icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पेरणीच्या तोंडावर बैलजोडी अडवण्याचा मामला: शेतकर्‍यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला

Latur, Maharashtra:लातूर जिलेतील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्यावर पेरणीच्या तोंडावर मोठं संकट उडवलं आहे... बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परत येत असताना काही गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून बैल अडवले. त्यानंतर या प्रकरणी कासार शिरशी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बैल गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. हे बैल शेतीसाठीच खरेदी केले होते, असा दावा राम बिराजदार यांनी केला आहे. इतकेच नाही, तर गोशाळेत ठेवलेले बैल दुसऱ्यालाच देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पेरणीचा हंगाम सुरू असताना बैलजोडी नसल्याने शेतीची कामे कशी करायची, असा सवाल हा शेतकरी उपस्थित करत आहे. याच संदर्भात शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.
0
0
Report
Advertisement

दो घंटे की बारिश ने स्कूल में पानी घुसा दिया, बच्चों के लिए तात्कालिक छुट्टी

Kalyan, Maharashtra:दोन तासांच्या पावसात शाळा पाणी शिरले.. उंबर्डेतील विद्यार्थ्यांना द्यावी लागली तातडीची सुट्टी. कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरातील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेत अवघ्या दोन तासांच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली. शाळेच्या पटांगणासह वर्गखोल्यांमध्येही पाणी शिरल्याने प्रशासनाला शाळेला सुट्टी देण्याची वेळ आली आहे. केडीएमसी नाले सफाई करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहे मात्र दोन तासाच्या जोरदार पावसामुळे शाळेत पाणी साचले आहे. शाळेच्या मागे असलेला नाला साफ न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शाळा प्रशासनाने करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी.
0
0
Report

धाराशिव में अतिवृष्टि: एक साल बाद भी किसानों को घोषित राहत अभी तक नहीं मिली

Dharashiv, Maharashtra:धाराशिव एक वर्ष उलटलं... पण अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप मदतीची प्रतीक्षा... धाराशिवमध्ये तब्बल 9 हजार हेक्टर जमीन खरडून गेली... तीन लाखांच्या मदतीची घोषणा हवेतच... 27 गायी वाहून गेल्या... मदत फक्त 2 लाख 22 हजार... सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप... अँकर : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलं. तब्बल नऊ हजार हेक्टरवरील सुपीक जमीन खरडून गेली... अनेकांची जनावरं वाहून गेली... तर पिकांचंही मोठं नुकसान झालं. राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत मदतीची घोषणा केली होती. मात्र एक वर्ष उलटलं तरी अनेक शेतकरी मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक गावांमध्ये नाले-ओढे दुथडी भरून वाहिले... रस्ते वाहून गेले... आणि हजारो हेक्टरावरील सुपीक शेती अक्षरशः खरडून गेली. जिल्ह्यात जवळपास 9 हजार हेक्टर क्षेत्रावरील जमीन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांची शेती आजही पूर्ववत झालेली नाही. या नुकसानीनंतर राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर केली होती. मात्र घोषणा होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरी अनेक पात्र शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. "घोषणा झाल्या... पण मदत मिळाली नाही," अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. भूम तालुक्यातील विश्वनाथ दातखिळे यांचं उदाहरण तर अधिक वेदनादायी आहे. अतिवृष्टीत त्यांच्या 27 गायी वाहून गेल्या, मात्र या मोठ्या नुकसानीच्या बदल्यात त्यांनी शासनाकडून केवळ 2 लाख 22 हजार रुपयांची मदत मिळाली. झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प असल्याचं ते सांगतात. दरम्यान, कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलीली मदत तातडीने मिळावी, यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात अनेक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचं चित्र आहे. एकीकडे शेती खरडून गेली... दुसरीकडे जनावरांचं नुकसान... आणि त्यातच मदतीची प्रतीक्षा... अशा दुहेरी संकटात धाराशिवचा शेतकरी अडकला आहे. सरकारने आता कागदोपत्री घोषणा न करता तातडीने मदत वितरित करावी, अशीच मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. एक वर्षापूर्वी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना आजही न्यायाची प्रतीक्षा आहे. घोषणांची पूर्तता कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव. काहींचा परिचय: गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 9 हजार हेक्टर शेती क्षेत्र खरडून गेले. 7,500 हून अधिक शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले. जिरायत (कोरडवाहू) जमीन : प्रति हेक्टर ₹3 लाख मदत जाहीर. बागायत जमीन : प्रति हेक्टर ₹5 लाख मदत जाहीर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत थेट खात्यात जमा करण्याची घोषणा. अनेक शेतकऱ्यांना घोषित निकषानुसार पूर्ण मदत मिळालेली नाही, अशी तक्रार. काहींना अंशतः मदत, तर अनेक शेतकरी अजूनही पूर्ण मदतीच्या प्रतीक्षेत.
0
0
Report

टीसी के सवाल पर छात्र ने शिक्षक पर चाकू से हमला, स्कूल में हड़कंप

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शाळेत विद्यार्थी घडतात , संस्कार रुजतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात, मात्र छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत घडलेली घटना या संस्कृतीलाच हादरा देणारी ठरली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने स्वतःच्या शिक्षकावर थेट चाकूने हल्ला केला. तुझ्यामळे परीक्षेत नापास झालो या रागातून या विद्यार्थ्याने गुरुलाच भोसकले.... हे धक्कादायक सीसीटीव्ही पुढं आले आणि शाळा विश्वालाच धक्का बसला, वाद तसा किरकोळ, 2024 मध्ये हा विद्यार्थी या शाळेत नवव्या वर्गात होता त्यात तो 2 विषयात नापास झाला आणि त्याला त्याच वर्गात बसावे लागले त्यात गेल्यावर्षी त्याने शाळा सोडून दिली आणि मंगळवारी तो शाळेत टीसी घ्यायला धडकला, सुरूवातीला मुख्याध्यापक सोबत वाद घातल्यानंतर त्याने वर्ग शिक्षकाला बोलवायला सांगितले आणि शिक्षक येताच त्याने त्यांना चाकूने भोसकले, शिक्षकाने कसाबसा बचाव केला तर मुख्याध्यापकांने कसाबसा बचाव केला यानंतर हा मुलगा फरार झाला पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून त्याला ताब्यात घेतले आहे.... या घटनेने शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, तर संवादाचा अभाव, आणि वारंवार हिंसक गोष्टी पाहिल्याने मुलं आक्रमक होत असल्याचे मानसोपचार तज्ञांचे मत आहे.. सध्या हा शिक्षक जन्म मृत्यू सोबत लढतोय, रक्तदाबाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीय त्यामुळं संघर्ष सुरू आहे मात्र जो शिक्षक विद्यार्थी घडवतो त्यालाच विद्यार्थ्यांच्या रागाचा असा सामना करावा लागत आहेय ही समाज म्हणून गंभीर, आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे
0
0
Report
Advertisement

नाशिक में आषाढी एकादशी: पालखी यात्रा और स्कूल परिसर भक्तिमय उत्सव

Nashik, Maharashtra:आषाढ़ी एकादशी निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीच नाशिक मध्ये आघामान झाला आहे तर दुसरीकडे नाशिकच्या फ्रवाशी टॉऊन स्कूलमध्ये दिंडीचे भव्य आजोजन करण्यात आलंय.दिंडी निमित्त विध्यार्थीन सह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला..यावेळी जवळजवळ 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होत असून टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत तर विठुरायाच्या नावाने स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केलीये.. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे विठ्ठलाचे रुक्मणीची वेशभूषा करत पालकांचे लक्ष वेधून घेतलं तर वासुदेवाच्या वेशभूषाचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता.....शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विध्यार्थीनामध्ये सहभाग नोंदवला...यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण पूर्ण भक्तीमय झालेल्या दिसून आलं.... तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात एकच व पंढरपूर भेटी च स्वरूप प्राप्त झालंय....त्याचबरोबर वारीच मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं..
0
0
Report

शेटफळे में विद्युत टॉवर विरोधी प्रदर्शन: किसानों ने शोले-स्टाइल आंदोलन, आत्मदहन की चेतावनी

Sangli, Maharashtra:आटपाडी तालुकے के शेटफळे गाँव में निजी कंपनी के विद्युत टॉवर के विरोध में किसानों ने शोले स्टाइल प्रदर्शन किया। टॉवर बनाने के कारण गाँव के किसानों की दालें और ज्वार की फसलें बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है। शिकायत दर्ज कराने के बावजूद कंपनी के अधिकारी ने इसे नजरअंदाज किया, जिससे किसान गुस्साए और टॉवर पर चढ़कर आत्मदहन करने की चेतावनी दे बैठे। इसके बाद आटपाडी पुलिस मौके पर पहुंची और किसानों को समझाने का प्रयास किया, लेकिन किसान नुकसान की भरपाई मिलने तक टॉवर निर्माण नहीं होने देने की भूमिका पर अड़े रहे।
0
0
Report
Advertisement

चिपळूण तहसील कार्यालय में अजब कारभार: भंगार में गाड़ियाँ सड़कों पर पार्किंग संकट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. भंगाराला छप्पर, नागरिकांना ऊन-पाऊस!.. चिपळूण तहसील कार्यालयाचा अजब कारभार.. चिपळूण तहसील कार्यालयात सध्या एक अजब आणि संतापजनक कारभार पाहायला मिळत आहे. येथे प्रशासनाने जणू 'माणसांपेक्षा भंगाराला जास्त किंमत' दिली आहे. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची सध्या भंगारात निघालेली जुनी शासकीय वाहने चक्क शेडच्या छताखाला सुरक्षित उभी करण्यात आली आहेत.. दुसरीकडे, कामानिमित्त गावोगावातून येणाऱ्या शेकडो नागरिकांना मात्र आपली वाहने उघड्यावर, थेट पावसात उभी करावी लागत आहेत.. तहसील परिसरात हक्काची पार्किंग व्यवस्था नसल्याने कार्यालयाबाहेर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.. भंगाराची काळजी वाहणाऱ्या प्रशासनाला करदात्या नागरिकांच्या सुविधेचे काहीच सोयरसुतक नसल्याने सध्या च Chipplun मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. आता तरी हे सुस्त प्रशासन जागं होऊन नागरिकांसाठी सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करणार का? हाच मोठा प्रश्न आहे..
0
0
Report

रिठद–अटकळी मार्ग पुलों का काम देरी से रुका, छात्रों को 10 किमी अतिरिक्त यात्रा

Washim, Maharashtra:वाशिम जिला रिठद–अटकळी मार्ग पर पुलों के निर्माण कई महीनों से अधूरे पड़े हैं, जिससे नागरिकों और स्कूल के विद्यार्थियों को बड़ी कठिनाई हो रही है. पुलों के काम रुक जाने से मार्ग पर यातायात बाधित है और स्कूल बसें भी बंद हो चुकी हैं. परिणामस्वरूप विद्यार्थियों को प्रति दिन लगभग 10 किलोमीटर अधिक दूरी तय कर स्कूल जाना पड़ रहा है. इससे विद्यार्थियों के समय और आर्थिक खर्च में वृद्धि हो रही है, जबकि माता-पिता को भी दिक्‍तें हो रही हैं. येवती, रिठद, अटकळी और रिसोड क्षेत्र की दैनिक आवाजाही पर भी इसका असर पड़ा है. बरसात के मौसम को देखते हुए नागरिकों की कठिनाइयाँ बढ़ने की संभावना है, और पुलों के काम को तात्कालिक रूप से जल्द पूरा करने की मांग की जा रही है.
0
0
Report
Advertisement

चिपळूण में बरसात के बिना सड़कें गड्ढों में डूबीं, नागरिक बोले- सड़क या गड्ढा?

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..पावसाच्या सुरुवातीलाच चिपळूणचे रस्ते पाण्याखाली.. 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?' नागरिकांचा प्रशासनाला सवाल.. अँकर चिपळूण शहरात पावसाने जोर धरताच अंतर्गत दुरवस्था उघडी पडली असून अवघ्या बारा दिवसांतच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.. या लपलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला असून शहरातील वाहतूक कमालीची मंदावली आहे.. स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्याचा आरोप करत, नागरिकांनी 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.. प्रशासनाने आतातरी डोळे उघडून तातडीने हे खड्डे बुजवावेत आणि पाण्याचा निचरा करून जनतेला दिलासा द्यावा,अशी तीव्र मागणी चिपळूणवासीयांकडून केली जात आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top