Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 14:32:01
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 02, 2026 14:17:34
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 14:01:10
Kolhapur, Maharashtra:आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 13:51:10
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 12:48:16
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर फाटा रोडवर बिबट्याने केली गायीच्या बछड्याची शिकार, वन पथकाने माहिती मिळताच नागरिकांना केले सतर्क अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर फाटा रोडवरील वननर्सरीच्या समोर बॉटनिकल गार्डन आवार भिंतीजवळ बिबट्याने भर रस्त्यावर गायीच्या बछड्याची शिकार केली. गस्तीवर असलेल्या वनरक्षक वर्षा पिंपरे व त्यांच्या टीमने घटनेची माहिती मिळताच तत्काळ दाखल होऊन प्रवाशांना सावध केले. हा परिसर गेल्या काही वर्षापासून बिबट्याच्या सतत वावराने दहशतीखाली आहे. बॉटनिकल गार्डन भिंत, राख डेपो आणि विटा भट्टी परिसरात बिबट भटकत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण आहे. गावातील मांस-मटण दुकानातील जैविक कचरा इथं टाकला जातो, यामुळे कुत्रे आणि वन्यजीव शिकारीच्या शोधात इथे येतात. संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनासह उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 02, 2026 12:21:02
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररंगांमध्ये होळीचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ही होळीसाठी नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर आले आहेत. उईके हे सातपुड्यातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरा करणार आहेत. होळी सणा निमित्ताने धडगाव शहरातून निघणाऱ्या भोंगऱ्या बाजारातील शाही मिरवणुकी त्यांनी अन्य लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांसह सहभाग नोंदवला. सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी बांधव होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. होळी सणानिमित्त सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव शहरात भोंगऱ्या बाजाराची मोठी धूम पाहायला मिळाली. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपली ऐतिहासिक आणि पारंपरिक शाही मिरवणूक अत्यंत उत्साहात काढली. या मिरवणुकीत गावाचे पाटील भीमसिंग पराडके आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी सरदारांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. हातातील काठ्या आणि कमरेला बांधलेले घुंगरू यांच्या आवाजासह, भले मोठे ढोल आणि वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव धुंद होऊन नाचले. आधुनिक काळातही आपली मूळ संस्कृती आणि डोंगराच्या बाजाराची परंपरा आजही धडगावमध्ये कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शाही मिरवणुकीने संपूर्ण शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले असून, हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने हा मिरवणूक पार पडला. Prashant Paredashi, Nathurbar.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 02, 2026 12:05:44
Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप आज तीव्र झाल्याचे चित्र आहे. वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज होळीच्या दिवशी कामकाज बंद ठेवत संप पाळला. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात वाढत चाललेले खाजगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपामुळे नागरिकांच्या भूमीविषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास हा संप पुढे कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 11:36:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख पत्रकार परीषद पॉइंटर ऑन खेमनेय मृत्यू. अमेरिका आणि इस्रायल यांनी जो हल्ला केला आहे, त्यात खेमनेय यांचा मृत्यू झाला. त्याचा मी निषेध करीत आहेत. रमजान महिन्यात असे नको व्हायला पाहूजे होते. हा माणुसकीचा वध आहे अमेरिका आणि इस्रायल कायर आहे. मी आदरणीय पंतप्रधान यांना विनंती करतो की त्यांनी पुढाकार घेऊन जागतिक शांतीसाठी प्रयत्न करावे. रमजान महिना सुरू आहे. नमाजाची वेळ झाली होती. औरंगजेबाच्या कबरीवर जाणे काहीही वाईट नाही. तेथे जाऊन दुवा मागितली. मालेगावात आमचा आमदार झाला, राज्यभरात विस्तारासाठी पक्षाची वल्लभ बैठक सुरू आहे. आम्ही राज्यभरात संपर्क सुरू आहे. रमजान नंतर राज्यभरात विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आज माझ्या सोबत बसलेले सर्व दिसत आहेत. त्यावसारवार्ांची आम्ही कोअर कमिटी ठरवत आहोत. रफत यार खान, सय्यद आरिफ हुसेनी, कलीम कुरेशी, जफर बिल्डर, अबू लाला. ही समिती युथ समिती, महिला विंग तयार करणार.. ही समिती जो पर्यंत मराठवाड्यातील बांधणी पूर्ण करणार नाही तो पर्यंत ही समिती राहणार. आमचा पक्ष सेक्युलर आहे. जातीयवादी पक्ष नाही. 3 हिंदू आमच्या पक्षातून निवडून आले आहेत. दोन मराठा आणि एक हिंदू निवडून आलेलं आहे. आमची विचारधारा सेक्युलर आहे. आम्ही व्हिजन घेऊन चालणारे आहे. आमचा व्हिजन काय राहणार याची घोषणा मुंबई मधील राज्यस्तरीय बैठकीत करणार आहे. sir साठी आमची कमिटी औरंगाबाद (संभाजीनगरचा उल्लेख) मध्ये जनतेला मदत करेल. Mim चे खासदार आमदारा झाले, विविध पक्षांनी या शहरात राजपाट केला, हा ऐतिहासिक शहर आहे. मात्र या शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याचं प्रश्न जसेच्या तसे आहे. अजूनही पाणी अनेक दिवस आड येत आहे. हा प्रश्न कायम आहे. याचा अर्थ म्हणजे आतापर्यंतचे सर्व सत्ताधारी याचे जबाबदार आहेत. म्हणजे सब एक हमाम मे नंगे है.. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात मोठे आंदोलन कराव लागलं तर मोठे आंदोलन या शहर वासियासाठी करणार आहे. या शहरात विविध पक्ष असताना इस्लाम पक्ष का आवश्यक आहे असा प्रश्न पडला असेल मात्र mim कडून तरुणाचा वापर केला गेला.. भाजप हिंदूंचा उपयोग करतो आणि mim मुस्लिमांच... हिंदूंना पर्याय मिळत नाही. हळूहळू या देशातून राज्यातून सेक्युलर पक्ष संपत चालला आहे. आपला देश हा हिंदू मुस्लिम एकतेचा देश आहे.. म्हणून एक विकल्प म्हणून आम्ही पुढे आलो आहोत, आम्ही राज्यात सर्वांना सोबत घेऊन शिक्षण, बेरोजगारी, महिला सर्वांना समोर ठेवून विकास करू. ट्रिपल तलाक, काळा कायदा... कायदेशीर लढाई, रस्त्यावरील लढाई, लोकशाही मार्गाने लढाई असे व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहोत. माझा 40 वर्षाचा राजकीय प्रवास आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top