445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा में मोर शिकार: सागर गौतम पवार गिरफ्तार, साजो-सामग्री जप्त
Satara, Maharashtra:सातारा तालुक्यातील वर्ये येथे राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा लावून शिकार केल्याप्रकरणी सागर गौतम पवार यास सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून मोराचे शिजविलेले मांस, पिसे, सापळा, हत्यारे आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.0
0
Report
गडचिरोली के 30 साल के विकास का क्षेत्रीय नक्शा एक साल में पूरा करें: अधिकारी
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याच्या पुढील ३० वर्षांच्या नियोजनबद्ध विकासाची दिशा निश्चित करणारा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवून कोणत्याही परिस्थितीत एका वर्षाच्या आत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दिले. गडचिरोली स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्ह्याच्या पुढील तीन दशकांच्या विकासाची दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला. नवीन प्रादेशिक आराखड्याची कार्यपद्धती व कालमर्यादा, अद्ययावत बेस मॅप, विद्यमान व प्रस्तावित जमीन वापर, भौगोलिक माहितीचे संकलन, नियोजन तज्ज्ञांची नियुक्ती, तांत्रिक संस्थेची निवड तसेच संभाव्य ‘ग्रोथ सेंटर’ आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर यांनीही जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. गडचिरोली जिल्ह्यासाठी १९९१ मध्ये तयार करण्यात आलेला प्रादेशिक आराखडा तीन दशकांहून अधिक जुना आहे. या कालावधीत जिल्ह्यातील रस्ते व दळणवळण, पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकासाच्या गरजांमध्ये मोठे बदल झाले आहेत. या बदलांसह पुढील ३० वर्षांतील संभाव्य विकास लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक आराखडा अद्ययावत, वस्तुस्थितीदर्शक आणि भविष्यवेधी असावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्याचे वनबहुल व आदिवासी स्वरूप, उपलब्ध जमीन, जलस्रोत, रस्ते व दळणवळण व्यवस्था, विद्यमान वसाहती, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाची संभाव्य केंद्रे यांचा समन्वय साधून आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.0
0
Report
सातारा में गणेशोत्सव के लिए सुरक्षा तैयारियाँ तेज, पुलिस निरीक्षण में मार्ग सुरक्षा सुनिश्चित
Satara, Maharashtra:सातारा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा पोलिसांकडून तयारी तीव्र करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग आणि विसर्जन तळ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. राजवाडा ते मोती चौक, राधिका रोड असा पायी दौरा करत त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यादरम्यान अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
भामाठाण में बिबट्या हमला: युवक घायल, वन विभाग से कड़ी कार्रवाई की मांग
Shirdi, Maharashtra:Anc - उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याचा थरारक बचाव झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. बाप्पूसाहेब जगताप असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जगताप यांच्या हाताला आणि मांडीला गंभीर इजा झाली आहे. त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच परिसरात बिबट्याने भरदिवसा एका शेतकऱ्याची शेळी पळवून नेली होती. लागोपाठ घडणाऱ्या या हल्ल्यांमुळे भामाठाण आणि लगतच्या परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. वनविभागाने या भागात तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे.0
0
Report
चिपळुण में गैस कंपनी की बिना अनुमति खोदाई, गणेशोत्सव में यातायात बाधित
Ratnagiri, Maharashtra:चिपळुण - रत्नागिरी ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर चिपळूण शहरात महानगर गॅस कडून रस्त्याची खोदाई सुरू झाली. नगर परिषदेची परवानगी न घेताच खोदकाम सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप. नगरपरिषदेने बंद पाडले काम. गणेशोत्सवाच्या काळात एसटी स्टँड परिसर ते चिंच नाका दरम्यान पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता.0
0
Report
एमपीएससी पेपरफुटी विरोधी छात्रों का अमरावती में प्रदर्शन, जिलाधिकारी कार्यालय के बाहर भारी मोर्चा
Amravati, Maharashtra:MPSC पेपरफुटीविरोधात अमरावतीत विद्यार्थी उतरले रस्त्यावर; सरकार अन् आयोगाविरोधात तुफान घोषणाबाजी, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा MPSC परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणावरून अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा जनखोभ उसळला आहे! MPSC चा अभ्यास करणारे हजारो परीक्षार्थी व विद्यार्थी आज थेट रस्त्यावर उतरले असून पंचवटी चौकातून या धडक मोर्चाला सुरुवात झाली व थेट अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व MPSC आयोगा विरोधी जोरदार घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला. पेपरफुटीची सखोल चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा हा अजस्र मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे。0
0
Report
Advertisement
GDP दाव्यांवर सवाल: मोदी सरकारला विपक्षाची तीखी प्रतिक्रिया
Kolhapur, Maharashtra:संजय राऊत पत्रकार परिषद मुद्दे *ऑन GDP दावा* देशाचे पंतप्रधान जेव्हा एखादा दावा करतात, तेव्हा त्यांच्या दाव्यावर जनतेचा विश्वास असायला हवा कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत, पण दुर्दैवाने ज्या पंतप्रधानाची ओळख जागतिक पातळीवर थापेबाज अशी असेल त्यावर जनता कशी विश्वास ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके खोटे बोलतात, देशालाही खोटं ऐकण्याची सवय लावली आहे. पण गेल्या काही काळापासून देशातला चित्र बदलले आहे त्यामुळे जनता हा खोटेपणा स्वीकारणार नाही. या देशाचा जीडीपी वाढलाय म्हणजे काय झालं, हे देशाच्या पंतप्रधानाला तरी सांगता येईल का. देशाचा जीडीपी वाढला याचा अर्थ अर्थव्यवस्था मजबूत झाली, पंतप्रधान ट्रिलियनचे आकडेवारी सांगतात.. ते आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे. आम्हाला इतकच कळतं की देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्याला दोन वर्षात या देशात साडेसात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हे काय जीडीपी वाढण्याचे लक्षण आहे का. या देशातील 85 कोटी जनता आजही नरेंद्र मोदींनी फेकलेल्या दहा किलो अन्नावर जगत आहे. हे जीडीपी वाढल्याचे लक्षण नाही. गेल्या बारा वर्षापासून आपण दोन कोटी रोजगार देऊ असं सांगताय, किती रोजगार निर्माण झाला ? कोट्यावधी बेरोजगार तरुण आज रस्त्यावर आहेत. त्यांच्या देखील आत्महत्या सुरू आहेत निवडणूक आल्या की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि मत विकत घ्यायचे. हे जेडीपी वाढल्याचे लक्षण अजिबात नाही. *जेव्हा आपण जीडीपी वाढला असा दावा करतो त्यावेळेला देशातील जनतेचा राहणीमान सुधारलं पाहिजे. देशातील शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळाला पाहिजे. पण या देशात अशा प्रकारचे चित्र काहीच नाही* *असं जर देशातील चित्र असेल आणि याला जर जीडीपी वाढला असं पंतप्रधान म्हणत असतील तर जीडीपीची व्याख्या जागतिक पातळीवर बदलावी*. ही लोकच आभासी आहेत.. पंतप्रधान मोदींचा जन्म देखील आभासी आहे. त्यांचा जन्म आपल्यासारखा आईच्या पोटातून झाला नाही. ते विष्णूचे अवतार आहेत.. ते नॉन बायलॉजिकल आहेत. त्यांना त्यामध्ये आनंद मिळतो. त्यामुळेच ते राम रहीम यांना वारंवार जामीनावर बाहेर सोडत आहेत. उजवीकेस्थान या देशातून व्हिडिओ करत रील करत ते सांगत आहेत देशाचा जीडीपी वाढला आहे. त्यांनी देशात येऊन बोलावं. त्यांनी जाहीर पत्रकार बैठक घेऊन बोलावं. *ऑन विकास झालाय दावा* देवेंद्र फडणवीस यांना सांगा पुण्यावरून कोल्हापुरात या म्हणून. मग रस्त्याचं जाळ काय आहे हे त्यांना कळल. नवी मुंबई येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधले आहे, मला इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचायला अडीच तास लागले. हे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर. भाजपवाल्यांच्या वर काय विश्वास ठेवता त्यांचा खेळ संपलेला आहे. 2029 च्या आधीच त्यांचा खेळ संपलेला आहे *ऑन डी जे* नागपूरला पोलीस आयुक्त यांनी एक भूमिका घेतली आहे आम्ही डीजे बंद करणार. पुण्यामध्ये देखील त्यांचेच राज्य आहे. नागपूरचे आयुक्त हे पूर्वी पुण्याचे आयुक्त होते, हा धोरणात्मक निर्णय असायला हवा होता ,एका शहरापुरतं नाही. डीजे असेल किंवा लेझर असेल यामुळे या राज्यातील नागरिकांना अडचणी येत असतील, आरोग्य बिघडत असेल. तर गृहमंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. हे म्हणतात कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेऊ. पण हे स्वतःच कायद्याची चौकट पाळत नाहीत. पुण्यातील लोक असो किंवा नागपूर मधील लोक असो यांनी डीजेला विरोध केला आहे. सरकार जर लोक भावनेचा आदर करणार असेल तर, त्यांनी लोकभावनेचा विचार करायला हवा. हे सरकार रोज हजारो निर्णय घेत.. *नागपूरला एक निर्णय.. पुण्याला एक निर्णय.. याला कायद्याची चौकट म्हणत नाहीत मिस्टर देवेंद्र फडणवीस* *ऑन देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान*. मराठी माणूस उपपंतप्रधान होणार असतील तर आनंद व्हायला पाहिजे. राष्ट्रीय राजकारणात उलथापाळथ व्हायची जास्त शक्यता आहे, तुम्ही पण पहा. *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात बदल करायचा आहे पण ते करू शकत नाहीत. कारण त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या सरकारमध्ये बंडाळी सुरू झाली आहे* *केंद्रातले प्रमुख जूने चार मंत्री हे राजीनामा द्यायला तयार नाहीत.ओरिजनल भारतीय जनता पक्षाच्या चार प्रमुख मंत्र्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही, त्यांची भूमिका आहे आधी अमित शहा यांचा राजीनामा घ्या. त्यामुळे अद्याप फेरबदल झालेला आहे* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अशी आहे, फेरबदलामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान हे पद निर्माण करा, आरएसएसला मानणाऱ्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी उपपंतप्रधान करा. जो पुढला वारस असेल. अमित शहा नव्हे. अमित शहा यांचा खेळ संपलेला आहे.. *On मुख्यमंत्री दिल्ली दौरा* सध्या ते दिल्लीला रोज जात आहेत.. महाराष्ट्राचा किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ७२ तासाने दिल्लीला का जावं लागतं याचं मला आश्चर्य वाटतं. उठ सूट दिल्लीला जाऊन नेमकं काय चर्चा करत आहेत.. ते काय चर्चा करत आहेत हे मी तुम्हाला सांगू शकतो. ते त्यांच्या पक्षामध्ये ठरवू शकत नाहीत.. मुख्यमंत्री व्हायचं हे त्यांनी ठरवलं होतं का.. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ते दिल्लीत जावेत आणि सर्वोच्च पदी जावेत अशी एकनाथ शिंदे यांचीच नाही तर अनेकांची देखील इच्छा आहे. माझ्याकडे जे इंटेलिजन्स आहे.. ते चोख इंटेलिजन्स आहे. मी सांगू शकेन एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये काय चर्चा झाली. *उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा* त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना दिल्लीला जावं लागतं. त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे अमित शहा आहेत. त्यामुळे हाय कमांड यांना भेटण्यासाठी त्यांना जावं लागतं.. शिवसेना ही मातोश्रीतून काम करत होती, शिवसेना भवनातून काम करत होती, अमित शहा यांनी स्थापन केलेली असे दोन पक्ष महाराष्ट्रात आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि मीध्ये यांचा पक्ष. या पक्षाच्या प्रमुखांना आदेश घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं.. *पुणे बापट हल्ला" या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे ग्रह खात आहे, ती कशासाठी आहे हेच कळत नाही. या राज्यामध्ये कोणत्याही विषयावर गृहखात्याची भूमिका स्पष्ट नाही. *फक्त आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी या खात्याचा वापर होत आहे. विरोधकांच्यावर पाळत ठेवण्यासाठी या गृहखात्याचा वापर होतो. विरोधकांचे फोन ऐकण्यासाठी त्याचा वापर होत आहे.* एका आंदोलकाला टीव्हीच्या कॅमेरासमोर मारलं जात, याचा अर्थ कायद्याची भीती राहिलेली नाही. *देवेंद्र फडणवीस हे पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीत. आता ते राज्याचे पूर्णवेळ मुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहत नाहीत.इतका गोंधळ त्यांच्या सरकारमध्ये सुरू आहे" महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसेल तर या राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडत राहतील. खुण होतील, हत्या होतील. कायद्याचं भय राहिलेलं नाही. आमचा गट नाही तर आमची शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे याला एक भूमिका आहे. ज्या गटाचा उल्लेख तुम्ही करता तो गट कोर्टात आहे. तो अमित शहा यांचा गट आहे. शक्तीपिठा संदर्भात आमच्या पक्षाने घेतलीली भूमिका चे बाधित आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत त्याच्या बाजूचे आहे. आधीचे केलेले रस्ते तुम्ही आधी बघा. मग शक्ती पिठाची गरज आहे की नाही हे तुम्हीच सांगा. कमिशन घेण्यासाठी हजारो कोटीची कामे काढली जात आहेत. विकास लोकहित कल्याण हा विषय काहीच नाही. *कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली का* निवडणुका येतात निवडणुका जातात आमचा भर हा पक्ष संघटनेच्या बाधणीवर आहे.. माझ्या शेजारी बसलेला गडी लोकसभा जिंकणारा होता. दिल्ली मधून जी यादी आली होती. ती यादी ही जागा ए प्लस म्हणून दिली होती. पण शेवटच्या क्षणी काही गोष्टी घडल्या. पैशाने माणसे विकली गेली. दिल्लीतून फोन येतो आणि निकाल जाहीर करा असं सांगितलं जातं आता हे होणार नाही. *ऑन मराठा आरक्षण शिवसेना भुमिका* या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे, त्यांचे भांडण सरकारशी आहे. ते सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत, मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल. एरवी ते संविधानाची मोडतोड करतात.. संविधान पाळत नाहीत.. संविधान बदलायला निघालेत.. पण जेव्हा अडचणीचा विषय येतो त्यावेळेला संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेऊ असं सांगितले जाते. मनोज जरंगे पाटील हे समर्थ आहेत त्यांच्याशी लढायला. सरकार त्यांच्याशी प्रश्न सुटावा म्हणून बोलत नाही तर त्याचं राजकारण करत आहे.. सरकार नेहमीप्रमाणे त्यांच्या उपोषणाचे त्यांच्या प्रश्नाचे राजकारण करत आहे. (((((गालावर हात फिरवत.)))) ते तुमचे डेप्युटी सीएम.. श्रेय घेतात ना.. आता कुठे आहेत.. आता विखे पाटलांना पाठवतात.. उदय सामंतांना पाठवतात त्यातून हा प्रश्न मिटणार आहे का सुटणार आहे का. हा सामाजिक आणि आर्थिक विषय आहे. यासाठी त्यांना या राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांना बोलून तोडगा काढावा लागेल*. *याच राज्यातील प्रमुख नेत्यांना बसवून चर्चा करून या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. त्यातून सर्वसमावेशक मार्ग काढणं गरजेचं आहे. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना तेवढी अक्कल आहे का* *ऑन राहुल गांधी नाकेबंदी* राहुल गांधी यांना मी खूप जास्त ओळखतो.. हा ग्रहस्थ सरकारच्या अशा बाबतीत घाबरणारा व्यक्ती नाही. उत्तराखंड सरकार भारतीय जनता पक्षाचा आहे.. राहुल गांधी विरोधात घेतलेली प्रत्येक ॲक्शन भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खड्ड्यात घालणारी असेल. *मोहन भागवत कार्यक्रमाला विरोध* मोहन भागवत कार्यक्रम करत आहेत.. त्यांना त्यांचं म्हणणं मांडू दिलं पाहिजे. आपण लोकशाही मानतो. *ऑन अजित पवार अपघात सुनेत्रा पवार स्टेटमेंट* *खरं म्हणजे सुनेत्रताई पवार यांनी हा विषय जोरात मांडायला हवा.* आमच्यासारखे लोक दादांच्या प्रेमाखातर हा विषय मांडत आहेत, एफ आय आर का होत नाही असं विचारत आहेत. अमित ठाकरे यांच्यावर एफ आय आर होतो.. आमच्या वरती एफ आय आर होतो. पण इतका मोठा नेता संशयास्पदरीत्या एका अपघातात मरण पावला.. तो एफ आयआर होत नाही. *त्यांच्या पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, कोणीही प्रसिद्धीसाठी करत नाही. कोणाला प्रसिद्धीची गरज नाही. आमच्या बाजूला तरी, मृताच्या टाळवरचं लोणी खाण्याची परंपरा नाही, ती सत्ताधाऱ्यांमध्ये आहे*0
0
Report
आकोला में 20 हजार विद्यार्थियों ने मिट्टी की गणेश मूर्तियाँ बनाकर पर्यावरणीय गणेशोत्सव शुरू किया
Akola, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात आज पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि भव्य उपक्रम पार पडला. शहरातील चार ठिकाणी एकाच वेळी तब्बल २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा महासंकल्प केला. मागील वर्षी १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागानंतर यंदा या उपक्रमाची व्याप्ती दुप्पट करण्यात आली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट… अकोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान तापडिया नगर, स्वर्गीय शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे पटांगण, जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड आणि प्रभात किड्स स्कूल पातूर रोड या चार ठिकाणी सकाळपासून विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला. सुमारे ३० शाळांमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ कार्यशाळा पाहिली नाही, तर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या हातांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवल्या. शरद कोकाटे, प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकेर, प्रा. गजानन बोबडे, श्रीमती कल्पना राव, सौ. अमृत स्प सेनाड आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना मूर्तीनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले. पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे, घरातच पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करणे, निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि गणेशोत्सवानंतर तुळस लागवडीचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. एवढ्या मोठ्या उपक्रमासाठी शाडू माती, लहान पाट, आईस्क्रीमचे चमचे, टूथपिक आणि इतर आवश्यक साहित्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हजारो विद्यार्थ्यांना साहित्याचे नियोजनबद्ध वितरण करण्यासाठी स्वतंत्र पथकही कार्यरत होते. मागील वर्षी अकोल्यात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून अशाच प्रकारची शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा सहभागाचा आकडा थेट २० हजारांवर पोहोचला. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे हजारो विद्यार्थ्यांच्या हातातून साकारलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम अकोल्यातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.0
0
Report
बारामती में पढ़ाई के दबाव से 16 वर्षीय लड़की ने चार मंजिला इमारत से कूदकर आत्महत्या
Rui, Maharashtra:बारामतीत अल्पवयीन मुलीची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या..... अभ्यासाच्या ताणतणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती..... सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या.... बारामतीत सोळा-वर्षीय अल्पवयीन मुलींन अभ्यासाच्या ताणतणावातून चार मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. बारामती शहरातील भिगवन रोड परिसरात मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलींन अभ्यासाच्या ताणतणावातून आपल्या वडिलांसमोरच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून रात्री एकच्या सुमारास खाली उडी मारली, तिला तातडीने बारामती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई: निजी स्कूल बस में 3 वर्ष की बच्ची से लैंगिक शोषण, बस चालक गिरफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका खासगी शाळेच्या बसमध्ये साडे तीन वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी आरोपी बसचालक इस्को यादव याला अटक केलेय. आरोपीने कामोठे येथील बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बसमधून प्रवास सुरू केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यावर बसमध्ये संबंधित तीन वर्षांची चिमुकली एकटी राहिली असल्याचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीचे लैंगिक शोषण केले. घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने पोटदुखीची तक्रार केल्यावर तिची विचारपूस केली असता चिमुकलीने बसमधील चालकाने तिच्यासोबत चुकीचे कृत्य केल्याचे सांगितले कुटुंबांना सांगितले. सदर प्रकरणाची माहिती शाळेला देत बस चालकविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून याप्रकरणी कामोठे पोलिसांनी आरोपीविरोधात 12 वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासंदर्भातील भारतीय न्याय संहितेतील कलमांसह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात केला असता न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
रत्नागिरी-सातारा घाट में दराड़ गिरने से यातायात ठप
Ratnagiri, Maharashtra:खेड-रत्नागिरी रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली ; वाहतूक ठप्प दरड कोसळलेल्या ठिकाणी अकलपे-खेड एसटी बस सकाळपासून अडकली असून, बसमधील विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.. खेडकडे येणारे अनेक प्रवासीही घाटात अडकले आहेत.. दरड हटविण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मोठे दगड असल्याने जेसीबीच्या मदतीने मलबा हटविण्यात अडचणी येत आहेत.. त्यामुळे ब्रेकरच्या साहाय्याने मोठे दगड फोडून रस्ता मोकळा करण्याचे काम करण्यात येणार आहे.. रस्ता पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही..0
0
Report
नागपुर में DJ बंदी पर भाजपा की मांग, सभी शहरों में एक नियम
Nagpur, Maharashtra:नागपूर BJP ON DJ भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी 121 -- भाजपाचे माजी आमदार आणि महापौर माजी महापौर संदीप जोशी यांची DJ बंदीची मागणी हे त्यांचे वैयक्तिक मतं आहे... सामाजिक विषयावर वेगळे वेगळे मत राहू शकतात... प्रवीण दटके यांची भूमिका ही पक्षाची भूमिका -- डीजेवर बंदी घालण्यापेक्षा आवाज डिसिबलच्या मर्यादा घातल्या घालता आल्या असत्या -- एक जानेवारी ते 31 डिसेंबर अशी बंदी का घातली नाही -- सनातनी धर्माच्या वेळेसच DJ निर्बंध का असा सवाल ही उपस्थित केला. -- डीजे प्रतिबंधात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे नियम का? संपूर्ण राज्यात एकच नियम हवा भाजपा शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनी ------ बाईट --- दया शंकर तिवारी,शहराध्यक्ष, भाजप0
0
Report
Advertisement
रत्नागिरी-पाली-लांजा मार्ग पर मालवाहू ट्रक का भीषण अपघात, चालक गंभीर घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी पाली-लांजा मार्गावर मालवाहू ट्रकचा अपघात अवघड वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक डोंगरावर धडकला; चालक गंभीर जखमी मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील पाली आणि लांजा दरम्यानच्या एका अवघड वळणावर कार्बन वाहून नेणाऱ्या मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक समोरच्या डोंगरावर जाऊन धडकला. धडक होण्यापूर्वी चालकाने ट्रकमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला, मात्र या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.0
0
Report
रत्नागिरी के पालीज के पास मुंबई-गोवा राजमार्ग पर कार डिवाइडर से टकराई, दो घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील पालीजवळ भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरीच्या दिशेने जाणारी कार ब्रिजवर चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या दुभाजकाच्या मधल्या भागात घुसली. या अपघातात कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे.0
0
Report
दौंड के सहजपूर में यवत पुलिस ने बड़ी कार्रवाई, दो पिस्टल और 10 कारतूस पकड़
Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील सहजपूरमध्ये यवत पोलिसांची मोठी कारवाई... आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह 10 जिवंत काडतुसे जप्त..... समीर जावेद सय Cross असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, 10 जिवंत काडतुसे आणि दोन रिकामे मॅगझिन, असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. समीर सय्यद याच्याविरुद्ध यापूर्वी तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्यापैकी एक गुन्हा मोक्का कायद्याअंतर्गत दाखल असून आरोपी सध्या जामिनावर बाहेर होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय.0
0
Report
Advertisement
