Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 24, 2026 04:47:28
Junnar, Pune, Maharashtra:एकीकडे उन्हाच्या कडाक्यामुळे वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत असताना, खाकी वर्दीतील एक 'देवदूत' त्यांच्या मदतीला धावून आलाय. माळशेज घाटात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी संजय गुडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेने सर्वांची मने जिंकली आहेत. घाटात कर्तव्यावर असताना त्यांना एक वन्य प्राणी पाण्यासाठी व्याकुळ झालेला दिसला. क्षणाचाही विलंब न लावता, गुडे यांनी स्वतःच्या हातातील पाण्याच्या बाटलीने त्या तहानलेल्या वानराला पाणी पाजले. उन्हाच्या झळा सोसणाऱ्या त्या मुक्या जिवाला जणू नवजीवनच मिळाले. गुडे यांच्या प्राण्यांप्रती असलेल्या प्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय, महत्त्वाचं म्हणजे हे सर्व सुरू असताना गुडे यांना आपलं कोणीतरी चित्रीकरण करतंय हे सुद्धा माहीत नव्हतं केवळ प्राण्यांप्रती असलेलं प्रेम आणि संवेदना भावना हेच त्यांच्या मनात होतं.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 24, 2026 04:47:15
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीत रस्सीखेच 27 मार्चला सभापती पदाची निवडणूक, तिन्ही पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता समीकरणांची चुरस भाजपला दोन, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक पद मिळण्याची शक्यता अँकर : धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीआधीच महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. 27 मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वीच तिन्ही पक्षांनी आपापली ताकद लावून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेना गटाकडून सभापती पदांवर अधिक भर देण्यात येत असून, महत्त्वाची पदे मिळावीत, अशी भूमिका सावंत गटाने घेतली आहे.दरम्यान, चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे दोन सभापती पदे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.या सर्व घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष पुन्हा पेटला असून, 27 मार्चची निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. Now final outcome कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 24, 2026 04:45:41
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लांबच लांब रांगा. अँकर:चंद्रपुरात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. शहरातील काही पेट्रोल पंप साठा संपल्याने बंद झाले आहेत. ज्या पंपांवर वितरण अद्याप सुरू आहे त्यावर तोबा गर्दी उसळली आहे. प्रशासनाने साठा मुबलक असल्याची माहिती दिली आहे. मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावरील गर्दीने संभ्रम वाढविला आहे. दोन दिवस प्रयत्न केल्यानंतरही नागरिक अजूनही रांगेत आहेत. पेट्रोल तुटवड्याने आगामी काळात चंद्रपूरकरांची चाके थांबण्याची शक्यता आहे. यावर उपाय मात्र अजूनही झालेला नाही.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 04:21:52
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू - सोलापूरातील हिप्परगा तलावात दोन युवक बुडाले, एकाच मृतदेह हाती तर दुसऱ्याचा शोध सुरू - सोलापुरातील शेळगी येथील भारत शिवशंकर सुरवसे असे मृतदेह सापडलेल्या युवकाचे नाव तर त्याच्यासोबचा सहकारी गिरीश याचा शोध सुरू. - भारत सुरवसे याचा महिन्यापूर्वीच झाला होता साखरपुडा तर 25 एप्रिल रोजी होते लग्न - भारत आणि त्याचा मित्र गिरीश हे दुपारी पोहण्यासाठी हिप्परगा तलावात गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्दैवी घटना - याप्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
1053
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 03:33:18
Shirdi, Maharashtra:शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आलंय.. 25 ते 27 मार्च दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार असून, साई संस्थानने उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.. उत्सवाच्या मुख्य दिवशी अर्थात 26 मार्च रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे.. या तीन दिवसीय उत्सव काळात साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.. साई दरबारी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी रामनवमी हा महत्वाचा उत्सव मानला जातो.. साईबाबा हयात असल्यापासून त्यांच्या पुढाकाराने 1911 सालापासून शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा असून साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ आजही ही परंपरा जपत आहेत.. उत्सव काळात देशभरातून मोठ्या संख्येने पायी पालखी शिर्डीत होतात.. रामनवमी उत्सवानिमित्त होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेत भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. यासह कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून शिर्डीत अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे..
1048
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 24, 2026 03:30:30
1046
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 24, 2026 03:17:17
997
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 24, 2026 03:15:23
Nagpur, Maharashtra:नागपूर राज्यात १२ वर्षांत २९८ वाघांचा मृत्यू, मात्र त्यापैकी ११० मृत्यू मानवी कारणांमुळे झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिकेद्वारे करण्यात आलाय. याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश. राज्यात वार्षिक वाघ मृत्यू दर ४.९१ टक्के, देशातील सर्वाधिक असल्याचा दावा. विजेच्या धक्क्याने ३३ वाघांचा मृत्यू, संरक्षण उपाययोजना अपुऱ्या. वीजवाहिन्या सुरक्षित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही दुर्लक्षित. वाघ मृत्यू प्रकरणांच्या तपासात मोठ्या प्रमाणात विलंब. २०२५मध्ये ९२.९% प्रकरणे प्रलंबित, एकूण १४३ प्रकरणे अद्याप न सुटलेली. NTCA च्या आकडेवारीत विसंगतीचाही आरोप.
1037
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 24, 2026 03:06:48
1062
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 03:06:07
Akola, Maharashtra:उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून 6 पैकी 4 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आज गटनेता बदलण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व नगरसेवकांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशी नोटीस शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून बजावण्यात आली आहे. मात्र उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेता विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत – i) नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील आणि सागर भारूका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे. ii) त्याचप्रमाणे सोनाली सरोदे यांनी देखील मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्ष किंवा गटात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे. iii) या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो आणि गटनेता बदलाचा निर्णय होतो का, याकडे आता राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
1066
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 24, 2026 03:05:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत , उन्हाचा सर्वानाच त्रास होतोय आहेत, अशात छत्रपती संभाजी नगरच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी ही सुटले नाही, त्यामुळं वाघोबाला लागणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी आणि वाघोबाला थंडा थंडा चील चील ठेवण्यासाठी त्याच्यावर रोज सकाळ दुपार संध्याकाळ आता पाणी मारण्यात येते आहे,  इतकच नाही तर वाघोबा साठी कुलर सुद्धा  लावण्यात आलेले आहेत.. पिंजऱ्याच्या आजूबाजूला पाण्याचे छोटे डबके सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत ..वाघ आणि सिंहाला उन्हाळ्यात जास्त त्रास होतो त्यासाठीची ही दक्षता छत्रपती संभाजी नगरच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात घेतली जात आहे
1072
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 03:05:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याची खा. प्रणिती शिंदे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी - दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याची खा. प्रणिती शिंदे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी.. - खा. प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली मागणी.. - भीमा नदीवरील बॅरेजमुळे केवळ पाण्याची साठवणूक वाढणार नाही तर परिसरातील 10 हून अधिक गावांतील भूजल पातळीतही वाढ होईल. - जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. संबंधित बॅरेजचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश दिले - दक्षिण सोलापूरमधील ​नांदणी, टाकळी, कुरघोट, मंद्रूप, औज मंद्रूप, लवंगी या गावांसह सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार
1086
comment0
Report
Advertisement
Back to top