445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाळ नगरपालिका की रोड वैक्यूम स्वीपर से धूल नहीं रुकी; करोड़ों खर्च पर सवाल
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषदेने रोड व्हॅक्युम स्वीपर मशीन खरेदी केली तेव्हापासून धुळ खात पडलेली आहे. शहरातले रस्ते स्वच्छ व्हावेत यासाठी हे अतिशय महागडे वाहन खरेदी केले असले तरी त्याचा कुठलाही उपयोग होताना दिसत नाही, प्रभागातील स्वच्छतेसाठी वारंवार मागणी करू नये ही मशीन मिळत नाही त्यामुळे संताप व्यक्त करीत वंचितचे नगरसेवक डॉ नीरज वाघमारे यांनी या वाहनाची प्रतिकात्मक यज्ञ याग व पूजाअर्चा पुरोहिताच्या हस्ते करून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदविला. करोडो रुपये खर्च करून खरेदी केलेले हे वाहन रस्ते स्वच्छ करण्यासाठी की कोणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न नगरसेवक निरज वाघमारे यांनी उपस्थित केला.0
0
Report
शिरूर में हवेत गोलीबारी: सेवानिवृत्त सैनिक समेत तीन गिरफ्तार
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे रात्री च्या sुमारास हवेत गोळीबार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून याप्रकरणी सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकर सह राजेश लंघे व स्वाती लंघे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंघे यांच्या घरासमोर हवेत गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती, मात्र याबाबत शिरूर पोलिसांनी चौकशी केली असता मुंबई येथून मूळ गावी सविंदणे येथे आलेल्या राजेश लंघे व स्वाती लंघे यांच्या सोबत असलेल्या सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकर यांनी त्यांचे परवानाधारक पिस्तूल बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसलेल्या राजेश लंघे व स्वाती लंघे यांच्याकडे लोड करून दिला त्यानंतर राजेश लंघे व स्वाती लंगे यांनी कोणताही परवाना नसताना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने सदर पिस्तौल मधून हवेत गोळीबार केल्याचे समोर आले,0
0
Report
अकोला के नीराट में पांडुरंग महाराज पाटकर की 50वीं सुवर्ण पुण्यतिथि महोत्सव शुरू
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील नीराट येथे वारकरी भूषण वै. गु. ह. भ. प. पांडुरंग महाराज पाटकर यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाचे भक्तिभावात आयोजन करण्यात आले. ५० वर्ष उलटूनही त्यांच्या संतविचारांची साखर पेरणी आजही अखंडपणे सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.विदर्भातील ख्यातनाम संत पांडुरंग महाराज पाटकर यांनी १९१८ ते १९७६ या काळात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. दळणवळणाची साधने नसतानाही गावोगावी जाऊन कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केला. १९०८ साली आकोट तालुक्यातील टाकळी येथे जन्मलेल्या महाराजांनी अल्पशिक्षण असूनही ज्ञानेश्वरी व संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून समाजाला योग्य दिशा दिली. पंढरपूर येथे चंद्रभागा तीरावर त्यांनी वारकरी परंपरेचे शिक्षण घेतले आणि आयुष्यभर कीर्तन-भजनातून जनजागृती केली. महाराजांनी सुरू केलेल्या पंढरपूर आणि मुक्ताबाई वारी आजही त्यांच्या वैचारिक वारसदारांकडून अखंडपणे चालवल्या जात आहेत. नीराट येथेच १६ एप्रिल १९७६ रोजी त्यांनी समाधी घेतली होती.या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनसेवा सादर करत महाराजांच्या कार्याला अभिवादन केले.0
0
Report
Advertisement
उत्तर पुणे में अनियमित बारिश ने डाळिंब बागों को भारी नुकसान पहुंचाया
Shirur, Maharashtra:Anc: गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे डाळिंब बागायतदारांचे प्रचंड नुकसान झालं असून गारपिटीने डाळिंब डँमेज झालेत तर उन्हापासून संरक्षणासाठी टाकलेले क्रॉप कव्हरही गारपिटीच्या तडाख्याने तुटले असून वादळाने बागा हि भुईसपाट झाल्यात, अवकाळीच्या तडाख्याने डाळिंब बागायतदारांच अतोनात नुकसान झालंय याचाच नुकसान ग्रस्त डाळींब बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Rep: Hemant Chapude To प्रशांत लोखंडे (नुकसान ग्रस्त डाळींब उत्पादक शेतकरी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...0
0
Report
14 वर्षीय अथर्व नानोरे का शव भरतवाडा पुल के पास मिला, अपहरण-हत्या की आशंका
Nagpur, Maharashtra:बेपत्ता 14 वर्षीय अथर्व नानोरे याचा पोत्यात बांधलेला मृतदेह भरतवाडा पुलाजवळ शनिवारी आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे... हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.. त्यामुळे अपहरण करून हत्या झाल्याची बाब उघडकीस आलाय .. या घटनेमुळे गिट्टीखदान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे... अपहरण -हत्येच्या या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे0
0
Report
नाशिक में पति ने सड़क पर पत्नी पर Fortuner कार चढ़ाकर हमला किया, गिरफ्तार
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - राजीव गांधी भवन परिसरात संतापजनक प्रकार - पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून पतीचा हल्ला - भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची माहिती - पत्नीच्या अंगावर थेट फॉर्च्युनर कार घातली - पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ - इंस्टाग्राम चॅटवरून पतीचा संताप अनावर - पत्नीने जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली - धडकेत गंभीर जखमी, नागरिकांनी मदत केली - सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल - सराईत गुन्हेगार पती समीर पठाण नाशिक पोलिसांच्या अटकेत0
0
Report
Advertisement
पालघर: बस चालक ने यूनिफॉर्म दिखाकर यात्रियों के साथ बदतमीजी की
Palghar, Maharashtra:पालघर - सफाळे बस आगारात चालकाची दादागिरी . युनिफॉर्म काढत प्रवाशाला दादागिरी. सफळे - कोरे बसमधील प्रकार. बसला उशीर झाल्याने प्रवाशाने जाब विचारल्याचा राग मनात धरून चालक संतापला . बस चालक अश्वजीत कांबळे यांनी युनिफॉर्म काढत प्रवाशांवर केली दादागिरी . व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल.0
0
Report
हिंगोली शिक्षा विभाग की नियोजनशून्यता, 29 लाख निधि समग्र शिक्षा अभियान को वापस
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन असल्याने 29 लाखाचा निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत गेला आहे इयत्ता दहावी व बारावी परीक्षा असल्यामुळे निधी खर्चाचे नियोजन नसल्याचे कारण शिक्षण विभागाने दिले आहे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.0
0
Report
अकोला में चाकू हमला: तीन घटनाएं, दो गिरफ्तार, तीन नाबालिग फरार
Akola, Maharashtra:अकोला शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून खदान पोलीस ठाणे हद्दीत चाकू हल्ल्याच्या सलग तीन घटना समोर आल्या आहेत. श्रद्धानगर, कौलखेड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, खडकी परिसरात हे प्रकार घडले. विशेष म्हणजे, काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनीच चाकूने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.या तिन्ही घटना एकाच टोळीने केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.कारवाईदरम्यान गुन्हे शोध पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, तीन अल्पवयीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
वर्धा में जमीन विवाद के कारण दुहेरी हत्या; नाबालिग आरोपी ने चाचा और कज़िन की हत्या
Wardha, Maharashtra:वर्ध्यात जमिनीच्या वादातून दुहेरी खून; अल्पवयीन आरोपीकडून चुलत भाऊ व काकाची हत्या लग्नाच्या वरातीत रक्तरंजित हल्ला; शहरात भीतीचे वातावरण आँकर - वर्ध्यात महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिराजवळ जमીનીच्य वादातून दोन जणांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांमध्ये रितेश भलमे (वय २४) व प्रभाकर भलमे (वय ५०, रा. बरबडी) यांचा समावेश आहे. आरोपी हा अल्पवयीन असून जुन्या जमिनीच्या वादातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेच्या वेळी परिसरात लग्नाची वरात सुरू होती. याच दरम्यान अचानक वाद उफाळून आला आणि आरोपीने संतापाच्या भरात काका आणि चुलत भावांवर सपासप चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एकाच वेळी चुलत भाऊ आणि काकाची हत्या झाल्याने नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सेवाग्राम हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
गिरीश महाजन: दुर्घटना की तात्कालिक जाँच, हर पीड़ित को 5 लाख मुआवजे की घोषणा
Nashik, Maharashtra:*गिरीश महाजन बाईट* विहीर तातडीने बुजवणार, अपघातास कोण जबाबदार आहे त्याची चौकशी करणार, विहीर मालकावर गुन्हा दाखल केला आहे, अधिकारी काय काम करत होते ? मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आर्थिक मदत ५ लाख प्रत्येकाला देण्याचे जाहीर केले आहे - गिरीश महाजन, मंत्री आपत्ती व्यवस्थापन0
0
Report
नाशिक के दिंडोरी में विहीर हादसे में नौ की मौत, प्रशासन पर सवाल उठने लगे
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग नौ जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग... विहिरी भोवती लावले बॅरिकेटिंग... नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर येथे घडली काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घटना... चौफुलेमध्येच असलेल्या विहिरीमध्ये चार चाकी गाडी थेट गेल्यामुळे मुलांचा आणि तीन प्रौढांचा झालाय मृत्यू... अपघात होण्याच्या आधीच प्रशासनाने आणि विहीर मालकाने जर काळजी घेतली असती तर अपघात असतात टळला... आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
नाशिक में कुंभ तैयारी और संत समाज की भूमिका पर जोर
Nashik, Maharashtra:नाशिक : मंत्री छगन भुजबळ, भाषण अखिल भारतीय संत समिती - नाशिक हे फक्त ऐतिहासिक शहर नाही तर आध्यात्मिक सनातन परंपरेचे एक केंद्र आहे - गोदावरी च्या तीरावर ही शहर वसलेले आहे - संत परंपरेचे विरासत या शहराला लाभलेले आहे - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे तिची दिशा ठरवणारी बैठक आहे - त्र्यंबकेश्वर येथे शैव साधू महंत जातात तर नाशिक येथे वैष्णव - प्रयाग सारखी जागा याठिकाणी नाही - ती उपलब्ध करण्याचे काम आमचे सुरू आहे - कुंभमेळा ही भारताची अध्यात्मिक मेळा आणि अखंड संत - करोडो लोक एकत्र येतात ते कसे राहतात याचा अभ्यास करण्यासाठी लोक बाहेरदेशातून येतात - ही तयारी फक्त प्रशासनाची नाही तर भाविक आणि दीर्घ कालीन विकासाच्या दृष्टीने महत्वाची आहे - नाशिकमध्ये वर्षभर लोक येतात कारण याठिकाणी अनेक धार्मिक विधी होतात - भारतात सर्वात जास्त धार्मिक कार्यक्रमात लोक एकत्र येतात ते फक्त कुंभमेळ्यात - राष्ट्रीय एकात्मिकतेचा हा उत्सव आहे - नाशिकमध्ये शैव वैष्णव वारकरी आणि सनातन परंपरा याचं महापर्व येथे होणार आहे - संत समाज या अध्यात्मकतेचे केंद्र आहे - संत महंत يांची भूमिका फार महत्वाची आहे - जेव्हा जेव्हा देशात आपत्ती आली तेव्हा संतानी या देशाला दिशा दाखवलेली आहे - संत समाजाची भूमिका प्रतिकात्मक नाही तर दिशादर्शक राहणार आहे - गोदावरी नदी ही शुद्ध हवी तिचे तीर्थ लोक घरी नेतात मात्र काही लोकांनी त्यावर ध्यान नाही दिले - मात्र ती शुद्ध झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे - रस्ते करा सर्व करा पण सर्वात अगोदर गोदावरीचे पाणी निर्मळ करा - मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी काम करत आहे - जे काम सुरू आहे ते वेळेत पूर्ण करण्याचे काम करायचे आहे - शहर सुंदर झाले पाहिजे - प्रभु रामाने या ठिकाणी १४ वर्ष घातले कारण इथले वातावरण शुद्ध आहे - २८ हजार कोटींचे काम सुरू आहेत - नवीन घाटांची निर्मिती केली जात आहे - साधुग्राम पार्किंग रस्ते काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहे - सरकार समोर साधू महंत ज्या गोष्टी आपण ठेवल्यात त्या दृष्टीने आम्ही काम करू फक्त आपला आशीर्वाद राहू द्या0
0
Report
नाशिक सातपूर में शोषण मामले में फॉरेन्सिक टीम ने रविंद्र एरंडे के कार्यालय पर छापा
Nashik, Maharashtra:Nashik break - नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीम दाखल - फॉरेन्सिक टीम कडून लैंगिक शोषण करणाऱ्या व्यावसायिक रवींद्र एरंडे च्या कार्यालयावर झाडाझडती - स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील तांत्रिक पुरावे गोळा करण्याची कारवाई - याच कार्यालयातील कम्प्युटरमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आले होते समोर0
0
Report
गोदावरी नदी में जलपर्णी वृद्धि, सायखेडा-चांदोरी क्षेत्र में स्वास्थ्य जोखिम बढ़ा
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा-चांदोरी परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात तयार झाली सायखेडा येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ जलपर्णीची दाट वाढ झाल्याने विळखा तयार होत नदीपात्र हिरवाईने नटल्याचा भास निर्माण होत असला, तरी प्रत्यक्षात ही परिस्थिती पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे नदीतील जलपर्णी सडू लागल्यामुळे पाणी दूषित होत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे तसेच मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी सायखेडा व चांदोरी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे0
0
Report
Advertisement
