icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जयकumar गोरे का विरोधी दायरे में आह्वान: विधान परिषद बिनविरोध कराने का प्रयास

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - माझं विरोधकांना आवाहन आहे, जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून देऊ, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करू - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे पालकमंत्री सोलापूर ऑन सोलापूर विधान परिषद जागा विधान परिषदेची निवडणूक लागली आहे त्या अनुषंगाने चर्चा होणे स्वाभाविक मुंबईतून सोलापूरला येण्यासाठी एकच विमान आहे त्यामुळे राजेंद्र राऊत मी एकाच विमानाने आलो त्यामुळे वेगळी चर्चा होण्याचे कारण नाही विधानपरिषदेसाठी भाजपमधील अनेक नेते कार्यकर्ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आम्हाला संख्याबळ मिळालं त्यामुळे आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छा असणं स्वाभाविक आहे ऑन विधानपरिषद विरोधक मोहिते पाटील यांनी मूठ जरी बांधली तरी शंभरच्या पुढे ते जाणार नाही.. काँग्रेसचे चार तर एमआयएम पक्षाचे नऊ सदस्य आहे त्यामुळे कितीजरी मोठी मूठ बांधली तरी काही उपयोग होणार नाही.. माझं विरोधकांना आवाहन आहे. जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून देऊ, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करू ऑन राज्य पेट्रोल डिझेल साठा राज्यात कुठेही डिझेल पेट्रोलचा साठा कमी नाही. नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण करणारी टोळी निर्माण झाली.. आवश्यक असणाऱ्या पेट्रोल साठ्यापेक्षा जास्त खरेदी होताना आपण पाहतोय त्यामुळे काही परिणाम होताना आपण पाहतोय.. ऑन कॉक्रोज जनता पार्टी मला याबाबतीत अधिकची माहिती नाही.. मात्र समाज माध्यमांवर अशा प्रकारचे ट्रेन्स येत असतात.. त्यामुळे त्याला अधिकच महत्व देणे मला उचित वाटत नाही.. विरोधी पक्ष विविध युक्त लढवताना आपण पाहतोय. त्यांची जनमानसात स्थान राहिलं नाही आणि प्रतिमाही राहिली नाही त्यामुळे जनता आपल्या पाठीशी येत नाही म्हणून नवीन योजना आखण्याचे काम सुरू आहे ऑन जरांगे पाटील आंदोलन फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.. कुणबी दाखल्यांबाबत न्याय मिळालताना आपण पाहतोय आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवण्यात आल्या.. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. ही समाज व्यवस्था बाधित होईल अशा प्रकारचं आंदोलन किंवा भूमिका मांडणं चुकीचं राहील. लोकशाही आणि समाज व्यवस्था सुदृढ व्हावी अशा पद्धतीचे आंदोलन असावं.. ऑन प्रणिती शिंदे नोटीस अजून मला कोणत्याही प्रकारची नोटीस पोचली नाही.. आदरणीय ताई साहेबांबद्दल मी आदरानेच बोललो आहे.. पण त्याबद्दल त्यांना वाईट वाटलं असेल तर त्यांची नोटीस आल्यानंतर माहिती घेईल. आवश्यकतेनुसार उत्तर मी देईल..
0
0
Report
Advertisement

चाकण चौक में बारिश से जलजमाव, सड़क पर पानी, यातायात बाधित

Chakan, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण मुख्य चौकात पावसामुळे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. साईड गटार तुंबल्याने पाणी थेट महामार्गावर आल्यानं वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. चाकण मुख्य चौक परिसरात झालेल्या पावसानंतर साईड गटारातील पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यावर आलं तर बाजूलाच झाडेही पडल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. स्थानिकांकडून गटारांची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.
0
0
Report

रयत शिक्षण संस्थे की बिनविरोध चुनाव: नेत्रदीपक प्रगति का वादा, कोई मतभेद नहीं

Shirur, Maharashtra:रयत शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाहीत! वळसेपाटील - रयत शिक्षण संस्थेचे नवीन कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडले. - पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संस्थेची नेत्रदीपक प्रगती सुरूच राहणार. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट किंवा संकट नाही. - आगामी काळात सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्ष जोमाने काम करणार. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर स्पष्टीकरण देताना नेत्यांनी पक्षात कोणतेही मतभेद किंवा संकट नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या ८ ते १५ दिवसांत सर्व गोष्टी सुरळीत होतील आणि सुनेत्रा वहिनींच्या तसेच अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पहिल्यासारखाच जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षात कायम असून, पुढील निर्णय पक्षाध्यक्ष घेतील असेही वळसेपाटील म्हणाले
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर विवाद: खेड-आंबेगाव में नेताओं के बीच घमासान

Khed, Maharashtra:भीमाशंकर मंदिर खेड की आंबेगाव तालुक्यात, यावरून राजकीय वाद पेटला असून माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप करत दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झाले आहेत. “भीमाशंकर खेडचेच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तर “आईचं दूध प्यायले असाल तर…” अशी भाषा ही राजकारणाची नसून गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. * बाबाजी काळे – आमदार, खेड * दिलीप मोहिते-पाटील – माजी आमदार * दिलीप वळसे-पाटील – माजी मंत्री
0
0
Report

आंबेगाव में तूफानी हवा ने पोल्ट्री कारोबार सहित फसलें उजाड़ दीं

Shirur, Maharashtra:आंबेगाव पुणे... आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे वादळ वाऱ्याच्या पावसाने शेतीमालासह फळबागांचे पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने संदीप मिंडे या शेतकऱ्याची पोल्ट्री जमीन दोस्त झाली असून 5 हजार पक्षांचा मृत्यू झालाय त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकाचं तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झालंय, वादळी वाऱ्याने सर्व संसार उघड्यावरती आला असून घर आणि पोल्ट्री जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हातबल झालाय याचाच आढावा घेतलाय आंबेगाव ते सेमित्री प्रतिनिधी हैंदेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

जारांगे पाटील का आंदोलन विधानपरिषद चुनाव में हलचल क्यों मचा रहा है?

Bhandara, Maharashtra:भंडारा न्यूज निवडणूक आली की जरांगे पाटील आंदोलन पुकारतात - आमदार परिणय फुके निवडणूक आली की जरांगे पाटील आंदोलन करतात। मला असं वाटते की आता कुठलेही निवडणूक नाही। विधानपरिषद निवडणुकीमध्ये या आंदोलनाचा काही फरक पडत नाही। पण कुठलीही निवडणुक आली की जरांगे पाटील आंदोलन पुकारतात। एखादा निवडणूक आयोगाने पत्र काढला की निवडणूक लागणार आहे। जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असो जारांगे पाटील आंदोलन पुकारतात। आता विधानपरिषद निवडनुकीची घोषणा झाली आणि जारांगे पाटील ने आंदोलनाची घोषणा केली आहे। (मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रसाद लाड जारांगे पाटील यांना भेटायला गेले होतें यावर परिणय फुके यांची प्रतिक्रिया.) परिणय फुके कॉकरोच पार्टीचे संस्थापक दिपके हे विदेशात राहतात... देश विरोधी जे मोठे षडयंत्र चालतं, भारत विकसित होऊ नये यासाठी इंटरनॅशनल रॅकेट आहे... भारत पुढे जातं त्यावेळी दिपके सारखे कॉकरोच भारतात सोडताच आणि अस्थिरता, अराजकता पसरवण्याचे काम करतात... ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये याच प्रकारे कॉकरोजेस सोडून कुठेतरी हलचल केली, चायनाने सुद्धा नेपाल मध्ये केलं, अमेरिकेने बांगलादेशमध्ये केलं त्या प्रकारे काही विदेशी लोक आपल्या देशात करायला बघत आहेत... हा देश सहिष्णु आहे पण तितका शक्तिशाली सुद्धा आहे या प्रकारचं देश विरोधी कृत्य कोणी करत असेल तर त्यांना हिट स्प्रे मारून संपवण्याचं काम करणार... देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना हे सरकार सोडणार नाही... परिणय फुके
0
0
Report

सावित्रीबाई फुले के शिक्षण संदेश का चित्ररथ अकोला पहुँचा

Akola, Maharashtra:महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेतेछगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरत असून आज अकोला शहरात त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भिडेवाडा येथील ऐतिहासिक शाळेचा वारसा, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा चित्ररथ राज्यभर दौरा करत आहे. चित्ररथावर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे दर्शन घडविण्यात आले असून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. अकोल्यात चित्ररथ दाखल होताच सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेकांनी चित्ररथासमोर छायाचित्रे काढत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला. त्यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. हा चित्ररथ समाजाला शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

रायगढ़ में मानसूनपूर्व बारिश, महाड- माणगाव- म्हसळा में तेज बारिश, आंबा पिक को नुकसान

Chendhare, Maharashtra:स्लग - रायगडात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी ...... महाड माणगाव, म्हसळा भागात पाऊस ...... कर्जत खालापूरात पावसाच्या जोरदार सरी ..... पावसामुळे हवेत गारवा, नागरिकांना दिलासा ...... अँकर - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत रायगड जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. रायगडच्या दक्षिण भागात महाड , माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. कर्जत खालापूर तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या रायगडकरांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली तर शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान झालंय. दरम्यान पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
0
0
Report

इंदापुर में चाय पे चर्चा: राजू शेट्टी और सदाभाऊ खोत 14 साल बाद मिले

Rui, Maharashtra:राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांची इंदापुरात चाय पे चर्चा.. जुन्या आठवणींना दिला उजाळा.. शेट्टी खोत यांच्यातील वैर क्षमणार..? Anchor- स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे माजी खासदार आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय वैर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. एकेकाळी मित्र असणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र हे दोन्ही नेते आज चक्क एकमेकांना भेटून चहाचा आनंद घेताना पाहायला मिळाले . यापूर्वीही त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयामध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या तारखेसाठी हे दोन्ही नेते जुने मित्र एकत्र आले होते. मात्र एकमेकांकडे बघणे देखील टाळले होते पण आज त्यांनी एकत्रित चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.. 2011 मध्ये झालेल्या आंदोलनातून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यातून इंदापूर न्यायालयामध्ये याचा खटला सुरू आहे,या खटल्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते तब्बल 14 वर्षांनंतर इंदापूरच्या न्यायालयात एकत्रित आले,त्यानंतर दोघांनीही एकत्रित न्यायालयामध्ये हजेरी लावली,त्यानंतर दोघांनीही चहाचा अस्वाद घेत चाय पे चर्चा देखील केली,तर दोन्ही नेत्यांनी मात्र ही भेट केवळ 'जुन्या आठवणींना उजाळा' देणारी असल्याचे सांगितले. " आंदोलनाच्या काळात आम्ही एकत्र होतो. खटला एकच असल्याने आज भेट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक आहोत,"अशी प्रतिक्रिया दोघांनीही दिली.
0
0
Report

यवतमाळ दरव्हा पंचायत समिति में बीडीओ के खिलाफ भीड़ ने अर्धनग्न प्रदर्शन किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा पंचायत समितीत सतरा वर्षांपासून प्रभारावर असलेल्या बीडीओंच्या विरोधात संतप्त नागरिकांनी अर्धनग्न भंडारा आंदोलन केले. यावेळी ईश्वर राठोड यांनी पोतराजाची वेशभूषा करून व भंडारा उधळून बीडीओंच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. पंचायत समितीतील भोंगळ कारभाराबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. प्रभारी गटविकास अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे रखडलेली कामे, तसेच मनरेगा अंतर्गत पांदण रस्ते कामांमध्ये झालेली मोठी आर्थिक अनियमितता, यासोबतच वैयक्तिक सिंचन विहीर योजनेत बोगस लाभार्थी दाखवून बोगस जॉब कार्ड तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top