445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में NSUI ने केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग पर कैंडल मार्च
Nagpur, Maharashtra:नागपूर - केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चच - नागपुरातील रामनगर चौक ते लक्ष्मी भुवन चौकापर्यंत काढण्यात आला कॅनडल मार्च.... - NSUI महाराष्ट्र प्रदेश सचिव कुणाल चौधरी यांच्या नेतृत्वात कँडल मार्चचे आयोजन..... काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधेसह पदाधिकारी झाले सहभागी...0
0
Report
सुभाष मैदान न मिलने पर कांग्रेस आंदोलन के साथ सड़क पर उतरेगी
Kalyan, Maharashtra:आंदोलनासाठी मागितलेले मैदान स्पर्धेसाठी न दिल्याने काँग्रेस संतप्त मैदान न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, काँगेसचा इशारा दिल्लीच्या जंतर मंतर वर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कॉक्रोज जनता पार्टी और काँग्रेसच्या वतीने २५ जुलैला आंदोलन केल जाणार आहे. यासाठी आयोजकांनी महापालिकेकडे सुभाष मैदान, फडके मैदान किंवा मॅक्सी ग्राउंड ची मागणी केली होती. Vásापैकी सुभाष मैदानाला परवानगी नाकारल्यानंतर फडके मैदान उपलब्ध होईल असं आयोजकांना वाटत होतं, मात्र हे मैदान Cricket स्पर्धेसाठी बुक झाल्याची माहिती आयोजकांना मिळाली. त्यामुळे काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी बाबत संताप व्यक्त केलाय. मैदान मिळाल नाही तर काँग्रेस आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावर उतरेल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन त्यासाठी जबाबदार असेल असं काँग्रेसने सांगितले आहे. फडके मैदान जरी आंदोलनाला दिल नाही तरी तिथेच आंदोलन होणार असा निर्धार कोक्रोज जनता पार्टीने केलाय. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण बाजारपेठ पोलिसांनी आयोजकांना नोटीसा बजावल्या आहेत.0
0
Report
नवी मुंबई के हजारों छात्र धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग पर उतर आए
Navi Mumbai, Maharashtra:केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेावा या मागणीसाठी नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी एकत्र जमले होते. वाशी मधील जुहूचौपाटी याठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत पायी मोर्चा काढलाय. ज्या विद्यार्थ्यांनी यंत्रणेच्या चुकीमुळे आत्महत्या केलेय त्याविद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेय. या शांतता पूर्ण मोर्चात विद्यार्थ्यांनी सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त करत ही व्यवस्था सुधारली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.0
0
Report
Advertisement
गोदावरी नदी में 94 हजार क्यूसेस विसर्जन से निफ़ाड-नाशिक में येलो अलर्ट जारी
Niphad, Maharashtra:निफाड ब्रेक नांदूर मधमेश्वर धरणातून विक्रमी 94 हजार क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहर, चांदोरी, सायखेडा नांदूर मधमेश्वर या भावना येलो अलर्ट नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर सह गोदावरी नदी काठच्या गावांना येलो अलर्ट इशारा रौद्ररूप धारण केलेल्या गोदावरी नदीचे दृश्य0
0
Report
अकोला में छात्र परीक्षा-भर्ती भ्रष्टाचार के विरोध में साखळी भूख हड़ताल आज शुरू
Akola, Maharashtra:देशभरातील विद्यार्थ्यांवरील वाढता अन्याय, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, पेपरफुटी, भ्रष्टाचार, भरतीतील विलंब, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ अकोल्यातील विद्यार्थ्यांनी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे साखळी अन्नत्याग (उपोषण) आंदोलन प्रारंभ करणार आहे.यापूर्वी संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तपणे शांततापूर्ण धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाराऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन सादर केले. मात्र, मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाची पुढील पायरी म्हणून साखळी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाअंतर्गत दररोज एक विद्यार्थी २४ तास अन्नत्याग करून उपोषणास बसणार असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन अखंड सुरू राहणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
यवतमाळ के पुसदा में आषाढी एकादशी पर भक्तिमय उमंग, छात्रों ने पारंपरिक वारी निकाली
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसदमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय उत्साह बघायला मिळाला. समर्थ इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत दिंडी व वारी काढली. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद अनुभवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदायाची संस्कृती, भक्ती, एकता आणि सेवेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आले.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में स्टोन आर्ट से विठ्ठल का जीवंत रूप सामने
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आषाढी एकादशी विशेष: दगडात वसला विठू माऊली! रत्नागिरीतील अजय पारकर यांच्या अनोखी 'स्टोन आर्ट' आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठलभक्तीचा एक अनोखा आणि मनमोहक आविष्कार रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. येथील प्रसिद्ध स्टोन आर्टिस्ट अजय पारकर यांनी साध्या दगडावर पांडुरंगाचे अत्यंत रेखीव आणि सुंदर चित्र साकारले आहे. अजय पारकर यांनी आपल्या या 'स्टोन आर्ट'च्या माध्यमातून विठू माऊलीचे रूप दगडावर जिवंत केले असून, त्यांच्या या कल्पक कलाकृतीचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे..0
0
Report
आकांक्षा चतुर्वेदी की माँ ने शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग दोहराई
Nagpur, Maharashtra:नागपूर - नेiit पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या नागपूरच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी ची आई नीलम चतुर्वेदी यांनी नागपूरातील संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. नागपूरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मागण्या मान्य होईपर्यंत दररोज आंदोलनात सहभागी होणार असून, गरज पडल्यास दिल्लीतील आंदोलनातही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर आजपर्यंत सरकारकडून कोणीही भेटण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आले नसल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बाईट – नीलम चतुर्वेदी (आकांक्षा चतुर्वेदीची आई)0
0
Report
नागपूर जेल में ड्रग्स तस्करी गिरोह का पर्दाफाश, जेलकर्मी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रक्षकाकडून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचे उघडकीस - कारागृहातील कैद्यांसाठी विविध प्रकारच्या ड्रग्जची तस्करी करताना कारागृहातील एका कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी अटक केलीय - तपासणीत त्याच्या आंतरराष्ट्रात अंतवस्त्रात चरस आणि नशेच्या गोळ्या तसेच सर्जिकल ब्लेड आढळले - या घडामोडीमुळे जेल प्रशासनात खळबळ निर्माण झालीय. - आरोपीचे नाव विकास सहारे असून तो गेल्यावर्षी कारागृह प्रशासनात रुजू झाला होता - आरोपी शिपायाचा सीडीआर आणि बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे - ड्रग्जच्या बदल्यात त्याला कुणाकडून किती रक्कम मिळत होती, त्याचाही उलगडा बँक खात्याच्या तपासणीतून उघड होणार आहे. - आरोपी धारदार पाच सर्जिकल ब्लेड कुणाला देणार होता आणि त्या आरोपींचा या ब्लेडचा वापर कशासाठी होणार होता, हा गंभीर प्रश्न - या ब्लेडच्या माध्यमातून कारागृहात गैंगवॉर होणार होते का, की आणखी काही, त्याची चौकशी आता पोलिस करत आहेत.0
0
Report
Advertisement
सोनू सूद के घर मंगल किरण में विषहीन सांप मिलने से इलाके में हड़कंप
Mumbai, Maharashtra:बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांच्या 'मंगल किरण' या राहत्या घरी आज दुपारी धामण जातीचा बिनविषारी सर्प आढळून आल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र श्री. विकी दुबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अत्यंत सावधगिरीने धामण जातीच्या सर्पाला सुरक्षितरीत्या पकडले. वेळेच करण्यात आलेल्या या बचावकारण्यासाठी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यानंतर सर्पाला वन्यजीव संरक्षणाच्या नियमांनुसार सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी नेण्यात आले.0
0
Report
रविंद्र चव्हाण के हाथों कोरेगाव में भूमिपूजन, 80 से अधिक गांवों को लाभ
Satara, Maharashtra:सातारा:कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यात लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेच्या भूमिपूजन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी परिसरातील ८० हून अधिक दुष्काळग्रस्त गावांना या योजनेचा थेट फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार महेश शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम येत्या ११ महिन्यांच्या आत पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकार राज्यातील सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी NEET प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणात १३ आरोपींना अटक झाली असून भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सोमवारी कॅबिनेटमध्ये कायद्यात कठोर बदल केले जातील, अशी माहिती ही त्यांनी दिली。0
0
Report
अमरावती में SC उपवर्गीकरण की मांग पर मातंग समाज का मोर्चा
Amravati, Maharashtra:SC के आरक्षण में उपवर्गीकरण लागू करने की मांग के लिए अमरावती में भव्य मोर्चा किया गया; शहर के nook-कन्ने क्षेत्रों में पुलिस का बड़ा बंदोबस्त तैनात रहा. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक से जिलाधिकारी कार्यालय तक निकला और इस दौरान बॅरिकेड्स लगा कर मोर्चा रोकने प्रयास किए गए. मातंग समाज ने अनुसूचित जाति में अलग आरक्षण देकर उपवर्गीकरण लागू करने की भी मांग रखी.0
0
Report
Advertisement
सातारा: सात दुभत्या म्हशी मृत, पशु चिकित्सक टीम ने शुरू की जांच
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता व बेलवडे खुर्द येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांत विष्णू पवार, राजेंद्र पवार, लक्ष्मण पवार, श्रीपती पवार आणि मारुती पवार या शेतकऱ्यांच्या एकूण सात दुभत्या म्हशींचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
दिल्ली के लाठीचार्ज के विरोध में दापोली में आरपीआई अवले गुट का आक्रामक मोर्चा
Ratnagiri, Maharashtra:दिल्लीतील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आरपीआय (आठवले गट) कडून दापोलीत आक्रमक मोर्चा काढण्यात आला. दोषी पोलिसांवर कारवाई आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निर्णय न बदलल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा पक्षाने दिला.0
0
Report
चंद्रपूर एसटी कर्मचाऱ्यांची आठ दिवसांत आंदोलन; ड्यूटी रोस्टर बदलेच्या मागणी
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांचे ड्युटी रोस्टर तयार करताना शहर आणि जंगल भागातील वेग मर्यादा लक्षात न घेता ड्युटी रोस्टर तयार केलं जातं असा आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी यामध्ये बदलाव करण्याची मागाणी केली आहे. व्यवहारिकता लक्षात न घेता तयार करण्यात आलेल्या ड्युटी रोस्टरमुळे सामान्य प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होऊ शकत नाही असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. सोबतच आठ तासांच्या ड्युटी वरील तासांचा ओव्हर टाईम देण्यात यावा अशी देखील प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची असून याचा राज्यभरातील 70 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलाय.0
0
Report
Advertisement
