icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

RTE प्रवेश की पहली फेरी: समयसीमा बढ़ी, 2 मई तक आवेदन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी आता २ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी ही मुदत संपत होती. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ५४१ शाळांमध्ये ४,९११ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी १७,१८७ अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत ४,८६६ विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी, कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे केवळ ७४३ विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. पालकांना दिलासा देण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी ही मुदत वाढवून दिली आहे.
0
0
Report

चुलबंद नदी में अज्ञात युवक का शव, दो दिन से लापता विकास ठाकरे की पहचान

Bhandara, Maharashtra:भंडारा. जिल्ह्यातील लाखांदूर शहरालगत असलेल्या चुलबंद नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र आता मृतदेहाची ओळख पटली असून, तो दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला युवक विकास प्रभाकर ठाकरे (वय ३५ वर्षे) असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकास ठाकरे हा मूळचा सरांडी (बू.) येथील रहिवासी असून सध्या तो नाग परसोडी गेल्या दोन दिवसांपासून तो घरातून बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर लाखांदूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. घडलेली घटना ही घातपात की अपघात याचा तपास पोलिस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

भगवती कॉलनी में वृद्ध महिला से सोने की साखळी छीनकर भागा; CCTV तस्वीरें

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एक भामटा हातात चप्पल घेऊन, जणू काही अगदी सामान्य वाटसरू असल्याचा आव आणत, पायी चालत आला. एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करून तो पसार झाला. हा प्रकार सोमवारी सकाळी १० च्या सुमारास भगवती कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. फिर्यादी महिला ओंकारेश्वर मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी परतत होत्या. पांढरा शर्ट आणि काळी पँट घातलेला एक तरुण त्यांच्या दिशेने चालत येत होता. तो सामान्य कामासाठी निघालेला स्थानिक रहिवासी असावा, असा भास होत होता. तो अगदी जवळ आला. महिलेला काही समजण्याच्या आतच त्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी आणि चांदीची तुळशीमाळ ओरबाडली.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में तीन महीनों में 217 किसान आत्महत्या, गंभीर मौसम संकट के बीच

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या गव्हाचे पीक भुईसपाट झाले. कर्जबाजारी होऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे या अस्मानी संकटामुळे कंबरडे मोडले. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावला. परिणामी, हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी, फेबहतारी, मार्च या तीन महिन्यांत विभागात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात मार्च महिन्यात सर्वाधिक ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी महिन्यात ७६ तर फेब्रुवारी महिन्यात ५९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. १६१ प्रकरणांत चौकशी सुरू आहे, तर ४४ प्रकरणात मदतीची रक्कम अदा करण्यात आली आहे. ९ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ३ प्रकरणे पात्र ठरली असून, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही. गेल्या वर्षी १,१२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ७९६ शेतकरी कुटुंबांना मदत करण्यात आली. १४० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. संभाजी नगर 53 आत्महत्या. बीड 49 आत्महत्या. धाराशिव 30 आत्महत्या. नांदेड 29 आत्महत्या. परभणी 19 आत्महत्या. जालना 13 आत्महत्या. Hingoli 3 आत्महत्या. लातूर 11 आत्महत्या
0
0
Report

NGO चालक मोह.रियाज काझी की गिरफ्तारी: धार्मिक दबाव और दुष्कर्म की जांच

Nagpur, Maharashtra:नागपूर धार्मिक चालीरीतींचे पालन करण्यासाठी दबाव आणत कर्मचारी तरुणींना धमकी देणाऱ्या एनजीओ चालक मो.रियाज मो.फाझील काझीच्या अटकेनंतर याप्रकरणी विनयभंग व दुसरीकडे धार्मिक दबावचा पोलीस तपास करत आहेच पोलीस आता विविध दिशांनी तपास करताय . रियाझ काझीच्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी, फिकर फाउंडेशन ला मिळणाऱ्या आर्थिक स्त्रोतांचाही शोध पोलीस घेत आहे. काझीच्या संस्थेला कोण कोण व किती मदत करत होते त्याला मिळालेले रक्कम त्याने कुठे वापरली याची संपूर्ण माहिती पोलीस गोळा करत आहे. त्यांनी मिळालेला निधी नेमका कशासाठी वापरला याचा उलगडा ही करण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे.. तर दुसरीकडे काझी काझी बनावट सोशल आयडी तयार करून तो महिला कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवायचा अशी माहिती पोलीस तपास पुढे आलीय
0
0
Report
Advertisement

बी.कॉम पेपर लीक मामला: केंद्र बंद, कर्मचारियों पर मामला, पेپر व्हॉट्सअॅपवर वायरल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉम. परीक्षेत प्रश्नपत्रिका लीक करून व्हायरल केल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील हतनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावरून झाल्याचे तपासणीत उघड झाले. या पेपरची परीक्षा नव्याने होणार असून, परीक्षा केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. तसेच केंद्रातील संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही कुलगुरू यांनी दिले...विद्यापीठातर्फे होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेत ११ एप्रिलला बी. कॉम. तृतीय वर्ष सहाव्या सत्राचा 'डायरेक्ट टॅक्स' या विषयाचा पेपर होता. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. १०० रुपयांपासून ५০০ रुपयांपर्यंत विद्यार्थाना ती विकली असल्याचे निष्पन्न झाले होते...
0
0
Report

अमरावती में अवकाली बारिश से बिजली सप्लाई बंद, रहाटगांव कार्यालय के पास धरना शुरू

Amravati, Maharashtra:अमरावती शहरात रात्री अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित; शेकडो नगरिकांची रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावर धडक, तीव्र आंदोलनाचा इशारा अमरावती शहरात काल रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे अर्जुननगर मधील वीज पुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक प्रशांत धर्माळे यांच्यासह शेकडो नगरिकांची रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावर धडक दिल्याचे पाहायला मिळाले आहे. रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावर नगरसेवक प्रशांत धर्माळे यांनी धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला आहे. वारंवार अर्जुन नगर परिसरातील वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले असून अर्जुननगरच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में अनियमित बारिश ने किसानों पर डाला भार, नुकसान से 65 हजार किसान प्रभावित

Nashik, Maharashtra:- नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका - 65 हजार शेतकऱ्यांच्या 41 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - कृषी विभागाकडून मार्च मधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण - 73 कोटींचा नुकसानभरपाई प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे - 410 गावांमध्ये शेतीचे नुकसान, 65,756 शेतकरी बाधित - 34,136 हेक्टरवरील कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान - डाळिंब 4,584 हेक्टर, गहू 1,231 हेक्टर, भाजीपाला 189 हेक्टर नुकसान - बागायती पिकांचे मोठे नुकसान, 36 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित - फळपिकांसाठी स्वतंत्र 11 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव - हेक्टरी 8,500 ते 22,500 रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद - सिन्नर, निफाड, दिंडोरी, मालेगावसह अनेक तालुक्यांना फटका - पुन्हा अवकाळीचे ढग, शेतकरी आणि प्रशासन चिंतेत
0
0
Report

नासिक में मल्टीनेशनल कंपनी मामले में आरोपी के फोन जब्त, ग्रुप संदेशों से महिला उत्पीड़न का भंडाफोड़

Nashik, Maharashtra:Nashik Breaking - - मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रकरणात संशयित आरोपींचे मोबाईल जप्त - व्हॉट्सअॅप्प ग्रुपचे धक्कादायक तपशील SIT तपासात समोर - ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केल्याची सूत्रांची माहिती - ग्रुपच्या माध्यमातून महिलांवर मानसिक दबाव व छळवणुकीचे प्रयत्न - ऑफिसमध्ये दररोज इंटरनेट पासवर्ड आक्षेपार्ह/धार्मिक भावना दुखावतील अशा नावाने सेट केल्याचा आरोप - लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणात आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत - अधिक तपासासाठी आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू - डिजिटल पुराव्यांमधून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
0
0
Report

वालवा के हुतात्मा सहकारी शक्कर कारखाने में भ्रष्टाचार के आरोप, काका-पौत्र के बीच धरणा

Sangli, Maharashtra:स्लग - हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन; वैभव नायकवडींच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू अँकर - सांगलीच्या वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्या विरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कारखान्याचे चेअरमन व क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडींची सुपुत्र वैभव नायकवडी यांच्या विरोधात गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कारखाना कर्जमुक्त करण्याबरोबर विद्यमान चेअरमन वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात आली असून,या आंदोलनामध्ये नागनाथ अण्णा नायकवडीचे नातू आणि वैभव नायकवडीचे पुतणे माजी सरपंच गौरव नायकवडी देखील सहभागी झाले आहेत.या आंदोलनामुळे पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्यात संघर्षाची ठिणगी पडली असून काका विरुद्ध पुतण्या असा देखील उफाळून आला आहे. बाईट - सभासद - हुतात्मा सहकारी साखर कारखाना,वाळवा.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top