416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ भूसंपादन घोटाले: अविनाश पाठक की गिरफ्तारी से हड़कंप
Beed, Maharashtra:पोलिसांच्या तावडीत असलेल्या या व्यक्तीचा हा चेहरा नीट निरखून पहा... व्हिडिओतील हा अधिकारी कदाचित तुमच्या ओळखीचा असेल.. एकेकाळी बीड जिल्ह्याचा कारभार हाताळणारे, अधिकाराच्या खुर्चीतून संपूर्ण यंत्रणा चालवणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आजच नामाच्या आधारावर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपात गैरव्यवहार झाल्याचा संशय नव्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला आणि प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एसआयटी स्थापन झाली आणि तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. अखेर अधिकाराच्या शिखरावर पोहोचलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला काल लातूर येथील निवासस्थानातून पोलिसांनी अटक केली या घटनेमुळे सबंध राज्यभरात एकच खळबळ उडाली.. तत्पश्चात नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले विवेक जॉन्सन यांना भूसंपादनातील घोटाळ्याची फाईल हाती लागली. त्यांनी याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या बनावट सयाच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मावेजात मोठा घोटाळा झाल्याचे लक्षात आणले आणि त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे देखील योगदान असल्याचा दावा करण्यात आला. आता एसआयटीच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे... भूसंपादनाच्या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार, बनावट स्वाक्षऱ्या, तसेच जमिनींच्या मोबदल्याच्या रकमेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय... तर भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक हाच आरोपी झाल्याने आता त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मनसेनी केलीय. काही प्रकरणांमध्ये मूळ शेतकऱ्यांना कमी रक्कम देऊन इतरांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा मावेजा वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागत आहे... दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेनंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय... राज्यभरातील विविध महामार्ग भूसंपादन प्रकरणांकडे आता संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असून, अनेक जिल्ह्यांतील जुन्या फाईल्सची पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे..0
0
Report
नाशिक धर्मांतरण मामले में निदा खान को मदद, इम्तियाज जलील की भूमिका प्रमुख
Sangli, Maharashtra:नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणी अटक केलेल्या निदा खान हिला मदत करण्यात इम्तियाज जालील यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.निदा खान ही संभाजीनगर मध्ये सापडणं यामागे खूप मोठे षडयंत्र असून याप्रकरणी इमत्याज जलिल व एमआयएम नगरसेवकाची,पोलिसांनी चौकशी करावी,अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे,ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते.0
0
Report
बीएमसी प्रमुख अस्पतालों के हाउसकीपिंग टेंडर में 45 करोड़ रुपये के घोटाले का आरोप
Mumbai, Maharashtra:बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयांतील हाऊसकीपिंग टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रमुख महापालिका रुग्णालयांतील हाऊसकीपिंग कंत्राटांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बीएमसीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून, निविदा प्रक्रियेत संगनमत करून फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजуриसाठी ठेवला जाणार आहे. अंदाजित खर्चापेक्षा २०% पेक्षा कमी दराने कोट करण्यात आले आहे. आमदार कोटेचा यांनी असाही दावा केला की, कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च शून्य दाखवून कामगारांच्या आरोग्याशी तडजोड केली असून कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. तसेच, कंत्राटदाराने स्थायी समितीची मंजুরি मिळण्यापूर्वीच KEM रुग्णालयात शेकडो कामगार तैनात केल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईचा महापौर भाजपचा असताना भाजप आमदारानेच स्वतः च्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.0
0
Report
Advertisement
कान बहरेपन के बावजूद शांभवी पंचबुद्धे ने दहावी में 94.2% हासिल किया
Nagpur, Maharashtra:नागपूराच्या शांभवी पंचब्ध्दे या 100% ऐकू न येणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीत 94.2% गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे... महत्त्वाचं म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकून दहावीच्या परीक्षेत तिने 94.2% गुण मिळवलेय... शिवाय परीक्षे दरम्यान लेखणीकही घेतली नव्हती.. शांभवी पाचव्या वर्गात असताना तिला मोठ्या प्रमाणावर कफ झाले.. आणि हळूहळू तिची ऐकण्याची शक्ती कमी होत गेली... ती सातव्या वर्गात पोहोचेपर्यंत ऐकण्याची शक्ती पूर्णपणे नाहीशी झाली... मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेतला... सोमलवार शाळेने सुद्धा साथ दिली... शांभवीला ऐकू येत नाही म्हणून फक्त तिला पहिल्या बाकावर बसण्याची सूट देण्यात आली.. शिक्षकांनी शिकवताना केलेला लीप मुव्हमेंट ती आत्मसात करायची आणि शिक्षक इतर विद्यार्थ्यांना काय सांगत आहे हे लीप रीडिंग च्या माध्यमातून समजून घ्यायची... ऐकण्यासंदर्भातल्या व्याधीमुळे बोर्डाच्या नियमाप्रमाणे शांभवीला राईटर मिळू शकत होता, मात्र शांभवी ने स्वतःच पेपर लिहिण्याचा निर्णय घेतला... आणि दहावीच्या परीक्षेत 94.2% अंक मिळवत घवघवीत यश मिळवले* आहे... शांभवी चे वडील आणि शिक्षिकेशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी...0
0
Report
पनवेल पुलिस ने करंजाडे रेलवे प्रोजेक्ट से 1.5 करोड़ रुपये के स्टील चोरी के तीनों को गिरफ्तार किया
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल पोलिसांनी करंजाडे येथील रेल्वे प्रकल्पातून 1.5 कोटी रुपयांचे स्टील चोरी केल्याप्रकरणी तिघांना अटक केली असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करंजाडे येथील सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे दीड कोटी रुपयांचे 67 टन स्टील चोरीला गेले होते. तपासादरम्यान हायड्रा क्रेनच्या सहाय्याने स्टील उचलून वाहतूक केल्याचे उघड झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने क्रेनच्या हालचालींचा माग काढत चालकाची चौकशी केली असता चोरीचा माल धानसर परिसरात ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून सर्व स्टील जप्त केले. चोरी केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी साइट मॅनेजर विजयकुमार वर्मा, स्क्रॅप व्यावसायिक अजीजुल रहमान आणि मजूर परवेज आलाव यांना अटक केलेय.0
0
Report
घर की मुश्किलों के बावजूद स्वरा खातू दहावी में 98.20% से टॉप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिद्द और मेहनतीचे 'स्वरा'क्षर!.. घरची परिस्थिती बेताची, तरीही क्लासेसशिवाय स्वरा खातूची दहावीत उत्तुंग भरारी.. अँकर जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. रत्नागिरीच्या चिपळूणच्या सावर्डे मध्ये एका सामान्य कुटुंबातील कन्येने यशाचं असं शिखर गाठलंय, ज्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. कोणतंही महागडं ट्युशन नाही की अवाढव्य फी... तरीही दहावीच्या निकालात या मुलीने बाजी मारली आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा महेश खातू हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वराचे वडील महेश खातू हे व्यवसायाने पेंटर आहेत. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, मात्र स्वराने आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे, आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे विद्यार्थी हजारो रुपयांचे खाजगी क्लासेस लावतात, तिथे स्वराने एकही जादा क्लास न लावता केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनावर हे यश संपादन केले आहे. स्वराच्या या यशामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "पेंटरच्या मुलीने यशाचे रंग उधळले" अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. रत्नागिरीच्या या लेकीने आपल्या कष्टाने हे सिद्ध केलंय की, यश सोयीसुविधांवर नाही तर केवळ आत्मविश्वासावर अवलंबून असतं..0
0
Report
Advertisement
अकोला के भारत विद्यालय ने दहावी में 100% परिणाम, खुशी का माहौल
Akola, Maharashtra:Anchor : राज्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अकोल्यातील भारत विद्यालयानेही यंदा शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत यशाचा झेंडा फडकावला आहे. निकाल जाहीर झाल्या शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींसह शिक्षकांनीही आनंद साजरा करत ठेका धरला. अकोल्यातील भारत विद्यालयातील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवणाऱ्या भारत विद्यालयाच्या यशामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.0
0
Report
नागपुर के युवाओं में एलएसडी ड्रग्स का डर बढ़ा, पुलिस ने कड़ा कदम उठाया
Nagpur, Maharashtra:नागपुरात तरुणाईला 'एलएसडी' ड्रग्जचा धोका वाढतोय ...ब्रेन स्टीम्युलेट आणि फोकस वाढत असल्याच्या चुकीच्या धारणाेंतून तरुणाई या टिकळ्या ड्रग्सकडे वळताना दिसत आहे...... नागपूर पोलिसांनी या धोकादायक ड्रग्स पासून तरुणाईला रोखण्यासाठी शाळा महावিদ्यालयांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे आणि महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.. नागपूर शहर पोलिसांनी गेल्याच महिन्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एलएसडी ड्रग्जसह अटक केली होती. स्टिकर फॉरमॅट असलेल हे ड्रग्स बाळगणाऱ्यावर शहरात झालेली प्रथम कारवाई होती.. याप्रकरणी सखोल पोलिसांनी सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे येतेय .. एलएसडीमधील घातक नशा मेंदूवर थेट परिणाम करतो . आकाराने अतिशय छोटा असल्याने एलएसडी ड्रग्ज सहज लपवता येते. बाईट रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त (हा पॉईंटर बाईट वापरावा ) --- युवा मंडळी मुले किंवा मुली आम्हाला दिसताय -- हे drugs घेतल्याने मुलांना काही वेळासाठी आपण अधिक awake असल्याच वाटतं -- कॉन्सन्ट्रेशन वाढतं.. हे ड्रग्स मेंदूला सस्टीम्युलेट करते.... मेडिकल purpose करता करतो.. मात्र त्याचा harmful आहे -- ब्रेन damage होतो --जास्त फोकस होतो हीं चूकीची धारणा आहे -- काही मुलांना असं वाटतं है की हे ड्रग्स सेवन केल्यानंतर काही तासांसाठी अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन वाढते. काही तास अजिबात झोप येत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहतो अश्या प्रकारची खोटी माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरवली जातं आहे. यासंदर्भात पोलिसांनी मानसोपचार तज्ञांची मते जाणून घेतली त्यावेळी त्यांनी सुद्धा हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत नोंदवलले आहे या उलट एलएसडी ड्रग्सचा उपयोग शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो, ---एलएसडी ड्रग्ज चा वापर विद्यार्थीांमध्ये, तरुणाईमध्ये वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांना सूचना केलेल्या आहेत की विद्यार्थ्यांच्या वागण्या, बोलण्यात जर काही फरक जाणवत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा असे आवाहन केलेयं बाईट- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त vo2 --= LSD ड्रग्स सेवन करण्याची अतिशय वेगळी पद्धत दिसून आली आहे. स्टिकर स्वरूपातील एलएसडी ड्रग्स तस्करी केली जात आहे. ते स्टिकर जिभेवर ती ठेवल्याचेनंतर काही वेळानंतर हळूहळू शरीरात त्याचा प्रभाव दिसतो. इतर ड्रग्सच्या तुलनेत या एलएसडी ड्रग्स चा प्रभाव अधिक वेळ राहत असल्याने तरुणांमध्ये त्याचे चलन वाढण्याचा धोका आहे बाईट- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त Final Vo -- कॉलेज युवकांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. पोलिस आता एलएसडी ड्रग्स कुठून आले व कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. झी २४ ताससाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर0
0
Report
नवी मुंबई के पाम बीच मार्ग ड्रिंक एंड ड्राइव से दुर्घटना; कार चालक घायल
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के पाम बीच मार्ग ड्रिंक एंड ड्राइव से दुर्घटना। कार ने पिकअप टेम्पो को टक्कर दी। कार चालक शराब के नशे में था, जिससे वाहन नियंत्रण खो गया। कार चालक घायल, दोनों वाहनों को बड़ा नुकसान।0
0
Report
Advertisement
नाशिक TCS केस: फरार आरोपी निदा खान एक माह बाद गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला एक महिन्यानंतर अटक झाली आहे.. नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा शोध घेत होते, अखेर संभाजीनगरनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आले.. तर दुसरीकडे शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना खरात एक महिना उलटूनही पोलिसांना सापडत नाहीये.. SIT सह अहिल्यानगर पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत.. या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, खरातचे हस्तक अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.. यातील बावके आणि सोनवणे हे दोन आरोपी आधीच गजाआड झालेत, तर अशोक खरात याला देखील शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. आज अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे.. या चौकशीतून काय खुलासे होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.. तर शिर्डी पोलिसांनी चौकशी दरम्यान अशोक खरात याला कल्पना खरात कुठे आहे? असे विचारले असता, आपण 18 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहोत.. आपल्याकडे मोबाईल नाही तसेच बाहेरची माहिती मिळायला कुठलाही सोर्स नाही.. त्यामुळे मला कल्पना खरात बाबत माहिती नसल्याचे त्याने म्हटलंय.. त्यामुळे फरार कल्पना खरात हिचा शोध लागणार तरी कधी..? स्थानिक गुन्हे शाखा , शिर्डी पोलीस आणि SIT पोलिसांचे पथक नावालाच का..?असा प्रश्न उपस्थित होतोय.. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
बारामती में सुनेत्रा पवार के मुख्यमंत्री बनने के बैनर से उत्साह
Rui, Maharashtra:बारामतीत सुनेत्रा पवारांचे "होय मुख्यमंत्रीच" आशयाचे बॅनर..... Anchor _ बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा "होय मुख्यमंत्रीच" अशा आशयाचा बॅनर झळकला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनर वरती लिहिण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे.0
0
Report
नाले में क्रिकेट खेलते हुए मनसे ने कल्याण-डोंबिवली में नाला सफाई पर आंदोलन
Kalyan, Maharashtra:नाले सफाईबाबत मनसेचं अनोखं आंदोलन कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरातील जरीमरी नाल्यातील साचलेल्या कचऱ्यात चक्क क्रिकेट खेळत मनसेने अनोखं आंदोलन केलं. केडीएमसी प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल करण्यासाठी मनसेने हे आंदोलन केलं. पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अद्यापही नालेसफाई सुरू झालेली नाही. पॅनल नंबर ९ च्या मल्हार नगर परिसरातील गणेश नगर, जोशी बाग, जरी मरी त्याचबरोबर झुंजारराव मार्केट इथल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आहे. दरम्यान हि नाले सफाई वेळेवर न झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होईल. शिवाय अनेक ठिकाणी नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत, मग या बंदिस्त नाल्यात नालेसफाई कशी होईल अशा अनेक मुद्द्यांना घेऊन मनसेने हे आंदोलन केलं. ही नालेसफाई लवकर झाली नाही तर महापौरांच्या दालनात जाऊन कचरा टाकण्यात येईल अशा इशारा मनसेने दिला आहे.0
0
Report
Advertisement
शिक्षण मंत्री पंकज भोयर ने जनगणना और विज्ञान प्रदर्शनी के मोके पर निर्देश जारी किए
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - पंकज भोयर,राज्यमंत्री (शालेय शिक्षण/गृह) On शिक्षक जनगणना/SIR कार्य - राज्यात सध्या जनगणना, एसआयआर हे काम सुरू आहे आणि बीएलओ नियुक्तीच्या शिक्षकांची झाली आहे, त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा काम शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल होता - तापमान वाढलेला आहे, कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे सगळंच काम करणं शक्य नव्हतं त्यामुळे काही शिक्षक संघटना आमच्याकडे आल्या, त्यामुळे सूचना दिले आहेत जनगणना आणि एसआर च काम सुरू असल्याने प्रशिक्षणाचा काम पुढे ढकलण्यात यावं On शालेय विद्यार्थी नासा भेट - राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाची,विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तालुका जिल्हास्तरावर बालविज्ञान प्रदर्शनीचा आयोजन करण्यात येतं, या विद्यार्थ्यांना अजून चांगला एक्सपोजर मिळावा, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जून 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव दिला होता - विद्यार्थी जिल्हा सायन्स सेंटर मध्ये भेटी देतील, इस्रो मध्ये भेट देतील आणि विज्ञानाचे अजून चांगले माहिती मिळावी यासाठी नासा येथील केंद्राला भेट देण्याची विनंती देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे - तालुका आणि जिल्हास्तरावर वर्धा जिल्ह्यातून सुरुवात केली, येणाऱ्या सत्रातील विद्यार्थी प्रदर्शनी राज्यस्तरावर होते त्यानंतर राज्यातील विद्यार्थी नासामध्ये जातील On NCRB आकडेवारी - - गुन्हे करणारे हे व्यक्ती विकृत असतात, यामध्ये सामाजिक सहभाग वाढवतो, सामाजिक जागृती झाली पाहिजे, पोलीस प्रशासन काम करतच आहे पण जोपर्यंत सामान्य नागरिकांनी सामाजिक संस्थाचा सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घालू शकणार नाही On सुनेत्रा पवार मुख्यमंत्री - - राजकारणात प्रत्येकाची इच्छा असते, एका पदावर जाण्याची आणि अपेक्षा बाळगणे चुकीचं नाही, कुठलेही स्पर्धा महायुतीत नाही ते नाही पक्षचे नेते एकत्रितपणे काम करत आहेत On ncrb आकडेवारी - - हे आकडेवारी सतत चेंज होत असते मात्र गुन्हेगारांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत On विदर्भ शाळा चालू - - शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सिलॅबस कम्प्लीट झाला पाहिजे यासाठी हा टाइम टेबल राज्यस्तराचा करण्यात आलाय, परंतु त्या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय पुढील काळात घेण्यात येईल On निदा खान अटक - - अशा पद्धतीचे जबरदस्तीचे धर्मांतर होणे यासाठी कायदा पास केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत, म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना होणे याच्यावर सप्तशती कारवाई करण्यात येईल On शालार्थ शिक्षक पगार - - यामध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, झालेला घोटाळा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच पद्धतीने ते निर्दोष आहेत त्यांचा पगार झाला पाहिजे, राज्य सरकार देखील याबाबतीत सकारात्मक आहेत, ज्यांचा दोष नाही त्यांचे पगार लवकर होतील - या संपूर्ण प्रकरणाचे सखोल चौकशी करण्याकरिता एसआयटीचा गठन करण्यात आला आहे, यासाठीचा अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येत आहे परंतु या शिक्षकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही त्यांचे पगार नियमितपणे On आज दहावी निकाल - - दिवसेंदिवस स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, पालकांना माझा आव्हान आहे अति महत्वकांशी अपेक्षा पाल्याकडून बाळगू नये, पाल्यांना समजून घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित कौन्सिलिंग शिक्षकाने पालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पाहिजे On पुणे अत्याचार घटना - - अशा पद्धतीच्या घटना काही विकृत लोकांमुळे होतात, लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम व्यापक झाली पाहिजे0
0
Report
विरार के नारंगी पुल का उद्घाटन, यातायात से राहत; श्रेय बंटवारे की राजनीति
Vasai-Virar, Maharashtra:विरार मध्ये रखडलेला नारिंगी उड्डाणपूल अखेर सुरू पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण भाजप, बवीआ च्या पदाधिकार , कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाची लढाई रखडलेल्या पुलामुळे विरार शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत होत होती, अनेक तास वाहने पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर अडकून पडायची मात्र नारंगी येथील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात अल्याने विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे... या उद्घाटनावरील बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली... नवीन पुलावरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे0
0
Report
लोणावळा स्कायवॉक परियोजना में सौ वर्षों पुराने पेड़ काटने का विरोध
Varsoli, Maharashtra:पर्यावरणप्रेमींकडून याचा तीव्र विरोध Anchor: सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळा पर्यटन नगरीला निसर्गानं नैसर्गिक सुंदरता बहाल केली असून याच लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पादरम्यान कुमार चौक ते टायगर पॉईंट येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे होणार आहेत. लोणावळ्यातील नंदनवन असलेल्या रायवूड येथील शेकडो वर्षापूर्वी ची झाडे तोडण्याचा मानस या प्रकल्पात आखला असून यासाठी पर्यावरणप्रेमी जागृत झाले आहेत. स्कायवॉक प्रकल्पाला विरोध नसून येथील झाडे तोडण्याला जोरदार विरोध होऊ लागलाय रस्ता रुंदीकरणाच्या नावाखालचे होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… हिरव्यागार लोणणावळ्यातील झाडे वाचवलीच पाहिजेत, असा ठाम पवित्रा घेत पर्यावरण रक्षणासाठी कडक भूमिका घेण्यात आली आहे. पर्यटननगरी लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा शहर ते टायगर पॉइंट दरम्यान सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे रायवुड परिसरातील हिरवळ धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष नासिर शेख यांनी पीएमआरडीएला निवेदन देत पर्यावरण संरक्षण कायद्यांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. ट्री सर्व्हे रिपोर्ट, पर्यावरणीय परिणाम अहवाल (EIA) आणि सार्वजनिक सुनावणी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाचे अलाइनमेंट बदलून शेकडो वर्षांपूर्वीची झाडे वाचवावीत, तसेच अपरिहार्य परिस्थितीत झाडतोड करावी लागल्यास 1:10 प्रमाणात वृक्षारोपण आणि ट्रान्सप्लांट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या प्रकरणी कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
