icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दिग्रस में बिजली आपूर्ति बार बार बाधित, नागरिक महावितरण कार्यालय के सामने धरना

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस शहर तसेच ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक दिली. अखंडित वीज पुरवठ्यामुळे दिग्रसकर त्रस्त झाले आहेत, त्यामुळे आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत करा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्यांना रोखणे हाताबाहेर जाईल असा इशारा देण्यात आला. दिग्रस मध्ये कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा होतो, वीज खंडित झाल्यास दुरुस्तीला विलंब होतो व तक्रारी करूनही कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे महावितरणचा कारभार रामभरोसे असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
0
0
Report

शिवसेना ने स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन तेज कर सरकार से योजना रोकने की मांग की

Akola, Maharashtra:राज्य सरकारने वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध होत आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही ( शिंदे गट ) या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोल्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असताना विरोधकांसह अनेक सामाजिक संघटना आणि ग्राहक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी स्मार्ट मीटरविरोधी घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून शासनाने या योजनेचा फेरविचार करावा, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. सरकारने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
0
0
Report

शिर्डी के भोंदू अशोक खरात गिरफ्तार: 51 हजार की धोखाधड़ी का केस

Shirdi, Maharashtra:नाशिकचा भोंदू अशोक खरात, ज्याला 'कॅप्टन' नावाने ओळखली जाते, राज्यभरात गाजत असतानाच शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूला गजाआड केलयं.. आंतरजातीय प्रेम विवाह विघ्न न टाकता मार्गी लावण्यासाठी आणि विवाहबद्ध जोडप्यावर नातेवाईकांनी केलेली करणी दूर करण्याच्या नावाखाली, या भोंदूने वेळेवेळी दाम्पत्याकडून 51 हजार रुपये उकळायचं ठरवलं.. काल अमावास्येच्या दिवशी दांपत्याला पूजाविधीसाठी बोलावल्यावर शिर्डी पोलिसांनी सापळा रचून भोंदू अशोक खरात याला बेड्या ठोकल्या.. सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम नावाच्या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही विवाह करायचा होता.. हा आंतरजातीय प्रेम विवाह व्यवस्थित पार पडावा, या नात्याने नवऱ्यावर संकट आल्याचे सांगत कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भोंदू अशोक खरात यांनी तरुणीला भीती देत त्याला सांगितले की देव शक्ती असल्याचे दाखवून सर्व संकट दूर करतो.. पूजा आर्चेच्या नावाखाली मागील एक वर्षात या भोंदूने 51 हजार रुपये उकळले.. काल अमावास्या असल्याने भोंदू अशोक खरात ने दांपत्याला पूजाविधीसाठी बोलावले होते.. शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून भोंदू अशोक खरात याला गजाआड केलयं.. राहाता परिसरातून त्याची साथीदार माया विठ्ठल कुसळकर हिला देखील बेड्या ठोकल्या आहेत.. अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात भोंदू अशोक खरात यांच्या विरोधात जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या भोंदूने जादू टोण्याच्या नावाखाली आणखी किती लोकांना आर्थिक गंडा घातला आहे? प्रकरणाचा तपास सुरू आहे...
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई नगरपालिका कार्यक्रम से शिंदे का नाम हटाने पर शिवसेना ने हंगामा किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव वगळले, वनमंत्री गणेश नाईक आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पेटला नवी मुंबई मनपातर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा प्रसंगी शिवसेनीकांनी कार्यक्रम स्थळी घातला गोंधळ, घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या गेटवर गणेश नाईक यांच्या गाडी अडवण्याचा केला प्रयत्न, शिवसेनीकांनी गेटवर चढून केले आंदोलन याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी
0
0
Report

मराठी फिल्म महामंडळ को मंत्रिपद का दर्जा मिलने की मांग; मेघराज राजेभोसले नए अध्यक्ष

Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी चित्रपट महामंडळाचे नूतन अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे. कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी मांडली. चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कामगार अशा सर्व घटकांसाठी कार्य करणारी देशातील मोठी संस्था म्हणून मराठी चित्रपट महामंडळाकडे पाहिले जाते. त्यामुळे या संस्थेला अधिकृत मान्यता आणि बळ देण्यासाठी राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा सकारात्मक विचार करावा, असेही राजेभोसले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान,आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी आनंद शिंदे आणि धनाजी यमकर यांची निवड झाली. तसेच सहकार्यवाहपदी सुशांत शेलार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में पानी की कमी से सब्ज़ियों की महंगी हो चुकी है; किसान टैंकर पानी पर निर्भर

Jalna, Maharashtra:जालना : विहिरीतलं पाणी खालावलं,भाजीपाल्याला टॅंकरने पाणीपूरवठा,विकतचं पाणी घेऊनही वाढत्या उन्हामुळे भाजीपाला करपण्याचं प्रमाण वाढल्यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली,येत्या काही दिवसांत भाजीपाल्य महागण्याची शक्यता(पॅकेज) अँकर : जालना जिल्ह्यात पावसाअभावी अजूनही काही पेरणी झालेली नाही.त्यातच ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याच्या भरवशावर भाजीपाला पिकाची लागवड केली.त्या विहीरीतला पाणीसाठा खोलवर गेलाय.त्यामुळे भाजीपाल्याला आता विकतचे टँकर घेऊन पाणी द्यावं लागतंय. आता सर्वसमान्यांच्या जेवणातला भाजीपालादेखील महागण्याची शक्यता आहे. व्हिओ:०१: जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरीही जालना जिल्ह्यात अजूनही पाऊस पडलेला नाही.पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यात.ज्या विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पाऊस पडण्याआधीच मिरची पिकासह भाजीपाला पिकाची लागवड केली.ती पिकंही पाऊस न पडल्यानं संकटात सापडलीय.विहिरीचा पाणीसाठा खालावल्यानं मिरची, पुदिना ही भाजीपाला असणारी पिकं करपू लागलीय.आता लागवड केलेल्या पिकांचा खर्च अंगलट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी 1 हजार रुपये टँकर प्रमाणे दररोज टँकर विकत घेऊन भाजीपाल्यासह पिकं वाचवण्यासाठी धरपड सूरु केली आहे. बाईट : सुरेश वाढेकर,लाल बनियान असणारे शेतकरी व्हिओ :१०२:पाऊस लवकर पडेल या अंदाजापोटी अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिलं.मात्र दररोज प्रत्येक शेतकऱ्याला भाजीपाला पीक वाचवण्यासाठी किमान 4 ते 5 टँकर पाणी भाजीपाला वाचवण्यासाठी घ्यावे लागतायत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दररोज किमान 5 हजारांचा आर्थिक फटका बसतोय. बाईट : किशोर वाढेकर,डोक्याला लाल रुमाल बांधलेला(टँकर सप्लायर) व्हिओ :०३: मिरची,पुदीना,निंब ही पिकं सध्या टँकरच्याच पाण्यावर अवलंबून असल्यानं शेतकरी आर्थिक टंचाईत सापडलाय.टँकरने पाणी टाकूनही उन्हाच प्रमाण जास्त असल्यानं पिकाला दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतं आहे.त्यामुळे मिरची ,पुदिना ही पिकं विकतचं पाणी देऊनही करपतायत.त्यामूळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. बाईट : नारायण वाढेकर,शेतकरी, पांढरा शर्ट व्हिओ: ०४: पाऊस नसल्यानं पेरणी बरोबरच नव्याने भाजीपाला लागवड देखील झालेली नाही.भाजीपाल्याची जी लागवड झाली तो भाजीपाला विकतचं पाणी घेऊनही करपून जातोय बाजारात भाजीपाल्याची आवक घटलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाला महागण्याची शक्यताय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

चंद्रपुर में महँगाई, पेट्रोल-डिज़ल के दाम और कर्जमाफी के मुद्दों पर शिवसेना का बड़ा मोर्चा

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेपरफुटी प्रकरण तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. स्थानिक रामनगर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिऱ्हे, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. तसेच वाढत्या महागाईचा निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून भाकरी बनवत अनोखे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
0
0
Report
Advertisement

शिंदे का बयान: ऑपरेशन टायगर पर अभी जानकारी नहीं, सत्ता परिवर्तन कुछ समय बाद

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते - विषय गंभीर असून अशा प्रकारची घटना अपेक्षित नव्हती.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दक्षता घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महायुतीमध्ये प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही शिंदे यांनी नमूद केले. ऑन ऑपरेशन टायगर - "ऑपरेशनमध्ये काही सांगायचं नसतं," असे म्हणत शिंदे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.२० तारखेला जे घडलं ते आधी सांगून घडलं नव्हतं आणि ऑपरेशनची माहिती आधी दिली जात नाही, असे त्यांनी म्हटले.योग्य वेळी माहिती दिली जाईल, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच सांगायच्या असतात, असे ते म्हणाले.२० जून रोजी सत्ता परिवर्तनाला एक वर्ष पूर्ण होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तो निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात काय होईल, याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर बाबत १२१ केलेला आहे ऑन विधान परिषद निवडणुक - महायुती म्हणून निवडणूका लढवत असून मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.काँग्रेस सध्या कोमामध्ये असल्याची टीका त्यांनी केली.विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे मनोबल आणखी खच्ची होईल आणि अनेक नेते पक्ष सोडतील, असा दावा त्यांनी केला.
0
0
Report

रत्नागिरी में महायुती के उम्मीदवारों की जीत की अटकलें, सरकार-गठबंधन के बयान जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. उद्योग मंत्री उदय सामंत. विधान परिषद निवडणूक. सर्व 11 च्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमचे निवडून येतील. नाशिकमध्ये काही विघ्न संतोषी व्यक्ती गीते यांच्या संदर्भात वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. परवा नाशिक सिपींकडे अर्ज दाखल केला आहे. जे चांगल्या पद्धतीने मिटलं आहे, त्यामध्ये कोणी वाद लावू नये. गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी कुठलीही कमिटमेंट झालेली नाही, कमिटमेंट न करता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला मान देऊन उमेदवारी मागे घेतलेली आहे. ऑपरेशन टायगर- खासदार वाघचौरे कथित भेट. एकनाथ शिंदे साहेबांनी कोणाबरोबरही बैठक केलेली नाही. Ubt च्या खासदारांसोबत बैठक कधीही झालेली नाही, होण्याची शक्यता नाही.. ऑपरेशन टायगरचा प्रश्नच नाही. पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी ऑपरेशन टायगर राबविण्याची गरज नाही. साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक लोकं प्रवेश करताहेत. ज्या काही बातम्या येताहेत त्याला पूर्णविराम द्यायचा आहे. मी वागचौरे यांना भेटलो अशीही बातमी आली. पुराव्यानिशी कोणीही सिद्ध करून द्यावं की वाघचौरे साहेब मला भेटले. ज्या रेस्ट हाऊसला मी राहायला होतो, त्याच रेस्ट हाऊसला ते राहायला होते. ते एका रुममध्ये होते, मी एका रूममध्ये होतो. मी बाहेर पडल्यानंतर ते या ठिकाणी आले होते. मी त्यांना भेटलेलो नाही. नवी मुंबई निमंत्रण पत्रिका वाद. नवी मुंबईत हे वारंवार व्हायला लागलेलं आहे, याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार. निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकायला सांगणारे लोक बालिश आहेत. कुणाच्यातरी सांगण्यावरून नाव न टाकल्याने त्यांचं कर्तृत्व कमी होत नाही. हा जर महानगरपालिकेचा कार्यक्रम असेल तर याबाबत आपण स्वतः आयुक्तांना जाब विचारणार. ज्या ठिकाणी याची दाद मागायची आहे ती मागणार. पाणीटंचाई जिल्ह्यात 12 ते 15 टक्के पाण्याचा साठा शिल्लक. MIDC चे पाणी रत्नागिरी साठी देणार. माणसांना पाणी मिळालं तर उद्योग आहेत. MIDC कडे मोठ्या प्रमाणात पाणी. ऑपरेशन टायगर आणि संजय राऊत. ऑपरेशन टायगर संदर्भात वातावरण निर्मिती केली जाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अशी कुठलीही मीटिंग झालेली नाही. उद्धव ठाकरे सेनेचे खासदार किती उपस्थित होते हे काल आम्ही तुमच्याकडूनच ऐकलं आहे. शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगर ची आवश्यकता नाही कारण दर दिवशी शिंदे यांच्या वरती विश्वास ठेवून लोक आमच्या पक्षात येत आहेत. ऑपरेशन टायगर हे बारसे मीडियाने केलं. ऑपरेशन टायगर संदर्भात आमचा उद्धव ठाकरे सेनेच्या खासदारांची संपर्क झालेला नाही. शिर्डी मध्ये उद्धव ठाकरे सेनेचे खासदार वाघ चवरे यांना मी भेटलेलो नाही. एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरे सेनेच्या कुठल्याच खासदाराला भेटले नाहीत. ऑन ऑपरेशन लांडगा आला रे. संजय राऊत यांच्या संयमाला दाद दिली पाहिजे. सकाळी संजय राऊत बोलले नाहीत तर उद्धव ठाकरे सेना यांच अस्तित्व काय. सकाळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे सेनेचं अस्तित्व टिकवलं आहे. ऑन बाळ माने. ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी माघारी का घेतली हे सुनील तटकरे यांना विचारा. जे अदखलपात्र झाले आहेत त्यांची दखल घेऊन त्यांना मोठे केलं. अनिकेत तटकरे निवडणुकीत उभे राहिले असते तरी ते बिनविरोध निवडून आले. ऑन संजय देशमुख भेट. काहीतरी काम असेल म्हणून ते भेटले असतील. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही सांगत आहोत की आमचा उद्धव ठाकरे सेनेच्या खासदारांची संपर्क नाही.
0
0
Report
Advertisement

शिवसेना महिला कार्यकर्ताओं ने महावितरण के अधिकारियों पर बांगड़ियां फेंकीं; कल्याण में हंगामा

Kalyan, Maharashtra:शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकून आपला रोष व्यक्त केला. कल्याण मध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे शिवसैनिकांनी आज महापौरांच्या उपस्थितीत कल्याण मधील महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी शिवसेनेकांनी पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांनी उठून आपल्या हातातील बांगड्या काढून त्या अधिकाऱ्यांवर फेकल्या. यावेळी शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
0
0
Report

कोल्हापूर गॅझेट लागू होतोय? मराठा आरक्षण संदर्भात नया मोड

Kolhapur, Maharashtra:हैदराबाद गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला आठ दिवसांचा इशारा दिला असून, मागणी मान्य न झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठा आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोल्हापूर गॅझेटची जोरदार एन्ट्री झाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा मार्ग शोधण्यात आला. यासाठी हैदराबाद संस्थानाच्या गॅझेटचा आधार घेण्यात आला होता. मात्र, त्याच धर्तीवर कोल्हापूर संस्थानाच्या 1886 च्या गॅझेटची अंमलबजावणी करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही जरांगे पाटील यांनी या विषयावर भूमिका घ्यावी, असे सुचविले होते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदी समजून घेतल्या. त्यानंतर सरकारने येत्या आठ दिवसांत कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. इतकेच नव्हे, तर सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर मराठा समाजाला आपल्या पुढच्या पिढीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी खोट्या प्रतिष्ठेत अडकून न राहता आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. मराठा संघटनांचा दावा आहे की, ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्यात आल्या, त्याच पद्धतीने कोल्हापूर गॅझेटचा विचार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठा कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु
0
0
Report

रोहित पवार पर किसान विश्वासघात का आरोप: सदाभाऊ खोत की तीखी प्रतिक्रिया

Sangli, Maharashtra:स्लग - रोहित पवारांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला,आमदार सदाभाऊ खोतांची खोचक टीका अँकर - आंदोलन मागे घेऊन,रोहित पवारांनी शेतकरयांचा विश्वासघात केलें आहे,रोहित पवार यांनी आपला आंदोलन चालू ठेवायला पाहिजे होतं,पण ते का पळाले,कळले नाही, अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी खोचक टीका केली आहे,रोहित पवारांनी तर शेतकरी कर्जमाफीसाठी पंढरपूर मध्ये अन्न त्या गांदोलन सुरू केले होतं,मात्र ते आंदोलन मागं घेतला आहे,यावरून सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार અને निशाणा साधला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - सदाभाऊ खोत - आमदार .
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top