icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रामदास कदम ने सुनील तटकरे पर आरोपों के सख्त जवाब की चेतावनी दी

Ratnagiri, Maharashtra:रामदास कदम (शिवसेना नेते) खासदार सुनील तटकरे हे ऐहसानफरामोश माणूस आहेत. माझ्या घराला गटार म्हणता, मग दहा वर्षे या गटारात कशाला येत होतात? तेव्हा माझे घर गंगा झाले का? – रामदास कदम यांचा सवाल. तुझ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाठीला जखम असतानाही मी वणवण भटकलो. गटार काय असते, हे सुनील तटकरे यांना दाखवून देणार. – रामदास कदम यांचा इशारा. दापोली विधानसभा मतदार संघात माझ्या मुलाविरोधात त्यांनी गद्दारी केली. सुनील तटकरे नालायक माणूस... गद्दारीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. सुनील तटकरे यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. हा विश्वासघातकी माणूस... गटार काय असते, हे भविष्यात दाखवून देऊ. On उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन म्हणजे ते चांगले काम करत आहेत. राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर सर्वांनी आवाज उठवायला हवा. भाजपनेही यावर आवाज उठवला आहे. On मंडणगड पाणी योजना : मंडणगड पाणी योजना मंजूर करण्यात सुनील तटकरे यांचे कोणतेही योगदान नाही. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनीही ही योजना मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका. रामदास कदम यांचा तटकरे यांना सल्ला
0
0
Report
Advertisement

मुंबई वनराई पुलिस ने मध्यरात्रि रेशन चावल से भरा ट्रक पकड़ा, रैकेट की जांच

Mumbai, Maharashtra:मुंबईतील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेशनिंगच्या धान्याने भरलेला एक ट्रक सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या आधी मांड्य पोलिस ठाण्यात असा ट्रक पकडून गुणा दाखल करण्यात आळ या कारवाईमुळे रेशन धान्याच्या कलाबाजाराचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. वनराई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून रेशन धान्याने भरलेला ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केल्यानंतर तो ताब्यात घेण्यात आला असून चालकाची चौकशी सुरू आहे. हा ट्रक नेमका कुठून आला, कोणाच्या मालकीचा आहे आणि रेशनचे धान्य कुठे नेले जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे रेशन धान्याच्या काळाबाजाराचे रॅकेट आहेका, याचाही शोध घेतला जात आहे. ट्रकमधील धान्याची कागदपत्रे, परवानग्या आणि संबंधित व्यक्तींची माहिती पडताळण्याचे काम सुरू असून, तपासानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

नातेपुते में खाद्य विभाग का छापा: 1384 लीटर ड्रिंकिंग वॉटर-मैंगो जूस जप्त

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश,१३८४ लिटर संशयास्पद साठा; लेवल दोष व नियमांचे उल्लंघन मे. सत्यवेल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अचानक छापा टाकून ५३ हजार रुपये किंमतीचा १३८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचा साठा जप्त केला. तसेच तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आस्थापनेस तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूस या अन्नपदार्थांचे ०२ नमुने घेण्यात आले. उर्वरित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे ५८४ लिटर व मँगो ज्यूसचे ८०० लिटर, असे एकूण १३८४ लिटर, किंमत रु. ५३,०००/- चा साठा जप्त करण्यात आला. सदर साठ्यावर लेवल दोष, कमी दर्जा असल्याचा संशय व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले。
0
0
Report
Advertisement

दिल्ली में राजीनामे मांग पर सोनम वांगचुक की हिरासत, सरकार पर दबाव बढ़ा

Ahilyanagar, Maharashtra:दिल्ली में केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान के राजीनामे की मांग के दौरान सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक को दिल्ली पुलिस ने हिरासत में लेकर अस्पताल दाखिल कराया गया है। इस मामले पर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने प्रतिक्रिया दी है। सोनम वांगचुक पिछले बीस दिनों से उपवास कर रही थीं; उन्हें उपवासस्थल से हिरासत में लेकर अस्पताल में भर्ती कराया गया। हालांकि, इस कारवाई का सरकार से कोई संबंध नहीं है, यह जलसंपदा मंत्री ने स्पष्ट किया। उच्च न्यायालय के निर्देशानुसार ही यह कार्रवाई हुई है, और न्यायालय ने सोनम वांगचुक के वैद्यकीय परीक्षण का रिपोर्ट अदालत में प्रस्तुत करने के निर्देश दिए हैं — क्या इससे न्यायालय के निर्देश या मंशा पर शक होता है, यह सवाल उन्होंने उठाया। अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांबाबत राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अनेक अधिकारींचा देखील निर्माण झाला आहे. जलजीवन मिशन योजनेत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत. सरकारने केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला असून योजनेतील त्रुटी दूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर जल स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल, असे विखे पाटील यांनी व्यक्त केले. मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेमध्ये काही BELO यांनी काम करण्यास नकार दिल्याच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. SIआर अंतर्गत मतदारांचे मॅपिंग सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच मतदारांची योग्य ओळख निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडे किंवा प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; परंतु पावसामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही चांगला पाऊस पडेल, अशी आशा असून दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
0
0
Report

मुंबई में बारिश शुरू, अंधेरी वेस्ट मिल्लत नगर में पेड़ गिरा; रास्ता बंद

Mumbai, Maharashtra:मुंबईत पावसाची सुरुवात; अंधेरी पश्चिमेतील मिल्लत नगरमध्ये मोठे झाड कोसळले मुंबईत पावसाची सुरुवात होताच अंधेरी पश्चिम येथील मिल्लत नगरमधील दीप टॉवर इमारतीच्या आवारात एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे इमारतीच्या परिसरातील रस्ता पूर्णपणे बंद झाला. झाड कोसळल्यानंतर नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला आणि काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

डोंबिवली डॉक्टरों के हमले के विरोध में 24 घंटे राज्यस्तरीय बंद का आह्वान

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण ; येत्या सोमवारी आयएमएने पुकारला राज्यस्तरीय बंद कल्याणातील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या डॉक्टर मारहाणप्रकरणी महाराष्ट्र आयएमएने आक्रमक भूमिका घेत येत्या सोमवारी २४ तासांच्या राज्यस्तरीय बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र आयएमएच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ राजेश राघव राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यानंतरही शासनाकडून कोणतीही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्यापासून बेमुदत बंदचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेकडून यावेळी देण्यात आला आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ६ जुलै रोजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना घडली होती. ज्याचे कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर प्रशासनाकडून या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध झालेली कायदेशीर कारवाई असमाधानकारक असल्याचे सांगत महाराष्ट्र इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे येत्या सोमवारी 20 जुलै 2026 रोजी बंदची हाक दिली आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत शासनाने तयार केलेला कायदा अधिक कडक करणे, डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न होण्यासाठी एस ओ पी तयार करणे, भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शासनाकडून एक समुपदेशन समिती तयार करणे आदी आमच्या मागण्या असल्याचे डॉ. राजेश राघव राजू यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे शाम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य अभिजीत ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉ. राहुल काळे, केंपस्वा सुभाष कदम, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. किरण टोकेकर, आय एम ए कल्याणचे डॉ. हिमांशु ठक्कर हेदेखील उपस्थित होते. दरम्यान या 24 तासांच्या बंदमध्ये राज्यातील आपत्कालीन सुविधा सुरू राहतील मात्र सर्व डॉक्टर आपली ओपीडी बंद राहणार असल्याचेही यावेळी डॉक्टर संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले. तर यानंतरही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्याच्या 9 ऑगस्टपासून बेमुदत बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
0
0
Report

उल्हासनगर FDA ने बड़ी कार्रवाई: 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त

Ambernath, Maharashtra:FDA ने उल्हासनगरात मोठी कारवाई केली आहे. म्हशींना जादा दूधासाठी दिली जाणारी 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त झाले. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात प्रकाश वाधवानी यांच्या तबेल्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जादा दूध उत्पादनासाठी वापरली जाणारी 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन तसेच त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ऑक्सिटोसिनचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो. इतकेच नव्हे, तर अशा दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, बेकायदेशीरपणे जनावरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

रामरक्षा पर उद्धव ठाकरे के साथ जयकुमार गोरे का तीखा हमला

Pandharpur, Maharashtra:रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती उद्धव ठाकरेना आले आहे म्हणूनच त्याचा रामरक्षा म्हणू लागलेले आहेत असं खोचक टोला राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूर मध्ये रामरक्षा म्हणण्याचा आंदोलन सुरू केला आहे त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. राम भक्तीत काय ताकद आहे याची ठाकरे यांना अनुभव ती आली आहे राम भक्तीतून बाजूला गेल्यावर जी फळ मिळाली आहेत. त्यातून ते काहीतरी शिकतील. प्रभू आम्हाला त्यांना आता चांगली बुद्धी द्यावी आणि आता तरी त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं अशा पद्धतीच वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केला आहे
0
0
Report

मावळ में प्रशासन-प्रतिनिधि संघर्ष से जनता मुश्किल में

Varsoli, Maharashtra:Headline : मावळात पुन्हा 'टाळेबंदी'चं राजकारण प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्षात जनतेचीच कोंडी Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांच्या दालनांना टाळे ठोकण्याच्या सलग घटनांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोणावळा नगरपरिषदेनंतर आता पंचायत समितीतही अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित असले, तरी कार्यालयीन कामकाज ठप्प करून प्रश्न सुटतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. या संघर्षाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वयातून जनहिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत..
0
0
Report

श्रीरामपुर होटल व्यवसायी आकाश दुबैया हत्या के बाद पुलिस ने 28 कारवाइयां, शिकायतें सुलझाईं

Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर शहरातील हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैय्या यांच्या हत्येनंतर पोलिस प्रशासन अँक्शन मोडवर आले असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने पोलिस कारवाया सुरू आहेत...व्यापारी आणि जनतेमधील गुंडाची दहशत संपवण्यासाठी विविध उपाययोजना पोलिस अधिक्षक मुम्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहेत...वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षकांनी तक्रार निवारण केंद्र सूरू केले असून नागरिकांनी पहिल्याच दिवशी उस्फूर्त असा प्रतिसाद दिलाय... जून्या आणि नवीन तक्रारींचे अवलोकन करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच पोलिस अधिक्षक एम सुदर्शन यांनी म्हणटलय...अवैध धंदे तसेच वॉंटेड गुन्हेगार अशा 28 कारवाया करण्यात आल्या असून आज 55 तक्रारदारांचे समाधान केलय...दोषी पोलिसांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलिस अधिक्षकांनी दिलय...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top