445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
टीसीएस मामले में यौन उत्पीड़न और धर्मांतरण: दो आरोपी फिर से पूछताछ के लिए
Nashik, Maharashtra:टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण टीसीएस प्रकरणातील सहा पैकी दोघांची आज पुन्हा चौकशी शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा मेमन यांना न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा घेतले ताब्यात पुढील गुन्ह्यात चौकशी साठी ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार मुंबई नाका पोलिसांकडून पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी चौकशी पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्यााचा दोघांवर आरोप फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत शोधण्याच्या चौकशीसाठी दोघांना घेतले ताब्यात बँक व्यवहार आणि फंडिंगचीही चौकशी होणार0
0
Report
रत्नागिरी जिले में पानी की किल्लत, 34 हजार नागरिक प्रभावित, 17 टैंकर पानी पहुंचा रहे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा विळाखा. 43 गावांतील 34 हजार ग्रामस्थांचे हाल. 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा. जिल्ह्यात उन्हाचा तडाका वाढल्याने पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. जिल्ह्यातील नद्या,नाले आणि विहिरीच्या पाणी पातळी झपाट्याने घट झाल्याने 43 गावांमधील 99 वाड्यांना आता तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवडाभरात 11 गावे आणि 21 वाड्यांची या टंचाईग्रस्त यादीत भर पडली आहे. बाधीतवाड्यांची संख्या आता 100 च्या उंबरठ्यावर पोचली आहे. जिल्ह्यातील सध्या 34 हजार 295 ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाकडून 17 ट्रँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.0
0
Report
चाकण स्थित सॅनी कंपनी में तेंदुआ प्रवेश, कर्मचारियों में दहशत
Khed, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील सॅनी कंपनीमध्ये बिबट्या शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या कंपनी परिसरात शिरल्याची माहिती मिळत आहे. कंपनीच्या परिसरात बिबट्या दिसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र औद्योगिक परिसरात बिबट्या शिरल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाकडून नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कंपनीमध्ये बिबट्याची एन्ट्री सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.0
0
Report
Advertisement
Kolhapur जिले के डैम में 42 टीएमसी पानी शेष; पेयजल बचत अनिवार्य
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यामधील धरणामध्ये सध्या 42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा वाढणारा तडाखा आणि पाऊस पुढे जाण्याची भीती यामुळे उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पंचागंगा आणि भोगावती नद्यांवर उपसा बंदी लागू केली आहे. जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिल्यावर पिण्याचे पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवले जाणार आहे.0
0
Report
जीवंतपणी दशक्रिया से बढ़ी बहस: स्वास्थ्य और धर्म का संगम नाशिक में
Yeola, Maharashtra:अँकर:- नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कोकणखेडे गावाच्या सुभाष बजाबा एळींजे यांनी जीवनातपणीच आपला दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. मृत्यूनंतर स्वर्ग कोणी पाहिला, मृत्यूनंतर दशक्रिया विधीला कोणी येईल हे कोण पाहणार हाच स्वर्ग आहे असे समजून त्यांनी दशक्रिया विधी केला. मानवता हा एकच धर्म अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानवादी दृष्टिकोन जोडण्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सांगितले जात आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध समाज प्रबोधनकार सप्त खंजीर वादक सतपाल महाराज यांचे कीर्तन ठेवले आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आलेल्या आप्त स्वकीयांसाठी जेवणावळीचा बेतही आखला. त्यामुळे या जिवंतपणी दशक्रिया विधीची चर्चा तर होणारच...0
0
Report
मेन्रोड स्थित जूस बार से मोटरसाइकिल चोरी, CCTV से तीन संदिग्धों की तलाश
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव शहरातील मेनरोड परिसरातील ज्यूस बारसमोरून मोटरसायकल चोरी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून CCTV फुटेजच्या आधारे संशयित तिघा चोरट्यांचा शोध घेत आहेत. काल बुधवारी दुपारी सुमारे पावणे बारा वाजेच्या दरम्यान तिघे अज्ञात युवक मेनरोडवरील ज्यूस बारमध्ये लस्सी पिण्यासाठी आले होते, लस्सी पिल्यानंतर त्यांनी ज्यूस बार चालक महेश विठ्ठल बकरे यांची बाहेर उभी असलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेली. महेश बकरे यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्याने वेगाने वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालवत घटनास्थळावरून पळ काढला. मेनरोड परिसरात काही काळ खळबळ उडाली होती; लासलगाव पोलीसांनी परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में नाबालिगों को वाहन चलाने के प्रकरण पर 15 पेरेंट्स के खिलाफ मामला दर्ज
Kolhapur, Maharashtra:अल्पवयीन मुलांना दुचाकी आणि चार चाकी वाहने देताय तर सावधान. कोल्हापुरात 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या हातात दुचाकी आणि चार चाकी वाहने देणाऱ्या शहरातील 15 पालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन मुलांनी वापरलेली वाहने देखील जप्त केले आहेत.. कोल्हापूर शहरामध्ये अपघाताच्या घटना रोखण्यासाठी अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या हातात दुचाकी आणि चार चाकी देणाऱ्या पालकांनी विरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापुर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये आठ, जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये एक, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये तीन आणि राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास पालक आणि वाहन मालकांना तीन वर्षापर्यंतचा कारावास, 25 हजाराचा दंड होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी कमी वयोगटातील मुलांना वाहने देऊ नयेत असा आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहेत.0
0
Report
सोलापुर में प्रणिती शिंदे बनाम देवेंद्र फडणवीस: भाजपा का तीखा हमला
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - खा. प्रणिती शिंदे यांचे मूळ दुखणे देवेंद्र फडणवीस आहेत - आ. सचिन कल्याणशेट्टी - सोलापुरात भाजप आ.सचिन कल्याणशेट्टी यांची खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर सडकून टीका - खा. प्रणिती शिंदे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपा आक्रमक - खा. प्रणिती शिंदे यांच्या मूळ दुखणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत - प्रणिती शिंदे या वयाने, कर्तुत्वाने अशा अनेक गोष्टींनी खूप लहान आहेत - अनेक रथी महारतींनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला मात्र ते घरी जाऊन बसले - खा. प्रणिती शिंदे यांना मित्रत्वाचा सल्ला आहे आव्हान करताना आपली पात्रता उंची असे म्हणणार नाही मात्र ते कुठे आहेत आपण कुठे आहोत याचा विचार करावा - प्रणिती शिंदे यांना डीपीसीच्या निधीसाठी उपोषणाला बसण्याची पाळी येते, आणि इकडे 700-800 कोटी मिळाल्याचा दिंडोरा पेटवतात - महिना दोन महिन्याला सोलापूरला येण्यापेक्षा त्यांनी रोज मतदार संघात आले असते तर माझी पोस्ट बघितल्यावर त्यांना कळायची वेळ आली नसती0
0
Report
उरुळी कांचन सोरतापवाडी में नाबालिग से दुष्कर्म; दो आरोपी गिरफ्तार
पुण्याच्या ग्रामीण भागातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिडीत मुलीचा पाठलाग करून, तिला धमकावून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी गावात घडली आहे. २७ एप्रिल ते ५ मे या कालावधीत आरोपी आकाश ओव्हाळ याने पिडीत मुलीचा पाठलाग केला. 'आय लव्ह यू' म्हणत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र, नराधमाची मजल इतक्यावरच थांबली नाही. ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास, आकाशचा मित्र अभिजीत खंडागळे याने मुलीला बोलावून घेतले आणि त्यानंतर आकाश ओव्हाळ याने जबरदस्तीने तिला कॅनॉलजवळील मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला नेले. तिथे अंधाराचा फायदा घेत तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. इतकेच नाही तर, याबद्दल कोणाला सांगितल्यास मामाला जीवे मारण्याची धमकीही या नराधमांनी दिली.0
0
Report
Advertisement
मेळघाट में भीषण जलसंकट: नौ गाँवों को 20 टैंकर पानी, 6 हजार नागरिक प्रभावित
Amravati, Maharashtra:मेळघाटात भीषण पाणी टंचाई, नऊ गावांना 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा; 6 हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांमध्ये नैसर्गिक पाणीस्रोत आटल्याने प्रशासनाकडून तब्बल २० टँकरच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी खालावल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही पाणीटंचाई मेळघाटातील ९ गावांत गावात असून ६ हजार ७६ नागरिक टँकरवर अवलंबून आहे. सध्या चिखलदरा तालुक्यात २० टँकर कार्यरत असून विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक स्रोत आटले त्यामुळे वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी घटली आहे. मोथा, खडीमल, गोलखेडा बाजारसह ९ गावांचा या भीषण पाणीटंचाई समावेश करण्यात आला असून प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असून शासन काय उपाययोजना करते असा सवाल मेळघाटातील आदिवासी उपस्थित करत आहे.0
0
Report
भंडारा के निजी पुलिस प्रशिक्षण केंद्र के 16 प्रशिक्षु भर्ती सफल, उत्साह का माहौल
Bhandara, Maharashtra:पोलीस भरतीत १६ प्रशिक्षणार्थ्यांची निवड; जल्लोषात यशाचा आनंद Anchor :- भंडारा येथील एका खाजगी पोलीस प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रातील १६ प्रशिक्षणार्थ्यांची नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत निवड झाली. यशाची बातमी समजताच केंद्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षक व पालकांनी अभिनंदन करत मिठाई वाटप केले. यावेळी डिजेच्या तालावर युवकांनी ठेका धरत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून परिसरातून निवड झालेल्या उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.0
0
Report
कोल्हापुर जिला परिषद में निधि बंटवारे पर सत्ता-विरोधी के बीच गरमाहट, 60-40 चर्चा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सम समान वाटणीची चर्चा असताना सत्तादारांकडून 60 40 सूत्रावर सहमती दर्शवल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषदेला केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगातून सुमारे 76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचे सम समान वाटप झालं पाहिजे अशी भूमिका विरोधी सदस्यांचे असताना, मिळालेल्या निधीतील वाटा सत्ताधाऱ्यांना अधिक देण्याच्या हालचाली सुरू असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.0
0
Report
Advertisement
हाईकोर्ट ने कोपेश्वर मंदिर के संवर्धन पर विस्तृत अहवाल मांगा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर इथं असणाऱ्या कोपेश्वर मंदिर कामाचा अहवाल सादर करण्याचा आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. कोपेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2021 मध्ये जाहीर केलेल्या 101 कोटी रुपयांचा निधीचा प्रभावी वापर झाला नसल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या नसल्याचा मुद्दाही याचिकेत नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणाशी संबंधित विभागांना कामाचा सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. मदत फाउंडेशनच्या माध्यमातून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर हे पुरातन आणि महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे.... उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जन याचिकेत.0
0
Report
नागपुर के धरमपेठ ज़ोन में पेयजल आपूर्ति से नागरिकों में नाराज़गी
Nagpur, Maharashtra:नागपुरात धरमपेठ झोनमध्ये विविध भागात पाणीपुरवठ्यावरून नागरिकात नाराजी आहे. अनियमित आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा याबाबत तक्रार नगरसेवक आणि स्थानिक नागरिकानी केलीय. पाणी समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आणि नगरसेवकांनी महापालिका धरमपेठ झोन जलप्रदाय विभाग शहरात पाणीपुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन निवेदन दिले. अनेक वर्षांपासून ही समस्या असून तातडीने मागणी यावी तक्रारदार नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी केली.0
0
Report
गायब युवक का कंकाल मिलने के दो दिनों में पहचान, पुलिस ने पुष्टि
Akola, Maharashtra:बेपत्ता तरुणाचा सांगाडा सापडला, दोन दिवसांत ओळख पटवण्यात पोलिसांना यश.. अखोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडेलेल्या एका अनोळखी मानवी सांगाड्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत यश आले आहे. हा सांगाडा सोपान धोंडबा खाडे (वय ३२ वर्षे, रा. हराळ, ता. रिसोड, जि. वाशीम) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी अनिकट पोलीस लाईनजवळ हा सांगाडा आढळून झाला होता. सोशल मीडियावरील माहिती आणि तपासाअंती मृताच्या भावाला बोलावण्यात आले. त्यांनी कपड्यांवरून आपल्या भावाची ओळख पटवली. सोपान खाडे हे उपचारासाठी अकोल्यात आले होते, मात्र तिथून ते बेपत्ता झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र हे मृत्यू कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.0
0
Report
Advertisement
