icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

वाशीम में प्राकृतिक खेती से 8 हजार किसानों ने रासायनिक खाद छोड़ना शुरू किया

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये यंदा नैसर्गिक शेतीकडे झुकाव वाढताना दिसत आहे.रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेती आणि मानवी आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांविषयी वाढती चिंता यामागे कारणीभूत ठरत आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील तब्बल ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांना फाटा देत शेणखत, कंपोस्ट आणि इतर सेंद्रिय निविष्ठांचा वापर सुरू केला आहे.या बदलामुळे जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत होत असून उत्पादन खर्चातही लक्षणीय घट होत आहे. तसेच,विषमुक्त अन्न उत्पादनाला चालना मिळत असल्याने ग्राहकांच्या आरोग्यासाठीही हा सकारात्मक बदल फायदेशीर ठरत आहे. नैसर्गिक शेतीकडे वाढणारा हा कल भविष्यात टिकाऊ शेतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
0
0
Report

बीड़ के नेकनूर में मामूली कारण पर रिक्षाचालक-यात्रियों पर पथराव, पुलिस लाठीचार्ज

Beed, Maharashtra:बीड: नेकनुर मध्ये शुल्लक कारणावरून रिक्षाचालकासह महिला प्रवाशांना मारहाण, गावात तणावाची परिस्थिती..! ANC - ऑटोरिक्षाचा धक्का लागल्याच्या घटनेनंतर बीड तालुक्यातील नेकनूर गावात तणाव निर्माण झाला. एकत्रित जमलेल्या जमावाने थेट ऑटोरिक्षाचालकाला बेदम मारहाण केली.. एवढेच नाही तर प्रवाशी महिला आणि लहान मुलांना देखील मारहाणण्यात आली. हिंसक जमावाने परिसरात दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीचार्ज केला. सध्या नेकनुर मध्ये तणावाची परिस्थिती आहे. रस्त्यावर उतरून हिंसा घडवणाऱ्या सर्वच लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. बाईट: व्यंकटराम, DYSP
0
0
Report
Advertisement

शिरूर के उमेश रणदिवे ने सूखी जमीन पर पेड़ लगा कर जीवंत स्मारक बना दिया

Shirur, Maharashtra:माणूस स्वतःच्या पोटासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, पण मुक्या प्राण्यांचा आणि निसर्गाचा विचार करणारे लोक आजही समाजात आहेत" "पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील उमेश रणदिवे! गेल्या १२ वर्षांपासून उमेश यांनी एक अनोखा वसा जपलाय. उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासू नये म्हणून ते आपल्या एक एकर शेतातली बाजरी काढत नाहीत, तर ती पक्ष्यांसाठी खुली ठेवतात." "पण त्यांच्या कार्य इथेच थांबत नाही. उमेश यांनी माळरानावर हजारो देशी झाडांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, या परिसराला त्यांनी 'सिंदूर टेकडी' असं नाव दिलं असून, प्रत्येक झाडाला शहीद जवानाचं नाव देऊन त्यांनी एक जिवंत स्मारक उभं केलंय."
0
0
Report

फडणवीस बोले: शिरपूर महाराष्ट्र के लिए मॉडल, अस्पताल और लाइब्रेरी के काम की सराहना

Dhule, Maharashtra:श्याम मानव कोण आहेत. ते काय बोलतात त्याच्याने काही फरक पडत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत, बागेश्वर धमच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार काशीराम पावरा यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार काशीराम पावरा यांच्याशी संवाद साधतं त्यांनी कार्यालच्या कामाची पद्धती समजून घेतली. याप्रसंगी मंत्री संजय सावकारे आमदार अमरीश पटेल यांची उपस्थिती होते. शिरपूर हे महाराष्ट्रासाठी मॉडेल आहे, या ठिकाणच्या हॉस्पिटल असेल लायब्ररी असेल हे काम बघितलं आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया फडणवीसब्यांनी दिली.
0
0
Report
Advertisement

शिर्डी ग्रो मोअर मामले में ठोस कार्रवाई: 500 करोड़ से अधिक निवेशकों को नुकसान, संपत्ति जब्ती की तैयारी

Shirdi, Maharashtra:ग्रो - मोअर च्या मालमत्ता जप्तीचे आदेश ; सक्षम प्राधिकारी नियुक्त... ठेवीदारांचे पैसे परत मिळून देण्यासाठी शासनाचे पाऊल... एपीआयडी कायद्यानुसार ग्रो मोअर संबधित पाच वित्तीय संस्थाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश... ठेवीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक... ग्रो मोअर कंपनीसह त्याचा सर्वेसर्वा भुपेंद्र सावळेसह 25 खात्यांवरील रक्कम सिल... शिरसगाव , शिर्डीसह नांदुर्खीतील सहा मालमत्ता होणार जप्त... आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये शिर्डी पोलिसात गुन्हा आहे दाखल... शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 500 कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याच उघडकीस..
0
0
Report

सोलापुर में चलती मोटरसाइकिल पर अचानक आग लगने से वाहन खाक

Solapur, Maharashtra:सोलapur ब्रेकिंग - सोलापुरात चालत्या मोटरसायकलला लागली अचानक आग, आगीत मोटरसायकल जळून खाक असताना अचानक मोटारसायकलला आग लागली. दुचाकीवरून एक व्यक्ती कुमठा नाक्याच्या दिशेने जात होता. दरम्यान,मोटारसायकलमधून अचानक धूर येऊ लागल्याचे रस्त्याच्या कडेला असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत चालकाला इशारा दिल्यानंतर त्याने तत्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. क्षणातच मोटारसायकलला आग लागली आणि अवघ्या १० ते १५ मिनिटांत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report

अमरावती के गाडगे नगर में एसटी बस ड्रायवर ने वृद्ध यात्री धक्का दिया

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या गाडगे नगरात एसटी बसची जीवघेणी वाहतूक; चालकाने धावत्या बसमध्ये बसवले वृद्ध प्रवासी. अँकर :- अमरावतीच्या गाडगे नगर परिसरात एसटी बसची जीवघेणी वाहतूक पाहायला मिळाली आहे त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी बसच्या चालकाने धावत्या बसमध्ये वृद्ध प्रवासी बसवले असून चांदूर बाजार आगाराच्या बस चालकाकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महीलांच्या जिवाशी एसटी चालक खेळ करत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीच्या गाडगे नगर भागातील व्हीडीओ असून या मुजोर एसटी चालकावर महामंडळ करून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
0
Report
Advertisement

विठ्ठल-रुक्मिणी दर्शन मंडप में शराब मिली; भाजप ने कंपनी-स्टाफ पर कार्रवाई की मांग

Pandharpur, Maharashtra:राज्यतील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन मंडपातील परिसरामध्ये दारूच्या बाटल्या गुटखा माव्याच्या पुढे आढळून आले आहेत भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी या प्रकाराचा समोर आणला मंदिर समितीच्या स्वच्छतेच काम खाजगी बीव्हीजी कंपनी कडे सोपवण्यात आले आहे. तरीही मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीच्या वस्तू वारंवार आढळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशा चुकीचं कृत्य करणाऱ्या कर्मचारी वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या दर्शन मंडपातून भाविक विठोबाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जातात त्याच दर्शन मंडपाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून बीव्हीजी कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाठ यांनी केली आहे. तर मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांनी याप्रकरणी बीवीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा व्यवस्थापकांनी दिला आहे
0
0
Report

इतिहासविद कोकाटे: रामदास शिवाजी के गुरु नहीं, बागेश्वर धाम के वक्तव्य की निंदा

Nanded-Waghala, Maharashtra:शिवाजी महाराजांच्या पायाजवळ बसण्याचीही लायकी रामदासांची नव्हती अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी केले. बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कोकाटे यांनी निषेध केला. समर्थ रामदासांचा कोकाटे यांनी एकेरी उल्लेख केला. बागेश्वर धाम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय निषेधार्य असून छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान करणार आहे. रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु शिक्षक किंवा मार्गदर्शक नव्हते. इतिहासाच्या कुठल्याही साधनांमध्ये रामदासांचा उल्लेख नाही. छत्रपती शिवाजी महाराज रामदास यांना ओळखत नव्हते. रामदास हे अतिशय विषमतावादी, जातीयवादी, आणि सनातनी विचाराचे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी विचाराचे होते. रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये अत्यंत तफावत आहे. ते जरी समकालीन असले तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास भेटल्याचा ऐतिहासिक कागदपत्रात कुठलाही उल्लेख नाही.रामदासांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादत्राण जवळ बसायची लायकी नव्हती. ज्याची शिवाजी महाराजांच्या पादत्राणा जवळ बसायची लायकी नव्हती अशा रामदासाकडं शिवाजीराजांनी राज्य सोपवलं, तो महाराजांचा गुरु होता, असं सांगणं विकृती आहे, नीचपणा आहे, हलकट पना आहे, त्या बागेश्वर बाबाचा आम्ही निषेध करतो असे कोकाटे म्हणाले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top