445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळूण में महावितरण के खिलाफ नागरिकों ने रात भर विरोध प्रदर्शन, आपूर्ति बाधित
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी उन्हाच्या उकाड्याने त्रस्त नागरिकांचा महावितरण कार्यालयात रात्रभर ठिय्या.... रात्री बंद केलेला वीजपुरवठा पूर्ववत न केल्यामुळे संतप्त नागरिकांची महावितरण कार्यालयात रात्री उशिरा धाव.... पहाटे तीन वाजेपर्यंत चिपळूण मधील नागरिक बसले महावितरण कार्यालयात. स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर. वीजपुरवठा सुरळीत होणार नसेल तर संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करा. नागरिकांची अधिकाऱ्यांकडे मागणी. काँग्रेस नगर सेवक साजिद सरगुरो यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर.0
0
Report
सांगली महापालिका में भाजपा का दबदबा, पवार गट को बड़ा धक्का
Sangli, Maharashtra:सांगली महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. जयंत पाटलांचे दोन खंदे नगरसेवकांनी मुंबईमध्ये भाजपात प्रवेश केलाय, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर या दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अवघे तीन नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडून आले होते, त्यापैकी दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेशा केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये जयंत पाटलांनी, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत करेक्ट कार्यक्रम केला होता, त्याची परतफेड म्हणून महापालिकेत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत जयंत पाटलांना दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.0
0
Report
तुर्भे परिसर में आज़रुनिसा खान की हत्या, शव गोदाम में छिपाने का शक
Navi Mumbai, Maharashtra:तुर्भे परिसर में आज़रुनिसा खान की हत्या, शव गोदाम में छिपाने का शक0
0
Report
Advertisement
सोलापुर के टेंभुर्णी में करमाला रोड पर देर रात आग, चार दुकानें जलकर राख
Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे करमाळा रस्त्यावरील काही दुकानांना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली या आगे मध्ये चार दुकाने भस्मसात झाली आहेत करमाळा रोडवरील फर्निचरच्या दुकानालाही आग प्रथम लागली यानंतरही आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली आग लागल्यानंतर बराच वेळ अग्निशामक अथवा आग विझण्याची कोणतीही यंत्रणा तातडीने उपलब्ध न झाल्यामुळे इतर दुकानांचाही आग मध्ये मोठा नुकसान झालेलं आहे0
0
Report
कोल्हापुर पुलिस ने राजारामपुरी में गावगुंडों के खिलाफ कार्रवाई कर धड़पकड़ की
Kolhapur, Maharashtra:Anc कोल्हापूर पोलिस गावगुंडांच्या विरोधात ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील राजारामपुरी परिसरात असणाऱ्या माऊली चौकात दहशत माजवत तोडफोड करणाऱ्या गुंडाची आज पोलिसांनी शहरातून धिंड काढली आहे... दहशत माजवणाऱ्या या गावगुंडांना पोलिसी खाक्या दाखवत जिथे जिथे दहशत माजवली त्याच परिसरातून त्यांची धिंड काढून राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांचा माज उतरावला. गेल्या दोन दिवसांपूर्वी राजारामपुरी परिसरात गेंड्या गँग आणि योगेश नलवडे गँग मध्ये राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या सर्व गुंडांना अटक करून अटक फिरवले. अजय अविनाश माने उर्फ अजय लातूर, वय 29, विशाल अविनाश माने उर्फ गोठ्या लातूर, वय 27, अमित सुरेश दिंडे, वय 29, रामू मुकुंद कलकुटगी, वय 27, ऋतेश जगन्नाथ कुराडे, वय 27, ऋणांत जगन्नाथ कुराडे, वय 21, सुरज गोपाळ दिंडे, वय 21 आणि योगेश नागोजी नलवडे, वय 38 अशी या गाव गुंडाची नावे आहेत0
0
Report
नवी मुंबई एंटी करप्शन यूनिट ने APMC के दो अधिकारियों को 1.4 लाख रु. रिश्वत लेते रंगे हाथ गिरफ्तार किया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई अँटी करप्शन यूनिट मार्फत एपीएमसी मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यात आलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारती मध्ये धाड टाकत घनकचरा विभागाचे प्रभारी उपसचिव डॉ दीपक आवटे आणि समीर म्हात्रे, जनरेटर ॲापरेटर, अभियांत्रिकी विभाग, प्रभारी घनकचरा विभाग या दोघांना लाच घेताना रंगेहात अटकण्यात आलेय. एका वर्षाच्या होणाऱ्या बिलाच्या 15% दराने 1 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना पकडण्यात आलेय.0
0
Report
Advertisement
INS गुलजार युद्धनौका समुद्र में उतारी गई, पर्यटकों के लिए जल्द खुलने की तैयारी
Oras Bk., Maharashtra:सिंधुर्दुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात INS गुलजार ही युद्ध नौका पाच वाजता विसावली आहे. यासाठी MTDCचे अधिकारी आणि कर्मचारी गेले 48 तास काम करत होते. 48 तासाच्या प्रयत्नानंतर ही युद्धनौका खोल समुद्रात विसावली आहे आता ती पर्यटकांना लवकरच पाहण्यासाठी खुली करण्यासाठी येणार आहे. त्यासाठी पाणबुडी प्रकल्प राबवला जाणार आहे.0
0
Report
यवतमाल-आर्णी रोड पर कार जलकर खाक, चारों यात्री सुरक्षित बाहर
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ आर्णी रोडवरील जवळा गावाजवळ धावत्या कारणे पेट घेतला, यात सुदैवाने जीवितहानी टळली, कार यवतमाळ येथील वर्धमान एजन्सी यांची असून ते त्यांच्या सासर असलेल्या दिग्रस येथून यवतमाळकडे परतत होते. गाडी मध्ये 2 महिला, 1 पुरुष व 1 लहान मुलगा होता. दरम्यान कार मध्ये स्पार्किंग होऊन अचानक धूर निघताच चालक मालकांनी गाडी थांबविली व सर्व चार जन गाडी बाहेर पडल्याने पडल्याने ते बचावले परंतु गाडी पूर्ण जळून खाक झाली.0
0
Report
विदर्भ में गर्मी का कहर: नागपुर समेत इन जिलों में पारा 46°C के पार
Nagpur, Maharashtra:नागपूर\nविदर्भात उष्णतेचा प्रकोप\nअमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात पारा 46 अंशावर\nजिल्ला तापमान\nअमरावती 46.8\nवर्धा 46.5\nअकोला 46.0\nयवतमाळ 45.4\nनागपूर 45.5\nचंद्रपूर 45.2\nगडचिरोली 44.0\nवाशिम 43.50
0
Report
Advertisement
अकोला के इंदौर गली में खुली नाली, लोगों की सुरक्षा खतरे में
Akola, Maharashtra:अकोला शहरातील काला چबूतरा परिसरातील इंदौर गल्लीमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार पुन्हा समोर आला आहे. नाला सफाईच्या नावाखाली मुख्य रस्ता खोदून अनेक दिवसांपासून उघडाच ठेवण्यात आला असून कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी आज एका नागरिकाचा जीव धोक्यात येण्याची वेळ आली.इंदौर गल्दीमधून जात असताना एक नागरिक अचानक तोल जाऊन खोल आणि चिखलाने भरलेल्या उघड्या नाल्यात पडला. परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी तत्परता दाखवत मोठ्या प्रयत्नांनी त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले. मात्र या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र टीका करत, “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पावसाळ्यात याच परिसरातील उघड्या नाल्यात वाहून जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतून कोणताही धडा न घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या उघड्या नाल्यामुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला असून परिसरातील व्यापाऱ्यांनाही तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून व्यापारावरही परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने नाल्याचे काम पूर्ण करून तो मजबूत पद्धतीने झाकण्याची मागणी केली आहे.0
0
Report
पवार साहेब को नकारने वालों पर सुरेश म्हात्रे का टोला, सुनील तटकरे पर तंज
Chendhare, Maharashtra:ज्यांनी पवार साहेबांना नाकारलं त्यांना पुन्हा त्यांच्याकडे जावं लागलं. खासदार सुरेश म्हात्रे यांचा सुनील तटकरे यांना टोला. पवार साहेब हे पवार साहेब आहेत. ज्यांनी शरद पवारांना नाकारलं त्यांना त्यांच्याकडे जावं लागलं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी सुनील तटकरे यांना लगावलाय. सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली यावर ते बोलत होते。0
0
Report
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा में विधानपरिषद चुनाव 18 जून को, 977 मतदाता मतदान करेंगे
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेची निवडणूक जाहीर, 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, 18 जून रोजी होणार मतदान, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन अँकर:-- चंद्रपूर – गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. तिन्ही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. या निवडणुकीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरेाली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांची निर्वाचित बॉडी नसल्याने सदस्यांची संख्या शुन्य आहे. निवडणुकीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात करण्यात येणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती केली जाणार आहे. बाईट १) वसुमना पंत, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशीष अम्बाडे चंद्रपूर0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के खेड में नदी में डूबे ही परिवार के तीन सदस्य, दर्दनाक मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर येत आहे...खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे...दुपारच्या sुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.. नदीतील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने हा घात झाल्याचे बोलले जात आहे.. या दुर्घटनेत १५ वर्षांची लावण्या पार्टे, ३८ वर्षांचे नितीन जाधव आणि अवघ्या १२ वर्षांच्या विराज जाधव या तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते.. घटना माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.. या घटनेमुळे संपूर्ण खेड आणि धामणंद परिसरात शोककळा पसरली असून, खेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत...0
0
Report
नीट पेपर लीक के विरोध में कांग्रेस का देशव्यापी चक्का-जाम
Kalyan, Maharashtra:नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉग्रेसचे चक्का जाम आंदोलन कॉग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरु आहेत.आज याच्याच निषेधार्थ कल्याण काँग्रेसच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आला. कल्याणच्या रेल्वे स्टेशन बाहेर रस्त्यात बसून केंद्र सरकार विरोधात जोरदार यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सात वर्षात ७० पेपर लीक झाले तरी मोदी सरकार का गप्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली जबाबदारी स्वीकारून त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली गेली. आंदोलनाची तीव्रता बघता आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतलं.0
0
Report
नाशिक के येवला वनपरिक्षेत्र में रिश्वतखोरी के आरोप, आठ लोगों पर एसीबी कार्रवाई
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातल्या येवला वनपरिक्षेत्र विभागात तब्बल आठ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई वनपरिक्षेत्र हद्दीतील झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच मागितल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मिळाली होती तक्रार याबाबत पकडलेल्या लोकसेवकांची कसून चौकशी सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती समोर आली आहे0
0
Report
Advertisement
