icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

विलास घुले हत्या मामला: सांसद पुत्र का आरोपी से संपर्क सीडीआर में उजागर; भूख हड़ताल

Beed, Maharashtra:बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. विलास घुले याची हत्या होण्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. यादरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्र सौरभ सोनवणे याचा आरोपीसोबत फोनवरून संपर्क झाल्याचा आरोप रमेश घुले यांनी केला आहे. सीडीआर मध्ये स्पष्ट उल्लेख आल्याने घुले कुटुंंब आता आक्रमक झाले आहे. SIT च्याच अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा घुले कुटुंबाने केला आहे. सात दिवसात सौरभ सोनवणे यांच्या सीडीआर मधील संपर्कात आलेल्या आरोपींना अटक करा अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कचेरीसमोर आमरण उपोषण करू असा इशारा घुले कुटुंंबाने निवेदनातून दिला आहे.
0
0
Report

लातूर में पेपरफुटी विरोधी मोर्चा: धर्मेंद्र प्रधान से इस्तीफे की मांग

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... पेपरफुटीविरोधात काँग्रेसचा लातुरात एल्गार मोर्चा... केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा... काँग्रेस नेते आ अमित देशमुख नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने लातुरात एल्गार मोर्चा काढण्यात आला... काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते... लातुर शहरातील ट्युशन एरिया ते जिल्हा क्रीडा संकुल असा हा मोर्चा काढण्यात आला...यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली...
0
0
Report

आषाढ़ी एकादशी पर साईं बाबा के दर्शन को शिर्डी-पंढरपूर में भक्तों का जनसैलाब

Shirdi, Maharashtra: आषाढ़ी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात वारकऱ्यांचा जनसागर लोटलेला असताना "शिर्डी माझे पंढरपूर" म्हणत हजारो साईभक्त आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला दाखल झाले आहेत.. सकाळपासून साईबाबांच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे.. साईबाबांच्या समाधीवर विठूरायाच्या प्रतीमेचे दर्शनही आज भाविकांना होत असून साईबाबांची शिर्डी पंढरपूरमय झाल्याचं बघायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

अकोले तालुक्यात भारी वर्षा से भूस्खलन, घर मिट्टी में दफन; लोग सुरक्षित स्थानों पर

Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.. अतिवृष्टीमुळे पांजरे येथील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले.. या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.. माहिती मिळताच पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले.. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी, आठ शेळ्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत.. खबरदारीचा उपाय म्हणून हरी शांताराम उघडे यांच्यासह परिसरातील आणखी तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे..
0
0
Report
Advertisement

आषाढ़ी एकादशी पर फडणवीस का سولापुरवासियों के लिए बड़ा गिफ़्ट; उड़ानपुल का रास्ता साफ

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना मोठे गिफ्ट, शहरातून उड्डाणपूल होण्याचा मार्ग अखेर मोकळा - आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरवासीयांना मोठे गिफ्ट - गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर मार्गी - उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या खासगी व राज्य शासनाच्या जागांचे राष्ट्रीय प्राधिकरणाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया 90% पूर्ण - पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना अखेर मोठे यश - 30 ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लागल्याने आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांची मानले विशेष आभार
0
0
Report

दिल्ली पुलिस पर भरोसा नहीं; अभिजीत दिपके की जान खतरे में

Beed, Maharashtra:बीड: अभिजित दिपके यांच्या जिवाला धोका; दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा देण्याची दिपके यांच्या बहिणीचे राष्ट्रपतींना निवेदन ANC - दिल्ली येथील जंतरमंतर वर CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलन कर्त्यांवर झालेला भ्याड लाठी हल्ला पाहता अभिजित दिपके यांच्याही जिवाला धोका असल्याची शक्यता दिपके यांची बहीण स्नेहा जितिन वंजारे यांनी वर्तवली आहे. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी अशा मागणीचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती कडे करण्यात आली आहे. दिपके यांच्या कुटुंबाला अद्याप संपर्क झाला नाही, त्यामुळे आम्हाला भीती वाटते आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

नागपूर और छत्रपती संभाजीनगर में पेपरफुटी के लिए विशेष न्यायालय, तेज सुनवाई

Nagpur, Maharashtra:नागपूर - पेपरफुटी प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी दोन विशेष न्यायालये - मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नीट पेपरफुटी प्रकरणांचाही समावेश - सार्वजनिक परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी प्रकरणांची विशेष न्यायालयात सुनावणी - नागपूर विशेष न्यायालयाचे कामकाज जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. पवार पाहणार - नागपूर विशेष न्यायालयाकडे सध्या पेपरफुटीची ११ प्रकरणे वर्ग - नीट पेपरफुटीशी संबंधित महाराष्ट्रातील काही आरोपी दिल्लीत न्यायालयीन कोठडीत - इतर जिल्ह्यांतही प्रकरणे वाढल्यास विशेष न्यायालये स्थापन करण्याचे संकेत - विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - पेपरफुटी प्रकरणांच्या जलद आणि प्रभावी सुनावणीसाठी विशेष यंत्रणा सुरू - राज्यभरातील परीक्षा गैरव्यवहाराच्या खटल्यांच्या सुनावणीला आता वेग मिळणार
0
0
Report

सोलापुर में आषाढ़ी एकादशी पर स्कूलों में बाल दिंडियां, विठ्ठल-रुक्मिणी की जयकार

Solapur, Maharashtra:सोलापूर - आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विठू माऊलीच्या जयघोषात काढण्यात आल्या बाल वारकऱ्यांच्या दिंड्या Anchor - आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने सोलापूर नगरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेली. शहरातील विविध शाळांमध्ये बाल दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बालदिंडीमध्ये तल्लीन झाले होते. विठ्ठल - रुक्मिणी, ज्ञानोबा, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, चोखामेळा, सावता माळी, संत एकनाथ यांची वेशभूषा साकारत विद्यार्थी दिंडीमध्ये तल्लीन झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने रिंगण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report

यवतमाळ में बुलेट की टक्कर: बाइक सवार की मौत, चालक के खिलाफ़ केस दर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा मार्गावर भरधाव बुलेटच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. प्रदीप जारी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते स्थानिक रेमंड कंपनीत कामगार होते. रात्री भाजीपाला घेऊन ते घराकडे जात असताना या वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट बुलेट स्वराने त्यांना जोरदार धडक दिली. यात जारी हे दुभाजकावर जाऊन आदळले. तर बुलेटस्वार युवक देखील फेकला गेला. अपघातात प्रदीप जारी यांच्या डोक्याला व कमरेला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी बुलेट चालक युवका विरुद्ध निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
0
0
Report
Advertisement

वासई के कलाकार ने मोरपंख पर विठ्ठल की आकर्षक चित्रकला रची

Vasai-Virar, Maharashtra:आषाढ़ी एकादशी निम्मित मोरपंखावर साकारलेले विठ्ठलाचे मनोहारी चित्र वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी मोरपंखावर भगवान विठ्ठलाचे आकर्षक चित्र साकारले आहे. हे चित्र वॉटर कलर्स इस माध्यमातून अवघ्या अर्ध्या तासात रेखाटण्यात आले आहे. मोरपंख भारतीय संस्कृतीत सौंदर्य, पावित्र्य आणि निसर्गाचे प्रतीक मानले जाते. त्याच मोरपंखावर विठ्ठलाची प्रतिमा साकारल्यामुळे या कलाकृतीला आध्यात्मिक आणि कलात्मक असा सुंदर संगम लाभला आहे. मोरपंखाचा नाजूक पोत आणि त्यावरील रंगसंगती जपत इतक्या सूक्ष्म पृष्ठभागावर चित्र रेखाटणे हे मोठे कौशल्य मानले जाते. ही कलाकृती कलाकाराच्या कल्पकतेची, संयमाची आणि चित्रकलेवरील प्रभुत्वाची साक्ष देते. वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा आणि कलाप्रेम यांचा सुंदर मिलाफ या चित्रातून पाहायला मिळतो. ही अनोखी कलाकृती सध्या कला रसिकांचे लक्ष वेधून घेत असून, स्थानिक पातळीवर तिचे कौतुक होत आहे.
0
0
Report

अंबेगांव में भारी बारिश से बाढ़, डिंभे डेम से पानी का स्तर बढ़ने की चेतावनी

Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या संततदार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आले असून अनेक भात खातरांचं नुकसान झालंय,अनेक शेतकऱ्यांच्या भात खाचरातील माती मुसळधार पावसाने वाहून गेलीय तर अनेकांच्या शेताचे बांध फुटलेत या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून धरण 80 टक्के पेक्षा अधिक क्षमतेने भरल्याने धरणातून कुठल्या हि क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
0
Report

इंदिरानगर की Yes Fine Bakery में स्वच्छता उल्लंघन, लाइसेंस तात्कालिक निलंबित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या इंदिरानगर, जुना बायजीपुरा परिसरातील 'येस फाइन बेकरी'त टोस्टचे उत्पादन अत्यंत अस्वच्छ वातावरणात करून पॅकिंगवर मात्र दुसऱ्याच बेकरीच्या नावाचे लेबल वापरून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाच्या नजरेस पडला. त्यामुळे या पथकाने बुधवारी रात्री या बेकरीचा परवाना तत्काळ निलंबित केला. बेकरीवर छापा मारून तेथील किळसवाण्या वातावरणाचा पर्दाफाश केला.. छापा मारला. तेव्हा, टोस्ट तयार केले जात होते, तो संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणात धूळ, कोळिष्टके, गंज व जळमटांनी माखलेला आढळला. टोस्ट उत्पादन क्षेत्रामध्ये दरवाजा नसलेले अस्वच्छ शौचालय असून, कामगारांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन, लिक्वीड सोपची व्यवस्था नव्हती. बेकरी पदार्थ बनवले जात होते, तिथे कामगार तंबाखू खात होते. उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्याही आतून-बाहेरून अत्यंत अस्वच्छ दिसून आल्या.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top