445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खेडशी में डंपर ने बाइक को टक्कर दे दी, महिला की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडशी येथे डंपरने दुचाकीला उडवले; डंपरखाली सापडून महिला ठार अँकर मुंबई - गोवा महामार्गवरील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर खेडशी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव येणाऱ्या डंपरने समोर असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेल्या जाकादेवी येथील पांचाळ कुटुुंबापैकी महिला डंपर खाली सापडून ठार झाली आहे. अपघातानंतर डंपर महामार्गावरून थेट दहा फूट खाली कोसळला. याच डंपर खाली सापडून महिला ठार झाली. अपघातानंतर या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातापूर्वी याच ठिकाणी रिक्षाचा देखील अपघात झाला होता.0
0
Report
रत्नागिरी में मानसून सक्रिय, दापोली-चिपळूण संगमेश्वर व खेड में जोरदार बरसात
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून ठिकठिकाणी मान्सूनच्या जोरदार सरी बरसतायेत.. जिल्ह्यातील दापोली,चिपळूण,संगमेश्वर,खेड या तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय तर अन्य तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरं असतात.. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे..0
0
Report
ठाणे: सुलेखा चौहान के जाति प्रमाणपत्र मामले में कार्रवाई के आदेश
Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील बहुचर्चित बिनविरोध निवडून आलेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद धोक्यात.. बोगस जात प्रमाणपत्र बाबत धुळे जात पडताळणी विभागाने सुलेखा चव्हाण यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सदरची घटना निदर्शनात आणून देत कारवाईचे आदेश देखील दिले आहे.. लकी जाधव अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवक अध्यक्ष यांनी ही घटना उघडकीस आणली असून येणाऱ्या काळात कारवाई न झाल्यास शिंदे सेना व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले... या बाबत लकी जाधव यांना ठाकरेंच्या सेनेने देखील पाठिंबा दिला आहे... केदार दिघे UBT ठाणे जिल्हा प्रमुख0
0
Report
Advertisement
टीडीसीसी चुनाव प्रचार के बीच हितेंद्र ठाकूर ने हार्दिक राऊत पर तीखा हमला
Vasai-Virar, Maharashtra:टीडीसीसी बँणडणूक : सहकार पॅनलच्या सभेत हितेंद्र ठाकूरांचा संताप ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापले आहे. वसई येथे झालेल्या सहकार पॅनलच्या प्रचार सभेत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाशी बंडखोरी करून विरोधी पॅनलमधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यावर तीव्र टीका केली. “ज्यांना आपण सर्व काही दिले, तीच माणसे आज विरोधात उभी आहेत,” असे म्हणत ठाकूर यांनी राऊत यांच्यावर मतांसाठी कार्यकर्त्यांकडे याचना केल्याचा आरोप केला. तसेच “जे गेले ते मेले, आता कोणतीही तडजोड नाही,” असा इशारा देत त्यांनी भर सभेतच हार्दिक राऊत यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्याचे आदेश ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांना दिले. दरम्यान, ठाकूरांच्या आदेशानंतर राऊत यांच्यावरील कारवाईचे पत्र लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ पाटील यांनी दिली. या घडामोडींमुळे टीडीसीसीची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. बाईट- हितेंद्र ठाकूर,0
0
Report
ओमराजे के बगावत से महाविकास आघाड़ी को बड़ा झटका; बसवराज पाटील की जीत
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका? विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तब्बल 150 फुटली . भाजपाचे बसवराज पाटील मराठवाड्यात सर्वाधिक मताधिकांनी विजयी. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी तब्बल 720 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला आहे. बसवराज पाटील यांना 844 मते, तर महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना केवळ 125 मते मिळाली. या निकालानंतर महाविकास आघाडीची सुमारे 150 मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीत प्रवेशानंतर ही क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावा महायुतीकडून केला जात असून, ओमराजेंच्या निर्णयाचा हा पहिला राजकीय परिणाम मानला जात आहे. मात्र, या मतफुटीबाबत महाविकास आघाडीतील नेते अद्याप अधिकृत भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आता या निकालानंतर धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.0
0
Report
येवला में अवैध मुरुम उत्खनन के विरोध में अधिकारी घायल, मामला दर्ज
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पारेगाव येथे गावालगतच्या तळ्यात सुरू असलेल्या कथित अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ येवला तालुका तलाठी संघ तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या घटनेमुळे महसूल विभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
बीड में अवैध रेत माफियाओं ने सरपंच नारायण शिंदे पर हमला, ग्रामीणों ने सड़क पर एक घंटे रास्ता रोको
Beed, Maharashtra:बीड: वाळू माफियांचा सरपंचावर जीवघेणा हल्ला ; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको. - संतोष देशमुखांसारखाच तुझा मर्डर करू अशी धमकी देत घरात घुसून हल्ला.. ANC- अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून हल्ला केल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बل एक तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार सरपंच नारायण शिंदे यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. या तक्रारींचा राग मनात धरून वाळू माफियांनी त्यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. हल्ल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांचा रोष अनावर झाला. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि वाळू माफियांची मुजोरी कायमची थांबवावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान आम्हाला निवेदन प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची माहिती दिली आहे अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे. बाईट- नारायण शिंदे, सरपंच बाईट- सुभाष कट्टे, नायब तहसीलदार0
0
Report
वाशिम में भारी बारिश ने किसानों को दी बड़ी राहत, खरीफ की उम्मीद जगी
Washim, Maharashtra:वाशिम: आज शहरासह जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.विशेषतःहळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.मात्र आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.शहरासह ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळण्यासाठी आणखी समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे.0
0
Report
महायुती ने सांगली-सातारा विधान परिषद में भाजपा के होश उड़ा दिए
Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद में महायुती की जीत, भाजपा की चिंता बढ़ाने वाला! एंकर - सांगली-सातारा विधान परिषद के निर्वाचन परिणाम आ चुके हैं। महाविकास आघाडी के उम्मीदवार अभयसिंह जगताप का पराभव हुआ है, पर पराभव के साथ महायुती को झटका देने वाली मतों की धार है, मित्र पक्षों की नाराजी और सातारा जिला परिषद की राडा जैसी चर्चा भी शुरू हो गई है।0
0
Report
Advertisement
परभणी में सईद खान की जीत, महायुति की भारी बढ़त
Parbhani, Maharashtra:महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सईद खान 242 मते पडून यांचा विजय झाला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नावंदर यांना 159 मते पडून पराभव झाला आहे तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना केवळ 56 मते पडले आहेत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याने मोठा फटका महाविकास आघाडीला परभणीत बसला आहे महायुतीच्े सईद खान यांचा विजय झाल्याने परभणीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका अल्पसंख्याक कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली आणि याच विश्वासामुळे मी आज निवडून येऊ शकलो अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार सईद खान यांनी दिली आहे。0
0
Report
जालना में वन्यप्राणी का धावा; पानी की किल्लत से युवती घायल, प्रशासन से सवाल
Jalna, Maharashtra:जालना : जाफ्राबाद शहरात वानरांचा धुमाकूळ, तरुणी जखमी,घाटी रुग्णालयात उपचार सुरू ग्रामीण भागात सध्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यानं वानरांनी त्यांचा मोर्चा शहराकडे वळवला आहे.जालन्यातील जाफ्राबाद शहरात वानरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.पाण्याच्या शोधात असणाऱ्या वानरांनी धुणे धुणाऱ्या मुलीवर वानराने हल्ला केला आहे यात ही शाळकरी मुलगी जखमी झाली है.किरण काळे असं या तरुणीचं नाव असून सध्या या जखमी मुलीवर जालन्यातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.आतापर्यंत जाफ्राबाद शहरात चार ते पाच जणांवर वानरांनी हल्ला केला असून धुमाकूळ घालणाऱ्या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.0
0
Report
गणेश मूर्तियों के दाम इस साल लगभग 30 फीसदी बढ़ेंगे
Ahilyanagar, Maharashtra:आहिल्यानगर शहरांमध्ये 200 च्या जवळपास गणेश मूर्ती बनवणारे कारखाने आहेत, गणेश मूर्ती. यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा फटका हा भाविक आणि मूर्तिकारांना बसणार आहे...पेट्रोलियम पदार्थापासून तयार होणारे रंगसाहित्य , मूर्तीसाठी लागणारे थिनर, रेझिन आणि वॉर्निश यांच्या किंमातीत मोठी वाढ झाली आहे...याशिवाय, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे ही वाढ 25 ते 40 टक्क्यांपर्यंत झाली आहे...त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीच्या किंमतीत साधारणत: 30 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे असं मूर्तिकारांचे म्हणणे आहे...0
0
Report
Advertisement
महायुती के सुहास शिरसाठ की औरंगाबाद-जालना में बड़ी जीत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये भाजपचे सुहास शिरसाठ यांचा विजय झाला. त्यांना ४५५मते मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांना १३५ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार इसाक खान यांना ३५ मते मिळाली. तर पाच मते बाद ठरली. निवडणुकीमध्ये ६३० जणांनी मतदान केले होते. विजयानंतर मंत्री अतुल सावे आणि उमेदवार सुहास शिरसाट यांची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे मतदारांनी आज कौल हा महायुतीच्या बाजूने दिला आणि महायुतीला आज राज्यात सगळीकडे यश प्राप्त झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ४५५ मतं मिळाली. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला ४५० प्लस मतं मिळतील. आम्ही विरोधी पक्षाला पण विनंती केली होती की आपलं कॅल्क्युलेशन लक्षात घेऊन आम्हाला पाठिंबा दिला तर बिनविरोध निवडणूक होईल, पण त्यांनी उमेदवार दिला. मला खात्री होती. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एनसीपी अजितदादा ग्रुपला आज बहुमत दिलं आणि सगळ्यांनी आम्ही एकत्र लढल्यामुळे आज आम्हाला भरपूरयश मिळालं. घोडेबाजार कोण केलं, तर त्यांनी केलं. आम्ही घोडेबाजार केला नाही कारण आमच्याकडे संख्याबळ होते. एमआयएम सोबत त्यांची छुपी युती आहे. त्यांना एमआयएमची सेंकड प्रेफरन्सची मतं घ्यायची का गरज पडली? आमची ४१९ मतंच आमची होती, जी बाकीची ADDITIONAL मिळाली आहेत, ती अशाच अपक्ष, मित्रपक्ष यांची मिळाली आहेत. घोडेबाजार कोण केला, काय केला, हे त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. सुहास शिरसाट महायुतीच्या सर्व नेत्यांनी याठिकाणी जो विश्वास माझ्यावर टाकला, आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केलं. त्याचाच हा विजय आहे. महायुतीची ४१९ मतं होती आणि मतदानात जास्त मते मला मिळाली.0
0
Report
महाराष्ट्र विधानसभा में महायुती की भारी जीत, बहुमत के साथ सरकार बनने की चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर आशिष देशमुख भाजपा आमदार, 121 भाजपा उमेदवारचा महाविजय आहे... काँग्रेस उमेदवाराला चपराक आहे देशासाठी महत्त्वाच असलेलं महिला आरक्षणाचा विधेयक पारित व्हावं.. 2/3 बहुमत एनडीएच व्हावं.. त्यामुळे ऑपरेशन टायगर अंतर्गत आलेल्या खासदारांचा आम्ही स्वागत करतो आमदार येऊ ये इच्छिता महाराष्ट्रात 288 पैकी 237/238 आमदार महायुतीचे आहे... तीन चतुर्थांश महायुतीचे आमदार आहे.. सत्ताधारी पक्षाचा आहे त्यामुळे अजून काही आमदार यावे अशी गरज मला तरी वाटत नाही लोकसभेचे किंवा राज्यसभेचे खासदार येत असतील तर त्यांचे स्वागत आहे... मात्र आमदारांची खरच गरज आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी आहे सत्ताधारी पक्षात असलेल्या आमदारांवर जर अन्याय नको असेल तर जर विकासाचा निधी अपेक्षित असेल.....पुढच्या निवडणुकीत उमेदवारी जर राज्यामध्ये सर्वदूर मिळायची असेल इथे अनावश्यक असलेल्या आमदारांची गर्दी कशाला हा माझा प्रश्न आहे0
0
Report
महायुती के धैर्यशील कदम विजयी: सांगली-सातारा विधान परिषद चुनाव
Kolhapur, Maharashtra:सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे. वैद्य ठरलेल्या एकूण मतांपैकी 593 मत मिळवत धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला आहे. विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिह जगताप यांना 292 मत मिळाली. या निकालानंतर बोलताना विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी निश्चित करताना आपल्यावर विश्वास टाकला याबद्दल आभार मानले. या निवडणुकीत कोणतीही मतं फुटली नाहीत असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी 292 मते मिळाल्याची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या मतांपेक्षा महायुतीच्या बाजूने मतांचा भडका असल्याचा जगताप यांनी दावा केला."0
0
Report
Advertisement
