445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पन्हाळगड के सदोबा दरगाह पर अतिक्रमण हटाने के लिए प्रशासन का विशेष अभियान
Kolhapur, Maharashtra:Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील सादोबा दर्गा परिसरातील उर्वरित अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन उद्या सकाळपासून विशेष मोहीम राबविणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने रविवारपर्यंत पन्हाळगड परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. प्रशासनाने यापूर्वी हजरत पीर शहादुद्दीन खतालवल्ली पन्हाळा ट्रस्टला अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. नोटिसीनंतर ट्रस्टने स्वच्छतागृह आणि पत्र्याचे शेड स्वतः हटविले होते. मात्र, तलाव परिसरातील उर्वरित प्रार्थनास्थळ कायदेशीर असल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी या बांधकामावर आक्षेप घेत तो भाग बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर आता उर्वरित बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, वीकेंडमुळे पन्हाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रविवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.0
0
Report
नागपुर के जुड़वां बहन-भाई ने दहावी में सेम टू सेम 97.8% हासिल किया
Nagpur, Maharashtra:दहावीच्या निकालात नागपूरातल्या जुळ्या बहिण भावाने मिळवलेलं सेम टू सेम यश सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.... रामदासपेठ सोमलवार हायस्कूलचे विद्यार्थी खिलज व ख़ुशी चांदेवार या जुळ्या बहिण-भावांनी दहावीच्या परीक्षेत अगदी सारखे म्हणजे 97.8टक्के गुण मिळवलेय... पाचव्या वर्गापासूनच दोघेही बहिण भावांमध्ये अभ्यासाची चांगलीच चुरस आहे... यापूर्वीच्या परीक्षांमध्ये एक दोन मार्कांनी ते मागे पुढे राहणारे हे दोघेही बहिण भावानी दहावीत मात्र सेम टू सेम मार्क मिळवत वेगळाच योगायोग साधला आहे... या जुळ्या बहिण भावांशी व त्यांच्या आई व शिक्षक वर्गशिक्षिकेशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
जालना में नवरदेव के बूट पळवाने पर वर-वधू में हंगामा, पुलिस मामला दर्ज
Jalna, Maharashtra:जालना : नवरदेवाचा बूट पळवण्यावरून वधू आणि वर पक्षात राडा झाला. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नांदी गावात लग्नात नवरदेवाचा बूट पळवल्याची परंपरा असल्याची माहिती दिली जाते; परंतु या वेळी नवरदेवाच्या भावाने नवरीच्या बूटही पळवले आणि वाद वाढला. दोन्ही गटात शाब्दिक चकमकनंतर तुंबळ राडा झाला; महिलादेखील जखमी झाल्या. या घटनेत दागिने चोरीचा आरोपही चर्चाात आला. पोलिस तपास करत आहेत आणि अटकाची तयारी दर्शविली.0
0
Report
Advertisement
वाशीम के दो खंभों के विरोध ने करोड़ों का बिजली उपकेंद्र प्रोजेक्ट रोक दिया
Washim, Maharashtra:वाशीम के मंगरुळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे उभारण्यात आलेले नवीन वीज उपकेंद्र केवळ दोन वीज खांबांच्या अडचणीमुळे रखडले आहे. ३३केव्ही वीजवाहिनी जोडणीसाठी आवश्यक खांब उभारणीला एका शेतकऱ्याचा विरोध असल्याने प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. शेलूबाजार उपकेंद्रावरील ताण कमी करून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांना अनियमित व कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा फटका बसत असून सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत. बहुतेक काम पूर्ण असूनही केवळ दोन खांबांमुळे कोट्यवर्धक रुपयांचा प्रकल्प ठप्प आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सांगितले आहे.0
0
Report
लातूर विभागीय शिक्षण मंडळ का दहावी परिणाम 88.42%, लड़कियों ने फिर मारी बाजी
Latur, Maharashtra:इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा एकूण निकाल ८८ पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. लातूर मंडळांतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांपैकी लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२ पूर्णांक ८० टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्याचा ९१ पूर्णांक २९ टक्के, तर नांदेड जिल्ह्याचा ८३ पूर्णांक ६२ टक्के निकाल लागला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा लातूर मंडळाच्या निकालात जवळपास २ पूर्णांक ३० टक्क्यांची घसरण झाली आहे.0
0
Report
बीड़ भूसंपादन घोटाले: अविनाश पाठक की गिरफ्तारी से हड़कंप
Beed, Maharashtra:पोलिसांच्या तावडीत असलेल्या या व्यक्तीचा हा चेहरा नीट निरखून पहा... व्हिडिओतील हा अधिकारी कदाचित तुमच्या ओळखीचा असेल.. एकेकाळी बीड जिल्ह्याचा कारभार हाताळणारे, अधिकाराच्या खुर्चीतून संपूर्ण यंत्रणा चालवणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आजच नामाच्या आधारावर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपात गैरव्यवहार झाल्याचा संशय नव्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला आणि प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एसआयटी स्थापन झाली आणि तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. अखेर अधिकाराच्या शिखरावर पोहोचलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला काल लातूर येथील निवासस्थानातून पोलिसांनी अटक केली या घटनेमुळे सबंध राज्यभरात एकच खळबळ उडाली.. तत्पश्चात नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले विवेक जॉन्सन यांना भूसंपादनातील घोटाळ्याची फाईल हाती लागली. त्यांनी याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या बनावट सयाच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मावेजात मोठा घोटाळा झाल्याचे लक्षात आणले आणि त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे देखील योगदान असल्याचा दावा करण्यात आला. आता एसआयटीच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे... भूसंपादनाच्या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार, बनावट स्वाक्षऱ्या, तसेच जमिनींच्या मोबदल्याच्या रकमेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय... तर भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक हाच आरोपी झाल्याने आता त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मनसेनी केलीय. काही प्रकरणांमध्ये मूळ शेतकऱ्यांना कमी रक्कम देऊन इतरांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा मावेजा वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागत आहे... दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेनंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय... राज्यभरातील विविध महामार्ग भूसंपादन प्रकरणांकडे आता संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असून, अनेक जिल्ह्यांतील जुन्या फाईल्सची पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे..0
0
Report
Advertisement
नाशिक धर्मांतरण मामले में निदा खान को मदद, इम्तियाज जलील की भूमिका प्रमुख
Sangli, Maharashtra:नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणी अटक केलेल्या निदा खान हिला मदत करण्यात इम्तियाज जालील यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.निदा खान ही संभाजीनगर मध्ये सापडणं यामागे खूप मोठे षडयंत्र असून याप्रकरणी इमत्याज जलिल व एमआयएम नगरसेवकाची,पोलिसांनी चौकशी करावी,अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे,ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते.0
0
Report
बीएमसी प्रमुख अस्पतालों के हाउसकीपिंग टेंडर में 45 करोड़ रुपये के घोटाले का आरोप
Mumbai, Maharashtra:बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयांतील हाऊसकीपिंग टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रमुख महापालिका रुग्णालयांतील हाऊसकीपिंग कंत्राटांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बीएमसीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून, निविदा प्रक्रियेत संगनमत करून फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजуриसाठी ठेवला जाणार आहे. अंदाजित खर्चापेक्षा २०% पेक्षा कमी दराने कोट करण्यात आले आहे. आमदार कोटेचा यांनी असाही दावा केला की, कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च शून्य दाखवून कामगारांच्या आरोग्याशी तडजोड केली असून कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. तसेच, कंत्राटदाराने स्थायी समितीची मंजুরি मिळण्यापूर्वीच KEM रुग्णालयात शेकडो कामगार तैनात केल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईचा महापौर भाजपचा असताना भाजप आमदारानेच स्वतः च्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.0
0
Report
कान बहरेपन के बावजूद शांभवी पंचबुद्धे ने दहावी में 94.2% हासिल किया
Nagpur, Maharashtra:नागपूराच्या शांभवी पंचब्ध्दे या 100% ऐकू न येणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीत 94.2% गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे... महत्त्वाचं म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकून दहावीच्या परीक्षेत तिने 94.2% गुण मिळवलेय... शिवाय परीक्षे दरम्यान लेखणीकही घेतली नव्हती.. शांभवी पाचव्या वर्गात असताना तिला मोठ्या प्रमाणावर कफ झाले.. आणि हळूहळू तिची ऐकण्याची शक्ती कमी होत गेली... ती सातव्या वर्गात पोहोचेपर्यंत ऐकण्याची शक्ती पूर्णपणे नाहीशी झाली... मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेतला... सोमलवार शाळेने सुद्धा साथ दिली... शांभवीला ऐकू येत नाही म्हणून फक्त तिला पहिल्या बाकावर बसण्याची सूट देण्यात आली.. शिक्षकांनी शिकवताना केलेला लीप मुव्हमेंट ती आत्मसात करायची आणि शिक्षक इतर विद्यार्थ्यांना काय सांगत आहे हे लीप रीडिंग च्या माध्यमातून समजून घ्यायची... ऐकण्यासंदर्भातल्या व्याधीमुळे बोर्डाच्या नियमाप्रमाणे शांभवीला राईटर मिळू शकत होता, मात्र शांभवी ने स्वतःच पेपर लिहिण्याचा निर्णय घेतला... आणि दहावीच्या परीक्षेत 94.2% अंक मिळवत घवघवीत यश मिळवले* आहे... शांभवी चे वडील आणि शिक्षिकेशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी...0
0
Report
Advertisement
पनवेल पुलिस ने करंजाडे रेलवे प्रोजेक्ट से 1.5 करोड़ रुपये के स्टील चोरी के तीनों को गिरफ्तार किया
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल पोलिसांनी करंजाडे येथील रेल्वे प्रकल्पातून 1.5 कोटी रुपयांचे स्टील चोरी केल्याप्रकरणी तिघांना अटक केली असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करंजाडे येथील सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे दीड कोटी रुपयांचे 67 टन स्टील चोरीला गेले होते. तपासादरम्यान हायड्रा क्रेनच्या सहाय्याने स्टील उचलून वाहतूक केल्याचे उघड झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने क्रेनच्या हालचालींचा माग काढत चालकाची चौकशी केली असता चोरीचा माल धानसर परिसरात ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून सर्व स्टील जप्त केले. चोरी केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी साइट मॅनेजर विजयकुमार वर्मा, स्क्रॅप व्यावसायिक अजीजुल रहमान आणि मजूर परवेज आलाव यांना अटक केलेय.0
0
Report
घर की मुश्किलों के बावजूद स्वरा खातू दहावी में 98.20% से टॉप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिद्द और मेहनतीचे 'स्वरा'क्षर!.. घरची परिस्थिती बेताची, तरीही क्लासेसशिवाय स्वरा खातूची दहावीत उत्तुंग भरारी.. अँकर जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. रत्नागिरीच्या चिपळूणच्या सावर्डे मध्ये एका सामान्य कुटुंबातील कन्येने यशाचं असं शिखर गाठलंय, ज्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. कोणतंही महागडं ट्युशन नाही की अवाढव्य फी... तरीही दहावीच्या निकालात या मुलीने बाजी मारली आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा महेश खातू हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वराचे वडील महेश खातू हे व्यवसायाने पेंटर आहेत. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, मात्र स्वराने आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे, आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे विद्यार्थी हजारो रुपयांचे खाजगी क्लासेस लावतात, तिथे स्वराने एकही जादा क्लास न लावता केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनावर हे यश संपादन केले आहे. स्वराच्या या यशामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "पेंटरच्या मुलीने यशाचे रंग उधळले" अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. रत्नागिरीच्या या लेकीने आपल्या कष्टाने हे सिद्ध केलंय की, यश सोयीसुविधांवर नाही तर केवळ आत्मविश्वासावर अवलंबून असतं..0
0
Report
अकोला के भारत विद्यालय ने दहावी में 100% परिणाम, खुशी का माहौल
Akola, Maharashtra:Anchor : राज्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अकोल्यातील भारत विद्यालयानेही यंदा शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत यशाचा झेंडा फडकावला आहे. निकाल जाहीर झाल्या शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींसह शिक्षकांनीही आनंद साजरा करत ठेका धरला. अकोल्यातील भारत विद्यालयातील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवणाऱ्या भारत विद्यालयाच्या यशामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.0
0
Report
Advertisement
नागपुर के युवाओं में एलएसडी ड्रग्स का डर बढ़ा, पुलिस ने कड़ा कदम उठाया
Nagpur, Maharashtra:नागपुरात तरुणाईला 'एलएसडी' ड्रग्जचा धोका वाढतोय ...ब्रेन स्टीम्युलेट आणि फोकस वाढत असल्याच्या चुकीच्या धारणाेंतून तरुणाई या टिकळ्या ड्रग्सकडे वळताना दिसत आहे...... नागपूर पोलिसांनी या धोकादायक ड्रग्स पासून तरुणाईला रोखण्यासाठी शाळा महावিদ्यालयांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे आणि महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.. नागपूर शहर पोलिसांनी गेल्याच महिन्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एलएसडी ड्रग्जसह अटक केली होती. स्टिकर फॉरमॅट असलेल हे ड्रग्स बाळगणाऱ्यावर शहरात झालेली प्रथम कारवाई होती.. याप्रकरणी सखोल पोलिसांनी सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे येतेय .. एलएसडीमधील घातक नशा मेंदूवर थेट परिणाम करतो . आकाराने अतिशय छोटा असल्याने एलएसडी ड्रग्ज सहज लपवता येते. बाईट रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त (हा पॉईंटर बाईट वापरावा ) --- युवा मंडळी मुले किंवा मुली आम्हाला दिसताय -- हे drugs घेतल्याने मुलांना काही वेळासाठी आपण अधिक awake असल्याच वाटतं -- कॉन्सन्ट्रेशन वाढतं.. हे ड्रग्स मेंदूला सस्टीम्युलेट करते.... मेडिकल purpose करता करतो.. मात्र त्याचा harmful आहे -- ब्रेन damage होतो --जास्त फोकस होतो हीं चूकीची धारणा आहे -- काही मुलांना असं वाटतं है की हे ड्रग्स सेवन केल्यानंतर काही तासांसाठी अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन वाढते. काही तास अजिबात झोप येत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहतो अश्या प्रकारची खोटी माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरवली जातं आहे. यासंदर्भात पोलिसांनी मानसोपचार तज्ञांची मते जाणून घेतली त्यावेळी त्यांनी सुद्धा हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत नोंदवलले आहे या उलट एलएसडी ड्रग्सचा उपयोग शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो, ---एलएसडी ड्रग्ज चा वापर विद्यार्थीांमध्ये, तरुणाईमध्ये वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांना सूचना केलेल्या आहेत की विद्यार्थ्यांच्या वागण्या, बोलण्यात जर काही फरक जाणवत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा असे आवाहन केलेयं बाईट- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त vo2 --= LSD ड्रग्स सेवन करण्याची अतिशय वेगळी पद्धत दिसून आली आहे. स्टिकर स्वरूपातील एलएसडी ड्रग्स तस्करी केली जात आहे. ते स्टिकर जिभेवर ती ठेवल्याचेनंतर काही वेळानंतर हळूहळू शरीरात त्याचा प्रभाव दिसतो. इतर ड्रग्सच्या तुलनेत या एलएसडी ड्रग्स चा प्रभाव अधिक वेळ राहत असल्याने तरुणांमध्ये त्याचे चलन वाढण्याचा धोका आहे बाईट- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त Final Vo -- कॉलेज युवकांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. पोलिस आता एलएसडी ड्रग्स कुठून आले व कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. झी २४ ताससाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर0
0
Report
नवी मुंबई के पाम बीच मार्ग ड्रिंक एंड ड्राइव से दुर्घटना; कार चालक घायल
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के पाम बीच मार्ग ड्रिंक एंड ड्राइव से दुर्घटना। कार ने पिकअप टेम्पो को टक्कर दी। कार चालक शराब के नशे में था, जिससे वाहन नियंत्रण खो गया। कार चालक घायल, दोनों वाहनों को बड़ा नुकसान।0
0
Report
नाशिक TCS केस: फरार आरोपी निदा खान एक माह बाद गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला एक महिन्यानंतर अटक झाली आहे.. नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा शोध घेत होते, अखेर संभाजीनगरनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आले.. तर दुसरीकडे शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना खरात एक महिना उलटूनही पोलिसांना सापडत नाहीये.. SIT सह अहिल्यानगर पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत.. या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, खरातचे हस्तक अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.. यातील बावके आणि सोनवणे हे दोन आरोपी आधीच गजाआड झालेत, तर अशोक खरात याला देखील शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. आज अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे.. या चौकशीतून काय खुलासे होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.. तर शिर्डी पोलिसांनी चौकशी दरम्यान अशोक खरात याला कल्पना खरात कुठे आहे? असे विचारले असता, आपण 18 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहोत.. आपल्याकडे मोबाईल नाही तसेच बाहेरची माहिती मिळायला कुठलाही सोर्स नाही.. त्यामुळे मला कल्पना खरात बाबत माहिती नसल्याचे त्याने म्हटलंय.. त्यामुळे फरार कल्पना खरात हिचा शोध लागणार तरी कधी..? स्थानिक गुन्हे शाखा , शिर्डी पोलीस आणि SIT पोलिसांचे पथक नावालाच का..?असा प्रश्न उपस्थित होतोय.. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
Advertisement
