445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई में सुबह से बारिश, लोगों के कामकाज प्रभावित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकींग नवी मुंबई मद्ये सकाळी पावसाची हजेरी सकाळी सहा वाजल्यापासून नवी मुंबई मधील काही भागात पाऊस पडत आहे。 सकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्याची चांगलीच तारांबळ उडाली0
0
Report
मानसून सक्रिय, कोकण में अगले सप्ताह भारी वर्षा की चेतावनी; रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदि क्षेत्र प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. पावसाचा आजपासून आठवडाभर मुक्काम. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. मान्सून सक्रिय झाल्याने मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार पुनरागम केले आहे. आणखी आठवडाभर पावसाचा मुक्काम कायम राहणार असून मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुधवारी आणि शुक्रवारी किंचित विश्रांती घेईल. मान्सूनच्या नवीन प्रवाहामुळे या हंगामातील सर्वात मोठा पाऊस कोकणात अपेक्षित आहे. 30 जून ते ३ जुलै दरम्यान सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगडमध्ये आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.0
0
Report
AISF का बड़ा धरना: नीट पेपर लीक के विरोध में मंत्रियों से तत्काल इस्तीफा माँगा
Bhandara, Maharashtra:पेपर लिक वाली सरकार नहीं चलेगी अबकी बार... केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदान आणि राज्य शिक्षणमंत्री भुसे यांनी राजीनामा द्यावा... AISF संघटनेची मागणी... नीटचा पेपरचा गोंधळ अजून थांबलेला नाही लगेच आता टीईटी परीक्षेचाही पेपर फुटल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे काम सरकारने केले आहे. ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली ही केवळ प्रशासनाची चूक नाही तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची त्यांच्या आई-वडिलांनी घाम गाळून केलेल्या खर्चाची किंमत या सरकारच्या दृष्टीने शून्य झाली आहे का असाही प्रश्न AISF संघटनेने केले असून एकामागून एक पेपर फुटत आहेत परीक्षा रद्द होत आहेत तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे पण सत्ताधाऱ्यांना मात्र खुर्च्या वाचवण्यात जास्त रस दिसून येत असून पक्ष फोडण्यात आणि सत्तेचे गणित जुळवण्यातच अधिकच मजा येत आहे. हा केवळ पेपर लीक नाही तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या भविष्याचा केलेला विश्वासघात आहे. विद्यार्थ्यांना न्याय हवा दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदान आणि राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे पाटील यांनी गांभीर्य आणि नैतिकता समजून तात्काळ राजीनामा द्यावा अश्या मागणी साठी जिल्हातील AISF संघटनेने भूंदाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला आहे.0
0
Report
Advertisement
सातारा–पुणे बेंगळूर National Highway पर नागठाणे में बड़ा गड्ढा, मार्ग बंद
Satara, Maharashtra:सातारा: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरून धावणाऱ्या काही जागरूक प्रवाशांच्या हे भगदाड वेळेत निदर्शनास आल्यामुळे एक भीषण अपघात बालंबाल टळला. प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून घटनास्थळी तात्काळ बॅरिकेड्स लावून ती मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली आहे.0
0
Report
शिरूर कृषि उपज बाजार समिती चुनाव में महायुति का तेज प्रचार
Shirur, Maharashtra:Rep: Hemant Chapude(Shirur) Anc:शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला असून, तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. या निवडणुकीत महायुती शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत प्रचाराचा झंझावात सुरू केलाय. आमदार माऊली कटके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार सध्या गावोगावी फिरत आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवार थेट ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीच्या संचालकांशी संवाद साधत असून, मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जातीय...0
0
Report
बीड में गोल्डन ट्रायंगल के ओलीस 20-30 युवक, मित्र की सुरक्षित वापसी की मांग
Beed, Maharashtra:बीड : 'गोल्डन ट्रॅंगल'मध्ये महाराष्ट्रातील 20-30 तरुण ओलीस बीडच्या मित्राला आला मदतीचा फोन मुख्यमंत्र्यांनी ओलीस ठेवण्यात आलेल्या माझ्या मित्राला सुखरूप मायदेशी परत आणावे ओलीस ठेवण्यात आलेल्या मित्राने केली मागणी बीड जिल्ह्यातील एका तरुणाला म्यानमार-थायलंड-लाओस सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रॅंगल' परिसरात ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओलीस असलेल्या या तरुणाने आपल्या बीडमधील मित्राला व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल करून मदतीची आर्त हाक दिली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत म्यानमारमध्ये नेण्यात आल्याचा, ऑनलाइन सायबर फसवणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा आणि नकार दिल्यास बंदुकीचा धाक दाखवला जात असल्याचा दावा त्याने केला आहे. या मित्रानेच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली असून महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता त्यांच्या सुटकेसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर: जिव्हती तालुक्यात लक्ष्मणगुडा गाँव में 6 वर्ष के बच्चे की सर्पदंश से मौत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील जिवती तालुक्यात लक्ष्मणगुडा गावात 6 वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू अँकर:-- चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यात लक्ष्मणगुडा गावात 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. आहे. घरी झोपेत असताना विषारी सापाने त्याला दंश केला.समीर मारोती आत्राम असे सहा वर्षीय मृत चिमुकल्याचे नाव आहे. घटना लक्षात आल्यावर उपचारासाठी धावाधाव सुरू झाली. मात्र वेळेत शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खासगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तालुकाविशेष डॉक्टरांनी मात्र सर्पदंशाचा प्रकार कुटुंबाच्या उशिरा लक्षात आल्याने उपचारास विलंब होत मृत्यू ओढविला असल्याचे म्हटले आहे。 आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर भीषण दुर्घटना: अल्टो चालक घायल, टाटा कार की भिड़ंत
Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी नजीक भीषण अपघात घडला, अल्टो कार कणकवली हून गोव्या च्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी टाटा कार यांची समोरासमोर धडक बसली या धडके मध्ये अल्टो कार चे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो कार चा चालक गंभीर रित्या जखमी झाला असून नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मुकई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटना स्थळी कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली, अपघातचे नेमके कारण काय आणि हा अपघात कशाने झाला याचा तपास कुडाळ पोलिस करत आहे0
0
Report
सांगली बैंक अध्यक्ष ने पडळकर पर आरोप, राजीनामा की मांग
Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश अँकर - गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील नावाची कावीळ झाली आहे,अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोणत्याही संचालकाला शंभर रुपये देखील कर्जमाफी केली नाही, पडळकरांनी कर्जमाफी केल्याचे दाखवावे, आपण राजीनामा देऊ नाही,नसेल तर पडळकरांनी राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान देखील मानसिंगराव नाईक यांनी गोपीचंद पडळकर यांना दिले आहे. बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही,पण गेल्या सहा महिन्यापासून प्रशासक येणार,असं ऐकतोय,मात्र अद्यापही पडळकर यांना यश आलं नाही,असा टोला लगावत पडळकरांना स्वतः नोकर भरती करण्यासाठी प्रशासक आणायचा आहे,असा आरोप नाईक यांनी पडळकरांवर केला आहे. बाईट - मानसिंगराव नाईक - अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.0
0
Report
Advertisement
नागपुर के सेंट्रल एवीीन्यू पर इमारत का मलबा गिरा, एक व्यक्ति गंभीर जख्मी
Nagpur, Maharashtra:नागपूर सेंट्रल एव्हेन्यूवर गीतांजलि टॉकीजच्याजवळ एका इमारतीचा काही मलबा कोसळला शिकस्त इमारतीचा मलबा कोसळला एक जण गंभीर जखमी एका कारसह काही दुचाकीचेही नुकसान0
0
Report
उरण के एक ही दिन तीन शव: तीन जगहों पर मिले, इलाके में खलबली
Navi Mumbai, Maharashtra:उरण परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. यापैकी दोघांची ओळख पटली असून, एका अज्ञात पुरुषाच्या नातेवाइकांचा पोलिस शोध घेत आहेत. न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेडब्ल्यूआर कंपनीच्या बाजूला रस्त्यालगत खारफुटीत मुरारी कुमार (३८) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो ऑफकॉन कंपनीत काम करीत होता. तो मद्याच्या नशेत खाडीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरा मृतदेह सारडे येथील प्रमोदिनी पाटील (७०) या मनोरुग्ण महिलेचा आहे. एप्रिल महिन्यात त्या लग्नाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. सारडे गावाजवळ रानभाज्या गोळा करणाऱ्या आदिवासी दाम्पत्याला झुडपांमध्ये त्यांचा मृतदेह दिसला. तिसरा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ खारफुटीत सापडला. तो एका ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा असून, त्याची ओळख पटलेली नाही.0
0
Report
सिया-चेतन की पुलिस हिरासत 3 जुलाई तक बढ़ी; जांच पर सरकार बनाम बचाव की तकरार
Varsoli, Maharashtra:सिया-चेतनची पोलीस कोठडी ३ जुलैपर्यंत वाढली. तपासावरून कोर्टात सरकारी आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद. ANCHOR: केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने तपास अद्याप अपूर्ण असल्याचं सांगत आरोपींची आणखी चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयात मांडलं. चेतनची घटनास्थळी पुनर्रचना, काही वस्तूंची जप्ती, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येचा सराव नेमका कुठे करण्यात आला, याचा तपास बाकी असल्याचं सरकारी पक्षाने सांगितलं. मात्र या मागणीला बचाव पक्षाने जोरदार विरोध केला. पोलिसांनी याच कारणांसाठी आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती. मग त्याच मुद्द्यांसाठी पुन्हा कोठडी का मागितली जाते, असा सवाल सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात उपस्थित केला. दुसरीकडे, चेतन चौधरीच्या वकिलांनीही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपासासाठी पुरेसा वेळ मिळूनही आवश्यक कारवाई झाली नसल्याचा दावा करत, केवळ कोठडी वाढवण्यासाठी जुन्याच कारणांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप त्यांनी केला.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई के कोपरखैरणे में बारहवीं के छात्र की दिल का दौरा से मौत
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-५ येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात इयत्ता बारावी शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव शिव पाल असे असून तो पावना येथील रहिवासी होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयात आला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास महाविद्यालयाच्या तळमजल्यावर तोला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
नवी मुंबई विमानतळ का नाम दिबा पाटील के नाम पर रखने की मांग
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लावण्यात यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. पनवेल- नवी मुंबई परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप देखील या विमानतळाचे नामकरण झालेले नाही. येथील प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी वारंवार मागणी केली. मात्र अद्याप देखील या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात काढण्यात आले असून, उपोषणदेखील करण्यात आले मात्र शासन दरबारी फक्त आश्वासन देण्यात आले. केंद्र शासनाकडून विमानतळाचे नामकरण केले जाईल असे सांगण्यात येत आहे. मात्र विलंब होत असल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनीदेखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव लावण्यात यावे, यासाठी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आणि आता तरी दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे。0
0
Report
वडाळीभोई में एसटी स्टॉप न मिलने पर ग्रामीणों ने मुंबई-आग्रा महामार्ग पर रोका
Yeola, Maharashtra:एसटी बस थांब्यासाठी वडाळीभोईचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून मुंबई-आग्रा महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन केले. वडाळीभोई या गावाची 15 हजार लोकसंख्या असून गावातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चांदवडसह इतर गावाला जातात शिवाय इतर छोट्या गावातील ग्रामस्थ देखील वडाळीभोईला ये-जा करतात मात्र एसटी थांबा नसल्याने सर्वांचे हाल होत असल्याचे सांगत नागरिकांनी रस्ता रोको केला. आंदोलनामुळे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला..0
0
Report
Advertisement
