445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली के पलूस में गारपिटी से फसलें तबाह, पृथ्वीराज देशमुख ने नुकसान जायजा
Sangli, Maharashtra:सांगली के पलूस तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वी अंकलखोप परिसरात प्रचंड गारपीट होऊन केळ्याची बाग जमीनदोस्त झाली होती, तसेच अन्य शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतीची भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पाहणी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला, राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असा आश्वासन दिले आहे.0
0
Report
अंबरनाथ फ्लॅट में किरायेदार का शव मिलने से हड़कंप
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये घरात आढळला भाडेकरूचा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता आनंदविहार संकुलातील घटनेनं खळबळ पोलिसांनी शिडी लावून घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूममध्ये बेडवर झोपलेल्या अवस्थेत किरण येळणे यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांचा बहुधा झोपेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होतेय. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून त्यातून मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकणार आहे.0
0
Report
खानापूर में गर्मी से अंडे उत्पादन में रोज 8 लाख की गिरावट, पोल्ट्री किसान चिंतित
Sangli, Maharashtra:स्लग - खानापूर तालुक्यात अंडी उत्पादनाला वाढत्या उन्हाचा फटका, रोज आठ लाख अंड्याची घट.. अँकर - वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील अंडी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. रोजच्या अंडी उत्पादनामध्ये तब्बल आठ लाखांची घट होत आहे.त्यामुळे पोल्ट्री धारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.विटा परिसरा सह खानापूर तालुक्यात दररोज 2 लाख अंड्यांचा उत्पादन होतं.मात्र सध्या उन्हाच्या वाढत्या कार्यामुळे अंडी उत्पादनात मोठी घट झाली आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचे बचाव करण्यासाठी पोल्ट्री धारकांना अधिकचा खर्च देखील करावा लागत आहे.याशिवाय अंड्यांचे दर देखील आखाती युद्धामुळे कमी झाल्याने पोल्ट्री धारकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.0
0
Report
Advertisement
जऊळका में पानी कमी से मुंग की फसल संकट, किसान धरण खोलने की मांग
Washim, Maharashtra:जऊळका परिसरात शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचं सावट पसरलं आहे. मुंग पिकाला वेळेवर आणि पुरेसं पाणी न मिळाल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काटेपूर्णा धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, जऊळका या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने उन्हाळी मुंग पिकाची लागवड केली होती. मात्र पाणी अभावी पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काटेपूर्णा धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने धरणाचं खोलीकरण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.0
0
Report
शिरूर की सड़क पर गर्भवती माँ की प्रसूति, महिलाओं ने मदद से जन्म कराया
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भाग... दुपारची वेळ, आणि अचानक एका माऊलीच्या प्रसूती कळांनी परिसर हादरला. वेदना इतक्या तीव्र होत्या की पुढच्या एका मिनिटाचाही प्रवास करणं अशक्य झालं होतं. रुग्णालय दूर होतं आणि वेळ कमी... नियतीने जणू रस्त्यातच वाट अडवली होती. पण त्याचवेळी माणुसकीची ढाल होऊन शिरूरच्या रणरागिणी धावून आल्या! कोणतंही साधन नाही, ना वैद्यकीय उपकरणं... पण जिद्द होती त्या माऊलीला वाचवण्याची. परिसरातील महिलांनी तातडीने एकत्र येत आपल्या साड्यांचा आडोसा केला. गजबजलेल्या रस्त्याचं रूपांतर काही क्षणातच एका तात्पुरत्या 'लेबर रूम'मध्ये झालं. ही लढाई फक्त त्या माऊलीची नव्हती, तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माऊलीची होती. केवळ महिलाच नाही, तर माहिती मिळताच डॉ. सुनिता पोटे यांनीही क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर धाव घेतली. भर रस्त्यात, कडक उन्हात आणि धूळ-मातीच्या वातावरणात डॉक्टरांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसूती पार पाडली. अखेर त्या झाडाखालून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काळजाचा ठोका चुकलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉ. सुनिता पोटे(प्रसूती करणाऱ्या डॉक्टर) आजच्या डिजिटल युगात माणु�किती संपली की काय, असं वाटत असतानाच जोशीवाडीतील या घटनेने समाजाला एक वेगळाच आरसा दाखवलाय. माता आणि बाळ दोघेही अब सुखरूप आहेत. पण या संकटाच्या वेळी साड्यांची भिंत उभी करणाऱ्या त्या माता आणि देवदूतासारख्या धावून आलेल्या डॉक्टरांचं आज संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होतंय.0
0
Report
मुंबई में मराठी अनिवार्यता से परप्रांतीय रिक्षाचालक पलायन, हजारों परिवार घर लौटे
Dhule, Maharashtra:मुंबईत रिक्षा चालकांना मराठीची सक्ती केल्यानंतर परप्रांतीय रिक्षाचालकांनी आपल्या घरची वाट धरली आहे. परवाने असतानाही फक्त मराठी भाषा शिकायला वेळ न दिल्यामुळे हे रिक्षा चालक आपल्या गावाकडे परतत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरती अशा रिक्षा चालकांचे जथे च्या जथे दिसून येत आहेत. मराठी भाषेच्या सक्तीमुळे परप्रांतीय रिक्षाचालकांचे पलायन सुरु झाले आहे. अस्वस्थ झालेल्या रिक्षा चालकांनी संसाराच्या गाडग्यासह असंख्य रिक्षाचालक उत्तर प्रदेश-बिहारच्या वाटेवर चालले आहेत. येत्या १ मे पासून रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आल्याने, परप्रांतीय रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरांमधील हजारो परप्रांतीय रिक्षाचालक आता आपल्या मूळ राज्याकडे, म्हणजेच उत्तर प्रदेश आणि बिहारकडे परतू लागले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व रिक्षाचालक आपल्या कुटुंबासह आणि घरातील सर्व सामानासह स्वतःच्या रिक्षातूनच हा हजारो किलोमीटरचा प्रवास करत आहेत. सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो रिक्षा यूपी-बिहारकडे जाताना दिसत आहेत. प्रवासात खाण्यासाठी सोबत बेकरीचे पदार्थ आणि पाणी घेऊन हे चालक मार्गस्थ झाले आहेत. रिक्षा चालक. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे परवाना रद्द होण्याची भीती या चालकांना सतावत आहे. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा आणि परवाने घेतले आहेत, त्यामुळे आता रोजगार हिरावला गेल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आम्हाला मराठी भाषा शिकण्यासाठी सरकारने किमान काही महिन्यांचा वेळ द्यावा, एकदम परवाने रद्द करू नयेत', अशी आर्त हाक या रिक्षाचालकांनी दिली आहे. रिक्षा चालकांनी आपल्या घरची वाट धरल्याने महानगरांमध्ये रिक्षाचालकांचा तुटवडा जाणवू शकतो. प्रवाश्याना नसत्या जाचाचा त्रास सहन करावा लागेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये घराकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
कोकण में तपिश, दमट हवा से लोग परेशान; विदर्भ तक गर्मी की लहर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात दमट हवामान..विदर्भात लाट कायम राज्यात कोकणपट्ट्यात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे.. उष्णतेची लाट कायम असून पुढील तीन दिवस या भागात लाट राहणार आहे.. महाराष्ट्रावर सध्या चक्रवाती वारे तसेच विदर्भातून तामिळनाडूपर्यंत हवेचा दबाव आहे..यामुळे राज्यात ऊन पावसाचा मारा सुरू असून तापमानात चढ-उतार होत आहे.. कोकण पट्ट्यात शुक्रवारी मुंबई,ठाणे,रायगड जिल्ह्यात उष्ण हवामान होते तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती.. सध्या चिपळूण मध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे.. उन्हाच्या झळा नागरिकांना बसत आहेत..0
0
Report
शिंदे के नजदीकी राहुल गेठे को मूल सेवामें वापस भेजने का प्रस्ताव स्थगित
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त राहुल गेठे यांचे नगरविकास खात्याने महापालिकेत कायमसमावेशन केले होते. उपायुक्त राहुल गेठे यांची नियुक्ती समाप्त करून त्यांना सेवामुक्त करून मूळ सेवेकडे परत पाठविण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने आणला होता. मात्र सदर प्रस्तावा वरून भाजपाला बॅकफूट वर जावे लागलेय. सत्ताधारी भाजपने प्रस्ताव मंजूर न करता विधी विभागाकडे सखोल अभ्यासासाठी पाठविण्याचा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदे यांच निकटवर्तीय अधिकारी म्हणून ओळख असेलेले राहुल गेठे यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित झाल्याने यासाठी पडद्यामागे काय हालचाली झाल्यात याचीच चर्चा मनपा वर्तुळात रंगत आहे.0
0
Report
श शिवाजी केस में संजय गायकवाड पर धमकी का आरोप, महाराष्ट्र में हंगामा
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop MLA Gayakwad PKG Feed:- Live U Anc:- शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत... दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.. VO 1 :- शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि वाद याचे समीकरण महाराष्ट्रासाठी नवे नाही.. दोनच दिवसापूर्वी कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी याला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटननी जोरदार आवाज उठवत आमदार जगताप यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राजारामपुरी पोलिसांना धारेवर धरत अदखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यावर पोलिसांनी योग्य ते गुन्हा दाखल केला जाईल असं सांगून वेळ मारून नेली .. पण रोहित पवार निघून जाताच राजारामपुरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली, त्यामुळे प्रशांत आंबी यांनी गुन्हा दाखल केला नाही. पण प्रशांत आंबी यांनी दिलेल्या अर्जावरून पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांचा निषेध करत प्रशांत आंबी आणि पुरोगामी संघटना या पुढच्या काळात रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची भूमिका जाहीर केली. Byte:- प्रशांत आंबी, प्रकाशक शिवाजी कोण होता पुस्तक. VO 2:- आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे. त्यामुळेच आमदार गायकवाड यांच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेतील अनेक नेत्यांनी आमदार गायकवाड यांचे चांगलेच कान टोचलेत. Byte:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Byte:- सुजय विखे Byte:- नवनाथ बन VO 3:- या पुढच्या काळात विरोधी पक्षातील नेते आणि पुरोगामी संघटना आमदार संजय गायकवाड यांना वेळोवेळी जाब विचारणार आहेत.. पण दुसरीकडे इतक्या वर्षानंतर गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तकाचा वाद उतरून काढणे चुकीचे असल्याच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.. इतकच नाही तर शिवाजी हे आदरयुक्त नावच आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा शिवाजी म्हणून उल्लेख केल्याने अपमान होत नाही असं सांगत अनेक उदाहरणं दिली. Byte:- इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक VO 4:- छत्रपती शिवरायांची शिवाजी असे संबोधन करत आजवर अनेक पुस्तक प्रकाशित झाले आहेत... अस असताना आता आमदार संजय गायकवाड हे चर्चेत राहण्यासाठी असे मुद्दे उकरून स्वतः प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याचा आरोप केला जातो.. त्यामुळे किमान यापुढे तरी आमदार संजय गायकवाड यांनी कोणताही विधान करताना ते चुकीचं तरी नाही ना याची शहानिशा करणे आवश्यक आहे.. अन्यथा ते सर्वांच्या टीकेचे धनी होतील हे नक्की. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
Advertisement
जालना में रायचंद कुरंगळ के दो बैंक घोटाले: 23.33 करोड़ और 8.12 करोड़
Jalna, Maharashtra:जालना : जालना मर्चंट बँकेला 23 कोटी 33 लाखांना गंडा घालणारा मुख्य आरोपी रायचंद कुरंगळचा आणखी एक प्रताप उघडकीस, पुर्णवादी नागरीक सहकारी बँकेलाही घातला शेतमाल गोडाऊनमध्ये तारण नसताना 8 कोटी 12 लाखांना गंडा (पॅकेज) फिडमध्ये मुख्य आरोपी कुरंगळ याचा फोटो जोडलेला आहे. अँकर : जालन्यातील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेला 23 कोटी 33 लाखांचा गंडा घालणारा मुख्य रायचंद कुरंगळ याचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. कुरंगळ याने शेतमाल तारण असल्याचे भासवून शेतमाल तारण ठेवलेला नसताना शेतमाल तारण असल्याच्या बनावट पावत्या देऊन पुर्णवादी नागरीक सहकारी बँकेची देखील फसवणूक केली आहे. या फसवणूकीत त्याने बँकेला 8 कोटी 12 लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात बँकेच्या वरिष्ठांनी गोडाऊनला भेट देऊन पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्या मॅनेजरसह रायचंद कुरंगळ याच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट: सुरेश उनवणे, पोलीस निरीक्षक आर्थिक गु pran घन शाखा, जालना. व्हिओ : २: आधीच जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेला रायचंद कुरंगळ याने केलेल्या 23 कोटी 33 लाखांच्या घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्र हादरलंय. त्यात बॅंकेतील गुंतवणूकदार हतबल झालेत. अशातच रायचंद कुरंगळचा पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेत दुसरा घोटाळा समोर आल्यानं पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलाय. या घोटाळयाप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेनं फरार असलेल्या पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेच्या मॅनेजरचा शोध घ्यायला सुरुवात केलीय. बाईट : मिथून घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालنا (गोरा रंग असलेले) व्हिओ: ०३: पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेत झालेल्या 8 कोटी 12 लाख रुपयांच्या घोटाळा हा 23 खातेधारकांच्या नावावर कर्ज काढून झालाय. मात्र या घोटाळ्यामध्ये बँकेच्या संचालक मंडळापैकी कुणाचा हात आहे का याचाही आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू झालाय. त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपी आणखी कोण याचीच चर्चा सध्या जालन्यात सुरू असल्याच पाहायला मिळतय नितेश महाजन,झी-२४ तास,जालना0
0
Report
कल्याण-डोंबिवली में मराठी स्टिकर मुहिम: रिक्षाचालक मराठी सीखने को राजी
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत मनसेकडून रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते. माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीम मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. चार मे रोजी मराठी सक्तीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या शैलीत उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही स्टिकर मोहीम राबवली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील अनेक रिक्षांवर हे स्टिकर लावण्यात आले असून सर्व रिक्षाचालकांनी स्वेच्छेने हे स्टिकर लावावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या मोहिमेला परप्रांतीय रिक्षाचालकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चालकांनी मराठी भाषा समजून घेण्याची आणि बोलण्याची तयारी दर्शवत स्टिकर लावले आहेत. यावेळी रिक्षाचालकांना मराठी बोलण्याचे आवाहनही करण्यात आले. मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांनी यावेळी मराठी भाषेचा सन्मान राखण्याची गरज अधोरेखित केली. तर रिक्षाचालक शफिउल्लाह यांनीही मराठी शिकण्याची आणि ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्याची तयारी व्यक्त केली. या मोहिमेमुळे कल्याण-डोंबिवलीत मराठी भाषा आणि स्थानिक प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.0
0
Report
बर्ली में मोर की निर्घृण हत्या; ग्रामस्थों ने वन विभाग से कठोर कार्रवाई की मांग
Sangli, Maharashtra:स्लग- बुर्लीतील बंच्याप्पा बनात राष्ट्रीय पक्षी मोराची निर्घृण शिकार ! दोषींवर वनविभागाने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बंच्याप्पा बनात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनातील मंदिराजवळ नदीकडच्या बाजूला मोराची पिसे छिन्नविच्छिन्ह अवस्थेत विखुरलेली पाहायला मिळाली, तर मोराच्या शरीराचा भाग गायब असल्याने ही शिकारच असल्याचे राणी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पक्षीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.बंच्याप्पा बनात शेकडो मोरांचे वास्तव्य आहे,या घटनेबाबत तातडीने वनविभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण में गांजा तस्कर महिला गिरफ्तार, 1.5 किलोग्राम गांजा बरामद
Kalyan, Maharashtra:कल्याण महात्मा फुले पुलिस ने गांजा तस्कर महिला को गिरफ्तार किया। अनिता लव्हाळे नाम की महिला सोलापूर की रहने वाली है जो तळोजा में रहती है। पुलिस के जब्त के दौरान अद्वच किलो गांजा मिला। परकर के कप्पे में गांजा छुपाकर वह गांजा तस्करी कर रही थी। ओडिशा से ट्रेन से गांजा बिक्री के लिए आने की सूचना मिली थी। कल्याण रेलवे स्टेशन क्षेत्र में पुलिस ने जाल बिछाकर आरोपी अनिता को गिरफ्तार कर लिया है।0
0
Report
गोदा से नर्मदा जलयात्रा का शुभारम्भ चौंडी में Ahilyabai Holkar के जन्मगांव से
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या चौंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ झाला. अहिल्यादेवी होळकर यांच जन्मगाव असलेल्या चोंडी येथे जल कलश पूजन, माती कलश पूजन आणि अहिल्यादेवींच दर्शन घेऊन जल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव आणि जलसंपदा विभागाच्या 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या निमित्ताने 'गोदा ते नर्मदा' अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देत चौंडी मध्यप्रदेशातील महेश्वर पर्यंत जाणार आहे.0
0
Report
मराठी सीखने पर राजनीति गरमाई: हिंदुत्व के नाम पर बहस तेज
Oras Bk., Maharashtra:ऑन मनसे vs सदावर्ते --- प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी जी भूमिका घेतलीय त्याच समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलेय. प्रत्येकजण मराठी शिकेल उगाच कोणीही या मुद्द्यावर वाद करू नये. ज्यांना इथे व्यवसाय करायचा आहे ते मराठी शिकतील, आमचे उत्तर भारतीय भाऊ देखील शिकतील त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम कोणी करू नये. आणि हिंदूंना मारण्याच्या सुक्या धमक्या देऊ नये असा विचार आमचं हिंदुत्ववादी सरकार असताना करू नये. ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही sगळं ट्रेनिंग देऊ. पुस्तक देऊ. मारण्याची भाषा कोणी करू नये, एवढीच खाज असेल तर एम आय एम ची नगरसेविका बोलते की मला मराठी येण्याची गरज नाही तेव्हा का गप्प बसता तेव्हा हे कागदी वाघ कुठे जातात. तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही?? जो नियम हिंदू धर्माला लावता तोच नियम इतर धर्माना लावा. मुसलमान समाजाचे किती ड्रायव्हर मराठी बोलतात त्यांना कोणी का विचारत नाही. आमच्या हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम कोणी करू नये आम्ही राज्यात बसलोय हे लक्षात ठेवा ज्याला मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकाव. ऑन शिंदे सेना --- निरुपम यांना शिंदे साहेब समजवतील शिंदे साहेब सक्षम आहेत. ऑन संजय राऊत ( भाजपा निर्लज्ज ) --- निर्लज्जची व्याख्या काय आहे. हे ज्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे त्याला सगळे निर्लज्ज वाटतात. निर्लज्ज मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलाय. निर्लज्ज काय असतो ते आपल्या मालकाकडे बघून सांगावे ऑन टोल -- मी आमदार होतो तेव्हा जिल्हा वासियांवर टोल लावायला दिला नाही. टोल सुरु झाला तरी mh 07 च्या गाडयांना टोल लागणार नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.0
0
Report
Advertisement
