445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
छत्रपति संभाजी नगर में दरगाह चौक पर 176 अतिक्रमणों पर प्रशासन की जेसीबी से तोड़फोड़
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या शहानूरमियाँ दर्गा चौकात गेल्या १५ वर्षांपासून विनापरवानगी बस्तान मांडलेल्या अनधिकृत चौपाटीवर मनपाने जेसीबी चालवला. कारवाईदरम्यान काही दुकानदारांसह हुल्लडबाज जमावाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला पांगवले. सकाळी १० वाजता सुरू झालेली कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. दर्गा चौक ते भाजीवाली बाई पुतळ्यापर्यंत तब्बल १७६ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी कुणालाही संधी न देता DP रस्त्यामध्ये बाधित होणारी अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केली. चौपाटीसमोरील हॉटेल व फळविक्रेत्यांची अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली0
0
Report
वाशिम के दौरे के बीच कृषि मंत्री के सामने किसानों का आमरण उपोषण, गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम : अँकर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात संपूर्ण कर्जमाफीसाठी आमरण उपोषण केलेले शेतकरी सतीश इढोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्या वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ईडोळी यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, वाशिम एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग सुरू करावेत या संदर्भात मागण्यासाठी सतीश इढोळे आणि आडोळी येथील गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण करून गाव विक्रीला काढलं होतं. आज कृषिमंत्रीांच्या दौऱ्यात त्यांनी कुठलाही अडथळा आणू नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे.0
0
Report
वाळूज में युवक पर चाकू हमला, करण गायकवाड घायल अस्पताल में भर्ती
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव कोल्हाटी येथे एका तरुणावर चाकूने भीषण हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वडगाव कोल्हाटी येथे करण गायकवाड या तरुणावर अज्ञात हल्लेखोराने अचानक चाकूने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या करण गायकवाड याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून वाळूज एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.0
0
Report
Advertisement
महाल दंगों के कथित सूत्रधार फहीम खान फिर गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:गेल्या वर्षी मार्च महिन्यात महाल परिसरात झालेल्या हिंसाचार prकरणी कथित सूत्रधार फहीम खानला पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे.. महाल परिसरात मार्च २०२५ मध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या फहीम खान याला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. तहसील पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे.. विशेष म्हणजे फहीम खान हा एमआयएमच्या नगरसेविका अलिसा खान यांचा पती आहे. २०२५ च्या मार्च महिन्यातील दंगल प्रकरणी त्याच्याविरोधात नागपूरच्या विविध पोलिस ठाण्यांत एकूण पाच गुन्हे दाखल असून, काही प्रकरणात त्याला तेव्हाचे अटकेनंतर जामीन मिळाले होते.. तर एका प्रकरणात तो फरार होता आणि त्या प्रकरणातच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे... * १७ मार्च २०२५ रोजी महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. या घटनेत तोडफोड, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. * विशेष म्हणजे, महिला पोलिस कर्मचारीांशी गैरवर्तन व छेडछाडीचे गंभीर आरोपही समोर आले होते.तेव्हाच्या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ही जखमी झाले होते. या संपूर्ण प्रकरणात फहीम खान हा कथित सूत्रधार असल्याचे आरोप होते..तेव्हा महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाचे आरोप करत त्याचे घरही पाडले होते. दरम्यान, फहीम खानच्या अटकेनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..0
0
Report
भारत में वाशीम शहर में पानी की तंगी: 26% शेष, आपूर्ति हर 8-10 दिन पर
Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी पाणी प्रकल्पात सध्या केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वाशिम नगरपरिषदेकडून नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाशिम शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर होते आणि यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असून, पैसे देऊनही वेळेवर पाणी मिळत नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर, कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठ्याचा आढावा आमचे वाशिम प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी घेतला आहे.0
0
Report
गोकुळ दूध संघ: 1320 संस्थाओं की सुनवाई पूरी होने तक चुनाव टाला गया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अवसानातील 1320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. त्याचबरोबर ही सुनावणी 75 ते 80 दिवसात पूर्ण करून निवडणूक घ्यावी असं देखील न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील याच्या डिव्हिजनल बेंचने निर्णय दिला आहे. एकूण सभासदांपैकी 20 टक्क्यांपेक्षा अधिक सभासद यांची सुनावणी होणे बाकी आहे, त्यामुळे त्यांना वगळून निवडणूक घेणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे त्यांची सुनावणी घेतl्यानंतरच निवडणूक घ्या असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोकुळची मुदत चार तारखेला संपल्यानंतर पाच तारखेला गोकुळवर प्रशासक राज येणार आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते, संचालक गोकुळची निवडणूक ठरलेल्या वेळेत होऊ दे अशी भूमिका मांडत होते, पण कोर्टानेच संस्थांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेण्यास मज्जाव केल्याने गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसला आहे.0
0
Report
Advertisement
हाई कोर्ट ने आमीर गैस जहाज जप्त किया, बनावट कागदपत्रों का मामला
Ratnagiri, Maharashtra:जयगड - रत्नागिरी.. 'आमीर गॅस' जहाज जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.. बनावट कागदपत्रांच्या आधारे मार्ग बदलल्याचा प्रकार उघड.. अँकर बनावट कागदपत्रे दाखवून मालाची अफरातफर केल्याच्या संशयावरून मुंबई उच्च न्यायालयाने 'आमीर गॅस' नावाचे मालवाहू जहाज जप्त करण्याचे आदेश दिले आहेत..जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत,तोपर्यंत या जहाजावरील एलपीजी (LPG) माल उतरवण्यास आणि जहाजाला जयगड पोर्टच्या बाहेर जाण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे.. हे जहाज इराकवरून कार्गो लोड करून निघाले होते.या जहाजाचे दोन मालक असून,त्यापैकी एका कंपनीला हा माल पाकिस्तानला पोहोचवायचा होता. मात्र, मूळ जहाज मालकाच्या हे लक्षात आले की,जहाजाचा मार्ग बदलून ते जयगड बंदराकडे वळवण्यात आले आहे.. यासाठी चक्क खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. 'झांग युनियन इंटरनॅशनल' यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने बुधवारी जहाज जप्त करण्याचे आदेश दिले.. न्यायालयाने जेएसडब्ल्यू (JSW) जयगड पोर्ट प्रशासनाला स्पष्ट ताकीद दिली आहे की,कोणत्याही परिस्थितीत या जहाजाला बंदराबाहेर जाण्याची परवानगी देऊ नये.. स्थानिक शिपिंग एजंट मिलिंद बनप यांनी न्यायालयाच्या या निर्णयाबाबत अधिकृत माहिती दिली आहे.. जयगड सारख्या महत्त्वाच्या बंदरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जहाज आणल्या गेल्यामुळे परिसरात आणि शिपिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे..0
0
Report
शिरोली अत्याचार केस: शाहिद-शाहरुख के वीडियो एक्सचेंज से खुला नया राज
Kolhapur, Maharashtra:शिरोली अत्याचार प्रकरणातील शाहिद सनडे याने फसवणूक केलेल्या मुली सोबतचे व्हिडिओ त्याचा मित्र शाहरुख देसाई सोबत शेअर करत होता अशी धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. शाहरुख देसाई याने देखील काही व्हिडिओ शाहिदला पाठवले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या प्रकरणात नराधम शहीदला अटक केल्यानंतर त्याचा मित्र शाहरुख प्रसार झाला होता, या काळात त्याने मोबाईल मधील व्हिडिओसह इतर डाटा डिलीट केला. शाहिद ने अनेक मुलीशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. त्यातून तो व्हिडिओ बनवून आपल्या मित्राला व्हिडिओच्या बदल्यात व्हिडिओ एक्स्चेंज करायचा.. आणि त्यानंतर त्याच व्हिडिओचा वापर करून पुन्हा पीडित युतींवर अत्याचार करायचा. आतापर्यंत तपासामध्ये दोन मुलींसोबत त्याने अशी कृत्य केल्याचं SIT च्या निदर्शनास आले आहे. सध्या शाहरुखने त्याच्या मोबाईल मधील डिलीट केलेला डाटा सायबर एक्स्पर्टच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हे दोघेही सर्वजण वापरत असणारे ॲप न वापरता वेगळ्या ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात असल्याच देखील पोलीस तपासात दिसून आले आहे, तो नेमका ॲप कोणता याच्याही मागावर SIT आहे.0
0
Report
नाशिक में महाराष्ट्र दिवस पर गिरीश महाजन ने ध्वजारोहण किया, अघोषित पालकमंत्री बने
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये महाराष्ट्र दिवसि minister गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अधिकृत पालकमंत्री नसल्याने नाशिकचा ४७ कोटींचा विकासनिधी अडकला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नाशिककरांना सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन. गिरीश महाजन बनले नाशिकचे 'अघोषित पालकमंत्री'.0
0
Report
Advertisement
गोंदिया पुलिस ने 2 किलो 70 ग्राम गांजे के साथ एक आरोपी गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:गोंदिया पोलिसांना अमली पदार्थांविरोधात मोठं यश मिळाले आहे. शहरालगतच्या सुंदर नगर परिसरात छापा टाकत घरात साठवून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहे. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सुंदर नगर भागात हि कारवाई केली. यात आरोपी मुस्ताक शेख यांच्या घराची झडती घेतली असता तब्बल २ किलो ७० ग्रॅम गांजा पोलिसांना आढळून आला. चौकशीत मुस्ताक शेख याने हा गांजा गोविंद अग्रवाल याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. तर गोविंद अग्रवाल याने हा गांजा त्याच्या वाहन चालकामार्फत आणण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपी अडक केली असून दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा गांजा, २० हजार रुपये रोख रक्कम आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
भंडारा में गर्मी से ट्रांसफॉर्मर पर दबाव, ठंडा रखने के लिए कुलर इस्तेमाल
Bhandara, Maharashtra:सध्या भंडारा जिल्हा चांगलाच तापला असून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कुलर, एसी आणि फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी विजेची मागणीही प्रचंड वाढली असून त्याचा ताण थेट ट्रान्सफॉर्मरवर येत आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेले ऑईल उष्णतेमुळे तापत असल्याने ट्रान्सफॉर्मर जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न होये यासाठी आता ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी चक्क कुलरचा सहारा घेतला जात आहे. ही अनोखी उपाययोजना सध्या लक्ष वेधून घेत आहे.0
0
Report
जेल से बाहर आए अपराधी की जुलूस में फटाक़े चलाने पर पंढरपुर पुलिस कार्रवाई
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील नदी घाट प्रदक्षिणामार्ग या ठिकाणी पुण्यातील एक गुन्हेगार सुटल्यानंतर आला होता त्याची त्याच्या साथीदाराने यावेळी मिरवणूक काढली फटाक्यांची आदेश बाजी केली त्यामुळे पंढरपूरात भीतीच वातावरण झालं होतं यानंतर काल रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि पोलिसांच्या पथकाने या सर्वांना पकडून त्यांची धिंड काढली या वेळी पंढरपुरात कायद्याचे राज्य असून गुन्हेगारांच्या अशा कृत्यांना गंभीरपणे घेऊन कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा हाईवे पर भारी ट्रैफिक जाम; कोकण की ओर जाने वाले मार्ग बाधित
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी नागोठणे जवळ कोकणात येणाऱ्या मार्गिकेवर लांबच लांब रांगा कामत हॉटेल ते वाकण फाटा इथं पर्यंत पोहोचल्या वाहनाच्या रांगा महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत. मात्र महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शिवाय बेशिस्त वाहन चालकांचा फटका वाहतुकीला बसतो आहे. कोकणात जाणाऱ्या लेन वर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते आहे वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत.0
0
Report
नाशिक- सिन्नर क्षेत्र में मोटरसाइकिल चोरी के आरोपी करण शर्मा गिरफ्तार, 5 मोटरसाइकिलें ضبط
Sinnar, Maharashtra:अँकर :- नाशिक व सिन्नर परिसरात मोटरसायकल चोरी करून तो मोकळ घालणाऱ्या सराईत मोटरसायकल चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे करण शर्मा राहणार नाशिक असे या मोटरसायकल चोरट्याचे नाव असून पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत0
0
Report
नाशिक के मध्यवर्ती सहकारी बैंक में चोरी की असफल कोशिश, सीसीटीवी में चोर पकड़ाए
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान तीन चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आहे; चोरीसाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लासलगाव येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये ही बँक असून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी आधी कॉम्प्लेक्समधील वरच्या मजल्यावरील घरांना बाहेरून कड्या लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्यांनी बँकेचे शटर व कुलूप तोडले; मात्र काही कारणास्तव चोरी करण्यात त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
