445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापूर प्रवेश कर विवाद से महापालिका में सियासी हलचल
Kolhapur, Maharashtra:प्रवेश कराच्या मुद्द्यावर कोल्हापूरात राजकारण तापले. उद्याच्या महापालिका महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष. कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेश कराच्या प्रस्तावावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. एमएच-09 आणि एमएच-51 या स्थानिक वाहनांना वगळून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या बाहेरील भाविक आणि पर्यटकांकडून प्रवेश कर आकारावा, असा प्रस्ताव ठाकरे गटाचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी उद्याच्या महासभेत मांडणार आहेत. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांमध्येच मतभेद उघड झाले आहेत. कोल्हापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून प्रवेश कराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शहरातील आर्थिक अडचणी आणि महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील वाहनांकडून प्रवेश कर आकारण्याची कल्पना पुढे आली आहे. ठाकरे गटाचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी उद्याच्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. एमएच-09 आणि एमएच-51 या कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनांना वगळून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून हा कर आकारण्याची मागणी करण्यात आली आहे. सुनील मोदी यांनी या प्रस्तावाचे समर्थन करताना महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत अत्यंत कमी असल्याचे सांगितले आहे. प्रवेश कराच्या माध्यमातून मिळणारा निधी शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधांवर खर्च करता येईल, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. गटनेत्यांच्या बैठकीतच सुनील मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव आणू नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात महापालिका प्रशासनाची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासनाने स्वतःचा अधिकृत प्रस्ताव न आणता सदस्यांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे आणल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी हा सदस्य ठराव असून तो मंजूर झाल्यास शहराच्या विकास कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रवेश करामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार की भाविक आणि पर्यटकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार, यावर राजकीय चर्चा रंगली आहे. गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रस्तावावर उद्याच्या महासभेत काय निर्णय होतो, याकडे कोल्हापूरकरांसह अंबाबाई भक्तांचे लक्ष लागले आहे..0
0
Report
परतूर नगर परिषद ने सफाई कर्मचारियों के वेतन नहीं दिए, कर्मियों ने किया आंदोलन
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग परतूर नगर परिषदेनं स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून पगार थकवले स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन संतप्त स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ठोकले नगरपरिषदेला कुलूप पगार होईपर्यंत कुलूप उघडू देणार नाही,स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ईशारा अँकर :जालन्यातील परतूर नगर परिषदेने तब्बल एक वर्षांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परतूर नगर परिषदेला कुलुप ठोकत नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कामबंद आंदोलन केलंय.एप्रिल महिन्यात पगाराचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलं होतं मात्र नगर परिषदेने पगाराचा प्रश्न सोडवला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अखेर नगर परिषदेला कुलूप ठोकत कामबंद आंदोलन केलं. जोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याच्या पगाराचा प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत कुलूप काढू देणार नसल्याचा ईशारा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिलाय. बाईट : स्वच्छता कर्मचारी0
0
Report
महाराष्ट्र महामार्ग के खतरनाक क्षेत्रों में तात्कालिक उपाय और जांच शुरू
Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र राज्य सडक विकास महामंडळाने महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी दिल्या. सातारा- पंढरपूर महामार्गावरील तांदुळवाडी हद्दीत रस्त्यालगत धोकादायक तीन विहिरी असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तात्काळ रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे. तसेच अपघात प्रवण क्षेत्रावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यासाठी सूचना करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे सा, भूसंपादन प्रमाणे रस्ता झाला आहे का, मार्गावरील पुल व रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी, रस्त्यावर गतिरोधक, लोखंडी बॅरिकेट, रिफ्लेक्टर संरक्षण कठडे, प्रकाश व्यवस्था, यासारख्या उपाययोजना आहेत का याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील ग्रामस्थांनी तांदुळवाडी हद्दीत वारंवार अपघात घडत असून रस्त्याची काम भूसंपादनाप्रमाणे झाले नाही. रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच तांदुळवाडी हद्दीतील उघडे पुलावर सतत खड्डे पडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. सदर पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी केली. जिल्हाधिकारीांनी तांदुळवाडी हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या तीन विहिरींची तसेच उघडे पूल येथील पाऊणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में शिंगणापूर बांध लीकेज से जल संकट, आपूर्ति युद्ध स्तर पर मरम्मत
Kolhapur, Maharashtra:नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या कोल्हापूरकरांवर ओढवली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्याच्या बरग्यांना गळती लागल्याने ते बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जेसीबीच्या सहाय्याने ही दुरुस्ती करत आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने उपसा बंदी देखील लागू केली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
शिवसेना का ट्रैक्टर मार्च: बीड में किसानों की कर्जमाफी की मांग
Beed, Maharashtra:बीड : शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेना आक्रमक; जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला बीड मधील ट्रॅक्टर मोर्चा..! शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आज मराठवाडाभर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर "नको अटी - नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती" या घोषवाक्याखाली आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले आहेत. राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारीपणा, पिकांना मिळणारा कमी दर, खतांचा तुटवडा, अपुरा वीजपुरवठा आणि विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरीांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही धडक ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान जर सरकारने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्राचा नेपाळ होईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी दिला आहे...0
0
Report
लातूर में रविकांत तुपकर के उपोषण के समर्थन में किसान, कर्जमाफी बिना शर्त की मांग
Latur, Maharashtra:লातুর 브েকিং न्यूज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपोषण आंदोलनाला लातूर मधून पाठिंबा... शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा तीव्र.... शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी संघटनेने लातूरमध्ये आंदोलन केलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशावर शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या अध्यादेशाची प्रतीकात्मक होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.0
0
Report
Advertisement
पंढरपुर: भाजपा शुद्धीकरण के बाद किसान आक्रामक, गोमूत्र-चंद्रभागा पर नाराजगी
Pandharpur, Maharashtra: Anchor - पंढरपुरात भाजपच्या शुद्धीकरण कार्यक्रमानंतर सर्वसामान्य शेतकरी आक्रमक, भाजपला शेतकऱ्यांची एलर्जी आहे काय ? पंढरपुरातील आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या जागेच्या ठिकाणी गोमूत्र आणि चंद्रभागेचे पाणी टाकून शुद्धीकरण केलं यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी बसलेली जागा अपवित्र असू शकते का असा सवाल या शेतकऱ्याने भाजपला विचारलेला आहे. गोरक्षणापर्यंत असलेला विषय गोमुत्रापर्यंत आणलेला आहे हे सहन केले जाणार नाही शेतकऱ्यांची चेष्टा सुरू झाली आहे. भाजपने अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या लोकांना आवरलं नाही तर शेतकऱ्याकडे सहा बैलांचा नांगर असतो त्या नांगरा सहित आम्हाला तुमच्या दारात यावं लागेल असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.0
0
Report
शिवसेना-शिंदे और भाजपा विटा में बैठक, नाराज़गी नहीं; स्नेहभोजन भी
Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप नेत्यांची सांगलीच्या विटा येथे बैठक पार पडणार आहे. शिवसेना नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार असून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ही बैठक होणार आहे. बैठकीमध्ये मतदान कसं करावं, याबाबत मार्गदर्शन होणार आहे. उद्या विटा येथेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे.0
0
Report
नाशिक की तपोवन रोड पर सुटकेस में महिला का शव मिला, पुलिस जांच शुरू
Nashik, Maharashtra:नाशिकच्या तपोवन रोडवर गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेला नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. हा मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली जात असून फॉरेन्सिक टीम कडून तपास केला जात आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीचा मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अधिकचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
Advertisement
सोलापुर के मंत्री जयकुमार गोरे ने नए शिवसेना गुट को बधाई, महायुती में हलचल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिवसेनेच्या नवीन गटाला माझ्या शुभेच्छा - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे (पालकमंत्री,सोलापूर) *ऑन माळशिरस अपघात* माळशिरसच्या अपघाताचा कारण आपल्या सर्वाना माहीत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला पण त्या विहिरीला संरक्षण कठडा असला असता अपघात झाला नस्ता. संबंधित जो ठेकेदार आहे त्याला अनेकदा नोटीसा पाठवल्या दिल्या होत्या. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला आहेत त्या ठेकेदाराला सोडलं जाणार नाही राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या जवळच्या विहिरींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विहीरीना संरक्षण कटडे करावे लागतील तर काही विहिरी बुजवावी लागतील. कुठल्याही विभागाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. *ऑन ठाकरे गट खासदार(स्वतंत्र गट)* *नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत.* *असा कोणता नवीन गट तयार होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू...* मी जिल्हा पातळीवरील छोटा कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी चालतात याची मला कल्पना नाही. ज्यांनी नारीवंदन विधेयकाचा विरोध केला त्यांना त्याचे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प केला आहे. जे जे घटक नारिवंदन विधेयक मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्या पक्षामध्ये असंतोष आहे. भविष्यात हे बिल मंजूर होईल आणि महिला भगिनींना न्याय मिळेल. *ऑन विधानपरिषद निवडणूक व्हीप* व्हीप बजावणे ही पक्षाची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भाजप कोणाला घाबरत नाही.भाजप उमेदवाराचे सर्व मतदार ठाम आहेत. भाजपकडे जेवढे मत आहेत त्याहून 200 अधिक मते घेऊन आम्ही निवडून येऊ विरोधक झोपतात म्हणून त्यांना घरी बसण्याची वेळ आलीय. *ऑन सातारा विधान परिषद निवडणूक* पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. शिवसेनेचा निर्णय आजउद्यापर्यंत होणे अपेक्षित आहे,तोही निर्णय होईल. महायुती मजबूत आहे अजिबात चिंता करू नका.. भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था करायची आहे ती केलेली आहे. शिवसेना आणि आम्ही सोबत आहोत,शिवाय हा जर तरचा विषय आहे. *ऑन शंभूराजे देसाई* साताऱ्यात निधी देण्याचा अधिकार हा शंभूराजे यांनाच आहे.त्यामुळे ते निधीवरून बिलकुल नाराज नाही. आम्ही महायुती म्हणून शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस आणि आणखी छोटेछोटे पक्षही आमच्या सोबत राहतील. *ऑन विधान परिषद गृहपाठ* मिरीटचा विद्यार्थी कधीही पुस्तकं बाजूला ठेवत नाही,मिरीटचा विद्यार्थी हा नेहमी पुस्तकं घेऊनच अभ्यास करत असतो. या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही,मग ती राजकीय शाळा असो किंवा आणखी कोणतीही असो.. *ऑन अभिजित दिपके मारहाण* आम्ही या गोष्टीची समर्थन करणार नाही,का झाले याच्या खोलात मी जाणार नाही.आपण सर्वांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. *ऑन शिवसेना निधी* जो निधी आम्हाला साताऱ्यात शिवसेनेकडून मिळाला त्याच्या दहापट निधी आम्ही सोलापुरात शिवसेनेला दिलेला आहे. त्याताली शिवसेनेतील एखाद्या नेत्याला अपेक्षित असणारे काम झालेलं नसेल तर ते भविष्यात आम्ही करू *ऑन रोहित पवार आंदोलन* हे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होत की प्रसिद्धीसाठी याच उत्तर शोधलं पाहिजे.. बाईट - जयकुमार गोरे (पालकमंत्री)0
0
Report
खारघर में अखंड पानी के लिए मनसे ने अर्धनग्न मोर्चा निकाला
Navi Mumbai, Maharashtra:खारघर में अखंडित और मुबलक पानी पुरवठा सुनिश्चित कराने के लिए मनसे के तरफे अर्धनग्न आंदोलन किया गया. खारघर में पानी समस्या जटिल है. मनसे द्वारा SIDCO कार्यालय के पास अर्धनग्न मोर्चा निकालकर अधिकारियों को अपूर्ण पानी आपूर्ति के विरोध में जवाब मांगा गया. मनसे कार्यकर्ताओं ने टॉवेल और बनियान पहने हाथों में बालदी लेकर SIDCO कार्यालय पहुँचे और पानी की आपूर्ति में कमी के मामलों पर SIDCO अधिकारियों को जवाबदेह ठहराया. आगे यदि पानी की कमी बनी तो खारघर वासियों के लिए और तीव्र आंदोलन की चेतावनी दी.0
0
Report
सातारा-सांगली महायुती में तनाव, आज सातारा में किंगमेकर भूमिका पर महत्त्वपूर्ण बैठक
Satara, Maharashtra:सातारा -सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान महायुतीतील तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.. सातारा-सांगलीत शिवसेना ठरणार 'किंगमेकर' आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्षयाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडत असून मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरू झाली आहे.. याविषयीचा आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
चंद्रपूर महापालिका में कांग्रेस गुटों के बीच गटनेता चयन को लेकर विवाद बढ़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर (चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस वाद) - चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच वाढला आहेय... धानोकर गटाकडून वेगळ्या गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश अडुर यांच्या विरोधात १६ नगरसेवक एकवटले आहे. त्यांनी धानोरकर यांचकडून वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केल्याची सूत्रांची माहिती आहे... त्यामुळे गटनेता बदलासाठी आज विभागीय आयुक्तांची भेट घघेत आहे. महानगरपालिका सत्ता स्थापन करतानाही गटनेता धानोरकर किंवा वडेट्टीवार गटाचा होणार यासाठी चांगलाच वाद तापला होता... त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आणि मध्यस्थी करून वाद मिटवला होता...मात्र आता हा वाद पुन्हा उफाळला आहे.. २७ पैकी १६ नगरसेवकांचा अडूर यांच्याविरोधात दावा चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर-वडेट्टीवार गटांतील संघर्ष पुन्हा उफाळला बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग0
0
Report
उद्धव ठाकरे की शिवसेना ने किसानों के पूर्ण कर्जमुक्ति के लिए ट्रैक्टर मोर्चा निकाला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि ऑनलाईन खतांची पद्धत बंद करण्यासाठी ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला.. क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध केला संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळेस या आंदोलकांनी दिला, विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तूर्तास आंदोलनाची सांगता झाली आहे मात्र सरकारने गांभीर्याने घ्यावा सरकार शेतकऱ्यांसाठी गंभीर नाही असा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला आणि संपूर्ण कर्जमुक्ती शिवाय सरकारची सुटका नाही असा इशाराही यावेळी दिला...0
0
Report
रत्नागिरी के गुहागर तट पर पानी का सुनहरा रंग, स्थानीयों में हड़कंप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गुहागर समुद्र किनाऱ्यावरील पाण्याला आला सोनेरी रंग.... स्थानिकांमध्ये संभ्रम असगोली येथील समुद्र किनाऱ्यावर पाण्याला मोठ्या प्रमाणात सोनेरी रंग आल्याने संभ्रमाचे वातावरण. गडद सोनेरी रंगासह काही भागात पाणी काळवंडले असल्याचा प्रकार. नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळ्या रंगाचे पाणी दिसू लागल्याने चर्चांना उधाण. गडद सोनेरी रंग आल्याचे कारण अस्पष्ट.....शोध घेण्याची गरज.0
0
Report
Advertisement
