icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई नगर निगम ने मिठी नदी का गाद साफ करने के लिए 1.31 करोड़ खर्च कर दिया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपाचा अजब कारभार, भूखंड सिडकोचा, प्राधिकरण एमआयडीसी आणि गाळ मिठी नदीचा असताना कंपन्यांमध्ये शिरलेला गाळ काढण्यासाठी मनपा करणार 1 कोटी 31 लाख रुपये खर्च. नवी मुंबई महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. मुंबईतील मिठी नदीचा काढलेला गाळ सिडकोच्या भूखंडावर टाकण्यात आला होता. मात्र हा गाळ डोंगरातून पावणे एमआयडीसी मधील चार कंपन्यांच्या आत घुसला होता. आता भूखंड सिडकोचा, प्राधिकरण एमआयडीसी आणि गाळ मिठी नदीचा असताना कंपन्यांमध्ये शिरलेला हा गाळ काढण्याचे काम मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने केलेय. यासाठी नवी मुंबई महापालिकेने तब्बल एक कोटी 31 लाख रुपये खर्च करण्याला स्थायी समिती सभेत मंजुरी दिलेय. केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठीच जनतेच्या पैशाचा चुराडा सत्ताधारी भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप केला जात असून याविषयी स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सारवासारव करणारी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.
0
0
Report

महाराष्ट्र में 79 हजार करोड़ के परमाणु ऊर्जा प्रोजेक्ट्स: 4200 मेगावॉट क्षमता का समझौता

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महाराष्ट्रात तब्बल ७९ हजार कोटींची गुंतवणूक; अणुऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे दोन मोठे सामंजस्य करार.. या करारांतर्गत दापोलीसह राज्यात एकूण ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून,यासाठी सुमारे ७९ हजार कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक होणार आहे.. या मेगा प्रकल्पांमुळे राज्यात ११ हजारांहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून,या प्रसंगी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में चार दिन प्रेम विवाह के बाद पत्नी की हत्या; पति गिरफ्तार

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या सायली लोखंडे या नवविवाहितेचा पतीने केलेल्या जीवघेण्या मारहाणीत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. घणसोली येथे राहणाऱ्या सायली चे तिथेच राहणाऱ्या सागर कदम या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सायली 5 जून रोजी कामाला जाते सांगून निघाली ती थेट सागर बरोबर निघून गेली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आणि अवघ्या चारच दिवसात सायली रुग्णालयात ऍडमिट असल्याचेकुटुंबियांना समजले. कुटुंबियांनी सागर विरोधात मारहाणीची तक्रार दिल्यानंतर रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र मारहाणा इतकी गंभीर होती की 2 महिने मृत्यूशी सुरु असलेला लढा संपला आणि सायलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी रबाळे पोलीसांनी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम लावत आरोपी सागर कदम याला अटक केलेय. एकूणच सायलीचा 4 दिवसांचा प्रेमाचा संसार पती सागर कदम ने केलेल्या जीवघेण्या मारहाणी मुळे संपुष्टात आलाय. याप्रकरणी रबाळे पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

कल्याण रेलवे स्टेशन के सामने खुलेआम शराब पीने पर सवाल, पुलिस कार्रवाई पर बहस

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकासमोर दिवसाढवळ्या मद्यपान, पोलीस एसीपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती उघड्यावर मद्यपान सुरू, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मद्यपान होत असताना पोलिस प्रशासनाचे लक्ष कुठे आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवर अखेर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वीही नशेखोरांचा उपद्रव आणि गैरप्रकारांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये स्थानक परिसरात नशेसाठी वापरली जाणारी संशयित इंजेक्शने आढळून आल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. स्थानक परिसरात मद्यधुंद व्यक्तींकडून महिलांची छेडछाड तसेच चोरीसारख्या घटना घडल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी अशा व्यक्तींवर तातडीने आणि सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दिवसाढवळ्या स्थानकासमोर मद्यपान होत असेल, तर पोलिसांची गस्त आणि कारवाई नेमकी कुठे आहे? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ति कार्यशाला ने गिनीज रिकॉर्ड दर्ज किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे राज्यात प्रथमच ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ति कार्यशाळा २०२६’ आयोजित करण्यात आले होते। पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पने नुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आलाय। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेय। सहा हजार पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील विद्यार्थ्यांसह पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवली आहे। या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक नी सहभाग घेत गणेशमूर्ती तयार केल्या
0
0
Report

मेहकर में ट्रैक्टर पोळा की अनोखी परंपरा, 200 ट्रैक्टरों की भव्य शोभायात्रा

Buldhana, Maharashtra:मेहकरमध्ये अनोखा ‘ट्रॅक्टर पोळा’! २०० ट्रॅक्टरची मिरवणूक; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवही सहभागी बुलडाण्याच्या मेहकरमध्ये यंदाचा पोळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बैलांसोबतच आधुनिक शेतीचा साथीदार असलेल्या ट्रॅक्टरचा पोळा शेतकऱ्यांनी साजरा केला. मेहकर शहरातून तब्बल १५० ते २०० ट्रॅक्टरची भव्य मिरवणूक काढण्यात आली. वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या ट्रॅक्टरप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर पोळ्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः ट्रॅक्टरचे सारथ्य करत सहभाग घेतला. माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी या मिरवणुकीत सहभागी झाले.
0
0
Report

बीड में सूखे के कारण बैलपोळा संकट, किसान सर्जा राजा जलसज्जा Washing Center तक

Beed, Maharashtra:बीड : शेतात पाणीच नाही, सर्जा राजाला आंघोळ घालण्यासाठी चक्क शेतकऱ्यांनी गाठलं वॉशिंग सेंटर शेतातील पिकं नाहीशी झालीत, आता सरकारने तात्काळ मदत करावी बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची सरकारकडे आर्तहाक Anc : बीड जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे.छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडलेत, विहिरींनीही तळ गाठलाय. अशा परिस्थितीत आज बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण, बैलपोळा साजरा होतोय. पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाला आंघोळ घालून सजवतो, त्याची पूजा करतो आणि मिरवणूक काढतो. मात्र यंदा दुष्काळाने ही परंपराही अडचणीत आणलीय. बीडमधील शेतकरी विनीत काळे यांच्या शेतातील विहिरीला आणि बोरला पाणीच नसल्याने, आपल्या लाडक्या सर्जा राजाला आंघोळ घालण्यासाठी त्यांना चक्क वॉशिंग सेंटर गाठावं लागलं. दुष्काळाची ही झळ आता बळीराजाच्या सणालाही बसलीय. बाईट : विनीत काळे, शेतकरी
0
0
Report
Advertisement

नितेश राणे के बयान से महाराष्ट्र में नया राजनीतिक बखेड़ा

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे on संदीप राऊत ( एकनाथ शिंदे लंडन दौरा टीका ) --- ह्यांचा मालक जेव्हा लंडन दावोसला जायचा तेव्हा आम्ही त्याला काय बोलायचं.. तिसरी मातोश्री लंडन ला आहे अस आम्ही ऐकतोय ह्याचा जनतेला संजय राजाराम राऊतच्या मालकाने हिशोब दिला पाहिजे. आपल्या राज्यातील एका व्यक्तीला पुरस्कार देत असतील तर त्याच कौतुक करावं, अभिमान वाटावा की त्यावर वैयक्तिक द्वेष बाळगून अशी वक्तव्ये करावी ? तुझ्या मालकासारखे तिकडे जाऊन महाराष्ट्राचे धिंडवडे तर उडवत नाहीत ना ऑन पर्युषण --- माहिती घेऊन बोलेन ऑन संजय राऊत ( बुद्धिजीवी ) --- तुझ्या उबाठा मध्ये बलात्कारी आणि गुंड भरलेले आहेत ना... तुझ्या मालकाच्या मुलावर सामूहिक बलात्कार आणि मर्डर ची केस होणार आहे अस दिसतंय त्यावर बोला आणि मग असे भाष्य करा ऑन सुनेत्रा पवार ( अर्थ खात ) --- राज्य सरकार केंद्र सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही राज्यासाठी अतिशय चांगलं काम करत आहोत. ऑन संजय राऊत ( धर्माची बंधन ) -- धर्माचा आधार घेऊन धर्माला अडचणीत आणून जी काही जिहाद निर्माण करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. गजवा हिंद केलं जातंय स्वतःच्या धर्माला ठेवण्यासाठी अशा मागण्या आल्या.. लादण्यापेक्षा धर्माला सुरक्षित ठेवणं आपलं काम आहे. ऑन मराठा आंदोलक मृत कुटुंबीय पाठिंबा ( उदय सामंत ) --- आमचं सरकार हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाबरोबर उभं आहे. 12 बलुतेदार आहेत त्यांना एकत्र घेऊन राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शब्द पाळणारा मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळालेला आहे.
0
0
Report

15 अक्टूबर से गन्ना पेराई शुरू, किसान चिंतित; राजू शेट्टी ने सरकार का निर्णय किया विरोध

Kolhapur, Maharashtra:कप शक्करकण बनावट? Anc : केंद्र सरकारच्या आदेशानुसार यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने घेतलाय. मात्र सरकारच्या या निर्णयाला ऊस पट्ट्यातून विरोध होऊ लागलाय. ऑक्टोबरमध्ये ऊस तोड झाल्यास साखरेचा उतारा अर्थात रिकव्हरी कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. रिकव्हरी कमी झाली तर तो त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार असल्याने, कारखाने सुरू झाले तरी शेतकरी ऊस तोड देणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. पाहूया याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट. VO 1 : देशाच्या बाजारपेठेत साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने काही काळ साखरेच्या दरात मोठी वाढ झाली… त्यानंतर केंद्र सरकारने साखर धोरणात बदल करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून व्यापाऱ्यांनी फायदा घेतल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला जातोय. एकीकडे साखरेच्या उपलब्धतेचा हा मुद्दा चर्चेत असतानाच, राज्य सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा निर्णय ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना मान्य नसल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते, ऑक्टोबरमध्ये ऊस पूर्णपणे पक्व झालेला नसतो , त्यामुळे लवकर तोड झाल्यास उसाच्या वजनाबरोबरच साखरेचा उताराही कमी होण्याची शक्यता आहे. साधारणपणे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून डिसेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत उसातील साखरेचा उतारा तुलनेने कमी असतो. त्यानंतर थंडी वाढू लागल्यानंतर उसातील साखरेचे प्रमाण आणि रिकव्हरी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास कमी रिकव्हरीच्या काळात मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर आणि परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या दरावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. VO 2 : सरकारने 15 ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात शेतकरी आपल्या उसाला तोड देणार का, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. शेतकरीपाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय. 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सरकारने हा निर्णय घ्यायचाच असल्यास, केंद्र आणि राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये प्रतिटन अनुदान द्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय. VO 3 : देशात साखरेचा साठा अपुरा असल्याचं कारण पुढे करून गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला जातोय, असा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र देशात साखरेची टंचाई नसून आगामी नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका साखर साठा उपलब्ध असल्याचा दावा शेतकरी नेते करत आहेत. काही मोजक्या साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारसमोर चुकीची आकडेवारी मांडल्याचा आरोपही केला जातोय. दरम्यान, गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यास उसाच्या साखर उताऱ्यावर परिणाम होऊन एकूण साखर उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता साखर कारखानदार देखील व्यक्त करत आहेत. VO 4:- देशभरात गाळप हंगाम लवकर सुरू झाल्याने साखर उत्पादनात तब्बल 15 ते 20 लाख मेट्रिक टनांची घट होऊ शकते, असा दावा शेतकरी नेते आणि साखर कारखानदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे मोजक्या कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित करत आहेत प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर गोकुळ दूध संघ चुनाव: अदृश्य शक्तियों के आरोप, मतदाता सूची से संस्थाएं हटाने पर विवाद

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय. गोकुळच्या 25 जागांसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गोकुळमधील सुमारे 1400 दूध संस्थांचा सत्यविजय मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या दूध संस्थांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, त्या संस्थांनी कथित अदृश्य शक्ती विरोधात एल्गार पुकारलाय. या शक्तीला निवडणुकीत थारा न देण्याचा निर्धारच या मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यात गोकुळच्या मतदार यादीतून अनेक संस्था वगळण्याचा आरोप करारलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनी केला. तरीही न्यायालयीन लढा देत आम्ही पात्र ठरलो, त्यामुळे आता ज्यांनी संस्थांना अपात्र करण्याचा घाट घातला, त्या कथित अदृश्य शक्तीला निवडणुतीत धडा शिकवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यातून गोकुळच्या सत्ताधारी संचालकांना पाठिंबा दर्शवण्यात आला, पण एक राजकीय संदेशही देण्यात आला: अदृश्य शक्तीच्या बाजूने असल्यास आम्ही तुमच्या सोबत नाही म्हणण्याची भूमिका घेतली. 18 ऑक्टोबरला निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही गोकुळ निवडणुकीची तयारी प्रभावीपणे सुरू केलीय. शहरातील काही चौकात banners च्या माध्यमातून नेतृत्वाची बरोबरी लढण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात थेट टक्कर होण्याची शक्यता आहे. तथापि दुखावलेल्या संस्थांचा वजन कोणत्या गटाच्या प cupboard वर जाईल, हे गोकुळच्या सत्तेच गणित ठरवणार आहे.
0
0
Report

रत्नागिरी भाजपा जिल्हा बैठक सम्पन्न

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.. यावेळी प्रदेश महामंत्री, आमदार निरजन डावखरे, आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, सिंधू रत्न Yोजनेचे उपाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आदि व्यासपीठावर उपस्थित होते.. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये सेवाभावाची भावना रुजवणे आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.. दरम्यान कार्यकर्त्यांनी लोकसंग्रह वाढवावा, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ, पायात गती ठेवून काम करा असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केलं..
0
0
Report

मानोरा में किसानों ने पोळा भरकर दुष्काळ राहत की मांग तेज की

Washim, Maharashtra:वाशीम: मानोरा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. मागील दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पावसाअभावी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग आणि उडीदयाह खरीपची पिकं करपली असताना शशना कडून दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मानोरा तहसील कार्यालयपरिसरात शेतकरी पोळा भरवत आंदोलन केलं. परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणीची दखल न घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या आंदोलनात तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, कृषी पंपाचे भारनियमन तात्काळ बंद करावे आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने मंजूर करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top