416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पालघर में दिनदहाड़े युवती पर धारदार हथियार से हमला, आरोपी फरार
Palghar, Maharashtra:पालघर - पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी तिला पुढे शहरातील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड आणि पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.0
0
Report
खेड में जगबुड़ी नदी में डूबकर तीन भाइयों की मौत, वीडियो सामने आया
Ratnagiri, Maharashtra:खेड - रत्नागिरी.. दोन दिवसांपूर्वी खेडच्या जगबुडी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरालेल्या तीन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला होता.. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.. या तिन्ही भावांचा पोहण्याआधीचा व्हिडीओ सध्या समोर येतोय.. मुंबईहून खेडमध्ये नातेवाईकांकडे सुट्टी साठी आले होते.. हे सर्व मूळचे सांगलीचे असून सध्या मुंबईतील चेंबूर मेट्रो स्टेशन परिसरात वास्तव्यास होते..0
0
Report
चंद्रपुर में जोरदार बारिश, तीन दिनों की तपिश के बाद मौसम ठंडा
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात बरसला जोरदार पाऊस ,तीन दिवसांच्या उकाड्यानंतर जोरदार पावसाने वातावरणात आणला गारवा गेले तीन दिवस प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या चंद्रपूरकरांना आज जलधारांनी मनसोक्त भिजवून काढले. आज दुपारपासून शहराच्या आकाशात ढगांची गर्दी होती. संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गेली तीन दिवस थोडा पाऊस पडत असल्याने उकाडा आणि आर्द्रता असह्य झाली होती. मात्र आज तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ बरसलेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला. गेले तीन महिने अतिशय उष्ण तापमानाच्या झळा सहन करणा-या चंद्रपूरकरांना मॉन्सून आगमन झाल्याने दिलासा मिळालाय.0
0
Report
Advertisement
वाशीम में आंधी-बारिश ने गर्मी भगाई, शिरपूर समेत इलाके में किसानों को मिली राहत
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी, शिरपूरसह परिसरात आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शिरपूर येथे पहिल्या पावसाचा लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला. दरम्यान,हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस मोठा आधार ठरला असून खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही यामुळे गती मिळणार आहे.0
0
Report
हिंगोली में मान्सूनपूर्व भारी बारिश, विद्युत आपूर्ति बाधित, जल जमाव से राहत
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. सेनगाव तालुक्यातील जयपूर कवठा साखरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित मान्सूनपूर्व पावसामुळे सखल भागात साचले पाणी पडत असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा... पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा..0
0
Report
धैर्यशील मोहिते पाटील ने क्रॉस वोटिंग पर तंज, मंत्री-मतदाताओं पर दबाव का आरोप
Pandharpur, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केले असते समजून येत अशी भीती पालकमंत्री मतदारांना घालत आहेत मात्र अशा पद्धतीचे काहीही समजून येत नाही, पालकमंत्री आहेत की मिस्टर इंडिया आहेत असा टोला धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांना लगावला आहे सोलापूर विधान परिषदेच्या मतदानामध्ये क्रॉस वोटिंग झाल्यास ते समजून येतं असं पालकमंत्र्यांनी भाजप नगरसेवकांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवणार आहे असं मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केल आहे. ही लोकशाही आहे आणि तो मतदानाचा अधिकार आहे त्यांना धमकावल जातंय. कधी ते मंत्री आहेत कधी पोस्टमन आहेत कधी मिस्टर इंडिया आहेत कधी ज्योतिष नक्की काय चालू आहे हेच कळत नाहीये. काँग्रेस मध्ये विलीनीकरण करण्याबाबत आमच्या पक्ष पातळीवर कोणतीही चर्चा नाही कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने स्पष्ट केला आहे कोणतंही विलीनीकरण होणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला लढावं लागेल आणि ती लढाई करा असा आम्हाला सांगितलं आहे असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट करत विलीनीकरण बाबत चर्चा फेटाळल्या आहेत0
0
Report
Advertisement
मानसून पूर्व तैयारी: कोकण रेलवे 700 कर्मियों के साथ 24x7 निगरानी
Navi Mumbai, Maharashtra:आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेने सर्वसमावेशक तयारी पूर्ण केली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. मान्सून काळात रेल्वे वाहतुकीत अतिरिक्त खबरदारी घेत वीर-कणकवली विभागात गाड्यांचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर ठेवण्यात आला आहे. सामान्य परिस्थितीत याच विभागात गाड्या ताशी १२० किलोमीटर वेगाने धावतात. तसेच कणकवली ते उडुपी विभागात रेल्वेगाड्या ताशी ९० किलोमीटर वेगाने चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मान्सूनदरम्यान रेल्वेमार्गांची सातत्याने पाहणी करण्यासाठी सुमारे ७०० कर्मचाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी रुळांवर नियमित देखरेख ठेवली जाणार असून, प्रत्येक एक ते दोन किलोमीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि जवळच्या स्थानकाशी तत्काळ संपर्क साधता येणार आहे. कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली.0
0
Report
शिर्डी लॉज में पांच वर्षीय बच्चे पर अमानवीय मारहाण: आरोपी अनिस शेख गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:पैशांसाठी पाच वर्षाच्या चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.. जालना पोलिसांनी चिमुकल्याची सुटका करत मुलाचा सावत्र बाप अनिस वजीर शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.. मात्र गुन्हा शिर्डीत घडला असल्याने हा गुन्हा जालना पोलिसांनी शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला आहे.. अवघ्या पंधराशे रुपयांसाठी आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय.. आरोपी अनिस शेख हा पत्नी आणि सावत्र मुलासह शिर्डीतील एका लॉजमध्ये थांबलेला होता.. तेथील रूममध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केली.. मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करून त्याने तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला.. त्यानंतर जालना येथील चिम़ुकल्याच्या आजोबांना फोन करून पैशांची मागणी केली.. पंधराशे रुपये न दिल्यास नातवाला मरेपर्यंत मारहाण करण्याची धमकी देत आजोबांकडून ऑनलाईन पैसे उकळले.. आजोबांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिस वजीर शेख, राहणार सारवाडी, जिल्हा जालना याच्या विरोधात पॉक्सोसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. जालना पोलिसांनी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर आरोपीचा ताबा घेत त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.. न्यायालयाने आरोपी अनिस शेख याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, शिर्डी पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत..0
0
Report
गोपीचंद पडळकर ने रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर तीखी टिप्पणी की
Sangli, Maharashtra:स्लग - केवळ नाटक करण्यापूरता,रोहित पवारांचे आंदोलन - गोपीचंद पडळकर यांची रोहित पवारांवर टीका अँकर - केवळ नाटक करण्यापूरता,रोहित पवारांचे आंदोलन आहे,एक्टिंग करायचे रोहित पवारांना माहिती आहे,अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे.तसेच नाटक कश्याला करताय,हे चित्रपटाचे शूटिंग आहे का ? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे ,का ? अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावावर टीका केली आहे,तसेच रोहित पवारांना आपले आवाहन आहे,जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानादार एफआरपी देत नाहीत,तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमखांना आपली मागणी आहे,रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून,रोहित पवार याला अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका,रोहित पवारांना एक दोन महिने आंदोलनला बसू द्या,असे देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत,त्याच बरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलय,अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
Advertisement
भांडूप ड्रीम्स कॉम्प्लेक्स में बुजुर्ग को फेरीवालों ने पीटा, पुलिस ने कार्रवाई शुरू की
Mumbai, Maharashtra:भांडुपमधील ड्रीम्स कॉम्प्लेक्स परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ड्रीम्स कॉम्प्लेक्समध्ये राहणारे 60 वर्षीय राजेंद्रप्रसाद हनुमान सिंग यांनी भांडुप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, शक्तीधाम मंदिरासमोरील रस्त्याने भांडुप स्टेशनकडे जात असताना त्यावेळी तेथे बसलेल्या काही भाजी विक्रेत्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सिंह यांनी याबाबत जाब विचारताच वाद वाढला आणि त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांना थेट मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाकडी वस्तूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात अब्बास मुर्तजा शेख, मोहसीन शेख आणि शमशुद्दीन शेख यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली असून आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधित फेरीवाल्यांच्या दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत ड्रीम्स कॉम्प्लेक्समधील रहिवासीही मोठ्या संख्येने एकत्र आले होते. रहिवाशांनी फेरीवाल्यांविरोधात विविध तक्रारी मांडत परिसरातील अतिक्रमण, वाहतुकीचा खोळंबा आणि सुरक्षेचे प्रश्न उपस्थित केले. तसेच मारहाणीच्या घटनेतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.0
0
Report
रत्नागिरी के चिपळूण में कार दुर्घटना, तीन घायल, जान बची
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण वालोंपे येथे कारचा भीषण अपघात.. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण वालोपे येथे कारचा भीषण अपघात झाला आहे.. मुंबई गोवा महामार्गावरून जाणारी भरधाव वेगाने जाणारी कार महामार्गाच्या रुंदी करणाच्या कामासाठी महामार्गाच्याच बाजूला ठेवण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या पोला जोरदार धडक दिली.. ही धडक एवढी जोरदार होती की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे.. या कारमध्ये तिघेजण प्रवास करत होते.. तिन्ही जणांना गंभीररित्या दुखापत झाल्याने जवळच्याच रुग्णालयात अधिक उपचारांसाठी नेण्यात आले आहे.. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही..0
0
Report
केडीएमसी महापौर दफ्तर के बाहर हंगामा, सिद्धार्थ जाधव की बैठक को लेकर ड्रामा
Kalyan, Maharashtra:महापौर दालनाबाहेर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींचा गोंधळ; सिद्धार्थ जाधवांच्या भेटीवरून केडीएमसीत रंगला हायव्होल्टेज ड्रामा केडीएमसी मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर महापौरांची भेट घेण्यासाठी दोन तास प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्याने नगरसेविका नाराज. याचदरम्यान अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटले. लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश कसा?’ असा सवाल करत कांचन कुलकर्णी आक्रमक. सिद्धार्थ जाधव यांचे पालिकेसाठी नेमके योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त महापौर आणि आयुक्त लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोप करत दालनाबाहेर जोरदार गोंधळ घातला सुमारे वीस मिनिटे महापौर कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गोंधळ वाढताच महापौर स्वतः बाहेर येऊन कांचन कुलकर्णी यांची समजूत काढली. महापौरांनी चर्चेसाठी कांचन कुलकर्णी यांना दालनात बोलावल्याने वादावर पडदा. वादावर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ जाधव यांनी ‘प्रयोगाच्या निमित्ताने भेटायला आलो होतो’ इथे कोणालाही आग घेतल्या नसेल तरी प्रयोगाला या त्या ठिकाणी सर्वांना आत घेतले जाईल असे सांगत अधिक बोलणे टाळले.0
0
Report
Advertisement
नाशिक ब्रेकिंग: बीएसएनएल-महावितरण केबल चोरी आरोपी गिरफ्तार, करोड़ों का माल बरामद
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग बीएसएनएल व महावितरणच्या महागड्या यूजी केबल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक... मुंबईतील भांडुप परिसरातून 17.5 टन अॅल्युमिनियम केबल, 14.5 टन कॉपर वायर जप्त एकूण 2 कोटी 88 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात.. गुन्हेशाखा युनिट-1, गुंडा पथक आणि अंबड गुन्हेशाखेची संयुक्त मोठी कारवाई मुंबई व बिहार येथील 6 आरोपींना अटक; चोरीचा माल गोडाऊनमधून घेतला ताब्यात नाशिकरोड येथील बीएसएनएलच्या भूमिगत केबल चोरी प्रकरणाच्या तपासातून मोठा खुलासा सरकारवाडा, मुंबईनाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 5 केबल चोरीचे गुन्हे उघडकीस0
0
Report
मनमाड-लासलगाव मार्ग पर टैंकर पलट, डीजल गळती से भारी हड़कंप, यातायात बाधित
Chandvad, Maharashtra:मनमाड-लासलगाव मार्गावर रायपूर जवळ इंधन घेऊन जाणारा टँकरने ॲपे रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकर पलटी होऊन त्यातून मोठया प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. टँकर मधून डिझेल गळती होतं असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी गर्दी केली होती. अपघातात टँकर, रिक्षा चालकासह 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असू न त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन टँकर आणि त्यातून गळणाऱ्या डिझेलवर पाण्याचा मारा सुरु केला. डिझेल गळतीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.0
0
Report
नाशिक में पनीर आउट ऑफ स्टॉक, दामों में भारी बढ़त; होटल-ढाबे परेशान
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये पनीरचा तुटवडा पनीर बटर मसाला गायब! नाशिकच्या हॉटेल्समधून पनीर आउट ऑफ स्टॉक पनीर बटर मसाला गायब! नाशिकच्या हॉटेल्समधून पनीर आउट ऑफ स्टॉक! नाशिककरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या हॉटेल्स आणि ढाब्यांवर सध्या एका वेगळ्याच संकटाने थैमान घातलंय. हॉटेलमध्ये जाऊन पनीरच्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांची निराशा होत आहे. कारण नाशिकमधील हॉटेल्समधून पनीर गायब झालंय. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पनीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक दोघेही हवालदिल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे आता बाजारात शुद्ध पनीरची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शुद्ध पनीरच्या दरात किलोमागे ८० ते ९० रुपयांची थेट वाढ झाली आहे. यामुळे घाऊक बाजारात पनीरचे दर प्रति किलो ६५० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. १ किलो शुद्ध पनीर तयार करण्यासाठी तब्बल ५ लिटर दूध लागतं. दुधाच्या वाढलेल्या दर, वाहतूक खर्च आणि तपासणीची कडक प्रक्रिया यामुळे पनीरचे उत्पादन महागल्याचं स्थानिक दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. एकीकडे भेसळयुक्त पनीर विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे शुद्ध पनीर महागल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते आहे. तूर्तास, नाशिककरांना पनीरच्या चमचमीत चवीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
