Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:50:24
Dhule, Maharashtra:हुकुमशाही विरोधात लोकशाहीचा विजय झाल्याचं चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगत, येतो अभी झांकी है जिल्हा परिषद बाकी आहे, असे सांगत भाजपाला इशाराही दिला आहे. येणारा जिल्हा परिषदेवर कुठलाही अध्यक्ष झाला तरी चालेल, मात्र डॉ. गावित परिवाराचे अध्यक्ष होऊ देणार नाही, असं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निर्धार केला आहे. जिल्ह्यात एकही पालिकेवर भाजपाची सत्ता आली नसल्यामुळे भाजपाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं सल्लाही त्यांनी दिला आहे. नगरपालिकेवर गेल्या ४० वर्षापासून सत्तेत असलेले चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होण्याच्या मान मिळला असून, जिल्ह्यातील चारी नगरपालिकेंवर आमच्या विचाराची सत्ता आली है. भारतीय जनता पार्टीची गटबाजी त्यांना भोवली आहे. आम्ही पक्षापेक्षा मोठे आहोत असे काही लोकांना वाटत होतं, त्यांना चारी नगरपालिकेचे जनतेने त्यांची जागा दाखवली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या निशाणा पुन्हा एकदा डॉ. गावित परिवारास साधला,
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 23, 2025 02:50:06
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या गास गावात ख्रिसमस कार्निवलची धूम उंट, घोडे , डिजे मिरवणुकीचे आकर्षण प्रभू येशूच्या आगमनासाठी वसईकर सज्ज कार्निवलदरम्यान शांतता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश लहान सरगोडी संस्थेच्या वतीने आयोजन अँकर - वसईत ख्रिसमस कार्निवलची जल्लोषात धूम पाहायला मिळत असून, प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवासाठी वसईकर मोठ्या उत्साहात सज्ज झाले आहेत. नालासोपारा येथील गास गावातील लहान सरगोडी सामाजिक संस्थेच्या वतीने या भव्य ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलमध्ये जवळजवळ पाचशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावोगावी फिरणाऱ्या या कार्निवलमुळे संपूर्ण परिसर ख्रिसमसच्या आनंदात न्हाऊन निघाला होता. प्रभू येशू यांच्या जन्माचा मंगल संदेश घराघरात पोहोचावा, तसेच सर्वधर्म समभावाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्निवलदरम्यान शांतता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. उंट, घोडे, ढोल-ताशांच्या तालावर वाजणारा डीजे, तसेच विविध वेशभूषा परिधान केलेले तरुण-तरुणी हे या कार्निवलचे मुख्य आकर्षण ठरले. ख्रिसमस गीतांच्या सुरावटींमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून कार्निवलचे स्वागत केले. एकूणच, वसईतील या ख्रिसमस कार्निवलने सामाजिक एकोपा, सद्भावना आणि आनंदाचा संदेश देत प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:46:02
Dhule, Maharashtra:यात्रा में ७५६ घोड्यांच्या विक्रीतून चार कोटी २४ लाखाची उलाढाल झाली. यात सर्वाधिक मारवाड जातिवंत घोडे विकले गेले आहेत. या वर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी खरेदी केले आहेत. यात्रेच्या शेवटच्या टप्पा आला असल्याने, खरेदी विक्रीच्या व्यवहार तेजीत राहणार असून पाच कोटीच्या टप्पा पार करणार आयोजक जयपालसिंग रावल यांची माहिती दिली आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या उटी, कर्नाटकातील बेंगलोरु येथून व्यापारी येऊन सर्वाधिक घोडे घेऊन गेले आहेत. या ठिकाणी सर्वात स्वस्त आणि सर्व जातीचे घोडे मिळत असतात, यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेला येऊ लागले आहेत. सरंगखेड्याची यात्रा ही देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उंदे घोडे विक्रीसाठी येत असतात तर देशातील विविध राज्यातून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी येत असतात, त्यामुळे सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे या यात्रेत व्यवस्थित सुविधा मिळत असतात, कुठल्याही व्यापारीला त्रास होत नाही. त्यामुळे सर्वाधिक घोडे व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेत येत असतात, त्यामुळे यावर्षी ३,००० पेक्षा अधिक घोडे दाखल झाले होते, त्यापैकी ७५६ घोड्यांची विक्री झाली आहे तर चार कोटी २४ लाख ४० हजार पाचशे रुपयांची उलाढाल झाली आहे. यात्रेचा शेवटच्या टप्प्यात आले असल्याने पाच कोटीच्या टप्पा पार करेल आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 02:32:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रांजणगाव वाळूज महानगरातील 'मिनी धारावी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव परिसरात वाढत्या अवैध धंद्यांविरुद्ध ग्रामस्थांन रणशिंग फुंकले. विनापरवाना सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री आणि गल्लोगल्ली चालणारी अवैध दारू विक्री यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. याच्या निषेधासाठी पुकारलेल्या 'रांजणगाव बंद'ला सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविल्याने १०० टक्के बंद यशस्वी झाला. जर आठ दिवसात पोलीस प्रशासनात कारवाई केली नाही तर गाव बेमुदत संपूर्ण बंद राहील असा इशारा यावेळेस आंदोलकांनी दिला...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 02:31:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यातील २,०९० न्यायालयांची सुरक्षा मजबूत; ४४३ कोटींचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यात उच्च न्यायालय, खंडपीठांमध्ये ३८१ सुरक्षा कर्मचारी महाराष्ट्र शासनाने राज्यातील २०९० न्यायालयांत ८ हजार २८२ सुरक्षा कर्मचारी आणि ४४३ कोटी २४ लाख ८४ हजारांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आणि कोल्हापूरचे 'सर्किट बेंच' तसेच तेथे कार्यरत न्यायमूर्ती यांच्या निवासस्थाने यांना एकूण ३८१ सुरक्षा कर्मचारी पुरविले जाणार आहेत. यासाठी १५ कोटींच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. इतर न्यायालयांसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:18:09
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरत प्रशासनाने सर्वपक्षीय बैठक घेतली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि नियमात संपन्न व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यादरम्यान निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच राजकीय पक्षांच्या शंकानचे निरसन ही करण्यात आल. आयुक्तांनी यां सर्वपक्षीय बैठक आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे आदर्श आचारसंहिता पाळावी आवाहन केले. इच्छुक उमेदवारांसाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली असून, त्या ठिकाणी उमेदवारांना सर्व प्रकारच्या परवानगी घेता येणार आहेत. त्याचबरोबर दररोजचाही हिशोब देखील सादर करावा लागणार आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 23, 2025 02:15:13
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, सुमारे 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेय... ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते..25 डिसेंम्बरसाठी अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जाने Januarपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी सध्या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या गाण्यांनी दुमदुमून गेली.गेल्या आठवडाभरापासून या सर्व चर्चेसमधून कॅरोल पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर करतांना दिसत आहे..
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:02:26
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेमध्ये महायुती करण्यासाठी प्राथमिक बैठक संपन्न झालेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित, भाजपा आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार राम भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. यावेळेस दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महायुतीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे युती झाली तर भाजप आणि शिवसेनेची होईल अशी सध्याची स्थिती आहे. युती संदर्भात चार सदस्य समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये दोन जण भाजपके तर दोन जण शिवसेनेचे असणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. युतीमध्ये निवडणूक लढावे असा प्रयत्न असून, त्यासाठी बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रावल यांनी यावेळी स्पष्ट केल.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 22, 2025 16:47:18
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 15:02:47
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बालापुर शहरात आज भरवस्तीत एक थरारक घटना घडली. चालती ओमनी गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीतून धूर आणि ज्वाळा दिसताच नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आगीत ओमनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रमुख माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top