icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

परभणी में सांसद संजय जाधव के समर्थकों ने शानदार स्वागत किया, शिवसेना छोड़ने पर विचार

Parbhani, Maharashtra:परभणीचे खासदार संजय जाधव आपल्या मतदारसंघांमध्ये आले आहेत परभणी शहरामध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत खासदार संजय जाधव यांचं स्वागत करण्यात आला आहे मी पैशासाठी गेलो नाही .. का ठाकरे शिवसेना सोडली याचा विचार त्यांनी करायला पाहिजे तुम्ही भूमिका बदलल्या त्यामुळे हे पानिपत बघायची वेळ आली आहे 2022 पासून 26 पर्यंत तुमच्या सोबत लढत राहिलो परंतु ज्या पद्धतीने लढाई लढला पाहिजे त्या पद्धतीने लढाई लढताना दिसले नाहीत कार्यकर्त्यांना संघटित करणाची भूमिका घ्यायला पाहिजे होती.. साहेबांची प्रकृती साथ देत नव्हती तर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरायला पाहिजे होतं रस्त्यावर उतरून लढाई करायला पाहिजे होती विरोधी पक्ष म्हणून फिरायला पाहिजे होतं मात्र हे न केल्यामुळे कार्यकर्ते दुरावले गेले स्थानिक गटबाजीमुळे मी नाराज होतो त्यामुळे मला ठाकरे शिवसेना सोडावी लागल्याची माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.
0
0
Report

गोशाळा संचालक भगवान कोकरे ने लोटे एमआईडीसी में पानी मुफ्त देकर लोगों को राहत दी

Ratnagiri, Maharashtra:खेड-रत्नागिरी.. लोटे एमआयडीसी परिसरासाठी 'गोशाळा' ठरली संकटमोचक.. भगवान कोकरे यांच्याकडून मोफत पाणीपुरवठा!.. अँकर रत्नागिरीतून एक अत्यंत दिलासादायक आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी बातमी समोर येत आहे..पावसाने ओढ दिल्यामुळे वाशिष्टी नदीचं पात्र कोरडं पडलं असून, लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.. मान्सून दाखल झाला असला तरी नद्या अद्याप भरलेल्या नाहीत.. अशा या भीषण संकटात लोटे एमआयडीसीतील गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे हे परिसरासाठी 'भगीरथ' ठरले आहेत..त्यांनी आपल्या गोशाळेतील विहिरीतून स्थानिक नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.. कोकरे यांच्याकडून दररोज तब्बल १० ते १२ पाण्याचे टँकर मोफत भरून दिले जात असून,या संकटकाळात ते परिसरातील नागरिकांची मोलाची सेवा करत आहेत.. त्यांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे लोटेवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे..
0
0
Report
Advertisement

अकोला के तेल्हारा में प्रतिबंधित गुटखा भारी जप्त, 11 लाख रुपए का माल पकड़ा गया

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलीसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ६ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा तसेच ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण ११ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभाग तर्फे छापेमारी सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा शहरातील एका पेट्रोल पंप परिसरात संशयित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये पान बहारचे ८० पॅकेट, विमलचे १ हजार ८७० पाऊच, विमल किंग पॅकचे ५०६ पॅकेट, विमल बिग पॅकचे ७० पॅकेट, विमल बिग पॅक होलीचे ९० पॅकेट, राजनिवास प्रीमियमचे २४ पॅकेट तसेच १ हजार ७०० तंबाखू पॅकेट यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ६ लाख १९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी बुलढाणा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून आणखी एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे तरी पुढील तपास अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलीस करीत आहेत.
0
0
Report

रत्नागिरी में भारी बारिश, किसानों को मिली राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावासाची जोरदार हजेरी.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.. गेले २४ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उष्मा आणि उखाणे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उकाड्याची तीव्रता वाढली होती पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या नागरिकांना अखेर सोमवारी सकाळपासून पावसाने दिलासा दिला.. सुरुवातीला हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर नंतर वाढला.. त्यानंतर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळाले.. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले.. दरम्यान शेतीच्या कामांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. भात लागवडी पूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उन्हाच्या तडाख्यातून मोठा दिलासा मिळाला आहे..
0
0
Report

चंद्रपुर में भारी बारिश से बिजली व्यवस्था चरमरा गई, महावितरण कार्यालय के बाहर प्रदर्शन

Chandrapur, Maharashtra:टायटल: पावसाचा तडाखा आणि झाडे उन्मळून पडल्याने चंद्रपुरात दीर्घकाळ विजेचा खेळखंडोबा, संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर घेतली धाव ,तणावपूर्ण परिस्थिती नंतर पोलिसांना करण्यात आले पाचारण आँकर: पावसाचा तडाखा आणि झाडे उन्मळून पडल्याने चंद्रपुरात दीर्घकाळ विजेचा खेळखंडोबा बघायला मिळत आहे. दुपारी 3 वाजता पाऊस आल्यावर बहुतांश भागात ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि झाडे उच्च दाब वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्रभर सुरळीत झाला नाही. संतप्त नागरिकांनी शास्त्रीनगर येथील महावितरण कार्यालयावर धाव घेत अधिकारी- कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तणावपूर्ण परिस्थिती नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. गर्दी पांगल्यानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र 2 तासात पुन्हा शहर काळोखात गेले. सध्या चंद्रपूरच्या बहुतांश भागात वीज पुरवठা खंडित झाला आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा में गैस सिलेंडर चोरी: घर से 10 सिलेंडर चुराए

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याने नागरिक हैराण,चक्क घरात ठेवलेले १० सिलेंडर चोरट्यांनी नेले चोरून..ANCHOR: भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात सिलेंडर तुटवडा कायम असून. गॅस एजन्सी मधून नवीन कनेक्शन देणे बंद आहे त्यामुळे आता चक्क घरातून गॅस सिलेंडर चोरीच्या घटन काही गावात घडल्या आहेत.लाखनी तालुक्यातील सलेभाटा परिसरात अनेक गावातून घरात ठेवलेले रिकामे व काही गॅस भरलेले १० सिलेंडर चोरी झाले आहेत त्यामुळे आता अनेक कुटुंबांना स्वयंपाक बनवायची अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

EL Niño के कारण लातूर के स्कूल अब सुबह 8 से दोपहर 12:30 बजे तक

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांवर परिणाम... लातूर जिल्ह्यातील शाळा आता सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंतच....एल-निनोच्या प्रभावामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय... पावसाळा सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रातच शाळा... AC ::- लातूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेतच भरवण्यात येणार आहेत. यापूर्वी शाळांची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० अशी होती. एल-निनोच्या प्रभावामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रातच शाळा सुरू राहणार आहेत......
0
0
Report
Advertisement
Advertisement

नाशिक में 9 हजार रुपये के विवाद में युवक की हत्या; आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिक - - टेरेसवर गोनीत आढळलेल्या मृतदेहाचा खुलासा - उसनवार दिलेल्या नऊ हजार रुपयांच्या वादातून युवकाचा खून - रेल्वेने फरार होण्यापूर्वीच संशयित आरोपीस बेड्या - नाशिकच्या कामगारनगर परिसरातील वैष्णव मिलिंद शिंदे या युवकाचा केवळ ९ हजार रुपयांच्या उसनवारीतून खून - संशयित आरोपी कृष्णा दुसाने याने वैष्णवचा मृतदेह आपल्यााच घराच्या टेरेसवर पोत्यात भरून ठेवला होता. - आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधी आल्याने कृष्णाचा डाव फसला - तो मुंबईकडे पळून जण्याच्या तयारीत असताना नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top