icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर में सीमा विवाद: वन विभाग ने किसानों की फसल ट्रैक्टर से बर्बाद कर दीं

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर नवी आगळीक, तेलंगणा वनविभागाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरविले अँकर:- महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूरसह सीमावर्ती गावांमध्ये तेलंगणा वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर (खुर्द), कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दशकांपासून शेती करत असलेल्या जमिनीवर अचानक कारवाई करत वृक्षलागवडीचे कारण देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा वाढला असून, शेतकरी न्याय आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
0
0
Report

बदलापुर में स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन तेज, पुरानी मीटर लौटाने की मांग

Ambernath, Maharashtra:"स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या" बदलापूरातील संतप्त ग्राहकांची मागणी याच लोकांनी सोनिवली येथील महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला. आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या अशी मागणी त्यांनी केलीय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्मार्ट मीटर नको असल्याचा निर्णय घेऊ शकतात मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही ग्राहकांनी उपस्थित केलाय. गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात सातत्याने जनआंदोलन सुरू आहे. लोक थेट महावितरण कार्यालय गाठून आपला रोष व्यक्त करतायेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी नगर में करोड़ों विकास फंड से आधुनिक शॉपिंग सेंटर, स्कूल-परिसर का कायाकल्प संभव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे पत्रकार परिषद रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मंजूर. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत माहिती पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर. नगर विकास विभागाकडून शासन निर्णय (GR) जारी. प्रभाग क्र. १५, आरक्षण क्र. ५८ येथे ७ कोटी रुपयांचे भव्य शॉपिंग सेंटर उभारणार. स्थानिक व्यापाऱ्यांना आधुनिक बाजारपेठ व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार. नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या सुधारणा कामांसाठी ४.८० कोटी रुपये मंजूर. पालिका शाळांच्या इमारतींचे बांधकाम व नूतनीकरणासाठी ७ कोटी रुपयांचा निधी. पानवल पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद. नगर परिषदेच्या नाट्यगृहातील अग्निशामक व्यवस्था व संबंधित कामांसाठी १.७५ कोटी रुपये मंजूर. विकास कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार. या निधीमुळे रत्नागिरी शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार: नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे
0
0
Report

डोंबिवली के शास्त्रीनगर अस्पताल में डॉक्टरों पर हमला: शिंदे बोले कार्रवाई कड़ाई से

Ambernath, Maharashtra:डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण डॉक्टरांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, दोषींना पाठीशी घालणार नाही! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचं काम आम्ही करणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून कायद्यानं आपलं काम केलं आहे. डॉक्टरांवरील हल्ला अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. उल्हासनगरमध्ये कामगार हॉस्पिटलच्या पाहणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आले होते. डोंबिवलीच्या मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
0
0
Report
Advertisement

किसानों का विरोध: शक्तिपीठ महामार्ग रद्द करने के लिए 18 जुलाई को भारी प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:*राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना बाईट मुद्दे* *ऑन सद्बुद्धी दिंडी* *शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना यावी यासाठी 18 जुलैला सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत* *वाखरी ते पंढरपूर दरम्यान ही सद्बुद्धी दिंडी असेल* वेगवेगळ्या मार्गाने शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सरकार करतय मात्र 13 ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे वसमत येथे कर यांचे बेकायदेशीर त्या भरून घेतलेले फॉर्म शेतकऱ्यांनी पेटवून दिले आहेत, द्रोण सर्वे शेतकऱ्यांनी थांबवले आहेत महिलांनी विट्याजवळ पहाटेच्या सुमारास भूसंपादनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी पळवून लावला आहे *18 तारखेला शक्तिपीठ विरोधात सर्वपक्षीय मेळावा होईल, मेळावा संपल्यानंतर वाखरी ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर पर्यंत सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत* *त्या नंतर पंढरपूर मधील नामदेव पायरीला अभिषेक घालणार आहोत* *ऑन शेतकरी लग्न* *सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याची शेती तोट्यात चालली आहे* हे सांगायला ज्योतिषाची सुद्धा गरज नाही *हे सगळ्यात आधी शेतकऱ्यांच्या मुलींना कळालं आहे* *त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुली शेतकऱ्यांसोबत लग्न करायला तयार नाहीत* नाशिक मधील आमचे एक कार्यकर्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं आश्रम चालवतात या आश्रमातून केलेल्या एकाही मुलीने शेतकऱ्यासोबत लग्न केलं नाही *ज्या शेतीमुळे आपल्या बापाला जीव द्यावा लागला ती शेती करणाऱ्या शेतकरी सोबत लग्न करायचं नाही असा विचार या मुली करत आहेत* *त्यामुळे शेतकऱ्यांचं लग्न हा एक सामाजिक प्रश्न झालेला आहे* शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण सरकार ज्यावेळी बदलेल त्याचवेळी ही परिस्थिती सुधारेल *ऑन कर्जमाफी* *सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे* *राज्याची आर्थिक स्थिती माहिती असताना जबाबदार पदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिल* *हे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित नव्हतं* *मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थिती माहिती असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून कर्जमाफीचा आश्वासन देत मत मिळवली* *मात्र कर्जमाफीसाठी ज्या अटी शर्ती निकष लावले आहे ते पाहता सांगितलं घागर भर आणि दिलं पेलाभर अशी स्थिती आहे* *ऑन cag अहवाल* *रिझर्व बँक, नीती आयोग आणि कॅगने सुद्धा राज्याच्या आर्थिक स्थितीत वित्तीय तूट होत असल्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे* *त्यामुळे हे राज्य वेगाने आर्थिकदृष्ट्या आजारी राज्य होत चाललं आहे* असं असताना सवंग लोकप्रियतेच्या घोषणा थांबलेल्या नाहीत *आमदनी चौवनी आणि खर्चा रुपया अशी राज्याची स्थिती असेल तर राज्याची आर्थिक शिस्त कशी राहील* *ऑन राष्ट्रवादी* शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत *त्यांच्या पक्षाबद्दल जो संभ्रम आता राजकीय वर्तुळात आणि लोकांमध्ये निर्माण झाला आहे त्याची स्पष्टता शरद पवार यांनीच केली पाहिजे* *सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सत्तेच्या बाजूने सगळेच चालले आहेत यात शरद पवार यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे* *सगळे गेले तरी आम्ही मात्र जनतेसोबत सामान्य माणसासाठी लढत राहू* या सगळ्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला की नाही मला माहित नाही *शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी असा निर्णय जर घेतला तर ते जनतेच्या मनातून उतरतील,जनता त्यांना पुन्हा थारा देणार नाही*
0
0
Report
0
0
Report

केतन अग्रवाल की मौत: माँ राखी अग्रवाल ने प्रधानमंत्री मोदी को भावुक पत्र लिखा

Varsoli, Maharashtra:Anchor: केतन अग्रवाल यांच्या हत्याप्रकरणी वडील विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपतींकडे न्यायाची मागणी केल्यानंतर आता केतनची आई राखी अग्रवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, "मला माझ्याच मुलासाठी न्याय मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावं लागतं असे वाटलं नव्हतं. माझ्या मुलाची निर्घृण हत्या झाली आणि त्याच्यासोबत माझं संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झालं," अशी वेदना व्यक्त केली आहे. तसंच, "मला कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नको, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी," अशी विनंती त्यांनी केली आहे. "दररोज मी मुलाच्या फोटोसमोर उभी राहून म्हणते... 'बेटा, आई आजही तुझ्यासाठी लढतेय... आणि एक दिवस तुला नक्की सांगेल की, तुला न्याय मिळाला'," अशा शब्दांत एका आईची हाक त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में पत्नी ने प्रेमी के साथ की हत्या

Navi Mumbai, Maharashtra:राज्यात केतन अग्रवाल खून प्रकरण चर्चेत असलं तरी नवी मुंबईतून त्याच्याही वरचढ ठरणारी घटना समोर आली आहे. ऐरोलीत एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीने पतीचे तीन तुकडे करत ते जंगलात विविध ठिकाणी फेकून दिले देत तब्बल अकरा महिने या हत्येचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. मात्र आता महिलेच बिंग फुटलं असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती यांना अटक केलेय. तर बलीराम कुशवाह असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुनिताचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध जुळले होते. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट सुनीता आणि तिचा प्रियकर राहुल याने रचला. यासाठी सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी मावशीकडे पाठवले. त्यानंतर 9 ऑगस्ट 2025 च्या रात्री बलीराम गाढ झोपेत असताना सुनिता आणि राहुल यांनी प्रथम त्यांचा गळा आवळला आणि धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच कटरच्या सहाय्याने बलीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. त्यांनी मुंडकं, धड आणि पाय कापून तिन्ही तुकडे वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. हत्येनंतर सुनिताने यादव नगरमधील आपलं घर भाड्याने देऊन मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे वास्तविक्यास सुरुवात केली. जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत चौकशी केली. तेव्हा सुनिताने भांडण करून घर सोडून गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र संशय वाढल्याने भावाने एप्रिल 2026 मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्‍यानंतर सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल आणि सिमकार्ड बदलून नवे हँडसेट वापरण्यास सुरुवात केली. मात्र तांत्रिक तपासादरम्यान राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनिताशीच सातत्याने संपर्क होत असल्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड मधून समोर आले. याशिवाय सुनिता प्रत्येक चौकशीत पतीबाबत वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्याची मोहीम सुरू केली है. मात्र गुन्हा घडून तब्बल 11 महिने उलटल्याने अवशेष शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
0
0
Report

रत्नागिरी के मि़रिया ग्रामपंचायत: भुयारी केबल-स्ट्रीट लाइट पर नागरिकों का उग्र मोर्चा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी मिऱ्यावासीयांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा; निकृष्ट भुयारी केबल आणि स्ट्रीटलाईट कामांवर संताप रत्नागिरीतील मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रात भुयारी केबल आणि स्ट्रीटलाईलच्या कामांवरून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. महावितरण आणि लीना पॉवरटेक कंपनीने केलेली कामे निकृष्ट, अपूर्ण आणि नियोजनशून्य असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. सुरक्षानियमांचे उल्लंघन झाल्याने नागरिकांना वारंवार विजेचे धक्के बसत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जाकीमिऱ्या ग्रामपंचायतीत महावितरण, कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात बैठक होणार असून त्यात पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
0
0
Report
Advertisement

जालना: एक साल पुरानी हत्या का पर्दाफाश, मुख्य आरोपी गिरफ्तार

Jalna, Maharashtra:जालना |वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक आईच्या रक्ताच्या डीएनए वरून मृतदेहाची ओळख पटली जालना पोलिसांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या एका हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली आहे. श्रद्धेश पवार हा 22 सप्टेंबर 2025 पासून बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार कदीम जालना पोलिसात दाखल होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना अन्य गुन्ह्यात शहरातील माळीपुरा भागातील आरोपी अविनाश वाघमारे याला पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याने त्याचा मित्र श्रद्धेश पवार याचा गळा आवळून खुन करून मृतदेह दुधना नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता अंबड हद्दीतील दुधना नदीपात्रात वर्षभरापूर्वी एक डेथबाॅडी आढळून आली होती. त्याचा डीएनए रिपोर्ट घेऊन पोलिसांनी मयताच्या आईचा डीएन फाॅरेन्सिकला पाठवला.. डीएनए अहवालातून मृतदेह श्रद्धेश पवार याचाच असल्याचं निष्पन्न झालं.. दरम्यान पैशांच्या देवानघेवाणीतून ही हत्या झालींचं उघड झालं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल आरोपीला अटक केलीये.
0
0
Report

रत्नागिरी में स्मार्ट मीटर विरोधी शिवसेना का चिपळूण में धड़क मोर्चा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी smart मीटर विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूणमध्ये धडक मोर्चा.. राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज शिवसेना चिपळूण तालुका जनसंपर्क कार्यालय येथून महावितरण कार्यालयापर्यंत काढण्यात आला..स्मार्ट मीटर संदर्भातील जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी व नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या धडक मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. उबाठा च्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना स्मार्ट मिटर विषयी जाब विचारला..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top