445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलढाणा दुष्काळ सूची से बाहर; किसानों का भारी प्रदर्शन
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर आला आहे! मेहकर तहसील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं. अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आणि प्रशासनाला धारेवर धरलं. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान होवत असताना बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांचं अनुदान द्या, तसेच दुष्काळातील सर्व सवलती लागू करा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.0
0
Report
लोनार सरोवर के जलस्तर बढ़ने से मंदिर डूबे, नवरात्रि से पहले आंदोलन की चेतावनी
Buldhana, Maharashtra:लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीने चिंता वाढली! कमळजा माता मंदिरासह प्राचीन मंदिरे पाण्याखाली; नवरात्रापूर्वी पाणी काढण्याची मागणी एक वर्षात पाणी कमी करण्याचे आश्वासन हवेतच? सरोवराचा pH आणि क्षारांचे गुणधर्म बदलल्याने जैवविविधतेला धोका! पाणीपातळी अशीच वाढत राहिल्यास मानव-वन्यजीव संघर्षाची भीती जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीने आता गंभीर संकट निर्माण झालंय! सरोवराचं पाणी सातत्याने वाढत असून, वाढलेल्या पाण्यामुळे कमळजा माता मंदिरासह परिसरातील काही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी संबंधित विभागाने एका वर्षाच्या आत सरोवरातील पाणी कमी करून दाखवू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र वर्ष उलटलं तरी प्रत्यक्षात पाणी काढण्याचं काम सुरू झालेलं नाही. दरम्यान, पाण्याची पातळी आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये होणारे बदल लोणारच्या वैशिष्ट्यपूर्ण अल्कधर्मी जैवविविधतेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पाण्यामुळे जंगल क्षेत्र कमी झाल्यास वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. आता नवरात्र उत्सव तोंडावर आला आहे. कमळजा माता मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असल्याने पाणी कमी न झाल्यास विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.0
0
Report
यवतमाळ में भीषण गर्मी के बीच बारिश से किसानों को मिली राहत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये उन्ह तापत असताना आणि प्रचंड उकाडा असताना आज सकाळपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बरसला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर फुटबॉल खेळाडूंनी या पावसाचा आनंद घेत खेळ रंगविला. कोरडवाहू शेतातील पिके करपली आहेत मात्र ओलिताच्या भरवशावर शेतीपिके जगविलेल्यां शेतकऱ्यांना हा पाऊस काहीसा दिलासा देणारा ठरला.0
0
Report
Advertisement
अनुऊर्जा प्रकल्प: पहली फीड में BT एड शुरू करने की चर्चाएं
Ratnagiri, Maharashtra:0
0
Report
योगेश कदम: दापोली अणुऊर्जा परियोजना पर जनता की राय ही मेरा फैसला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जनतेचा कौल असेल तोच माझा निर्णय; दापोलीत निसर्गाला हानी पोहोचवणारा प्रकल्प खपवून घेणार नाही — मंत्री योगेश कदम.. अँकर दापोलीत होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्प बाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी.. प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचवली जाईल; त्यानंतर ग्रामस्थ आणि मतदार जो निर्णय घेतील, तोच माझा निर्णय असेल..असं म्हटलंय.. कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला समर्थन दिले जाणार नाही.. दापोली परिसरातील विकासाची संभाव्य संधी पाहता स्थानिकांनी आपल्या जमिनी परप्रांतीय किंवा बाहेरच्या लोकांना विकू नयेत.. केवळ दिखाऊ कामे न करता रस्ते, पाणी, धरणे आणि दळणवळणाच्या माध्यमातून मतदारसंघाचा शाश्वत आर्थिक विकास साधणार.. याआधी मंत्री योगेश कदम यांनी आपल्या मतदारसंघातील दापोलीत अणुऊर्जा प्रकल्प होणार असं सांगितलं होतं.. आता आपल्याच मतदारसंघातील जनतेचा विरोध पाहून योगेश कदम यांनी यूटर्न मारलाय.. अणुऊर्जा प्रकल्पाबाबत दापोलीतील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या स्थानिक ग्रामदेवतेला प्रकल्प होऊ नये याबाबत साकडं घातलं होतं.. Bt योगेश कदम.. गृहराज्यमंत्री0
0
Report
एमपीएससी के सुधार रोडमैप से भर्ती प्रणाली में पारदर्शिता और सुरक्षा बढ़ेगी
Nagpur, Maharashtra:*एमपीएससीच्या बळकटीकरणाची निश्चितच गरज आहे... त्यांच्याकडू. काही चुका निश्चितच झाल्या असतील, मात्र यापूर्वी त्यांनी परीक्षा योग्य रीत्या घेऊनही दाखवल्या आहे... आताच्या प्रकरणात कोण दोषी, याची चौकशी एसआयटी करेल....* परीक्षा पद्धतीत सुधारणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख वी राधा यांचे वक्तव्य.. एमपीएससीबद्दल उमेदवारांच्या मनात निश्चितच विश्वासाची कमतरता निर्माण झाली आहे... मात्र, संस्थेचे बळकटीकरण करून आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करू, असे मत परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी व्यक्त केले आहे... एमपीएससीचा आकृतीबंध वाढवून अधिक कर्मचारी आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, एमपीएससीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाकडून रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. * एमपीएससीचा आकृतीबंध वाढवून अधिक कर्मचारी देण्याची गरज. * एमपीएससीची स्वतःची इमारत तयार होत असून, संस्थेला सुरक्षित आणि आवश्यक संसाधने देणे गरजेचे. * यूपीएससीदेखील परीक्षा आयोजित करते; त्यामुळे परीक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा विचार आवश्यक. * निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेच्या मदतीने निवडणुका घेतो; * त्याचप्रमाणे एमपीएससीला प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात स्वतंत्र कर्मचारी असणे आवश्यक नाही.. * एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून, यापूर्वीही तिने व्यवस्थित काम करून दाखवले आहे. * परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासन एमपीएससीला रोडमॅप देणार. * एमपीएससीमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन. * भ्रष्ट कारभाराबाबत झिरो टॉलरन्स असायला हवे; दोषींवर कारवाई होणे आवश्यक. * परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि दोषींवरील कारवाई या दोन स्वतंत्र बाबी आहेत. Byte - व्ही राधा, परीक्षा पद्धतीत सुधारण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख आणि राज्य सरकारच्या अप्पर मुख्य सचिव0
0
Report
Advertisement
वासिम के खरोळा गांव में एक एकड़ से इरानी अकरकरा, लाखों रुपये की आय की उम्मीद
Washim, Maharashtra:अँकर:सोयाबीन शेती अडचणीत असताना वाशीमच्या खरोळा गावातील युवा शेतकऱ्याने औषधी वनस्पतीच्या शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. विष्णू ठाकरे यांनी एक एकरात ‘इराणी अकरकरा’ची लागवड केली असून, या पिकातून दोन ते तीन लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. व्हीओ:विष्णू ठाकरे यांनी जुलै महिन्यात एक एकर क्षेत्रात अकरकराची लागवड केली. अकरकराच्या फुलांना औषधनिर्मिती उद्योगात मागणी असल्याने बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे.सध्या फुलांची तोडणी सुरू असून, फुले सुकवून मध्य प्रदेशातील नीमच बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जात आहेत. एक एकरातून ९ ते १० क्विंटल उत्पादन अपेक्षित असून, सध्या २५ ते ३० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे खर्च वजा जाता दोन ते तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. एन्ड व्हीओ:विशेष म्हणजे अकरकरासाठी फवारणी आणि मशागतीचा खर्च तुलनेने कमी असल्याचं सांगितलं जात आहे.खरोळ्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनीही या पिकाची लागवड केली आहे.सोयाबीनला पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरत आहे. बाईट: विष्णू ठाकरे, प्रयोगशील शेतकरी0
0
Report
भिवंडी में पूर्व विधायक नरेंद्र पवार और पुलिसकर्मी पर सामूहिक बलात्कार का मामला सामने
Kalyan, Maharashtra:सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस यांनी पीडित मुलीवर केला सामूहिक बलात्कार पिस्तूल दाखवत दोघांनी केला बलात्कार भिवंडी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने pिडीत तरुणीस आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारी वरून पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरुणी पिडीत तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंड वरील मोबाईल वर संपर्क साधून मदत मागितली.मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली.तिच्या जवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पिडीत तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाले.पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.परंतु ही घटना अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी असून देशात आणि राज्यात लाडकी बहीण म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी तर स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करून बळकावली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.यांना ४८ तासात अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे. पिडीत तरुणी0
0
Report
दौंड के रेकॉर्ड आरोपी दत्ता शिंदे पर दो साल का तडीपार
Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील राहू येथील रेकॉर्डवरील सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे याच्यावर यवत पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दत्ता शिंदे याच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे 19 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कायदा और सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी त्याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलं आहे. उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग यांच्या आदेशानुसार यवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.0
0
Report
Advertisement
कळंबा जेल में अधिकारी पर हमला, छह बंदीयों की धमकी से तनाव
Kolhapur, Maharashtra:कळंबा काराग्रहातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. कारागृहातील मोका प्रकरणातील सहा न्यायाधीन बंदी यांनी एकत्र येत तू लय नियमाने वागतोस शांत रहा नाहीतर आम्ही बाहेर गेल्यावर बघून घेऊ अशी धमकी देत कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी प्रकाश चव्हाण यांच्यावर दगडाने हल्ला चढविला. प्रकाश चव्हाण हे अधिकारी या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी न्यायाधीन बंदी यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आशुतोष वर्तले, विनायक चौगुले, आदम सय्यद, भारत शेट्टी आणि शाहिद सगळ्यात विरोधात वेगवेगळ्या शहरात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.0
0
Report
SC ने 492 दूध संस्थाओं की सदस्यता रद्द करने की याचिका खारिज की—निर्णय जस का तस
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या 492 दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे. त्यामुळे या संस्थांचे सभासदत्व व मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 3 सप्टेंबर रोजी 492 संस्थांच्या पात्रते संदर्भात दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. गोकुळच्या श्रीराम सहकारी दूध संस्था आणि Card सिद्धेश्वर सहकारी दूध संस्थेने या 492 दूध संस्थानविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.0
0
Report
राज्यात महायुती में खटके तेज: प्रमोद घोसळकर ने तटकरे पर तीखा हमला
Chendhare, Maharashtra:स्लग - रायगडात महायुतीमध्ये खटके कायम प्रमोद घोसाळकर यांची तटकरेंवर टीका त्यांना वाटतं रायगडचा सातबारा आमचाच भरत गोगावले हेच रायगडचे भाग्यविधाते अशांचा कुणी नाद करू नये, असा टोला घोसाळकर यांनी लगावला. शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता कडाडून टीका केली. रायगड जिल्ह्याचा सातबारा आपल्याच नावावर आहे असं काही जणांना वाटत होतं पण रायगड जिल्ह्याचे खरे भाग्यविधाते भरत गोगावले हेच आहेत, त्यांचा कुणी नाद करू नये, असा टोला घोसाळकर यांनी लगावला. बाईट - प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख0
0
Report
Advertisement
कारंजा में Eco-friendly गणेश मूर्ति ने पर्यावरण प्रेमियों को चकित कर दिया
Washim, Maharashtra:वाशिम के कारंजा शहर में इस साल गणराय का अनोखा अवतार देखा गया है। भाजी बाजार परिसर के श्रीमंत बाल हाऊसी गणेश मंडळ ने सुपारी, बडीशेप, वेलची और लवंग का इस्तेमाल कर 70 से 80 किलो वजन की आकर्षक गणेश मूर्ति बनाई है। जो पान के विड्यामे से लिया गया सामग्री से गणपती बाप्पा साकारला है। गणपती स्थापनेत इस विड्याला विशेष महत्त्व असते. या मूर्ती साकारण्यासाठी १५ किलो सुपारी, ५ किलो बडीशेप, १ किलो वेलची लवंग और मातीचा वापरण्यात आले असून, ती तयार करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही मंडळाने दैनंदिन वापरातील कडधान्यांपासून गणेशमूर्ती साकारली होती. यंदाच्या अनोख्या आणि पर्यावरणपूरक मूर्तीमुळे मंडळाचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिओ: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या व त्याचप्रमाणे काही मंडळे हे डीजे लावतात मात्र या मंडळांनी डीजे न लावता मागील अनेक वर्षापासून पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणपती बाप्पा साकारून स्थापन करत असल्याचे मंडळ सदस्य सांगतात तर यंदा पाऊस सुद्धा कमी आहे नदी व तलावामध्ये पाणी नाही त्यामुळे मोठमोठ्या मुर्त्याच्या विसर्जनाचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो त्यामुळे इतर मंडळांनी सुद्धा या मंडळाकडून आदर्श घेऊन पर्यावरण पूरक गणपती बाप्पा साकारून आदर्श घेण्याची गरज आहे.0
0
Report
अमरावती के धारणी में रेत तस्करी: एक नागरिक पर ट्रैक्टर चढ़ाने की कोशिश, प्रशासन चुप
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या धारणी तालुक्यात वाळू तस्करीचा धुमाकूळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या एका नागरिकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर संबंधित नागरिकाला काठीने मारण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या प्रकाराची माहिती प्रशासनाला देऊनही एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धारणी तालुक्यात दिवस रात्र वाळूची वाहतूक सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
भाग्यश्री पटवर्धन ने गणपती मंदिर में आरती के दौरान पुजारी का सम्मान नहीं किया
Sangli, Maharashtra:अँकर - अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी गणपती मंदिरात येऊन आरती करणे, पुजाऱ्याशी चुकीच्या पद्धतीने बोलणे हे,कृत्य हे उन्मानमत पणा आणि चुकीचे असल्याचे मत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा येऊन पूजा करणं हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत,आपली तब्येत तंदुरुस्त असून,अजून दोघांना लोळवेल,इतपत माझ्या अंगात ताकत आहे,असं स्पष्ट करत भाग्यश्रीने वडिलांची तब्येत ठीक नसल्याने आरतीची परंपरा पुढे नेण्यासाठी आपण सांगलीला आल्याचे सांगितलं होतं,यावरून विजयसिंह राजे पटवर्धन हे स्पष्टीकरण दिले आहे,तसेच 1940 च्या संस्थान कायद्यानुसारच संस्थानाचे युवराज म्हणून आदित्यराजे यांची नियुक्ती केल्याचा खुलासा,करत आरती दरम्यान पुजाऱ्यांचा अपमान भाग्यश्रीने केला असून तिने पुजारीची माफी मागावी,असे मत विजयसिंहराजे पटवर्धनांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
