Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 11:41:33
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 09, 2025 06:47:50
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीनंतर कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना आमनेसामने; युती असूनही पॅनलवाद तीव्र! शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही — मोरे यांचा इशारा; तर 'जशास तसे उत्तर' — भाजपचे वरुण पाटील; महायुतीत तणाव चिघळला! कल्याण–डोंबिवलीतील राजकारण पुन्हा तापलंय! डोंबिवलीतील पक्षप्रवेश बॅनर वादानंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. महायुती अस्तित्वात असली, युतीतर्फे एकत्र निवडणुका लढवण्याचे आवाहन असले तरी स्थानिक पातळीवर पॅनलवाद आणि बालेकिल्ला वाचवण्याचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या तर थेट “शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही” असा इशारा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक वरुण पाटील यांनीही “जशास तसे उत्तर देऊ… आमच्या मार्गात कोणी आडवे येणार नाही” असा पलटवार केला आहे.महायुतीच्या घरातला अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आला आहे.कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.याच पॅनलवरून आता भाजप आणि शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीतील तणाव चिघळला आहे. विधानसभा निवडणुकीत 80 पैकी 60 जागा शिंदे साहेबांच्या चेहऱ्यामुळे आम्ही जिंकल्या. तेव्हाच्या त्यांच्या नेतृत्वामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विराजमान झाले.युती झाली तरी पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचाच आहे. एकही सीट भाजपला देणार नाही. विरोधक आमचे असोत वा परके — जमिनीवर आम्हीच उभे राहणार! गीतेने शिकवलंय — शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय मिळत नाही. आमच्या समोर युतीचा उमेदवार असो वा दुसरा, आम्ही गारद करूनच सोडणार。
16
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 06:34:28
117
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 09, 2025 06:32:55
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा वाद राज्यभर चर्चिला गेला. संपूर्ण निवडणूक या दोन्ही आमदारांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत एकमेकांवर चिखली केली होती. यामुळे हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती मधील भाजप आणि शिवसेना हे पक्ष सातत्याने चर्चेत राहिले होते पण हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांचा स्मित हास्य करीत असलेला विधानभवनातील एक फोटो समोर आल्याने हिंगोलीच्या राजकारणात चर्चेला उधाण आला आहे. आमदार बांगर यांनीच स्वतः हा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल टाकलाय. मग एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन केली जात असलेली टीका आहे फक्त मतदारांना फसवून मत घेण्याप्रीतनच होती का अनेकांना पडत असावा.
180
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 09, 2025 06:17:38
Chakan, Maharashtra:चाकण/पुणे चाकण मध्ये EVM च्या सुरक्षा बाबत उमेदवारांच्या शंका वाढल्या जिल्हा प्रशासनाच्या EVM सुरक्षितेवर उमेदवारांचेच प्रश्नचिन्ह Anc... नगरपरिषद निवडणूकांची मतमोजणी ही पुढे ढकलण्याने निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला EVM मशीनच्या सुरक्षित बाबत सूचना दिल्या आहेत पुण्याच्या चाकण नगरपरिषदेच्या EVM मशीन एका खाजगी मंगल कार्यालयात ठेवन्यात आले असुन या कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही चा डिस्प्ले लावलेला नसल्याने उमेद्वारांनी प्रशासनाला धारेवर धरले तर सीसीटीव्ही डिस्प्ले पाहण्यासाठी उमेदवारांना जाचक अटींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपली मते सुरक्षित आहे की नाही असाच प्रश्न सध्या उमेदवारांना उद्भवत आहे निवडणूक आयोगाने ईव्हीएम च्या सुरक्षितबाबत दिलेल्या सूचनाचें पालन जिल्हा प्रशासनाने करावे अशी मागणी उमेदवार करत आहे चाकण येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील परिस्थिती - सीसीटीव्हीचा डिस्प्ले बाहेर लावलेले नाहीत - गेट पासून 200 मीटर अंतरावर आत मध्ये लावण्यात आलाय त्याचा डिस्प्ले अनेकदा बंद असतो - उमेदवार यांना सीसीटीव्ही पहायची असल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय - उमेदवाराच्या प्रतिनिधीना सीसीटीव्ही पाहण्यासाठी बंदी - सुरक्षा अलार्म सिस्टीम लावण्यात आलेली नाही Byte:भाग्यश्री वाडेकर (उमेदवार) Byte: राम गोरे (उमेदवार) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
112
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 09, 2025 06:17:16
Ambernath, Maharashtra:वांगाणी-बदलापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात. खड्ड्यांमधून वाहनचालकांची सुटका होणार. झी 24 तासच्या बातमीनंतर अखेर वांगणी-बदलापूर महामार्गावर गोरेगाव ते ढवळेपाडा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर झाला. पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती; त्यामुळे वाहनचालकांना त्रास झाला. या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या. मागील दोन वर्षांपासून काँक्रिटीकरण सुरू होते; 800 मीटर रस्ता डांबरीकरण झाले. स्थानिक नेतेांनी आवाज उठवला होता. आता 2 कोटींच्या कामाला मंजूरी मिळाली आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले. सध्यातरी रस्ता कॉंक्रीट असल्यामुळे फक्त 800 मीटर डांबीकरण झाले; भविष्यात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
151
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 09, 2025 04:51:08
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच इतर पिकांची वाढ सध्या उत्तम अवस्थेत झाली असून थंडीही अनुकूल आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी pिकांना वेळेवर सिंचन देण्यावर भर देत आहेत. मात्र, वारंवार रोहित्रात होत असलेल्या बिघाडांमुळे सिंचनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे.मागील काही वर्षांपासून अनिश्चित हवामान, कमी उत्पादन आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांवरचे कर्जाचे ओझे सतत वाढत आहे.त्यातच रोहित्राच्या वारंवार बिघाडामुळे शेतकऱ्यांची अधिकच गैरसोय होत आहे. त्यामुळे महावितरणने या समस्येची दखल घेऊन रोहित्र तातडीने दुरुस्त करून कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
96
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 04:39:11
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव येथे प्रदीप नंद यांच्या पुढाकारातून “नंद तारांगण” या अत्याधुनिक खगोल अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेले हे केंद्र विदर्भातील एकमेव असे खगोल निरीक्षण केंद्र ठरणार आहे. या केंद्रात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक तीन दुर्बिणींमुळे खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि अभ्यासकांना अंतराळातील विस्मयकारक दृश्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे. चंद्रावरील विवर, दऱ्याखोऱ्या, विविध ग्रह-उपग्रह, तसेच गुरू ग्रहावरील सुरू असलेली महाकाय वादळे आणि त्याचे अक्षाभोवतीचचे परिवलन यांसारख्या घटनांचे थेट निरीक्षण पाहता येणार आहे. याशिवाय, हॉर्स हेड नेब्युला, अँड्रोमेडा गॅलॅक्सी, कॅब नेब्युला यांसारखी अतिदूर असलेली आकर्षक आकाशगंगा आणि नेब्युलाची दृश्येसुद्धा येथे पाहण्याची संधी उपलब्ध आहे. या दुर्बिणींमधून गुणवत्ता असलेली खगोल फोटोग्राफी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. “नंद तारांगण” केंद्रामुळे अकोल्यातील नागरिकांना आणि परिसरातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि अंतराळाचा अनोखा चमत्कार अनुभवण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
140
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 09, 2025 04:38:27
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनांची कामे सध्या निधीअभावी ठप्प पडली आहेत.जिल्ह्यात मंजूर झालेल्या ७४१ नळ योजनांपैकी फक्त २९७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सर्व कामे मागील दीड वर्षांपासून आवश्यक निधी न मिळाल्याने अडथळ्यात आहेत.पूर्ण झालेल्या योजनांसाठी कंत्राटदारांना ५६ कोटी रुपयांची देयकं बाकी असून देयकांचा प्रश्न सुटल्याशिवाय नव्या कामांना सुरुवातच होऊ शकत नाही.याचा थेट परिणाम म्हणजे अनेक गावांमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.शासनाकडून आवश्यक निधी कधी उपलब्ध होणार, याकडे जिल्हा प्रशासनासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
158
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 09, 2025 04:37:44
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर के ताडोबा-अन्हारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये असलेल्या पांढरपौनी भागातून एका वाघिणीला जेरबंद करण्यात आले. ताडोबाच्या कोर भागातून वाघीण जेरबंद करण्यात आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या वनविभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेरबंद झालेली वाघीण अडीच ते तीन वर्षांची पूर्ण वाढ झालेली सुदृढ वाघीण असून छोटी तारा या प्रसिद्ध वाघिणीचा हा मादी बछडा आहे. जेरबंद झालेली वाघीण कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना केली गेली आहे. ताडोबातून एकूण 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हा विशेष स्थानांतरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्यासाठी याआधी जेरबंद करण्यात आलेली चंदा आणि आज पांढरपौनी भागातून जेरबंद करण्यात आलेली वाघीण या दोन्ही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष नसलेल्या भागातून जेरबंद करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष असलेला जिल्हा असताना ज्या भागात संघर्ष नाही त्या भागातील वाघ जेरबंद करून वनविभाग काय साध्य करणार याबाबत मात्र सवाल उपस्थित झाले आहेत.
186
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 09, 2025 04:37:21
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... गंभीर २३ घरफोड्या उघड.... आंतरजिल्हा कुख्यात टोळीतील ४ आरोपी जेरबंद.... लातूर जिल्हा पोलीस दलाने घरफोड्या करणाऱ्या एका आंतरजिल्हा कुख्यात टोळीचा पर्दाफाश करत, गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय असलेल्या या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे लातूरसह धाराशिव आणि बिदर जिल्ह्यातील तब्बल २३ गंभीर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती. या अनुषंगाने पोलीसांनी हि कार्यवाही केली आहे...
100
comment0
Report
Advertisement
Back to top