icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में भारी बारिश, किसानों को मिली राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावासाची जोरदार हजेरी.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.. गेले २४ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उष्मा आणि उखाणे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उकाड्याची तीव्रता वाढली होती पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या नागरिकांना अखेर सोमवारी सकाळपासून पावसाने दिलासा दिला.. सुरुवातीला हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर नंतर वाढला.. त्यानंतर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळाले.. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले.. दरम्यान शेतीच्या कामांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. भात लागवडी पूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उन्हाच्या तडाख्यातून मोठा दिलासा मिळाला आहे..
0
0
Report

चंद्रपुर में भारी बारिश से बिजली व्यवस्था चरमरा गई, महावितरण कार्यालय के बाहर प्रदर्शन

Chandrapur, Maharashtra:टायटल: पावसाचा तडाखा आणि झाडे उन्मळून पडल्याने चंद्रपुरात दीर्घकाळ विजेचा खेळखंडोबा, संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर घेतली धाव ,तणावपूर्ण परिस्थिती नंतर पोलिसांना करण्यात आले पाचारण आँकर: पावसाचा तडाखा आणि झाडे उन्मळून पडल्याने चंद्रपुरात दीर्घकाळ विजेचा खेळखंडोबा बघायला मिळत आहे. दुपारी 3 वाजता पाऊस आल्यावर बहुतांश भागात ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि झाडे उच्च दाब वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्रभर सुरळीत झाला नाही. संतप्त नागरिकांनी शास्त्रीनगर येथील महावितरण कार्यालयावर धाव घेत अधिकारी- कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तणावपूर्ण परिस्थिती नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. गर्दी पांगल्यानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र 2 तासात पुन्हा शहर काळोखात गेले. सध्या चंद्रपूरच्या बहुतांश भागात वीज पुरवठা खंडित झाला आहे.
0
0
Report

भंडारा में गैस सिलेंडर चोरी: घर से 10 सिलेंडर चुराए

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याने नागरिक हैराण,चक्क घरात ठेवलेले १० सिलेंडर चोरट्यांनी नेले चोरून..ANCHOR: भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात सिलेंडर तुटवडा कायम असून. गॅस एजन्सी मधून नवीन कनेक्शन देणे बंद आहे त्यामुळे आता चक्क घरातून गॅस सिलेंडर चोरीच्या घटन काही गावात घडल्या आहेत.लाखनी तालुक्यातील सलेभाटा परिसरात अनेक गावातून घरात ठेवलेले रिकामे व काही गॅस भरलेले १० सिलेंडर चोरी झाले आहेत त्यामुळे आता अनेक कुटुंबांना स्वयंपाक बनवायची अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

EL Niño के कारण लातूर के स्कूल अब सुबह 8 से दोपहर 12:30 बजे तक

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांवर परिणाम... लातूर जिल्ह्यातील शाळा आता सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंतच....एल-निनोच्या प्रभावामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय... पावसाळा सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रातच शाळा... AC ::- लातूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेतच भरवण्यात येणार आहेत. यापूर्वी शाळांची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० अशी होती. एल-निनोच्या प्रभावामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रातच शाळा सुरू राहणार आहेत......
0
0
Report
Advertisement

नाशिक में 9 हजार रुपये के विवाद में युवक की हत्या; आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिक - - टेरेसवर गोनीत आढळलेल्या मृतदेहाचा खुलासा - उसनवार दिलेल्या नऊ हजार रुपयांच्या वादातून युवकाचा खून - रेल्वेने फरार होण्यापूर्वीच संशयित आरोपीस बेड्या - नाशिकच्या कामगारनगर परिसरातील वैष्णव मिलिंद शिंदे या युवकाचा केवळ ९ हजार रुपयांच्या उसनवारीतून खून - संशयित आरोपी कृष्णा दुसाने याने वैष्णवचा मृतदेह आपल्यााच घराच्या टेरेसवर पोत्यात भरून ठेवला होता. - आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधी आल्याने कृष्णाचा डाव फसला - तो मुंबईकडे पळून जण्याच्या तयारीत असताना नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले
0
0
Report
Advertisement

पिंपरी चिंचवड के भंगार गोदाम में भीषण आग, दमकलें आग पर काबू पाने में जुटी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:कुदळवाडी मधल्या भंगारच्या गोदामाला भीषण आग. कुदळवाडी मधल्या महादेव मंदिर जवळ असलेल्या एका भंगारूच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, रबर, लाकूड आणि इतर साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे दरम्यान या भंगारच्या गोदामाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकाेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळाकडे रवाना होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. आग लागलेला भंगार गोदाम अतिशय अरुंद आणि खूप वळणाच्या ठिकाणी असल्याने अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगीची तीव्रता पाहून पिंपरी चिंचवड शहरातील इतर अग्निशमन केंद्रातील अग्नीशमन बंब वाहन देखील बोलविण्यात आले. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून त्या ठिकाणी कुलिंग च काम अग्निशमन दला कडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

मनमाड में दोहरे हत्या: आरोपी ने दो लोगों के सिर पर पत्थर से हमला किया

Nashik, Maharashtra:मनमाड शहर.. माथेफिरूने रस्त्याच्या कडेला होपलेल्या दोघांच्या डोक्यात दगड घालून केला निर्घृणपणे खून.. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला केले जे्रबंद.. दुहेरी हत्याकांडाने मनमाड शहर हादरले असून एका माथेफिरूने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे त्यांचा खून केला. खून करण्यात आलेल्या एकाची ओळख पटली असून बाळू प्रल्हाद अमृतसागर असे त्याचे नाव आहे तो धुळे जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असून दुसऱ्याची ओळख पटली नाही.खून केल्या नंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी जे्रबंद करून गजाआड केले मनोज नंदू बोमराज असे या आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील खंडाव्याच्या पांडाणा येथील आहे.त्याने मध्यरात्री नंतर पुणे-इंदूर महामार्गाला खेटून असलेले एसटी स्टॅन्ड आणि एचपी पेट्रोल पंप अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेल्या दोघांच्या डोक्यात दगड घालून ठार केले. आरोपी मनोरुग्ण असल्याच्या प्राथमिक माहिती असून त्याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
0
0
Report

महाबळेश्वर के विल्सन पॉइंट को रात में बंद, सुरक्षा और अव्यवस्था रोकथाम के लिए

Satara, Maharashtra:महाबळेश्वरमधील सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेला विल्सन पॉईंट परिसर आता रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसह रात्रीच्या वेळी वाढलेला मद्यपी उपद्रव, कचरा आणि अस्वच्छता रोखण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.विल्सन पॉईंटकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर गेट बसविण्यात आले असून बंदीबाबत माहिती फलकही लावण्यात आले आहेत. पहाटे सूर्योदय आणि सायंकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांना प्रवेश राहणार असला, तरी रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रवेश बंद असेल.
0
0
Report

वाशीम जिले में मध्यरात्रि से बारिश, किसानों को राहत; खरीफ की तैयारी तेज

Washim, Maharashtra:रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:वाशिम जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. शेतात पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने मशागतीच्या कामांना गती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे.आणखी एक-दोन चांगले पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष पुढील पावसाकडे लागले असून,समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत ते आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top