icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मोदा इंदोरा बायोमास बैंक में आग, धान भूसा लाखों रुपये का नुकसान

Nagpur, Maharashtra:नागपूर - शेजारच्या शेतातील आगीची ठिणगी वाऱ्यामुळे थेट धानाच्या भुसा जळून राख... - नागपुर जिल्ह्याचा मौदा येथील इंडोरा बायोमास बँक परिसरात लागली होती आग - अंदाजे ३ हजार टन धान भुसा जळाल्याची माहिती, पूर्णसाठा जळून राख - उन्हाचा तडाखा आणि जोरदार वारा त्यामुळे आग मिळा वेगाने पसरली . - कंपनीचे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज... - मौदा आणि रामटेकहून अग्निशामक विभागाने दाखल,पाण्याचे टँकरने पाण्याचा केला मारा.... - आटोक्यात आणण्यासाठी मोठी धडपड, अखेर आग नियंत्रणात - रिलायनस् इंडस्ट्रीजसाठी जाणारा साठा, इथेनॉल निर्मितीसाठी वापर - घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी,नआगीचे भीषण दृश्य - शेतकऱ्यांकडून पराळी खरेदी करणारी कंपनी, साठा नष्ट
0
0
Report
Advertisement

सातारा के अशोक जाधव ने अकेले पहाड़ पर बना दी 3.5 किलोमीटर सड़क

Satara, Maharashtra:सातारा-जवळील श्री सिलोबा गड येथे पूर्वी खडतर, घसरडा आणि अरुंद पायवाट होती. मात्र आता हा रस्ता स्वच्छ, सपाट आणि चालण्यासाठी योग्य झाला आहे. एका व्यक्‍ती ने निःस्वार्थ भावनेने हा बदलाव आणला होता—करंडी गावचे 67 वर्षाचे अशोक जाधव यांनी कुठलाही स्वार्थ… ना प्रसिद्धीची अपेक्षा… फक्त एकच ध्यास — आपल्या ग्रामदैवत सिलोबाप्रती श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस यातून हा 3.5 किलोमीटरचा रस्ता बनवला आहे. अशोक जाधवा यांच्या दिनक्रमात दररोज सकाळी हा डोंगरावर येऊन रस्ता करायचा, कमीत कमी 50 फुट रस्ता तयार करायचा. गेल्या एक वर्षापासून जवळपास साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता अशोक यांच्या श्रमदानातून तयार झाला आहे. हा रस्ता फक्त या डोंगरावर सिलोबा भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक ट्रेकर, भटक्या आणि निसर्गप्रेमीसाठी एक वरदान ठरत आहे। दशरथ मांझी यांच्या इतिहासाची हा निष्ठा-उद्भव उदाहरण आहे। गावकरी, नागरिक अशा प्रकारे या अवलिया व्यक्तिमत्वाला सलाम करतात。
0
0
Report
Advertisement

नागपुर केंद्रीय जेल में चार कैदियों का कर्मचारी पर हमला, हालत खतरे से बाहर

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात चार कैद्यांनी मिळून एका कर्मचाऱ्याला वबेदम महाराण केल्याची घटना घडली आहे.. या घटनेत संदीप काळे (42 वर्ष) असे कारागृहातील कर्मचारी जखमी झाले आहे... काल दुपारच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या बैरक क्रमांक दहा जवळ ही घटना घडली... * बैरक क्रमांक दहा जवळ काही कैद्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असताना कारागृहाचे कर्मचारी संदीप काळे तुरुंग अधिकारी संतोष मदने यांच्या सोबत त्या ठिकाणी गेले होते... तेव्हा शाब्दिक वाद करणाऱ्या कैद्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठ तुरुंग रक्षक यांच्याकडे घेऊन जात असताना अचानक चार कैद्यांनी संदीप काळे यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केला.. एका कायद्याने धातुसदृश वस्तूने काळे यांच्यावर वार केल्यामुळे ते जखमी झाले आहे.. त्यांना रुग्णालयात दाखলण्यात आले असून त्यांच्या प्रकृती धोक्याबाहेर आहे...
0
0
Report

कोकण रेल्वे मार्ग पर दो दिन मेगाब्लॉक: ट्रैफिक और ट्रेन समय में बदलाव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण रेल्वे मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक.. कोकण रेल्वे मार्गवर नांदगाव रोड आणि कणकवली स्थानका दरम्यान नवीन अंडरपारच्या बांधकामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.. यामुळे उद्या 30 एप्रिल आणि 1 मे रोजी या मार्गावरील दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.. दादर - तिरुनेलवेली एक्सप्रेस ही उद्या आणि परवा नांदगाव रोड स्थानकावर 10 मिनिटे थांबून नियंत्रित केली जाईल.. तिरुवनंतीपुरम-लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही गाडी मडगांव जंक्शन ते नांदगाव रोड दरम्यान 1 तास उशिराने धावणार आहे..
0
0
Report
Advertisement

भाजपा ने संजय भेंडे को विधानपरिषद उम्मीदवार घोषित किया

Nagpur, Maharashtra:विदर्भातून विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना उमेदवारी जाहीर झालीय. प्रस्थापितांऐवजी स्वयंसेवक, सहकारतज्ज्ञ, निवडणुकीचे मायक्रोप्लॅनर, संघटनात्मक कार्याच्या हातोटी असलेल्या संजय भेंडे यांना संधी मिळाली आहे. भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, संदीप जोशी आणि राजू पोतदार शर्यतीत होते... मात्र भाजपा नेतृत्वाने राजकीय वर्तुळात शांत, संयमी व मितभाषी अशा संजय भेंडे यांना संधी दिली. मागील काही निवडणुकींतील त्यांच्या पडद्यामागील कामगिरी मोलाची ठरलीय. संघ मुख्यालय असलेल्या मोहीते भागाचे ते कार्यवाहदेखील होते. भेंडे हे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकदेखील होते. सहकार क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यावर कामाचा आवाका वाढला व २७ वर्षांहून अधिक काळापासून ते बॅंकिंग क्षेत्राशी जुळले राहिले. यावेळी संजय भेंडे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी
0
0
Report

अंबरनाथ में भाजपा-शिवसेना के बीच टकराव, सभागृह स्थगित

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेत जुंपली शहर समस्येची सभा स्थगित केल्याने भाजपाचे शिवसेना विरोधात निदर्शने अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये पुनर्वसन धोरण आणि शहरातील आरोग्याशी निगडित विषयांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र पत्र वाचण्याच्या वादातून शिवसेना आणि भाजपात सभागृहात जुंपली आणि त्यानंतर संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने सभाच तहकूब केल्याने गोंधळ निर्माण झाला. अंबरनाथ नगरपालिकाेत सत्ता संघर्षावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून वाद सुरू आहे. या वादामुळे सभागृहातील कामकाजावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये पत्र वाचनाच्या विषयावरून वाद झाला. अंबरनाथमधील नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा विजय झाल्यामुळे शिवसेनेला हा पराभव पचनी पडला नव्हता. शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आलेले असतानाही नगराध्यक्ष पद हातातून गेल्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. नगराध्यक्ष पद भाजपाकडे आणि संख्याबळाचे गणित शिवसेनेकडे असल्यामुळे त्याचा फटका शहर विकास कामांवर होताना दिसत आहे चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
0
Report
Advertisement

अकोला में कथित लव जिहाद मामला: लड़की बची, बजरंग दल-पुलिस ने किया रेस्क्यू

Akola, Maharashtra:अकोल्यात कथित लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील 24 वर्षीय तरुणीची सोशल मीडियावरून अकोल्यातील जमील काझी नावाच्या विवाहित युवकासोबत ओळख झाली. इंस्टाग्रामच्या মাধ্যমে सुरू झालेली ही मैत्री पुढे प्रेमसंबंधात बदलली. सुमारे आठ महिन्यांपूर्वी दोघांमध्ये संपर्क सुरू झाला होता. त्यानंतर संबंधित युवकाने तरुणीला अकोल्यात बोलावून घेतले आणि तिला आपल्या घरी पाच दिवस ठेवले, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी फरीदाबाद येथे पोलिसांत दाखल केली होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तरुणी अकोल्यात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कुटुंबीयांनी अकोल्यातील बजरंग दलाशी संपर्क साधला. बजरंग दल आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तरुणीची सुटका करण्यात आली. तर आपल्या आई सोबत किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात आपण निघून अकोल्यात आलो अशी माहिती पोलिसांना या मुलींना दिली आहे. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध फरीदाबाद पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास फरीदाबाद पोलीस करीत आहेत.
0
0
Report

सोलापुर में यात्रा के दौरान चोरी करने वाली महिला गिरफ्तार, तीन लाख रुपए बरामद

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - चिमुकल्याला घेऊन यात्रेत चोरी करणाऱ्या महिला पोलिसांच्या जाळ्यात, शहर गुन्हे शाखेची कारवाई ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत महिलांचे दागिने चोरणारी महिलेला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. लहान मुलाला काखेत घेऊन नजर चुकून महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील पैसे लंपास करण्यात येत होते. या महिलेकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 27 ग्रॅम वजनाचे सोने, 9.5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 6 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top