icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सरकारी कर्मचारियों की हड़ताल तीसरे दिन भी जारी; आज निर्णायक बैठक की उम्मीद

Chendhare, Maharashtra:सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशीही संप सुरूच राहणार. १८ मागण्यांबाबत मुख्य सचिवांशी चर्चा. संघटनांच्या समन्वय समितीची आज बैठक. बैठकीत संपाबाबत अंतिम निर्णय घेणार. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून सुरू झालेला संप आज तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. काल संध्याकाळी सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिवांसोबत पार पडली. या बैठकीत १८ मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. आज आंदोलक संघटनांच्या समन्वय समितीची बैठक होईल. त्यात संपाबाबत निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे समन्वय समिती तर्फे जाहीर करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

जालना के मदिना टॉवर परिसर में 22 वर्षीय युवक पर चाकू हमला, अस्पताल भर्ती

Jalna, Maharashtra:जालना : मदिना टॉवर परिसरात 22 वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकू हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशरफ अस्लम कुरेशी (वय 22, रा. मंगळ बाजार, जालना) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर अत्यंत निर्दयीपणे हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या दोन्ही पायांवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले, तर डोक्यावर लाकडी वस्तूने प्रहार करून त्याला अक्षरशः रक्तबंबाळ केले. या क्रूर हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी युवकाला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवले. सध्या त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर मदिना टॉवर परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता पसरली होती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, “लवकरच आरोपींना अटक केली जाईल,” असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
0
0
Report

कांग्रेस ने महिला आरक्षण नहीं, डीलिमिटेशन बिल पर विरोध की घोषणा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लोकसभेतील महिला आरक्षण विधेयक विषयी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर करण्यात आली. काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यापूर्वी पासूनच महिलांच्या बाजूने काम करणारा पक्ष असून भाजपला महिला विधेयाकाच्या आडून त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची होती. काँग्रेसचा विरोध महिला आरक्षणाला नसून डीलिमिटेशन विधेयकाला होता मात्र भाजपने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही खेळी करण्याचा प्रयत्न केला असून हा प्रयत्न जनतेने हाणून पाडला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

भीगवण में कथित अपहरण प्रकरण में अझर शेख गिरफ्तार

Rui, Maharashtra:पुणे के इंदापुर के भीगवण में कथित अपहरण प्रकरण में आज अझर शेख को भीगवण पुलिस ने गिरफ्तार किया। भीगवण पुलिस ने अझर शेख के खिलाफ भीगवण के तरुणी अपहरण और यौन उत्पीड़न के प्रकरण में गिरफ्तारी की है। उसे इंदापुर सत्र न्यायालय में यू.एम. मुदहोळकर जिला अतिसत्र न्यायाधीश के कोर्ट में पेश किया गया। अदालत ने उसे 27 अप्रैल तक पुलिस को कोठड़ी सुनाई है, यह जानकारी अतिरिक्त जिला सरकारी वकील एडवोकेट प्रसन्न जोशी ने दी। इससे पहले अझर शेख को दौंड पुलिस ने 27 फरवरी को दौंड थाने में दर्ज एक मामले में गिरफ्तार किया था। अब पुनः भीगवण पुलिस ने उसे भीगवण प्रकरण में गिरफ्तार किया है।
0
0
Report

बेळगांव में विवाद के बाद पति ने पत्नी को आग लगा दी, भर्ती

Belagavi, Karnataka:गाऊन घालण्यावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीला पेटवून दिल्याची धक्कादाय घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. खानापुर तालुक्यातील हातरवाड गावात ही अमानवीय घटना घडली आहे. या घटनेत संबंधित महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे. आरोपी कृष्णाजी पाटील आणि मंजुळा यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होत. पण कृष्णाजी लग्नापासून आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, १९ एप्रिलला साडी नेसण्या ऐवजी गाऊन का घातला असा प्रश्न उपस्थित करत कृष्णाजीने आपल्या पत्नीला पेटवले. ही घटना कळतात शेजारील लोकांनी तातडीने पोलिसांना या संदर्भात कळवले, पण तोपर्यंत कृष्णाजी यांची पत्नी मंजुळा गंभीर भाजून जखमी झाल्या. पोलिसांनी तातडीने मंजुळाला उपचारासाठी हॉस्पिटलला हलवले. बेळगाव पोलिसांनी आरोपी कृष्णाजी याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या संदर्भात बेळगाव जिल्ह्यातील नंदगडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

शोभा बच्छाव ने महिला आरक्षण विधेयक पर भाजपा पर निशाना साधा

Ahilyanagar, Maharashtra:महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. आता यावरून काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे..महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर झालं आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचं शोभा बच्छाव म्हणाले आहे. सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. काही राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांची सत्ता नसल्यामुळे महिलांची मतं मिळवण्यासाठी हे विधेयक पुढे आणल्याचं बच्छाव यांनी म्हटल आहे. ज्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता नाही, तिथे महिलांची मतं मिळवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचं बच्छाव यांनी म्हटल आहे. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे, मात्र ते पूर्णपणे चुकीचं असल्याचा दावा त्यांनी केलाय. काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला असून, महिलांना राजकारणात पुढे आणण्याचं काम केलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी; विखे पाटलांच्या नावावर निशाणा

Dharashiv, Maharashtra:मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, अध्यक्षपदावरून विखे पाटलांनी नाव घालवलं मनोज जरांगे पाटील यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं मराठा समाजाच्या सुखदुःखाकडे लक्ष देणे उपस समितीचे काम मात्र उपसमितीचे नेमकं काम काय कळत नाही ?, सातारा समितीचा अहवाल घ्यायचा कधी ? मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावायला विखे पाटलांकडे वेळ नाही, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ मराठा आरक्षण उप समितीच्या कामावरून मनोज जरांगे पाटील नाराज सातारा गॅझेटला आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची ? मनोज जरांगे पाटलांचा सवाल
0
0
Report

नातों विवाद चलते जावई ने सासुरवाड़ी व पड़ोस का घर जलाया; लाखों का नुकसान

Dhule, Maharashtra:धडगाव तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून एका जावयाने सासूरवाडीच पेटवून दिली आहे. केवळ सासूरवाडीच नाही, तर शेजाऱ्याचे घरही या आगीत जळून खाक झाले असून संतापलेल्या जावयाचे हे टोकाचे पाऊल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. धडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाडा येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खडक्याचा पाटीळ पाडा येथील मिथुन पाडवी याचे लग्न कुंडल येथील मुलीशी झाले होते, मात्र वादामुळे पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला परत नेण्यासाठी आलेल्या मिथुनला सासऱ्यांनी नकार दिला, आणि याच रागातून जावई मिथुनने थेट सासुरवाडी गाठून घराला आग लावून दिली. उन्हाळ्याचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंतही पसरली. या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अन्नधान्य, कपडे आणि घराचे छप्पर जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबे आता उघड्यावर आली आहेत. या घटनेनंतर जावई फरार झाला असून त्याचा विरोधात सासूने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
0
0
Report
Advertisement

सातारा में अचानक आंधी-बारिश, गर्मी से परेशान लोग पावस का आनंद लेते हैं

Satara, Maharashtra:सातारा -सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या कडक उन्हाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला.अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर धावपळ उडाली, तर काही ठिकाणी गारांचा मोठा पाऊस झाला. ढगांच्या गडगडात विजेचा कडकडासह अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. मात्र गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांसह नागरिकांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे
0
0
Report

शेगाव के वाटिका चौक में भीषण आग, दो सिलेंडर फटने से सात दुकानें जलीं

Buldhana, Maharashtra:शेगावतील वाटिका चौकात भीषण आग — सिलेंडर स्फोटामुळे सात दुकाने भस्मसात Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील वाटिका चौक येथे एका खाजगी जागेमध्ये लहान व्यावसायिकांसाठी दुकाने उभारण्यात आली होती. दुपारी सुमारे चार वाजताच्या दरम्यान अचानक एका दुकानातून आग लागली. सुरुवातीला ही आग लहान प्रमाणात असली तरी काही वेळातच दोन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि एका लाईनमधील सात दुकाने पूर्णपणे जळून भस्मसात झाली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्यास मदत केली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top