445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा में मुसलधार बारिश से कृष्णा नदी में जलस्तर बढ़ा, पुराने पुल डूबे
Satara, Maharashtra:सातारा - मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराजवळील जुना पुल पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्याने कृष्णा नदीवरील धोम-बलकवडी आणि धोम धरणातील पाणी पातळी वाढल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लिंब येथील पुरातन घाटही पाण्याखाली गेला आहे. लिंब गोवेदरम्यानच्या जुन्या पुलाबरोबर मर्ढे - आनेवाडी दरम्यानचा पूलही पाण्याखाली गेला आहे.0
0
Report
सोलापुर में MD ड्रग केस: 34 ग्राम मेफेड्रोन के साथ युवक गिरफ्तार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरात जवळपास 7 लाख रुपयांचे एमडी ड्रग जप्त, शहर गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक करत केली कारवाई - एमडी ड्रगच्या विरोधात सोलापूर शहर पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर - शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 6 लाख 80 हजार रुपयांचे 34 ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त - शहरात एमडी ड्रग विक्रीसाठी आणलेल्या रुपेश थडसरे याला शहर गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या - सदर आरोपीचा पोलीस कसून तपास करीत असून ड्रग नेमका कुठून आणला याचा शोध सध्या सुरू आहे0
0
Report
कन्नड़ तालुक में सावर्गाव में भारी बारिश से पूर्णा नदी में बाढ़, यातायात ठप
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कन्नड़ तालुक्यातील सावरगाव येथे शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला या पावसाळ्यात प्रथमच पूर आला. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने दोन्ही काठांवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नसून परिसरात पावसाचा जोर कायम आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में दो दिन की भारी बारिश से धबधबे फूटे, पहाड़ों पर हरियाली छा गई
Chandvad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भरभरून दान लाभलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी व इंद्राईवाडी डोंगर रांगावरील सर्व धबधधे प्रवाहित झाले तर नदी व नाले दुथडी वाहताहेत तर डोंगरावरून पाणी ओसंडून वाहू लागले. ढग उतरल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
विदर्भ में चार दिन की भारी बारिश के बाद राहत, बाढ़ से नुकसान
Nagpur, Maharashtra:विदर्भात गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ-या पावसाने आज मात्र उसंत घेतली आहे.... नागपूर, गडचिरोली,अमरावती,यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसात पावसाने टप्प्याटप्प्याने जोरदार बॅटिंग केली... काही ठिकाणी पाणी साचल्याने मोठे नुकसानही झाले तर काही जणांना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने व दुर्घटनेमुळे जीवही गमवावा लागला... मात्र आज सकाळपासून विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.0
0
Report
रत्नागिरी के चिपळुण-कराड मार्ग पर गड्ढे पानी से हादसे बढ़े
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-कराड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सध्या अक्षरशः 'जीवघेणा' ठरत आहे.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण-कराड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सध्या अक्षरशः 'जीवघेणा' ठरत आहे.. पहिल्याच पावसात पोफळी सय्यद वाडी परिसरातील रस्त्याची कमालीची दयनीय अवस्था झाली असून महामार्गावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत.पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये,ज्यामुळे या भागात भीषण अपघात घडत आहेत.. निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा याचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसत असून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.. त्यामुळे आता प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची आणि जीवितहानीची वाट पाहतंय का?..असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.. Wkt बाईट0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी का जलस्तर अचानक बढ़ा; तीन बाँध डूबे, सांगली के गाँव सतर्क
Sangli, Maharashtra:कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र में पडणारा पाउस और कोयना धारनातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे, सांगलीतील आयुर्विन पुल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 24.6 इतकी झाली आहे. तर कृष्णा नदीवरील असणारे बहे, नागठाणे आणि सांगलीवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुथडी भरून कृष्णा नदी पुन्हा वाहू लागली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असून कोयना धरणाचा विसर्ग वाढवून रात्रीपासून 23 हजार 500 क्यूसेक करण्यात आला, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
जालना में भारी बारिश ने खरीप फसलों को बड़ी राहत दी
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा,पावसामुळे पिकांच्या वाढीस होणार मदत अँकर :जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग व उडीद या खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. जुलैअखेरपर्यंत झालेल्या बहुतांश पेरण्यांनंतर पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल. पিকांची वाढ जोमदार होईल. मूग-उडीदाची फुलधारणा चांगली होईल. विहिरी, कूपनलिका, शेततळी तसेच लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाणीस्थित्यात वाढ झाली आहे. पुढील काळात संरक्षित सिंचनासाठीही पाणी उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.0
0
Report
बारिश से कृष्णा व कोयना नदी में बाढ़, सातारा में जलस्तर उफान पर
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. या विसर्गामुळे आणि पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्या दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली आहे. या स्मशानभूमीतील अग्नी कुंड पाण्यात बुडाली आहेत. त्याचबरोबर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवत तो 23 हजार क्युसेक पर्यंत नेण्यात आला आहे. त्याचबरोबर उरमोडी, कण्हेर आणि धोम धरणातूनदेखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा कोयना, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहतायत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
पंढरपुर में भीमा नदी का जलस्तर बढ़ा, 60-70 परिवारों के स्थानांतरण की तैयारी
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दुपारनंतर सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरणार असल्याने प्रशासनाकडून 60 ते 70 कुटुंंबांच्या स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसानंतर भीमा नदीवरील उजनी धरण आणि नीरा नदीवरील वीर धरण 100 टक्के भरले असल्याने पूर नियंत्रण करण्यासाठी भीमा आणि नीरा नदीतून अनुक्रमे 80 हजार क्युसेक आणि 63 हजार क्यूसेक असा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे त्यामुळे पंढरपूर मध्ये दुपारनंतर भीमा नदीच्या पात्रात अंदाजे एक लाख तीस हजार ते 40 हजार क्युसेक पाणी वाहणार आहे यामुळे अंबाबाई झोपडपट्टी व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे पंढरपूर तहसील पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने येथील कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने वाळवंटातील सर्व मंदिर पाण्यामध्ये बुडाले आहेत नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरत आहे यामुळे शेतीचेही नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.0
0
Report
यवतमाळ में निळोणा डैम ओवरफ्लो: पर्यटक पानी के दृश्य देखने उमड़े
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निळोणा नंतर आता चापडोह धरण देखील लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. दरम्यान निळोणा ओव्हरफ्लो चे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी अनेकांनी धरणाकडे धाव घेतली. ओव्हरफ्लो मुळे खळखळ वाहणाऱ्या वाघाडी नदी आणि धरणातील पाणी साठ्याच्या काठावर बसूनही पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. यवतमाळ शहरापासून 11 किमी अंतरावर असलेल्या व निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी यवतमाळकरांची मागणी आहे.0
0
Report
भंडारा के मोहाड़ी नगरपंचायत उपाध्यक्ष के विरुद्ध अविश्वास प्रस्ताव बहुमत से मंजूर
Bhandara, Maharashtra:Anchor : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या सभेला उपाध्यक्ष सचिन गायधने हे अनुपस्थित होते. अविश्वास ठरावावर झालेल्या मतदानात १४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर केवळ १ नगरसेवकाने ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे स्पष्ट बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. उपाध्यक्ष सचिन गायधने हे सभेला अनुपस्थित असले तरी नियमानुसार मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.0
0
Report
Advertisement
अमरावती में भारी बाढ़: 39 तहसीलों में अतिवृष्टि, 1092 घर नुकसान, दो मौतें
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; 39 महसूल मंडळात अतिवृष्टी, 1092 घरांची पडझड, दोघांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून या आपत्तीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेड अलर्टदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे सुमारे 38 हजार हेक्टरवरील शेती पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बेंबळा नदीसह परिसरातील साखळी नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे 1,092 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला वेग दिला असून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
कोयना बांध में मुसलाधार बारिश से जलस्तर बढ़ा, रात 12 बजे दरवाजे खोले
Satara, Maharashtra:सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री १२ वाजत्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटांवरून ४ फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामधून २२ हजार ४७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीपात्रात एकूण २३ हजार ५२० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.0
0
Report
गोदावरी नदी के बीच सराला बेट मानसून में हरियाली और मंदिर से भरा पर्यटन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर, गोदावरी नदीच्या प्रवाहात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम आविष्कार घडवते. यंदाच्या मान्सूनमधील ५९ दिवसांच्या पावसानंतर चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, दाट हिरवळ आणि बेटाच्या मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल यामुळे सराला बेटाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच निसर्ग, भूगोल आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हे ठिकाण मराठवाड्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. श्रद्धेचे केंद्र असलेल्या या बेटावर जैववैविध्याचीही समृद्ध परिसंस्था पाहायला मिळते. गोदावरीच्या सततच्या प्रवाहामुळे येथे सुपीक गाळ साचतो, त्यामुळे बेटाभोवती हिरवाई आणि विविध वनस्पतींची समृद्ध वाढ झालेली दिसून येते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेले सराला बेट अधिकच मनोहारी दिसते. विशेष म्हणजे, ड्रोन किंवा आकाशातून पाहिल्यास गोदावरीचा विस्तीर्ण प्रवाह, सभोवतालची हिरवीगार शेती आणि मध्यभागी असलेले मंदिर यांचा मनमोहक मिलाफ पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतो. त्यामुळे सराला बेट हे श्रद्धा, निसर्ग आणि पर्यटन यांचा अद्वितीय संगम ठरते.0
0
Report
Advertisement
