Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Mar 12, 2026 02:46:31
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 12, 2026 02:45:22
Nasik, Maharashtra:तपोवनातील वृक्षतोडीबाबत नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदविल्या आहेत. दुसरीकडे नाशिक शहरात वृक्षतोड मात्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व नाशिककर पर्यावरणप्रेमी नागरिकांतर्फे पर्यावरण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. सीबीएस परिसरातील हुतात्मा स्मारक येथून सकाळी ९ वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार असून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नेण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने, केवळ झाडे व निसर्ग संवर्धन, गोदावरी व तिच्या उपनद्या, ब्रह्मगिरी, अंजनेरी तसेच प्राणी व पक्षी संवर्धन हा विषय अग्रस्थानी ठेवून काढण्यात येणार आहे. विविध विचारसरणीचे नागरिक, राजकीय पक्षांचे सदस्य, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक पक्षीय झेंडे बाजूला ठेवून सहभागी होणार आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 12, 2026 02:45:09
Kolhapur, Maharashtra:كو�ل्हাপور जिल्ह्यातल्या पिराचीवाडी या छोट्याशा गावाने विकासाची अनोखी वाट धरली आहे. विशेष म्हणजे गावातील वैकुंठभूमी अर्थात स्मशानभूमी आता आकर्षणाचे केंद्र बनली आहे. स्वच्छता, सुशोभीकरण आणि शांत वातावरणामुळे येथे प्री-वेडिंग शूट, सेल्फी तसेच अभ्यासासाठीही तरुणांची वर्दळ पाहायला मिळते. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कमी पाऊस आणि पावसावर अवलंबून शेतीमुळे पूर्वी परिस्थिती कठीण होती. मात्र गावकरी एकत्र येऊन गावात अनेक योजना राबवल्या. त्यानंतर हे गाव नावा रुपाला आले. गावात सुसज्ज स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत, सीसीटीव्ही व्यवस्था, वनराई आणि विविध योजनांची माहिती फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पिराचीवाडी गाव आज जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले असून, गावची विकासकामे पाहण्यासाठी अनेक जण गावाला भेट देत आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 12, 2026 02:33:25
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - भाजप नेते किरीट सोमय्यांना मालेगाव प्रकरण भोवणार ? मालेगावातून किरीट सोमय्या यांना नोटीस. नाशिकच्या मालेगावात जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले बांगलादेशी घुसखोर अतिरेकी असल्याचे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याला महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करीत सोमय्या तसेच त्यांना माहिती देणाऱ्या आयुक्त जाधव यांचा निषेध केला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मी घुसखोर, अतिरेकी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान काही कारणास्तव भोसले यांचे जन्म प्रमाणपत्र रद्द झाले होते. भोसले यांनी मालेगावचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे. ते कायमचे मालेगावातील रहिवाशी आहेत. असे असताना किरीट सोमय्यानी केलेल्या वक्तव्याबद्दल भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान सोमय्या यांना नोटीस पाठवून माफी मागावी अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा करणार असा इशारा, नोटीस भोसले यांनी दिली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 02:33:09
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग, वेरूळ घाटातील घटना छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ घाटात मध्यरात्रीच्या sुमारास एका मोठ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. हा ट्रक बोलठाणहून-टाटा नगरकडे कांदा घेऊन जात होता. आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच ट्रकच्या केबिनने पेट घेतला आणि ट्रक जळून खाक झाला. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने सुदैवाने प्राणहानी टळली असली, तरी आगीने रौद्ररूप धारण केले होते. कांद्याने भरलेला हा ट्रक जणू धगधगती भट्टीच बनला होता. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र या आगीत कांदाही जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 02:30:46
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में सर्वर डाऊनमुळे गॅस सिलेंडर बुकिंग करताना अडथळे,गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती और गॅस कंपन्यांच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून बुकिंगच होत नसल्याने छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यात घरगुती और व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। जानेवारीपर्यंत दररोज 600 सिलिंडरचा पुरवठा होत होता, मात्र गेल्या आठ दिवसांपासून केवळ 300 सिलिंडर उपलब्ध होत असल्याने एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत। गॅस बुकिंगसाठी कंपन्यांनी केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे। मात्र, सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बुकिंग प्रक्रियेत अडथळे येत आहेत। वारंवार संबंधित नंबरवर कॉल केल्यानंतरही ऑनलाइन बुकिंग होत नाही। त्यामुळे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत। असाच परिस्थिती सिल्लोड, गंगापूर तालुक्यात देखील पाहायला मिळत आहे。
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 02:16:12
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 02:15:46
Bhandara, Maharashtra:जिल्हयात इंधन पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भंडारा जिल्ह्यात तीनही कंपन्यांचा गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेल साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. मार्च 2026 च्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडर (14.2 kg) च्या दरात 60 रुपयांची वाढ झाली असून ते 974.00/- प्रती सिलेंडर झाले आहे. व्यावसायिक सिलेंडरांची किंमत 2073.00/- झाली आहे. महिन्याला घरगुती सिलेंडरसाठीची मर्यादा 15 दिवसांवरून 25 दिवस केली गेली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपन्या जिल्हयातील गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेलचा साठा कायम राहील याबाबत कटीबद्ध आहेत. अशा साठा आणि साठा असलेल्या पंपांवर अनावश्यक गर्दी टाळा अफवांवर विश्वास नसावा. ज्यांनी साठवून ठेवला त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 02:15:28
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | दौलताबाद किले को आग, 300 एकड़ के क्षेत्र में आग लगने से वन संपदा खाक अँकर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला अवघ्या 11 महिन्यांत पुन्हा आगीच्या विळख्यात सापडला. या किल्ल्यावर अचानक आग लागली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली; मात्र जोरदार वाऱ्यामुळे 300 एकरांत आग पसरली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली; परंतु तोपर्यंत किल्ल्याचा परिसर आगीच्या राखेने काळवंडला होता. देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी मंदिराच्या समोरील गवताला आग लागल्यानंतर किल्ल्यावरील झाडं झुडपं जळून खाक झाली. तब्बल आठ तासानंतर ही आग विझवण्यात यश आलं
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 02:02:25
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 12, 2026 02:00:28
Varasoli, Maharashtra:रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होते आहे. जिल्हा परिषदेतील गेले महिनाभर सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेच्या तयारीत असतानाच आता शिवसेनेलाही या सत्तेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार असे चित्र आहे. आजच्या निवडणुकीत भाजपचा अध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात असून तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने अलिबागमध्ये विजयोत्सवाची तयारी केली आहे. असा आहे कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा होईल उमेदवारी अर्जांची छाननी होऊन अंतिम यादी जाहीर होईल त्या नंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येईल
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 12, 2026 01:46:10
Kalyan, Maharashtra:अमेरिका इस्राईल इरान युद्धाचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणात पडला आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा मुळे गृहिणी इलेक्ट्रिक शेगडीकडे वळल्या. युद्धाच्या परिणामी सिलेंडर गॅस मिळत नसल्याने नागरिक लाईनमध्ये उभे दिसत आहेत. युद्धापूर्वी घरगुती गॅस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गॅस सिलेंडर एजन्सी कडून पुरवठा केला जात होता; मात्र इस्राईल-इराण युद्धामुळे भारताला मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला आहे. व्यापारींसाठी लागणारा गॅस मिळत असल्याने हॉटेल चालकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरं चा तुटवडा देखील होत आहे. नागरिक आणि गृहणी चिंतेत s. अखेर इलेक्ट्रिक शेगडी घेण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे; त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 12, 2026 01:30:54
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड महापालिकेला अखेर पाच महिन्यांनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळालेत. कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडील आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार काढण्यात आला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मागील पाच महिन्यांपासून हर्डीकर यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार होता. अतिरिक्त जबाबदारीमुळे केवळ अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य दिले जात असल्यान महापालिकेचे प्रशासकीय कामकाज काहीसे संथगतीने सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top