icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रामदास आठवलें का शरद पवार को भाजपा या रिपब्लिकन पार्टी में आने का संकेत

Sangli, Maharashtra:शरद पवारांनी, त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्या़ ऐवजी भाजपा सोबत यावे - मंत्री रामदास आठवलेंचा. शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, त्यांनी आमच्यामध्ये यावे, अब निमंत्रण आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला आहे. या आधी शरद पवारांना आपण काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता, पण आता काँग्रेसमध्ये दम राहिला नाही, काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल, अशीही परिस्थिती नाही, त्यामुळे शरदवारांनी आमच्यासोबत यावं भाजपाकडे घेऊन जाऊ, असं देखील विधान रामदास आठवले यांनी केला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
0
Report

नालासोपारा के यूपीआई एटीएम से 400 रुपये कम, फटी नोट मिलने मामला सामने आया

Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात एटीएममधून निघाली फाटलेली नोट ग्राहकाला तब्बल ४०० रुपयांचा फटका! ANC : डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एटीएममधून सुरक्षित व्यवहार होईल या आशेने गेलेल्या ग्राहकांना आता थेट एटीएम मशिनकडूनच 'धक्का' बसला आहे. नालासोपारा येथील गालानगर भागात असलेल्या हिताची (Hitachi) कंपनीच्या युपीआय एटीएम (UPI ATM) मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ग्राहकाने पैसे काढले असता, त्याला केवळ फाटलेली नोटच मिळाली नाही तर हिशोबापेक्षा तब्बल ४०० रुपये कमी आल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने गालानगर येथील हिताची एटीएममधून ४,००० रुपये काढण्यासाठी 'युपीआय कॅश विथड्रॉल' चा पर्याय वापरून क्यूआर कोड स्कॅन केला होता. मशिनमधून पैसे बाहेर आल्यानंतर ग्राहकाने जेव्हा नोटा तपासल्या, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. बाहेर आलेल्या नोटांमध्ये २०० रुपयांची एक नोट पूर्णपणे फाटलेली आणि अत्यंत दुरवस्थेत होती. याशिवाय आणखी धक्कादायक बाब म्हणजे, ४,००० रुपयांपैकी प्रत्यक्ष मोजणी केली असता फक्त ३,६०० रुपयेच हातामध्ये आले. म्हणजेच ग्राहकाला ४०० रुपये कमी मिळाले. त्यामुळे पैसे कमी आल्याचे आणि नोट फाटलेली असल्याचे लक्षात येताच ग्राहकाने सतर्कता दाखवून एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर त्याने सर्व नोटांची मोजणी करून दाखवली, जेणेकरून हा सर्व प्रकार रेकॉर्ड व्हावा आणि बँक प्रशासनाकडे याचा भक्कम पुरावा राहावा. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला असून, एटीएमच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report

धाराशिव के राजनीति में ओमराजे نिंबळकर की चुप्पी क्यों राज उगल रही है?

Dharashiv, Maharashtra:धाराशिव के राजनीति में सध्या एकच चर्चा... खासदार ओमराजे निंबळकर शांत क्यों? बैठकीं को दांडी, राजकीय घडामोडीं पर मौन और ऑपरेशन टायगर की चर्चाओं से बढ़ता गूढ़... पाहूया ओमराजें की शांतते मागचं राजकारण. सध्या ऑपरेशन टायगर की जोरदार चर्चा शुरू है. और इस चर्चा में सर्वाधिक चर्चेत हैं धाराशिव के उद्धव ठाकरे गट के खासदार ओमराजे निंबळकर. इसका कारण भी वही है. पहले की तरह धाराशिव के राजकारण में सक्रिय न दिखने वाले ओमराजे पक्ष के छोटे-बड़े कार्यक्रमों और बैठकों में अनुपस्थित रहते हैं, इस से उनका वावर मतदारसंघ में कम हुआ बतलाया जा रहा है. ऑपरेशन टायगर की चर्चाओं में उनके नाम के साथ साथ मौन भी चर्चा का विषय बन रहा है. नेमकं क्या चल रहा है ओमराजें के मन में?
0
0
Report
Advertisement

अमरावती विधान परिषद चुनाव में कांग्रेस- वंचित के समर्थन पर नया ट्विस्ट

Amravati, Maharashtra:अमरावती विधान परिषद निवडणुकीत पुन्हा आला नवीन ट्विस्ट; काँग्रेसने वंचितला पाठवलेला पाठिंब्याचा प्रस्ताव वंचित कडून गेल्या तीन दिवसांपासून वेटिंगवर ठेवण्याचा काँग्रेसचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी म्हटला आहे त्यामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये नेमकं चाललय काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तीन दिवसांपूर्वी वंचित चे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्याशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली होती वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली यानंतर काँग्रेस नेते आणि वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या एक गुप्त बैठक झाली तेव्हा वंचितला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला मात्र बाळासाहेब आंबेडकरांचा यांच्याशी बोलून निर्णय घेऊ असे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले पण आता तीन दिवस उलटूनही अजून विश्वकर्मा यांच्याकडून कोणताही निरोप न आल्याने वंचित ने काँग्रेसचा प्रस्ताव गेल्या तीन दिवसांपासून वेटिंग वर ठेवल्याचं बोलला जात आहे. बाइट :- सुनील देशमुख, माजी मंत्री व काँग्रेस नेते शाहू, फुले आंबेडकर विचारधारेला पाठिंबा द्यायचा की जातीवादी पक्षाला पाठिंबा द्यायचा हे काँग्रेसने ठरवावे; निलेश विश्वकर्मा यांचा काँग्रेस वर पलटवार वो: अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस सोबत प्राथमिक दुसरी आणि तिसरी बैठक झाली आहे. मी सुरुवातीला म्हटलं होतं काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे. ज्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन आपण चालतो त्याला पाठिंबा करायचा की जातीवादी शक्तीला पाठिंबा द्यायचा आहे हे त्यांनी ठरवावे असे विश्वकर्मा यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. दरम्यान पाठिंबा बाबत लवकर निर्णय होईल असेही विश्वकर्मा यांनी म्हटले आहे. बाइट :- निलेश विश्वकर्मा, उमेदवार, वंचित
0
0
Report

1984 जीआर के आधार पर समाज कल्याण भर्ती की बहस गर्म

Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट- आ परिणय फुके नागपूर - On समाजकल्याण विभाग आरक्षण - समाज कल्याण विभागात काढलेली भरती..१९८४ च्या जीआर नुसार भरती काढली जाते.. कोणाला काही संभ्रम असेल तर त्यांनी तो जीआर वाचन कराव.. - संजय राऊताना कोणतेही काम नसल्याने सकाळी उठून टीकाटिपणी करतात.. त्यांनी १९८४ चा जीआर त्यांना मी आज पाठवतो..त्याचा करून अभ्यास करून बोलाव.. On रोहित पवार आंदोलन - रोहित पवार यांना कर्जमाफीचा अभ्यास नाही.. कर्जमाफीचा शेतकरी लाभ घेत आहेत.. अडचण असेल तर स्थानिक जिल्हाधिकारी يांना तक्रार करून निवारण करतील. रोहित पवार यांची मागणी शेतकऱ्याची कोणतीही पोठतिडकी नाही.. On विलीनीकरण चर्चा - इतर सर्व पक्ष राज्याच्या हितासाठी आणि वेगळ्या विचारामुळे काँग्रेसमधून बाहेर पडले होते.. आज त्यांच्या राज्यात नाकारल्याने त्यांचे विचार असेल पुन्हा काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हायचं... On काँग्रेस उमेदवार माघार.. - . त्यांचे भांडण संपल्याशिवाय निवडणूक लढायची नाही असे काँग्रेस पक्षाने ठरवले असावे म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली असावी..
0
0
Report

रोहित पवार का उपोषण, राम शिंदे की तीखी टिप्पणी और कर्जमाफी मुद्दे पर बहस

Ahilyanagar, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्या या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी SP चे आमदार रोहित पवारांनी पंढरपूरात उपोषण सुरू केले आहे... यावरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे...पंढरपूरातील आंदोलन का आणि कशासाठी सुरू आहे हे शोधण्याची गरज आहे...शेतकऱ्यांना शासनाने वेळेत कर्जमाफी दिली आहे, 22 तारखेला आचारसंहिता संपल्यावर कर्जमाफीची करावाई होईल असं असतांना विठ्ठलाच्या दारात उपोषण करून भाविकांची गैरसोय निर्माण होईल असा हा प्रकार आहे...शासनाने केलेल्या कर्जमाफीमध्ये कोणतेही त्रुटी दिसत नाही, तरी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा रोहित पवारांचा हा केविलवाणा प्रकार आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली.
0
0
Report
Advertisement

अल निनो से महाराष्ट्र के मराठवाड़ा में सूखे की आशंका, मानसून प्रभावी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून मध्यावर आलाय मात्र महाराष्ट्रात अजूनही पाऊस नाहीं त्यामुळं दुष्काळ प्रवण क्षेत्र असलेल्या मराठवाड्या सारख्या भागात धडकी भरली आहे, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत तर दुसरीकडे हवामान विभागाने प्रशांत महासागरात अल निनो परिस्थिती निर्माण झाल्याची घोषणा केलीय त्यामुळं दुष्काळचे ढग दाटून आले आहे... महाराष्ट्रासह मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट. प्रशांत महासागरात अल निनो परिस्थिती निर्माण. पावसाच्या सरसरीत 25 टक्के तूट पडण्याची भीती. जून महिना मध्यावर आलाय मात्र अजूनही ढग दाटून येत नाहीय.. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे मात्र सरी कोसळत नसल्याने तो हवालदिल झालाय, एरव्ही जूनच्या पाहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात पेरण्या होतात मात्र यंदा पावसाचा नेम दिसत नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत, त्यामुळं पाऊस कधी येणार आणि कधी पेरण्यां होणार असा प्रश्न बळीराजाला पडलाय, मराठवाड्यात तर सर्वदूर असेच चित्र आहे तर महाराष्ट्र मध्येही जवळपास असेच चित्र दिसतेय, जमिन तयार आहे मात्र प्रतीक्षा पावसाची आहे.. यामुळं काय आहे अल निनो ... प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढते, त्याला 'एल निनो' असे म्हणतात. एल निनोचा प्रभाव जागतिक असला, तरी भारतासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो: एल निनोचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. जेव्हा एल निनो सक्रिय असतो, तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो. जगातील तापमानात वाढ होते आणि जगभरात उष्णतेच्या लाटां येतात. एका बाजूला भारत, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात दुष्काळ पडत असतानाच, दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर येतो. अल निनो चा मोठा फटका मान्सून ला बसणार असे चित्र दिसते या आधी 1953, 1957, 1958, 1965, 1966, 1972, 1977 ते 1980 आणि नुकताच 2015-16 मध्ये अल निनो च्या प्रभावाने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती..
0
0
Report

तुकाराम मुंढे के قوي कारवायों से दूध बाजार में सुधर; किसानों ने दुग्धाभिषेक कर जताया समर्थन

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आहे. राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खडकी येथील शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत त्यांच्या कामगिरीच कौतुक केल आहे. राज्यात सुरू असलेल्या कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध बाजारातून कमी होण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुद्ध दुधाला अधिक मागणी निर्माण होऊन दुधाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुकाराम मुंढे यांची या विभागातून बदली करू नये अन्यथा आम्ही आंदोलन करू असे इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे
0
0
Report
Advertisement

वालधुनी नदी पुनर्जीवन के लिए DPR तैयार, KDMC ने सफाई हेतु सहयोग माँगा

Kalyan, Maharashtra:केडीएमसी महापौर हर्षाली थविल चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अधिकारी नगरसेवकांनी केला वालधुनी नदीचा पाहणी दौरा, वालधुनी नदी पुनर्जीवित करण्यासाठी DPR तयार करणार. वालधुनी नदी पुनर्जीवन करण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी इतर महानगरपालिकांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलं आवाहन, वालधुनी नदीचे पुनर्जीवनासाठी केडीएमसी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापौर हर्षाली थविल आयुक्त अभिनव गोयल, संबंधित अधिकारी आणि नगरसेवकांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान वालधुनी नदी पुनर्जीवित करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नदीत सोडले जाणारे सांडपाणी, घनकचरा आणि इतर प्रदूषणाच्या स्रोतांबाबतही चर्चा करण्यात आली. वालधुनी नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी केवळ केडीएमसीच नव्हे तर नदीच्या प्रवाह क्षेत्रातील इतर महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत आयुक्तांनी इतर महापालिकांना देखील सहकार्य करण्याचे आवाहन केले.
0
0
Report

अमोल मिटकरी ने संजय राऊत पर तंज, महाआघाडी में अर्थ खाते के सवाल उठे

Akola, Maharashtra:खासदार संजय राऊत यांनी बोलावं आणि महायुतीने ते ऐकावं, अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्याचे अर्थ खाते सांभाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगत, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शंका घेणे म्हणजे जिजाऊ माता आणि सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यासारखे असल्याचे मिटकरी म्हणाले. महिला अर्थ खाते सांभाळू शकत नाहीत, असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अर्थ खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगतानाच, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत असल्याबद्दल कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक असे वक्तव्य करून महायुतीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला. तसेच, संजय राऊत यांच्या नावासमोर कंसात "कळलावे" असे लिहावे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. दरम्यान, भाजपने अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावे, जेणेकरून संजय राऊत यांना पुन्हा याबाबत बोलण्याची वेळ येणार नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
0
0
Report

फुलउमरी बांध पर 17 वर्षीय युवक डूबा: दोस्त सहित तीन मित्रों के बीच हादसा

Washim, Maharashtra:फुलउमरी येथील बोरमळी धरणात १७ वर्षीय युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुसद येथील अंश जयस्वाल हा आपल्या मित्र व तीन मैत्रिणींसह धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता.यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह पिंजर येथील आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.युवकाचा शोध घेण्यासाठी धरण परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.रील बनविण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.अंश जयस्वाल हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तसेच फुलउमरी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर के सरकारी छात्रवास भर्ती विज्ञापन में SC उपवर्गीकरण पर विवाद; सामाजिक समूह विरोध

Nagpur, Maharashtra:नागपूर – शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नवा वाद उद्भवण्याचे चिन्ह, सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहात प्रवेशाच्या जाहिरातीत SC प्रवर्गाचे स्वतंत्र उपविभाजन. जाहिरातीत SC प्रवर्गासोबतच कॉलममध्ये 'मांग', 'मेहतर' आणि 'इतर SC' असा उल्लेख. राज्यात SC उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असतानाच जाहिराती मुळे नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता. 'जातनिहाय विभागणी सामाजिक ऐक्याला धक्का देणारी असल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप'. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींमध्ये भेदभाव होत असल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप.
0
0
Report

आर्थिक संकट के बीच सुप्रिया सुले ने पवार से संबंधों पर चुप्पी हटाने की माँग

Nagpur, Maharashtra:Ngp Supriya sule byte live u ने फीड पाठवले - नागपूर - खा सुप्रिया सुळे, नेता, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष (On विलीनीकरण ) - मला याबद्दल काही माहिती नाही.. तुमच्याकडून कळलं.. मला आणि पवार साहेबांना याबद्दल काही माहिती नाही.. - आर्थिक संकटात देश जात असताना पंतप्रधानांनी सर्व पक्षांना बोलावून देशातील आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा व्हावी अशी आमच्या पक्षाची वारंवार विनंती राहिली आहे.. (On शरद पवार पक्ष आमदार चव्हाण भेटीला ) - देशातील सर्व मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते.. म्हणून अस्वस्थता असते का.. विनोद तावडेंना देखील मी काल भेटले.. ते त्यांच्या कामासाठी मी माझ्या कामासाठी आलो.. कोणत्याही राजकीय पक्षातील लोक अनेक वेळा कामासाठी एकमेकांना भेटत असतात.. - आमच्या आमदार ,खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कोणी संपर्क केला नाही.. On संजय राऊत - तृणमूल काँग्रेसची बैठक सोनिया गांधी आणि ममता दीदी या दोघांमध्ये झाली होती. त्या दोघी माझ्याशी किंवा मी त्यांच्याशी बोलले नाही.. त्यांच्यात काय बोलणं झालं हे त्यांनाच माहीत.. - कोण कोणाच्या संपर्कात याबद्दल मला माहिती नाही.. पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव आला नाही.. किंवा पवार साहेबांनी कोणालाही प्रस्ताव दिला नाही.. - आपापसात तू तू महिमा करून घरफोडा आणि पक्ष फोडा असले उद्योग आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही .. - आता देशाची आर्थिक परिस्थिती राजकारण करायची नव्हे तर देश वाचविण्याची वेळ आहे.. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.. आम्ही नीट च्या पेपर संदर्भात मुलांचे भविष्य बघायचं ki.. आपापसात वाद करायचं अडचणीत आलेल्या जनतेला आधार द्यायचं.. आम्हाला काही जबाबदाऱ्या आहेत की नाही.. घरफोडा आणि पक्ष फोडा असे उद्योग आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही.. (On रोहित पवार आंदोलन ) - रोहितला अगोदर पासून उपोषण करू नको म्हणून विनंती करत होते... आसंवेदनशील सरकार असल्याने त्याच्यासोबत लढायची ताकद ठेवली पाहिजे. त्याच प्रेम शेतकऱ्यावर होतं.. शेतकऱ्यासाठी रोहित लढा उभा करतो याचा मला सार्थ अभिमान.. सरकार किती असंवेदनशील याचा हे उदाहरण आहे. - संजय राऊत माझ्या मोठ्या भावासारखा.. त्यामुळे प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन सूचना करण्याचा अधिकार..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top