icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

धामणगाव में पुलिस ने 18 लाख के हरभरे के साथ 5 आरोपी पकड़े

Buldhana, Maharashtra:बुलढाणा धामणगाव बढे पोलिसांची मोठी कारवाई; 18.91 लाखांचा हरभरा व ट्रकसह 5 आरोपी ताब्यात. धामणगावबढे हद्दीतील लालमाती परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या 270 क्विंटल हरभऱ्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ट्रकसह 118.35 क्विंटल हरभरा आणि 3 लाखांची रोख रक्कम असा एकूण 18 लाख 91 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मलकापूर येथील 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींनी हरभरा बाजार समितीत न नेता दुसरीकडे नेऊन अपहार केल्याची तक्रार दाखल होती. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करत आहेत....
0
0
Report

सांगली नगरपालिका पूंजी मूल्य आधारित घरपट्टी नोटिस जारी करने की शुरुआत हुई

Sangli, Maharashtra:स्लग - सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य कर आधारित घरपट्टीच्या सहा हजार नोटिसांचे वाटप,दोन लाख नोटिसा पाठवल्या जाणार... अँकर - सांगली महापालिकडून भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकरण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. अंतर्गत पहिला टप्प्यातील सहा हजार मोठी संच वाटप महापालिका प्रशासन कडून करण्यात आला आहे.येत्या महिन्याभरात पलिका क्षेत्रातील दोन लाख सहा हजार मालमत्तेधारकांना घरपट्टटी कराच्या नोटीसा दिल्या जाणार आहेत,या नोटिसांवर हरकतीसाठी 21 दिवसांची मुदत असणार आहे.वाढीव घरपट्टी कर वसुलीवरून वाद निर्माण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी घरपट्टी वसुलीला स्थगिती दिली होती,मात्र आता पालिकेकडुन नव्याने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी कर प्रणाली लागू केली जाणार आहे,मात्र यालाही विरोध सुरू झाला आहे.
0
0
Report

वाशीम में सात दिनों से पेट्रोल-डिज़ेल तुटवड़ा, किसान और वाहनधारकों को भारी परेशानी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात सलग सातव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल तुटवडा कायम असून शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर कॅन आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाशीम शहरातील अकोला नाका परिसरातील छाबडा पेट्रोल पंपावर मध्यरात्री डिझेलचा टँकर पोहोचताच मोठी गर्दी झाली. तांत्रिक कारणामुळे वितरणाला उशीर झाल्याने नागरिकांना पहाटेपर्यंत थांबावे लागले. तर जाधव पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शेतकरी सकाळी चारपासूनच रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्याचे खरीप पेरणीपूर्व मशागती चे काम सुरू असल्याने शासनाने ही इंधन टूट दूर करून डिझेल पेट्रोल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी व वाहनधारकाकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

बुलढाणा में डीज़ल टंचाई से वाहनधारक परेशान, पेट्रोल पंपों पर 2 किमी तक कतारें

Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात डिझेलसाठी वाहन धारक त्रस्त, पेट्रोल पंपांवर रात्रभर वाहनांच्या किलोमीटरच्या रांगा आरटीओ कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियम पंपावर डिझेलसाठी २ किमीपर्यंत वाहनांची गर्दी अँकर जिल्ह्यात डिझेल टंचाई अधिक तीव्र होत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुलढाणा शहरातील आरटीओ कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियम पंपावर डिझेल भरण्यासाठी रात्रभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. डिझेल मिळत नसल्याने ट्रक, ट्रॅक्टर, कार तसेच इतर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक त्रस्त झाले आहेत. अनेक वाहनधारकांनी रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर ठाण मांडले असून तब्बल २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या इंधन टंचाईमुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report

जुनर के टमाटर किसानों की बेबसी: कीमत सिर्फ 20–25 रुपये प्रति किग्रा

Barav, Maharashtra:एकीकडे कडकडणारं ऊन... दुसरीकडे इंधनाचे भडकलेले दर... आणि त्यातच बाजारभावा अभावी टोमॅटो उत्पादक शेतकरी पार कोलमडून गेलाय. वाढत्या तापमानामुळे टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, ज्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झालीये. त्यात भर म्हणून डिझेलच्या दरांचा भडका उडाल्याने वाहतूक खर्च आवाक्याबाहेर गेलाय. एवढं सगळं सोसून शेतकरी जेव्हा बाजारात जातोय, तेव्हा टोमॅटोला अवघा २० ते २५ रुपये किलोचा भाव मिळतोय. खर्चही निघत नसल्याने बळीराजा पुरता संकटात सापडलाय. या नारायणगाव बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

लातूर में सीबीआई ने बालरोग डॉक्टर मनोज शिरूरे को गिरफ्तार किया

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासाला आता मोठे वळण मिळाले आहे. मूळ औसा तालुक्यातील आणि गेल्या दोन दशकांपासून बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मनोज शिरूरे यांना दोन्ही दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयने पुण्यात अटक केली आहे. लातूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयचे पथक ठाण मांडून असून विविध ठिकाणी झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. डॉ. शिरूरे यांच्या आर्थिक व्यवहारांची, कथित लागेबांध्यांची आणि संभाव्य लाभार्थ्यांची माहिती तपास यंत्रणा शोधत आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली असून त्यांच्या जवळच्या नात्यातील एका डॉक्टरच्या घरावरही सीबीआयने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.
0
0
Report
Advertisement

कांदा-धान्य लिलाव में हिस्सा नहीं लेने से किसान संकट गहरा

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव बाजार समितीच्या व्यापारी असोसिएशनने सोमवार पासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिल्याने आता कांदा उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात सापडल्याने चिंताग्रस्त झालाय इंधन तुटवड्यामुळे नाशिक जिल्ह्यात राज्यात तसेच राज्यांमध्ये डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीमाल पाठवण्यासाठी ट्रक मिळत नसल्यामुळे हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचे या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे या अगोदर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणाम मुळे कांद्याची निर्यात ठप्प झाले आहे तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून कांदा जात नसल्यामुळे कांद्याचे बाजार समितीमध्ये सरासरी बाजार भाव सहा ते दहा रुपयांपर्यंत खाली आले आहे तर उष्णतेची लाट आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असल्याने आर्थिक अडचणीत कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला असताना आता या पत्रामुळे या कांद्याचे करावे काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय
0
0
Report

रत्नागिरी-नागपूर महामार्ग पर भीषण दुर्घटना, रिक्षाचालक अम्बा घाट में गंभीर घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरचा रिक्षाचालक आंबा घाटात गंभीर जखमी.. अँकर रत्नागिरीच्या आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आज पहाटे ४ ते ५ च्या sुमारास एक भीषण अपघात घडला.. कोल्हापूरहून पेढ्यांचे बॉक्स घेऊन गणपतीपुळे येथे चाललेल्या एका रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचालक सुरेश शामराव साळोखे (वय ६६, रा. कोल्हापूर) हे थेट रिक्षाखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस चौकीच्या पथकाने तातडीने धाव घेत स्थानिक लोकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढले. जखमी चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. साखरपा पोलीस सध्या या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

लोणंद बकरी ईद बाजार में रिकॉर्ड कारोबार, बकरों की कीमतें लाखों तक पहुंचीं

Satara, Maharashtra:सातारा - बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद बाजार समितीच्या आवारात भरलेला बोकड-बकरी बाजार यंदा रेकॉर्डब्रेक ठरला. पहाटेपासूनच बाजारात मोठी गर्दी झाली असून परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. कर्नाटक, गोवा, कोकणासह सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी भागांतून हजारो खरेदीदार बाजारात दाखल झाले होते. बोकड-बकरींचे दर सरासरी १५ हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गेले. काही बोकडांना लाखोंचा भाव मिळाल्याने बाजारात मोठी चर्चा रंगली. बाजारात पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात सेस जमा होणार असल्याची माहिती सचिव अमोड शेळके यांनी दिली. सभापती सुनील शेळके-पाटील यांनीही यंदाचा बाजार विक्रमी ठरल्याचे सांगितले.
0
0
Report

AJ Furniture Mall गोलीबारी: लॉरेंस बिश्नोई गैंग से जुड़े तीन गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड़ के AJ Furniture Mall गोलीबारी मामले में पिंपरी-चिंचवड़ पुलिस को बड़ी सफलता मिली है। इस मामले में लॉरेन्स बिष्णोई गैंग से संबंधित तीन आरोपियों को उत्तराखंड के हरिद्वार से गिरफ्तार किया गया है। गिरफ्तार आरोपियों में 22 वर्षीय परमीन रामनिवास, 21 वर्षीय पंकज कुलदीप और 21 वर्षीय सागर अजयपाल शामिल हैं, सभी हरियाणा के निवासी हैं। न्यायालय ने उन्हें 28 मई तक पुलिस कस्टडी में रखने के आदेश दिए हैं। 15 मई की रात करीब 9.15 बजे दो बाइक सवारों ने AJ Furniture Mall के सामने अंधाधुंध 5–6 गोलियां चलाईं, जिससे मॉल की खिड़कियाँ और signs नुकसान हुए, लेकिन किसी जीवित घटना नहीं हुई। घटना के बाद क्षेत्र में दहशत फैल गई थी। आगे की जांच के दौरान लगभग 400 सीसीटीवी फुटेज का विश्लेषण किया गया। आरोपी जिस लॉज में ठहरे थे, वहां से पुलिस को अहम सुराग मिले। हरियाणा और उत्तराखंड में चार दिनों की विशेष मुहिम चलाकर आरोपियों को गिरफ्तार किया गया। प्रारम्भिक जांच में यह सामने आया है कि इस प्रकरण के पीछे 2 करोड़ रुपये की रंगदारी का विवाद था। मॉल के मालिक जगदीश बिष्णोई और उनके पार्टनर अशोक बिष्णोई को अंतरराष्ट्रीय नंबरों से धमकी भरे कॉल आए थे; पैसे न देने पर यह हमला किया गया, ऐसा पुलिस का कहना है। همچنین जांच में सिद्धू मुसेवाले हत्याकांड से जुड़े कुलदीप उर्फ Kashish ने जेल से सोशल मीडिया के जरिए हमला कराने के निर्देश दिए थे, जबकि शुभम लोणकर और आरझू बिष्णोई के नाम भी सामने आए हैं। बाइट - शशिकांत महावरकर, सहायक पुलिस आयुक्त
0
0
Report
Advertisement

पूर्णा में अवैध बालू खनन: पुलिस ने दो मशीन और पांच नाव जब्त किए

Parbhani, Maharashtra:पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव परिसरात पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पूर्णा पोलिसांनी कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या दोन मशीन पाच बोटी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव परिसरात असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार पोलिसाच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी धाड टाकत दोन मशीन पाच बोटी जप्त करत कारवाई करण्यात आली आहे
0
0
Report

सोलापुर में आज सुबह हल्की बारिश से गर्मी के उहे से मिली राहत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुर शहरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी, 40.9° से. इतक्या कडक उन्हापासून सोलापूरकरांना काहीसा दिलासा - सोलापुर शहरातील अनेक भागात आज सकाळी हलक्या पावसाची हजेरी - कालच्या 40.9° से. तापमानानंतर सोलापूरकरांना काहीसा दिलासा - हवामान विभागाचा आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज - तब्बल 43 दिवसानंतर पहिल्यांदाच शहराचे कमाल तापमान 38.6 ° से ने खाली आले होते - मात्र हा सुखद दिलासा अवघ्या एका दिवसापुरता राहिला पुन्हा दुसऱ्या दिवशी 2.3 अंशांनी तापमानात वाढ - आज सकाळी सात वाजल्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र गारवा
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top