Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Mar 09, 2026 15:16:32
Buldhana, Maharashtra:स्टोरी - धक्कादायक.. शिक्षक पत्नीच्या खुनाची पतीनेच दिली सुपारी.. पत्नीवर तीन वेळा विषप्रयोग, अखेर दुचाकीला धडक देऊन पाठविले यमसदनी.. Anchor - एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे.. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवल्येत असलेला कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे... जळगाव जामोद पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.. विवो -1 मागील २ मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा गाडीने शाळेवर जाणाऱ्या शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती.. या अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला.. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि सत्य समोर आले.. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास केला असता तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (एमएच २८ बीबी ५७५३) गाडीकडे वळाली.. ही गाडी मनीष सुर्यवंशी , राहणार शेगाव याची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता मनीषने या थरारक कटाची कबुली दिली आहे.. मनीषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतक महिलेचे पतीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनेकदा कौटुंबिक वाद व्हायचे आणि कौटुंबिक शाळेची तक्रार सदर महिलेने यापूर्वी पोलिसांना दिलेली होती हा राग डोक्यात धरून...मुख्य सूत्रधार मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार , राहणार पातुर्डा यांनी मिळून हा कट रचला असल्याचे माहिती मिळाली तर मृतक वृषाली यांना अन्नातून विष देऊ मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.. आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी १ लाख रुपयांची सुपारी दिली होती.. ठरल्याप्रमाणे २ मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.. या गुन्ह्यात वाहन चालक मनीष सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तिघांनाही अटक करून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.. बाईट - श्लोकानंद लोढा, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक वियो -2 - मृतक वृषाली गावंडे पिंपळगाव काळे येथील शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.. दरम्यान त्यांचा अपघात नसून खून झाल्याच्या घटनेने सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या घरातील शिक्षक पत्नीचा खून करणाऱ्या पतीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.. मयूर निकम झी 24 तास बुलढाणा
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 09, 2026 14:49:06
Buldhana, Maharashtra:धक्कादायक: अपघाताचा बनाव रचून शिक्षिकेचा खून; पतीच निघाला मास्टरमाइंड अँकर- बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ गावाजवळ २ मार्च रोजी झालेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूला आता एक थरारक वळण मिळाले आहे. जो आधी रस्ते अपघात वाटत होता, तो प्रत्यक्षात पतीकडूनच रचलेला एक सुनियोजित कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे येथील शाळेत शिक्षिका होत्या. २ मार्च रोजी कवठळ गावाजवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली होती, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचा आधार घेतला असता, हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, वृषाली यांचे पती प्रकाश गावंडे यांनीच आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी साथीदार मंगेश चुलकार याच्या मदतीने कट रचला होता. त्यांनी आरोपी वाहन चालक मनीष सुर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन गाडीने धडक देण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे, या अपघातापूर्वीही वृषाली यांना तीन वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पती प्रकाश गावंडे, मंगेश चुलकार आणि चालक मनीष सुर्यवंशी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या हत्येमागील नेमके मुख्य कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SKShubham Koli
Mar 09, 2026 14:01:12
Thane, Maharashtra:गुरुवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवार दिनांक 12/03/2026 रोजी सकाळी 9.00 ते शुक्रवार दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी 9.00 पर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 13:18:50
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात कचरा टाकण्याचा वाद विकोपाला सफाई कामगाराची चाकू मारून केली हत्या पतीची हत्या तर पत्नीने केली आत्महत्या आरोपीला पोलिसांनी केली अटक Anchor घरातील कचरा इकडे तिकडे टाकू नकोस असे सांगितल्यावर कचरा टाकणारा आणि सफाई कर्मचारी यांच्यात नेहमी वाद होत होता. सोमवारी देखील हाच प्रकार घडला. नेहमी रागाने का बघतोस ? का वाद घालतोस? यावरुन कचरा टाकणाऱ्या दुर्गेश गुप्ता नावाचा व्यक्तीने कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप याची धारदार शस्त्राने हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. उल्हासनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सफाई कामगार महादू याच्या हत्येची माहिती मिळताच महादूची पत्नी पूर्वी जगताप हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जगताप यांना दोन मुले आहेत. वडिलांची हत्या आणि आईची आत्महत्येमुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. कचरा टाकणाच्या वादातून दोघांचा जीव गेल्याने जगपात कुटुंब उद्धवस्त झाले आहे. Byte सचिन काळे पोलीस उपयुक्त उल्हासनगर परिमंडळ 4 चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 13:01:39
Akola, Maharashtra:अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेण्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत काही तासांतच आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर उर्फ फुलसिंग सोलंकी (वय ३०, रा. शाहूपूर, जिल्हा बुरहानपूर, मध्यप्रदेश) हा अकोल्यातील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज सकाळी चारच्या सुमारास हॉस्पिटलमधून दीड वर्षाच्या मुलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन निघून गेला. यादव मुलीच्या आईने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अकोट रोड परिसरातून त्याला ताब्यात घेत चिमुकलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले,पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 09, 2026 12:50:27
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 09, 2026 12:32:08
Satara, Maharashtra:सातारा: सातारातील एका शाळेतील हॉस्टेलमधील केयर टेकर कडून मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप झाल्यामुळे खळबळ उडाली असून यामध्ये संशयित आरोपी ऋषिकेश सुभाष चव्हाण याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. या घटनेत शाळेत सुरुवातीला तीन मुलांवर लैंगिक छळाचा प्रयत्न झाल्याची नोंद झाल्याने पोलीस तपासामध्ये 24 मुलांवर लैंगिक व मानसिक छळ झाला असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. या प्रकरणात शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 09, 2026 12:31:49
Pimpri-Chinchwad, Maharashtra:लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले तरीही हा एक लव जिहाचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अभ्यास सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंदू रीत्या रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचाही अद्याप स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अध्ययन स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचंही ती म्हणाली...! बाईट - अद्या सुर्वे
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 09, 2026 12:31:18
Satara, Maharashtra:सातारा - सातारा शहराजवळील सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे प्रचंड लोट आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील वाहतुक करणाऱ्या नागरिकांना आणि आजू बाजूच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या आगीमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात दिवसाढवळ्या पावसाळ्यासारखे दाट धुके पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावर आलेल्या धुरामुळे वाहनचालकांना भर उन्हात देखील गाड्यांचे लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. मात्र कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 09, 2026 12:15:33
Baramati, Maharashtra:बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयास दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने देण्यात आलेल्या निर्णयाच्या बारामतीतल्या नेत्यांच्या युक्तिवादाचे विस्तार रुजला. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी कडाडून विरोध व्यक्त केला. या महाविद्यालयाला 2024 मध्ये राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्यात आले होते, परंतु यामध्ये छेडछाड झाली तर तीव्र आंदोलनाची धमकी देण्यात आली. बारामतीत धनगर समाजाच्या नेत्यांनी या प्रकरणाला वेगवेगळे विचार व्यक्त केले. बारामतीत काही नेते आणि समाजघटक या निर्णयाला पाठिंबा देत आहेत, तर काहींनी विरोध दर्शवला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 09, 2026 11:51:14
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव–कोटमगाव रोडवरील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून ती वेगाने पसरली होती. घटनेची माहिती मिळताच लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाने तत्पर कारवाई करत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. उपकेंद्र परिसरात सुमारे १६३० सोलर पॅनल बसविण्यात आले असून आगीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती; मात्र वेळीच आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत वीज वितरण कंपनीचे किरكوळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 11:35:37
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा फटका साखर उद्योगाला ही बसला असून आखाती देशातील साखर निर्णात ठप्प झाल्याने साखरेचे बाजारभाव किलोमागे चार ते पाच रुपयांनी गडगडलेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी ही घटली असून साखरेला उठाव नाही तर दुसरीकडे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपा साठी कमी प्रमाणात आल्याने साखरेचे गाळप ही कमी झालंय तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे,सततच्या पावसामुळे ऊसाचं वजन घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय साखर कारखान्यांना ही रिकवरी हि कमी प्रमाणात मिळाल्याने साखरेचं आर्थिक गणितचं कोलमडलं असून साखर उद्योग संकटात आल्याचं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी म्हटलंय याच संदर्भात त्यांच्या शी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 09, 2026 11:35:24
Dhule, Maharashtra:नंदुरबार शहरातील शिवसेना शिंदे गट एक सुप्त शीतयुद्धाच्या अडकत चालला आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. नंदूरबारात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ऐट्रोसिटीचा गुन्हा महिन्याभरात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काहीही संबंध नसताना राजकीय सूडभावने हे गुन्हा दाखल होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते करीत आहेत. पोलीस प्रशासनाची चुप्पी मात्र पडद्या मागे कोण आहे हे सांगत आहे. भाजपाला झोबीपछाड देत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता आणली. भाजपाला धक्का देत शिवसेनेचा हा विजय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जिव्हारी लागला. त्यानंतर उपनगरध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि शिवसेना शिंदे गटामागे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु झाले. आता पुन्हा बाबा रिसॉर्ट येथे झालेल्या चौधरी समाजाच्या कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या महिलेचा अपमान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर करण्यात आला आला आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तक्रारदार महिला उपनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर एट्रोसिटी चे गुन्हा दाखल झाला आहे.. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि नगरसेवक गौरव चौधरी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वीही एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातच पुन्हा एकदा गुन्हा नोंद झाल्याने नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सध्या भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा राजकीय सामना आहे. त्यातूनच हे घडत आहे का? भाजपच्या अदृश्य शक्ती शिंदे गटाच्या नेत्या-यांना टार्गेट करताय का ? असे प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. येणाऱ्या काळात शिंदे गटाच्या नेत्यांना अश्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा अडचणीत आणले गेले तर येणाऱ्या काळात हा संघर्ष शिगेला पोहचेल असे दिसत आहे. पोलीस यंत्रणेला देखील हे राजकीय युध्य असल्याची जाणीव आहे, मात्र गुन्हा दाखल करून घेणे आणि तपास करणे ही त्यांची चौकट आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा या गुन्हांबद्दल काही बोलायला तयार नाही. पोलीस यंत्रणा यां राजकीय सुप्त संघर्षातून आरोपीचे धनी होत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top