icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगोल्या में सूखे के कारण किसान ने दो एकड़ खरबूजे की फसल उखाड़ दी

Pandharpur, Maharashtra:सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने दोन एकर खरबुजाचे उभे पीक उपसून टाकले! गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. बंडगरवाडी येथील नवनाथ बंडगर यांनी दोन एकर खरबुजाची लागवड केली होती. टँकरच्या पाण्यावर पीक जगवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा खर्च परवडत नसल्याने अखेर फळाला आलेले उभे पीक उपसून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. तालुक्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून सध्या आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली आहे...
0
0
Report

कोल्हापुर के बहिरेश्वर में पुलिस ने डॉल्बी पर कार्रवाई; 8 डॉल्बी सिस्टम और 8 ट्रैक्टर जब्त

Kolhapur, Maharashtra:आता एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून. डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर गावात पोलिसांनी कारवाई करत तब्बल आठ डॉल्बी सिस्टीम आणि आठ ट्रॅक्टर जप्त केलेत. बहिरेश्वर गावात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलेल्या यात्रेत या डॉल्बीचा वापर करण्यात आला होता. कोल्हापुर शहरातील करवीर पोलिसांनी डॉल्बी विरोधात जोरदार कारवाई केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डॉल्बी चालक, सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचे धाबे दनाणलेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

नांदेड में सूखा घोषित करने की मांग, किसान फसल बचाने को चिंतित

Nanded-Waghala, Maharashtra:तब्बल महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतातील उभी पिके कोमेजली आहेत. त्यात ऊन वाढत असल्याने पिके करपून जात आहेत. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने शेतातील विहिरींनाही पाणी नाही आणि बोरही कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे पीक जगवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकलाय. अजूनही पावसाची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
0
0
Report

अकोला की कावड़ यात्रा ने सर्वधर्म एकता और उत्साह का जलवा दिखाया

Akola, Maharashtra:आज सारं अकोला शहर हर-हर महादेव, बम-बम भोले के गजरों से दुमदुमून गया था. यह स्वागत स्वातंत्रपूर्व काल की काल्पनिक पार्श्वभूमी वाली विदर्भ की अकोला की प्रसिद्ध कावड यात्रा के लिए था, जो 82 वर्ष की परंपरा रखती है और श्रावण महीने के अंतिम सोमवार को निकलती है. अकोलेकरांचा ग्रामदैवत श्री राज राजेश्वराला 17 कि.मी. दूरी के गांधीग्राम से पुर्णा नदी के जलाभिषेक के साथ अभिषेक किया जाता है और अकोला में बारिश की मान्यता होती है. यह महोत्सव सभी धर्मों के people के बीच समभाव की धारा है. आज संपूर्ण अकोला शहर एक नई खुशी और उत्साह में नहाए थे. अकोल्याची कावड यात्रा भारत की एकल प्रकार की सबसे बड़ी यात्रा मानी जाती है, जिसकी शुरुआत स्वतंत्रता आंदोलन के दौरान एक जल अभिषेक की परंपरा से मानी जाती है. 1944 के दशक में अकोला शहर को भीषण पानी की तंगी का सामना करना पड़ा था, तब कुछ युवाओं ने ग्रामदैवत राजेश्वर के जलाभिषेक का संकल्प किया और गांधीग्राम से पुर्णा नदी का जल लाकर अभिषेक किया गया, और तब से यह परंपरा चली आ रही है. राजेश्वर महाराज के मंदिर को जागृत देवस्थान माना जाता है. यात्रात प्रमुख आकर्षण रहती है हरिहर पेठ की 1111 भरण्याची कावड, जो 250 फूट लम्बी और 14 फूट चौड़ी होती है, इसमें लगभग एक हजार से अधिक युवक शामिल होते हैं. इस वर्ष यात्रा में लगभग 200 कावड़ और 150 पालखी शामिल हैं. यह यात्रा देश के भीतर और बाहर सभी को एक साथ लाने का प्रयास करती है ताकि शांतता और किसान सुख बरकरार रहे. कावड यात्रा के बाद अब अकोला के लोगों को गणेश उत्सव की तैयारी का आभास होता है. जयेश जगड, अकोला
0
0
Report
Advertisement

सांगली में धनगर समाज के लिए आरक्षण समेत प्रमुख मागों पर धरणे आंदोलन

Sangli, Maharashtra:धनगर समाजाच्या विविध बांधण्यासाठी सांगलीमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात सरकारला जाग आणण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.. यावेळी परिसर दणाणून सोडला.धनगर समाजाला आरक्षण द्या, बाळूमामा ट्रस्टच्या व्यवस्थापनामध्ये मेंढपाळ बांधवांना योग्य प्रतिनिधित्व देऊन, मेंढपाळ बांधवांमधूनच अध्यक्षाची नियुक्ती करण्यात यावी, ‘मिसिंग लिंक’ला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, या सहित विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
0
0
Report

तहसीलदार के निजी इंस्टाग्राम रील ने नियमों की उड़ाई धज्जियाँ, जांच तय

Washim, Maharashtra:अँकर: वाशिम च्या रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या शासकीय पदाचा आणि कार्यालयाचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करण्यास मनाई असताना देखील त्यांनी चक्क तहसील कार्यालयातच 'प्रोफेशनल सिनेमॅटिक रील' शूट करून शासनाच्या आदेशाला हरताळ फासली आहे.'लाईट, कॅमेरा आणि ॲक्शन'च्या थाटात तयार केलेल्या ही रील व्हायरल होत असून प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.नियम मोडणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ शिस्तभंगाची कडक कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरामबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 जुलै 2025 रोजी स्पष्ट परिपत्रक जारी केलं आहे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यासाठी बंधनकारक आहे. मात्र रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सर्व नियमांना पायदळी तुडविल्याचे त्यांच्या इंस्टाग्राम वरील रिल वरून दिसून येत आहे.शासनाच्या परिपत्रकातील नियम 10 नुसार, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर फोटो,रील किंवा व्हिडिओ अपलोड करताना शासकीय पदनाम,लोगो, गणवेश तसेच शासकीय इमारत व वाहनांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.मात्र रिसोड तहसिलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या रीलमध्ये, वैयक्तिक प्रसिद्धीच्या मोहापोटी तहसील कार्यालयातच व्यावसायिक कॅमेरामन लावून हे चित्रीकरण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.​यावर आता वरिष्ठ अधिकारी आणि शासन या 'रीलस्टार' तहसीलदारावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले. इंस्टाग्राम पोस्टची लिंक. https://www.instagram.com/reel/Dc0wSMAvBsd/?igsi=MjlpdDdxa2Y4NnZm
0
0
Report

मराठा आरक्षण पर सरकार की सख्ती, आंदोलनों के बीच समिति गठित करने की बात

Shirdi, Maharashtra:मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर ऑन मराठवाडा अधिकारी बैठक जरांगे पाटलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शासन स्तरावर कारवाई सुरू... व्हीसीद्वारे मराठवाड्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली... ज्या नोंदी सापडल्यात त्या पुढील तीन दिवसात ग्रामपंचायत मध्ये डिस्प्ले करणार... 10 ते 17 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्रांबाबत कॅम्प सुरू होत आहे... कार्यवाही कुठेही थांबलेली नाही... शासन एक एक पाऊल पुढे टाकत आहे... जे काही कायदेशीर आणि नियमात आहे, त्याबाबत शासनाने पावले उचलली आहेत... शासन केवळ आश्वासन जरांगे आरोप काही बाबतीत कायदेशीर गुंतागुंती असतात... त्यातूनही आपण मार्ग काढतोय... बहुतांश मुद्द्यांवर कार्यवाही झाली आहे.. जे बाकी असतील त्यावरही कार्यवाही करू... ऑन मराठा धनगर ओबीसी आंदोलन शासन नियम सोडून काहीही कार्यवाही करत नाही... अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, ही आमची पहिल्यापासून भूमिका... काही मंडळी विनाकारण राजकारण करण्याचा प्रयत्न करताय... त्यांनी हे थांबवलं पाहिजे... सामाजिक तेढ निर्माण करणं राज्याला परवडणार नाही... अंतरवली ओबीसी आंदोलन सरकार जरांगेंसोबत चर्चा करतय... काही लोकांना त्या पायघड्या वाटत असतील, मात्र हे आरोप बिन बुडाचे... मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी काही लोक अशी भाषा वापरतात... हे चुकीच आहे... विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू... सरकार त्यांचीही बाजू समजून घेण्यासाठी तयार... काहीही चुकीचं करण्याची आमची भूमिका नाही... मराठा आरक्षण तिढा ARक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे... दहा टक्के SEBC आरक्षणामुळे मराठा समाजातील मुलांचा फायदा झाला... ई डब्ल्यू एस मधून देखील SEBC मध्ये जाण्याची मुभा दिली... 95 टक्के मुलांनी SEBC ला प्राधान्य दिले... कुणबी प्रमाणपत्र वाटप अधिकाऱ्यांना सूचना प्रमाणपत्र वाटपाबाबत पाठपुरावा करा... कॅम्पच्या ठरलेल्या तारखा पाळल्या गेल्या पाहिजे... ग्रामपंचायत मध्ये याद्या डिस्प्ले करण्याची कार्यवाही झाली पाहिजे... विखे पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना... मराठा आंदोलक वर्षा बंगल्यावर आंदोलन इशारा मराठवाड्यात साडेतीन लाख दाखले दिले आहेत... मराठा समाजाच्या मुलांनी एस ई बी सी साठी हे दाखले घेतले... शंभर टक्के लोक आरक्षण मागताय असं नाही... साडेतीन लाख मुलं SEBC दाखले घेताय, याचा अर्थ काय?... नियमावली पाडून कार्यवाही करावी लागेल... कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही... ऑन पुणे MPSC आमदार विक्रम पाचपुते शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटले... मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी समिती नेमली आहे... मात्र प्रत्येक प्रश्नात राजकारण करण्याची फॅशन सुरू झाली, हे दुर्दैवी...
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण के लिए लातूर में प्रदर्शन, राजमार्ग यातायात ठप्प

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... बोरगाव काळे येथे मराठा आरक्षणासाठी एल्गार... रस्ता रोकोमुळे लातूर-बार्शी महामार्ग ठप्प.... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं... संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले... बोरगाव काळे, मांजरा पट्टा, मुरुड सर्कल आणि पश्चिम लातूर परिसरातील मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभागी होत आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली... 'आरक्षण आमचा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे' और 'एकच मिशन, मराठा आरक्षण' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला... आंदोलकांनी लातूर-बार्शी महामार्गावर ठिय्या दिल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0
0
Report

मराठा आरक्षण के समर्थन में युवक ने टॉवर पर चढ़कर दिया प्रदर्शन, सरकार से immediate हस्तक्षेप की मांग

Latur, Maharashtra:मराठा समाजातील तरुणाचं टॉवरवर चढून आंदोलन, मागच्या दोन तासापासून तरुण टॉवर वर... AC ----मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रेनापुर तालुक्यातील कोरेगाव येथील मराठा समाजातील तरुण टावर वर चढून शोले स्टाईल आंदोलन करतो आहे, मागच्या दोन तासापासून हा तरुण टावर वर चढून बसलाय. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी हा तरुण करतोय... साऊंड बाईट :- आंदोलक
0
0
Report

वन विभाग को हेलीकॉप्टर देकर नरभक्षक बाघिणी का पीछा, नवनीत राणा ने मांगा कदम

Amravati, Maharashtra:नरभक्षक वाघिणाच्या शोधासाठी वनविभागाला हेलिकॉप्टर द्या; नवनीत राणा यांची वनमंत्र्यांकडे मागणी सोनोंरी गावात भीतीचे वातावरण, नागरिकांनी केली वनविभाच्या गाड्यांची तोडफोड अँकर :- अमरावती जिल्ह्यातील तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीची अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातही मोठी दहशत पाहायला मिळत असून या नरभक्षक वाघिणीमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या नरभक्षक वाघिणीला शोधण्यासाठी वनविभागाला हेलिकॉप्टर द्यावे व त्या वाघिणीला शूट करण्याची मागणी नवनीत राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली असून वाघिणीला शोधण्यासाठी हेलिकॉप्टर देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आदेश दिल्याची माहिती आहे. या नरभक्षक वाघिणीने मागील वीस दिवसात जिल्ह्यातील तीन जणांचा बळी घेतला असून काल सोनोरी गावातील एका तरुणीला ठार केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वनविभाच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले असून नागरिकांनी वनविभाच्या गाड्यांची तोडफोड केली आहे.
0
0
Report
Advertisement

उद्योग मंत्री उदय सामंत: युबीटी में नकली जाति प्रमाणपत्र से नगरसेवक बनने की चर्चा

Chandrapur, Maharashtra:टायटल:---उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, जातीचं खोटं प्रमाणपत्र देऊन नगरसेवकपद मिळवणे हे फक्त युबीटी मध्येच होऊ शकतं अँकर:-- उबाठा नगरसेवकांवर अपत्रतेची टांगती तलवार का आहे याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे, युबीटी मधील काही नेते स्वतःचं नगरसेवक पद टिकवण्यासाठी खोटं जातीचे प्रमाणपत्र देतात हे देखील सिद्ध झालं आहे, जातीचं खोटं प्रमाणपत्र देऊन नगरसेवक पद मिळवणे हे फक्त युबीटी मध्येच होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बाईट १) उदय सामंत, उद्योगमंत्री
0
0
Report

वाशीम जलाशयों का भंडारण अभी चिंताजनक, सिर्फ 40.25% शेष

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अद्याप चिंताजनक आहे.दोन मध्यम आणि ७५ लघु अशा ७७ प्रकल्पांमध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ ३.६५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये अवघा ४०.२५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.पावसाळा अंतिम टप्प्यात असतानाही जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.आता उर्वरित पावसामुळे जलसाठ्यात किती वाढ होते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top