416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में शोरूम आग: दमकल ने आग पर पाया नियंत्रण, सुरक्षा नियमों पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चितार ओळ लागत सोनचाफा ज्वेलरी शोरूमला आग लागली होती... वेगाने पसरणाऱ्या या इमारतीची आग लगतच्या होर्डिंग आणि दुचाकींचाही कवेत घेते... दरम्यान अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले... अग्निशामक दलाच्या जवानांनी लगेचच ही आग नियंत्रणात आणली... आगीमुळे मोठं नुकसान झालं असून इमारती लगतच्या दुचाकीही जाळल्यात... दरम्यान बाजारपेठ असलेल्या महाल परिसरात काही दिवसांपूर्वीच आशिष एन एक्स या कपड्यांच्या दुकानाला आग लागली होती. त्यानंतर आज पुन्हा एका शोरूमला आग लागल्याने मोठ्या शोरूममध्ये अग्निशामन दलाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा त्याबाबत नियमांचे पालन होतं का प्रश्नचिन्ह निर्माण झालेयं0
0
Report
जेजुरी के खंडेराय गढ़ से पालखी सोहळा शाही स्नान के लिए प्रस्थान
Rui, Maharashtra:जेजुरी 'येळकोट येळकोट जयमल्हार' जयघोषात श्री खंडेरायाच्या गडावरून पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानसाठी प्रस्थान झालंय.... अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावरून 'येळकोट येळकोट जयमल्हार' जयघोषात पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानासाठी प्रस्थान झालंय.... अधिकमास महिन्यात सोमवती अमावस्या असल्याने मोठं महत्त्व प्राप्त झालंय.. देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे सोमवती अमोशा निमित्त जेजुरी गडावर दाखल झालेले पहावयास मिळाले यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केलीय..0
0
Report
सांगली में वेदांत बंडगार हत्या के विरोध में कैन्डल मार्च
Sangli, Maharashtra:अँकर - सांगली जिल्हा हादरून टाकणाऱ्या 14 वर्षीय वेदांत बंडगर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली मध्ये सामाजिक संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. सांगली मिरज रोडवरील शहीद अशोक कामटे चौकापासून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये पीडित बंडगर कुटुंबासह सांगलीतील विविध पक्षातील व सामाजिक कार्यकर्ते आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मेणबत्ती घेऊन मृत वेदांत बंडगर याला न्याय द्यावा, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समस्त सांगलीकरांच्यावतीने चिमुरडया वेदांत याला सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.0
0
Report
Advertisement
बारामती में कर्जमाफी पर सरकार पर सवाल, आंदोलन की धमकी तेज
Rui, Maharashtra:पॉइंटर - कर्जमाफी चा बिना अट येईल असे वाटत होतं. त्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांना यांना वंचित राहावं लागतं होते. 44 लाख शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत झाली असती. 2 लाखापर्यंत सरसकट माफ करावा असा आम्हाला म्हणायचं होत. काही जाचक अटी काढणं गरजेचे होत. उपोषण सोडत असताना महाजन साहेब आले. ते cm सोबत बोलले. Cm सकारात्मक निर्णय घेतील. आम्ही सरकारशी बसून बोलू. अजून काही दिवस आम्ही बसलो असतो. आमची भावना होती की सरकारला संधी देऊ. सरकार चूक करणार नाही कारण त्याला अहिल्यादेवी यांचं योजनेला नाव आहे. सरकार महापुरुष यांच्या अवमान करतो आहे असं वाटू शकते, तसेच मला पंढरपूरला शब्द दिला होता. जर पंढरपूरचा शब्द फिरवला तर वारकरी त्यांना पूजा करू देणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सरकार शब्द फिरवणार नाही. आपण संधी देऊन बघू. जर अटी मान्य केल्या नाहीत 4 जुलै ला आम्ही मराठवाड्यात मोठं आंदोलन करू. संधी देऊन सुद्धा काम केलं नाहीतर महाजन साहेब खोट बोलले आणि cm साहेब देखील खोटं बोलले अस म्हणावं लागेल. डिलीमिटेशन चा कायदा महिलांचा आरक्षण पुढं करून त्यांना तो आणायचा होता मात्र तो हाणून पाडला. टीएमसी ला पराभव स्वीकारावा लागला. भाजपाला आता कळलं आहे निवडून येणं अवघड है त्यामुळे ते कुठे खासदार हाताला लागतात काही बघत आहेत. उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार खरंच अन रिचेबल आहेत खरंच ते आन रीचेबल होते का का मुद्दामून ते अनरिचेबल झालं हे बघावे लागेल. त्यामुळे लोकांच्यात याबाबत भाजपमध्ये नाराजी होऊ शकते. आपण भाजपसोबत कधी जाणार नाही तो विचारा मला पटत नाही. सध्या अनेक प्रश्न आहेत यावर कुणीतरी बोललं पाहिजे. आज सपकाळ साहेब तिथे येणार होते. अनेक नेते सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. माझी भूमिका संघर्षाची आहे. मनोज जरांगे जेव्हा आंदोलन कर्जमाफीसाठी करतील त्यावेळेस आपण तिथं बघूया. दोन लाखापर्यंत मदत मिळणं आमच्या शेतकऱ्यांना सध्या गरजेचा आहे.0
0
Report
कळंबोली में तेज कार से 7-8 लोग घायल, चालक गिरफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग कळंबोली सेक्टर-1 परिसरात भरधाव कारने 7 ते 8 नागरिकांना दिली धडक। झोप लागल्याने ब्रेक ऐवजी एक्सेलेटर दाबला गेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। अपघातात जखमी नागरिकांना rुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत। अपघातात महिला पुरुष आणि लहान मुलांचा समावेश。 अपघातात गाडी थेट फूटपाथ वर。 कळंबोली पोलिसांनी कार चालक डॉ संजय बरनवाल यांना घेतले ताब्यात。 या प्रकरणी कळंबोली पोलिस अधिक चौकशी करत आहेत。0
0
Report
ठाकरे गुट बनाम शिंदे गुट: महासभा में आमने-सामने टकराव
Kalyan, Maharashtra:न्यूज फ्लॅश केडीएमची महासभेत ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये रस्त्यांवर फिरवा सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या या विधानानंतर शिंदे गटाने घेतला आक्षेप स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे आणि इतर नगरसेवकांनी उमेश बोरगावकर यांना धारेवर धरले उद्धव ठाकरे यांना फिरवा आमच्या नेत्यात दम आहे असे शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी उमेश बोरगावकर यांना सुनावले काही काळ महासभेत गोंधळाची परिस्थिती0
0
Report
Advertisement
कराड में शहीद अर्जुन जाधव के परिवार को मराठा नेता ने सांत्वना दी
Satara, Maharashtra:कराड, सातारा - जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना भारतीय नियंत्रण रेषेजवळ लँडमाईंडचा स्फोट होऊन शहीद झालेले वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या कुटुंबीयांचे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वन पर भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा दौरा आटोपून इंदापूरकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावी भेट देत शहीद जवान अर्जुन जाधव चे वडील राजेंद्र जाधव, वीर पत्नी सायली, भारतीय नौदलात कार्यरत असणारे शहीद अर्जुन जाधव यांचे धाकटे बंधू ऋषिकेश जाधव, आई सुरेखा जाधव यांचे सांत्वन केले.0
0
Report
बदलापुर में स्मार्ट मीटर के विरोध में आक्रोश, नागरिक उपवास पर
Ambernath, Maharashtra:स्मार्ट मीटरविरोधात बदलापुरात संतापाची लाट संगीता चेंदवणकर, राम जगताप यांचं उपोषण ‘महावितरणची मनमानी कदापी सहन करणार नाही’ बदलापुरात सक्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट विरोधात संतापाची लाट उसळलीय. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केलंय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली बदलापुरातल्या जनतेला भरमसाठ बिलं पाठवण्यात येत आहेत. जनतेची अक्षरश: लूट सुरू आहे. प्रशासनाने स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवावी अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा राम जगताप यांनी दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून बदलापुरच्या जनतेत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप दिसून येतोय. महावितरणचे कर्मचारी सक्तीने स्मार्ट मीटर लावत असून त्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं येत आहेत. याविरोधात निवेदनं देऊनही महावितरणने स्मार्ट मीटर लावण्याचा धाडका सुरूच ठेवलाय. महावितरणच्या याच मनमानीविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी एल्गार पुकारलाय. स्मार्ट मीटर म्हणजे लुटीचा खेळ असून, अदानींच्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी महावितरणचे अधिकारी त्यांना साथ देत असल्याचा आरोप राम जगताप यांनी केलाय. या मीटरमुळे भविष्यात वीजबिलांचा भार इतका वाढेल की सर्वसामान्य नागरिकांना घर कसं चालवायचं असा प्रश्न पडेल. त्यामुळे बदलापुरातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून या स्मार्टविरोधात आंदोलन छेडावं असं आवाहन राम जगताप यांनी केलंय. तर शासनाच्या धोरणानुसारच वीज मीटर बदलण्यात येत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे वाढीव वीज बिलं येत नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणचे अधिकारी काटकर यांनी दिलंय.0
0
Report
मालेगांव गोठे में भीषण आग से तीन बैल जले, किसान को बड़ा नुकसान
Washim, Maharashtra:मालेगांव तालुक्यातील डोंगरकिन्ही के किसान नीळकंठ देशमुख के गोठे में भीषण आग लगने से तीन बैलों की मौत हो गई. गोठे में खेती के लिए आवश्यक सामग्री और बड़े पैमाने पर चारा भी जलकर खाक हो गया. इस दुर्घटना से किसान को बड़ा आर्थिक नुकसान हुआ है और खरीप मौसम शुरू होने से पहले बैलों की मौत से देशमुख के सामने बड़ा संकट खड़ा हो गया है. खेती की मशागत और बुआई कैसे करनी, यह सवाल सामने है. इस घटना से देशमुख परिवार के आर्थिक संकट में वृद्धि हुई है और सरकार से तात्कालिक आर्थिक सहायता की मांग है.0
0
Report
Advertisement
नागपुर के गोरेवाड़ा संग्रहालय में घुसपैठिया बिबट्या ने तीन बिबटों को मार डाला
Nagpur, Maharashtra:नागपुर स्थित गोरेवाडा प्राणी-संग्रहालय में घुसखोर बिबट्य के हैदोस की घटना सामने आई है। घुसखोर बिबट्ये ने तीन बिबट्यों को मार डाला। सफारी से बाहर से प्रवेश किया यह बिबट्या रविवार को बिबट सफारी में हैदोस मचाते हुए तीन बिबट्यों को मारने में सफल रहा। इस घटना ने प्राणी-संग्रहालय की सुरक्षा व्यवस्था पर प्रश्नचिन्ह खड़े कर दिए हैं। कर्मचारियों को दो बिबट्यों के बीच भीषण झझट दिखाई दी; इनमें से एक का मौके पर निधन हो गया, दूसरा गंभीर रूप से घायल हुआ। हालांकि प्राप्त जानकारी के अनुसार रक्तरंजित संघर्ष केवल इन दो बिबट्यों तक सीमित नहीं रहा और बाहरी बिबट्य ने इन तीनों की गिरफ्त लिया, ऐसी सूचना सामने आ रही है। गोरेवाडा प्राणी-संग्रहालय प्रशासन इस बारे में जानकारी देने को तैयार नहीं है।0
0
Report
दिग्रस में बिजली आपूर्ति बार बार बाधित, नागरिक महावितरण कार्यालय के सामने धरना
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस शहर तसेच ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक दिली. अखंडित वीज पुरवठ्यामुळे दिग्रसकर त्रस्त झाले आहेत, त्यामुळे आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत करा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्यांना रोखणे हाताबाहेर जाईल असा इशारा देण्यात आला. दिग्रस मध्ये कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा होतो, वीज खंडित झाल्यास दुरुस्तीला विलंब होतो व तक्रारी करूनही कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे महावितरणचा कारभार रामभरोसे असल्याचा आरोप नागरिकांनी केला.0
0
Report
शिवसेना ने स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन तेज कर सरकार से योजना रोकने की मांग की
Akola, Maharashtra:राज्य सरकारने वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध होत आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही ( शिंदे गट ) या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोल्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असताना विरोधकांसह अनेक सामाजिक संघटना आणि ग्राहक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी स्मार्ट मीटरविरोधी घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून शासनाने या योजनेचा फेरविचार करावा, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. सरकारने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी के भोंदू अशोक खरात गिरफ्तार: 51 हजार की धोखाधड़ी का केस
Shirdi, Maharashtra:नाशिकचा भोंदू अशोक खरात, ज्याला 'कॅप्टन' नावाने ओळखली जाते, राज्यभरात गाजत असतानाच शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूला गजाआड केलयं.. आंतरजातीय प्रेम विवाह विघ्न न टाकता मार्गी लावण्यासाठी आणि विवाहबद्ध जोडप्यावर नातेवाईकांनी केलेली करणी दूर करण्याच्या नावाखाली, या भोंदूने वेळेवेळी दाम्पत्याकडून 51 हजार रुपये उकळायचं ठरवलं.. काल अमावास्येच्या दिवशी दांपत्याला पूजाविधीसाठी बोलावल्यावर शिर्डी पोलिसांनी सापळा रचून भोंदू अशोक खरात याला बेड्या ठोकल्या.. सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम नावाच्या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही विवाह करायचा होता.. हा आंतरजातीय प्रेम विवाह व्यवस्थित पार पडावा, या नात्याने नवऱ्यावर संकट आल्याचे सांगत कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भोंदू अशोक खरात यांनी तरुणीला भीती देत त्याला सांगितले की देव शक्ती असल्याचे दाखवून सर्व संकट दूर करतो.. पूजा आर्चेच्या नावाखाली मागील एक वर्षात या भोंदूने 51 हजार रुपये उकळले.. काल अमावास्या असल्याने भोंदू अशोक खरात ने दांपत्याला पूजाविधीसाठी बोलावले होते.. शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून भोंदू अशोक खरात याला गजाआड केलयं.. राहाता परिसरातून त्याची साथीदार माया विठ्ठल कुसळकर हिला देखील बेड्या ठोकल्या आहेत.. अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात भोंदू अशोक खरात यांच्या विरोधात जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या भोंदूने जादू टोण्याच्या नावाखाली आणखी किती लोकांना आर्थिक गंडा घातला आहे? प्रकरणाचा तपास सुरू आहे...0
0
Report
यवतमाळ के घोडखिंडी में पानी की तंगी के खिलाफ ग्रामीणों ने पंचायत कार्यालय के बाहर प्रदर्शन किया
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घोडखिंडी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन आमदार बाळासाहेब मांगुळकर व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गावात पाणीपुरवठा होत नाही, विहीर जंगल भागात असल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते, त्यामुळे विहिरीवरून गावात पाईपलाईन टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वारंवार मागणी करूनही पाणीटंचाई दूर केल्या जात असल्याने तीव्र आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला.0
0
Report
नवी मुंबई नगरपालिका कार्यक्रम से शिंदे का नाम हटाने पर शिवसेना ने हंगामा किया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव वगळले, वनमंत्री गणेश नाईक आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पेटला नवी मुंबई मनपातर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा प्रसंगी शिवसेनीकांनी कार्यक्रम स्थळी घातला गोंधळ, घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या गेटवर गणेश नाईक यांच्या गाडी अडवण्याचा केला प्रयत्न, शिवसेनीकांनी गेटवर चढून केले आंदोलन याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी0
0
Report
Advertisement
