445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
FDA ने महाराष्ट्र में मिलावटखोरों पर बड़ी छापेमारी, 43 लाख कीमत का साठा जप्त
Shirur, Maharashtra:राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळमाफियांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि हॉटेल्सवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेत तब्बल १४ हजार ५४ किलोग्रॅम दुग्धजन्य पदार्थ आणि २४ हजार ६३२ लिटर संशयास्पद दूध जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत सुमारे ४३.३१ लाख रुपये असून, हा संपूर्ण भेसळयुक्त साठा जनारोग्याच्या हितासाठी नष्ट करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील ८२ हॉटेल्स आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ९ मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर ३३ हॉटेल्सना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतल्या फूडविस्टा इंडिया (Fresh Menu) आणि पुण्याच्या बाणेर-पाषाण भागातील National 360 व Happy Da Dhaba या नामांकित हॉटेल्सवरही परवाना निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा विक्रीप्रकरणी १३ गुन्हे दाखल करून १२ जणांना अटक करण्यात आली असून, ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांना काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.0
0
Report
नागपूर: 36 हजार करोड़ के कर्ज माफ़ी से 56 लाख किसानों को लाभ
Nagpur, Maharashtra:नागपूर - सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते On कर्जमाफी - - आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, मी जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो मी कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यात उल्लेख केला होता जनतेला खास करून शेतकऱ्यांना वचन दिलं होतं जनतेने विश्वास व्यक्त करीत माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्हाला निवडणुकीत आशीर्वाद दिला - 36 हजार कोटींची कर्जमाफी घोषित केली, 56 लाख शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे याच्या अटीच्या बाबतीत काही सदस्यांच्या मागण्या होत्या आग्रह होता की याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या सर्वांचे अभिनंदन शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार सरकारच्या वतीने केला आहे On संजय राऊत - - त्यांच्या बाबत बोलणं योग्य नाही, त्यांना या संदर्भातील जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे - मला वाटत नाही की केंद्र नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल - मी तेच सांगतो आहे की राज्यात कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी असे वक्तव्य केले जातात On सावरकर भारतरत्न - - मी पाच मार्चला सभागृह ठराव मांडला होता ठराव मांडताना मला शासनाच्या वतीने आश्वासन दिलं होतं, ज्यांच्या विचारावर आम्ही राजकारणात भाजपमध्ये काम करतोय आज त्यांच्या ठरावालाही दोन अधिवेशन जाणं हे योग्य नाही - मी ज्या पक्षाचा झेंडा हाती घेतला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करणारा आहे, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारांचा उल्लेख करतात, आम्हाला फक्त ठराव करून केंद्राकडे पाठवायचा होता On उद्धव ठाकरे रामरक्षा पठण - - मला वाटतं असं कोणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे, मी तर रोजच करतो मुंबईचे माझ्या घरी म्हणून हा काही उद्धवजींना इशारा नाही, कोणाला काय विरोध आहे रामरक्षा म्हटल्याने चुका आहेत ज्या चुका आहेत प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती देतील On सोयाबीन बोगस बियाणे - - सोयाबीनच्या बाबतीत दुर्दैवाने आपलं राज्य बियाणं बनवणंमध्ये मागे आहे, आपण मध्य प्रदेश म्हणून साधारणता सोयाबीन बियाणे आणतो आणि यामध्ये मग कमी उगवणार बियाणं शेतकऱ्यांच्या नशिबी येतं, तेलंगणातून एचटीबीटी हे आपण तिथून तस्कर विकतात तिथे अडचणी आहेत - म्हणून मी बी -बियाण्याच्या बाबतीत अशासकीय विधेयक आणलं, त्याबाबत बैठक झाली आहे आपला प्रयत्न आहे की अप्रमानिक बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये - शासनाने गंभीर रीतीने या प्रकरणी कारवाई केली पाहिजे - बोगस बी बियाण्याचं अशासकीय विधेयक मांडल्या माझी भूमिका शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, मी दोन सूचना केल्या आहेत, आर्थिक फसवणुकीसाठी जसा आपण करतो तर तसेच कृषी क्षेत्रात आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची चौकशी करून फास्टट्रॅक कोर्टात केस चालवायला पाहिजे, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच फास्टट्रॅक कोर्ट करणे - करण न्याय द्यायला दहा वर्षे लावले तर तो शेतकरी वाट पाहू शकत नाही On Cag अहवाल - - मला याची माहिती नाही, वाचल्यावर मी सांगणार On सुप्रिया सुळे पर्यायी मतदारसंघ - - आताच यावर मतं वक्त करणे बरोबर नाही, डी लिमिटेशन व्हायला संसदेत पुन्हा बहुमत लागेल बहुमत आल्यावरच डी लिमिटेशन होईल,मला वाटत निवडणूक दहा टक्के उमेदवार आणि 90 टक्के पार्टी संघटन करत असते - निवडणूक 10% उमेदवाराची 90% संघटनेचे असते आणि म्हणून डी लिमिटेशन झाल्याने फार फरक पडतो असं वाटत नाही On धान बोनस मुद्दा - - धान पूर्व विदर्भाचा सन्मान शान आहे, कर्जमुक्ती मध्ये आपण बँकेत असणार कर्ज त्याला मुक्ती देतोय,पण हातात शेतकऱ्याच्या पैसे नाही,धान लागवड आणि विकून येणार उत्पन्न,एक एकरच मागे शेतकरी फक्त चार ते पाच हजार कमावतो,2013 मध्ये काँग्रेस सरकारने बोनस सुरू केला आणि आम्ही बंद करणे योग्य नाही, - म्हणून माझी आग्रही भूमिका आहे की धानाच्या बोनस चा विचार अतिशय गंभीर आहे0
0
Report
अमरावती से पंढरपूर तक 560 किमी साइकिल वारी पर्यावरण संदेश के साथ धाराशिव पहुंची
Dharashiv, Maharashtra:धाराशिव पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अमरावतीहून सायकल वारी पंढरपूरकडे... ५६० किलोमीटरचा प्रवास करत सायकल वारी धाराशिवच्या कळंबमध्ये दाखल... विठ्ठल दर्शनासोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश; ४५ वारकऱ्यांचा अनोखा उपक्रम... अँकर विठ्ठल भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. अमरावती ते पंढरपूर अशी सुमारे ५६० किलोमीटरची सायकल वारी सध्या सुरू असून आज ही वारी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दाखल झाली. डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील ४५ जण या वारीत सहभागी झाले आहेत. दररोज जवळपास १०० किलोमीटरचा प्रवास करत हे वारकरी विठ्ठल दर्शनासोबत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहेत. ७ जुलै रोजी अमरावती येथून या सायकल वारीला सुरुवात झाली. पाच दिवसांत सुमारे ५६० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ही वारी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. आज कळंब शहरात वारीचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. लक्ष्मीकांत खंडागळे, सी. एन. कुलकर्णी आणि सचिन ढवळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात १६ महिलांसह एकूण ४५ जण सहभागी झाले असून, सायकलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जात आहे. बाईट लक्ष्मीकांत खंडागळे (सायकल वारी संयोजन) बंडोपंत दशरथ (स्वागत व भोजन व्यवस्था)0
0
Report
Advertisement
बांधावर की शाला में बालीराजा के खेत का नजारा और लावणी का प्रदर्शन
Oras Bk., Maharashtra:पीकपाणी राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविला जातोय. त्याचं अनुषंगाने शाळेतील मुलांना शेतात नेऊन त्याची माहिती शालेय मुलांना व्हावी या हेतूने बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. तळकोकणात देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातं आहे. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 या प्रशालेच्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांना बळीराजाच्या शेतात नेऊन तरवा काढणे व लावणी करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. चिमुकल्यांनी तर धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान हे गीत गात तरवा काढला लावणी केली व बळीराजा प्रमाणेच शेताच्या बांधावर बसून न्याहरी केली.0
0
Report
रत्नागिरी में शिंदे गट से मुलाकात के चलते राजनीतिक हलचल तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बाळ माने शिंदेसेनेच्या वाटेवर? सचिन अहिर यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!.. बाळ माने यांनी नुकतीच विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली आहे.बाळ माने यांनी स्वतः या भेटीचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केल्यामुळे ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जातील असे तर्क लढवले जात होते,मात्र भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते.. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळ माने यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवल्याचे दिसत असून,या अनपेक्षित भेटीमुळे आगामी काळात रत्नागिरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..0
0
Report
नाशिक के नकली शालार्थ ID केस में बड़ा मोड़: आरोपी प्रशांत वाडीले गिरफ्तार
Dhule, Maharashtra:नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळे येथून अटक केली आहे. आज त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेले जाणार असल्याची माहिती आहे. नाशिक मधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रशांत वाडीले यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अटकेनंतर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रशांत वाडीले यांच्या धुळे येथील निवासस्थानी दाखल झाले असून, तेथे सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या सुमारे एक तासापासून ही कारवाई सुरू असून, पहाटेच नाशिकहून आलेल्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा तपासाशी संबंधित इतर पुरावे हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रशांत वाडीले यांच्या अटकेमुळे बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची अपेक्षा आहे.0
0
Report
Advertisement
योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज की पालखी पंढरपूर के लिए भक्तिमय प्रस्थान
Shirdi, Maharashtra:Go davari tiri vaslelya Yogr gaze Sadguru Gangagiri Maharaj yanchya Sarla Bet yethun Pandharpur paid dindi che mothya bhaktimay vatavaranat Pandharpur kadhe prasthan jhale ahe. 200 varshachi parampara aslele ya palkhi sohalyat hazaror warakari sahabhagi jhale ani Shri Ramapur Shaharata palkhiche jalloshat swagat karwale gela. V/o - Sarala Betache mathadhipati Mahant Ramgiri Maharajanchya adhipattyaakhale tal mridung ani harinamacha jaIyghosh kart palkhine Pandharpukade prasthan kele ahe. Shri Ramapur nagaritat palkhiche ajalya swagat kele jhale. Shaharatil that te maidan ya thite bhaktimay vatavaranat pahila rihang sanhota savd dekhila gelay. Bite - Mahant Ramgiri Maharaj, mathadhipati Godavari dham Sarla Bet0
0
Report
महाराष्ट्र सरकार ने किसानों के लिए 2 लाख रुपए लाभ की घोषणा
Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी या पूर्वीच्या कर्जमाफीत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांचा लाभ मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यानंतर पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संत नामदेव पायरीजवळ पेढे वाटून जल्लोष केला. आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर मधून कर्जमाफी आंदोलनाची अन्नत्याग करून सुरुवात केली होती. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला0
0
Report
मुंबई-कोकण जैसी भारी बारिश अभी विदर्भ मराठवाड़ा में नहीं, किसानों को राहत की प्रतीक्षा
Yavatmal, Maharashtra:मुंबई आणि कोकणात ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस झाला तसा पाऊस अद्यापही विदर्भ मराठवाड्यात झालेला नाही. विदर्भ मराठवाडा अजूनही कोरडाच असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. झालेली पेरणी साधली पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.0
0
Report
Advertisement
मान्सून पावसात विदर्भातील मोठी कमी: 1 जून–10 जुलैमध्ये एकूण कमी 18%
Nagpur, Maharashtra:नागपूर मुंबई आणि पुण्याकडे मान्सूनचा मुसळधार पाऊस झाला असला तरी विदर्भात मान्सूनच्या पावसाची मोठी तूट आहे. 1 जून ते 10 जुलै दरम्यान सरासरीच्या 18% मान्सूनच्या पावसाची तूट विदर्भात आहे. 1 जून ते 10 जुलै दरम्यान मान्सून पावसाची विदर्भातील स्थिती अकोला (-13) अमरावती (-15) भंडारा- (-34) बुलडाणा (0) चंद्रपूर (-25) गडचिरोली (-46) गोंदिया (30) नागपूर (-12) वर्धा (-2) वाशिम (-29) यवतमाळ (-10) एकूण (-18)0
0
Report
लोणावळा में बाढ़ पीड़ित क्षेत्रों के लिए मावळ विधायक सुनील शेळके का दौरा
Varsoli, Maharashtra:Headline: लोणावळ्यातील पूरग्रस्त भागांना मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट Anchor: लोणावळ्यातील पूरग्रस्त भागांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती घेतली.यावेळी पूरग्रस्तांनी घरांमध्ये शिरलेले पाणी, झालेले आर्थिक नुकसान तसेच प्रशासनाकडून अपेक्षित मदतीबाबत आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या. नागरिकांना धीर देताना आमदार शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद आणि टाटा धरण प्रशासनाशी समन्वय साधून पूरग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवल्या जातील, असे आश्वासन दिले..0
0
Report
शेरीराला प्रकल्प जल्द पूरा करने की मांग, कांग्रेस विधायक कदम ने विधानसभा में उठाई
Sangli, Maharashtra:सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषण आणि शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या शेरीनाला प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील कदम यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करत केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सांगली आणि कृष्णा नदीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शेरीनाला प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी केली आहे. शेरीनाल्या लाखो लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे, त्यामुळे नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर शेरीनाल्यामुळे पाणी तुंबल्याने पावसाळ्यात पुरपट्ट्यात पूरस्थिती निर्माण होण्याचाही धोका दरवर्षी निर्माण होतो, त्यामुळे राज्य सरकारने रखडलेल्या शेरीनाल्याचा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी आमदार कदम यांनी विधान सभेत केली आहे.0
0
Report
Advertisement
लोणावळा बाढ़: जलपर्णी हटाने में ढिलाई से नागरिकों में भारी नाराज़गी
Varsoli, Maharashtra:Headline : जलपर्णीचा हलगर्जीपणा की नैसर्गिक आपत्ती? लोणावळ्यातील महापुरानंतर नागरिकांचा संताप Lozda: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः जलसमाधी दिली. अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्याने हजारो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, हा पूर केवळ अतिवृष्टीमुळेच नव्हे, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ओढवला, असा गंभीर आरोप आता स्थानिक नागरिक करत आहेत. विशेषतः हुडको कॉलनीतील रहिवाशांनी इंद्रायणी नदीतील जलपर्णी वेळेत हटवली असती, तर एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली नसती, असा दावा केला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... VO-1 : ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये तब्बल पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने फर्निचर, घरगुती साहित्य, धान्य, इलेक्ट्रिक उपकरणांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासन, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुमारे १२०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. VO-2 : पूराचा सर्वाधिक फटका हुडको कॉलनी परिसराला बसला. टाटा धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर साचलेल्या जलपर्णीमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे नदीचे पाणी शहराच्या दिशेने वळले आणि अनेक वस्त्यांमध्ये पूर शिरल्याचा दावा नागरिकांनी केला. इंद्रायणी नदीतील जलपर्णी वेळेत हटवण्यात आली असती, तर नुकसानाची तीव्रता कमी झाली असती, असा संतप्त आरोप नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर केला आहे. VO-3 : दरम्यान, नागरिकांच्या या गंभीर आरोपांनुसार लोणावळा नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेणार आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूर ओसरला असला तरी या महापुराच्या जखमा आणि प्रशासनावरील प्रश्न मात्र अद्याप कायम आहेत.0
0
Report
पिंपरी चिंचवड़ मोशी इमारत में फंसे 8 लोगों के लिए बचाव अभियान युद्धस्तर पर
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड च्या मोशी मध्ये इमारतीत अडकलेल्या ८ जणांना काढण्याच बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे... दरम्यान ज्या इमारती मध्ये ही दुर्घटना घडली आहे त्या बाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांना परवानगी नसल्याचं स्पष्ट झालंय... ज्य्या पर्यावरण विभागाच्या देखरेखीत हा प्रकल्प सुरू होता त्या विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय... नैसर्गिक आपत्ती आहे असा दावा करणाऱ्या आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं होत. त्यामुळे पालिका कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न उपस्थित झालाय..दरम्यान सुरू असलेल्या बचाव कार्याचा आणि उपस्थित प्रश्नांसंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
वन नेशन वन इलेक्शन पर भाजपा के खिलाफ भारी विरोध, महाराष्ट्र में मंत्रिमंडल फेरबदल चर्चा
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन एक देश एक निवडणूक जॉईन पार्लमेंटरी कमिटी आहे एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन निर्माण केली त्यात भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या बहुमत आहेत त्याच्यामुळे इतर पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी किती वेगळी भूमिका मांडली लोकशाही विरुद्ध आहे संविधान विरोधी आहे संघराज्य जी आपली रचना आहे त्याला हे मानवणार नाही हे त्या बैठकीमध्ये त्या मीटिंगमध्ये अनेक खासदाराने मत व्यक्त केलं तरीही बहुमत असल्यामुळे त्या कमिटीचा बीजेपीचा त्यांचा जो अजेंडा आहे तो रेटून न्यायचा प्रयत्न करत आहेत एक देश एक निवडणूक त्याची गरज नाही हे आमचे मत आहे या देशांमध्ये विविधता आहे राज्य वेगवेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या हवामान असतं मासिकता वेगळे आहे प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत पण भारतीय जनता पक्षाला व नेशन वन इलेक्शन पेक्षा वन इलेक्शन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे वन पार्टी वन इलेक्शन ही त्यांची जी वाटचाल आहे ती या माध्यमातून वन पार्टी दुसरा कोणताही पक्ष राहता कामा नये आणि त्यानंतर महिला आरक्षण च्या नावाखाली डी लिमिटेशन बिलाचा जो विषय चालू आहे 850 खासदार करण्याचं आणि त्या माध्यमातून भाजपाला आपला देश ताब्यात घेण्याचा तो काय त्यांचा सरळ हेतू नाही आहे 850 खासदार झाल्यावर ते संविधानामध्ये बदल करून भारतामध्ये राष्ट्र अध्यक्ष पद्धत आणण्याचा विचारत आहेत ट्रम्प मूर्ख पद्धतीने राज्य करतो असा एखादा मूर्ख आपल्याकडे जो आहे तो त्या पद्धतीने राज्य करू शकतो प्रेसिडेन्शिअल डेमोक्रॅटिक पद्धत म्हणजे राष्ट्र अध्यक्षाला अमर्यादा अधिकार तिकडे निवडणुकांची गरज नसते प्रेसिडेंट मंत्रिमंडळ जे आहे आपल्याला हवी असल्याने माणसं नेमतो निवडून आलेल्या लोकांतून तुम्हाला मंत्री म्हणून बनवायला पाहिजे असं नाही कॅबिनेट भाजपची वाटचाल आता त्या दिशेने सुरू आहे आता त्या बैठका आणि काम सुरू आहे म्हणून आधी डी लिमिटेशन बिल मंजूर करायचं डी लिमिटेशन बिल मंजूर झाल्यावरती घटनेमध्ये पूर्णपणे बदल करून संविधान बदलून मोडून या देशातील लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष आणि परत या परत या देशाच्या छातीवर राष्ट्र अध्यक्ष म्हणून मोदींना बसवायचं अशा पद्धतीची वाटचाल लोकशाही मोडण्याच्या दिशेने सुरू आहे त्याच्यामुळे हे सगळं चाललं आहे वन नेशन वन इलेक्शन वगैरे हे सगळे बरोबरचे बुडबुडे आहेत आमचा विरोध आहे त्याला या देशांमध्ये परंपरेने भारतीय घटनेनुसार जी पद्धत सुरू आहे भारतीय संविधानाने जी दिशा लोकशाहीला दिली आहे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे तो मार्ग कोणालाही असं उकडून फेकता येणार नाहीस या देशाच्या संविधानानुसार या देशाची संसद लोकशाही आणि निवडणुका होतील ही आमची भूमिका आहे ऑन पावसाळी अधिवेशन केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल महाराष्ट्रातील नाव चर्चेत 20 तारखेला संसदेचा अधिवेशन सुरू होईल आणि 20 तारीख आता लांब राहिली नाही आता मिरीट वरती कोणांना प्रधान मंत्री पद मंत्री पद मिळण्याचे दिवस संपले आहेत गुणवत्तेवर आता हडकं फेकली जातात आणि हडका कोणामुळे फेकली जातात ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी आणि शहा यांनी पट्टा बांधला आहे अशा ना हाडके जातात त्याच्यामध्ये आता कोणाच्या पुण्यामध्ये हारकर फेकले जातील मिंध्ये गट असेल किंवा आमच्याबद्दल फुटलेले सहा आहेत त्यांना कोणाच्या तोंडात हाडुक दिले जाईल हे पाहू एक मात्र नक्की केंद्रामध्ये विशिष्ट हालचाली सुरू आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यासाठी गेले अनेक काळात सुरू आहे त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील कोणी म्हणतात राजनाथ सिंग बदलले जातील अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने केंद्रातील असं म्हटलं जातं आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत 2029पूर्वी तुम्हाला जर पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत कारण 2029 नंतर भाजपचे राज्य इकडे येणार नाही त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते 2029 आधी तुम्ही करा 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्या कुणी राहणार त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वीच्या हालचाली करायचे आहे त्या करून घ्यावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत ऑन एकनाथ शिंदे ते फोडत आहेत फोडण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचंड पैसे आहेत पैसे त्यांच्या दरेगावातला शेतामध्ये उगवत नाहीत ते पैसे मिसिंग लींक अडीच हजार कोटीचा ओव्हर बजेट म्हणजे लुटलेले पैसे आहेत अशा पैशातून आमदार खासदार विकत घ्यायचे हे त्यांचे धोरण आहे अशा प्रकारची माणसं देशाला घातक आहेत राजकारणाला नाही देशाला घातक आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेची खेळ करणं हा एक आर्थिक दहशतवाद आहे तुम्ही आजच महालेखा पालांचा रिपोर्ट पाहिला असेल त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्त वरती अत्यंत कठोर शब्दांमध्ये कोरडे ओढले आहेत आर्थिक बेशिस्त अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राला कोणी यापुढे एक रुपया सुद्धा कर्ज देणार नाही आता हे तर विरोधी पक्षाने सांगितले नाही महाराष्ट्राचे बदनामी आम्ही केली नाही केंद्र सरकार यांचे महालेखापाल आहेत त्यांनी बदनामी केली असेल महाराष्ट्राचे इतर देवेंद्र फडणवीस यांनी महालेखापालना बघून घेतले पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तुम्ही महाराष्ट्र विषयी असं काही कसं म्हणू शकता जरी ते सत्य असलं तरी असे मला त्यांना आता सांगायचे आहे ऑन फडणवीस मंत्री पद केंद्र राज्याची सूत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येतील तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन तर मला जे चित्र दिसत आहे त्यानुसार विदर्भातल्या चंद्रशेखर बावनकुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसत सगळ्यांशी संवाद ठेवणारे सांभाळून घेणारे एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले आम्ही तर म्हणून प्रधानमंत्री व्हा 2029 च्या आधी तर मला शंभर टक्के वाटतं चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीस करतील हे माझं आकलन आहे राज्याच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजे तो राज्याचं हेच पाहिल जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि तो या राज्याचे स्वाभिमान असं कोणीही व्यक्ती असेल त्याला शुभेच्छा देणे हे आमच्या कर्तव्य आहे त्या चुकीचं काय मी तुम्हाला माझा अंदाज आणि आकलन सांगितलं त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे ऑन राम मंदिर चोरी एकनाथ शिंदे आणि सिद्धिविनायक मंदिर डल्ला उद्धव ठाकरे सरकार सिद्धिविनायक मंदिर ज्या पद्धतीने आम्ही सांभाळलं ज्याचा निधीचा सामाजिक कार्यासाठी केला तो या आधी कधीच झाला नव्हता आताच मला एक कार्यकर्ते भेटायला आले ते घाटकोपर परिसरामध्ये डायलिसिस केंद्र उभा करत आहेत जागा त्यांची स्वतःची आहे आणि आदेश बांदेकर अध्यक्ष असताना डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी रक्कम मंजूर केली त्यानंतर सत्ता बदलल्यावर जे कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते डायलिसिस केंद्र निधी रद्द केला आणि म्हटलं जर तू आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच तुला हा निधी मंजूर केला जाईल हे जे असे लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासानं आदेश बांदेकर संकेत सावंत हे लोक असताना जेवढा उत्तम काम केलं तेवढा कधीच काम होऊ शकला नाही 18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत राम मंदिर लुटीच्या प्रकरणात जो देशात असंतोष आहे आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाही आजही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्ये मध्ये आहेत त्यांनी राम मंदिराची आणि रामाचे पूर्ण बदनामी केली आहे आणि म्हणून शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केलं त्याचा पहिला टप्पा मुंबईत पार पडला दुसरा टप्पा महाराष्ट्राचा उपराजधानी मध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि असंख्य आमचे मुंबईतले नेते आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील 18 जुलै साडेचार वाजता ऑन नाशिक ठाकरे नगरसेवक संपर्क काही कोटीच्या विकास निधीचा नाही तर काही कोटींच्या लाचेची गेल्या एक महिन्यापासून त्यांचे काही लोक मिन्धे यांचे बॅगा घेऊन नाशिकमध्ये फिरत आहे हे खर आहे घरोघरी जात आहेत पण आमच्या एकाही नगरसेवकांनी त्यांना घराच्या उंबरठा ओलांडू दिला नाही हे सुद्धा सत्य आहे ऑन लाडकी बहीण कॅग यासंदर्भात खरं म्हणजे 85 लाखापेक्षा जास्त बोगस लाभार्थींना जो लाभ दिला ती गंभीर चिंता आहे आता हे तुम्ही वसुली कसे करणार आहात आर्थिक बेशिस्त तर यालाच म्हणतात जे ज्यांची गुणवत्ता नाही ज्यांना मेरिटवर हा लाभ घेता येत नाही अशा लाखो बोगस लोकांना मत विकत घेण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये दिले ही बेशिस्त आहे आता काय करणार आहात तुम्ही सांगा ही जी बदनामी महाराष्ट्राची होत आहे आर्थिक बेशिस्त संदर्भात त्याच्यामध्ये खरं म्हणजे राजाच्या मुख्यमंत्र्यांनी पदत्याग केला पाहिजे इतका कलंका लागला आहे महाराष्ट्राला ऑन मार्च महिना गुन्हा सिद्धिविनायक चोरी हिंदी मार्च महिन्यात कोणाचे सरकार होतं बघाना एकनाथ शिंदे यांना जाऊन कोणी सांगितले पाहिजे तुमचा चेअरमन आहे तुम्ही त्या ठिकाणी जरा बोट दाखवा0
0
Report
Advertisement
