445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सिंधुदुर्ग में आठवड़ी बाजार का उद्घाटन, कोकणी व्यंजनों का स्वाद लोगों के लिए खुला
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग वासियांना आता अस्सल कोकणी मेव्याची चव चाखता येणार आहे. सिंधुनुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आलेय. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. मंत्री नितेश राणे यांनी आठवडी बाजाराची पाहणी करत काही पदार्थ देखील चाखले. या बाजारात मिळणाऱ्या सर्वच गोष्टी ह्या आरोग्यदायी असतात. आणि ह्या आठवड़ी बाजारामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण अर्थ कारण वाढेल. आणि जिल्ह्याच दरडोई उत्पन्न वाढण्यास हातभार लाभेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.0
0
Report
मोदी-नड्डा के बयान से प्रादेशिक पार्टियों पर दबाव, अयोध्या दान घोटाले पर भी बहस
Nagpur, Maharashtra:प्रादेशिक पक्ष - भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी और पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे प्रादेशिक पक्ष संपविण्याचे काम करत आहेत. जनभावनांकडे दुर्लक्ष करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार दबाव और भीती दाखवून प्रादेशिक पक्ष फोडण्याचे काम करत आहे. मोदी सरकार लोकशाही मानत नाही, त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे. अयोध्या मंदिर दान घोटाळा - राम मंदिरासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. नागरिकांनी त्या समितीवर आरोप केले आहेत. भाजप सरकारला दिलेल्या पैशांचा हिशोब आम्हाला मिळालेला नाही. धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो राजकीय कामांसाठी खर्च केला जात आहे. अखिलेश यादव यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे. मोहन भागवत - मोहन भागवत यांना पाकिस्तानबद्दल प्रेम निर्माण झाले आहे, तर नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे. ज्या देशांमध्ये भारताचा अपमान कला जातो, त्या देशांबद्दल या लोकांना प्रेम वाटते. नरेंद्र मोदी त्यांचे आभार मानतात, तर मोहन भागवत शत्रूराष्ट्रांसोबत जवळीक साधत आहेत.0
0
Report
शिवसेना में फूट और भाजपा-त्रिण्मूल के बीच घमासान, सांसदों की बैठक का नतीजा
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन खासदार आमच्या पक्षात बैठकीत काय सुरू आहे. यावर उगाच अफवा पसरवण योग्य नाही. शिवसेना खासदारांची काल मातोश्रीवर बैठक झाली मुंबईतील तिन्ही खासदार उपस्थित होते. नाशिकचे खासदार होते. उर्वरित 5 खासदारांनी आधीच चर्चा झाली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली शिवसेना फुटली ज्यांच्यावर संशय नव्हता तीच आधी गेली संशय कोण ठेवणार कोणी ठेवायचा ? आमचा आमच्या खासदारांवर पूर्ण विश्वास संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे भाजप असे करत असत आम्ही ऑपरेशन बुल्फ करू.. वाघ तुम्हाला हात लावू देईल का ? वाघ जंगलात मोकळा फिरत आहे. 19 जून ला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार हिरक महोत्सव आशा कार्यक्रमाला आमंत्रण द्यायचं नसत आपला कार्यक्रम आहे. जे येतात त्यांच्या साठी खुर्च्या ठेवल्या जातील. ऑन 20 खासदार तृण्मुल कधी आपण या पार्टीचे नाव ऐकलं का? ही त्रिपुराची पार्टी या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मतं मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये काही जागा लढले तिथे यांची डिपॉझिट गेली हजार मते देखील पडली नाही अमित शहा कुठून कुठून असे पक्ष तयार करतात. आणि पटलावर आणतात आणि एखाद्या गुलामांना हाता पायात बेड्या बांधून कोथडीत ढकला व तसा ढकलतात 22 खासदार भाजपत जायला निघाले त्यांना Ncrt पक्षात अमित शहा यांनी ढकल आहे. विहिरीत ढकलल्यासारखं त्याच्यामुळे पार्टी मर्ज झाल्यामुळे तृण्मुल काँग्रेस वरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा संपलेला आहे जय महाराष्ट्र मध्ये व्हायला पाहिजे होतं पण इथे एक वेगळा आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना विलीन होणं हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्र मधलं जो काही शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेके द्यायचे आहे आम्ही त्यासाठीच म्हणतो तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे तरी तृणमूल मध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फूठले आहेत इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटले नव्हते तरी त्यांना एका पक्षामध्ये दिली व्हावं लागलं आपली खासदारकी वाचवण्यासाठी महाराष्ट्रात तुलनेत कमी आकडा असून ते शिवसेना मिरवत आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातून नेत्यांचा दिल्ली पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल पुण्यात गरीब राजकारणी असल्यामुळे इथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे तिथे समृद्धी मार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा अन्य त्यांच्याकडे त्यांच्या ulc खात नसल्यामुळे ते त्या गरीब बिचाऱ्या आमदार आणि खासदारांना कुठल्यातरी पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झढकलूनत्यांच्या कडे एकनाथ शिंदे असते तर त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं असतं जर त्यांच्याकडे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता तर तृणमूल पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळाले असते कायदेशीर लढाई ही पहिल्या दिवशी आमची सुरू झाली आणि तेव्हाच आम्हाला विजय मिळला पाहिजे होता तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती तृणमूल इतके आमदार आणि खासदार त्यांची आमदारकी आणि खासदारकी वाचवण्यासाठी एका अशा पक्षात प्रवेश केला त्याच पक्षाचा अस्तित्व नाही पण या इथे मात्र तुम्हाला मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह दिल मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा चिन्ह दिल हे देशाच्या न्यायव्यवस्थेतील कायद्यातील आणि निवडणूक आयोगातील तफावत पहा न्याय देण्याची ऑन पाकिस्तान संवाद नारायण राणे यांचे चिरंजीव याला पाकिस्तानी त्याला पाकिस्तानी म्हणता म मोहन भागवत यांना पाकिस्तानी म्हणतील का ? पाकिस्तानला ही चिरडून टाका शिवसेनेची भूमिका आहे तुम्ही ऑपरेशन सिन्दुर मधून माघार घेतली तेव्हा तुम्ही, भाजप पाकिस्तानी झालात.0
0
Report
Advertisement
बीजेपी के नगरसेवक गोवा से मुंबई में प्रशिक्षण के लिए पहुंचे, 16-17 तारीख तक चलेगा कार्यक्रम
Nagpur, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी भाजप के सभी नगरसेवक गोव्या से तीन दिन के लिए मुंबई पहुंचे और अब प्रशिक्षण हेतु मुंबई में हैं। रामभाऊ म्हाळगी में उनका प्रशिक्षण वर्ग होगा। मतदानपूर्व 17 तारिख को वे मुंबई से नागपुर पहुँचेंगे। पहले भाजप नगरसेवक और माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे ने प्रतिक्रिया दी। भारतीय जनता पार्टी के सभी नगरसेवकों का रामभाऊ माळगी में प्रशिक्षण है। आज दुपहार डेढ़ बजे से यह प्रशिक्षण शुरू होगा। 16 तारीख तक यह प्रशिक्षण रहेगा। जो नवनियुक्त नगरसेवक हैं वे जनता के साथ कैसे व्यवहार करें, और जनता की समस्याओं और विकास कार्यों के दृष्टिकोण से समग्र प्रशिक्षण दिया जाएगा। हमारे नगरसेवक घूमने के लिए नहीं गए थे; प्रशिक्षण वर्ग पहले से तय था, और प्रशिक्षण वर्ग 16-17 तारीख तक है।0
0
Report
देवदर्शन के बाद बावचे परिवार पर दुखद हादसा, आठ लोग बचे
Pandharpur, Maharashtra:सहा महिन्याचं बाळ कायम आजारी असतं म्हणून देवदर्शन करायला गेले आणि कुटुंबाचा घात झाला. पंढरपुरातील संदीप आणि बालाजी बावचे बंधू यांनी कष्टातून आपलं एक छोटसं विश्व तयार केलं होतं. दोन बंधू बांधकाम व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते यातून त्यांची चांगली प्रगती झाली होती. पंढरपूर मधील अनिल नगर मध्ये राहत असताना त्यांनी कष्ट करून पुणे रस्त्यावरील परिसरात चांगल घर बांधले होते. मात्र नियतीला त्यांचा हा सुख पहवल नाही. घरामध्ये आई दोन भाऊ त्यांच्या पत्नी आणि मुले असा सगळा संसार होता. मात्र अवघ्या काही क्षणात सगळ पाण्यात बुडाले सहा महिन्यापूर्वी बालाजी आणि पूजा यांना लहान बाळ झाले मात्र जन्मल्यापासून सतत हे बाळ आजारी पडायचे यासाठी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र तरीही त्याला म्हणावा तसा फरक पडत नव्हता म्हणून बावचे कुटुंबाने देवदर्शन करण्यावर आपला विश्वास ठेवला होता. यापूर्वीही त्यांनी गाणगापूर तुळजापूर अशा ठिकाणी जाऊन देवदर्शन केलं होतं. मात्र तरीही बाळाच्या तब्येतीमध्ये म्हणावा असा फरक पडत नव्हता. बावचे कुटुंबाने आपले कुलदैवत असलेले सातारा जिल्ह्यातील मसवड येथील सिद्धनाथ जोगेश्वरी च्या दर्शनाला जाण्याचा नियोजन केलं रविवारी अमावस्या असल्याने या दिवशी दर्शन घ्यावं असं त्या सर्व कुटुंबाने ठरवलं. संदीप आणि बालाजी यांच्या सोबत त्यांची मावस बहीण तिचा पती आणि त्यांची मुलं यांनाही त्यांनी सोबत घेतलं. सकाळी दहा वाजता निघाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला गोंदवले महाराज यांचे दर्शन घेतलं त्यानंतर सिद्धनाथ जोगेश्वरीच्या दर्शनाला ते आले त्या ठिकाणी कुटुंबासह त्यांनी फोटो काढला आणि आपल्या सोशल मीडिया खात्यावर सुद्धा ठेवला. आजारी बाळाला निदान कुलदैवताच्या आशीर्वादाचा फरक पडून त्याची तब्येत बरी होईल आणि हसत खेळत मोठा होईल अशी अपेक्षा बावचे कुटुंबाला होते मात्र ज्य अमावस्येच्या निमित्ताने बावचे कुटुंब दर्शनाला गेले होते त्याच अमावस्येच्या दिवशी त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवी संकट आले या अपघातात संदीप आणि बालाजी हे दोन सख्खे भाउस बालाजी ची दोन वर्षाची जिया आणि अडीच वर्षांचा आरव , वाहन चालक सागर चौगुले, शशिकला जाधव सह आठ जण दैव बलवत्तर म्हणून वाचले आहेत.0
0
Report
पंढरपुर के विहिरी हादसे में 8 की मौत; अंतिम संस्कार शांतिपूर्ण
Pandharpur, Maharashtra:म्हसवड - पंढरपूर रस्त्यावर विहिरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातात पंढरपुरातील आठ जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिराने मृत्यू पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मध्यरात्रीनंतर उशिराने यांच्यावर पंढरपूरातील गोपाळपूर रोडच्या वैकुंठ स्मशान भूमीत सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अत्यंत शांततेत व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाल्याची बाब पुढे आली. अंत्यसंस्कार झालेल्यांची नावे :- माय लेकर पूजा अमोल साकोरे 23 आरव अमोल साकोरे 8 पूजा बालाजी बावचे 27 समर्थ बालाजी बावचे 6 महिने अश्विनी संदीप बावचे 27 संस्कार संदीप बावचे 14 संस्कृती संदीप बावचे 14 आजी इंदुबाई दशरथ बावचे 600
0
Report
Advertisement
रत्नागिरी के सावर्डे में शैक्षणिक वर्ष का स्वागत, विधायक शेखर निकम ने गुलाब-चॉकलेट दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात.. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी,शाळेची ओढ वाढावी, यासाठी शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डेत आज नवगत विद्यार्थ्यांचं चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत केलं..0
0
Report
डोंगरवाड़ी बैलगाड़ी शर्यत में गेम चेंजर हरण्या-खलाटी ने जीत दर्ज की
Sangli, Maharashtra:डोंगरवाडीत बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. भाजप नेते तानाजी पाटील यांच्या वतीने आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचा आयोजन करण्यात आलं होते. यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील जवळपास दोनशेहून अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या अंतिम स्पर्धेत लिंगनूरच्या गेम चेंजर हरण्या व फायरिंग बैज्या खलाटी बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी आमदार खाडे यांच्या हस्ते बक्षीसाचा वितरण करण्यात आले. तर बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो शर्यती प्रेमींनी उपस्थिती लावली होती.0
0
Report
सातारा के स्कूल: नए शैक्षणिक वर्ष की धूम, बच्चों के चेहरों पर मुस्कान
Satara, Maharashtra:सातारा - सुट्टी संपली... शाळेची घंटा पुन्हा वाजली... आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातील शाळा सज्ज झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यासाठी जिल्हाभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. व्हीओ : सातारा जिल्ह्यातील 157 शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचं स्वागत फुलं, टाळ्या आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलं.जिल्ह्यात पहिल्यांदाच शाळा गोडी अभियान राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच शैक्षणिक गुडी उपक्रमातून नव्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटपही केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन मित्र आणि भरपूर उत्साह... अशा आनंदी वातावरणात सातारा जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच या स्वागत सोहळ्याची खरी ओळख ठरत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...0
0
Report
Advertisement
भीमाशंकर मंदिर आज खुला: ऑनलाइन बुकिंग से सिर्फ 1000 भक्तों को दर्शन
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर आज खुला: ऑनलाइन बुकिंग से सिर्फ 1000 भक्तों को दर्शन श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पांच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पहिल्या दिवशी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी0
0
Report
संजय पाटील फिर से बीजेपी में शामिल होंगे: मुख्यमंत्री के सामने 30 जून को प्रवेश तय
Sangli, Maharashtra:सांघली फ्लॅश (स्रोत) माजी खासदार संजय पाटील यांची अखेर घरवापसी होणार आहे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असणारे माजी खासदार संजयकाका पाटील आता पुन्हा भाजपात परतणार आहेत. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 30 जून रोजी संजयकाका पाटील यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून भाजपाशी वाढलेली संजयकाकांची जवळीक यामुळे संजयकако भाजप परतणार, अशी चर्चा सुरू होती, मात्र पक्षांतर्गत असणाऱ्या विरोधामुळे ग्रीन सिग्नल मिळत नव्हता, दोन दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संजयकाका पाटील यांनी विटा येथे भेट घेत चर्चा केली होती,त्यानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून आता संजयकाका पाटील हे पुन्हा भाजपात परतणार आहेत,त्यामुळे जिल्ह्यातील भाजपची ताकद आणखी वाढणार असून सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये देखील भाजपाला याचा फायदा होणार आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.0
0
Report
शिर्डी साईबाबा भक्तनिवास में विनयभंग का आरोप, आरोपी फरार
Shirdi, Maharashtra:शिर्डी साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासातील धक्कादायक प्रकार... साईभक्त महिला तरुणींची सुरक्षा रामभरोसे..? साईबाबा संस्थानच्या 500 रूम भक्तनिवासातच परराज्यातील तरूणी भाविकाचा विनयभंग साई संस्थानात काम करणाऱ्या सफाई कंत्राटी कामगाराने केला तरुणीचा विनयभंग.. पीडितेकडून पोलिसांत विनयभंगाची तक्रार दाखल... तरूणी रूम मध्ये एकटी असताना केला विनयभंग... आरोपी अमन पठाण हा भक्तनिवासातील कंत्राटी सफाई कामगार... आरोपी फरार , शिर्डी पोलीसांकडून शोधमोहीम सुरू... आरोपी अमन पठाणला साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने केले निलंबीत...0
0
Report
Advertisement
उद्धव ठाकरे के शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर भाजपा में शामिल
Ratnagiri, Maharashtra:उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी म्हणुन सहदेव बेटकर यांचा चेहरा भाजप प्रवेशा आधीच सहदेव बेटकर यांचा पदाचा दिला आहे राजिनामा बुधवारी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश0
0
Report
सांगली में 14 वर्षीय नातू की हत्या के मुख्य आरोपी निलेश गडडे गिरफ्तार
Sangli, Maharashtra:स्लग - १४ वर्षीय मुलाच्या हत्येच्या मुख्य संशयितास अटक. अँकर - सांगली पोलिसांनी अखेर माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या नातूच्या हत्या प्रकरणी मुख्य संशयित हल्लेखोर निलेश गडडे याला गजाआड केले आहे. तीन दिवसांपूर्वी सांगली शहरातल्या अभयनगर येथे माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून निलेश गडडे व त्याच्या साथीदारांनी हवेत गोळीबार करत बंडगर यांच्या १४ वर्षीय नातूच्या डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून केला होता, या घटनेने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ आली होती. या प्रकरणी सांगली पोलिसांनी गतीने तपास करत मुख्य संशयित निलेश गडदेला अखेर अटक केली आहे. सीमेनं असणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या एका लॉज मध्ये निलेश गडडे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून गडदेला अटक केली आहे.0
0
Report
राज्य के स्कूलों में स्मार्ट उपस्थिति लागू, पहली से बारहवीं तक 100% ऑनलाइन उपस्थिति
Washim, Maharashtra:राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल होणार असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती आता पूर्णपणे ऑनलाइन नोंदवली जाणार आहे. शिक्षण विभागाने ‘स्मार्ट उपस्थिती’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून दररोज शंभर टक्के उपस्थिती ऑनलाइन नोंदविणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.विद्या समीक्षा केंद्राच्या स्विफ्टचॅट अँपमधील स्मार्ट उपस्थिती बॉटद्वारे ही नोंद केली जाणार आहे.वाशिमसह विदर्भातील शाळांमध्ये ही प्रणाली ३० जूनपासून लागू होणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती,अनुपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीवर रिअल टाईम पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.0
0
Report
Advertisement
