icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

GB क्लब मालिक के हेरासमेंट से रमण बाच्छील ने आत्महत्या; मोबाइल वीडियो में आरोप

Bhandara, Maharashtra:व्यावसायिक छळाला कंटाळून आत्महत्या..... मोबाईलमध्ये आढळलेल्या व्हिडिओत जीबी क्लब मालकावर गंभीर आरोप.... भंडारा शहरातील जीबी क्लबचे मालक गुड्डू उर्फ ललित सिंग बैस यांच्या कथित त्रासाला कंटाळून रमण सिंग बाच्छील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी बाच्छील यांनी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बैस यांच्या त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी बैस यांनी विविध प्रकारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर बाच्छील यांनी वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. मोबाईलमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर मृतकाच्या पत्नी व भावाने भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

गर्मी में जानवरों के लिए किसान प्रकाशराव हराळ ने गांव में पानी स्रोत बनवा दिया

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत हिंगोलीच्या कापडशिंगी येथील शेतकरी प्रकाशराव हराळ यांनी पुढाकार घेत गावातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची हौद बांधून मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या या हौदमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर जनावरे पाणी पिण्यासाठी येत आहेत वाढत्या उष्णतेमुळे तलाव नदी नाले आणि विहिरी कोरड्या पडत असताना या शेतकऱ्याने गावातील जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे..
0
0
Report

कोरेगाव तालुक्यात अर्धवट रस्ते कारण हादसे, हलगी आंदोलन के साथ आश्वासन मिला

Satara, Maharashtra:साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात सातारा सोलापूर राज्य महामार्गावर वडाचीवाडी येथे मागील सात वर्षापासून अर्धवट रस्त्याचे कामामुळे या भागात अनेक अपघात होत आहेत प्रशासनाला सांगूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ग्रामस्थांच्या समवेत हलगी नाद आंदोलन केले यावेळी राज्य महामार्गाचे मेघा इंजिनिअरिंगचे समन्वयक श्रीकांत घाडगे यांनी येणाऱ्या 27 मे पर्यंत या भागातील प्रलंबित रस्त्याची कामे पूर्ण होतील असे आश्वासन यावेळी दिले. या आंदोलनात वडाचीवाडी सांगवी चिमणगाव आझादपूर चिमणगाव गोठा रामोशीवाडी खेळखंडी गोळेवाडी एकंबे गावांमधील ग्रामस्थ सहभागी झाले होते
0
0
Report
Advertisement

अकोला में भीषण गर्मी: तापमान 46°C, नागरिकों के लिए चेतावनी जारी

Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून अकोला महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पहुरकर यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगितले आहे. चक्कर येणे, उलटी होणे, पोटदुखी, अंग गरम होणे, अशक्तपणा जाणवणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, ओआरएसचे सेवन करावे तसेच सैल आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत महानगरपालिकेकडून पाणपोई सुरू करण्यात आल्या असून नागरिकांना ओआरएस पावडरचे वाटपही करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघातग्रस्तांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.दरम्यान, सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अकोलेकरांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
0
0
Report

जालना में डीजल- पेट्रोल टंकी खाली, ग्रामीण पंपों पर किसान की लंबी कतारें

Jalna, Maharashtra:जालना : ग्रामीण भागातील अनेक पंपांवर परिस्थिती बिकट, शेतीची कामे खोळंबली ४८ पेट्रोलपंप बंद; ८० पंपांवर रांगा अनेक ठिकाणी कामे थांबवून पंपांवर कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे जालना जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा ८० पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. विशेषतः डिझेलसाठी ग्रामीण भागात नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काल सायंकाळपासून १७० पैकी ४८ पेट्रोल पंपांवरील इंधन संपलेले होते. जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरही इंधनाचा साठा संपल्याने 'नो-स्टॉक'चे बोर्ड झळकत होते. जिथे इंधन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी रांगा दिसून येत होत्या. सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांचा वापर करत असल्याने डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र पुरवठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कामे थांबवून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. तर अनेक ठिकाणी इंधन मिळत नसल्याची तक्रार वाहनधारकांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में पानी संकट रोकने के लिए उपमहापार ने जलशुद्धीकरण केंद्र की समीक्षा की

Akola, Maharashtra:अकोला शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर अमोल गोगे यांनी महान धरण आणि महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. धरणातील उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.सध्या महान धरणात २५.४४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध साठ्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन काटेकोर आणि सुयोग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील विविध प्रक्रियांची पाहणी करून पाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, तसेच नागरिकांनाही पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
0
0
Report

सsolapur महापालिका के अतिक्रमण विभाग में स्क्रैप चोरी के आरोप, अमोल शिंदे ने घेरा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप चोरी होत असल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या आरोप, आरोपनंतर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप दिवसाढवळ्या चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेनीं आणला चव्हाट्यावर - कोणतीही अधिकृत परवानगी किंवा पावती नसताना अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या समोरच स्क्रॅप चोरी होत असल्याची धक्कादायक बाबसमोर - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील पहिला टेम्पो निघून गेला त्यानंतर दुसरा टेम्पोत स्क्रॅप भरत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी टाकली धाड - महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी जग्गनाथ बनसोडे यांच्यासह इतर पाच जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - स्क्रॅप खाजगी वाहनात भरतानाच्या हालचाली या संशयास्पद असल्याची महापालिकाेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कबुली - अतिक्रमण विभागाचे अधिकारी जग्गनाथ बनसोडेंनवर गुन्हा दाखल झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ? - खाजगी वाहनात स्क्रॅप भरतानाचे कर्मचारी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना पाहताच पळून गेल्याने अनेक चर्चांना उधाण - संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आक्रमक
0
0
Report

पुणे से अक्कलकोट जा रही परिवार की ट्रक दुर्घटना में तीन मृत, चार घायल

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धावत्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झाला भीषण अपघात. पुण्याच्या देहूरोड येथील रवि खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी जात होते. या अपघातात सिंधू रवि खंडागळे (वय ४२), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय ४५) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय ३२) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलिसात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

नीलम गोरे ने कल्याण रेलवे यार्ड मामले की समीक्षा के साथ सुरक्षा उपायों की मांग

Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे यार्ड अत्याचार प्रकरण के संबंध में नीलम गोरे ने आढ़ावा लिया। पुलिस प्रशासन के साथ बैठक के अलावा पीड़ित परिवारों से मुलाकात की गई। पीड़ित लड़की की शिक्षा की पूरी जिम्मेदारी शिवसेना संभालेगी। इस प्रकरण में पुलिस चार्टशीट जल्द दाखिल होगी। रेलवे परिसर के आसपास खाली इमारतों को ढहाने या वहां सुरक्षा रक्षक तैनात करने की मांग, रेलवे पुलिस और स्थानीय पुलिस के बीच समन्वय बढ़ाने के निर्देश, रेलवे यार्ड में सर्च लाइट और CCTV लगाने की सलाह नीलम गोरे ने दी। केंद्र/राज्य सरकार से 140 पॉक्सो कोर्ट का प्रस्ताव मंजूर हुआ है, पर उपलब्ध कोर्ट केवल 38 हैं। बाकी कोर्ट आने तक केस लटकता है।
0
0
Report

नासिक के येवल्या गांव में ट्रैक्टर ट्रॉली के भूस में आग, किसान को नुकसान

Yeola, Maharashtra:नासिक जिल्ह्यातील येवल्याच्या नगरसुल येथील भडके वस्तीवर मक्याच्या भुसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीतील मक्याच्या भुसाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रॉलीमधील संपूर्ण मक्याचं भूस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिकांनी आग लागल्याचे दिसतात ट्रॅक्टर चालकाला याची माहिती दिली असता त्वरित ट्रॅक्टर थांबून ट्रॅक्टर व ट्रॉली बाजूला केली. ट्रॅक्टर चालक मक्याचं भूस घेऊन जात असताना विजेच्या तारांचीं ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच ट्रॉलीतील कोरड्या भुसाने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
0
0
Report

तुर्भे डम्पिंग ग्राउंड के विरोध में आमरण उपवास, रास्ता रोको कर प्रदर्शन

Navi Mumbai, Maharashtra:तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये उभारण्यात येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पा विरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टी वासीयांनी विरोध दर्शवत आमरण उपोषणाला सुरुवात केलय. आज सायंकाळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको देखिल केला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी ठाणे बेलापूर रोड वर उतरत चक्काजाम आंदोलन करत प्रशासना पर्यंत आपला आवाज पोहचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमरण उपोषणाला बसलेल्या नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत शांततेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन केल्यावर हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय.
0
0
Report
Advertisement

तुर्भे डम्पिंग ग्राउंड की वेस्ट टू एनर्जी परियोजना रोकें, उपोषण जारी रहेगा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंड मध्ये वेस्ट टु एनर्जी हा प्रकल्प महापालिकेतर्फे राबविण्याचा घाट घातला जात असून याविरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टी धारकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प राबविल्यास झोपडपट्टी भागात पुनर्विकास प्रकल्प राबविता येणार नाही. यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण निर्माण होणार आहे. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प रद्द करावा अन्यथा आमरण उपोषणावरून उठणार नाही असा थेट इशारा नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी मनपा प्रशासनाला दिलाय.
0
0
Report

गडचिरोली में काँग्रेस का धरणा, भूमि-धिग्रहण में प्रशासनिक मनमानी

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील एमआयडीसी आणि विमानतळाच्या जागेसाठी भूमीअधिग्रहण संदर्भात प्रशासनाची मनमानी सुरू असल्याच्या आरोप करत काँग्रेसने केले धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया पुढे एकत्र आले संबंधित गावातील हजारो नागरिक, सकारात्मक निर्णय न झाल्यास चार जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा केला निर्धार अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील एमआयडीसी आणि विमानतळाच्या जागेसाठी भूमीअधिग्रहण संदर्भात प्रशासनाची मनमानी सुरू असल्याच्या आरोप करत काँग्रेसने आज  धरणे आंदोलन केले.  जिल्हाधिकारी कार्यालया पुढे संबंधित गावातील हजारो नागरिक एकत्र आले. यासंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास चार जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा  निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा दावा करणाऱ्या सरकारकडून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एमआयडीसीच्या या दडपशाही धोरणाविरोधात १४ गावांतील नागरिकांनी एकत्र येत 'मुंडण आंदोलन' केले होते. सरकार आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, "सरकार गडचिरोलीला विकासाकडे नाही, तर विनाशाकडे घेऊन जात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

जुन्नर के पश्चिम आदिवासी क्षेत्र में जल संकट पर प्रशासन ने ठोस आदेश दिए

Barav, Maharashtra:*ब्रेकिंग* *पुणे* *जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न आता थेट पुणे जिल्हा परिषदेत पोहोचला* जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषद सीईओ यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले* जुन्नरच्या आदिवासी भागात शासनाचे पाण्याचे टँकर वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप करत, जलजीवन मिशनची कामेही अत्यंत बोगस पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप माई लांडे यांनी केला. अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने संतप्त झालेल्या माई लांडे थेट हंडा घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी परिस्थितीची दखल घेत प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात टँकर वेळेत पोहोचवावेत, गरज पडल्यास टँकर संख्या वाढवावी तसेच रोजचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ठिकाणी निकृष्ट किंवा बोगस कामे झाली आहेत, त्या प्रकरणांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पश्चिम आदिवासी भागाचा दौरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी बोलताना माई लांडे म्हणाल्या, “माझ्या माणसांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे। समस्या सुटल्या नाहीत तर जिल्हा परिषद जनरल बॉडीमध्ये अधिक आक्रमक भूमिका घेऊ, आणि गरज पडल्यास आदिवासी महिलांसह उपोषण आंदोलन करू.” पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याने जुन्नर तालुक्यातील परिस्थितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top