416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भागवत नागपुर में युवाओं से बोलते: भारत का विश्वगुरु बनने का मार्ग
Nagpur, Maharashtra:नागपुर: नागपुरात आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ‘जेन-झी’शी संवाद साधणार आहे. कस्तुरचंद पार्कवर एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसह तरुणांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी ते ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावर येतील. यावेळी सरसंघचालकानी केलेले भाषण मार्गदर्शन. नागपूर - डॉ मोहन भागवत,सरसंघचालक,भाषण. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला त्यावेळी लोक बोलायचे की हे स्वातंत्र्य टिकणार नाही पण स्वातंत्र्य टिकलं. प्रसंग सगळेांशी संवादाचा आहे पण मला तरुणांशी संवाद साधायला सांगितलं. प्रसंग सर्वांसोबत संवादाचा आहे मात्र तरुण हे डेमोक्रॅटिक आहे, त्याचा योग्य लाभ झाला तर आपण विश्वगुरू बनणार आणि नाही झाला तर पुढे खूप बोजा येईल. तीस वर्षांनंतर आजची पिढी जुनी पिढी बनेल, आजच्या पिढीला पुढच्या पिढी बद्दल विचार करणे आवश्यक आहे. आपली तुलना इतर लोकांशी करू नये, आपण अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नाही, हे तरुणांनी समजायला पाहिजे की आम्ही भारत आहोत. उन्नतीचे जे निकष पाहिजे त्यासाठी आपल्याला आपला आणि आपल्या देशाचा विचार करावा लागेल, इतर केवळ त्यांच्या भौतिक उन्नतीचा विचार करतात मात्र भारतात आपण भौतिक उन्नतीचा विचार करत नाही. संतुलन ठीक करून पुढील मार्ग दाखवणे हे भारताच्या प्रती आपलं दायित्व आहे यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. रोजगार केवळ नोकरी होत नाही; हाताने काम करणाऱ्याला ही प्रतिष्ठा पाहिजे, उद्दमिता यालाही प्रतिष्ठा पाहिजे. अधिक साधन संपन्न देश नोकरीचा विचार करू शकतात, मात्र भारतासारखे विशाल जनसंख्या असलेला आपल्या देशाला वेगळा विचार करावा लागेल. प्राण गेले तरी चालेल असा विचार करणारे तरुण असतात, कारण वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक हे हिम्मत करू शकत नाही तरुणांमध्ये ही हिंमत असते. जग ज्याला अविचार म्हणते तेच साहस पुढे कामात येणार; एकट्याचा भाग्य नाही बनत आपल्याला देशाचं भाग्य बनवायचं आहे. जगात प्रतिष्ठा पाहिजे असेल तर जेव्हा पर्यंत आपला देश, समाज प्रतिष्ठित नहीं, तोपर्यंत ते मिळणार नाही. आम्ही तेव्हा वैभव संपन्न आहोत जेव्हा भारत वैभव संपन्न आहे.0
0
Report
GEN Z को मार्गदर्शन देकर युवाओं के साथ संवाद का क्रम जारी रहा
Nagpur, Maharashtra:सरसंघचालक ने GEN Z को मार्गदर्शन किया। इसके बाद वहां मौजूद GEN Z युवाओं से संवाद किया गया, उनकी प्रक्रियाओं को हमारे प्रतिनिधियों ने लिया.0
0
Report
अगस्त की छुट्टियों में शिर्डी में भक्तों की भारी भीड़
Shirdi, Maharashtra:सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.. साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झालेत.. आज 15 ऑगस्ट आणि उद्या रविवार अशी सलग सुट्टी असल्याने पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तिर्थस्थळे हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र आहे.. साई मंदिराच्या दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.. सलग दोन दिवस शिर्डीत गर्दीचा ओघ असाच कायम राहणार आहे.. साई मंदिरातून गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
Advertisement
नागपुर में बनावट देशी-विदेशी शराब बनाने वाले कारखाने पर आबकारी विभाग की बड़ी कार्रवाई
Nagpur, Maharashtra:नागपुर - *नागपुरातील काटोल तालुक्यातील चिखलागढ शिवारात बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर राज्य उत्पादन्न शुल्क विभागाची मोठी कारवाई* - *शेतातील घरावर छापा टाकून देशी-विदेशी बनावट दारू आणि निर्मितीसाठी लागणारं साहित्य असा ५४ लाख ८१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त* - रॉकेट संत्रा आणि टँगो पंच देशी दारूचे ३६০ बॉक्स, रॉयल स्टॅगच्या ४०८ बाटल्या जप्त - बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, ब्लेंड आणि इतर साहित्यही जप्त केले.. - दारू आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी बोलेरो पिकअप आणि ह्युंदाई आय-२० कार जप्त - कारवाईप्रकरणी चार आरोपीं विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल - चिखलागढ येथील शेतातील घरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची विक्री आणि वाहतूक केली जा असल्याचा माहिती मिळाली होती... - आता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? आर्थिक पाठबळ कुणाचं? साहित्य कुठून येत होतं? याचा तपास सुरू... - तयार दारूची विक्री आणि वितरण कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून होत होतं, याची सखोल चौकशी करण्याची मागणी - केवळ कारखाना चालवणाऱ्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क आणि मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचं आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे...0
0
Report
स्वतंत्रता के पथ पर विराट संकल्प: भारत विश्वगुरु बनेगा
Nagpur, Maharashtra:नागपूर सरसंघचालक मोहन भागवत, (संघ मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेले मार्गदर्शन ) - स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा विषय आहे. १८५७ पासून जवळपास ९० वर्षे अनेक प्रकारचा त्याग आणि बलिदान देऊन आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या त्याग आणि बलिदानाचा गौरव आपल्या मनात आहे आणि त्या संघर्षाची यशस्वी सांगता झाल्याचा आनंदही आपल्या मनात आहे. - मात्र, त्यासोबतच आपल्याला आणखी एका गोष्टीचे भान असणे आवश्यक आहे. एवढे परिश्रम करून, एवढा त्याग आणि बलिदान देऊन मिळालेले हे स्वातंत्र्य कायम टिकवणे आणि त्याचा योग्य परिणाम देशात घडवून आणणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. - सावरकरांनी म्हटले आहे....स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून जे काही उत्तम, उदात्त, उन्नत, महान आणि मधुर आहे. ते सर्व आपल्या देशात अवतरले पाहिजे. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. - आपण आपल्या तिरंग्याचे ध्वजारोहण करतो. त्यातील तीन रंगांकडे पाहिल्यावर आपल्याला हाच संदेश मिळतो. - केशरी रंग हा कर्मशीलता, ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक आहे. ज्या प्रकारच्या परिश्रमातून एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळते आणि स्वातंत्र्यानंतर ते राष्ट्र उत्कर्ष, वैभव आणि सामर्थ्याने संपन्न व सुरक्षित बनते, त्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा हा केशरी रंग आहे. - आपल्या जीवनात त्याग, बलिदान, कर्मशीलता आणि ज्ञान असेल, तर समाजात शांतता निर्माण होते. पांढरा रंग आपल्याला शांती आणि पवित्रतेचा संदेश देतो. आपण जे तप करीत आहोत ते योग्य दिशेने सुरू आहे की नाही, याची परीक्षा घेत राहण्याची प्रेरणा हा रंग देतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे समृद्धी. त्याचे प्रतीक म्हणून आपल्या तिरंग्यात हिरवा रंग आहे. - या सर्व गोष्टी करताना आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळे असलो, तर आपले विचारही वेगवेगळे असतील. मात्र ही विविधता हीच एकतेची अभिव्यक्ती आहे. - धर्मचक्राच्या अनेक आऱ्यांप्रमाणे आपण वेगवेगळ्या दिशेने जात असलो, तरी हे सर्व आरेएका धर्माच्या, एका शिस्तीच्या मर्यादेत ठेवण्यात आले आहेत. - समाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी ज्या अनुशासनाचे पालन करणे आवश्यक आहे, - राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करताना या सर्व प्रतीकांमागे असलेल्या विचारांचे आपण चिंतन केले पाहिजे. त्या चिंतनातून मिळणारे सार आपल्या जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. - कारण आपले राष्ट्र स्वतंत्र झाले आहे आणि ते स्वतंत्रच राहील, ही गोष्ट निश्चित आहे. मात्र या राष्ट्राला सुखी, संपन्न आणि सुरक्षित बनवायचे आहे. जगामध्ये आपले निश्चित आणि महत्त्वपूर्ण योगदान देणारे राष्ट्र बनवायचे आहे. - आपल्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. आपल्या विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड न करता संपूर्ण जगामध्ये या आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचे आहे. संपूर्ण मानवतेच्या जीवनात सार्थक योगदान देणारा देश म्हणून भारताला उभे करायचे आहे. - हे कर्तव्य आज आपल्या सर्वांसमोर आहे. याचे आपण चिंतन करूया आणि आजचा हा संदेश घेऊन येथून पुढे जाऊया.0
0
Report
FDA ने महाप्रसाद आयोजनों के लिए अनिवार्य परमिट और सुरक्षा नियम जारी किए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:श्रावण महिन्यात मंदिरे, सार्वजनिक मंडळे आणि भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधेचे प्रकार घडू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आता अॅक्शन मोडवर आले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी महाप्रसाद आयोजकांना एफडीएचा परवाना अनिवार्य करण्यात आला आहे, स्वयंपाक आणि पिण्यासाठी केवळ स्वच्छ किंवा आरओ पाण्याचाच वापर करावा. अन्न बनवणाऱ्या व वाढणाऱ्या स्वयंसेवकांना मास्क, हँडग्लोव्हज आणि हेड कॅप वापरणे अनिवार्य आहे. प्रसाद जास्त वेळ उघड्यावर ठेवू नये. शिळे अन्न वाटल्यास कठोर कारवाई केली जाईल. अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा सुरक्षित भांड्यांचाच वापर करावा, असेही नियमावलीत नमूद आहे.0
0
Report
Advertisement
ठाणे महापालिका स्कूलों में हर घर तिरंगा से देशभक्ति उपक्रम
Thane, Maharashtra:हर घर तिरंगा अभियानांतर्गत मनपा शाळांमध्ये देशभक्तीपर उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पातलीपाडा, दिवा, गायमुख आणि इतर मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा व देशभक्तीवर आधारित कलाकृती साकारल्या. तसेच घोषणाबाजी करत रॅली काढून परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर आणि देशप्रेमाचा संदेश दिला.0
0
Report
मुंबई में पांच फर्जी डॉक्टर गिरफ्तार, 1.19 लाख का चिकित्सा सामान जब्त
Mumbai, Maharashtra:मुंबईत पाच बोगस डॉक्टरांवर गुन्हे शाखेची कारवाई; १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त मुंबईत वैद्यकीय पदवी आणि परवाना नसतानाही नागरिकांवर उपचार करणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ आणि कक्ष ८ ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनंतर देवनारच्या झाकिर हुसेन नगर परिसरातील चार आणि बांद्रा पूर्वेतील नौपाडा परिसरातील एका क्लिनिकवर छापे टाकण्यात आले. या कारवाहीदरम्यान सगीर अहमद हाशमी, अखिलेश कुमार दुबे, मेहमुद आलम शेख, केशव प्रसाद पटेल आणि मोहम्मद आफताब खान हे पाच जण रुग्णांवर उपचार करताना आढळून आले. विशेष म्हणजे, या व्यक्तींकडे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय परवाना नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून विविध आजारांवर औषधोपचार केले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटीबायोटिक गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य असा एकूण १ लाख १९ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी देवनार आणि निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ आणि ८ च्या पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत ही कारवाई केली असून, बोगस डॉक्टरांविरोधात पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
पालघर में आश्रमशाला के विद्यार्थिनी सुरक्षा पर सवाल: रातभर छह किलोमीटर पैदल यात्रा
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जव्हार तालुक्यातील देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर बस उपलब्ध न झाल्याने रात्रीच्या अंधारात तब्बल सहा किलोमीटर पायी प्रवास करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेची जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी गंभीर दखल घेतली आहे. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, विक्रमगडचे विद्यमान भाजपा आमदार हरिश्चंद्र भोये यांनी विद्यार्थिनींसाठी मानव विकास बससेवेची मागणी यापूर्वीच करण्यात आली असल्याचे सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र देऊन याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर बससेवाही सुरू झाली आहे.मात्र चालक किंवा डेपो व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आमदार भोये यांनी स्पष्ट केले. मात्र, बससेवा सुरू असतानाही विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात सहा किलोमीटर पायी जाण्याची वेळ का आली? विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी सुरक्षित वाहतूक व्यवस्था कधी निर्माण होणार? हे प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
Advertisement
नाशिक के गड्ढे मौत बनते, सातवीं मौत के बाद प्रशासन से मांगें तेज
Nashik, Maharashtra:नाशिक शहर की सड़कों पर गड्ढे मौत बनते जा रहे हैं। सातपूर क्षेत्र में सड़क पार करते समय गड्ढा चुकाने के प्रयास में बाइक सवार दिलीप काळे को भिड़ंत हो गई और वे गंभीर रूप से घायल हो गए थे। 25 दिनों तक उपचार के बाद उनका निधन हो गया। परिवार ने महापालिका प्रशासन पर आरोप लगाते हुए आर्थिक सहायता और परिवार में से एक व्यक्ति को महापालिका में नौकरी देने की मांग की है। स्थानीय नगरसेवकों ने आयुक्त और महापौर को पत्र लिखकर सहायता की मांग की। महापालिका ने कहा है कि लगभग 15 हजार गड्ढे भरे गए हैं, पर गड्ढों ने मौत का यह सिलसिला बढ़ा दिया है। दिलीप के परिवार ने कहा कि घर की आय भाजी के व्यवसाय पर निर्भर है; अब परिवार आर्थिक संकट में है।0
0
Report
Sawantwadi Assembly sees major chaos over health issue as parties clash
Oras Bk., Maharashtra:अँकर सावंतवाडीच्या आमसभेत आज आरोग्याच्या प्रश्नावरून प्रचंड गोंधळ झाला. सावंतवाडीत आरोग्याचा प्रश्न गंभीर असून यासंदर्भात भीक मागो आंदोलन करण्यासाठी मंजूर द्यावी अशा पद्धतीची मागणी सावंतवाडीतील एका नागरिकाने केली. यावरून हा शब्द मागे घ्यावा अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदेंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. याावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला मात्र काल दोडामार्गमध्ये झालेला राडा आणि आज भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने आजचीही आमसभा वादळी ठरली.0
0
Report
नागपुर में तिरंगा रैली: मंत्री बावनकुळे ने छात्रों के साथ राष्ट्रभक्ति जगाई
Nagpur, Maharashtra:नागपुर के कोराडी–महादुला क्षेत्र में तिरंगा रैली निकाली गई। इस तिरंगा रैली में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने हिस्सा लिया। इसमें बड़ी संख्या में छात्र मौजूद थे। हाथ में तिरंगा लेकर पालकमंत्री बावनकुळे ने विद्यार्थियों के साथ रैली में भाग लिया और देश की एकता, अखंडता और राष्ट्रभक्ति की भावना युवाओं में जागृत करने के लिए इस तिरंगा रैली का आयोजन किया गया।0
0
Report
Advertisement
नाशिक के खड्डों से एक और मौत, नगरपालिका पर गंभीर आरोप
Nashik, Maharashtra:नाशिक महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नाशिक कराचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे, नाशिक मधील खड्डे अपघातामुळे मृत्यू मुखी पडलेल्या नागरिकांचा आकडा आता 7 वर गेला आहे, दिलीप काळे हे नाशिकचा सातपूर परिसरातील रस्ता क्रॉस करत असताना खड्डा चुकवण्याच्या नादात एका दुचाकीस्वराने दुचाकी अंगावर घातल्याने गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी या सगळ्या अपघाताला आणि मृत्यूला नाशिक महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे, तर स्थानिक नगरसेवकांनी देखील संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा खड्ड्यांमुळे झाल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी महापालिकेच्या आयुक्तांसह महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे... कुटुंबाने देखील यावर प्रतिक्रिया देत खड्ड्यांमुळेच मृत्यू झाल्यास म्हटल आहे... आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला असल्या कारणामुळे आमचा उदार निर्वाह कसा करावा असा मला प्रश्न पडला आहे त्यांचा भाजी विक्रेता चा व्यवसाय होता आता ते गेल्याने कुटुंब आर्थिक नुकसानामध्ये सापडला आहे त्यामुळे आमच्या घरातील एकाला महापालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी देखील कुटुंबीयांनी केली है....0
0
Report
1 सितम्बर से महाराष्ट्र में महात्मा फुले लोकशाही लोकअदालत, तेजी से निपटारे का प्रयास
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री *ऑन महात्मा फुले लोकशाही लोकअदालत* - महाराष्ट्रात एक सप्टेंबरपासून महात्मा फुले लोकशाही लोकअदालत आयोजित करण्याचा विचार महसूल विभागाने केला आहे. शताब्दीनिमित्त हा कार्यक्रम आहे. तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे केसेस प्रलंबित आहेत. निपटारा लोकअदालत करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे नागरिक जातात, मात्र त्यांच्या निकाल लागत नाही. तीन-तीन, चार-चार वर्षे प्रलंबित आहेत. पुण्यामध्ये सुद्धा आम्ही मॉडेल तयार केलेले आहे. ११ हजार केसेस काढले आहेत. लोकांना घेणे म्हणजे दोन लोकांचे निपटारे करणे. सर्व प्रांत कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लोकअदालत होईल. वर्षानुवर्षे जे केसेस आहेत, ते निघताना होईल. शासन निर्णय होईल. समझोता करून हे निकाली काढता येईल. एक सप्टेंबर ते ३१ मार्च २०२७ पर्यंत - तहसीलदारांकडे सुरू आहेत. जमिनीचे लोकअदालतीच्या माध्यमातून जनतेने सुद्धा पुढाकार घ्यावा. *ऑन उदय सामंत* - उद्योगमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे. चाकणमधली एमआयडीसी ही मुख्य समस्या होती. नितीन गडकरी यांनी पुणे-चाकण येथील रस्त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. मला वाटतं की फॅसिलिटी आहे. शरद पवार यांनी सूचना दिल्या. उदय सामंत काम करतील. *ऑन राहुल गांधी परराष्ट्र धोरण टीका* - राहुल गांधींनी टीकेचा धंदा उचललेला आहे. व्यंग करणारे लोक जास्त काळ टिकत नाहीत. व्यंग करून माणूस मोठा होत नाही. *ऑन जमाबंदी कायदा* - काल मी जमाबंदी अधिकाऱ्याकडे गेलो होतो. सातबारा नाही आहे. आदिवासी भागातील, कोकणातील शेतकरी असेल, वेगवेगळ्या कायद्यामध्ये ओळखलेल्या इनाम व्यवस्थेशी शेतकरी, प्रॉपर्टी घाट झालेला नाही. या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा योजना मिळण्याकरता आम्ही पुढाकार घेत आहोत. मला विश्वास आहे, ६० हजारांचा आकडा पूर्ण केला. पुढच्या एक महिन्यात अनेक लोकांचे काम होणार आहे.मराठवाड्यात निजामाच्या जमिनी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात देशमुख वतन आहेत. कायद्यात या संदर्भात बदल होणार आहे. - देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या नावाने शेतकरी जमीन होणार आहे. *ऑन संजय राऊत* - अशा पद्धतीने टीका करून काही मिळणार नाही. आमचे गृहमंत्री अमित शहा या देशाला सुरक्षित करण्यासाठी भूमिका घेत आहेत. संजय राऊत यांच्या वर काय बोलायचं. *ऑन मनोज जरांगे पाटील* - कालच सांगितलं आहे, यावर बोलणं अधिक उचित होणार नाही. ओबीसी संघटनांना माझी विनंती आहे, रस्त्यावरचे मुद्दे आंदोलन करून या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणे बरोबर नाही. समाजामध्ये वाद होणे हे बरोबर नाही.ओबीसी संघटनांनी मोर्चा करू नये. *ऑन ओबीसी समाज* - रोज - रोज या विषयावर बोलणं उचित ठरणार नाही. *ऑन रवींद्र चव्हाण बैठक* - सोशल मीडियाचा वापर अधिक झाला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे. हा योग्य सल्ला दिला आहे. अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू. *ऑन गुलाबराव पाटील* - भाजप-सेना युती ३० वर्षांपासून भावा-भावासारखी सांभाळलेली आहे. असे वक्तव्य करणे कुठल्या उद्देशाने केले, हे मला माहीत नाही. चर्चा केली जाईल त्याची. *ऑन नागपूर बिल्डरांना इशारा* - नागपुरात इंटरनल नकाशाचे उल्लंघन केले, डीपी प्लॅन केले. नितीन गडकरी यांनी बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आवर्जून सांगतो, ज्यांनी लोकांना फसवलं आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही. छोटे-मोठे डेव्हलपमेंट असेल, ते दूर करू. आम्ही काय बिल्डरला त्रास देत नाही. नागपूरला पूर येतो. अव्वाच्या सव्वा इमारती बांधल्या. पण अधिकृत चार हजार इमारती एकेक करून घेतल्या आहेत. अजूनपर्यंत रजिस्ट्री झाली नाही. नागपूर आता उद्ध्वस्त व्हायला निघाले आहे. दादागिरी आम्ही आता खपवून घेणार नाही. सर्व बिल्डरांना सूचना आहे, जे काही डेव्हलपमेंट केले असेल ते अधिकृत काम करून रजिस्ट्री करा. *ऑन पुणे ओबीसी बैठक* - ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. आम्ही आधीच सांगितलं आहे, जे पात्र कुणबी समाजातील लोक आहेत, २२ हजार प्रमाणपत्र दिले आहे. सर्व समाजांना सर्टिफिकेट दिले आहे. मूळ कुणबी दाखला असेल, त्या ठिकाणी वंशावळीमध्ये आला आहे, त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे. पण चुकीच्या पद्धतीने मान्य करत नाही. ओबीसी आपल्या ठिकाणी, मराठा आपल्या ठिकाणी आहे. दोन्ही समाज भावासारखे आहेत. दोन्ही समाजाने भांडण करायचे नाही आहे. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. *ऑन विद्यार्थी सायकल वाटप* - प्रताप सरनाईक यांच्याशी स्वतः बोललो. एमडीशी बोललो आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बस सुरू केली. किती सायकल पाहिजे या संदर्भात माहिती घेतली आहे. आमच्या ट्रस्ट द्वारे ज्या विद्यार्थ्यांकडे सायकली नाहीत अशा विद्यार्थ्यांना सायकल पुरवणार आहोत.0
0
Report
Kolhapur के Survenagar में एक महीने के बच्चे की दूध पिलाते समय मौत
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहर के सुर्वेनगर में मन को छू लेने वाली घटना घटी है. अवघ्या एक महिन्याच्या बाळाचा दूध पिताना ठसका लागून दुर्दैवी मृत्यु झाला. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने मालवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्विक अमोल मालवणकर… अवघ्या एक महिन्याच्या या चिमुकल्याचा दूध पिताना ठसका लागून मृत्यू झाला. मालवणकर कुटुंबीय मूळचे पुण्याचे. आर्विकचे वडील अमोल मालवणकर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, काही दिवसांपूर्वी ते कुटुंबासह कोल्हापूरात आले होते. एक महिन्यापूर्वीच आर्विकच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आई-वडील आपल्या चिमुकल्याच्या भविष्याची स्वप्नं रंगवत होते. मात्र, हे आनंदाचे क्षण अचानक दुःखात बदलले. बाळाला वरचे दूध पाजत असताना अचानक ठसका लागला. बाळाचा श्वास अडकल्याने आईने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच आर्विकने श्वास सोडला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आईच्या डोळ्यासमोर दूध पाजताना बाळाचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाळाला दूध पाजताना पालकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः वरचे दूध देताना बाळाची पोझिशन, दूध देण्याची पद्धत आणि ठसका लागल्यास काय करावे, याबाबत पालकांनी माहिती घेणे गरजेचे आहे. इतकच नाही तर नवव्या महिन्यातच ब्रेस्टफीड कसं करावे याची देखील माहिती जाणकारांकडून घेण्याची आवश्यकता आहे. बाळाला दूध पाजताना ठसका लागला तर अनेकदा घरगुती उपाय केले जातात. करंगळी दाबणे, टाळूवर फुंकर मारणे अशा पद्धतींचा अवलंब केला जातो. मात्र, अशा उपायांपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेल्या प्रथमोपचाराची माहिती पालकांना असणे महत्त्वाचे आहे. बाळाला दूध पाजताना त्याचे डोके आणि मान योग्य स्थितीत ठेवणे, दूध देताना बाळाला पूर्णपणे आडवे न झोपवणे आणि दूध पाजल्यानंतर ढेकर देणे, या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. बाळाचा श्वास अडखळत असेल, आवाज निघत नसेल तर ही गंभीर परिस्थिती असू शकते. अशावेळी चुकीचे घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे हे मालवणकर कुटुंल्बीयावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरनंतर स्पष्ठ झाले आहे. त्यामुळे नवजात बाळांना दूध पाजताना पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे...0
0
Report
Advertisement
