416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में भारी बारिश से दो नदियाँ खतरे के निशान पर, प्रशासन अलर्ट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरप्रवण क्षेत्रातल्या दोन नद्या..चिपळूणची वाशिष्टी इशारा पातळीवर आणि खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीवर वाहते.. प्रशासन सध्या अलर्ट मोड वरती आहे.. नगरपरिषद भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहे.. नदीकाठच्या घरांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.. या पूर प्रवण क्षेत्रातील खेड आणि चिपळूण तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी सह्याद्रीच्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे..0
0
Report
जगबुडी नदी का खतरे का स्तर: मुंबई गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:ब्रेक रत्नागिरी.. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील जगबुडी नदी सध्या धोका पातळीवर वाहते.. प्रशासन अलर्ट मोडवर.. तीन दिवसांपूर्वी जगबुडी नदी धोका पातळीवर वाहत होती त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि नदीचे पाणी ओसरलं होतं मात्र आता पुन्हा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पाऊस पडल्यामुळे जगबुडीची पुन्हा पाणीपातळी वाढली असून सध्या साडेसात मीटर उंचीने जगबुडी धोक्यावर वाहत आहे.. परिणामस्वरूप पुराचे पाणी काही भागांतील घरांमध्ये शिरल आहे.. जनजीवन विस्कळीत झाला आहे.. दुपारनंतर पावसाचा जोर खेड तालुक्यामध्ये वाढल्यामुळे पावसाचे पाणी मुंबई गोवा महामार्गावर आल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुकीही संथ झाली..0
0
Report
रायगढ़ में दराड़ गिरने से सड़क बंद, सात गांवों की संपर्क टूट गई
Chendhare, Maharashtra:माणगावातील कुंभेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. रायगडात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच. माणगावातील कुंभेवाडीकडे जाणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद. सात गावांचा माणगावशी संपर्क तुटला. दरड बाजूला करण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता. कुंभे धबधबा पहाण्यासाठी गेलेले पर्यटकही अडकून पडल्याची भीती. काही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले मात्र काहीजण रस्त्याच्या पलीकडे अडकले असण्याची शक्यता. घटनास्थळी तलाठी स्थानिक सरपंच दाखल. बाईट - स्थानिक नागरिक.0
0
Report
Advertisement
यवतमाळ अस्पताल शवागार: फ्रिजर से मृत देह सड़े मिलने पर परिजनों का हंगामा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा रुग्णालयाच्या शवागार मध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णतः कुजल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मनीष वाघमारे यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्यांना खाजगी रुग्णालयात कुटुंबीयांनी नेले, तिथून जिल्हा रुग्णालयात त्यांना आणन्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला असल्याने, त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला, तेथील फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवला, आज शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार होता. मात्र फ्रिजर मधून मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णतः कुजलेला होता. मृतदेहाची नीट ओळखही पटत नव्हती. मृतदेह ठेवताना तो बंद फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याने हा संताप जनक प्रकार घडला. त्यामुळे नातेदारांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जाब विचारला. यावेळी रुग्णालय परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. रुग्णालय प्रशासनाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान शवागारातील फ्रिझर बंद असल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कुठलेही उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नाही. याप्रकरणी दोशींवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. बाईट: मेहरबान वाघमारे : मृताची पत्नी0
0
Report
नांदूर मधमेश्वर धरण से 55,928 क्यूसेक पानी विसर्जन; 18 आदिवासी युवाओं की सुरक्षित बचाव
Niphad, Maharashtra:नांदूर मधमेश्वर धरणातून 55,928 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू. आठ वक्राकार गेटमधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नांदूर मधमेश्वर धरणाच्या समोरील बेटावर अडकलेल्या 18 आदिवासी तरुणांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका. बचावकार्यासाठी काही काळ पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला. सुटका पूर्ण होताच धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठी न जाण्याचे प्रशासनाक नागरिकांना आवाहन. नदीपात्रात उतरणे टाळा; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.0
0
Report
सातारा में ऑरेंज-रेड अलर्ट: 6–10 जुलाई तक पर्यटन स्थल बंद
Satara, Maharashtra:भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी 'ऑरेंज' आणि 'रेड' अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती और दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार धोम धरण, मेणवली घाट, लिंगमळा धबधबा, प्रतापगड यांसह वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे, धरणे, नदीपात्रे आणि धबधब्यांच्या ठिकाणी ६ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत पर्यटकांना व नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे。0
0
Report
Advertisement
आदित्य ठाकरे ने अस्पताल में डॉक्टरों पर हमले के विरोध में तात्कालिक गिरफ्तारी की मांग
Kalyan, Maharashtra:शास्त्रीनगर रुग्णालयाला आदित्य ठाकरे यांची भेट त्या नगरसेवांना मेंटल टेस्टिंग ची गरज. रमेश म्हात्रे यांना अटक करून परेड काढा. रमेश म्हात्रेंना तातडीने अटक करा नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट देत डॉक्टर, परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करण्याची तसेच त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली. डॉक्टर आणि परिचारिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. घाबरू नका." हल्ल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो अत्यंत धक्कादायक आणि भयावह असल्याचे त्यांनी सांगितले. "रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका रुग्णाची सेवा करत असताना त्यांच्यावर झालेली मारहाण असह्य आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही," असे ते म्हणाले. रमेश म्हात्रे यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल करत ठाकरे म्हणाले की, डॉक्टर आणि परिचारिका रुग्णाची सेवा करत असताना त्यांच्यावर झालेली मारहाण असह्य आहे. कोविड महामारीपासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. ठाकरे यांनी रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करून त्यांची धिंड काढावी, त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे आणि भविष्यात त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री राज्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करतात, मात्र मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांनी नियमित आरोग्य सेवा बंद ठेवून आंदोलन सुरू ठेवले असून केवळ आपत्कालीन सेवा सुरू आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी वैद्यकीय संघटनांनी पुन्हा केली आहे. बाईट आदित्य ठाकरे0
0
Report
पालघर में मुसलाधार बारिश से जनजीवन अस्त-व्यस्त, नुकसान भरपाई की मांग तेज
Palghar, Maharashtra:पालघर गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक गावपाड्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. पालघरच्या केळवे येथील मोरपाड्यामध्ये पाणी शिरून कुटुंबांची मोठी गैरसोय झालीच पाहायला मिळाल. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांमध्ये असलेले साहित्य, अन्नधान्य आणि घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तीन दिवस घरामधील पाणी न ओसरला नसल्याने चिखलामध्ये राहण्याची वेळ येईल नागरिकांवर आली आहे. तीन दिवस पुरूण परिस्थिती असताना प्रशासनाचे अधिकारी इथे फिरकले नसून कुठलीही मदत मिळाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी येथील पीडित करीत आहेत.0
0
Report
पैसे के विवाद में मित्र की बेरहमी से पिटाई, अस्पताल में मौत; आरोपी सुरेश अग्रवाल गिरफ्तार
Akola, Maharashtra:पैसे के विवादातून आधी मित्राला बेदम मारहाण केली... त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मित्रालाच स्वतः उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं..मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्यात आला होता. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत या खुनाचा छडा लावत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ गंभीर जखमी अवस्थेत एका युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचं आरोपींकडून सांगण्यात आलं. मात्र पोलिसांना संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला.तपासादरम्यान मृतकाच्या अंगावरील जखमा अपघातातील नसून मारहाणीच्या असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. चौकशीत पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादात आरोपीने मित्रालाच बेदम मारहाण केल्याचं समोर आलं. त्यानंतर संशय टाळण्यासाठी त्यालाच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अवघ्या तीन तासांत स्थानिक गुन्हे शाखेाने मुख्य आरोपी सुरेश अग्रवालला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
फरार कृष्णा आंधळे: पुलिस की खोज अब भी नाकाम, प्रश्नों की गूंज
Beed, Maharashtra:सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी जेलमध्ये आहेत पण आठव्या आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पकडला गेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून बक्षीस जाहीर केला. तपास यंत्रणांनी बँक खाते, मोबाईल, नातेवाईकांच्या घरी छापे टाकले; तरी आंधळेचा पत्ता लागला नाही. तो देशाबाहेर पळाला का, की गावात कोणाच्या आश्रयाला आहे याचं उत्तर अद्याप पोलिसांकडे नाही.0
0
Report
फरार कृष्णा आंधळे: पुलिस उसे पकड़ पाएगी या यंत्रणा हतबल?
Beed, Maharashtra:फरार कृष्णा आंधळे - यंत्रणेला आव्हान..! PKG ANC- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी गजाआड आहेत पण 1 आरोपी अजूनही मोकाटच आहे! वाल्मिक कराडसह 7 आरोपी तुरुंगात आहेत. पण या खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून डोक्यावर बक्षिसही ठेवलंय. तपास यंत्रणेचे शेकडो पथक कामाला लावलेत, तरीही आंधळे सापडत नाही. मग प्रश्न आहे... कृष्णा आंधळे अखेर गायब कुठे झाला? की तो यंत्रणेलाच आव्हान देतोय? पाहुयात आजचा खास रिपोर्ट... 9 डिसेंबर 2024... मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुष हत्या झाली. या प्रकरणात CID ने वाल्मिक कराडसह 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं. त्यापैकी 7 जण सध्या जेलमध्ये आहेत. पण आठवा आरोपी कृष्णा आंधळे 18 महिन्यापासून फरार आहे. पोलिसांनी त्याच्यावर 1 लाखाचं बक्षिस जाहीर केलं. महाराष्ट्रासह शेजारील राज्यात पथक पाठवली. त्याचे बँक खाते, मोबाईल, नातेवाईकांच्या घरी छापे... सगळं करूनही आंधळ्याचा पत्ता लागला नाही. तो देशाबाहेर पळाला का? की गावातच कोणाच्या आश्रयाला आहे? याचं उत्तर अद्याप पोलिसांकडे नाही... फरार झाल्यानंतर कृष्णा आंधळे सोशल मीडियावरूनही सक्रिय नाही. त्याचे फोटो व्हायरल करूनही माहिती मिळत नाही. याचा अर्थ तो पूर्णपणे भूमिगत झाला आहे. बनावट नावाने, बनावट कागदपत्रांसह तो लपून बसला असावा असा संशय आहे. पण एक आरोपी जर पोलिसांना चकवा देत असेल तर "कायदा सर्वांसाठी सारखा" हा दावा कितपत खरा?... आंधळा सापडल्याशिवाय हे प्रकरण पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्याची साक्ष आणि जबाब हा खटल्यासाठी महत्वाचा आहे. तो कदाचित पाकिस्तानमध्ये गेला असावा, एरवी काश्मीर मधून आरोपी अटक करणाऱ्या बीड पोलिसांना कृष्णा आंधळे कसा सापडत नाही असा संतप्त सवाल शिंदे गटाने केला आहे. आंधळे प्रकरणात बीड पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात यावा अशी अजब मागणी करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे कुठे आहे? हा फक्त पोलिसांचा प्रश्न राहिला नाही... तर तो बीडच्या जनतेचा प्रश्न झाला आहे. जर यंत्रणेला एक आरोपी सापडत नसेल तर मग सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? कृष्णा आंधळे यंत्रणेला आव्हान देतोय... की यंत्रणाच हतबल झाली आहे? उत्तर शोधणं आता गरजेचं आहे. महेंद्रकुमार मुधोळकर ZEE 24 तास बीड...0
0
Report
चंद्रपुर-मुला हाईवे पर दुर्लभ चांदी अस्वल की मौत, संरक्षण योजना पर सवाल
Chandrapur, Maharashtra:अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा मृत्यू झाला आहे. या महामार्गावर आतापर्यंत चार चांदी अस्वलांचा अपघातात बळी गेला असून, वन्यजीवांसाठीच्या उपशमन योजना अद्यापही प्रत्यक्षात न आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कावल–ताडोबा–उमरेड वन्यजीव भ्रमणमार्गावरील वाढत्या अपघातांमुळे तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने केली आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में भारी बारिश से मिलिंद नगर के 20-25 परिवारों के घर पानी में डूबे
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये आज पहाटे मुळासधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. तर काही ठिकाणी घरात पाणी साचले.... शहरातील मिलिंद नगर परिसरातही 20 ते 25 घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आणि अनेकांचे घर ,कुटुंब रस्त्यावर आले.... बघूया याचा खास रिपोर्ट ही आहे नाशिक शहराच्या मधोमध असलेले मिलिंद नगर वस्ती या वस्तीच्या बाजूनेच जाते ती नंदीदी नदी... रात्री झालेल्या पावसाने नंदीदी नदी दुधडी भरून वाहू लागली... मात्र याच परिमाण मिलिंद नगर परिसरात असलेल्या कुटुंबाच्या घरात पाणी शिरले. त्यात शेवरे कुटुंबाचं घरही पूर्णपणे पाण्याखाली गेलं. घरातील फर्निचर, कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दैनंदिन वापराचं सामान पाण्यात भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेवरे च 6 जनाच कुटुंबात आहे. यात दोन चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे.... मंगला शेवरे हे आपला उदरनिर्वाह मॉल मुजरी करून करतात अचानक आलेल्या पावसामुळे शेवरे कुटुंबांच्या घरात पाणी शिरलं आणि यात शौर्य कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर येऊन पडलाय... घरातील कडधान्य देखील या पावसात भिजून गेल्यामुळे खाण्याचा प्रश्न देखील समोर आल्याचा शिवरायांच्या कुटुंबांनी सांगितले.... शासनाने आम्हाला आमच्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेवरे कुटुंबांनी केली आहे.... मिलिंद नगर परिसरात अनेक कुटुंब राहतात.. यात 20 ते 25 कुटुंभावरांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. बाजूलाच सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामामुळे नुकसान झाले असल्याचा आरोप नुकसानग्रस्त नागरिकांनी केलाय. तर प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलाय. नागरिकांचे होणारे नुकसान हे अधिकाऱ्यांच्या निष्काळजी मुळे झालेले नुकसान आहे...शहरात सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होतंय... शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले नागरिकांच्या घरात पाणी शिरले याचं सर्व कारण नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आणि संस्था कुंभमेळाच्या पार्श्वभूमी सुरू असलेल्या ठेकेदारांनी केलेल्या कामांमुळे ही परिस्थिती नाशिकवर आली असल्याचं नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे यांनी म्हटले यासंदर्भात जोशी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे देखील उपमहापौर विलास शिंदे यांनी म्हंटल आहे... मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांच्या थेट घरात पाणी शिरलं यामुळे अनेकांची कुटुंब थेट रस्त्यावरती आलीये... त्याचबरोबर कुंभमेळ्यानीमित्त शहरात विकास कामे सुरू आहेत. मात्र याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलाय... झालेल्या पावसामुळे नागरिकांना लवकरात लवकर भरपावी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली جاتیये...0
0
Report
आळंदी में बाढ़ के कारण संत तुकाराम पालखी प्रस्थान सीमित उपस्थिति के साथ
Akola, Maharashtra:आळंदीतील इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मोजक्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतिहासात प्रथमच अशा प्रकारे पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात होत असल्याचे सांगत, या परिस्थितीसाठी अनियोजित बांधकामे, उद्योजक, कंत्राटदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकारणी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचा विचार करून पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करत, हा वारकरी परंपरेसाठी वेदनादायी क्षण असल्याचे म्हटले. शहरातील अनियंत्रित बांधकामे, नदीपात्रावरील अतिक्रमणे आणि नियोजनशून्य विकासामुळे आज ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप त्यांनी केला. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळेच आळंदीला वारंवार पूरस्थितीचा सामना करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने यापुढे अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.0
0
Report
राम मंदिर दान मामले पर शिवसेना का प्रदर्शन: देणगी की जाँच की मांग
Yavatmal, Maharashtra:मंदीर दान के चोरो को, अब हिंदू माफ नही करेगा... अशি घोषणाबाजी करीत यवतमाळ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले. दत्त चौकातील श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून राम रक्षा आंदोलन करण्यात आले.यावेळी राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून, कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
