icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भंडारा में गणेशोत्सव की तैयारी तेज, महंगाई से मूर्तिकार परेशान

Bhandara, Maharashtra:बाप्पाच्या आगमनाचे वेध... मूर्तिकारांची लगबग सुरू सार्वजनिक गणेश मंडळांच्या ऑर्डरनुसार मूर्तींना अंतिम रूप महागाईची झळ गणरायाच्या मूर्तींनाही... माती, रंग आणि सजावट साहित्य महागले... बाप्पोत्सवाच्या आगमनाच्या तयारीला भांडारा जिल्ह्यात वेग आला असून, शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळा बाप्पांच्या मूर्तींनी गजबजल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळां कडून मिळालेल्या ऑर्डरनुसार मूर्ती तयार करण्यात येत असून, अनेक मूर्तिंचे मातीचे काम पूर्ण झाले. आता मूर्तींवर अखेरचे रंगकाम आणि सजावटीचा शेवटचा हात फिरवला जात आहे. मात्र यंदा मूर्ती घडवताना महागाईचा सामना करावा लागत आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी लाल माती महागली आहे. त्याचबरोबर मूर्तीच्या बांधणीसाठी लागणाऱ्या तणसाच्या दरातही वाढ झाली आहे. तर मूर्तीला आकर्षक रूप देण्यासाठी वापरणाऱ्या रंग आणि सजावटीचे साहित्यही महागले आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम मूर्ती तयार करण्याच्या खर्चावर होत असल्याचं मूर्तिकार सांगत आहेत.
0
0
Report

चंद्रपूर की दहीहंडी विवाद: प्रतिभा धानोरकर पर भाजप की राजनीतिक चोट

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- वडेट्टीवारांच्या गावात प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी, भाजप नेत्यांनी ब्रह्मपुरीत आयोजित केलेल्या दहीहंडीला खा. प्रतिभा धानोरकर यांची हजेरी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात राजकीय वैर आहे. गेल्या काही महिन्यात तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या राजकीय वैमयानस्यला नव्याने धुमारे फुटले आहे. त्यातच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत नसलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघातल्या दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली. विशेष म्हणजे दहीहंडीचा हा कार्यक्रम भाजप नेत्यांनी आयोजित केलेला होता. दहीहंडीच्या या कार्यक्रमात आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीकाही केली. भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी तर अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात प्रतिभा धानोरकर आपल्या सोबत असल्याची आणि त्यांच्या मदतीने आपण विजय वडेट्टीवार यांचा पाडाव करू अशी घोषणाही करून टाकली. मात्र प्रतिभा धानोरकर यांनी मी चंद्रपूर जिल्ह्याची खासदार आहे असं सांगत वारंवार ब्रह्मपुरी मतदार संघातून मला निमंत्रण येत होतं आणि त्यामुळे मी दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला होकार दिल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी या सर्व प्रकरणावर "भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर मला यावर काही बोलायचं नाही" असं म्हणत अधिक बोलण्यास नकार दिलाय. विधानसभा निवडणुकीआधी प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी मतदार संघात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना अप्रत्यक्षपणे पराभूत करण्याचं आवाहन केल्याने मोठा गदारोळ झाला होता. त्यातच गेल्या काही दिवसात चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक नगरसेवक एकत्र आल्याचं चित्र निर्माण झालं होतं. तर आज ब्रह्मपुरीत काँग्रेस आणि भाजप मधील विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगjaniत्यार विरोधक एकत्र आल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात अनेक बदल घडून येण्याची चिन्हे आहेत.
0
0
Report

सातारा: डीजे पर बंधन संभव नहीं, आवाज पर नियंत्रण जरूरी

Satara, Maharashtra:कराड, सातारा राज्यात डीजेवर बंदी घालण्याबाबत जोरदार मागणी धरली असताना सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांनी डीजेवर बंदी येवूच शकत नाही, असे विधान केले आहे. त्यांनी डाॅल्बी आणि डीजे यामधील फरक सांगितला आहे. डाैल्बी ही टेक्नालाॅजी असते, त्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घालायला कुठेच सांगितले नाही. फक्त आवाजाची मर्यादा ठेवा सांगितले आहे. तर डीजे मुक्ती होवूच शकत नाही. कारण डीजे हा बाबा किंवा बाई पण असते. ती केवळ टेक्नालाॅजी चालवते. तेव्हा मुद्दा डाॅल्बीचा नाही, आवाजाचा आहे. तेव्हा ज्यांना डाॅल्बीला परवानगी पाहिजे, त्यांनी त्याच्या घरातील आज्जी- आजोबांना तेथे बसवावे मग परवानगी देवू असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांना केले.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के ऑर्केस्ट्रा बार पर ग्रामीण पुलिस का छापा, 15 महिलाएं समेत 28 गिरफ्तार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा, 15 महिलांसह 28 गिऱ्हाईकांवर ग्रामीण पोलिसांची कारवाई\n\n- सोलापुरातील भोगाव परिसरातील ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई \n\n- अश्लील नृत्य करणाऱ्या 15 महिलांसह 26 गिऱ्हाईकांवर करण्यात आली कारवाई \n\n- सदरच्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला तोकडे कपडे घालत अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याची माहिती समोर \n\n- रविवार रात्री सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने टाकला छापा \n\n- ऑर्केस्ट्रा बारवर केलेल्या कारवाईच्या दरम्यान 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
0
0
Report

पुणे में MPSC विद्यार्थियों के आक्रोश मोर्च के संदर्भ में विक्रम पाचपुते ने चर्चा की

Pune, Maharashtra:*पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांची विद्यार्थ्यांशी चर्चा पुणे : MPSC विद्यार्थ्यांकडून उद्या पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत शिक्षकांनी विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा उद्याचा मोर्चा संविधानिक पद्धतीने होत असेल, तर सरकारचा त्याला विरोध नाही. मोर्चाला सरकारने परवानगी दिली असून, तो रद्द करण्याची सरकारची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर न करता ते सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत पाचपुते म्हणाले की, आयोग ही स्वायत्त संस्था असून अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. त्यामुळे सरकारला अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा किंवा घेण्याचा अधिकार नाही. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे हा संबंधितांचा वैयक्तिक अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करण्यास हरकत नसल्याचे सांगताना, मात्र त्या प्रश्नांचा तात्काळ राजकीय वापर करणे योग्य नसल्याचे पाचपुते यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून, सरकार सर्व प्रश्न ऐकून घेण्यास तयार असल्याचे पाचपुते यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही सदस्यांचा समावेश करता येईल का, याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. SIR प्रक्रियेबाबत बोलताना पाचपुते यांनी नियमानुसार पात्र नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी झाली असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अद्याप सुरू असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

जुन्नर के स्मशानभूमि में संदिग्ध वस्तुएँ, नागरिकों में भय फैल गया

Shirur, Maharashtra:बोरी बुद्रुकच्या स्मशानभूमीत संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून चौकशीची मागणी केली जात आहे स्मशानभूमीत लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या तसंच महिला आणि पुरुषांच्या छायाचित्रांवर टोचलेल्या अवस्थेत आढळून आल्या या वस्तूंनी नेमक्या कोणी आणि कशासाठी ठेवल्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने यामागचं सत्य समोर आणण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी होत आहे अंधश्रद्धेला खतपाणी न घालता वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं आहे
0
0
Report
Advertisement

सोलapur में मराठा समाज का रास्ता रोको; राष्ट्रीय महामार्ग ठप, सरकार से तात्कालिक कदम

Solapur, Maharashtra:सोलापुरात मराठा समाज आक्रमक, अक्कलकोट ते सोलापूर महामार्गावर केला रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक. सकल मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. राज्य शासनाने मराठा समाजाचा अंत न पाहण्याची करण्यात आली विनंती. रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा सकल मराठा समाजाचा इशारा.
0
0
Report

मेलघाट में भारी बारिश से कारंजखेडा ka संपर्क टूट, पुल नहीं

Amravati, Maharashtra:मुसळधार पावसाने मेळघाटातील कारंजखेडा गावाचा संपर्क तुटला; नाल्यावर पूल नसल्याने आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास. मुसळधार पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. कारंजखेडा गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह महिला ज्येष्ठ नागरिक आणि इतर ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कारंजखेडा गावातील पुलाचा प्रश्न सरकार आणि प्रशासन कधी सोडवणार. तसेच आदिवासी बांधवांचा हा जीवघेणा प्रवास कधी संपणार. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

FDA ने कल्याण की प्रसिद्ध बेकरी सील कर दी

Kalyan, Maharashtra:कल्याण मधील नामांकित बेकरी एफडीएकडून सील Anchor- कल्याणमधील प्रिन्स या नामांकित बेकरीवर अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. Vo- या बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात भट्टीत लाकडांचा वापर केला जात असल्याने ही बेकरी सील करण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भाची तक्रार एफडीएला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली .या बेकरी मध्ये पाव तयार केले जातात आणि कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो .मात्र आता ही बेकारी सील करण्यात आल्यानंतर अशाच प्रकारे लाकडाचा वापर आपल्या भट्टीत करणाऱ्या बेकरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
0
0
Report
Advertisement

पुणे-बेंगलुरु हाईवे पर भिड़ंत: 5-6 घायल, यातायात बाधित

Sangli, Maharashtra:स्लग - पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन कारची समोरा-समोर जोरदार धडक.. ५ ते ६ जण जखमी.. अँकर - सांगलीच्या येडेनिपाणी फाट्याजवळ पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दोन इनोव्हा कारची अपघात झाला आहे.या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ५ ते ६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी इनोव्हा कारचे अचानक टायर फुटला.त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर गेली.यावेळी समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
0
0
Report

कल्याण में बंजारा समाज का पारंपरिक तीज उत्सव धूमधाम से सम्पन्न

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव उत्साहात संपन्न, गौरपूजनासह सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौटुंबिक स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, बंजारा समाजाची परंपरता, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा पारंपरिक बंजारा तीज उत्सव (गौरी) सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी कल्याणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीत आयोजित या सोहळ्यास बंजारा समाज बांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पद्धतीने तीज उत्सव साजराण्यात आला. विशेषतः अविवाहित मुली व महिलांसाठी आनंद, उत्साह आणि आपुलकीचा हा सोहळा ठरला. यावेळी गायन, नृत्य, एकमेकांचा परिचय तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. समाजातील महिला व युवतींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला. याप्रसंगी बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीचे अध्यक्ष मदन जाधव, यांच्यासह समाजातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
0
0
Report

ठाणे बेलापूर रोड पर रस्ता रोको: अधिकारी के खिलाफ FIR की मांग

Navi Mumbai, Maharashtra:शनिवार को संतप्त परिवार वालों ने ठाणे बेलापूर रोड पर रास्ता रोको किया और इस मामले में दोषी अधिकारी के खिलाफ FIR दर्ज करने की मांग की है। सुसाइड नोट में सहाय्यक पुलिस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील ने महापे स्थित लॉज पर आत्महत्या कर ली थी, जिसमें पुलिस अधिकारी संजयकुमार पाटील (डीसीपी), सहाय्यक पुलिस आयुक्त गिरीश ठाकूर और एक हेड कॉन्स्टेबल जयवंत आहिरे के नाम भी थे। नातेवाईकों ने इन नामों के ऊपर आत्महत्या के प्रवृत्त करने का मामला दर्ज करने की मांग की है। इस बीच शव के अंतिम कर्म के संबंध में पुलिस से चर्चा चल रही है और परिवार ने स्पष्ट किया कि अन्त्यविधि के लिए कोई तिथि नहीं तय कराई जाएगी जब तक प्राथमिकी दर्ज नहीं हो जाती।
0
0
Report
Advertisement

हिंदुत्ववादी सरकार के दौरान आंदोलन, अतिक्रमण और लव जिहाद के मुद्दों पर बवाल

Shirdi, Maharashtra:आ.गोपीचंद पडळकर बाईट मुद्दे - ऑन हिंदुत्ववादी सरकार असताना आंदोलन - समोरची लोक कायदा मानायला तयार नाहीत... सरकारी जागेवरती अतिक्रमण केली जात आहेत... ग्रामीण भागात अतिक्रमण करून प्रार्थनास्थळ उभी केलेली आहेत... नेवाशात पालिकेने अतिक्रमण कडूनही पुन्हा अतिक्रमण केली... म्हणजे तुम्ही कायदा मानत नाहीत... कायदा न मनणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर येतोय... आम्ही पाच महिन्यात 15 मुलींना लव्ह जिहादपासून परावृत्त केले... अनेक प्रकरण तर समोर पण येत नाहीत... त्यांची कार्यपद्धती संविधानाला न मानणारी... त्यामुळे आम्ही संघर्ष करतोय, सरकार आमच्या पाठीशी... ऑन ऋषीकेश शेटे हल्ला - हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला करण्याची हिम्मत होऊ नये म्हणून आम्ही इथे आलोय... पोलिसांसमोर दगड घातली जात आहेत, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय... या गोष्टींना चाप बसेल असा आम्हाला विश्वास... ऑन SHRP नंबर प्लेट - मी एस एच आर पी नंबर प्लेट बनवायला दिली आहे... ऑन सोलापूर मराठा आंदोलकांनी गाडी अडवली - मी कार्यकारिणीच्या निमित्ताने सोलापूरला गेलो होतो... मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आणि मी तिथे गेलो... त्यांनी माझी गाडी अडवली... मी तिथे माझी भूमिका स्पष्ट केली... आंदोलन करण्यात गैर नाही... मी योगायोगाने त्यांच्या आंदोलनात सापडलो... मी त्यांच्याशी चर्चा करूनच बाहेर पडलो... ऑन पुणे डीजे विरोधात मोर्चा - डीजेच्या आवाजामुळे अनेक समस्या... महाराष्ट्राला लोककला आणि परंपरा... पारंपारिक वाद्य वापरायला हवीत... गावाकडच्या लोककला बाहेर आल्या पाहिजेत... लोककलावंतांना संधी दिली पाहिजे... Byte - आ.गोपीचंद पडळकर
0
0
Report

इंदापुर में drought के दौर में किसानों को राहत, बारिश के लिए सरकार कदम उठाएगी

Rui, Maharashtra:इंदापूर*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण दगडवाडी राज्यात दुष्काळचे सावट आहे,पाऊस पडावा हे संकट दूर व्हावं असं नंदिकेश्वराच्या चरणी मी साकडं घालतो. राज्यात पाऊस पडू दे राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे असं साकडं मी नंदिकेश्वर चरणी घालतो. पाऊस नाही झाला तर आपण काही करू शकणार नाही,आज राज्यातील शेतकरी अडचणीत आहे.त्याला सरकारकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. आज अजित दादांनी आठवण येते,दादांना आपल्या सर्व प्रश्नांची माहिती जाण होती, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता आज आपल्यात नाही मी नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो की, निरवांगी दगडवाडी या भागात सिमेंटचे रस्ते केले आहेत.२८० कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे आपण या परिसरात करत आहोत. पाइपलाइन साठी रस्ते खोदू नका,त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होते. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर निमसाखर येथे पूल व्हावा इच्छा आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नीरा नदीवर पाणी अडवण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोललो आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तरच पाऊस पडेल,असा हवामान विभागाचा अंदाज आहे.एल निनो चे खूप मोठे संकट आहे.तुम्हाला झोप लागत तशी मला ही झोप लागत नाही. पाऊस नाही पडला तर काही खरं नाही,माझा जीव खूप तळमळतो मी नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो.आज दादांच्या उणीव जाणवते एकच विनंती करायची आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत,बारीक सारीक गोष्टी सोडून द्या वाद विवाद करू नका. पाठीमागे आपण मूठ झाकायला हवी होती ती आपण उघडी केली त्यामुळे आपल्याला त्रास झाला.मी गप्प बसणारा माणूस नाही,बावीस गावचा पाणी प्रश्न सोडवला जाईल,मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्टी घातल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल आहे तुम्हाला जिथे काही गोष्टी करायच्या असतील तिथे मी मदत करेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले आहे. मला उद्घाटन वगैरेची हाव नाही असा आमदार मिळेल का शेतीच्या पाण्यासाठी भविष्यात योग्य तो मार्ग काढला जाईल हा शब्द देतो. कर्जमाफी मध्ये सर्वांच व्यवस्थित झाले ना ? आणखी २ लाखाच्या पुढच्या याद्या येत आहेत.जिल्ह्यात आपला तालुका दुसऱ्या नंबर ला आहे. दादांनी कन्हेरी मध्ये शेवटच भाषण केलं होत त्यात त्यांनी सांगितलं होतं राजकारण राजकारणपुरत करा.
0
0
Report

यवला तालुक्य में पेयजल संकट, किसानों ने कालवाय से पानी सप्लाई की मांग

Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाच्या पाण्याअभावी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटचारी करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येवला तालुक्यातील विसापूर, गोरखनगर, वसंतनगर, अंकाई, सावखेडे, चांदगाव, नायगव्हाण, कुसूर, कुसमाडी, जायखेडे, आहेरवाडी, लहीत, हडपसावरगाव आणि खिर्डीसाठे या गावांमध्ये पावसाच्या पाण्याशिवाय पाण्याचा कोणताही पर्यायी स्रोत उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यांचीही मोठी कमतरता भासत असल्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटचारी निर्माण करून पाणी उपलब्ध करून दिल्यास या गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल. तसेच या परिसरातील शेतीला पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. या मागणीसाठी संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी स्वाक्षरीचे निवेदन खासदार समीर भुजबळ यांच्याकडे सादर करून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटाچارि करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top