445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई गोवा मार्ग के घाट में एसटी बस और बल्कर की भिड़ंत, 9 यात्री जख्मी
Chendhare, Maharashtra:एसटी बस आणि बल्करची समोरासमोर धडक होऊन कशेडी घाटात अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव गावाजवळ एसटी बसमधील 9 प्रवासी जखमी झाले. हा अपघात रात्री साडे11 वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींवर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बसमधून एकूण 31 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातग्रस्त बस खेड इथून बोरिवली कडे निघाली होती.0
0
Report
ठाकरे सेना ने चchipळूण की नगरपालिका पर धावा, प्रशासन से जवाब की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमें ठाकरे सेनेची पालिकेवर धडक.. अपूर्ण कामांवरून प्रशासनाला विचारला जाब.. आंदोलनाचा इशारा.. शहरातील प्रलंबित कामे, प्रशासाने ढिलाई आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पालिकेवर धडक दिली... शहर प्रमुख भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेत निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला..0
0
Report
वनविभाग के साहसिक रेस्क्यू से रानगवा जीवित बचकर जंगल लौट गया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण मध्ये वनविभागाची थरारक कामगिरी.. डोहात पडलेल्या रानगव्याला जीवदान.. अँकर रत्नागिरीतील चिपळूणमध्ये वनविभागाने एका रानगव्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे. ओवळी येथील सुकविलवाडीत एका खोल नैसर्गिक डोहात हा रानगवा अडकला होता. दुर्गम भाग असल्याने यंत्रसामग्री नेणे अशक्य होते, अशावेळी वनविभागाचे पथक आणि ग्रामस्थांनी डोहात दगड टाकून रानगव्यासाठी मार्ग तयार केला. रात्री ८ ते ११ चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर ६ ते ७ वर्ष वयाचा हा रानगवा सुखरूप बाहेर पडला आणि जंगलात निघून गेला. वनविभागाच्या या 'मिशन सक्सेस'चे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
राज्यसभा सीट पर चक्रव्यूह: अमोल मिटकरी ने जताई उम्मीद, निर्णय अभी बाकी
Akola, Maharashtra:विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी सध्या प्रतीक्षेत असून परिवार आणि मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवत कॅरम खेळताना दिसत आहेत. पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून विधान परिषदेसाठी सुमारे ७५ नावे चर्चेत असल्याची माहिती आहे. मात्र, यापैकी केवळ एकाच उमेदवाराची निवड होणार असल्याने उर्वरित इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. उमेदवारीबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, अद्याप पक्षाकडून कोणताही अधिकृत फोन आलेला नाही. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतही कोणतीही सूचना मिळालेली नाही. मी माझ्या पद्धतीने अर्ज आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही निरोप मिळालेला नसल्यामुळे सध्या मी निवांत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संघर्षात मी सुरुवातीपासून सोबत आहे आणि कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. दरम्यान, विधान परिषदेसाठीच्या या जागेवर अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वर्धा में ओवरहिट से ट्रांसफॉर्मर में आग, विद्युत आपूर्ति बाधित
Wardha, Maharashtra:वर्ध्यात ओव्हर हिट मुळे भर रस्त्यावरच ट्रान्स फार्मर जळाले वर्ध्यात पावडे चौक परिसरात अचानक ट्रान्सफार्मरने पेट घेतलाय अचानक आग लागताच नागरिकांनी धावपळ करीत आग वीझविण्याचा प्रयत्न केला लवकर विजपुरवठा खण्डीत करण्यात आला वाढत्या तापमानामुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत0
0
Report
विमानतळ परिसर में लग्न समारोह से आग, फटाकों की चिंगारी से घास-जंगल जला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात बुधवारी लागलेली आग, ही लग्नाच्या मिरवणुकीत पेटवलेल्या फटाक्यांमुळे लागल्याचं पुढं आलं आहे, फटाक्यांची ठिणगी उडून विमानतळ परिसरातील लाकूड व वाळलेल्या गवतावर पडून ही आग लागली. रडार परिसरातच ही आग लागल्याने बुधवारी रात्री 9 वाजता विमानतळ परिसरात काही काळ गोंधळ उडाला. बघ्यांच्या गर्दीमुळे जालना रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विमानतळाचा रडार परिसर स्वच्छ करण्यात आला होता. झाडांच्या फांद्या, वाळलेले गवत कापून एकत्र ठेवले होते. बुधवारी विमानतळ परिसरातील एका लॉन्समध्ये विवाह सोहळा होता. त्यापैकी बविमानतळाच्या रडार परिसरात ही आग लागली होती. जालना रस्त्यावरून गेलेल्या लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.0
0
Report
Advertisement
करजगी में ग्रामीण अस्पताल के लिए जमीन मंजूर, कदम उठाने की तैयारी
Solapur, Maharashtra:अक्कलकोट तालुक्यातील करजगीमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा, मंत्रालयात आढावा बैठक संपन्न सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीस आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तिला अनेक वर्षांपासून जागेचा प्रश्न रखडलेला होता या गावची अनेक दिवसांपासून मागणी होती आखे ती पूर्ण करण्यात आलीय. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आवश्यक त्या सूचना देत प्रस्तावाच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग सुकर झालाय.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में अवैध गर्भपात के 3 रैकेट सामने, पथोलॉजी लैब का खुलासा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दीड महिन्यांत अवैध गर्भपाताचे 3 रॅकेट समोर आले. या सर्व ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या. गर्भपाताच्या गोळ्यांचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असताना त्यांचा चॉकलेट, बिस्किटप्रमाणे सर्रास बाजार सुरू आहे. धक्कादायक म्हणजे मंगळवारी उघडकीस आलेल्या रॅकेटमध्ये एका पॅथॉलॉजी लॅबचालकाचा सहभाग समोर आला. जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅबची ना आरोग्य विभागात नोंदणी होते, ना मनपाकडे. त्यामुळे या लॅबची कोणी तपासणीच करत नाही. त्यातून अनधिकृत लॅब वाढून गैरप्रकारांना हातभार लागत आहे. या प्रकारामुळे आता कारवाईची मागणी जोर धरतेय.0
0
Report
गर्मी के कहर में पानी की तलाश में हिरण का रेस्क्यू, वन विभाग ने नैसर्गिक आवास में वापस छोड़ा
Yeola, Maharashtra:पाण्याच्या शोधात असलेलं एक हरीण येवला तालुक्यातील पिंपळखुटे बुद्रुक येथील सागर महाराज मुंडे यांच्या शेतात पडले होते. ही बाब त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवली. यावेळी वन विभागाचे मच्छिंद्र आरखडे, विजय रोठे आदींनी घटनास्थळी येऊन या हरणाला सुरक्षित रेस्क्यू करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के नंदिकेश्वर मंदिर परिसर में हथियारबंद संदिग्ध गिरफ्तार, दो युवक हिरासत में
Washim, Maharashtra:वाशीम: अध्यक्ष: वाशीम शहरातील नंदिकेश्वर मंदिर परिसरात घातपाताच्या तयारीत फिरत असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन धारदार तलवारी आणि एका आरोपीच्या कंबरेला लटकवलेला खंजीर जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांची ओळख अक्षय गजानन वानखेडे (वय 26) आणि जय राम चव्हाण (वय 18), दोघेही वाशिम येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शस्त्रे का बाळगली होती याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे。0
0
Report
कुंभ मेळा घोटाले: विभागीय आयुक्त की नकली हस्ताक्षर से 70 करोड़ का ठेका उजागर
Nashik, Maharashtra:*कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने ७० कोटी रुपयांचे कंत्राट* अँकर कुंभमेळ्याच्या कामांची लगीनघाई सुरू असताना ७० कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश आणि तेही नाशिकचे विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकाण उघड झाला आहे. यासंदर्भात एका व्यक्तीने गेडाम यांच्या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. नाशिकरोड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपये खर्च करून कामे होत आहेत. त्यामुळे अनेकांचा हात साफ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका ठगाने विभागीय आयुक्तांची बनावट सही वापरून पस्तीस कोटींच्या दोन कामांच्या कार्यारम्भाच्या प्रती तयार केल्या. २८ एप्रिल रोजी सिडको येथील नीळकंठ शेवाळे नामक व्यक्तीने त्यांच्याकडे कुंभमेळानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली बसवत कार्यान्वित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा आणि देखरेख व्यवस्था पुरवण्याबाबतचे दोन कार्यारंभ आदेश दाखवले. हे पत्र नांदेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन पाटील यांनी दिल्याचे सांगितले. यात अभिषेक संजय झरे, संस्थापक संचालक इनोव्हेटिव्ह एआय ऑटोमेशन सोल्युशन एजन्सी ठाणे यांच्या नावाचे कार्यारंभआदेश होते. याची पडताळणी करताना कुंभमेळा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पेलिंगवरून ओळखले. त्यांचे स्वीय सहायक विजय सोनवणे यांच्या तक्राऱयानंतर गुन्हा दाखल करण्यात आला0
0
Report
आठवें मामले में अशोक खरातला फिर अदालत में; SIT कोठडी और लैंगिक शोषण के आरोप
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - भोंदू अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात पुन्हा न्यायालयात करण्यात येणार हजर - एसआयटी पोलिस कोठडीसाठी करणार जोरदार युक्तिवाद - सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेतले - महिलांवरील लैंगिक शोषण आणि जादूटोणा प्रकरणातील आणखी एका गंभीर गुन्ह्यात आज खरातला न्यायालयासमोर उभे केले जाणार - आठव्या गुन्ह्यातही महिलेवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप - एसआयटीकडून पुढील पुरावे, गुंगीकारक पदार्थ आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी अपेक्षित - ‘ओकस प्रॉपर्टी’ कार्यालयातील काल घेतलेल्या नव्या झाडाझडतीनंतर तपासाला अधिक गती - आठव्या गुन्ह्यात न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष0
0
Report
Advertisement
युद्धविराम के बाद टोमैटो कीमतें 400-500 रु प्रति 20 किलोग्राम, किसानों में खुशी
Niphad, Maharashtra:गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादकांना टोमॅटो उत्पादन करणे परवडत नव्हते त्यात युद्धकाळात टोमॅटोचे दर प्रति 20 किलो कॅरेट साठी अवघे 100 ते 120 इतका नीचांकी दर मिळत होता मात्र सध्या युद्धविराम झाला असून आखाती देशातील टोमॅटोची मागणी वाढल्याने टोमॅटो उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत सध्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी टोमॅटोची आवक वाढली असून टोमॅटोला प्रति 20 किलो कॅरेटला 400 ते 500 रुपये दरमळ्यात असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी वर्ग समाधानी झाले आहेत0
0
Report
बाढ़ से प्रभावित विद्यार्थियों के लिए महाराष्ट्र बोर्ड ने शुल्क वापस करने का निर्णय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णतः परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील एकूण २८२ तालुक्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याविषयीच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळांनी मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याना दिल्या आहेत. त्यानुसार २ मे पर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांची माहिती पाठवावी लागणार आहे... छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोलीसह इतर बाधित जिल्ह्यांतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.0
0
Report
लातूर में पिवला पानी समस्या: अमित देशमुख ने निगम को कड़े निर्देश दिए
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूरकरांना पिवळ्या पाण्याचा त्रास... पिवळं पाणी टाकीत सोडू नका, स्वच्छ पाणीच द्या...आमदार अमित देशमुखांचा महापालिकेला इशारा... लातूर शहरात पिवळ्या पाण्याच्या तक्रारी समोर येत असतानाच आमदार अमित देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पिवळं पाणी येत असेल तर ते पाणी शहराच्या टाकीतच सोडू नका, जेणेकरून नागरिकांच्या नळापर्यंत दूषित पाणी पोहोचणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी तातडीने बिघाड दुरुस्त करून पाणी स्वच्छ झाल्यानंतरच शहरात पाणीपुरवठा करावा, अशी सक्त सूचना अमित देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन आता किती तत्परतेने काम करते, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. आमदार अमित देशमुख0
0
Report
Advertisement
