Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 05, 2025 18:03:20
Kolhapur, Maharashtra:खासबाग कुस्ती मैदानात पुनश्च कुस्तीचा हरिओम… एक वर्षानंतर मैदानात ‘शड्डू’चा नाद! खासबाग कुस्ती मैदानालाही बसला होता. संपूर्ण व्यासपीठ जळून खाक झालं आणि तब्बल एक वर्षाहून अधिक काळ कोल्हापूराच्या परंपरेचा अधिष्ठान असलेलं हे ऐतिहासिक मैदान बंद पडलं. अखेर आता खासबागचा आखाडा पुन्हा सज्ज झाला आहे… आणि पुन्हा एकदा मैदानावर “शड्डू”चा गजर घुमू लागलाय. कोल्हापूरची ओळख म्हणजे कुस्ती… आणि कुस्ती म्हटलं की पहिलं नाव येतं ते राजर्षी शाहू महाराजांच्या खासबाग मैदानाचं. पण वर्षभरापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या दुर्घटनाग्रस्त आगीने खासबागचं व्यासपीठही भस्मसात केलं. व्यासपीठ जळालं आणि कुस्तीचं हे पवित्र स्थान लॉक डाऊन झाल्यासारखं शांत पडलं… एक वर्षाहून अधिक काळ मैदान बंद राहिल्यानं आखाड्याची माती निष्प्राण झाली होती… पैलवानांना सरावाची जागा नव्हती… आणि कोल्हापुराच्या पारंपरिक मल्लविद्येची धुरा जणू अडकून पडली होती .. पण अखेर हा संघर्ष संपला! आखाडा परत जिवंत करण्यासाठी ज्या पद्धतीने पैलवानाला खुराक दिला जातो… अगदी त्याच पद्धतीने मातीला खुराक देण्याचा मंत्र अवलंबण्यात आल.. या खुराकात १० पोती लिंबू, १० पोती हळद, १० डबे तेल, २ पोती काव आणि ५० लिटर दूध याशिवाय इतर पारंपरिक अर्क आणि नैसर्गिक घटक मिसळून मातीत नवी ऊर्जा फुंकण्यात आली. जमदाडे, महान भारत केसरी ( अमोल महाडिक यांनी.. मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिले.. दोन-चार दिवसांपूर्वी मातीत मिक्स करून खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले.. ) मैदान वर्षभर बंद असल्यामुळे माती घट्ट झाली होती… आता खुराक दिल्यावर माती पुन्हा कुस्तीसाठी पोषक झालीये... या संपूर्ण कामासाठी भाजपा आमदार अमल महाडिक यांनी सर्व साहित्य दिले पण खरा कस लागला तो गंगावेश तालीमचे पैलवान, सामाजिक कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमीचा.. कारण त्यांनीच काही दिवस श्रमदान करून या आखाड्या जीव आणला.. सर्वांचा उद्देश एकच होता करवीरच्या कुस्तीची परंपरा आबादीत ठेवणे. जयदीप शितोळे, शंभर ते सव्वाशे वर्षाची वारसा... शाहू खासबाग मैदानाला ऊर्जेचा अवस्था प्राप्त झाली आहे. खासबाग मैदानात सुरू झालेला हा सराव.. लाल मातीची परंपरा जपली जाईल पैलवान सराव करताना, ‘शड्डू’ देताना.. आखेर… वर्षभरानंतर खासबाग मैदान पुन्हा जागं झालंय! मैदानावर पुन्हा मातीचा सुगंध दरवळतोय… आणि पैलवानांच्या आवाजात तोच पारंपरिक “शड्डू” घुमतोय. यानिमित्ताने कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.
157
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 05, 2025 17:45:38
Buldhana, Maharashtra:ऑन तपोवन मधील वृक्षतोड. कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणे , त्या वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे . भावना जोडलेली आहे . आस्थेचा आणि भावनेचा विचार केला गेला पाहिजे. विकास करत असताना जंगलाचा ऱ्हास करतो , पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे . ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम उभा राहिला आहे . त्यामुळे शिवसेना जनतेच्या सोबत उभी आहे .. ऑन मंगलप्रभात लोढा . मंगलप्रभात लोढा यांनी जे सांगितले, त्यात काही नाकारता येत नाही . पण सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे . शिवसेना हा पक्ष ध्येय धोरणावर चालतो . लोढाजी यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही . ऑन भाजपचा महापौर . शिवसेना भाजपा महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल . आमचा जागा जास्त आल्यात तर आमचा महापौर होईल . मुंबई मध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे . जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला .याचा फायदा महा विकास आघाडीला होणार आहे . याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील . जास्त जागा भाजपा लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल .. जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू .
210
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 05, 2025 16:15:16
Navi Mumbai, Maharashtra:Anchor :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने 'प्रोजेक्ट महागदेवा' या महत्त्वाकांक्षी फुटबॉल विकास उपक्रमाची सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 13 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शोधणे, त्यांना घडविणे आणि संपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्धेश्य आहे. प्रोजेक्ट महागदेवा द्वारे राज्यात एक शिस्तबद्ध प्रतिभा प्रवाह तयार करून महाराष्ट्राला ग्रामीण व युवा फुटबॉल उत्कृष्टतेचे अग्रस्थान मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या साठी मुंबईतील कुपरेजा फुटबॉल मैदानात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र फुटबॉल amabesidor अभिनेता त्रायगर श्रॉफ यांनी खेळाडूंसोबत खेळून प्रोत्साहन देखील दिल आहे.. या संदर्भात या प्रोजेक्टचे अधिकारी क्षितिज देसाई आणि महिला फुटबॉल खेळाडू यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी..
159
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 05, 2025 15:20:05
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खाजगी दवाखान्यात 2 डिसेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती सुरज चव्हाण (वय 22) या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते. सदरची महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्याने तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं.महिलेची प्रसुती होण्यापूर्वीच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे कुटुंबाने पंढरपूर मधील एका ब्लड बँक स्टोरेज येथून ओ पॉझिटिव रक्त आणून ठेवलं होतं. डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीण महिलेला जास्त त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारास घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारानंतर सदर महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नाही.
155
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 05, 2025 15:19:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - महायुती म्हणून अजित पवारांना लढावं,आणखी काही गणित करू नये - चंद्रकांत पाटील अँकर - आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुती म्हणून लढावं,आणखी काही गणिते करू नयेत,यासाठी बोलणी सुरू असल्याचे भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थिती आणि झालेली गर्दी,त्यामुळे काही गोष्टी घडल्या,मात्र महापौरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका संख्या कमी असल्याने,तसे प्रश्न आता निर्माण होणार नाहीत,असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलाय,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा. व्ही वो - राजकारणात आता काहीही होऊ शकतं,या राजकारणातील जुन्या वाक्याचा आता व्यापक अर्थ झालाय,खरगेंना उद्धव ठाकरे भेटतील काय? मग उद्या खरगे म्हणाले,मनसेला बरोबर घेऊ नका ? ते कशावर काय करतील हे माहित नाही,असा हा अनपेक्षित प्रश्न असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि खरगे भेटीवरून चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.
64
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 05, 2025 15:17:10
Baramati, Maharashtra:पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे उलुक उत्सवास सुरुवात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सैनिकांच गाव असलेल्या पिंगोरी येथे सहाव्या उलूक उत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला अंदाजे 25 हजार विद्यार्थी भेट देणार आहेत. या मोहत्सवाच्या माध्यमातून उलूक म्हणजेच घुबड या बद्दलची माहिती दिली जातेय. त्याच बरोबर घुबडा बद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. इला फाउंडेशनच्या माध्यमातून या मोहत्सावाच आयोजन केलं जातं उत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. या यामध्ये सात हजार विद्यार्थ्यांनी काढलेली घुबडाची चित्रे, घुबडाच्या प्रतिकृती, रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली घुबडाची चित्रे इत्यादींचे प्रदर्शन भरवण्यात आलंय. तर विद्यार्थ्यांनी घुबडा संदर्भात सादर केलेली विविध गाणी नाटिका आणि घुबडा बद्दलची चित्र फित दाखवून माहिती दिली जातेय. घुबडा बद्दलची अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर केले जातायत.
196
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 05, 2025 15:16:46
Kalyan, Maharashtra:मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाच्या पथकाने काल रात्री कल्याण पूर्वेतील रेल्वे पे-एंड-पार्क पार्किंग वर छापा टाकला आणि रेल्वे प्रशासनाची फसवणूक करण्याच्या नावाखाली चालणाऱ्या बनावट सुविधेचा पर्दाफाश केला. दक्षता विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या पथकाला जास्त शुल्क आकारल्याची तक्रार मिळाली होती. हे प्रकरण उघड करण्यासाठी, दक्षता विभागाच्या पथकाने एक पावती मिळवली आणि कल्याणच्या कोळसेवाडी पूर्वेतील पार्किंग सुविधेत वाहन पार्क केले. अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की पावतीवर डीएस एंटरप्रायझेस, साइट एम असे लिहिले होते. पथकाने पावती तपासली तेव्हा ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले, जी पे-एंड-पार्क ऑपरेटरने स्वतः छापली होती. तपास पथकाने पार्किंग संचालक हरिशंकर प्रजापती यांना अटक केली. त्या ठिकाणी काही बनावट कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत, जी स्टँड चालवण्यासाठी वापरली जात होती. दक्षता विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अटक केलेल्या आरोपीला कल्याण आरपीएफकडे सोपवण्यात आले आहे. दक्षता पथकाला या प्रकरणात काही रेल्वे अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे, दक्षता विभागाचे अधिकारी आता बनावट पे-एंड-पार्क ऑपरेटर्समध्ये कोणते रेल्वे अधिकारी सहभागी आहेत याचा तपास करत आहेत.
143
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 05, 2025 15:03:28
Nagpur, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष --फडणवीस यांनी एका वर्षात महाराष्ट्राला जाती-जातीमध्ये भांडण लावणे, कायदा सुव्यवस्थेची ची लढाई, सरकारी जमीन विकणे, माफिया राज वाढणे, मुंबई उद्योगपतींच्या घशात घशात घशात असेच काम एका वर्षात झाले आहे.. महाराष्ट्र दिल्लीश्वरांच्या मर्जीने चालत आहे.. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहे.. फडणवीस फक्त रबर स्टॅन्ड आहे. कुणाशी युती करायची, कोणाला कोणतं खातं द्यायचा, कोणते पालकमंत्री राहणार, याचे निर्णय अमित शहा करतात.. महाराष्ट्रातील धोरणात्मक निर्णयांसाठी दिल्ली गाठावी लागते.. महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी गहाण ठेवला आहे.. केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या घरच्या मुलीची छेडखानी होते, तरी पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नाही, अखेर त्यांना धरणे आंदोलन करावे लागते. राज्याच्या गृहराज्यमंत्र्याचे आईचे नावाने बार चालते. हेही एका वर्षात महाराष्ट्राला पहावे लागले.. एका वर्षात संतोष देशमुख, संपदा मुंडे असे हत्याकांड महाराष्ट्रात घडले आहे. हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला सर्वात लाचार सरकार आहे.. हे गँग्स ऑफ ट्रिपल इंजीन सरकार आहे.. हे आजवरचा सर्वात निर्लज् आणि लाचार सरकार आहे.. पुढच्या एका वर्षासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो.. मागील वर्षात त्यांची तुलना औरंगजेबशी होत होती... ती तुलना आम्हाला त्यांच्या वर्तवणुकीमुळे नाईलाजाने करावी लागली होती.. त्यांनी आम्हाला जल्लाद, दरीन्दा म्हणावे लागले, कारण ते तसे वागतात.. ते विसरतात म्हणून गजनी म्हणावे लागले.. मात्र या शब्द सारखं त्यांनी मागू नये, म्हणून पुढच्या वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो... लोढा काही खोटं बोलत नाही, इतर पक्ष चालवतात, पक्ष फोडतात, लोकांना सोबत घेतात.. त्याच्या शेतीला आपली शेती म्हणणं असा हा प्रकार आहे... लोढांचं निशाणा व्यवस्थेच्या दिशेने आहे... त्यांचा वक्तव्य अहंकाराचे संकेत आहे.. रावणाचा अहंकार देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी आहे.. लोढांचे वक्तव्यातून हेच लक्षात येते.. विजय वडेट्टीवार On वर्षपूर्ती लाडक्या बहिणीपासून सुरू झालेली सरकारची सुरुवात लाडके कंत्राटदार पर्यंत पोहचली कोट्यवधीची कामे यांनी कंत्राटदार यांना दिली आणि त्याचं चांगभलं केलं महाराष्ट्रात असे कोणते दिवे लावले.... राज्यात शेतकरी आत्महत्या होते आहे.. संकट आल्यावर अद्याप दुर्लक्ष, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं अजून कोणताही प्रस्ताव आला नाही... हे म्हणतात आम्ही पाठविले... त्यामुळे ग्रामीण भागात खोट बोलणाऱ्या लोकांच्या तोंडांत किडे पडो म्हणतात तेच मी म्हणेन तपोवनात झाडे तोडण्याचा विरोध केला त्याला बकरी ईद सोबत जोडली गेली धार्मिक भावनेला कोणाकारण नाही. पण पर्यावरण बचाव करण्यासाठी काही संघटना पुढे आल्या तर काय झाल.. गुंड म्हणत असेल की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असेल तर आम्हाला मंत्रालयात सेल्फी काढता येईल.. कोणी खून करेन असे वाचाळवीर यांनी तयार केलेत.. विदर्भाचे मुख्यमंत्री असताना विदर्भातील सर्वाधिक बेरोजगार स्थलांतरण होत आहे.. हे अपयश कोणाचं याचा विचार जनता करत आहे.. या सरकारची कामगिरी शून्य आहे.. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.. दमडी दराने जमिनी लुटून खात आहेत... पुण्यातील प्राईम लँड खाल्लेत, कंत्राट मध्ये टक्केवारी अंगणवाड्या मध्ये गेल्यावर कळेल जे साहित्य पुरविल्या जात आहे... ते एकही महिला खात नाही, घेऊन फेकून देत आहे... शिक्षण विभागात एकही पॅकेटमध्ये पूर्ण धान्य नाही, सोयाबीनची डाळ मिक्स केली जात आहे... अश्या प्रकारे मोठमोठी कामे 67 हजार कोटीची कामे वाटून दिली... आज सामान्य माणूस इलेक्ट्रिक बिल भरु शकत नाही.. महागाई वर नियंत्रण नाही... कापूस चांगल्या दर्जाच्या सात हजाराच्या वर जात नाही, सोयाबीनला दर नाही.. धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही.. आता अबोला बोलण बंद झाले, पुढच्या काळात के ते चित्र दिसेल.. राज्याला अधोगतीकडे नेणारे हे वर्ष राहिले.... On लोढा लोढा खोट बोलत नाही... पक्ष फोडून चालवणं म्हणजे पक्ष चालवणे असे वाटत असल्यास....
66
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 05, 2025 11:47:40
Yavatmal, Maharashtra:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नुकतीच निवड झालेल्या पायल किनाके यांनी महाविद्यालयातील छात्र संघ निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी सरकारची घेराबंदी करणार असल्याचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर अमरावती आणि गडचिरोली येथील विद्यापीठांवर एबीव्हीपीने मोर्चे काढून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच छात्र संघ निवडणुका घेण्याबद्दल मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांपुढेही याबाबत मागणी केलेली आहे, मात्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे धडकेल असा इशारा पायल केला यांनी दिला. एबीव्हीपी चे राष्ट्रीय अधिवेशनात सामाजिक शैक्षणिक प्रस्ताव पारीत झाले असून, जेन झी चळवळ व भारतीय युवा, ए आय चॅट जीपीटी व शिक्षण, बांगलादेशी घुसखोरी व समसामायिक सुरक्षा प्रश्न, लोकसंख्या असंतुलन व विकसित भारताचे उद्दिष्ट, ऑपरेशन सिंदूर व सुरक्षा परिदृश्यातील बदल या विषयांवर सखोल चर्चा झाली. अशी माहिती पायल किनाके यांनी दिली.
120
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 05, 2025 11:23:33
164
comment0
Report
SKShubham Koli
Dec 05, 2025 11:16:21
Thane, Maharashtra:महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणेकरांसाठी निधी कमी पडू दिला नाही; विविध प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. ठाणेकरांसाठी एक गोड बातमी: घोडबंदर परिसरात नवीन तिसरं नाट्यगृह निर्माण होत असल्याची घोषणा, 7,350 स्क्वेअर फूट जागेवर भव्य नाट्यगृह. भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो-4 प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वाला; डिसेंबरपर्यंत लोकार्पणाचा प्रयत्न. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी; जोड रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे; 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या RTओची 5 टीम स्कॉड वाहतूक नियंत्रण देणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी वेगाने विकासकामं करीत आहेत. घोडबंदर रोडवरील सेवा रस्तावर ट्रॅफिकचा विचार; 60 मीटरचा रस्ता फाउंटन ते नरिमन पॉइंटपर्यंत; लवकरच एकत्र केला जाईल. एमएमआर क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने पिकल बॉल टर्फ बनवला; उद्घाटन झाले. पावलोफ शेष प्रकल्प ठाणेकरांना देण्यात येत आहेत. 21 तारीख निकालाबद्दल चर्चा; निवडणुकीचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेेत. खापर फोडणार नाही; अधिकारी चांगले काम करतात; 15 तारखेपूर्वी सर्व काम पूर्ण.
76
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 05, 2025 11:08:42
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथील आर्थिक फसवणुक प्रकरण चांगलं गाजलं होतं. आता याप्रकरणी शनीशिंगणापूर देवस्थानचे दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे..सचिन शेटे आणि संजय पवार असे या कर्मचाऱ्यांची नावे आहेत...गुरुवारी मध्यरात्री सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनी शिंगणापूर देवस्थान मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक घोटाळा झाला आहे. या माध्यमातून जमा झालेला देणग्यापैकी काही निधी दोघा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वगळला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे.. या दोघांबरोबरच अजून काही बडे मासे हाती लागतात का याचा पोलीस तपास करत आहेत
132
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 05, 2025 11:06:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या भूमीवरून राज्यातील सर्व नागरिकांना नमन करून धन्यवाद देतो... वर्षभरापूर्वी मोठा आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिले. हा एक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित वर्ष आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता वेगवेगळ्या योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या.. वर्षभरानंतर पुन्हा जनतेला अस्वस्थ करते, असाच महाराष्ट्र पुढे जात राहील, जात राहील , जात राहील. २०१४ते १९ या काळात दोन वेळा दुष्काळाचा सामना करावा लीगल. त्यावेळी एकीकडे विजेची आणि दुसरीकडे पाण्याची अडचण असल्याची गंभीर समस्या होती. शेतकऱ्यांची मागणी असायची दिवस १२ तास वीज द्या.... आपण जलयुक्त शिवार योजना केली. आणि रिपोर्ट मध्ये आले महाराष्ट्राची पाणी पातळी वर आली , महाराष्ट्राची पाणी पातळी वर आली. रात्री अनेक अडचणी शेतकऱ्यांना होती, शेतीवर अनेक बंधने त्या काळी शेतीवर आली होती. फिडर वयक्तिक करायचे निर्णय केला होता, याचा पाहिला प्रयोग राळेगण सिद्धीमध्ये केला आणि तो यशस्वी झाला.... दुर्दैवाने मध्यंतरी सरकार म्हणते त्या काळी योजना बंद पडली ... पुन्हा सरकार आले तेव्हा हक्काने मी ऊर्जा विभाग मागून घेतले.. आपली महाराष्ट्राची योजना केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून लागू करण्याचे सांगितले.... सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी केंद्राने समाविष्ट केली त्यानंतर महाराष्ट्र थांबला नाही.. देशात कुसुम अंतर्गत ९ लाख पंप आहेत. त्यापैकी ७.५ लाख पंप फक्त महाराष्ट्राने लावले... देशात आज आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. २०१३- १४ साली चार चार वर्षाचा पेंडिंग असायचं... विधानसभेत यावर सर्वात जास्त चर्चा व्हायची. आम्ही पेड पेंडिंग संपवली. दरवर्षी २०-२५ लावणारा महाराष्ट्र एक महिन्यात ४५ हजार पंप लावू शकला.... ज्यावेळी मी ही योजना विधानसभेत घोषित केली त्यावेळी विरोधकांनी याचा मजाक उडविले मात्र आम्ही ही करून दाखविले. एका महिन्यात लोकांचे पंप शेतात लागायला लागले आहेत. एक नवीन रेकॉर्ड आपण तयार केलेलं आहे. हा आमचा रेकॉर्ड आम्हीच पुन्हा तोडून दाखवू. पुढच्या वर्षी १० लाख पंप पूर्ण झाले पाहिजे. आपण आता कुठेही अडकणार नाहीं. महाराष्ट्र आता पहिले राज्य होत आहे. शेतकऱ्यासाठी वेगळी कंपनी तयार करून वीज देणार. १६ हजार मेगावॉट वीज सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना मिळेल. दिवसा वीज, २५ वर्षे बिल भरावे लागत नाही, पाच वर्षे आम्हीच बिल घेणार नाही, मात्र पाच वर्षानंतर कुणाला काय माहिती सूर्याच्या आशीर्वादाने सौर ऊर्जेत परिवर्तित केल्याने पर्यावरणाची हानी टाळणार आहे. सव्वा रुपया आणि दीड रुपया एवढा शेतकऱ्याकडून बिल करायचा ६.५० रुपयाचा लॉस असायचा. ही वीज सरासरी ३ रुपयांनी पडत आहे. साडेतीन रुपये आताच कमी झाले आहे. दरवर्षी वीजच भाव कमी करणार आहे. 3 टक्क्यांनी विजेचे भाव कमी केले जाणार. या योजनेमुळे करू शकलो. ज्या 6 पुरवठादार कंपन्या होत्या, त्या मोठ्या कंपन्या झाल्या आहेत. 1 लाख रोजगाराची संधी ग्रामीण भागात तयार झाली आहे. ऊर्जा क्षेत्र करिता नवीन दिशा महाराष्ट्राने निर्माण केली आहे. यात मराठवाड्याने त्याची छत्रपती संभाजीनगर ने लीड घेतली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागात सर्वाधिक स्वागत या कृषी पंपाचे होत आहे. मागेल त्याला शेततळे, आच्छादन, विविध औजारे, ड्रिप ९० ते १०० टक्के सबसिडीवर दिली जात आहे. शाश्वत भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याचे प्रयत्न सरकार करीत आहेत. नदीजोड प्रकल्प सरकारने हातात घेतले आहे. यापिधीने दुष्काळ पहिला, पुढची पिढीने पाहू नये म्हणून नदीजोड प्रकल्प हातात घेतले आहे. सांगली आणि कोल्हापूरचे १०० TMC वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणार आहे. यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त पाहायला मिळेल, सरकारने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे.... विदर्भातही दुष्काळमुक्त होणार आहे. पुढील चार वर्षात मोठा परिणाम शेतीक्षेत्रात पाहायल मिळाले.. एक वर्षे पूर्ण झाले आहे काय काय सांगावे आणि काय नाही असे मला झाले आहे... अतिवृष्टीने शेततकऱ्यांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या खात्यात पैशे पोहोचवण्याचे काम सरकारने केले आहे. शेतकरी जोपर्यंत शाश्वत शेतीकडे वळत नाही, तो पर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील...
203
comment0
Report
Advertisement
Back to top