445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पनवेल में स्मार्ट मीटर विरोध: मनसे आक्रमक, मीटर फोड़े गए
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मद्ये बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात मनसे आक्रमक झाले आहेत, दिपेश पोपेटा मनसे उपतालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महावितरण कार्यालयात जाब विचारण्यासाठी आला, स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल दुप्पट येत आल्याने मीटर फोडून याचा निषेध करण्यात आला0
0
Report
पंचगणी में विश्व पर्यावरण दिवस: वृक्षारोपण से रक्तदान तक पर्यावरण जागरण
Satara, Maharashtra:सातारा - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाचगणी टेबललँड येथे भेट देऊन टेबललँड माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान जनजागृती, पथनाट्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन झाले.संत निरंकारी मंडळ (दिल्ली झोन-सातारा) आणि पाचगणी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.0
0
Report
यवतमाळ में बदस्तूर हत्या: 24 घंटों में दो हत्या, शहर में दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये खुनाचे सत्र सुरूच असून आता 24 तासात दोन हत्या तर दोन प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. जामणकर नगर एका युवकाला घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार करून ठार करण्यात आले. तर पांढरी येथे पाण्याचा वापर करण्याच्या किरकोळ कारणावरून पोटच्या मुलाने वृद्ध बापाला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली. आर्णी रोडवर एका तरुणावर शस्त्राचे घाव घालून त्याला जखमी करण्यात आले तर दिग्रस येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आले. हत्येच्या घटनेने जिल्हा हादरला आहे.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर अस्पताल में सर्पदंश से 3 वर्षीय की मौत, इलाज में देरी पर हंगामा
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात तीन वर्षाच्या चिमुकल्याला साप चावल्याने मृत्यू वेळेत उपचार नमिळल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप मध्यवर्ती रुग्णालयात कुटुंबांचा मोठा गोंधळ उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या 3 वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. यावेळी कुटुंबियांनी जो साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाला तो सापच पकडून रुग्णालयात घेऊन आले त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला, याआधीही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा अभावी नवजात बालकांच्या मृत्यूच्या आणि रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत, मुलाचे नातेवाईक0
0
Report
कल्याण में नाले सफाई में नाबालिग का दोहन: ठेकेदार पर कड़ी कार्रवाई की तैयारी
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत नालेसफाई एका अल्पवयीन मुलाकडून करून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली परिसरात नाले सफाईचे काम सुरु आहे. पैसे वाचवण्यासाठी ठेकेदार सुरक्षा साहित्य दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात ठेकेदाराचा विरोधात ठोस आणि कडक कारवाई करणार असल्याचे उपमहापौर राहूल दामले यांनी सांगितले. या घटनेवरून केडीएमसी अधिकारीांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकारी यांचे नालेसफाईच्या कामावर लक्ष आहे का? नालेसफाई कशी होते? त्याच बरोबर ती कोणाकडून केली जाते हे पाहणे केडीएमसी अधिकाऱ्यांचे काम आहे.0
0
Report
मुरबाड पुलिस ने अवैध हाथभट्टी शराब के तीन ठिकाने ध्वस्त, 1.2 लाख मूल्य शराब बरामद
Ambernath, Maharashtra:१ लाख २० हजारांची हातभट्टीची दारू केली नष्ट मुरबाड पोलिसांची कामगिरी दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले पुण्यातील विषारी दारू प्रकरणांने संपूर्ण महाराष्ट्रात हादरून गेलाय. या पाश्र्वभूमीवर मुरबाड पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत, आज मुरबाड पोलिसांनी खोपिवली गावाच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू निर्माण करणाऱ्या तीन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत १ लाख २० हजार किमतीचे गुळ मिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आले असून सुमारे ८० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मुरबाड पोलीस प्रशासनामार्फत अवैध दारू व्यवसाया विरोधातील कारवाया पुढेही अशाच करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली।0
0
Report
Advertisement
पुणे के शिरूर में मानसूनपूर्व बारिश से कहर, होटल के फर्नीचर उड़े, फसल नुकसान
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहर आणि परिसराला आज वादळी वाऱ्याच्या मान्सूनपूर्व पावसाने झोडपलंय, वादळी वाऱ्याच्या या पावसाने चक्क हॉटेलमधील खुर्च्या टेबल महामार्ग वर उडून आलेले पाहायला मिळाले असून या वादळी वाऱ्यााच्या पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरांचे फळबागांचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंयं..0
0
Report
मंचर कांदा आंदोलन पर FIR, किसानों के खिलाफ कार्रवाई तेज
Shirur, Maharashtra:आंबेगाव पुणे... पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलन करणं आंदोलकांना भोवलंय, पुणेच्या मंचर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि 200 ते 250 अज्ञात आंदोलन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी पुणे नाशिक महामार्ग लगत सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या सभेनंतर आंदोलकांनी थेट पुणे नाशिक महामार्गावर उतरून आंदोलन केलं, सार्जनक वाहतूक व्यवस्था विस्कळीत करत शांतता भंग करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याच मंचर पोलिसांनी FIR मध्ये म्हटलंय, गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वरती ट्विट करत मंचरमधील आंदोलनাপ्रकरणी देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. कांद्याचा दर वाढावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर FIR करणे शोभते का ? सरकार सत्तेच्या जोरावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा करत असलेला प्रयत्न शोभनीय नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे. अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय...0
0
Report
राजेंद्र राऊत का दावा: सोलापुर विधान परिषद में भाजपा की जीत पक्की
Pandharpur, Maharashtra:महायुती के मते तर मला मिळतीलच पण महाविकास आघाडीच्या मतदारांची मते ही आपल्या सोबत असतील कारण सर्वच पक्षात आपले चांगले संबंध आहेत. असा आशावाद सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं तसेच उमेदवारीच्या शेरीत असलेले प्रशांत परिचारक यांची सुद्धा भेट घेतली. सोलापूर विधान परिषदेच्या मतदानामध्ये आपल्याला सव्वा पाचशे ते साडेपाचशे मतदार मतदान करतील त्यामुळे ही निवडणूक एकतर्फेहून आपला विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे0
0
Report
Advertisement
नांदेड के धर्माबाद में किसानों का बंद, मांगें पूरी न होने पर आंदोलन शुरू?
Nanded-Waghala, Maharashtra:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. धर्माबादची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या बंदची हाक देण्यात आली आहे. पिक विम्याची रखडलेली रक्कम तात्काळ वितरित करावी, डीएपी व युरिया खतांचा काळाबाजार रोखावा, ट्रॅक्टर साठी डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे यास इतर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी धर्माबाद कडकडीत बंद ठेवण्यात आला.0
0
Report
IMA बुलढाणा शाखा के नाम पर बनावट लेटरहेड से 3.23 लाख के गबन का मामला
Buldhana, Maharashtra:Buldhana Indian Medical association Buldhana shakh me arthik garvabhacharacha aarop; don doctoranvar gunha dakhala Banavat letterhead v shikkyancha vapr karun 3.23 lakhanchya apaharacha aarop.. Anchor - Indian Medical Association (IMA) Buldhana shakhachya navane banavat letterhead, shikke ani padacha garaavapooran vapr karun arthik apahar kelyaprakarni Dr. Ajit Sirsaath va Dr. Gazendra Nikam yananchyavirodha Buldhana shahar polisa thanaat gunha dakhla jhala aahe. Firyadi Dr. Jadusing Rajpoot yanayachi takraryanusar, aaropi anur sarkari padavar nasatanaahi adhikrit padavaras ahsasvaat sansthechya navane patravyavahar kela ani bank vyavaharat hastakshep kela. IMA chya khataatun 3 lakh 23 hajar 716 rupayanchya apahaaracha aarop ahe, nyayalayachya aadesh anusar vividh kalmanda gunha nondavnyat aala aahe. Ya prakaracha pudhil tapas polisa upanirsak Ravi More karit aahet.0
0
Report
परळी में हत्या मामले के आरोपियों के घर बुलडोजर चलेगा: मुस्लिम समुदाय की मांग
Beed, Maharashtra:बीड: परळीतील तोहिद पठाण हत्या प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा; मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकारीांची भेट घेतली. बीडच्या परळीत झालेल्या तोहिद पठाण हत्या प्रकरणात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. यातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी करत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. परळीतल्या तोहीद पठाण या 36 वर्षीय तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घुण हत्या केल्याचं समोर आलं. हत्या केल्यानंतर तोहीदचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला. सुरुवातीला सदरील प्रकार अपघात वाटला होता. मात्र पोलिसांच्या तपासात तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं. दरम्यान पठाण कुटुं embodimentsला न्याय मिळावा. या मागणी करिता मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली. इतर संबंधितांवर कारवाईची मागणी केली जाते. आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी होतेय.0
0
Report
Advertisement
Kolhapur की गोकुळ चुनावी लड़ाई में शिवाजी पाटील ने उठाए सवाल
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात नवीन संघर्ष उफाळून आला आहे. भाजप समर्थक आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोकुळ निवडणुकीसंदर्भात झालेल्या महायुतीच्या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणातून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आमदार शिवाजी पाटील म्हणाले की आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला गोकुळच्या बैठकीला बोलावलं नाही.. हसन मुश्रीफ यांना बोलावलं.. पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुमित कदम यांना बोलावलं.. कोल्हापूर जिल्ह्याचा, गोकुळचा सुमित कदम यांचाशी संबंध नाही.. पण आम्हाला बोलावले नाही.. या जर आम्हाला जमेत धरत नसतील तर सतेज पाटीलला आमचे विरोधक नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यानंतर गोकुळच्या राजकारणातील संघर्ष किती टोकाला पोहोचला आहे याची प्रचिती येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे आणि अमल महाडिक उपस्थित होते. मात्र शिवाजी पाटील यांना निमंत्रण नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी केवळ गोकुळच्या राजकारणावरच भाष्य केले नाही, तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी दादानी नेमकं काय योगदान दिलं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पक्षांतर्गत नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे शिवाजी पाटील याच्या वक्तव्यापूर्वीच गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील यांनी देखील महायुतीवर टीका केली आहे. गोकुळच्या निवडणुकीत थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागतंे, हेच जिल्ह्यातील सत्तेचे नेते यांनी अपयश असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार शिवाजी पाटील यांनी यापूर्वी गोकुळमधील 1308 संस्था बोगस असल्याचा आरोप केला होता. या संस्था निवडणूक प्रक्रियेतून वगळण्याची मागणीही त्यांनी केली होती. पण नंतर या संस्थांना पात्र ठरवण्यात आले. यामागे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भूमिका असल्याचा आरोप शिवाजी पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, भाजप समर्थक आमदार असूनही शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीत नेमकी कोणती समीकरणे तयार होणार, आमदार शिवाजी पाटील खरोखरच वेगळी भूमिका घेणार का ? आणि महायुतीतील हा वाद किती वाढणार यावर गोकुळच्या सत्तेची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..0
0
Report
नाशिक के खडक मालेगाव में बिबटिया पोलिहाउस में घुसा, रेस्क्यू टीम ने जेरबंद किया
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे राहुल खंडेराव शिंदे यांच्या मिरचीच्या पॉलीहाऊसमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे गेल्या पाच तासापासून बिबट्या पॉलीहाऊसमध्ये असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मिरचीच्या पॉलीहाऊसमध्ये बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळताच निफाड येथील वन विभागाची रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी खडक माळेगाव येथे दाखल झाली बिबट्या अचानक उठून पॉलिहाऊस च्या बाहेर येण्यासाठी पळाला आणि पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी आणि वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुटकेचा निश्वास सोडला या बिबट्याला निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कडून तपासणी करून वरिष्ठांच्या आदेशानंतर बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली मात्र या दरम्यान शिमला मिरचीच्या पॉलिहाऊसचे आणि मिर्चीचे बिबट्याकडून मोठे नुकसान झाल्याने वन विभागाने ही संदर्भ भरून द्यावी अशी मागणी शेतकरी महिलेने केली0
0
Report
लातूर में आंधी-बारिश: मंडप उड़ने से कार्यक्रम प्रभावित
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी... लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात गेल्या अर्ध्या तासापासून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक गावांमध्ये वाऱ्याचा वेग वाढल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, किल्लारी येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडाल्याची घटना घडली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.0
0
Report
Advertisement
