445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पेट्रोल-डिज़ल की फिर से बढ़ोतरी, आम नागरिकों में गुस्सा—कोल्हापुर पेट्रोल पंप से रिपोर्ट
Kolhapur, Maharashtra:पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.. परवाच पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ केल्यानंतर पुन्हा दरवाढीचा फटका का ? असा सवाल ग्राहक विचारत आहेत.. कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
यवतमाळ में महावितरण की धड़ाक अभियान: 50 लाख से अधिक बिजली चोरी पकड़ाई
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये महावितरण कडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहिम राबवली जात आहे. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात पंधरा पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटर मध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे वीज मीटर ला जामर लावणे, रिमोट कंट्रोल द्वारे मीटर फिरविणे, बायपास करणे, आकोडा टाकणे आदी सर्वच प्रकारे ही विजेची चोरी होत होती. वीज चोरट्यांमध्ये राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींचा सुद्धा सहभाग उघडकीस आला आहे. एक ते दीड तासात तब्बल पन्नास लाखाहून अधिक रुपयांची वीज चोरी पकडल्या गेली आहे. दरम्यान या धडक मोहिमेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक लोकांनी घरादारांना कुलूप लावून पळ काढला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 25% हून अधिक विजेची तूट होत असून वीज चोरीच्या बाबतीत जिल्हा बदनाम होऊ नये म्हणून वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.0
0
Report
लातूर में RCC क्लासेस के सामने मनसे का भारी प्रदर्शन, अंडे फेंके गए
Latur, Maharashtra:लातूर में RCC क्लास के सामने मनसे का आंदोलन हुआ. शिवराज मोटेगावकर के RCC क्लासेस के सामने मनसे के कार्यकर्ताओं ने जोरदार प्रदर्शन किया. कुछ आंदोलकों ने क्लासेस के बोर्ड पर अंडे फेंके. परिसर में कुछ समय के लिए तनाव का माहौल बना रहा. क्लासेस के बाहर पुलिस का बंदोबस्त रखा गया. अब आंदोलक को पुलिस ने हिरासत में ले लिया गया है.0
0
Report
Advertisement
अमेरिका-इराण युद्ध के प्रभाव से पेट्रोल-डीजल कीमतों में अचानक बढ़ोतरी, शहरों में ईंधन संकट
Akola, Maharashtra:Anchor : अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता देशातील इंधन बाजारावरही दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती असताना गेल्या दोन दिवसांत इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. काल पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल, डिझेल आणि पावर पेट्रोलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काल पेट्रोलचा दर 107 रुपये 24 पैसे होता, तो आज 108 रुपये 15 पैशांवर पोहोचला असून पेट्रोलमध्ये तब्बल 91 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर 93 रुपये 78 पैशांवरून 94 रुपये 71 पैशांपर्यंत वाढला असून डिझेलमध्ये 93 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय पावर पेट्रोलचा दर 116 रुपये 98 पैशांवरून 117 रुपये 88 पैशांपर्यंत वाढला असून त्यातही 90 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडत असून वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
इंधन महँगाई पर भाजपा-शिवसेना के आरोप-प्रत्यारोप बढ़े
Mumbai, Maharashtra:On इंधन महागाई भडका: जय श्री राम! म्हणत गप्प बसायचं.. महागाई वाढणारच आहे.. देशात अराजकता माजणारे.. आणि भाजप म्हणणार याला मुस्लिम जबाबदार आहेत. लोकं मग टिळा लावून भाजप ला मतदान करतील.. लोकं त्यांच्या कर्माची फळ भोगतायत.. आज विरोधात आंदोलन करणं देशद्रोहाचा गुन्हा ठरतो अदानी ला न्याय मिळतो पण आम्हाला न्याय मिळत नाही भाजपच्या लोकांना कुठून इंधन मिळतय माहित नाही.. भाजपचं कार्ड दाखवा इंधन मिळवा असं असेल ठाकरेंची सेनाच विरोधक म्हणून आवाज आहे, ठिक ठिकाणी आंदोलन करतोय.. On समुद्राखालून पाईपलाईन Modi प्रयत्नः मोदी परदेश दौऱ्याहून परत येताना समुद्राखालून पाईपलाईन कुठून टाकायची हे बघत समुद्राखालून प्रवास करतील.. ते स्वतःच उडी मारतील व पाईपलाईन चा मार्ग शोधत जातील.. तुम्ही इराण बरोबर संबंध खराब केलेत..चीन, नेपाळ सोबत संबंध चांगले नाहित मग पाईপलाईन कुठल्या समुद्राखालून टाकणार आहात? ॲान विमानतळ आंदोलन ः काल दिवसभर विमानतळ बंद होतं अनेक उड्डाणं रद्द झालेली.. भाजप ने हा संप केला कारण विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेची युनियन आहे.. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे अन्य युनियनच्या लोकांना धमकावतायत, जबरदस्ती फॉर्म भरून घेतायत.. ॲान नागेश अष्टिकर शिंदे भेटः काय असतं ॲापरेशन टायगर? टायगर कोणाला म्हणतात..हि मिलटरीची ॲापरेशन्स असतात.. लफंगेगीरीची नव्हे.. अष्टिकर हतबल झालेत निघी मिळत नाहिए.. अष्टिकरांप्रमाणे विरोधी पक्षातील अन्य ही आमदार, खासदारांना निधी मिळत नाहिये ॲान नीटः नीट मारली ना युवकांची भाजप ने.. नीट प्रकरणात आज समन्स काढलेले नीट चे प्रमुख प्रमोद जोशी आर एस एस चे स्वयंसेवक आहेत.. नीट प्रकरणात भाजपचं सूत्रधार आहे.. भाजप ने आरोप फोटाळावा मी पुरावे देतो.. हा अणू बॅाम्ब आहे भारतावर पडलेला-शिक्षणव्यवस्था उद्धवस्थ केलीय.. सर्व शैक्षणिक संस्थांवर भाजप व संघाचे लोक बसवून पेपर फोडून यांना चांगले गुण मिळवून वर नेतायत..0
0
Report
शासकीय मेडिकल कॉलेज में परिचारिका अत्याचार: 40 स्वास्थ्य कर्मचारी किए विरोध प्रदर्शन
Amravati, Maharashtra:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका अत्याचार प्रकरणी चार दिवसांपासून काम बंद आंदोलन; आरोपीला अटक करण्याची मागणी, चाळीस आरोग्य कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग अँकर :- अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका परिचारिकेवर सहा मे रोजी रात्रपाळीला ड्युटीवर असणाऱ्या अत्याचाराची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे मात्र सहा तारखेपासून अजूनही आरोपी अटक न झाल्याने गेल्या 16 मे पासून अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 40 आरोग्य कर्मचारी संपावर गेले आहे त्यामुळे आरोपीला तात्काळ पकडण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा यंत्राला सुरळीत करून अशा प्रकारचे कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे त्यामुळे हे आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी किती दिवस चालते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.0
0
Report
Advertisement
नीट प्रकरण के बाद शिवराज मोटेगावकर फिर वायरल, खेत में डांस वीडियो चर्चा में
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट प्रकरणानंतर शिवराज मोटेगावकर पुन्हा चर्चेत... शेतात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल... नीट पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर चर्चेत आलेले शिवराज मोटेगावकर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी कोणत्याही चौकशीमुळे नाही, तर त्यांच्या एका वेगळ्याच व्हिडिओमुळे चर्चा रंगली आहे. एका शेतामध्ये गाण्याच्या तालावर डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या व्हिडिओवरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.0
0
Report
बीड़ के मांडवखेल में मोरशिकार: चार गिरफ्तार, धारदार हथियार बरामद
Beed, Maharashtra:बीड: बीड तालुक्यातील मांडवखेल परिसरात मोरांची शिकार करणाऱ्या चार जणांना मध्यरात्री गावकऱ्यांनी पकडले. ANC- बीड तालुक्यातील मांडवखेल परिसरात वनपरिक्षेत्रात मध्यरात्रीच्या सुमारास मोरांची शिकार करणाऱ्या चार जणांना मांडवखेल येथील गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोरांची शिकार करण्यासाठी वापरत असलेले धारदार हत्यार आणि गुलेर असे साहित्य त्यांच्याकडे होते तसेच शिकार केलेले दोन मोर देखील त्यांच्या पिशवीत आढळून आले.0
0
Report
बुलढाणा में ATS ने नागपुर-आकोला के साथ बड़े कारवाई; पिस्टल-92 कारतूस बरामद
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात नागपूर आणि अकोला एटीएस ची मोठी कारवाई. दोन पिस्टलसह 92 जिवंत काडतूस जप्त. तीन जणांना ATS ने केली अटक. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्रीकोळी या गावातून नागपूर आणि अकोला एटीएसने तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन पिस्टल व 92 काडतूस जप्त केले आहे. अकोला आणि नागपूर एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाई बाबत मात्र बुलढाणा पोलीस अनधिज असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर आणि अकोला एटीएसला बुलढाणा जिल्ह्यात येऊन केलेल्या कारवाईमुळे मात्र बुलढाणा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल आहे. शुभम सागर पवार राहणार वर्धा व रोहित शिंदे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते काळ्या रंगाच्या कारमधून या परिसरात फिरत असल्याची माहिती अकोला आणि नागपूर एटीएसला मिळाली होती त्यानुसार काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली दोन पिस्टल व 92 जिवंत काडतूस जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे0
0
Report
Advertisement
उल्हासनगर महापालिका में महायुती की भीतर की खींचतान जारी, भाजपा-शिवसेना आमने-सामने
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेतील महायुतीतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागले असून, उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिवसेना आमनेसामने ठाकले आहेत. महासभेत झालेल्या गोंधळानंतर भाजपने सभात्याग करत लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर शहर विकासात अडथळा आणत असल्याचा पलटवार केला आहे. विरोधी पक्षनेतेपद, विद्यार्थीवृत्ती आणि अजेंड्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष आता महायुतीतील मोठ्या राजकीय वादात बदलताना दिसत आहे.0
0
Report
रत्नागिरी-कोकण सीट पर महायुती में पेच, शिंदे-शिवसेना बनाम अजित पवार की भिड़ंत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीत उमेदवारीवरून चढाओढ शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा राजन साळवी यांनी यापुर्वीच सुरु केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुशंघाने आखणी कोकण विभागात या मतदार संघात शिंदे शिवसेनेचे पारडे जड रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण 831 मतदार सदस्य यातमध्ये एकट्या शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांचे 236 संख्याबळ श शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही पाडलेल्या संख्याबळाच्या जोरावर या मतदारसंघावर ,सांगितलाय हक्क राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षनिहाय संख्याबळ पाहता या निवडणुकीत चुरस सुनील तटकरे आपल्या मुलगा अनिकेत तटकरे याचे राजकीय पुर्वुनवस करण्यासाठी पुर्व एकदा आग्रही महायुतीतील हा जागेचा पेच सोडण्यासाठी मुख्यमंत्री समन्वयाची भूमिका घेणार0
0
Report
नाशिक–पुणे महामार्गावर सीएनजी पंपांवरील गॅस असंयोजनामुळे लांबच लांब रांगा, गाडीचालकांची नाराजी
Sinnar, Maharashtra:नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी सीएनजी गॅस उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तासन्तास लाईनमध्ये थांबल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक पंपावर नियमितपणे सीएनजी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. तासनतास सीएनजी गॅस मिळवण्याकरता थांבण्याचे वेळात असल्याने प्रवाशांसह वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
प्याज भाव: किसान 12.35 रुपये से नाराज, 20–22 रुपये की मांग
Sinnar, Maharashtra: सरकारने कांद्याला १२ रुपये ३५ पैसे बाजारभाव जाहीर केल्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “१२ रुपयांत वडापाव तरी मिळतो का?” असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी हा दर मान्य नसल्याचे स्पष्ट केले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याला किमान २० ते २२ रुपये बाजारभाव मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला.0
0
Report
वाशीम में पेट्रोल-डीजल का तुटवड़ा कायम, पंप बंद, प्रशासन ने खपत रोकने को कहा
Washim, Maharashtra:वाशीम: File:1905ZT_WSM_FUEL_SHORT_DM_BT रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असताना, दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप आजही बंद असून, ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वांधारकाने मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सकाळी सहावाजल्या पासूनच रांगा लावल्याचे दिसून आले.नागरिकांना घाबरून अतिरिक्त इंधन साठा न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा 20 टक्क्यांनी अधिक झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तसेच इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे गरजेपेक्षा अधिक पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये, जेणेकरून कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही,असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. बाईट:योगेश कुंभेजकर,जिल्हाधिकारी वाशीम0
0
Report
मोहाडी के जनता दरबार में अधिकारी गैरहाजिर, कुर्सियाँ खाली—प्रशासन पर प्रश्न
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे तहसीलदाराच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जनता दरबारासाठी मोठी तयारी करण्यात आली होती, मात्र अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नागरिकांनीही या जनता दरबाराकडे पाठ फिरवल्याने सभागृहातील अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. त्यामुळे जनता दरबाराच्या उपयुक्ततेवर आणि प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
