445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संगमनेर में किसानों ने निळवंडे धरण कालव्यात पानी नहीं मिलने पर प्रदर्शन शुरू किया
Shirdi, Maharashtra:निळवंडे धरण कालव्यात পানि नहीं मिलने के कारण किसान कलव्यात उतरकर आंदोलन कर रहे हैं। संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे परिसरात किसान पानी में उतरकर प्रदर्शन कर रहे हैं। सिन्नर तालुक्यातील शेतकरी निळवंडे धरणाच्या कालव्यात उतरले। शासन کا लक्ष्य आकर्षित کرنے کے لیے पानी میں उतर کر आंदोलन ہوا۔ कालव्यांची कामे अपूर्ण होने के कारण सिन्नर तालुक्य के سات गावों में किसान धरण के पानी से वंचित हैं। लवकरात लवकर काम पूर्ण करके पानी मिले, किसानان की मांग। पाच تासों کے بعد شتکرے کے پانی میں उतरنے کا سلسلہ जारी ہے۔0
0
Report
कांदा भाव सिर्फ 1 रुपए में, किसान सड़कों पर उतर आये
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash कांद्याला अवघा 1 रुपया भाव... संगमनेर तालुक्यात शेतकरी संतप्त... संतप्त शेकऱ्यांचा वडगावपान येथे रास्तारोको... कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी उतरले रस्त्यावर... बाजार समितीकडून पुन्हा लिलाव आणि योग्य भाव मिळून देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे... कांद्याचे भाव गडगल्याने शेतकरी आर्थिक संकटात...0
0
Report
रामनाथ कोविंद ने शिर्डी में साईं बाबा के दर्शन किए, शांति की प्रार्थना
Shirdi, Maharashtra:भारत के पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज शिर्डी में साईं बाबा के दर्शन हेतु पहुंचे। उन्होंने समाधी पर पाद्यपूजा की और मनोभावे दर्शन किया। उन्होंने कहा कि मुझे दर Monthly दर्शन करना चाहिए पर बाबा के बुलावे पर ही दर्शन संभव होता है। वर्तमान वैश्विक परिस्थितियों में शांति की प्रार्थना भी की गयी। केंद्र सरकार ने वंदे मातरम गीत को राष्ट्रगीत का दर्जा दिया है और जन-जन के साथ एक गीत को जोड़ते हुए मातृभूमि की वंदना की गई।0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में तेज बारिश ने भीषण गर्मी दूर कर दी, लोगों में खुशी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी.. उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना मोठा दिलासा.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासूनच्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील चिपळूण,लांजा आणि राजापूर या भागात दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या.. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजा देखील सुखावला आहे.. अचानक आलेल्या या पावसाने बाजारपेठेत काही काळ तारांबळ उडाली असली तरी,उष्णतेच्या लाटेपासून मुक्तता मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे..0
0
Report
रत्नागिरी में तेज बारिश से गर्मी में राहत, तापमान घटने की उम्मीद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी.. बळीराजा सुखावला,उष्णतेपासून दिलासा.. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर जाणवणारा उकाडा आणि वाढत्या तापमानानंतर,आज रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून जिल्हावासीयांना कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे.. दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाला सुरुवात झाली.रत्नागिरी शहरासह चिपळूण, राजापूर आणि लांजा तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या.. गेल्या आठवड्यापासून रत्नागिरीचे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले होते, पावसामुळे यात घट होऊन हवेत सुखद गारवा पसरला आहे.. येत्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. पावसाच्या अचानक येण्यामुळे शहरातील बाजारपेठेत काही काळ तारांबळ उडाली...0
0
Report
बारामती जय पवार जनता दरबार: जनता के लिए समाधान की पहल
Rui, Maharashtra:बारामती जय पवार बाईट* ऑन_जनता दरबार खूप चांगला प्रतिसाद आहे. वाटलं नव्हतं की एवढी लोक पहिल्याच दिवशी येतील. दादांचा प्रेम सर्वांच्या डोळ्यात अजूनही दिसतं. मी सुद्धा दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑन_नागरिकांच्या समस्या आरोग्याच्या शिक्षणाच्या पाण्याच्या लाईटच्या समस्या होत्या. ऑन_बारामती गुन्हेगारी मला हे समजलं पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोलत आहे. दादा नसल्याने अशी परिस्थिती या ठिकाणी होता कामा नये. सर्वांनी कायदेशीर पणाने वागलं पाहिजे. पोलिसांना मी याबाबत बोललो आहे आणि सुनेत्रा पवार यांनाही मी बोललो आहे. दादा असताना सर्व व्यवस्थित होतं तसा आमचा प्रयत्न सुरू आहे. ऑन_राज्यसभा जागा जय पवार नावाची चर्चा माझ्या नावाची चर्चा होत आहे पण माझी काही इच्छा नाही. मी इथे सर्वांसाठी कामासाठी असणार आहे. ऑन_युगेंद्र पवार वक्तव्य त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं योग्य वाटत नाही. काही दिवसापूर्वी आमची चर्चा झाली. सर्वच बारामतीकारांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आता वहिनी पण तशा कष्ट घेत आहेत 2029 ला वहिनीच उभा राहतील आमच्या सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनींनी मुख्यमंत्री बनवून तिथे घेतली पाहिजे. ऑन_राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी मुंबईमध्ये काय घडामोडी सुरू आहेत मला माहित नाही. वहिनी आणि पार्थ दादा दिल्लीत आहेत आज ते मुंबईला येतील परवा मी मुंबईला जाणार आहे मला माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेन ऑन_जनता दरबार लोक मला सांगतात तेव्हा मी पण इमोशनल होतो सर्वांसाठी आधार म्हणून बारामतीकरांनी यावेळेस वहिनींना प्रेम दाखवलं रेकॉर्ड ब्रेक ने वहिनी निवडून आल्या माझी पण आशा आहे की तेवढेच प्रेम मी सुद्धा त्या सर्वांना दिलं पाहिजे. ऑन_ जिरayat पट्टा पाणी मतमोडणी झाली तेव्हाच मी सांगितलं होतं की पाण्याची विषय भरपूर आहेत आता आचारसंहिता संपले आहे आम्ही आमच्या वतीने सर्वच अधिकाऱ्यांना जिथे पाण्याची गरज आहे तिथे पाण्याच्या टाकी फिरवण्याच्या सूचना देणार आहोत. जानाई शिरसाई चे पाणी त्या संदर्भात पण कुठे पाणी लवकर पोहोचू शकतं त्याबाबत सूचना देणार आहेत. ऑन_अमोल मिटकरी ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे माझी आणि अमोल मिटकरी यांची चांगली चर्चा होत असते त्यांच्या मनातली भावना त्यांनी तिथे सांगितले असेल. ऑन_मुख्यमंत्री जानाई शिरसाई योजना निधी तरतूद वहिनींनी जेव्हापासून जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून त्यांच्याही विचारात आहे पाणी सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे मुख्यमंत्री बारामतीत आले तेव्हा देखील त्यांची चर्चा झाली. तातडीने याबाबत कष्ट घेऊन निधी उपलब्ध केला जाईल. ऑन_जनता दरबार हिंदी प्रतिउत्तर अच्छा था सब लोग आये थे हम सबको दादा की बहुत याद आती है. राज्यसभा की एक जगह खाली है उसके लिए मेरा नाम चर्चा में है मैं पहले भी बोलना आया हूं कि मुझे लोगों के लिए काम करना है मुझे लगता है मैं पक्ष का कार्यकरता रहने से ही अच्छा हूं0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग में अवकाली बारिश ने जोरदार असर, ऑरेंज अलर्ट जारी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सह फोडा घाट भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली सिंधुदुर्गात सायंकाळच्या सत्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उकाड्या मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीकाळ दिलासा मिळाला.0
0
Report
नागपुर पुलिस ने ऑपरेशन थंडर के दौरान 36 आरोपी से गांजा जप्त
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर पोलिसांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी अंमली पदार्थविरोधी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. हे ऑपरेशन “ऑपरेशन थंडर” या अंमली पदार्थविरोधी उपक्रमाचा भाग असून, नार्कोटिक्स संबंधीत गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेचे प्रत्यक्ष नेतृत्व पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी केले. विविध ठिकाणी एकाच वेळी अनेक पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी संशयित व्यक्तींची तपासणी, पडताळणी आणि निगराणी केली. या कारवाईदरम्यान एनडीपीएस कायद्याअंतर्गत पूर्वीचे गुन्हे नोंद असलेल्या 36 आरोपींची तपासणी करण्यात आली असून, शोध मोहिमेदरम्यान गांजा जप्त करण्यात आला. तसेच, सर्व संबंधित आरोपींच्या घरांची सखोल झडती घेण्यात आली असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, कारवाईदरम्यान काही गुन्हेगारांशी संबंधित घरांमध्ये संशयित बेकायदेशीर बांधकामे आढळून आली असून, त्यांची पडताळणी सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नेतृत्व केल्यामुळे पोलीस दलाचे मनोबल वाढले आहे आणि गुन्हेगारांमध्ये एक प्रकारचा धाक निर्माण झाला आहे.0
0
Report
पुणे में पिता ने बच्चों की बेरहमी से हत्या कर दी; एक बच्चा बच गया
Barav, Maharashtra:ज्या बापाच्या खांद्यावर बसून पोरांनी जग पाहायचं, त्याच बापानं त्यांना मृत्यूच्या दारात ढकललं! क्रौर्याचा असा कळस जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. पुणे जिल्ह्यातील आळेफाट्यात एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या लेकरांचा गळा आवळला. पत्नी सोडून गेल्याचा राग त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर आणि पाच वर्षांच्या मुलावर काढला. एक निष्पाप जीव गेला, पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा मृत्यूच्या दाढेतून परतलाय. माणुसकीला काळिमा फासणारा हा थरार नेमका काय आहे? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये... याच झाडाझुडपांच्या आड एका बापानं आपल्याच रक्ताचं नातं रक्ताळलं. सागर शिंदे... मोशीचा राहणारा हा इसम. सहा महिन्यांपूर्वी पत्नी घर सोडून गेली, संसार मोडला... पण या संसाराच्या राखेचा सूड त्याने आपल्याच दोन निरागस फुलांवर उगवला. आरोपी सागरने ५ वर्षांचा आर्यन आणि साडेतीन वर्षांच्या हर्षदाला "फिरायला नेतो" असं खोटं सांगितलं. बापाच्या हाताला धरून ही पोरं आनंदाने निघाली होती, पण त्यांना काय ठाऊक होती की ज्या हातांनी त्यांना कडेवर घेतलं, तेच हात आज काळ बनणार आहेत. जंगलाच्या एकांतात पोहोचताच सागरमधील 'माणूस' मेला आणि 'हैवान' जागा झाला. त्याने आधी ५ वर्षांच्या आर्यनचा गळा आवळला. पोटचा गोळा डोळ्यासमोर तडफडू लागला, पण या नराधमाला पाझर फुटला नाही. मुलगा हालचाल करेनासा झाल्यावर त्याने त्याला मेलं समजून झुडपात फेकून दिलं. त्यानंतर त्याचा मोर्चा वळला साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या हर्षदाकडे... तिने तर अद्याप नीट बोलायलाही शिकली नव्हती, पण त्या नराधमाने तिचाही गळा आवळून जीव घेतला. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी'. नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. झुडपात फेकलेला आर्यन जिवंत होता. काही वेळाने तो शुद्धीवर आला आणि सकाळी मॉर्निंग वॉक ला गेलेल्या नागरिकांना तो त्या जंगलात रडताना एका बेवारस मुलाची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली... आणि समोर आलं असं सत्य, जे ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला! End Vo..हर्षदा आता या जगात नाही, आणि आर्यनच्या चिमुकल्या मनावर कधीही न पुसले जाणारे जखमा उमटल्या आहेत. पत्नीशी भांडण झालं म्हणून पोटच्या लेकरांचा बळी घेणाऱ्या या 'कसाई' बापाला कायदा काय शिक्षा देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...0
0
Report
Advertisement
वांगणी और आसपास में तेज़ बारिश, घरों के पत्ते उड़ने लगे
Ambernath, Maharashtra:वांगणी आणि परिसरात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ अंबरनाथ तालुक्यातील वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय.. या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून काही झाडांच्या फांद्याही पडल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालीय.0
0
Report
हिरापुर में भूमि मापन के दौरान अधिकारी ग्रामपंचायत में घेराबंदी, ग्रामीणों का आक्रोश
Gadchiroli, Maharashtra:जमीन अधिग्रहणासाठी आलेल्या नागपूरच्या भू-अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत मध्ये डांबून रोष व्यक्त केला. गडचिरोली तालुक्यात हिरापूर, गुरवळा, विहिरगाव क्षेत्रात खाजगी कंपनीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया गुपचूपपणे सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले. आज सकाळी नागपूरच्या भू-अभिलेख कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचा-यांनी गावात येऊन जमिन मोजण्याचे काम सुरू केले होते. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना रोखून विचारणा केली. त्यांनी कोणतीही ओळख न सांगता शासनाकडून जमीन मोजणीचे आदेश असल्याचे सांगितले. गावकरी आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबले. तहसीलदार यांनी पोलीस टीमासह गावात पाचारण केला. शासनस्तरावरून जमिनीचे मोजमाप सुरू करण्याचे आदेश असल्याचे सांगितले, परंतु गावकऱ्यांच्या सहकार्यानुसारच प्रक्रिया सुरू होईल; तोपर्यंत रोकथाम.0
0
Report
नाशिक रिंगरोड विरोध: किसानों‑महिलाओं पर पुलिस के हाथ मारहाणी का आरोप
Nashik, Maharashtra:अँकर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह ग्रामीण भागात सह शहरी भागात रिंग रोड तयार करण्यात येत आहेत... मात्र हे रिंग रोड तयार करत असताना अनेक शेतकऱ्यांचे घर आणि जमीन ह्या या रिंग रोड मध्ये जात आहे...नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंगरोड प्रकल्पावरून आता मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. रिंगरोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियेदरम्यान मातोरी आणि मुंगसरे परिसरातील शेतकरी महिलांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिवसेना ठाकरे गटानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. महिलांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने नवे राजकीय वळण घेतले आहे. त्यानंतर राऊत यांनी या महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. नेमकं काय प्रकरण आहे जाऊन जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून Vio/01 संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना रिंगरोडला विरोध करणाऱ्या काही शेतकरी महिला त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी महिलांनी मोजणीच्या कामादरम्यान पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला. काही महिलांना जबरदस्तीने घराबाहेर ओढण्यात आल्याचेही सांगण्यात आले. महिलांची आपबिती ऐकल्यानंतर संजय राऊत संतप्त झाले. त्यांनी तात्काळ प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावत अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. तुमच्या घरी आई-बहिणी नाहीत का? महिलांशी अशी वागणूक देण्याचा अधिकार कोणी दिला? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राऊत यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरताना आपल्या जवळ मारहाणीचे व्हिडिओ असल्याचाही दावा केला. महिलांना फरफटत बाहेर काढणे हा कोणता कायदा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचवेळी प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली. पवन दत्ता हे परप्रांतीय अधिकारी असून त्यांना येथे कोणाच्या शिफारशीवर आणण्यात आले, असा सवाल करत त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रशासनाने शेतकऱ्यांशी संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय राऊत हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रांत अधिकारी पवन दत्ता हे कार्यालयातून निघून गेले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना जिल्हाधिकारी देखील नियोजित बैठक असल्यामुळे कार्यालयातून निघून गेले यामुळे तब्बल एक तास जिल्हाधिकारी कार्यालयात संजय राऊत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर बसून राहिले... तासाभरानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कार्यालयात पोहोचले यानंतर संजय राऊत आणि शेतकऱ्यांबरोबर त्यांनी तात्काळ बैठक घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिल असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं बाईट- संजय राऊत , खासदार उबाठा Vio/02 या संपूर्ण वादाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली. रिंगरोडच्या मोजणीसाठी महसूल विभाग आणि पोलिसांचे पथक मातोरी परिसरात पोहोचले होते. मात्र, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी जमिनी देण्यास विरोध केला. त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी महिलांवर बळाचा वापर केला. काही महिलांना घरातून बाहेर खेचण्यात आले तर काहींना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण राज्यभर चर्चेत आले.या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि बाधित ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आणि मारहाण झालेल्या महिलांनी देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर आपली तक्रार मांडली शिवसेनेचे बाधित शेतकरी ज्यावेळी प्रांत अधिकारी पवन दत्त यांच्या कार्यालयात पोहोचले होते त्यावेळेस पाच मिनिटांची चर्चा करून पवन दत्त आहे मागच्या दरवाजाने निघून गेले.. यावरही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रांत121ाऱ्यांवर कारवाईची मागणी केली... प्रस्तावित रिंग रोड हा बदलावा अशी मागणी यावेळी बाधित शेतकऱ्यांनी केलीये याआधी असलेला रिंग रोडचा मॅप हा सूचक असा होता... मात्र पुन्हा एकदा सिंहासथाच्या पार्श्वभूमीवर तयार करणाऱ्या या रिंग रोड मुळे अनेक शेतकऱ्यांचे घरे जमिनी जात आहे...यामुळे आधी तयार केलेला रिंग रोडचा मॅपच वापरावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केलीये... तर ज्या प्रांत अधिकाऱ्यांनी महिलांवरती हात उगारला काठ्या चालवली या प्रांत अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी शेतकऱ्यांनी आणि महिलांनी केलीये..... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी भूसंपादनाचा काम सुरू आहे.... तर तब्बल 66 किलोमीटरचा नाशिक शहरा बाहेरील ग्रामीण भागातून रिंग रोड तयार करण्यात आला आहे....या चहू बाजूच्या रिंग रोड मुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना येण्यासाठी हा सुलभ मार्ग होणार असल्याचं बोललं जात आहे.... मात्र असं होत असताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावर अनेक शेतकऱ्यांचे जमिनी आणि घर जात असेल तर हा कुंभमेळा कोणाच्या भलासाठी होतोय...? असा सवाल उपस्थित होतोय...0
0
Report
Advertisement
दिनदहाड़े लूट: अकोला के आदर्श कॉलनी में बंदूक दिखाकर सोना-चांदी लूट, पुलिस तलाश में
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरातील आदर्श कॉलनी येथे असलेल्या सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीच्या ऐवजाची लूट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराफा व्यवसायिक दुकानात एकटे असताना हातात बंदूक घेऊन एक अज्ञात व्यक्ती दुकानात शिरला. आरोपीने व्यवसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील मौल्यवान सोन्या-चांडीचा ऐवज लुटला आणि घटनास्थळावरून पसार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हा दरोडेखोर एकटाच आला होता.घटनेनंतर व्यवसायिकाने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
जुन्नर में पिता ने साढ़ेतीन साल की बेटी की गला घोंटकर हत्या, बेटे पर भी हमला
Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला, तर पाच वर्षांच्या मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आळेफाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. सागर सदाशिव शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मोशी येथील रहिवासी आहे. आरोपीची पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्यानंतर तो दोन लहान मुलांसह राहत होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक चिडचिडीतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. आरोपीने मुलगा आर्यन आणि मुलगी हर्षदा यांना फिरायला नेतो असं सांगून घराबाहेर नेलं. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरातील निर्जन जंगलात नेऊन प्रथम मुलाचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलगा मृत झाल्याचं समजून त्याला जंगलात टाकून दिल्यानंतर आरोपीने मुलगी हर्षदाचा गळा आवळून निर्घृण खून केला. आर्यन हा जंगल परिसरात बेवारस अवस्थੇत आढळून आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खून आणि खूनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.0
0
Report
गोवा में पैरासेलिंग हादसा: पर्यटक महिला मौत के करीब
Ratnagiri, Maharashtra:गोव्यात पॅरासेलिंगचा थरार;..दोरी गळ्याभोवती आवळल्याने पर्यटक महिला मृत्यूच्या दारात गोव्याचा समुद्र... पर्यटकांची गर्दी... आणि हवेत झेपावणारे पॅरासेलिंग! पण याच पॅरासेलिंगचा आनंद एका महिलेसाठी मृत्यूचा सापळा ठरणार होता. अवघ्या एका मिनिटाचा तो थरार, गळ्याभोवती आवळलेला फास आणि डोळ्यासमोर दिसणारा काळ! सुष्मिता नावाच्या पर्यटक महिलेसोबत गोव्याच्या समुद्रात नेमकं काय घडलं? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून... निळाशार समुद्र आणि आकाशात पॅरासेलिंगचा आनंद... प्रत्येक पर्यटकाचं हे स्वप्न असतं. पण याच स्वप्नाचं रूपांतर भयानक स्वप्नात कसं होतं, याचा प्रत्यय गोव्यात आला आहे. सुष्मिता नावाची पर्यटक महिला जेव्हा पॅरासेलिंग करत होती, तेव्हा तांत्रिक बिघाडामुळे ती थेट समुद्रात कोसळली. मात्र, भयानक गोष्ट ही की, पॅरासेलिंगची दोरी तिच्या गळ्याभोवती एखाद्या फासासारखी आवळली गेली..0
0
Report
Advertisement
