445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
राज्य के स्कूलों में स्मार्ट उपस्थिति लागू, पहली से बारहवीं तक 100% ऑनलाइन उपस्थिति
Washim, Maharashtra:राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल होणार असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती आता पूर्णपणे ऑनलाइन नोंदवली जाणार आहे. शिक्षण विभागाने ‘स्मार्ट उपस्थिती’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून दररोज शंभर टक्के उपस्थिती ऑनलाइन नोंदविणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.विद्या समीक्षा केंद्राच्या स्विफ्टचॅट अँपमधील स्मार्ट उपस्थिती बॉटद्वारे ही नोंद केली जाणार आहे.वाशिमसह विदर्भातील शाळांमध्ये ही प्रणाली ३० जूनपासून लागू होणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती,अनुपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीवर रिअल टाईम पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.0
0
Report
कोयना डैम में जलसंकट: संचय सिर्फ 9 टीएमसी, पर्यटन बढ़े
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्याची जीवनदायिनी आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानलं जाणारं कोयना धरण सध्या चिंताजनक स्थितीत पोहोचलं आहे. तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा अवघा 9 टीएमसीवर आला आहे. पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने अनेक वर्षांपासून जलसमाधी घेतलेले इतिहासाचे साक्षीदार पुन्हा एकदा उघड्यावर येऊ लागले आहेत. कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवजा गावातील ग्रामदैवत मानाईदेवी मंदिराचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या दुर्मिळ दृश्याला पाहण्यासाठी पर्यटकांची बँक वॉटर परिसरात मोठी गर्दी होत असून, एकीकडे हे दृश्य कुतूहल निर्माण करत असलं तरी दुसरीकडे धरणातील घटता पाणीसाठा भविष्यातील जलसंकटाची गंभीर घंटा दिसत आहे0
0
Report
नाशिक के स्कूल खुले, जंगल थीम में विद्यार्थियों का पहला दिन उत्साह से भरपूर
Nashik, Maharashtra:आज पासून शाळा सुरू अँकर दीर्घ सुट्टीनंतर आज पासून नाशिक शहर आणि परिसरातील शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस सुखद आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी नाशिकमधील विविध शाळांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे... नाशिक शहरातील नवरचना विद्यालयात जंगल थीम तयार करण्यात आली शाळेचा पहिला दिवस सुखकर आनंदी व्हावा आणि पर्यावरण पूरक व्हावं यासाठी शाळेकडून विशेष आयोजन करण्यात आले आहे... येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेकडून ऑक्शन करून शाळेत प्रवेश दिला जाणार आहे तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फुल देऊन स्वागतही केलं जाणार आहे... शाळेच्या परिसरामध्ये संपूर्ण जंगल थीम तयार करण्यात आली आहे यामध्ये विद्यार्थी शाळेत येत असताना गुहा तयार करण्यात आली आहे आणि यातून शाळेत येताना कंटाळा न येता आनंद व्हावा यासाठी प्रयोजन करण्यात आला आहे.. यासंदर्भात शाळेतून आढावा घेत विद्यार्थ्यांची बातचीत केले आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
Advertisement
वाशीम में डीएपी उपलब्ध, खरीप के लिए किसानों को राहत; 950 टन स्टॉक पहुँचा
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे.डीएपी खताची मागणी जास्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या डीएपी खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती.मात्र कृषीविभागा च्या विशेष नियोजनातून काल जिल्ह्यात ९५० मेट्रिक टन डीएपी खताचा साठा दाखल झाला आहे.त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.यंदा जिल्ह्यात 3 लाख 90 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज असून सोयाबीन व तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेला डीएपी खताचा साठा तातडीने विविध केंद्रांवर वितरणासाठी पाठवण्यात आला आहे.0
0
Report
आळंदी में साखळी चोरी का पर्दाफाश: पिंपरी-चिंचवड़ पुलिस ने तीन आरोपी गिरफ्तार, 12.95 लाख का माल बरामद
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदी परिसरात झालेल्या साखळी चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात चोरीस गेलेली सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहनेही हस्तगत करण्यात आली आहेत.0
0
Report
गोरवेड़ा सफारी में बिबट्यों का भीषण संघर्ष, एक बिबट्या की मौत, सुरक्षा पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर गोरेवाडा सफारीत बिबट्यांची झुंज,एका बिबट्याचा मृत्यू, एक बिबट्या बाहेरून आल्याची शक्यता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील बिबट सफारीत दोन नर बिबट्यांमध्ये भीषण संघर्ष झुंजीत एका बिबट्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती... बाहेरील बिबट्याच्या शिरकावामुळे सफारीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह घटनेनंतर प्रशासनाची धावपळ, ड्रोनच्या मदतीने बाहेरील बिबट्याचा शोध सुरू यापूर्वीही बाहेरून आलेल्या बिबट्यामुळे झाली आहे घटना गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर या घटननेमुळे वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी0
0
Report
Advertisement
नाशिक में मतदाता सत्यापन अब फेस रिकग्निशन से, पहली बार प्रयोग
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये मतदारांची पडताळणी आता 'फेस रिकग्निशन' द्वारे होणार; राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ६१९ मतदारांचा चेहरा स्कॅन करून होणार तपासणी. बोगस आणि दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी 'सी डॅक' संस्थेने तयार केले विशेष मोबाईल ॲप. १८ जून रोजी होणार मतदान; तांत्रिक अडचण आल्यास नेहमीप्रमाणे मतदान करण्याची मुभा, राज्य निवडणूक आयोगाची तत्त्वतः मान्यता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे विशेष पुढाकार; ॲपमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाची अचूक आकडेवारी जागेवरच मिळणार. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी 'अल्टीमेटम'0
0
Report
Ratnagiri ke schoolon mein aaj 10 hazar naye chhaatriyon ka pehla kadam, school varsh ki shuruaat
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दहा हजार मुलांचे शाळेत पडणार आज पहिले पाऊल.. नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात.. अँकर यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढावी,विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी नवगतांचे स्वागत हा उपक्रम शासनाने सुरू केला आहे.. जिल्ह्यात अडीच हजार शाळामध्ये तब्बल 10 हजार 91 विद्यार्थी नव्याने पहिलीच्या वर्गात दाखल होणार आहेत.. यामध्ये 5 हजार 114 मुले, 4 हजार 977 मुली..पहिलीच्या वर्गात पाऊल ठेऊन आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत..0
0
Report
रत्नागिरी में जाधव के दरवाजे के पास भाजप ने नया कार्यालय उद्घाटन किया, राजनीतिक संघर्ष तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ठेट भास्कर जाधवांच्या 'दारात' भाजपचे आव्हान!.. चिपळुणात कार्यालयाशेजारीच 'कमळ' फुलले; प्रमोद जठारांच्या हस्ते उद्घाटन.. अँकर ठाकरे गटाचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयाच्या अगदी बाजूलाच भाजपने आपले नूतन कार्यालय सुरू केले आहे.या कार्यालयाचे आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले.. राजकारणातील दोन कट्टर विरोधकांची कार्यालये आता एकाच भिंतीच्या अंतरावर आमनेसामने आली आहेत.. थेट भास्कर जाधवांच्या दारातच भाजपने 'कमळ' फुलवल्याने चिपळुणात राजकीय संघर्ष आणि चुरस कमालीची वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.. या अनोख्या शेजारधर्माची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे..0
0
Report
Advertisement
इस्लाम पार्टी नेता के गोदाम से राशन घोटाला: गर्भवती महिलाओं तक पहुंचा घोटाला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इस्लाम पार्टीच्या नेत्याच्या गोडूनवर छापा रेशनिंगचे धान्य काळाबाजार करत होता गरीरोदर मातांना वाटप केल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा देखील काळाबाजार सुरू होता ANCHOR : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या छाप्यात एक मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. किराडपुरा भागातील एका गोदामात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला रेशनिंगचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत रेशनिंगचे धान्याचाच काळाबाजार उघड झाला सोबतच त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील ६ महिने ते ३ वर्षांच्या मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी शासनाकडून मोफत दिला जाणारा 'अन्नपूर्णा' पोषण आहारही या माफियांच्या गोदामात सापडला. १ किलोच्या प्लास्टिक पॅकिंग फोडून त्यातील तांदूळ आणि मिक्स पावडर गोण्यांमध्ये पलटी केली जात असतानाच रंगेहात पकडण्यात आले. धक्कादायक म्हणजे सगळा गोरखधंदा इस्लाम पार्टीचा नेता कलीम कुरेशी चालवत होता तो सद्या फरार आहे. तर पोलिसांनी समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुतरी आणि फरदीन गणी पठाण या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.0
0
Report
दुभाषी बनावट दस्तावेज से संपत्ति हड़पने के मामले में SIT ने किया पर्दाफाश; जांच जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीदरम्यान वाढत्या फसवणूक आणि तोतयेगिरीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी दखल घेत विशेष तपास पथक स्थापन केली आहे. या गैरव्यवहारांच्या मुळाशी जाऊन संघटित भूमाफियांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करणे या पथकाचा मुख्य उद्देश आहे. सिटी चौक आणि सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२४ ते २०२६ या काळात बनावट दस्तऐवज व मुद्रांक नोंदणीप्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल झाले. हिरापूर येथील कोट्यवधींची जमीन बोगस हिबानामा करून बळकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मूळ मालकाच्या जागी तोतया व्यक्तीला उभे करणे आणि बनावट पॉवर ऑफ अटर्नी वापर करून मालमत्ता हडप करण्याची कार्यपद्धती समोर आली आहे. त्यामुळं या आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ही एसआयटी नेमली आहे.0
0
Report
गोदावरी नदी में डूब कर ही परिवार की तीन महिलाएं मरीं, मोहोला में शोक
Parbhani, Maharashtra:अँकर -परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहोळा गावाजवळ असलेल्या गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीसह एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समीक्षा जाधव उत्कर्ष जाधव सिंधुताई जाधव असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून तिघी नदीवर आंघोळ करत असताना समीक्षा व उत्कर्षा पाण्यात बुडत असल्याने वाचवण्यासाठी सिंधूबाई यांनी उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यादेखील पाण्यात बुडाल्या आणि या घटनेत तिघींचा मृत्यू झाला आहे.. एकाच कुटुंबातील दोन बहिणींसह चुलतीचा मृत्यू झाल्याने मोहोळा पाटील जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में पानी की आपूर्ति: 12 जून तक नई उम्मीद, तकनीकी बाधाएं बनीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात वाढीव पाणी एप्रिल महिन्यातच आणण्यात येणार होते. पहिली डेडलाइन हुकल्यानंतर न्यायालयाने १२ जूनला पाणी आणावे, असे निर्देश दिले. मात्र गेली दोन दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक अडचणींना डोंगर मांडण्यात येतोय. शुक्रवारी आणायला पाणी सुरुवात करताच जायकवाडीत स्कोअर व्हॉल्व्ह निखळला. शनिवारी पम्पिंग सुरू केली, तर व्हॅक्युम पंपच जळाला. रविवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान शहरात वाढीव पाणी आणण्यासाठी पम्पिंग सुरू केले. रात्री उशिरापर्यंत सर्व काही सुरळीत असेल तर नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणात फक्त साडेसात एमएलडी पाणी येईल त्यामुळं पाणी येण्यासाठी ची अडथळ्यांची शर्यत कायम आहे...0
0
Report
Indigo ने छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे की गोवा-हैदराबाद उड़ानें 16 जून–30 सितम्बर तक बंद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंडिगो एएरलाइन्सने छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील गोवा आणि सायंकाळची हैदराबाद विमानसेवा १६ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत..महत्वाचं म्हणजे गेल्या १२ वर्षात छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील प्रवासी संख्या ४ लाखांवरून ७ लाखांपर्यंत गेली आहे. विमानतळाने सुविधा, तांत्रिक क्षमता आणि विस्ताराच्या दृष्टीनेही मोठी झेप घेतली आहे. परंतु, आगामी काही दिवसांत कमी होणारी ही विमाने चिंतेचा विषय ठरतोय..0
0
Report
चिपळूण के कळवंडे गांव में आबकारी विभाग छापा: करीब 2.9 लाख का माल जब्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या कळवंडे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा.. पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!.. चिपळूण तालुक्यातील कळवंडे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त केला आहे.. या छाप्यात सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,६ हजार लिटर रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले.. याप्रकारणी आरोपी नंदेश वरपे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.. व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळालेल्या गावातच हा अवैध धंदा सुरू असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता.. पुढील तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
