icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उद्धव ठाकरे की सभा में संजय देशमुख ने आरोप, रेल प्रकल्प पूरा करने का दावा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेत वणी आणि चंद्रपूर येथील लोक आमदार संजय देरकर यांनी आणले होते, या सभेला लोकांची ओसंडून गर्दी झाली असती मात्र तसे झाले नाही, त्यामुळे जनता आमच्या पाठीमागे असल्याचे सिद्ध होते अशी टीका खासदार संजय देशमुख यांनी केली. संजय राऊत यांच्या वैयक्तिक टीके कडे देखील लक्ष देणार नाही, आम्हाला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प कार्यकाळात पूर्ण करायचा आहे. शिंदे गटात जाण्याचा निर्णय हा सर्व जनतेला विश्वासात घेऊनच घेतला, असेही संजय देशमुख म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा आईच्या शपथेचा व्हिडिओ सभेत दाखविला, यावर बोलताना संजय देशमुख म्हणाले की ती तेव्हाची परिस्थिती होती, शिवसेनेत जाऊ की नाही हे आईला विचारले होते मात्र शपथेचा प्रश्न नाही हा विषय भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना नगरपरिषद निवडणुकीवळी सभेसाठी बोलविले होते मात्र ते आणि आदित्य ठाकरे दोघेही आले नाहीत. आम्ही लढत राहायचं आणि तुम्ही पाठबळही द्यायचं नाही, निर्णय घेतला तर टीका करायची आरोप संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे वर केला.
0
0
Report

आकोला के मूर्तिजापूर में कृषि विभाग ने गुजरात कंपनी के बीज जप्त किए

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत गुजरातमधील एका कंपनीचे सुमारे २१ लाख रुपये किमतीचे १,९८८ बियाण्यांचे पाकिटे जप्त केली आहेत.संबंधित गोदामाला सील करण्यात आले असून कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृषी विभागाच्या तपासात संबंधित कंपनीकडे बियाणे साठवणूक व विक्रीचा वैध परवाना नसल्याचे, तसेच आवश्यक नोंदवहीही उपलब्ध नसल्याचे आढळले.विशेष म्हणजे याच कंपनीवर यापूर्वीही कारवाई झाली होती. जप्त बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

नाशिक के कलवण शहर में ऑनलाइन सट्टा जुगार पर बड़ी कार्रवाई, 5 आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:कळवण ब्रेकिंग ( नाशिक ) - कळवण शहरातील फुलामाता चौकात ऑनलाईन सट्टा जुगार सेंटरवर सायबर क्राईम चा छापा. - ५ आरोपी ताब्यात, लॅपटॉप विविध ५४ बँकेचे पासबुक व इतर साहित्य जप्त Anchor : नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात ऑनलाईन सट्टा आणि जुगाराविरोधात नाशिक सायबर क्राईम विभागाने मोठी कारवाई केली आहे. फुलामाता चौकातील गंगा निवास येथे सुरू असलेल्या ऑनलाईन बेटींग सेंटरवर छापा टाकून पाच आरोपींना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान चार लॅपटॉप, अठरा मोबाईल, ५४ बँक पासबुक, २५ एटीएम कार्ड, राऊटर, सिमकार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी विविध बेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन डिपॉझिट आणि विड्रॉवल करून सट्टा चालवत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

नीतिश राणे का भाषण: हिंदुत्व के नारे और प्रशासन पर तीखा हमला

Kolhapur, Maharashtra:नितेश राणे भाषण मुद्दे आज शिवराज्याभिषेक दीन आहे हिंदू साम्राज्य दीन आहे आज सेक्युलर जिहादी वळवळत त्यांनाच शिवाजी कळतात मग तुम्हाला शिवाजी कळतात तर तुम्ही बिळात मागे का बसता आमच्या शिवरायांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट छाती ठोक पणे करायला सांगितले आहे आमचे रक्त भगव आहे आमच्या बापाचे नाव शिवाजी आहे राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार निवडून दिले आहे एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बनवले आम्ही कोणत्याही मोहल्यात मत मागायला गेलो नाही, मी नेहमी वाढीव मताने निवडून आलोय हिरव्या मतांमधे ताकत नाही इथ पहिले हिंदूंचे हित मग बाकीचे जे नियम हिंदुना ते नियम इतरांना ही आहेत, आम्ही कायदा पाळतो ते पाळत नाहीत, का पाकिस्तान आहे का इथे प्रशासनाने कान उघडे ठेऊन ऐका मी देवाभाऊच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये आहे हे इथल्या प्रशासनाने लक्षात ठेवा सोमवार पासून कसे फटाके वाजतात ते बघा विशाळगडावर त्याचे लालूंचगुल करणाऱ्याची मी नोंद ठेवली आहे आम्ही मंत्रालयात बसलोय तुम्ही चिंता करू नका, मला माहिती आहे कसे त्याचे कार्यक्रम करायचे माझी पाठ फिरल्यावर जर काही घडले तर मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरून फोन येईल गडावर सिमेंट काँक्रिट चे अतिक्रमण कसे चालतात ? जर हे कायद्यात असेल तर मी त्या अधिकाऱ्याचे प्रमोशन करेन वाघजाई देवीच्या मंदिराचे जीर्णोध्दार करण्याची आमची जबाबदारी आता इथून पुढे विशाळगडावर जे येतील ते देवीच्या दर्शनाला येतील इथ लॉज चालतात एवढी हिंमत, जा त्या जामां मशिदीवर करून दाखवा या गडाला मुक्ती मिळणार, आम्ही गप्प बसणार नाही आम्ही डोझोर चालवणारे आहे इथ ही सामननगरी येणार, दाडी वाल्यांना सांगा गेल्या वर्षी हिंदू भावनी इथ फटाके फोडले
0
0
Report

विशाळगड अतिक्रमण: सभी धर्मों पर एक समान नियम लागू करने की मांग

Kolhapur, Maharashtra:मंत्री नितेश राणे बाईट मुद्दे ऑन विशाळगड अतिक्रमण आपण सगळे बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आणि संविधानांना नुसार जगणारे नागरिक आपण आहोत.. विशाळगडावरील अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावेत अशी स्पष्ट भूमिका आहे. जो अधिकारी हिंदूना दिलेत तेच अधिकार मुसलमान आणि ख्रिचन समाजाला म्हणजेच सगळ्यांना दिले आहेत. मग अस असताना एका धर्माला पाहिजे तेव्हढे अतिक्रमण करायला द्यायचे आणि दुसऱ्याला एक टपरी पण उभी करायला द्यायचे नाही.. यामुळं येणाऱ्या काळात कायदेशीर पद्धतीने अतिक्रमणे काढावीत. जो नियम हिंदूना लागतो तोच नियम सगळ्या धर्मांना देखील लागतो. त्यामुळे विशाळगड अतिक्रमण मुक्ती होईल असा विश्वास देवाभाऊच्या सरकारच्या वतीने सगळ्यांना देतो. ऑन अधिकारी भूमिका अतिक्रमणासाठी काही कायदे बनविले आहेत, गडकिल्यावर पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय आपण एक दगड पण उभा करू शकत नाही.. मग हे ही लोक कोणत्या अधिकाराने काँक्रिटची घरे बांधत आहेत. वस्ती करत आहेत, दारू विकतात, चिकन विकतात.. मग हेच जरजामा मशीद आणि हाजीअली दरगाह वर केले तर चालेल का ? जो नियम आम्हाला लागतो तोच नियम त्यांना लावा.. त्याच्या तिथे अतिक्रमण चालणार नसतील तर आम्हाला देखील अतिक्रमण चालणार नाहीत ही भूमिका हिंदुत्ववादी सरकारची आहे. जो जो अधिकारी कायद्याचे पालन करत नाहीत, डोळेझाक करतात.. त्यांना कदाचित बिर्याणीवर जास्त प्रेम येत आहे. जो अधिकारी कायद्याचेपालन करत नसतील ते अधिकारी घरचा रस्ता धरेल.. देवभाऊ बुलडोझर इथे कोणी बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांच्यार जोर जबरदस्ती करत असेल .. लॅन्ड जिहाद च्या निमित्ताने जमीनच सोडायची नसेल तर आमचा देवाभाऊचे बुलडोझर तयार आहेत. ऑइलिंग करायला दिलेत. येतील इथ पर्यंत. ऑन उद्धव ठाकरे दौरा वेळेत गेले असते तर त्याचे खासदार पण गेले नसते. आत्ता उद्धव ठाकरे जे फिरतात... ते ज्या मौलवी यांनी निवडून दिले, त्याला सलाम करण्यासाठी ते फिरत आहेत. मुजको माफ करदो अब्बा हे सांगण्यासाठी फिरत आहेत. आत्ता आलेले खासदार हे बाळासाहेब ठाकरे याच्या विचाराने आलेले आहेत. ऑन विमान प्रवास ते तर कमर्शियल विमान आहे, त्यामूळे एकमेकांना विचारून थोडीच तिकीट काढतो... कधी नाही ते उद्धव ठाकरे यांना घर तरी सोडायला मिळाले असेल तर चांगलीच गोष्ट आहे..
0
0
Report

उल्हासनगर के सरकारी अस्पताल में एक दिन में आठ सर्पदंश के मामले, डॉक्टरों ने बचाई जान

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी सर्पदंशाचे तब्बल आठ रुग्ण दाखल झाले. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांनी सर्वांचे प्राण वाचले. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, साप चावल्यानंतर 'गोल्डन पिरियड'मध्ये रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्यांच्या जीव वाचवणं शक्य झालं. या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश होता. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कोणताही धोका न पत्करता तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी आणि सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
0
0
Report
Advertisement

TET पेपर लीक: छात्रों का विश्वास डगमगाया, सरकार जांच की मांग तेज

Shirdi, Maharashtra:शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी बाईट ऑन TET पेपर फुटी प्रकरण पॉइंटर नीट पाठोपाठ आता TET चा पेपर फुटला.. माध्यमांनी बातम्या शोधायच्या आणि तज्ञांनी मत मांडायची.. समाजाने वैतागायच आणि सरकारने चौकशीची भाषा बोलायची.. आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा हे किती चालणार.. यामुळे विद्यार्थांचा परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न.. स्पर्धा परीक्षा हे एकच माध्यम तरुणांसाठी उपलब्ध.. कितीही घटना घडल्या तरी जबाबदारी निश्चित होत नाही.. इतके आंदोलन होऊन केंद्रीय शिक्षणमंत्री अजून राजीनामा देत नाही.. केवळ रेल्वे अपघात झाला तर लालबहादुर शास्त्रींनी राजीनामा दिला होता.. त्यामुळे प्रतिक्रिया न देणे हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी अस माझं मत..
0
0
Report

आषाढ़ी एकादशी के मौके पर मिरज से पंढरपूर के लिए तीन विशेष रेलगाड़ियों की घोषणा

Sangli, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर.. अँकर - आषाढी एकादशी निमित्ताने सांगलीच्या मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.एकादशी निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तीन गाड्या अधिकच्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये नागपूर-मिरज, कोल्हापूर-कुर्डूवाडी आणि पुणे-मिरज या मार्गावरील विशेष गाड्यामुळे मिरज,सांगली, कोल्हापूर,पुणे,सांगोला आणि पंढरपूर परिसरातील भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.
0
0
Report

स sili में बैलबंडी पलटने से किसान सेवदेव माकडे की मौके पर मौत

Bhandara, Maharashtra:भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे बैलबंडी उलटून शेतकरी सेवदेव वासुदेव माकडे (५१) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून खरीप हंगाम तोंडावर असताना झालेल्या या घटने कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला आहे. सेवदेव हे स्वतःच्या शेतावरून जनावरांसाठी तणस भरून बैलबंडीने घरी परत येत होते. शेत शिवार रस्त्यावर अचानक बैल बिचकल्याने बंडी अनियंत्रित झाली आणि उलटली. यात सेवदेव मृत्यमुखी पडले. अपघातानंतर बराच वेळ कोणीही तिकडे न गेल्याने घटनेची माहिती घरच्यांना उशिरा मिळाली. त्यांच्या सोबतचा एक बैलही फाशी लागलेल्या अवस्थेत आढळला. त्याला वाचविण्यात यश आले. मयत सेवदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. खरीप हंगामाच्या कामासाठी ते शेतात गेले होते. कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. घटनेची नोंद कारधा पोलिस ठाण्यात करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

पत्रकारों को धमकी देने वाले शिवसेना सांसद संजय दिना पाटील के खिलाफ कार्रवाई की मांग

Yeola, Maharashtra:मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील या खासदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले तसेच पत्रकारिताकरत असताना अनेक वेळा पत्रकारांना धमकी देणे असे प्रकार सातत्याने होत असतात त्याकरता पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी देखील याप्रसंगी करण्यात आले येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
0
Report
Advertisement

चीन की पाबंदियों से कैलास यात्रा में फंसे 52 भारतीय भक्त, मदद के लिए भारत सरकार से गुहार

Shirur, Maharashtra:पुण्यातील तब्बल ५२ भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत. मोक्षप्राप्तीची आणि अत्यंत पवित्र मानली जाणारी 'कैलास-मानसरोवर यात्रा' करण्यासाठी ये भाविक घराबाहेर निघाले, परंतु अब त्यांच्या यात्रेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. चीन प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे या ५२ शिवभक्तांचा पुढील प्रवास रखडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चीन सरकारने या भाविकांना प्रवासासाठी आवश्यक असणारे 'परमिट' जारी केले, प्रवासाचे पैसेही उकळले, मात्र ऐनवेळी त्यांचा 'व्हिसा' रोखून धरला आहे! गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व भाविक काठमांडूमध्ये व्हिसाच्या प्रतीक्षेत असून, आता त्यांनी थेट भारत सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. पुढे: पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि परिसरातील जवळपास ५२ भाविक अत्यंत श्रद्धेने कैलास-मानसरोवर यात्रेसाठी घराबाहेर पडले. नेपाळमार्गे तिबेटमध्ये प्रवेश करून कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी लागणारे व्हिसा ॲप्लिकेशन, पासपोर्ट आणि इतर सर्व आवश्यक कायदेशीर दस्तऐवज या भाविकांनी वेळेत पूर्ण केले होते. चीन सरकारने त्यांना परवानगी म्हणजेच परमिटही दिले. मात्र ऐनवेळी चीन प्रशासनाने खोडा घातला आहे. पैसा लेकरही व्हिसा का दिया जाता है? असा संतप्त सवाल आता हे भाविक उपस्थित करत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व लोक काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत, त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही वाढत चालला आहे. या ५२ लोकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या अडकलेल्या भाविकांनी केली आहे. चीनच्या या अशा वागणुकीमुळे दरवर्षी अनेक भारतीय पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रश्न: पैसे आणि परमिट देऊनही चीनने ऐनवेळी व्हिसा का रोखला? या ५२ निष्पाप भाविकांची सुटका करण्यासाठी सरकार किती तत्परतेने पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top