Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 13, 2026 04:34:41
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावजवळील विंचूर येथील अल्पभूधारक शेतकरी निलेश गायकवाड व शरद गायकवाड या काका-पुतण्यांनी पारंपारिक कांदा व द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून फुलशेतीचा यशस्वी प्रयोग राबवत महिन्याला ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे बाजारातील चढ-उतार आणि पारंपारिक पिकांमधील अनिश्चित उत्पन्नामुळे त्यांनी शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेत एक एकर क्षेत्रात पिवळा व अष्टगंध झेंडू, गेलडा तसेच सफेद फुलांच्या चार ते पाच विविध जातींची लागवड केली. फुलशेतीसाठी नियोजनबद्ध सिंचन व्यवस्था उभारून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला सुरुवातीला फुले बाजारात विक्रीसाठी पाठविली जात होती मात्र अपेक्षित नफा मिळत नसल्याने त्यांनी व्यवसायात बदल करत फुलांपासून हार-माळा तयार करून घरपोच सेवा सुरू केली या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून सध्या या फुलशेतीतून दरमहा सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळत आहे या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुकर झाला असून शेतीत नवनवीन प्रयोग आणि मूल्यवर्धन केल्यास अल्पभूधारक शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, असा संदेश गायकवाड काका-पुतणे देत आहेत
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 04:32:45
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर|आखाती देशांतील युद्धाचा फटका शेतकऱ्यांना; टरबूजाचे दर कोसळले,शेतकरी चिंतेत अँकर :आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवरही दिसू लागला आहे. इराण-इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून महाराष्ट्रातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावातील शेतकरी एकनाथ लेंभे यांनी दोन एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च आला होता. सुरुवातीला टरबूजाला चांगला भाव मिळत होता. मात्र युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्यात ठप्प झाल्याने बाजारात दर घसरले.सध्या टरबूजाला अवघा सात ते आठ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बाईट- एकनाथ लेंभे , टरबूज उत्पादक शेतकरी,
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 13, 2026 04:20:15
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे भर दिवसा एका २२ वर्षीय युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित दहीफळे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार बस स्थानक परिसरातील एका दुकानासमोर घडला असून हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ ही आता समोर आला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आता समोर आली असून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. हे हल्लेखोर नेमके कोण आहेत यांचा शोध पोलीस घेत आहेत....
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 13, 2026 04:19:59
Beed, Maharashtra:बीड: बस उशिरा, पण रंगला ठेका! बीड बसस्थानकात चिमुकल्या कलाकारांची lावणी; प्रवाशांचा टाळ्यांचा कडकडाट..!! ANC - बस उशिरा येणं ही प्रवाशांसाठी सहसा त्रासदायक बाब असते. मात्र बीड बसस्थानकात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. बसची वाट पाहताना काही क्षणातच बसस्थानक छोट्याशा रंगमंचात बदललं आणि प्रवाशांचं मन जिंकून घेतलं ते तीन चिमुकल्या कलाकारांनी.... बाल नृत्य कलाकार वैभवी टाखनकार आणि तिच्या दोन मैत्रिणी कुटुंबासोबत बीडहून माजलगावकडे आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर थांबल्या होत्या. संध्याकाळचे सुमारे आठ वाजले होते. बस उशिरा असल्याने सर्व प्रवाशी प्रतीक्षेत होते. याच वेळी प्रवाशांचं मनोरंजन करण्यासाठी या तिन्ही बाल कलाकारांनी अचानक लावणीच्या गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या अचूक हालचाली, आत्मविश्वास आणि नृत्यकौशल्य पाहून बसस्थानकातील प्रवाशी अक्षरशः थक्क झाले. काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला, तर अनेकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या चिमुकल्यांना भरभरून दाद दिली. दरम्यान बसस्थानकावर घडलेला हा अनपेक्षित “लावणीचा जल्लोष” प्रवाशांसाठी अविस्मरणीय ठरला...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 13, 2026 04:19:11
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 13, 2026 04:18:53
Ambegaon, Maharashtra:गॅस टंचाईचा फटका शालेय पोषण आहाराला बसत असून आंबेगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयात पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढ्याच गॅस टाक्या उपलब्ध आहेत, रिलायन्स कंपनीचा खाजगी गॅस हा येथे स्वयंपाक बनवण्यासाठी वापरला जातो त्याचे दर हि 350 रूपयांनी वाढले असून अधिकचे पैसे देऊन सुध्दा आता हा गॅस उपलब्ध होत नसल्याने त्यासंदर्भात येथे जेवण बनवणाऱ्या बचत गटाच्या महिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकां सह तहसीलदारांना या संदर्भातली माहिती कळवलीय परिणामी या पुढच्या काळात गॅस उपलब्ध झाला नाही तर शालेय विद्यार्थ्यांच्या भोजनावरती याचा मोठा परिणाम होऊन ते बंद करण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे, याचाच आढावा घेत बचत गटाच्या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यांनी...
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 13, 2026 04:08:01
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 13, 2026 04:07:49
Amravati, Maharashtra:मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, युवक काँग्रेसचा आरोप; चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या बंद अवस्थेत आहेतर काही ठिकाणी योजना केवळ कागदोपत्रीच असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मेळघाटातील अनेक टंचाईग्रस्त गावांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि मेळघाटातील सर्व पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. दरम्यान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी पुराव्यांसह हा संपूर्ण प्रकार उघड करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून टंचाईग्रस्त गावांना न्याय द्यावा अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 13, 2026 04:06:49
Nagpur, Maharashtra:नागपुर - राजस्थान के सालासर रोड पर भीषण दुर्घटना में नागपुर के कमठी के पारसे परिवार के तीन सदस्य की मौत हो गई. माता-पिता और बेटा मौके पर ही मर गए; छह अन्य लोग गंभीर रूप से घायल हो गए. मृतकों में महादेव पारसे, उनकी पत्नी कांता और पुत्र घनश्याम शामिल हैं. खाटू श्याम बाबा के दर्शन के लिए जाते समय टवेरा गाड़ी को पिकअप ने जोरदार टक्कर मारी. घायलों में चालक मनोज चिन्दामवार सहित आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे और पवन बागडे शामिल हैं. सभी घायलों का उपचार सालासर के अस्पताल में जारी है. दुर्घटना की सूचना मिलते ही कमठी के कचरीपुरा क्षेत्र में शोक की लहर दौड़ गई. शवों को पोस्टमार्टम के बाद कमठी लाया जाएगा.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 13, 2026 04:06:37
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 13, 2026 04:05:14
Varasoli, Maharashtra:आखाती देशातील युद्धाचा देवस्थानांवर परिणाम.... बल्लाळेश्वर देवस्थान येथील प्रसादालय बंद.... देवस्थान संस्थेचा निर्णय.... आज शुक्रवार 13 मार्च पासून अनिश्चित काळासाठी केले प्रसाद गृह बंद.... स्वयंपाकसाठी गॅस उपलब्ध नसल्याने घेण्यात आला निर्णय.... बल्लाळेश्वर हे अष्टविनायक पैकी पाली येथील एक महत्वाचे क्षेत्र... अँकर - आखाती युद्धाचा देशातील देवस्थानांवर देखील परिणाम होत आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानने आता प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून अनिश्चित काळासाठी येथील प्रसादालय बंद राहणार आहे. स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्यानं देवस्थान विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. तशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 04:05:02
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग जालन्यात 50 हजार रुपयांची लाच घेताना मंठा येथील पोलीस निरीक्षकासह पोलीस अमंलदार जेरबंद वाळू वाहतूक टिप्परवर कारवाई न करण्यासाठी स्वीकारली लाच पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि अमंलदार रवी जाधव अशी आरोपींची नावं छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत विभागाची कारवाई अँकर- जालन्यात 50 हजार रुपयांची लाच घेतताना मंठा येथील पोलीस निरीक्षकासह एका पोलीस अमंलदाराला एसीबीने जेरबंद केलंय.. पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि अमंलदार रवी जाधव अशी आरोपींची नावं आहेत.. तक्रारदार यांच्याकडून वाळू वाहतूक करणार्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी महिन्याला हप्ता 50 мың रुपयांची मागणी केली होती. त्यातील 10 हजार रुपये घेऊन उर्वरित 40 हजार रुपये देणे बाकी होते.. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत विभागात तक्रार दिली. त्यानुसार लाच लुचपत विभागाने सापळा लावून मंठा पोलीस स्टेशनमध्ये उर्वरित लाच घेतताना पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि अमंलदार रवी जाधव याला रंगेहाथ अटक केलीये.. पुढील कारवाई सुरु आहे..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 13, 2026 04:04:00
Amravati, Maharashtra:छत्री तलाव डोंगरावर भीषण अग्नितांडव की षडयंत्र; पोहरा जंगलातील ७-८ किमी अंतरावरील वनसंपदा खाक छत्री तलावाच्या पूर्व दिशेने छत्री तलावापासून हनुमानगढी रस्त्यावरील डोंगरावर पोहरा वनक्षेत्रात भीषण आग लागली. पाहता पाहता या डोंगरावरील आगीने लवकरच भयंकर रूप धारण केले. सुरुवातीला एक किलोमीटर परिसरात पसरलेली आगीने ७-८ किमी. चा जंगल परीसर व्यापल्याचे विदारक चित्र आगीच्या ज्वाला दुरवरून पाहता दिसत होते. आगीच्या प्रचंड ज्वालांनी हिरवीगार आणि सुकी दोन्ही झाडे पूर्णपणे राख झाले असून जंगलातील प्राणी-पक्षी सैरावैरा झाली तर काहींचा बळी गेला. आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाची गाडी पोहोचली. मात्र आग डोंगरावर लागल्याने तिथपर्यंत गाडी पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागले. अचानक एवढी भयावह आग लागली कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाचा हलगर्जीपणा की कुणाचे षडयंत्र ! अशी चर्चा आगीच्या ज्वाला दुरवरून पाहणाऱ्या शहरवासीयांमध्ये सुरु होती.
0
comment0
Report
Advertisement
Back to top