445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशिम सोनल प्रकल्प से पानी छोड़ा गया; 2-3 दिन जल आपूर्ति जारी, किसानों को राहत
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प मधून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेलुबाजार परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत होते. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानंतर पुढील २ ते ३ दिवस पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. सध्या प्रकल्पात सुमारे २०% जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यामुळे उन्हाळी पिके, फळबागा, जनावरांचे पाणी तसेच विहिरी-बोअरवेलची पातळी सुधारण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याच्या समस्येतही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.0
0
Report
मुंबई महापौर रितू तावड़े ने रस्ते निर्माण एवं नाले की सफाई का निरीक्षण किया
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या महापौर रितू तावडे आज रस्ते बांधकाम आणि नालेसफाईची पाहणी करत आहेत. चेंबूरपासून रस्ते बांधकामाची पाहणी रितू तावडे यांनी सुरु केली असून चुनाभट्टी येथील माहुल नाल्याची सफाईची पाहणी करण्यासाठी दाखल. यानंतर मिठी नदी आणि बीकेसी येथील नालेसफाईची पाहणी करत आहे0
0
Report
पश्चिम विदर्भ में जलसंचय 50% से नीचे, उच्च जलस्तर सूखे की आशंका
Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भात उष्णतेचा जलसाठ्यावर मोठा परिणाम; जलसाठ्यात मोठी घट, प्रकल्पात 50 टक्यापेक्षा कमी जलसाठा अँकर :- वाढत्या तापमानाचा पश्चिम विदर्भातील जलसाठावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जलसाठा 50 टक्यापेक्षा कमी झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड पडली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ आणि महत्त्वाचा समजला जाणारा अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ 49 टक्के जलसाठा आहे. मे महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात 50 टक्के पेक्षा कमी जलसाठा असल्याने येत्या काळात पाणीटंचाईची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
शिरूर-जुन्नर Leopard Strike: वन विभाग ने 46 बिबटों को जेरबंद किया
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातून वनविभागाच्या कामगिरीची एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येतेय. शिरूरमधील पिंपरखेड परिसरात गेल्या चार महिन्यात वनविभागाने चक्क 'बिबट्यांचा स्ट्राईक' केला आहे. अवघ्या पाच किलोमीटरच्या परिघातून तब्बल ४६ बिबटे जेरबंद करण्याची ऐतिहासिक कामगिरी वनविभागाने फत्ते केली आहे. वाढता बिबट-मानव संघर्ष पाहता, वनविभाग आता ॲक्शन मोडमध्ये आला असून जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात ५ नवीन रेस्क्यू सेंटर्स उभारली जाणार आहेत. इतकंच नाही, तर जेरबंद केलेल्या बिबट्यांची रवानगी आता थेट 'वंतारा' आणि देशातील विविध प्राणिसंग्रहालयांत केली जातेय. या मोहिमेमुळे शिरूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असला, तरी वनविभागापुढील आव्हानं संपलेली नाहीत. नेमकं काय आहे वनविभागाचं पुढचं 'मिशन बिबट्या'? पाहूया आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत...0
0
Report
कमकासुर में एक ही बोरवेल पर ग्रामीणों की प्यास, पानी की किल्लत भयावह
Bhandara, Maharashtra:३०० लोकवस्तीच्या कमकासुर गावात पाण्याची भीषण टंचाई.... एकाच विहिरीवर संपूर्ण गावाचा भार.... उन्हाळ्यात लांबच लांब रांगा.... महिला-पुरुषांना तासन्तास पाणीासाठी प्रतीक्षा.... पुनर्वसनानंतरही मूलभूत सुविधांचा अभाव... आदिवासी गावाची व्यथा कमकासुर गावात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. गावात केवळ एकच विहीर असून त्यावरच सर्व गावकऱ्यांची तहान भागते. विशेषतः उन्हाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी घटल्याने परिस्थिती आणखीच चिंताजनक होते. पाण्यासाठी दररोज सकाळपासूनच महिला आणि पुरुषांची लांबच लांब रांग लागते. अनेक वेळा पाणीासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे. हे गाव पुनर्वसित असले तरी पिण्याच्या पाण्याची सोय बरोबर नाही. गावात दोन बोअरवेल आहेत त्याही बंद अवस्थेण गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील समस्या मार्गी लागली नाही.0
0
Report
हिंगोली के देऊळगावरामे बेलवादी मार्ग की सड़क पर अव्यवस्था, प्रशासन से सवाल
Hingoli, Maharashtra:हिंगोली के देऊळगावरामा से बेलवाडी मार्गे जाने वाले रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे, रस्त्याचं काम अर्धवट करण्यात आल्याने रस्त्यावर गिटी उघडी पडली असून अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वेळा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे0
0
Report
Advertisement
headline
Satara, Maharashtra:सातारा: कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे.... निमित्त होते माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या कोरेगाव शहरातील संपर्क कार्यालयाचे आणि तीन नवीन शाखांचे उद्घाटन सोहळ्याचे....या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लावलेली हजेरी आणि विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती... यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरेगाव मधील राजकीय घडामोड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोणत्याही फलकावर किंवा बॅनरवर आमदार महेश शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला नाही. यचे कारण जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी महेश शिंदे यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली. आ.महेश शिंदे यांचे एकेकाळीचें निकटवर्तीय राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा कडून मोठी ताकद दिली जाते आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांनी दिलेली विशेष उपस्थिती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगावमध्ये नव्या नेतृत्वाला ताकद देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.. चोट्या दौरा आहे मोठा दौरा अजून व्हायचा आहे.. शिवसेनाचा मेळावा आम्ही लवकरच कोरेगाव मध्ये घेणार . कोरेगावचे प्रथम माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजाभाऊ बर्गेंनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला तो कोरेगाव मधील नागरिकांना रुचलेला आहे.. पक्षाची ताकद राजाभाऊ उभी राहणार असा आश्वासन एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून मी दिला आहे.. आमदार महेश शिंदे या कार्यक्रमाला आले नाहीत असे विचारताच .....चांगला कार्यक्रम चालला आहे.. पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रण लागत नाही.. आज शाखा उद्घाटन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे.. जिथे शिवसेनेचे नाव जिथे धनुष्यबाण चिन्ह असतं तिथे उपनेते नेत्याला आमदार खासदार यांना निमंत्रण देण्याची पद्धत आमच्यात नाही पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं सर्वांनी हजर राहिला पाहिजे..0
0
Report
अमरावती में भीषण गर्मी: ट्रांसफॉर्मर ठंडे रखने के लिए कुलर लगने की तैयारी
Amravati, Maharashtra:अमरावती में पश्चिम विदर्भ में भीषण गर्मी की लहर फैल गई है। तापमान 47 अंश सेल्सियस को पार कर गया है। इस गर्मी से बिजली वितरण तंत्र पर भी असर पड़ रहा है। ग्राहकों को निर्बाध बिजली आपूर्ति के लिए महावितरण ने विशेष योजना शुरू की है। 33/11 केवी उपकेंद्रों के पॉवर ट्रांसफॉर्मर के तापमान को नियंत्रण में रखने के लिए कुलर लगाने की प्रक्रिया शुरू की गई है। ट्रांसफॉर्मर के तेल से तापमान को नियंत्रित करना महत्त्वपूर्ण है, पर बढ़ते तापमान से यह अतिउष्ण हो सकता है। इसलिए ट्रांसफॉर्मर ओवरहिट होकर खराबी या आग लगने से बचाने के लिए यह उपाय किया गया है। उष्णते से बिजली की मांग भी बढ़ी है जिससे संपूर्ण तंत्र पर दबाव है। फिर भी महावितरण के कर्मचारी कड़क सूरज की परवाह न करते हुए बिजली आपूर्ति सुचारू रखने के लिए रात-दिन प्रयास कर रहे हैं। महावितरण ने ग्राहकों से बिजली के उपयोग में संयम बरतने और सहयोग करने को कहा है।0
0
Report
सोलापुर से वळसंग के लिए 81 किमी के नए राजमार्ग के लिए 740 करोड़ मंजूर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - 13 मैल ते वळसंग या 81 किलोमीटरच्या नव्या रस्त्यासाठी 740 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी Anchor - मोहोळ - 13 मैल - वळसंग हा नवीन रस्ता बांधण्यासाठी 740 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आलीय. हा रस्ता नव्याने व्हावा यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. अखेर आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीला मोठे यश मिळाले असून नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी देखील पूर्ण झाली आहे. या मार्गावर मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक, शेतकऱ्यांच्या अन्नधान्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सर्वांच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा मानला जातोय.0
0
Report
Advertisement
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर प्लेटफॉर्म विस्तार: ट्रैफिक ब्लॉक 85 से 108 दिन, ट्रेनें प्रभावित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रेल्वे प्रशासनातर्फे विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सध्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी घेण्यात येत असलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या काही प्रमुख रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात, मार्गात तात्पुरते बदल केले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ च्या विस्तारीकरण व नूतनीकरणासाठीचा ट्रॅफिक ब्लॉक आता ८५ दिवसांवरून १०८ दिवसांपर्यंत वाढविला आहे. या तांत्रिक कामामुळे बल्लारशाह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (नंदीग्राम) एक्स्प्रेस ही गाडी १८ मे या कालावधीत दादर स्थानकापर्यंतच धावेल. दादर ते सीएसएमटी दरम्यानचा प्रवास रद्द राहणार आहे.. सोबतच ओखा एक्सप्रेस आणि इतर काही गाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे..0
0
Report
बारिश के साथ ताडोबा-अंधारी वन्यजीव गणना: रातभर ऊँचे मचान पर प्रेमी जुटे
Chandrapur, Maharashtra:पावसाच्या साथीने ताडोबा परिघात पार पडली वन्यजीव गणना, आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्य आणि जिल्हाभरातून रात्रभर बसले हौशी प्रगणक, दुधाळ चंद्रप्रकाशात घेतला जंगलाचा अवर्णनीय आनंद अँकर:--पावसाच्या साथीने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र परिघात बुद्धपौर्णिमेनिमित्त हौशी वन्यजीव गणना पार पडली. ताडोबा प्रशासनाने आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्य आणि जिल्हाभरातून हौशी प्रगणक रात्रभर नोंदी करत बसले. या सर्व हौशी वन्यजीवप्रेमींनी दुधाळ चंद्रप्रकाशात जंगलाचा अवर्णनीय आनंद घेतला. यात त्यांना शेकडोच्या संख्येत पक्षी -प्राणी यांचे दर्शन झाले. मात्र ऐन मध्यरात्र्री जोरदार बरसलेल्या पाऊससरींनी आनंदात काही काळ व्यत्यय आणला. निसर्गानुभव असे नाव असलेल्या या उपक्रमात ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सज्ज करण्यात आल्या होत्या. एका मचाणीवर क्षमतेनुसार 2 ते 4 प्रगणक बसू शकतील अशी सोय करण्यात आली होती. कोअर म्हणजे गाभा क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीवर्ग यांनी प्राणीगणना केली. या गणनेतून जी आकडेवारी समोर येते, तिला शास्त्रीय मान्यता नसली, तरी कोणत्या प्राण्यांचे वास्तव्य कोणत्या भागात आहे हे ढोबळमानाने सिद्ध होते. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र तेजोमय असल्याने त्यात जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणी ठरली.0
0
Report
फर्नीचर मार्केट के गल्ले में शटर तोड़कर 75 हजार की चोरी, CCTV फुटेज सामने
Bhandara, Maharashtra:Anchor: तुमसर भंडारा मार्गावरील दहेगाव मोहाडी दरम्यान असलेल्या पीयूष फर्निचर मार्ट मध्ये पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून पंचाहत्तर हजारांची चोरी केली. चोरीदरम्यान CCTV कॅमेरा तोडला गेला. ही चोरी पोलिस स्टेशनपासून अवघ्या एक किमी अंतरावर असल्यामुळे पोलिसांचा धाक असण्याबद्दल चर्चा आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर की जलयोजना विवाद के बीच कार्य तेज़ी से कराने का निर्देश
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या नवीन पाणी योजनेमधील वाद संपता संपत नाहीये त्यामुळे सातत्याने बैठका प्रशासनाला घ्याव्या लागतात.. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या. कंत्राटदाराने छोट्या-छोट्या कारणांसाठी कामे थांबवू नयेत. प्रलंबित देयके योग्य ती कागदपत्रे तपासून आणि पडताळणी करूनच अदा करावीत, अशा निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य यांनी दिले आहेत. प्रकल्प कंत्राटदाराने देयके प्रलंबित असल्याबाबत न्यायालयात तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी योजनांच्या पूर्ण आणि अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मजीप्राच्या मुख्य अभियंता यांच्यासह कंत्राटदार आणि अधिकारी उपस्थित होते. कंत्राटदाराने मुदतीत पाणी पोहोचेल हे लक्षात घेऊन प्राधान्यक्रमाने कामे मार्गी लावावीत, अशा सूचना करण्यात आल्या.0
0
Report
सोलापुर में पहले स्मशानभूमि के निर्माण को प्राथमिकता, गोरे ने प्रशासन को निर्देश दिए
Solapur, Maharashtra:सोलापूर - मागणीच्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारण्यास प्राधान्य द्या - मंत्री जयकुमार गोरे Anchor - महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली बैठक मुंबईत पार पडली. या समितीचे सदस्य म्हणून निवड झालेले आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला नवीन स्मशान म्हणून संदर्भात विविध निर्देश दिले आहेत. राज्यातील स्मशानभूमीची सद्यस्थिती परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सूचनासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.0
0
Report
छत्रपती संभाजी नगर में नई कंपनी से कचरा संकलन शुरू, 29 वार्डों में साफ-सफाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात आजपासून कचरा संकलनाचं काम नवी कंपनी करणार आहे जुन्या कंपनीच्या बऱ्याच तक्रारी होत्या त्यामुळे त्यांचं कंत्राट रद्द झालं होतं आता नव्या कंपनीला कंत्राट दिलाय महत्त्वाचा म्हणजे ही कंपनी रोज कचरा उचलणार आहे छत्रपती संभाजी नगर शहरात कचरा संकलनासाठी आतापर्यंत २५० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च १० वर्षांसाठी होत होता. आता यासाठी १००० ते ११०० कोटींचा खर्च होणार आहे. गुजरातमधील एक कंपनीला कंत्राट दिले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी या कामाचा शुभारंभ झाला. २ मेपासून शहरातील २९ प्रभागांतून प्रत्यक्ष कचरा संकलन सुरू होणार आहे. कंपनीने काम सुरू करण्यापूर्वी सर्वेक्षण केले अहे. त्यात ५ लाख २ हजार मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. यात ४ लाख ५६ हजार ८०४ निवासी मालमत्ता, तर ४५ हजार ३७५ व्यावसायिक मालमत्ता आहेत. त्यानुसार कंपनीने रोडमॅप तयार केला. सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत २ शिफ्टमध्ये कचरा उचलला जाणार आहे. २९ प्रभागांतील प्रत्येक घराघरापर्यंत या गाड्या पोहोचतील. त्यासाठी घंटागाड्यांना रुट ठरवून दिला आहे. जीपीएसद्वारे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कंपनीने कंट्रोल रुमही उभारली आहे.0
0
Report
Advertisement
