icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती में रेलवे पटरी के नीचे महिला की दुखद मौत, रंगोली होटल के पास मामला

Amravati, Maharashtra:अमरावतीत रेल्वेखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू; राजापेठ हद्दीतील रंगोली हॉटेलजवळील घटना अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवातील चौक परिसरातील रंगोली हॉटेलजवळ एका महिलेचा रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मीना जोहारले (रा. कुंभारवाडा, अमरावती) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात असून यापूर्वीही तिने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
0
0
Report

Beed: Vilas Gule murder sparks kin protest, highway blocked for two hours

Beed, Maharashtra:बीड: विलास घुले खूण प्रकरण; आरोपी अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांसह ग्रामस्थांचा ठिय्या, दोन तासांपासून राष्ट्रीय महामार्ग रोखला ANC - भांडणे मिटवण्यासाठी मध्यस्थी करत असलेल्या विलास घुले या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. घटनेला आजचा तिसरा दिवस आहे. याप्रकरणी 9 आरोपींविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपींसह इतर आरोपींना तत्काळ अटक करा या मागणीसाठी नातेवाईक आणि टाकळी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतप्त ग्रामस्थानी केज मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग दोन तासांपासून ठप्प आहे. पोलिसांनी कसलीही कारवाई केली नसल्याचा आरोपी मयताच्या पत्नीने केला आहे. जोपर्यंत संपूर्ण आरोपी अटक करणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे..मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. बाईट: सुषमा घुले, मयत विलास घुले याची पत्नी
0
0
Report

ठाकुरळी में महावितरण का बड़ा पोल गिरा, ट्रैफिक जाम और विद्युत आपूर्ति बाधित

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात महावितरणचा भलामोठा विद्युत पोल कोसळला परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दोंबिवलीच्या ठाकुरळी शेलार चौक परिसरात महावितरणचा एक भला मोठा विद्युत पोल कोसळल्याची घटना घडलीय.एक बाईकस्वार इथुन जात असतांना हा पोल कोसळला, मात्र त्याने प्रसंगावधान बाळगल्याने तो वाचला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मुख्य रस्त्यावर हा विद्युत पोल कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या घटनास्थळी दाखल झाले असून विद्युत पोल बाजूला करण्याचे काम सुरू आहे .दरम्यान हा विद्युत पोल कोसळल्याने संपूर्ण ठाकुर्ली परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झालाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नाशिक समेत कई जिलों में अच्छी बारिश, खरीफ की खेती में तेजी

Yeola, Maharashtra:गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यातही पहिल्या चांगल्या पावसानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषी सेवा केंद्रांकडे वळले असून बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पेरणीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचीच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. येवला तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर सध्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

खारघर में पानी की किल्लत पर महिलाओं ने बिल्डर के कार्यालय का घेराव किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डर कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी रहिवासी आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अरिहंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक छाजेर यांच्यावर महिलांच्या अंगावर डिफेंडर वाहन घालण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांनी तातडीने पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

देवाभाऊंके दैवी शक्ति, विधायक बनने वालों के लिए साफ संकेत

Sangli, Maharashtra:ज्यांना आमदार व्हायची इच्छा,त्यांनी काळजी करू नये - देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. अँकर - देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे,ती शक्ती सगळ्यांच समाधान करणारी आहे, त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचे,त्यांनी काळजी करू नये,असे विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला,धैर्यशील कदम, अतूलबाबा, मनोजदादा,अश्या चौघांना विधानसभेत जाणार असल्याचे सांगितले होते.त्यानंतर आता मी चौघेही आमदार झालोत, प्रामाणिकपणे काम केल्यावर देवा भाऊ पाठीशी ठाम उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायचं इच्छा आहे,त्यांनी काळजी करू नये,कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे,जी सगळ्यांचा समाधान करणारी आहे, संविधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर सांगलीत आयोजित सत्कार समारंभ दरम्यान ते बोलत होते.
0
0
Report

भास्कर जाधव के स्टेटस ने राजनीतिक गलियारों में उथल-पुथल मचा दी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चापलूसांच्या जमातीत...भास्कर जाधवांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! अँकर नेहमीच आपल्या धडाकेबाज आणि रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले नेते भास्कर जाधव सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.. भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.. स्टेटसमध्ये दिसणाऱ्या या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, चापलूसांच्या जमातीत सरळ उभ्या राहिलेल्या माणसावरही ताठरपणाचा (अकडणे) आळ घेतला जातो... जाधवांनी हिंदीतील या ओळींच्या माध्यमातून नेमकं कोणावर निशाणा साधला आहे? हा टोला विरोधकांना आहे की पक्षांतर्गत परिस्थितीवर? याबाबत आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.. यावर आता पुढे काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top