Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Feb 16, 2026 03:15:47
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 16, 2026 02:46:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये साडेपाच वर्षाच्या कालखंडानंतर प्रशासन यंदा नवीन कारभाऱ्यांसमोर अर्थसंकल्प सादर करणार आहे, यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नवनिर्वाचित नगरसेवकांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. दरवर्षी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. वर्षअखेर अर्थसंकल्पात मोठी तूट आढळून येते. वर्षाअखेर अर्थसंकल्पात मोठी तूट आढळून येते. या वर्षीही त व्यवस्थापनाने १ हजार १२०० कोटींची तूट जाणवणार, हे निश्चित. या तुटीमुळे ७० टक्के विकास कामे गत वर्षी कागदावरच राहिली, आणि याही वर्षी तीच शक्यता आहे त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आता यातून मार्ग काढावा लागणार आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 16, 2026 02:34:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या कामांचे ८०० टेंडर बांधकाम विभागाने 'आऊटसोर्सिंग' द्वारे मंजूर केल्याची चर्चा आहे. हा सगळा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून झाला, हे आता चौकशीतून उघडकीला येणार आहे. हे सर्व टेंडर तयार करणारे ऑपरेटर कंत्राटदाराकडून एक निविदा तयार करण्यासाठी चार ते पाच हजार रुपये घेतात. बांधकाम विभागाच्या बाहेरील ते ऑपरेटर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासह वर्कऑर्डर तयार करण्याची जबाबदारी घेतात. हा सगळा प्रकार अनधिकृतपणे पूर्वापारपणे चालत आला आहे अशीही माहिती आहे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समिती चार आठवड्यांत चौकशी पूर्ण करण्याचा दावा करण्यात येत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 16, 2026 02:32:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी शहरातील नो नेटवर्क झोनमध्ये पाणीटंचाई असल्याने या ठिकाणी मनपाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. याचा गैरफायदा घेत महानगरपालिकेच्या टँकर पुरवठ्यात मोठा गैरप्रकार सुरू आहे. महापालिकेकडून विविध वसाहतींना पुरवल्या जाणाऱ्या खासगी कंत्राटदारांच्या टँकरचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी ubt नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. वर्षभर ८० टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका आहे. वर्षाला ५ कोटींपेक्षा अधिकची रक्कम मनपा टँकर मालकांना देते. टँकरचालकांची मोठी साखळी मनपामध्ये कार्यरत आहे. यामध्ये काही मनपाचे माजी पदाधिकारीदेखील असल्याने कारवाई करताना मनपाच्या अधिकाऱ्यांचे हात बांधले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाण्यातून पैसे कमावण्याचा धंदा बारमाही सुरू आहे असाही आरोप होतोय..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 16, 2026 02:30:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यतील जैतापूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत उघडकीस आलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या २४ जणांपैकी जिल्हा परिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांनंतर आता खासगी संस्थेतील १५ ते १६ शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईचा अधिकृत अहवाल सोमवारी शिक्षण विभागाकडे सादर केला जाणार आहे. १० फेब्रुवारी रोजी बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीद्वारे उघड झाला होता. शिक्षण आयुक्तांच्या कडक आदेशानंतर संबंधित खासगी संस्थालाचालकांनी ही निलंबनाची कारवाई केली
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 16, 2026 02:15:33
Chendhare, Alibag, Maharashtra:सौर दिव्यांनी उजळल्या किल्ले रायगडावरील धनगर वस्तीतील झोपड्या. आमदार गोपिचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना यश; धनगर कुटुंबांना चांगली घरे मिळवून देणार. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील धनगर वस्तीतील झोपड्या सौर दिव्यांनी उजळून निघाल्या आहेत. आमदार गोपिचंद पडळकर यांच्या प्रयत्नातुन हे सौर दिवे बसवण्यात आले आहेत. घरात सौर दिव्यांचा प्रकाश पडताच या कुटुंबांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे या धनगर वस्तीला वीज पुरवठा दिला जात नव्हता. यामुळे काल पर्यंत येथील 24 झोपड्या दिव्याच्या प्रकाशात होत्या. मागीलवर्षी पडळकर यांच्या दौऱ्या दरम्यान येथील रहिवाशांनी वीज नसल्याची तक्रार मांडली होती. याची दखल घेत पडळकर यांनी झोपड्यांना सोलर पॅनलच्या माध्यमातून विज पुरवठा मिळवून दिला. रविवारी संध्याकाळी पडळकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. किल्ल्यावरील धनगरवाडी हलवू देणार नाही उलट यांना चांगली घरं कशी मिळतील यासाठी प्रयत्न करू, असा शब्द पडळकर यांनी इथल्या ग्रामस्थांना दिला.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 16, 2026 02:01:05
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 16, 2026 02:00:53
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 16, 2026 02:00:21
Jalna, Maharashtra:जालना :स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वडीगोद्री शाखेत दरोड्याचा प्रयत्न,सायरन वाजल्याने दरोडेखोरांनी काढला पळ,घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद अँकर : बुरखा घालून तसेच तोंडाला बांधून आलेल्या दरोडेखोरांनी जालन्यातील वडीगोद्री येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे पाठीमागील शटरचे कुलूप तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय; परंतु गुराख्याची सतर्कता आणि पोलिस व्हॅनचे सायरन वाजल्यामुळे दरोडेखोरांनी साहित्य जागेवर सोडून पळ काढला. यामुळे बॅंकेतील ३० ते ४० लाखांची रोकड वाचली असून, ही घटना سیसीटीव्हीत कैद झाली आहे.दरम्यान बँकेच्या काही अंतरावरील शेतातून पोलिसांनी लहान मोठ्या गॅस टाक्या जप्त केल्या आहेत.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 16, 2026 00:45:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - लेकीच्या जयंतीनिमित्त 102 मुलींच्या नावावर कन्यारत्न ठेव, गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ सांगलीतील रुद्राणी फाउंडेशनच्यावतीने समाजातील गरीब कुटुंबातील 102 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आले आहेत. रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी मुलीच्या जयंती निमित्ताने तिच्या नावे ही ठेव योजना सुरु केली असून गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते मुलीच्या नावे ठेवण्यात आलेली ठेव पावती संबंधित कुटुंबांना प्रदान करण्यात आली. आतापर्यंत रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून 702 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आल्या असून मुलीचा जन्मदर वाढावा,या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतुन रुद्राणी फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 16, 2026 00:45:25
Ambernath, Maharashtra:पूरपरिस्थिती पासून होणार बदलापूरकरांची सुटका 230 कोटी रुपयांच्या स्ट्रॉंम वॉटर प्रकल्पाचे भूमिपूजन बदलापूर शहरातील स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पाडलं. साडेचारशे कोटींचा या प्रकल्पाच्या 230 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. या प्रकल्पात बदलापूर शहरातील 10 किलोमीटर लांबीच्या मुख्य नाल्याच्या बाजूला बांधकाम करून त्यांचं खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन होऊन ते उल्हास नदीला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बदलापूर शहरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थिती पासून सुटका होणार आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 15, 2026 16:33:24
Nanded, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त ड्रोन लेझर शो सादर करण्यात आला. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा भव्य ड्रोन शो भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. दोनशे ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारण्यात आलेल्या या लेझर शोमध्ये नागनाथ मंदिराचा इतिहास, त्याची आध्यात्मिक ओळख आणि धार्मिक परंपरा प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून भगवान शंकरांची भव्य प्रतिमा, त्रिशूळ, शिवलिंग, औंढ़ा नागनाथ मंदिराची रचना तसेच संत परंपरेचे प्रतीक असलेल्या प्रतिमा आकाशात साकारण्यात आल्या. या नयनरम्य आणि मनमोहक सोहळ्याला पाहण्यासाठी हिंगोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 15, 2026 16:31:51
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 15, 2026 14:45:44
Akola, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलना केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अकोल्यात भाजपातर्फे तीव्र आंदोलन झाले. नवीन बस स्टँडसमोर झालेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसन्त खंडेलवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप महानगर सरचिटणीस ॲड. देवाशीष काकड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
Advertisement
Back to top