icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

माणगाव-इंदापुर बायपास में कोकण रेलवे बाधा, गडकरी से जल्द समाधान की मांग

Chendhare, Maharashtra:माणगाव आणि इंदापूर बायपास कामात कोकण रेल्वेचा अडथळा विद्युत खांब हलविण्याच्या कामात दिरंगाई गडकरी यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार सुनील तटकरे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर येथील बायपासच्या कामात कोकण रेल्वेचा अडथळा आडमुठेपणा आडवा येतोय कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा, विद्युत खांबामुळे बायपासवरील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे यासंदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि ही समस्या निदर्शनास आणून दिली यावर तातडीने मार्ग काढावा अशी विनंती गडकरी यांना केली मुंबई गोवा महामार्ग 31 मे पर्यंत पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल असा शब्द काही दिवसांपूर्वीच दिला होता मात्र गडकरींच्या शब्दपूर्तीत कोकण रेल्वेचा अडथळा ठरतो आहे बायपासच्या कामातील समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
0
0
Report

शिरूर के किसानों के लिए हड़ताल: कृषि विक्रेताओं का अनिश्चित बंद

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... आधीच अवकाळी पाऊस और शेतीमालाचे बाजारभाव पडल्याने राज्यातील बळीराजा शेतकरी संकटात सापडलेला असताना आता शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढणार आहे, राज्यातील कृषी विक्रेत्यांनी 27 एप्रिल पासून बेमुदत बंदची हाक दिलीय, या संदर्भात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइट्स सीड्स डीलर्स असोसिएशन ने राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र दिलं असून आपल्या विविध मागण्यांसाठी ही बंदची हाक पुकारलीय.... कंपन्यांकडून रासायनिक खताचा पुरवठा होताना होत असलेले लिंकिंग बंद करणे, किरकोळ खत विक्रेत्यांवर लावलेल्या जातच नियमांच्या विरोधात, अनधिकृत एचटीबीटी बियाणे विक्रीच्या विरोधात यांसारख्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारलाय
0
0
Report

रत्नागिरी के चिपळूण में नर बिबटिये की संदिग्ध मौत, वन विभाग जांच कर रहा है

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरवली-गौळवाडी परिसरात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ हा बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत चिपळूण, संगमेश्वर परिसरात वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,याचा तपास आता वनविभाग करत आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालय ने कोकण विश्वविद्यालय में सुवर्ण पदक पाया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी येथे कोकण कृषी विद्यापीठात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. यात साक्षी थोरात हिने बीएससी (कृषी) मध्ये संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला, तर समीक्षा बोने आणि वैष्णवी पाटील यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदके मिळवली. कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report

धाराशिव में लेडी डॉन समेत परंडा के युवक पर बेल्ट-ऊस-लकड़ी से मारहाण, वीडियो वायरल

Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये तरुणाला बेल्ट, ऊस आणि लाकडाने अमानुष मारहाण; ‘लेडी डॉन’चा व्हिडिओ व्हायरल धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला बेल्ट, ऊस आणि लाकडाने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात एक महिला आणि तिचा भाऊ तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. जखमी तरुण वेदनेने विव्हळत असतानाही मारहाण सुरूच असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. तरुणाला वाचवण्यासाठी त्याची आई आर्त विनवणी करत असल्याचेही हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मारहाण करणारी महिला परिसरात ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखली जाते. वन विभागाच्या कामावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परंडा पोलीस आणि धाराशिव पोलीसांनी तपास सुरू केला असून, संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

जुन्नर के येणेरे पंचायत स्कूल बना मॉडल स्कूल, 10 लाख सुरक्षा बीमा समेत

Barav, Maharashtra:राज्यात आज एकीकडे मराठी शाळांची पटसंख्या घटतेय, पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वाढतोय. पण पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील येणेरे गावाने हे चित्र पूर्णपणे पालटून टाकलंय. इथे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांचा विद्यार्थांचा आग्रह दिसतोय! पण ही शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पालकांच्या भविष्याचीही काळजी घेतेय. चक्क १० लाखांचा विमा देणारी ही राज्यातील पहिली शाळा ठरली आहे. पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट... येणेरे गाव... आणि इथली कायापालट झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. जिथे प्रवेश घेण्यासाठी खासगी शाळा सोडून विद्यार्थी रांगा लावत आहेत. या शाळेने केवळ दर्जेदार शिक्षणच नाही, तर सुरक्षिततेचा एक असा आदर्श मॉडेल उभं केलंय, ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. या शाळेने विद्यार्थ्यांसाठी २ लाख रुपयांचा आरोग्य व अपघाती विमा, तर कमावत्या पालकांसाठी तब्बल १० लाख रुपयांचा सुरक्षा विमा काढण्याचा उपक्रम राबविला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि भारतीय पोस्ट विभागाच्या सहकार्याने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला एक भक्कम आधार देणारा ठरला आहे. केवळ विमाच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि शिस्तीमुळे या शाळेने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय, तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून या शाळेने 'मॉडेल स्कूल'ची ओळख सार्थ ठरवली आहे. अशोक भुजबळ (सरपंच येणेरे) ... End VO: आजच्या काळात जिथे शिक्षणाचे बाजारीकरण होतंय, तिथे येणेरेची ही शाळा माणुसकी आणि जबाबदारीचं दर्शन घडवतेय. शिक्षणासोबतच जीवनाची हमी देणारी ही शाळा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी 'लाईटहाउस' ठरली आहे.
0
0
Report

वाशीम में तेज गर्मी, तापमान 44°C; प्रशासन ने लोगों से सतर्क रहने की सलाह दी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. काल वाशीमचे ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, असे त्यांनी सांगितले. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. लहान मुलांना उन्हात जाण्यापासून रोखावे, त्यांना पुरेसे द्रवपदार्थ द्यावेत. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

गणेश नाइक की आक्रामक पहल से MIDC ने झोपड़पट्टी पुनर्विकास टेंडर रद्द किया

Navi Mumbai, Maharashtra:एमआयडीसी विभागातील झोपडपट्टीचा पुनर्विकास करुन 300 चौरस फुटाची घरे देण्यासाठी एमआयडीसीने टेंडर काढले होते. या टेंडर प्रक्रियेला वनमंत्री गणेश नाईक यांनी कडाडून विरोध करत टेंडर रद्द न केल्यास मंत्रिपद सोडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. यासाठी भाजपातर्फे झोपडपट्टी विभागात बैठका घेत जनजागृती करण्यात येत होती. अखेर गणेश नाईक यांच्या आक्रमकतेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीने काढलेला टेंडर रद्द केलाय. याबद्दल भाजपच्या नगरसेवकांनी गणेश नाईकांचे आभार मानत झोपडपट्टी वासियांची दिशाभूल करण्यापेक्षा जीआर वाचून थोडा अभ्यास करावा अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांवर केलेय.
0
0
Report

भंडारा में घरेलू गैस सिलेंडर संकट पर सड़क पर प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यातील खात रोड परिसरामध्ये गॅस सिलेंडर साठी रास्ता रोको आंदोलन... घरगुती सिलेंडर रस्त्यावर घेऊन उतरले नागरिक Anchor ;- आखाती देशांमध्ये युद्धविराम झालेले असून सुद्धा याचे परिणाम देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवटा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरिता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाही. प्रशासन म्हणतो की परिस्थिती हे पूर्वपदावर आली असून मात्र भंडारा मध्ये प्रत्येक साथ पाहिले गेले तर जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सी मध्ये गॅस सिलेंडरच्या पुरवठा सुरळीत प्रमाणे सुरू आहे मात्र असे अनेक जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचे वाटप होत नसल्यामुळे भोंगर कारभार चव्हाट्यावर आलेला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भंडारा शहरातील खात रोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सी समोर रास्ता रोको करण्यात आला या वेळी नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडर चक्क भंडारा शहरातील राज्य मार्गावर आणून ठेवले त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. Byte ;- स्थानिक नागरिक (2)
0
0
Report

पूर्व महापौर अभिषेक कालमकर के खिलाफ जाहिरनामा, अदालत ने तात्कालिक हाज़िरी का आदेश दिया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरोधात न्यायालयाने जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. आरोपीला तात्काळ न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विळद घाट परिसरात आरोपीने फिर्यादी महिलेला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले, तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलीसांकडून आरोपीविरोधात आधीच स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. राज्यभर शोध घेऊनही तो सापडला नसल्याने आता न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ८४ नुसार जाहिरनामा जारी केला आहे. न्यायालयाने आरोपी अभिषेक कळमकर याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में खाद बिक्री की अनियमितताओं पर कार्रवाई: 12 विक्रेता, 2 केंद्र लाइसेंस रद्द

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील खत विक्रीतील अनियमिततेवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने धडक कारवाई करत 12 खत विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 10 विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर 2 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या तपासणीत संबंधित विक्रेत्यांकडे खत साठ्यात तफावत आढळून आली. तसेच, काही ठिकाणी खत विक्री प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले. यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधितांवर कारवाई केली. विशेष म्हणजे, खत विक्रीसाठी अनिवार्य असलेल्या पॉश (PoS) मशीनचा वापर न करणाऱ्या दोन केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. पुढील काळातही अशा प्रकारच्या अनियमिततेवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report

चंद्रपुर में बायसन-हरिण समेत हिमयुगीन जीवाश्म: मानव इतिहास उजागर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूरात सापडले बायसन हरीणाच्या दुर्मीळ जीवाश्मासह अश्मयुगीन अवजारे, प्रा. चोपणे यांच्या संशोधनाने चंद्रपूरच्या भू-वारसा उजळला अँकर:-- १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये यूनेस्कोच्या वतीने सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. चंद्रपूर जिल्हा जीवाश्म संपदेच्या दृष्टीने देशात अग्रेसर असून, येथील शोध हे मानवी व प्राण्यांच्या प्राचीन इतिहासाचे प्रमाण आहेत. चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीकाठच्या भोयेगाव पुलाजवळ बायसान, हरिण, रानडुक्कर व मानवी जीवाश्मे तसेच पाषाणयुगीन अवजारे आढळली आहेत. ही शेवटच्या हिमयुगीन प्लेइस्टोसीन काळातील (२०,००० वर्षांपूर्वीची) जीवाश्मे असून, प्रा. सुरेश चोपणे यांनी गेल्या वर्षापासूनची संशोधनात ती शोधली आहे. जास्त प्रमाणात बायसनची जीवाश्मे व कमी प्रमाणात इतर प्राण्यांचे अवशेष सुरेश चोपणे रॉक म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या जीवाश्मांजवळ पाषाणयुगीन अवजारे आढळल्याने मानव वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याचे सिद्ध होते. २०,००० वर्षांपूर्वी हिमयुग संपल्यानंतर महापुरात प्राणी नदीत वाहून गाळात गाडले गेले, ज्यांचे जीवाश्मीकरण झाले. वरोरा व चंद्रपूर तालुक्यातील गाळ-रेतीत हत्तीसह इतर जीवाश्मेही याच काळातील आहेत.चंद्रपूरमध्ये २०० कोटी ते २०,००० वर्षांपूर्वीची जीवाश्मे सापडली असून, यात स्ट्रोमॅटोलाईट्स, वृक्ष-पाने, डायनासोर व शंख-शिंपले सामील आहेत. प्रा. चोपणे यांनी याआधी १५० कोटी वर्षांची स्ट्रोमॅटोलाईट्स, ६ कोटी वर्षांची डायनासोर व इतर जीवाश्म शोधले आहेत.
0
0
Report

कारंजा में सरकारी निधि की उधड़बुन: 20 लाख की इमारत पर 40 लाख खर्च

Washim, Maharashtra:कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे शासकीय निधीच्या उधळपट्टीचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने २० लाख रुपये खर्च करून उभारलेल्या नव्या इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखालून सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल ४० लाख रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे ही इमारत तात्पुरत्या स्वरूपात महिला बचत गटाच्या नव्या इमारतीत हलवण्यात आली होती. रुग्णालयासाठी पार्टिशन करण्याच्या कामासाठी ॲल्युमिनिअम व काचेच्या भिंती उभारण्यात आल्या तसेच काही किरकोळ कामे करण्यात आली. या कामासाठी झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आणखी ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top