445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
देवली पुलिस ने प्रतिबंधित सुगंधित तंबाकू, गुटखा और पान मसाला की अवैध बिक्री पर बड़ी कार्रवाई
Wardha, Maharashtra:अँकर : सार्वजनिक आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याच्या बेकायदेशीर साठवणूक आणि विक्रीविरोधात देवळी पोलिसांनी मोठी कारवाई केली. २५ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव (नि.) येथील देशमुख लेआउटमध्ये आरोपी सतीश गंगाधर नांडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत जनम तंबाखूची ५० पॅकेट, भाग्य गुटख्याची ३६३ पॅकेट, रत्ना तंबाखूचे १० टिन, ५०० ग्रॅम खर्रा असा एकूण ३२,८२६ किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा माल बेकायदेशीर विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
जालना में हनीट्रैप बनाकर पैसे मांगे, महिला समेत छह गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना: ब्रेकिंग :जालन्यात हनीट्रॅप करणा-या महिलेसह सहा जणांना पोलिसांकडून बेड्या सोशल मीडियावर अश्लिल व्हिडिओ बनवून करायची पैशांची मागणी विविध पोलिस स्टेशनमध्ये आरोपी महिलेविरोधात सात गुन्हे दाखल सपना निकाळजे (वय 23 वर्ष) असं आरोपी महिलेचं नाव अँकर- जालन्यात हनीट्रॅप करून पुरुषांकडून पैशांची मागणी करणार्या एका महिलेसह सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याात. सपना निकाळजे (वय 23 वर्ष) असं आरोपी महिलेचं नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहे.. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ओळख करून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या घटना घडत होत्या.. तशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी नवीन मोंढा भागात घडली.. एका बोलेरो चालकाला अडवून त्याला डांबून पैसे मागणी करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या नातेवाईक आणि मित्रांकडून फोन पे वर पैसे मागवून घेतले.. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना अवघ्या चार तासात पोलिसांनी हनीट्रॅप करणारी टोळीच गजाआड केलीये.. सपना निकाळजे असं मुख्य आरोपी महिलेचे नाव असून अविनाश गणेश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव आणि आतिष सतीष गायकवाड या साथिदारांना अटक केलीये.. दरम्यान आरोपींकडून 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या मामले में अब तक 10 लोगों के बयान दर्ज, साहिल भी पूछताछ के लिए बुलाया गया
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरण में अब तक 10 व्यक्तियों के बयान दर्ज हो चुके हैं. आज सुबह सिया गोयल के भाई साहिल को भी पूछताछ के लिए बुलाया गया है. लोणावळा में सिया गोयल के इशारे के बाद चेतन ने केतन को ढकेलने की बात प्रथम जांच में सामने आई है. अग्रवाल परिवार द्वारा दिए गए सभी बयानों को गंभीरता से लिया जा रहा है. एक अहम बयान नीरज कुमार का भी दर्ज किया गया है. इस पूरी जांच के बारे में हमारे प्रतिनिधि चैत्राली राजापूरकर ने बातचीत की.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर: जटपुरा गेट के पान दुकान पर धावा, 104.210 ग्राम MD ड्रग्स के साथ आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर एलसीबीची मोठी कारवाई, जटपुरा गेटच्या प्रसिद्ध पान दुकानावर धाड, इटनकर पान दुकानावर धाड घालून 104.210 ग्रॅम MDMEPHEDRONE ड्रग्ज ताब्यात; पान दुकान संचालक अटकेत; एकूण 6,23,370/- किमतीचा मुद्देमाल जप्त. आरोपी ओम संतोष इटनकर (वय 25 वर्षे) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने ड्रग्ज इरफान उर्फ भुऱ्या पठाण याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला. इटनकर पान दुकानावर ड्रग्जविषयक धाड घालून मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ.0
0
Report
केतन हत्या मामले में सिया के भाई से पिछले तीन घंटों से पूछताछ जारी
Varsoli, Maharashtra:केतन हत्या प्रकरणात सियाच्या भावाची मागील तीन तासांपासून चौकशी सुरू.. चेतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता सियाच्या भावाला चौकशी साठी बोलविण्यात आले आहे. मागील 3 तासांपासून सियाचा भाऊ साहिल याची चौकशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे. या हत्येबाबत कुटुंबाला याची काही माहिती होती का याची सखोल चौकशी त्याच्याकडे करण्यात येत आहे. याच लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी....0
0
Report
आशियाड कॉलनी में रानडुकर के हमले से बुजुर्ग की मौत, CCTV फुटेज में
Amravati, Maharashtra:मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान! रानडुकराच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू शहरातील आशियाड कॉलनी परिसरातील गोविंद पिंजरकर (वय ७५) बुधवारी पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की डुकराने पिंजरकर यांच्या संपूर्ण अंगावर चावे घेतले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आपला एक बोटही गमावावे लागले. त्यांना लगेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.0
0
Report
Advertisement
सिद्धार्थ खरात की पोस्ट से राजनीति में हलचल, ऑपरेशन टायगर पर नया मोड़
Buldhana, Maharashtra:आमदार सिद्धार्थ खरातांच्या 'हमे याद रखना' पोस्टने वाढवला संभ्रम.. जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण.. दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर आमदार खरात यांची पोस्ट व्हायरल. पोस्टमुळे 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेला नवा रंग.. Ancjor - बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.. त्यांनी 'हमें याद रखना, हमें याद करना, कोई सितम आए, चेहरे याद रखना' असा शेर लिहित उद्धवसेनेच्या दोन आमदारां सोबतचा फोटो शेअर केला आहे.. या छायाचित्रात बाळापूरचे ठाकरे यांचे आमदार नितीन देशमुख आणि उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील दिसत आहेत.. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क- वितर्कांना सुरुवात झाली असून उद्धवसेनेच्या सहा खासदारांच्या 'ऑपरेशन टायगर' नंतर राज्यातील राजकारण आधीच ढवळून निघाले असताना, आता काही आमदारही त्याच मार्गावर असल्याच्या या पोस्टमुळे बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.. मात्र या तिघांच्या भेटीचा नेमका उद्देश काय होता, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही.. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी यापूर्वीच 'मातोश्री'प्रती आपली निष्ठा स्पष्टपणे दाखवून दिली, तर कैलास पाटील हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात.. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेला आणखी धक्के देणार असल्याचे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार खरात यांच्या या पोस्टमुळे राजकीय संभ्रम अधिक वाढला आहे.. एव्हढे मात्र निश्चित ..0
0
Report
सावंतवाड़ी में तेज बारिश से किसानों में खुशी, गर्मी से मिली राहत
Oras Bk., Maharashtra:अँकर —--- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस दडी मारलेल्या पावसाने अखेर सावंतवाडीत दमदार पुनरागमन केले आहे. सकाळपासून उन्हाळ्या सारखे वातावरण असताना अचानक दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशाही पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र जिल्ह्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी कडकडीत ऊन पडलेल दिसून येत. भातशेतीसह खरीप हंगामातील कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले दोन दिवस पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर झालेल्या या दमदार पावसामुळे सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
जंगलना-खत टंचाई: किसान परेशान? डीएपी-यूरिया की कमी पर सरकार एक्शन लेle
Jalna, Maharashtra:जालना : जालना,हिंगोली,परभणी जिल्ह्यात खतांची टंचाई,डीएपी,युरीया मिळत नसल्यानं शेतकरी हतबल(पॅकेज) खतांचं लिंकिंगही होत असल्याच्या तक्रारी अँकर :मराठवाड्यातील जालना,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात खत टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.तर काही ठिकाणी खतांचं लिंकिंग होत असल्याचं समोर आलंय.बघूया यावरचा स्पेशल रिपोर्ट व्हिओ:०१: मराठवाड्यात तीन दिवसांपूर्वी चांगला pाऊस झालाय.त्यामुळे शेतकरी पेरणी आणि लागवडीच्या कामात गुंतलाय.मात्र ज्या पिकांच्या पेरणीसाठी डिएपी आणि युरीया खतांची आवश्यकता आहे त्याच खतांची सध्या जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात टंचाई असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बाईट : किसन गिते, शेतकरी,हिंगोली (पाठीमागे दुकानचा बोर्ड) बाईट : भरत उंडे, शेतकरी(पांढरा शर्ट, खांद्यावर रुमाल,) बाईट : प्रकाश सुरवसे,शेतकरी, जालना(पिवळा शर्ट) व्हिओ ग्राफिक्स :०२: परभणी : १६ हजार टन कमी पुरवठा परभणी जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर १ लाख १२ हजार ११ टन आहे. त्यानुसार खरिपातील गरज लक्षात घेऊन एप्रिल ते ग्रेडच्या १ ७७ हजार सप्टेबर कालावधीसाठी विविध खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. मागणीच्या तुलनेत १६ हजार ६५० टन कमी खते मंजूर झाली आहेत. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपी ही खते कमी तर कमी तर संयुक्त खते जास्त मंजूर झाली आहेत. जालना : डीएपीसोबत युरिया घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती जालना जिल्ह्याला ३ लाख ०९ हजार ११९ मेट्रीक टन खताची गरज असून २लाख ०९ हजार २४१ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. सध्या प्रामुख्याने युरिया, डीएपी या खतांचा तुटवडा जाणवतो आहे. तसेच खतांची लिंकिंग होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. २ हजार २०० रुपयांच्या डीएपीसोबत ७३० रुपयांचे सल्फर किंवा ५५० रुपयांचा लिक्विड युरिया दिला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. हिंगोली : मागणी वाढल्याने डीएपी खताची सध्या टंचाई जिल्ह्यात डीएपी खताची टंचाई असून सध्या युरिया व संयुक्त खते मुबलक उपलब्ध आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सरासरी ८१ हजार मेट्रीक टन खतांचा वापर केला जातो. त्यानुसार कृषी खात्याने ९० हजार हेक्टरसाठी मागणी नोंदवली होती. आयुक्त कार्यालयाने ९८ हजार मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर केले आहे. मात्र कृषी केंद्र चालकाकडे डीएपी आणि युरीया उपलब्ध नसल्यानं सरकारने डीएपी खतांचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी केंद्र चालकांनी केलीय. बाईट : बाईट - हरीश झंवर,कृषी केंद्र चालक,हिंगोली(लायनिंग शर्ट) व्हिओ :3: दरम्यान जालना जिल्ह्यातील खत टंचाई बरोबरच खतांच्या लिंकींग वरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. कृषी विभागाने साठे बाजी करणाऱ्यावर कारवाई न keल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना खतांच्या गोडाऊनवर धाडी टाकून आंदोलन करेल असा ईशारा स्वाभिमानीने दिलाय. bाईट :सुरेश काळे,जिल्हाध्यक्ष ,स्वाभिमानी शेतकरी संघटना, जालना(पांढरा लायनिंग शर्ट, थोडं टक्कल असलेले) व्हिओ :०4: ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी आणि युरीया ही महत्वाची खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणी करावी कशी असा प्रश्न उभा राहिलाय.शेतकरी खत टंचाईमुळे हतबल झालाय. END0
0
Report
Advertisement
कडगांव में मोहरम जुलूस, हिंदू-म muslim ऐक्य की गगनचुंबी ताबूत भेटी
Sangli, Maharashtra:कडगांव, सांगली में हिंदू- मुस्लिम ऐक्य का प्रतीक मोहरम का जुलूस बड़े उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर गगनचुंबी 100 फुट ऊँचे लकड़ी के ताबूतों की भेटी का समारोह आयोजित हुआ। बाराबलुतेदारों द्वारा कडेगांव में मोहरम और ताबूत भेटी का समारोह सदियों से चला आ रहा है; इस वर्ष भी बड़े उत्साह के साथ यह समारोह सम्पन्न हुआ। हजारों भक्त कडेगांव पहुंचे। इसका अवलोकन हमारे सांगली प्रतिनिधि सरफराज सनदी ने किया।0
0
Report
रोहित पवार बोले, डीलिमिटेशन कानून पास होते ही विधायक भाजपा में जाएंगे
Hingoli, Maharashtra:अँकर - खासदार और आमदार फोडले जात आहेत असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता भाजप लवकरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या दोन्हीही कुबड्या बाजूला काढून टाकेल आणि अमित शहा म्हणल्याप्रमाणे एकला चलो चा नारा दिला जाणार आहे तेव्हा विरोधातलेच नाही तर सत्ताधारी पक्षातले आमदार फुटून भाजपमध्ये जातील असं भाकित रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे ते हिंगोली मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते हा तमाशा थोड्या दिवसासाठी आहे आता आमदारांना फोडले जाणार नाही अगोदर खासदारांना फोडलं जाणार आहे त्याचा मुख्य कारण आहे डीलिमिटेशन कायदा हा कायदा पास तर होणार नाही जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची आणि अजित दादांच्या पक्षाची किंमत आहे आणि तोपर्यंतच खासदारांची किंमत आहे चुकून जर तो कायदा झाला तर या पक्षांची कुठेही किंमत राहणार नाही अमित शहा ज्याप्रमाणे मानले होते की एकला चलो त्याप्रमाणे या दोन कुबड्यांना बाजूला टाकल्या जाणार आहे यापुढे विरोधातलेच नाही यापुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आणि अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा आमदार फुटणार आहेत यातले बहुतांश आमदार हे भाजप पक्षामध्ये0
0
Report
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ने वस्तीगृह का निरीक्षण किया, 5 करोड़ निधि मंजूर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सामजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज समाज कल्याण वस्तीगृहाची पाहणी केली. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी याच वस्तीगृहाला भेट दिली होती. त्यावेळी वस्तीगृहाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आज त्या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत पालकमंत्र्यांनी कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. पालकमंत्री प्रतिक्रिया एका युनिटचे काम अंतिम टप्प्यात असून, ट्रायल बेसिस वर एका युनिट चे काम हाती घेतले होते उर्वरित चार युनिटची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. पुढील चार युनिट साठी जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे तो मी आता एकत्रच मंजूर करून देणार आहे. मात्र कामांमध्ये झालेल्या दिरंगाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना पुढील शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतरही विलंब झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.0
0
Report
Advertisement
अमरावती में उदय सामंत के बयान से संजय दिना पाटील पर पत्रकार धमकी विवाद
Amravati, Maharashtra:अमरावती में मंत्री उदय सामंतांची मुक्ताफळ; पत्रकारांना धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील यांना म्हटले दिलदार व्यक्तिमत्व. संजय दिना पाटलांच्या जवळ जाऊन अभ्यास केल्यास कळेल; मंत्री उदय सामंतांच्या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता. शिवसेना त्यांच्या विधानाशी सहमत नाही आणि आता हा विषय थांबवला पाहिजे असे म्हणत सामंतांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे...0
0
Report
परशुराम घाट में गैबियन वॉल धंस गया; भारी सुरक्षा खतरे की आशंका
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. परशुराम घाटात पावसाच्या सुरुवातीला गॅबियन वॉलची माती सरकली; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!.. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच,पावसाच्या सुरुवातीच गॅबियन वॉलखालची माती सरकू लागल्याने खळबळ उडाली आहे.. प्रशासनाने रॉक बोल्टिंग आणि गॅबियन वॉलचे काम १०० टक्के पूर्ण केल्याचे म्हटले असले,तरी अवघ्या पाच-सहा दिवसांच्या पावसाने या कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. घाटाच्या वरून येणारे पावसाचे पाणी थेट गॅबियन वॉलच्या परिसरात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर मृदाक्षरण (मातीची धूप) होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.. घाटाच्या खाली पेढे-परशुराम गाव असल्याने मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.. अद्याप अडीच ते तीन महिन्यांचा पावसाळा शिल्लक असल्याने,संबंधित यंत्रणांनी तातडीने याची पाहणी करून उपाययोजना करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.. चिपळूणच्या परशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
नाशिक में जल आपूर्ति संकट गहरा, गंगापुर बांध में केवल 30% पानी बचे
Nashik, Maharashtra:जून अखेर पावसाला सुरुवात न झाल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे, जिल्ह्यात छोटे-मोठी एकूण 26 प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये केवळ 20 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी हाच पाणीसाठा तब्बल 38 टक्के इतका होता, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात देखील 30 टक्के इतका पाणीसाठा असून हा पाणीसाठा गतवर्षी 60 टक्के इतका होता जिल्ह्यात पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा असल्याने शहरात एक वेळ पाणी कपात देखील सुरू करण्यात आली आहे,मात्र परिस्थिती अशीच राहिली तर आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात करण्याची वेळ येणार आहे,नाशिक मधील याच पाणीसाठ्याचा गंगापूर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.0
0
Report
Advertisement
