icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई: दहिसर पूर्व में तेज कार ने लोगों को कुचला, एक महिला गंभीर घायल

Mumbai, Maharashtra:मुंबईतील दहिसर पूर्व येथील आर.टी. परिसरात भरधाव कारने अचानक अनेकांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report

मुंबई के कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स में मध्यरात्री चोरी: चार दुकानों के शटर तोड़े

Mumbai, Maharashtra:मुंबईतील कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समधील गोकुळ नगरी-१ या उच्चभ्रू परिसरात मध्यरात्री धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सलग चार दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.\n\nया घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांमध्येही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये चोरटे अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\n\nघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\n\nया घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

Versova में पानी की पाइप फटने से जल जमाव, यातायात प्रभावित

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या वर्सोवा परिसरातील जे.पी. रोडवरील संजीव एन्क्लेव्ह, ७ बंगलो येथे आज पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली. काही क्षणांतच हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसर जलमय झाला आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे काही काळ वाहतूकही मंदावली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ महापालिकेला याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पाणीपुरवठा काही काळासाठी प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा घटना टाळण्यासाठी पाईपलाईनची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण लॉज में भाई-बहन ने हाथ काटकर आत्महत्या की कोशिश; हालत स्थिर

Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे स्टेशन के सामने महाराष्ट्रीय लॉज में भाई-बहन ने हाथ की नस काटकर आत्महत्या प्रयास किया, यह धक्कादायक घटना सामने आई है. इस घटना से क्षेत्र में हलचल मच गई. सुनील बेलशेकर उम्र 56 और पद्मजा बेलशेकर उम्र 53 की ज़ख्मी भाई-बहन की नाम हैं. पुलिस ने जानकारी दी अनुसार दोनों बेरोजगार हैं तथा कामधंधा नहीं होने के कारण निराशा से उन्होंने यह कदम उठाया. ये दोनों असनगांव से कल्याण आए थे. महाराष्ट्रीय लॉज में उन्होंने हाथ की नस काटकर आत्महत्या का प्रयास किया. सूचना मिलते ही पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुँचाकर दोनों को इलाज के लिए कलवा के छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में भर्ती कराया. अभी दोनों की हालत स्थिर है
0
0
Report

नाशिक गोदावरी खतरे से चांदोरी में बाढ़ आशंका, प्रशासन ने स्थान जाने को कहा

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये सतत संतधार सुरू असल्यामुळे गंगापूर दारणा या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने पात्र सोडले असून चांदोरी गावाला पुराचा विळखा पडायला सुरुवात झाली आहे रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्यामुळे चांदोरी गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला असून सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे दरम्यान निफाड तालुक्यातील चांदोरी गावातून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे
0
0
Report
Advertisement

सादाभाऊ खोत के पोस्टर पर हमला; राष्ट्रवादी कांग्रेस के विरोध प्रदर्शन तेज

Sangli, Maharashtra:स्लग - आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा निषेध.. अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सांगलीत आंदोलन करण्यात आले आहे. आमदार खोत यांच्याकडुन दिल्लीतील आंदोलन विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी उपमा देण्यात आली होती. यावरून तीव्र पडसाद उमटत आहेत, सांगलीत देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने खोत यांच्या विरोधात निदर्शने करत आमदार खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे,शहरातील कॉलेज कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार खोत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

CJP आंदोलन में राजनीतिक घुसखोरी के आरोप, सरकार ने बातचीत की भूमिका दोहराई

Shirdi, Maharashtra:शिर्डी / अहिल्यानगर मंत्री विखे पाटील बाईट ऑन CJP आंदोलन बाईट ऑन ठाकरे बंधू CJP चे आंदोलन विशिष्ट मागण्यासाठी होते... सरकारने चर्चेची भूमिका घेतली है... मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू झाले... राजकीय लोकांनी आंदोलनात घुसखोरी केली... जनाधार गमावलेल्या लोकांनी विद्यार्थी आंदोलनाचा आधार घेतलाय... CJP च्या आंदोलकांनी राजकीय घुसखोरांना बाजूला केलं पाहिजे... घुसखोरांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न... पोलिसांवर दगडफेक, नुकसान, हे आंदोलनाचे लक्षण नाही... सरकारला बदनाम करण्यासाठी राजकीय पक्षांचे गुंड आंदोलनात घुसलेत... हिंसा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे... राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना जनता धडा शिकवेल... ऑन मनोज जरांगे इशारा - सरकार आंदोलकांच्या विरोधात नाही... नीटचे निकाल आलेत.. कुणीही तक्रार केली नाही... नीट पेपर फुटीत सत्ताधारी पक्षांचे नाही, तर कोचिंग क्लासचे लोक आढळलेत... जरांगे पाटलांना विनंती आहे... विद्यार्थी आंदोलनात जे राजकीय पक्षाचे लोक घुसलेत, त्यांचा पहिला बंदोबस्त करा... ऑन काँग्रेस काळात पेपर फुटी - पेपर फुटण्याची घटना पहिल्यांदा घडली नाही... भाजप सरकारने उलट पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलाय... कांग्रेसच्या काळातही पेपर फुटीचे प्रकार घडले आहेत... ज्यांचा जनाधार संपलाय असे लोक आता राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करताय... विरोधी पक्षाला चर्चा होऊ द्यायची नाही... विरोधी पक्षांची रस्त्यावर झोपून नौटंकी सुरू... शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न... Byte - radhakrishnan vikhe patil
0
0
Report
Advertisement

जयंत पाटील बोले: मुंबई पुलिस ड्रग्स मामले में कार्रवाई क्यों नहीं?

Sangli, Maharashtra:टेक - ड्रग्ज बाबत केलेल्या विधानावरून जयंत पाटील यांची मुंबई पोलिसांवर टीका. मुंबई पोलिसांच्या ड्रग्ज संबंधित कथित व्हिडिओवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलिसाकडून ड्रग्जची धमकी देत अडकवण्याचे विधान करण्यात आले असून, यावरून आमदार जयंत पाटलांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्स येतात कुठून ? पोलिस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होते., तसेच आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उध्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भिती व्यक्त करत अशा घटनांमुळे लोकांचा पोलीस यंत्रणेवर गैरविश्वास निर्माण होतो. त्यामुळे वेळीच अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील आमदार जयंत पाटील यांनी केली आहे, ते सांगलीच्या ईश्वरपुर मध्ये बोलत होते.
0
0
Report

चंद्रपुर के बल्लारपुर में कांग्रेस का धरना, दिल्ली लाठीचार्ज पर सरकार पर सवाल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के बल्लारपुर शहर में कांग्रेस कमिटी की वती से दिल्ली लाठीमार विरोधात धरने आंदोलन, सरकार ने ठीक पेपर फूट और विद्यार्थी आंदोलन को सही प्रकार से संभाले नहीं जाने की शिकायत माजी आमदार_subhash_dhoite_ ने की। देशभर में दिल्ली के जंतर मंतर आंदोलन और विद्यार्थी लाठीमार विरोधा की श्रृंखला चल रही है। चंद्रपूर जिले के बल्लारपुर शहर में आज कांग्रेस कमिटी की वती से विद्यार्थी लाठीमार विरोधात धरने आंदोलन किया गया। इसमें शहर व तालुका कांग्रेस कमिटी के पदाधिकारी नेता व कार्यकर्ता शामिल हुए। सरकार ने पेपर फूट और विद्यार्थी आंदोलन को सही प्रकार से संभाले नहीं जाने की टिप्पणी माजी आमदार कांग्रेस जिल्हाध्यक्ष_SUBHASH_DHOITE ने इस मौके पर की। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान द्वारा इस्तीफा देकर इस समस्या को समाप्त करने की मांग भी उठाई गई।
0
0
Report

आषाढ़ी एकादशी पर पंढरपूर में रिकॉर्ड भीड़, विठोबा के चरण स्पर्श दर्शन के लिए भक्तों की कतार मंदिर से गोपालपुर कॉलेज तक

Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूर हाउसफुल्ल, विठोबाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिर पासून गोपाळपुरच्या कॉलेज पर्यंत, 2018 नंतर या वर्षी झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी, आषाढी वारीसाठी जवळपास सर्वच संतांच्या पालख्या आज पंढरपूर जवळ आल्या आहेत. त्यामुळे या पालख्या मधील वारकरी विठोबाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जाऊ लागले आहेत. त्यामुळे ही रांग गोपाळपूर मधील स्वेरी कॉलेज पर्यंत गेली आहे. अचानक झालेली गर्दी मुळे मात्र प्रशासनावर ताण आला आहे. अनेक ठिकाणी बॅरीकेटिंग तसेच इतर सुविधा नसल्याने वारकऱ्यांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. स्वेरी कॉलेज कडून 500 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में युवा कांग्रेस ने दिल्ली के विद्यार्थियों पर लाठीचार्ज का तीव्र विरोध किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये युवक काँग्रेसने आक्रमक होत दिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदविला. दारव्हा मार्गावर मोठ्या संख्येने गोळा झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोळा होत, केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून चक्काजाम आंदोलन सुरू केले. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पोलिसांनी आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केले.
0
0
Report

नाशिक में भारी बारिश से गोदावरी नदी में बाढ़, 55775 क्यूसेक विसर्ग शुरू

Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात घोटी इगतपुरी त्रंबकेश्वर दिंडोरी या परिसरामध्ये सतत संतधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाकडून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळं गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने 55775 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून निफाड सिन्नर राज्य मार्ग वाहतुकीसाठी सकाळ पासून बंद ठेवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

अकोला जेल में आरोपी कैदी ने आत्महत्या: पत्नी हत्या के मामले की जांच जारी

Akola, Maharashtra:अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन बंदीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावंडगाव येथील अनिल ओंकार निंबोकार (वय 35) यांनी कारागृहातील विहिरीत उडि घेऊन जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. अनिल निंबोकार याने चार महिन्यांपूर्वी पत्नी वृषाली निंबोकार यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्या हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती आणि तो अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तेरा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्याला दोन मुले असून, आई-वडिलांसह दोन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या आणि त्यानंतर कारागृहात झालेली आत्महत्या या दुहेरी घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आणि कारागृह प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top