icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पूर्व विधायक हर्षवर्धन जाधव को अॅट्रॉसिटी के आरोपों से निर्दोष बरी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर माजी आमदार हर्षवर्धन जाधव अॅट्रॉसिटीतून निर्दोष पानटपरीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीच्या आरोपावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होता. खासदार, आमदारांविरुद्धच्या प्रकरणांचे विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश डी. पाटील यांनी या गुन्ह्यातून ५ मे २०२६ रोजी त्यांची निर्दोष सुटका केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २९ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी पानटपरीच्या वादातून जाधव यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभियोजन पक्षाकडून ठोस, विश्वासार्ह आणि शंकातीत पुरावे सादर करण्यात अपयश आले, त्यामुळे माजी आमदार हर्षवर्धन जाधव अॅट्रॉसिटीतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
0
0
Report

देवगिरी हिल्स में ट्रैवलर कार में भीषण आग, दमकल ने काबू पाया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी हिल्स परिसरातील पंडित नेहरू कॉलेजच्या मागील बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हलर गाडीला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राचे पथक पहाटे ३:४९ वाजता तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत गाडीचा पूर्णपणे कोळसा झाला होता. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने आणि गाडीत कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में जन्म-मृत्यु प्रमाणपत्रों के फर्जी रैकेट का पर्दाफाश

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. दोन ते तीन हजार रुपये मोजले की एका दिवसात बोगस प्रमाणपत्र हातावर टेकवले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. विशेष म्हणजे, एका शाळेत पटपडताळणी दरम्यान विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र स्कॅन केले असता दुसऱ्या नाव समोर आल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. झोन कार्यालय निहाय जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची आणि त्यावरील स्वाक्षऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ७ दिवसांच्या आत जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्रे नागरिकांना मिळालीच पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मकरिये यांनी प्रशासनाला दिले असून दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
0
0
Report

जेवनाळा की जिल्हा परिषद डिजिटल स्कूल में प्रवेश परीक्षा, ग्रामीण शिक्षा का नया मॉडल

Bhandara, Maharashtra:जिल्हा परिषद शाळेत ‘हाऊसफुल’ची परिस्थिती.... जेवनाळा डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी परीक्षा.... गुणवत्तेमुळे ग्रामीण शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा राज्यात एकीकडे विद्यार्थीसंख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येत आहे… शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जावे लागत आहे… मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे… येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला चक्क प्रवेश परीक्षा घ्यावी लागत आहे. यजवणाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे. शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधील यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. परिसरातील 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील गावांमधून विद्यार्थी येथे प्रवेशासाठी येत आहेत. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनाने प्रवेश परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील ही शाळा इतर जिल्हा परिषद शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0
0
Report
Advertisement

राज्य के सार्वजनिक ट्रस्ट अधिनियम में बड़ा बदलाव, 1 मई से लागू

Nashik, Maharashtra:Breaking राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट कायद्यात मोठा बदल; १ मेपासून अंमलबजावणी देवस्थानांचे नियंत्रण दिवाणी न्यायालयांकडून धर्मادाय आयुक्तांकडे ट्रस्ट व्यवस्थापन, विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेत बदल त्र्यंबकेश्वर, सप्तश्रुंगी, काळाराम मंदिरांसह अनेक मंदिरांचा समावेश विश्वस्त नियुक्ती व कामकाजावरून वाद वाढल्याची पार्श्वभूमी न्यायालयांवरील ताण कमी करण्यासाठी सरकारचा निर्णय ट्रस्टमधील गैरव्यवहार, पारदर्शकतेअभावी कारवाईस गती त्र्यंबकेश्वर विश्वस्त संस्थांमधील गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरून वादाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत संरचनेत बदल कायमस्वरूपी विश्वस्तांवर २५% मर्यादा लागू करण्याचा नियम
0
0
Report
Advertisement

बीड के धारूर में गोठे में आग, वृद्ध की मौत और पशु झुलसे: जाँच जारी

Beed, Maharashtra:बीड: कोठ्याला आग लागून वृद्ध जळून खाक.. पशुधन देखील आगीच्या भक्षस्थानी.. आगीचे कारण मात्र अस्पष्ट..! ANC- एक बातमी भीषण है.... बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील रेपेवाडी येथे एका शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत एका वृद्धाचा जळून कोळसा झालाय. रामभाऊ रेपे असे मयताचे नाव आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.... कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.... आगीत वृद्धासह अनेक शेळ्या आणि कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि तहसील प्रशासन तब्बल चार तासानंतर पोहचले... यावेळी वृद्धाचा केवळ सांगाडा दिसून आला. आग लागली किंवा कोणी लावली का याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र या प्रकरणात पोलिस अद्याप माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. यामुळे या घटनेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

साई रिसॉर्ट मामले में अनिल परब समेत सभी आरोपी निर्दोष मुक्त

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना मोठा दिलासा.. खेड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता!.. अनिल परबांसह सर्व आरोपींची सुटका.. मुरुडच्या गाजलेल्या 'साई रिसॉर्ट' प्रकरणावर कायदेशीर पडदा.. पुराव्याअभावी सर्व आरोप फेटाळले.. किरीट सोमय्यांनी गाजवलेल्या प्रकरणात परबांना 'क्लीन चिट'. एंकर.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची खेड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे... गेल्या दोन-तीन वर्षांपासून राजकीय वर्तुळात गाजलेल्या या प्रकरणावर आता कायदेशीर पडदा पडला आहे.. या प्रकरणात बनावट कागदपत्रे, सीआरझेड नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते... मात्र, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुधीर बुटाला यांचा 'जमीन आणि बांधकाम स्वतंत्र घटक' असल्याचा तांत्रिक युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.. पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका केली आहे.. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत राहिले होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top