445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना मर्चेंट बैंक घोटाला: 54 करोड़ से अधिक ऋण घोटाला, 8 करोड़ संपत्ति फ्रीज़
Jalna, Maharashtra:जालना : मर्चंट बँक प्रकरणात ८ कोटींची संपत्ती गोठवली; ५ संचालकांना अटक होणार बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार दाखवून बँक कर्ज अपहरण जालना मर्चंट बँकेतील ५३ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात कारवाईचा फास घट्ट होत आहे. १७७ बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या या घोटाळ्यात १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, मुख्य आरोपी अर्थात बँकेचा अध्यक्ष गोपाल अग्रवाल अद्याप फरार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात एमपीआयडी प्रस्ताव केला. यानुसार आरोपींच्या मालमत्ता गोठवल्या जात आहेत. पोलिसांचा तपास खोलवर गेला असून आणखी पाच संचालकही आरोपी होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेल्या रायचंद कुरंगळ, नीलेश्वर भोसले या दोघांची ८ कोटींची संपत्ती गोठवण्यात आली आहे. जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमपीआयडी प्रस्ताव केला आहे. या बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार दाखवून तब्बल ५४ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा बँक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात फिर्याद देणारेच बँकेचे महाव्यवस्थापकच आरोपी निघाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 'एमपीआयडी' कायदा लावल्यामुळे आरोपींना पळवाट मिळणे कठीण आहे. यात त्यांना ३ ते ५ वर्षे अतिरिक्त कैद होऊ शकते. या कायद्यानुसार ठेवीदारांची फसवणूक केल्याबद्दल स्वतंत्र शिक्षेची तरतूद आहे. तसेच जशी आता ८ कोटींची संपत्ती गोठवण्यात आली, तशीच सर्व आरोपींची स्थावर-जंगम मालमत्ता जप्त केली जाईल. कोर्टाच्या आदेशाने या मालमत्तेचा लिलाव करून बँकेच्या खातेदारांचे पैसे परत केले जातील.0
0
Report
शिरूर में पेयजल संकट गहराने से गन्ने की फसलें बर्बाद, किसान परेशान
Shirur, Maharashtra:वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचं संकट अधिकच गडद झाले असून या वाढत्या उन्हाचा आणि दुष्काळाचा मोठा फटका शेती पिकांना बसतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाण्याच्या टंचाईमुळे ऊसाचं पीक डोळ्यादेखत जळून खाक झालं आहे. वेळेवर कालव्याव्दारे वेळेवर पाणी न मिळाल्याने विहिरींनी तळ गाठला असून पाण्याअभावी पिके करपून गेलीय. यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. हेमंत चापुडे यांनी याचाच आढावा घेतला.0
0
Report
तूफान में सौर ऊर्जे वाले हाईमैक्स लाइट डगमग, दुर्घटना की आशंका
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरची शहरात बसवलेले सौरऊर्जेवरील हाय मॅक्स लाईट वादळामुळे पडून अपघात होण्याची भीती आहे शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन जवळ असलेला हाय मॅक्स लाईटच्या सौर ऊर्जा प्लेट रात्री वादळामुळे हेलकावे घेताना पाहायला मिळाल्या. शहरातील मुख्य चौकांमध्ये असे सौर ऊर्जेवरील हाय मॅक्स बसवण्यात आले आहेत. रधारीच्या ठिकाणी बसवलेल्या हायमॅक्स लाईट वादळाने खाली कोसळल्या तर दुर्घटना घडण्याची देखील शक्यता आहे. गेल्या तीन दिवसापासून वादळ वाऱ्यासह पाऊस पडत आहे रात्री सहा वाजेच्या सुमारास सुटलेल्या वादळ वाऱ्यात अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या आणि शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला अशातच महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात लावण्यात आलेले सौर ऊर्जेवरील हाय मॅक्स लाईट व्यवस्थित न बसवल्याने वाऱ्यामध्ये हेलकावे खाताना पाहायला मिळाले हे सौर ऊर्जेवरील हाय मॅच लाईट वरदळीच्या चौकातच असल्याने खाली पडल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे महानगरपालिकेकडून अशा सौर उर्जेवर बसवलेल्या हाय मॅक्स ची पाहणी करून दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे0
0
Report
Advertisement
यवतमाल में ट्रक ने साइकिल सवार को कुचला; सड़क सुरक्षा पर सवाल
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर एका भरधाव ट्रकने सायकल स्वारास चिरडले. रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुरीचे पोते घेऊन जाणारा ट्रक सायकल स्वार व्यक्तीच्या अंगावरून गेल्याने रस्ता रक्ता मासाने माखला होता. यवतमाळचा व्हीआयपी रोड म्हणून या परिसराची ओळख आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची निवासस्थाने व शासकीय कार्यालये या ठिकाणी असताना जड वाहतुकीने सायकल स्वाराचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अपघातस्थळी असलेले हाय मास्ट व रस्ता दुभाजकावरील लाईट बंद होते. शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही देखील नसल्याचे निदर्शनास आले.0
0
Report
गडचिरोली के लिए गोसे खुर्द डैम से 40 क्यूसेक पानी जारी, प्यास बुझाने तैयारी
Bhandara, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवणार भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द धरण. गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी सोडण्यात आले गोसे खुर्द धरणाचे पाणी. विदर्भात उन्हाचा कडाखा वाढलेला असून अनेक जिह्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आरमोरी व गडचिरोलीच्या भागांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाण्याची अडचण होती ही बाब लक्षात घेत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने गोसे खुर्द धरण प्रकल्पाला पाण्याची मागणी केली होत. या आधारे आज प्रकल्पातून 40 क्यूसेक पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याची तहान भागणार आहे.0
0
Report
महाराष्ट्र की जिल्हा परिषदों के ऑनलाइन पेमेन्ट ठप, मैन्युअल लेनदेन से काम चले
Chendhare, Maharashtra:राज्यातील जिल्हा परिषदांचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणे अडचणीचे झाले आहे. मंत्रालय स्तरावरून एक सेवा पुरवठादार कंपनी आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात करार झाला होता. त्यानुसार ही कंपनी मागील चार वर्षांपासून सॉफ्टवेअर सेवा पुरवत होती. परंतु महाराष्ट्र बँक आणि या कंपनीतील वादामुळे कंपनीने 31 मार्चपासून आपली सेवा बंद केली. त्यामुळे जिल्हा परिषदांना मॅन्युअली व्यवहार करावे लागत आहेत. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गैरसोयीची ठरत आहे. जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती, ग्राम पंचायतींना मिळणारा विकास निधी विलंबाने जात आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली के सेनगाव में बैल कुएं में गिरी, गाँव वालों ने क्रेन से बचाया
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घोरदरी परिसरात शेतात पेरणीपूर्व मशागत करत असताना अचानक बैल कुएं मध्ये गिरी, गावकाठमण्या तात्काळ विहिरीत उतरून बैलांना गाडी पासून वेगळे करत क्रेनच्या साह्याने दोन्ही बैलांना सुखरूप बाहेर काढले आहे या अपघातात बैल जखमी झाले आहेत यात कोणतीही जीवित हानी झाली नाहीये गावकऱ्यांनी धाडसाने विहिरीमध्ये उतरत दोन बैलांचे प्राण वाचवले आहेत0
0
Report
अनिकेत तटकरे के भाषण का वीडियो वायरल: उमेदवारी के बीच उठे सवाल
Karjat, Maharashtra:अनिकेत तटकरे yanchya bhashanachā video samor ... mhajyā vāṭhyālā jē yēil tē Sudhākār Ghārē yānnā deīna ... Aniket Tatkare yānnaṁ aamadārkī chi umēdavārī milānyānantar video charchā ... Kārajat̄hē kāryakarta sandaτav melāvāyatlaḥ hā video āhe. yāyā madhyē mājhyā vāṭhyālā jē mē rozhe tē mūdhō ṭhānārā sudhākār ghārē yānnā deīna hēṁ aniket tatkare mhāḷālē hōtē ... āva Aniket Tatkare yānnaṁ salaga dusryānda Vidhan Parishadchi umēdavārī milānyānte hā video charchācha viṣay tharlay. Ḍarimānya, yā vaktavyānantarīha svataḥ Aniket Tatkare yēnārāṁ salaga dusryānda Vidhan Parishad chi umēdavārī svīkāralyāne t̄hyāñā bhūmikāvar praśna chinha prastut kelā jātā āhe. Sudhākār Ghārē hē rāṣṭrādvāc sāvhāṅkṛṣhś nāmachē Raīgāḍ jillhāḍhāyā āhe; vidhān sabhā nivhaḷaṇa t̄ēṅnā hyāṁtāṁ thōḍhada parābhava jhālō. Sound Bite - Aniket Tatkare0
0
Report
रायगढ़ किले पर शिवराज्याभिषेक की तैयारी चरम पर, राज दरबार सजे
Chendhare, Maharashtra:स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्य कार्यक्रम असणाऱ्या राज दरबारात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पर्यटक, शिवप्रेमींच्या सुविधेसाठी होळीचा माळ, बाजार पेठ आदी ठिकाणी देखील छोटे छोटे मंडप उभारण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त साऊंड, लाईट आणि सिसीटीव्हीची देखील उभारणी किल्ले रायगडावर केली जात आहे.0
0
Report
Advertisement
आमदार दळवी: कोकणमध्ये शेकापाचा अंत, राष्ट्रवादी काँग्रेसही समाप्त होऊ शकत होती
Chendhare, Maharashtra:तर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचाही end झाला असता ..... आमदार महेंद्र दळवी यांचा दावा ........ शेकाप संपवला तसाच राष्ट्रवादी काँग्रेसही संपली असती ....... सुनील तटकरे यांनी अनेकदा फसवलं ....... जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते बोलत होते. शेकापचा उपद्व्याप वाढला होता परंतु जिल्हा परिषदेत त्यांची एकही जागा येऊ दिली नाही, तसंच सुनील तटकरे यांचाही आम्हाला त्रास झालाय त्यांनी अनेकदा आम्हाला फसवले आहे, असं दळवी म्हणाले.0
0
Report
श्रीकांत शिंदे ने विधानसभा चुनाव पर बयान: विकास को प्राथमिकता, ठाणे-नाशिक में उम्मीद
Kalyan, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीवर खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया मला अपेक्षा आहे की सर्वे उमेदवार डेव्हलपमेंट ला prाधान्य देतील .. सर्व जागा कशा बिनविरोध घेतील हे सगळ्यांना माहिती आहे नाशिक आणि ठाणे या ठिकाणच्या जागा शिंदे साहेबांवरती आणि सरकार वरती विश्वास असल्याने या ठिकाणी सकारात्मक निर्णय येऊ शकतो डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरामध्ये पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमात उपस्थित दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले वक्तव्य बाईट... श्रीकांत शिंदे खासदार0
0
Report
भाजपा के चार पूर्व नगरसेवक शिवसेना में प्रवेश, डोंबिवली राजनीति तेज
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले. केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपले नशीब आजमावले होते. या पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील सेनेची राजकीय ताकद वाढणार आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में मानसूनपूर्व तेज बारिश से गर्मी में राहत मिली
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
नाशिक में महायुती उम्मीदवारों के बीच बगावत, सामंत ने अर्ज वापस लेने का दावा किया
Nashik, Maharashtra:विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये महायुतीत बंडखोरी होताना पाहायला मिळत आहे... या बंडखोरीला आळा घालण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या 24 तासांपासून नाशकात तळ ठोकून आहे.... सकाळपासूनच उदय सामंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उमेदवारी करणाऱ्या महायутиच्या उमेदवारांची भेट घेतली आहे... याबाबत बोलताना उदय सामंत यांनी तीन वाजेपर्यंत हे सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केलाय... उद्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे या अनुषंगाने उदय सामंत हे नाशकात आहेत... गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय... याबाबत देखील गिरीश महाजन आणि बोलणं झालं असून याबद्दल योग्य तो निर्णय होणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय...महायुतीमध्ये सगळ्या ठिकाणी अलबेल सुरू असून महायुतीमध्ये मध्ये कुठल्या प्रकारची नाराजी नाही असे देखील सामंत म्हणालयेत.. उद्या तीन वाजेपर्यंत पॉझिटिव्ह असा रिझल्ट असेल असं उद्या सामंत म्हणालय0
0
Report
पुणे- अहिल्यानगर महामार्ग पर भारी पावस से यातायात जाम
Shirur, Maharashtra:कारेगावात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहनांच्या गतीला ब्रेक लागला. काही काळ वाहतूक संथ झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या या पावसाने मात्र महामार्गावरील वाहतुकीची कोंडी वाढवली.0
0
Report
Advertisement
