Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 26, 2025 11:53:20
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 11:47:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद... महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले त्याचा भाग म्हणून एक हेल्प लाईन सुरू करण्यात आली आहे, ठाण्यातून एकनाथ शिंदे साहेब काम बघत आहेत विविध योजना आहेत त्याची महिलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय... आनंदाचा शिधा एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केला होता, मात्र आता त्यासाठी पैश्यांची तरतूद नसल्याने तो बंद केला आहे. माझी cm dcm यांना विनंती आहे की पुन्हा हा आनंदाचा शिधा सुरू करावा अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे त्यामुळे मोठ्या गाड्यांना प्रतिबंध आणावे असे पत्र परिवहन मंत्री यांना दिले आहे,प्रवेशाची वेळ ठरवून द्यावी असे देखील निवेदन दिले आहे , शहरात दिवसा मोठे ट्रक येऊ देऊ नये, अपघात होतात त्यामुळं जड वाहने स्पीड वर बंधन आणणे, यासाठी प्रताप नाईक यांना विनंती करतोय... उमेदवार पळवापळवी मुळात शिंदे साहेब काल म्हटले, अमीत शहा यांना भेटून चर्चा झाली आहे.. काही लोक नाराज होता,एखाद्याला निधी दिला त्याचा वापर कसा झाला हे विचारले तर याचा देखील काही लोकांना राग येतो परंतु प्रभाग रचने नुसार देखील लोक भूमिका बदलतात, कारण आरक्षण तसे सुटतात त्यामुळं कार्यकर्ते जाणे येणे सुरू राहते... भाजप चा दबाव स्वतःच्या मनावर दबाव आला तर तो मनुष्य मुक्त नाही, दबाव काही नाही आम्ही आपले स्वतंत्र्य निर्णय घेऊ शकतो... राजेंद्र जंजाळ नाराजी मैंने देखा मैं अभी तक उनसे चर्चा नहीं कर पाई, शिंदे साहेब प्रत्येकाशी चर्चा करतात, नाराजी 24 तासात दूर होईल , पालकमंत्री यांनी विश्वासात घेऊन काम करावं ही भूमिका त्यांची योग्यच आहे .. अंजली दमानिया चौ कशी कमिटी नेमल्या आहेत त्यामुळे मी वैधानिक पदावर आहे मी भूमिका मांडणे योग्य नाही अंजली दमानिया स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, लोकशाही पद्धतीने काय करावे यासाठी त्या मुक्त आहे , त्या आंदोलन करू शकतात... लाडकी बहीण श्रेय योजना उदघाटन झाले तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मात्र ते नसताना ही योजना बंद होईल असे विरोधक सांगत होते,मात्र तस काही घडले नाही , श्रेय कोणाचे एकाचे नाही.. अजय पवार तिजोरी चावी विधान .. तिजोरीची चावी अजित पवार यांच्याकडे जरी असली तर त्याच्या अनेक चाव्या होऊ शकतात, आता तिजोरी ला डिजिटल लॉक पण आहेत चेहरा पाहूनही तिजोरी उघडते आणि आता एक तिजोरी उरली कुठेय त्या 2 ही असू शकतात, त्यामुळं चावी कुणा एकाकडे नाही...
107
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 26, 2025 11:34:42
50
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 11:34:29
Shirdi, Maharashtra:साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 16 वर्षीय मुलीचा मृत्यू ; रुग्णालयात आईचा आक्रोश... साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनि उपचारात हलगर्जीपणा केल्याने आमच्या मुलीचा मृत्यू.. कुटुंबियांचे रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप... 16 वर्षीय ऋतुजा गणेश वारे हिचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ... हृदयाच्या आजारासाठी गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या ऋतुजाची काल अचानक खालावली होती तब्बेत.. प्रकृती गंभीर असताना डॉक्टरांनी फक्त सलाईन लावून ऋतुजाला ऍडमिट न करता डिस्चार्ज दिला... सकाळी पुन्हा रुग्णालयात आणल्यावर काही वेळातच डॉक्टरांनी ऋतुजाला मृत घोषित केले... कुटुंबीयांचे रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शैलेश ओघ यांची प्रतिक्रिया... डॉ.शैलेश ओघ , वैद्यकीय अधीक्षक
103
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 26, 2025 11:20:16
Dhule, Maharashtra:भविष्यात एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या प्रचारासाठी जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने चर्चाना उधाण आला आहे. यावेळेस त्यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे सांगितलं. तसंच येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं सांगायला भुसे विसरले नाहीत. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ठाम प्रतिक्रिया भुसेनी दिल्याने चर्चा आहे. काळजी करू नका भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेला असेल परत या महाराष्ट्राच्या नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहणार आहोत. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झोपडीतून आलेला माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जात नाही होता, असं सांगत भुसे यांनी विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांना डिवाचले आहे.
60
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 11:05:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- संविधान दिनानिमित्त चंद्रपुरात काढण्यात आली संविधान जागर रॅली, शहराच्या प्रमुख मार्गांवरून रॅलीचे भ्रमण, शेकडो चंद्रपूरकर नागरिकांनी रॅलीत घेतला सहभाग अँकर:-- संविधान दिनानिमित्त चंद्रपुरात आज संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅलीची सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थित त्यांना संविधान उद्देशिकेची शपथही देण्यात आली. रॅलीने शहराच्या प्रमुख मार्गांवरून भ्रमण केले. शाळेच्या विद्यार्थ्यांची लेझीम प्रात्यक्षिके, विविध आदिवासी नृत्यप्रकार रॅलीचे आकर्षण ठरले. शेकडो चंद्रपूरकर रॅलीत सहभागी झाले. आज संविधान वाचवणे ही काळाची गरज आहे. त्याशिवाय संविधानाने घालून दिलेल्या मार्गावरूनच आपण मार्गक्रमण केले पाहिजे अशी भावना याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली.
104
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 26, 2025 10:52:56
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा येथील नगरपरिषद निवडणूक प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पांढरकवडा येथे रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने एमआयडीसी निर्माण करावी अशी जनतेची मागणी शिंदे यांनी सामंत यांना सांगितली. पांढरकवडा येथील नागरिकांना शब्द देऊ का... अशी विचारणा त्यांनी केली असता सामंत यांनी लगेच होकार दिला. आचारसंहिते नंतर लगेच पांढरकवडा शहरात एमआयडीसी निर्माण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवसेनेचे संपूर्ण पॅनल विजयी करा, तीन तारखेला पांढरकवडा येथे येणार असल्याचा शब्द देखील एकनाथ शिंदे यांनी दिला.
92
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 26, 2025 10:51:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार - मंत्री चंद्रकांत पाटलांकडून, महाडिकांच्या बाबतीत मोठं सुतोवाच... सांगलीच्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीकांच्या बाबतीत मोठं सुतोवाच केले आहे. एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा आमचाला मोठा सत्कार करायचा आहे, असं विधान केले आहे. त्यामुळे सम्राट महाडिकांना आमदारकी देण्याबाबत भाजपाकडून देण्यात आलेला शब्द पाळला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिराळा विधानसभा निवडणुकीदरम्यान सम्राट महाडिकांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजपाने विधान परिषदेवर संधी देण्याचा आश्वासन दिले होतं, दरम्यान शिराळा नगरपंचायतीच्या प्रचार निमित्ताने आयोजित सभेमधून मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकां बाबतीत बोलताना सम्राट महाडीकांनी घाबरू नये, एप्रिल महिन्यात जे व्हायचं आहे, ते होईल आणि एप्रिल महिन्यात तुमचा मोठा सत्कार आम्हाला करायचा आहे, असं विधान केले आहे. त्यामुळे महाडिक समर्थकांच्या भुवया उंचावल्या असून सम्राट महाडीकांना लवकरच विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
112
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 26, 2025 10:50:38
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ.रोझलिन फर्नाडिस यांनी धनुष्यबाण घेतला हाती भाजप नगराप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश तुम्ही जर आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांचा भाजपला इशारा व्हिडिओ: अंबरथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे तर अंबरनाथ मध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं फोडण्याच राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये वरिष्ठांनी ठरवलं आहे की कोणत्याही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते फोडाफोडी करू नये मात्र असं असताना देखील अंबरनाथ शहरात फोडाफोडी सुरूच आहे
167
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 26, 2025 10:46:03
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या पाथरी नगर पालिकेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा मुलाखती घेतल्या गेल्या त्यातून काही इच्छूक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आणि ऐन वेळी त्यांना एबी फॉर्म च न दिल्याने 17 इच्छूक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी ईच्छूक असलेल्या उमेदवाराला एबी फॉर्मच दिले गेले नाहीत,यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या विरोधात राण पेटवत वरिष्ठांकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे पाथरीचे भाजपचे शहराध्यक्ष दहे यांच्यासह भाजपच्या जुन्या एकनिष्ठ पदाधिकार्यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या शिवराज नाईक यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत त्यांना पाठिंबा दर्शवलाय,पाथरी 15 सोळा हजार हिंदूंचे मत असतांना भाजपने एक ही उमेदवार न देता तडजोड करीत भाजपच्या एकनिष्ठाना आयरामांकडून डावलल्याचा आरोप केलाय, भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलीय आमचे परभणीचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी
208
comment0
Report
Advertisement
Back to top