Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Apr 15, 2025 12:56:13
Sangli, Maharashtra
सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 28, 2025 03:33:43
Nashik, Maharashtra:महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमधील प्रचंड घोळामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार त्रस्त झाले असून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. अर्थात, हरकतींसाठी शासनाने मुदतवाढ दिल्याने महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला असून, घरोघर जाऊन पडताळणी करण्यास बीएलओंना दिलासा मिळालाय...महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी घोषित केली आहेत. त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असून अनेक नावे वेगळ्याच प्रभागांत घुसवण्यात आली आहेत. अर्थात, ती राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच घुसवली की यात निवडणूक शाखेतील गोंधळ झाला हे स्पष्ट झाले नसले तरी राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. विशेष म्हणजे त्यात महायुतीच्या पक्षांनीही आक्षेप घेतला आहे. महापालिकेकडे आत्तापर्यंत ३ हजार ६४४ हरकती दाखल झाल्या आहेत. चुकीचा पत्ता, नाव चुकलेले असणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. महापालिकेच्या बीएलओंना घरोघर जाऊन पडताळणी करावी लागणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले...
65
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 28, 2025 03:16:26
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडमध्ये महायुतीत सुनील तटकरे यांनी मिठाचा खडा टाकला. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. महायुती फोडण्याची भाजपच्या नेत्याला सुपारी, यामुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडलं. म्हणून आम्हालाही ट्रॅक बदलावा लागला. अँकर - रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलं आणि त्याची सुपारी भाजपमधील एका नेत्याला दिली असा घणाघाती आरोप अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला. यामुळेच रायगडचं वातावरण बिघडलं आहे. कोण कुणा बरोबर चाललंय हेच समजत नाही. युती आघाडीचा धर्म कुणीच पाळला नाही त्यामुळे आम्हालाही ट्रॅक बदलावा लागला.
94
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 28, 2025 03:06:08
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में सिडको 4500 करोड़ की जमीन घोटाले के प्रकरणी संजय शिरसात की चोकशी के लिए अख़रत समिति स्थापन की गई है. समिति में सिडको के सहव्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी रायगड़, मुख्य भूमि और भू-आवासन अधिकारी ठाणे और रायगड़, उपवनसंरक्षक अलिबाग आदि शामिल हैं. आमदार रोहित पवार ने संजय शिरसात पर भ्रष्टाचार के आरोप लगाकर प्रकरण सामने लाए थे. समिति गठन के बाद रोहित पवार को देर आये दुरुस्त आये जैसा ट्वीट किया गया है, जबकि सरकार ने आज समिति गठित की है, तो भी गठन करने में घपला दिख रहा है. जिस अधिकारी ने आज का जीआर निकाला है (लक्ष्मीकांत जाधव) उसने जमीन देने की शिफारस करने वाला पत्र सिडको को लिखा था. आज के समिति में सचिव के रूप में जो अधिकारी हैं उन्होंने ही बिवलकर को जमीन अलॉट की थी. इन सबको देखते हुए आज की समिति को चोरी का पुलिस द्वारा किया गया जैसा कहा गया है.
106
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 28, 2025 03:04:40
Yavatmal, Maharashtra:राज्यमंत्री इंद्रनील यांची पत्नी मोहिनी नाईक ह्या पुसद च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्या निवडणूक लढत असून विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे, मंत्री इंद्रनील यांचे यांचे दोन भाऊ देखील सून मोहिनी नाईक यांच्या विरोधात प्रचार करीत आहे. अशा परिस्थितीत मी नाईकांची सून आहे, हे माझे भाग्य आहे आणि माझे कार्यकर्तृत्वामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. कोणत्या नाईकाने किती कामं केले हे जनतेला माहिती असल्याचा टोला मोहिनी नाईकांनी कुटुंबातील विरोधकांना लगावला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सासू अनिता नाईक यांनी पुसद चे नगराध्यक्ष पद भूषवले आहे आता मला संधी मिळाली त्यामुळे विकासाची ब्लू प्रिंट घेऊन आपण जनतेपुढे जात असल्याचे मोहिनी नाईक त्यांनी सांगितले आहे. त्यांनी घरोघरी भेटी देऊन प्रचाराचा धुराळा उडविला आहे.
132
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 28, 2025 03:04:19
159
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 28, 2025 02:46:27
Satara, Maharashtra:सातारा - भाजप मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रहिमतपूर येथील सभेत मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी वर सडकून टीका केली आहे. सध्या घड्याळाची वेळ काही चांगली नाही. देशात फक्त वेळ कमळाची चांगली आहे. बाकीच्यांना आपल्या सोबत येण्याशिवाय पर्याय नाही. हातातलं घड्याळ वेगळं असतं पण चिन्ह जे घड्याळ आहे ते काय आपण गळ्यात घालून फिरू शकत नाही अशी खोचक टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. राष्ट्रवादी मध्ये असताना आमचा वापर हा जिल्हा बँक, जिल्हा परिषद, खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी होत होता मात्र ज्या वेळी संधी देण्याची वेळ असायची त्यावेळी आम्हाला डावललं जायचं अशी खंत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या व्यक्त झाली आहे.
111
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 28, 2025 02:45:52
Washim, Maharashtra:अँकर:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ ते भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे तसेच भाजप नगरसेवकांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेणार आहेत.ही सभा दुपारी १:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, राज्यात महायुती असली तरी वाशिममध्ये महायुतीतीलच काही उमेदवार एकमेकांविरुद्ध रिंगणात उभे असल्याने स्थानिक राजकारणात वेगळीच रंगत निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस आपल्या सभेत वाशिमच्या विकासात्मक धोरणांविषयी काय भूमिका मांडतात आणि विरोधकांवर कोणत्या मुद्द्यांवर टीका करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。
162
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 02:33:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून ते सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. ३२ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने ८ हजार ७०८ कोटी ४८ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर केला. त्यापैकी ५ हजार ७०५ कोटी रुपये ७६ लाख ८८ हजार ८०३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे वाटप डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा दावा फोल ठरला असून अद्यापही २९ लाख ६० हजार लाभार्थी अनुदान मिळण्यापासून वंचित आहेत. विभागीय आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १ कोटी ६ लाख ४९ हजार ५२९ शेतकरी बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८३ लाख ५१ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या. त्यातील ६५.५१ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. शासनाने तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी मदत देण्याचे धोरण ठरवले आहे. अनेक मंडळांमध्ये जून, जुलै महिन्यातही अतिवृष्टी झाली. पंचनामे सुरू असतानाच पावसाचा जोर कायम होता. जिल्हानिहाय अनुदान वाटप : छत्रपती संभाजीनगर ५५ टक्के, जालना ५३ टक्के, परभणी ६५ टक्के, हिंगोली ६४ टक्के, नांदेड ६५ टक्के, बीड ७३ टक्के, लातूर ७३ टक्के, तर धाराशिवमध्ये ६५ टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.
207
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 28, 2025 02:32:54
Beed, Maharashtra:बीड: माहिती मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याच्या मित्राला उपसरपंचाच्या पतीकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण, मारहाणाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद..! ANC - ग्रामपंचायतीच्या विकास कामा संदर्भात माहिती अधिकारात, मागितलेली माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेल्या तरुणाच्या मित्राने मोबाईल वर शूटिंग केली. आणि याचाच राग अनावर झाल्याने उपसरपंचाच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटना केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे. मारहाण करणारा उपसरपंच असलेल्या महिलेचा पती आहे. विष्णू थोरात असे त्याचे नाव आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील महिला ग्रामसेवकाच्या समोरच ही मारहाण झालीय. याप्रकरणी केज पोलिसांत उपसरपंच महिलेच्या पतीसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
162
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 28, 2025 02:31:18
Washim, Maharashtra:वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची सभा विशेष लक्षवेधी ठरली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी या सभेतून थेट अनुभवी नेत्यांवर टीका करत तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज अधोरेखित केली. वंचितच्या वाशिम नगरपरिषदेच्या २२ वर्षांच्या तरुण उमेदवार वैभव उलेमाले यांच्या समर्थनार्थ बोलताना त्या म्हणाल्या, 'तुमच्याकडे लाखो लोक प्रचारासाठी येतात, पण येथे तरुण मुले आहेत. त्यांना काय अनुभव आहे, असा सवाल करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे की अनुभव देण्याची संधी आम्हीच देणार आहोत. तुमच्या अनुभवाचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता नव्या विचारांना आणि नव्या उर्जेला संधी देण्याची वेळ आली आहे.' त्या पुढे म्हणाल्या की, 'आमचं भविष्य आता या तरुणाच्या हातात देणार आहोत.' वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून वैभव उलेमाले उभे असून त्यांच्या सभेला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
235
comment0
Report
Advertisement
Back to top