icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शून्य सावली दिवस: दुपारी विद्यार्थ्यांमध्ये सावली अदृश्य अनुभव

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर हटवण्यात आलेल्या गावातील जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज शून्य सावली दिवस अनुभवला. सूर्य डोक्यावर आल्याने दुपारी बारा ते एक वाजल्याच्या दरम्यान प्रत्येकाची सावली अदृश्य झाली. उत्तरायण-दक्षिणायनामुळे वर्षातून दोनदा सूर्य कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यानच्या भागांवर थेट डोक्यावर येतो. त्यावेळी सावली क्षणभर गायब होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षक गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली छोटे प्रयोग करून ही घटना समजून घेतली. काचेवर वस्तू ठेवून सावली कशी अदृश्य होते हे त्यांनी पाहिले. ही अनोखी भौगोलिक घटना अनुभवताना विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला.
0
0
Report

नवी मुंबई: अदालत ने होल्डिंग पॉन्ड के आदेश दिए — महापौर दावा तीन पॉन्ड पर्याप्त

Navi Mumbai, Maharashtra:सानपाडा जुईनगर भागात होल्डिंग पॉन्ड बुजवून मैदान निर्माणण्यात आलेय. आता अतिक्रमित मैदानावरील भराव काढून पुन्हा होल्डिंग पॉन्ड पुनरस्थापित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दुसरीकडे महापौर सुजाता पाटील यांनी सानपाडा जुईनगर भागात 3 होल्डिंग पॉन्ड असून चौथ्याची गरज लागणार नाही असा अजब दावा केलाय. सानपाडा जुईनगर विभागात असलेल्या होल्डिंग पॉन्ड वरून आता संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. होल्डिंग पॉन्ड बुजवून त्याठिकाणी सध्या मैदान उभं राहिलेलं दिसत असलं तरी न्यायालयाने होल्डिंग पॉन्ड मधील भराव 3 महिन्यात काढण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकाेला दिले आहेत. असे असले तरी नवी मुंबई मनपा महापौर यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैदान अधिक महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
0
0
Report

सोलापुर विधानपरिषद सीट पर भाजपा उम्मीदवार का फैसला कौन करेगा?

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात विधानपरिषदेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी देव ठेवले पाण्यात - राज्यात तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार विधान परिषदेच्या निवडणुका - सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक - जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चांना उधाण - मंत्री जयकुमार गोरे जो ठरवतील तोच असणार उमेदवार ? - सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची एक जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता आजपासून आचारसंहिता लागू झाली असून प्रत्येकाने त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी दिले आहेत. बाईट - एस. कार्तिकेयन ( जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर ) सोलापूर जिल्ह्यातील एका विधानपरिषदेच्या जागेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 616 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. --------------------------------- *खालील प्रमाणे मतदार असतील* 1) सोलापूर महानगरपालिका - 102 + 9 ( स्वीकृत ) = एकूण 111 2) जिल्हापरिषद - 68 3) पंचायत समिती सभापती - 11 4) नगरपरिषद / नगरपंचायत - 374 ( नगरसेवक ) + 12 ( नगराध्यक्ष ) + 40 स्वीकृत नगरसेवक = 426 *एकूण - 616 मतदार* --------------------------- सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या एका जागेसाठी प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, शशिकांत चव्हाण, रणजितसिंह नाईकनिंबाळकर, शहाजी पवार, दिलीप माने, राजन पाटील इत्यादींची नावे चर्चेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याने जिल्ह्यात आता चांगले वर्चस्व निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर स्कोडा कार दर्दनाक हादसा, 2 की मौत, 3 घायल

Varsoli, Maharashtra:पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्कोडा गाडीचा भीषण अपघात झाला आहे... मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या लेन वर हा अपघात झाला आहे... चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, पोलीस व ऍम्ब्युलन्स दाखल झाले.. गाडीत मध्ये एकूण 5 जण होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडर ला जाऊन धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले 2 जण जागीच ठार झाले. गाडीचे दरवाजे व पत्रा कापून गंभीर जखमी व मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0
0
Report

वर्धा में गरमी ने मचा दिया कहर, पारा 46.5°C

Wardha, Maharashtra:वर्ध्यात उष्णतेचा उच्चांक, पारा 46.5 अंशांवर नागरिक हैराण - कडक उन्हाचा तडाखा, दुपारच्या वेळेत शहरात शुकशुकाट - उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा ॲंकर - वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून आज तापमानाने उच्चांक गाठला आहे. आज वर्ध्यात कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळपासूनच वर्ध्यात कडक उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारपर्यंत तापमान 46.5 अंशांवर पोहोचल्याने जनजीवनावर परिणाम झाला. काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त जात आहेय..वर्ध्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
0
0
Report
Advertisement

सांगली में शरद पवार गुट के कार्यालय-घर पर पथराव, गाड़ियों की तोड़फोड़

Sangli, Maharashtra:सांगली के विटा में राष्ट्रवादी शरद पवार गट के पदाधिकारियों के घर-कार्यालय और गाड़ियों की तोड़फोड़ की घटना घटी। आमदार गोपीचंद पडळकर के कार्यकर्ताओं द्वारा तोड़फोड़ कराए जाने के आरोप राष्ट्रवादी कांग्रेस के सरचिटणीस महेश कुपाडे ने लगाए। मोबाइल पर एक स्टेटस पोस्ट करने के बाद संतप्त पडळकर समर्थकों ने फोन पर धमकी देकर व्यवसायिक कार्यालय की बड़े पैमाने पर तोड़फोड़ की। इसके साथ ही घर पर भी पत्थरबाजी कर दी गई, यह भी आरोप लगाया गया है; विटा थाने में कुपाडे द्वारा रिपोर्ट दर्ज कराई गई है और कठोर कार्रवाई की मांग की गई है।
0
0
Report
Advertisement

कोल्हापूर में 85 खतरनाक इमारतें, नोटिस के बावजूद मालिकों की अनदेखी

Kolhapur, Maharashtra:राज्यात धोकायदायक इमारती कोसळल्यानं अऩेकांचे बळी गेले आहेत. असा प्रकार कोल्हापूरातही घडु शकतात. शहरातील अनेक धोकायदक इमारती काढुन घेण्यासंदर्भात कोल्हापूर महानगरपालीकेनं संबधीतांना अनेक वेळा नोटीसा काढल्या, पण धोकादायक इमारतीच्या मालकांनी या नोटीसीला कच-याची टोपली दाखविली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या इमारतींना धोका निर्माण होऊन पडू शकतात.. कोल्हापूर महानगरपालिकेन केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात तब्बल 85 हुन अधिक धोकादायक इमारती असल्याच समोर आल आहे. या सर्वेक्षणानंतर कोल्हापूर महानगरपालीकेनं संबधीत इमारत मालकांना नोटिस लागू करून इमारत काढुन घेण्याची विनंती केली होती. पण बहुतांश धोकादायक इमारत मालकांनी या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे, त्यामुळे शहरात धोकादायक इमारती कधी पडतील याचा नियम नाही.. खर तर कोल्हापूर महानगरपालिकेन पुढाकार घेवुन धोकादायक इमारती उतरवून घ्यायला हवेत.. पण ढिम्म प्रशासनान याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय..
0
0
Report

डिज़ेल की कमी से नांदेड के ग्रामीण पंपों पर किसानों की लंबी कतारें

Nanded-Waghala, Maharashtra:डिझेलच्या तुटवाड्यामुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची रांगा लागल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात दिसून आले. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीचं मशागतीचं काम सुरू आहे. कमी वेळात जास्त मशागत होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरने जमिनीची मशागत करत आहेत; परंतु डिझेल मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच लांबलांगी रांगा दिसत आहेत. तसेच कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्यात. काही ठिकाणी डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले असल्यामुळे नागरिकांना एक पंपातून दुसऱ्या पंपाकडे भटकंती करावी लागत आहे. उन्हात तास काही प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

अमरावती देश का सबसे गर्म शहर; तापमान 46°C पार, हीटवेव अगले पाँच दिनों तक जारी

Amravati, Maharashtra:देशात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अमरावतीची नोंद; पारा पोहचला 46 अंशाच्या पुढे, पश्चिम विदर्भात पुढील पाच दिवस कायम राहणार उष्णतेची लाट अँकर :- दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली असली तरी दुसरीकडे पश्चिम विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली असून काल अमरावतीचा पारा तब्बल 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यामुळे अमरावती देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. विदर्भासह अमरावतीत सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Vo :१ अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरसह संपूर्ण पश्चिम विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भात हीट वेव्ह कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी गरम वाऱ्यांचे फटके बसत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक भागात रस्ते ओस पडले असून बाजारपेठांमध्येही गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. Vo:२ दरम्यान या उन्हामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यात 15 उष्माघाताचे रुग्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आढळले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे. तसेच आतापर्यंत तीन ते चार रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत अधिकृत ही आकडेवारी पुढे आली नाही. काही काम करायचे असल्यास सकाळी करून घ्यावी व बाहेर जायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे तसेच पोटभर नाश्ता करून बाहेर पडावे व उन्हात गडद कपडे न घालता पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा आणि बाहेरील काम करायास संध्याकाळच्या वेळेचा उपयोग करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी केला आहे. बाईट :- डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती Vo:३ अमरावतीत उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरातील तापमान तब्बल ४६ अंशांच्या पुढे गेले आहे. अमरावती जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात तरुण वर्ग विशेषतः बच्चे कंपनीला जलतरण तलावांचे म्हणजेच स्विमिंग पूलचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सध्या शहरातील स्विमिंग पूलवर मुलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्विमिंग पूल वर मोठी गर्दी केल्याचा चित्र आहे त्यामुळे सध्या तरुण तसेच बालकांनी आपला मोर्चा जलतरण केंद्रांकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उन्हाळ्यामुळे पोहायला गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सात बालकांचतरुणण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली आहे बाईट :- अथर्व डबले, पोहायला गेलेले तरुण Vo : ४ उष्णतेमुळे सर्वाधिक फटका मजूर, शेतकरी, वाहतूक कर्मचारी आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. दुपारच्या वेळेत अनेक ठिकाणी कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायडरेशन, चक्कर येणे, अशक्तपणा अशा तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे, हलका आहार घेणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीने देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करत उष्णतेचा विक्रम केला असला, तरी आता सर्वांचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
0
0
Report

अकोला में निजी बस भीषण आग से जली, लोगों की जिंदगी बची

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर–शेगाव मार्गावर आज सकाळी एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील प्रवासी घेऊन जाणारी ही खाजगी बस बाळापूर–शेगाव मार्गावरून जात असताना अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाडानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि आगीने संपूर्ण बसला वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी उभी असलेली एक दुचाकीही आगीत सापडून जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक तसेच दुचाकीवरील दोन व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top