icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

इंदिरानगर के मल्हार अपार्टमेंट में चोरी, वॉचमन के घर से तीन मोबाइल गायब

Nashik, Maharashtra:इंदिरानगरमधील मल्हार अपार्टमेंटमध्ये धाडसी चोरीची घटना ▪️ सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार उघड ▪️ एका महिलेने आणि लहान मुलीने वॉचमनच्या घरात प्रवेश केला ▪️ वॉचमनच्या घरातील तब्बल तीन मोबाईल फोन लंपास ▪️ चोरीदरम्यान आणखी एक महिला कंपाऊंडबाहेर संशयास्पदरीत्या थांबलेली ▪️ तिघींनी संगनमताने चोरी केल्याचा प्राथमिक संशय ▪️ चोरीनंतर टेम्पोमधून घटनास्थळावरून पलायन ▪️ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; संशयित दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन。
0
0
Report

स्थल न मिलने से छत्रपति संभाजीनगर जिला परिषद की पहली सभा स्थगित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेच्या नियोजनाला सामान्य प्रशासन विभाग लागला आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाने समन्वयातून ३० जून ही तारीखही निश्चित केली आहे. मात्र, त्यासाठी सभागृह निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे तारीख ठरली, पण स्थळ ठरेना, अशी स्थिती झाली आहे. जिल्हा परिषदेची ५७ कोटी रुपये खर्चुन नवीन इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, फर्निचर आणि विद्युत जोडणीचे काम प्रलंबित आहेत. त्यामुळे टोलेजंग इमारत असूनही अपूर्ण सुविधांमुळे ती वापरात घेणे शक्य नाही त्यामुळे बैठक कुठे घ्यावी हक्काची जागा नाही या गोंधळात ही पहिली सर्वसाधारण सभा लांबली आहे..
0
0
Report
Advertisement

नागपुर में मतदाता सत्यापन के लिए बड़ा फैसला: 70 BLO निलंबित, विशेष पुनरीक्षण से पहले प्रशासन सख्त

Nagpur, Maharashtra:नागपूर मतदार पडताळणीच्या कामात टाळाटाळ केल्याचा कारणावरून 70 बीएलओंवर निलंबनाची टांगती तलवार निवडणूक विभागाचे महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद सीईओंना पत्र विशिष्ट सखोल पुनरीक्षण प्रक्रियेपूर्वी मतदार तपासणीचे काम रखडल्याचा ठपका नागपुरात आतापर्यंत केवळ 69 टक्के मतदार पडताळणी पूर्ण 46 लाखांहून अधिक मतदारांपैकी 31 लाख 86 हजार मतदारांचीच तपासणी मतदार पडताळणीत नागपूर राज्यात 29व्या क्रमांकावर घसरला बीएलओंकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने प्रशासनाची कारवाईचा इशारा संबंधित बीएलओंना यापूर्वी नोटीस आणि सुनावणीची संधी दिली... कामात कुचराई करणाऱ्यां विरोधात पोलिसांत तक्रारीही दाखल निलंबनासाठी प्रस्तावित 70 बीएलओंपैकी 35 जिल्हा परिषद तर 35 शहरी भागातील 20 जूनपासून सुरू होणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी प्रशासनाचा दणका कारवाईचा अहवाल महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून मागविणार
0
0
Report

आळंदी के कचरा डिपो पर फिर उठा सवाल: कचरा जलाने से प्रदूषण

Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदीतील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केळगाव परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदवर गंभीर आरोप करत कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीन विल्हेवाट लावण्याऐवजी तो जाळला जात असल्याचा दावा केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर, दुर्गंधी आणि वायू प्रदूषण निर्माण होत असल्याची तक्रार आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि दम लागण्याच्या समस्या वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कचरा जाळण्याची पद्धत बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय.
0
0
Report

शिरूर में 36 घंटे में हत्या का पर्दाफाश, नाबालिग आरोपी गिरफ्तार

Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय बाळासो बबन तांबे यांची धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत तत्परता दाखवत, अवघ्या ३६ तासांत या खुनाचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जुन्या वादाचा आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून, गावातीलच एका अल्पवयीन मुलाने हा रक्ताचा खेळ खेळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

आधार कार्ड से यूरिया वितरण: अकोला में किसानों में डर, कालाबाजारी की आशंका

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असला, तरी आधार कार्डवर प्रति व्यक्ती पाच बॅग युरिया देण्याच्या निर्णयामुळे आता नव्या प्रश्नांना तोंड फुटले आहे. शेतकरी असल्याची खात्री न करता केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप होत असल्याने साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू असताना अकोट तालुक्यात युरियासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून युरियाचा पुरवठा अपुरा असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता खताचा साठा उपलब्ध होत असला, तरी वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासनाच्या नियमानुसार केवळ आधार कार्ड दाखवून प्रति व्यक्ती पाच बॅग युरिया दिले जात असल्याने प्रत्यक्षात शेती नसलेल्या व्यक्तीलाही खत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साठेबाज मोठ्या प्रमाणात युरिया खरेदी करून नंतर जादा दराने विक्री करू शकतात, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, युरिया वितरणासाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा, किसान कार्ड किंवा फार्मर आयडी अनिवार्य केल्यास खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचू शकेल. तसेच संबंधित शेतकऱ्याकडे किती जमीन आहे आणि त्याला किती खताची आवश्यकता आहे, याचीही खातरजमा होऊ शकते. त्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराला आळा बसण्यास मदत होईल. दरम्यान, युरियाच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खताचा मुबलक साठा उपलब्ध असून त्याचे नियोजनबद्ध वितरण सुरू असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. युरिया खरेदीची गरज असल्याची भूमिका || एकीकडे युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असला, तरी वितरण प्रक्रियेत शेतकरी पडताळणीचा अभाव असल्याने साठेबाजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधार कार्डसोबत सातबारा किंवा फार्मर आयडीची अट लागू करून खत वितरण अधिक पारदर्शक करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता या मागणीकडे शासन आणि कृषी विभाग कितपत गांभीर्याने पाहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर की पांच प्रमुख विमान सेवाएं बंद, यात्रियों को बड़ा झटका

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अवघ्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरातील महत्त्वाच्या पाच विमानसेवा बंद होणार आहेत, दिल्ली, मुंबई, बंगरुळू हैद्राबाद आणि गोवा या विमानसेवा तत्कालीन बंद होणार आहेत.. त्यातल्या कारणामुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या आठवड्याला तब्बल ३ हजार ने घटणार आहे. यामुळे दररोज सरासरी ४३७ प्रवासी कमी येण्याची, तर महिन्याला १३ हजारांहून अधिक प्रवाशांची घट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर हे अजिंठा-वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, घृष्णेश्वर ज्यোतिर्लिंग यासारख्या जागतिक पर्यटनस्थळांचे प्रवेशद्वार मानले जाते. विमानसेवा कमी झाल्याने देशातील प्रमुख शहरांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्याय मर्यादित होतील. त्याचा मोठा फटका शहराला आणि पर्यटनाला बसणार आहे; आखाती उद्ध आणि इंधन किंमत आणि परिस्थिती आटोक्यात आल्यावर विमानसेवा पूर्ववत होईल असे दावा करण्यात येतोय.
0
0
Report
Advertisement

कम बारिश संकेत: कृषि विभाग किसानों लिए पिक योजना और जल प्रबंधन तैयारी शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्याची मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत कृषी विभागाने आतापर्यंत ३१ हजार ६०६ बैठका घेतल्या. यातून सुमारे ४ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली... हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचून पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में बिजली कटौती पर युवासेना का महावितरण कार्यालय के बाहर प्रदर्शन: नागरिक परेशान

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील विविध भागात गेल्या काही दिवसात विज पुरवठा खंडीत होत असल्याने रहिवाशी बेजार झाले आहेत. रोज मध्यरात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विज वितरण विभागाच्या या अनागोंदी कारभार विरोधात युवासेना ने वाशीत हल्लाबोल आंदोलन केले. युवासेना अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी MSCB अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सत्ताधारी असूनही MSCB च्या कारभाराविरुद्ध रस्त्यावर उतरावे लागत असून यापुढे महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करुन असा दम खासदार नरेश म्हस्के यांनी भरलाय.
0
0
Report

Hindi: माय-बेटी की पाझर तालाब में डूबकर दर्दनाक मौत, तहसील में मातम

Sangli, Maharashtra:कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तासगावच्या मणेराजुरी परिसरातील घटना सत्वल्ला संतोष जाधव आणि मंजू संतोष जाधव अशी मृत मायलेकींची नावे आहेत. दोघीही दुपारी कपडे धुण्यासाठी मणेराजुरी परिसरातील चिमणखोरा पाझर तलावात गेले होते. मंजू जाधव तलावात पडल्यावर पाण्यात बुडू लागल्याने तिचा बचाव करण्यासाठी सत्वल्ला जाधवने पाझर तलावात उडी घेतली. मात्र लेकीला वाचवताना आईचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला; या घटनेमुळे मनेराजुरी गावावर शोककळा पसरली असून या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
0
0
Report

शिंदे गट के नगरसेवक साहिल चौगुले पर बलात्कार केस, राजनीतिक हलचल तेज

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में शिवसेना शिंदे गट के स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले पर एक महिला ने बलात्कार की घटना दर्ज कराई गई। पर इस मामले में साहिल चौगुले को रबाळे थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक और अरोली के सहाय्यक पुलिस आयुक्त की मदद मिल रही है जिससे इस मामले में साहिल चौगुले को जमानत मंजूर होने का गंभीर आरोप ठाकरे गट की नेता किशोरी पेडणेकर ने किया है। इसके अलावा शिवसेना शिंदे गट के सांसद Naresh Mhaske ने कहा कि यह मामला न्यायालयीन क्षेत्र में है और हम भी पक्षांतर्गत औचित्य कर रहे हैं। यदि दोषी पाए जाने पर हम कार्रवाई करेंगे— ठाकरे गट की नेता किशोरी पेडणेकर ने कहा है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top