Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 11:41:33
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 11, 2025 14:33:09
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 11, 2025 13:51:37
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली में यशवंतराव क्रीड़ा संकुल (मॅक्सी ग्राउंड) की दुर्दशा.. संपूर्ण मैदान महिनाभर व्यावसायिक मेळ्यासाठी आंदण Kडीएमसी चिरीमिरीसाठी मैदानांना व्यावसायिक वापरासाठी देत असल्याचा शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधव यांचा आरोप मेळा आयोजकाने मैदानाची दुरावस्था ,मैदानात कचरा ,बांबू ,दारूच्या बाटल्यांचा ढीग खेळाच्या मैदानात हे व्यावसायिक व्यापारासाठी केडीएमसी कडून दिली जात आहे त्यामुळे खेळाडूंचे आणि नागरिकांचे गैरसोय होत आहे कल्याण डोंबिवली मध्ये हातावर मोजके इतकेच खेळाचे मैदान आहेत कल्याण पश्चिम येथे सुभाष मैदान, फडके मैदान, यशवंतराव क्रीडा संकुल हे तीन मैदानच खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत त्यातील दोन मैदाना हे नेहमी व्यावसायिक व्यापारासाठी तसेच लग्न कार्यासाठी, राजकीय सभा, हे महापालीके कडून दिले जात आहे त्यामुळे खेळाडूंची तर गैरसोय होतेच पण मैदानांची दुरवस्था होते त्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी महापालिकेला इशारा दिला आहे मैदान पुन्हा व्यावसायिक वापरास दिल्यास खेळाडू मुलांना आयुक्तांच्या दालनात खेळवणार शिवसेनेचा इशाराचं दिला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 11, 2025 13:34:38
Akola, Maharashtra:अकोला जिला स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून पगाराविना काम करत असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. महिलांच्या आरोग्यसेवेत महत्वाची भूमिका बजावणारे हे कर्मचारी आयसीयू सह विविध विभागात दहा ते बारा वर्षांपासून निष्ठेने सेवा देत आहेत. मात्र, वेतनाबाबत विचारणा केली असता कंत्राटदार फोनसुद्धा उचलत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून घरखर्च, औषधे, मुलांचे शिक्षण अशा गरजांसाठी पैसे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच पगार मागितल्यामुळे काम कमी करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केली आहे.या सर्व मागण्यांवर तोडगा निघावा यासाठी आज कर्मचाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. चार महिन्यांचा थकीत पगार तात्काळ देण्यात यावा, कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी आणि कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.पगाराचा प्रश्न न सुटल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 11, 2025 13:34:23
Yavatmal, Maharashtra:नागपूर हिवाळी अधिवेशनात समग्र शिक्षा पूर्वीचे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 20 ते 25 वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शासन स्तरावर त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या अभियानात कार्यरत 6483 कर्मचारी व इतर 3105 कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 08 ऑक्टोबर 2024 नुसार शासन सेवेत कायम करावयाचे होते, परंतु अद्यापही 3378 कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यात आलेले नाही. करिता कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण व स्वेच्छा मरण्याची परवानगी मागितली आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 11, 2025 13:17:25
Nanded, Maharashtra:Anchor - कर्जाची परतफेड करण्यासाठी चक्क मयत शेतकऱ्याला लेकअदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी येथील हा प्रकार आहे. वाडीतील अनेक शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी लोकअदालताची नोटीस पाठवली आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले ते शेतकरी खंडू सटवाजी मेंढेवाड यांनाही 13 डिसेंबरला लोकअदालतात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेंढेवाड यांचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले असताना त्यांच्या नावे नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. त्यांच्या नावावर एसबीआय बँकेचे 1 लाख 4 हजार 731 रुपये कर्ज थकीत आहे. अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती आहे. अश्यात नोटीस पाठवल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. नोटीस मुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुदखेड तहसीलसमोर खराब सोयाबीन टाकून याचा निषेध केला. “पिकाचं नुकसान झालं, पैसे कुठून आणायचे?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 11, 2025 12:25:25
Nagpur, Maharashtra:नितीन राउत, काँग्रेस नेता विधिमंडल में दरवर्षी सत्र आते हैं.. यहाँ आने वाले सदस्य, मंत्रीगण की सुरक्षा का गंभीर प्रश्न है। उसी शुरुआत में अचानक पास शुरू किया गया; चूंकि कुछ गलत/खोटा होने की बात कही गई, मैंने सभागृह में शिकायत दर्ज कराई। इससे सुरक्षा को खतरा है; इस पर गंभीर दखल जरूरी है। उन्होंने यह कदम उठाया है; शिकायत पर गुन्हा दाखल किया गया; अब उन्हें गिरफ्तार होने की खबर है। पुणे जमीन प्रकरण के विरोधी कब आवाज उठायेंगे। जैसी संधी से इस मामले में बोलने की परंपरा है, वैसे ही कहेंगे। अधिवेशन अर्धकाल में है... कोर्ट ने FIR में पार्थ पवार का नाम क्यों नहीं कहा, यह पूछा; लेकिन विपक्ष गप्प क्यों। अधिवेशन का कालावधी कम है; कामकाज अधिक है; इनमें कुछ मुद्दे सुलझते हैं; देखेंगे आगे क्या होता है।
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 11, 2025 12:16:59
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 11, 2025 12:16:48
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 11, 2025 12:16:32
Baramati, Maharashtra:दौंड तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार... स्थानिक शेतकऱ्यांसह वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी... दौंड तालुक्यात बिबट्याचा हैदोस.... अनेक बिबट्यांचा मुक्त संचार दौंडच्या डुबेवाडी मळ्यात आणि दहिटणे गावच्या गणेश नगर रोडवर बिबट्याचा मुक्त संचार पहायला मिळाला... यावेळी नागरिकांनी आपल्या चार चाकीतून मुक्त बिबट्याचा संचार आपल्या कॅमेरात कैद केलाय.. परंतु बिबट्याचा शिरकाव दौंडच्या दहिटणे गावच्या गणेश नगर आणि डुबेवाडीच्या मळ्यात या परिसरात झाल्याने, संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. याबाबत स्थानिक नागरिक संबंधित प्रशासन वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 11, 2025 11:23:15
Jalna, Maharashtra:FEED NAME पार्ट हटाकर एडिटर द्वारा रिपोर्टेड टेक्स्ट: बदनापुर तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना. शेतरस्त्याचा वाद मिटवण्यासाठी नायब तहसिलदाराने पैसे मागितल्याचा आरोप. हेमंत तायडे नावाच्या नायब तहसीलदारासाठी शेतकऱ्यांनी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या घटनेची चर्चा झाली. हलदोला येथील एका शेतकऱ्याचा शेत रस्त्यावरून गावातील व्यक्तीशी वाद होता. या प्रकरणात तहसील कार्यालयात अर्ज दाखल झाला, परंतु निकाल शेतकऱ्याच्या विरोधात आला. नंतर शेतकरी तहसील कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असताना वाद झाला आणि शेतकऱ्याचा भाऊ-पुतणा यांनी टेबलवर पैसे फेकून निषेध नोंदवला. पुढे या रस्त्याच्या प्रकरणात सुनावणीत निकाल आमच्या बाजूने लागल्याचा उल्लेख, वाचकांच्या समस्येवर काय कारवाई होईल याची कलाटणी.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 11, 2025 11:22:22
Shirdi, Maharashtra:अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स के नाशिक विभाग की बड़ी कार्रवाई... संगमनेर तालुक्यात 454 किलो गांजा जप्त संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावात भल्या पहाटे छापा टाकून केली करावी... तुषार पडवळ नामक व्यक्तीच्या घरातून साठवलेला गांजा केला जप्त.. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे एक कोटी 14 लाख रुपये टास्क फोर्स पथकाला माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई... काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरात सापडले होते एम डी ड्रॅग.. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू... बाईट - गणेश इंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 11, 2025 11:22:01
Nashik, Maharashtra:नाशिक ( तपोवन )आनंद दवे - प्रदेशाध्यक्ष, हिंदू महासभा बाईट मुद्दे:- - आम्ही इथे येण्याच्या आधी आयुक्तांशी भेटलो - त्यांना झाड भेट दिले - 220 कोटी, वृक्षतोडीवर त्यांच्याकडे उत्तर नाही - mice सेंटर उभारण्याचे त्यांचे त्यात आहे - सरकारसह मनपाकडे उत्तर नाही - हिंदू लोकांच्या नावावर काही मोजक्या हिंदूंच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू - झाडे तोडून जमिनी मिळवा असे त्यांचे दिसतेय - त्यामुळे आम्ही आंदोलन करतोय - आम्ही झाडे लावून सरकारची जिरवू - जी झाडे लावणार ती कुठं लावणार हे निश्चित नाही - आम्ही यासाठी सभा घेणारआहोत - नाशिकला पाहिले आंदोलन हिंदू सभेने केले - आम्ही आत्मदहन करू - पालिकेच्या विरोधात आंदोलन करू - कुंभमेळा व्हायला पाहिजे, त्यासाठी झाडे तोडू नका - काशी, पंढरपूर येथे कॉरिडॉरसाठी झाडे मंदिर तोडले - जिथं रामाचे पाय लागले तिथं कुऱ्हाडीचे पाय लावू नका - सरकारला आम्ही एकही झाड तोडू देणार नाही
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 11, 2025 11:05:25
Yavatmal, Maharashtra:महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघाने विविध मागण्यांसाठी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांची भेट घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. वस्तीशाळा शिक्षक तांडे, पाडे अशा डोंगराळ, दुर्गम व अदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात, 18 एप्रिल 2000 साली जाहिरातीने सेवेत नियुक्त केलेल्या व 2001 साला पासून सेवेत कार्यरत असलेल्या सेवेतील व सेवानिवृत्त वस्तीशाळा शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ देण्यात यावे अशी मागणी वस्तीशाळा शिक्षकांची आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 11, 2025 10:04:27
Parbhani, Maharashtra:अँकर- कधी न कधी शेतकर्यांना कर्जमाफी मिळते म्हणून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे हे कर्ज उचलल्याचे शेतकऱ्यांना माहितीच पडू नये याची बँका सुद्धा खबरदारी घेतांना दिसून येत आहे, शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पीक कर्ज कधीतरी कर्ज माफीत बसवून आपले उखळ पांढर करण्याचा प्रकार एका तरुणामुळे समोर आलाय. बघुयात हा खास रिपोर्ट. व्हीओ- निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत कोलमडली असल्याने शासन कर्ते शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देतात,महायुती सरकारने सुद्धा कर्ज माफी देण्याचं आश्वासन दिलं होतं, सोसायटीच्या संचालकांनी केलेल्या शिफारशीनंतर शेतकऱ्यांना शासन पीक कर्ज वाटप करीत असते. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव विविध कार्यकारी सोसायटीने राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 117 कर्जदारांच्या नावाने 1 कोटी 6 लाख 24 हजार 410 रुपयांचे पीककर्ज 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठी वाटप केले असल्याचे गुंजेगाव सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आले. विशेष बाब म्हणजे या यादीत नाव असलेल्या अनेक शेतकर्यांना असे काही कर्ज आपण काढल्याचे त्यांना माहीतच नाही,कारण हे कर्ज ना शेतकऱ्यांच्या पासबुक मध्ये होत ना,सातबाऱ्यांवर,शिवाय राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक बीबीशन सुर्यवंशी मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना बँक स्टेटमेंट देत नाहीये, गावात लावलेल्या यादीत ज्ञानोबा पांडलवाड यांच्या केवळ 80 आर जमिनीवर 2 लाख 96 हजार 900 रुपयांचे तर त्यांचे बंधू विक्रम पांडलंवाड यांच्या नावे 1 लाख 27 हजार 980 रुपयांचे कर्ज त्यांच्या परस्पर उचलण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी,जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे लेखी तक्रार करीत बँक व्यवस्थापन आणि सोसायटीच्या पदाधिकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. बाईट- ज्ञानोबा पांडलवाड- कर्जबाजारी शेतकरी व्हीओ- काही महिन्यांपूर्वी गुंजेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती,ही निवडणूक लढविण्यासाठी गुंजेगाव येथील अमोल मोटे यांनी बँकेकडे नो ड्युज मागवले असता गावातील अनेकांच्या नावे नियमापेक्षा अधिक कर्ज दिसून आलं,13 पैकी 12 सोसायटी संचालकांच्या नातेवाईकांच्या नावावर नियमापेक्षा अधिक कर्ज दिसून आले, हेक्टरी 25 हजार रुपयांचे कर्ज वाटप करायचे असतांना काही शेतकऱ्यांना हेक्टरी लाखो रुपयांच्या खैरात वाटण्यात आली. सदर यादी गावात बोर्डवर लावल्यावर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलच नाही,अश्या ही शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... बाईट- अमोल मोटे- तक्रारदार तरुण व्हीओ- गुंजेगाव सोसायटीच्या 13 पैकी 12 चेअरमनच्या 56 नातेवाईकांच्या नावे 77 लाख 17 हजार 416 रुपयांचे कर्ज काढले असून हे नियमबाह्य असल्याचा दावा केला जातोय,चेअरमेन तुकाराम इमडे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने चक्क 10 लाख 17 हजार 860 रुवयांचे कर्ज नियम डावलून दिले,संचालक अभय बालासाहेब कुंडगिर यांच्या जवळच्या 8 खात्यावर 24 लाख 60 हजार 560 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. आता या प्रकाराची चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक संदीप भालेराव यांनी दिले असून या चौकशीसाठी त्रि- सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. बाईट- संदीप भालेराव- जिल्हा उपनिबंधक, परभणी व्हीओ-याबाबत झी 24 तासने राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक बीबीशन सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या गैरकरभारावर काहीही बोलण्यास नकार दिला. शेतकऱयांना दिलेले पीक कर्ज जर शेतकऱ्यांना कळू दिलं जात नसेल तर याप्रकरणात केवळ विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारीच नव्हे तर बँकेच्या अधिकाऱ्यांचे ही या घोटाळ्यात उखळ पांढरे झालेच असलं पाहिजेत,ज्या तरूणांने गौर गरीब शेतकर्यांसमोर बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आणलाय, त्या तरुणाला धमकीवजा फोन येत आहेत,म्हटल्यावर हे प्रकरण पारदर्शीपणे हाताळले गेले तर यातून मोठा अपहार बाहेर येणार आहे,गुंजेगाव कार्यकारी सोसायटीचे हे केवळ एक उदाहरण असलं तरी जिल्ह्यात असलेल्या कार्यकारी सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल असल्याचा प्रकार नाकारता येत नाही,त्यामुळे कर्जमाफीपूर्वी बोगस कर्जदार शोधून काढण्याची आता गरज निर्माण झालीय....
0
comment0
Report
Advertisement
Back to top