416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कांदिवली में 610 ग्राम सोने की धोखाधड़ी: बैंक उपशाखा प्रबंधक गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:कांदिवलीत ज्येष्ठ नागरिकाची बँक लॉकरमधील ६१० ग्रॅम सोन्याची फसवणूक; बँक मॅनेजरला अटक मुंबईच्या कांदिवली परिसरात अनिवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक लॉकरमधून तब्बल ६१० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी इंडसइंड बँकेच्या तत्कालीन उपशाखा प्रबंधकाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ८१ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. फिर्यादी प्रदीप भाटीया हे गेल्या ५२ वर्षांपासून दुबईत वास्तव्यास आहेत. २२ मार्च २०२४ रोजी त्यांनी कांदिवली पश्चिमेतील एम. जी. रोडवरील इंडसइंड बँकेच्या लॉकरमध्ये ६१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले आणि ते दुबईला परत गेले. तब्बल दोन वर्षांनंतर दागिने घेण्यासाठी बँकेत आल्यानंतर लॉकरमधील सर्व दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तपास करताना तत्कालीन उपशाखा प्रबंधक कुलदीप रामचंद्र सहानी याच्या बँक खात्यांची माहिती घेतली. गेल्या दोन वर्षांत त्याच्या खात्यात सुमारे ९ कोटी रुपयांचे व्यवहार झालेले समोर आले. तसेच सोने तारण ठेवणाऱ्या संस्थांशी मोठ्या प्रमाणात व्यवहार आढळून आले. तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी सहानीला अटक केली. त्याने तारण ठेवलेल्या सोन्याचे फोटो मिळवून फिर्यादीकडून त्याची खात्री करण्यात आली. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी ६१० ग्रॅम सोने जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला.0
0
Report
पवई में नजर चुराने के बहाने घर घुसकर महिला से दुष्कर्म; गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नजर काढण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली आहे. दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपári सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या राहत्या घरी असताना ‘अनिल’ नावाचा तृतीयपंथी व्यक्ती नजर काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात आला. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन महिलेशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९०/२०२६, कलम ६४(१), ३५१(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करत आरोपीचा ठावठिकाणा मिळवण्यात आला. आरोपी कळवा येथील झोपडपट्टी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी तृतीयपंथी नसून भीक मागणारा बहुरूपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील आरोपी अनिल शेषराव शिंदे, वय २८ वर्षे, व्यवसाय – भीक मागणे, राहणार गोळाई नगर, गोळाई देवी मंदिराच्या मागे, खारेगाव, कळवा, ठाणे, याला १९ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.0
0
Report
कोल्हापुर के संत बालूमामा देवस्थान ट्रस्ट में 60 करोड़ रुपये घोटाला, SIT जांच शुरू
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथं असणाऱ्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी और आठ पोलीस कर्मचारी अशा एकूण बाराच जणांचा या पथकात समावेश आहे. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून निष्पन्न झाले होत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत मेंढ्यांची विक्री तसेच जमीन खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तात्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिनी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरे यांच्यासह कंत्राटदार आणि संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून देवस्थानच्या विविध आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असून, विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत. आता SIT स्थापन झाल्याने या प्रकरणातील तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
अमित ठाकरे का नाशिक दौरा: विश्वविद्यालयों में छात्रों के साथ संवाद की योजना
Nashik, Maharashtra:- मनविसेचे नेते अमित ठाकरे साधणार झेन जी सोबत संवाद - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर - शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थ्यांशी साधणार संवाद - मनविसेच्या युनिटचे उद्घाटन आणि सभासद नोंदणीचा घेणार आढावा - सकाळी ९ वाजता अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात - सकाळी ९.३० वाजता उत्तमनगर येथील कर्मवीर वाबळे महाविद्यालयाला भेट - त्यानंतर आर.बी.के. महाविद्यालय, के.बी.टी. इंजिनिअरिंग, के.टी.एच.एम. आणि के.के. वाग महाविद्यालयाला भेटी - विविध महाविद्यालयांमध्ये मनविसेच्या युनिटचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मनविसेकडून आवाहन0
0
Report
आदिवासी आश्रमशालाओं में 2421 शिक्षक भर्ती, चार जिलों में प्रक्रिया शुरू
Nashik, Maharashtra:आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये २ हजार ४२१ शिक्षक पदांसाठी भरती आदिवासी विकास विभागाकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षकांची भरती नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर विभागातील आश्रमशाळांमध्ये भरती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे भरणार पेसा क्षेत्रातील ८८५ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार ५३६ पदांचा समावेश नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे उपलब्ध ठाणे विभागात ६१३, अमरावतीत ४६८, तर नागपूर विभागात ५१४ पदे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची पदे भरणार उच्च माध्यमिक स्तरावर विविध विषयांच्या शिक्षकांचीही भरती पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणार उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांचे आवाहन0
0
Report
नाशिक कोर्ट ने निदा खान को 50 हजार रुपए के जमानत पर शर्तों के साथ राहत दी
Nashik, Maharashtra:*मल्टिनॅन्ड्र कंपनी प्रकरणातील संशयित निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यात देखील सशर्त जामीन* नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने निदा खानला दिलासा ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर मल्टिनॅशनल कंपनी प्रकरणातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी निदा खान आहे संशयित आरोपी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात निदा वर झाला होता पहिला गुन्हा दाखल त्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा झाला होता दाखल न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय नाशिक जिल्हा सोडता येणार नाही0
0
Report
Advertisement
पुणे में गणेश उत्सव और दहीहंडी पर पुलिस अनुमति, आयोजक तैयारियाँ तेज
Pune, Maharashtra:पुणे पुण्यात गणेश भक्ताची महाआरती. दहीहंडी गणेश उत्सव निर्बंधा विरोधात गणेश मंडळ आक्रमक. पुण्यातील गणेश उत्सव आणि दहीहंडी कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी द्यावी. स्पीकर और डीजे परवानगी द्यावी. आपला धर्म आपला सण आपली दहीहंडी आणि गणेशोत्सव वाचवण्यासाठी एकत्रित. गणेश मंडळाचे पुण्यातील अखिल मंडई शारदा गणेश गणपती समोर आरती.0
0
Report
पुणे महापालिका में भाजपा के अहंकार पर अमोल बालवडकर निशाने पर, जनता के सवाल उठते रहेंगे
Pune, Maharashtra:एनसीपी नगरसेवक अमोल बालवडकर माझं बजेट झीरो करणाऱ्या बीडकरांना आमच्या नेत्या सुनेञा पवार यांना पञ लिहिण्याचा नैतिक अधिकारच नाही, पुणे मनपात भाजपला सत्तेचा अहंकार आलाय, स्वर्गीय अजितदादांनी अर्थमंञी असताना भाजपसोबत कधीच सुडाचं राजकारण केलं नाही, मग तरीही भाजप आमच्या सोबत सुडाचं राजकारण का करतंय, असा सवाल बालवडकरांनी उपस्थित करत आम्ही जनतेचे प्रश्न मांडतच राहू, असं म्हटलंंय0
0
Report
पुणे मनपा बजट विवाद: बालवडकर पर आरोप, बीडकर ने मुख्यमंत्री को शिकायत भेजी
Pune, Maharashtra:Pmc ncp vs bjp पुणे मनपाचे भाजप सभागृह नेते गणेश बीडकर यांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांची तक्रार थेट उपमुख्यमंञी सुनेञा पवार यांच्याकडे केलीय...विशेष म्हणजे त्यांनीच अजित दादांच्या राष्ट्रवादीला बहुमताच्या जोरावर भर जीबीत राजकीय दमबाजीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भाजपचे बंडखोर नगरसेवक अमोल बालवडकर यांचा प्रभाग निधी बजेट शुन्य केल्यावरून भाजपा राष्ट्रवाद हा सगळा वाद सुरू झालाय....आपल्याला झीरो बजेट मिळाल्यावरून बालवडकरांनी पालिका सभागृहात आवाज उठवला होता त्यावेळी याच गणेश बीडकरांनी विरोधी पक्षनेते निलेश जगताप यांना, राज्यात आपण महायुतीत एकञ असलो तरी यापुढे पुणे मनपात आमचे आमचे तुम्हाला असहकार्य असेल, अशा इशारा दिला होता त्याच बीडकरांनी आता थेट उपमुख्यमंञी सुने़ञा पवारांना दिर्घ पञ लिहित बालवडकरांची तक्रार केलीय त्यामुळे पुणे भाजप आणि राष्ट्रवादीतला हे 'बजेट वॉर' वरिष्ठ ने त्यांच्या समेटाने मिटणार की आणखी वाढत जाणार हे लवकरच कळेल...0
0
Report
Advertisement
बहन ने लिवर दान के बावजूद अस्पताल बिलिंग के खिलाफ वीडियो वायरल किया
Nagpur, Maharashtra:बहिणीने आपल्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे लिवर दिलं.. मात्र त्यानंतरही उपचारादरम्यान भावाचा मृत्यू झाला... मृताच्या नातेवाईकानी यानंतर खाजगी रुग्णालयाच्या (मॅक्स हॉस्पिटल) उपचार आणि बिलिंग प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले.. (वायरल व्हिडिओ मध्ये मृत व्यक्तीची बहीण आरोप करताना दिसत आहे). उपचारादरम्यान मॅक्स हॉस्पिटल ने रुग्णाच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे घेतल्याचा आरोप ही मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.... वायरल व्हिडिओ मध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील उपचार प्रक्रिया आणि बिलिंग व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.0
0
Report
ओबीसी आरक्षण बचाने को लक्ष्मण हाके का बड़ा आह्वान; महाराष्ट्र में आंदोलन तेज
Rui, Maharashtra:बारामती_ ओबीसी नेते लक्ष्मण हाके पत्रकार परिषद ऑन बारामती दौरा 1 सप्टेंबरला आक्रोश मोर्चा घेऊन मुंबईला जाणार आहात त्याचं नियोजन करण्यासाठी दररोज दुपारपासून रात्री बारा एक वाजेपर्यंत घोंगडी बैठका घेत आहोत ओबीसींना आवाहन करत आहोत. आपल आरक्षण आज रोजी गेल आहे. ते कसं गेलं आहे हे ओबीसींना समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. ऑन ओबीसी जनता पार्टीची स्थापना कोणाचातरी मुख्यमंत्री व्हायचं आमदार खासदार व्हायचंय म्हणून पक्ष काढायचा नाही, व्यवस्थेमध्ये पोकळी निर्माण होते त्यावेळी चळवळी मधून पक्षा जन्माला येतात. आमच्या ओबीसींच आज रोजी आरक्षण संपूर्ण गेल आहे आमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही. ज्यांना ज्यांना ओबीसींनी मतदान दिल त्या महाराष्ट्रातला एकही मंत्री लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. राज्याच्या कालच्या पावसाळी अधिवेशात एक लक्षवेधी देखील या महाराष्ट्रातील दोनशे तीनशे आमदारांनी आणली नाही. मग आम्हाला आमचं पक्षाचा विचार करावा लागेल. पहिल्यांदा ओबीसींच्या आरक्षणाचा संरक्षण कसं करता येईल यासाठी चळवळ उभा केली आहे पुढे जाऊन ओबीसी जनता पार्टीची घोषणा होईल आणि आम्ही ती करू लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीत त्याची घोषणा करू ऑन ओबीसींचे प्रश्न काय आज रोजी शंभर टक्के आरक्षण संपल आहे. मंत्रीगणांनी आम्हाला बोलायला तयार नाहीत. 22 लाख 20 हजार 577 प्रमाणपत्र मराठा समाजाला वाटली गेली. आता उरली सुरली चॅलेंज झालेली प्रमाणपत्र त्यांना रेगुलर करून घ्यायची आहेत,म्हणून तर मनोज जरांगे 29 तारखेला उपोषणाला बसणार आहेत देऊन टाका ना मग ओबीसीच आरक्षण ओबीसीच्या बाजूने एक माईचा लाल बोलायला तयार नाही... ऑन ओबीसींच आरक्षण कसं वाचू शकतं मराठा समाजाला दहा टक्के एसीबीसीच आरक्षण का दिल आहे, गोरगिरिबाच्या लेकराचा प्रश्न आहे म्हणूनच दिला आहे. देशभरात प्रत्येक राज्यात हा प्रश्न निर्माण झाला होता.देशाच्या संसदेने 103 वी घटनादुरुस्ती करून आणि आरक्षणाला ते तुम्हाला का नको आहे. मग आर्थिक बेसवर घटनादुरुस्तीपूर्ण आरक्षण दिला आहे ते तुम्हाला ka नको. ओबीसी मधून पाहिजे हा अट्टहास कशासाठी ? गावगाड्यातील ओबीसीच जे नेतृत्व आहे एखादा सभापती नगरसेवक पोलीस पाटील सरपंच हे यांना ओरभडून घ्यायच आहे. आरक्षणाच्या माध्यमातून एखादा गावगाड्यातील ओबीसीचा व्यक्ती पुढे येत होत होता त्याला तुम्हाला संपवून टाकायचं आहे. ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने आमदार सर्वांनी मिळून संपवलेल आहे माझं राज्य सरकारला आज जाहीर आव्हान आहे की तुम्ही ओबीसींच आरक्षण संपवल आहे ऑन ओबीसी नेते शांत کا सत्तेमधील ओबीसी नेत्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा, ओबीसींच्या प्रश्नावर तुम्ही बोलणार नसाल तर तुम्हाला ओबीसी जाब विचारतील ऑन ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेवर तुम्ही का बोलत नाहीत जातनिहाय जनगणना 1948 च्या सेल्सिस ऍक्ट मध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत जात निहाय जनगणना होणार नाही. देशात कास्टवाईज सेल्सिस जनगणना होऊच शकत नाही बिहार छत्तीसगड मध्ये जो झाला तो सोशल इकॉनोमिकल सर्वे झाला. 1948 चा सेल्सिस ऍक्ट असं सांगतो की इथे कास्ट वाईज सेल्सिस होणार नाही आज पर्यंत अनेक सरकार आले गेली सर्वांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणना करण्याची आश्वासन दिली पण कोणीही निर्णय केला नाही. आमच्या ओबीसींच्या संघटनेची पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे. या महाराष्ट्रात 22 सभा लक्ष्मण हाकेने घेतले आहेत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. आमचा हा पहिला प्रश्न आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. लक्ष्मण हाकेने शंभरहून जास्त वेळा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आवाहन या सरकारला दिल आहे. 1948 चा सेल्सिस जात निहाय जनगणना करायला मान्यता देत नाही, हे पुढारी खोटं बोलत आहेत राज्यातील ओबीसी जनतेच्या तोंडाला पाणी पुसत आहेत. राज्य मागासाच्या आयोगावर मी रात्रंदिवस काम केला आहे.मी अभ्यास केला आहे मी आभाळातून बोलत नाही. जोपर्यंत 1948 च्या सेल्सिस ऍक्ट मध्ये घटनादुरुस्ती होणार नाही,या देशाच्या संसदेत विचार होणार नाही,तोपर्यंत जे पुढारी तुम्हाला जात नाही जनगणनेच आश्वासन देत आहेत ते तुम्हाला फसवत आहेत. जोपर्यंत तुमची जात निहाय जनगणना होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील बजेट तुम्हाला मिळणार. आज शंभर टक्के बजेट पैकी ओबीसीला शून्य पूर्णांक सहा टक्के बजेट फक्त आहे. एखादी शिवी दिली तर ब्रेकिंग बातमी होते पण आम्ही जी मागणी करतो ती मीडिया दाखवत नाही. आरक्षण कसं संपल हे सांगून सांगून आमचा घसा बसला कोणतरी येतो आणि तोंडावर काहीतरी मारून जातो. ऑन एक सप्टेंबर नंतर तुमची भूमिका काय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून आमच्या हजारो फोर व्हीलर मुंबईसाठी निघतील. जर तुम्हाला 27 टाक्याच्या आतून आरक्षण द्यायचा असेल तर महाराष्ट्रातील 48 खासदार दिल्लीत गेलेत त्या खासदारांना माझा सवाल आहे तुम्ही इकॉनॉमिकल विकर सेक्शन चा जे आरक्षण दिलं आहे 103 वी घटनादुरुस्ती करून दिला आहे त्याचा उद्देश महाराष्ट्रातील या आंदोलकांना समजावून सांगा, नाहीतर ई डब्ल्यू एस सी बी सी रद्द करा. 27 टक्केमध्ये घटनादुरुस्ती करा आणि त्यामध्ये रखाना करा आणि त्यामध्ये त्यांना काय द्यायचं ते द्या सामाजिक दृष्ट्या मागासाच्या आरक्षणामध्ये जर तुम्ही आमचा मोठा बंधू शासनकर्ती जमात असलेला बंधू यात आला तर गावगाड्यातील या भटक्या विमुक्त जमाती टिकणार नाही. आम्ही आज सांगत आहोत किंवा ओबीसीचे आरक्षण संपलेल आहे. 2017 पासून महाराष्ट्रात आजपर्यंत 22 लाख 20 हजार 577 कुणबी दाखले वाटले. साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष पद तिथल्या अध्यक्षा ओपन जागेवर निवडून आल्या, साडेअकरा वाजता दाखला काढला आणि दीड वाजता ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले ओबीसी च्या जागेवर सभापती झाल्या, दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याची ब्लड रिलेशन आहे ज्यांचे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची नातेसंबंध आहेत त्यांच्यावर कोणता सामाजिक दुजाभाव झाला असेल कुठल्या जातीने त्यांच्यावर भेदभाव केला असेल की त्यांना आज ओबीसीचा दाखला काढावा लागला आणि ओबीसीचा आरक्षण खाव लागलं. पुण्यामध्ये 42 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या त्यातील 31 जागा मराठा कुणबीने घेतल्या राहिले ka ओबीसीच आरक्षण. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं किंवा कुणबी मानून म्हणजे सामाजिक मूर्खपणा होईल : जस्टीस नागापल्ले दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने साडेसहाशे पानाचे स्टेटमेंट दिल आहे मराठा समाज सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रात मागास नाही., मनोज तरंगे यांनी उठायचं आणि म्हणायचं ह्या पहा आमच्या कुणब्याच्या नोंदी कुण्याच्या नोंदी म्हणजे काय 58 लाख नोंदी म्हणजे त्याच्यापुढे कुठे लिहिला आहे की हे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून रेव्ह्यूच्या नोंदी तुम्ही कुणब्याच्या नोंदी म्हणून दाखवणार का ? त्या नोंदी ब्राह्मणांच्या, जैनांच्या पण आहेत त्यांना पण ओबीसींच आरक्षण द्यायचं का. हा संविधानिक तेच आहे काय म्हणाला तो प्रसाद लाड लक्ष्मण हाके च्या मागे चार-पाच माणसे दिसत नाहीत मनोज जरांगे आव्हान दिले की पाच पन्नास हजार माणसे गोळा होतात, म्हणजे माणसं गोळा केल्यानंतर जो बोलू शकत नाही त्याचा आरक्षण तुम्ही काढून घेणार का. व्यवस्थेमधील शेवटच्या माणसाच्या हक्काचे संरक्षण संविधान करतात. मी कायदा पायदळी तुडवत आहात. लक्ष्मण हाके मरेपर्यंत हे आंदोलन लढणार बबनराव तायवाडे बबनराव तायवाडे किंवा परिणाम फुके त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही माझ्यासमोर चर्चेला या,आरक्षण राहिले आहे की गेले आहे हे उदाहरणासहित मी त्यांच्यासमोर चर्चेला तयार आहे. तायवडे कोणाची भाषा बोलतो सकाळी एक बोलायचं दुपारी बोलायचं संध्याकाळी एक बोलायचं कोणासाठी बोलतो हे त्यांनी स्वतः येऊन पुढे सांगावं मोर्चाला कोणाचा पाठिंबा भटक्या विमुक्त आणि ओबीसी एकत्र येतील आणि या सरकारला जाब विचारतील. ओबीसी मी ओबीसींचा आरक्षण संपलं आहे म्हणून माझ्या पाठीमागे यावं कोण चष्मा घालून आला असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांचा जीआर महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जाऊन फाडून टाकणारा लक्ष्मण हाके आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचा ओबीसींचा डीएनए नाही, तुम्ही ओबीसींच आरक्षण संपवल आहे, आता काय मी आत्महत्या करू का तुमच्यापुढे जीव देऊ, सरकारच्या विरोधात बोलत नाही म्हणता बोलतोय कोणाच्या विरोधात शरद पवारांच्या विरोधात बोलू ते काय सरकारमध्ये आहेत काहीतरी लावलंय.... (लक्ष्मण हाके भयंकर चिडले) या दिवशी दोन सप्टेंबर चा जीआर निघाला त्याच दिवशी मी विरोध दर्शवला लक्ष्मण हाके सांगतोय ते ओबीसींना पटलं आहे एक सप्टेंबरला ओबीसी येतील नाही आले तर लक्ष्मण हाके राजकारण चळवळ सगळं बंद करेल आणि घरात बसेल. ओबीसी जागृत असता त्यांना कळलं असतं तर यांची काय माय व्याली ओबीसींच आरक्षण संपवायला सुप्रिया सुळे देशात पोपटासारखं फक्त मिठू मिठू बोलतात, त्या सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे किंवा मराठा संघटनांना सांगितलं पाहिजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन चा उद्देश तरी समजावून सांगा. ज्या लोकांना आरक्षण देता आलं नाही त्या लोकांसाठी इकॉनॉमिकल विकर शिक्षण आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही दहा टक्क्याचा कायदा केला ते तुम्हाला का नको आहे. गावागाड्यातील ओबीसीचा नेता तयार व्हायला लागला आहे त्याला मातीत गाडण्यासाठी मनोज जरांगे ला ओबीसीच आरक्षण पाहिजे एवढं जर ओबीसीच्या लोकांना कळत नसेल तर ओबीसीच्या लोकांना माझा साष्टांग नमस्कार. राज्य सरकारने घटना पायदळी तुडवली, साडेतीनशे जातींच्या हक्क अधिकारांच संरक्षण केलं नाही धनगर समाज एसटी आरक्षण मागणी मला कायम हा प्रश्न विचारला जातो मला जाणीव आहे मी धनगराचा पोरगा आहे ओबीसी मध्ये 27 टक्के आरक्षणापैकी साडेतीन टक्के आरक्षण एनटीसी अंतर्गत धनगर समाजाला मिळतं गावगाड्यातील 27 टक्क्यातील सर्वांची जबाबदारी आहे ही आरक्षण टिकवणे. आतडी तुटेपर्यंत महाराष्ट्राला समजावून सांगतोय मुख्यमंत्री मंत्री ऐकायला तयार नाहीत हे असंच राहिलं तर लक्ष्मण हाके जीव द्यायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाही ओबीसी हा गुलाम आहे तो डोंगरात कुशीत अडकलेला आहे, कारखानदार कोण आहेत पहा कसा ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकेल. माझी सर्व भाषणे काढा जातनिहाय जनगणणेनवर जर मी बोललो नसेल तर मी आज या ठिकाणी माझं सर्व आंदोलन थांबवेल एक सप्टेंबरला दौंड तालुक्यातील पाठक येथून ओबीसी मुंबईच्या दिशेने कुच करेल आतापर्यंत हजारो वाहनांची नोंद झाली आहे0
0
Report
पुणे में शनिवार को राहुल गांधी के लाइव प्रोग्राम की स्टेज और व्यवस्था पूरी तैयारी के साथ
Pune, Maharashtra:पुण्यात येत्या शनिवारी होणाऱ्या छाञों की गुंज या लाईव्ह प्रोग्रामची तयारी पूर्ण झाली असून सर्वच नेत्याची आज स्टेजची देखील पाहणी केली...राहुल गांधी यांच्या या प्रोग्राम ची स्टेज आणि इतर व्यवस्था नेमकी कशी असणार हे पुणे काँग्रेसचे प्रभारी सतेज पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊयात...0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में पेपरफूटे पर विपक्ष का हमला, राहुल गांधी का कार्यक्रम जारी
Pune, Maharashtra:पुणे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषद राहुल गांधी भारत भर फिरत आहेत.... प्रत्येक समाजातील घटकांशी त्यांचा संवाद आहे.... शेतकरी,भाजी विक्रेते, लोहार कामगार, सर्वांशी संवाद राहुल गांधी टिकुन ठेवत आहेत... शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दुर झाल्या पाहिजेत.... प्रतिगामी आणि पुरोगामी हा फरक आहे.... संविधानाने समता बंधुता निर्माण केली... भाजपाने बहुजनाना अधिकार हेरावला त्यांच्या अधिकारावर गधा आणली.... सर्व क्षेत्रात भाजपाने भ्रष्टाचार सुरू केला आहे... पैसे घेऊन त्यांना पेपर देणे वन नेशन वन पेपर सुरू झाले आहे. बाकी पक्षाला संपवण्याचे काम सुरू केले आहे १२ वर्षात ५४ वेळा पेपर फुटी झालेली आहे... ५६ इंचाची छाती असलेल्यांनी संसदेमधुन पळ काढला.... व्यवस्था परिवर्तनासाठी राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम हाती घेतला आहे... अनेक ठिकाणी राहूल गांधी यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे ते सांगितले... पुण्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते भारताचे वैशिष्ट्य आहे. सावित्रीबाई वर दगड फेकणारे देशातीलच होते... दुर्दैवाने आज ती प्रवृत्ती राज्यात सत्तेवर आहे... त्याच पुण्यात विद्यार्थ्यांनी युवतीची संवाद साधण्याची राहुल गांधी उपस्थित राहणार आहे... मुख्यमंत्री अज्ञानातून बोलले असतील... अज्ञानाचा पांघरूण त्यांनी पांघरलेले आहे. कोणी पण या कार्यक्रमाला येऊ शकतात... यामध्ये आमच्या पक्षाचे पक्ष चिन्ह नसेल... या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्रातील पेपरफुटी या प्रकरणावर आम्ही आवाज उठवणार आहोत... मुख्यमंत्री आमच्या कार्यक्रमाबद्दल काही बडबडले म्हणून का गडबडले म्हणून.... गडबडले म्हणावं लागेल.... बारकोड काय असेल ते त्यांना माहीत असेल...आमचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे... मुख्यमंत्री यांच्या दाव्यावर हसावं वाटतंय.... मुख्यमंत्री यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे... भयगंटातुन केलेले वक्तव्य आहे... जळी कष्टी पाषाणी दिसताय..... ऑन अमित शहा वंदे मातरम् वक्तव्य सुभाष चंद्र बोस यांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरम्, रविंद्रनाथ टागोर यांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरम् आम्ही म्हणणार आहोत.... भाजपाने कधी त्यांच्या पक्ष कार्यालयावर तिरंगा लावला नाही त्यांनी आम्हाला वंदे मातरम् बद्दल शिकवु नये... वंदे मातरम आम्ही पूर्वीपासून म्हणत आहोत....0
0
Report
संभाजीनगर के अनफिट पानी टँकर: नियम-लायसेंस के बिना पानी सप्लाई?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर एक असे शहर जिथे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो, शहराचा बराचसा भाग अजूनही टँकरवर अवलंबून आहे त्यातूनच पाणी मिळत, पाणी योजनेचे काम ही सुरू आहे , लवकरच शहराला त्यातूनही पाणी मिळेल मात्र या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टँकर न होणारा पाणीपुरवठा.. जवळपास 88 टँकरच्या चारशे फेऱ्या या शहरात होत असतात मात्र हे टँकर सुरक्षित आहेत का याचे उत्तर नाही असे आहे, या टँकर ना कुठलीही नियमावली नाही, ना नंबर प्लेट ना गाडीचे फिटनेस, अनेकांकडे तर लायसन्स ही नसल्याचं सांगण्यात येताय, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट... संभाजी नगरात अनफिट टँकरचा सुळसुळाट महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर अनफिट टँकर ना नंबर प्लेट, ना चालवण्याची पद्धत वाली कोण... छत्रपती संभाजी नगर इथली पाण्याची योजना अजून पूर्ण झाली नाही म्हणून शहराच्या बराचसा भाग अजूनही टँकरवर जगतो पाणी मिळतंय यात निश्चितपणे आनंद आहे टँकरच्या माध्यमातून मिळतं यातही दुःख नाही मात्र सगळ्यात महत्त्वाचं रस्त्यावर चालणारे हे टँकर योग्य आहेत का? नागरिकांना सुविधा देण्यासाठी सुसज्ज आहेत का? तर याचे उत्तर नाहीये महापालिका 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी देतात झी २४ तास ना या टँकरची पाहणी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी पुढाव्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक टँकरवर साध्या नंबर प्लेट सुद्धा दिसत नाही ना पुढे नंबर प्लेट ना माग नंबर प्लेट ह्या गाड्या तसाच चालतात म्हणजे कुठला अपघात झाला तर कोणाला पकडावं हा प्रश्न आहे याहून धक्कादायक माहिती म्हणजे 88 पैकी जवळपास 55 टॅक्टर हे आरटीओच्या दृष्टीने अनफिट आहे याबाबतची माहिती महापालिकेलाही असल्याचा समजते मात्र यावर कोणीही कारवाई करत नाही त्यात काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या अंगावर एका टँकरनं चालकांना टँकर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी याबाबत पोलिसात तक्रारही केली आणि टँकरच्या एकूणच या लॉबी बाबत त्यांनी संशयही व्यक्त केला आहे.. महापालिकेच्या माध्यमातून 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी देतात ... या संदर्भात आरटीओने तपासणीसाठी दिशेने दिले आणि महापालिका आयुक्तांनी टँकर नंबर प्लेट, फिटनेस, ड्रायव्हर पद्धतींबद्दल चौकशीची घोषणा केली, इतर गाड्यांच्या एसओपी आता टँकरांवर लागू केली जाईल असे सांगितले.. या सगळ्यावर महापौरांनी चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला जाब विचारू आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकर नागरिकांची सोय असल्याने ही व्यवस्था गरजेची आहे, परंतु रस्त्यावर बेलगाम टँकर हाकणे कोणत्याही नियमाची Junction नसणे, कोणाच्याही अंगावर गाडी टाकणं हे दुर्दैवी आहे असे मत व्यक्त झाले.0
0
Report
Ville Parle के साठे कॉलेज में सभासद नोंदणी टेबल पर टकराव
Mumbai, Maharashtra:Ville Parle साठे कॉलेजमध्ये सभासद नोंदणीवरून वाद मुंबईतील साठे कॉलेज परिसरात काल संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या सभासद नोंदणीच्या टेबलवरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेज परिसरात दोन्ही संघटनांकडून सभासद नोंदणी सुरू असताना टेबल लावण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. काही वेळातच हा वाद अधिक वाढल्याचे सांगण्यात येत आहे. नेमका हा वाद कशामुळे झाला, सभासद नोंदणीसाठी जागा देण्यावरून हा प्रकार घडला का, की यामागे आणखी काही कारण आहे, याबत सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी.0
0
Report
Advertisement
