icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गुरुपौर्णिमा पर गुरु ने शिष्यों को वृक्ष भेंट कर पर्यावरण संदेश दिया

Sangli, Maharashtra:स्लग - गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश। अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथे अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली आहे. गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. संख येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबा यांनी गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्या शिष्यांना पिंपळ आणि चिंचाचे वृक्ष भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे, वृक्षतोड रोखावी आणि वृक्ष लागवड करावी, अशी साद तूकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना घातली आहे, सुमारे शंभरहून अधिक शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष भेट म्हणून दिले।
0
0
Report

जल जीवन मिशन के खड्डे में तीन वर्षीय बच्ची की मौत, इलाके में भारी हड़कम्प

Amravati, Maharashtra:जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; जलजीवन मिशनचे अपूर काम उठलं चिमुकल्याच्या जीवावर मेळघाटात जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील घटना असून कु. नायरा संजू बुसुम असं गड्ड्यात पडून मृत्यू झालेलेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोरडा गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळाची पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले होते मात्र काम झाल्यानंतरही ते खड्डे व्यवस्थित न बुजवल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यात पाणी साचलं या दरम्यान चिमुकली खेळत असताना याच गड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यामुळे मेळघाटातील जल जीवन मिशनचे खड्डे चिमुकल्यांच्या जीवावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. आता या जलजीवन मिशनच्या कंत्राट दरावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण आंदोलन: जरांगे 29 अगस्त से अंतरवाली सराटी में अंतिम आमरण उपोषण करेंगे

Jalna, Maharashtra:जालना : जरांगेंचा पुन्हा आमरण उपोषणाचा एल्गार,29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत करणार आमरण उपोषण अँकर :मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण होतायत.या निमित्ताने जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेतली.28 ऑगस्ट पर्यत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे शेवटचं आणि अंतिम आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे.दरम्यान या आंदोलनात ज्या मराठा बांधवांना सहभागी व्हायचं त्यांनी अंतरवाली सराटीत यावं आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी गावातच राहून रॅली काढून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.दरम्यान,जरांगे यांनी दिल्लीत देखील मराठा समाजाचं अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे मात्र दिल्लीत होणाऱ्या अधिवेशनाची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. बाईट : मनोज जरांगे ऑन आंदोलन बाईट ऑन दिल्ली अधिवेशन(हा बाईट भाषणात आहे) दरम्यान, या बैठकीत जरांगे यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया *ग्राफिक्स : मनोज जरांगे यांच्या मागण्या* 1) राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या 2)हैदाबाद गॅजेटिअरनुसार मराठवाड्याले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे 3)सातारा, कोल्हापूर, पुणे औंध आणि बाॅम्बे या पाचही संस्थानच्या गॅजेटिअरची अमंलबजावणी जीआरसहीत पाहीजे 4)मराठा आंदोलकांवरील दाखल केलेेले गुन्हे मागे घ्यावे 5)ओबीसीच्या सर्व सोई- सुविधा मराठा समाजाला लागू करा 6) अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत 7)सारथीच्या योजना पुन्हा सुरु करण्यात याव्यात 8)मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं 9) एसईबीसीचे, ईएसबीसी आणि एसडब्लू एस मधून निवड झालेलेल्यांना नियुक्त्या द्या 10)ईसीबीसी आरक्षणातून निवड झालेल्या परिक्षार्थी,विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घ्या 11-कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना व्हॅलिडीटी प्रमाणपत्र द्या
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में बाघों की संख्या बढ़ी, मानव-बाघ संघर्ष से नई समस्याएं

Chandrapur, Maharashtra:अनकर:-- अनुकूल अधिवास असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत आहे. मात्र मानव-वाघ संघर्षाने नव्या समस्या उभ्या राहत आहेत. वाघ गावे और शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ले करत आहेत. यावर उपाय म्हणून वनविभागाने गेल्या 2 वर्षात 28 वाघ जेरबंद केले आहेत. परंतु समस्याग्रस्त वाघच पकडले गेलेत का याबाबत मात्र संदिग्धता आहे. या सर्व वाघांना वन विभागाने चंद्रपुरातील वन्यजीव शुश्रूषा केंद्र- TTC आणि अन्य वनपरीक्षेत्रात पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले. TTC सेंटर ला ठेवलेल्या वाघांमध्ये 6 बछडे, 4 नर वाघ व 3 मादी वाघांचा समावेश आहे. जागेच्या अभावी इतर वाघांना दुसऱ्या जिल्ह्यातील TTC सेंटरला स्थानांतरित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा परीघ , ब्रम्हपुरी प्रादेशिक व FDCM जंगलाचा समावेश आहे. या जंगल क्षेत्रात शेकडो वाघांचा वावर आहे. वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वाघाने नागरिकांवर केलेले 90% हल्ले घनदाट जंगलात झाले आहेत. यामुळे मानवाचे वाघ अधिवासावर होत असलेले अतिक्रमण स्पष्ट झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नाशिक के गड्ढे बन गए परेशानी, नागरिकों ने महापौर से गड्ढे रोकने की मांग तेज

Nashik, Maharashtra:खड्ड्यांमुळे नाशिककर झाले हैराण... कंबर दुखी पाठ दुखीचा करावा लागत आहे त्रास सहन.... नाशिक मध्ये पडलेल्या खड्ड्यांवर बोलवावी महासभा नगरसेवकांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हा भरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास काम सुरू आहेत... शहरात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम सुरू असताना आता शहरातील सगळेच रस्ते हे खड्डेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळते.... या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना कंबर दुखी पाठदुखीचा त्रास सहन होतोय... त्याचबरोबर अनेकांचे अपघात देखील या शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेत.. आता या खड्ड्यांमुळे नाशिकचा राजकारण तापणार असून खड्ड्यांवरच महासभा बोलवावे अशी मागणी नगरसेवक करताना पाहायला मिळतायेत.. तर खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले असून अनेकांचे अपघात होतात याची तक्रार नाशिककर करतायेत.... त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांचा अनुभव घ्यावा आणि शहरातील सगळे रस्ते सुधारित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.... या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report

आंद्रा बांध 1248 क्यूसेक पानी छोड़ता: नदी किनारे निवासी सतर्क रहें

Varsoli, Maharashtra:आंद्रा धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून आंद्रा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून तब्बल १,२४८ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आणि धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकाचा अंदाज घेता, या विसर्गामध्ये कोणत्याही क्षणी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात होणाऱ्या आवकनुसार या विसर्गात कोणत्याही वेळी वाढ किंवा घट होऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे आंद्रा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

नाशिक बागलाण में इंदौर की प्याज गोण्या सड़क किनारे मिलने से किसानों में हंगामा

Nashik, Maharashtra:बागलाण (नाशिक) विशाल मोरे - साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मध्यप्रदेशातील इंदोरच्या कांद्याच्या गोण्या आढळल्या फेकलेल्या अवस्थेत... - नाशिकच्या बागलाण तालुक्यातील घटनेने खळबळ.. - कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातल्या ट्रक शेतकऱ्यांनी अडवला.. नाशिकच्या बागलाण तालुक्यात साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाटा परिसरात मध्यप्रदेशातील इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याबाबत वाद सुरू असताना आता ही नवी घटना समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याच्या ट्रकबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या गोण्या येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने फेकल्या, त्यांचा संबंध कांदा खरेदी प्रक्रियेशी आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे。
0
0
Report
Advertisement

दापोली-खे़ड़ मार्ग पर दुचाकी दुर्घटना: नर्सिंग छात्रा की मौत, मित्र घायल

Ratnagiri, Maharashtra:दापोली-खेड मार्गावरील शिरसिंगे फाटा येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २२ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेजल भागवत असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही या अपघातात जखमी झाली आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोनही मैत्रिणी दापोलीहून आपल्या गावाकडे जात असताना हा हृदयद्रावक अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे दापोली परिसर आणि शेजलच्या गावावर शोककळा पसरली आहे.
0
0
Report

सप्तशृंगगड़ में गुरु पूर्णिमा पर आदिमाये के मंदिर में फूलों की सजावट

Nashik, Maharashtra:सप्तशृंगगड ( नाशिक ) : - सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास - गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी... - भाविकांनी घेतले आदिमायेचे दर्शन... उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड वणी येथील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आकर्षक अशी फुलांची आरास करून सजावट करण्यात आली..फुलांच्या माळांनी मंदिर गाभारा पूर्ण सजलेला होता..गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर आज भाविकांनी आदिमायेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती..हजारो भाविकांनी मनोभावे आदिमायेचे दर्शन घेतले..सण उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक होतात..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top