445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली के करहाळे डिग्रस क्षेत्र में आंधी-बारिश से हल्दी किसानों को नुकसान
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील करहाळे डिग्रस परिसरामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्री पाऊस झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान झाल आहे शेतकऱ्यांनी शेतात वाळायला घातलेली हळद पावसामुळे भिजल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे.0
0
Report
रायगड में ग्लैंडर्स से रोकथाम के लिए घोड़ों की स्वास्थ्य जाँच, एक हजार तक हेल्थकार्ड जारी
Chendhare, Maharashtra:ग्लँन्डर्सचा धोका रोखण्यासाठी घोड्यांची आरोग्य तपासणी. रायगडच्या पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार. जवळपास एक हजार घोड्यांना मिळणार हेल्थकार्ड. जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम. पर्यटक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल. या मोहिमेचा प्रारम्भ वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत झाला.0
0
Report
सातारा में तेज़ आंधी-बारिश से करीब 40 घर क्षतिग्रस्त
Satara, Maharashtra:सातारा : शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले. जवळपास ४० घरांचे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी विद्युत पोल आणि झाडे उन्मळून घरांवर पडल्याने नुकसान वाढले आहे. घटनेनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तात्काळ परिसराची पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एमएसईबी आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती हाताळून त्वरित निवारणाची कामे करण्याचे आदेश देण्यात आले.0
0
Report
Advertisement
अकोला में गर्मी के दबाव में पानी आपूर्ति शेड्यूल बदला गया; पांचवें दिन पानी मिलेगा
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात घटता जलसाठा आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता अकोला महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. शहरात तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा बंद करून आता पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या २६.३२ दलघमी म्हणजेच ३०.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि तीव्र उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी वाढत असून धरणातील साठ्यात सातत्याने घट होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.0
0
Report
जालना बैंक धोखाधड़ी: 140 करोड़ रुकी रकम, ठेवीदार तीन साल इंतजार करेंगे
Jalna, Maharashtra:जालना :राजस्थानी, ज्ञानराधा, स्नेहश्रीमध्ये ५ हजार ७३ नागरिकांची फसवणूक ६ बँकांचे १४० कोटी गोठवले; ठेवीदारांचे हक्काचे पैसे मिळण्यास तीन वर्षे लागणार आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई अँकर : जिल्ह्यात विविध बँकांमध्ये अपहार झालेला आहे. यातून हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन सहा बँकांची १४० कोटींची रक्कम गोठवली आहे. फसवणूक झालेल्यांना रक्कम परत मिळण्याच्या अनुषंगाने पाच बँकांचे ठेवीदारांचे हितसंरक्षण प्रस्ताव पाठवले आहे. मंजुरी, लिलाव, न्यायालय परवानगी, ठेवीदारांचे दावे पडताळणी याला जवळपास ३ वर्षे लागणार आहे. यामुळे घामाची रक्कम परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचा अजूनही तीन वर्ष वनवास असणार आहे. सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय, शेतकरी, निवृत्त कर्मचारी, महिला बचत गटांना बसला आहे. अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी, तर काहींनी वृद्धापकाळाच्या आधारासाठी ठेवलेल्या ठेवी आता अडकून पडल्या आहेत. दरम्यान, काही बँकांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याने ठेवीदारांमध्ये आशेची भावना निर्माण झाली आहे.0
0
Report
बदलापुर के व्हॉलीबॉल खिलाड़ियों के लिए 5% आरक्षण मांग, क्या मंजूर होगी घोषणा?
Ambernath, Maharashtra:सरकारी सेवेत व्हॉलीबॉल खेळाडूंना पाच टक्के आरक्षण द्या\n\nआमदार किसन कथोरे त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n\nबदलापुरातील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने केली मागणी\n\nयावेळी त्यांनी पूर्वी व्हॉलीबॉल खेळाडूंना पाच टक्के आरक्षण होतं मात्र त्यानंतर ते बंद झालं असं सांगत हे आरक्षण पुन्हा सुरू केल्यास खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय.\n\nयंदाच्या वर्षी पहिल्यांदाच बदलापूर शहराला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा मान मिळालाय. राज्य सरकारचा क्रीडा विभाग आणि बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा शानदार शुभारंभ आ. कथोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, व्हॉलीबॉल जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातील एकूण 32 संघ आणि जवळपास 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. 13 मे 17 मे असे पाच दिवस बदलापूर पश्चिमेकडील जिमखाना मैदानात ही स्पर्धा होणार आहे.0
0
Report
Advertisement
पुणे में ज्ञानेश्वर पालखी भवानी पेठ में तय, देवस्थान ने समय-सारणी जारी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:याबाबत अखेर आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं होणार आहे. आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब दिलं. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करुन, परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं असून तशी प्रक्रिया ही सुरु झालीये, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.0
0
Report
डोंबिवली की भावना इमारत खाली कराने नोटिस से 29 परिवारों में सनसनी
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील भावना इमारत खाली करण्याच्या नोटिसीने रहिवासी हवालदिल, केडीएमसी मुख्यालयात धाव.. डोंबिवली पूर्वेतील मुखर्जी रोडलगत असलेल्या चार मजली भावना इमारत खाली करण्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिकेकडून बजावण्यात आल्याने 29 कुटुंबातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी इमारतीतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि लोकप्रतिनिधींना भेट घेत निवेदन सादर केले. 2002 मध्ये महापालिकेने इमारत तोडण्याची नोटिस दिल्यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने इमारत तोडण्यास स्थगिती दिली होती. कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संबंधित व्यक्तीने मागे घेतल्याने उच्च न्यायालयातील स्थगिती आदेश रद्द झाला.यानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी इमारत खाली करण्याची नोटिस बजावली आहे. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून इमारत उभारण्यात आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला असून रहिवाशांनी १५ दिवसांत इमारत खाली न केल्यास पाडकामाचा खर्च वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच रहिवाशांनी सहकार्य न केल्यास पोलिस बळाचा वापर करण्यात येईल, तसेच वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे इमारतीतील 29 कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका आम्हाला बेघर करणार असेल तर आम्ही जायचे कुठे ? असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.0
0
Report
NEET प्रकरण: CBI ने शुभम खैरनार के घर पर छापा मारा
Nashik, Maharashtra:- नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत CBI ऍक्शन मोडवर... - शुभम खैरनार याच्या घरी जाऊन झाडाझडती सुरू.. - आरोपी शुभम खैरनार याच्या नांदगाव येथील घरी CBI आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती... - अधिकाऱ्यांकडून कमालीची गोपनीयता.. - NEET प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार यांच्या नांदगाव येथील घरी CBI चा छापा.... - एक तासाहून अधिक वेळेपासून शुभम च्या कुटुंबीयांची चौकशी सुरू... - CBI पथक व स्थानिक पोलीस यांच्याकडून शुभम च्या घराची झाडाझडती सुरू... - NEET प्रकरणात शुभमच्या घरून काही धागे दोरे लागतात का ? हे पाहणे महत्वाचे... - NEET पेपर प्रकरणात शुभम खैरनार यास काल CBI च्या पथकाने ताब्यात घेतले होते...0
0
Report
Advertisement
27 गांवों के पानी की समस्या छह महीने में खत्म होगी, शिंदे ने दी जानकारी
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांचा पाणी प्रश्न मिटणार. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती. 27 गावांमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून वाढीव 50 कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केलाय. त्यासाठीचा अध्यादेश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने महापौरांना सादर करण्यात आला. शिवाय महापालिकेच्या 50 कोटी अशा जवळजवळ 100 कोटीच्या माध्यमातून 27 गावातील पाणी समस्या सहा महिन्यात संपेल अशी माहिती शिंदे यांनी दिली. जुन्या जलवाहिन्या बदलून पानीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 268 कोटीचा प्लॅन महानगरपालिकेने तयार केलाय. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे कसे उभे करायचे यावर कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.0
0
Report
नीट पेपर फूटे मामले में धनंजय लोखंडे गिरफ्तार, पूछताछ शुरू
Ahilyanagar, Maharashtra:नीट पेपर फूटे प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर या गावातील धनंजय लोखंडे याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याला न्यायालयात नेण्यात आले आहे. न्यायालयातून त्यांना ट्रांझिट रिमांड घेऊन लोखंडे यास सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन जात आहेत. लोखंडे यांची दिवसभरामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्यासोबत इतर दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतले होते मात्र त्यांच्या चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.0
0
Report
नांदगाव विधानसभा चुनाव केस: छह अपराधी और गवाह अदालत में पेशी
Nashik, Maharashtra:नांदगाव (नाशिक): ब्रेकिंग विशाल मोरे नांदगाव विधानसभा निवडणुक काळात दाखल ६ गुन्ह्यासंदर्भात आज नांदगाव न्यायालयात या गुन्ह्यासदर्भात साक्षीदारांची साक्ष... विधानसभा निवडणुकातील उमेदवार आ.सुहास कांदे, समीर भुजबळ, गणेश धात्रक, डॉ.रोहन बोरसे आज न्यायालयात हजर.. गुणे दाखल प्रकरणात फिर्यादी आणि साक्षीदार तपासणी... एकूण ६ गुन्ह्यांमधील आरोपी आणि साक्षीदार न्यायालयात हजर... नांदगाव न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ; न्यायालयाला छावणीचे स्वरूप.. या सहाही गुन्ह्यातील आरोपींना पुढील ३ जून या तारखेस पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश... नांदगाव नगरपरिषद कर्मचारी व गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी या प्रकरणात केली होते गुन्हे दाखल.. यातील एका प्रकरणात साक्ष नोंदविण्यात आली.. नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम.अग्निहोत्री यांच्यासमोर खटल्याचे आजपासून कामकाज सुरू0
0
Report
Advertisement
Satara: अचानाक बारिश ने किसानों को बड़ा नुकसान, 18 भेड़ें मृत
Satara, Maharashtra:सातारा -सातारा शहरासह ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे...वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं..., या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठं अस्मानी संकट कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे...माण तालुक्यातील म्हसवड येथील हनुमंत मासाळ हे सध्या कोंडवे गाव परिसरात मुक्कामी राहत आहेत...शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गेले असताना अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने मोठा अनर्थ घडला...विजेच्या धक्क्याने तब्बल 18 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे...आधीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यावर आता अवकाळी पावसाचं नवं संकट कोसळलं आहे...शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हनुमंत मासाळ यांनी केली आहे...0
0
Report
CIDCO अधिकारी रिश्वत लेते गिरफ्तार; Navi Mumbai ACB की ठोस कार्रवाई
Navi Mumbai, Maharashtra:CIDCO के अपर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप 22,500 रुपये रिश्वत लेते हुए Navi Mumbai में गिरफ्तार हुए। उनके साथ उनके शिपाई हरेश सोनवणे को भी रंगे हाथ पकड़ा गया। आगे की कार्रवाई Navi Mumbai ACB यूनिट कर रही है।0
0
Report
केमिस्ट-ड्रिगिस्ट संघ ने 20 मई को 24 घंटे की देशव्यापी बंदी का आह्वान किया
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- विविध मागण्यांसाठी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 20 मे रोजी देशव्यापी व्यापार बंद चा इशारा, देशभरातील साडेबारा लाख केमिस्ट दुकाने केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणावरोधात राहणार बंद अँकर:-- विविध मागण्यांसाठी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 20 मे रोजी देशव्यापी व्यापार बंद चा इशारा देण्यात आलाय. या संपात देशभरातील साडेबारा लाख केमिस्ट दुकाने केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणावरोधात 24 तासांसाठी बंद राहणार आहेत. चंद्रपुरात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी ही माहिती दिली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये या बंदकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा पुरवठा सुकर व्हावा यासाठी नंबर जारी करण्यात आले आहेत. ऑनलाइन औषध विक्री बंद करा कार्पोरेट औषधे निर्मिती कंपन्या द्वारे अव्यावसायिक सवलती बंद करा बनावट औषधी पासून देश वाचवा या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.0
0
Report
Advertisement
