icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ से पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी दर्शन को सायकलवारी में भक्तिभाव की धारा

Yavatmal, Maharashtra:विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, रिंगणातील भक्तिभाव आणि सायकलच्या चाकांचा वेग… अशा भक्तिमय वातावरणात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपची ‘पंढरपूर सायकलवारी’ यवतमाळ येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे उत्साहात रवाना झाली. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकलवारीने शहरातील नागरिकांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेल्या ह्या सायकलवारीचे नागरिकांनी “माऊली… माऊली…”, “ग्यानबा तुकाराम…” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!” या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. “राज्यावरील अलनिनोचे संकट पूर्णपणे दूर होवो, राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात भरघोस पीक येवो आणि यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील समस्त जनतेला सुखी, समाधानी व निरोगी ठेव,” अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्याची विनंती भाजप नेते देवानंद पवार यांनी यावेळी वारकारी बांधवांना केली.
0
0
Report
Advertisement

वारणा नदी में जलस्तर बढ़ा, बाढ़ जैसे हालात; खेतों में फसलें डूबीं

Sangli, Maharashtra:स्लग- वारणा खोऱ्यात पाऊसाची संततधार.. अनेक छोटे बंधारे पाण्याखाली,वारणेचे पात्र बाहेर पडल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती.. अँकर - सांगलीच्या शिराळा व वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे,काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,चिकुर्डे ,मांगले येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.तर ऐतवडे खुर्द येथील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत आहे,त्याच बरोबर वारणा नदी काठच्या शेतात पाणी घुसले आहे,त्यामुळे भुईमूग,सोयाबीन, ऊस, भात, या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. तर बंधारयाचे दरवाजे न काढल्याने पाणी शेतात घुसल्याचे शेतकरयांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती जेल में कैदियों के बीच भारी मारामारी, तीन घायल

Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान मारामारी झाली; तीन कैदी गंभीर जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. ही घटना 4 जुलैच्या पहाटे बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये घडली असून न्यायालयीन बंदी जमील खान बिस्मिल्ला खान यांनी इतर तीन कैद्यांवर काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असून कारागृहात कैद्यांमधील वाद आणि हिंसक घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
0
Report
Advertisement

भारी वर्षा से पुणे-मुंबई महामार्ग और लोहमार्ग पूरी तरह बंद, यातायात ठप्प

Varsoli, Maharashtra:पुणे और मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली है. आधीच्या एक्सप्रेस हायवे वर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय.
0
0
Report

नाशिक के येवला में बारिश ने किसानों की फसलें डगमगाईं, दुबारा बुवाई की आशंका

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मराठवाड्या येणारा येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मुग, बाजरी आणि मक्याची पेरणी केली होती. पिके चांगली उगवल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. पुढील आठ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे
0
0
Report

घर में लटकी पैंट से सांप ने डसा, 12 साल के बच्चे की हालत बिगड़ी; डॉ आनंद बेंदले ने बचाई जान

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- घरात खुंटीला टांगलेल्या पँटमध्ये शिरला विंचू, दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथील घटना, आधी गावातच गावठी उपचार केल्याने प्रकृती खालावली, चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले प्राण अँकर:-- घरात खुंटीला टांगलेली पँट अंगात घातल्यावर आत दडून असलेल्या विंचवाने दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगावची घटना पालकांसाठी धडा ठरली आहे. त्याचे 3 दिवस अतिदക്ഷता विभागात उपचार करण्यात आले. यात चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलाचे प्राण वाचविले. या मुलाचे नाव अनुप ईश्वर ढोणे असे आहे. पावसाळ्याच्या दिवसात विंचू आणि साप यांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज घटनेच्या निमित्ताने व्यक्त झाली. विशेष म्हणजे मुलाच्या पालकांनी प्रकृती अत्यवस्थ होईपर्यंत त्याच्यावर गावातच गावठी उपचार केले. त्यामुळे मुलाची तब्येत आणखी खालावली. मात्र आता चंद्रपुरात डॉ. बेंदले यांच्या इस्पितळात प्रकृती सुधारत आहे. बाईट १) डॉ. आनंद बेंदले, तज्ञ चिकित्सक
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top