Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Feb 12, 2026 17:16:49
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये अचानक आगीचा भडका उडाल्याने काही क्षणांतच आग वेगाने पसरली. सुत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एका लहान मुलाचा आणि त्याच्या वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुलाची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 12, 2026 15:03:50
Kalyan, Maharashtra:ANC- कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून कामाची मुदत संपूनही अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मनसे कार्यकर्ते कपिल पवार यांनी महापालिकेकडे केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बैल बाजार येथील जुनी स्मशानभूमी तोडून आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. सदर कामाची मुदत ३०० दिवसांची असतानाही आजतागायत काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ जुनी स्मशानभूमी पाडण्यात आली असून नवीन बांधकामाचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले दिसत नाही. याच कालावधीत लालचौकी आणि बैल बाजार येथील मुख्य स्मशानभूमीचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आल्याने कल्याण पश्चिम विभागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणास संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी जबाबदार असून, मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच कामावर योग्य देखरेख न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी मनसे कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अगर तात्काळ योग्य कारवाई करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व ठेकेदारावर राहील, अशी इशारा मनसे ने दिला आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 12, 2026 15:01:59
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर ब्रेक मिरा रोडमध्ये डान्स बारवर डीसीपीं राहुल चव्हाण यांचा छापा १९ तरुणींसह २९ ग्राहक ताब्यात सिल्व्हर पार्क येथील 'व्हाईट हाऊस' उर्फ 'खुशी' बारवर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी धाड टाकून १९ मुली आणि २९ ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. निवासी इमारतीत अनधिकृत बदल करून छुप्या मार्गाने हा डान्स बार सुरू होता, जिथे पोलिसांनी वेढा घालून पळणाऱ्या मुलींना पकडले. या बारमुळे रहिवासी महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून, पालिकेच्या दुर्लक्षामुळे इमारतीचे कॉलम तोडून केलेले अनधिकृत बांधकाम आणि अश्लील कृत्ये थांबवण्यासाठी आता कायमस्वरूपी कारवाईची मागणी होत आहे. बाईट- राहुल चव्हाण , पोलिस उपायुक्त.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 12, 2026 13:18:00
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध विषयांवर प्रतिक्रिया... ऑन हर्षवर्धन सपकाळ आरोप # माझं घर महाग असेल तर त्यांनी कार्यालयासाठी विकत घ्यावं, त्यांनी जो आकडा सांगितला, त्यातल्या किती टक्क्यात घ्यायचं आहे ते सांगावं, खरंतर काँग्रेसला असेच प्रदेशाध्यक्ष लाभले पाहिजे जे बेताल बोलतात, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही कितीला घर विकत घेता, तेवढाच मला फायदा होईल ऑन संदीप देशपांडे # संदीप देशपांडे यांचा आरोप हा शिवसेना मनसे भांडणा संदर्भातला आहे, असं वाटतं की त्यांना मुंबईत बसून या संदर्भातली माहिती झाली, मनसेचे काही नगरसेवक जेव्हा शिंदेंकडे गेले तेव्हा असे आरोप झाले, त्यामुळे हा बदला चुकवण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे, कोणी त्याकडे गंभीरतेने पाहू नये ऑन जोरगेवार मंत्रिपद नाकारलं वक्तव्य # काही महिन्यात लक्षात येऊन जाईल, बिरजू पाझारे हा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याच्या उमेदवारीसाठी आधीही गेलो पुढेही जाईल, 2029 मध्ये डोज दिल्या जाईल, साधारण डीलिमिटेशन नंतर काय होते ते सर्वांनाच बघावं लागेल ऑन एबी फॉर्म वाटप गोंधळ # प्रदेशाध्यक्षाची यादी बदलण्याचा अधिकार हा विनापरवानगी कोणालाच नसतो आणि त्यातही समर्थन केल्या जात आहे की हो आम्ही नावं बदलली, तर निश्चितच या संदर्भात भविष्यात इतर पक्षातील नेते तसं वागले तर मोठी अंधाधुंद होणार आहे, अशा प्रकारे वागता येत नाही
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 12, 2026 13:17:44
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 12, 2026 13:02:00
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयातील जेवणाचा निकृष्ट दर्जा, वार्ड परिसरातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि रुग्णांशी होणारी उद्धट वागणूक या गंभीर मुद्द्यांवर पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अधिष्ठाता डॉ. सोनोने यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार साजिद खान पठाण यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत व्यवस्था तात्काळ सुधारण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयातील विविध वार्डांना भेट देताना आमदारांनी परिस्थितीची पाहणी केली. स्ट्रेचरवर रुग्णांना हलवण्यासाठी वार्डबॉय उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकच स्वतः रुग्णांना एका वार्डमधून दुसऱ्या वार्डमध्ये नेत असल्याचे चित्र पाहून आमदार संतप्त झाले. “ही बाब अत्यंत निंदनीय आहे. व्यवस्था त्वरित सुधारली नाही तर प्रशासनाला जड जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. पाहणीदरम्यान अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच रुग्णालयातील भोजनाच्या गुणवत्तेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप रुग्णांनी केला. दरम्यान, रुग्णालयातील अनेक ‘स्मार्ट’ कंत्राटे एका मंत्र्याच्या जावयाशी संबंधित कंपनीला देण्यात आल्याची चर्चा असल्याचा मुद्दा उपस्थित करत आ. पठाण यांनी कंत्राट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कंत्राटदारांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णालयातील सेवा कोलमडल्या आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार," असे त्यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 12, 2026 12:31:45
Nanded, Maharashtra:Anchor - शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यांवर हल्ला करत अस्वलाने धूमाकूळ घातला होता. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू तर आठ शेतकरी जखमी झाले होते. या शेताऱ्यांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. अखेर या अस्वलाला पकडण्यात वन विभागाला यश आले. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे ही घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तब्बल 18 तास शोधमोहीम राबवली. अखेर अथक प्रयत्नांनंतर अस्वलाला पकण्यात वन विभागाला यश आले आहे. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना व मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top