445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारामती विधानसभा उपचुनाव: 53 वैध, 15 रद्द; मैदान में कितने उमेदवार बचे?
Pune, Maharashtra:बारामती विधानसभा पोटनिवडणूक: छाननीअंती ५३ अर्ज वैध, १५ उमेदवारांचे अर्ज बाद बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीसाठी ५५ उमेदवारांनी एकूण ६८ अर्ज दाखल केले होते. यापैकी ५३ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण माहितीमुळे १५ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यापैकी १३ अर्ज दुहेरी असल्याने बाद करावे लागले तर २ उमेदवारांचे अर्ज सूटींमुळे बाद ठरले. या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर मैदानात किती उमेदवार उरतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रशासनाने पारदर्शकपणे ही छाननी प्रक्रिया राबवली असल्याचे स्पष्ट केले आहे...0
0
Report
पुणे पुलिस ने AI-सहायता से एफआईआर दर्ज करने की प्रक्रिया को 20 मिनट में संभव बनाया
Pune, Maharashtra:Pune cp 121 एफआयआर नोंदणीसाठी पुणे पोलिसांनी आता एआय तंञाची मदत घेण्याचं ठरवलंय त्यासाठी स्वतन्त्र सॉफ्टवेयर देखील विकसित केलं गेलं...पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झी 24 तासला ही माहिती दिली...सध्या प्रायोगिक तत्वावर बानेर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हे सॉप्टवेअर वापरलं जात असून नंतर राज्यभरात त्याचा वापर सुरू होईल...व्हाईस टायपिंग स्वरूपाच्या या स्पॉप्टवेअरमध्ये एफआयआर मधील गुन्ह्याची कलमं देखील आपोआप सिलेक्ट होतात, त्यामुळे जिथे यापूर्वी एक एफआयआर नोंदवून घ्यायला किमान 2-3 तास लागायचे तिथे अवघ्या 15 ते 20 मिनिटात एफआयआर नोंदवली जाणार हे त्यामुळे ठाणे अंमलदार आणि तक्रारदाराची ही वेळेची प्रचंड बचत होणार आहे....असंही पोलीस आयुक्त म्हणाले दरम्यान, पुणे शहराला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी नुकतीच ड्रग्ज पेडलरची ओळख परेड केलीय तसंच पाण टपऱ्यांवर ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना जेरबंद केलंय...पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...0
0
Report
नवी मुंबई शिक्षक भ्रष्टाचार: मंडळ अध्यक्ष राजेंद्र अहिरे 20 हजार की लाच लेते रंगेहाथ पकड़े
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई लाचलुचपत विभाग ने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल के विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे को 20 हजार रुपये की लाच लेते रंगेहाथ पकड़ा। शिकायत मिलने पर विभाग ने कार्यालयीन विद्युत उपकरण देखभाल व दुरुस्ती के बिल मंजूर करने के लिए सात प्रतिशत कमीशन मांगने का आरोप लगाया; आज ट्रैप लगाकर राजेंद्र अहिरे को लाच लेते रंगेहाथ पकड़ लिया गया। इस घटना से शिक्षण विभाग में भ्रष्टाचार फिर सुर्खियों में आया है।0
0
Report
Advertisement
वाशीम में आपातकालीन सेवाओं के कंत्राटदार पर मनसे का हमला, विवाद गहराया
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर आपत्कालीन सेवा देणाऱ्या कंत्राटदाराला मनसेच्या पदाधिकार्यांनी मारहाण केल्याची घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे घडली आहे.या घटनेवेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) चे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते.दहा दिवसांपूर्वी आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.या पार्श्वभूमीवर मनसे,एमएसआरडीसीचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्यात बैठक सुरू होती.बैठकीदरम्यान कंत्राटदाराने अरेरावीची भाषा केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.यानंतर वाद चिघळून कंत्राटदाराला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.0
0
Report
शिर्डी भूमि घोटाला: दोनों आरोपी जमानत खारिज, 14 दिन की न्यायिक हिरासत
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash अशोक खरात याचे शिर्डीतील जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरण... *अटकेतील दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज राहाता न्यायालयाने फेटाळला...* *दोन्हांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी...* *आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत...* दोन्ही आरोपींची रवानगी कोपरगावच्या कारागृहात... याच प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात SIT च्या कोठडीत, तर कल्पना खरात अद्याव फरार....0
0
Report
भीमाशंकर मंदिर 31 मई 2026 तक बंद, विकास कार्यों के कारण
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर दर्शन ३१ मेपर्यंत बंद; विकास कामांना वेग भीमाशंकर मंदिर बंद ला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असुन पुढील ३१ मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी घेतलाय बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिरात सुरू असलेल्या सभामंडप व परिसर विकास कामांमुळे, तसेच कुंभमेळा पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी आणि सुरक्षिततेचा विचार करून ९ एप्रिल ते ३१ मे २०२६ दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीही मंदिर तीन महिन्यांपासून बंद होते, आणि आता पुन्हा पावणे दोन महिने बंद राहणार असून पावसाळ्यापूर्वी मंदिर खुले करण्याचा प्रयत्न राहणार है.0
0
Report
Advertisement
नीलम शिंदे की दुखद मौत: अमेरिका के अस्पताल में कोमा के बाद निधन
Satara, Maharashtra:कराड:-महाराष्ट्रातील साताऱ्याच्या कराड तालुक्यातील नीलम तानाजी शिंदे हिचा अमेरिकेत 14 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेतील Sacramento येथे सायंकाळी 7.30 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) दुर्दैवी अपघात झाला. त्या अपघातानंतर तिला तात्काळ University of California Hospital येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्या दिवसापासून ती कोमामध्ये होती. डॉक्टरांनी तिच्यावर शक्य ते सर्व उपचार केले, परंतु प्रकुळतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. जवळपास 13 महिने तिच्यावर उपचार सुरू होते. अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे अखेर तिच्या शरीराने साथ दिली नाही आणि 28 मार्च 2026 रोजी उपचार सुरू असतानाच तिचे दु:खद निधन झाले.तिच्या कुटु्टीीयांनी अत्यंत उदात्त निर्णय घेत अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे डोळे आणि त्वचा (स्कीन) दान करण्यात आली, ज्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे.तिच्यावर आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) Mount Vernon Memorial Park येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.निलम अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली होती. कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावरून चालत असताना एका वाहनाने नीलमला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात नीलमच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून कवटीचे फ्रॅक्चर, तसेच हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तेव्हापासून ती कोमात होती. या अपघाताची माहिती भारतात असलेल्या नीलमचे वडील तानाजी शिंदे, मामा संजय कदम यांना मिळाल्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. अवघ्या काही तासात सरकारने दखल घेत यूएस वाणिज्य दूतावासाने व्हिसा तातडीने दिला होता.मात्र, अखेर निलमची झुंज 1 वर्ष 27 दिवसांनी अपयशी ठरली. आज तिच्यावर अंत्यसंस्कार होत असताना आखाती देशातील युध्दामुळे वडील व कुटुंबियांचे उपस्थित राहू शकत नाहीत. तर अमेरिकेत स्थायिक असलेल्या निलमची आत्या सर्व विधी करणार आहेत.0
0
Report
मुंबई के MM व्हॅली में भीषण हादसा; सीसीटीवी फुटेज ने दर्दनाक मंजर उजागर किया
Thane, Maharashtra:मुंब्रा MM व्हॅलीत भीषण अपघात; सीसीटीव्हीत थरारक कैद, दोन युवकांचा जागीच मृत्यू.... मुंब्रा: मुंब्रा येथील एमएम व्हॅली परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, अपघाताची थरारक दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेली दुचाकी अचानक घसरली. तोल गेल्यामुळे दुचाकीवरील तिघेही बसच्या संपर्कात आले. यामध्ये पुढे आणि मागील चाकाखाली आल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत युवकांची ओळख अविनाश दवंडे (वय 20) संगम फुलशेरे (वय 17) हे दोघेही ठाकूरपाडा, मुंब्रा येथील रहिवासी असून, अपघातात बसच्या टायरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा युवक महेश वारे (वय 18) हा गंभीर जखमी असून, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या मुंब्रा येथील हकीम हजमल खान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, दुचाकीस्वार वेगात बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अचानक गाडीचा तोल गेल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
शिर्डी समता पतसंस्थे में 100 खातों मामला: अशोक खरात परिवार सहित नाम सामने
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेतील 100 खात्यांचे प्रकरण... आतापर्यंत 26 खातेदारांची चौकशी पूर्ण... 57 पैकी 26 खातेदारांचे जबाब नोंदवले... मागील तीन दिवसात 19 तर आज 7 खातेदारांची चौकशी पूर्ण... समता पतसंस्थेत असलेल्या आमच्या नावाच्या खात्यांबाबत माहिती नाही... सर्व खातेदारांचे शिर्डी पोलिसांना जबाब... समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी दोन वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांच्या नावे तीन खाती... तर खरात याने बहीण आणि भाच्याच्या नावाने देखील उघडले समता पतसंस्थेत खाते... नाशिक येथील मेडिकल व्यवसायिक पती पत्नीच्या नावे देखील दोन खाती असल्याचे समोर... सर्व खाती अशोक खरात ऑपरेट करत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न...0
0
Report
Advertisement
चंद्रपुर: मुंधडा अस्पताल चोरी के आरोपी श्रीकांत चुनारकर उर्फ बोटतुट्या गिरफ्तार, 60 हजार जब्त
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात जटपुरा गेट परिसरात डॉ. मुंधडा रुग्णालयात चोरी करणाऱ्या आरोपी श्रीकांत चुनारकर उर्फ बोटतुट्या याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून 60 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अतुल राणा मात्र अद्याप फरार आहे. डॉ. मनिष मुंधडा यांच्या रुग्णलयात प्रवेश करत केबिनमध्ये चोरी करताना रात्रीच्या सुमारास सीसीटीव्हीत हे आरोपी कैद झाले होते.0
0
Report
हिंदी में: मालेगांव में SIR प्रकरण में पहली मौत, परिवार ने सुरक्षा पर सवाल उठाए
Malegaon, Maharashtra:भारतात SIR प्रकरणाचा मालेगावात बळी. SIR च्या भीतीने 75 वर्षीय वृद्धाची आत्महत्या - कुटुंबियांचा आरोप. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू. आत्महत्या प्रकरणी इस्लाम पार्टी, MIM, समाजवादी पार्टी और अन्य पक्ष दोषी - भाजप SIR प्रमुखांचा आरोप. भारतात SIR प्रकरणाचा पहिला बळी मालेगावात ठरला असून खैरुद्दीन अब्दुल शकूर मोमिन वय वर्ष 70 राहणार पवारवाडी मालेगाव यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 2002 च्या मतदान यादीत त्यांचे नाव नव्हते त्यामुळे कागदपत्रांच्या जुळवाजुळव करण्यासाठी ते दोन महिन्यापासून चिंताग्रस्त होते यामुळे त्यांनी शेवटी भीतीपोटी आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे。0
0
Report
यवतमाळ के किसानों के कम दाम पर कपास बिके, व्यापारी मालामाल, किसान परेशान
Yavatmal, Maharashtra:कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात यंदा शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल असे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खरीप हंगामातील कापूस हाती आल्यानंतर शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी बाजारात आणला असता कवडीमोल भावात तो विकावा लागला. खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस कवडीमोल भावात खरेदी केला, शेतकऱ्यांना सात हजार 000 ते 7800 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळाला. आणि आता अचानक कापसाच्या भावात मोठी उसळी आली आहे. कापसाचा दर आठ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघालेला नाही.0
0
Report
Advertisement
मालेगांव: पुणे विद्यापीठ के कुलगुरु पर कड़े आरोप, छात्रों ने इस्तीफे की मांग की
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा मालेगावी निषेध... - कुलगुरूंच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी... सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू विद्यापीठीय कामकाज सुधारण्याऐवजी गलिच्छ राजकारण, कटकारस्थान करण्यात मशगूल आहेत. ब्लॅकमेलिंग, अनैतिक व्यवहार करणाऱ्या गुंडांना आणि त्यांच्या तथाकथित संघटनांना हाताशी धरून RTL, तक्रार अर्ज मागवून कुलगुरू स्वतः विद्यापीठाचे, अधिकारी कर्मचारी यांचे अहित साधत आहेत. या सर्वांची हद्द झाली असून विद्यार्थी विद्यापीठ हितासाठी झटणाऱ्या श्री. सागर वैद्य यांच्यासारख्या सिनेट- मॅनेजमेंट काउन्सिल सदस्यांच्या कुटुंबीयांची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे षड्यंत्र कुलगुरू कार्यालयात होत असेल तर ही अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. तेव्हा विद्यार्थी विरोधी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. बाईट: सागर वैद्य0
0
Report
गोबर खिलाओ आंदोलन: KDMC आयुक्त के खिलाफ दस दिन में ठोस कार्रवाई का अल्टिमियम
Kalyan, Maharashtra:गुरचरण जमिनीवर अतिक्रमण..“गोबर खिलाव” आंदोलनातून केडीएमसी ला 10 दिवसांचा अल्टिमेटम! आणी कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील द्वारली पाडा परिसरात गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या जागेवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे चाळी उभारल्याामुळे तबेला चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप वेक्त केला जात आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून कोणत्याही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयावर धडक देत “गोबर खिलाव” आंदोलन केले. आंदोलनादरम्यान केडीएमसी आयुक्तांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला शेण चारत आरती करण्यात आली, ज्यामुळे आंदोलनाने वेगळेच स्वरूप घेतले. यापूर्वीही स्थानिक रहिवासी सौरभ सिंग यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये सौरभ पांडे आणि त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, तसेच तबेला चालवणाऱ्या कुटुंबांनी सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान एक म्हैस घेऊन प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, आणि त्या म्हशीच्या पाठीवर “KDMC Commissioner” असे लिहून प्रशासनावर निशाणा साधण्यात आला. तसेच आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत येत्या दहा दिवसांत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे दरम्यान, आय प्रभाग कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी या विषयावर बोलताना संबंधित बांधकामांना नोटीस देण्यात आली होती आणि आता पुन्हा कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सागितले मात्र तथापि, गुरचरण जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर केवळ कागदी कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.0
0
Report
गडचिरोली में मलेरिया रोकथाम: पुजारियों की मदद से डॉक्टरों के पास पहुँच बढ़ेगी
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया मृत्यू दर घटविणे आणि उपचाराकरिता आरोग्य विभागाची नवी शक्कल लढविली आहे. आदिवासी ग्रामस्थांचे मन वळवून त्यांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आता पुजारीच प्रशासनाला मदत करणार आहेत. आरोग्य विभागाने 1700 पूजा-यांची यादी तयार केली असून अर्ध्याहून अधिक पुजाऱ्यांना या विषयी प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एटापल्ली आणि भामरागड या अतिदुर्गम तालुक्यातील दोन गावे यासाठी निवडली गेली असून त्याचे उत्तम परिणाम पुढे आले आहेत. गाव पातळीवरील स्थानिक आदिवासींसाठी मलेरियाशी दोन हात करण्यासाठी पुजाऱ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.0
0
Report
Advertisement
