icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आमदार कथोरे पर गैंगस्टर को मारने की सुपारी देने का आरोप; पनवेलकर ने दावा

Ambernath, Maharashtra:आमदार किसन कथोरे यांच्या कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप अंबरनाथचे उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांनी केलाय. स्वतः लकडावाला याने जेलमधून ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत याबाबतची माहिती दिल्याचा दावा पनवेलकरांनी केला असून या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्योजक विश्वनाथ पनवेलकर आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. या सगळ्या आरोपांबाबत अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांना विचारलं असता त्यांनी हे संवेदनशील प्रकरण असल्याचं सांगत काहीही बोलण्यास नकार दिलाय. तर आमदार किसन कथोरे हे मुंबईला असल्यानं त्यांनी अद्याप आपली बाजू मांडलेली नाही. या आरोपांवर आता आमदार किसन कथोरे काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

वाशीम के किसानों को महाभूमी साइट के कारण कर्ज प्रस्ताव नहीं मिल पा रहे

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असतानाच डिजिटल सातबाऱ्याच्या अडचणींमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सातबारा, आठ अ व इतर आवश्यक कागदपत्रांसाठी शेतकरी सेतु केंद्रावर जात असले तरी महाभूमी वेबसाईट बंद राहणे व सुरू झाल्यानंतरही व्यवस्थित काम न करणे, याामुळे कागदपत्रे मिळण्यात अडथळे येत आहेत.या परिस्थितीमुळे बँका कर्ज प्रस्ताव स्वीकारत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.नियमित कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने महाभूमी साईट तातडीने सुरळीत करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

कोल्हापुर सर्किट बैंच में गोकुळ दूध संघ मामले में आज सुनवाई, चुनाव स्थिति स्पष्ट होगी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ मधील दूध संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बँक मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिके संदर्भात आज सुनावणी होणार आहे.. दूध संघातील संस्था पात्र अपात्र ठरविण्यासह आणि अन्य याचिकांची सुनावणी एकत्रित होण्याची शक्यता आहे. गोकुळची निवडणूक तोंਡावर असताना सर्किट बेंच मध्ये एक एक करून याचिका दाखल होत आहे. न्यायालयाने अद्याप निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही, तरीही दूध संस्थांकडून ठराव मागणीसह निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. मे महिन्यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे, त्यामुळे गोकुळ दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणुक वेळेवर होणार की प्रशासक राज येणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार असं सगळे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में फल-भाजी विक्रेताओं के खिलाफ पुलिस ने कार्रवाई शुरू कर दी

Washim, Maharashtra:वाशीम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौक परिसरात फळ व भाजीपाला विक्रेत्यांमुळे राहदारीत वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची समस्या समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वाशीम शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांवर, तसेच हातगाडीधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधित सर्व हातगाड्या जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सुरळीत प्रवास करता यावा, याासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
0
0
Report

वैजापुर में भीषण सड़क दुर्घटना: 58 वर्षीय व्यक्ति की मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर एकनाथ पठाडे, वय 58 वर्षे, रा. सवंदगाव हे आपल्या दुचाकीने जात असताना जरुळ फाटा येथे भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पठाडे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर उपस्थितांनी तत्काळ मदत करत जखमी पठाडे यांना रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
0
0
Report
Advertisement

संजय शिरसाट के पुत्र के लिलाव मामले पर समिति की रिपोर्ट सरकार के पास

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने रेल्वे स्टेशन रोडवरील जागा व हॉटेल लिलावात खरेदी केल्याप्रकरणी नियुक्त उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या या लिलाव प्रक्रियेत दबावामुळे अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हॉटेल आणि लगतच्या जागेचे बाजारमूल्य १५० कोटींच्या घरात असताना मंत्र्यांच्या दबावामुळे ती ६५ कोटींत विकली गेल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता तर विधानसभेत हा मुद्दा गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शिरसाट यांनी मुलाला माघार घेण्यास सांगितले होते. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील ८ सदस्यांच्या समितीने तांत्रिक बाबी आणि पारदर्शकतेची तपासणी केली आहे. हा अहवाल आता महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून त्यावर सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report

वाशिम के 21 स्कूलों को अनुदान समाप्ति खतरा, संचालक खुद खर्च पर चलेंगे

Washim, Maharashtra:21 शाळांमधील 39 तुकड्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.शासनाकडून वेळोवेळी मूल्यांकन करूनही या शाळांना शासकीय अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.राज्य शासनाने गुरुवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला.या निर्णयानुसार, संबंधित शाळांना मान्यता टिकवून ठेवायची असल्यास संस्थाचालकांना त्या शाळा स्वतःच्या खर्चावर,म्हणजेच स्वयंअर्थसहायित तत्त्वावर चालवाव्या लागणार आहेत.यासाठी केवळ एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित शाळांतील शिक्षक,कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में भीषण गर्मी, अगले हफ्ते पारा 39 डिग्री तक पहुँचने की संभावना

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरावरील अवकाळी पावसाचे ढग ओसरल्यानंतर आता उन्हाची तीव्रता वेगाने वाढू लागली आहे. मंगळवारी शहराचे किमान तापमान २०.४, तर कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. गेल्या पाच दिवसांपासून शहराचा पारा ३५ अंशांच्या घरात असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात यात आणखी ३ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. ७ ते १२ एप्रिल या कालावधीत कमाल तापमान ३६ ते ३९ अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी किमान तापमान २२ अंशांच्या पार गेले होते. त्यानंतर त्यात काही अंशी घट झाली असली तरी आता पुन्हा किमान तापमान २१ अंशांपर्यंत पोहोचणार आहे. १२ एप्रिलपर्यंत शहराचा पारा ३९ अंशांवर जाण्याची शक्यता असल्याने शहरवासीयांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर के पास दारू से भरे ट्रक का घाटी पर पलटना; चालक गंभीर घायल

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जवळ असलेल्या चास येथे दारूची वाहतूक करणारा एक आयशर ट्रक अवघड घाटात पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा ट्रक नगरकडून पुण्याच्या दिशेने दारूचा साठा घेऊन जात होता. चास आणि कामगारगावच्या मधल्या घाट परिसरात चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. घाटातील धोकादायक वळणावर ट्रक अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या भीषण अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने बाहेर काढून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
0
0
Report

Ashok Kharat के खिलाफ 11 और शिकायतें, पुलिस ने जांच तेज कर दी

Nashik, Maharashtra:भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 11 पीडित महिलांनी खरातविरोधात पोलिसांत तक्रार दिली. भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी केलेल्या आवाहनाला साद देत आणखी ११ पीडितांनी खरातच्या विरोधात पोलिसांत धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. खरातने 'ऊर्जा आणि मन, शरीरशांती पूजां'च्या नावाखाल्‍या लैंगिक शोषण खरातविरुद्ध महिलांच्या एकूण १९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. लैंगिक शोषणाच्या आठ गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, २०१८ पासून खरातच्या जाळ्यात अडकलेल्या या ११ पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. व्हिडिओ नसले तरी अन्य तांत्रिक पुरावे आणि दबावाचा वापर करून खरातने शोषण केल्याची तक्रार पीडित महिलांनी दिलीये... समाजातील प्रतिष्ठेपोटी आजपर्यंत या महिला शांत होत्या. आता तपास पथकाने केलेल्या आवाहनानंतर या महिला तक्रार देण्यास पुढे आल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलंय...
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर की नई जल आपूर्ति योजना में प्रमुख प्रगति, पर वाल्व लीकेज से पंपिंग रोक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या नव्या पाणीपुरवठा योजनेने मंगळवारी ३८ किमीपैकी ३५.३०० किमीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. मात्र, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापासून अवघ्या २ किमी अंतरावर असताना ढोरकीन येथील स्कॉव्हर व्हॉल्वला गळती लागली. पाइपलाइनमधील दाबामुळे हा व्हॉल्व्ह फुटला असून यामुळे पंपिंग तातडीने थांबवावे लागले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर या तांत्रिक बिघाडामुळे सुमारे ३ कोटी लिटर पाणी वाया गेले, आता गुरुवारी दुरुस्ती करून शुक्रवारी पुन्हा पंपिंग सुरू केले जाणार आहे..
0
0
Report
Advertisement

लातूर में विनयभंग के आरोपों के बारे में किसान ने आत्महत्या की; पुलिस पर धमकी-घोटाला आरोप

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... पत्नीच्या विनयभंग प्रकरणात न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या.... जळकोटमध्ये ६ जणांवर गुन्हा दाखल.... आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने हातावर लिहिले पोलिसाचे नाव.... तक्रार असूनही गुन्हा नोंद न केल्याचा गंभीर आरोप.... विनयभंग प्रकरणात धमक्या व पैशांची मागणी केल्याचा आरोप.... मानसिक तणावातून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय.... लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे… पत्नीच्या विनयभंगाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, या मानसिक तणावातून एका शेतकऱ्याने आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे… विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून तसेच संबंधित पोलिसाचे नाव हातावर लिहून आपली वेदना व्यक्त केली… या प्रकरणी जळकोट पोलिस ठाण्यात २ पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण ६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे… २१ फेब्रुवारी रोजी मृत शेतकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग झाल्याचा आरोप असून, याबाबत तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता… उलट तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे… तसेच, गुन्हा नोंदवण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप समोर आला आहे… या सर्व मानसिक तणावाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली… दरम्यान, या प्रकरणी संबंधित आरोपीसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
0
0
Report

नगर निगम की 50 स्कूलों में 865 नए बच्चों ने बालवाड़ी-प्रथम प्रवेश लिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या ५० शाळांमध्ये मंगळवारी ८६५ नवीन विद्यार्थ्यांनी बालवाडी आणि पहिलीमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशोत्सवासाठी सर्वच शाळांमध्ये जोरदार तयार करण्यात आली होती. गुलाबपुष्प, पुष्प वर्षाव करीत फुगे, पेन्सील देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मनपा शाळेपासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सीएसआर निधीतून सायकल देण्याची घोषणा आयुक्त अमोल येडगे यांनी केली. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. बॅण्ड वाजवून, पुष्प वर्षात करीत काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे उंची, वजन आणि त्यांच्या पाऊलखुणा घेण्यात आल्या.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top