icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तळकोकण में बारिश रुकी, किसान की लावणी फसलें खतरे में—नुकसान की आशंका

Oras Bk., Maharashtra:तळकोकणात मागील पाच दिवस पावसाने दडी मारलीय त्यामुळे तळकोकणातील बळीराजाच्या चिंतेत वाढ झालीय. तळकोकणात सद्या भात लावणीची काम सुरु आहेत. काही प्रमाणात लावणीची काम शिल्लक असताना पावसाने दडी मारल्याने लावणीची काम खोळबलीत त्यासोबत बळीराजाने लावणी केलेली रोप देखील कोमेजून गेलीत. येत्या दोन दिवसात पाऊस आला नाही तर मात्र बळीराजाची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. कोमजलेली रोप कडक उन्हामुळे सुकून जाण्याची दाट शक्यता आहे. सुरवातीच्या काळात लपंडाव करणाऱ्या पावसाने ऐन लावणीच्या मोसमात दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झालीय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report

सांगली में संत ज्ञानेश्वर पालखी दिंडी हादसे में तीन महिला श्रद्धालुओं की मौत

Sangli, Maharashtra:स्लग - दिंडीतील वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेने सांगली जिल्ह्यावर शोककळा,गावं बंद ठेवत श्रद्धांजली. अँकर - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात झाला आहे.ट्रक अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे,तर ३ वारकरी जखमी झाले आहेत,मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज,मालगाव आणि कवलापूर येथील महिला वारकरयांचा समावेश आहे.नंदा पवार वय 60,माधवी राजाराम सलगरे वय 55,राजश्री शंकर भोसले वय 55,अशी मृत वारकरी महिलांची नावे असून घटनेमुळे तिन्ही गावांमध्ये शोककाळा पसरली असून वारकरयांच्या मृत्युच्या घटनेची माहिती मिळताच,गावामध्ये बंद पाळण्यात आले आहे.१५० हुन अधिक वारकरी हे 6 जुलै रोजी कसबे डिग्रजच्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडीतून आळंदीला गेले होते,दिंडीचा आजचा पाचवा दिवस होता.मात्र पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर दिंडीवर काळाने घाला घातला आहे,या घटनेमुळे सांगली जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून मृत पावलेल्या वारकऱ्यांना राज्य शासनाने भरघोस मदत करावी व दिंडीमध्ये वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावेत,अशी मागणी कसबे डिग्रज येथील वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

शालार्थ आयडी घोटाला: धुळे में बनावट IDs से 160 करोड़ रुपये का अपहार उजागर

Nashik, Maharashtra:२५ लाखांत 'शालार्थ आयडी' विक्रीचा पर्दाफाश शिक्षण विभागातील 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात बनावट आदेश तयार करणाऱ्या प्रशांत वाडिले याला पोलिसांची कोठडी. धुळे येथील मध्यस्थ संशयित प्रशांत तुकाराम वाडिले याला नाशिकरोड न्यायालयाने १७ जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. वाडिले याने धुळ्यातील एका शिक्षण संस्थेतील सहा जणांना बनावट आयडी मिळवून देण्यासाठी दीड कोटी रुपये उकळले. बनावट 'शालार्थ आयडी' तयार करून देण्यासाठी प्रतिव्यक्ती २० ते २५ लाख रुपये उकळल्याचे तपासात समोर. शिक्षकांचे वैद्यकीय बिले मंजुरी आणि वेतनाची फरक बिले काढून देण्यासाठी आरोपी ५० टक्के कमिशन घ्यायचा. आरोपी वाडिले याने या बेकायदेशीर पैशांमधून धुळ्यात चार गुंठ्यांत तब्बल तीन कोटी रुपयांचा अलिशान बंगला बांधला. 'बॅकडेटेड' आदेश दाखवून शासनाच्या तिजोरीतून सुमारे १६० कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १६ संशयितांवर सबळ पुरावे.
0
0
Report
Advertisement

मानसून देर से आया, भंडारदरा में भात की खेती शुरू, किसान चिंतित

Shirdi, Maharashtra:अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटात पावसाची संततधार सुरू असून घाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लागवडीला सुरुवात झाली आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने भात लागवड देखील उशिरा सुरू झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्यात तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिवार पावसाचे माहेरघर समजला जातो. हे ठिकाण पावसाचे ठिकाण असल्याने प्रमुख पीक भात आहे.या परिसरातील नागरिकांनी भाताची लागवड सुरू केली आहे.यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आणि कमी प्रमाणात पाऊस पडल्याने भात लागवड उशिरा सुरू केली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. भंडारदरा परिसरातील भात लागवडीच्या शेतीतून भात लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.
0
0
Report

अयोध्या राम मंदिर दान घोटाले पर उद्धव ठाकरे के नागपुर रामरक्षा पाठ का विवाद

Nagpur, Maharashtra:अयोध्येतील राम मंदिर मधील देणगी अफरातफर प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे जरी नागपूर रामरक्षा पठण करणार असले, तरी अद्यापही नागपुरातल्या कुठल्या मंदिरासमोर हे राम रक्षा पठण करावे हे निश्चित झालेले नसल्याची माहिती आहे.. नागपूरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजाबाक्षा राम मंदिर सह शहरातील इतर काही राम मंदिरांबद्दल सल्ला दिला आहे... मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजून मंदिर निश्चित झालेलं नाही... दुसऱ्या बाजूला रामनगर येथील राम मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू स्पष्ट करत उद्धव ठाकरे रामनगर येथील राम मंदिरात राम रक्षा पठाण साठी येणार असल्याची कोणतीही माहिती आम्हाला नसल्याचे सांगितले आहे... येथे कोणीही यावे, आम्हाला त्याचा कोणताही विरोध नाही. मात्र मंदिरात रामरक्षा म्हणावी आणि शांततेत बाहेर जावे. आंदोलन करण्याची जागा नाही. मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. दरम्यान, आंदोलनााच्या परवानगीबाबत आम्हाला अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. जेव्हा पत्र येईल, तेव्हा आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे मत व्यक्त झाले आहे...
0
0
Report
Advertisement

नागपुर के नेशनल लॉ विश्वविद्यालय में रैगिंग मामले में चार छात्र गिरफ्तार, विरोध जारी

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठात विद्यार्थ्याच्या अटकेवरून आंदोलन.. - कथित रॅगिंग प्रकरणाचा आरोपवर चार विद्यार्थ्यांना बुटीबोरी पोलिसांनी अटक केल्यानंतर विद्यापीठ परिसरातील वातावरण तापले होते... - विद्यापीठ परिसरात पक्षपात, श्रेयवाद आणि भेदभावाचे वातावरण निर्माण झाल्यावरचा विद्यार्थ्याचा आरोप.. - अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या कारवाई विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.. - रॅगिंगची घटना ही केवळ परिचय आणि चिडवण्यापुरती मर्यादित होती. त्यामुळे या प्रकरणाची प्राथमिक चौकशी विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग समितीकडून होणे अपेक्षित होते.. - मात्र थेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रॅगिंग विरोधी नियमावलीनुसार अंतर्गत यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे..
0
0
Report

बीड़ में आजोबा नाती की भेट का दैदीप्यमान सोहळा, हजारों श्रद्धालु पहुंचे

Beed, Maharashtra:बीड शहरातील बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदिप्यमान सोहळा.. भक्ती प्रेमाच्या आनंद सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. Ac - बीड शहरातील बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदीप्यमान सोहळा पार पडला.संत मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांची बीडमध्ये समाधी आहे. आज संत मुक्ताई च्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर आजोबा गोविंद पंतांच्या समाधीजवळ संत मुक्ताईच्या पादुका देण्यात आल्या यावेळी मुक्ताईला साडी चोळीचा आहेर देण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी बीड शहरातील नागरिक आणि मुक्ताई सोबत आलेले हजारो वारकरी आजोबा नातीच्या भेटीच्या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी केली होती. संत गोविंद पंतांच्या समाधी मंदिराच्या वतीने मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचा सन्मान करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज व भावंडांचे आजोबा गोविंद पंत याची बिंदुसरेच्या तीरावर समाधी आहे. गेल्या तीनशे वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताईची पालखी बीड शहरातून पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना हा आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा मोठा प्रेमळ अंतकरणाने साजरा केला जातो. साडीचोळी भेट देऊन संस्थांच्या वतीने स्वागतही केलं जातं.त्यामुळे तीनशे वर्षाची अनोखी आजोबा नातीच्या भेटीची परंपरा अत्यंत प्रेमाने साजरी केली जाते मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले. बाईट- रवींद्र महाराज हरणे (पालखी सोहळा प्रमुख)
0
0
Report

श्रीगोंदा में रिश्ते के विवाद के कारण तलवार से हमला; हाथ कटे; 6 आरोपी गिरफ्तार

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगराच्या श्रीगोंदा तालुक्यात भावकीचा वाद उफाळून आला असून या वादात एकावर तलवारीने हल्ला करत त्याचे हाताचे पंजे तोडल्याचे गंभीर घटना घडली आहे...श्रीगोंदा येथील सुपेकर वस्तीवर हा धक्कादायक प्रकार घडला असून घुगल वडगाव येथील रोहिदास दांगडे हे गंभीर जखमी झालेत... रोहिदास दांगडे आणि त्यांच्या भावकीतील विक्रम दांगडे सागर दांगडे संग्राम दांगडे यांच्याशी गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहेत या वादातून यापूर्वी एकमेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत मात्र याच वादाच रूपांतर गंभीर हाणामारीत झाला असून यात रोहिदास दांगडे यांचे दोन पंजे आहेत या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलााय...रोहिदास दांगडे यांची मुलगी राधिका दांगडे हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार परशुराम दांगडे, अभयराज दांगडे , सागर उर्फ प्रदीप दांगडे दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे , संग्राम उर्फ तात्याराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...विक्रम दांगडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे , तर इतर आरोपी फरार झाले आहेत...मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे...पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत。
0
0
Report
Advertisement

श्रीरामपूर में अपराध बढ़े: नेताओं ने पुलिस पर उठाए सवाल

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून आता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले आणि राजकीय नेत्यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुन्हे करणारे हे केवळ मोहरे असून, या संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा 'आका' कोण आहे, हे प्रशासनालाही माहिती असल्याचा दावा त्यांनी झी 24 तासाशी बोलतांना केला. मात्र, त्या सूत्रधाराचे नाव घेणे आमदारांनी टाळले. पोलिसांनी थेट त्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून कारवाई करावी, अशी मागणी केली. हिंदुत्वाच्या नावाखाली काही जण दोन नंबरचे व्यवसाय आणि गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. श्रीरामपूरात दोन-तीन टोळ्यांनी दहशत निर्माण केली असून, या विरोधातील बेमुदत बंद आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आजी माजी आमदारांसह, माजी खासदारांनी दिला आहे. आंदोलन स्थळावरून आढावा घेत आजी माजी आमदार आणि माजी खासदारांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report

बारसे से पहले विवाहिता ने घर में फांसी लगा कर आत्महत्या कर दी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरात छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २३) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकी झाली असून राजारामपुरी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने कुटुंबीयांचा नातेवाईकांना धक्का बसला आहे. मूळच्या आजरा तालुक्यातील लाटगाव तिथल्या अस्मिता यांचा वर्षभरापूर्वीच प्रतीकसीह काटकर त्यांच्याशी विवाह झाला होता. महिन्यापूर्वी अस्मिता यांची प्रसूती झाली होती. मुलीला एक महिना पूर्ण होत असल्याने घरात बाळाच्या बारशाची तयारी सुरू होती. रविवारी दुपारी सासू सासरे आणि पती कार्यक्रमासाठी हॉल ठरवण्यासाठी गेले होते, यावेळी अस्मिता यांनी छताला असलेल्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. काही वेळाने पती सासू-सासरे घराकडे परतले. पण आतून दरवाजा बंद असल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडल्यानंतर अस्मिता यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे दिसले. अस्मिता यांनी आपल्या लेकीला सोडून गळफास का घेतला ? याचा शोध राजारामपुरी पोलीस करत आहे。
0
0
Report

सोलापुर के मालशिरस में राजस्व विभाग की बड़ी कार्रवाई: सवा करोड़ रुपये कीमत की विदेशी शराब जब्त, दो गिरफ्तार

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. साळमुख चौकात उशिरा रात्री टाकलेल्या धाडीत तब्बल सव्वा कोटी रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने साळमुख चौकात सापळा रचला होता. यावेळी सांगोला मार्गे धुळेकडे जाणारा एक संशयित ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रकसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या विदेशी दारूची अंदाजे किंमत सव्वा कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत ट्रकमधील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही दारू नेमकी कुठून आणण्यात आली होती आणि ती कुठे पोहोचवली जाणार होती, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top