icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Kas Plateau में दिखे गवे; पर्यटक बढ़ने से वन विभाग ने चेतावनी जारी की

Satara, Maharashtra:सातारा - जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार परिसरात पुन्हा एकदा गव्यांचे दर्शन झालं आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कास परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. अशातच दुपारच्या सुमारास काही पर्यटकांना रस्त्यालगत गवे दिसून येत आहेत. अचानक समोर आलेल्या गव्यांमुळे वाहनचालकांची भांबेरी उडत आहे. कास परिसर हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र पर्यटकांची वाढती गर्दी आणि जंगल परिसरात होणारी हालचाल यामुळे गवे मानवी वस्तीकडे येत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, वन विभागाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जंगल परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचे तसेच वन्यप्राण्यांना त्रास होईल असे कृत्य टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
0
0
Report

दक्षिण आरफळ नहर में पानी पहुंचा; किसानों ने पूजा-आनंद के साथ स्वागत किया

Sangli, Maharashtra:दीड महिन्यानंतर दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये आले पाणी, शेतकऱ्यांनी पाणी पूजन करत केलं स्वागत.. अँर्थ कॅनलचे पाणी पोहोचला आहे गेल्या दीड महिन्यांपासून अर्थ दक्षिण कॅनॉल हा कोरडा ठाक पडला होता,त्यामुळे आम्ही आसपासच्या पाच गावातील शेती हजारो एकर शेती वाळू लागली होती,त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता,अखेर पाटबंधारे प्रशासनाकडून दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी सोडले असून, गावात पाणी दाखल त्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष पाण्याचे स्वागत केले आहे.यावेळी महिलांना पाण्याचे पूजन करत आंनद व्यक्त केला आहे.
0
0
Report

मोदी के आवह्न से सोने के कारोबार पर बड़ा असर, ज्वेलरी उद्योग चिंतित

Nagpur, Maharashtra:नागपूर 1 to 1 - राजेश रोकडे, अध्यक्ष, ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सील - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारतात सराफा व्यवसायावर मोठा परिणाम होइल - ज्वेलरी व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संघटना असलेली ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउंशीलने व्यक्त केली चिंता - भारतात सोनं म्हणजे धार्मिक संस्कृती महत्व - लोकांना सोनं खरेदी बंद केलं तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल - राष्ट्रहित लक्षात घेऊन पंतप्रधानांचं आवाहन त्याला आमचे समर्थन पण लोकांनी सोनं खरेदी न करणे कठीण आहे - ज्वेलरी उद्योगाचं जीडीपीमध्ये सात टक्के योगदान - महाराष्ट्र आणि पश्मिम बंगाल येथील कारागीरांना सर्वाधिक फटका बसेल - देशात दरवर्षी 700 टन सोन्याची --भारतात Gold monetisation schema implement करावी - ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउंशलचे देशात ६५ हजार सदस्य, देशभरातील २७५ संघटना जुळल्या --- युक्रेन रशिया वॉर दरम्यान युक्रेनच्या नागरिकांनी सोने विक्री करून स्वतःला उभारले
0
0
Report
Advertisement

वाशीम जिले में गर्मी से पपी पिक पर रोग-कीट नुकसान बढ़ने से उत्पादन घटने की आशंका

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा फटका आता पपई पिकालाही बसताना दिसत आहे. तीव्र उष्णता, कोरडे वातावरण आणि पाण्याच्या ताणामुळे पपई पिकावर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोझॅक विषाणू, पानांवरील डाग रोग तसेच मुळकूज यांसारखे रोग आढळून येत आहेत.याशिवाय मावा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींमुळे झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.परिणामी पपईची पाने पिवळी पडणे,झाडांची वाढ खुंटणे आणि फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या घटना वाढल्या आहेत.यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून पपई उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
0
0
Report
Advertisement

मोबाइल पर प्रतिबंध: संत गजानन महाराज मंदिर में आज से कोविड नहीं बल्कि मोबाइल निषेध

Buldhana, Maharashtra:शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आज पासून मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. सुलभ व शांततेत दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मंदिर परिसरात मोबाईल वापरल्याने इतर भाविकांना त्रास होतो व मंदिर परिसरात दर्शन सुलभ व शांततेत घेता येत नाही म्हणून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आजपासून मंदिर परिसरात भाविकांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करूनच ठेवावा असा आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
0
0
Report

चंद्रपुर में तीन नाबालिग बच्चे एक साथ लापता, पुलिस ने खोज तेज

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपुर शहरात खळबळ, महाकाली वॉर्ड भागातून एकाचवेळी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता, पोलीस तपासण्यात आला वेगवान अँकर:- चंद्रपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील महाकाली वॉर्ड परिसरातून 9, 13 आणि 15 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 8 रोजी ही मुले महाकाली परिसरात खेळत होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाहीत. मुलांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने चिंताग्रस्त पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाईट १) जया मोकलवार, मुलाची आई बाईट २) कृणाल रामटेके , सहायक पोलीस निरीक्षक
0
0
Report
Advertisement

सूखाग्रस्त येवला में केले की खेती ने किसानों की आय बदल दी

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पिकांमधील अनिश्चितता यामुळे येथील शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. मात्र या परिस्थितीला छेद देत येवला तालुक्यातील नांदूर गावातील चार प्रगतशील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. एक वर्षात येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती झाला असून या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरील राज्यांतूनही मोठी मागणी आहे. गुजरात आणि राजस्थानमधील व्यापारी थेट शेतात येऊन केळीची खरेदी करत आहेत. एकूणच, दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात केळीच्या लागवडीमुळे शेतीत नवसंजीवनी आली आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधत नवनवीन प्रयोग केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, याचं हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
0
0
Report

मोदी के आह्वान पर मंत्री भुसेन ने स्वागत किया, नागरिकों से तत्काल अमल की अपील

Nashik, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे मंत्री दादा भुसेंकडून स्वागत.... दादा भुसे ऑन नरेंद्र मोदी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना जे आवाहन केले आहे त्याच मी स्वागत करतो... प्रत्येक नागरिकांना मी देखील आवाहन करतो की नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाची प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अंमलबजावणी करा.. ज्यावेळेस आपण आपल्या भारताला महासत्ता बनवायचा संकल्प करतो.. तेव्हा पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगले मुद्दे हे उपस्थित केलेले आहे..
0
0
Report

शेलु बाजार में CCTV बंद, चोरी पर अंकुश नहीं, नागरिकों ने माँगी त्वरित मरम्मत

Washim, Maharashtra:शेलुबाजार येथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे परिसरात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना घडूनही संबंधित यंत्रणेकडून कॅमेरे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासातही अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने सर्व कॅमेरे दुरुस्त करून सुरू करावेत अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

मालेगाव के फार्महाउस से गोवंश तस्करी, पूर्व महापौर अब्दुल मलिक पर मामला

Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावात एमआयएम गटनेत्याच्या फार्म हाऊसवरून गोवंशाची तस्करी - मालेगावातील माजी महापौर एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्याविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या पवारवाडी व किल्ला पोलिसांनी स्वतंतपणे कारवाई करीत सवंदगाव येथील फॉर्महाऊस व इस्लामबादच्या राहत्या घराजवळील गोदामातून सुमारे अश्या तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 18 गोवंश जनावरे ताब्यात घेतली.दरम्यान घराजवळ कारवाई सुरू असताना मलिक याने शासकीय कामात अडथळा आणत गोवंश जनावरे पळवून लावत फरार झाला आहे.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही जनावरे विक्रीसाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top