icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर के शिक्षण संस्थापक की आत्महत्या; सुसाइड नोट में I AM GOOD FOOL से बढ़ा रहस्य

Latur, Maharashtra:लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील namaांकित संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे... मात्र सुसाईड नोटमधील काही शब्दांमुळे आता या आत्महत्येभोवती नवं गूढ निर्माण झालंय... आणि त्यामुळे पोलिसांसमोरही एक नवं आव्हान उभं राहिलंय... नेमकं काय आहे प्रकार पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून... घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले... सुसाईड नोट ताब्यात घेतली... परवानाधारक शस्त्रासह घटनास्थळावरील काही वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या... सुसाईड नोटमधील हस्ताक्षराचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे... कारण नोटमधील मजकूर आणि त्याचा नेमका संदर्भ तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे... दरम्यान, सोनवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असल्यामुळे, कुटुंबीय लातूरला पोहोचेपर्यंत अंत्यविधीही थांबवण्यात आले आहेत. मात्र, शिक्षण क्षेत्रात मोठं नाव असलेल्या सोनवणे यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं... याचा धक्का त्यांच्या मित्रांनाही बसलाय. शेवटी त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं ? हा प्रश्न आता त्यांच्या मित्रांसह पोलिसांपुढेही आहे... शिक्षण क्षेत्रात मोठं नाव... प्रतिष्ठेचं आयुष्य... मग आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात अशी वेळ का आली? कुणी त्यांना फसवलं होतं का? कुणाचा दबाव होता ka? सुसाईड नोटमधील त्या शब्दांमागे नेमकं कोणतं गूढ दडलंय? शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात नेमकं काय होतं... हे आता कायमचं अनुत्तरित राहणार, की पोलिसांच्या तपासातून त्याचा उलगडा होणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांपुढे आहे...
0
0
Report

Solapur: Ganesh festival extortion alleges hotel owner asked for three lakh rupees

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यावसायिकाला मागितली तब्बल तीन लाखांची वर्गणी, रक्कम ऐकताच हॉटेल मालकाला आली चक्कर. - सोलापुरात एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल व्यवसायीकाला मागितली चक्क तीन लाख रुपयांची वर्गणी. - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल मालकाला आली चक्कर. - मंडळाच्या 500 ड्रेसचे प्रत्येकी 600 ₹ प्रमाणे टेलर ला देण्यासाठी मागितले तीन लाख रुपये. - गणेश मंडळासाठी वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाकडे तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समोर आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे हा हॉटेल व्यावसायिक एकनाथ सोपान घाडगे यांच्या हॉटेलवर आला होता. मंडळाच्या गणपती वर्गणीच्या नावाखाली 500 ड्रेसचे प्रत्येकी 600 ₹ प्रमाणे तीन लाख रुपये टेलरला देण्यासाठी मागितले. हॉटेल व्यवसाय एकनाथ घाडगे यांनी आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे 25 हजार रुपये वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. तसेच यापूर्वी मंडळाला 2 लाख रुपये दिल्याचेही सांगितले. मात्र, तक्रारीनुसार नेताजी शिंदे यांनी 3 लाख रुपयांच्या मागणीवर ठाम राहत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर सपाटे यांनी या घटनेच्या संदर्भात माहिती दिली आणि मंडळाचा सदस्य असल्याचा दावा केला. गणेशोत्सवासाठी वर्गणी मागताना कायद्याचे उल्लंघन होत नाही ना? पैसे न दिल्यास धमकी देण्याचा प्रकार कितपत योग्य? या घटनेमुळे उत्सवाच्या वर्गणीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस तपासात नेमके काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
0
Report

ओबीसी नेता लक्ष्मण हाके का विधान सभा पर जमकर हमला: गुंडा संस्कृति पर सवाल

Sangli, Maharashtra:स्लग - साल्यांनो,तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे,कायद्याचं सभागृह बनलंय गुंडाड - ओबीसी नेते लक्ष्मण हाके . अँकर - कोणीही उठतं,मनोज जरांगेला पाठिंबा देतं,साल्यांनो,तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे,अ ash्या शब्दात ओबीसी येथे लक्ष्मण हाके यांनी विधानसभेतल्या आमदारांवर टिका केला आहे,तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत,लँड माफीया, गुटखा,मटका,आणि गुंड माणसं आणि मसल पावर वरती निवडून जात आहेत,अशी टीका करत s सेत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या विधानसभेत बॅरिस्टर आणि उच्चशिक्षित माणसं निवडून जायची,पण आता कायद्याच्या सभागृहात गुंडाड आणि सुमार दर्जाची माणसं निवडून जात आहेत,अशी घणाघातीत टीका देखील लक्ष्मण हाके यांनी आमदारांवर केली है. बाईट - लक्ष्मण हाके - ओबीसी नेते व्ही वो - धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकर यांच्या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हक्क यांनी टीका केली आहे,गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत आणि सत्ताधारी भाजप आहे,यामुळे सत्ताधारी आमदाराला सत्ताधाऱ्यांनी विरोधात आंदोलन करायची वेळ का येते ? असा खडा सवाल लक्ष्मण हाके यांनी गोपीचंद पडळकर यांना केला आहे.. बाईट - लक्ष्मण हाके - ओबीसी नेते
0
0
Report
Advertisement

गणपतीपुळे मंदिर में 1 जनवरी 2027 से वस्त्र संहिता लागू, भक्तों ने समर्थन दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - गणपतीपुळे मंदिरात 1 जानेवारी 2027 या दिवसापासून भाविकांसाठी वस्त्र संहिता बंधनकारक भाविकांनी वस्त्र संहितेच्या नियमाला दिल समर्थन मंदिर प्रशासनाचा निर्णय योग्यच अनेक भाविकांची प्रतिक्रिया गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर वस्त्र संहिता बंधनकारक असल्याचे सांगणारे लागले बोर्ड भाविकांनी वस्त्र संहिता म्हणजे ड्रेस कोड संदर्भातले नियम पाळण्याचे मंदिर प्रशासनाचे निर्देश ऐतिहासिक मंदिर त्यामुळे मंदिर प्रशासनाचे नियम भाविकांनी पाळावेत असं ही केले आव्हान गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना या ड्रेस कोड संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत..
0
0
Report
Advertisement

रोहित पाटिल के पदयात्रा पर संजय काका पटेल का तंज, राजनीतिक घमासान तेज

Sangli, Maharashtra:स्लग - रोहित पाटलांच्या पदयात्रेवर,माजी खासदार संजयकाकांची टीका,रोहित पाटलांचा ही पलटवार.. अँकर - दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेवरून माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलेल्या टीकेवरून आता आमदार रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात जुंपली आहे. सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला हिम्मत आणि जिगर असावं लागतं,ते फक्त संजय काका पाटलाच्यात आहे,असा टोला लगावत कोण कुणाच्या मांडीवर बसले,कौन कुणाला मॅनेज आहे,हे काही दिवसांनी सविस्तर मांडू,असा इशारा देखील संजयकाका पाटलांनी रोहित पाटलांना दिलाय. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार . व्ही वो - दरम्यान संजयकाका पाटलाच्या टीकेवरून रोहित पाटल्यांनी देखील काकांचा समाचार घेत..त्यांनी किमान काही तर करावं, आम्ही काही करायला गेलं की त्यावर टीका करतात,टीका करण्याच्या व्यतिरिक्त ते आजपर्यंत काही करू शकले नाहीत.. त्यामुळेच लोकांनी त्यांना घरी बसवण्याचे काम केलं आहे,असा जोरदार टोला आमदार रोहित पाटलांनी, संजयकाका पाटल्यांना लगावला आहे,थोडे रोहित पाटळांच्या पदयात्रेवरून संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळाले .. बाईट - रोहित पाटील -आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस - ( SP )
0
0
Report

अक्टूबर से यूपीआय पर MDR 0.4%; 5–300 रुपए फीस, व्यापारी-ग्राहक में विरोध

Nashik, Maharashtra:ऑक्टोबरपासून यूपीआयमध्ये मोठा बदल होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांना २ हजार रुपयांवर यूपीआय पेमेंट घेतल्यास ०.४% मर्चेंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. हे शुल्क किमान ५ रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत असेल. या निर्णयाला नाशिकच्या व्यापारांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय. जर केंद्र शासनाला जीएसटी च्या माध्यमातून सगळ्यात जास्त कर जर आम्ही देत असताना आता नव्याने असे टॅक्स का देऊ असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केंद्र सरकार विचारलाय. तर ग्राहकांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शवला असून व्यापारी हे पैसे ग्राहकाकडूनच वसूल करतील असे देखील मत ग्राहकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.
0
0
Report

सांगोला टेंभू योजना में पानी गड़बड़ी, छह दिन से पानी नहीं, किसान फसलें जल रहीं

Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेचे पाणी गळती सहा दिवसानंतरही सुरूच, टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेच्या टेल कडील शेतकऱ्यांचे पिक जळू लागली. पाणी वाटपाचा नियमा प्रमाणे योजनेच्या टेल कडील शेतकऱ्यांना आधी पाणी देण्याचा नियम असताना, सांगोला तालुक्यातील वाटंबरे परिसरात काही शेतकऱ्यांनी स्वतःला आधी पाणी मिळण्यासाठी टेंभू योजनेचे पाईप व्हॉल्व तोडून आपल्या शेताकडे पाणी वळवले. यामुळे टेल कडील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पिके जळू लागली आहेत. टेंभुयोजनेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही सहा दिवस झाले तरी पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरूच आहे. ---
0
0
Report
Advertisement

नागपुर में महिला ड्राइवर ने चार लोगों को टक्कर मारी, चार घायल

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात महिला कार चालकाच धुमाकूळ, गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ भीषण अपघात - कार चालक महिलेने चार जणांना उडवल्याची घटना, तीन चिमुकल्यांसह चार जण अपघातात जखमी - पहिल्यांदा बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला कारने धडक दिली, कारमधून मुलीसह खाली उतरत असताना बालू यांना कारची धडक - त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने तीन मुलांना उडवले, रस्त्यावरील हरीश रेवतकर आणि आशीष नखाते यांनाही धडक - अपघातात अनेक जण गंभीर जखमी, महिला चालकाच्या नशेत असल्याची घटनास्थळी चर्चा - महिला चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, अपघातावेळी कारमध्ये आणखी कोण होते, याचाही तपास सुरू - घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जाणार आहे...अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याला घातला घेराव - महिला चालकावर कठोर कारवाईची संतप्त नागरिकांची मागणी करण्यात आलीय..
0
0
Report

दो नाबालिगों के साथ बलात्कार कर हत्या: 70 वर्षीय आरोपी को फांसी

Sangli, Maharashtra:दो अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून एकीचा खून केल्याप्रकरणी सांगलीच्या विटा न्यायालयाने एका वृध्द नराधमास फाशीचे शिक्षा ठोठावली आहे. शिवाजी काळेल वय ७०, असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. आटपाडी तालुक्यातल्या गळवेवाडी येथे ७ सप्टेंबर २०१८ रोजी गावातील एक आठ वर्षीय चिमुरडी खेळण्यासाठी गेली असता, बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता, या प्रकरणी पोलिसांकडून शोध घेतला असता आरोपी शिवाजी काळेल यांच्या घरातील एका पत्र्याच्या डब्याला रक्ताचे डाग आढळून आले होते, त्यानंतर काळेल याला ताब्यात घेऊन त्याची पॉलीग्राफ आणि नार्कोटेस्ट करण्यात आलेणंतर त्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून, त्यापैकी एका मुलीचा खून करत मृतदेह एका पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आलं होतं. या प्रकरणी काळेला याला अटक करत त्याच्यावर विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी विटा न्यायालयामध्ये पार पडली, यामध्ये विटा न्यायालयाने 19 साक्षीदारांची साक्ष आणि सबळ पुराव्यांच्या आधाराने आरोपी शिवाजी काळेल याला खून प्रकरणी फाशी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची, शिक्षा सुनावली आहे. बाईट - आरती देशपांडे-साटविलकर - सरकारी वकील.
0
0
Report
Advertisement

8 दिन बारिश नहीं, चंद्रपूर के धान किसान भारी संकट में

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत ,फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे, 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून जाणार हंगाम, पावसाने दगा दिल्याने शेतकरी भयंकर संकटात अँकर:--  मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत , फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे अशी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याची स्थिती. पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर हे जिल्हे भाताचे कोठार मानले जातात. मात्र यंदा अल निनो प्रभावाने पाऊसमान कमो होणार याची शक्यता असताना शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी- लावणी करत आभाळाकडे डोळे लावले. मात्र यंदा लहरी पाऊस शेतकऱ्याची जणू परीक्षा घेत आहे. अधे मध्ये दोनदा आलेला पाऊस धान पीक कसाबसा जगवून गेला मात्र आता 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून हा हंगाम जाणार आहे. पावसाने दगा दिल्याने चंद्रपूरचा धान उत्पादक शेतकरी भयंकर संकटात सापडला असून विहिरी, कालवे आणि नाले- नदी यांचे सिंचन असलेले शेतकरी शिवारात ओलावा टिकवून ठेवत आहेत. धान पिकाला भरपूर पावसाची गरज असल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांची धडधड वाढविणारा ठरला आहे. बाईट १) चिंताग्रस्त धान शेतकरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

सरकारी फाइलें सात दिन से अधिक लंबित नहीं रहेंगी; तत्काल निपटारे के निर्देश

Nagpur, Maharashtra:नागपूर सरकारी फाईल सात दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवल्यास कारवाई, शासकीय कामकाजातील दिरंगाईला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, कोणतीही फाईल एका कर्मचाऱ्याकडे सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवता येणार नाही. तातडीची फाईल शक्यतो एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी निकाली काढण्याचे निर्देश, तातडीच्या स्वरूपाची फाईल शक्यतो चार दिवसांत निकालात काढावी लागणार आहे. एकाच विभागातील फाईलवर ४५ दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक, दुसऱ्या विभागाकडे पाठवावी लागणारी फाईल तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश आहे. विहित मुदतीत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.. विलंबास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम १० नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सूचना, जिल्हा परिषदांमधील निवेदने आणि तक्रारींवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्याने न्यायालयाची नाराजी व्यक्त केली होती.. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश झाल्याचा शासन परिपत्रकात उल्लेख प्रलंबित अर्ज, निवेदने आणि प्रकरणांचा विभागप्रमुखांनी दर महिन्याला आढावा घ्यावा दिरंगाई टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे निर्देश, ११ सप्टेंबरला सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top