445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम में ट्रक पलटा, चालक की झपकी से समृद्धि एक्सप्रेसवे पर कांदा बिखरा
Washim, Maharashtra:अँकर :वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारंजा तालुक्यातील दोनद परिसरातीलचॅनल 263 क्रमांकावर अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याची घटना सकाळी घडली आहे. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे, या अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र कांद्याची पोती पसरली होती. नाशिक वरून मुजफ्फर येथे हा ट्रक कांदा घेऊन जात होता.0
0
Report
युद्ध के कारण निर्यात बंद, हापूस आम अब कोल्हापुर के स्थानीय बाजार में आया
Kolhapur, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे हापूस आंब्याची निर्यात थांबली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक बाजारपेठेत रत्नागिरी देवगड हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. कोकणातील हवामान बदल, अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा आंबा चाखायला मिळेल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. पण निर्यात होणारा आंबा स्थानिक बाजारपेठेत आल्यामुळे उच्च दर्जाच्या हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे. असे असले तर हापूस आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्याच्या आवक्या बाहेर आहेत.0
0
Report
चंद्रपुर में शराबी बस चालक को सतर्क यात्री ने रोककर बड़ा हादसा टल गया
Chandrapur, Maharashtra:Feed slug ---0704ZT_CHP_ST_DRIVER ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपुर जिल्ह्यात दारू पिऊन बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला सतर्क प्रवाश्याचा दणका, डगमगत चालणारी बस थांबवून प्रवासी उतरले खाली, मद्यधुंद चालकाला विचारला जाब, मोठी दुर्घटना टळली अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात दारू पिऊन बस चालवणाऱ्या बस ड्रायव्हरला सतर्क प्रवाशांनी दणका दिला. प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. हा प्रकार गडचांदूर-नागपूर बस फेरी दरम्यान झाला. राजुरा डेपोची MH-14 5322 क्रमांकाची महामंडळाची बस भद्रावती येथे मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली. धक्कादायक बाब म्हणजे गडचांदूर-नागपूर या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. बस डगमगत रस्त्याच्या कडेला डिव्हायडरला धाडकून रस्त्याच्या खाली उतरली. ही बाब प्रवाश्यांच्या लक्षात येताच एका सतर्क प्रवाशाने तत्काळ बस थांबवून चालकाला जाब विचारला. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. संतप्त प्रवाशांनी तात्काळ दुसरी बस उपलब्ध करून देण्याची मागणी वाहकाकडे केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ---------- vis--------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
रांजणगाव में 11 महीने के बच्चे की हत्या, माँ ने कबूल किया
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात अकरा महिने वयाच्या आपल्या पोटच्या पोराचा सिमेंट ओट्यावर आपटून त्याच्या आईनेच जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर महिलेले कापडाच्या बॅगमध्ये दगड व आपल्या मुलाचा मृतदेह ठेवून बॅग विहिरीमध्ये टाकून दिली होती. मात्र पोलिसी खाक्याने ही सर्व बाब उघड झाली असून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावाचे रहिवासी रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात आपल्या अकरा महिने वयाच्या मुलाचा मृत्यूची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फिर्यादी रवींद्र पवार यांची पत्नी पूजा रवींद्र पवार यांची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली देताना दुसरे लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यात असून मुल सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही या उद्देशाने स्वतःच्या मुलाचाच जीव घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतल्य असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
कोल्हापुर के 85 स्कूल वैतनिक अनुदान से बाहर, शासन ने कड़ी कार्रवाई की
Kolhapur, Maharashtra:वारंवार अपात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य शासनाकडून कारवाईचा दणका बसला आहे. कोल्हापूर विभागातील वेतन अनुदानासाठी तब्बल 85 शाळा कायमस्वरूपी अपात्र ठरविले आहेत. तेरा वर्षात निकषांची पूर्तता न केल्याचा ठपका कारवाई करताना ठेवण्यात आला आहे.0
0
Report
कोल्हापुर में जियो रेफरेंसरिंग शुरू, सभी संपत्तियों के नक्शे अक्षांश-रेखांश से जुड़ेंगे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतीचे जिओ रेफरेन्सिंग होणार आहे. जिओ रेफरेन्सिंग म्हणजे मिळकतीचे नकाशे अक्षांश आणि रेखांशशी जोडले जाणार आहेत. यानिमित्ताने जिओ रेफरेन्सिंग करणारी कोल्हापूर महानगरपालिका राज्यात पहिली ठरणार आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेकडून हे सर्वेक्षण होणार आहे. या माध्यमातून जुन्या प्रॉपर्टी कार्डधारकांसह शहरातील सर्वच मिळकतींचे नकाशे मिळणार आहेत.0
0
Report
Advertisement
युद्ध की आग से कोकण के मछली व्यापार पर असर, निर्यात ठप्प
Ratnagiri, Maharashtra:युद्धाची झळ खोल समुद्रात.. डिझेलचे वाढलेले दर,गॅस टंचाई मच्छीमाराच्या मुळावर.. निर्यात ठप्प आणि मासळीचे दर निम्म्यावर.. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचे ढग आता कोकणच्या किनारपट्टीवर घोंगावू लागले आहेत.. युद्धाच्या परिणामामुळे डिझेलचे वाढलेले दर गॅस टंचाई आणि विस्कळीत झालेली निर्यात साखळी यामुळे मच्छीमार पूर्णपणे कोलमडून गेला आहे.. परिस्थिती इतकी गंभीर आहे की हर्णे बंदरातील 50% नौका सध्या किनाऱ्यावरच नांगरलेल्या अवस्थेत आहेत.. कोकणातील विशेषता हर्णे बंदरातील मासळीला आरोग्य देशांमध्ये मोठी मागणी असते महागूळ महाकुळ सारख्या मासळीचे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते मात्र युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाल्याने निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी मासळी खरेदी बंद केली आहे.. गोव्यातील ज्या कंपन्या हर्णे बंदरातून 90% मासळी उचलत असतात त्यांनीही आता हात आढळता घेतल्याने मच्छीमारांसमोर मासळी विकायची कुठे असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.. निर्यात ठप्प झाल्याने ही सर्व मासळी आता मुंबई पुणे आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये वळवण्यात येत आहे मात्र आवक जास्त आणि मागणी मर्यादित असल्याने मासळीचे दर रसातळाला गेले आहेत..0
0
Report
नांदेड में क्रिकेट खेलते बच्चा बिजली का झटका लग गया, अस्पताल में भर्ती
Nanded-Waghala, Maharashtra:क्रिकेट खेळताना पत्र्याच्या दुकानाच्या छतावर पडलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलाला ताराच्या स्पर्श झाला. ताराच्या स्पर्शामुळे मुलगा काही वेळ बेशुद्ध पडला आणि त्याच्या कपड्यांना पेट लागला. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी मध्ये काल दुपारी घडली. अरमान खान नावाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. बॉल पत्र्याचे शेड असलेल्या एका दुकानाच्या छतावर गेला. तो बॉल आणण्यासाठी अरमान लोखंडी पत्र्याच्या छतावर चढला. छतावरून जाणाऱ्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि काही वेळ निपचित पडला. गंभीररित्या भाजून त्याच्या कपड्यांना पेट झालेला. कपड्यांनी पेट घेतल्यानंतर त्याला जाग आली. कसाबसा उठून मुलगा स्वतः छतावरून खाली पडला आणि नागरिकांनी त्याला पकडले. त्या नंतर अरमान ला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलावर उपचार सुरु आहेत.0
0
Report
यवतमाल के पुसद में टरबूज किसान लागत से कम भाव पर हार रहे हैं
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसদ तालुक्यात टरबूज उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे, टरबूजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने , हताश शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची गुंतवणूक केलेले टरबूज गुरांना खाऊ घालण्याची किंवा शेतात सोडून देण्याची वेळ आली आहे. वनवारला गावातील हे विदारक दृश्य असून अशीच परिस्थिती सर्व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. टरबूजाला बाजारात तीन ते चार रुपये एवढा अल्पभाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघेनासा झाला असून, वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी अनेक शेतकरी हे टरबूच पाऊल उचलत आहेत.0
0
Report
Advertisement
बुलढाणा: विजयराज शिंदे पर गंभीर आरोप, चौकसी की मांग
Buldhana, Maharashtra:बुलढाणा. विजयराज शिंदे अन्य भोंदूबाबा खरात हैं. उनकी चौकशी होनी चाहिए. शिवसेना के विधायक संजय गायकवाड़ भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे पर गंभीर आरोप लगाते हैं. शिंदे दुसरे भोंदूबाबा खरात हैं, जिन्होंने अपने आश्रमशाळे में अनेक लड़कियों की जिंदगी प्रभावित की है; उनकी चौकशी होनी चाहिए. उनकी शाळा में महिला कर्मचारी सभी प्रकार के मध्यस्थ रहते हैं. लड़कियों की बदनामी के डर से हम भांडाफोड़ नहीं कर रहे, यह बतौर प्रतिक्रिया संजय गायकवाड ने कहा. भोंदूबाबा अशोक खरात को उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी कॉल किया था, ऐसी जानकारी अंजली दमानिया ने दी है, इसलिए उनकी भी चौकशी होगी, ऐसी प्रतिक्रिया विजयराज शिंदे ने दी थी; इस पर आमदार संजय गायकवाड ने पलटवार किया है.0
0
Report
Sharabī ke nase me dost ne kiya mitr ka hatya, Amba Ghāt me sanseṇī
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा घाटात मैत्रीचा करुण अंत.. दरूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा काटा!.. ज्या मित्रावर जीवापाड प्रेम केलं, त्याच मित्राने सुधीर यादव या तरुणाचा घात केला आहे.. 'मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ' असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.. सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव हा तरुण काही दिवसांपूर्वी आंबा घाटात अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता,ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. सुरुवातीला हा अपघात वाटत असतानाच,पोलीस तपासात मात्र अंगावर शहारे आणणारे वास्तव समोर आले आहे.. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत सुधीरचा मित्र आशिष शांताराम भावके यानेच त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.. मद्यधुंद अवस्थेत असताना किरकोळ वादातून आशिषने रागाच्या भरात सुधीरला कारची जोरदार ठोकर दिली,ज्यामध्ये सुधीरचा मृत्यू झाला.. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आशिष भावके याला बेड्या ठोकल्या आहेत.. सोमवारी त्याला रत्नागिरीतील देवरुख न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.. क्षुल्लक वाद आणि नशेच्या विळख्याने एका तरुणाचा बळी घेतला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे..0
0
Report
सोलापुर वन विभाग में करोड़ों के भ्रष्टाचार के आरोप, पालकमंत्री से कार्रवाई की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर वनविभागामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप, जनशक्ती शेतकरी संघटनेची पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून अटल घन वन प्रकल्पामध्ये नियमबाह्य कामे दाखवत भ्रष्टाचार झाल्याचा दावा जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करमाळा तालुक्यात नगरपालिका, महापालिका तसेच एमआयडीसी क्षेत्रात लागवड करण्याचा नियम असताना वनविभागाकडून नियमबाह्य काम करण्यात येतेय धक्कादायक बाब म्हणजे 17 मार्चला प्रस्ताव दिला आणि 24 मार्चला त्यांना मंजुर मिळाली. माग 31 मार्चच्या आत ही कामे पूर्ण कशी होणार जवळपास 3 कोटी पेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाय. शिवाय जुन्या तारखेच्या प्रशासकीय मान्यता दाखवण्यात आल्या आहेत याशिवाय 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या कामाचे ऑनलाईन टेंडर काढणे अनिवार्य असताना तसे झालेले नाही. म्हणून मियावाकी वृक्षाच्या लागवडीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार यापूर्वी दिली आहे0
0
Report
Advertisement
सोलापुर में जैनमुनी नयन पद्मसागर के खिलाफ ऑनलाइन शिकायत दर्ज, विवाद गर्म
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल\n\n- वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल \n\n- सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली.\n\n- मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिलीय \n\n- महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे चुकीचे वक्तव्य केले होते.\n\n- त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने 6 दिवसापूर्वी निवेदन दिले होते.\n\n- मात्र जैनमुनीविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यात आली0
0
Report
आकोला नगरपालिका की कार्रवाई: नाश्ते की गुमठा में गंदे पानी का खुलासा, स्वास्थ्य पर सवाल
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर झोपेतून जाग येत नवीन बस स्थानक परिसरातील नाश्त्याच्या हातगाड्यांवर कारवाई केली आहे. मात्र हा प्रश्न उपस्थित होतो की, ही कारवाई खरंच जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून झाली आहेका, की फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाखवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे? नाल्यातील घाण पाणी नाश्ताच्या दुकानात वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कर्मचारी नाल्यातून पाणी भरून नेताना दिसत आहेत. हा प्रकार केवळ घृणास्पदच नाही, तर थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होतो. इतक्या दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना प्रशासन झोपेत होतं का? सोशल मीडियावर प्रकरण गाजल्यानंतरच कारवाई का? शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे नियमांची पायमल्ली होत असताना तिकडे मात्र दुर्लक्ष का? महापालिकेने आता कारवाईचा बडगा उचलला असला तरी ही कारवाई सातत्याने होणार का, की काही दिवसांत पुन्हा परिस्थिती जैसे थे होणार? नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं हा त्यांचा हक्क आहे, आणि तो हक्क पायदळी तुडवणाऱ्यांवर केवळ दिखाऊ नव्हे तर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई होणं गरजेचं आहे. या ठिकाणचं अतिक्रमण काढणच यावर उपाय नसून नाश्त्याची गुणवत्ता तपासणीही अधिक महत्त्वाची आहे.0
0
Report
अमरावती में टमाटर संकट: किसान लागत से परेशान, सरकार से मुआवजे की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती जिले में टमाटर उत्पादक किसान आर्थिक संकट में हैं. बाजार में टमाटर के दाम केवल 4 से 5 रुपये प्रति किलो रहने के कारण किसानों के उत्पादन खर्च भी निकल नहीं रहे. टमाटर की आपूर्ति बाजार में अधिक होने से मांग घट रही है और व्यापारी खरीद में रूचि नहीं ले रहे. इस कारण किसान नाराज होकर टमाटर खेत के बाहर फेंकने को मजबूर हैं. किसानों ने तत्काल सरकार से हस्तक्षेप कर टमाटर के उचित न्यूनतम भाव और नुकसान की भरपाई की मांग की है.0
0
Report
Advertisement
