icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गर्मी की चपेट में वाशीम: स्कूल टाइम बदला, सुबह 7 से 11 बजे क्लास

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असून, तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उन्हाच्या तीव्र झळांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report

हिंगोली में दाताला बुर्दुक के गोठे में शॉर्ट सर्किट से किसान के आग लगाने के हादसे पर भारी नुकसान के साथ आग

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताळा बुद्रुक येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकरी देविदास गायकवाड यांच्या शेतातील गोठा पूर्णत जळून खाक झाला असून शेतीसाठी लागणारे अवजारे फवारणी पंप इंजिन जनावरांचा चारा तसेच अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच मोठ आर्थिक नुकसान झाले असून, आधीच कमी भाव आणि महागाईच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने नुकसान झालेल्या गोट्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.
0
0
Report

वाशीम की काली हल्दी ने बाजार में धमाका, 21,150 रुपये पर रिकॉर्ड दाम

Washim, Maharashtra:वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळी हळद म्हणजेच कोच्याला 21हजार 150 रुपयांचा उच्चांकी दर मिळातोय. कोचा म्हणजेच लागवड करताना बियाणे म्हणून वापरलेली हळद जी कालांतराने जमिनीमध्ये सडून वाळून जाते याला कोचा हळद म्हणतात. ही काळी हळद अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते,जसे की संधिवात, यकृताचे रोग, आणि त्वचेचे विकार.या सह इतर आजारामध्ये काळी हळद गुणकारी आहे.सध्या शेतात मशागतीचे काम सुरू असून मशागतीदरम्यान काली हळद (कोच्या) बाहेर येत आहे, या हळदीला सध्या बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असून इतर प्रकारच्या हळदीच्या तुलनेत तिला सर्वाधिक दर मिळताना दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

हडको एन-12 कचरा केंद्र पर प्रदर्शन, पांच दिन बाद भी प्रशासन नहीं उठा कदम

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या हडको एन-१२ येथील कचरा संकलन केंद्रात आंदोलन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. मात्र, १२० तास म्हणजे ५ दिवस उलटूनही महानगरपालिका प्रशासनाने अद्याप एकही पाऊल उचललेले नाही. यामुळे सभापतींचे आदेश प्रशासनाने केराच्या टोपलीत टाकल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात रंगली आहे. हडको एन-१२ येथील महापालिकेच्या जागेत आठ वर्षांपासून कचरा संकलन केंद्र सुरू आहे. गेल्या आठवड्यात इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत हे संकलन केंद्र बंद पाडले होते..
0
0
Report

इंदापुर के कांदलगाव में चोरी की घटनाएं बढ़ीं, रात लोड शेडिंग से चोरों को मौका

Rui, Maharashtra:कांदलगाव महादेव नगर शहा पट्ट्यात चोरीच्या घटना वाढल्या..... रात्रीच्या वेळी बत्ती गुल होत असल्याने अज्ञात चोरटे घेतायेत फायदा..... रात्रीच्या वेळीच लोड शेडिंग बंद करण्याची मागणी..... उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या इंदापूर तालुक्यात रात्री सहा ते दहा या वेळेत लोड शेडिंग केलं जातंय मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा अज्ञात चोरटे उठवत आहेत इंदापूर तालुक्यातील कांदलगाव शहा महादेव नगर यासह उजनी पट्ट्यात चोरीच्या घटना वाढल्या असून रात्र-रात्र लोक जागून काढतायेत त्यामुळे हे लोड शेडिंग तात्काळ बंद केलं जावं अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.
0
0
Report

रत्नागिरी में पालकमंत्री ने निजी अस्पताल भेजने पर कड़ी कार्रवाई के निर्देश दिए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रुग्ण खासगीत पाठवणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा.. रत्नागिरीत पालकमंत्र्यांचे कडक निर्देश!.. मंत्री अँकर रत्नागिरीच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत हलगर्जीपणा करणाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.. PHC मधून मुद्दाम खासगी रुग्णालयात डिलिव्हरीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी 'भरारी पथके' तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. आरोग्य व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी २ कार्डियाक आणि १२ नव्या रुग्णवाहिकांचा प्रस्ताव देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.. गरीब रुग्णांची लूट थांबवा आणि त्यांना शासकीय रुग्णालयातच योग्य उपचार द्या,असे कडक निर्देश यावेळी यंत्रणेला देण्यात आले आहेत..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में अगले दो दिनों में भारी बारिश की संभावना, किसान सावधान रहें

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता..हवामान विभागाचा अंदाज अँकर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.. जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मेघर्जनेहसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावी..काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवणीत किंवा ताडपत्री किंवा झाकणांनी सुरक्षित ठेवावीत.. वादळी वारे,पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.. शेतमाल भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये..
0
0
Report

मेहकर में निजी ट्रैवल्स पलटी: डेढ़ वर्षीय बच्चे की मौत, 20–25 यात्री घायल

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग . समृद्धी महामार्गावर पुन्हा खाजगी लक्झरी बसचा अपघात .. मोबाईल वर रिल बनवण्याच्या नादात ट्रॅव्हलचा अपघात .. ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनर बनवत होते रिल.. मेहकर येथील टोलनाका जवळ खाजगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन झाली पलटी.. अपघातात एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू .. तर २० ते २५ प्रवाशी जखमी .. ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने चार चाकी वाहनावर आदळले.. त्यामुळे चार चाकी वाहनाचे ही मोठे नुकसान. घटनेनंतर तात्काळ परिसरातील नागरिकांना रुग्णालयात हलविले .. मात्र, मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना खाजगी रुग्णालयात हलविले .. तर काहींवर स्वतः नागरिकांना केले थातूरमातूर उपचार..
0
0
Report

मानगांव उपजिल्‍हा अस्पताल के ऑन-कॉल डॉक्टरों ने वेतन नहीं मिलने पर हड़ताल शुरू की

Chendhare, Maharashtra:माणगाव सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन. ऑन कॉल सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन. रुग्णालयातील रुग्ण सेवेवर परिणाम. मानधन न मिळाल्याने डॉक्टर आक्रमक. रायगडच्या माणगाव मधील उपजिल्हा रुग्णालयात ऑन कॉल सेवेत असणाऱ्या डॉक्टरांनी काम बंद केले आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झालाय. ही सात खाजगी डॉक्टर मागील वर्षीच्या नोव्हेंबरपासून सेवा देत आहेत. परंतु त्यांचं ३३ लाख ३० हजार रुपयांचे मानधन शासनाने दिलेलं नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन करावं लागलं, असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. महेश मेहता, प्रभारी अधीक्षक, माणगाव उपजिल्हा रुग्णालय
0
0
Report
Advertisement

अक्षय तृतीया पर Ahirani गीत और पुरणपोळी की परंपरा के साथ ग्रामीण महाराष्ट्र में जश्न

Nashik, Maharashtra:अक्षय तृतीया- अहिराणी गीत, पुरणपोळी स्पेशल बातमी। अक्षय तृतीया मतलब आखाजी हा खरा तर माहेर वाशिनींचा सण है। ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून आहे। सासरवाशिनी सासर वरून आखाजीला माहेरी येतात, झोका खेळतात, रात्री पुरणपोळी बनवत अहिराणी गाणी म्हणतात। या सणाला आंब्या सोबत मांडा म्हणजेच पुरणपोळिलादेखील खूप महत्व। साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया हा सण महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो… घरातील जे व्यक्ती नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असतात तेही या दिवशी सणासाठी घरी येत असतात. तसेच सासर वाशिन महिला या सणा निमित्त माहेरी येतात. जुन्या परंपरेनुसार ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून असून महिला आपल्या माहेरी येत झोका खेळत, रात्रभर पुरणपोळी बनवत अहिराणी गीत म्हणत असत। आमरस और पुरणपोळी शिवाय अक्षय तृतीया सण साजरा होत नाही। तेव्हा ग्रामीण भागात कशी पुरणपोळी बनवतात त्याची रेसिपी देखील आपण बघू…
0
0
Report

वाशी बाजार में अक्षय तृतीये के मौके पर 94 हजार आंबा पेटियों की भारी आवक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वाशी बाजार समितीत 94 हजार आंबा पेट्या दाखल.. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजार समितीत आंब्याचा घमघमाट.. अन्य राज्यातील आंबाही दाखल,कोकणातील हापूसचा वाटा मोठा.. अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल 94 हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्यात.. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेटांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे.. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खाण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात पाळली जाते..त्यामुळे या दिवसासाठी आंब्याला मागणी वाढते.. सध्या आंबा पेटीला पंधराशे ते चार हजार रुपये दर आहे..गतवर्षीच्या तुलनेत आंबा कमी आहे त्यामुळे यावर्षी दर टिकून आहे..
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र बाल अधिकार आयोग ने सभी जिलों में स्वतंत्र बाल पुलिस इकाइयां स्थापित निर्देश दिए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. बाल पोलीस पथकासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात विशेष स्वतंत्र कक्ष. बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क आयोगाचे राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश. राज्यातील बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया पाहता, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातर्गत आता स्वतंत्र विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याचे निर्देश आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दिले आहे. हा कक्ष बालस्नेही स्वरूपाचा असावा असेही म्हटले आहे.
0
0
Report

आदिवासी आश्रम शाळाओं के पहले दिन किताब-गणवेश और एएनएम परिचर सेवा, मंत्री उईके का ऐलान

Yavatmal, Maharashtra:राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एएनएम आणि परिचर देणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे. तसेच 500 आश्रम शाळांमध्ये आतापर्यंत 1771 शिक्षक नियुक्त केले असल्याने केवळ घोषणा न करता अंमलबजावणीवर आपला भर असल्याचे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. याशिवाय शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी व वर्षातून तीन वेळा स्वतः मंत्री, आदिवासी आमदार, आणि आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रम शाळांमध्ये मुक्कामी थांबतील असेही मंत्री अशोक उईके यांनी जाहीर केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top