icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे-नाशिक हाईवे भारी बारिश से जाम, सात-आठ घंटे से फंसे सैकड़ों वाहन

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, याचा मोठा फटका पुणे-नाशिक महामार्गाला बसला आहे. चाकणजवळील सक्सेस पॉईंट परिसरात महामार्गावर नदीसारखं पाणी वाहू लागल्याने, पहाटेपासूनच या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता, महामार्गाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. तब्बल ७ ते ८ तासांपासून शेकडो वाहनचालक आणि नागरिक एकाच जागेवर अडकून पडले आहेत. पाऊस ओसरत नसल्याने आणि वाहतूक पुढे सरकत नसल्याने, अनेक नागरिक आता आपला जीव धोक्यात घालून या पाण्यातून प्रवास करताना दिसत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.
0
0
Report

चाकण में भीषण बारिश से पुणे-नाशिक highway जलमग्न, सैकड़ों लोग फंसे

Chakan, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः चाकण परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. महामार्गावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने गेल्या ८ ते १० तासांपासून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो प्रवासी आणि वाहनचालक एकाच जागेवर अडकून पडले आहेत. या अतिवृष्टीचा आणि प्रशासकीय नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह महिला आणि लहान मुलांना बसत असून, गेल्या अनेक तासांपासून लोक अन्न-पाण्याविना ताटकळत आहेत.याचाच पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

टिटवाला-बल्याणी के बीच सड़क धंस गई, भारी बारिश से यातायात प्रभावित

Kalyan, Maharashtra:टिटवाळा बल्यानी दरम्यान रस्ता खचला राष्ट्रीय महामार्ग विभागाने नित्कृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा बल्याणी दरम्यान रस्ता खचल्याची घटना आज दुपारी एक वाजुन्याच्या सुमारास घडली मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर पाणी जमा झाले होते त्यातच रस्ता खचल्याने वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत हा रस्ता बंद केला . याच रस्त्यावरून मुंबई बडोदरा मार्ग जातो बडोदरा मार्गासाठी कलवड या रस्त्यावरून करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे आज हा रस्ता खचला असल्याचे आरोप माजी नगरसेवक पाटील यांनी केली आहे
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में संभावित बाढ़ के मद्देनजर शाहू महाराज ने जिला अधिकारी से चर्चा

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर में संभावित बाढ़ स्थिति के संदर्भ में सांसद शाहू छत्रपती महाराज ने आज जिलाधिकारी विजय राठोड से चर्चा की। इन दोनों के बीच संभावित बाढ़ स्थिति के अनुसार बीस मिनट की बैठक हुई। बैठक में शाहू महाराज छत्रपती ने बाढ़ आने पर तात्कालिक राहत के लिए प्रभावित नागरिकों के स्थानांतरण के निर्देश दिए। साथ हीRadhaनगरी डैम 100% भरने से पहले डैम के पॉवर हाउस से विसर्जन जारी रखने की भी सलाह दी गई। जिलाधिकारी विजय राठोड ने कहा कि अभी बाढ़ स्थिति नहीं है, लेकिन बारिश के आगमन के साथ प्रशासन ने आवश्यक तैयारियां कर ली हैं।
0
0
Report

मुंबई में अंधेरी के भूमिगत मार्ग बंद, भारी बारिश से यातायात चरमराया

Mumbai, Maharashtra:मुसळधार पावसामुळे पूर्व-पश्चिम जोडणारा अंधेरीचा भुयारी मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी, विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि मार्ग पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

बारिश से शेड गिरने पर नागरिक घायल, राहत टीमें मौके पर पहुँचीं

Mumbai, Maharashtra:अंधेरीतील लोखंडवाला गार्डन क्रमांक २ येथे मुसळधार पावसामुळे उभारलेली पत्र्याची शेड कोसळून एक नागरिक जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मनसे विभाग अध्यक्ष प्रशांत राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड व पडलेला पत्रा हटवून मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना पाचारण करण्यात आले. सर्व यंत्रणांच्या समन्वयाने परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के बच्चों के लिए मुफ्त दिल की जांच और शल्य चिकित्सा अभियान शुरू

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील बालकांना अत्याधुनिक हार्दय रोग निदान व मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे मोफत 2D Echo व बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री डा. आशिष जयस्वाल आणि अन्य मान्यकार सहभागी झाले. या शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ३०० हून अधिक बालकांची अत्याधुनिक 2D Echo तंत्रज्ञानाद्वारे मोफत तपासणी करण्यात आली. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग व त्यांच्या चमूने ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची सविस्तर तपासणी केली. या तपासणीद्वारे जन्मजात हृदयविकार, हृदयाच्या झडपांचे विकार तसेच रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे निदान करण्यात आले. पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शिबिरादरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अहेरी तालुक्यातील दोन वर्षीय अन्विका सूरज गौरकर हिची यशोगाथा सादर करण्यात आली. अंगणवाडी स्तरावरील नियमित आरोग्य तपासणीत आरबीएसके पथकाने तिच्यामध्ये हृदयविकाराची लक्षणे ओळखली. पुढील तपासणीत तिला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) अर्थात जन्मजात हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. शिबिरात तिची पुढील तपासणी करण्यात आली असून तिच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहুল जिल्ह्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन होणे ही अत्यंत समाधानाची बाब असून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे कार्य ईश्वरी कार्य असून अशा उपक्रमांना सातत्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.
0
0
Report
Advertisement

मंचर में दूध मिलावट के मामले पर FDA-ग्रामीण पुलिस की बड़ी कार्रवाई, 13 गिरफ्तार

Shirur, Maharashtra:पुण्याच्या मंचरमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच जिल्ह्यांमध्ये व्यापक मोहीम राबवून तब्बल १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या वतीने सुरुवातीला ७ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र आरोपींच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या संपूर्ण कारवाईवर माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे माध्यमांशी बोलताना "दूध भेसळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केवळ अन्न प्रशासनच नव्हे तर उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागामार्फतही अवैध धंद्यांवर मोठी कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
0
0
Report

कांग्रेस कल आयोध्या राम मंदिर दान के कथित अपहरण के विरोध में प्रदर्शन करेगी

Nashik, Maharashtra:*काँग्रेसचे उद्या काळाराम मंदिरात आयोध्या राम मंदिर कथित अपहार प्रकरणी आंदोलन...* अँकर: अयोध्या येथील राम मंदिरात भाविकांकडून दान केलेल्या रकमेच्या कथित अपहार प्रकरणी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे का बोलत नाही त्यांना सवाल करत रघुपती राघव राजाराम अशा आंदोलनाने काळाराम मंदिरात आंदोलन करत राज्यकर्त्यांना आम्ही सवाल करणार आहोत असे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हटले आहे. बाईट: मोहन जोशी- काँग्रेस नेते
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top