icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजीनगर में शिंदे-राऊत के बीच राजनीति की हलचल, बच्चू कडू शिवसेना में शामिल?.

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पॉइंटर ऑन सामना अग्रलेख. - बच्चू कडू यांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला निर्णय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना त्यांना कल्पना आहे. राजकारणाची दिशा काय असेल म्हणून. यांनी काँग्रेस बरोबर केलेला घरोबा ती आत्महत्या न्हवती का!? काँग्रेस सोबत सनगत नव्हे तर शया केली. - प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करीत असतो. 29 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते. काही कोणाला थांबवले नाही. शिवसेना भाजप युती तुटताना पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करतील हे स्वप्न आहे. ते स्वप्नात आहे. आम्ही स्वप्नात नाही. ऑन महेश शिंदे विरोधकांना प्रवेश. - महेश शिंदे यांनी भाजप बरोबर सत्ता मिळविण्यासाठी जो प्रकार केला तो शिंदे साहेबांन मान्य न्हवता, मात्र शिंदे यांच्यावर निर्णय घेतील. त्याचा विरोधक आहे म्हणजे प्रवेश द्यायचा नाही असे नाही. देसाई यांनी शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला असावा. शिंदे यांचा निर्णय जाहीर करतील. - घरातील भांडण कोणत्या स्तरावर गेले मला माहिती नाही. मात्र भांडण मिटविण्यासाठी पुढील आठवड्यात बोलावले जाईल काही कटु निर्णय घ्यायचा ते शिंदे ठरवतील. - काही नेत्यांची वयक्तिक ताकद असते. ऑन संजय राऊत उद्घाटन. - एकदा काम केल्यावर त्याचा संदेश लोकांपर्यंत जायला पाहिजे त्याचा क्रेडिट घेतले पाहिज. माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा किती जाहिरात केली आणि तसेच वागले. तुम्हाला विकास कामाचे दुःख होतोय, आम्ही घरात न बसणारे रस्त्यावर उतरणार लोक. ऑन शिंदे प्राण वाचवलं राऊत विधान. - यांच्या घरात का बंगाल चे बाबा बसले होते का? अनेकांना माहिती ऑक्सिजनचे टँकर कसे थांबले, रेमडोसिव्हर कशी आणल्या. कोरोनाच्या संसर्गातून शिंदे बाहेर निघाले मात्र त्यांनी सेवा सोडली नाही. ऑन सामंत जरांगे भेट दरम्यान विधानपरिषदेसाठी जरांगे यांना विचारणा? की हाकेसाठी संमती? - जरांगे पाटील यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी द्यायची असे नाही. हे बोलणे चुकीचे आहे. उदय सामंत यांची भेट घेतली मात्र सध्या निवडणूकही नाही. ती वयक्तिक भेट होती. बच्चू कडू हे 2022 पासून आमच्या सोबत आहे. शिंदेवर त्यांचा विश्वास आहे. विदर्भातील चांगला जुना शिवसैनिक आणले. - लक्ष्मण हाके, जरांगे पाटील या कल्पित बातम्या आहेत. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका शिंदे यांची आहे. - महाराष्ट्रात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची टाकत फक्त शिंदे मधे आहे. ऑन बागेश्वर बाबा. - बाबाचा विधान चुकीचं होत त्याला आम्ही ठाम विरोध केला. खरातला देखील विरोध केला. बाहेरचे जे महाराज इथे येतात त्यांना आपले काही लोक सपोर्ट करतात. ऑन मराठीवरून नितेश राणे चेतावणी - हिंसा सगळीकडे झाली आहे. हा वाद काही आतापासूनच नाही. काही शक्ती येतात. ओवेसींच्या पिलावळ आहे.. ऑन संभाजीनगर वाढत्या हत्या घटना. - अत्यंत कमी वयातील मुलाकडून हत्या केल्या जात आहे. नशेच्या माध्यमातून अशा हत्या होत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथक निर्माण केले आहे. पोलिस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. ऑन 2029 स्वातंत्र्य लढण्याची तयारी सुरू आहे का? - कधीही कुणाचेही कोणतेही शाश्वत राजकारण नसते. अनेक युती अशा झाल्या की, कधी स्वप्नातही त्या होऊ शकत नाही. आपला पक्ष मजबूत करणे हा सर्वात मोठा उपाय. आमची भूमिका महायुती सोबत लढायची, ताकत विभागाला नको. ऑन रिक्षाचालक अशिक्षित दलवाई विधान. - असे नाही की फक्त गरीबच आणि अशिक्षितच रिक्षा चालवतो,असे म्हणणे चुकीचे आहे. उच्च शिक्षित तरुण देखील रिक्षा चालविता आहे. त्या वर्गाला खऱ्या अर्थाने कमी लेखत आहे. जो कोणी माणूस असेल त्यांनी महाराष्टात मराठी शिकवी. हुसेन दलवाई यांनी असे वक्तव्य करू नये. ऑन योगेंद्र पवार वक्तव्य. - अजितदादांची राष्ट्रवादी प्रत्येक जण स्वतःच्या डोक्यावर घेऊन पळत आहे. ते पक्ष स्वातंत्र्य आहे त्यांचा निर्णय त्यांना घेऊन द्या. ऑन भोर बलात्कार. - काही प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.अशा नराधमाना चौकात येऊन शिक्षा द्यायला पाहिजे.
0
0
Report
Advertisement

पंढरपुर में भीड़ बढ़ी: गर्मी के बीच श्रद्धालु सुबह दर्शन के लिए पहुँचे

Pandharpur, Maharashtra:सलग आलेल्या सुट्ट्या और सुरू झालेली मे महिन्याची सुट्टी यामुळे पंढरपूर फुल्ल झाले. विठ्ठलाचे दर्शन रांग चंद्रभागेच्या तीरावरील सारडा भवन च्या पुढे पोचली आहे. सध्या पंढरपुरात सकाळी नऊ नंतर उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. उष्णता असल्याने भाविकही सकाळी लवकर दर्शन रांगेत उभी राहत आहेत. या भाविकांच्या दर्शन रांगेला डोक्यावर जरी छत असले तरी पायाखालचे मॅट खराब झाल्याने भाविकांच्या पायांना उष्णतेचा त्रास होतो आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेत आल्याने चंद्रभागा ही दुथडी भरून वाहत असून पुढील काही दिवस पंढरपुरात अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे.
0
0
Report
Advertisement

कटेपुरणा वन्यजीव अभयारण्य में बौद्ध पूर्णिमा पर मचान से वन्यजीव गणना हुई सफल

Washim, Maharashtra:वाशीम: बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात मचान प्राणी गणना उत्साहात पार पडली. वन विभागाने उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या निरीक्षणासाठी कोअर व बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारले होते. सर्व मचान लॉटरी पद्धतीने भरले गेले असून प्रत्येक ठिकाणी गाईड व सुरक्षा रक्षक तैनात होते. कृत्रिम पाणवठ्यांजवळ रात्रीभर निरीक्षण करताना सायाळ, हरिण, चितळ, बिबट, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे तसेच विविध पक्ष्यांचे दर्शन झाले. या उपक्रमातून वन्यजीवांची संख्या, हालचाली व सवयींचा अभ्यास करण्यास मदत होणार असून अभयारण्यात जैवविविधतेच्या संवर्धनाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.
0
0
Report

लोणावळा के मिसिंग लिंक पर प्रवेश मार्ग को लेकर मनसे का विरोध

Varsoli, Maharashtra:मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर मिसिंग लिंक ला मावळ तालुक्यातील मनसेने विरोध केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे करण्यासाठी तसेच मिसिंग लिंक तयार करण्यासाठी मावळ तालुक्याच्या भूमीपुत्रांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या, मात्र लोणावळा शहरासाठी मिसिंग लिंक वर जाण्यासाठी सोयीस्कर प्रवेश नाही, लोणावळा परिसरातील नागरिकांना मिसिंग लींक वर सोयीस्कर प्रवेश नसल्याने हा मिसिंग लिंक लोणावळा शहराचं पर्यटनाच्या फायद्याचा नाही, हा मिसिंग लिंक एक प्रकारे लोणावळा शहराचं पर्यटन कमी करण्याचा डाव आहे असा आरोप मावळ मनसेने केला आहे. राज्य सरकारला मिसिंग लींक सुरू ठेवायचं असेल तर त्यांनी लोणावळा आणि परिसरातील नागरिकांना मिसिंग लींक वर सोयीस्कर प्रवेश देणारा रस्ता कायमस्वरूपी तयार करून द्यावा अशी मागणी मावळ तालुक्यातील मनसेने केली आहे.
0
0
Report

वसई के बद्रीनाथ मंदिर में भक्तों की भीड़ सुबह से रात तक दर्शन के लिए

Vasai-Virar, Maharashtra:वसईत बद्रीनाथ मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी – सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी रांगे वसई पश्चिमेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या बद्रीनाथ मंदिरात दिवसेंदिवस भक्तांची प्रचंड गर्दी वाढताना दिसत आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी या भव्य मंदिराचे प्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून, तेव्हापासूनच भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उत्तरांचल मित्र मंडल वसई यांच्या अथक परिश्रमातून आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून हे मंदिर साकार झाले आहे. आज, शुक्रवार दिनांक १ मे रोजी पहाटे ६ वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. दिवसभर अखंडपणे भक्तांची रांग लागलेली असून, संध्याकाळ उलटूनही हजारो भाविक बद्रीनाथ भगवानाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. स्थानिक भक्तांसह दूरवरूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
0
0
Report
Advertisement

मालेगांव के ज्वेलर्स दुकान से सोने-चांदी भरी बैग चोरी, चोर फरार

Nanded-Waghala, Maharashtra:ज्वेलर्स दुकान उघडून सफासफाई करताना चोरट्याने सोने चांदी भरलेली बॅग लंपास केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मालेगाव मध्ये घडली. काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिवशक्ती ज्वेलर्सचे मालक सचिन उडानशिव हे आपले दुकान उघडुन मंदीरात गेले. त्यांच्या वडीलांनी दुकानात सोने-चांदी असलेली बॅग ठेवली आणि ते झाड-झुड करत होते. पाळत ठेवुन असलेल्या अज्ञात चोरट्याने सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. या बॅगेत अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे दागिने होते. चोरटे वसमत मार्गे दुचाकीवरून वेगाने फरार झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्यांचा पाठलाग केला परंतु भररस्त्यात पोलिसांना चकवा देण्यात चोरटे यशस्वी झाले. दुकानातून बॅग पळवून नेण्याची घटना cctv कॅमेऱ्यात कैद झालीये.
0
0
Report

च chipळूण-रत्नागिरी: मिरजोळे में छह महीने की मादा बिबटिया जेरबंद

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. मिरजोळे येथे सापडलेल्या बिबट्या वनविभागाकडून जेरबंद.. ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने वन विभागाची कार्यवाही.. 6 महिन्यांचा बिबट्या वनविभागच्या देखरेखीखाली.. रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांत वाडी येथील भाई कोलगे यांच्या किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचा खाली लावलेल्या जाळीत बिबट्या अडकल्याचे ग्रामस्थांना दिसल्यानंतर तातडीने वनविभागाला पाचरण करून वनविभागाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने सहा महिन्यांच्या मादी बिबट्याला सुरक्षित रित्या जेरबंद करण्यात आले..
0
0
Report

इंद्रायणी नदी में डूबकर युवक की मौत, खोज-Team ने शव बरामद

Varsoli, Maharashtra:इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. मावळ तालुक्यातील पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्रांच्या तत्परतेने मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. मावळ तालुक्यातील सालुंब्रे-गहुंजे येथील जुन्या दगडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ गाव उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असून, तो साळुंब्रे येथील काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता. तो पवना नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ शोध आणि बचावकार्य राबवत मृतदेह बाहेर काढला. यानंतर शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या उपस्थितीत विरा ॲम्बुलन्सच्या माध्यमातून मृतदेह पवना हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

नसरापुर में बाल लैंगिक शोषण और हत्या: बाजार बंद, भारी भीड़ नारेबाजी

Pune, Maharashtra:पुणे. नसरापुर मधील चार वर्षे चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरण. काल भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नसरापूर गावात कडकडीत बंद. कडकडीत बंद पाडून करणारं निषेध व्यक्त. नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि समस्त ग्रामस्थ नसरापूर आज कडकडीत बंदचं आवाहन. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. सकाळी 10 वाजता गावातील भैरवनाथ मंदिर येथून घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार. नसरापूरच्या नागरिकांवर दुःखाचा डोंगर. महिला आक्रमक सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू. घटना सांगताना नसरापूरच्या महिला डसाडसा रडल्या. संशयीत आरोपीला फाशी होऊ द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या आम्ही शिक्षा करतो. नसरापूर गावात फॉरेन्सिकची टीम दाखल. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू, गावातील नागरिक आक्रमक मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात.
0
0
Report

मुंबई-गोवा महामार्ग पर 15 जुलाई तक वृक्षारोपण की गारंटी, प्रशासन ने लिखित आश्वासन दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गावर वृक्ष लागवडीसाठी 15 जुलै डेडलाईन.. अँकर गेल्या चार वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने संतप्त झालेल्या चिपळूण वासियांबरोबरच हायवे वृक्ष लागवड हक्क समितीचे शहानवाज शहा यांनी महामार्ग उपविभाग कार्यालयासमोर थेट भू-समाधी आंदोलन छेडले.या आंदोलनानंतर प्रशासनाने 15 जुलैपर्यंत इंदापूर ते तळेगाव दरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्ष लागवड केली जाईल अशी लेखी हमी आंदोलन कर्त्यांना दिली..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top