445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दिवा क्षेत्र के 39 अनधिकृत गोडाउनों पर निष्कासन अभियान; सर्वे जारी
Thane, Maharashtra:दिवा परिसरातील ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई सर्वेक्षण मोहीमही सुरू ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 39 अनधिकृत गोडावूनवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत शनिवारी (दि. २० जून २०२६) शिळफाटा येथील आचार गल्ली परिसरात असलेल्या ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून, संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून, नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी नमूद केले.0
0
Report
शिर्डी में भगवा वादळ के बीच हिंदू समाज का सड़क प्रदर्शन
Shirdi, Maharashtra:साईंंच्या शिर्डीत भगवे वादळ. शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा. पश्चिम बंगालमधून कुटुंबीयांसोबत साई दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर विनयभंग. साईबाबा संस्थानच्या 500 रुम भक्तनिवासातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याने संताप. (मुलगी हिंदू तर आरोपी मुस्लिम आहे) अमन पठाण असे कर्मचाऱ्याचे नाव; शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी अटकेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज आक्रमक. अहिल्यानगरचे आ.संरंग्राम जगताप, भाजप नेते सुजय विखे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग सांचे सह सकल हिंदू समाज उतरला रस्त्यावर. शिर्डी शहरातून मुख्य मार्गावरून काढण्यात आला मोर्चा. मोर्चानंतर सभेचे आयोजन.0
0
Report
चंद्रपुर में अवैध मद्यपान अड्डे पर छापा, 4 ग्राहक गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 4 ग्राहकांसह मालिकाविरुद्ध गुन्हा दाखल, मोठा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरच्या पथकाने ताडोबा व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थायी टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्य विक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यासाठी आवश्यक ते साहित्य/सेवा पुरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आढळून आले. कारवाईदरम्यान 4 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करतांना आढळून आले. तसेच आशिष खोबरागडे, हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोहिमेत देशी दारु, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या बाटल्यासह मोठा दारू साठा जप्त करण्यात आलाय.0
0
Report
Advertisement
वाशीम में देर रात पुलिस ने संदिग्ध तिकड़ी के खिलाफ मामला दर्ज किया
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड शहरात पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करत संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाशिम नाका येथील मुंडडा कॉम्प्लेक्स परिसरात डी.बी.पथकाने छापा टाकला असता तिघांनी पळ काढला.यापैकी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तलवार,कटर,मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली.तसेच घटनास्थळावरून लायटर पिस्टल आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आला.या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.0
0
Report
अमित शाह ने पश्चिम महाराष्ट्र के लिए 1500 करोड़ रु को-ऑपरेटिव प्लांट की घोषणा
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजी येथील जाहीर सभेत पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अत्याधुनिक को-ऑपरेटिव्ह संयंत्र उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. या संयंत्रामध्ये साखर, इथेनॉल आणि सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून होणारा नफा महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आणि साखर कारखान्यांना बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.0
0
Report
इचलकरंजी के लिए नई पानीपुरवठा योजना: शाह-फडणवीस की घोषणा से फाइनल मंजूरी
Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.. या योजनेसाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृष्णा नदीकाठावरील नवे दानवाड येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाल्याने, शहरवासीयांचा अनेक वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी सभेत शहराच्या पाणीप्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांनी घोषणा करावी अशी मागणी या कार्यक्रमा केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली.0
0
Report
Advertisement
निफाड़ तालुक के पूर्व भाग में बारिश शुरू, किसानों को मिली राहत
Niphad, Maharashtra:अँकर:-निफाड तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आणि नागरिक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. अखेर पावसाचे आगमन झाल्यामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि विशेषतः बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आता परिसरातील रखडलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.0
0
Report
मावळ के अंबी MIDC में पुष्पक एग्रो कंपनी में भीषण आग
Varsoli, Maharashtra:Anchor: मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरातील वराळे येथील पुष्पक अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक उत्पादने तयार करणाऱ्या या कंपनीत अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी आंबी एमआयडीसी अग्निशामक दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे...0
0
Report
अंबरनाथ के उपनगराध्यक्ष की निजी फॉर्च्युनर में लाल-नीले फ्लैशर, आदेश उल्लंघन पर जांच की मांग
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या खासगी फॉर्च्युनर गाडीवर लाल-निळे फ्लॅशर दिवे लावल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारने अशा दिव्यांच्या वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही हे दिवे वापरले जात असल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. या प्रकरणी सदाशिव पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होतेय. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौरांच्या वाहनावरील अशाच फ्लॅशर दिव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तो वाद शांत होत नाही तोच अंबरनाथमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या खासगी फॉर्च्युनरच्या डॅशबोर्डवर लाल-निळे फ्लॅशर दिवे लावण्यात आल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे शहरात फिरताना तसेच नगरपालिकेत ये-जा करतानाही हे दिवे सुरू ठेवले जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेले नियम लोकप्रतिनिधींनाही लागू आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. केंद्र सरकारच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा आरोप होत असताना प्रशासन आणि वाहतूक पोलिस या प्रकरणाची दखल घेणार का, आणि उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर कारवाई होणार का, याकडे आता अंबरनाथकरांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपुर में किसानों ने तहसील के सामने पावर सप्लाई की मांग पर ठिय्या प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील शेती पंपाला पुरेशा त्या प्रमाणात वीज कोर्टात द्यावा या मागण्यासाठी आज आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सध्या सुरळीत वीज पुरवठा अभावी शेतातील पिके जळू लागली आहेत अनेकांना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही अशी अवस्था झाली आहे या आंदोलन दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला0
0
Report
NEET परीक्षा मालेगांव में कल, 2051 छात्र देंगे परीक्षा
Nashik, Maharashtra:*मालेगाव ब्रेकिंग.. विशाल मोरे नाशिक* - रद्द झालेली NEET ची परीक्षा उद्या मालेगावातही होणार.. - एकुण 2051 विद्यार्थी परीक्षा देणार.. - मालेगावात शहरात एकूण 3 परीक्षा केंद्र.. - NEET परीक्षा केंद्रावर अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांची केली पाहणी.. - परीक्षा योग्य रीतीने पार पडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती.. *बाईट: अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान*0
0
Report
तुर्भे सेक्टर 24 में PWD कर्मियों की कॉलोनी में गाड़ियाँ जलाने का मामला
Navi Mumbai, Maharashtra:anchor - तुर्हे सेक्टर 24 मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगार वसाहतीमध्ये गाड्या जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरासमोर उभ्या गाडीला लावली आग. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष. ना सुरक्षा रक्षक ना सिसीटीव्ही कॅमेरे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी त्यांच्या वसाहती मध्येच असुरक्षित.0
0
Report
Advertisement
वसई में ट्रांसफॉर्मर ब्लास्ट, तीन घायल; मानिकपुर क्षेत्र में अफरा-तफरी
Vasai-Virar, Maharashtra:वसईत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; तीन जण जखमी, मानिकपूर परिसरात खळबळ वसई : वसई पश्चिमेतील मानिकपूर येथील फुटाडो टॉवरसमोर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने तीन जण जखमी झाले. स्फोटानंतर ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, अचानक झालेल्या स्फोटामुळे ट्रान्सफॉर्मरमधील गरम ऑईल बाहेर पडून रस्त्यावर पसरले. यावेळी तेथून जात असलेल्या दोन पादचाऱ्यांच्या अंगावर ऑईल उडाल्याने ते किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महावितरणाचा एक कर्मचारी दुरुस्तीच्या कामासाठी घटनास्थळी पोहोचला. मात्र, काम सुरू असतानाच त्याच्या डोक्यावर ऑईल पडल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर सांडलेले ऑईल पाण्याच्या फवाऱ्यांच्या मदतीने हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानीयांच्या म्हणण्यानुसार, वसई-विरार परिसरात ट्रान्सफॉर्मर फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून यापूर्वीही अशा दुर्घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे महावितरणाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, संबंधित ट्रान्सफॉर्मरची क्षमता 315 केव्हीए असून त्यावर सुमारे 300 ग्राहकांचा वीजपुरवठा अवलंबून आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि विजेच्या वाढलेल्या वापरामुळे अतिरिक्त भार पडल्याने ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेळ लागू शकतो.0
0
Report
वाशिम में संजय देशमुख की बगावत पर शिवसेना का जोरदार विरोध प्रदर्शन
Washim, Maharashtra:यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ मानोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जनतेने निवडून दिल्यानंतर पक्षाशी बेईमानी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मतदारांच्या भावनांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी गद्दारांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.0
0
Report
मनसे का पनवेल: 19 जुलाई से आमरण अनशन, अवैध डांसबार बंद कराने की चेतावनी
Navi Mumbai, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मुख्यत्व पनवेल तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शेकडो डान्सबार विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड जिल्ह्याची ओळख डान्सबारचे माहेरघर अशी होऊ नये यासाठी 19 जुलैपासून मनसेतर्फे आमरण उपोषणाची हाक देण्यात आलेय. मनसे महिनाभर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डान्सबार मुळे होणारे नुकसान याबाबत नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे. महिनाभरात सरकारने डान्सबार बंदी कायद्याची अंमलबजावणी करून डान्सबार बंद केले तर ठीक अन्यथा आमरण उपोषण करून हे सर्व बेकायदेशीर डान्सबार बंद करू असा इशारा मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी सरकारला दिलाय.0
0
Report
Advertisement
