445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
देहू संस्थान ने पंजीकृत वारकऱ्यों के दुखद निधन पर एक लाख मदद की घोषणा
Varsoli, Maharashtra:Headline: वारकऱ्यांसाठी देहू संस्थानचा मोठा निर्णय आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्या नोंदणीकृत वारकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी निधन झाल्यास, संबंधित वारकऱ्याच्या कुटुंबाला संस्थानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. देहू संस्थानने स्पष्ट केले आहे की, ही मदत दुःखाची भरपाई नसून संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून वारकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे. दरम्यान, या आर्थिक मदतीसाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. संबंधित वारकरी हा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत दिंडीत सहभागी असणे आवश्यक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.0
0
Report
नगर मनमाड महामार्गावर ट्रक ने बाइक टक्कर, महिला की मौत
Shirdi, Maharashtra:नगर मनमाड महामार्गावर अपघात कोल्हार परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर महिलेला जवळपास दीडशे फूट ओढत नेले अपघातात दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला घेतले ताब्यात अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक मंदावली0
0
Report
मालाड कुरार पुलिस ने तलवारधारी युवक को रंगेहात पकड़ा, बड़ा हादसा टला
Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई; तलवारधारी तरुणाला अटक करून मोठी दुर्घटना टळली मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका तलवारधारी तरुणाला रंगेहात अटक केली आहे. राधेय राजेंद्र राणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात होणारी एक मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथील नुतन स्कूलजवळ दोन गटांत जोरदार हाणामारी सुरू होती. याच दरम्यान आरोपी राधेय राणे हातात उघडी तलवार घेऊन विरोधी गटावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे धावला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पांचाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अत्यंत हुशारीने आणि जीवाची पर्वा न करता आरोपीला झडप घालून पकडले. त्याच्याकडची तलवारही जप्त करण्यात आली.0
0
Report
Advertisement
नाशिक में Ring Road के विरोध में किसान आमरण उपोषण पांचवें दिन
Nashik, Maharashtra:कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी हे शेतकरी उपोषण करत आहेत. रिंग रोडची अलाइनमेंट नवीन मार्गाने न घेता जुन्या मार्गाने घ्यावी या प्रमुख मागणी सह शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची निलंबन करण्यात यावे. या सह विविध मागण्यासाठी आंदोलन केले जात असून मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील या आंदोलकांकडून देण्यात आलाय. आढावा घेतला घेत उपोषणकर्ताांशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
नवी मुंबई: शिवसेना शिंदे गट की महिला उपजिला प्रमुख गिरफ्तार, खंडणी मांगने का आरोप
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखाला अटक. पूजा बनसोडे यांना खंडणी प्रकरणी तुर्भे पोलीसांनी केली अटक. तुर्भे येथील स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिका कडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. खंडणी देण्यास नकार दिल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा पूजा बनसोडे यांच्यावर आरोप. पूजा बनसोडे यांच्यासोबत असलेल्या इतर 3 आरोपींचा पोलिस घेतायत शोध.0
0
Report
अभिजित बिचुकले बोले: आषाढ़ी वारी का खर्च सरकार उठाएगी, एकता दिखे वारकरी
Satara, Maharashtra:सातारा - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अभिजित बिचुकले यांनी वारकरी संप्रदायाच्या एकतेचे कौतुक करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व जाती-धर्मांचे वारकरी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांनी वारकऱ्यांकडून एकतेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेते अभिजित बिचुकले आले होते.वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या स्वागत कमानींवर टीका करत, हा निधी वारकऱ्यांच्या अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांवर खर्च केला असता त्याचा अधिक फायदा झाला असता, असेही त्यांनी म्हटले. शासन वारकऱ्यांच्या सेवेत कमी पडत असल्याचा आरोप करत, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर आषाढी वारीचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलणार आणि वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देणार नाही,अशी घोषणा अभिजित बिचुकले यांनी केली.0
0
Report
Advertisement
लोडशेडिंग के विरोध में किसानों का आक्रोश, खामखेडा में बिजली उपकेंद्र के पास प्रदर्शन
Nashik, Maharashtra:- लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचा हुंकार... - नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा अंधार जनआक्रोश मोर्चा गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतशिवारातील वारंवार होत असलेल्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी देवळा तालुक्यातील खामखेडा येथील ३३/११ केव्ही महावितरण वीज उपकेंद्रावर "अंधार जनआक्रोश मोर्चा" काढत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. हातात मेणबत्त्या आणि टेंभे घेऊन काढण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी लोडशेडिंगच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत “अंधार नको, वीज हवी!”, “लोडशेडिंग बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.0
0
Report
दापोली के सुतारवाडी में दराड-खतरे से लोग सुरक्षित स्थानों पर रवाना
Ratnagiri, Maharashtra:दापोली/ रत्नागिरी दापोलीत सुतारवाडीवर दरड कोसळण्याचे संकट दोन किलोमीटरपर्यंत भेगा; डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांचे स्थलांतर सुरू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत भेगा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी या भेगांची खोली दोन ते चार फूट असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. संभाव्य दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करत नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.0
0
Report
रत्नागिरी-कोकण में मानसून फिर सक्रिय, दस दिनों के बाद भारी बारिश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकणात पहाटेपासून आषाढ सरी जोरदार बंगालच्या उपसागरात कमी दबाच्या पट्ट्यामुळे कोकणात मॉन्सून पुन्हा सक्रिय दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात दमदार पावसाच्या सरी कालपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 46.90 मिलिमीटर पावसाची नोंद सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात 94. 42 मिलिमीटर पावसाची नोंद दापोली चिपळूण आणि मंडणगड तालुक्यात 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद बावनदी सुद्धा सध्या दुथडी भरून0
0
Report
Advertisement
लातूर के रेणापुर में FDA ने बेकरी पर बड़ी कार्रवाई, लाइसेंस निलंबित
Latur, Maharashtra:लातूरच्या रेणापूर शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकत, एका बेकरी वर मोठी कारवाई केली आहे, तपासणी दरम्यान बेकरीत अस्वच्छता आढळली असून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरात येणारे साहित्य बाहेर दिसल्याने FDA च्या अधिकाऱ्यांनी बेकरीचा परवाना जागेवरच निलंबित केला आहे, परंतु परवाना निलंबित करूनही बेकरी राजरोसपणे सुरू आहे0
0
Report
चंद्रपूर में फिर टस्कर हत्ती: किसान दहशत में, प्रशासन सतर्क
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाला आहे. हा हत्ती सामदा-सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आला. सध्या या हत्तीने सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे. या हत्ती पाठोपाठ कळपातील इतर हत्ती सुध्दा परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात हत्ती दाखल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 महिन्यांपूर्वी 30 रानटी हत्तींच्या कळपाने उमरी तलाव क्षेत्रातील जंगलात ठिय्या मांडला होता. 1 जुलैला इतर हत्ती वैनगंगा नदीला पार करून गडचिरोली जिल्ह्यात परत गेले. त्यातील टस्कर हत्ती सुद्धा परतीच्या मार्गावर असतांना त्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. उमरी जंगल परिसरात 3 मोठे तलाव आणि घनदाट जंगल असल्यामुळे हत्तीसाठी पोषक वातावरण आहे. कदाचित त्याच कारणामुळे हत्ती पुन्हा याच परिसरात परत आले असावे असा अंदाज वन विभागाद्वारे वर्तविला जात आहे. खरीप हंगाम सुरू असतानाच हत्तींच्या आगमनामुळे पिकांवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हत्तींच्या आगमनामुळे शेतजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या जंगल परिसरात पाथरी , आसोला- चक, उसरपार- चक, उसरपार/ तुकूम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा ही गावे आहेत. हत्तीच्या आगमनाने गावांतील सामान्य नागरिकांचेही दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.0
0
Report
आषाढ़ी एकादशी के लिए 225 विशेष बसें, पंढरपूर यात्रा सुरक्षित
Akola, Maharashtra:आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून ७ विशेष एसटी बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण अकोला विभागासाठी एकूण २२५ विशेष बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले असून, यात्रेच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने या बस सेवा उपलब्ध राहणार आहेत. अकोला, अकोट, मूर्तिजापूर, कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, व तेल्हारा आगारांमधून या बस चालविण्यात येणार आहेत. तसेच ४५ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास आगाऊ आरक्षणासह गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रेकरूंनी वेळेत आरक्षण करून सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के आंबा घाट में भीषण दुर्घटना, अज्ञात वाहन ने दुचाकी चालक रामा बाळू माशाळ की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा घाटात भीषण अपघात;अज्ञात वाहनाच्या धडकेत विजापूरचा दुचाकीस्वार जागीच ठार.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात आज पहाटे एक भीषण अपघात घडला. मिठ्या-नागपूर महामार्गावरील दक्खन बस थांब्यापासून जवळच एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, जि. विजापूर) हा तरुण जागीच ठार झाला. तो सापुचेतळे येथून विजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त तरुणाला तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देवरुखचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या असून, अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत..0
0
Report
चंद्रपूर पुलिस पर मानसिक उत्पीड़न और रिश्वतखोरी के गंभीर आरोप, CID मामले में हस्तक्षेप
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर पोलिसांवर मानसिक छळ आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करत दिलीप यादव नामक तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण CID सोपविण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, रुपेश पराते आणि महिला शिपार्ड भावना रामटेके या तिन्हीं पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने शहर पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. मृत दिलीप यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात त्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरून CID तपासाचे आदेश देण्यात आले असून CIDची चमू कालच चंद्रपुरात दाखल झाली आहे. घटना अत्यंत संवेदनशील असल्याने मृतकाच्या शवविच्छेदन प्रक्रिया ಮॅजिस्ट्रेटच्या समक्ष आणि प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडली. आता या प्रकरणात मॅजिस्ट्रेट और CID यांच्या तपासणी兩यंत्रणा द्वारे केली जाईल, साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांची तपासणी स्वतंत्रपणे केली जाईल.0
0
Report
वीरधरण के पानी ने चंद्रभागा में भक्तों को स्नान का आनंद दे दिया
Pandharpur, Maharashtra:चंद्रभागा नदीच्या पात्रात नीरा नदीवरील वीर धरणाच्या पाण्याने वारकऱ्यांनी लुटला स्नानाचा आनंद, वारकऱ्यांच्या स्नानासाठी नीरा माई धावली सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप पावसाने मनावा तसा जोर धरला नाही त्यामुळे चंद्रभागेच्या पात्र कोरडं होतं पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे निरा नदीवरील वीरधरणातून सोडलेले पाणी पंढरपूर मध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे चंद्रभागा नदीमध्ये वारकऱ्यांना स्थानासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे पंढरपूर मध्ये आलेले वारकरी या पाण्यात स्नानाचा आनंद घेत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार १८ जुलै रोजी उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी सोडलेले पाणी एक-दोन दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर चंद्रभागा नदीत भाविकांसाठी मोठ्याप्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे0
0
Report
Advertisement
