icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

इंधन दरों में कटौती की मांग पर काँग्रेस का सांगली में प्रदर्शन

Sangli, Maharashtra:इंधन दरवाढी विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे। भाजप सरकारच्या विरोधात पेट्रोल पंपा समोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करत भाजप सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे। काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली। पेट्रोलचे वाढवलेले दर कमी करावेत व इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करत,या पुढील काळात दर वाढ झाल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिला आहे।
0
0
Report

इंदापुर के किसानों ने खडकवासला पानी संकट के खिलाफ पुणे- सोलापुर NH पर रास्ता रोको

Rui, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1805ZT_INDAPURROAD FILE 5 कृषिमंत्र्याच्या इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक; पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको.... हजारो शेतकरी रस्त्यावर पाण्यासाठी उतरले.... Anchor _ कृषिमंत्र्याच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत असून शेतकरी आक्रमक होऊन पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग पुणे धरला आहे... इंदापूर तालुक्यात खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन अद्याप मिळाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर दोन चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.... खडकवासला कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन इंदापूर तालुक्याला अद्याप मिळालेले नाही. यामुळे आधीच पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आज इंदापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर दोन चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. “शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्या”, “उन्हाळी आवर्तन सुरू करा” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....
0
0
Report

पिंपरी-चिंचवड में भीषण गर्मी, पारा 40 डिग्री से ऊपर

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने उष्णता वाढतच असून अनेक वेळा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरदरून घाम आला किंवा चक्कर आली तर तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिला आहे. महापालिकेची सर्वच रुग्णालय आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.
0
0
Report
Advertisement

विधान परिषद में भावना गावली की उपस्थिति पर प्रश्न, रिकॉर्ड की जाँच की जाएगी

Washim, Maharashtra:अधिवेशन दरम्यान बहुतेक दिवस उपस्थित नसल्याची बाब समोर आल्यानंतर भावना गवळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली。“रेकॉर्ड तपासलं तर मी कोणत्या अधिवेशनाला उपस्थित होते किंवा नव्हते हे स्पष्ट होईल.या उन्हाळी अधिवेशन दरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली होती.ती जखम महिना-सव्वा महिना बरी झाली नाही,त्यामुळे मला अधिवेशनाला उपस्थित राहता आला नाही,” असं त्यांनी सांगितलं.तसेच, “आता माझी प्रकृती चांगली आहे. इतर अधिवेशनांमध्ये माझी उपस्थिती राहिली आहे. त्यामुळे संपूर्ण रेकॉर्ड तपासूनच निष्कर्ष काढावेत,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
0
0
Report

नागपुर जलक्रांति परिषद 2026: नाना पाटेकर और मकरंद अनासपुरे की उपस्थिति

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात जलक्रांती परिषद 2026 चे आयोजन.... - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलक्रांती परिषदेचे आयोजन.... यंदाचे हे 25 वे वर्ष... - रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात.... सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. - तसेच राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, पंकज भोयर डॉ. पंकज भोयर उपस्थित आहे - पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे - विदर्भातील विविध भागातून नागरिक, शेतकरी, अभ्यासक या कार्यक्रमात सहभागी झाले आहे..
0
0
Report

नीट पेपर लीक: नांदेड के कोचिंग क्लास पर घातक आरोप, CID जांच शुरू

Nanded-Waghala, Maharashtra:नीट चा निकाल येण्यापुर्वीच नांदेडमधील एका कोचिंग क्लासेसस ने अपकमिंग रिझल्ट म्हणून जाहिरात करून ती जाहिरात व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. ही जाहिरात सध्या व्हायरल होत आहे. नांदेड मध्ये खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेतून आपले विद्यार्थी कसे गुणवंत आहेत याची जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र नांदेड मधील एका खाजगी कोचिंग क्लासेसला अशी जाहिरात महागात पडण्याची शक्यता आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने शनिवारी नांदेड मध्ये कदम कुटुंबाची चौकशी केली. पाच लाख रुपयांत आपल्या मुलीसाठी तिच्या वडीलांनी नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. आणि याच मुलीचा फोटो छापून नांदेड मधील एका खाजगी कोचिंग क्लासेसने जाहिरातबाजी केल्याचे समोर आले आहे. चौकशी करण्यात आलेल्या मुलीला केमिस्ट्री या विषयात 180 पैकी 180 गुण मिळाल्याची ही जाहिरात आहे. विशेष म्हणजे नीट परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच संबधित क्लासेसने असे भाकीत जाहिरातीतून वर्तवले आहे. अन्य दोन विद्यार्थ्याचे फोटो देखील जाहिरातीत छापण्यात आले. सद्या ही जाहिरात समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. दरम्यान या जाहिरातबाजीमुळे संबधित कोचिंग क्लासेस चालक तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.
0
0
Report
Advertisement

बेकायदे गर्भपात की दवाएं देने वाले आयुर्वेदिक डॉक्टर के खिलाफ एफडीए की छापा कार्रवाई

Vasai-Virar, Maharashtra:बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या BAMS आयुर्वेदिक डॉक्टर वर फूड्स अँड ड्रग्स च्या अधिका-याने छापा टाकून रंगेहाथ पकडले आहे. आरोपी डॉक्टरकडून फूड्स अँड ड्रग्स अधिकारी यांना धक्काबुक्की करत, पुरावा केला नष्ट शैलेश महाजन असे बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टर चे नाव असून, याने नालासोपारा पश्चिम निर्मळ नाका येथे गुरुकृपा नावाचे क्लिनिक चालवत होता. हा केवळ BAMS डॉक्टर असून, सर्रास पणे गर्भपाताच्या गोळ्या देत होता. सतीश चव्हाण असे धक्काबुक्की झालेल्या औषद निरीक्षक चे नाव असून, गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132 शासकीय कामात अडथळा, कलम 221 सरकारी आदेशाचे उल्लंघन करून, चौकशीत अडथळा निर्माण करणे, कलम 3(5) कट रचून सामूहिक गुन्हेगारी केल्या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केले आहे. रविवार ता 17 रोजी न्यायालयात हजर केले असता, 19 मे पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिली आहे.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

वैजापूर के कांदा किसान आंदोलन ने समृद्धी महामार्ग रोककर ट्रैफिक बाधित किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. यावेळेस आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला आणि जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन होतं. यावेळेस समृद्धी महामार्गावर टायर सुद्धा पेटवण्यात आले आणि वाहतूक रोखून धरली. महामार्गावर वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्या. पोलिसांनी समजूत घातल्यावर ही आंदोलक हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी काही आंदोलकांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं आणि महामार्ग मोकळा केला. जवळपास 15 ते 20 मिनिटं आंदोलकांनी महामार्ग रोखून ठेवला होता त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवून महामार्ग वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. अंबादास दानवे यांना ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कांद्याला हमीभाव दिला नाही तर यापेक्षा मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंबादास दानवे आणि आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report

रत्नागिरी में हापूस आमों की कीमतें गिरीं, मानसून से किसान परेशान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत हापूसचा अंतिम टप्पа.. कोसळते दर आणि पावसाच्या सावटात बागायतदार संकटात!.. अँकर रत्नागिरीत हापूस आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मान्सूनच्या धास्तीने बागायतदारांची काढणीसाठी मोठी धावपळ सुरू आहे.. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची मोठी घट झाली आहे,त्यातच आता बाजारात आवक वाढल्याने हापूसचे दरही कमालीचे कोसळले आहेत... एकीकडे घसरलेले भाव आणि दुसरीकडे पावसाचे संकट यामुळे आंबा उत्पादक शेतकरी "इकडे आड तिकडे विहीर" अशा कात्रीत सापडला आहे... हाता-तोंडाशी आलेले पीक मान्सूनपूर्वी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची झाडांवर शेवटची धडपड सुरू आहे..
0
0
Report
Advertisement

खेड के किसान घोड़े से खेत में, ईंधन महंगाई के बीच पारंपरिक खेती की मिसाल

Shirur, Maharashtra:*बुलेट-कारच्या युगात खेडच्या शेतकऱ्याचा घोड्यावरून प्रवास; इंधन बचत आणि पारंपरिक शेतीचा अनोखा संदेश* ANC :आजच्या काळात माणूस अलिशान गाड्या आणि महागड्या प्रवासामागे धावत असताना, खेड तालुक्यातील पाईट गावातील शंकर हेंगले मात्र रोज घोड्यावरून शेतात जातात. वाढते पेट्रोल दर, खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेती यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला आहे. VO :पाईट गावातील शंकर खेंगले यांनी आधुनिक वाहनांऐवजी घोडीला आपल्या जीवनाचा भाग बनवलेय शेतातील खराब रस्ते आणि वाढत्या इंधन दरांमुळे ते रोजच्या प्रवासासाठी घोडीचाच वापर करतात.गोवंशाचे संगोपन करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या खिल्लार गाईच्या संगोपनाचा ध्यास घेतलाय ट्रॅक्टरपेक्षा बैल आणि गोपालनावर आधारित शेतीच जमीन टिकवते, असा विश्वास व्यक्त करत कप पेट्रोल शंभरी पार करत असताना, दुचाकीऐवजी घोड्यावरून प्रवास करणारा हा शेतकरी इंधन बचतीचाही संदेश देतोय. मुंबईतील आयुष्य सोडून गावाकडे परतलेल्या शंकर हेंगले यांनी पारंपरिक शेती आणि गोवंश संवर्धनाची वाट निवडत आधुनिक दिखाऊ जीवनशैलीसमोर वेगळा आदर्श उभा करत खिल्लार गाईचे संगोपन, इंधन बचत आणि पारंपरिक शेती जपत आधुनिक जीवनशैलीला चपराक दिलीय Byte: शंकर धोंडीबा खेंगले (शेतकरी ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
0
0
Report

रत्नागिरी में कृत्रिम रेत परियोजना से रोजगार के नए अवसर, ग्रामीण अर्थव्यवस्था को नई दिशा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कृत्रिम वाळू प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीला बळ.. साई क्रश सॅन्ड जिल्ह्यातील पहिला प्रकल्प.. ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही मिळणार नवी दिशा.. उद्योजक अनिकेत कदम यांचा विश्वास.. नदीपात्रातील अवैद्य वाळू उपसा रोखून पर्यावरण संवर्धनासाठी कृत्रिम वाळू अर्थात एम सॅन्ड उद्योगाला शासनाने प्राधान्य देत धोरणात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.. वेरळ येथील साईक्रश सॅन्ड प्रकल्प जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.. पर्यावरणाचा समतोल राखत बांधकाम क्षेत्रासाठी पर्यायी साधन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या प्रकल्प अंतर्गत अवजड दगड, बेसॉल्ट किंवा ग्रॅनाईट दगड मोठ्या क्रशर मशीनद्वारे बारीक करून त्याद्वारे कृत्रिम वाळू तयार करण्यात येते.. या कृत्रिम निर्मितीला चालना मिळून भविष्यात अशा उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल असा विश्वास युवा उद्योजक अनिकेत कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top