445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नीट पेपरफूट पर अमरावती में युवक कांग्रेस का प्रदर्शन, इस्तीफा की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरची जाळपोळ, नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली; नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी.0
0
Report
कणकवली में अल्पवयस्क युवती से छेड़छाड़ के आरोप पर प्रवासी युवकों की बेदम पिटाई
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग — अल्पवयीन युवतीची छेड काढल्याच्या रागातून परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण.... कणकवली शहरात घडली घटना..कणकवली येथील एका खाजगी दुकानात काम करणाऱ्या दोन परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन युवतीची छेड केली; युवतीनी घडलेला प्रकार कथन करताच स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही युवकांना बेदम मारहाण केली; दोन्ही युवकांना पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी; कणकवली शहरातील नागरिक एकटावले, पोलीस स्थानकात परप्रांतीय युवकांवर गुन्हा दाखल करण्याची केली होतेय मागणी; अखेर पोलीसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले; सदर घटनेमुळे कणकवली शहरात काही काळ तणाव होता.0
0
Report
अर्थतंत्र के बिना राजनीति नहीं चलेगी: वनमंत्री गणेश नायक ने साफ विचारों पर किया जोर
Chendhare, Maharashtra:स्लग - स्वच्छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही. वनमंत्री गणेश नाईक यांचे महत्वपूर्ण विधान. आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही. पेण येथे राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलन. अँकर – आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्ही स्वच्छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही. हे वि धान केलंय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी. अखिल भारतीय आगरी समाज संस्थेने आज पेण इथं राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. तुमचं मन स्वच्छ असेल, मानसिक स्थिरता राहील मग शारीरीक स्थिरता मिळते त्यातून समाजकार्य होतं मग अर्थकारण होतं. और आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही असं गणेश नाईक म्हणाले. पेणचे आमदार रवींद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते. साऊंड बाईट – गणेश नाईक, वनमंत्री0
0
Report
Advertisement
पिंपरी-चिंचवड महापौर का साइकिल यात्रा, मोदी के आह्वान पर नया कदम
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरीच्या महापौरांचा सायकलवर प्रवास, मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आजचं कामकाम सायकलवर करतायेत. पण केवळ एक दिवस सायकल प्रवास करुन भागणार नाही, त्यामुळं आठवड्यातून एक दिवस सायकलवरून कामकाज करण्याचा निर्धार केलाय. मी पदावर आहेत तोपर्यंत याचं अनुकरण करेल, असं महापौर म्हणालेत. सोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत शेअरिंग सायकलची बारगळेलेली योजना नव्यानं सुरु करणार असल्याचं आणि प्रत्येक रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारणार असल्याचं ते म्हणालेत.0
0
Report
100 करोड़ रंगदारी मांगने के मुकदमे में जयेश पुजारी व अधिकारी को पांच साल सश्रम जेल
Nagpur, Maharashtra:नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून 100 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारी आणि अफसर पाशाला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमारा शर्मा यांनी हा निकाल दिला. जयेश उर्फ जयेशकांत उर्फ शाहीर उर्फ शाकीर शशीकांत पुजारी आणि अफसर पाशा उर्फ बसीरुद्दीन उर्फ खसिरुद्दीन मोहम्मद (४३, दोघेही सध्या मध्यवर्ती कारागृह, बेळगाव, कर्नाटक) अशी दोषी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी मोहम्मद शकीर मोहम्मद हनीफ हा अद्याप फरार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यादी तयार करून त्यांना धमक्या देण्याचा आरोप जयेश आणि पाशा यांच्यावर होता. सुनावणीदरम्यान हा आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहिताेच्या कलम 385, 387, 506 तसेच बेकायदेशीक कारवाया प्रतिबंध कायद्याच्या कलम 10, 13(1) व 18 नुसार प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार अतिरिक्त एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच भादंवि कलम 507 अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास 10 महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा देण्यात आली. या प्रकरणी सरकारी पक्षाने एकूण 65 साक्षीदार तपासले. तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅकवर करण्यात आली. दररोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न करीत न्यायालयाने तब्बल एक 55 दिवसांत या खटल्याचा निकाल लावला. काय आहे प्रकरण १०० कोटींची खंडणी १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी आरोपी जयेश पुजारी याने नागपूरातील खामला येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना धमकी देण्यात आली होती. हे फोन कर्नाटकमधील तुरुंगातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी बंगळुरू कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर जयेशला ताब्यात घेत नागपूरात आणले होते. चौकशीदरम्यान त्याचे लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पीएफआयसह विविध दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा खुलासा झाला होता. त्याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.0
0
Report
नाना पटोले का आरोप: मोदी सरकार महंगाई से जनता को लूटा, किसान परेशान
Bhandara, Maharashtra:निवडणूका संपल्या की जीवनावश्यक वस्तूच्या किंमती वाढवण आणि पुन्हा जनतेकडून पैसे लुटन ही परंपरा 2014 पासून सुरू आहे. दरवाढ भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी दरवाढ आहे. त्यामुळे गरिबाच्या तोंडातला घास या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी सरकारने हिसकलेला आहे. महाराष्ट्र मध्ये आणि अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी सांगतात गंगा जिथून निघाले तिथं पर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. जनतेचे मत घ्यायची आणि सत्ता मिळाल्यानंतर जनतेला उठायचे ही जी परंपरा डबल इंजिनची सरकारची झालेली आहे. या फेकू सरकारला जुबलेबा सरकारला आता आपण खोटे आश्वासनाला फसू नका आणि आता या सत्तेतून बाहेर काढा... फडणवीस सरकारने आरक्षणा मध्ये 2014 ते 2019 मधील मागच्या दोन वर्षाच्या सरकारमध्ये आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला आताही आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीचे कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे आहे. आणि त्याची प्रॉपर बजावणी करायची नाही आणि महाराष्ट्रातले ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानामुळे आरक्षण मिळाले आहे. त्या व्यवस्थेच्या लोकांना मिळू नये याच्या प्रयत्न सातत्याने होतो. 2014 ते 2019 च्या काळामध्ये फडणवीस यांनी असाही कायदा केला होता की जे लोक आरक्षणामध्ये आहेत त्यांना ओपनच्या जागेमध्ये जाता येणार नाही खरंतर असं करता येणार नाही आरक्षणाच्या जागा आहेत त्या आरक्षणाने भरेले जातील पण आरक्षणाबद्दल कोणी टॉपर असेल त्याला ओपन मध्ये जायचं असेल तर थांबवता येणार नाही परंतु फडणवीस सरकारने तेही पाप केला आहे... कॅबिनेटमध्ये जे निर्णय असतात कॅबिनेट घ्यायची म्हणून घ्यायची त्याच्यावर खर्च करायचा म्हणून करायचा पण जनतेच्या पद्धतीने निर्णय करायचे नाही असे अनेक निर्णय इथे पाहायला मिळतात.....0
0
Report
Advertisement
ठाकरेंची शिवसेना ने कणकवली में पेट्रोल-डिज़ल दरों के विरोध में मोर्चा निकाला
Oras Bk., Maharashtra:अँकरइंधन दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून आज कणकवली शहरात माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेट्रोल डिझेलचे दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून भाजपने याविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधकही शिल्लक ठेवले नाहीत असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. एकीकडे इंधनाची बचत करा व परदेश दौरे टाळा म्हणून सांगणारे पंतप्रधान परदेशात फिरतायत अशी टीका ही वैभव नाईक यांनी केली आहे. बाईट- वैभव नाईक माजी आमदार ठाकरे गट0
0
Report
नाना पटोले के समर्थन में भंडारा के वैनगंगा नदीपात्र में जलसमाधी आंदोलन जारी
Bhandara, Maharashtra: विविध मागण्यासाठी नाना पटोले यांचा भंडारा येथील वैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन सुरूच आहे. तब्बल 2 तासांपासून नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, इतर महिला पुरुष पदाधिकारी नदीपात आंदोलन करत आहेत. तरी अजूनपर्यंत कुठलाही अधिकारी आंदोलन शांत करण्यासाठी पाण्यात उतरलेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी उग्र होण्याची चिन्ह आहेत....0
0
Report
दुचाकी की लापरवाही से ertiga कार का दुर्घटना, CCTV कैमरे में कैद; कोई जनहानि नहीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी, गुहागर चिपळूण मार्ग के पास गिमवी पेट्रोल पंप के सामने दुचाकी की लापरवाही से ertiga गाड़ी का अपघात. घटना CCTV में कैद. दैव बलवत्तर के कारण कार चालाक सहित सभी यात्री सुरक्षित बच गए. दुचाकीस्वार ने रफ्तार नहीं रोकी और भाग गया. सौभाग्य से कोई जनहानि नहीं हुई, लेकिन ertiga गाड़ी का लाखों का नुकसान. दुचाकी को गलत दिशा से मोड़ लेने के कारण दुर्घटना हुआ. दुचाकी को बचाने की कोशिश में ertiga की भारी क्षति; चालक को हल्का चोट लगे.0
0
Report
Advertisement
पंढरपूर के किसान ने रोजगार सेवक के प्रताड़ना के चलते आत्म-हत्या का प्रयास किया
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कार्यालयात एका शेतकर्याने रोजगार सेवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. संतोष महादेव बागल असे पिडीत शेतकर्याचे नाव आहे. महादेव बागल यांना महात्मा गांधी रोजगार हमी मधून विहीर मंजूर झाली आहे. कामाचे रोस्टर भरून देण्यासाठी स्थानिक रोजगार सेवकाचे पती भजनदास पवार याला तीस हजार रूपये दिले आहेत. अजून पैशाची मागणी केल्यानंतर पिडीत शेतकर्याने रोजगार सेवकाच्या आर्थिक त्रासाला कंटाळून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांनी रोजगार सेवक आणि तीच्या पतीवर कडक कारवाई करावी अशी लेखी मागणी केली आहे.0
0
Report
राहुरी थाने के पास दो गुटों के बीच हिंसक भिड़ंत; 4-5 लोग हिरासत में
Shirdi, Maharashtra:पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले... पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी... अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारातील प्रकार... अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या संशयावरून राडा... एका गटाने मुलीच्या विवाहाबाबत आक्षेप घेतल्याने राडा झाल्याची प्राथमिक माहिती... शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत... पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण... पोलिसांनी हस्तक्षेप करत 4 ते 5 जणांना घेतले ताब्यात...0
0
Report
नीट पेपरफुटी: लातूर तक पहुंचा मामला, CBआई की तेज जांच शुरू
Latur, Maharashtra:देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचले आहेत... शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’मुळे देशभर ओळख असलेल्या लातूरमध्ये सध्या सीबीआयने ठाण मांडले असून अनेक नामांकित क्लासेस चालक तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत... सीबीआयच्या वेगवान हालचालीमुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली है... पाहूयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट... या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी आता पालकांकडून जोर धरू लागली आहे... विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या कष्टाने, आर्थिक ताण सहन करत मुलांना नीटच्या तयारीसाठी लातूरमध्ये पाठवले... अनेक पालकांनी लाखो रुपये खर्च करून मुलांच्या भवितव्यासाठी मेहनत घेतली... अशा परिस्थितीत पेपरफुटीसारख्या घटना समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत... दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी... तपास अधिक सक्षम यंत्रणेमार्फत वेगाने व्हावा... तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधितांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही पालकांकडून केली जात आहे... दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने लातूरमध्ये वेगवान हालचाली सुरू केल्याने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे... अनेक नामांकित क्लासेस चालकांची चौकशी आणि निवृत्त प्राध्यापकांची चौकशी... आणि कथित ‘गेस पेपर’च्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचा तपास... यामुळे लातूरच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत... आता या तपासातून नेमकं काय समोर येणार...? या प्रकरणात आणखी कोणाची नावं पुढे येणार...? आणि देशभर चर्चेत आलेल्या या प्रकरणाचा शेवट नेमका कसा होणार...? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS0
0
Report
Advertisement
अकोला के मूर्तिजापुर में फसल बीमा के विरोध में किसानों का ट्रैक्टर मार्च
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखपुरी आणि कुरूम महसूल सर्कलमधील शेतकऱ्यांना एकरी अवघे ३०० ते १००० रुपये इतकाच पीक विमा मंजूर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर महामोर्चा काढला. विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. तालुक्यातील निंबा, सिरसो, हातगाव, माना, जामठी आणि शेलूबाजार महसूल सर्कलमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रखरखत्या उन्हात ट्रॅक्टरसह तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पीकविमा कंपनी आणि शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.दरम्यान, तहसील कार्यालयात प्रवेश करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असता पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी काही काळ शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ढकलाढकलीची परिस्थितीही निर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाने संयमाची भूमिका घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारीांनी स्वतः येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत.0
0
Report
जालना की नादी-युसूफ कॉलोनी में कचरा, 10-15 दिन से नहीं आई नगर निगम गाड़ी
Jalna, Maharashtra:जालन्यातील नादी आणि युसूफ कॉलनीत कचऱ्याची समस्या,10 ते 15 दिवस घंटागाडी येत नसल्यानं नागरीक हतबल नाल्यांचीही सफाई होत नसल्यानं नागरीक संतप्त वाक थ्रू+ AVB अँकर : जालनाातील नादी आणि युसूफ कॉलनीत कचऱ्याची समस्या नागरीकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.या भागात 10 ते 15 दिवस महापालिकेची घंटागाडी येत नसल्यानं नागरीक हतबल झालेत.महिन्यातून केवळ दोनच वेळा या भागातील कचरा साफ केला केला जातो.नियमित कचरा उचलला जात नसल्यानं याच परिसरात मच्छरांच्या त्रासाला नागरीकांना सामोरं जावं लागतंय.शिवाय या भागात नाल्यांची देखील नियमित स्वच्छता केली नससल्यानं महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक या समस्यांकडे मागणी करूनही लक्ष देत नाही.त्यामुळे या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईची मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे. बाईट :साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते(व्हाईट हाफ शर्ट) बाईट :मोहम्मद नोही,नागरीक(ग्रे रंगाचा शर्ट,गोल टोपी) बाईट : मोहम्मद आरेफ नागरीक, व्हाईट गोल टोपी आणि भागातील कचरा समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी वाक थ्रू नितेश महाजन,प्रतिनिधी, जालना0
0
Report
पनवेल महापालिका: 45 दिन बाद भी अर्थसंकल्प मंजूर नहीं, विपक्ष ने उठाए सवाल
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन 45 दिवस उलटले तरी अद्याप अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही. पनवेल मनपातील सत्ताधारी भाजपच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल करणारा स्पेशल रिपोर्ट. 30 मार्च रोजी पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी 4853 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यावर त्यात आवश्यक सूचना मांडून तो मंजूर करणे आवश्यक असताना आज 45 दिवस उलटले तरी अद्याप अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला नाही. याविरोधता विरोधकांनी आवाज उठवत हे प्रशासनाचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचे असा प्रश्न उपस्थित केलाय. अर्थसंकल्प मंजूर करायला एवढा कालावधी का असा सवाल उपस्थित करत सत्ताधारी भाजपला महापालिका कशी चालवायची हेच माहित नाही अशी खोचक टीका काँग्रेसचे नगरसेवक हरीश केणी यांनी केलेय. Hariश केणी (नगरसेवक काँग्रेस) बबन मुकादम (स्थायी समिती सभापती - पनवेल मनपा) अर्थसंकल्प हा सेन्सिटिव्ह विषय असून प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सखोल अभ्यास करुन जनतेच्या आणि नगरसेवकांच्या मागण्यांचा समावेश करुन लवकरच अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी ओघम प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनी व्यक्त केलेय. बबन मुकादम (स्थायी समिती सभापती - पनवेल मनपा) दीड महिना उलटला तरी अद्याप अर्थसंकल्पचं मंजूर झाला नसल्याने नगरसेवकांना काम करण्यात अडचणी निर्माण होतं असून सत्ताधारी आणखी किती दिवस अभ्यास करुन अर्थसंकल्प मंजूर करणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागलेय. Swati Naik Navi Mumbai0
0
Report
Advertisement
