445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नांदेड में जोरदार आंधी-बारिश से फसलें बर्बाद, किसानों ने मुआवजे की मांग की
Nanded-Waghala, Maharashtra:काल रात्री नांदेड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी मका सारखी पिके पूर्णपणे आडवी झाली तर हळद केळी आणि इतर फळबागांचे मोठे नुकसान झालय. हवामान खात्याचा इशारा खरा ठरला आणि पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा झाली. काल रात्री नांदेड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. नांदेड, अर्धापूर, भोकर, हिमायतनगर, माहूर, नायगाव, मुखेड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. ज्वारी, मका सारखी पिके आडवी झाली. तर केळी, शेतात कापून ठेवलेला गहू, हळदीचे नुकसान झाले. नांदुसा, कामठा, मालेगाव भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच शेती उत्पादनाचा मोठा खर्च वाढलाय. त्यातच शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत s? या आठ दिवसात दोनदा अवकाळणी पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पीक मातीमोल झालीयेत. हवामान विभागाने 3 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट नांदेड जिल्ह्याला दिलाय. त्यामुळे उरली सुरली पीक ही मातीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावतेय. पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में पाकिस्तानी बनावटी सौंदर्य प्रसाधनों का बड़ा जखीरा जब्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor :: छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक बातमी आहे, छत्रपती संभाजी नगर मध्ये पाकिस्तानी बनावटीचे सौंदर्यप्रसाधन खुलेआम विक्री सुरु होती याबाबत संभाजीनगर पोलिसांनी शहरातल्या सिटी चौक भागात छापे टाकत 60000 रुपयांचा साठा जप्त केलाय , मात्र महत्त्वाचा म्हणजे ज्या सौंदर्यप्रसाधनावर बंदी आहे केंद्र सरकारचे निर्बंध आहे अशी सौंदर्य प्रसाधने संभाजीनगर पर्यंत पोहोचतात कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते... छत्रपती संभाजी नगरात पाकिस्तानी माल पाकिस्तान बनावटीची सौंदर्य प्रसाधने जप्त पोलिसांच्या छाप्यात पाकिस्तानी कनेक्शन उघड छत्रपती संभाजी नागरातून ही सगळी पाकिस्तानी बनावटीची सौंदर्य प्रसाधने पोलिसांनी जप्त केलीय गेल्या कित्येक महिन्यापासून या प्रसाधनाची विक्री सर्रास सुरू होती, मुंबईहून हा सगळा माल छत्रपती संभाजी नगरात यायचा अशी माहिती मिळतेय, हा सगळा प्रकार मनसेने उघड केला याबाबत पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आणि कारवाईची मागणी केली.. पोलिसांनी तातडीने या साठ्याचा शोध सुरू केला आणि मध्य शहरात 4 दुकानावर छापा करत हा माल jपत केलाय, यात 3 आरोपीना अटक करण्यात आली आहे, याातील काही क्रिम ही गोरे होण्यासाठी वापरले जात असल्याची पोलिसांनी सांगितले...धक्का... असूनही हे सगळे उत्पादन ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहेत, सहज रित्या विकत मिळतात आता याबाबत ही पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे... पोलिसांनी या छाप्यात अनेक प्रकारचे पाकिस्तान मेड क्रिम जप्त केले आहेत ...त्यात मल्लिका क्रीम, झलक क्रीम, गोरे क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, चांदणी क्रीम, अजूबा क्रीम, फेस फ्रेश क्रीम, नूर हर्बल क्रीम, न्यू फेस ब्युटी क्रीम, साबण आणि सिरम, पार्ले गोल्ड साबण, गोरे साबण, मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम आहेत, ही प्रसाधने वापरून किडनी वर परिणाम झाल्याची कबुली एक तरुणाने दिलीय ...या क्रिम मध्ये Mercury चे प्रमाण जास्त होते त्यामुळं किडणीवर परिणाम झाला उपचाराला 20 लाख लागत आले अजूनही आजार पूर्ण बरा झाला नसल्याचं पीडित सांगताय.. या क्रिम मूळ परिणाम झालेले अनेक रुग्ण डॉक्टरांना ही आढळून आले आहेत त्यामुळं असली प्रसाधने वापरू नका असा सल्ला डॉक्टर्स देताय... सलमान शेख उपचार घेऊन बरा झालेला, डॉ श्रीगणेश बरनेला किडनी विकार तज्ञ हा प्रकार धक्कादायक आहे, याबाबत आता पोलिसांनीं कारवाई सुरू केली आहे मात्र हा प्रकार फक्त संभाजी नगर पुरता मर्यादित नाही कदाचित देशभर हा सगळा प्रकार सुरू असेल त्यामुळे याची योग्य ती दखल घेऊन बाजारातून या सौंदर्य प्रशासनांचाHigh-Token" उच्चाटन करण्याची गरज आहे0
0
Report
सोलापुर में महिलाओं के लिए मुंबई जैसा विशेष फंड स्वच्छतागृह की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर - महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी मुंबई महापालिकेप्रमाणे विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कुठेच सार्वजनिक महिला स्वच्छतागृह नाहीत. पुरुषांना अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत मात्र महिलांनी काय करायच असा महत्वपूर्ण विषय सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत नगरसेवक मनीष केत यांनी मांडला. याच सोबत सोलापूर महापालिकेत महिलांचा स्वच्छतागृहासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात झाला मात्र तो कापुरा असून मुंबई महापालिकेप्रमाणे महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी केली गेली. यावेळी सभागृहातील सर्व उपस्थित महिलांनी बेंच वाजवत सदर विषयाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.0
0
Report
Advertisement
मीरा-भायंदर में ट्रैफिक अधिकारी के भ्रष्टाचार का खुलासा, रिश्वत मांगने का मामला
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर येथे चक्क वाहतूक पोलिसाकडूनच त्याच्या वरिष्ठाने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....\n\nमीरा-भाईंदर मध्ये विविध भागात 100 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.. हे कर्मचारी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत असतात मात्र अनेक वेळा दंड टाळण्यासाठी काही वाहन चालकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना सोडण्यात येत असते..\n\nदरम्यान, मीरा रोड येथे एका महिला वाहतूक पोलिसाकडून काशिमिरा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले व त्याच्या सहाय्यक निरीक्षक यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली.... \n\nyासंदर्भात पैशांची मागणी करत असल्याचे पुरावे जमा करून संबंधित महिलेने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती... त्यानुसार पोलिसांनी पडताळणी करत वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे...0
0
Report
वन विभाग ने बिबटिया की खाल तस्करी के मामले में दो गिरफ्तार किया
Vasai-Virar, Maharashtra:वसईत बिबٹ्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली असून वनपरिक्षेत्र भाताणेच्या पथकाने धाडसी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. गुप्त माहितीनुसार खानिवडे टोलनाक्याजवळ ही सापळा रचून कारवाई करण्यात आली. वनाधिकारी विजय बारब्दे आणि वनपाल नितीन खुळपे यांनी स्वतः ग्राहक बनून तस्करांना जाळ्यात ओढले आणि कातडीसह त्यांना ताब्यात घेतले. अंधाऱ्या आणि जोखमीच्या ठिकाणी ही कारवाई पार पडली. या प्रकरणामुळे संरक्षित वन्यजीवांची तस्करी अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही याच पथकाने मांडूळ साप तस्करी प्रकरणात कारवाई केली होती. दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्यासारख्या शेड्युल-१ प्राण्यांच्या कातडीची तस्करी गंभीर गुन्हा असून दोषींना ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.0
0
Report
अकोला महापालिका सभा में पत्रकारों की नाराज़गी, तकनीकी खामियों से कवरेज बाधित
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान माध्यम प्रतिनिधींमध्येही तीव्र नाराजी पाहायला मिळाली. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आलेल्या हॉलमध्ये लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण वारंवार खंडित होत असल्याने पत्रकार संतप्त झाले. याविरोधात पत्रकार संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महानगरपालिका प्रशासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे आज माध्यम प्रतिनिधींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पत्रकारांसाठी स्वतंत्र हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी सभेचे थेट प्रक्षेपण सतत बंद पडत होते. यामुळे सभेतील घडामोडींची अचूक माहिती मिळण्यात अडथळे निर्माण झाले. यावेळी पत्रकारांनी महापौरांवरच संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासकीय कॅमेरामन हे महानगरपालिका आयुक्तांच्या इशाऱ्यावरच चित्रीकरण करत असल्याचा आरोपही पत्रकारांकडून करण्यात आला. तसेच सभेचे पारदर्शक आणि सुरळीत प्रक्षेपण करण्याची मागणी पत्रकारांनी केली. दरम्यान, पत्रकारांच्या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या सर्व गोंधळामुळे आजची आमसभा चांगलीच वादळी ठरली असून महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा आणि निर्णय प्रक्रियेवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सभागृहात जागा कमी असल्याने पत्रकारांना सभेत बसू देता येत नाही हे कारण नेहमी समोर केला जात आहे. मात्र सभागृहात घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनाच अडवल जात आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
जयंत पाटील ने केंद्र सरकार पर पेट्रोल-गैस की आपूर्ति को लेकर निशाना साधा
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अखाती देशात युद्ध सुरू आहे, पण आपल्या देशात घराघरात चिंता गॅस आणि पेट्रोलची आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. तिकडे किती लोक मरतात, याची चिंता नाही, पण आपल्याकडे पेट्रोल आणि सिलेंडर मिळणार का, याची चिंता लागून राहिली आहे, असे देखील आमदार जयंत पाटील म्हणाले, ते सांगलीच्या ईश्वरपुरमध्ये घरगुती पीएनजी गॅस वितरण प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.0
0
Report
पानी में उतरते विद्युत प्रवाह से किसान सुरेश थोरात की मौत; महावितरण पर आरोप
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे Anc - आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक गावातील 44 वर्षीय सुरेश पांडुरंग थोरात हे शेतकरी त्यांच्या शेतात पाणी भरत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा Shock लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. मयत सुरेश थोरात यांच्या शेताशेजारी असणाऱ्या महावितरणच्या खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सदर खांब वाकला होता. वाकलेला हा खांब दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कडे केली होती. मात्र महावितरण कडून कुठलीही उपाययोजना झाली नसल्याने सुरेश पांडुरंग थोरात यांच्या मृत्यूला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.0
0
Report
तालासरी पुल पर भारी हादसा: बारातियों से भरा टेम्पो खड़े कंटेनर से टकराया, 20-22 घायल
Palghar, Maharashtra:पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात. लग्नाच्या वराडांनी भरलेला टेम्पो ची उभ्या कंटेनरला धडक. धडके 20 ते 22 वऱ्हाडी गंभीर जखमी. जखमींवर तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. घटनास्थळी पोलीस दाखल. महामार्गावर नादुरुस्त वाहने हटविण्यात महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष.0
0
Report
Advertisement
जुन्नर-आंबेगाव-खेड में तेज बारिश-ओलों से फसलें बर्बाद
Junnar, Pune, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.0
0
Report
केडीएमसी ने 14 करोड़ बकाया वसूलने BOT प्रकल्प सील, लग्न समारोह ठप्प
Kalyan, Maharashtra:कर वसुलीसाठी केडीएमसी ची धडक कारवाई.. 14 कोटी थकबाकीमुळे वाधवा BOT प्रकल्प सील माधव बँक्वेट, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेलला टाळे..लग्नसमारंभ ठप्प, आयोजक अडचणीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने थकबाकीदारांवर मोठी कारवाई करत केडीएमसी ने वाधवा बिल्डरला BOT प्रकल्पांमधील विविध व्यावसायिकासाठी देण्यात आलेल्या प्रॉपर्टी सील करण्यात आले आहे वाडेघर जलकेंद्र BOT प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या प्रॉपर्टींचे मासिक भाडे अनेक वर्षांपासून थकले होते. याबाबत पालिकेकडून 2023 पासून नोटीस बजावण्यात अल्या होत्या मात्र, वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली न गेल्याने अखेर पालिकेने कठोर पाऊल उचलत सुमारे 14 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली.या कारवाईत माधव बँक्वेट हॉल, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेल यांना सील करण्यात आले.अचानक झालेल्या या कारवाईमुळे येथे सुरू असलेले व्यवसाय आणि कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले आहेत0
0
Report
अकोला में अचानक बारिश: मौसम बदला, गर्मी से राहत, किसानों की फसलें खतरे में
Akola, Maharashtra:राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असून अकोल्यातही आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.Gेल्या काही दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत होता. तापमान तब्बल ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली असून अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई बजट 6704 करोड़, टैक्स नहीं बढ़ेगा; कई योजनाओं की घोषणा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2026-27 चा अर्थशंकल्प स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महासभेत सादर केलाय. तब्बल 6704 कोटी रुपयांचा अर्थशंकल्प सादर करण्यात आला असून शहरातील प्रत्येक घटकाचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलाय. रहिवासी क्षेत्रात कुठलीही करवाढ न करता प्रत्येक विभागात वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत काम, प्रत्येक नगरसेवकांना प्रभाग समिती निधी म्हणून 1 कोटींचा निधी, सिग्नल मुक्त रस्ते, महिलांना उद्योग सहाय्य, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ अश्या विविध योजना आणि प्रकल्पाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेय.0
0
Report
नाशिक में कोडवर्ड का पर्दाफाश, पुलिस की जांच तेज हो जाएगी
Nashik, Maharashtra:भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेलं हे काळं साम्राज्य किती खोलवर पसरलंय, हे आता पोलिसांच्या तपासात स्पष्ट होईलच. मात्र, या कोडवर्डचं रहस्य उलगडल्यानंतर नाशिकमध्ये मोठी खळबळ उडणार, हे मात्र निश्चित.0
0
Report
वाशिम में अनसीज़नल बारिश से नागरिकों को राहत मिली
Washim, Maharashtra:वाशिम जिले के रिसोड शहर व आसपास के तालुकों में दुपहर अवकाळी बारिश हुई। पिछले कुछ दिनों से बढ़ी गर्मी से परेशान नागरिकों को इस बारिश से राहत मिली। दुपहर अचानक मौसम में बदलाव हुआ, आकाश बादलों से घिर गया और कुछ स्थानों पर हल्की से मध्यम वर्षा हुई। इससे माहौल ठंडा हो गया और लोगों को गर्मी से कुछ राहत मिली।0
0
Report
Advertisement