icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अंबेगांव के ग्रामीणों ने आठवीं कक्षा तुरंत शुरू करने और आश्रमशाला बहाल करने की मांग की

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गम आंबे गावातील ग्रामस्थांनी शिक्षणाच्या हक्कासाठी थेट घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरू केले आहे. गावात आठवीचा वर्ग तात्काळ सुरू करून, पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळा पूर्ववत करावी, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागाणी आहे. २००३ पासून सुरू असलेली ही शाळा २०१३-१४ मध्ये शासनाने बंद केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत शाळा सुरू करण्याचे लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report

मालाड में सफेद पट्टी विवाद: मनसे ने विरोध किया, प्रशासन ने कार्रवाई का भरोसा दिया

Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये पांढऱ्या पट्टीवरून वाद; मनसेचा निषेध, कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन मुंबईच्या मालाड पूर्व परिसरात रस्त्यावर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. नवजीवन शाळेजवळील दाफ्तारी रोड परिसरात जैन साधूंच्या भ्रमंतीनिमित्त एका सोसायटीलगतच्या रस्त्यावर पांढरी पट्टी काढण्यात आली होती. या प्रकाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला. मनसेचे कांदिवली पूर्व विभागप्रमुख महेश फरकासे यांच्या कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पांढऱ्या पट्टीवर काळी पट्टी रंगवत निषेध नोंदवला आणि सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारच्या खुणा परवानगीशिवाय करण्यात येत असल्याचा आरोप करत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली. आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित पांढरी पट्टी पूर्णपणे काळ्या रंगाने झाकून टाकली. यावेळी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमांनुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल, असे आश्वासन मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. मात्र, या घटनेप्रकरणी अद्याप पोलिस किंवा मुंबई महानगरपालिकेकडून कोणताही अधिकृत एफआयआर दाखल झाल्याची किंवा फौजदारी कारवाई सुरू झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सोनम वांगचू की रात में अस्पताल दाखिला; नागपुर में उग्र हिंदुत्व प्रदर्शन पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर : संजय राऊत ऑन सोनम वांगचू धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी त्यांचा उपोषण होत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेतला नाही आणि आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचू यांना मध्यरात्री पोलिसांनी जो जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केला, हा देश किती हुकूमशाही मार्गाने चाललेला आहे. सोनम वांगचू यांच्या प्राण्यांची तुम्हाला इतकी किंमत असती, तर उपोषण सुरू झाल्यावर त्यांच्या मागण्या संदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती, ती भूमिका घेतली नाही सोनम वांगचू यांच्यावर दडपशाही करण्याचे शिक्षकांनी आहे की, आज नागपुरात जी हिंदुत्वाची धडक आहे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिर लुटी विरुद्ध एक एल्गार आहे त्या कार्यक्रमावरच लक्ष वळवाव म्हणून सोनं वगचू यांना काल रात्री दडपशाही मार्गाने अटक करून हॉस्पिटलमध्ये नेलं. ऑन नवनीत राणा पोस्टर याबाबत मला माहित नाही ऑन रामरक्षा निमंत्रण आमच्या कर्तव्य आहे, आम्ही या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो, अयोध्येमध्ये मुक्तीचं आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना भाजपचे काही लोकं असतील हे सर्व सहभागी झाले, तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचे जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे. त्यामुळे जे जे रामभक्त आहे हिंदू आहे, त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही सहसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वांना आमंत्रित केले आहे जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्यामुळे तिची पूजा अर्चना झाली असेल तर स्थापन केले असतील, त्या मूर्तीची आज आम्ही पूजा करणार आहोत म्हणूनच आम्ही संघ मुख्यालयात आमंत्रण दिले आहे तुमच्याच हस्तापर्शने स्पर्शाने पावन झालेल्या या मूर्ती आहेत, यात कुणाला राजकारणाचा गंध येत असेल तो त्यांच्या प्रश्न आहे आम्हाला असे वाटते की सर्वांनी यावे जनता तर येईलच त्यांच्या हिंदीतून वेगळा आमच्या हिंदुत्व वेगळा त्यांच्या राम वेगळा आमचा राम वेगळा असा नाही आहे. राम एकच आहे या राष्ट्राच्या आत्मीयतेचा प्रतीक आहे, आणि जी लढाई रामासाठी अयोध्येत झाली त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही भाजप कार्यक्रम होर्डिंग 22 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस आहे आम्ही त्यांना उदंड, दीर्घायु, निरोगी, आणि राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिलेले आहे. मी तर नेहमी म्हणतो त्यांच्यात राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्र नाही त्या देशाचे नेतृत्व करावे अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे त्याच्यासाठी त्यांनी यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकच आमच्या शुभेच्छा मध्येसुद्धा ताकद आहे. ऑन राम मंदिर पत्र त्यांनी मला पत्र दिले आहे आणि त्या पत्रामध्ये सर्व आमच्या कार्य चालेल, आम्ही मंदिर आणि मंदिराचा परिसरामध्ये कोणतेही राजकारण करणार नाही तर आमचा व्यासपीठ रस्त्यावर आहे शिवसेना पक्षप्रमुख त्या मंचावरून जनतेला संबोधणार आहे. ऑन NCP एकत्र एकत्र येण्याची चर्चा दोन वर्षापासून सुरू आहे सुप्रियाताई, जयंत पाटील असेल की विनायक गर्ग आहे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ऑन मोहन यादव (mp CM) असं कानून बनवत आहे काय, असे केलं तर अर्धी बीजेपी रिकामी होईल, समान नागरीक कानून जे आहे किंवा तिहेरी तलाक चा मुद्दा असेल आम्ही त्यांना समर्थन केला तर तुम्हाला बदलाव करावा लागेल जो पत्नीला सोडतो त्यालाही त्या कानून मध्ये आणावे लागेल असे भरपूर आहे ही पब्लिक रॅली नाही आहे, कोणता तिने रॅलीमध्ये इतके लोक येतील असं नाही आहे आम्ही जनतेला निमंत्रण दिले आहे आणि कार्यकर्त्यांना, विशेष करून उद्धव ठाकरे हे मंदिरात पूजा करायला येत आहे आणि पूजेत ज्यांना यायचे आहे ते येतील, विरोधकांना रक्षा पठणकरता येते, पण त्यांनीच तर मंदिरात चोरी केली आहे रामरक्षा तुम्हाला पूर्ण वाचता येते की नाही हे चरित्राचा सर्टिफिकेट नाही आहे, हे लोक आहे जे मंदिरात बसले आहे ते फटाफट राम रक्षा बोलतात त्या लोकांनीच रामाला लुटले आहे ऑन उपराष्ट्रपती वक्तव्य त्याच्यामध्ये शंका घेण्याचा काहीच कारण नाही कारण आता मनामध्ये शंका का येते कदाचित राम मंदिराच्या लुटीमध्ये काही अशा लोकांच्या सहभाग आहे ते समोर आल्यामुळे त्यांना असं बोलावसं वाटलं असेल जेव्हा सोनम वांगचू जेव्हा उपोषणाला बसले, तेव्हा सरकारने त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे होती 21 दिवस त्यांच्या शरीराची झीज होऊ दिली त्यांच्या ऑर्गन फेलुअरची वेळ आली आणि आता तुम्ही त्या शिक्षण मंत्राची मंत्राला दूर करण्याऐवजी सोनम वांगचू यांना अटक करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
0
0
Report

आषाढी एकादशी के लिए ११६ विशेष बस: वारकऱों को पंढरपुर सीधे पहुंचाने की योजना

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे. वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी तब्बल ११६ विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही गावातील किमान ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यंदाची आषाढी यात्रा २० ते ३० जुलैदरम्यान होणार असून,२५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोला विभागाने आगारनिहाय बसचे नियोजन पूर्ण केले असून, प्रवाशांची संख्या वाढल्यास अतिरिक्त बसही उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.तसेच वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून, सुरक्षित किफायतशीर आणि सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळाने सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे.
0
0
Report

सोनम वांगचुक मामले पर विपक्ष का तीखा हमला, सरकार पर दबाव बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - इम्रान प्रतापगडी, काँग्रेस खासदार *ऑन सोनम वांगचुक* - सरकारने आज एका सोनम वांगचुक सारख्या वयोवृद्ध व्यक्तीला इतक्या दिवसांपासून उपोषण सुरू असताना पोलिसांकडून उचलून नेले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. सरकार आंदोलन दडपण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला नाही. आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो. - लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. हणून लोकांवर अन्याय करायचा का? हे सरकार डरपोक आहे. *ऑन मोहन यादव* - आजचा मुद्दा सोनम वांगचुक यांचा आहे. मोहन यादव यांच्यावरील कथित घोटाळ्यांच्या आरोपांवर सरकार मौन का बाळगत आहे? सरकार निष्ठा, इमानदारी आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांची भाषा करते, मग त्यांच्या कार्यकाळात असा कथित भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? - एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायचे असेल, तर त्याच्याशी संवाद साधून डॉक्टरांकडे नेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना ओढत-ताणत अशा पद्धतीने दवाखान्यात नेणे चुकीचे आहे. शिक्षणमंत्र्यांची नेमकी भूमिका आणि मनशा काय आहे?
0
0
Report
Advertisement

सोनम वांगचूक आंदोलन को मनसे का समर्थन, CM परिवर्तन पर शुभकामनाएं

Kalyan, Maharashtra:सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर 'दोघांनाही शुभेच्छा', तर NCP फुटीबाबत राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरल्याचा राजू पाटील यांचा दावा. अमित ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे सोनम वांगचूक यांना पाठिंबा द्यायला पाहिजे राज ठाकरे यांनी देखील पोस्ट केलेली आहे. एक माणूस राजीनामा मागण्यासाठी बसलेला आहे वीस विद्यार्थ्नी आत्महत्या केलेली आणि यावर कुणी लक्ष देत नाही ही चिंतेची बाब आहे. अशा व्यक्तीला पाठिंबा दिला नाही तर याला काही अर्थ नाही त्यामुळे आमचा यांना पाठीमागे आहे. देवेंद्र फडणिस दिल्ली जाणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार या ज्या चर्चा सुरू आहे यावर राजू پाटील यांनी बोलताना دوघांना मनसेच्या शुभेच्छा असे सांगत यावर बोलणं टाळलं. कोणी महाराष्ट्रातला केंद्रात जात असेल आणि इकडे वेगळे मुख्यमंत्री होत असतील एक मराठी म्हणून याचा अभिमान असला पाहिजे फडणवीस साहेब पंतप्रधान याला आमच्या शुभेच्छा यात वाईट वाटण्यासारखं काय. NCP बाबत राज ठाकरे यांनी आधीच भाकीत केली होती की पहिली खेप गेली आहे दुसरी लवकरच जाईल या सर्व गोष्टीला उशीर झाला दुर्दैवाने अजित दादांचा दुर्दैवी अंत झाला मात्र ही लोक तेव्हाच या सगळ्या गोष्टी झाले असेल. दोन्ही सेना एकत्र होतील या विषयावर आम्हाला काय माहिती नाही आणि काही देणं घेणं देखील नाही.
0
0
Report
Advertisement

लड़ाख के सामाजिक कार्यकर्ता के उपोषण पर राजनीतिक प्रतिक्रिया, मोड़ने को लेकर नाराज़गी

Akola, Maharashtra:केंद्र सरकारविरोधात लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू केलेल्या उपोषणावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी 21 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मोडून काढत त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिटकरी म्हणाले, आंदोलनकर्त्याला बळजबरीने रुग्णालयात दाखल करून उपोषण मोडणे हे लोकशाहीला पोषक नाही. देशात संविधान आणि लोकशाही असल्याचा दावा केला जात असताना अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होणे अत्यंत वेदनादायी आणि निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, आम्ही सरकारमधील घटक पक्ष असलो तरी चूक ती चूकच आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततामय आंदोलन করারाचा अधिकार आहे. त्यामुळे ही घटना संतापजनक असून तिचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

लोकतंत्र खत्म, हुकूमशाही शुरू: देश में आंदोलन उग्र, विपक्ष क्या तय करेगा

Kolhapur, Maharashtra:सतेज पाटील बाईट मुद्दे लोकशाही संपलेली आहे, हुकूमशाही सुरू झाली आहे। राहुल गांधी गेल्या दोन-तीन महिन्यापासून नीट भ्रष्टाचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी काँग्रेसकडून देखील पाठपुरावा सुरू आहे हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं हलवण्यात आलं कोर्टातून ऑर्डर घेऊन हे आंदोलन मोडायचं हे नियोजन करण्यात आले यानिमित्ताने हुकूमशाही सुरू झाली आहे। देशात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे विद्यार्थ्यांसाठी देहराडून मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छात्रो की गुंज कार्यक्रमात वेगळा मुद्दा समोर आला सरकारला चूक झाली हे माहित आहे, तर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.. नव्या पिढीसमोर एक संदेश द्यायला पाहिजे.. पण सरकारची भूमिका आंदोलन चिरडण्यासाठी आहे अण्णा हजारेंची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावे. शक्तीपीठ आंदोलन गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा हे महाराष्ट्रातील लोकांची भूमिका बारा जिल्ह्यातील अनेक मंडळी आज पंढरपूरमध्ये एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नामदेव पायरी इथं साकडे घालणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेत आहोत.. किमान विठ्ठलाकडे बघून मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ बाबत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका.. जयंत पाटील जयंत पाटील जाणार नाहीत याची मला निश्चित खात्री आहे, आज भाजपची अवस्था काय.. मूळ भाजपची अवस्था काय.. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश वाळवांकर यांची अवस्था काय आहे हे पहा.. आज मंत्रिमंडळात मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडून आलेले लोकच आहेत मूळ भाजपवाले सतरंज्या उतरण्याचं काम करत आहेत.. राम मंदिर राम मंदिरात जो दरोडा पडला आहे, तो उघड व्हावा ही काँग्रेसची भूमिका. लोकांच्या भावना तुम्ही किती दुखवणार आहात.. या संदर्भात एस आय टी नेमली आहे, पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. एका बाजूला प्रभू रामाच्या नावाने मत मागायची आणि कृती मात्र रावणाची करायचे असे दिसून येत आहे. जात पडताळणी आम्ही सातत्याने विधिमंडळात सांगितले आहे. जात पडताळणीची माणसं दबावाखाली काम करत आहेत. जात पडताळणीची विंडो कायमस्वरूपी ओपन ठेवावे.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणी नको. कोल्हापुरातील महायुतीतील संघर्ष आम्ही पाहिला आहे .. गडहिंग्लज नगराध्यक्ष यांचे देखील जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला, पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. यावरून महayuतीमध्ये देखील कशा प्रकारचा संघर्ष सुरू आहे हे दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

यवला के धुळगाव में किसान की कारला बाग रातोंरात उखाड़ी, 15 लाख का नुकसान

Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी कांदा पिकाला भाव नसल्यामुळे पारंपरिक शेती सोडून पीक कर्ज काढून मोठ्या कष्टाने कारल्याची बाग उभी केली होती बाजारात कारल्याला 700 रुपये प्रति कॅरेट भाव मिळत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात मनोविकृताने कारल्याची बाग मुळासकट उपटून नष्ट केली या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आहे शेतकऱ्याचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून येवला तालुका पोलिसात आज्ञा व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या संदर्भात आढावा घेतला आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top