icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

इंदापुर में आंधी-बारिश ने केले केले के बाग तहस-नहस कर दिए; किसान मुआवजे की मांग

Rui, Maharashtra:वादळी वाऱ्याचा पावसाचा इंदापूरला तडाखा.... केळीच्या बागा जमिनीवरती झाल्या आडव्या..... शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू..... पुणे जिल्ह्यातील इंदापुरात शुक्रवारी झालेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं ओरबाडून नेला आहे, शेतकऱ्यांच्या केळी बागा जमिनीवर आडव्या झाल्या असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाला आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतायेत इंदापूर तालुक्यातील सुरवड वडापुरी गावासह परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे करून आम्हाला या पिकांचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
0
0
Report

काश्मिरी पहचान के कारण होटल से निकाले जाने का दावा वायरल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये काश्मिरी ओळखीमुळे शहरातील हॉटेलमधून बाहेर पडण्यास सांगितल्याचा दावा एका काश्मिरी व्यक्तीने सोशल मीडियावर केल्याने चर्चा रंगली आहे. साजिद युसूफ शाह यांनी 'एक्स' या माध्यमावर केलेली पोस्ट व्हायरल झाली. साजिद युसूफ शाह यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, 'महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर, माझ्या काश्मिरी ओळखीशी संबंधित चिंतांमुळे मला (एका तासानंतर) हॉटेल सोडण्यास सांगण्यात आले. हॉटेलचे मालक नम्र आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी कबूल केले की, हा निर्णय अन्यायकारक आणि दुःखदायक होता; पण ते सूचनांचे पालन करीत होते, असे सांगितले. मी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि कोणताही वाद न घालता निघून गेलो. महत्वाचे म्हणजे साजिद शाह हे काश्मीर मध्ये भाजपचे प्रवक्ते आहेत..
0
0
Report

तुळजाभवानी मंदिर में नकली पुजारी, भक्तों से धोखाधड़ी का बड़ा खेल सामने

Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरात बोगस पुजाऱ्यांचे जाळे? बनावट ओळखपत्रांच्या आधारे भाविकांची लूट? दोन दिवसांत पाच संशयित पुजारी जाळ्यात; मंदिर प्रशासन अॅक्शन मोडवर अँकर सोने-चांदी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मंदिरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय... पुजारी असल्याचे भासवत बनावट ओळखपत्रांच्या आधारे भाविकांची फसवणूक केली जात आहे. मंदिर प्रशासनाच्या विशेष मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत पाच संशयित बोगस पुजारी जाळ्यात अडकले आहेत. नेमकं काय आहे हे बोगस पुजाऱ्यांचं रॅकेट... पाहुयात हा विशेष रिपोर्ट... VO 1 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काही जण स्वतःला अधिकृत पुजारी असल्याचे भासवत बनावट ओळखपत्रांच्या आधारे धार्मिक विधी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. VO 2 या प्रकाराची दखल घेत मंदिर प्रशासनाने विशेष पथकाची नियुक्ती केली. सलग दोन दिवस राबवलेल्या मोहिमेत पाच संशयित ब bogस पुजारी पथकाच्या ताब्यात आले. त्यापैकी दोन जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून तिघांची चौकशी सुरू आहे. BYTE रामेश्वर वाले सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक VO 3 मंदिर परिसरात अनधिकृत पुजारी व्यवसाय, भाविकांची दिशाभूल आणि नियमबाह्य धार्मिक सेवा रोखण्यासाठी ही मोहिम सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र काही व्यक्तींना बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्रे मिळत असल्याचा आरोप पुजारी मंडळांकडून करण्यात येत आहे. FVO परंतु तीन पुजारी मंडळांनी या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोने-चांदी घोटाळ्यानंतर आता बोगस पुजाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, मंदिर प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास धाराशिव.
0
0
Report
Advertisement

मृग किड़ा नक्षत्र के संकेत पर वाशीम के किसानों में पेराई तैयारी शुरू

Washim, Maharashtra:अँकर:वाशीम तालुक्यातील बाभुळगाव येथे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पारंपरिकदृष्ट्या पावसाचे सूचक मानला जाणारा ‘मृग किडा’ आढळून आला.मृग किड्याचे दर्शन होताच शेतकऱ्यांनी त्याचे पूजन करून चांगल्या पावसाची आशा व्यक्त केली.भारतीय कृषी परंपरेनुसार मृग नक्षत्राला विशेष महत्त्व असून, या काळात मृग किडा दिसणे हे समाधानकारक पावसाचे संकेत मानले जाते.त्यामुळे परिसरातील शेतकरी पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी अशा पारंपरिक नैसर्गिक संकेतांवर विश्वास ठेवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

धैर्यशील मोहिते पाटील ने गोरे के बयान पर जमकर हमला

Solapur, Maharashtra:Solapur ब्रेकिंग – संपलेल्या व्यक्तीवर मी चार चार वेळा बोलत नाही, धैर्यशील मोहिते पाटलांची राम सातपुते यांचे नाव न घेता सडकून टीका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रत्युत्तर. राम सातपुते यांच्यावर नाव न घेता सडकून टीका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पोस्टमन टीकेवर उत्तर. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका: जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन आहेत हे त्यांनीच ठरवावे. नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. माझे मतदार माझ्याबरोबर आहेत.. मतदारांबरोबर मी काम करतोय. सहाशे अदृश्य मतदार माझ्याबरोबर आहेत. राम सातपुते वक्तव्य: आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवले आहेत.. क्रॉस वेरिफिकेशन करावं. पालकमंत्री आणि ज्याचं नाव घेतलं, त्यांच्या प्रतिक्रिया बघा. दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आहेत. पालकमंत्री गोरे वक्तव्य: मी माझ्या पक्षाचा प्रचार करतोय आणि मतदारांना काय विकास होणार आहे ते सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी काय मदत केली है ते उघडपणे सांगितले आहे.
0
0
Report

नाभिक महामंडळ ने दाढ़ी कटिंग दर 20% बढ़ाने की घोषणा की

Nagpur, Maharashtra:Ngp Saloon shots Ngp saloon Byte live u ने फीड पाठवले ------------ आता दाढी -कटिंगसाठी 20 टक्क्यांनी दरवाढ झालीय. नाभिक महामंडळ प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती कार्याध्यक्ष श्याम आस्ककर यांनी दिलीय.सलून व्यवसायासाठी रोजच्या कामात वापरल जाणाऱ्या अनेक मटेरिअल पेट्रोलियम आणि केमिकलशी संबंधित आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी आपल्या प्रोडक्शन किमती वाढविल्यान दरवाढं केली.त्यामुळे सलून चालकांना स्थानिक पातळीवर दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले ---------------- बाईट --- श्याम आस्ककर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश कार्याध्यक्ष
0
0
Report

गोदावरी प्रदूषण पर शिवसेना ठाकरे का रामकुंड मोर्चा

Nashik, Maharashtra:Nashik Breaking गोदावरी नदीत ड्रेनेज व दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप. याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून रामकुंडावर आंदोलन. दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात. भाविक स्नानासाठी येत असलेल्या गोदावरीची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप. पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेकडून तीव्र आंदोलन. शिवसेनेचे सर्व नगरसेवक आंदोलनात सहभागी. गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका. आठ दिवसाच्या आत गोदावरी नदी ही स्वच्छ केली नाही तर महानगरपालिकेवर शिवसेनेचा मोर्चा जाईल असा दिला इशारा... आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report
Advertisement

तुळजाभवानी मंदिर में फर्जी पुजारियों के खिलाफ विशेष छापा, दो दिन में पांच गिरफ्तार

Dharashiv, Maharashtra:श्री तुळजाभवानी मंदिरात दोन दिवसात बोगस पाच पुजारी विशेष पथकाच्या ताब्यात. दोन पुजाऱ्यांना मंदिर संस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन तर तीन पुजाऱ्यांची चौकशी सुरू. बोगसगिरी करणाऱ्या संशयित पुजाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थान कडून माहिती. मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक और अनधिकृत पुजारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी संस्थानने केली विशेष मोहीम सुरू. मोहिमे अंतर्गत सलग दोन दिवसांत पाच पुजारी पथकाच्या जाळ्यात. काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे मंदिर संस्थानकडून पुजारी असल्याची ओळखपत्रे मिळवत असल्याचा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांचा आरोप तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची केली मागणी. मंदिर प्रशासनाकडून अनधिकृत पूजा, भाविकांची दिशाभूल आणि नियमबाह्य धार्मिक सेवा याविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत。
0
0
Report

सोलापुर में महाविकास आघाड़ी के भीतर टिकटों को लेकर गुटबाजी और हेवेदावे सामने

Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीला दोन खासदार आणि सहा आमदार निवडून दिले. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे हेवेदावे समोर येऊ लागले आहे. यामुळे महाविकास आघाडीची डोके दुखी वाढली आहे. सोलापूर विधान परिषद साठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. वसंतराव देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सभापती होत असताना आपल्या समर्थकाचे मत भाजप उमेदवाराला दिल. हाता तोंडाशी आलेला सत्तेचा घास वसंतराव देशमुख यांच्यामुळे गेला मग आता त्यांना मदत कशासाठी करायची असा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला आहे. वसंतराव देशमुख यांची उमेदवारी देताना जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांनी विश्वासात घेतलं नाही आपल्याकडे मतदार असतानाही एकही सूचक घेतला नाही विरोधी पक्षाचे उमेदवार संपर्क करतात मात्र आपल्याच पक्षाचे उमेदवार अद्याप संपर्क करत नाहीत 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यावेळी शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या समोर ही वस्तुस्थिती मांडणार आहे मात्र तरीही वसंतराव देशमुख यांनी मागे झालेल्या कुरघोड्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अभिजीत पाटील यांनी आता आपले जुने हिशोब चुकते करण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांच्या हेवेदाव्या साठी महा विकास आघाडीची ताकद असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आमदारांनीच पक्ष कमकुवत करण्याची भूमिका घेतली आहे
0
0
Report

महाबळेश्वर बस स्टॉप पर अधिकारी के आरेरावी बर्ताव से यात्रियों में नाराजगी

Satara, Maharashtra:महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी बस स्थानकातील एका वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावी आणि उद्धट वर्तनामुळे प्रवासी तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवेतील विलंबाबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. काल दुपारी ३.३० वाजता सुटणारी एसटी बस तब्बल एक तास उशिराने रवाना करण्यात आली. या विलंबामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही प्रवाशांचे पुढील प्रवासाचे आरक्षण असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. बस उशिरा का सुटत आहे, याबाबत प्रवाशांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे विचारणा केली असता वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर हा कर्मचारी चित्रीकरण का करताय असा जाब विचारत होता. त्यामुळे एकूणच या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे
0
0
Report
Advertisement

अकोला में खरीफ के लिए यूरिया-डीएपी की खरीद में किसानों की भीड़, टोकन वितरण शुरू

Akola, Maharashtra:राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणे आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला ७ हजार १०१ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे. सध्या एका आधार कार्डवर पाच पोती खताचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांकडून टोकन पद्धतीने खत वितरण केले जात आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर खत आणि बियाणे शेतात नेणे अवघड होते. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच खताची खरेदी करून साठा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
0
0
Report

अनुदीवाड़ी के खेत में मगर के पिल्ले मिले: 9 पिल्लों की मौत, 5 जीवित, प्राकृतिक आवास में छोड़ दिए गए

Sangli, Maharashtra:स्लग - अनुडीवाडीतील उसाच्या शेतात मगरीची विण; ९ पिलांचा मृत्यू, ५ पिलं नैसर्गिक अधिवासात मुक्त. अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील अनुडीवाडीत एका उसाच्या शेतात १४ मगरीची पिल्ले आढळून आली आहेत. यामध्ये ९ पिल्ले मृतावस्थेत आढळून आले आहेत, तर ५ पिलं जिवंत आढळली आहेत, त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. अनुडीवाडीच्या काळ्या ओढ्यालगत असलेल्या उसाच्या शेतात एका मगरीचा वावर दिसून आला, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांनी आसपास पाहिलं असता काही मगरीची पिल्लं मृत अवस्थेत आढळून आली तर काही जिवंत दिसून आली. घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि वन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी वन विभाग व गावकऱ्यांनी धाव घेत, शेजاریच असणाऱ्या कळ्या ओढ्यामध्ये जिवंत मगरींच्या पिल्लांना सोडण्यात आले आहे. मृत मगरांच्या पिल्लांना दफन करण्यात आला आहे, या पिल्लांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

नागपूर में AC स्लीपर बस में आग से यात्रियों के जीवन खतरे, वीडियो वायरल

Nagpur, Maharashtra:नागपूर - AC स्लीपर बस मध्ये नागपुरात येणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर - धावत्या बस मध्ये आग पेटवून अमली पदार्थांचे सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर - कोटावरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅवेल्स मधली धक्कादायक घटना - परिवहन विभागाचे नियम धाब्यावर ठेऊन विना परवानगी अनेकांना फूट लॉबी मध्ये झोपवलं - आग पेटवली तेव्हा अनेक प्रवासी AC स्लीपर बस मध्ये झोपलेले होते, सुदैवाने कोणताही अनुचित घटना नाही.. - AC स्लीपर बस मध्ये आग पेटवली आणि अमली पदार्थांचे सेवन करून प्रवाशांचे जीव धोक्यात टाकले, ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तक्रार करणाऱ्या प्रवाशाला उडवा उडवीची उत्तर मिळाल्याची माहिती..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top