445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाणार बॉक्साइट: जनसुनावणी टली, सत्ता-विरोधी के आरोप बरकरार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी कोकणचा 'बॉक्साईट' ब्लास्ट!.. नाणारमध्ये जनसुनावणी स्थगित,पण ठिणगी कायम.. राऊत-सामंत आमनेसामने!.. अँकर इंट्रो.. रत्नागिरीच्या तांबड्या मातीत सध्या प्रकल्पांच्या विरोधाचा धूर निघतोय. राजापूरच्या नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. स्थानिकांचा तीव्र विरोध पाहता पालकमंत्र्यांनी जनसुनावणी स्थगित केली, पण विनायक राऊतांनी याला 'सरकारची चाल' म्हटलंय. नेमकं नाणारमध्ये काय घडतंय? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून... कोकणचा निसर्ग,हापीसच्या बागा आणि इथली शांतता... पण याच शांततेत आता आंदोलनाचा एल्गार घुमतोय. राजापूरच्या नाणार परिसरात प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी शड्डू ठोकलाय. 20 आणि 28 मे रोजी होणारी जनसुनावणी प्रशासनाने रद्द केली आहे. या निर्णयाची माहिती खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली,पर ही स्थगिती वादावर पडदा टाकेल की वादाची नवी ठिणगी टाकेल, हाच मोठा प्रश्न आहे. उदय सामंत, पालकमंत्री पालकमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेतली असली, तरी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी याला सरकारचा 'वेळकाढूपणा' म्हटलंय. सुनावणी केवळ पुढे ढकलली आहे, कॅन्सल केलेली नाही, असा दावा करत त्यांनी कोकणी माणसाला सावध राहण्याचं आवाहन केलंय. विनायक राऊत, माजी खासदार प्रमोद जठार, माजी आमदार यांनीही या प्रकल्पाला विरोध करत घरचा आहेर दिला आहे. रिफायनरीला पाठिंबा देणारे जठार बॉक्साईट प्रकल्पाच्या बाबतीत मात्र आक्रमक झाले आहेत. प्रमोद जठार, माजी आमदार या सगळ्या राजकीय कलगीतुऱ्यात सर्वात महत्त्वाचा आवाज आहे तो इथल्या भूमिपुत्रांचा. नाणार आणि परिसरातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात आरपारची लढाई लढण्याची तयारी केली आहे. स्थानिक ग्रामस्थ0
0
Report
वाशीम में बिना रिफ्लेक्टर के वाहनों पर आरटीओ का विशेष अभियान; 104 वाहन दण्डित
Washim, Maharashtra:राशिम जिल्ह्यात रिफ्लेक्टरविना धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने आरटीओ विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मागील три महिन्यांत रिफ्लेक्टर नसलेल्या १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, डंपर, बस आदी वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनधारक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर बसवावेत,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.0
0
Report
वाशिम के किसानों को सौर कृषि पंप योजना की देरी से झकझोर, आंदोलन चेतावनी
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनें अंतर्गत व washim च्या रिसोड तालुक्यातील वाकद, सवד, घोटा, चिखली, व्याड, कवठा, गोभणी, भर जहाँगीर यांसह अनेक गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज करून आवश्यक शुल्क भरले आहे. मात्र, अर्ज मंजूर होऊन सहा महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप सौर कृषीपंपाची जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कंपनीकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पुढील हंगाम तोंडावर असताना सौर पंप जोडणी रखडल्याने पिकांच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. प्रलंबित जोडण्या तातडीने द्याव्यात अन्यथा पुढील 15 दिवसांत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
पनवेल के ओवे कैंप गांव में पानी की भीषण टंकी, हर घर में 5–10 ड्रम
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मनपा क्षेत्रातील ओवे कॅम्प गावात पाण्याची भीषण टंचाई, प्रत्येक घरासमोर 10 10 ड्रम. पहा विशेष रिपोर्ट. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर येथे असणारे ओवे कॅम्प गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेय. प्रत्येक घरासमोर 5 ते 10 ड्रम आणि पाण्याच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ अशी गंभीर परिस्थिती पहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरष्ट्रिय विमानतळाला लागून असलेल्या पनवेल महानगरपालिकेत पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झालेय. आठवड्यातून एकदा येणारा टँकर आणि नळातून अवघ्या काही मिनिटांसाठी येणारे पाणी साठविण्यासाठी नागरिकांनी चक्क 10 10 ड्रम विकत घेतले आहेत. प्रत्येक घरासमोर हे ड्रम लागलेले पहायला मिळत असून पनवेल महानगरपालिका आणि सिडको दोघांनीही दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असताना पाणी टंचाईची भीषणता अधिक गडद होतं असून आम्हाला रोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. ओवे कॅम्प गावातील पाण्याची भीषणता दाखवत या गावातील ग्रामस्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.0
0
Report
वाशीम में कृत्रिम जलस्रोतों से वन्यजीवों को राहत, पानी की स्थिति सुधरी
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटत असल्याने वन्यप्राण्यांसमोर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.यावर उपाय म्हणून वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली असून दिवसातून दोन वेळा टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे.त्यामुळे हरिण,नीलगाय,रानडुक्कर,माकडे तसेच पक्ष्यांना मोठा दिलासा मिळत असून वन्यप्राणी लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे।0
0
Report
शिरूर में 42°C तापमान से मेथी की फसल बर्बाद, किसान परेशान
Shirur, Maharashtra:सध्या वाढत्या तापमानाचा मेथी पिकाला मोठा फटका बसत असून पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात तापमान 42 अंशांच्या पार केल्याने शेतातील उभे मेथीचं पीक शेतातच करपून गेलंय. सध्या मेथीला चांगला बाजार भाव मिळतोय. या आशेने शेतकऱ्यांनी शेतात मेथीचं पीक घेतलं मात्र वाढत्या तापमानाचा या मेथी पिकाला मोठा फटका बसला असून बाजार पेठेत पोहोचण्या आधीच मेथीचं पीक शेतातच जळून गेलंय.0
0
Report
Advertisement
हळदी की विक्रमी आवक से कीमतें गिरीं, किसान नाराज़
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत काल हळदीची विक्रमी ७ ते ८ हजार क्विंटल विक्रमी आवक झाली. आवकामुळे दिवसभरात केवळ ६० टक्के हळदीचा लिलाव पूर्ण झाला असून उर्वरित ४० टक्के लिलाव आज दुसऱ्या दिवशी केला जाणार आहे. त्यामुळे इतर शेतमालाची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आवक वाढल्याने हळदीच्या दरात घसरण झाली असून कांडी हळदीला १२,१०० ते १३,४५० रुपये, तर गट्टू हळदीला ११,३५० ते १२,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या घरणीमुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरले आहे.0
0
Report
गांव में प्रवासी नागरिकों को जमीन बेचने पर रोक के लिए ग्रामसभा तेज बहस
Ratnagiri, Maharashtra:गावातील परप्रांतीयांना जमीन विकण्याचा मुद्दा पुन्हा तापणार. लांजा तालुक्यातील गोविळ गावात परप्रांतीयाना जमिनी विक्री करू नये यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यासाठीचे पत्र दिलंय. गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने ग्रामपंचायतीला हे पत्र दिलंय. गावातील जमिन विक्री प्रकरणात गावातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी देखिल या पत्रातून करण्यात आलीय.0
0
Report
Kalamb Police Raid: 2 Officers Caught Bribing 36,000 in ACB Bust
Dharashiv, Maharashtra:कळंब पोलिस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई; ३६ हजारांची लाच घेताना दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) मोठी कारवाई या प्रकरणी अशोक दादाराव करवर याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे फरार तक्रारदाराचा रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदारांनी हप्त्याच्या स्वरूपात ४० हजार रुपयांची केली होती मागणी पोलिस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये आणि दुय्यम अधिकाऱ्यासाठी २० हजार रुपये अशी झाली मागणी पडताळणीनंतर दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न तक्रारदाराकडून ३६ हजार रुपये स्वीकारताना अशोक करवर याला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीकडून ३६ हजार रुपयांची लाचेची रक्कम, ३५० रुपये रोख, एक मोबाईल, कार व मोटारसायकलच्या चाव्या जप्त दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल0
0
Report
Advertisement
आंबेगांव नागापूर में भक्ष के पीछे बिबट्या कुएं में गिरा; मंचर वन विभाग की रेस्क्यू टीम ने सुरक्षित बाहर निकाला
Ambegaon, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात मानव आणि बिबट संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आंबेगाव नागापूर येथे भक्षाचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर मंचर वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.0
0
Report
कोकण के बॉक्साइट-रेफायनरी-आणुऊर्जा प्रकल्पों के खिलाफ एकजुटता का बिगुल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी रत्नागिरीमध्ये प्रेस घेतली, फक्त 20 तारखेची जन सुनावणी पुढे ढकललेली आहे. ती फक्त पुढे ढकलली आहे; कॅन्सल केलेली नाही. त्यामुळे आपल्याला बेसावध राहून जमणार नाही. जोपर्यंत बॉक्साईट प्रकल्प कॅन्सल होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे आंदोलन चालूच ठेवावं लागेल. म्हणून तुमच्या आमच्या जीवाशी खेळणारे हे बॉक्साइट प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प हे केवळ आणि केवळ कोकणच्या माथी मारायचे आहेत आणि चांगलं, चांगलं असेल ते गुजरातला पाठवायचंय. ही जी काही काय घाणेरडी वृत्ती आहे ती hाणून पाडण्याचं काम आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहून करायचं आहे. आपल्यापाठी नव्हे तर आपल्यापुढे एक पाहून पुढे टाकून या प्रकल्पांना विरोध करण्याचे काम आम्ही करणारच आहोत.0
0
Report
14 मई को कुलपति पद के लिए मुलाखत: शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर, 115 उम्मीदवार
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 14 मे रोजी मुलाखती होणार आहेत. राजभवन मध्ये या मुलाखती होणार असून त्यामध्ये डॉक्टर आर.के. कामत, ज्योती जाधव, पी.एस.पाटील, स्मिता देशमुख आणि संजय ढोले या उमेदवारांचा समावेश आहे. कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्या 115 उमेदवारांनी शोध समितीकडे अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी प्रक्रिया झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, संशोधनातील कामगिरी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला दिलेले योगदान तपासून उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. शिवाजी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू लाभावा अशी मागणी गेल्या अनेक महिन्यापासून केली जात होती. त्यानंतर आता कुलगुरू पदासाठी अंतिम उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.0
0
Report
Advertisement
वर्धा के करोड़ों खर्च से बना हॉकर्स प्लाज़ा आज भी खस्ताहाल, रोजगार के दावे खोखले
Wardha, Maharashtra:वर्ध्यात कोट्यवधी खर्चून उभारलेला वर्ध्यातील हॉकर्स प्लाझा ओसाड - रोजगाराच्या उद्देशाने बांधलेला प्रकल्प बनला गैरप्रकारांचा अड्डा? वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालयासमोरील जागेवर सन 2018-19 मध्ये हॉकर्स प्लाझाचे बांधकाम करण्यात आले होते. वर्ध्याच्या सौंदर्यात भर पडावी तसेच बेरोजगार युवक आणि महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला होता. या कामासाठी तब्बल 1 कोटी 4 लाख 55 हजार रुपये खर्च करण्यात आले होते..हा प्रकल्प आजही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. सध्या हॉकर्स प्लाझा ओस पडलेला असून परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली दिसत आहे.रात्रीच्या वेळी येथे काही समाजकंटकांकडून दारू पार्ट्या आणि इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.0
0
Report
चंद्रपुर के वेंडली से ओबीसी जाति जनगणना के लिए अभियान शुरू, आंदोलन की धमकी
Chandrapur, Maharashtra:जातिनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जनजागृती अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली गावातून सुरवात, रामलीला मैदानावर आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली गावातून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे. जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक है. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
कोल्हापुर सर्किट बेंच के सामने गोकुळ के पूर्व निदेशकों की याचिका, चुनाव 90 दिन में
Kolhapur, Maharashtra:गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांनी पुन्हा एकदा कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली आहे. प्रशासकीय मंडळाच्या विरोधात ही धाव घेण्यात आली आहे. यापूर्वी गोकुळच्या संचालकानी कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसात निवडणूक घेण्याच्या आदेश दिले आहेत. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने संचालकांना मुदतवाढ आणि प्रशासकीय मंडळाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती. त्यानुसार गोकुळच्या संचालकांनी पुन्हा एकदा कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून सर्किट बेंच मध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.0
0
Report
Advertisement
