445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उद्धव ठाकरे की शिवसेना से छह सांसद शिंदे गुट में शामिल; कार्यालय पर पुलिस तैनाती
Washim, Maharashtra:वाशिम: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. खासदार देशमुख हे उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करणार असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडवून आणू नये यासाठी खबरदारी म्हणून खासदार देशमुखांच्या वाशिम येथील कार्यालयात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यालयातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले असून बॅनर सुद्धा उतरवण्यात आले आहेत.0
0
Report
उद्धव ठाकरे की कार्यपद्धति पर सांसद नाराज़, अशोक चव्हाण का बड़ा बयान
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही खासदार नाराज.. काही खासदार वेगळा मार्ग स्वीकारणार असल्याचा अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया... उद्धव ठाकरे पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. नेमकं काय घडतंय हे मला माहिती नाही, पण काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे काही खासदार उद्धव ठाकरे यांच्यापासून विभक्त होत असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.0
0
Report
शिर्डी के सांसद वाकचौरे के निवासस्थल पर सुरक्षा कड़ी, चार पुलिस अधिकारी तैनात
Shirdi, Maharashtra:शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त. खा.वाकचौरे यांच्या निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून चार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात. शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्यानं शिर्डी पोलिसांकडून खबरदारी. खा.वाकचौरे यांच्या साई अर्पण या शिर्डीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही वाकचौरे यांना फिरू देणार नाही असा दिलाय ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांनी इशारा. शिवसैनिकांच्या इशाऱ्यानंतर खासदार वाकचौरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात.0
0
Report
Advertisement
नाशिक: 18 जून को विधान परिषद चुनाव, तहसील कार्यालय मतदान केंद्र 5 पर 88 नगरसेवक मतदान
Yeola, Maharashtra:अँकर : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या 18 जून रोजी मतदान होत असून यावेळी येवला तहसील कार्यालयात मतदान केंद्र क्रमांक पाच असून या ठिकाणी येवला, मनमाड व नांदगाव येथील 88 नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. याच मतदानाची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा होम राऊंड असलेल्या या मतदान केंद्रावर सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...0
0
Report
उद्धव ठाकरे के समर्थकों में मतभेद, चव्हाण ने किया बड़ा बयान
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही खासदार नाराज.. काही खासदार वेगळा मार्ग स्वीकारणार असल्याचा अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया... उद्धव ठाकरे पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. "नेमकं काय घडतंय हे मला माहिती नाही, पण काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे काही खासदार उद्धव ठाकरेपासून विभक्त होत असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे." खासदार अशोक चव्हाण0
0
Report
रोहा तालुक़े के डामरीकरण में देरी: ग्रामवासियों ने रास्ता रोको, अधिकारियों पर दबाव
Chendhare, Maharashtra:रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईने ग्रामस्थ हैराण, ग्रामस्थांचा संताप उतरला रस्त्यावर रास्ता रोको करून अधिकाऱ्यांना घेराव. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. द Chanera-Birwadi, Gayachoḷvāḍi ते ṭāmbḍi savāṇe मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामातील दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रस्त्याचे खोदकाम करून अनेक ठिकाणी काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून अपघाताचा धोका वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी सीट पर वाकचौरे के विरोध की आग, ठाकरे गट आक्रामक
Shirdi, Maharashtra:शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात राजकारण पेटलं आहे… ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक… संगमनेरमध्ये वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली… “गद्दारी सहन नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला… स्वतःर गटाच्या चर्चेत नाव समोर येताच कार्यकर्त्यांचा संताप उफाळलावाकचौरे यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा… शिर्डी मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं…0
0
Report
चव्हाण का आरोप—मोदी विपक्ष फोड़ने के लिए चला राजनीति खेल
Satara, Maharashtra:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार डी लिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. देशात एकाच व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीकाही त्यांनी केली. बाईट : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण “लोटस, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावं माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव ठाकरे गटात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे पक्षात फूट पडलेली दिसत आहे. नरेंद्र मोदी डी लिमिटेशन विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आरक्षणाच्या नावाखाळ्या देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात एका व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू असून लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे. एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यात राजकारण करणं कठीण झाले आहे. तुम्ही पक्षात आलात तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असं भ्रष्ट राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारचं एकमेव उद्दिष्ट सत्ता मिळवणं हेच आहे.0
0
Report
कामोठे में महावितरण ने चार दिनों में ट्रांसफॉर्मर लगाकर बिजली बहाल कर दी
Navi Mumbai, Maharashtra:Navi Mumbai: Anchor - पनवेल महानगर पालिका हददीतील कामोठे, कलंबोली, खांदा कॉलनी येथे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये पाऊसामुळे उष्णता वाढल्याने वीजपुरवठा ताणला होता. कामोठे येथे 40 MVA चा ट्रांसफॉर्मर होता जो अपुरा पडत होता. नागरिकांचा मागणीनुसार महावितरणने युद्धपातळीवर तत्काळ उपाययोजना केल्या आणि चार दिवसांत 5 MVA चा ट्रांसफॉर्मर बसवून ग्राहकांना दिलासा दिला. कलंबोली येथे देखील विद्युत वहिनीचा लोड नियंत्रित करत असून LT केबल दुरुस्त केली जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महावितरण अधिकारी यांनीही ही माहिती दिली.0
0
Report
Advertisement
headline
Sangli, Maharashtra:संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरे व त्यांच्याच पक्षाचा जास्त नुकसान होतं, अशी खोडकर टीका पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे, उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे, यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका करत शिवराळ भाषादेखील वापरली आहे, यावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीका करताना गुहाटी वेळी, वाटेल ते आरोप व टीका आम्हावर केली, पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 40 ते 60 झालो, पण शिवसेना उभाठा रसातळाला गेली, त्यामुळे जेवढी शिवराळ भाषा संजय राऊत करणार आहेत, तेवढे उद्धव ठाकरे सेनेचे, नुकसान करणार आहेत, असे देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केल्या ते सांगलीच्या विटा येथे बोलत होते.0
0
Report
स्कूल पोषण आहार के विरोध में महिला ने आत्मदहन का प्रयास
Nashik, Maharashtra:- शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने केला आत्मदहनचा प्रयत्न.. - विष प्राशन करून केला शिक्षण विभागाचा निषेध... - संगिता सोनवणे असे विष प्राशन केलेल्या महिलेचे नाव - कोणतेही कारण नसतांना कामावरून महिलांना कमी केल्याच्या निषेधार्थ केले विष प्राशन - महिलेची प्रकृती खालावल्याने केले मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल.. - नांदगांव नगर पालिकेच्या मालकीच्या असलेल्या शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचे कारण नसतांना चूक नसताना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगांव येथील शिवकण्या सौ संगिता सोनवणे यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आज शिवस्फूर्ती मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज सर्व महिला जमा झाल्या मात्र संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाने त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली याशिवाय महिलांना आमच्या हातात काही नाही आम्ही आता चौकशी समिती नेमु मग निर्णय घेऊ असे उत्तर दिले मात्र संतापलेल्या संगिता सोनवणे यांनी विष प्राशन केले यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने महिला कर्मचारी व पोलिसांनी त्यांना तात्काळ पोलिस गाडीत टाकून शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने त्याना तात्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले पोलिस आणि प्राशकीय यंत्रणा केवळ मजाक घेण्याचे काम करत असल्याचा आरोप महिलांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व सबंधित विभागाला पत्र देऊनही या महिलांचा कोणीही विचार केला नाही याचा देखील महिलांनी निषेध केला. - बाईट: 2 महिला0
0
Report
मिसिंग लिंक ब्रिज पर तीन गाड़ियों का हादसा, जान-माल की सुरक्षा
Khopoli, Maharashtra:मिसिंग लिंकच्या व्हॅली ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या वाहनांची एकमेकांना धडक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकच्या पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रिजवरील तीन वाहनांचा अपघात समोर आला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. फॉर्च्युनर कारचे चालकांनी अचानक ब्रेक दाबून तिसऱ्या लेनमध्ये गाडी थांबवली. यामुळे मागून येणाऱ्या व्हेर्ना कारने फॉर्च्युनरला धडक दिली. व्हेर्नाच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारनेही पुढच्या वाहनाला धडक दिली, ज्यामुळे तीन वाहनांचा चेन-लिंक परिसरात अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व एम.एस.आर.डी.सी. कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. नंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली.0
0
Report
Advertisement
फ्लॅश: सांसद संजय दिना पाटील के आवास पर तीन पूर्व उपायुक्त दाखिल, सुरक्षा चेकिंग
Mumbai, Maharashtra:फ्लॅश : खासदार संजय दिना पाटील यांच्या घरी पूर्व तीन चे उपायुक्त अभयसिंग देशमुख दाखल, सुरक्षेची केली पाहणी, संजय पाटील यांचे घर आणि कार्यालय चा परिसराची उपायुक्तांकडून पाहणी दक्षतेचे उपाय म्हणून उपायुक्त स्वतः संजय पाटलांचा घरी दाखल0
0
Report
वाशिम केनवड पेट्रोल पंप चोर CCTV में कैद: 200-300 लीटर पेट्रोल गिरे
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वWashिमच्या केनवड मध्ये साईजी पेट्रोल पंपावर एका पठ्ठ्यान चक्क रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावर कर्मचारी झोपलेले असताना स्वतःच्या हाताने पेट्रोल पंपाची मशीन चालू करून पेट्रोल चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.यावेळी पंपावर नोझल बंद न करता आल्यामुळे 200 ते 300 लिटर पेट्रोल खाली सांडले आहे. संबंधित पेट्रोल चोरट्याची शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.0
0
Report
नवी मुंबई नगरपालिका पानी बचत के लिए कठोर उपाय करेगा; 175 लीटर पानी प्रति व्यक्ति मिलेगा
Navi Mumbai, Maharashtra:story Slug -: नवी मुंबई मनपातर्फे पाणी बचतीसाठी विविध सक्त उपाययोजना. ftp slug - nm water cut shots- नवी मुंबई यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने नवी मुंबई मनपातर्फे पाणी बचतसाठी विविध सक्त उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. कार वॉशिंग सेंटर, तरणतलाव, बांधकाम, पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लांट यांना पिण्याचे पाणी देणे पूर्णतः बंद करण्यात आलेय. व्यवसायिक आणि वाणिज्य आस्थापनांची 20% पाणी कपात तर आजपासून 220 ऐवजी प्रतिमाणसी 175 लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच 100 विहिरी साफ करुन कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यासोबतच उद्याने, मोकळ्या जागा, ट्रीबेल्ट, रस्ता दुभाजक यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करुन त्याठिकाणी टँकरद्वारे प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांनी नवी मुंबईकरांना पाणी बचतीचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्यांना प्रथम दंड आणि वारंवार सापडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. बाईट -: कैलास शिंदे (नवी मुंबई मनपा आयुक्त)0
0
Report
Advertisement
