Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Feb 06, 2026 01:31:39
Thane, Maharashtra:भिवंडी ग्रामीण मध्ये प्रस्तावित एम.आय.डी.सी. करीता जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा तिव्र विरोध... जमिनीचा एक तुकडापण भुसंपादीत करू देणार नसल्यावर शेतकरी ठाम... शेतकऱ्यांना भूमीहीन करण्याचा डाव.. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध शासकीय प्रकल्प, उपक्रम व रस्ते यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. तर ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायाने येथील जमिनी सोन्याच्या किमतीच्या झाल्या असताना शासनाने तालुक्यातील पडद्या नजिकच्या भादाणे, आतकोली, वाशेरे व सापे येथील ९९ हेक्टर जमीन एम.आय.डी.सी. साठी देण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक शेतकऱ्यांनी माजी पंचायत समिती सभापती प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी येथे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. एम.आय.डी.सी. साठी येथील जमीन अधिग्रहित करीत असल्याचा शासन निर्णय २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार खणीकर्म विभाग कडून काढण्यात आला आहे. त्यानंतर भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून १४ जानेवारी रोजी स्थानिक शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी वरून यापूर्वी मनमाड-मुंबई पेट्रोल लाईन, रिलायन्स गॅस लाईन, वीज सब स्टेशन, टाटा पॉवर लाईन तसेच ठाणे महापालिकेचा कचरा डेपो या वेग-वेगळ्या कारणाने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत. परंतु बाधित शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक मोबदला देखील देण्यात आला नाही त्यामुळे या नव्या भूसंपादनामुळे येथील बाधित शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. असे प्रकल्प आमच्यावर लादून शासनाने आम्हाला भूमीहीन करण्याचा विडा उचलला आहे का? असा सवाल शेतकरी करत आहेत. विवो- 01 शासनाने हा निर्णय स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही पूर्व सूचना न देता घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन असून या भूसंपादनाने येथील शेतकरी उध्वस्त होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा सर्व बाधित शेतकरी निषेध नोंदवून हरकत दाखल करीत आहोत. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास न्यायालयीन लढाई सोबतच शेतकऱ्यांची रस्त्या वरची लढाई उभी करून शासनास हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असा विश्वास अँड. संदीप जाधव यांनी व्यक्त केला आहे. बाईट:- अँड. संदीप जाधव विवो-02 शासनाने हा निर्णय स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही पूर्व सूचना न देता घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन असून या भूसंपादनाने येथील शेतकरी उध्वस्त होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा सर्व बाधित शेतकरी निषेध नोंदवून हरकत दाखल करीत आहोत. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास न्यायालयीन लढाई सोबतच शेतकऱ्यांची रस्त्या वरची लढाई उभी करून शासनास हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असा विश्वास अँड. संदीप जाधव यांनी व्यक्त केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थिती आमच्या जमिनी या प्रकल्पाला देणार नाही. आज पर्यंत अनेक प्रकल्प आमच्या गावांवर लादले गेले आहेत. ज्या काही थोड्याफार जमिनी आमच्याकडे शिल्लक आहेत त्या राहुदेत आम्हाला कसायला. असे प्रकल्प आमच्यावर लादून शासनाने आम्हाला भूमीहीन करण्याचा विडा उचलला आहे का? असा सवाल शेतकरी रमेश शेलार हे करत आहेत.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 06, 2026 01:31:18
Thane, Maharashtra:आठगाव येथे जुन्या लाकडी घराला भिषण आग.... शाँर्टसर्कीटमुळे आग लागल्याची माहीती.. घराच मोठ्या प्रमाणात नुकसान... सुदैवाने जिवीत हानी टळली... अँकर... शहापूर तालुक्यातील आठगाव रेल्वे स्थानका समोरील लाकडी घराल आग लागल़याची घटना घडली आहे. प्रदीप भानुशाली यांचे हे घर असून या घरात दोघा पती-पत्नी राहत आहेत. घरातील अन्नधान्य, कपडे व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू या आगी मध्ये जळून राख झाल्या आहेत. या आगीमुळे भानूशाली यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहापूर नगर परिषद अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी धाव घेत आगीवय नियंत्रण मिळविले आहे. या आगीत जीवितहानी झाली नसती तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमुळे भानुशाली यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 06, 2026 01:31:04
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 06, 2026 01:30:38
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक आज होणार आहे. महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी निकम hya महापौर पदासाठी तर जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सचिन शेडे यांनी महापौर पदासाठी तर दुर्वास कदम यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.. महायुती मधील भाजप पक्षाकडे 26, शिवसेनेकडे 15, राष्ट्रवादीकडे 4 आणि जनसुराज्य पक्ष 1 असे एकूण 46 नगरसेवक आहेत. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेसकडे 34, शिवसेना ठाकरे गटाकडे 1 असे एकूण 35 नगरसेवक आहेत... महापौर पदासाठी महायुतीकडे पुरेसे संख्याबळ आहे, तरी देखील कोणताही दगा फटका नको म्हणून महायुतीने आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवले आहे. महापौर निवडणुकीच्या आधी या सर्व नगरसेवकांना महानगरपालिकेत आणले जाणार आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 06, 2026 01:30:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील मौजे वडिये रायबाग येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान साडया वाटपचा प्रकार समोर आला आहे. भाजपा उमेदवाराकडून महिला मतदारांना साड्या वाटप करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. एका चारचाकी वाहनातून मतदारांना घरोघरी साड्या वाटप सुरू असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली, त्यानंतर कार्यकर्त्यांनी गाडी अडवून तपासली असता, त्यामध्ये शेकडो साड्या आणि उमेदवारांचे पत्रक आढळून आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घालत साड्या वाटप करणारयांना पकडले.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, निवडणूक आयोग व पोलिसांना घटनास्थळी दाखल होत,चार चाकी गाडी साड्या आणि प्रचाराचे पत्र ताब्यात घेतले आहे,तर निवडणूकीसाठी भाजपा उमेदवाराकडून साड्या बरोबर प्रचार पत्रक वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 05, 2026 16:30:57
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 05, 2026 16:01:25
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू. प्रभाग ८ मधील नागरी समस्यांवर काँग्रेस नगरसेविकेने प्रभाग अधिकाऱ्यांना धरले धारेवर ANC - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तब्बल सहा वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली आहे. या सहा वर्षांच्या कालावधीत अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे मोठ्या प्रमाणात नागरी समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारभार करत केवळ खाबूगिरी केल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला होता. मात्र आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या प्रभागात सक्रिय होताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ८ मधील गंभीर नागरी समस्यांवरून प्रभाग अधिकारी धनंजय थोरात यांना धारेवर धरले आहे. प्रभाग ८ हा मूलभूत सुविधांपासून पूर्णतः वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, गेल्या तब्बल २५ वर्षांपासून या भागातील पाईपलाईन बदलण्यात आलेली नाही, अशी माहिती नगरसेविका कुलकर्णी यांनी दिली. आज प्रभागातील समस्यांबाबत अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्व प्रश्न शांततेने आणि स्पष्टपणे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या समस्या वेळेत सोडवण्यात आल्या नाहीत, तर प्रभागातील सर्व कचरा उचलून थेट पालिका मुख्यालयात टाकणार, असा ठणकावून इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे. लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच अधिकाऱ्यांच्या कारभारावर थेट सवाल उपस्थित होऊ लागल्याने येत्या काळात नागरी प्रश्नांवर प्रशासनाला अधिक जबाबदार भूमिका घ्यावी लागणार असल्याचे संकेत या घटनेतून मिळत आहेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 05, 2026 14:45:33
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूरात महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपने दिले उमेदवार , सत्तेचं गणित भाजपंच बसवणार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया अँकर:-- चंद्रपूरात महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपने उमेदवार दिले आहेत.  सत्तेचं गणित भाजपंच बसवणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. आमचं सत्तेचं गणित सुटलेलं आहे आणि आमचं गणित सुटावं यासाठी आमचे काँग्रेसचे मित्र खूप प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आमचाच महापौर होईल असेही ते म्हणाले. आमची चर्चा कुणाशीही झालेली नाही पण समोरच्यांची चर्चा आमच्या सोबत होत असते पण ही चर्चा सध्या मीडियाच्या माध्यमातून सांगणं योग्य नाही, ११ तारखेला मात्र कोणाशी चर्चा झाली हे नक्की सांगू, सध्या कोणासोबत चर्चा सुरू आहे हे सांगणे संकेताला आणि शिष्टाचाराला धरून नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 05, 2026 14:15:41
Thane, Maharashtra:भिवंडीत महापौर पदाच्या सत्तेचे घोडे अडले... काँग्रेस-भाजप-शिवसेनेच्या आकड्यांच्या खेळात.. अँकर:- साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटी नंतर सर्वांनाच लोकप्रतिनिधींच्या सत्तेचे वेध लागले असताना मुंबई सह ठाणे जिल्ह्यातील महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या, पण याला अपवाद ठरले ते भिवंडी महानगरपालिका. भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असून भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडीनुसार कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून अजूनही कोणताही कार्यक्रम जाहीर होत नसल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु अशा परिस्थितीत भिवंडी पालिकेत 30 सदस्यांसह मोठा पक्ष असलेल्या काँग्रेससह भाजपा व शिवसेना यांनी सुद्धा महापौर पदावर दावा केला असून त्यांना मॅजिक फिगर 46 जमवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या 6, कोणार्क विकास आघाडीच्या 4 व भिवंडी विकास आघाडीच्या 3 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार अशी चिन्हे आहेत. विवो 01:- भिवंडीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ( श.प.) व समाजवादी पक्षाच्या सोबतीने भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे.काही मुद्द्यांवर वाद असतात ते येत्या दोन दिवसात संपुष्टात आणू. समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांची आमदार रईस शेख यांच्यावर नाराजी आहे त्य्या दूर करू. भाजपा शिवसेना काही आघाड्या या आपला उमेदवार अजून निश्चित करू शकले नाहीत. त्यामुळे महापौर निवडणुकीची तारीख शासनाच्या दबावामुळे जाहीर करण्यासाठी उशिर केला जात आहे. आमच्याकडे उमेदवार निश्चित आहे. त्यामुळे ठाम पणे पालिकेचा महापौर काँग्रेस पक्षाचाच असेल असा विश्वास काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमिन यांनी व्यक्त केला आहे. साडेतीन वर्ष प्रशासक बसले होते. नागरिकांची कामे होत नव्हती आता नगरसेवक निवडून आले पण निवडणूक लावायला शासन घाबरत आहे असा आरोप रशीद ताहीर यांनी केला आहे. बाईट:- रशीद ताहीर मोमिन - काँग्रेस शहराध्यक्ष Vio 02 :- महायुती म्हणून भाजपा शिवसेने कडे 34. संख्याबळ आहे. इतर काही गट आमच्या सोबत तर काही शिवसेने सोबत आहेत. एक चांगलं गट आम्ही तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेनेने भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आमची एकत्र बैठक होऊन तशी मोर्चे बांधणी भाजपा कडून सुरू आहे. त्यासाठी आमचे नगरसेवक कॅम्प मध्ये बाहेर गेले आहेत. शहराच्या विकासा साठी महापौर हा महायुतीचाच बसणार असा विश्वास भाजपा गटनेता संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. शहराची मागील आठ वर्षात जी परिस्थिती झाली आहे ती सुधारण्यासाठी राज्याच्या सत्तेतील पक्ष पालिकेत सत्तेवर हवा या भावनेतून भाजपा नियोजन करीत आहे. काहीजण या महापौर निवडीला सुद्धा जातीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत ते चुकीचे आहे असे शेवटी संतोष शेट्टी यांनी स्पष्ट केले. Byte:- संतोष शेट्टी - भाजपा गटनेता Vio 03:- पालिकेत समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपा सोडून इतर धर्मनिरपेक्ष पक्ष सोबत जाऊन महापौर निवडावा असे स्पष्ट निर्देश समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आजमी यांनी दिले आहेत. नगरसेवक नॉट रिचेबल वगैरे काही नसून ते थेट प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांच्या संपर्कात आहेत. भिवंडी सेक्युलर फ्रंट मध्ये समाजवादी पक्षाच्या गटाचा महापौर असावा असा प्रस्ताव दिला आहे अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव यांनी दिली आहे. Byte:- अजय यादव - प्रदेश उपाध्यक्ष समाजवादी पक्ष
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 05, 2026 14:01:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर- उपमहापौर पद उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उबाठा शिवसेनेने देखील महापौरपदासाठीचा अर्ज भरला. निकाल लागल्या दिवशीपासून शिवसेना उबाठा पक्षाने आपलाच महापौर हवा अशी आघाडी करतताना आत घातली होती. जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पत्नी मनस्वी गिऱ्हे यांनी महापालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात आपला अर्ज दाखल केला. 6 शिवसेना उबाठा- 2 वंचित आणि काँग्रेस बंडखोर असलेले दोन अपक्ष असा हा 10 जणांचा गट आहे. काँग्रेस बंडखोर अपक्ष नगरसेवक असलेल्या प्रशांत दानव यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. आपण शहर विकासासाठी लढणार असल्याचे ते म्हणाले.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 05, 2026 13:57:42
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूरात जनविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला दाखल, देशमुख काँग्रेसवर आहेत नाराज अँकर:--चंद्रपूरात Genविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेकडे चंद्रपूर महानगरपालिकेत एमआयएम सह 4 नगरसेवक आहेत. काँग्रेस सोबत निवडणूक पूर्व आघाडी करणाऱ्या जनविकास सेनेला उपमहापौर पदाची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने उपमहापौर पदासाठी वसंता देशमुख यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आता पप्पू देशमुख यांना उपमहापौर पद मिळणार का याबाबत मात्र संभ्रम आहे. या सर्व घडामोडी वर पप्पू देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर प्रतिक्रिया दिली. # काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आमच्या सोबत कुठलीही चर्चा केली नाही, त्यामुळे आम्ही आज उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे # आम्ही पाच वर्षे महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात लढलो आहे, आमचा प्रशासनावर वाचक आहे, मी स्वतः उच्चशिक्षित आहे, त्यामुळे लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत # मात्र काँग्रेसने त्यांच्याकडे उपमहापौर पदासाठी सक्षम उमेदवार आहे हे सिद्ध करावं, आम्ही आमचा अर्ज वापस घेऊ मात्र असं नसेल तर काँग्रेसने आघाडी धर्माचं पालन करावं # 10 तारखेपर्यंत चर्चा आणि संवाद करू, त्याशिवाय टोकाची भूमिका घेता येणार नाही, सध्या काँग्रेसमध्येच बिघाडी आहे, त्यांची बिघाडी ठीक झाली की ते आमच्याकडे लक्ष देशील अशी अपेक्षा आहे असे पप्पू देशमुख म्हणाले. बाईट १) पप्पू देशमुख, अध्यक्ष, जनविकास सेना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 05, 2026 13:47:18
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहर महापौर पद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस तर्फे चार अर्ज दाखल, खा. धानोरकर गटाला महापौर पद , नेमके पद कुणाला याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अशी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी दिली माहिती अँकर:--चंद्रपूर शहर महापौर पद निवडणुक‍ीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस तर्फे चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत वाटाघाटीत खा. धानोरकर गटाला महापौर पद देण्यात आलेले आहे. नेमके पद कुणाला याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अशी माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी दिली आहे. तर 10 तारखेला यापैकी कोण महापौर याचा खुलासा होईल अशी माहिती ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर यांनी दिली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top