icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

No hospital access on tough roads, now another woman’s death

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यात दुर्गम आदिवासी पाड्यावर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात सर्पदंश झालेल्या २५ वर्षीय सादुरी खरात यांना रस्ता नसल्याने झोळीतून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. उपचाराला विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं. अखेर सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शालकीबाई सोलंकी या महिलेचा काल मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर शालकीबाई सोलंकी यांनाही रस्ता नसल्याने झोळीतूनच उपचारासाठी न्यावं लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दोन घटनांनी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार गावातच घडला असून आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिका येत नाही कारण रस्ताच नाही. रुग्णाला वाहनातून नाही तर झोळीतून घेऊन जावं लागतं. मागील आठवड्यात सादुरी खरात यांच्या बाबतीतही हेच घडलं. सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना झोळीतून घेऊन जावं लागलं. आणि आता शालकीबाई सोलंकी यांच्या मृत्यूने ग्रामस्थांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. आजारी पडल्यावर वेळेत उपचार मिळतील का? नेहमी तेच तेच होत असल्याने ग्रामस्थांची निराशा स्पष्ट होती. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा सवाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचा बोर्ड इथे आहे. प्रत्यक्षात वाहन जाईल असा रस्ता कुठे आहे? जर रस्ता पूर्ण झाला असेल तर तो दिसत का नाही? आणि जर रस्ता पूर्ण झालेला नसेल तर रस्ता झाल्याचा बोर्ड इथे कसा? नामांतरानंतरही रस्ता असा का दिसत नाही? सादुरी खरात असोत किंवा शालकीबाई सोलंकी—नावं वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत—पण प्रश्न एकच आहे—रस्ता! कारण रस्ता नसेल तर रुग्णवाहिका पोहोचणार कशी? रुग्णालय वेळेत गाठणार कसं? वेळेत उपचार मिळणार कसे?
0
0
Report
Advertisement
Advertisement

दहीहंडी उत्सव में बिना अनुमति डीजे बजाने पर चार गिरफ्तारी

Rui, Maharashtra:दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग... विनापरवाना डीजे वाजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांनी एकत्रितपणे दहीहंडी संघ जमवून विनापरवाना डीजे वाद्य वाजवून तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे निदर्शनास आले. यावरून ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये डीजेची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत....
0
0
Report

हिंदू उत्सवों के दौरान डीजे पर लगी बंदिश पर सांसद संग्राम जगतاپ ने सवाल उठाए

Ahilyanagar, Maharashtra:हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा आरोप अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी केला. दहीहंडी उत्सवातील भाषणा दरम्यान साऊंड सिस्टीमवरील बंदीच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांवर टीका केली. वर्षभरात गणपतीचे १० दिवस, नवरात्रीचे ९ दिवस आणि दहीहंडीच्या काही तासांसाठीच हे साऊंड वाजतात. मग त्यावरच एवढा आक्षेप का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रात्री १० वाजताच खाकी वर्दीवाले येऊन सिस्टीम बंद करायला सांगत असतील, तर आपण कायदा पाळतोच; पण हिंदू सणांच्या वेळीच असा त्रास का दिला जातो? त्यामुळे जनतेने यापुढे हिंदू परंपरेला आणि सणांना विरोध करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे आवाहन करत संग्राम जगताप यांनी केलंआहे.
0
0
Report

हिंगोली के सेनगांव में खेत-झगड़े में दो गुट भिड़े, वीडियो में महिलाएं मारपीट करती दिखीं

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वझर खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून फवारणीचे ट्रॅक्टर शेतीच्या धुऱ्यावरून नेण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तसेच, एका महिलेच्या हातात शस्त्र असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनंतर सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

मनमाड में सर्पदंश से 11 वर्षीय बच्चे की दर्दनाक मौत

Nashik, Maharashtra:सर्पदंशाने 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू...\nमनमाडच्या अमरधाम परिसरातील घटना..\nअरुण सुनील पवार असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव..\nसर्पदंशाने अरुण सुनील पवार या अकरा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या मनमाड मध्ये घडली.अमरधाम परिसरात राहणाऱ्या अरुण शाळेत घरी परतल्यानंतर पलंगावर असलेल्या सर्पाने त्याला दंश केले. त्याला उपचारासाठी मालेगाव येथे नेत असतांना रस्त्यात त्याची प्राणज्योत मावळली.मयत अरुण इयत्ता 5 वी शिकत होता .शाळेत हुशार आणि गुणी होता. त्याच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

हिंदू त्योहारों की आवाज़ पर रोक नहीं: योगेश कदम ने बापट को दिया सीधा चैलेंज

Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी हिंदू सणांचा आवाज बंद होणार नाही; विद्याआनंद बापट यांच्या वक्तव्यावर योगेश कदम यांचं थेट आव्हान.. हिंदू सणांमधील ध्वनिप्रदूषणावरून पुण्यात विद्याआनंद बापट यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे.. यावर खेडमधील दहीहंडी उत्सवातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बापट यांना थेट आव्हान दिले आहे.. "हिंदू सण आणि उत्सव परंपरेनुसार उत्साहातच साजरे होणार, त्यांचा आवाज कोणीही बंद करू शकत नाही," अशी ठाम भूमिका कदम यांनी मांडली असून,त्यांच्या या वक्तव्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. बाईट मंत्री योगेश कदम..
0
0
Report
Advertisement

वाशीम में रानभाजी खाद्य महोत्सव में 23 प्रकार की रानभाज्यें प्रदर्शित

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: पारंपरिक आहारपद्धती, स्थानिक जैवविविधता आणि रानभाज्यांचे पोषणमूल्य विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी वाशिमच्या कामरगाव येथील पीएम.श्री.जिल्हा परिषद विद्यालयात रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात तब्बल २३ प्रकारच्या पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले, तर त्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध पारंपरिक पदार्थांचेही सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात कर्टुले, शेवगा, अंबाडी, चवळी, सुरणकंद, अळू, समुद्रशोक, केना आणि चमकोरा यांसह विविध रानभाज्यांचा समावेश होता. ज्वारी-बाजरीच्या भाकरी, धपाटे, अंबाडीची भाकर, शेवगा व समुद्रशोकबिर्याणी, तसेच करवंद, चिंच आणि पुदिन्याच्या सरबताचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक आहारपद्धतीसोबतच स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे पोषणमूल्य जाणून घेण्याची संधी मिळाली.
0
0
Report

अमरावती में नई हत्या: शहर में 34वीं वारदात, तनाव बढ़ा

Amravati, Maharashtra:अमरावती शहरात रात्री आणखी एकाची हत्या; 8 महिन्यांत अमरावती शहराततब्बल 34 हत्या, शहरात खळबळ अँकर :- अमरावती शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरल असून काल रात्री गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलवस्तू नगर येथे विशाल मनोहर वय २० वर्ष या तरुणाची चाकूने निर्घुणपने हत्या करण्यात झाली. कपिलवस्तू नगर भागात अज्ञात हल्लेखोरांनी विशालच्या पायावर आणि मांडीवर धारदार चाकूने वार केले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला आहे. यानंतर घटनास्थळी आणि रुग्णालयात परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. हत्येचं कारण अद्यापही पुढे आले नसले तरी घटनेनंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध पथक रवाना केली आहे. अमरावती शहरात चालू वर्षातील जानेवारी ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३४ हत्येच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून या आठवडाभरात तिघांची हत्या करण्यात आली दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीची हत्या प्रकरण ताज असताना पुन्हा जीवघेणा हल्ला करण एका शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आल्याने शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.
0
0
Report

नेपाल में महाप्रलय के बीच मेडिकल सर्टिफिकेट से योगिनी पाटिल बचे, जानिए पूरी कहानी

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे नेपाळ प्रलयातून बचावल्या योगिनी पाटील मेडिकल सर्टिफिकेटसाठी रुग्णालयात थांबावे लागल्याने नेपाळमधील महाप्रलयातून शेवगाव येथील महिला पर्यटक बचावल्या... योगिनी पाटील नेपाळमधील संकटाची थरारक कहाणी सांगितली... या 16 ऑगस्टला शेवगावहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाल्या होते...17 ऑगस्टला काठमांडू येथून पुढील प्रवासासाठी त्या निघाल्या... त्यांचा सुमारे दीडशे यात्रेकरूंचा समूह होता... मात्र, सगळे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले होते... दरम्यान योगिनी पाटील यांच्या ग्रुपमधील तहसीलदार स्मिता पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले... त्याच दिवशी सकाळी इमिग्रेशन सेंटरवर जाण्याचे सर्वांचे नियोजन होते...मात्र, तेथे मेडिकल सर्टिफिकेटची मागणी झाल्याने पाटील आणि त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना पुन्हा रुग्णालयात जावे लागले...तपासणी, प्रमाणपत्र मिळवण्यात वेळ गेला...त्याचवेळी इमिग्रेशन सेंटरच्या परिसरात महापुराचे पाणी घुसले...जेथे पाटील आणि त्यांचा ग्रुप जाणार होता , ते ठिकाण महापुरात नाहीसे झाले... हे सर्व समजल्यानंतर सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला... मेडिकल सर्टिफिकेटसाठी रुग्णालयात थांबावे लागल्याने आमचा जीव वाचला, असे योगिनी पाटील म्हणाल्या...तीन दिवस नेपाळमध्ये आक्रोश, भीती आणि भयाण शांतता होती... अनेकांची घरे वाहून गेली...या काळात स्थानिक नागरिक, गाईड यांनी मोठी मदत केली...महादेवाच्या कृपेनेच आम्ही घरी पोहचलो असं योगिनी पाटील यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top