445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम में 43°C तापमान, पेट्रोल-डिज़ेल की किल्लत से सड़कें उठी आपाधापी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त झाले आहेत. त्यातच सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेल टंचाई कायम असल्याने वांधारकासह शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत आहे, तेथे मोठी गर्दी होत असून वाशिममधील दक्षता पेट्रोल पंपावर शेतकरी कॅन व वाहनांसह रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले. भर उन्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनधारक हैराण झाले असून प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
अंबराठ में सत्ता संघर्ष खत्म, बीजेपी ने हाई कोर्ट याचिका वापस ली
Ambernath, Maharashtra:अंबरनाथचा सत्तासंघर्ष : भाजपाकडून उच्च न्यायालयातील याचिका मागे शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर निर्णय अंबरनाथ पालिकेतील सत्तासंघर्षाच्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. jिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपाची युती झाल्यानंतर भाजपाने आपली याचिका मागे घेतली आहे. यावेळी भाजपा गटनेते अभिजित करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले हे दोन्ही मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित होते. युतीनंतर दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याचं मानलं जात असून, आगामी काळात पालिकेतील सत्तासमीकरण यामुळे अधिक मजबूत होणार आहे。0
0
Report
नीट पेपरफुटी के मामले में अकोला में मनसे ने मोतेगावकर के खिलाफ प्रदर्शन किया
Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत इतर संबंधितांवरही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यातील मोटेगावकर यांच्या क्लासेससमोर मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी मोटेगावकर यांच्या फोटोला काळे फासून परिसरातील बॅनर्सही फाडले. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत मनसेने मोटेगावकर यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे तात्काळ परत करावेत, तसेच अकोल्यात मोटेगावकर यांचे एकही क्लास सुरू राहू देणार नाही, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
Advertisement
जुन्नर मंडवे गांव में पेयजल संकट, तीन-चार दिन पर एक बार टैंकर पर निर्भर
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. तर ज्या काही नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये थोडेफार पाणी शिल्लक आहे ते पण दूषित असल्याने सुमारे दोन ते अडीज हजार लोकसंख्या असणाऱ्या मांडवे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.0
0
Report
कल्याण पूर्वे के उद्यान में चार-पाँच युवकों ने जिम ट्रेनर तेजस चव्हाण को पीटा
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत टवाळखोर तरुणांची दहशत पुन्हा एकदा समोर आली है. मध्यरात्रिच्या सुमारास केडीएमसी च्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात बसलेल्या तरुण-तरुणीला चार ते पाच टवाळखोर तरुणांनी बेदम मारहाण केलीये. या टवाळखोर तरुणांनी तरुणांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या तरुणीला देखील लाथा बुक्क्यांनी मारले या प्रकरणी पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. तेजस चव्हाण हा जिम ट्रेनर आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या मित्रिणी सोबत केडीएमसी च्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात गप्पा मारत बसला होता. याच दरम्यान चार ते पाच तरुण त्याच्याकडे आले .त्यांनी त्याचा मोबाईल घेतला . मोबाईल घेऊन निघून जात असताना तेजसने या चौघांना हटकले मोबाईल देण्यास सांगितले . संतापलेल्या या तरुणांनी मोबाईल दिला आणि तेथून निघून गेले . काही वेळातच पुन्हा ते चार ते पाच जण त्या ठिकाणी आले तेजसशी हुज्जत घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली .यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र या संतापलेल्या तरुणांनी या तरुणीला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली .इतकेच नव्हे तर तेजसच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या . या मारहाणीत तेजसला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार ते पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
घाटकोपर के चिराग नगर में लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक के विरोध पर बुलडोजर
Mumbai, Maharashtra:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कर्मभूमी असलेल्या घाटकोपर च्या चिराग नगर मध्ये त्यांचे भव्य स्मारक सरकारच्या वतीने उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या नागरिकांना इथेच घरे मिळावी अशी मागणी स्थानिकांची आहे. यासाठी त्यांनी मोठा विरोध दर्शविला होता. नेत्यांकडे प्रशासनाकडे मागणी केली होती, आता न्यायालयात ही धाव घेतली आहे. मात्र आज पासून इथल्या घरांवर हातोडा मारण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या तणावाची स्थिती असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता इथले नागरिक हवालदिल झाले आहेत. घर तुटताना या नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत. मुख्यमंत्रीांनी आम्हाला इथेच घर देऊ असे आश्वासन दिलेले असताना आता आम्हाला बाहेर फेकले जात आहे, सरकारने आमचा विचार करावा अशी मागणी या रहिवाश्यांची आहे.0
0
Report
Advertisement
शिवाजी महाराज चषक वॉर्डीबॉल: मुंबई-कोल्हापुर-पुणे-लातूर ने खिताब जीता
Ambernath, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मुंबई, कोल्हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद रात्री अडीच वाजेपर्यंत रंगला व्हॉलीबॉलचा थरार स्पर्धेला बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद Anchor बदलापूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, पुणे, लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. रात्री अडीच वाजेपर्यंत रंगलेल्या राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा महासंग्राम पहाण्यासाठी बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद पहाण्यास मिळाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बदलापूर जिमखाना मैदानावर संपलेल्या राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार किसन कथोरे आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे यांच्या हस्ते झाला. विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्या स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूरच्या संघ बाजीगर ठरला.तर २१ वर्षांखालील मुलींच्या गटात पराभवानंतर सलग ३ सेट जिंकून मुंबईने नाशिकचा लोळवून विजेतेपदावर नाव कोरले. चंद्रशेखर भुयार , बदलापूर0
0
Report
लातूर NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने क्लास पर दबिश
Latur, Maharashtra:लातूरमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण.. मोटेगावकर यांच्या क्लासवर पुन्हा CBI ची झाडाझडती... खाजगी क्लासेसमध्ये CBI चे चार अधिकारी दाखल... कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी.... 42 प्रश्नांचा गेस पेपर तंतोतंत जुळला... मोटेगावकरांचा व्हायरल व्हिडीओ पुन्हा चर्चेत... रात्री उशिरापर्यंत चौकशी अन् आता पुन्हा चौकशीसाठी पथक दाखल.... NEET प्रकरणात CBI चा तपास वेगात....0
0
Report
लातूर पेपर लीक केस: वायरल वीडियो से सीबीआई ने उठे सवाल
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ... विद्यार्थ्यांचे चेहरे ब्लर करा... फिड असाइनमेट नंबरला... AC :- 42 प्रश्नांचा गेस पेपर तंतोतंत जुळण्याचा दावा करणारा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी स्वतःचा व्हिडिओ वायरल केला होता या व्हिडिओमुळेच मोटेगावकर यांच्यावर नीट पेपर फुटी प्रकरणात संशय बळवला होता. त्यानंतर अनेकदा चौकशी करून सिबीआय ने मोटेगावकर याला ताब्यात घेतला आहे... त्यानंतर आता पुन्हा तो विडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला ....0
0
Report
Advertisement
नाशिक: रोहित पवार के नेतृत्व में कांदा आंदोलन, हमी भाव और निर्यात नीति की मांग
Lasalgaon, Maharashtra:कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनोखं आंदोलन छेडलं... गळ्यात कांद्याच्या माळा, हातात सरकारविरोधी फलक आणि जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली... यावेळी शेतकऱ्यांसोबत कांदा-भाकर खाऊन सरकारचा निषेधही व्यक्त करण्यात आला... पाहूया आमचा हा विशेष report... व्हीओ 1 आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला... कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं... व्हीओ 2 गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... कांद्याला हमीभाव द्या, विकलेल्या कांद्याला अनुदान द्या, तसेच कांदा निर्यात धोरणात बदल करा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या... बाईट : रोहित पवार / आंदोलक शेतकरी व्हीओ 3 आंदोलनानंतर छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलं... यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत कांदा-भाकर खात सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला... कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली... व्हीओ 4 दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला... नाशिक जिल्हाभरातील शेतकऱ्यांना एकत्र करत येत्या 26 मे रोजी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्ग रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे... त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या प्रश्नावर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...0
0
Report
नीट पेपरफुटी मामले में लातूर कनेक्शन पर सीबीआई की नई जांच तेज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... फिड असाइनमेट नंबरला.... AC ::- नीट पेपरफुटी प्रकरणात आता लातूर कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे... कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे... शुक्रवारी लातुरात तब्बल नऊ तास चौकशी झाल्यानंतर काल पुण्यात पुन्हा त्यांची चौकशी करण्यात आली... आणि आता आज पुन्हा एकदा सीबीआयने त्यांना पुण्यात ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे... या घडामोडीनंतर लातूर शहरात मोठी खळबळ उडाली असून उद्योग भवन परिसरातील कोचिंग क्लासेससमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे... याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी0
0
Report
छत्रपती संभाजीनगर के नाम को लेकर औरंगाबाद विवाद, सभापति बनाम MIM नगरसेवक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:*छत्रपती संभाजीनगर* मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत छ संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद वरून वाद MIM नगरसेवकाकडून शहराच्या नावाचा औरंगाबाद उल्लेख होताच सभापती आक्रमक MIM नगरसेवकाने छत्रपती संभाजीनगर म्हणायला लावायला तुमची तणाशाही आणि हुकूमशाही सुरू असल्याच सभापती समोर केले वक्तव्य सर्वांचे नगरसेवक हे औरंगाबाद मध्ये राहतात असे MIM नगरसेवकाने केले होते वक्तव्य औरंगाबाद म्हणाले तर कारवाई होणार असा सभापतींचा इशारा0
0
Report
Advertisement
भोकरदन में पेट्रोल बाइक को LPG गैस से चलाने का जुगाड़ पकड़ा गया
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदनमध्ये दुचाकी चालकाचं जुगाड,पPetrol गाडी एलपीजी गॅसवर जोडणं पडलं महागात,पोलिसांनी जप्त केली दुचाकी भोकरदनमध्ये दुचाकी चालकाला अवैधरीत्या जुगाड करून पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला एलपीजी गॅस कनेक्शन जोडणं चांगलंच महागात पडलं आहे.या तरुणाने त्याची दुचाकी एलपीजी वर चालवण्याला परवानगी नसताना बेकायदेशीर रीत्या हा प्रयोग केला.तसेच गाडीमध्ये फेरबदल केले.भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांना नाकाबंदी दरम्यान ही गाडी आढळून आल्यानं पोलिसांनी ही दुचाकी जप्त करत मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.गाडीच्या डिक्की मध्ये या दुचाकीचालकानं एलपीजी गॅसची टाकी ठेऊन या टाकीतील गॅसवर ही दुचाकी चालवण्यात येत होती.0
0
Report
एमआईएम का विरोध: छत्रपति संभाजी नगर नगरपालिका EV गाड़ियाँ खरीदने पर घिरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिका इलेक्ट्रिक गाड्या घेण्याच्या विचारात आहे। यासाठी जवळपास एक ते दीड कोटीचा खर्च होणार आहे। नेमका याचाच विरोध करण्यासाठी एमआयएम ना आज महापालिकेत आंदोलन करीत गाड्या खरेदीला विरोध केला। एमआयएमचे सर्व नगरसेवक सायकल वापरत आज महापालिकेत आलें; आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेने असले खर्च करू नये अशी मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांनी महापौर आणि पदाधिकारीांना सायकल भेट म्हणून दिल्या।0
0
Report
डी3 पर पानी नहीं मिलने से किसान कार्यालय के बाहर आंदोलन
Pandharpur, Maharashtra:निरा उज्वा कालव्याचे पाणी मिलने के लिए पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जलसंपदा अधिकारी कार्यालयासमोर गळफास आंदोलन करण्याचा प्रयत्न। कालव्यात पाणी असतानाही ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पिकांना पाणी नहीं मिला। निरा उजव्या कालव्यातून माळशिरस पंढरपूर सांगोला तालुक्याला पाणी शेतीसाठी दिलं जातं, पर याच कालव्यावरील डी3 वितरिकेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। यावर्षीही बहात्तर दिवस कालवा सुरू असूनही डी3 वर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी दिलेलं नाही, त्यामुळे या वितरिकेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी आज जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर येऊन गळफास आंदोलन केले, यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.0
0
Report
Advertisement
