icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report
Advertisement

अण्णा हजारे की तबीयत बिगड़ी, मुंबई के बॉम्बे अस्पताल में भर्ती

Ahilyanagar, Maharashtra:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे... अण्णा हजारे यांना तीन-चार दिवसांपासून त्रास होत आहे व्यवस्थित जेवणही जात नव्हतं आज प्रकृती जास्त अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तपासणी करण्यासाठी मुंबई हलवण्यात आलं आहे स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डिहायडरेशन चा त्रास असल्याचं सांगितलं आहे अण्णा हजारे यांची प्रकृती जास्त बिघडू नये याची खबरदारी घेत राळेगण येथील कार्यकर्त्यांनी अण्णांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे तपासणी करण्यासाठी दाखल केलं आहे
0
0
Report
Advertisement

मराठी विरोध के बीच रिक्षाचालकों के लिए मराठी अनिवार्यता स्थगित, भाजपा और सरकार पर हमला

Ratnagiri, Maharashtra:रिक्षाचालकांसाठी मराठीच्या सक्तीला स्थगिती; भास्कर जाधवांचा मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल.. मुख्यमंत्री मराठाद्वेष्टे आहेतच, पण आता मराठीद्वेष्टेही निघाले"; भास्कर जाधवांचा घणाघात.. भाजपच्या मागणीनंतर मराठी भाषेच्या निर्णयाला स्थगिती देणे म्हणजे दादागिरी – भास्कर जाधव.. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे समर्थन.. विरोधी पक्षात असलो तरी रिक्षा व्यावसायिकांनी मराठी बोललेच पाहिजे, या भूमिकेसाठी प्रताप सरनाईक यांचे आभार. त्यांनी मराठी शिकण्यासाठी व्यवस्था आणि मुदतही दिली होती.. भाजपवर निशाणा.. मराठी भाषेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भाजपच्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मागणी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी रिक्षाचालकांसाठीच्या मराठी सक्तीला वर्षभरासाठी स्थगिती दिली.. मायुथीमध्ये समन्वयाचा अभाव.. आघाडी किंवा युतीचे सरकार असताना मित्रपक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करणे गरजेचे असते; मात्र केवळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीवरून निर्णय रद्द करणे ही 'दादागिरी' आहे.. मराठी भाषेबद्दल भाजपचा द्वेष.. त्रिभाषा सूत्राच्या वेळीही मराठीला बाजूला सारण्याचे काम फडणवीस सरकारच्या काळात झाले, तेव्हाही मुख्यमंत्री गप्प होते.. रिक्षाचालकांना केवळ प्राथमिक मराठीची गरज.. प्रवाशांशी बोलताना रिक्षाचालकांना फार मोठी भाषा बोलण्याची गरज नसते,केवळ भाडे आणि पत्ता समजण्यापुरते तीन-चार शब्द बोलावे लागतात; तरीही त्याला स्थगिती देण्यात आली.. मराठीद्वेष्टे सरकार.. या निर्णयामुळे राज्यातील मुख्यमंत्री व सत्ताधारी हे मराठी माणूस आणि मराठी भाषेचा द्वेष करणारे आहेत, हेच स्पष्ट होते..
0
0
Report

उद्योगमंत्री के जनहित फैसले पर भास्कर जाधव ने उठाए सवाल

Ratnagiri, Maharashtra:उद्योगमंत्र्यांनी स्वतःच्या हितापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत; बॉक्साईट प्रकल्पावरून भास्कर जाधवांचा सामंत बंधूंवर निशाणा.. दोन भावांनी (उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत) घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा, हे स्पष्ट नाही..सामंत बंधूंच्या निर्णयावर भास्कर जाधवांचा सवाल.. Pointer *स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे..*रत्नागिरी जिल्ह्यात नवीन उद्योग आणताना स्थानिक जनतेला विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक आहे.. *जनतेच्या गरजेनुसार काम करावे..* उद्योगमंत्र्यांनी लोकांची मानसिकता, मागण्या आणि त्यांच्या गरजा ओळखून उद्योगमंत्री म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे.. *​सामंत बंधूंच्या निर्णयावर सवाल..* दोन भावांनी (उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत) घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा, हे स्पष्ट नाही.. *लोकहिताचा सल्ला..* जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत कोणताही निर्णय घेताना तो स्वतःच्या हिताचा नसून केवळ जनहिताचाच असला पाहिजे..
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के पारगाव में भ्रष्टाचार के खिलाफ ग्रामस्थों का जिल्हा परिषद के समक्ष प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथ विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन केल आहे. या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय. यावेळी आंदोलकांनी संबंधित ठेकेदाराने बनावट सह्या करून 14 लाख रुपये लाटत आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोप केला. यावेळी पारगाव ग्रामस्थांनी जोरदार बोंबाबोंबारत जिल्हा परिषდესचा आवार दणाणून सोडला. त्याचबरोबर बोगस पद्धतीने काम करून भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे।
0
0
Report

कोल्हापुर गणेशोत्सव: डॉल्बी विवाद से प्रशासन बनाम मंडळ का टकराव संभव

Kolhapur, Maharashtra:पुण्यानंतर अब कोल्हापुरात गणेशोत्सवात डॉल्बीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून डॉल्बी किंवा ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांना कारवाईचा इशारा कोल्हापूर पोलीस प्रशासनाने दिला आहे. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, मात्र प्रशासनाने अतिरेके करू नये, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मात्र डॉल्बीवर निर्बंध घालण्यास विरोध केलाय. पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही ‘डॉल्बी विरुद्ध प्रशासन’ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव म्हटलं की जल्लोष, मिरवणूक आणि डॉल्बी. गणेशोत्सवाच्या या काळात डॉल्बीच्या आवाजावरून प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लंघन करणाऱ्या मंडळांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलाय. प्रशासनाच्या भूमिकेमुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. डॉल्बी आणि लेसर लाइटसाठी अनेक मंडळांनी आधीच पैसे देऊन बुकिंग केलंय, आता डॉल्बी रद्द करायचा कसा असा प्रश्न मंडळांकडून विचारला जातोय. कोल्हापूर शहराचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही डॉल्बीच्या अतिरेकावर चिंता व्यक्त केली आहे. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा; डॉल्बीसारख्या वाद्यांवर तरुणाई बेधुंद होताना काळजी वाटते; त्यामुळे डॉल्बी सारख्या साऊंड सिस्टिमला आपला विरोध अशी भूमिका मांडली आहे. परंतु प्रशासनानेही अतिरेक करू नये असे स्पष्ट केलेय. एकीकडे प्रशासनाची कायदा आणि नियमांची अंमलबजावीणी, दुसरीकडे मंडळांची परंपरा आणि जल्लोष कायम ठेवण्याची भूमिका. ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार विविध क्षेत्रांमध्ये आवाजाची मर्यादा निश्चित केली गेली आहे; डॉल्बी लावताना या ध्वनीमर्यादेचे पालन होणार का याचं परीक्षण महत्त्वाचं ठरेल. नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्ते ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची मागणी करत आहेत.anted प्रताप नाईक-ZEE 24 TASA, कोल्हापूर.
0
0
Report

मंचर में सचिन आहिर के समर्थकों के बीच महायुती की नई चुनौती

Manchar, Maharashtra:मंचर पुणे... सचिन आहिर उपसभापती विधान परिषद भीमाशंकर दर्शन व विकासकामे: - गेल्या अनेक वर्षांपासून मला भीमाशंकरची ओढ आहे. पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा घडावी हीच प्रार्थना केली. मंदिराच्या विकासकामांचा आढावा घेतला असून पुजाऱ्यांचे प्रश्न आणि भाविकांच्या सुविधांबाबत चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा बैठक घेऊन प्रशासकीय आढावा घेतला जाईल, जेणेकरून आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. मराठा आरक्षण व वक्तव्यांवर प्रतिक्रिया: - व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा त्यांनी मांडलाला विषय महत्त्वाचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर काम केले आहे. उदय सामंत आणि शंभूराज देसाई सातत्याने चर्चा करत आहेत. कोणावरही वैयक्तिक किंवा एकेरी टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सर्वांनीच संयम बाळगला पाहिजे. सहकार क्षेत्र आणि मुंबई जिल्हा बँक निवडणूक: - ठाणे जिल्हा बँकेप्रमाणेच सहकार क्षेत्रात (दूध संघ, बाजार समित्या, पतसंस्था) पक्षाचा विस्तार झाला पाहिजे. यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. मुंबई बँकेतही पक्षाचे संचालक किंवा पॅनेल उभे करता येईल का, याबत प्रारंभिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. पुणे जिल्हा दौरा आणि निधी वाटपातील नाराजी: - पुणे जिल्ह्याशी माझा जुना संबंध आहे. जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करताना निधी वाटपाबाबत तक्रारी समोर आल्या. सत्ताधारी असो वा विरोधक, विकासकामांसाठी सरसकट निधी मिळायला हवा. आगामी डी-लिमिटेशनमुळे मुंबई Pune्यात मतदारसंघांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे पक्षविस्तारासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. महायुतीतील स्थानिक समन्वय व दुरावा: - महायुती म्हणून काम करताना स्थानिक पातळीवर दुरावा नसावा. स्थानिक नेत्यांनी मोठे मन दाखवून समन्वयाचा हात पुढे केला, तर आम्हीही दोन पावले पुढे जाऊ. एकतर्फी संवाद होऊ शकत नाही. Byte: सचिन अहिर (उपसभापती ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report
Advertisement

विदर्भ में अगस्त में बारिश 58% नीचे, नागपुर सहित जिलों में भारी कमी

Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात केवळ ऑगस्ट महिन्यातच पावसाची 58% तूट... ( 297.1 MM सरासरी पाऊस... 125.5 MM बरसलेला पाऊस ) तर यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिना मिळून एकूण 22 टक्के विदर्भात पावसाची तूट --- विदर्भात कमी पावसामुळे चिंता वाढल्या -- पुढील काही दिवसात पाऊस मात्र पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता कमीच *ऑगस्ट महिन्यात विदर्भात कमी झालेला पाऊस जिल्हानिहाय* ( किती टक्के ऑगस्ट महिन्यात कमी पावस झाला ते ) अकोला (-84%) अमरावती (-82%) यवतमाळ (-78%) वर्धा (-73%) वाशिम (-71%) नागपूर (-71%) बुलडाणा (-61%) चंद्रपूर (-55%) गडचिरोली (-32%) गोंदिया (-28%) दरम्यान विदर्भातील कमी पावसाबाबत माहिती जाणून घेतली आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे हवामान तज्ञ प्रवीण कुमार यांच्याकडून
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top