icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशिम रेलवे पुल पर रोशनी नहीं, युवकों ने मशाल जलाकर किया प्रदर्शन

Washim, Maharashtra:वाशिम शहरातून अमरावती व पुसद कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण होऊन चार वर्षे लोटली आहेत. मात्र, पुलावर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाशिम शहरातील युवकांनी मशाल पेटवून आंदोलन केले. उड्डाण पुलावर तातडीने पथदिवे बसवावेत, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर के स्कूलों में भौतिक सुविधाओं की जाँच, 391 स्कूलों में सुधार आवश्यक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जि. प.च्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ ते ३० मेच्या दरम्यान शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्गवारी केली आहे. त्यात २ हजार ८४ शाळांपैकी तब्बल ३९१ शाळांचा समावेश पडझड वर्गवारीत झाला असून, दुरुस्तीची मोहीम तत्काळ हाती घ्यावी लागणार आहे. या दुरुस्थीसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात जि. प.च्या २ हजार ८४ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळेच जि.प.च्या सीईओंनी गुणवत्ता तपासणीसह भौतिक सुविधांसाठी विशेष मोहीम राबवली.
0
0
Report

तुळींज पुलिस स्टेशन में भारी बारिश के कारण पानी घुसा, प्रशासनिक कामकाज प्रभावित

Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारामध्ये झालेल्या पावसामुळे तुळींज पोलीस ठाण्याच्या परिसरात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या जोरदार पावसात पोलीस ठाण्याच्या आवारात आणि काही भागांमध्ये पाणी शिरल्याने प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणी साचल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारी, कागदपत्रांची हालचाल आणि इतर प्रशासकीय कामांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.... तुळींज पोलीस ठाणे परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...
0
0
Report
Advertisement

शिंदेसेना ने छत्रपति संभाजीनगर जिला बैंक में आठ निदेशक बिनविरोध चुन लिए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने शिंदेसेना धक्का बसला होता. परंतु, आता उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यातही शिंदेसेना यशस्वी झाली. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह वैजापूरचे आ. रमेश बोरनारे, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्यासिरोधात अर्जच न आल्याने ते यापूर्वीच विजयी ठरले आहेत. एकूण आठ जणांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, ४ जुलै रोजी मतदान होईल. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर १२० उमेदवारांचे विविध मतदारसंघांतून अर्ज वैध ठरले होते. यापैकी तब्बल ८३ अर्ज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अर्ज मागे घेण्यात आले. विशेष म्हणजे, मतदारसंघांतील उमेदवारांविरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने आठ जणांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
0
0
Report

अमरावती में रात्रभर तेज बारिश से किसान और नागरिकों को मिली राहत

Amravati, Maharashtra:अमरावती में रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची उकाड्यापासून सुटका. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काल अमरावतीत जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावत रात्रभर दमदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे तर बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे आता खोळंबलेल्या पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नसून शेतकऱ्यांना अजूनही मान्सूनचा प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आजपासून शेतकऱ्यांनी पेरणीचा लगबग सुरु केली आहे. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तरीही पेरणीचा हंगाम हातातून निघून जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केल्याचे दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

Chhatrapati Sambhajinagar mein cafe ke peeche ashlil kritiyon ke khilaf police-municipal corporation ne sanyukt karyavahi

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लील कृत्यांविरोधात अखेर पोलिस आणि महापालिकेने संयुक्त बडगा उगारला. मंगळवारी संध्याकाळी शहरात एकाच वेळी सुरू झालेल्या या महाकारवाईत वेदांतनगर, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस, टी.व्ही. सेंटर आणि हर्सल भागातील ४९ अनधिकृत, संशयास्पद कॅफे अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आले. २०२४-२५ मध्ये पोलिस, मनपाने शहरातील २९ कॅफेंवर कारवाई केली होती. कारवाईत सातत्य न राहिल्याने कॅफे चालक पुन्हा निर्धावले होते. आठ दिवसांपूर्वी शहरातील विविध कॅफेंमध्ये नेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर मंगळवारी कॉफी सेंटरवर मोहीम राबविली. मनपाच्या हातोड्यांने केबिन काढून टाकले. कॅनॉट प्लेसमधील १९ आस्थापनांची पाहणी करून १२ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई केली.
0
0
Report

दोंडाईचा क्षेत्र में दो दिनों की भारी बारिश से किसानों में राहत

Dhule, Maharashtra:दोंडाईचा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. या पाऊसाने जनजीवन विस्कळीत केले असले तरी शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून हेत आहे. काही वेळातच शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कापूस, मका, बाजरी, आदी पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
0
0
Report

अकोला में मोटरसाइकिल चोरियाँ: दो आरोपी गिरफ्तार, चोरी की दो बाइकें बरामद

Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली असून, त्यांनी इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयितांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी अकोला शहरातील दोन ठिकाणांहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या आरोपींनी अकोला जिल्ह्यासह इतर भागांतही वाहन चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

एलसीबी ने नंदूरबार में अंतरराज्यीय गैंग का पर्दाफाश किया: 15 केस, 2 आरोपी गिरफ्तार

Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. शहादा तालुक्यातील सात मोटरसायकल चोरी आणि आठ घरफोडी अशा एकूण १५ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींना एलसीबीने अटक केली आहे. या आरोपींकडून मोटरसायकली, रोख रक्कम आणि घरफोडीतील मुद्देमाल असा तब्बल आठ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, आणखी एक आरोपी फरार आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील या आरोपींनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही अनेक गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. या संपूर्ण कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात एलसीबीला मोठे यश आलं असून, या आरोपींकडून आणखिन काही गुन्ह्यांच्या उलगडा लागण्याची शक्यता आहे.
0
0
Report

रायगड में मानसून पूरी तरह सक्रिय, उत्तर भाग में बारिश तेज

Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय. जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाची संततधार. मुरूड तालुक्यात सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद. उशिराने आलेला पाऊस आता संपूर्ण रायगड जिल्ह्यात पूर्णपणे सक्रिय झालाय. अलिबाग, पेण, मुरुड या उत्तर भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. अधून मधून जोरदार सर बरसत आहेत. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. मुरुडमध्ये सर्वाधिक १५০ मिलिमीटर तर अलिबाग मध्ये ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतात पाणी झाल्याने आता शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र दक्षिण रायगड जिल्ह्यात पाऊस थांबला असून ढगाळ वातावरण आहे.
0
0
Report
Advertisement

मूर्तिजापूर के किसानों का आंदोलन स्थगित, लेखी आश्वासन मिलने पर वापस लौटे

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं शेतकऱ्यांच अन्नत्याग आंदोलन सध्या स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. अखेर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात रेटून धरलेल्या प्रश्नावर कृषीमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे अखेर प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन तात्पुरत स्थगित केलं आहे...
0
0
Report

बुलढाणा में तेज़ बारिश से खेतों में पानी जमा, पेरणी के आसार बढ़े

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक. बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस.. शेतात साचले पाणी. . Anchor - जून महिना संपत असताना शेतकरी हा नेमका केव्हा येतो पाऊस या विवंचनेत असताना काल रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार सुरुवात केलीय .. घाटाखालील खामगाव, शेगाव, संग्रामपूर सह इतर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. . यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाले आहे.. नेमका हा पाऊस पेरणी करता कसा दिलासादायक ठरतो याकडे देखील बळीराजा लक्ष ठेवून आहे. . शेतीची मशागत पूर्ण केल्यानंतर पाऊस नेमका केव्हा येतो याकडे तो लक्ष ठेवून होता, आता सलग दोन ते तीन दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली तर पेरणी करता देखील हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो.. असे चित्र आहे.
0
0
Report

वसई-विरार और पालघर में तेज़ बारिश, पानी में डूबे भाग, यातायात अस्त-व्यस्त

Vasai-Virar, Maharashtra:पहिल्याच मुसळधार पावसाने वसई-विरारची दाणादाण; सखल भाग जलमय, जनजीवन विस्कळीत वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भाग जलमय झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top