icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भंडारा के मोहाड़ी नगरपंचायत उपाध्यक्ष के विरुद्ध अविश्वास प्रस्ताव बहुमत से मंजूर

Bhandara, Maharashtra:Anchor : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या सभेला उपाध्यक्ष सचिन गायधने हे अनुपस्थित होते. अविश्वास ठरावावर झालेल्या मतदानात १४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर केवळ १ नगरसेवकाने ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे स्पष्ट बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. उपाध्यक्ष सचिन गायधने हे सभेला अनुपस्थित असले तरी नियमानुसार मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.
0
0
Report

अमरावती में भारी बाढ़: 39 तहसीलों में अतिवृष्टि, 1092 घर नुकसान, दो मौतें

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; 39 महसूल मंडळात अतिवृष्टी, 1092 घरांची पडझड, दोघांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून या आपत्तीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेड अलर्टदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे सुमारे 38 हजार हेक्टरवरील शेती पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बेंबळा नदीसह परिसरातील साखळी नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे 1,092 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला वेग दिला असून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

कोयना बांध में मुसलाधार बारिश से जलस्तर बढ़ा, रात 12 बजे दरवाजे खोले

Satara, Maharashtra:सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री १२ वाजत्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटांवरून ४ फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामधून २२ हजार ४७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीपात्रात एकूण २३ हजार ५२० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
0
0
Report
Advertisement

गोदावरी नदी के बीच सराला बेट मानसून में हरियाली और मंदिर से भरा पर्यटन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर, गोदावरी नदीच्या प्रवाहात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम आविष्कार घडवते. यंदाच्या मान्सूनमधील ५९ दिवसांच्या पावसानंतर चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, दाट हिरवळ आणि बेटाच्या मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल यामुळे सराला बेटाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच निसर्ग, भूगोल आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हे ठिकाण मराठवाड्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. श्रद्धेचे केंद्र असलेल्या या बेटावर जैववैविध्याचीही समृद्ध परिसंस्था पाहायला मिळते. गोदावरीच्या सततच्या प्रवाहामुळे येथे सुपीक गाळ साचतो, त्यामुळे बेटाभोवती हिरवाई आणि विविध वनस्पतींची समृद्ध वाढ झालेली दिसून येते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेले सराला बेट अधिकच मनोहारी दिसते. विशेष म्हणजे, ड्रोन किंवा आकाशातून पाहिल्यास गोदावरीचा विस्तीर्ण प्रवाह, सभोवतालची हिरवीगार शेती आणि मध्यभागी असलेले मंदिर यांचा मनमोहक मिलाफ पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतो. त्यामुळे सराला बेट हे श्रद्धा, निसर्ग आणि पर्यटन यांचा अद्वितीय संगम ठरते.
0
0
Report

पुणे-इंदूर मार्ग के बस स्टॉप के पास गडढ़ा, पानी भी भरा; बस-यात्रा प्रभावित

Yeola, Maharashtra:येवला शहरातून जाणाऱ्या पुणे–इंदूर महामार्गालगत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला असून, पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दररोज हजारो प्रवासी तसेच अनेक एसटी बस आणि इतर वाहने याच मार्गाने बसस्थानकात ये-जा करतात. मात्र, अनेक दिवसांपासून हा खड्डा कायम असतानाही संबंधित प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गालगतच हा खड्डा असल्याने नाशिक सारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
0
0
Report

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार से नगरसेवकों की बैठक, 600 करोड़ निधि मांगी

Ahilyanagar, Maharashtra:बीड़ जिल्ह्याच्या दौऱ्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची भेट घेतली...आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवक सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी एकत्र आले होते, यावेळी नगरसेवकांनी विकास कामासाठी 600 कोटीच्या निधीची मागणी केली आहे... विकास कामासाठी लागणाऱ्या निधीच निवेदन सर्व नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांना दिल आहे जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात महापौर असून या महानगरपालिकेत निधी अभावी सध्या विकास कामाची गती कमी झाली आहे...नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या विकास कामाची माहिती देत असताना निधी अभावी काय कामे रखडले असल्याचं सांगत निवेदन देऊन भरीव निधी द्यावा अशी मागणी केली आहे... सुनेत्रा पवार यांनी देखील अजित दादांनी या महानगरपालिकेला चांगला निधी दिलेला आहे आणि यापुढेही शहरातील विकास कामासाठी आपण निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटल आहे.
0
0
Report
Advertisement

रायगड़ जिले के किसानों को कर्जमुक्ति लाभ, पहली सूची में 7,544 लाभार्थी

Chendhare, Maharashtra:शेतकरी कर्जमुक्ती लाभाची प्रक्रिया वेगात ......12 हजार 682 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ ........ पहिल्या यादीत 7 हजार 544 पात्र शेतकऱ्यांना लाभ ........ अँकर - शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील शेतकयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, जिल्ह्यातील 12 हजार 682 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 7 हजार 544 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी आजपर्यत 1 हजार 980 इतक्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे उर्वरीत पात्र लाभार्थ्याने आपले आधार प्रमाणीकरण आणि अग्रिस्टेक तात्काळ करुन घेण्याचे अवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
0
0
Report

अण्णाभाऊ साठे के भारतरत्न पर बहस तेज, समाज के आवाज़ बनते साहित्यकार

Sangli, Maharashtra:स्लग - "अण्णा भाऊ साठे : ज्यांचा गौरव सातासमुद्रापार,पण भारतरत्नाची प्रतीक्षा अजूनही कायम!" अँकर - आज आपण स्मरण करत आहोत अशा एका लोकशाहीराचे... ज्यांनी अक्षरशः रस्त्यावरून साहित्याच्या विश्वात झेप घेतली... ज्यांची लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी समाजाला आवाज मिळाला... ज्यांची शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ दिले... आणि ज्यांची साहित्याचा गौरव रशियापासून जगभर झाला...पण प्रश्न आजही कायम आहे...इतकं मोठं योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेना आजपर्यंत भारतरत्न का मिळालं नाही ? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... व्ही वो - १ ऑगस्ट...हा दिवस केवळ एका साहित्यिक जयंती नाही..तर हा दिवस आहे,संघर्षाचा... शोषित वंचित दिन दुबळ्यांचा कामगारांचा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या प्रेरणेचा...ते नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे... ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाशिवायही जगाला साहित्याची ताकद दाखवून दिली. व्ही वो - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव येथे एका छोट्याशा घरात अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला,जिथून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन संघर्षाच्या प्रवासाला सुरुवात झाली,तो संघर्ष अगदी मरेपर्यंत सुरू राहिला.. बाईट - मोहन साठे - ग्रामस्थ,वाटेगाव. व्ही बो - अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केलं. 'फकिरा'सारखी कादंबरी आजही मराठी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता,शेतकरी,कामगार,दलित,वंचित,आणि सामान्य माणसाचं आयुष्य.त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून त्यांची लोकप्रियता भारता बाहेरही पोहोचली. बाईट - प्रकाश साठे - ग्रामस्थ - वाटेगाव ( सफारी शर्ट ) व्ही वो - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास लिहिताना,अण्णा भाऊ साठेंचं नाव वगळणं अशक्य आहे.'लाल बावटा' कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी फिरत पोवाडे,लावण्या आणि लोकनाट्य सादर करत जनजागृती केली.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या शाहिरीने हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. बाईट - तानाजी साठे - ग्रामस्थ - वाटेगाव. बाईट - दीपक चव्हाण - ग्रामस्थ - वाटेगाव व्ही वो - अण्णाभाऊ साठेंचा गौरव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही.त्यांच्या साहित्याला सोव्हिएत रशियासह अनेक देशांत मान्यता मिळाली.त्यांच्या विचारांनी सीमा ओलांडल्या,पण विडंबना अशी की, जगभरात गौरव झालेल्या लोकशाहीर किंबहुना अण्णाभाऊच्या विचारांचा गौरव भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन का झाला असा सवाल साठे उपस्थित केला जातो. व्ही वो - दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न देण्याची मागणी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरावरून पुन्हा जोर धरते.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' सुरू करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.वाटेगाव येथे अण्णाभाऊंचे जीवन चरित्र शिल्प सृष्टीच्या माध्यमातून साकारले आहे, त्यांचं जन्म झालं ते घर देखील जतन केलं जात आहे.पण देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही अण्णा भाऊ साठेंचा गौरव व्हावा,हीच जनभावना आहे. End ऑफ - एका हातात डफ,दुसऱ्या हातात लेखणी, आणि मनात सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न,अशी ओळख असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी केवळ साहित्य निर्माण केलं नाही.तर समाजाला विचार,स्वाभिमान और संघर्षाची दिशा दिली...अश्या लोकशाहीर अण्णाभाऊनां भारतरत्न कधी मिळणार?
0
0
Report

हेडगेवार निवास में विशेष डाक आवरण और मुहर का लोकार्पण

Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपूर येथील ऐतिहासिक निवासस्थान 'डॉ. हेडगेवार निवास नागपूर' याच्या विशेष आवरण, सूचना पुस्तिका आणि कव्हर, कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण आज झाले. यह अवसर पर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, राष्ट्रसेवा आणि व्यक्तिनिर्माणावर उद्बोधन केले. डॉ. हेडगेवार निवास पर आधारित विशेष आवरण, सूचनापુस्तिका एवं स्थायी सचित्र डाक मुहर का लोकार्पण नागपुर, 31 जुलाई 2026। भारतीय डाक विभाग, नागपुर द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक डॉ. केशव बलिराम हेडगेवार के ऐतिहासिक निवास "डॉ. हेडगेवार निवास, नागपुर" पर आधारित विशेष आवरण (Special Cover), सूचनापुस्तिका (Brochure) तथा स्थायी सचित्र डाक मुहर (Permanent Pictorial Cancellation) का लोकार्पण समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर अपने संबोधन में सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ने कहा कि डॉ. हेडगेवार और संघ एक-दूसरे से अभिन्न हैं। उनके जीवन में संघ कार्य और राष्ट्रकार्य के अतिरिक्त कोई दूसरा विषय नहीं था। इसी ऐतिहासिक भवन की ऊपरी मंजिल पर स्थित उनकी कोठरी में विजयादशमी के दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना हुई थी। उस समय संघ छोटा था, किंतु आज उसका कार्य देश-विदेश तक व्यापक रूप से पहुँचा है। उन्होंने कहा कि संघ के कार्य का विस्तार हुआ है और देश-विदेश में उसके प्रति उत्सुकता निरंतर बढ़ रही है। केवल जिज्ञासा ही नहीं, बल्कि मनुष्य निर्माण की संघ की कार्यपद्धति आज विकास के पथ पर अग्रसर अनेक देशों की आवश्यकता बनती जा रही है। व्यक्ति निर्माण की यह परिणामकारक पद्धति समाजों के लिए उपयोगी सिद्ध हो रही है। डॉ. भागवत ने कहा कि यह संघ के लिए गौरव का नहीं, बल्कि दायित्व और उत्तरदायित्व के बढ़ने का विषय है। संघ का कार्य राष्ट्रसेवा का कार्य है और संघ ने कभी प्रचार या प्रसिद्धि की अपेक्षा नहीं की। किंतु आज जब समाज और विश्व इसके प्रत्यक्ष परिणामों को देख रहा है, तब अनेक सज्जन लोग इसके विस्तार में सहयोग की भावना से आगे आ रहे हैं। उन्होंने भारतीय डाक विभाग का आभार व्यक्त करते हुए कहा कि विशेष आवरण, सूचनापुस्तिका एवं स्थायी सचित्र डाक मुहर जारी कर विभाग ने मनुष्य निर्माण के इस कार्य के प्रति अपनी सद्भावना व्यक्त की है। इससे संघ के कार्य और उसके उद्देश्य की जानकारी अधिकाधिक लोगों तक पहुँचेगी तथा समाज में इस कार्य को नई गति मिलेगी। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्र की अपेक्षाओं के अनुरूप चरित्रवान, सक्षम और सेवाभावी नागरिकों का निर्माण इस कार्य के माध्यम से और अधिक गति से होगा तथा समाज का सहयोग इस दिशा में महत्वपूर्ण भूमिका निभावेगा। कार्यक्रम में प्रांत सह संघचालक श्रीधरजी गाडगे, महानगर संघचालक श्री राजेशजी लोया, डॉ. सुधीरजी जाखेरे, डाक सेवाएँ, नागपुर क्षेत्र के निदेशक, श्री रामचंद्र जायभाये, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र एवं गोवा परिमंडल, डाक विभाग नागपुर के अधिकारी एवं कर्मचारी तथा डॉ. हेडगेवार स्मारक समिति, नागपुर के सदस्य उपस्थित थे。
0
0
Report
Advertisement

कल्याण के खड्डों पर कांग्रेस का जोरदार प्रदर्शन; ठेके में 25.70 करोड़ का सवाल

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील चक्की नाका-मलंगगड रोडवरील खड्ड्यांमुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये चिखल टाकून कमळ अगरबत्ती लावत नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर केडीएमसी मुख्यालयाचे गेट बंद करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. कल्याण पूर्वेतील चक्की नाका-मलंगगड रोडवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चिखल टाकून त्यात कमळ लावण्यात आले. तसेच अगरबत्ती लावत नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचे फोटो असलेले बॅनर व खड्डे भरा असे फलकही आंदोलनात झळकले. महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी ७० लाख रुपयांचे ठेके दिले असतानाही पावसाळ्यापूर्वी कामे झाली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान, आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर खडी डांबर टाकून अधिकाऱ्यांचे येणे-जाणे बंद करू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे. बाईट, नवीन सिंग, जिल्हाध्यक्ष काँग्रेस,
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी की बाढ़ ने Wai शहर के महागणपती मंदिर को पानी में डुबो दिया

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून कृष्णा नदीला पूर आला आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरातील ऐतिहासिक महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गणरायाच्या मूर्तीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. तसेच कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहेत. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जांभळी धरणही शंभर टक्के भरले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी नदीपात्र आणि पुलांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

रोहित पवार ने चंद्रकांत पाटिल के फिंगरप्रिंट दावों पर तीखा हमला

Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार ऑन चंद्रकांत पाटल: दिल्लीतील दगडफेक प्रकरणात केलेल्या वक्तव्यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. फिंगरप्रिंट आणि तंत्रज्ञानाबाबतच्या दाव्याची खिल्ली उडवत, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना प्रशिक्षण द्यावे, इतकेच नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही हे तंत्रज्ञान शिकवावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपरोधिक निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले, दिल्लीतील दगडफेकीनंतर रस्त्यावर पडलेल्या प्रत्येक दगडावरील फिंगरप्रिंट तपासून आरोपी शोधता येतात, असे जर चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसाठी मार्गदर्शनाची मालिका सुरू करावी. गृहमंत्र्यांना गृहविभागाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर ती जबाबदारीच चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेत जाऊन ट्रम्प आणि तेथील प्रशासनालाही हे फिंगरप्रिंट तंत्रज्ञान शिकवावे अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांमध्येही हेच फिंगरप्रिंट लॉजिक वापरून दोषींना शोधून दाखवावे असे टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. रोहित पवार ऑन विद्यार्थिनी आत्महत्या: नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सरकारवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नीट पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, आत्महत्येच्या नोंदीत नीटचा उल्लेख टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे या 19 वर्षीय विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकिताला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत तिने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी आई-वडील किंवा भावाला जबाबदार धरू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यांनी नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात पेपरफुटी होणार नाही, यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप करत, आत्महत्येच्या प्राथमिक नोंदीत नीटचा उल्लेख करण्यात आलेला नसून तो टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची शक्यता व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार ऑन शिवेंद्रराजे भिसले: साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवेंद्रराजे हे स्वभावाने चांगले मंत्री असले तरी दबाव आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ते भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचेही ते म्हणाले. मंत्र्याशी जुना परिचय असून त्यांच्या परिवाराबद्दल आदर असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी टीकेची सुरुवात केली. मात्र साताऱ्यात नुकत्याच घडलेल्या कथित सोसायटी ठराव प्रकरणात दबाव आणि गुंडांचा वापर करून ठराव मंजूर करून घेतल्याची माहिती समोर आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपसोबत गेल्यावर अशा घटनांचा हा निर्णय शिवेंद्रराजेंचा होता की तिच्या पाठीमागे भाजप नेत्यांचा सल्ला होता याबाबत आपण काही ठाम बोलू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे, मात्र दबावाचे राजकारण करून निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत अशा पद्धतीला लोकांची मान्यता नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top