icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

हिरामण खोसकर ने कुंभमेळे के دوران सरकार के खिलाफ तीखा सवाल उठाया

Nashik, Maharashtra:नाशिक - - सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर - राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच म्हणत कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी - स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना ही विश्वासात घेत नसल्याची व्यक्त केली खंत - यापूर्वी कुंभमेळे झाले नाहीका ? याच कुंभमेळ्यात असा काय बदल होणार आमदार खोसकर यांचा सरकारलाच संतप्त सवाल - शेतकऱ्यांना उघड पाडून कुंभमेळा करणार का ? - काल भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज वरून आमदार हिरामण खोसकर संतप्त
0
0
Report

यवतमाल के आजंती पारधी गांव में पानी की कमी से छह वर्षीय बालिका की मौत, उष्माघात की संभावना

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ के नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर एका सहा वर्षीय मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गावात पाण्याची टंचाई असल्यामुळे अनवी अनाडी भोसले ही मुलगी पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करायची, पाणी आणण्यासाठी गेलेली अनवी रस्त्यात चक्कर येऊन कोसळली, ज्यात तिचा मृत्यू झाला. अनवीचा मृत्यू हा उष्माघाताचा बळी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजंती पारधी बेड्यावर 56 कुटुंब, व 350 लोकवस्ती आहे. गावातील प्रत्येक घरासमोर नळ कनेक्शन आहे मात्र या नळाला पाणी येत नाही. 8 दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्याने, इतर दिवस गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. अनवी हिला कुठलाही आजार नव्हता, शिवाय तिला मळमळ उलटी झाली नाही त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कसा झाला याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. सध्या हा उष्माघाताचा बळी म्हणता येणार नसला तरी अनवीच्या शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे आरोग्य विभागाने सांगितले.
0
0
Report

नाशिक का आरोप: सरकार के खिलाफ आमदार खोसकर ने किसान-प्रतिनिधियों से नाराजगी

Nashik, Maharashtra:नाशिक - सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर - राष्ट्रवादीचे आमदार हिरामण्य खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच म्हणत कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी - स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना ही विश्वासात घेत नसल्याची व्यक्त केली खंत - यापूर्वी कुंभमेळे झाले नाही का ? याच कुंभमेळ्यात असा काय बदल होणार आमदार खोसकर यांचा सरकारलाच संतप्त सवाल - शेतकऱ्यांना उघड पाडून कुंभमेळा करणार का ? - काल भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज वरून आमदार हिरामण खोसकर संतप्त बाईट - हिरामण खोसकर ,आमदार
0
0
Report
Advertisement

ताडोबा-अंधारी के किनारे आगरझरी में फूलपंखरू ग्राम बनेगा, पर्यटन का नया केंद्र

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात आता फुलपाखरू उद्यान नव्हे तर चक्क फुलपाखरू ग्राम साकारणार. जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेले आगरझरी गाव फुलपाखरू ग्राम रुपात होणार विकसित. खास आराखडा तयार करून ग्रामस्थाना या अंतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. गावातील प्रत्येक घराला एका फुलपाखरू प्रजातीचे नाव दिले जाणार असून ती प्रजाती प्रामुख्याने आढळणाऱ्या झाडाचे संवर्धन आणि विक्री त्या कुटुंबाला करता येणार है. गावात महिला गाईड नेमून त्याच्या द्वारे ग्राम सफर घडविली जाणार आहे. वाघा व्यतिरिक्त परिसंस्थेतील सर्वात छोट्या घटकाला केंद्रस्थानी ठेवत पर्यटन विकास साधला जाणार आहे. डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या भागीदारीने हा प्रकल्प आणखी सक्षम होणार आहे. प्रत्यक्ष जीवन आणि कथा-साहित्यात संवेदनशीलता आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या फुलपाखरामुळे एक गाव पर्यटन नकाशावर येत आर्थिक समृद्धी साधणार आहे. ताडोबा प्रशासनाच्या प्रयत्नाने हे शक्य झाल्यास विविधांगी पर्यटन मॉडेल विकसित होणार आहे. आगरझरी गावाच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे की फुलपाखरू ग्रामामुळे आर्थिक समृद्धी आणि रोजगार वाढणार आहे. आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर.
0
0
Report

पुणे में चाकण के 3 साल के बच्चे के साथ घृणित अपराध: बीड में नातेदारी के खिलाफ क्रूरता

Khed, Maharashtra:पुण्यात एका 3 वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसऱीकडे बीडमध्ये एका नराधम आजोबाने आपल्याच 3 वर्षांच्या नातीला हवशीचा शिकार बनवलंय. या घटनांचा हा थरकाप उडवणारा रिपोर्ट... पुण्याच्या चाकण परिसरातील खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात खेळायला गेलेला 3 वर्षांचा निष्पाप 'रियान्स' अचानक गायब होतो. आई-वडील शोध घेतात, पोलिस कामाला लागतात... काही तासांतच सत्य समोर येतं; गळा चिरून मृतदेह एका सुटकेसमध्ये कोंबून ठेवला जातो. या नराधमाचा साथी 16 वर्षांचा शेजारी मुलगा असलेल्या अल्पवयीन मुलाने केला. मध्य प्रदेशातून पुण्यातील कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. बीडच्या केज तालुक्यातील 54 वर्षाच्या आजोबाने आपल्या 3 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पोलीसांनी नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. सुरक्षित नातेसंबंधांची व्याख्या आता बदलायची का? एकीकडे विकृत अल्पवयीन मुलाची क्रूरता, दुसरीकडे रक्ताच्या नात्यातील नराधमपणा... या दोन्ही घटनांनी समाजमन सुन्न झालंय. चाकण असो वा बीड, नागरिक आता एकच मागणी करत आहेत - अशा नराधमांना भरचौकात फासावर लटकवा! म्हाळुंगे आणि केज पोलीस तपास करत आहेत. आज ही दोन्ही कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. 3 वर्षांच्या त्या निष्पाप मुलांना काय माहीत होतं की त्यांच्या आजूबाजूलाच लांडगे टपून बसलेत. गुन्हेगारांना न्यायालय कठोर शिक्षा करेलच, पण अशा विकृत मानसिकतेचं काय? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय.
0
0
Report

सोलापुर बोरामणी तिहेरा हत्याकांड: 6 के विरुद्ध मुकदमा दर्ज, मुख्य आरोपी की तलाश जारी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची नातेवाईकांची तक्रार मृत गायत्री मस्के ही संपत्तीतील वाटा तसेच आरोपी शंकर मस्के याला हात उसने दिलेले 25 लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यातूनच आरोपीने हे हत्याकांड केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथके रवाना केली आहेत बीएनएस कलम 103 (अ), 351(2), 3, 5 यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल
0
0
Report
Advertisement

लातूर में दो घटनाओं में आग, गोठे में नुकसान, मोटरसाइकिल जलने से हड़कंप

Latur, Maharashtra:चाकूर तालुक्यातील जगळपूर येथे जनावरांच्या गोठ्याला आग तर रेणापूर तालुक्यातील मोठेगाव येथे एका मोटारसायकलला लागली आग लातूर जिल्ह्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना लातूर जिल्ह्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना समोर आले आहेत. चाकूर तालुक्यातील जगळपूर येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून मोठे नुकसान झाले असतानाच आता रेणापूर तालुक्यातील मोठेगाव येथे एका मोटारसायकलला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे... मोटारसायकलने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली... सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही... मात्र सलग घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे...
0
0
Report

मुरबाड के काळू डैम के विरोध में किसानों ने किया बड़ा प्रदर्शन, बयान पर नाराजगी

Ambernath, Maharashtra:मुरबाडच्या काळू धरण बाबत पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप धरणग्रस्तांचा एकत्र येत वक्तव्याचा केला निषेध बाधित १९ गावांचा धरणाला विरोध कायम ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या कामाला गती दिली असून बाधित शेतकरी यांना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी मार्गदर्शन करताना केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परिसरातील सर्व स्थानिक शेतकरी यांनी एकत्र येत धरणाला ठाम विरोध करण्याचा निर्धार केला. यावेळी बाधित क्षेत्रातील शेतकरी यांनी निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रसरकारने धरणाला पूर्वपरवानगी देताना टाकलेल्या ३४ अटींची कोणतीही पूर्तता न करता धनदांडग्यांच्या फायद्यासाठी धरणाचा अट्टाहास सुरू आहे. मंत्री महोदय यांचं वक्तव्य हे वस्तुस्थितीच्या उलट असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा धरणाच्या भूसंपादन प्रस्तावाला ठाम विरोध आहे. तसे ठराव प्रत्येक ग्रामसभा यांनी एकमताने मंजूर केले असताना अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये करून शेतकऱ्यांना चिथावण्यासाठी जर कुणी करत असेल तर त्याला आपण वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करू असे असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं तसेच या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे चंद्रशेखर भुयार , मुरबाड
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top