icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement

चार दशक बाद साकीनाका से फरार आरोपी गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्बल ४० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून महत्त्वाची कारवाई केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १४१/१९८५ मध्ये भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत हा गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील आरोपी सुरेश चंदर अडागळे हा न्यायालयीन सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. आरोपीचा वारंवार शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर साकीनाका पोलिसांच्या फरार आरोपी शोध पथकाला आरोपी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील राजणगाव परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी पोलिसांनी सापळा रचून सुरेश चंदर अडागळे याला अटक केली. तब्बल चार दशकांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून गुन्ह्याचा तपास पुढे नेण्यात पोलिसांना यश आले आहे.
0
0
Report

लातूर के औसा में स्कूल में बिना अनुमति प्रवेश पर मामला दर्ज

Latur, Maharashtra:लातूर के औसा स्थित जिला परिषद स्कूल में बिना अनुमति प्रवेश कर सरकारी काम में बाधा डालने के आरोप में कॉकरोच जनता पार्टी के प्रमुख अभिजीत दिपके, कार्यकर्ता अजिंक्य शिंदे समेत अन्य लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है。 ‘स्कूल ठीक करू’ अभियान के तहत अभिजीत दिपके और उनके कुछ सहयोगी औसा के जिला परिषद और उर्दू स्कूल पहुंचे थे। छात्रों के बीच बैठकर सवाल पूछने, शिक्षकों को धमकी देने और स्कूल में हुए पूरे घटनाक्रम की रिकॉर्डिंग कर उसे मीडिया में प्रसारित करने का आरोप शिकायत में लगाया गया है। एक शिक्षिका की शिकायत पर औसा पुलिस ने मामला दर्ज किया है। मामले की आगे की जांच जारी है। एफआईआर में आरोप है कि स्कूल में दूसरी स्कूल के विद्यार्थियों को लाकर बैठाया गया था। इसी मुद्दे पर दिपके ने विद्यार्थियों के बीच बैठकर सवाल किए। साथ ही, शिक्षकों को धमकी देने और स्कूल में हुए घटनाक्रम की रिकॉर्डिंग कर उसे मीडिया में प्रसारित करने का आरोप भी शिकायत में लगाया गया है।
0
0
Report
Advertisement

नागपुर में CM का युवाओं से संवाद: जेन झी के साथ मंच की तैयारी

Nagpur, Maharashtra:नागपुरात उद्या मुख्यमंत्र्यांचा तरुणांसोबत संवाद... रेशीम बाग मैदानावर जय्यत तयारी... जेंझी मध्ये फिरून मुख्यमंत्र्यांना संवाद साधता यावं यासाठी दोनशे फुटांचा भला मोठा रॅम ही तयार... राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधत असताना, उद्या नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही हजारो तरुणांशी, जेन झी सोबत संवाद साधणार आहे.. मंथन फॉर युवा या एनजीओ ने नागपुरात आठ ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत विविध विषयांवर स्पर्धांचे आयोजन केले होते... त्यामध्ये अगदी चित्रकला, गायन, नृत्य, काव्य वाचन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, कॅम्पस लीडर समिट अशा विषयांवरील स्पर्धांसह विकसित नागपूर या विषयावर हेकेथॉन च्या माध्यमातून विविध समस्यांवरील तरुणांच्या मनातील उपाययोजना, स्टार्टअप उभारणारे तरुण आणि संशोधनांवर पेटंट मिळवणारे तरुण यांच्याशी संवाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. उद्या मुख्यमंत्र्यांचे हस्ते गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या अभियानाचा समारोप होणार आहे... त्यासाठी नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर मोठे स्टेज आणि पेंडॉल उभारण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यक्रमात आलेल्या हजारो जेन झी मध्ये फिरून संवाद साधतील, यासाठी एक दोनशे फुटांपेक्षा जास्त लांबीचा रॅम्प ही तयार करण्यात आला आहे... तरुणांतील विविध गुण कौशल्यांना वाव देण्याचा, त्यांना आयुष्यात एक संधी मिळून देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याची भावना मंथन फॉर युवा या अभियानाच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे... कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी...
0
0
Report

सरकार के आयात-निर्यात फैसलों से चीनी उद्योग पर असर

Rui, Maharashtra:इंदापूर : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये 22 लाख टनांचा कोटा गव्हर्मेंटने रिलीज केला घरगुती कामकाजासाठी 20 ते 22 लाख टन साखर लागते तो कोटा पण केंद्र सरकारने रिलीज केला... अचानक वाढलेले दर हे आश्चर्याचे आणि न समजणारे... केंद्र सरकारने दहा लाख टन मेट्रिक टन कच्ची साखर आयात करायला परवानगी दिली... हा साखर उद्योग सरकार बरोबर आहे... आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे बॅलन्स पॉलिसी ठेवावी लागते ग्राहक आणि शेतकरी महत्त्वाचा आहे सरकारही महत्त्वाचं आहे एलनिनो चा परिणाम मूळ उद्योगावरच फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आमच्या सर्व राष्ट्रीय स्तरावरील संस्था सरकारला सहकार्य करतील आणि योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील ऑन भारतामध्ये साखर आयात करण्याची वेळ पाऊस पडणार नाही असं सांगितलं गेलं... पाऊस कमी जास्त झाला पश्चिम महाराष्ट्रातील सगळे धरण भरले गेले निसर्गावर अवलंबून असणारा साखर उद्योग आहे इथेनॉल कडे साखर गेल्यामुळे साखरेचा तुटवडा झाला वास्तविक पात्र तशी वस्तुस्थिती नाही 28% इथेनॉल निर्मिती साखरेच्या मोलसेस पासून झाले आहे इथेनॉल हा शेतकऱ्याचा प्रॉडक्ट आहे उसाचे उत्पादन रिकवरी कमी होऊ लागली मोलेसिस मधून फक्त साखर निघत होती आणि आता साखरेला पर्याय तयार झाले आहेत स्टेबल पॉलिसी शाश्वत नियोजन ठेवावा लागणार आहे साखर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करतोय म्हणून याचा पुढच्या दृष्टिकोनातून नियोजन बारकाईने करावा लागणार आहे
0
0
Report
Advertisement

अब्दुल सत्तार की मनोज जरांगे से मुलाकात, 29 अगस्त तक आंदोलन जारी

Jalna, Maharashtra:जालना अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट एकनाथ शिॅदेंवर जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर सत्तारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न मात्र चूक दुरुस्त करून द्या, मनोज जरांगे आंदोलनावर ठाम छगन भुजबळ आता बावनकुळेंवर हसत आहेत भुजबळांनी मंत्रीपद घेऊन गप बसावं मराठ्यांच्या नादी लागू नये, नसता राजकीय करीयर खल्लास विशाखा राऊत जात प्रमाणपत्रावर जरांगे यांची प्रतिक्रिया याबाबत माहिती घेऊन बोलतो अंगणवाडी सेविका निलंबन प्रकरण यात सरकारच जबाबदार या सरकारमध्ये कोणीही खुश नाही अॅंकर- शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. मनोज जरांगे येत्या २९ आॅगस्ट पासून आमरण उपोषण करत आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला उपोषणाची वेळ आली असल्याचं जरांगे यांनी म्हंटलंय. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मनात तुमच्या बद्दल आस्था भावना आहेत. प्रमाणपत्र रद्द करण्यात त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सत्तार यांनी म्हंटलंय. तुमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत असून चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केलाय. शिवाय तुमच्या मागण्यांबाबत मी फडणवीस आणि शिंदे यांच्या सोबत चर्चा करेन असं आश्वासन सत्तार यांनी दिलंय. मात्र जोपर्यंत ५८ लाख कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदींचा डेटा आणि प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं जरांगे यांनी म्हंटलंय. बाईट- अब्दुल सत्तार, आमदार शिवसेना बाईट- मनोज जरांगे, मराठा आंदोलक
0
0
Report

खवड़्या पहाड़ मौत का जाल बन गया: अवैध खनन ने बना दिया सुसाइड पॉइंट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगर मध्ये मुलासह आई-वडिलांनी डोंगरावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मात्र, या घटनेमुळे तिसगाव परिसरातील मुख्य धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या खवड्या डोंगराचे एक अत्यंत भयानक वास्तविक चव्हाट्यावर आले आहे. हा डोंगर आता केवळ नैसर्गिक डोंगर राहिलेला नसून, वारेमाप अवैध उत्खननामुळे तो थेट मृत्यूचा सापळा म्हणजेच 'सुसाइड पॉइंट' बनला आहे. पाहुयात काय आहे प्रकार. खवड्या डोंगर बनला आहे सुसाईड स्पॉट. गेल्या 4 वर्षात 13 आत्महत्या, 1 खून अवैध उत्खननाने बनला मृत्यूचा सापळा. छत्रपती संभाजी नगरच्या धुळे सोलापूर हायवे वरून दिसणारा हा खवड्या डोंगर खवडया डोंगर अब मृत्यूचा हॉटस्पॉट ठरलाय. छत्रपती संभाजी नगरात शुक्रवारी एका तरुणांना इथून आत्महत्या केली सोबत त्याच्या आई-वडिलांचाही मृत्यू झाला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या डोंगरावर आणि परिसराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. खरंतर एरवी डोंगराला एक नैसर्गिक उतार असतो मात्र या खवड्या डोंगरावर वारेमाप उत्खनन झालाय... डोंगराची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि निसर्गाच्या लुटीचे वास्तव पुढे येतेय. खवड्या डोंगरावर गेल्या काही वर्षांत महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अफाट अवैध उत्खनन झाले आहे. यंत्रांच्या साहाय्याने डोंगराचे अक्षरशः लचके तोडल्यामुळे डोंगराचा एक भाग पूर्णपणे कापला गेला आहे. या कटिंगमुळे तेथे सुमारे 246 फूटांचा एक सरळसोट आणि सपाट कडा तयार झाला आहे. नैसर्गिक उतार नष्ट झाल्याने हा कडा थेट मृत्यूच्या दरीसारखा झाला आहे. महापालिकेची पंतप्रधान आवास योजना की नवी वसाहत पायथ्याशीच असून भविष्यातही असं काही घडू शकत त्यामुळे इथे तरी किमान सुरक्षा जाळा लावाव्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गेल्या चार वर्षात या डोंगरावर तेरा आत्महत्या झाले आहेत तर एक खून झाला आहे; तरीही इथं कुठलीही सुरक्षा व्यवस्था व प्रवेश बंदी नाही. एक कुटुंभगाचा दुर्दैवी अंत झाला आहे, झालेली हानी भरून निघण्याची नाही किमान यंत्रणांनी तरी आता सावध होत काही उपाययोजना करण्याची गरज आहे. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top