445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दहिसर चेक नाक्यावर 33 लाख रुपए के प्रतिबंधित गुटखे के साथ गिरफ्तार चालक
Mumbai, Maharashtra:मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट-१२ ने दहिसर चेक नाक्यावर मोठी कारवाई करत गुजरातहून मुंबईत आणला जाणारा सुमारे ३३ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी आयशर टेम्पो चालकाला अटक करण्यात आली असून या अवैध गुटखा रॅकेटचा तपास सुरू आहे. पाहूया हा रिपोर्ट. गुप्त माहितीच्या आधारे क्राइम ब्रांच युनिट-१२च्या पथकाने दहिसर चेक नाक्यावर सापळा रचला. गुजरातहून मुंबईकडे येणारा संशयित आयशर टेम्पो अडवून तपासणी केली असता, मिठाच्या पोत्यांमागे लपवून ठेवलेला विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी ४२ पोती आणि १५ बॉक्स गुटखा जप्त केला. जप्त गुटख्याची किंमत सुमारे १९ लाख रुपये असून वाहनासह एकूण जप्त मालमत्तेची किंमत सुमारे ३३ लाख रुपये आहे. या प्रकरणी टेम्पो चालक दिलीप कुमार पाल (३०) याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा गुटखा मुंबईतील विविध भागांत पुरवठ्यासाठी आणला जात असल्याचे समोर आले आहे. या अवैध साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास क्राइम ब्राँचकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रANCH यूनिट-१२ आणि एफडीएच्या अधिकारीांनी संयुक्तपणे केली. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
रत्नागिरी-सातारा के रघुवीर घाट में बारिश से फिर दराड़ गिरने से यातायात बाधित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली.. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली असून माती रस्त्यावर आल्याने काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.. गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी डोंगराचा भाग खचला होता,त्याच ठिकाणी आता धबधब्यांनी विक्राळ रूप धारण केले असून रस्त्यावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत आहे.. या नैसर्गिक आपत्तीमुळे खेड-अकलपे ही एसटी बस दीड तास घाटात मधोमध अडकून पडली होती, त्यामधील शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी तिथेच अडकले आहेत.. या दरडीमुळे सातारा जिल्ह्यातील १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून,अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाने सुरक्षित बाहेर काढले..0
0
Report
मिरज पंचायत समिति सभापति चयन रद्द, पुनः चुनाव के निर्देश
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकींग ईश्वरपूर नगराध्यक्ष पाठोपाठ,मिरज पंचायत समिती सभापती पद अपात्र.. जयंत पाटलांन पाठोपाठ खासदार विशाल पाटलांना दणका मिरज पंचायत समितीचे सभापती पद ठरवण्यात आलं रद्द मिरज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापती पद रद्द अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून करण्यात आली कारवाई सभापती पदाच्या निवडणुकीत अपारदर्शकता व सदस्य अपहरण प्रकरणी करण्यात आली कारवाई सभापती पदाची निवडणूक पुन्हा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश.. भाजपाच्या कवलापूर पंचायत समिती सदस्य राणी भोरे यांनी दाखल केली होती याचिका शिवसेना शिंदे पक्षाच्या एका सदस्याच सभापती निवडणुकी दरम्यान अपहरणाचा झाला होता प्रकार एका मताने महाविकास आघाडीच्या तन्वी कमलेकर यांचा सभापती म्हणून झाली होती निवड बहुमत असून देखील भाजपाला मिरज पंचायत समिती मध्ये स्वीकारावा लागला होता पराभव..0
0
Report
Advertisement
चंद्रपूर में गांजा विक्रेता ने विष पीकर आत्महत्या, पुलिस पर आरोप
Chandrapur, Maharashtra:गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चंद्रपूर शहर पोलीस ठाणे आवारात विष प्राशन, उपचारादरम्यान झाला मृत्यू. दिलीप यादव -४४ असं मयताचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओ वायरल झालाय. माझी कुठलीही चूक नसताना मला ठाण्याच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचे यात नमूद केले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील बाबूपेठ परिसरात गांजा विक्री प्रकरणी शहर पोलिसांनी धाड टाकली होती. या धाडीतील आरोपीने दिलीप यादव बाबत माहिती दिली होती. त्यावरून दिलीप यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. मात्र आज तो पोहोचताच त्याने ही कृती केली. पोलीस तपास सुरू आहे. मयताच्या भावाने मात्र वसुलीच्या छळानंतर आत्महत्या केल्याचे सांगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी स्वतः रुग्णालयात पोहोचत स्थितीचा आढावा घेतला. हा मयत पोलीस ठाण्यात येण्याआधी त्याने विष प्राशन केले होते आणि तो उलटी करत पोलीस ठाणीत प्रवेश केला हे सीसीटीव्हीत स्पष्ट झाल्याची माहिती त्यांनी दिली. मयताने मृत्यूआधी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत काही पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित छळाची तक्रार केली आहे. त्या संदर्भात सखोल चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. बाईट १) अनुप यादव, मयताचा भाऊ बाईट २) आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
मनमाड़-येवला मार्ग पर बाइक दुर्घटना: चालक फरार, एक की मौत, दो घायल
Yeola, Maharashtra:अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मनमाड - येवला मार्गावरील अनकाई बारी नजीक असलेल्या अशोकबाबा आश्रमात समोर घडली. अपघातातील मृत व जखमी तिघेही येवला तालुक्यातील देशमाने येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.0
0
Report
भोस्ते घाट के खतरनाक मोड़ का चौड़ाईकरण शुरू, 55 करोड़ निधि से सुरक्षित यात्रा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. भोस्ते घाटातील मृत्यूचा सापळा ठरणारे वळण इतिहासजमा; 55 कोटींच्या निधीने रुंदीकरणाचे काम सुरू! मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. खेडजवळील भोस्ते घाटातील ज्या धोकादायक तीव्र वळणावर आजवर अनेक भीषण अपघात झाले, त्या वळणाचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शासनाने या वळणाच्या रुंदीकरणासाठी तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, प्रत्यक्ष कामाला जलदगतीने सुरुवात झाली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यांत हे काम पूर्ण होऊन हा प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच भोस्ते घाटातील प्रवाशांचा प्रवास निर्धोक आणि चिंतामुक्त होणार आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में शिक्षा व्यवस्था ध्वस्त, मनसे ने प्रशासन पर पोलखोल कर दी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा क्षेत्रात शिक्षणाचा अक्षरशा बोजवारा उडाला असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता देखिल धोक्यात आहे. शाळा सुरु होऊन महिला उलटला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केलेय. धक्कादायक म्हणजे नवी मुंबई मनपाच्या अग्निशमन विभागाने नवी मुंबई मनपाच्या 80 शाळांचे फायर ऑडिट करण्यास नकार देत त्रयस्थ संस्थेद्वारे फायर ऑडिट करावे असे पत्र शिक्षण विभागाला दिलेय. एखादा नगरसेवक अथवा अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांच्या कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून हा कट शिजवल्याचा आरोप मनसेने केलाय. यासोबतच सभागृह नेत्यांनी गाजावाजा करत आणलेले शिक्षण रूपांतरण धोरण लागू करत यावर्षी पासून सर्व शाळेतील नर्सरी प्रवेश इंग्रजी माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाकडे नवी मुंबईकरांनी पाठ फिरवली असून केवळ 128 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमात प्रवेश केलेय. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हा नॉर्णय सपशेल फेल ठरल्याने नवी मुंबईकरांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय.0
0
Report
चंद्रपुर में गांजा विक्रेता ने पुलिस परिसर में विष पीकर आत्महत्या, अस्पताल में मौत
Chandrapur, Maharashtra:गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगाराने चंद्रपूर शहर पोलीस ठाणे आवारात विष प्राशन केला. घटना लक्षात आल्यावर तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान या गांजा विक्रेत्याचा मृत्यू झाला. दिलीप यादव -४४ असं मयताचं नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओ वायरल झालाय. माझी कुठलीही चूक नसताना मला ठाण्याच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचे यात नमूद केले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील बाबूपेठ परिसरात गांजा विक्री प्रकरणी शहर पोलिसांनी धाड टाकली होती. या धाडीतील आरोपीने दिलीप यादव बाबत माहिती दिली होती. त्यावरून दिलीप यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. मात्र आज तो पोहोचताच त्याने ही कृती केली. पोलीस तपास सुरू आहे. मयताच्या भावाने मात्र वसुलीच्या छळानंतर आत्महत्या केल्याचे संगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे0
0
Report
प्रशासक काल के दौरान महापालिकाओं में भ्रष्टाचार: कांग्रेस विधायक विश्वजित कदम का आरोप
Sangli, Maharashtra:स्लग - प्रशासक काळात राज्यातील महापालिकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार - काँग्रेस आमदार विश्वजित कदम. जाल्या चार वर्षात महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही,सत्ता नसताना त्या काळात काय काय भ्रष्टाचार झालाय,हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असं विधान देखील आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे,सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टी सह विविध प्रश्नांवर आमदार विश्वजित कदम यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली,यावेळी ते बोलत होते.0
0
Report
Advertisement
लिंक न मिलने से बैठक भारी देरी, विधायक भास्कर जाधव ने प्रशासन पर सवाल उठाए
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीच्या लिंकसाठी दोन तास ताटकळले; बैठकीतच भास्कर जाधवांच्या संतापाचा स्फोट अँकर रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीची लिंकच वेळेत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तब्बल दोन तास ताटकळत राहिले. दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीची लिंक पावणेदोन वाजेपर्यंतही न मिळाल्याने दिशा समितीची बैठक संपून गेली. अखेर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होताच आमदार जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा साधा शिष्टाचारही नाही का? ही नेमकी कोणती कार्यपद्धती? असा खरमरीत सवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरही त्यांनी या गंभीर हलगर्जीपणाचा जाब विचारला. एका लोकप्रतिनिधीला वेळेत बैठकीची लिंकही न पाठवता प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची जोरदार टीका यावेळी करण्यात आली.0
0
Report
महाराष्ट्र में राजनीति घनघोर घमासान: राम मंदिर से ईवीएम तक तीखे सवाल
Ratnagiri, Maharashtra:जयंत पाटील–तावडे–एकनाथ शिंदे भेट: अधिकृत जानकारी नसताना कोई भी मत व्यक्त करना उचित नहीं. रामरक्षा पाठन आंदोलन: मोहन भागवत ने मुख्यमंत्री को निमंत्रण देने के लिए उचित बताया. भाजपा का 'उद्धव ठाकरे ने रामरक्षा पढ़नी चाहिए' आरोप: यह हमें बताने वाले कौन? चोरी करने वालों ने हमें सिखाने से बाज आना चाहिए. हनुमान चालीसा वाद: राज ठाकरे ने मशिदी के सामने हनुमान चालीसा पढ़ने की भूमिका निभाई थी. मातोश्री मशिद है क्या? मातोश्री के सामने जाने वालों को शर्म नहीं आती क्या? ऐसा सवाल. राम मंदिर चोरी प्रकरण: चोर के उलटे बोला. धर्म के आधार पर चोर को माफ नहीं किया जा सकता. इनकी श्रद्धा राम पर नहीं दान पर है, ऐसी तीका. ये लोगों को लाज शर्म क्यों नहीं आती? मातोश्री पर आने वाले अब राम मंदिर चोरी के बाद कहाँ गए? नवनीत राणा: ऐसे लोगों की समाज में पात्रता क्या? उनके बारे में मुझे कुछ बोलना नहीं. भाजपा ने ऐसे लोग बनाए हैं. कर्जमाफी/वीजबिल घोषणा: फडणवीस बोट पर की स्याही घुमाने में माहिर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना. अदानी के मीटर इस्तेमाल करें, बिजली बिल माफ करें, यह अदानी के लिए चला रहा प्रयास है, ऐसा आरोप. संगमेश्वर छत्रपती संभाजी स्मारक: यह अजित पवार का सपना था. देवेंद्र फडणवीस ने स्मारक के बारे में शब्द दिए और आगे बढ़ाने का कहा. डिलिमिटेशन सुप्रिया_sule भाष्य: सुप्रिया_sule के भूमिका के संदर्भ देत, पहले तय के अनुसार विधेयक आए तो घटक पक्ष चर्चा कर पाठिंबा दें या नहीं, ऐसा कहा. पावसाळी अधिवेशन: महाराष्ट्र में इस समय अधिवेशन से जनता के भाग्य में कुछ नहीं. रोज नई थाप, विरोधी पक्ष को गाली, विरोधी पक्ष को बोलना नहीं चाहिए, यही चल रहा है. जिस विभाग की चर्चा होती, उसी विभाग के मंत्री गायब रहते हैं. दांडीबहाद्दर मंत्री: सभा में एक दिन भी नहीं आए तो चल सकता है. दो-तीन अधिवेशनों को नहीं आए, अवकाश का कारण अध्यक्षों को नहीं बताया जाए तो कार्रवाई हो सकती है. इसका फायदा मंत्री और सत्ता धारी उठा रहे हैं. लाडकी बहीण, साड़ी योजना: केंद्र और राज्य सरकार चुनाव के समय आकर्षक घोषणाएं करते हैं और चुनाव जीतते हैं. 2014 में दो करोड़ रोजगार देंगे, काला पैसा लायेंगे और हर के खाते में 15 लाख रुपये देने का दावा था. हुआ क्या? वन नेशन, वन इलेक्शन हुआ? पुलवामा हमला हुआ, चुनाव जीते. राम मंदिर का उद्घाटन पिछली बार हुआ, चुनाव जीते. मराठा, धनगर, लिंगायत के आरक्षण का क्या हुआ? सिर्फ थापा मारने का काम शुरू है. लाडकी बहीण योजना के 92 लाख लाभार्थी कम किए गए. दिवाली के समय एक साड़ी दे रहे थे, वह भी बंद कर दी गई. यह लाडकी बहीण योजना नहीं, लाडकी खुर्ची योजना है. राज्य की स्थिति: राज्य की स्थिति गंभीर है. लोकतंत्र खतरे में है. ईवीएम घोटाला, मतचोरी, मतदार गायब ऐसे प्रकार से चुनाव जीते जाते हैं. अब दूसरे पक्ष के निर्वाचित प्रतिनिधियों को ही खरीदकर पार्टी में लिया जा रहा है. यह लोकतंत्र के लिए घातक मार्ग है. मुंबई लोकल अपराध: मुंबई लोकल में सुरक्षा खतरे में है. रेल्वे में दिनदहाड़े हत्या, बलात्कार, चोरी और भ्रष्टाचार बढ़ा है. गृहखाते केवल पुलिस की वकालत कर रहा है. राज्य में कानून और व्यवस्था रसातल में गई है. कानून और व्यवस्था के बारे में कहने योग्य एक भी अच्छी बात नहीं.0
0
Report
रामदास कदम: केंद्र से 3500 करोड़ निधि मिलती तो नदियाँ साफ़, महाराष्ट्र का चेहरा बदलेगा
Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी रामदास कदम (माजी पर्यावरण मंत्री) बाईट On बदलते वातावरण विकासाबरोबर पर्यावरण संरक्षणालाही प्राधान्य द्या. सरकारने विकासापेक्षा पर्यावरण रक्षणावर अधिक भर द्यावा. पर्यावरण मंत्री असताना 23 प्रमुख नद्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. माझे मंत्रिपद गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तो प्रस्ताव पुढे नेला नाही. प्रस्ताव मंजूर झाला असता तर केंद्राकडून सुमारे साडेतीन हजार कोटींचा निधी मिळाला असता. त्या निधीतून नद्यांची स्वच्छता व संवर्धन होऊन राज्याचे चित्र बदलले असते. On पत्नीला वनश्री पुरस्कार पत्नी ज्योती कदम यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद. आजवर 50 हजारांहून अधिक झाडांची लागवड केली. गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवताना 50 हजार झाडे होती; आता त्यात आणखी 15–20 हजार झाडांची भर. वृक्ष लागवडीचे कार्य पुढेही सुरू राहणार. प्रत्येक मुलाने किमान एक झाड लावावे, असे आवाहन. On जाखडी नृत्य राजाश्रय गेली 30 वर्षे जाकडी लोककलेच्या संवर्धनासाठी कार्य. गणेशोत्सवात जाकडी पथकांना ढोलकी, टाळ व इतर साहित्याचे वाटप. मंत्री योगेश कदमही हा सांस्कृतिक वारसा पुढे नेत आहेत. जाखडी लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. रामदास कदम pointer एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयात जाऊन सत्ताधारी पक्षातील नेत्याने त्यांची भेट घेणं हे चांगलं आहे..दरवेळी भास्कर जाधवांकडे कावीळ या नजरेने बघणं हे योग्य नाही..पक्ष डोळ्यासमोर न बघता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भेट.. यात आशिष शेलारांचं कौतुक..त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी..मी भास्कर जाधव नाही मी रामदас कदम आहे मी प्रत्येक शब्द जबाबदारी ने बोलतो..भास्कर जाधव जी स्वप्न बघतायत ती बिचारांची साकार होत नाहीत..आता बघू स्वतः मंत्री तिथे जाऊन आले आता तरी फरक पडतो का..आगे आगे देतो होता है क्या..0
0
Report
Advertisement
यूपी से पकड़ा गया सीरियल फ्रॉडस्टर, विधवा महिलाओं को बंधक बना कर लूट
Kalyan, Maharashtra:लग्नाच्या नावाखाली लूट! विधवा-घटस्फोटीत महिलांना टार्गेट करणारा ‘सीरियल फ्रॉडस्टर’ उत्तर प्रदेशातून अटकेत. अनुज संतोष तिवारी उर्फ अनुजकुमार त्रिवेदी असं अटक करण्यात आलेल्या ४८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. हा भामटा मूळचा उत्तर प्रदेशच्या सीतापूरचा राहणारा आहे. या भामट्याची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत धक्कादायक होती. शादी डॉट कॉम, मॅट्रिमोनिअल डॉट कॉम आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांतून तो अशा श्रीमंत महिला शोधायचा, ज्या एकट्या राहतात, विधवा आहेत किंवा ज्यांची मुले परदेशात आहेत. एका ७३ वर्षांच्या वृद्ध महिलेशी ओळख वाढवून त्याने आधी तिच्या घरातील दागिने चोरले, तिच्याच नावावर सिम कार्ड काढले आणि तिला पुण्यात हायक्लास सोसायटीत घर घेण्याचे आमिष दाखवून तिचे राहते घरही विकायला लावले आणि 57 लाख रुपये हडप केले. हा भामटा ओळख लपवण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या नावावरील सिम कार्ड वापरायचा. अशाच प्रकारे त्याने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत दागिने, पैसे आणि कर्ज काढून कोट्यवधी रुपयांना लुटले आहे. एका प्रकरणात तर या नराधमाने महिलेचे लैंगिक शोषणदेखील केले. तब्बल एक वर्ष पोलीस याच्या मागावर होते. अखेर विष्णुनगर पोलीसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या भामट्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मुले दाखल असून या भामट्याने देशात आणखी किती महिलांना लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.0
0
Report
चिपळूण पंचायत समिति ने तुकाराम मुंढे के अभिनंदन का प्रस्ताव सर्वसम्मति से मंजूर किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव; चिपळूण पंचायत समिती ठराव मांडणारी राज्यातील पहिली समिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची दखल घेत चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुदृढ ठेवायचे असेल, तर तुकाराम मुंढे यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या विभागात गरज असून त्यांची बदली करू नये, अशी मागणी या ठरावातून करण्यात आली. हा ठराव सदस्य गौरव पाटेकर यांनी मांडला असून सभेतील सर्व सदस्यांनी त्याला एकमताने मंजुरी दिली. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा असा ठराव मंजूर करणारी चिपळूण पंचायत समिती राज्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.0
0
Report
चंद्रपुर में फिर लौटा टस्कर हाथी, सावली के हरंबा-उमरी इलाके में दहशत
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतला टस्कर हत्ती, सावली तालुक्यातील हरंबा-उमरी परिसरात पुन्हा एकदा हत्तीचा वावर याच तस्कर हत्तीने काही दिवसात घेतला आहे त्यांचा बळी अँकर:--- गडचिरोली जिल्ह्यात परतलेला रानटी टचकर हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला आहे. वैनगंगा नदी ओलांडून या हत्तीने सावली तालुक्यातील हरंबा -उमरी भागात प्रवेश केला आहे. हा 30 रानटी हत्तींचा कळप असून तो पावसाच्या आधी गडचिरोलीला परत गेला होता. मात्र त्यातील एक टस्कर हत्ती ऐन खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दाखल झाल्याने शेतकरी आणि विभागाची चिंता वाढली आहे. वनविभागाचे पथक हत्तीच्या हालचालीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. वनविभागाने आपली चमू या भागात सक्रिय केली असून हत्तीचे दर्शन झाल्यास त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला याची माहिती द्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
