445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नंदूरबार निधि बंटवारे पर शिवसेना विधायक भावुक, दो मंत्रियों के सामने रो पड़े
Dhule, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला असून, याच असमान निधी वाटपावरून शिवसेनेचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी हे थेट दोन शिवसेना मंत्र्यांसमोरच भावुक झाल्याचे चित्र समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमधील धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली असून, याच धुसफुसीतून जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाच्या ठरलेल्या सूत्रावरून विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करताना आज शिवसेनेच्या मेळाव्यात दोन मंत्र्यांसमोरच त्यांना रडू कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेचे सध्या विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी असे दोन आमदार आहेत. अशातच नियोजन समितीच्या ठरलेल्या निधी वाटपाच्या सूत्रानुसार या दोन्ही आमदारांच्या वाट्याला अत्यल्प निधी येत असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. यातून कार्यकर्त्यांची कामे करायची कशी, असा सवाल करतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी भावनिक झाले. याच मुद्द्यावरून मंत्र्यांसमोरच त्यांना रडू कोसळले. त्यामुळे याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर पक्षनिहाय निधी देण्याची विनंती त्यांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.0
0
Report
मोक्का के तहत अंमली पदार्थ तस्करी: 9 किलो 768 ग्राम हेरॉइन के साथ गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:Anchor-कल्याण में अंमली पदार्थ तस्करी के अपराधियों पर पुलिस ने मोक्का कानून के अंतर्गत कार्रवाई की है। महात्मा फुले चौक पुलिस थाने के एनडीपीएस अपराध में पांच आरोपियों को गिरफ्तार किया गया है। इस कार्रवाई में आरोपियों के पास से कुल 9 किलो 768 ग्राम हेरॉइन जप्त की गई है। जप्त हेरॉइन की कीमत लगभग 3 करोड़ 41 लाख 85 हजार रुपये है। इसके अलावा आरोपी के कब्जे से 29 हजार रुपये की रक़द और मोबाइल फोन भी बरामद किया गया। आरोपी अमजद युसूफ पठाण के अनुसार अंमली पदार्थों की तस्करी की जा रही थी, जिसकी पुष्टि जांच में हुई है। गिरफ्तार आरोपियों पर महाराष्ट्र, राजस्थान और मध्य प्रदेश में अंमली पदार्थों की तस्करी, बिक्री, हत्या, मारामाड़ी जैसे गंभीर अपराधों के कुल 20 मामले दर्ज हैं। इससे पहले भी कुछ आरोपियों पर मोक्का कानून के तहत कार्रवाई की जा चुकी है।0
0
Report
गणेशोत्सव के चलते मुंबई-गोवा महामार्ग पर अवजड वाहनों पर रातभर रोक लागू
Chendhare, Maharashtra:स्लग - मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी ....... आज मध्यरात्रीपासून बंदी लागू ....... अँकर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड आणि लांब वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू होणार असून, ठराविक कालावधीत अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश बंद राहणार आहे. मात्र दूध, भाजीपाला आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. याबाबत रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी माहिती दिली आहे.0
0
Report
Advertisement
आयकर-क्राइम ब्रांच बनावट से 1 करोड़ खंडणी मांगने वाले गिरोह का अंधेरी में पर्दाफाश
Mumbai, Maharashtra:अंधेरीत बनावट आयकर छापा टाकून १ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबईच्या अंधेरी परिसरात आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट छापा टाकत तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली असून, यामध्ये आयकर विभागात कार्यरत असलेल्या एका आयकर निरीक्षक आणि एका कर सहायकाचाही समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार राजकुमार कन्डासमी यांच्याकडे पूर्वी चालक म्हणून काम करणाऱ्या संतोष खोपटकर याचा तक्रारदारासोबत वाद झाला होता. त्यानंतर तक्रारदाराने संतोषला नोकरीवरून काढून टाकले होते. याचाच राग मनात धरून संतोषने आपल्या साथीदारांसोबत कट रचल्याचा आरोप आहे. आरोपींनी आयकर आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचा बनाव करत तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला धमकावण्यात आले. तसेच कार्यालयातील सुमारे दहा कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेत त्यांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. आयकर विभागामार्फत कारवाई करण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली आणि कारवाई टाळण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे अंधेरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
वाशीम में ट्रैक्टर पोळा उत्सव: आधुनिक खेती को परंपरा से जोड़े
Washim, Maharashtra:वाशीम: शेतीकामात बैलांप्रमाणेच आता ट्रॅक्टरलाही महत्त्व प्राप्त झालं आहे.कमी वेळेत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरला प्राधान्य देतात.याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अनोख्या पद्धतीने ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला.गावातील सर्व ट्रॅक्टर मालकांनी सहभाग घेत ट्रॅक्टरची पूजा केली.आधुनिक शेतीमुळे बैलांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्याचा आधुनिक साथीदार ठरलेल्या ट्रॅक्टरसोबतच पारंपरिक बैलपोळ्याची आठवण करून देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिकं संकटात असल्याने यंदाचा पोळा मात्र बळीराजासाठी चिंतेचा ठरला आहे.0
0
Report
गोराई राजा की पहली झलक: 15 फुट मूर्ति से भक्तों में चहल-पहल
Mumbai, Maharashtra:मुंबईतील गणेशोत्सवाची लगबग आता शिगेला पोहोचली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच बोरिवलीच्या प्रसिद्ध गोराईचा राजाच्या आगमनाची पहिली झलक आज गणेशभक्तांना पाहायला मिळाली. एक्सर वर्कशॉप येथील गणेश चित्रशाळेतून गोराईच्या राजाच्या भव्य मूर्तीचे आज विधिवत प्रस्थान करण्यात आले. तब्बल 15 फूट उंचीच्या या बाप्पाच्या मूर्तीच्या आगमनासाठी गोराई परिसरातील रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा ‘गोराईचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 32 वे वर्ष असून, ‘आगमनाधीश बाप्पा’ म्हणून या मंडळाची विशेष ओळख आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. एक्सरच्या गणेश चित्रशाळेतून ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाची मूर्ती गोराईच्या दिशेने मार्गस्थ झाली. बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी आणि आगमन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गोराईच्या राजाच्या आगमनाने परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढला आहे.0
0
Report
Advertisement
यवला में बैलपोला पर बारिश भारी, किसानों में उत्साह की लहर
Yeola, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यानंतर ऐन बैलपोळ्याच्या दिवशी येवला शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेરી लावली... त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पावसाची संततधार सुरू असतानाही येवल्यातील मानाच्या शिंदे घराण्याच्या बैलाची वाजत-गाजत मिरवणूक काढत बैलपोळा सणाला उत्साहात सुरुवात करण्यात आली... पावसाच्या सरी आणि पारंपरिक उत्साहामुळे येवल्यात बैलपोळ्याचा जल्लोष पाहायला मिळला या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में सोने के अलंकारों से विठ्ठल आकर्षक, भक्तों की भीड़
Pandharpur, Maharashtra:गोकुळ अष्टमी व बैल पोळा उत्सव निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलास आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी अलंकृत करण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गोकुळ अष्टमी व बैल पोळा उत्सव निमित्त श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, मोत्याचा तुरा, नाम हिऱ्याचा,कौस्तुभ मणी,दंडपेट्यात जोड मोठा, हिऱ्याचे कंगनजोड, मोत्याची कंठी दोन पदरी, शिरपेच लहान, शिरपेच मोठा, मस्त्य जोड, लक्ष्मी हार, अष्टपैलू मण्याची कंठी तीन पदरी, तांदळा हार सात पदरी, एकदानी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी, तोडेजोड आदी पारंपरिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले.0
0
Report
किसान बैलगाड़ी पर सूखा मांग लिखकर पोळा कार्यक्रम में आक्रोश दिखाए
Yavatmal, Maharashtra:शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्यात यंदा शेतकऱ्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अनोख्या पद्धतीने केली. बैलाच्या अंगावर ही मागणी लिहून पांघरलेली झुल लक्षवेधी ठरली. महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे शेतकऱ्यांनी शासनावर आसूड ओढत आपल्या सर्जा राजाचा बैलपोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा केला. पावसा अभावी निर्माण झालेला दुष्काळ, फसवी पिक विमा योजना आणि फसवी कर्जमाफी या मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी पारंपारिक झडत्या सादर केल्या. पावसाने पाठ फिरवल्याने यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाळा आटोपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतशिवार कोरडेठाक पडले असल्याने रानावनातील हिरवा चारा गायब झाला आहे. पिके मरणासन्न अवस्थेत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.0
0
Report
Advertisement
उरण में द्रोणागिरी में स्थानीय मराठी परिवार पर प्रवासियों का खौफनाक हमला, आरोपी गिरफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:उरण मधील द्रोणागिरी येथे शुल्लक कारणावरून एका स्थानिक मराठी कुटुंबियांवर परप्रांतीयांनी जीवघेणा हल्ला केलाय. जेवल्या नंतर स्कूटीवर फेरफटका मारायला आलेल्या रुपेश भोईर याच्या अंगावर द्रोणागिरी येथे एका झोपडपट्टी जवळ असलेल्या इसमाने जेवणाचा खरखटा फेकला असता याचा जाब रुपेश ने विचारला. याचं रागातून सदर इसमाने आपल्या 10 ते 15 साथीदारांना बोलावून रुपेश वर लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात रुपेशला मारहाण करण्यात आली असून पत्नी आणि मुलीच्या अंगावर कुऱ्हाड भिरकावण्यात आली. घटनास्थाळा वरून जिवाच्या आकांताने पळ काढल्या नंतर हल्लेखोरांनी स्कूटीवर हल्ला चढवत त्याची तोडफोड केलेय. याप्रकरणी 3 जणांसह इतर हल्लेखोरां विरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.0
0
Report
किसानों को तुरंत बोनस दें! सरकार के वाद को लेकर बढ़ी नाराज़गी
Bhandara, Maharashtra:शेतकऱ्यांना तात्काळ बोनस द्या... शासनाने दिलेला शब्द पाळा.... बैलांच्या शिंगांवरही झळकली बोनसची मागणी.... पोळ्यानिमित्त बैलांच्या शिंगांवर व पाठीवरून तसेच बॅनरच्या माध्यमातून ‘शेतकऱ्यांना बोनस द्या’ असा संदेश देण्यात आला. शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सण असलेल्या पोळ्यातूनच शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांनी केला आहे....0
0
Report
मनसे के विरोध के बाद सेवन स्क्वेअर अकादमी ने फैसला वापस लिया
Mira Bhayandar, Maharashtra:मनसेच्या जोरदार विरोधानंतर सेव्हन स्क्वेअर अकॅडमीचा निर्णय अखेर मागे! आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या टिफिनमध्ये कांदा, बटाटा आणि लसूण असलेले पदार्थ आणण्यास मनाई करण्यात आली होती. या निर्णयाला मनसे नेते अविनाश जाधव यांच्या प्रयत्नांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी दिवसभर केलेल्या जोरदार विरोधानंतर शाळा प्रशासनाने अखेर हा निर्णय मागे घेतला।0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में गणेश भक्तों के बीच आरटीओ की चेकिंग, रिक्षा भाड़ा वसूली रोक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची रिक्षा चालकांकडून लुट होऊ नये म्हणून रत्नागिरी आरटीओ विभाग अक्शन मोडवर प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे स्टेशनसह जिल्ह्याभरात मुख्य ठिकाणी लावले दर फलक, शेअर रिक्षाचेही लावले दरफलक प्रवाशांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी आरटीओ पथकाची तपासणी मोहीम रिक्षा भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे आणि मीटर प्रमाणे भाडे न आकारणे अशा रिक्षा चालकांच्या विरोधात होणार कारवाई रत्नागिरी रेल्वे रेल्वे स्थानकावर येतात लाखोंच्या संख्येने गणेश भक्त अवाजवी भाडे आकारून लूट थांबवण्यासाठी जिल्ह्यात मुख्य वर्दळीच्या ठिकाणी RTO विभागाची तपासणी मोहीम..0
0
Report
शिर्डी में 629 ग्राम सोने का मुकुट दान, कीमत 82 लाख
Shirdi, Maharashtra:बैळपोळा सणाच्या दिवशी शिर्डीत भक्ती आणि श्रद्धेचं अनोखं दर्शन घडलंय. आंध्र प्रदेशातील एलुरु येथील देणगीदार साईभक्त एम. श्रीनिवास राव यांनी साईचरणी 629 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट देणगी स्वरूपात साईबाबांना अर्पण केलाय. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची किंमत तब्बल 82 लाख 39 हजार 271 रुपये इतकी आहे. साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून अर्पण केलीली ही सुवर्णभेट भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक ठरलीय. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त एम. श्रीनिवास राव यांचा सत्कार केला. पोळ्याच्या पवित्र पर्वावर साईचरणी अर्पण झालेल्या या सुवर्ण मुकुटाने शिर्डीत भक्तीची श्रीमंती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे...0
0
Report
नागपुर की बडग्या प्रसार में आसिफ मुनीर के खिलाफ राजनीतिक फलक, विवाद तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपुरात मारबत बडग्यांच्या मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा आहे. सामाजिक कुप्रथेवर, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करणारे तसेच देशाविरुद्ध बोलणाऱ्यांवर टीका करणारे फलक बडग्यांवर लावण्यात येतात... राजकीय भाष्य व टीकाही करण्यात येते... सरकारी धोरण आणि वर्तमान घडामोडींवर थेट सवाल उपस्थित करणारे बडगे निघत असतात... यंदा छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाने पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिफ मुनीरचा बडग्या काढणार आहे... भारताविरुद्ध सगळ्या लढायांमध्ये हरणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा हा फील्ड मार्शल... सतत पोकळ वल्गना करत असतो..... तसेच भारताविरुद्ध नेहमी कटकारस्थान करत असतो... म्हणून त्याच्या विरुद्ध हा बडग्या काढण्यात आलाय... गेल्या वेळेस याच मंडळाने भारतावर टेरिफ लादणाऱ्या ट्रम्पचाही बडग्या काढला होता ...यंदा आसिफ मुनीरचा बडग्या काढणाऱ्या छत्रपती शिवाजी पार्क समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
