icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

एक गाँव, एक गणपति, एक दिन: गणेश उत्सव की अनोखी परंपरा

Chendhare, Maharashtra:साले गावाची अनोखी गणेशोत्सवाची परंपरा तलावातून निघते बाप्पांची पालखी मिरवणूक घराघरात नाही, संपूर्ण गावात एकच गणपती एकजुटीने साजरा होतो साले गावचा गणेशोत्सव इथे ना प्रत्येक घरात गणपतीची प्रतिष्ठापना, ना दहा दिवसांचा उत्सव... तर ‘एक गाव, एक गणपती आणि एकच दिवस’ अशा अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. गावातील गणेश मंदिरात विधिवत पूजा-अर्चा झाल्यानंतर बाप्पांची पालखीतून मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे, ही मिरवणूक चक्क गावातील तलावातून काढण्याची परंपरा आहे. तलावातून पालखी पुढे नेताना भक्तिमय वातावरण निर्माण होतं. त्यानंतर गावातील प्रत्येक घरासमोर पालखी नेऊन बाप्पांचे पूजन केले जाते. या वेळी संपूर्ण गाव एकत्र येतं आणि मोठ्या उत्साहात हा पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला जातो. शेकडो वर्षांची ही अनोखी परंपरा आजही साले ग्रामस्थांनी जपली असून, एकजुटीचा आणि श्रद्धेचा अनोखा संदेश या गणेशोत्सवातून पाहायला मिळतो.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में चांदी के नए नंदी की प्रतिष्ठापना, दानियों की धूमधाम

Shirdi, Maharashtra:साईंच्या समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची प्रतिष्ठापना... श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर चांदीच्या नव्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना... आग्रा येथील साईभक्तांकडून 54 किलो 065 ग्रॅम चांदीचा नंदी व बेस अर्पण... चांदीच्या नंदी व बेसचे देणगीमूल्य तब्बल 1 कोटी 20 लाख 56 हजार 495 रुपये... नंदीला सुशोभित करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचे शिंग व बिंदीही अर्पण... सोन्याच्या अलंकारांचे वजन 98 ग्रॅम 600 मिलीग्रॅम, देणगीमूल्य 13 लाख 85 हजार 132 रुपये... जुन्या नंदीचे उत्तरपूजन करून नव्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना... भक्तिमय वातावरणात पार पडला प्रतिष्ठापना सोहळा.. साईभक्तांच्या विनंतीवरून देणगीदार साईभक्तांची नावे साईसंस्थान प्रशासनाकडून गोपनीय....
0
0
Report
Advertisement

सरकार का सकारात्मक आश्वासन: मनोज जरांगे पाटील के मुद्दों पर आगे कदम

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) ब्रेकिंग.. मंत्री दादा भुसे On मनोज जरांगे पाटील.. कोणत्याही शुभकार्यांची सुरुवात आपण श्री गणेशाचे पूजन आपण करतो.. गणेशोत्सव आपण सगळीकडे उत्साहाने साजरा करतो.. मनोज जरांगे पाटील यांना विनंती आव्हान करेल.. आपल्या बऱ्यापैकी मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत... आणि काही राहिलेल्या असतील त्यात शासन निश्चित सकारात्मक असेल.. मला या गोष्टीची जाणीव आहे काही मराठा समाज कुटुुंकुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.. कष्टकरी अनेक बांधवांना न्याय मिळाला पाहिजे..याबद्दल कोणाचेही दुमत असता कामा नये.. जे मुद्दे राहिले असतील ते शासनाच्या वतीने येणाऱ्या काळात निश्चितपणे सोडविण्याचे काम केले जाईल.. मंत्री दादा भुसे On समान नागरिक कायदा.. आपण सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे... यामध्ये प्रत्येकाला न्याय मिळेल... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना लिहिण्यामागची भावना एकच आहे... समाजातील सर्व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे.. शेवटच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे.. जे घटक पाठीमागे राहिले ते सर्व घटक मुख्य प्रवाहात येतील... आपण सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे...
0
0
Report

हिंदी में क्लिकबेट हेडलाइन: हर्षवर्धन पाटिल के घर गणेश उत्सव की धूम, बेटा राजवर्धन ने ढोल-ताश में दी प्रस्तुति

Rui, Maharashtra:इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी बाप्पा विसावले.... ढोल ताशाच्या गजरात केलं लाडक्या गणरायाचं स्वागत..... हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटलांनी धरला ढोल ताशावर ठेका......ANCHOR राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आगमन झालंय. विशेष म्हणजे ढोल ताशाच्या गजरावर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी चांगलाच ठेका देखील धरल्याचं पाहायला मिळालं. हर्षवर्धन पाटील पत्नी भाग्यश्री पाटील आणि पुत्र राजवर्धन पाटील यांनी विधिवत पूजा करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे...
0
0
Report
Advertisement

नवनीत राणा के घर गणपति बाप्पा का आगमन: आशीर्वाद और सुख-समृद्धि की प्रार्थना

Amravati, Maharashtra:नवनीत राणांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन; सर्वांच्या आयुष्यात आनंद दे.... बाप्पांकडे नवनीत राणांची आर्त हाक अँकर :- अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांची स्थापना करण्यात आली. नवनीत राणा यांनी बाप्पांची विधिवत पूजा करत गणरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी बाप्पांकडे सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा अशी मनोभावे प्रार्थना केली. समाजात शांतता आणि सलोखा कायम राहावा प्रत्येकाच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि सर्वांना यश समृद्धी मिळावी अशी आर्त हाक त्यांनी गणरायाच्या चरणी घातली. गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
0
0
Report
Advertisement

ओझर में विघ्नहर जन्मोत्सव श्रद्धा और उत्साह के साथ संपन्न

Barav, Maharashtra:ओझरच्या विघ्नहराचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला आहे. Anc: गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायक क्षेत्र ओझरमध्ये श्री विघ्नहराचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने बाप्पाचा गाभारा आकर्षक विविधरंगी फुलांनी सजवण्यात आला असून गणरायाला सुवर्ण अलंकारांनी विभूषित करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पारंपरिक द्वारयात्रा उत्सवाचीही आज सांगता होत असून, भाविकांसाठी कीर्तन, महाप्रसाद आणि शेरण्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.याचाच मंदिर गाभाय्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया ओझर पुणे...
0
0
Report

मराठा समाज का मुंबई पलायन: एकाकी उपोषण और डाव-पेच का तनाव

Jalna, Maharashtra:जालना |मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद पॉइंटर्स दोन महत्वाचे विषय राज्यातील मराठा समाजाला सांगायचे आहेत.सध्या मला बोलता येतं.16 दिवसांच्या उपोषणात डॉक्टरांनी सलाईन लावल्यानं मला बरं वाटत होतं.पण काल पोलिसांनी परवानगी नाकारल्याने औषधोपचार पाणी मि सोडलं आहे. आता सर्व बंद केल्यानं पोटात आग होण्यास सुरुवात झाली आहे.उद्या बोलण्यास त्रास होईल त्यामुळे महत्वाचे विषय मला सांगायचे आहेत त्याबदल कुणीही वाईट वाटून घेऊ नका *उद्या आपण सकाळी 11 वाजता मुंबईाच्या दिशेने निघणार आहोत.मुंबईला जायचा शब्द मागे घेतला जाणार नाही यामुळे समाजाच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही.ठरलेल्या मार्गानेच मुंबईला जायचं आहे* *माझ्या सोबत 2 अँबुलनस असतील 10माणसांपेक्षा माझ्या सोबत कुणीही असणार नाही.* *देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो.फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या आडून मराठ्यांवर डाव टाकला.मराठे मुंबईत येणार आणि धिंगाणा घालणार. मग दंगल घडणार,* *परवानगी नाकारली ना मग फडणवीस मला एकट्याला परवानगी देणार की नाही.?आझाद मैदानांवर आता मला परवानगी देणार का.?मि एकटा आधी खिंड लढवतो आधी एकटा मि मुंबईत जातो,समाजाने येऊ नये असं नाही,वर्गणी करून केलेल्या गाड्या तशाच ठेवा पैसे खर्च करू नका* *देव देवতांच्या आडून त्यांनी डाव टाकला आहे त्यामुळे डाव पलटतो.मि एकटा लढतो.* *मुंबईत मराठा समाजाला योग्य वेळी बोलावलं जाईल.तुम्ही तुमच्या गावात सावध आणि सुरक्षित राहा.* *मराठा समाजाने आता नाराज होऊ नये.वेळप्रसंगी निर्णय बदलावे लागतात.निर्णय फक्त तुम्ही येण्याचा बदलला आहे.* *फडणवीस यांना डाव टाकून मराठ्यांना जिंकवावं लागेल,सण उत्सव आहेत.* *सगळं सैन्य कधीच एका दिवशी गेलेलं नाही.काही घात झाला तर.मि एकटा मुंबईत जातो.मला कोण अडवतो कोण परवानगी नाकारतो ते बघतो.मराठ्यांची तिथे गर्दी होणार म्हणून तुम्ही परवानगी नाकारली ना.?आता मि एकटा येतो.आता आम्ही सरकार आणि न्यायदेवतेचा सन्मान होणार की नाही.?* जेवण्यासाठी आणलेलं साहित्य तसंच ठेवा.ते साहित्य नंतर मुंबईत कामाला येईल. मुक्कामाचे ठिकाण कायम राहील, मुक्कामाच्या ठिकाणी अंतरवालीच्या उपोषणासारखं ठिकाण तयार करा.मि तिथेच उपोषण करीन.प्रत्येक ठिकाणी अशीच व्यवस्था ठेवा.कुठेही हार तुरे ठेऊ नका. *मि एकटा सध्या मुंबईत उपोषण करत जाणार,माझ्यासोबत 10 लोक असणार,मराठा समाज मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात येणार असल्यानं सरकारनं परवानगी नाकारली,त्यामुळे मि एकटा मुंबईत उपोषणाला जाणार,मराठा समाजाने सध्या मुंबईत उपोषणाला येऊ नये,जरांजे यांचं आवाहन,मि सांगेल तेव्हा मुंबईत या-जरांजे* मला आशीर्वाद देण्यासाठी मराठा समाज मि मुंबईला जाणाऱ्या मार्गावर येऊ शकतो. *मराठा समाजाच्या महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी कधी यायचं ते दोन दिवस अगोदर सांगितलं जाईल.मला माझा डाव टाकू द्या.मि समाजासाठी थांबणार नाही.रस्त्यावर काटे अंथरलेले आहेत ते आधी मला दूर करू द्या मराठा समाजाचे रस्त्यावर सांडणारे रक्त मला बघायचे नाही माझं सांडलं तरी चालेल,मराठा समाजावर अडचणी येऊ नये म्हणून हा निर्णय मि घेतला आहे* समाजाला संकटात सोडून मि मजा करणं मला योग्य वाटत नाही,संकटाच्या दाढेत मि चाललो डावाला प्रतिडाव मला टाकू द्या *"दम असेल तर आमची परवानगी आता रोखून दाखवा,नव्याने पोलिसांकडे अर्ज करा"* *मराठ्यांनी फक्त आता गावं संभाळावेत. मि आंदोलन सांभाळतो.मुंबई सांभाळतो.महाराष्ट्रभर पाठिंबा सुरू ठेवा* बोलता आलं तरच मि एखाद्या ठिकाणी भाषण करीन अन्यथा करणार नाही *माझी ही शेवटची भेट म्हणून मला भेटायला या.पण हार मानायची नाही.जातवान लढा.समाजाची हार होऊ देऊ नका.मेला पण शरण नाही गेला असा संदेश समाजात जाईल.* *छातीवर गोळ्या घेतल्या,पळून नाही गेला.असा वाटलं पाहिजे.समाजाला देऊन मेला नाही दिलं तर नाही दिलं म्हणून मेला असं लोकांनी म्हणायला पाहिजे* *मला फक्त समाजाच्या लेकरांसाठी शरण जायचं नाही.फडणवीस याचा हा शेवटचा डाव होता.त्याच्या डावाचा शेवट होत नाही.उद्या सकाळी 2 गाड्या आणि 2 अँबुलनस घेऊन मि निघतो मला कोण अडवतो ते बघतो* जोपर्यंत मि जगेल तोपर्यंत झुंज देतो.माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावा गावात शांतता फेऱ्या काढा *दगा फटकா कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही.संकट किती आले आणि शत्रू कितीही मोठा असू द्या मि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे* मराठा समाजाची शक्ती सरकारला कळाली आहे.त्यामुळे मुंबईत धुराळा वाजू शकतो हे सरकारच्या लक्षात आलं आहे मराठा समाजाने आता मोहीम बदलावी,मराठा समाजाने रागावू नये.उलट मोहीम बदला माझ्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. *निर्णय बदलण्याचे कारण* प्रत्येक वेळी परवानग्या नाकारूनही आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला परवानगी दिली यावेळी त्यांनी डाव रचला *ऑन CM फडणवीस* सांगू ना मुंबईला आल्यानंतर. आता मि एकटा येत आहे.कायद्याच्या आतल्या कोणत्या आणि बाहेरच्या कोणत्या हे तिथे आल्यावर कळेल.आता डावाला प्रति डाव आहे.मर्दासारखे डाव टाका.नपुसकासारखे नको.सरकारशी मैत्री करण्यासाठी समजाची का रांगोळी करू.सरकार मला गोळ्या घालून मारणार.? समाजाचा सगळा उन्हाळा करून आपण चांगलं जगायचं असं होणार नाही.त्यापेक्षा मि गोळ्याझेलो. समाजाला मि माय बाप मानतो.समाजाचं पोरगं म्हणून जाऊ द्या माझा बळी *ऑन उपोषण* मि आतापर्यंत इथे उपोषण केलं.सरकारचं ऐकून औषधोपचार घेतले. आता मि सलाईन औषधोपचार घेणार नाही.मि मेल्यावर किंवा कोमात गेल्यावर सरकार काय करेल मला माहित नाही.पण मला समजेल तोपर्यंत मि उपचार घेणार नाही.शरीर मला दान करता येईल तेवढं करीन. पोलीस डॉक्टरांनी मला मुंबईत देखील हात लावायचा नाही. ते मुंबईत गेल्यावर ठरवू,(कोर्टाच्या उपचारांच्या निर्देशावर) राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यात भांडण लावायला बसलेत,राजकारण्यांनी तुमच्या लेकरांचं कल्याण केलेलं नाही *जो आपल्याला आरक्षण देईल तो निवडून आणता येईल.यांना निवडुन देऊन चूक केली.आवडी असून फायदा काय.?* तुमच्या आवडीचा नेता आणि पक्षाचं करता काय,तो काही समाजाचं कल्याण करत नाही *निवडून आणण आणि मतं देणं आपल्या हातात आहे.चिन्ह असलेल्या उमेदवारापेक्षा चिन्ह नसलेल्या उमेदवाराला आपली मते मिळाली तर जास्त मतं मते पडतील* जो मराठयांना आरक्षण देईल.तो निवडून आणू *ऑन चर्चा* *कुठेही पटांगणात चर्चेला यावं आम्ही तयार आहोत. मराठे आता मुंबई कोणत्याही दिवशी जॅम करू शकतात आतां आम्हाला आरक्षण पाहिजे. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे सरकार मेंगे आहे.फडणवीस विखे यांनी फसवलं आहे.शिंदेंच्या मंत्र्याने आम्हाला फसवलं आमचं वाटोळं केलं* योग्यवेळी मराठा समाजाला आणि महिलांना मुंबईत बोलावतो.आपली ही शेवटची भेट राहील.आलो तर नशिबाने परत येईल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top