icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वसई-विरार में गर्मियों में पानी की कटौती नहीं, मानसून पूर्व तैयारी तेज

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महानगरपालिकेने आतापासूनच तयारीला वेग दिला असून यंदाच्या उन्हाळ्यात शहरात कोणतीही पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त बी. पी. पृथ्वीराज यांनी दिली आहे. शहरात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मान्सूनपूर्व कामांमध्ये नालेसफाईला गती देण्यात आली असून तब्बل ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. नालेसफाईतील अडथळे दूर करण्यासाठी तिवर झाडांच्या पुनर्वसनाचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान एनडीआरएफकडे विशेष प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. शहराच्या पुढील दहा वर्षांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार असल्याने विकास आराखड्यालाही गती मिळणार आहे.
0
0
Report

नीट पेपर लीक पर नेताओं की प्रतिक्रियाएं और मोदी की महंगाई पर आह्वान

Nashik, Maharashtra:नाशिक (मालेगाव) विशाल मोरे (47 सेकंदाचा बाईट महत्वाचा) रामदास आठवले पत्रकार परिषद on Neet पेपर leak - मला वाटते की Neet संदर्भात समझतील काही लोक जबाबदार असतात.. सरकार त्याकडे लक्ष देतील.. त्यांना सरकार कडून शिक्षा केली जाईल.. पेपर leak होणे योग्य नाही असे होणे चांगले नाही.. On महागाई..मोदी आवाहन - नरेंद्र मोदींनी देशाच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवून आहे.. अमेरिका आणि इराण युद्धमालेमुळ इंधन पुरवठा अडचणी वाढल्या आहेत. आमचे सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेल एवढे वाढले नाहीत. केंद्राने लक्ष घालावे.. सर्व सामन्यांना त्रास होऊ नये म्हणून काही निर्णय घेतला जात आहे.. राज्य सरकारला एक्साईज कमी करण्याचा अधिकार आहे. On नेते पेट्रोल बचत.. - प्रधानमंत्र्यांनी जर पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी भूमिका घेतली तर त्याचे अनुकरण केला.. सर्व मंत्री देखील त्याचे अनुकरण करतील.. सर्वांनी पेट्रोल डिझेल वापरले जाणे आवश्यक आहे.. नितीन गडकरी यांनी देखील बस ने प्रवास केला.. कोविड मध्ये देखील इकॉनॉमी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले तसेच आताही प्रयत्न आहे.. देशाची आर्थिक स्थिती टिकवण्याची जबाबदारी आहे.. सर्व नेते आणि उद्योजकांनी देखील सिक्युरिटी कमी केली पाहिजे.. On मालेगाव कविता.. राजकारणात मला बनण्याची अजिबात नाही हाव म्हणून मी आलो मालेगाव ..
0
0
Report
Advertisement

शिंदखेडा-डोंडाईचा में गैस सिलेंडर लेकर लंबी कतार, आक्रोश के साथ रास्ता रोको

Dhule, Maharashtra:दोंडाईचा शहरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस सिलेंडर सह नागरिकांच्या तब्बल अर्धा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. पहाटेपासून गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगेमध्ये उभे असताना देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप झाल्याचे पहायला मिळाले. भर उन्हामध्ये तासन्तास रांगेत उभे राहून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल. शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केले. या रास्ता रोको दरम्यान संतप्त नागरिकांचा आक्रोश बघावयास मिळाला. पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल डिझेल भाव वाढीनंतर घरगुती गॅस देखील मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे .
0
0
Report

खेत में दवा छिड़कते समय बिजली का झटका, मामा-भाचा की मौके पर मौत

Sangli, Maharashtra:शेतामध्ये औषध फवारणी करत असताना विजेचा शॉक लागून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू. शेतामध्ये पिकावर औषध फवारणी करीत असताना हा विजेचा शॉक लागला आहे. ज्यामध्ये विशाल पांडुरंग माळी व त्यांचा भाचा अथर्व रवींद्र माळी या दोघांचा मृत्यू झालाय. आरग येथील रवींद्र माळी यांच्या शेतामध्ये असणाऱ्या वांगी पिकावर मामा - भाचे औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी औषध फवारत असताना रवींद्र माळी यांच्या शेतामध्ये असणाऱ्या महावितरणच्या ट्रांसफार्मरच्या वायरचा दोघांना स्पर्श झाला. यावेळी विजेचा शॉक लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्युच्या घटनेने आरग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

उल्हासनगर में परिवार पर हमला: महिलाओं को मारा, बाल काटे जाने का आरोप

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात तक्रार दिल्याचा राग महिलांसह कुटुंबावर हल्ला केस कापून जीवे मारण्याची धमकी महिल्यांच्या गळ्यात चप्पलांचा हार घालत काढली धिंड कथन: उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाला अडवून आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये महिलांनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्हिओ -उल्हासनगर-३ येथील वाघेलानगर चौक परिसरात १४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. फिर्यादी आपल्या बहिण गीता राजपूत आणि मुलगी अंजली यांच्यासह मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. त्यावेळी तरुण मित्र मंडळ परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत त्यांना अडवले. गीता राजपूत यांनी यापूर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपी नितीन थोरात याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींनी तोंडावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलांना गळ्यात चप्पलांचा हार घालत काढली धिंड काढली या हल्ल्यात आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांनी फिर्यादीचे डोक्याचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. फिर्यादीची बहिण गीता आणि मुलगी अंजली यांनाही हाताने व लाठाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच “पोलीसाकडे तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेऊ” अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किर्वे करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

Mulund Kalidas Kriida Sangkul में भ्रष्टाचार: महापौर ने खुद जांच कराई

Mumbai, Maharashtra:मुलुंडमधील कालिदास क्रीडा संकुलातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संकुलात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्वतः या ठिकाणी पाहणी करत गंभीर आरोप केले आहेत. तात्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळात मेघराज हॉस्पिटॅलिटी या संस्थेला दिलेलं १५ वर्षांचं कंत्राट अनधिकृत असल्याचा दावा करत, संकुलात मोठमोठे हॉल, हॉटेल आणि बांधकाम नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. सामान्य नागरिकांसाठी असलेल्या जागेचा गैरवापर करत महापालिकेचा ठराव डावलण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करत अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती रितू तावडे यांनी दिली. दरम्यान, पाणी कपातीच्या निर्णयावर बोलताना एल निनोमुळे पावसाला उशीर होत असल्याने मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे。
0
0
Report

नीट पेपरफूट पर अमरावती में युवक कांग्रेस का प्रदर्शन, इस्तीफा की मांग

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरची जाळपोळ, नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली; नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी.
0
0
Report

कणकवली में अल्पवयस्क युवती से छेड़छाड़ के आरोप पर प्रवासी युवकों की बेदम पिटाई

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग — अल्पवयीन युवतीची छेड काढल्याच्या रागातून परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण.... कणकवली शहरात घडली घटना..कणकवली येथील एका खाजगी दुकानात काम करणाऱ्या दोन परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन युवतीची छेड केली; युवतीनी घडलेला प्रकार कथन करताच स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही युवकांना बेदम मारहाण केली; दोन्ही युवकांना पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी; कणकवली शहरातील नागरिक एकटावले, पोलीस स्थानकात परप्रांतीय युवकांवर गुन्हा दाखल करण्याची केली होतेय मागणी; अखेर पोलीसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले; सदर घटनेमुळे कणकवली शहरात काही काळ तणाव होता.
0
0
Report
Advertisement

अर्थतंत्र के बिना राजनीति नहीं चलेगी: वनमंत्री गणेश नायक ने साफ विचारों पर किया जोर

Chendhare, Maharashtra:स्‍लग - स्‍वच्‍छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही. वनमंत्री गणेश नाईक यांचे महत्‍वपूर्ण विधान. आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही. पेण येथे राष्‍ट्रीय आगरी अध्‍यात्मिक संमेलन. अँकर – आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्‍ही स्‍वच्‍छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही. हे वि धान केलंय राज्‍याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी. अखिल भारतीय आगरी समाज संस्‍थेने आज पेण इथं राष्‍ट्रीय आगरी अध्‍यात्मिक संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. तुमचं मन स्‍वच्‍छ असेल, मानसिक स्थिरता राहील मग शारीरीक स्थिरता मिळते त्‍यातून समाजकार्य होतं मग अर्थकारण होतं. और आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही असं गणेश नाईक म्‍हणाले. पेणचे आमदार रवींद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते. साऊंड बाईट – गणेश नाईक, वनमंत्री
0
0
Report

100 करोड़ रंगदारी मांगने के मुकदमे में जयेश पुजारी व अधिकारी को पांच साल सश्रम जेल

Nagpur, Maharashtra:नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून 100 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारी आणि अफसर पाशाला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमारा शर्मा यांनी हा निकाल दिला. जयेश उर्फ जयेशकांत उर्फ शाहीर उर्फ शाकीर शशीकांत पुजारी आणि अफसर पाशा उर्फ बसीरुद्दीन उर्फ खसिरुद्दीन मोहम्मद (४३, दोघेही सध्या मध्यवर्ती कारागृह, बेळगाव, कर्नाटक) अशी दोषी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी मोहम्मद शकीर मोहम्मद हनीफ हा अद्याप फरार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यादी तयार करून त्यांना धमक्या देण्याचा आरोप जयेश आणि पाशा यांच्यावर होता. सुनावणीदरम्यान हा आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहिताेच्या कलम 385, 387, 506 तसेच बेकायदेशीक कारवाया प्रतिबंध कायद्याच्या कलम 10, 13(1) व 18 नुसार प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार अतिरिक्त एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच भादंवि कलम 507 अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास 10 महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा देण्यात आली. या प्रकरणी सरकारी पक्षाने एकूण 65 साक्षीदार तपासले. तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅकवर करण्यात आली. दररोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न करीत न्यायालयाने तब्बल एक 55 दिवसांत या खटल्याचा निकाल लावला. काय आहे प्रकरण १०० कोटींची खंडणी १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी आरोपी जयेश पुजारी याने नागपूरातील खामला येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना धमकी देण्यात आली होती. हे फोन कर्नाटकमधील तुरुंगातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी बंगळुरू कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर जयेशला ताब्यात घेत नागपूरात आणले होते. चौकशीदरम्यान त्याचे लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पीएफआयसह विविध दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा खुलासा झाला होता. त्याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
0
0
Report
Advertisement

नाना पटोले का आरोप: मोदी सरकार महंगाई से जनता को लूटा, किसान परेशान

Bhandara, Maharashtra:निवडणूका संपल्या की जीवनावश्यक वस्तूच्या किंमती वाढवण आणि पुन्हा जनतेकडून पैसे लुटन ही परंपरा 2014 पासून सुरू आहे. दरवाढ भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी दरवाढ आहे. त्यामुळे गरिबाच्या तोंडातला घास या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी सरकारने हिसकलेला आहे. महाराष्ट्र मध्ये आणि अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी सांगतात गंगा जिथून निघाले तिथं पर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. जनतेचे मत घ्यायची आणि सत्ता मिळाल्यानंतर जनतेला उठायचे ही जी परंपरा डबल इंजिनची सरकारची झालेली आहे. या फेकू सरकारला जुबलेबा सरकारला आता आपण खोटे आश्वासनाला फसू नका आणि आता या सत्तेतून बाहेर काढा... फडणवीस सरकारने आरक्षणा मध्ये 2014 ते 2019 मधील मागच्या दोन वर्षाच्या सरकारमध्ये आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला आताही आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीचे कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे आहे. आणि त्याची प्रॉपर बजावणी करायची नाही आणि महाराष्ट्रातले ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानामुळे आरक्षण मिळाले आहे. त्या व्यवस्थेच्या लोकांना मिळू नये याच्या प्रयत्न सातत्याने होतो. 2014 ते 2019 च्या काळामध्ये फडणवीस यांनी असाही कायदा केला होता की जे लोक आरक्षणामध्ये आहेत त्यांना ओपनच्या जागेमध्ये जाता येणार नाही खरंतर असं करता येणार नाही आरक्षणाच्या जागा आहेत त्या आरक्षणाने भरेले जातील पण आरक्षणाबद्दल कोणी टॉपर असेल त्याला ओपन मध्ये जायचं असेल तर थांबवता येणार नाही परंतु फडणवीस सरकारने तेही पाप केला आहे... कॅबिनेटमध्ये जे निर्णय असतात कॅबिनेट घ्यायची म्हणून घ्यायची त्याच्यावर खर्च करायचा म्हणून करायचा पण जनतेच्या पद्धतीने निर्णय करायचे नाही असे अनेक निर्णय इथे पाहायला मिळतात.....
0
0
Report

ठाकरेंची शिवसेना ने कणकवली में पेट्रोल-डिज़ल दरों के विरोध में मोर्चा निकाला

Oras Bk., Maharashtra:अँकरइंधन दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून आज कणकवली शहरात माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेट्रोल डिझेलचे दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून भाजपने याविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधकही शिल्लक ठेवले नाहीत असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. एकीकडे इंधनाची बचत करा व परदेश दौरे टाळा म्हणून सांगणारे पंतप्रधान परदेशात फिरतायत अशी टीका ही वैभव नाईक यांनी केली आहे. बाईट- वैभव नाईक माजी आमदार ठाकरे गट
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top