icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जलसंकट चेतावनी: जायकवाड़ी सहित सभी जलाशयों का पानी 40% से नीचे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अलनिनोमुळे यंदा सरासरीखेappa कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून, जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर आहे. उपलब्ध पाण्यातून ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचे नियोजन केले आहे. कडक उन्हाळ्यामुळे लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी केले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पासह सर्वच मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पातील जलसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार जायकवाडी धरणांत आज ४० टक्के जलसाठा आहे. मोठ्या धरणात सरासरी ४३ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकारच्या धरणांत सरासरी ३० टक्क्यांपर्यंत घटला आहे. लघु प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांत सरासरी २० टक्केच पाणी उरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
0
0
Report

मालेगांव में मानसून पूर्वी तेज़ बारिश से कांदा किसानों को भारी नुकसान

Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अचानक झालेल्या मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रीसाठी शेतातून काढून ट्रॅक्टरमधून बाजार समितीकडे नेला जात असलेला कांदा अचानक आलेल्या जोरदार पावसात पूर्णपणे भिजला. त्यामुळे आधीच कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजी नगर में पानी की भारी किल्लत, निजी टंकरों की आपूर्ति प्रभावित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हाळ्यात छत्रपती संभाजी नगरच्या सातारा-देवळाई वासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बोअरवेल कोरडे पडल्याने खासगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, टँकरची मागणी वाढल्याने नागरिकांना तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात शहरात सध्या डिझेल टंचाईचा फटका खासगी टँकर चालकांना बसत आहे. डिझेल भरण्यासाठी चालकांना पेट्रोल पंपांवर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे तसेच परिसरातील विहिरी व टँकर भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोरिंगची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने टँकर चालकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाणी विकत घेण्यासाठी पैसे मोजूनही टँकर वेळेवर येत नाही. तसेच पाणी नसल्याने अनेकांना काम धंदे सोडून पाण्याची वाट बघावी लागते. काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांनी पाणी मिळत असल्याने महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे तसेच परिसरातील नागरिकांनी मनपाकडून सोसायटींना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
0
0
Report

जनगणना के लिए 10 शिक्षकों की गैरहाजिरी पर पुलिस को मामला दर्ज कराने की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जनगणनेच्या राष्ट्रीय कामासाठी संभाजी नगर महापालिकेने नियुक्त केलेले १० शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर राहिले आहेत. अखेर मनपा प्रशासनाने या दांडीबहाद्दर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी सिटी चौक पोलिसांना पत्र दिले आहे. झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्त तथा जनगणना अधिकारी यांनी हे पत्र दिले असून, सोबत शिक्षकांची यादीही जोडली आहे. कर्मचाऱ्यांवर 'जनगणना अधिनियम १९४८' च्या कलम ११ अन्वये गुन्हा या दाखल करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे
0
0
Report

सोलापुर में अगले चार दिन हल्की बारिश की संभावना, गर्मी से राहत

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - आजपासून पुढील चार दिवस सोलापुरात रिमझिम पावसाचा इशारा. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरचे तापमान 40° वर स्थिर असताना शनिवारी रात्री शहर परिसरात पावसाने लावली होती हजेरी. शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमानात चार अंशांची घट, हवेत गारवा निर्माण झाला. रविवारी सोलापुरात 39.8 अंश से तापमानाची नोंद झाली. हवामानात आर्द्रता 32 टक्के पर्यंत राहिल्याने दिवसभर उकाडा कायम. आता पुन्हा एकदा पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता.
0
0
Report
Advertisement

72 किमी ग्रीनफील्ड रोड परियोजना, 3452 करोड़ रु मंजूर; अलाइनमेंट तय होने की संभावना

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या छत्रपती संभाजीनगरमधील तिन्ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या ७२ किलोमीटर लांबीच्या सहापदरी ग्रीनफील्ड रस्त्याचे काम आता अत्यंत वेगवान टप्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि तांत्रिक कागदपत्रांचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्याची अंतिम अलाइनमेंट निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पावर स्वतः लक्ष ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी मुंबईत एका विशेष बैठकीत या कामाचा सविस्तर आढावा घेणार आहेत. वाढत्या उद्योगांसाठी दर्जेदार, स्वतंत्र दळणवळण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने या ७२ किमी ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी ३,४५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
0
0
Report

मध्यरात्रि से पेट्रोल-डिज़ल के दाम बढ़े, किसान परेशान

Shirur, Maharashtra:इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला असून पंधरा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं असून मध्यरात्रीपासून पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महाग झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती इंधनाच्या किंमती वाढल्याने आणि वेळेवरती इंधन उपलब्ध होत नसल्याने शेती करायची तरी कशी तर दुसरीकडे शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय,याचाच पेट्रोल पंप वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

बिडकीन में दीवार तोड़कर देशी दारू दुकान से लाखों की चोरी, CCTV में कैद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भिंतीला बोगदा पाडून देशी दारूच्या दुकानात लाखोंची चोरी; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सोमपुरी रोडवरील देशी दारू दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

सातारा के आंबेनळी घाट में भीषण हादसा, 800 फुट खाई में स्कॉर्पियो गिरा—8 मृत

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात रात्री भीषण अपघात झाला असून स्कॉर्पिओ गाडी तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अंदाजे ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.दरम्यान, रात्री १० वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलिस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही。
0
0
Report
Advertisement

युवक कांग्रेस ने पेट्रोल पंप पर मेलोडी चॉकलेट देकर महंगाई विरोध प्रदर्शन किया

Kalyan, Maharashtra:कल्याणात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन,पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले मेलोडी चॉकलेट इंधन दरवाढी विरोधात मेलोडी चॉकलेट वाटप करत केले निषेध आंदोलन ANC - वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसने रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशात रॉकेटच्या वेगाने महागाई वाढत असताना मोदी सरकार मात्र गप्प आहे,असा आरोप केला. विदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना मेलोडी चॉकलेट देतात, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त आहेत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.
0
0
Report

आٹपाड़ी तालुक़े में तेज आंधी-गरज के साथ गारपिट, एक म्हैस की मौत; डाळिंब के बागों में पानी जमा

Sangli, Maharashtra:आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अंगावर झाड कोसळून म्हैस ठार, डाळिंबां बागांना फटका.. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट्याचा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आटपाडी येथे वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड कोसळून एक म्हैस ठार झाली आहे. अचानक पडलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे डाळिंब बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे डाळींब बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top