445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमरराती के राजेंद्र कॉलनी हत्या: सीसीटीवी फुटेज सामने, चार आरोपी
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या राजेंद्र कॉलनीत हत्या झाल्याचे प्रकरण; हत्येचे सीसीटीव्ही झी 24 तास च्या हाती. अँकर: अमरावतीच्या राजेंद्र कॉलनीत हत्या झाल्याचे प्रकरणात सीसीटीव्ही पुढे आल्याने पुन्हा एकदा खडबड उडाली आहे. थेट हाताचा पंजा छाटत amaravatiच्या राजेंद्र कॉलनी तरुणाची हत्या करण्यात आली होती. मृतक आणि आरोपींमध्ये प्रेम प्रकरणातून काही दिवसापासून वाद सुरू होता. याच वादातून ही घटना घडल्याची पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी ही माहिती दिली आहे. प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी हे सर्व आरोपी आणि मृतक जमले असता चर्चेदरम्यान वादाचे रूपांतर थेट झाले. हत्तेत झाल्याने एकच खडबड उडाली आहे. मृतकाचे नाव शेख अफाख शेख अकिल वय २४ वर्ष राहणार ताज नगर येथील रहिवासी असून घटनेत एकूण चार आरोपी निष्पन्न, तीन आरोपी अल्पवयीन आहे. सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्याच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली आहे.0
0
Report
बेमुदत बंद स्थगित, आंदोलन जारी; चौथे दिन शहर पूर्वपद पर लौटेगा श्रीरामपूर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर बेमुदत बंद स्थगित... सर्वपक्षीय महामोर्चा नंतर बंदचा निर्णय मागे... छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर झालेल्या सभेत घोषणा... बंद स्थगित केला असला तरी विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार.. अखेर चौथ्या दिवशी शहर येणार पूर्वपदावर... महामोर्चात आजी माजी आमदारांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी सहभागी... मयत आकाशच्या नातेवाईकांनी केली होती बंद मागे घेण्यासाठी विनंती... बंद मागे घेतला असला तरी मकोका अंतर्गत कारवाई करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार...0
0
Report
श्रीरामपूर हत्या: बेग टोळीसह भूमिका पर नया बवाल, सागर बेग ने दी प्रतिउत्तर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर शहरात 11 जुलैला दुपारी किरकोळ कारणातून आकाश दुबय्या हा हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली.. या हत्येचे पडसाद गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूर शहरात उमटत आहे.. गेल्या तीन दिवसांपासून शहर बंद ठेवत सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक एकवटले आहेत...वाढत्या गुन्हेगारीत बेग टोळीचा हात असल्याचा आरोप श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केल्यानंतर आता हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.. केवळ बेग टोळी नाव घेऊन आरोप करण्यापेक्षा आमदाराने बेग टोळीच्या सदस्यांची नावे सांगून त्यांचा संबंध या हत्याकांडात कुठे आला हे जाहीर करण्याची मागणी केली आहे... श्रीरामपूर शहरात 11 जुलैला व्यावसायिकाच्या हत्येनंतर गेल्या तीन दिवसांपासून शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून आज महामोर्चा देखील काढण्यात येणार आहे... श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीत बेग टोळीचा हात असल्याचा आरोप स्थानिक आमदार हेमंत ओगले यांनी केला.. आणि हा आरोप करताना त्यांचा रोष होता श्रीरामपूर शहरातील हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्याकडे... यानंतर सागर बेग यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिलय.. सागर बेग पत्रकार परिषद मुद्दे शिंदे गटाचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटनेचे नेते सागर बेग यांच्या पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या आमदारावर गंभीर आरोप... व्यवसायिक आकाश दुबैया यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे फोटो आणि व्हिडिओ भाजपच्या नेत्यांबरोबर... भाजपच्या नेत्यांवर कोणीही बोलणार नाही , मला ज्या पद्धतीने फोटो असल्यामुळे जबाबदार धरत आहात त्याच पद्धतीने त्यांच्यावर ही कारवाई करा... आमाडार बेग टोळी आरोप माझ्यावर गुन्हे नव्हते हे मी सांगणार नाही.. अनेक होते पण मी निर्दोष झालोय..माझ्यावर आतापर्यंत 18 गुन्हे दाखल होते त्यात केवळ चार गुन्हे न्यायालयात प्रलंबित.. इतर गुन्ह्यात मी निर्दोष झालोय.. माझ्या भावावर देखील अवघे चार गुन्हे आहेत आज.. मी काही कुठला अतिरेकी नाही... आमदाराचा अभ्यास आहे तर केवळ बेग टोळी बेग टोळी आरोप करण्यापेक्षा सदस्यांची नावे सांगावी.. कोण लोक या घटनेशी निगडीत आहे.. कॉल झालेत काय आमचे आरोपींशी.. अस काही असेल तर आरोपी करा आम्हाला.. त्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांचे दोन नंबरचे धंदे... या घटनेत पकडलेल्या आरोपींशी माझा कुठेही संबंध नाही... मोर्चा काढल्यानंतर गाव उघडले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू.. आजही ते करू शकलो असतो मात्र पुन्हा आमचे नाव येऊ नये म्हणून आम्ही ताकद वापरतो असा आरोप केला गेला असता.. या तीन आरोपींमध्ये एक भाजपच्या नेत्याच्या गाडीवर रॅलीत पूर्वी फिरला आहे.. मग त्या नेत्याला आरोपी करणार का ? आमच्या सोबत फोटो आला तर गुंड आणि तुमच्यासोबत असला की सुशिक्षित..? గ్రाफिक्स - कोण आहे सागर बेग.. सागर बेग गेल्या चार वर्षापासून हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख... मंत्री नितेश राणे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय... गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार.. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश.. आमदार संग्राम जगताप व सागर बेग यांची अनेक हिंदुत्ववादी आक्रोश मोर्चात एकत्र सभा... चार वर्षापूर्वी अनेक वेगवेगळे 18 गुन्हे दाखल.. त्यातील 14 गुन्ह्यात निर्दोष मुक्तता तर इतर गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेत... गेल्या चार वर्षांत कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख... महिनाभरापूर्वी पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची सागर बेग यांची माहिती...0
0
Report
Advertisement
भेसळ रोकथाम से मुंबई- पुणे में शुद्ध दूध की मांग बढ़ी; गोकुळ को फायदा
Kolhapur, Maharashtra:राज्यात दुधातील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईचा परिणाम आता बाजारपेठेत दिसू लागला. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये भेसळयुक्त दुधाचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांचा विश्वास दर्जेदार दुधाकडे वाढला आहे. त्याचा थेट फायदा शुद्ध दूध विक्री करणार्या संघाला होत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील एका गोकुळ दुधाच्या मागणीत दररोज दीड ते दोन लाख लिटरची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे, वाढत्या मागणीचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. राज्यात सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे दूध व्यवसायात मोठे बदल होत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध ठिकाणी छापेमारी करून भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात भेळसयुक्त दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. याचाच परिणाम म्हणून ग्राहकांचा ओढा आता दर्जेदार आणि विश्वासार्ह दूध ब्रँडकडे वाढला आहे. त्यामध्ये एका गोकुळ दूध संघाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. सध्या मुंबईत गोकुळचे दररोज १० ते ११ लाख लिटर, तर पुण्यात ५ ते ६ लाख लिटर दूध विकले जात आहे. गेल्या काही दिवसांत या विक्रीमध्ये आणखी दीड ते दोन लाख लिटरची भर पडली आहे. गोकुळ दूध संघाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही भविष्यात राज्यात दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत भेसळयुक्त दूध विकणाऱ्या अनेकांवर कारवाई झाल्यामुळे बाजारातील पुरवठा घटला आहे. त्यामुळे दर्जेदार दूध पुरवणाऱ्या सहकारी दूध संघांवर आता अधिक जबाबदारी आली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गोकुळसारख्या संघांना दूध संकलनात वाढ करावी लागत असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, गोकुळच्या वाढत्या मागणीमागे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. मात्र उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना दूध दरात अपेक्षित वाढ होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. दर्जेदार दूध देण्यासाठी जनावरांचा चारा, औषधे आणि देखभाल यावर मोठा खर्च करावा लागत असल्यामुळे गोकुळच्या दुधाची मागणी वाढत असली तरी त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांनाही मिळायला हवा, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे. राज्यात सध्या दुधाची मागणी उत्पादनापेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत भेसळमुक्त आणि दर्जेदार दूध नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर सहकारी दूध संघांचे संकलन वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर पैसे आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.0
0
Report
डोंबिवली के शास्त्रीनगर अस्पताल में दवाएं उपलब्ध नहीं, गरीब मरीजों को राहत नहीं मिली
Kalyan, Maharashtra:"आमच्याकडे औषधं नाहीत... बाहेरून घ्या!" डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात औषधं उपलब्ध नाही ? त्वचेच्या आजाराने त्रस्त दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी डॉक्टरांनी लिहिली १२ औषधे रुग्णालयातील मेडिकलमध्ये एकही उपलब्ध नसल्याचा वडिलांचा दावा पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार समोर टिटवाळा परिसरात राहणारे जगदीश राठोड आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन आज डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात आले . जगदीश यांचा दोन वर्षाचा मुलगा वेदांश याला त्वचेचा त्रास होता त्यावर उपचार करण्यासाठी जगदीश यांनी आपल्या मुलाला शास्त्रीनगर रुग्णालयात आणलं डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदांशाला तब्बल 12 औषध लिहून दिली ही औषधा घेण्यासाठी वेदांत चे वडील जगदीश हे रुग्णालयातील मेडिकलमध्ये गेले मात्र तिकडे यामधील कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने ही औषध बाहेरून घ्या असे सांगण्यात आले. गोरगरीब गरजू रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयांमध्ये साधा औषधांचा साठाही उपलब्ध नसल्याने आता रुग्णांमध्ये रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येतोय .या घटनेमुळे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार समोर आला जगदीश राठोड ( मुलाचा वडील )0
0
Report
वाशीम के कॉलेज में मुख्यमंत्री समेत मंत्रियों की शपथ समारोह आयोजित
Washim, Maharashtra:अँकर:महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यभरात करिअर संसद शपथ विधी सोहळा प्रत्येक महाविद्यालयात राबविण्यात आला त्यानुसार आज वाशिम येथील ऍड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयात सुद्धा विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री पदासह विविध खात्याचे मंत्री पदाची शपथ देण्यात आली यावेळी महाविद्यालयात प्रति मंत्री मंडळ स्थापन करण्यात आले,या शपथ विधी सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्तिथी होती..0
0
Report
Advertisement
अमरावती महापालिका में साफ-सफाई मुद्दे पर MIM का आक्रामक प्रदर्शन, कचरा फेंका
Amravati, Maharashtra:अमरावती महानगरपालिका में स्वच्छता के मुद्दे पर एमआईएम आक्रामक हो उठा। सभा के दौरान महापालिका के मुख्य प्रवेशद्वार पर एमआईएम के कार्यकर्ताओं ने कचरा फेंका और जोरदार घोषणाबाजी की। पांच दिन से सफाई कर्मचारियों के वेतन न मिल पाने से वे हड़ताल पर हैं, शहर में सफाई व्यवस्था बिगड़ी है, दुर्गंध फैल रही है और रोग हो सकते हैं। आंदोलन जारी है。0
0
Report
शिंदे गुट की गुंडागिरी पर सवाल, सुरक्षा की मांग तेज
Shirdi, Maharashtra:माझ्या डोळ्यादेखत माझ्या मुलाची निर्घुण हत्या.. माझ्यावर ओढवलेल्या दुःखात श्रीरामपूरकरांनी माझी खूप मदत केली.. अशी घटना परत घडली नाही पाहिजे.. माझ्या कुटुं布ाला आता संरक्षणाची गरज... मुलगा वारल्यावर बापाची अवस्था काय होते हे ज्यांचा मुलगा वारला त्या बापाला विचारा... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा वारला आहे , त्यांना विचारा बापाचं दुःख काय असतं... शिंदे गटाच्या माजी आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना माझा प्रश्न , अश्या खुनी लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात कसे ठेवता... एकनाथ शिंदे यांचे राज्यात खूप चांगलं काम मात्र या लोकांची गुंडगिरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची तुमची जबाबदारी... शिंदेच्या शिवसेनेत असणाऱ्या या गुंडाचा एन्काऊंटर करा , हद्दपार करा आणि पक्षातून काढून टाका... शिंदे गटात असलेल्या सागर बेगवर नाव न घेता निशाणा... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मयत आकाश दुबैया याच्या वडिलांची आर्त हाक...0
0
Report
कर्जमाफी के नए फैसले पर किसान सभाओं की आलोचना, 2 लाख रुपये प्रोत्साहन की मांग
Shirdi, Maharashtra:राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किसान संघाच्या वतीने सत्कार होत आहे. भाजपशी संलग्न असलेल्या किसान संघाकडून हा गौरव करण्यात येत असतानाच, दुसरीकडे किसान सभेने सरकारवर टीका केली आहे. मागील कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा कर्जमाफी देण्याचा निर्णय हा पहिल्यांदाच घेतल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचा दावा किसान सभेने केला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये अजूनही नाराजी असल्याचे सांगत, ही रक्कम किमान दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी केलीय...0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में वेतन के गुस्से ने ट्रक को सिलिंडर से भर कर चुरा लिया
Chandrapur, Maharashtra:१८ हजारांच्या थकीत पगाराचा संताप, चंद्रपुरात ट्रक चालकाने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवला, २४ तासांत पोलिसांचा मोठा उलगडा, 2 आरोपी अटकेत, 1 फरार अँकर : मेहनतीचा घाम गाळूनही वेळेवर पगार न मिळाल्यास एखादा कर्मचारी किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण चंद्रपुरात समोर आलं आहे. पत्नीच्या बाळंतपणासाठी खर्च म्हणून आवश्यक असलेली १८ हजार रुपयांचे थकीत वेतनाची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवून नेला. एवढंच नाही, तर ट्रकमधील गॅस सिलिंडर विकून मालकाला आर्थिक फटका देण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलीस तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा करत राजेंद्र काळे आणि कुणाल घुरुडे या चंद्रपुरात राहणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. चोरीला गेलेले 342 गॅस सिलिंडर, विक्रीतून मिळालेली लाखो रुपयांची रोकड आणि ट्रक जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील सिलिंडर विकत घेणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा येथील मोहित पोद्दार नामक आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. मेहनतीचा मोबदला वेळेवर न मिळाल्याने निर्माण झालेला संताप आणि त्यातून घडलेला हा गुन्हा सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.0
0
Report
बालापुर नगर परिषद के दो पार्षद पद रिक्त, जाति सत्यापन मामले में अयोग्य घोषित
Akola, Maharashtra:Balapur Nagar Parishad के दो पार्षद पद रिक्त, जाति सत्यापन मामले में अयोग्य घोषित0
0
Report
वाशीम में 1135 बोगस सोयाबीन बीज से किसानों को नुकसान, बारिश नहीं
Washim, Maharashtra:वाशीम:\n\nअँकर:वाशीम जिल्ह्यात 1135 वाणाच्या बोगस सोयाबीन बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तामसी येथील शेतकरी अर्जुन कव्हर यांनी 26 जून रोजी केलीली पेरणी उगवली नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पाऊसाने खंड दिल्याने दुबार पेरणीनंतरही पीक उगवण्याची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वारंवार पेरणीमुळे बियाणे, मशागत आणि मजुरीचा वाढलेला खर्च शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहे.0
0
Report
Advertisement
खेड में पूल बहने से एसटी बस सेवा बंद, छात्र पैदल 5–10 किमी
Shirur, Maharashtra:खेड/पुणे अतिवृष्टीने वेताळे ओढ्यातला पूल वाहून गेला असून उर्वरित पूलही धोकादायक ठरला आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद केली आहे। धोकादायक पूलामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद ठेवली आहे। अनेक विद्यार्थ्यांना दररोज पाच ते दहा किलोमीटर पायी चालत शाळा- महाविद्यालय गाठावे लागत आहे। शेतकऱ्यांनाही शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। आजारी नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती महिलांनाही अडचण. एकीकडे धोकादायक पूल दुसरीकडे बंद एसटी सेवा, नागरिक विद्यार्थी अडकले।0
0
Report
मीरा रोड पर स्कूल इमारत के टॉप फ्लोर में आग, दमकल ने जल्दी नियंत्रण पाया
Vasai-Virar, Maharashtra:एन.एल. डालमिया शाळेच्या इमारतीच्या टॉप फ्लोअरला आग सुदैवाने जीवितहानी टळली मीरा रोड येथील हरे कृष्णा मंदिराजवळ शाळेच्या इमारतीच्या टॉप फ्लोअरला बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी वेगाने कारवाई करत अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी कूलिंगचे काम सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. प्राथमिकल माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे. सुदैवाने ही घटना शाळा सुरू होण्यापूर्वी घडल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या टॉप फ्लोअरवरील काही भागाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, नुकसानाचे नेमके स्वरूप आणि कारणांचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.0
0
Report
अनसिंग–रामनगर तांडा मार्ग पर पुल व सड़क निर्माण की मांग, उपवास तीसरे दिन जारी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील अनसिंगजवळील रामनगर तांड्यातील ग्रामस्थांनी पक्का रस्ता आणि पुलाच्या बांधकामाच्या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.अनसिंग–रामनगर तांडा मार्गावरील तुटलेला पूल व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची त्यांची मागणी आहे. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे,रुग्णवाहिकेला तांड्यापर्यंत पोहोचणे आणि पावसाळ्यात वाहतूक करणे अत्यंत कठीण होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी सांगितले.मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
