445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आषाढी वारी: दातली में संत निवृत्तीनाथ महाराज के पहले रिंगण में भक्तों का उत्साह
Yeola, Maharashtra:संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढ़ी वारी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ज्ञानोबा-तुकाराम जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या अखंड नामगजरात हजारो वारकरी और भाविकांनी पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी दातली परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका और वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्तीभाव व्यक्त केला.0
0
Report
रायगढ़ में भारी बारिश, नदियां खतरे के निशान पर—पीड़ित इलाकों में आपदा चेतावनी
Chendhare, Maharashtra:संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला रायगडच्या अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली उत्तर रायगडला जोरदार पावसाने झोडपले पेण, खोपोली, पाली परिसरात जोरदार पाऊस0
0
Report
पेण शहर में भीषण बारिश से जल भराव, लोग परेशान
Chendhare, Maharashtra:मुसळधार पावसामुळे यंदाही पेण शहराच्या अनेक भागात पाणी साचले. संध्याकाळच्या sुमारास झालेल्या पावसानं पेणच्या प्रवेशद्वारासह रामवाडी एसटी वर्कशॉप, विक्रम स्टेडियम, उर्दू शाळा, म्हाडा कॉलनी, गोविंदबाग, महावीर मार्ग परिसर जलमय झाला. गटारांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी पाणी दुकाने आणि रस्त्यांवर साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही दुचाकी व रिक्षाही पाण्यात बंद पडल्या. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दरवर्षी याच ठिकाणी पाणी तुंबत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
रामदास आठवले का दावा: एक दिन उद्धव ठाकरे उनके पास आना ही होगा
Sangli, Maharashtra:एक दिवस उद्धव ठाकरेनाचं आमच्याकडे यावं लागेल, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच हे टायगर ऑपरेशन नाही, देवेंद्र ऑपरेशन नाही, हे उद्धव ठाकरेचे ऑपरेशन झाले आहे. आम्ही कोणतीही फोडाफोडी केली नाही; आमदार-खासदार हे आमच्याकडे येत आहेत. 2019 मध्येचे आमच्यासोबत यावं, असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितलं होतं, पण ते आले नाहीत, ती त्यांची चूक होती, त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
ढोर सांगवी में खुले विद्युत तार से युवक की दर्दनाक मौत
Latur, Maharashtra:जळकोट तहसील के ढोर सांगवी गांव से एक अत्यंत दुर्दैवी और धक्कादायक घटना सामने आई है। खेत में डाली गई विद्युत तार में प्रवाह चालू रहने के कारण तार खुला पड़ा था, जिससे एक निर्दोष व्यक्ति को जीव गंवाना पड़ा। शंकर गोविंद यमूलवाड वहां से गुजर रहे थेतो उनके कदम के नीचे बिजली प्रवाह वाली वायर आ गई और उन्हें जोरदार झटका लगा। इस भयावह घटना में उनकी मौके पर ही मृत्यु हो गई। घटना की जानकारी मिलने पर क्षेत्रीय लोगों ने मौके पर पहुंचकर शव को पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल भेज दिया।0
0
Report
रायगढ़ के पालकमंत्री पद को लेकर विवाद, भरत गोगावले को मिलने की चर्चा तेज
Karjat, Maharashtra:रायगडच्या पालकमंत्रीपदावरून झालेल्या वादावर आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीचं सरकार स्थापन करण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं योगदान असल्याचं सांगत, रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळावं, यासाठी आम्ही तिन्ही आमदार आग्रही होतो, असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या प्रक्रियेत भरत गोगावले, मी आणि महेंद्र दळवी इतर सहकाऱ्यांचंही मोठं योगदान होतं. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळावं, ही आमची ठाम भूमिका होती. मात्र हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला काही काळ स्थगिती दिली. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर हा वाद संपुष्टात आला.0
0
Report
Advertisement
रायगड के करजत में श्रीराम पुल का उद्घाटन, मंत्री भरत गोगावले की मौजूदगी में
Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग रायगड के करजत के उल्हास नदी पर नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम पुलाचे उद्घाटन राज्याच्या रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे देखील उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाला अजित दादांच्या राष्ट्रवादीला डावळल्याचा प्रकार समोर आला यानंतर मंत्री भरत गोगावले यांना याबત विचारला असता भात चुलीवरून उतरलेले आहे. ते थोड थंड होईउदया पुढच्या वेळेस सगळ्यांचे फोटो आणि बॅनर लागतील असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत तू तू मैं मैं अद्यापही सुरूच आहे त्यामुळे पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादीला डावल्याचा प्रकार समोर आलाय.0
0
Report
मंत्रिमंडळ विस्तार पर बारणे का दावा: निर्णय शिंदे के हाथ में
Karjat, Maharashtra:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. मंत्रिमंडळात आपल्या नावाची चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी निर्णयाचा अधिकार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील सत्तासमीकरण, सहा खासदारांचा शिवसेनेत प्रवेश आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळात आपल्या नावाची चर्चा असल्याबाबत बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हे एकनाथ शिंदे ठरवतील आणि ते कार्यकर्त्याला न्याय देणारे नेते आहेत. राज्याची सूत्रे शिंदे यांच्या हाती येण्याच्या चर्चेवर त्यांनी हा निर्णय भाजपचा असल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांबाबत बोलताना बारणे म्हणाले, हे खासदार मुळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असून त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे होत नसल्याने त्यांनी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार उतरवायला हवेत होते, मात्र तसे झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली.0
0
Report
رامدس آدهوتلے کا طنز: عادیہ ठाकرے کا آخری اسمبلی اجلاس
Sangli, Maharashtra:सरकारचं नव्हे तर आदित्य ठाकरे यांचे शेवटचा अधिवेशन आहे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांचे शेवटचे आमदारकी आहे, वरळी मतदारसंघातून त्यांना आम्हीच निवडून आणलं होतं, असं देखील मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी महायुतीचे हे शेवटचं अधिवेशन आहे, अशी टीका केली आहे. यावरून मंत्री रामदास आठवलेंनी आदित्य ठाकरेना हा टोला लगावला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
Advertisement
ठाणे के बारवी डैम क्षेत्र में 9 घंटे में 100 मिमी बारिश, पानी 4 फुट बढ़ा
Ambernath, Maharashtra:Anchor ठाणे जिल्हा आणि आसपासच्या शहरांची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. आज सकाळपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, अवघ्या ९ तासांत तब्बल १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ४ फुटांची लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळपासून धरण क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे. प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा खालावला होता, ज्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आज झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे0
0
Report
राम रक्षा महाआरती पर उद्धव ठाकरे पर तंज, आठवलें बोले शिवसेना रक्षा आंदोलन जरूरी
Sangli, Maharashtra:स्लग - उद्धव ठाकरें राम रक्षा नव्हे,शिवसेना रक्षा आंदोलन करावे,रामदास आठवलें, उडवली खिल्ली.. अँकर - उद्धव ठाकरेंनी,राम रक्षा महाआरती आंदोलन करण्यापेक्षा,शिवसेना रक्षा आंदोलन केले पाहिजे,अशी खिल्ली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.तसेच उध्दव ठाकरे,यांनी अयोध्याला जावं, आणि रामाकडे एक ही आमदार फुटी येऊ नये,असे साकडे घालावे असा खोचक सल्ला देखील मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे, अयोध्यातील राम मंदिर चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंकडून उद्या रामरक्षा महाआरती राज्यभर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे,यावरून मंत्री रामदास आठवलेांनी हा टोला लगावला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - रामदास आठवले -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.0
0
Report
अंबरनाथ की वालधुनी नदी में बच्चों के खतरनाक स्टंट, तेज बहाव में जान जोखिम में
Ambernath, Maharashtra:चिमुकल्यांचा जीवाशी खेळ प्रशासनाचे दुर्लक्ष स मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधील वालधुनी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली असून प्रवाह अत्यंत वेगवान आहे. मात्र, अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही चिमुकल्यांचा नदीच्या पुरात जीवाची पर्वा न करता स्टंट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वालधुनी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात लहान मुले उंच कठड्यांवरून आणि पुलावरून थेट उड्या मारत आहेत. वेगवान प्रवाहाचा आणि पाण्याचा अंदाज नसतानाही मुलांचा हा जीवघेणा खेळ आणि धोकादायक अंघोळ सुरू आहे. एखादा जरी पाय घसरला किंवा पाण्याचा वेग वाढला, तर मोठी दुर्घटना घडू शकते,0
0
Report
Advertisement
मधुबन में जलसंकट के बीच बचाव टीम ने 20-25 नागरिकों को सुरक्षित निकाला
Vasai-Virar, Maharashtra:वसई पूर्वेतील मधुबन परिसरात बचावकार्य; २० ते २५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले ही दृश्ये वसई पूर्वेतील मधुबन परिसरातील आहेत. मुसळधार पावसामुळे या भागात गंभीर जलसंकट निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पाण्याची पातळी नागरिकांच्या गळ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी दोरीच्या सहाय्याने जलमय भागात प्रवेश करून सुमारे २० ते २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेल्या भागात जाणे टाळण्याचे तसेच सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.0
0
Report
चंद्रपूर महापालिका में भाजप गुटों के बीच भारी राडा, सुधीर मुनगंटीवार नाराज़
Chandrapur, Maharashtra:चांदा ते बांदा भाजपला पडलाय एकच प्रश्न, सुधीरभाऊ को गुस्सा क्यू आता है?, चंद्रपूर महानगरपालिकेत मुनगंटीवार- जोरगेवार नगरसेवकात आमसभा रद्द झाल्या वरून जोरदार राडा झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे स्टेरिंग त्यांच्या हातात आहे- मी अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे अँकर:--चांदा ते बांदा भाजपला सध्या एकच पडलाय प्रश्न पडलाय. तो म्हणजे सुधीरभाऊ को गुस्सा क्यू आता है? चंद्रपूर महानगरपालिकेतील मुनगंटीवार- जोरगेवार नगरसेवकात आमसभा रद्द झाल्या वरून जोरदार राडा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे स्टेरिंग त्यांच्या हातात आहे- मी अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. व्ही. ओ. १) एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी, रेटारेटी आणि धक्काबुक्की नंतर चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या आ. किशोर जोरगेवार आणि आ. सुधीर मुनगंटीवार गटाच्या नगरसेवक आणि समर्थकांनी एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला. बराच वेळ महानगरपालिकेत सुरू असलेल्या या तमाशाला नंतर दोन्ही गटाचे नगरसेवक आणि समर्थकांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. या नाराजी नाट्याला याच आठवड्यात जिल्ह्याची ग्रामीण कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्पुरती स्थगित केल्याची किनार आहे. ही ग्रामीण कार्यकारणी मुनगंटीवार यांच्या मर्जीने तयार झाली होती. मात्र मुनगंटीवार विरोधकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संयुक्तपणे भेट घेत यावर स्थगिती मिळवली. यामुळे मुनगंटीवार विरोधकांना एक प्रकारे विजय मिळाला. त्याचे पडसाद मनपाच्या आमसभेच्या निमित्ताने दिसून आल्याचे म्हटले जाते. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते (on चंद्रपूर महापालिका भाजप गटातील दोन गटातील राडा ) व्ही. ओ. २) दरम्यान या मुद्द्यावर आ. मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूरच्या पक्ष संघटनेचे कल्याण करायचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत प्रदेशाध्यक्षांना थेट लक्ष्य केल्याचे म्हटले जाते. चंद्रपूरच्या विषयात मला गुंतवू नका, मला विदर्भाचे- राज्याचे प्रश्न मांडू द्या असं म्हणत त्यांनी राड्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटना चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे हे सांगताना त्यांनी आपल्या विरोधकांना पक्ष संघटनेने दिलेले बळ आपल्याला रुचले नसल्याचे दाखवून दिले आहे. वाघाला बंदिस्त करू नका असे त्यांनी सूचकपणे म्हटले. बाईट २) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते ( मुनगंटीवार ऑन कल्याण आणि वाघ) व्ही. ओ. ३) चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपासून आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार असा जोरदार वाद पेटला आहे. त्यातच मनपा निवडणूक आणि नंतर महापौर निवडी संदर्भात पक्षांतर्गत जोरदार बंदद्वार फटाके फुटले. आता मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेल्या नाराजी नांरे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काय पावले उचलतात याकडे भाजप आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्पताल में भर्ती, डॉक्टर आराम की सलाह दे रहे हैं
Pandharpur, Maharashtra:राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिंदे साहेबांना धावपळीमुळे त्रास होत असल्याने डॉक्टरांना त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र शिंदे साहेब हे ऐकणारे नाहीत. मात्र त्यांना सध्या आरामाची गरज आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच बाबत एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती आरोग्य मंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूरात दिली.0
0
Report
Advertisement
