445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली के कलगाव फाटे पर ट्रक दुर्घटना, नुकसान भारी
Hingoli, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या कलगाव फाट्याजवळील वळन रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय ट्रक वाशीमकडून हिंगोली मार्गे सोयाबीनच्या बॅगा घेऊन येत असताना चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन पडला यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे...0
0
Report
तुळजापूर में युवक पर धारदार हमला, आरोपी फरार, शहर में भय बढ़ा
Dharashiv, Maharashtra:तुळजापूरात पुन्हा तरुणावरती जीवघेणा हल्ल्याची घटना, मध्यरात्री तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला अज्ञात हल्लेखोराने पार्थ कन्हाडे या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर वार होताच बचावासाठी हात पुढे घेतल्याने युवकाच्या हाताच्या शिरा तुटल्या गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोर अद्याप फरार असून पोलिसांकडून तपास सुरू चार दिवसाखालीच तुळजापूर मध्ये एका तरुणाचा झाला होता खून तुळजापूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी0
0
Report
मालेगांव महापालिका ने मानसून पूर्व नाला सफाई शुरू की; वार्ड में 25 कर्मी
Malegaon, Maharashtra:*Fast - नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे* - मालेगाव महापालिकेकडून शहरात मन्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात. - पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासून नियोजनबद्ध करण्याच्या सूचना - प्रत्येक प्रभागासाठी २५ कर्मचारी, ५ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध. Anc: मालेगाव शहरात पावसाळ्यात पाणी साचू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मालेगाव महापालिकेकडून मन्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नाले आणि गटारांची साफसफाई नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. याअंतर्गत प्रत्येक प्रभागासाठी २५ कर्मचारी, ५ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी यंत्रसामग्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली के किसान ने गर्मी से डाळिंब बचाने के लिए क्रॉप कव्हर अपनाया
Hingoli, Maharashtra:डाळिंबाच्या बागा करपून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, हिंगोलीच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने यावर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. हिंगोलीच्या माळसेલू येथील शेतकरी राजेंद्र पाटील याच्या चार एकर डाळिंबाची बाग सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतेय. वाढत्या उन्हामुळे डाळिंबाची फळे काळी पडतात, त्यावर उन्हाची थेट किरणे फळावर पडत असल्याने डाग पडतात आणि पर्यायाने फळांचा दर्जा घसरतो. बाजारात अशा फळांना भाव मिळत नाही. हे संकट टाळण्यासाठी राजेंद्र पाटील यांनी आपल्या 1100 डाळिंबाच्या झाडांना चक्क 'क्रॉप कव्हर'चे अस्तरीकरण केले आहे यामुळे उष्णतेपासून या बागेचा बचाव होत आहे0
0
Report
रत्नागिरी में आंधी-बारिश ने मचाई तबाही, पेड़-झाड़ियाँ गिरने से नुकसान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्याला वादळी पावसाचा तडखा. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाविली ही होत असतानाच काल गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पुन्हा धुमाकूळ घातला. संगमेश्वर देवरुख आणि चिपळूण पट्ट्यात ढगांच्या गडगडात आणि विजांच्या कडकडात सह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले; सातत्याने पडणाऱ्या अवकाळी मुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. संगमेश्वरतालुक्यातील बुरंबित वीज कोसळून नारळाच्या झाडाने पेट घेतल्याची घटना घडली तर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.0
0
Report
नाशिक केस में निदा खान गिरफ्तार: 5 दिन बाद पुलिस ने हिरासत में लिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक प्रकरणातली आरोपी निदा खान गेली पाच दिवस छत्रपती संभाजीराजे राहत होती आणि तिथूनच तिला अटक करण्यात आलेली आहे. नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला अटकण्यात आलेली आहे. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर निदासांचे लोकेशन शोधण्यात आले आणि त्यातून तिला अटक करण्यात आलेली आहे. तिला नाशिक कडे रवाना करण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगरच्या नारेगाव भागातील कौसर पार्क या भागात एक जुनाट घरात निदा खान तिच्या आई-वडील बहीण मावशी सह राहत होती. आम्हा प्रतिनिधी विशाल करोळे यांनी आढावा घेतला.0
0
Report
Advertisement
बीड़ के उमापुर में मध्यरात्रि हुड़दंग: जेसीबी-हाईवा के शीशे टूटे, आग लगाई गई
Beed, Maharashtra:बीड : उमापूरमध्ये मध्यरात्री टोळक्याचा धुडगूस; जेसीबी-हायवाच्या काचा फोडल्या, कडब्याच्या गंजीला लावली आग..! बीडच्या गेवराई तालुक्यात उमापूर परिसरात मध्यरात्री अज्ञातांनी मोठा धुडगूस घालत राडा केलाय. उमापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर उभ्या असलेल्या जेसीबी मशीन आणि हायवा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, तर शेजारील कडब्याच्या गंजीलाही आग लावण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गेवराई नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली. नेमक्या कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याबात अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
जनसंघर्ष अर्बन निधि घोटाले में जप्त संपत्ति से 6200 खातेदारों को राहत
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेतील घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी प्रणित मोरेसह इतर आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना गृह विभागाने ४ मे रोजी जारी केली आहे. ४९ कोटींच्या अपहार प्रकरणातील जप्त मालमत्तेचा लिलाव झाल्यास सुमारे ६२०० खातेदारांना दिलासा मिळणार आहे. दिग्रस पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.0
0
Report
चंद्रपूर नगरपालिका: पुतले के कार्यक्रम में फेटा नहीं बाँधने पर चार अधिकारी निलंबित
Chandrapur, Maharashtra:टायटल :-- मनपाच्या कार्यक्रमात फेटे न बांधल्याचा ठपका,चंद्रपूर महानगरपालिकेतील चार कर्मचारी निलंबित अँकर :--- चंद्रपूर शहरात नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना फेटे न बांधणे, कार्यक्रमस्थळी बॅनर न लावणे तसेच पत्रिका वाटपात झालेल्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवत चंद्रपूर महानगरपालिकेतील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मनपा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
पिंपरी-चिंचवड: ट्रैफिक नियम तोड़ने पर 654 ड्राइविंग लाइसेंस निलंबन की तैयारी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 3743 नियम मोडणाऱ्या वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवलं आहे त्यामध्ये 654 वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, ड्रंक अँड ड्राईव्ह, विनाहेल्मेट वाहन चालवणे, बेदरकारपणे गाडी चालवणे अशा गंभीर नियमभंगांवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत असतात. वारंवार नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात आता थेट लाइसन्स निलंबनाची कारवाई केली जात आहे. वाहतूक विभागाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अपघात रोखण्यासाठी आणि रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले.0
0
Report
आंबा-काजू किसानों का मोर्चा: मुख्यमंत्री के विरुद्ध हेक्टेयर 5 लाख मांग
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग शेतकरी नेते राजू शेट्टी बाईट *ऑन : आंबा_काजू नुकसानभरपाई आंदोलन* आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन गेली अडीच महिने आम्ही सातत्याने संघर्ष करतोय. परंतु, सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आंबा उत्पादकांना केवळ हेक्टरी २२ हजार रुपये एवढीच मदत जाहीर केल. म्हणजे कलमाला २२० रुपये म्हणजे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. सरकारने नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी १५ हजार कोटींवरून २५ हजार कोटींची तरतूद केली आणि २५ हजार कोटींवरून ३५ हजार कोटींपर्यंत नेली. पण ५० वर्षांमध्ये पहिल्यांदा सरकारकडे न्याय मागणाऱ्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला मात्र ७०-७५ कोटी देऊन त्याची चेष्टा होय. त्यामुळे, आम्ही येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला हा मोर्चा आयोजित केलेला आहे कोकणवासीयांचा. मुंबईस्थित कोकणवासीय असतील किंवा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी असतील, या साऱ्यांना घेऊन आम्ही “वर्षा”वर धडकणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहोत. *ऑन: तुटपुंजी नुकसान भरपाईबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील आणि रत्नागिरीचे पालकमंत्री, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी लवकरच भूमिका जाहीर करू असे स्पष्ट* "लवकर म्हणजे कधी? कधी भूमिका जाहीर करणार आहे? काय मुहूर्त सापडत नसेल तर एखाद्या भटजीला जाऊन आम्ही विचारू का? कधी देणार आहात? एक तर २२० रुपये तर आम्हाला मान्य नाहीच. आमची मागणी आहे हेक्टरी ५ लाख रुपये, म्हणजे कलमाला ५ हजार रुपये ही मागणी आहे. तुम्ही देताय २२० रुपये. काजूला तर तुम्ही वाऱ्यावरच सोडलेलं आहे. काय अवस्था आहे आज काजू उत्पादकांची? आणि अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याला तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल, तर शेतकरी आता गप्प बसणार नाही. *ऑन : या आंदोलनाबाबत तुम्ही उद्धव किंवा राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आंदोलनाची दिशा व्यापक होणार का?* "हो, निश्चितच व्यापक होणार आहे. कारण केवळ राजकीय पक्षांनीच नव्हे, तर अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. जनआंदोलनाची जी कमिटी आहे त्यांनी पाठिंबा दिलाय, मुंबई मराठी भाषा संशोधन अभ्यास केंद्राने पाठिंबा दिला आहे. अशा अनेक सामाजिक संघटना आहेत. मुंबईस्थित जेवढे पण कोकणवासीय आहेत, त्या सगळ्यांनी पाठिंबा दिलाय. आमच्या बैठका चालू आहेत. मी स्वतः सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका, मेळावे घेतले आहेत. त्यामुळे मोर्चाची तयारी आमची जोरदार झालेली आहे. *ऑन: मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल का?* "मोर्चला किती लोक येणार आहेत हे मी आज सांगत नाही, पण सरकारला शॉक बसेल असा मोर्चा होणार एवढं नक्की."0
0
Report
ओतूर पुलिस ने वृद्धा के साथ मारपीट और चोरी करने वाले अपराधी को गिरफ्तार किया
Barav, Maharashtra:पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे घरात घुसून वृद्धाला मारहाण आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ओतूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कबीर काळे असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि हत्यार जप्त करण्यात आलंय. ओतूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होतंय.0
0
Report
Advertisement
सोलापूर के भद्र Baba के आश्रम में 28 लाख बिजली चोरी का मामला
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले च्या करमाळ्यातील घोटी येथील आश्रमात 2025 पासून चोरून वीज वापरली जात होती. याप्रकरणी महावितरण कडून 28 लाख रुपयांच्या वसुलीचे बिल आणि भोंदू मनोहर मामाची पत्नी रूपाली भोसले हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यानंतर आता त्याची पत्नी रूपाली भोसले यांच्या सुद्धा अडचणी वाढल्या आहेत. घोटी मधील ज्या आश्रमात अमावस्येला भक्तांची गर्दी असायची तिथे असणारी वीज भोंदू बाबा चोरून वापरत असल्याचे समोर आला आहे. घोटी आश्रमातील घरगुती वापराची वीज महावितरण कडून बंद करण्यात आली असून जवळपास 28 लाख रुपयांचे बिल दंडासहित रूपाली मनोहर भोसले यांना देण्यात आल आहे. याप्रकरणी रूपाली भोसले हिच्यावर वीज चोरी कायद्य 2003 च्या कलम 135 नुसार बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
मेलघाट जंगल में बुद्ध पूर्णिमा रात: 33 बाघों समेत सैकड़ों वन्यजीव दिखे
Amravati, Maharashtra:मेळघाट स्थित प्राण्यांची गणना पूर्ण; पर्यटकांनी 12 तास मचानावर बसून रात्री वन्यजीव निरीक्षणाचा थरार अनुभवला. एकूण 33 वाघांचे दर्शन झाले; बिबट, अस्वल, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चितळ यांसारखे शेकडो वन्यजीव दिसले. या उपक्रमात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व तेलंगणा राज्यातील पर्यटकांचा सहभाग होता. प्रत्येक पर्यटकासोबत वन कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था होती. चांदण्यांच्या प्रकाशात जंगलातील शांतता व वन्यजीवांचा अनुभव अविस्मरणीय ठरला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात 33 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 413 रानगवा, 856 सांबर, 121 नीलगाय दिसले. पांढरकवडा विभागात 3 वाघ, 2 बिबट, 164 रानडुक्कर, 25 अस्वल, 67 नीलगाय व 153 चितळ दिसले. अकोला विभागातही 16 बिबट, 25 अस्वल, 2 तडस, 23 कोल्हा, 60 रानडुक्कर, 202 चितळ व 365 नीलगाय0
0
Report
गोवा में बलात्कार के मामले देश में सबसे अधिक, NCRB रिपोर्ट चौंकाने वाली
Ratnagiri, Maharashtra:गोवा.. गोव्यात बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक.. 61% पीडित अल्पवयीन.. एनसीआरबीची आकडेवारी.. अँकर राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) क्राईम इन इंडिया 2024 अहवालानुसार गोव्यातील बलात्काराच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून देशातील सर्व राज्यांमध्ये गोव्याचा बलात्कार दर सर्वाधिक नोंदवला गेला आहे.. 2024 मध्ये गोव्यात प्रति लाख लोकसंख्येमागे 13.3 बलात्कार प्रकरणांची नोंद झाली असून हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 4.3 च्या तिपटीपेक्षा अधिक आहे.. देशात सर्वाधिक बलात्कार प्रकरणांची संख्या राजस्थानमध्ये नोंदवली गेली असून दर 12.5 इतका आहे.. तर चंदिगड मध्ये 16.6 असं सर्वाधिक दर नोंदवण्यात आला आहे.. 2024 मध्ये बलात्कारांची 105 प्रकरणे नोंदवली गेली या प्रकरणात एकूण 106 पिडीतांचा समावेश असून पैकी 65 म्हणजे जवळपास 61 टक्के पीडित अल्पवयीन आहेत.. उर्वरित 41 पीडित महिला प्रौढ वयोगटातील आहेत.. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्येही गोव्याचा दर प्रति लाख लोकसंख्येमागे 8.1 इतका आहे..0
0
Report
Advertisement
