445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमित शाह कोल्हापुर दौरे पर: अंबाबाई मंदिर संवर्धन कार्य की समीक्षा, दर्शन समय बदला
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार असून उद्या 20 जून रोजी अंबाबाई मंदिर संवर्धन कामाचा आढावा घेणार आहेत. विकास आराखडा अंतर्गत प्रदक्षिणामार्ग, राम मंदिर जतन संवर्धन कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान अमित शहा हे अंबाबाई मंदिरात येणार असल्याने सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळेत देवीचे दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.0
0
Report
चांदवड़ तालुक़े में राजदेरवाड़ी और इंद्रायणीवाड़ी में पानी संकट; टैंकर सेवा शुरू करने की मांग
Chandvad, Maharashtra:अँकर:-चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत त्यातच प्रशासनाकडून अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे इंद्रायणीवाडी परिसरातील एका शेतकऱ्याच्या बोअरवेलच्या पाइपला झालेल्या लिकेजमधून पाणी बाहेर पडत असून त्याच पाण्यावर नागरिकांना तहान भागवण्याची वेळ आली आहे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे मान्सूनचे आगमन अद्याप झाले नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनल्याने तातडीने दखल घेऊन राजदेरवाडी व इंद्रायणीवाडीसाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महिलांकडून जोर धरू लागली आहे0
0
Report
जून तक संभाजीनगर में खरीप कर्ज वितरित सिर्फ 24.57%, किसान परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी संभाजीनगर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचा पार बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात अद्याप २५ टक्केही कर्जवाटप पूर्ण न झाल्याने पेरणीच्या तोंडावर बळीराजा दुहेरी अडचणीत सापडला आहे. दुष्काळाची स्थिती, कर्जमाफीचा घोळ, अपुरे कर्जवाटप यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. १५ जूनअखेर जिल्ह्यात केवळ २४.५७टक्केच कर्जवाटप झाले आहे. त्यामध्ये व्यापारी बँकांकडून केवळ ६ टक्के कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यासाठी यंदा १५९७ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६१ हजार ९१६ शेतकऱ्यांना ३९२ कोटी रुपयांचेच वाटप होऊ शकले आहे. पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. मात्र कर्जमाफीच्या घोळात कर्जवाटप अडकला आहे. यामुळे शेतकरीही संभ्रमात आहेत.0
0
Report
Advertisement
हिंगोली में कृषि असिस्टेंट अधिकारी ने 5 हजार रिश्वत लेते रंगे हाथ पकड़े गए
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात फळबागाच्या मस्टरवर स्वाक्षरी करून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मोहन माने असं या लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याचं नाव असून लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.0
0
Report
यवला तालुका पुलिस ने नगरसुल में दो स्थानों पर छापेमारी कर अवैध देशी-विदेशी माल जब्त किया
Yeola, Maharashtra:नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक डॉ.डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे येवला तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी नगरसुल येथे दोन ठिकाणी छाप्यामध्ये अवैद्य देशी विदेशी मध्ये साठा जप्त केला आहे याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.0
0
Report
मिसारवाडी से शुरू होगा पानी वितरण योजना; नलों में पानी मिलेगा, टैंकर निर्भरता खत्म होगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाणीपुरवठा योजनेद्वारे छत्रपती संभाजी नगर शहरात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता टँकरवर अवलंबून असलेल्या या भागांत नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही मनपाने हाती घेतली आहे. याची सुरुवात मिसारवाडीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मनपाने दिली. शहरातील नो नेटवर्क भागात ५ लाखांहून अधिक मालमत्तांना अद्याप नळाद्वारे पाणी मिळत नाही. या भागांत जलवाहिन्यांचे जाळे नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, नवीन योजनेच्या वाढीव पाण्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेवर पाणीपुरवठा विभागाची निगराणी असणार आहे. मिसारवाडी हा भाग नो नेटवर्कच्या यादीत असल्याने तेथून कामाला सुरुवात होईल0
0
Report
Advertisement
परभणी के गंगाखेड में ठाकरे शिवसैनिकों ने प्रतिकात्मक पुतला दहन कर विरोध जताया
Parbhani, Maharashtra:परभणी के गंगाखेड में ठाकरे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले हैं संतप्त ठाकरे शिवसैनिकोंने खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले है यावेळी खासदार संजय जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली0
0
Report
चांदवड में मूंग बीज पर 50% अनुदान, किसानों को मिली राहत
Chandvad, Maharashtra:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय बीज निगम लिमिटेडच्या के-1812 या भुईमूग जातीच्या बियाण्यांचे 50 टक्के अनुदानावर वाटप सुरू करण्यात आले आहे या योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून बियाणे खरेदीसाठी पंचायत समिती कार्यालयात गर्दी होत आहे पंचायत समितीमार्फत 20 किलो वजनाच्या एकूण 96 बॅगा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याला प्रति बॅग 1,140 रुपये या अनुदानित दरात एक बॅग दिली जात आहे बाजारभावाच्या तुलनेत कमी दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत असून गेल्या तीन दिवसांतच 77 बॅगांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित बियाण्यांसाठीही शेतकऱ्यांची मागणी कायम आहे0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में गर्मी की लहर, अधिकतम 40°C और न्यूनतम 25–26°C का पूर्वानुमान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरकरांची उन्हाच्या कडाक्यामुळे लाहीलाही होत आहे. निम्मा जून महिना उलटून गेला, तरी अद्याप शहराला मान्सून तसेच मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षाच आहे. १८ जूनला शहराचे कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले. यातच आता हवामान विभागाने शुक्रवारआणि शनिवारी शहरात पुन्हा उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत शहराचे कमाल तापमान ४० अंशांपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.0
0
Report
Advertisement
तीन घंटे की मेहनत के बाद वन विभाग ने पिंपळगाव-खांबी में बिबट को जेरबंद किया
Bhandara, Maharashtra:तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या पिंपळगाव-खांबी येथे काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा. बिबट्या गावात असल्याने वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.0
0
Report
जालना स्कूल के वार्षिक स्नेहसंमेलन के विवादित वीडियो पर FIR दर्ज
Jalna, Maharashtra:जालना : स्नेहसंमेलनामध्ये वादग्रस्त गाणे, संस्थाचालकावर गुन्हा परतूरच्या वर्ल्ड किड्स इंग्लिश स्कूलमधील प्रकार जालन्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल या इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान चित्रित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. यात तुर्की येथील एका युट्यूब सिरीयलमधील गाण्यावर विद्यार्थी नृत्य करीत असताना बॅकग्राऊंड स्क्रीनवर पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरी याचा फोटो दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओची गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून पडताळणी सुरू होती. अखेर पोलिस अंमलदार गोविंद पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थाचालक तथा मुख्याध्यापक महंमद वजीयोद्दीन तारेख सिध्दीकी, शिक्षक शेख साजीद अब्दूल गणी आणि एका महिला शिक्षकांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा उघड झाला प्रकार शाळेच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ होता. १६ जून रोजी त्या व्हिडिओची लिंक राज्याचे पोलिस महासंचालक आणि जालना येथील पोलिस अधीसंघ यांच्या समाजमाध्यमांवर टॅग करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गेल्या दोन दिवस व्हिडिओची पूर्ण चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनीच फिर्यादी होत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे संस्था चालका समोरील अडचणीत वाढ झाली आहे.0
0
Report
गुजरात-महाराष्ट्र सीमा पर बड़ी कार्रवाई: 1.55 करोड़ रुपये के एलपीजी-डिजेल का जखीरा पकड़ाया
Dhule, Maharashtra:अन्न व नागरी पुरवठा विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. गुजरात-महाराष्ट्र सीमेवर राज्यस्तरीय दक्षता पथकाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; तब्बल १.५५ कोटींचा अवैध एलपीजी गॅस आणि डिझेल साठा जप्तण्यात आला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या इंधन आणि एलपीजी गॅसच्या आंतरराज्यीय तस्करीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफাশ केला आहे. पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या एका अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे, गुजरात-धुळे हायवेवरील दहिवल गाव येथील एका धाब्याच्या मागे सुरू असलेल्या अवैध अड्ड्यावर धडक छापा टाकण्यात आला. या धडक कारवाईत १ कोटी ५५ लाख ९५ हजार किमतीचे दोन्ही मोठे टँकर, वाहने आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून पुरवठा विभागात प्रचंड खळबळ माजली आहे. गुजरातवरून जळगावच्या दिशेने येणारा हा अवैध साठा नेमका कोठून लोड करण्यात आला होता आणि महाराष्ट्रात हा काळाबाजार कोणाच्या फायद्यासाठी केला जाणार होता? याचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में राजाभाऊ वाजे का जोरदार स्वागत, उद्धव सेना शक्ति प्रदर्शन की तैयारी
Nashik, Maharashtra:नाशकात खासदार राजाभाऊ वाजे यांचा करण्यात येणार स्वागत या स्वागत सोहळ्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात उद्धवसेना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शहर व सिन्नर परिसरातही वाजे यांच्या स्वागताचे बॅनर मोठ्या प्रमाणावर झळकत आहे. या स्वागत सोहळ्याचे आयोजन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना (नाशिक जिल्हा) यांच्यावतीने करण्यात आलाय。0
0
Report
आधी रात महिला पर अस्वल का हमला, नागपुर के अस्पताल में भर्ती
Bhandara, Maharashtra:मध्यरात्र्री झोपेत असलेल्या महिलेवर अस्वलाचा जीवघेणा हल्ला,हल्ल्यात महिला गंभीर जखमी उपचारासाठी नागपूर येथे दाखल.. Anchor: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील वाकल येथे थरारक घटना पुढे आली आहे.मध्यरात्री घराच्या पोर्च मध्ये झोपलेल्या महिलेवर अस्वलाने जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले आहे.अनिता बनकर ( वाकल) ह्या आपल्या घराच्या पोर्च मध्ये गाळझोपेत असताना हा हल्ला झाला आहे.अस्वलाच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावा शेजारी आलेले अस्वल दूर पडून जावे यासाठी वन विभागाकडून फटाके फोडण्यात आले व घटनेनंतर गावात गस्त घालण्यात आली.या हल्ल्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली असून अस्वल पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र मध्यरात्री झालेला हल्ला हा गावकऱ्यांची झोप उडवणारा ठरलेला आहे....0
0
Report
नागपुर विधान परिषद पोटनिवडणुकी की मतगणना 22 जून को, 823 मतदाताओं ने मतदान किया
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणूक निवडणुकीसाठी 836 मतदारांपैकी 823 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 13 नगरसेवक मतदानापासून तटस्थ राहिले. यामध्ये महापालिकेतील एमआयएमचे 6, इंडियन मुस्लिम लीचे 4 आणि बसपाचा एक असे 11 नगरसेवकांचा समावेश आहे. तर उमरेड व कामठी येथील प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. भाजपाचे डॉक्टर राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्या लढत असलेले या विधानपरिषद पोटनिवडणुकीची मतमोजणी 22 जूनला होईल0
0
Report
Advertisement
