icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कराड में बिबटों का दहशत, रात में बाइक चालक घायल

Satara, Maharashtra:कराड, सातारा - कराड तालुक्यात बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढला असून रात्री एका बिबट्याने कराड- ढेबेवाडी मार्गावरील विंग फाटा येथे दुचाकीवर झडप घेतली. यामध्ये दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाला आहे. दरम्यान बिबट्या सुध्दा जखमी झाला असून काही वेळात त्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दुसरीकडे कराड तालुक्यातीलच तासवडे एमआयडीसीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला असून बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या चार महिन्यांत एमआयडीसीत बिबट्या शिरण्याची ही तिसरी घटना असल्याने उद्योजक आणि कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर खटाव तालुक्यातही बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. जयराम स्वामींच्या वडगावमध्ये वडजाई मंदिर परिसरात दूध गाडी चालकाला रस्त्याकडेला बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
0
0
Report

सोलापूर में राजकारण पर राजेंद्र राऊत का धैर्यशील मोहिते पाटील पर जोरदार प्रहार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज्यातील राजकारण केलेल्या माणसांकडे जिल्ह्यात फिरायला एक माणूस शिल्लक नाही, मा. आ. राजेंद्र राऊतांचा खा. धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार प्रहार - विधान परिषद निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच - खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमचाच उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर माजी आ.राजेंद्र राऊतांची जोरदार टीका - राज्याचे राजकारण केलेल्या माणसांकडे जिल्ह्यात फिरायला एक माणूस शिल्लक नसल्याचे सांगत मा. राजेंद्र राऊतांचा जोरदार प्रहार - सोळा मतांनी आम्ही सुरुवात केली होती 16 मतांनीच आमचा विजय होईल असा आत्मविश्वास खा.धैर्यशील मोहिते पाटलांनी केला होता व्यक्त - अशा पद्धतीचा चुकीचा कॉन्फिडन्स ठेवल्यामुळे मोहिते पाटलांची दुर्दैवी अवस्था झाल्याचा राजेंद्र राऊतांचा दावा बाईट - धैर्यशील मोहिते पाटील ( खासदार, राष्ट्रवादी SP ) बाईट - राजेंद्र राऊत ( विधानपरिषद उमेदवार तथा माजी आमदार )
0
0
Report
Advertisement

अमरावती में मानसून देर से आने से किसान चिंतित, बुवाई प्रभावित

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसाची दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यातील पेरण्या खोडबल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत केवळ १८०० हेक्टरच शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून यावर्षी ६ लाख ५० हजार هेक्टर वर पेरणीचे क्षेत्र अपेक्षित अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन पिक अडीच लाख हेक्टर कपाशीच क्षेत्र असणार तर एक लाख वीस हजार तुरीचा नियोजन असल्याचा अंदाज आहे. अद्याप मान्सूनचा पाऊस आला नसल्यामुळे पेरण्या थांबल्या असून मान्सूनचा पाऊस येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी केले आहे. २४ ते २५ जून नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असा कृषी विभागाचा अंदाज असून ७० ते १०० मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असेही आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आल्या दरम्यान पाऊस लांबल्याने मोठ्या प्रमाणात उकाळा वाढला असून नागरिक उखाड्याने हैराण झाल्याचा पाहायला मिळत आहे.
0
0
Report

NTA ने नीट री-एंट्री परीक्षा के लिए प्रवेश पत्र जारी किए, अबुधाबी केंद्र पर विवाद

Nagpur, Maharashtra:पेपर फुटी चे आरोपानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीची नीट ची फेरपरीक्षा उद्या होणार आहे... तिच्यासाठी सर्व परीक्षार्थींना NTA कडून प्रवेश पत्र देण्यात आले आहे... नागपूरात मात्र अब्दुल्ला नावाच्या परीक्षार्थीने नागपूरसह जवळील शहरपर्याय परीक्षा केंद्रासाठी निवडले असताना त्याला यूएई मधील अबुधाबी परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर देण्यात आले आहे... संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी या संदर्भात एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केल्याची माहिती आहे... परीक्षा केंद्र बदलून न मिळाल्यास अब्दुल्ला परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे。
0
0
Report
Advertisement

यवला धोखाधड़ी मामला: करोड़ों रुपये की ठगी में आरोपी गिरफ्तार, 24 जून तक पुलिस कोठडी

Yeola, Maharashtra:अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोनं देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. येवला तालुक्यातील नगरसुलचा सुप्रसाद प्रमोद दीक्षित याला पुण्यातून सिनेस्टाईल कारवाई करत अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. आज येवला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक, पुणे आणि संभाजीनगर सह अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर जिला परिषद ने 90 स्कूलों में कक्षा वृद्धि मंजूर की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांकडून वर्गवाढीसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्तावाची छाननी करून तब्बल ९० शाळांना वर्गवाढ करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने यावर्षी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी सूचना दिल्यात. त्यात आवश्यक त्याठिकाणी शाळांना वर्गवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शाळांकडून प्रस्तावही मागवले. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांचा छाननी करण्यात आली. पात्र ठरलेल्या ९० शाळांमध्ये वर्गवाढीस मंजुरी दिली. त्यामध्ये चौथीपर्यंत असलेल्या २६ शाळांना पाचवीचा वर्ग असेल. त्याशिवाय ८ शाळांमध्ये सहावीचा वर्ग, ३ शाळांमध्ये सातवीचा, २८ शाळांमध्ये आठवीचा, १९ शाळांमध्ये ९ वीचा आणि सहा शाळांमध्ये दहावीचा वर्ग वाढवण्यात आला.
0
0
Report
0
0
Report

मराठवाड़े में मॉनसून देरी: किसानों के पेराई सीजन पर संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मौसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे मराठवाड्यात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीये जून महिना संपायला आला पेरण्या कधी करायचा असा प्रश्न बळीराजाला सतावतोय..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top