icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आकांक्षा चतुर्वेदी की माँ ने शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग दोहराई

AKAMAR KANEJust now
Nagpur, Maharashtra:नागपूर - नेiit पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या नागपूरच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी ची आई नीलम चतुर्वेदी यांनी नागपूरातील संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. नागपूरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मागण्या मान्य होईपर्यंत दररोज आंदोलनात सहभागी होणार असून, गरज पडल्यास दिल्लीतील आंदोलनातही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर आजपर्यंत सरकारकडून कोणीही भेटण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आले नसल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बाईट – नीलम चतुर्वेदी (आकांक्षा चतुर्वेदीची आई)
0
0
Report

नागपूर जेल में ड्रग्स तस्करी गिरोह का पर्दाफाश, जेलकर्मी गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रक्षकाकडून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचे उघडकीस - कारागृहातील कैद्यांसाठी विविध प्रकारच्या ड्रग्जची तस्करी करताना कारागृहातील एका कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी अटक केलीय - तपासणीत त्याच्या आंतरराष्ट्रात अंतवस्त्रात चरस आणि नशेच्या गोळ्या तसेच सर्जिकल ब्लेड आढळले - या घडामोडीमुळे जेल प्रशासनात खळबळ निर्माण झालीय. - आरोपीचे नाव विकास सहारे असून तो गेल्यावर्षी कारागृह प्रशासनात रुजू झाला होता - आरोपी शिपायाचा सीडीआर आणि बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे - ड्रग्जच्या बदल्यात त्याला कुणाकडून किती रक्कम मिळत होती, त्याचाही उलगडा बँक खात्याच्या तपासणीतून उघड होणार आहे. - आरोपी धारदार पाच सर्जिकल ब्लेड कुणाला देणार होता आणि त्या आरोपींचा या ब्लेडचा वापर कशासाठी होणार होता, हा गंभीर प्रश्न - या ब्लेडच्या माध्यमातून कारागृहात गैंगवॉर होणार होते का, की आणखी काही, त्याची चौकशी आता पोलिस करत आहेत.
0
0
Report

सोनू सूद के घर मंगल किरण में विषहीन सांप मिलने से इलाके में हड़कंप

Mumbai, Maharashtra:बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांच्या 'मंगल किरण' या राहत्या घरी आज दुपारी धामण जातीचा बिनविषारी सर्प आढळून आल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र श्री. विकी दुबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अत्यंत सावधगिरीने धामण जातीच्या सर्पाला सुरक्षितरीत्या पकडले. वेळेच करण्यात आलेल्या या बचावकारण्यासाठी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यानंतर सर्पाला वन्यजीव संरक्षणाच्या नियमांनुसार सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी नेण्यात आले.
0
0
Report
Advertisement

रविंद्र चव्हाण के हाथों कोरेगाव में भूमिपूजन, 80 से अधिक गांवों को लाभ

Satara, Maharashtra:सातारा:कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यात लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेच्या भूमिपूजन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी परिसरातील ८० हून अधिक दुष्काळग्रस्त गावांना या योजनेचा थेट फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार महेश शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम येत्या ११ महिन्यांच्या आत पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकार राज्यातील सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी NEET प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणात १३ आरोपींना अटक झाली असून भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सोमवारी कॅबिनेटमध्ये कायद्यात कठोर बदल केले जातील, अशी माहिती ही त्यांनी दिली。
0
0
Report

सातारा: सात दुभत्या म्हशी मृत, पशु चिकित्सक टीम ने शुरू की जांच

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता व बेलवडे खुर्द येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांत विष्णू पवार, राजेंद्र पवार, लक्ष्मण पवार, श्रीपती पवार आणि मारुती पवार या शेतकऱ्यांच्या एकूण सात दुभत्या म्हशींचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर एसटी कर्मचाऱ्यांची आठ दिवसांत आंदोलन; ड्यूटी रोस्टर बदलेच्या मागणी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांचे ड्युटी रोस्टर तयार करताना शहर आणि जंगल भागातील वेग मर्यादा लक्षात न घेता ड्युटी रोस्टर तयार केलं जातं असा आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी यामध्ये बदलाव करण्याची मागाणी केली आहे. व्यवहारिकता लक्षात न घेता तयार करण्यात आलेल्या ड्युटी रोस्टरमुळे सामान्य प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होऊ शकत नाही असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. सोबतच आठ तासांच्या ड्युटी वरील तासांचा ओव्हर टाईम देण्यात यावा अशी देखील प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची असून याचा राज्यभरातील 70 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलाय.
0
0
Report
Advertisement

नाशिक में भारी बारिश से गोदावरी नदी बाढ़, 400 नागरिक सुरक्षित स्थानांतरित; प्रशासन अलर्ट

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने तरुणांच्या मदतीने 400 नागरिकांचे स्थलांतर केले असून या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू राहिल्यास पुराचा धोका आणखी वाढणार असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वर असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्याधिकारी ओंकार पवार यांनी दिली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे.
0
0
Report

نवी मुंबई नगरपालिका کی صفائی ریلی سے بچوں میں پلاسٹک سے मुक्त महाराष्ट्र کا پیغام

Navi Mumbai, Maharashtra:स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मधील सफाई अपनाओ, बिमारी भगाओ या अभियानांतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिंडी यात्रा काढत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अश्या सामाजिक संदेशाची जनजागृती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये मनपा आयुक्त अधिकारीगणांच्या सह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
0
0
Report
Advertisement

अकोट में नीट पेपरफुटी के विरोध में प्रदर्शन, प्रधान से नैतिक जिम्मेदारी और इस्तीफे की मांग

Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. एकूणच, नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार্জच्या निषेधार्थ अकोटमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top