icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बार्शीटाकळी के किसान बेमौसमी बारिश से प्रभावित, प्रदर्शन कर सूखा घोषित करने की माँग

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे... हातातोंडाशी आलेला घास पावसाअभावी हिरावला जात असताना, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रात्रभर जागून आंदोलन केलं... बार्शीटाकळीच्या जुन्या बसस्थानकावर शेकडो शेतकऱ्यांनी ‘दुष्काळ जागरण आंदोलन’ करत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली...शनिवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होतं... हातात फलक, घोषणाबाजी आणि सरकारविरोधातील आक्रोश..अशा वातावरणात शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली... अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे... पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे... त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..या पार्श्वभूमीवर बार्शीटाकळी तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली... यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याची तातडीने मदत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या...
0
0
Report

कराड बालगृह में मारपीट से नाबालिग की मौत, परिजनों ने हंगामा किया

Satara, Maharashtra:कराड, सातारा: बाल निरीक्षण गृहातील मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराडमध्ये घडली आहे. निशांत शिलवंत असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी बालगृहातील मुलांमध्ये भांडण झाले होते. या भांडणात एका निशांत शिलवंत याला मारहाण झाल्याची माहिती आहे. या निशांतवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. कोल्हापुरातून मुलांच्या मृतदेह घेऊन आलेली ॲम्बुलन्स थेट कराडच्या बाल गृहात आणण्यात आल्याने गोंधळ उडाला. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी बालगृहासमोर दिवसभर ठिय्या मारला होता. अखेर वादावादीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनि केलेल्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात बालगृहातील तिघांना बडतर्फ केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आल्याने नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. मारहाणीचे नेमके कारण आणि या घटनेला जबाबदार कोण, याचा पोलीस तपास सुरू आहे. बाईट :- नातेवाईक
0
0
Report
Advertisement

अकोला के अकोट में वनवासी लोककला जागरण, नई पीढ़ी को पारंपरिक कला मंच

Akola, Maharashtra:लोककला....महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध करून सोडणारा आपला प्राचीन वारसा... मात्र, काळ बदलत गेलाय आणि कधीकाळी समाजमनावर गारूड घालणाऱ्या या लोककला हळूहळू लोप पावत गेल्यात... अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आपल्या याच लोककलांच्या वैभवशाली आणि समृद्ध वारशाचा 'जागर' करण्यात आला... जेसीआय सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित 'नृत्यरंग वनवासींचा' या विशेष कार्यक्रमातून वनवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्यकलेला व्यासपीठ मिळालं... तसंच, नव्या पिढीपर्यंत ही लोकपरंपरा पोहोचवण्याचा संदेशही देण्यात आला... या कार्यक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणं एवढाच नव्हता... तर वनवासी समाजाच्या पारंपरिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरांना व्यासपीठ देणं, नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांची ओळख करून देणं आणि लोप पावत चाललेल्या लोककलांचं जतन करण्यासाठी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता... याबद्दल एक टिप्पणी? Not in Marathi. आम्ही या भागात कार्यक्रमाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित केलं आहे. अलीकडे बदलाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचं हिडीस आणि ओंगळवाणं प्रदर्शन मांडलं जात असताना..आपल्या मातीशी नाळ जोडणाऱ्या या पारंपरिक लोककला मात्र आजही आशेचा किरण ठरत आहेत... कारण या कला केवळ मनोरंजनाचं साधन नाहीत, तर त्या आपल्या पूर्वजांची संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहेत...
0
0
Report

गणेश मूर्तियों की बुकिंग हाउसफुल, महंगाई के बावजूद भक्तों में उत्साह तेज

Ambegaon, Maharashtra:गणेशोत्सवासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या दरांचा फटका यंदा गणेशमूर्तींनाही बसला आहे. तरीही भक्तांच्या उत्साहात आणि श्रद्धेत कोणतीही कमतरता दिसून येत नाहीये. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गणेशमूर्तींचे बुकिंग हाऊसफुल झालंय. वाढती महागाई आणि वाहतूक खर्च यामुळे किंमती वाढल्या असल्या, तरी बाप्पावरील अथांग श्रद्धेपोटी भक्तांनी कारखान्यांमध्ये आगाऊ नोंदणी करून मूर्ती सुरक्षित केल्या आहेत. अवघ्या काही तासांत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर घुमणार आहे.
0
0
Report

भंडारा लोकअदालत: 3758 मामलों में 272 समझौते

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय तिसरी लोकअदालूत ने लोकअदालत समोर 3758 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 272 प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. धनादेश अनादर, मोटार VEHICLE अपघात दावे, दिवाणी प्रकरणे, लेबर लॉ आणि विविध प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. विशेष म्हणजे, मोटार अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एका प्रकरणात 66 लाख रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात 21 लाख रुपयांचा मोबदला मिळवून देण्यात आला. लोकअदालतीच्या माध्यमातून वादाचा जलद आणि सामंजस्यपूर्ण तोडगा काढला जात असल्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रासही कमी होत आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में शिक्षक सम्मान समारोह में विद्यार्थियों की लम्बी प्रतीक्षा ने उठाए सवाल

Akola, Maharashtra:त्रं: अकोला जिल्ह्यातील अंत्री येथे काँग्रेसच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचीही उपस्थिती अपेक्षित होती..मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.दरम्यान, प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तयार करण्यात आले होते..कार्यक्रमाची वेळ होती दुपारी चार वाजता..मात्र काही प्रमुख पाहुणे उशिरा आल्याने या चिमुकल्या विद्यार्थ्यांना तब्बल सव्वा सहा वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली..अखेर पाहुणे आल्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीमच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं.. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या शिक्षकांना विचारणा केली असता एका शिक्षकाने हे विद्यार्थी शाळकरी असल्याचा म्हंटल तर एका शिक्षकाने हे विद्यार्थी व्यायाम शाळेचे असल्याचे म्हंटल.शिक्षकांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमातच विद्यार्थ्यांना अशाप्रकारे ताटकळत ठेवण्यात आल्याने कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे...त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करताना विद्यार्थ्यांच्या वेळेचा आणि त्यांच्या सुविधांचाही सन्मान होणार का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे..
0
0
Report

हाईवे पर फंसे यात्रियों को मुफ्त नाश्ता और पानी से मिली राहत, फूड स्टॉल

Chendhare, Maharashtra:स्लग - वाहतूक कोंडीत प्रवाशांना फूड स्टॉलचा दिलासा महामार्गावर प्रवाशांसाठी मोफत नाश्त्याची सोय काँडीत अडकलेल्या गणेशभक्तांसाठी मदतीचा हात अँकर - मुंबईहून कोकणाकडे गणेशोत्सवासाठी निघालेल्या प्रवाशांना सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ठिकठिकाणी vehicleांची लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना तासनतास रस्त्यावरच थांबावं लागत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडून महामार्गावर फूड स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर प्रवाशांना मोफत नाश्ता आणि पाण्याची सुविधा दिली जात असल्याने कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय.
0
0
Report

बुलढाणा में संजय गायकवाड़ पर महिला के सम्मान के उल्लंघन के आरोप; पुलिस ने मामला दर्ज किया

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग "बाप तो बाप है लेकिन बापासारखा शरीर आणणार कुठून.." "असं विधान करणे आ.संजय गायकवाड यांना भोवले." 42 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल. गेल्या आठवड्यात चिखली मतदार संघाच्या भाजपा आ.श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने बुलढाणा शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या वेळी एक रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीत "बाप तो बाप रहेगा...." अशा प्रकारे गाणेही वाजवण्यात आले होते. या गाण्यावर प्रसारमाध्यमांनी आ.संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता आ.संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, " बाप तो बाप है हे ठीक आहे. मात्र हे विधान एखाद्या पुरुषाने केलं तर चालेल मात्र एखाद्या बाईने म्हटलं बाप तो बाप आहे तर बापाचं शरीर आणणार कुठुन....?" असा सवाल उपस्थित केला होता. हे विधान समाज माध्यमात व प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. या विधानावर महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला असून महिलांच्या शरीर ठेवणीवर प्रहार करण्यात आला आहे असा आरोप करत संजय गायकवाड यांनी हे विधान हेतू पुरस्कर केल्याचं तक्रार करत एका 42 वर्षीय महिलेने आ.संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्री आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

गणपति उत्सव के संदर्भ में कांजूरमार्ग पुलिस का रूट मार्च

Mumbai, Maharashtra:गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कांजूरमार्ग पोलिसांचा रूट मार्च आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरातील झोन-७ अंतर्गत कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने आज रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढवण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला. यावेळी कांजूरमार्ग परिसरातील प्रमुख मार्ग तसेच संवेदनशील ठिकाणांवरून पोलिसांनी संचलन केले. गणपती उत्सव शांतता‌त आणि उत्साहात पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला. नागरिकांनी गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
0
0
Report

गणेश नाईक का शिंदे पर तंज: मुद्दों से भटकना नहीं चलेगा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग वन मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर लगावला अप्रत्यक्ष टोला. आता सध्या मुख्यमंत्री आणि सगळेच मंत्री इतके टेन्शनमध्ये आहेत. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती, धर्माच्या आणि जातीच्या नावाने सगळं सुरु ज्याचा ताप राज्य कर्त्यांना होतोय. काही लोकांनी आगे लावल्या आता आधी भिजत नाही आहेत. बाटलीतली भूत ज्याच्यात ताकद असेल पुन्हा बंद करण्याची त्यानेच बाटलीतलीत भूत बाहेर काढावी. ज्याच्यात बंद करण्याची ताकद नाही त्यांनी या लफड्यात पडायचं नाही. तसली ढोंग सोंग कायम आणता येत नाहीत त्यासाठी रिअलॅस्टिक जीवन असलं पाहिजे. गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य. साउंड बाईट- गणेश नाईक
0
0
Report
Advertisement

सप्तशृंगी गढ़ घाट पर swift कार में आग, यातायात बंद, मायलेक सुरक्षित

Nashik, Maharashtra:सप्तशृंगी गढ़ घाटात संदेशनात swift कार ने आग पकड़ ली; मायलेक सुरक्षित, यातायात बंद. नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटातून मोठी बातमी समोर आली आहे. दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या Swift कारने अचानक पेट घेतला. घाटातील गणपती पॉइंटजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शिरूर येथील भाविक कारमधून गडाकडे जात असताना इंजिन गरम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. वाहन थांबवल्यानंतर काही वेळातच कारने अचानक पेट घेतला. आग लागल्यावर नांदुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक बंद केली. अग्निशामक दल आणि टँकरच्या मदतीने आग विझवण्यात आली; मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कारमधील मायलेक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, घाटातील वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली असून भाविक आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

नागपुर में बाप्पा के आगमन से बाजारों में चहल-पहल, बारिश के बावजूद उत्साह बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी नागपुरातही बाजारपेठ सज्ज झाली आहे... मात्र दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे थोडी भक्तांची धावपळ झालीय... चितार परिसरात बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी भक्त पोहोचत आहे मात्र पावसामुळं अपेक्षित गर्दी आज झालेली नाही... दरम्यान बाप्पाच्या आगमनापूर्वी सजावटीच मखर आणि इतर सजावटीचा सामान घेण्यासाठी महाल आणि इतर शहरातील बाजारपेठेत खरेदी करताना सर्वसामान्य नागरिक दिसून येत आहे दिसून येत आहे... दरम्यान उद्या रविवारच्या दिवशी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top