icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

एल निनो के चलते भंडारा के किसानों ने धान के लिए बुवाई पद्धतियाँ अपनाईं

Bhandara, Maharashtra:एल निनो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत केला बदल.. शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधावर. एल निनो मुळे मान्सून वर परिणाम झाला असून पर्जन्यमान उशिरा होईल व पर्जन्यमानात अनियमितता राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे त्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करता यावा याकरिता पीक पेरण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येत आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जात कमी पाण्यावर पीक घेण्याच्या पद्धती चे प्रात्यक्षिक घेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले धान पीक लावणी ची वेळ जवळ आलेली आहे मात्र एल निनो चा प्रादुर्भाव असल्याने मान्सून लांबणीवर गेलेला आहे. पर्जन्यमानामध्येही अनियमितता राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पारंपारिक पीक पेरणी पद्धत बदलवून कमी पाण्यावर चांगले धान पीक घेण्यासाठी डीएसआर व एस आर टी या पद्धतीचा अवलंब शेतकरी करत आहेत. यासाठी आता कृषी विभाग ही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरलेला असून बदलत्या वातावरणाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीसाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे वातावरणातील बदल शेतकऱ्यांनी सहन करत योग्य पद्धतीने धान पिक घेता यावे यासाठी नवीन पीक पेरणी पद्धतींचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

गणेशोत्सव से पहले मुंबई-गोवा महामार्ग के पुल पूरे, यात्रा तेज होगी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात कोकणकरांचा प्रवास सुसाट; जूनअखेर मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या पुलांची कामे पूर्ण होणार!.. सध्या महामार्गावरील चिपळूण,लांजा,निवळी,पाली आणि संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील दुसऱ्या मार्गिकेच्या पुलांचे काम अत्यंत युद्धपातळीवर सुरू आहे.. हे पूल वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर दरवर्षी गणेशोत्सवात होणारी वाहतूक कोंडी फुटणार असून,कोकणकरांचा प्रवास कमी वेळेत आणि विनाअडथळा होणार आहे.. त्यामुळे यंदा बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर मोठा दिलासा मिळणार हे नक्की!..
0
0
Report

संभाजी नगर बैंक चुनाव में बीजेपी-शिवसेना भिड़ंत, मंत्री ने मोर्चा संभाला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:७०० कोटींची उलाढाल असलेल्या संभाजी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत. मनपा, जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेने निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. पालकमंत्री संजय शिरसाट व भाजपचे राजू शिंदे यांच्यातील राजकीय वैर जिल्हा बँक निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. त्यांनी परस्परांच्या अर्जावर आक्षेप नोंदवले आहेत. तसेच खा. डॉ. कल्याण काळे यांच्या अर्जावर वाजीद खान यांनी आक्षेप घेतला आहे. तर जवळपास सर्वच महत्वाच्या नेत्यांवर आक्षेप घेण्यात आले आहेत...
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर की 2740 करोड़ जल योजना शुरू, बिल बढ़ने से महापालिका चिंतित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराच्या नव्या २७४० कोटींच्या योजनेचे पाणी मिळाल्यानंतर शहरवासीयांना दिलासा मिळणार असला तरी मनपासाठी मात्र ही योजना म्हणजे पांढरा हत्ती ठरणार आहे. योजना १०० % कार्यान्वित झाल्यानंतर वीजबिल भरताना मनपाच्या नाकीनऊ येणार आहे. एप्रिल महिन्यापासून पाणी योजनेचे घेतलेले ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पाण्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मनपाला दीड कोटी रुपये वीजबिल जास्तीचे भरावे लागत होते. एरव्ही पाणी योजनेचे पाच कोटी रुपये बिल येत होते, पण जूनमध्ये साडेसहा कोटी रुपये मनपाला भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. १२ जूनपासून या योजनेतून पाणी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र जीवन प्राधिकरणाने त्यापूर्वीच पाणी पुरवठा सुरू केला आहे. १४ एप्रिलपासून या पाणी योजनेची चाचणी सुरू करण्यात आली होती.
0
0
Report

खेड में कुणबी समाज की क्रांतिकारी परिषद संपन्न, हजारों बांधव उपस्थित

Ratnagiri, Maharashtra:खेड में कुणबी समाज की क्रांतिकारी परिषद संपन्न; हजारों बांधवांची उपस्थिती! खेड तालुक्यातील भरणे येथील ‘जोगळे बंधू हॉल’मध्ये कुणबी समाजाची एक दिवसीय क्रांतिकारी परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (खेड ग्रामीण शाखा), कुणबी युवा और महिला मंडळाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट रोशन पाटील, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी विजय थोरे आणि समाजनेते सहदेव बेटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शंकर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला खेड तालुक्यातील हजारो कुणबी बांधव उपस्थित होते.
0
0
Report

सांगली महापालिका के लिए 250 करोड़ के डीपीआर की मांग; मुख्यमंत्री से मंजूरी की उम्मीद

Sangli, Maharashtra:स्लग - सांगली महापालिका क्षेत्रातील वीज वितरण आराखडयासाठी 250 कोटींचा मुखमंत्र्यांकडे मागणी. सांगली,मिरज आणि कुपवाड शहरामधील वीज वितरण कंपनीच्या सुविधांसाठी 250 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी बनवलेला डीपीआरसाठी २५० कोटींचा निधी मंजूर करावे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती राज्य विद्युत कंपनीच्या संचालक व भाजप नेत्या नीताताई केळकर यांनी दिली आहे.सांगली शहराला भेडसवणाऱ्या विद्युत खंडित पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे,शहरातील मुख्य वीज केबल अंडर केबल करणे, वाहतूकीसाठी अडथळे ठरणारे विद्युत पोल शिफ्टिंग व ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवण्याचा वितरण कंपनीकडुन आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील झाली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होऊन,सांगली महापालिका क्षेत्रातल्या विद्युत वीज वितरण कंपनीशी असणारे प्रश्न मार्गी लागतील,असा विश्वास नीता केळकर यांनी व्यक्त केला आहे.
0
0
Report
Advertisement

यवला में डाळिंब बाग तेल्या रोग से तहस नहस, किसान लाखों के नुकसान

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील जळगाव नेऊर, विखरणी येथील डाळिंम बागेवर तेल्या रोगामुळे मोठे संकट कोसळले आहे. बबन शिंदे, गोकुळ शिंदे आणि योगेश शिंदे यांनी चार वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेली सहा एकर डाळिंब बाग अखेर कुऱ्हाडी तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने उखडून टाकावी लागली. अतिउष्णतेमुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाला. रोग नियंत्रणासाठी महागडी औषधे, खतांचे नियोजन आणि विशेष काळजी घेऊनही रोग आटोक्यात आला नाही. परिणामी, ऐन उत्पादनाच्या हंगामात शेतकऱ्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला. लाखो रुपयांचा खर्च करून अक्षरशः पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे
0
0
Report

नाशिक में गोकुळ गीते का स्पष्ट नकार, महायुती के उम्मीदवार को समर्थन नहीं

Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग - *गोकुळ गीते निवडणूक लढण्यासाठी ठाम....* गोकुळ गीते exclusive - - पेठ येथे प्रचारांच्या गाठीभेटी घेत असताना गिरीश भाऊंचा फोन आला - गिरीश भाऊ यांनी दोन तासात नाशिकला पोहोचशील का अशी विचारणा केली - त्यानंतरच मंत्री उदय सामंत यांना मुंबईला जायचे होते यासाठीच एअरपोर्टला या असे फोन करून सांगितले - एअरपोर्टला लॉबीमध्ये गिरीश महाजन साहेब दादा भुसे उदय सामंत व मी आमच्याक मध्ये चर्चा झाली - चर्चेदरम्यान भाऊंनी प्रसाद हिरे याने दराडे यांना पाठिंबा दिला त्या प्रकारे तुम्ही देऊ शकाल का अशी विचारणा केली - मात्र मी त्या ठिकाणी त्यांना नकार दिल्याने माझ्या नाशिकला आल्यानंतर माझ्या गाठीभेटी पुन्हा सुरू केले आहेत - त्यांची विशेष अशी काही प्रतिक्रिया नव्हती त्यांचा आग्रह होता - संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये जळगाव आणि नाशिक मध्ये ही निवडणूक चुरशीशी होत आहे - मला जळगाव बद्दल काही माहिती नाही मात्र नाशिकमध्ये ही निवडणूक नक्कीच चुरशीची झाली आहे - प्रसाध हिऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे ही लढत फक्त आता गीते आणि दराड्यांमध्ये आहे - आणि पत्रकारांसोबत सगळ्यांनाच माहिती आहे की त्या उमेदवाराबद्दल कोणाची किती भावना आणि किती घोर निराशा त्यांच्याबद्दल आहेत - त्यामुळे त्यांच्या भावनांच्या उद्रेकाचा मला कितपत फायदा होतो हे मला पुढील दिवसांमध्ये समजेल - महाराष्ट्रात तरी असं राजकारण चालत नाही - यशवंतराव चव्हाण यांचा हा महाराष्ट्र आहे शरद पवारांचा हा महाराष्ट्र आहे आणि आपल्या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडवणीस साहेब एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून देशात गौरवले जातात म्हणून त्यामुळे मला असं काही वाटत नाही की असा दुसरा काही प्रकार होईल - आणि आम्ही काही चुकीचे काम केलेले नाहीत त्यामुळे मीही शंका घेण्यात काही जागा नाही
0
0
Report
Advertisement

जालना: तहसीलदार विजय चौहान लाच मामले में गिरफ्तार, तक्रारकर्ता भी जेल में

Jalna, Maharashtra:जालना : अंबड तहसीलदाराच्या लाच प्रकरणात तक्रारदार अटकेत वर्षभरापूर्वी केलेल्या वाळू चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये कारवाई अँकर :जालन्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण याने ६ लाख ४० हजारांची लाच घेतल्याने त्याला एसीबीने पकडले होते. या प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळंके याला गोंदी पोलिसांन अटक केली आहे. २०२५ मध्ये दाखल झालेल्या वाळू चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अंबड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सोळंकेला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे लाचप्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार एकाचवेळी पोलिस कोठडीत गेले. सोळंकेविरुद्ध अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी, मारहाण तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय, यापूर्वी त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच तो या कारवाईतून मुक्त झाला होता. यातच अंबडचे तहसीलदार चव्हाण यांना लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर सोळुंकेचे नाव चर्चेत आले आहे. पोलिस कोठडीदरम्यान सोळुंकेकडून अवैध वाळू उत्खननाशी संबंधित इतर बाबींची माहिती घेतली जाणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, तहसीलदार लाचप्रकरणात अडकल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारावर केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. सोळुंके याच्यावर या आधी अटकेची कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

राजगुरुनगर से शिरूर तक एसटी बस शिंदेवाडी में बार-बार बंद, यात्रियों में आक्रोश

Shirur, Maharashtra:राजगुरुनगर आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका आज प्रवाशांना बसला आहे. राजगुरुनगरहून शिरूरकडे जाणारी एसटी बस शिंदेवाडी येथे अचानक बंद पडली. विशेष म्हणजे, राजगुरुनगरपासून सुरू झालेला हा ४५ किलोमीटरचा प्रवास प्रवाशांसाठी अत्यंत मनस्तापाचा ठरला, कारण ही बस वाटेत तब्बल ५ ते ६ वेळा बंद पडली. शिंदेवाडी येथे बस पूर्णपणे बंद पडल्याने, भर उन्हात प्रवाशांवरच एसटीला धक्का मारण्याची वेळ आली. अष्टविनायक महामार्गावर प्रवाशांनी बस ढकलून सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र बस सुरू न झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. नियमित देखभाल आणि दुरुस्तीअभावी एसटी बसेस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
0
Report

डोडामार्ग के गांव में ओंकार हत्ती का जंगल छोड़ कर प्रवेश, भीड़ वीडियो वायरल

Oras Bk., Maharashtra:अँकर मागील काही दिवस जंगल भागात हैदोस घालणारा आणि काही महिन्यांपूर्वी वॉन्टेड आलेला ओंकार हत्ती आता चक्क दोडामार्ग तालुक्यातील एका गावात दाखल झालाय. दोडामार्ग येथील झोळंबे गावात ओंकार हत्तीने आपला मोर्चा वळविलाय. नेहमीच जंगल भागात किंवा बागायतीमध्ये दिसणारा ओंकार हत्ती आता थेट रस्त्यावर उतरलाय. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ओंकार हत्तीला बघून ज्यांची थरकाप उडायची तेच दोडामार्गातील नागरिक आता ओंकारशी जवळीक साधत असल्याचे दिसून येतेय. झोळंबे गावातील बाजारात अगदी ऐटीत उभ्या असलेल्या ओंकार हत्तीला अगदी जवळून पाहण्यासाठी नागरिक गर्दी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top