445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर में भारी बारिश से जलाशय उफान, सात बांधों के पानी ने यातायात रोक दिया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रात कोसळधारा कायम असून जिल्ह्यातील अनेक नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह एकूण 7 बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे या बंधार्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांची पाणी पातळी देखील वाढू लागली आहे. जिल्ह्यातील आंबा घाट, करूळघाट परिसरात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात धरणांच्या पाणीपलोट क्षेत्रात पडलेल्या पावसावर एक नजर टाकूया घट घटप्रभा धरण क्षेत्रात 59 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण परिसरात 43 मिलिमीटर तुळशी व पाटगाव धरण क्षेत्रात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिकोत्रा मध्ये 38, कुंभी धरण क्षेत्रात 32, वारणा मध्ये 22 तर दूधगंगा धरण परिसरात 24 मिलिमीटर पाऊस पडला आहे. अजूनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. उशिरा का होईना पाऊस सर्वजूर पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.0
0
Report
धापेवाडा डैम के 13 गेट 2 मीटर खुले, 3157 क्यूमेक्स पानी छोड़ा गया
Bhandara, Maharashtra:धापेवाडा धरणाच्या 13 गेट 2 मीटरने खुली.... Anchor :- गोंदिया जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पानी पातळीत वाढ झाली आहे. तर धापेवाडा धरणामध्ये देखील पाण्याची पातळी वाढली आहे.... पाण्याची पातळी वाढल्याने धरणसुरक्षित्तेच्या अनुषंगाने 13 गेट 2 मी ने सुरु करून सध्यास्थिती अंदाजे 3157 क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जर आणखी पाणी पातळीत वाढ झाली तर टप्पा टप्प्याने गेट खुली करण्यात येणार आहे....0
0
Report
मुंबई-गोवा हायवे पर भारी बारिश से उफान, प्रशासन ने सतर्क रहने को कहा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर.. गेल्या दोन तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी.. मुसळधार पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली.. नदी,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.. प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा.. अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडा.. शक्यतो रात्रीच्या वेळी घाट माथ्यावरील रस्त्यांवरून प्रवास टाळा..0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के नागभीड़ के कोरंबी गाँव में बिबटिए को वनपथक ने डार्ट मारकर पकड़ा
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात कोरंबी गावात घरात प्रवेश केलेला बिबट्या वनपथकाने डार्ट मारून जेरबंद केला. बिबट्याला नर असलेला, वय साधारण 2 वर्षे असल्याची माहिती मिळाली. प्रकृती उत्तम असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.0
0
Report
संजय गायकवाड़ को मानहानि नोटिस: असिम सरोदे के दावे पर माफी का नोटिस
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग असीम सरोदे यांना अर्धे पाकिस्तानी आणि अर्धे हिंदुस्तानी म्हणणे आमदार संजय गायकवाड यांना महागात पडणार..? नावावरून टीका केल्याने असीम सरोदे यांनी संजय गायकवाड यांना पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस... सात दिवसाच्या आत जाहीर माफी मागून आपले वक्तव्य मागे घेण्याचा नोटीस मध्ये उल्लेख... आँकर - भाजपाचे बुलढાણા जिल्हा अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती, ही नोटीस प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यामार्फत पाठवण्यात आले होते.. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी वसीम सरोदे यांच्या नावावरून ते "अर्धे पाकिस्तानी आणि अर्धे हिंदुस्तानी वाटतात" असे वक्तव्य केले होते.. या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांना आता असीम सरोदे यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.. आमदार संजय गायकवाड यांनी सात दिवसाच्या आत जाहीर माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे.. असा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आला आहे.. त्यामुळे आता आमदार संजय गायकवाड नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... Byte- अॅड असीम सरोदे0
0
Report
मालेगांव में एक परिवार के दो युवाओं ने की आत्महत्या; पति-पत्नी के कदम चर्चा में
Nashik, Maharashtra:• पतीने आयुष्य संपवल्यानंतर फरार पत्नीचीही आत्महत्या.. • पती अनिकेत जगताप (वय २७)मानसिक छळाला कंटाळून काही दिवसांपूर्वी केली होती आत्महत्या.. • अनिकेच्या कुटुंबीयांनी आरोपी पत्नीला तात्काळ अटक करण्याची केली होती मागणी.. • यानंतर फरार पत्नी श्रुती जगताप هिनेही टोकाचं पाऊल उचलत संपवली जीवनयात्रा... • मालेगावी एकाच कुटुंबातील दोन तरुण जीवांच्या आत्महत्येमुळे मालेगावात मोठी खळबळ.. • पत्नी श्रुती जगताप हिने आत्महत्या केल्याने माहेरवासीयांकडून कॅम्प पोलीस ठाण्यात ठिय्या...0
0
Report
Advertisement
हवा-रेड अलर्ट के कारण कल्याण डोंबिवली महापालिका ने सभी स्कूलों की छुट्टी घोषित की
Kalyan, Maharashtra:हवामान खात्याच्या रेड अलर्ट नंतर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या रद्द. Anc ४ जुलैला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुसळधार,अति मुसळधार पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयांचा समावेश आहे. Remember, यादरम्यान आपातकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी ४ आणि ५ जुलै असे दोन दिवस महापालिकेचे सगळे विभाग प्रमुख, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त या सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने १२ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. या नियंत्रण पक्षाच्या माध्यमातून आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या संदर्भाची माहिती मिळून तात्काळ उपयोजना केला जाईल अशी माहिती महापालीकेकडून देण्यात आलीय. शिवाय महापालिका हद्दीतील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा ,अन्यथा पडू नये असे देखील आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय. Byte-बाळासाहेब चव्हाण (उपायुक्त केडीएमसी)0
0
Report
चिपळूण में तेज हवा से पेड़ गिरा, चार-पाँच वाहन क्षतिग्रस्त, राहत कार्य शुरू
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/रत्नागिरी चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्याचा तडखा.... पंचायत समितीसमोर झाड कोसळले. चार ते पाच वाहनांचे नुकसान. मुसळधार पावसामुळे रहदारी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. झाड हटवाण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु.... झाडाखाली चार ते पाच दुचाकी अडकल्याने गाड्यांचे नुकसान.0
0
Report
नवी मुंबई पालिका कैन्टीन में तले वड़े में जिंदा कीड़े दिखे
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिका के कैन्टीन में तला हुआ वडा में जिंदा अळ्या आढळल्या, तक्रारदार महिलेने आज पालिकेच्या कॅन्टीनमधून खाण्यासाठी वडा घेतला होता, परंतु वडा मध्ये जिवंत अळ्या आढळल्याने महापालिका प्रशासन व कॅन्टीन चालकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.0
0
Report
Advertisement
विरार के कुंभारपाडा धरण में 21 वर्षीय युवक डूबा, जलस्रोतों पर सुरक्षा अपील
Vasai-Virar, Maharashtra:विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील कुंभारपाडा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात जलाशयांमध्ये पोहण्याचा मोह किती जीवघेणा ठरू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव अभिषेक राजभर असे असून तो विरारमध्ये राहत होता. गुरुवारी संध्याकाळी मित्रांसोबत तो कुंभारपाडा धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करूनही तो सापडला नव्हता. आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, धरणे, तलाव, धबधबे आणि बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.0
0
Report
नागपूर में संघ के 101वें एपिसोड का उद्घाटन डॉ. मोहन भागवत के हाथों
Nagpur, Maharashtra:नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त...संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित शंवत व्हिडिओंच्या प्रसारण झाले आहे.. आज "असू आम्ही सुखाने, पत्थर पायातील" या दृकश्राव्य मालिका के १०१ व्या भागाचे प्रसारण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. - "डॉ. हेडगेवार : आधुनिक युग के शालिवाहन" या विशेष यूट्यूब व्हिडिओचेही यावेळी प्रसारण होणार आहे... - लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटी सभागृहात हा कार्यक्रम होतोय0
0
Report
गडचिरोली में प्रस्तावित विमानतळ के विरोध में स्कूल के विद्यार्थियों ने बहिष्कार शुरू किया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली मुख्यालयालगत प्रस्तावित विमानतळाच्या वशीही शाळेवर बहिष्कार, हिरापूर, गुरवळा गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे शाळेसमोर आंदोलन अँकर : गडचिरोलीत प्रस्तावित विमानतळाचा वाद आता नव्या टप्प्यात पोहोचला आहे. कारण, शेतकऱ्यांनंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाची धुरा हाती घेतली आहे. हिरापूर आणि गुरवळा गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकत सलग तिसऱ्या दिवशी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत विमानतळासाठीच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा जीआर रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता विद्यार्थी आणि संपूर्ण गावाचा पाठिंबा मिळाल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज्यपालांकडून आश्वासन मिळूनही जमीन अधिग्रहण प्रक्रिया न थांबल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई क्राइम ब्रांच ने घरफोड़ो के आरोपी गिरफ्तार, 11.67 लाख का माल बरामद
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई गुन्हे शाखेने घरफोडी आणि सोनसाखळी चोरी करणाऱया दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन तब्बल ११ गुह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. गुन्हे शाखेने या आरोपींकडून तब्बल ११ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी कोपरखैरणे, पनवेल तालुका, बदलापूर, वाशिंद, नारपोली, खारघर आणि बाजारपेठ परिसरात गुन्हे केल्याची कबूलि दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी ७ जून रोजी कोपरखैरणे सेक्टर-१२ बी येथील स्वीस्तिक जमुना या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करून १५.९५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करुन नेले होते. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असताना, गुन्हे शाखा यूनिट-१ ने सुद्धा या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. अत्याधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीने दोन संशयितांची ओळख पटविली. मात्र आरोपी कायमस्वरुपी एकाच ठिकाणी न राहता मिरा-भाईंदर, चेंबूर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध डॉरमेटरी व लॉजमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलग १६ दिवस आरोपींचा मागोवा घेऊन युसुफ रशीद शेख ऊर्फ दीपक ऊर्फ राहुल (४२) आणि नौशाद मुस्ताक आलम ऊर्फ सागर (वय ३२) या दोघांना गत २३ जून रोजी कोपरखैरणे परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत या आरोपींनी कोपरखैरणे, पनवेल तालुका, बदलापूर, वाशिंद आणि नारपोली येथील नऊ घरफोडया केल्याची कबुली दिली. तसेच नौशादने त्याच्या साथीदारासह खारघर व बाजारपेठ परिसरातील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या कडून कोपरखैरणे येथील घरफोडीतील ९.४७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच अन्य घरफोडीतील सोन्याची साखळी, एक टीव्हीएस अपाची मोटारसायकल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली आणखी एक मोटारसायकल असा एकूण ११.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या इतर गुह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे. या गुह्यात अटक करण्यात आलेला आरोपी युसुफ रशीद शेख याच्यावर यापुर्वी घरफोडी व इतर ५१ गुन्हे दाखल असून तो गत २० मार्च रोजी जेलमधुन जामीन घेऊन सुटून आला होता. तर त्याचा साथीदार नौशाद मुस्ताक आलम याच्यावर यापुर्वी ३२ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली.0
0
Report
शिराळा में भारी बारिश: चांदोली डैम जलस्तर बढ़ा, पाणीसाठा बढ़ा
Sangli, Maharashtra:शिराळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी,चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ.. सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठयात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यामध्ये 24 मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 46 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे चांदोली धरणात पाण्याची आवक वाढल्याने धनाच्या पाणी पातळी देखील वाढ झाली असून 11.98 टीएमसी इतका पाणीसाठा धरणा मध्ये निर्माण झाला आहे.0
0
Report
कल्याण-शिंदे गट के नगरसेवक-आकाश जयस्वाल विवाद का VIDEO वायरल: महायुती में गहमागहमी
Kalyan, Maharashtra:कल्याणात राजकीय राडा! नगरसेवक मधुर म्हात्रे-आकाश जयस्वाल संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल महायुतीतील वाद चव्हाट्यावर शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी आकाश जयस्वाल याला मारहाण करण्याचा व्हिडिओ वायरल.. कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि आकाश जयस्वाल यांच्यातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला मधुर म्हात्रे यांनी जयस्वालकडून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे आकाश जयस्वाल यांनी मधुर म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला मारहाण करून सोन्याची चैन व मोबाईल हिसकावल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत वादही पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे काल मारहाणी झाली तेव्हा मधुर म्हात्रे यांनी हा हल्ला आकाश जयस्वाल याने केले असून जयस्वाल हा एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्यावर कल्याणमध्ये प्रवेशबंदी न्यायालयाने केली होती तसेच आकाश जयस्वाल हा भाजपचे माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवक विक्रांत तरे यांचा समर्थक असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पालिका निवडणुकीतील पराभवानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वापर करून आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही मधुर म्हात्रे यांनी विक्रांत तरे यांच्यावर केला. निवडणुकीपासूनच आपल्या कामात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला मात्र यावर भाजपचे माजी उपमहापौर विक्रांत तरे यांचेही नाव समोर आले आहे. तरे यांनी आपण आणि मधुर म्हात्रे हे राजकीय विरोधक असल्याचे सांगत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार लढाई सुरू झाली असून परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. सध्या कोळसेवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोघांवर गुन्हे दाखल झाले आहे.0
0
Report
Advertisement
