445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे- सोलापूर रोड पर धनश्री लॉज में अनैतिक कारोबार पकड़ा गया, 10 महिलाएं छुड़ाईं
Rui, Maharashtra:पुणे-सोलापूर रोडलगत लॉजमध्ये सुरू होता अनैतिक व्यवसाय... धनश्री लॉजवर पोलिसांची कारवाई... 10 महिलांची सुटका...दोघांवर गुन्हा दाखल... दौंड तालुक्यातील वाखारी परिसरातील धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या कारवाईदरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम कंडोमची पाकिटे तसेच ग्राहकांच्या नोंदीचे रजिस्टर जप्त केले आहे. या कारवाईत 10 महिलांची सुटका करण्यात आली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहे....0
0
Report
उजनी बांध के लिए जमीन मोजणी पर किसानों का तीव्र विरोध, प्रदर्शन तेज
Rui, Maharashtra:उजनी धरणग्रस्तांचा संताप.. जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध.. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी.. उजनी धरण व्यवस्थापनाच्या. लेखी पत्रानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे.. . पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता तैनात... जलसंपदा मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या दहा प्रतिनिधींची होणार बैठक.. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव आणि तरटगाव येथील उजनी धरणासाठी अतिरिक्त संपादित जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शासनाच्या विरोधात रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तीन वेळा प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चा फिस्कटली तब्बल चार तासानंतर जलसंपदा विभागाच्या उजनी धरण व्यवस्थापनाकडून लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान यावेळी अडीचशे हून अधिक पोलिसांचा पाऊस फाटा तैनात करण्यात आला होता.0
0
Report
उल्हासनगर में गोलीबारी: सात राउंड, दो मौतें, एक घायल
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात भररस्त्यात थरारक गोळीबार; सात राउंड फायरिंगमध्ये दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. उल्हासनगरातील प्राचीन शिवमंदिर रोड परिसर पुन्हा एकदा गोळीबाऱ्याच्या घटनेने हादरला आहे. कैलास कॉलनी चौकातील के.सी ग्रुप कार्यालयाजवळ आज संध्याकाळी एका टोळीने अचानक गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात तब्बल सात राउंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबाऱ्यात अमोल चव्हाण, अनिल चव्हाण आणि अर्जुन चव्हाण हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तાતडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अर्जुन चव्हाण याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिसर सील केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
पुणे के ओतूर में बिबट्या हमला, 10 वर्षीय बच्ची घायल, सुरक्षा उपायों की मांग
Shirur, Maharashtra:पुण्यात बिबट्याचा पुन्हा एकदा हल्ला, दहा वर्षीय चिमुरडी जखमी Anc:पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्ह्या एकदा बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडलीये. गुरुवारी पहाटे १० वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काव्या महेंद्र वाकचौरे (वय १०, रा. वाकचौरे मळा, ओतूर) ही मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास काव्या ही आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. काव्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ओतूर येथील १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्यापही सुरू न झाल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी हेळसांड झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे तसेच मुलीच्या पालकांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, वाकचौरे मळा परिसरात वारंवार बिबट्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...0
0
Report
पुणे के पर्यटक मालवण समुद्र में डूबे, एक बचा, एक लापता; खोज जारी
Oras Bk., Maharashtra:मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्यातील दोन पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. यातील एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले आहे तर एक जण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत दुसऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. समर्थ गणेश कर्पे (आंबेगाव, पुणे) असे पाण्यात बुडून बेप्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, ऋषभ रविकिरण कदम असे वाचवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषभवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बेप्ता पर्यटकाचा समुद्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे.0
0
Report
नाशिक में शिवसंवाद दौरे के दौरान आगामी चुनावों पर बहस शुरू
Nashik, Maharashtra:मालेगाव. ( नाशिक ) उपमुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये हा शिवसंवाद दौरा... नाशिक जिल्ह्यातला आजचा पहिला दिवस... नाशिक जिल्ह्यातील ६ विधानसभाचा आढावा...आज घेतला नाशिक जिल्ह्यातील शिवसंवाद मालेगाव सांगता... पदाधिकाऱ्यांची संवाद साधला... झालेल्या निवडणुकां आणि होणाऱ्या निवडणुकांवर संवाद झाले... तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या... युवासेनेची जबाबदारी आविष्कार भुसेकडे आहे त्याचे काम देखील चांगले आहे... युवासेनेने देखील पायाला भिंगरी लावून काम केले पाहिजे..0
0
Report
Advertisement
Abhijeet Dipke के पिता बोले- राजनीति से डरना नहीं, समर्थन जरूरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अभिजीत दिपके तसा एकलकोंडा होता फारसे बोलत नव्हता हे असे काही करेल असे कधीच वाटले नाही अशी प्रतिक्रिया सध्या ट्रेंडिंग असलेला अभिजीत दिपके चे वडील भगवान दिपके यांनी दिली आहे खरंतर राजकारणाची आम्हाला भीती वाटते त्याला अनेक वेळा आम्ही नोकरी कर म्हणून सांगितलं स्पर्धा परीक्षा दे म्हणून सांगितलं मात्र तो शिकागो मध्ये बहिणी सोबत शिकायला गेला आणि तिकडेच नोकरी करेल असं सांगून गेला अशी प्रतिक्रिया भगवान दिपके यांनी दिलीय, राजकारणात जाईल त्याबाबत भीती वाटते पण नाईलाज असतो पाठिंबाही द्यावा लागणार असेही त्याचे वडील म्हणाले त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोल gave यांनी0
0
Report
वसई कोर्ट में सरकारी वकील के रिश्वत मामले में एसीबी ने रंगे हाथ गिरफ्तार किया
Vasai-Virar, Maharashtra:*वसई न्यायालयाच्या आवारात लाच स्वीकारताना सरकारी वकिल ACB च्या जाळ्यात* ANC : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) वसई न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता भूपेश अजित पुरंदरे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराच्या क्लायंटने मणिपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त मालमत्ता परत मिळवण्यासाठी वसई येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर अनुकूल अभिप्राय देण्यासाठी पुरंदरे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
विदर्भ में भीषण गर्मी: ब्रह्मपुरी में 47.1°C तापमान, नागपुर 46°C
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उष्णतेचे तडाखा कायम... चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत 47.1अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर 46.8 आणि गडचिरोलीही 46.4 अंश सेल्सिअस तापमानाने होरपळले नागपूर- 46.0 तर वर्धा 46.4 अंशावर शहर तापमान ब्रह्मपुरी 47.1 ( ब्रह्मपुरी चंद्रपूर जिल्ह्यात आहे ) चंद्रपूर 46.8 वर्धा 46.4 नागपूर 46.0 अमरावती 45.8 अकोला 44.9 यवतमाळ 45.0 गडचिरोली 46.4 भंडारा 45.0 गोंदिया 45.20
0
Report
Advertisement
मई की गर्मी के बीच नासिक-येवला में तेज बरसात, बच्चों ने नाच उठे
Yeola, Maharashtra:मे महिन्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत असून तापमानाचा पारा हा चाळीशी पार गेला आहे अंगाची लाहीलाही होत असताना अशातच नाशिकच्या येवल्यात दुपारपासून जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शहर व तालुक्यात सुमारे दोन तासांपासून पावसाने हजेरी लावली आहे अशातच शहरात लहानग्या मुलांनी पावसात नाचण्याचा आनंद घेतला आहे0
0
Report
6 साल की आरना ने राज्य स्विमिंग में तीन गोल्ड जीते, इतिहास रचा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या ६ वर्षांच्या आरनाची कमाल.. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ३ सुवर्णपदकांसह पटकावली चॅम्पियनशिप! अँकर वय अवघं ६ वर्ष... जे वय खेळण्या-बागडण्याचं असतं,त्या वयात रत्नागिरीच्या आरना अमन देवळेकरने थेट राज्याच्या नकाशावर जिल्ह्याचं नाव चमकवलं आहे.. पुण्याच्या बालेवाडीत पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत आरनाने अंडर-६ गटात फ्रीस्टाईल,बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय अशा तिन्ही प्रकारांत ३ सुवर्णपदके पटकावून 'इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप' आपल्या नावावर केली.. SFI च्या अधिकृत स्पर्धेत रत्नागिरीसाठी असा पराक्रम करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनीही तिचा विशेष सत्कार केला असून,संपूर्ण जिल्ह्यातून या छोट्या जलपरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे..0
0
Report
शंभूराज देसाई के बयानों से कांग्रेस-शिवसेना clash, पाटी-नेतृत्व पर सवाल
Satara, Maharashtra:सातारा - आज महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसची जी परिस्थिती आहे. त्याला अनुसरूनच श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केल आहे. सतेज पाटील माजी राज्यमंत्री आहेत ते आतुरतेने विधान परिषदेमध्ये पक्षनेते पद मिळवण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या सतत नजरेत राहण्यासाठी. श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. साताऱ्यात सतेज पाटील तुम्ही पाहिजे होता. परंतु फरपटत नेले हे बोलणं म्हणजे अतिरंजीत बोलणं झालं या बोलल्यानंतर दिल्लीश्वर आपल्याला विचारतील म्हणून असे गोष्टी त्यांच्या कडून बोलले गेले...बंटी पाटील तुम्ही विराधी पक्ष नेते पदाची जी आस लावून बसले आहात. त्याआधी पहिल्यांदा काँग्रेस संख्याबळ सुधारा. काँग्रेसला महाराष्ट्रातल्या आणि देशातील जनतेने मतदान करून त्यांची जागा दाखवली आहे हे सत्य श्रीकांत शिंदे यांनी बोलल्यामुळे बंटी पाटील यांना ते बोलणे जमलं म्हणून दिल्लीश्वरांच्या नजरेत राहण्यासाठी त्यांनी हे विधान बोललो आहे. काँग्रेसकडे आता सर्वसमावेशक नेतृत्व राहिलेलं नाही. जिल्हा परिषद साताऱ्यात काँग्रेस कुठे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक सदस्य तुमचा येऊ शकला नाही ही जर तुमची सातारा जिल्ह्यात अवस्था आहे.तेव्हा शिवसेना सातारा जिल्ह्यात शिवसेना कुठे आहे आणि तुमची काँग्रेस कुठे आहे याची समोरासमोर चर्चा करायची माझी बंटी पाटील यांच्याबरोबर तयारी आहे... विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर आम्ही सांगली सातारा या दोन्ही मतदारसंघातील आकडेवारी पाहिली.शिवसेनेची 140 ही संख्या आमची निर्णयाक आहे.आत्ता मी प्राथमिक स्थळावर भूमिका घेण्यापेक्षा जेव्हा शिवसेनेचे संसदीय मंडळ चर्चा करेल आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे चर्चा करून निर्णय घेतील.सातारा सांगलीची निवडणूक महायुतीला जिंकायचे असेल तर शिवसेनेच्या मताचा नक्कीच विचार करावा लागेल. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांना अटक होण्यापासून रिलीफ मिळाला नाही.कायदा कायद्याचे काम करणार त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आकसतांडव करू. नये.जर ते चुकले नसतील तर ते सुटतील.0
0
Report
Advertisement
NEET पेपरफुटी: लातूर के डॉ. शिरुरे समेत तीन गिरफ्तार, नया खुलासा
Latur, Maharashtra:NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई... लातूरच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे अटकेत... पोऱीसाठी पेपर विकत घेतल्याचा CBI ला संशय.... NEET प्रकरणात पालकाला पहिल्यांदाच अटक.... शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णीनंतर लातूरमधून आणखी एक मोठी कारवाई... NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा तपास दिवसेंदिवस वेग घेताना दिसत आहे. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना CBI ने अटक केली आहे. स्वतःच्या पोरीसाठी कथितरित्या NEET प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यापूर्वी या प्रकरणात दोघांवर कारवाई झाली होती. आता लातूरमधून झालेली ही तिसरी मोठी अटक आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर नविन नविन खुलासे बाहेर येत आहेत. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना CBI ने अटक केली आहे. फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI लातूर मधून ताब्यात घेतले आहे. CBI च्या प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून ते पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. वैभव बालकुंदे रिपोर्टर सीबीआयने अटक केलेल्या डॉ. मनोज शिरुरे याने सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केली होती. नीटची परीक्षा ३ मे रोजी झाला. परीक्षा होण्याच्या दहा दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आली होती. अशी माहीती आता CBI चौकशी मध्ये समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात पहिल्यांदाच विद्यार्थ्याच्या पालकाला अटक झाली आहे. शिरुरे ने आणखी कुणाला प्रश्नपत्रिका दिली होती का ? असाही प्रश्न आता समोर आला आहे. लातूरमधील डॉ. मनोज शिरूरे यांच्या घरावर तपास यंत्रणांची कारवाही सुरू असतानाच, CBI चे पथक आंबेजोगाई येथून दोन विद्यार्थ्यांना घेऊन डॉ. शिरूरे यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. घराची झाडाझडती, महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लातूर... शिक्षणाची ओळख असलेले शहर... पण आता त्याच लातूरचे नाव देशभर NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि आता डॉ. मनोज शिरुरे... अशा सलग कारवायांमुळे तपासाचा फास आणखी आवळला जात आहे. “पोऱीसाठी डॉक्टर बापाने पेपर विकत घेतला...?” या आरोपामुळे केवळ शिक्षण व्यवस्थेवरच नाही, तर पालकांच्या भूमिकेवरही मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता CBI च्या पुढील तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.0
0
Report
बुलढाणा में डीजल संकट से किसान परेशान, लोणार में पेट्रोल पंपों पर भीड़
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग “डिझेल के लिए किसानो की धावपळ; लोणार में किसान अक्षरशः हैरान!” “मशागती की कामे ठप्प, पेरणी संकटात; कमळजा पेट्रोल पंप पर कैन के साथ किसानों की भीड़” अंकर जिल्ह्यातील वाढत्या डिझेल टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून लोणार शहरात परिस्थिती गंभीर बनली आहे। लोणार येथील कमळजा पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कैन लेकर बड़ी गर्दी केली। अनेक ठिकाणी तासन्तास रांगा लागत असून डिझेल मिळेल त्या पंपाकडे शेतकरी धाव घेताना दिसत आहेत। सध्या शेती मशागतीची अत्यंत महत्त्वाची वेळ असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि शेतीची अवजारे बंद पडली आहेत। परिणामी शेतातील मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून आगामी 10 दिवसांनंतर होणारी पेरणीही धोक्यात आली आहे। एकीकडे पावसाच्या तोंडावर शेतकरी तयारीत असताना दुसरीकडे डिझेल टंचाईने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे। जिल्हाभर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागात हाहाकार माजला असून प्रशासन आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। “शेती करायची कशी आणि पेरणीची तयारी करायची कशी?” असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत。0
0
Report
किल्ले रायगड के पायरी मार्ग दो दिन बंद, 30-31 मई को यात्रा रोक
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगड के पायरी मार्ग दो दिनों के लिए बंद रहेगा। 30 और 31 मई को पायरी मार्ग बंद रहेगा। रायगड जिलाधिकारी ने अधिसूचना जारी की है। ढीले पत्थरों को हटाने का काम किया जाएगा ताकि ऊँच कड़ों पर गिरने से हादसे न हों। इसके आधार पर पायरी मार्ग पर चलना दो दिनों के लिए बंद रहेगा।0
0
Report
Advertisement
