445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बार्शी में 42 दिन से बारिश नहीं, सोयाबीन बर्बाद; किसान राहत मांगते
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत ४२ दिवसांपासून पावसाची दडी; सोयाबीन होरपळले, शेतकऱ्याने ३ एकर पिकांवर फिरवला रोटावेटर बार्शी तालुक्यातील नारी येथील सतीश शिंदे यांचा संताप; कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी बार्शी तालुक्यात पावसाने तब्बल ४२ दिवसांपासून दडी मारल्याने सोयाबीन पिके अक्षरशः होरपळून गेली आहेत. नारी गावातील शेतकरी सतीश शिंदे यांच्या तब्बल ३ एकर सोयाबीन पिकाचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. पीक वाचण्याची शक्यता नसल्याने शिंदे यांनी अखेर रोटावेटर फिरवून उभे सोयाबीन पीक नष्ट केले. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. दरम्यान, बार्शी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्याला अखेर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे.0
0
Report
चंद्रपूर में बारिश नहीं, किसानों की धान-खेत खतरे में
Chandrapur, Maharashtra:Feed slug :- 1109ZT_CHP_CROP_IN_DANGER ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने दिली मोठी ओढ पावसाने खंड दिल्याने धान- सोयाबीन- तूर -कापूस पिके संकटात, सिंचनाचा प्रबंध असलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पीक आहे जगवले अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. सुमारे महिनाभरापासून पाऊस बेपत्ता आहे. पावसाने खंड दिल्याने धान- सोयाबीन- तूर -कापूस पिके संकटात आहेत. विहीर, ओढे आणि कालवे असा सिंचनाचा प्रबंध असलेल्या शेतकऱ्यांनी पीक कसेबसे जगवले आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पडलेल्या सरासरीच्या निम्म्या टक्केवारीच्या पावसाने आगामी काळात मोठ्या दुष्काळाची चाहूल लागली आहे. एकीकडे तोकडी कर्जमाफी, वाढलेले खतांचे दर आणि वारंवार खंडित होणारी वीज यासह लहरी निसर्गाचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. एन शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये निराशेचा सूर आहे.0
0
Report
श्रीरामपुर के चर्च क्षेत्र में 16 वर्षीय पर धारदार हथियार से हमला, हालत गंभीर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोडवरील घरकुल चर्च परिसरात गुरुवारी रात्री साडे 10 वाजेच्या सुमारास एका १६ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात संकेत भाऊसाहेब वाघमारे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी संकेत याला तातडीने पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भर लोकवस्तीत रात्रीच्या वेळी झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व तणावाचे वातावरण पसरले आहे. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
गोवा-कोलकाता के आरोपी करोड़ों की साइबर धोखाधड़ी के बाद गिरफ्तार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:कर्ज देण्याच्या बहाण्याने बँक खाती घेऊन करोडोंची सायबर फसवणूक करणारे गोवा आणि कोलकात्याचे आरोपी गजाआड. पोलीस तपासानुसार परदेशी शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये ५०० टक्के नफा देऊन देणाऱ्या आमिषाने एका कंपनी मॅनेजरची ८३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली गेली. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासात खेड शिवापूरमधून अभिषेक मोहन आचरेकर आणि कोलकाता मधून अनमोल शर्मा या दोन मुख्य आरोपींना अटक झाली. अभिषेक आचरेकर हा गोव्यातील सामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या ६० ते ७० बँक खात्यांची माहिती गोळा करत असे. ही सर्व खाती तो त्याचा साथीदार अनमोल शर्मा आणि इतरांना सायबर फसवणुकीचे करोडो रुपये स्वीकारण्यासाठी पुरवत होता. अटक केलेले आरोपी पुणे शहर आणि राजस्थान मधल्या गुन्ह्यांतही पोलिसांना हवे होते.0
0
Report
उल्हासनगर, अंबरनाथ और बद्लापुर में डीजे बैन: गणेश मंडलों के लिए कड़े सुरक्षा कदम
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापुरात यंदा डीजेचा दणदणाट नाही उल्लंघन चाचपणीसाठी नॉईज लिवर मीटर, उल्लंघन केल्यास होणार कारवाई ठाणे पोलिस आयुक्त कार्यालय अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ और बदलापुरात डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या माध्यमातून गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डिजे बंदी संदर्भात सूचना करण्यात आल्यात. 262 गणेश मंडळ असून प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलिस कर्मचारी आणि चार मंडळात एक पोलिस अधिकारी तैनात असणार आहे. तर नियमाचे उल्लंघन चाचपणीसाठी नॉईज लिवर मीटरने मोजणी केली जाणार आहे.0
0
Report
ओबीसी मंत्री अतुल सावे के भाई-भतीजे पर जमीन विवाद के चलते हमला, तीन गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या भावाला आणि पुतण्याला जमिनीच्या वादातुन गुरुवारी मारहाण झाली होती या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहेत, तर तीन आरोपींना रात्रीतून पोलिसांनी अटक केलेली आहे या बेदम मारहाणीतील सावे यांचे भाऊ अजित सावे आणि पुतण्या गंभीर जखमी झालेले आहेत जमिनीच्या वादातून घेरून मारल्याचा सावे कुटुंब यांचा आरोप आहे दरम्यान मारहाण होण्यापूर्वी सावे कुटुंबीय आणि मारहाण करणाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय , नायगव्हाण - खंडेवाडी येथील ग्रामस्थ आणि अतुल सावे यांचे भाऊ अजित सावे यांचा व्हिडिओमध्ये संवाद आहे..0
0
Report
Advertisement
अंबरनाथ नगरपालिका की इमारत में लीकेज, तीन साल में बनी गंभीर खामियां
Ambernath, Maharashtra:अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या इमारतीला गळती लागल्याचा प्रकार सततच्या पावसाने समोर आला. सभागृहात देखील गळती लागल्याने फ्लोरिंग मॅट ओला झाला. आणि त्याच्याच दुर्गंधीमुळे नगरसेवकांना तिथे बसणं शक्य नव्हतं. यामुळेच नगरपालिकेची सभा नाट्यगृहात घेण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली. परंतु सदरील इमारतीचे आणखी दोन मजल्याचं काम सुरु असल्याचे कारण देत ही गळती लागल्याचं नगरपालिकेने मान्य केलं. जवळपास 35 कोटी रुपये खर्च करून अंबरनाथ नगरपालिकेची इमारत तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाली. याच इमारतीतून प्रशासकीय कामकाज नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कारभार चालतो. मात्र अवघ्या तीन वर्षातच इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून नगरपालिकेला लक्ष केलं जातंय. काही कार्यालयाची कमतरता पाहता आणखी दोन मजले वाढविले जात आहेत. त्याकरिता इमारतीवर असलेला डोम हटविण्यात आला. त्यामुळे इमारतीला गळती लागल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली. याच बांधकामावरून टीका सुरू असताना याचा फटका पालिका प्रशासनाला देखील बसला. सभागृहाला देखील गळती लागल्याने पालिकेची सभा नाट्यगृहात घेण्यात आली. सुरू असलेल्या बांधकामामुळे ही गळती लागली असून लवकरच काम पूर्ण होईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य अधिकाऱ्यांनी दिली.0
0
Report
सोलापुर में मराठा आंदोलन जारी, आज पांचवें दिन रास्ता रोको
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मराठा आंदोलनाची धग कायम - मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक - गेल्या चार दिवसांत 4 मोठी आंदोलने तर आज पाचव्या दिवशी देखील सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होणार रास्ता रोको - बीड, धुळे, जालना नंतर सोलापूर जिल्ह्यात देखील आंदोलनाचे लोण पसरण्यास सुरुवात - मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये तरुणांचा लक्षणीय सहभाग0
0
Report
वाशीम में बस स्टैंड पर महिला की सोने की चैन चुराने वाला आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशीम में बस स्टैंड पर महिला की सोने की चैन चुराने वाला आरोपी गिरफ्तार0
0
Report
Advertisement
मराठवाड़ा में कुणबी प्रमाणपत्र वितरण तेज, 3 लाख से अधिक प्रमाणपत्र जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात 'कुणबी' आणि 'मराठा-कुणबी' नोंदी शोधून प्रमाणपत्र वाटप करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. शिंदे समितीच्या स्थापनेपासून ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत मराठवाड्यात तब्बल ३ लाख १६ हजार ९७७ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने प्राप्त अजपैिकी ९९.८ टक्के अर्जावर कार्यवाही पूर्ण केली आहे. संपूर्ण महसूल विभागात आता केवळ ४४ अर्ज प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यात प्राप्त २ लाख १० हजार ९४१ अजपैिकी तब्बल २ लाख १० हजार ९३१ प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. बीड, जालना आणि हिंगोली या üç जिल्ह्यांत सध्या एकही अर्ज प्रलंबित नाही. याशिवाय छत्रपती संभाजीनगर (२५,९५८), धाराशिव (१९,७७५), परभणी (२०,१९०) आणि जालना (१८,६५३) या जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.0
0
Report
मराठवाड़ा में भीषण सूखा: मंत्रिमंडल बैठक तीन साल से नहीं, किसानों की समस्या गम्भीर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाच्या मोठ्या खंडामुळे मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनसारखे हातातोंडाशी आलेले पीक उपटून फेकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. या गंभीर प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी अपेक्षित असलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक यंदाही मराठवाड्यात होणार नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, ही बैठक मराठवाड्यातच व्हावी. यासाठी आपण मुंबईतील आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी करणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. मात्र आता हे शक्य नाही हे ही स्पष्ट आहे, महत्त्वाचा म्हणजे तीन वर्षा आधी विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्यात केलेल्या घोषणांची अजूनही पूर्तता झाली नाही असा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यासाठी उद्धवसेनेचे संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन सुद्धा सुरू आहे..0
0
Report
सोर्स कोड चोरी मामले में प्रमुख आरोपी मंदार पाथरीकर गिरफ्तार; दुबई से पुणे लाया गया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर आणि पुण्यातील नामांकित PRM सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड या आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभाग तसेच नगर विकास विभागाची मुख्य आर्थिक प्रणालीचा सोर्स कोड चोरल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनीचा मालक आणि prm कंपनीचे माजी कर्मचारी अश्या सहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून फरार असलेल्या सॉफ्टमेट कंपनीचा मालक मंदार पाथरीकर या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो दुबई येथे पळून गेला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती. दुबईहून पुणे विमानतळावर आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
Advertisement
40 दिनों बाद बारिश लौटेगी: गणेशोत्सव से पहले शहर में भारी बौछारों की संभावनाएं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गेल्या ४० दिवसांपासून पावसाने मारलेली दडी आणि सलग ४ दिवसांपासून ३१ अंश सेल्सियसच्या पार गेलेल्या तापमानामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आता दिलासादायक वातावरण तयार होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरात पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी शहरात मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारपासून शहराचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सियसच्या पार गेले असल्याने नागरिक प्रचंड उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहरात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या आगामी सात दिवसांच्या अंदाजानुसार समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे...0
0
Report
नाशिक के येवला के खेत में बड़ा गड्ढा, पुरातन भुयार की आशंका से किसान भयभीत
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसुल या ठिकाणी कुडके वस्तीवर मका पिकाच्या शेतामध्ये शेतकरी पतंग कुडके हे पाणी भरण्यासाठी गेले असता अचानक मोठा आवाज झाला सर्व शेतकऱ्यांनी आवाजाचे दिशेने धाव घेतली असता मक्याच्या शेतामध्ये भला मोठा खड्डा त्यांना आढळून आला साधारण 4 ते 5 फूट रुंद व अंदाजे 25 फूट खोल खड्डा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या ठिकाणी पुरातन भुयार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले असून प्रशासनाच्या वतीने तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी करत आहे0
0
Report
कोल्हापुर महापालिका ने घरेलू पानी की दर 5.5 से 8 रुपये तक बढ़ाई, अक्टूबर से लागू; वाणिज्यिक और औद्योगिक सीवरेज अधिभार 30–35% बढ़ेगा
Kolhapur, Maharashtra:Anc :- कोल्हापूरकरांना अखेर पाणी दरवाढीला सामोरे जावं लागला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने नवे दर जाहीर केले असून घरगुती साठी साडेपाच ते आठ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी ऑक्टोंबर महिन्यापासून करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर महानगरपालिका पाणी दरवाढ करणार अशी चर्चा सुरू होती. महानगरपालिकेत देखील पाणी दरवाढीची चर्चा झाल्यानंतर सर्वसमावेशक दरवाढ करण्याबाबत सर्व पक्षांचे एकमत झाले. त्यानंतर आता या दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे. घरगुती बरोबरच व्यावसायिक आणि औद्योगिक सांडपाणी अधिभार देखील 30 ते 35 टक्के इतकी वाढवण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
