416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागिना घाट पर गोदावरी नदी में डूबे दो युवक, दर्दनाक मौत
Nanded-Waghala, Maharashtra:नागिना घाट परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 19 वर्षीय गणेश डोंगरे आणि 14 वर्षीय रणवीर शिंगाडे या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी होते. गणेश व रणवीर हे नगीना घाट परिसरात गोदावरी नदीकाठी काल सायंकाळी गेले होते. नदीपात्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.0
0
Report
चंदूर के युवाओं ने मोर्णा नदी की सफाई अभियान चला कर एकता की मिसाल दी
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील चांदूर गावातील युवकांनी नदी स्वच्छतेचा संकल्प केला आणि आज हे अभियान संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या चांदूर गावातून मोर्णा नदी वाहते. मात्र गेल्या काही वर्षांत नदीपात्रात वाढलेली घाण, झाडाझुडपे आणि अतिक्रमणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. पावसाळ्यात काटेरी झाडांमुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याने पूरस्थितीही निर्माण होत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील काही युवकांनी पुढाकार घेत “नदी पुनर्जीवन” अभियान सुरू केले. युवकांनी गावकऱ्यांसमोर नदी स्वच्छतेची संकल्पना मांडली आणि विशेष म्हणजे सर्व जाती-धर्म तसेच सर्व पक्षांचे लोक मतभेद विसरून या अभियानात सहभागी झाले. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गावकऱ्यांनी स्वेच्छेने देणग्या देत या उपक्रमाला हातभार लावला. नदीपात्रातील काटेरी झाडे हटवून नदीचा प्रवाह मोकळा करण्यात आला. तसेच नदीपात्र रुंद करण्यात आल्याने भविष्यातील पुराचा धोका कमी झाला आहे. विशेष म्हणजे आता गावकरी केवळ नदीच नव्हे तर गावातील रस्त्यांचीही श्रमदानातून स्वच्छता करत आहेत. जवळपास दोन किलोमीटर लांबीच्या मोर्णा नदीला नवसंजीवनी देण्यासाठी सुरू असलेले हे अभियान पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकतेचेही उत्तम उदाहरण ठरत आहे. चांदूर गावातील युवकांनी दाखवलेली ही सकारात्मक दिशा इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. Byte : मिलिंद पाटील.0
0
Report
सोलापुर में अकलपनीय बारिश, बार्शी में बिजली गिरने से दो भैंसों की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा, बार्शीत वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू - गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा - मोहोळ तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लांबोटी येथील हॉटेलची आणि पेट्रोल पंपाच्या छताची मोठ्या प्रमाणात पडझड - तर दुसरीकडे बार्शीतील पिंपळगाव मध्ये वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू - जिल्ह्यातील काही भागांमध्ये आंबा डाळिंब असे शेती पिकांचे मोठे नुकसान0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे पर अंतरराष्ट्रीय सेवाओं के लिए इमिग्रेशन मंजूरी का इंतजार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विमानतळावर टर्मिनल सज्ज, काऊंटर उभे.. अगदी विमान कंपनीही थेट बँकॉक विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार आहे, मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळाची आंतरराष्ट्रीय भरारी केवळ एका सरकारी मंजुरीअभावी अडकून पडली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्ट मंजुरी न मिळाल्याने विमानतळावरून एकही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. चिकलठाणा विमानतळाला दोन वर्षापासून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आयसीपी मंजुरीची प्रतीक्षा आहे. याशिवाय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत नाही. दोन वर्षापूर्वी एअर एशिया कंपनी थेट बँकॉक विमानसेवेसाठी तयार होती, परंतु विमानतळाला इमिग्रेशन चेकपोस्ट नसल्याने ही विमानसेवा अडकली. गतवर्षी आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी धावपट्टीला टर्निंग पॅड वाढवणे, टॅक्सी-वे लिंक फिलेट वाढवणे, टर्मिनलवर स्वतंत्र इमिग्रेशन व इमिग्रेशन सिक्युरिटी, बोर्डिंग व चेक-इन काउंटर उभारणे आदी पायाभूत सुविधांचे काम करण्यात आले आहे0
0
Report
मालेगाव में गर्भलिंग रैकेट का पर्दाफाश; 23 हजार की मांग, 5 गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आरोग्य विभागाने डिकॉय ऑपरेशन राबवत माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर छापा टाकला. या तपासणीसाठी २३ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे समोर आले. कारवाई दरम्यान महिला डॉक्टर आणि मुख्य दलाल फरार झाले. या तपासणीसाठी रुग्णालय संचालक डॉ. विवेक माने यांच्यासह ५ जणांविरोधात PCPNDT कायद्यांतर्गत मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
जलसंकट चेतावनी: जायकवाड़ी सहित सभी जलाशयों का पानी 40% से नीचे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अलनिनोमुळे यंदा सरासरीखेappa कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून, जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर आहे. उपलब्ध पाण्यातून ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचे नियोजन केले आहे. कडक उन्हाळ्यामुळे लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी केले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पासह सर्वच मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पातील जलसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार जायकवाडी धरणांत आज ४० टक्के जलसाठा आहे. मोठ्या धरणात सरासरी ४३ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकारच्या धरणांत सरासरी ३० टक्क्यांपर्यंत घटला आहे. लघु प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांत सरासरी २० टक्केच पाणी उरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.0
0
Report
Advertisement
मालेगांव में मानसून पूर्वी तेज़ बारिश से कांदा किसानों को भारी नुकसान
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अचानक झालेल्या मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रीसाठी शेतातून काढून ट्रॅक्टरमधून बाजार समितीकडे नेला जात असलेला कांदा अचानक आलेल्या जोरदार पावसात पूर्णपणे भिजला. त्यामुळे आधीच कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में पानी की भारी किल्लत, निजी टंकरों की आपूर्ति प्रभावित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हाळ्यात छत्रपती संभाजी नगरच्या सातारा-देवळाई वासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बोअरवेल कोरडे पडल्याने खासगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, टँकरची मागणी वाढल्याने नागरिकांना तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात शहरात सध्या डिझेल टंचाईचा फटका खासगी टँकर चालकांना बसत आहे. डिझेल भरण्यासाठी चालकांना पेट्रोल पंपांवर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे तसेच परिसरातील विहिरी व टँकर भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोरिंगची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने टँकर चालकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाणी विकत घेण्यासाठी पैसे मोजूनही टँकर वेळेवर येत नाही. तसेच पाणी नसल्याने अनेकांना काम धंदे सोडून पाण्याची वाट बघावी लागते. काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांनी पाणी मिळत असल्याने महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे तसेच परिसरातील नागरिकांनी मनपाकडून सोसायटींना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.0
0
Report
जनगणना के लिए 10 शिक्षकों की गैरहाजिरी पर पुलिस को मामला दर्ज कराने की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जनगणनेच्या राष्ट्रीय कामासाठी संभाजी नगर महापालिकेने नियुक्त केलेले १० शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर राहिले आहेत. अखेर मनपा प्रशासनाने या दांडीबहाद्दर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी सिटी चौक पोलिसांना पत्र दिले आहे. झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्त तथा जनगणना अधिकारी यांनी हे पत्र दिले असून, सोबत शिक्षकांची यादीही जोडली आहे. कर्मचाऱ्यांवर 'जनगणना अधिनियम १९४८' च्या कलम ११ अन्वये गुन्हा या दाखल करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे0
0
Report
Advertisement
सोलापुर में अगले चार दिन हल्की बारिश की संभावना, गर्मी से राहत
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - आजपासून पुढील चार दिवस सोलापुरात रिमझिम पावसाचा इशारा. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरचे तापमान 40° वर स्थिर असताना शनिवारी रात्री शहर परिसरात पावसाने लावली होती हजेरी. शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमानात चार अंशांची घट, हवेत गारवा निर्माण झाला. रविवारी सोलापुरात 39.8 अंश से तापमानाची नोंद झाली. हवामानात आर्द्रता 32 टक्के पर्यंत राहिल्याने दिवसभर उकाडा कायम. आता पुन्हा एकदा पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता.0
0
Report
72 किमी ग्रीनफील्ड रोड परियोजना, 3452 करोड़ रु मंजूर; अलाइनमेंट तय होने की संभावना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या छत्रपती संभाजीनगरमधील तिन्ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या ७२ किलोमीटर लांबीच्या सहापदरी ग्रीनफील्ड रस्त्याचे काम आता अत्यंत वेगवान टप्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि तांत्रिक कागदपत्रांचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्याची अंतिम अलाइनमेंट निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पावर स्वतः लक्ष ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी मुंबईत एका विशेष बैठकीत या कामाचा सविस्तर आढावा घेणार आहेत. वाढत्या उद्योगांसाठी दर्जेदार, स्वतंत्र दळणवळण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने या ७२ किमी ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी ३,४५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.0
0
Report
हिंगोली के दुघाळा में गोठे की भीषण आग, किसान दिवाकर पवार के नुकसान
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या औंडा नागनाथ तालुक्यातील दुघाळा येथे शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, शेतकरी दिवाकर पवार यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने या आगीत शेकडो कोंबड्यांचा जळून मृत्यू झालाय तर संसार उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाल आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे. या आगीत शेकडो कोंबड्याचा जळून मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे...0
0
Report
Advertisement
मध्यरात्रि से पेट्रोल-डिज़ल के दाम बढ़े, किसान परेशान
Shirur, Maharashtra:इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला असून पंधरा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं असून मध्यरात्रीपासून पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महाग झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती इंधनाच्या किंमती वाढल्याने आणि वेळेवरती इंधन उपलब्ध होत नसल्याने शेती करायची तरी कशी तर दुसरीकडे शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय,याचाच पेट्रोल पंप वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
बिडकीन में दीवार तोड़कर देशी दारू दुकान से लाखों की चोरी, CCTV में कैद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भिंतीला बोगदा पाडून देशी दारूच्या दुकानात लाखोंची चोरी; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सोमपुरी रोडवरील देशी दारू दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
नाशिक में पेट्रोल-डीजल के दाम बढ़े, 25 मई 2026 से नए दर लागू
Nashik, Maharashtra:Nasik breaking डिझेल आणि पेट्रोलचे दर पुन्हा वाढले नाशिक शहरातील जुने आणि आजचे दर खालीलप्रमाणे Old rates Petrol 109.74 Diesel 96.30 New Rates from 25 May 2026 Petrol 112.47 Diesel 99.110
0
Report
Advertisement
