Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Feb 24, 2026 12:39:12
Nashik, Maharashtra:नाशिक शहरातील जलालपूर येथील श्रीराम मंदिर के مالک کی 4.44 ہेक्टیر जमीन کی بےقانونہ فروخت کا جھوٹا واقعہ سامنے آیا ہے۔ वाल्मीकीनगर के रहिवाशों ने इस मामले में जिला प्रशासन से संपर्क किया है और 2 फरवरी 2026 को हुई जमीन की फेरफार पंजीकरण 5292 को रद्द कर देने की मांग की है। 1961 में स्थापित इस मंदिर की जमीन के लिए पहले पांच पंचों की नियुक्ति की गई थी, लेकिन पंचों के निधन के बाद कुछ व्यक्तियों ने संगनमत से अपने नाम वारश के तौर पर डालकर जमीन परस्पर विक्रय किया है। यह व्यवहार गैरकानूनी है और धार्मिक भावना को ठेस पहुंचाने वाला है, इसी कारण पंचवटी पुलिस थाना में मुकदमा दर्ज किया गया है। अभी प्रशासन और पुलिस इस प्रकरण की गहन जाँच कर रही है।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 12:35:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास मातीमोल - सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील ग्रहण कायम - महापुरानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका - गहू,ज्वारी, हरभरा,द्राक्ष, आंबे अशा अनेक पिकांचे वादळी वारा, अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान - एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाची देखील अवकृपा - महापुरानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आज उद्या मध्ये काढलेला ज्वारीची, हरभऱ्याची, गहुची पीक आडवी झाली आहेत तर दुसरीकडे द्राक्षाच्या भागांना आणि आंब्याच्या झाडांना सुद्धा मोठा फटका बसलाय.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 12:24:51
Akola, Maharashtra:माजी मंत्री तथा बच्चू कडू यांनी आज अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भेट देत शेती क्षेत्रातील नव्या घडामोडींचा आढावा घेतला. Vo : सध्या शेतीमध्ये होत असलेले बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यापीठात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी बच्चू कडू यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. कृषी क्षेत्र अधिक लवचिक, शाश्वत आणि शेतकरीहिताचे कसे होईल याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. विद्यापीठात विकसित होत असलेल्या नवीन वाणांच्या पिकांबाबत तसेच अत्याधुनिक शेती पद्धतींबाबत माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यापीठाच्या कार्याची स्तुती केली. यावेळी त्यांच्या सोबत काही शेतकरीही उपस्थित होते. नवीन रोपे घेण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्सुकता दाखवली. दरम्यान, “इतरांसाठी वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो?” असे हसत म्हणत बच्चू कडू यांनी स्मितहास्य केले आणि उपस्थितांमध्ये हलकं-फुलकं वातावरण निर्माण झालं.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 24, 2026 12:23:56
Buldhana, Maharashtra:सिंदखेडराजा नजीकच्या राहेरी पुलाचा वनवास संपता संपेना; वळणरस्त्याची अक्षरशः चाळणी, वाहन चालकांची कसरत. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावरील राहेरी पुलाचे काम रखडलेले आहे. पुल जीर्ण झाल्याने प्रशासनाने तो वाहतुकीसाठी बंद केला, मात्र पर्यायी वळण रस्त्याची अवस्था आता अत्यंत बिकट झाली आहे. पुलाचं काम तर होत नाहीच, पण जो वळण रस्ता दिलाय, त्याची अवस्था तर अशी आहे की तिथे रस्ता शोधण्यासाठी आता 'बिंगो' खेळावा लागेल इतकी त्याची चाळणी झालीये. वाहनधारकांचं कंबरडं मोडणाऱ्या या 'प्रशासकीय अकार्यक्षमतेचा' आणि प्रवाशांच्या संतापाचा ग्राऊंड झिरोवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 24, 2026 12:00:42
Nagpur, Maharashtra:नागपूर – ब्रिटिश एअरवेजच्या विमानाची हैदराबाद ऐवजी नागपूरला divert करुन लँडिंग करण्यात आली आहे. नागपूरला लँडिंग झाल्यानंतर बोईंग ७८७ विमानात काही तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले. विमानाचे जीपीएस सेट होत नसल्याने हे विमान अजूनही नागपूर विमानतळावरच आहे. ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७८७ विमान लंडनहून हैदराबादला जात असताना हैदराबाद विमानतळावर खराब हवामान असल्यामुळे त्याला लँडिंगची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विमानाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. लँडिंगनंतर तांत्रिक बिघाड असल्याचेही निदर्शनास आले. विमानात एकूण १६९ प्रवासी असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. प्रवाशांच्या नागपूरमधील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 24, 2026 11:47:00
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 24, 2026 11:46:44
Ambernath, Maharashtra:बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणी चौथी अटक अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव सोनल गरीवाल स्त्रीबीज प्रकरणात महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी केल्याचा आरोप Anchor - बदलाپورातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोनल गरीवाल या महिलेला अटक केली. त्या प्रकरणात अवैधरित्या सोनोग्राफीसाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली होती. यातील सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी सोनल गरेवाल या आणखी एका महिलेला अटक केलीय. या चौघींच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. Byte - सचिन गोरे, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 24, 2026 11:31:51
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 11:23:47
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिश्नोई गॅंगशी संबंधित असल्याचा आरोप असलेला शुभम लोणकर आणि अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लिप झी 24 तासच्या हाती लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शुभम लोणकर याने विदेशातून आमदार साजिद खान पठाण यांना फोन केला होता.या फोन कॉलमध्ये तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये दोघांमधील संभाषण ऐकू येत असून, पैशांची मागणी पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचेही समोर आले आहे.या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या ऑडिओ क्लिपची सत्यता आणि तपासाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी पोलिस यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top