल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
अंगणवाड़ी जाने से इनकार पर मां ने बेटी को लाठी से मारा; वीडियो वायरल
Navi Mumbai, Maharashtra:अंगणवाड़ी जाने से इनकार करने पर पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे राहणाऱ्या एका महिलेच्या चिमुकलीला अंगेणवाडीत जावले न जावले म्हणून तिची लाथ मारण्यात आली, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई-बाबत संताप व्यक्त केला जातो आहे.0
0
Report
पुणे-इंदोर हाईवे पर ट्रक पलटने से चालक घायल, यातायात घंटों के लिए प्रभावित
Yeola, Maharashtra:पुणे-इंदोर महामार्गावरील येवल्याच्या बाभुळगाव शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली असून या अपघातात चालक जखमी झाला आहेत. चेन्नईच्या दिशेने जाणारा हा ट्रक अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने ट्रक बाजूला करण्याचे काम हाती घेतले. अखेर ट्रक हटविण्यात यश आले असून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
यवला के घरकुल मामले की गहन जांच की मांग, वरिष्ठ नागरिक अनशन पर
Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील सायगाव येथील घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत ज्येष्ठ नागरिक सुधाकर कारभारी पठारे यांनी येवला पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड, पात्रता पडताळणी, मंजुरी प्रक्रिया, तांत्रिक तपासणी तसेच निधी वितरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वरूड तालुक्यात जोरदार पाऊस, खरीफ के लिए बुवाई शुरू
Amravati, Maharashtra:सलग तीन दिवस वरूड तालुक्यात दमदार पाऊस; पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात, शेतकरी सुखावला गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता शेतात मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. दमदार पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने सरी वरंबा पारंपरिक पद्धतीवर पेरणीला सुरुवात झाली आहे. सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास पाण्याचा योग्य निचरा होऊन पिकांची वाढ चांगली होते. त्यामुळे अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करत आहेत. पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतीची कामे जोमात सुरू झाली आहेत.0
0
Report
अहिल्यानगर में मोहरम मिरवणुकी रात बारह बजे से शुरू, कड़े सुरक्षा बंदोबस्त
Ahilyanagar, Maharashtra:देशभरात प्रसिध्द असलेल्या अहिल्यानगरच्या मोहरम मिरवणुकीला रात्री 12 वाजता कोठला परिसरातून सुरुवात झाली आहे. छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारम्भ झाला. पारंपारिक पद्धतीने रात्री काढण्यात आलेली कत्तलची रात्र मिरवणूक शांततेत सुरू झाली असून या मिरवणुकी त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत रात्री मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी निघाल्यानंतर दोन्ही सवारींच्या मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून सुरुवात झाली. दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, पंचपीर चावडी, बांबू गल्ली, रामचंद्र खुंट, इदगाह मैदान मार्गे कोठला येथे सकाळी 11 वाजेपर्यंत पर्यंत या दोन्ही सावरी परत आपल्या जागेवर बसविण्यात येते तसेच आज दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा या दोन्ही सवारींच्या मिरवणुकीला सुरुवात होते. मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, सतरा पोलीस निरीक्षक, 46 अधिकारी, 650 अंमलदार, दोन एसआरपीएक आणि तीन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात असणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलीये0
0
Report
Advertisement
वाशीम कृषि उत्पादक बाजार समिति में काली हल्दी के दाम फिर उछले, प्रतिक्विंटल 22 हजार रुपये
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळी हळद अर्थात कोच्या या नगदी पिकाच्या दरात काही दिवसांपूर्वी मोठी घसरण झाली होती.मात्र आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून,काळ्या हळदीच्या दरात पुन्हा सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.ताज्या लिलावात काळ्या हळदीला प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा भाव मिळाला. औषधी गुणधर्मांमुळे काळ्या हळदीला बाजारात विशेष मागणी असते.मात्र गेल्या काही दिवसांत बाजारात आवक वाढल्याने आणि मागणी तुलनेने कमी राहिल्याने दरात घसरण झाली होती.आता पुन्हा मागणीत सुधारणा झाल्याने भावात वाढ झाली असून, त्यामुळे काळ्या हळदीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.0
0
Report
आकोला के गायगांव में नकली आधारकार्ड से जमीन बिक्री, दो गिरफ्तार
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील गायगाव येथे मूळ शेतकऱ्याच्या नावाने बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करून लाखो रुपयांची शेती विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आधार कार्डवरील बायोमेट्रिक, वय आणि सह्यांमध्ये स्पष्ट तफावत असतानाही व्यवहाराची नोंद झाल्याने संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... जमिनीच्या खरेदी-विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी शासनाने अनेक नियम आणि डिजिटल पडताळणीची व्यवस्था केली आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील गायगाव येथे हे सर्व नियम धाब्यावर बसवून मूळ शेतकरी अरविंद देठे यांच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले. त्याच आधारावर जमीन विक्रीचा व्यवहारही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या व्यवहारात संबंधित व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आधार नोंदींशी जुळत नव्हते, कागदपत्रांमध्ये वयात तफावत होती आणि प्रत्येक पानावरील सह्याही वेगवेगळ्या होत्या. एवढ्या गंभीर त्रुटी असतानाही व्यवहाराची नोंद कशी झाली, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत हा प्रकार लक्षात आल्यामुळे अरविंद देठे यांच्या जमीन वाचली. अन्यथा स्वतःच्या मालकीची जमीन परत मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली असती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अरविंद देठे, मूळ शेतमालक. सुमारे दोन एकर शेती अवघ्या वीस लाख रुपयांत विकण्याचा व्यवहार ठरविण्यात आला होता. त्यापैकी सहा लाख रुपये टोकन म्हणून देण्यात आले होते. त्यानंतर पाच लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपींनी ठरावीक दिवस आणि ठिकाण निश्चित केले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दोघांना रंगेहात ताब्यात घेतले.या कारवाईनंतर या प्रकरणामागे बनावट कागदपत्रे तयार करणारे आणि जमीन व्यवहारात फसवणूक करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. महसूल विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या आठवणीने अशाप्रकारे याआधीही कुणाला अशाप्रकारे गैरव्यवहार करून जमिनी विकल्या आहेत का ? असा संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. अनिल जुमळे, पोलीस निरीक्षक. बनावट आधारकार्ड, न जुळणारे फिंगरप्रिंट्स, चुकीचे वय आणि प्रत्येक पानावर वेगवेगळ्या सह्या... एवढ्या स्पष्ट विसंगती असतानाही जमीन व्यवहाराला मंजुरी कशी मिळाली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून बनावट कागदपत्रे तयार करणारे, त्यांचा वापर करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
नागपुर में स्मार्ट मीटर विरोध प्रदर्शन: नागरिक मोर्चा में कांग्रेस नेता भी शामिल
Nagpur, Maharashtra:स्मार्ट मीटर विरोधात नागपुरात नागरिक संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. काटोल रोडवरील विद्युत भवनावर हा मोर्चा काढण्यात आला होता. घरांमध्ये बसविण्यात आलेल्या विद्यमान मीटर च्या जागी नागरिकांच्या संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णयावरचा तीव्र विरोध आंदोलकांनी केला. स्मार्ट र मीटर हे जनविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मोर्चात काँग्रेस सह विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ता सहभागी झाले होते0
0
Report
Advertisement
