icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सूखे में एक गाँव एक गणपति: मूर्ति और वृक्ष मुफ्त, अनावश्यक खर्च से बचाव

Sangli, Maharashtra:स्लग - दुष्काळी परिस्थितीत एक गाव एक गणपती साजरा करण्याचा उपक्रम.. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन ह.भ.प.तुकारामबाबा महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एक गाव एक गणपती उत्सव साजरा करण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत एक गाव एक गणपती अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना श्री संत बागडे बाबा महाराज मठाकडून गणेश मूर्ती व वृक्ष मोफत भेट स्वरूपात देण्यात येणार असून दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा तुकाराम बाबा महाराजांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0
0
Report

भंडारा में स्कूल पोषण आहार की जांच: किचन में गंदगी और चूहों के मिलने पर कार्रवाई के आदेश

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची टीम भंडारामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिधाची अंमलबजावणीची आढावा घेतला गेला. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आयोगाच्या पाहणी समितीने जिल्ह्यातील चार शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना दिला जाणारा जेवण अधिकारी स्वतः चाखून पाहिला आणि तपासणी केली. मात्र, दोन शाळांच्या किचनमध्ये अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला; किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि काही ठिकाणी चूह्यांच्या आळ्या आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकाराबाबत संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ही पाहणी राज्य अन्न आयोगाच्या팀ने यांद्वारे घेतली असून कोणतेही लाभार्थी अन्नाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले. महाविकास आघाडी राज्य शासनाच्या आरोग्य व पोषण योजनेच्या घटकांबाबत गुणवत्तेची खात्री करण्यासाठी ही चौकशी राबविण्यात आली.
0
0
Report
Advertisement

डिंभे-मानिकडोह बोगद्याविरोधी वळसे पाटील: डावा कालवा चालू ठेवल्यास बोगद्याची गरज नाही

Manchar, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगद्याला वळसे पाटलांचा विरोध; “डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालवा, बोगद्याची गरज नाही” ANC: डिंभे-माणिकडोह धरणाच्या बोगद्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाला विरोध कायम ठेवला आहे. बोगद्याची गरज नाही, त्यामुळे आधी हा पर्याय तपासावा, अशी त्यांची भूमिका आहे. VO: डिंभे-माणिकडोह बोगद्याला आमचा आधीपासूनच विरोध असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. डिंभेचा डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालला तर बोगदा करण्याची गरज नाही, असं अधिकाऱ्यांचं टेक्निकल मत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना पाणी मिळालं पाहिजे, मात्र चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यास विरोध राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. पुढेही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री यावर मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report

आयफोन के लालच में अल्पवयस्क पोते ने बुजुर्ग के घर से गहने चुराए

Yavatmal, Maharashtra:पोलिसांना आव्हान ठरलेली घरफोडी ही, फिर्यादीच्या अल्पवयीन नातवानेच केल्याचा ऊलगडा यवतमाळच्या वणी पोलिसांनी केला आहे. आयफोनच्या हव्यासापोटी नातवाने आजोबांच्या घरातील कपाट फोडून तब्बल सहा लाख 72 हजार रुपयांचे 52 ग्राम सोन्याचे दागिने चोरले. या विधिसंघर्षग्रस्त बालकाला हा गुन्हा करण्यासाठी दोन युवकांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळे पोलिसांनी  विधीसंघर्षग्रस्त बालकासह गुणवंत उर्फ पोलार्ड दानव याला ताब्यात घेतले. तर सुरज गेडाम हा फरार आहे.  विधी संघर्ष बालकाला आयफोन चे प्रचंड आकर्षण होते, महागडा आयफोन कसा घ्यायचा हा प्रश्न त्याच्यापुढे होता, ही हौस भागवण्यासाठी पैसे लागणार असल्याने, त्याने चोरी करावी यासाठी मित्रांनी त्याला प्रवृत्त केले.
0
0
Report
Advertisement

कोकण में गणेशोत्सव के दौरान रिक्शा मंहगाई पर नियंत्रण: जिलाधिकारी ने आधिकारिक दरपत्रक लगाने के निर्देश दिए

Ratnagiri, Maharashtra:गणेशोत्सवात कोकणात रिक्षांच्या मनमानी भाडेवाढीला चाप; थांब्यांवर अधिकृत दरपत्रक लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांची वाढीव भाडे आकारून होणारी लूट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.. उत्सवाच्या काळात प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये,यासाठी प्रत्येक रिक्षा थांब्यावर अधिकृत दरपत्रकाचे फलक तातडीने लावण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.. गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला हे आदेश दिले.. याशिवाय,आरटीओने रिक्षाचालकांची तातडीने बैठक घेऊन मीटर तपासणी पूर्ण करावी,अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत..
0
0
Report

कोल्हापुर के संत बालूमामा मंदिर ट्रस्ट घोटाले में प्रशासक व सचिव की जमानत खारिज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील 60 कोोटी 75 लाख घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन प्रशासक रागिनी खडके आणि देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर या दोघांनीही कोल्हापुर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्वक जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाखाचा गैरव्यवहार झाल्याचं तपास अहवालात उघडकीस आला होता, त्यानंतर तात्कालीन प्रशासक आणि धर्मदाय निरीक्षक रागिनी खडके, देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्या तात्कालीन विश्वस्त मंडळातील अनेकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघांनी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन जामीन्यासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान त्या देवस्थान घोटाळ्याची चौकशी विशेष पथकाच्या माध्यमातून सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी दौरे पर रुबल अगरवाल ने चिपळूण-खेड में प्रशासनिक कामकाज की दमदार समीक्षा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त रुबलअगरवाल यांचा रत्नागिरी दौरा; चिपळूण प्रशासकीय कामकाजाची केली विशेष प्रशंसा.. अँकर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला.. या दौऱ्यादरम्यान त्यांनी खेड,चिपळूण आणि रत्वागिरी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठका घेऊन प्रशासकीय कामांची थेट पाहणी केली.. पूर नियंत्रण,पर्यावरण संवर्धन,पारदर्शक भूसंपादन आणि मतदार यादी पुनर्निरीक्षणात चिपळूण विभागीय कार्यालयाने बजावलेली कामगिरी अव्वल दर्जाची असल्याचे नमूद करत त्यांनी स्थानिक प्रशासनाचा गौरव केला..तसेच,कामाचा हाच आदर्श पुढेही कायम ठेवण्याचे निर्देश दिले.. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्रमांक एकमधील मतदान केंद्राची पाहणी केली आणि शाळकरी मुलींशी आत्मीय संवाद साधत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
0
0
Report

सोलापुर में विजपुरवठा बाधित, उळे सब स्टेशन बंद, किसान उग्र प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले एमएससीबीचे सब स्टेशन विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने सोलापुरातील शेतकरी आक्रमक दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे सब स्टेशन शेतकऱ्यांनी बंद पाडले उळे सब स्टेशन बंद पाडल्याने 11 गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा आणि शेतीला 8 तास वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 200 ते 250 शेतकऱ्यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत सब स्टेशन बंद पाडले. या भागातील शेतकऱ्यांची रात्री 1 वाजता लाईट येते पहाटे 6 वाजता लाईट जाते त्यातही दर 10 मिनिटाला लाईट ये जा होते त्यामुळे सर्व शेतकरी कंटाळले आहेत त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळपासून उळे सब स्टेशन बंद पाडले आहे
0
0
Report

प्याज के दाम 60-70 रुपए तक पहुँचे, घर खर्च बढ़ा

Washim, Maharashtra:अवघ्या दहा दिवसांत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून,३० रुपये किलो असलेला कांदा आता थेट ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचला आहे.त्यामुळे घरखर्चाचे गणित बिघडले असून, रोजच्या स्वयंपाकात कांद्याचा वापर कमी करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.कांद्यासोबतच लसणाच्या दरातही मोठी वाढ झाली असून,बाजारात लसूण सध्या २०० ते २२० रुपये किलो दराने विकला जात आहे.त्यातच इतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाल्याने रोजच्या बाजारहाटीचा खर्च वाढला आहे.कांदा, लसूण आणि भाजीपाल्याच्या वाढत्या दराचा थेट फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला बसत आहे.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के सिरोंचा तालुक़े में 3.6 भूकंप; अहेरी-नागेपल्ली में भी हल्के धक्के, नुकसान नहीं

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप, अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के, प्राथमिक माहितीनुसार कोणतीही हानी नाही; नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन अँकर:--  गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत दर्शविण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही हे धक्के जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही. नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
0
0
Report

केदारनाथ नवले ने कांदा बाजार के उतार-चढ़ाव के बीच वांग्या की नई खेती शुरू की

Yeola, Maharashtra:कांद्याच्या बाजारभावात दररोज होत असलेल्या चढ-उताराला कंटाळून शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय येवला सोमठाणे देश येथील कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांनी घेतला त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात भरीतासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या बारकू कंपनीच्या वांग्याची तब्बल २२०० रोपांची लागवड केली मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आणि इतर खर्च मिळून आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये खर्च केला आज पहिल्या तोडणीला सुरुवात झाली असून सुमारे ७० ते ८० कॅरेट वांगी निघाली मात्र, अपेक्षित ३० रुपये किलो दराऐवजी नाशिक बाजार समितीत सध्या १० ते १५ रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, अशी भीती शेतकरी केदारनाथ नवले यांनी व्यक्त केली
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top