445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मराठवाड़ा में गार्पीट-अवकाळी बारिश से 29 हजार किसान प्रभावित, 17 हजार हेक्टेयर फसलें नुकसान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात 16 मार्चपासून आजवर झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 742 गावांतील 29 हजार 676 शेतकऱ्यांच्या सुमारे 17 हजार 345 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. 4 एप्रिलपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 209 गावांतील 8 हजार 780 शेतकऱ्यांना फटका बसला असून, 5 हजार 345 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक 3340 हेक्टरवरील नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. 18, 19 आणि 20 मार्च रोजी गारपीट आणि मुसळधार पावस झाला. या तीन दिवसांच्या पावसाने 12 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नसताना मार्चअखेरीस पुन्हा अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा बसला. 30 आणि 31 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस झाला. काढणीला आलेला गहू, मका यासोबतच संत्री, आंबा, पपई, टरबूज अशा फळपिकांचे मोठे नुकसान झाले. 1 एप्रिल रोजी सायंकाळी विभागात पुन्हा जोरदार पाऊस पडला. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.0
0
Report
जालना में प्रसूति के बाद माँ की मौत, चिमुकली अनाथ, जांच शुरू
Jalna, Maharashtra:जालना | प्रसूत मातेचा जालन्यात मृत्यू, चिमुकली अनाथ जिल्हास्तरीय समिती करणार घटनेची चौकशी जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे 20 वर्षीय मातेचा मृत्यू झाल्याची घटना एका खासगी रुग्णालयात घडली. 20 वर्षीय कोमल चव्हाण असं या मयत मातेचं नाव आहे.मयत महिला ही बुलडाणा जिल्ह्यातील हनवतखेडा गावची रहिवासी आहे. अँटॉनिक पीपीएचमुळे हा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच अचूक कारण समोर येईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र, या घटनेत मायेचे छत्र हरपल्याने चिमुकली अनाथ झाली आहे.कोमल प्रसूतीसाठी गांधीचमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. दीड तासांनी १२.३० वाजता त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर त्यांना अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. डॉक्टरांनी औषधोपचार केले. गर्भाशय शिथिल पडल्याने ते नैसर्गिकरीत्या आकुंचन पावत नव्हते. प्रकृती खालावत गेली. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. नैसर्गिक प्रसूतीनंतर गर्भाशयाने प्रतिसाद न दिल्यामुळे सुरू झालेला अतिरक्तस्राव मृत्यूस कारणीभूत ठरल्याच सांगितलं जातं आहे. दरम्यान जिल्हास्तरीय चौकशी समिती या प्रकरणाची अधिक चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलीय.0
0
Report
हिंगोली: महिला को 6.5 लाख की ठगी, पैसे दोगुना करने का लालच देकर फरार
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पातळवाडी एका महिलेची सहा लाख 50 हजार रुपयाने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे, पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवत महिलेचे पैसे घेऊन फरार होणाऱ्या आरोपीवर औंढा नागनाथ पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे..0
0
Report
Advertisement
हर्सूल तालाब हादसा: दो दोस्त डूबे, एक ने आत्महत्या की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील हर्सूल तलाव परिसरात रविवारी (५ एप्रिल) काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दोन सलग घटना घडल्या. दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणाचा या बुडून मृत्यू झाला. या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच एका तरुणाने तलावाच्या कठड्यावरून उडी घेत आत्महत्या केली. काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. निजामगंज आणि भवानीनगर भागातील तीन मित्र सुटीनिमित्त हसूल तलावावर गेले होते. त्यातील अफान इस्माईल खान आणि मैशिद मोहसीन हे दोघे पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत करण रामचंद्र मोरे तरुणही पाण्यात गेला. हे तिघेही एकमेकांचे हात धरून खोल पाण्यात शिरले. पाण्यात पुढे जात असताना खोल खड्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. एकमेकांना सावरण्याच्या नादात ते दिसेनासे झाले. अग्निशमन दलाचे पथक तिघांचे मृतदेह घाटीत नेण्याची तयारी करत असतानाच तलावाच्या संरक्षक कठड्यावरून एका दुसऱ्याच तरुणाने अचानक पाण्यात उडी घेतली. यश असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने पाण्यात उडी घेतल्यानंतर उपस्थित सुरक्षा रक्षकाने त्याला वाचवण्यासाठी काठी पुढे केली, मात्र त्या तरुणाने ती पकडण्यास नकार देत मृत्यूला जवळ केले...0
0
Report
बीड़ में कांग्रेस समिति छह दिन डेरा, नीतू वर्मा करें आढावा; बड़ा फेरबदल संभव
Beed, Maharashtra:बीड : दिल्लीतील काँग्रेसची समिती सहा दिवस बीडमध्ये तळ ठोकून; काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, जिल्ह्यात घेणार कार्यकर्त्यांचा नीतू वर्मा घेणार आढावा..! बीडमध्ये काँग्रेसच्या संघटनात मोठी हालचाल सुरू झाली आहे.. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून अभियानाच्या प्रमुख नीतू वर्मा बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. पुढील सहा दिवस त्या जिल्ह्यात मुक्काम करून 11 तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यात तळागाळातील कार्यकर्त्यांचा सखोल अभ्यास करून काँग्रेस वाढवण्यासाठी सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकारीहांसह विविध पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती नीतू वर्मा यांनी दिली.0
0
Report
अकोला शहर में तीन चाकूघात, गिरोह के हमले, आठ घंटे में सभी आरोपी गिरफ्तार
Akola, Maharashtra:अकोला शहरात चाकू हल्ल्याच्या सलग तीन घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. खदान पोलीस ठाणे हद्दीतील श्रद्धानगर, कौलखेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, खड़की परिसरात या घटना घडल्या. काही अल्पवयीन मुलांनी चाकूने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही हल्ले एकाच टोळीने केल्याचे समोर आले होते. घटनेनंतर खदान पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत उर्वरित सर्व आरोपींनाही अवघ्या आठ तासांत अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत ‘सिन क्रिएशन’च्या माध्यमातून तपासाची दिशा निश्चित केली. तसेच, अटक करण्यात आलेल्या आरोपींची परिसरात परेड काढून नागरिकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पолिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर के अधिकांश क्षेत्रों में 36 घंटे पानी आपूर्ति बंद: शहरभर प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरात 36 तास बहुसंख्य भागात राहणार पाणीपुरवठा बंद. 7 एप्रिलला सकाळी दहापासून 8 एप्रिल रात्री 10 वाजेपर्यंत राहणार. 58 जलकुंभावरून पाणीपुरवठा राहणार बंद. पेंच च एक ते चार जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवून फळ मार्केट परिसरात अमृत योजनअंतर्गत 900 मिमी फिटर मेन लाईनवर व्होल्व बसण्याचे काम असल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बाधित. या शटडाऊनमुळे लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा आशीनगर आणि मंगलवारी झोनमधील विविध भागांवर होणार परिणाम0
0
Report
जमीन से बाहर आ रहे ज्वलनशील पदार्थ से लोगों में दहशत, जांच जारी
Jalna, Maharashtra:जालना | जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्याने खळबळ... या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. या ठिकाणी जमिनीतून काळ्या रंगाचे ज्वलनशील पदार्थ अचानक बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले. हे पदार्थ बाहेर पडताना लाव्हा जमिनीतून उसळावा, अशा प्रकारे दृश्य दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. घटनास्थळी सुमारे 11 केव्ही क्षमतेचा विजेचा खांबही आहे. त्यामुळे या प्रकारामागे नेमकं कारण काय आहे, याबाबत अजून माहिती कळू शकलेली नाही. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा शोध घेण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू होण्याची अपेक्षा आहे.0
0
Report
कल्याण पूर्व मलंगरोड से चेतना तक फेरीवालों के कारण ट्रैफिक जाम, चालक परेशान
Kalyan, Maharashtra:कल्याण कुवेमध्ये फेरीवाल्यांमुळे ट्राफिक जाम कल्याण पूर्व मलंगरोड पासून चेतना ते काका ढाबा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फेरीवाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी मुले वाहचालकांना मनस्ताप करावा लागतं आहे. पाचशे मीटरच्या अंतरासाठी अर्धा तास लागतं आहे एकाच ठिकाणी जाम वाहतूक पोलीस आणि केडीएमची चा फेरीवाल्याना अभय कां असा सवाल नरगरिकान कडुन बोल जात आहे.0
0
Report
Advertisement
चिखली में शिंदे गुट की शिवसेना में जोरदार प्रवेश, भाजपा के नेताओं का पलायन
Buldhana, Maharashtra: बुलढाणा. स्टोरी बुलढाण्यात मी जर भाजपाचे लोकांना 150 कोटींची कामे देऊ शकतो तर चिखलीत का दिली जात नाही. आमदार संजय गायकवाड यांची भाजपा वर टीका. चिखलीत शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा.. विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश.. "गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" उपक्रमाला सुरुवात.. Anvhor - बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजप, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड तसेच मंत्री, प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपा वर टीका करत बुलढणा्ि मधील भाजपचे लोकांना जर 150 कोटींची कामे दिल्या जातात, मग чिखलीत शिवसेनेच्या लोकांना का दिली जात नाही, उलट काम मागायल गेले तर भाजपत प्रवेश करा म्हणतात .. नाहीतर खोटे गुन्हे दाखल करतात .. त्यामुळे आता चिखलीत आम्ही आलो आहे ."गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" या उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली असून, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता चिखलीत मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश सुरू झाला असून, हा सपाटा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले... स्पीच बाईट - आ संजय गायकवाड, बुलढाणा ( शिंदेसेना )0
0
Report
राहुरी विधानसभा उपचुनाव: तनपुरे स्वतंत्र उम्मीदवार, लंके ने संकेत दिए
Ahilyanagar, Maharashtra:भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली आहे या मतदारसंघात प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असताना, लंके यांनी "मी तनपुरेंच्या संपर्कात असून राजकारणात योग्य वेळी योग्य डाव टाकला पाहिजे," असे सूचक विधान केले आहे. बारामतीची निवडणुकीत बिनविरोध करण्याचे आवाहन केले. अजित पवारांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली.0
0
Report
खारात प्रकरण पर मंत्री चंद्रकांत पाटील का बयान; एसआईटी नियुक्त जांच जारी
Sangli, Maharashtra:स्लग - खरात प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया,देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये मास्टर अँकर - अशोक खरात प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये खूप मास्टर आहेत.त्यामुळे एसआयटी नेमली आहे. सातपुते मॅडम सारख्या खूप चांगल्या ऑफिसर नेमल्या आहेत.खूप खणलं जात आहे,आवश्यकता वाटली तर देवेन्द्र जी केंद्रीय तपास यंत्रणाची मदत घेतील,त्याच बरोबर चंद्रकांत पाटील यांच्या कॉल प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावर बोलताना,या संदर्भात देवेंद्रजीं यांनी विधानसभा विधान परिषदेमध्ये एक अतिशय सविस्तर निवेदन केलेला आहे,असे सांगत अधिक बोलणे टाळले,ते सांगलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री0
0
Report
Advertisement
नाशिक के खरात मामले ने महिलाओं पर मानसिक शोषण का सच उजागर किया
Nashik, Maharashtra:अँकर नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे...या प्रकरणातील पीडित महिलांच्या मनावर झालेल्या जखमा आता समोर येऊ लागत आहेत मानसिक छळ, भीती आणि नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या या महिलांची ‘इनसाइड स्टोरी’ आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत... V/O १ राज्यात खळबळ उडवणाऱ्या भोंदू खरात प्रकरणातील पीडित महिला सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील तब्बल ८ ते ९ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घटनाक्रमामुळे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीमुळे या महिलांना आता स्वतःच्या घरातच लपवून राहण्याची वेळ आली आहे...ही फक्त शारीरिक शोषणाची गोष्ट नाही तर ही आहे मानसिक जाळ्याची एक धक्कादायक कहाणी बहुतांश महिला त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात असताना भावनिक आधाराच्या शोधात असतात आणि नेमकं हाच कमकुवतपणा ओळखून खरात त्यांचा विश्वास जिंकत असे “तुम्ही खूप खास आहात” अशा गोड बोलण्याने तो महिलांच्या मनात स्वतःबद्दल विश्वास आणि आकर्षण निर्माण करत असे एकदा का हा विश्वास निर्माण झाला की तो ‘गुरू’च्या रूपात त्यांच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण मिळवत असे आणि मग ‘मन आणि शरीर शुद्धी’च्या नावाखाली त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे.....पीडित महिलांना आतून चुकीचे वाटते, पण लगेच मन दुसरीकडे वळते. इतके दिवस विश्वास ठेवला मग चुकीचे कसे असेल, हा अंतर्गत संघर्ष महिलांना अडकवून ठेवतो. संस्कार, आज्ञाधारकपणा, आवाज उठवण्यापासून रोखल्याने या पीडितांची मानसिक गुंतागुंत वाढलीये...कुटूंबाने पीडित महिलांना समजून घेणं आणि त्यांना धीर देणं महत्वाचं आहे...पीडित महिलांनी मन मोकळं करून बोल पाहिजे अस मत मनसोपचार तज्ञांनी व्यक्त केलाय.... नागरिकांनी देखील समाज भान राखणं गरजेचं आहे या व्हिडिओ बद्दल चर्चा करणे आणि हे व्हिडिओ व्हायरल करणे हे थांबवलं पाहिजे यामुळे अनेक महिलांना मानसिक त्रास होत असल्याचं मत डॉक्टर सोननिस दिलीये... बाईट- डॉ. हेमंत सोननिस .... मनसोपचार तज्ज्ञ GRX * *खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना मानसिक धक्का* * *८ ते ९ महिलांनी घेतली मानसोपचार तज्ज्ञांची मदत* * *व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने नैराश्य वाढले* * *‘गुरू’च्या नावाखाले भावनिक शोषण* * *पोलिसांकडून अज्ञात स्थळी चौकशी* vio/02 तज्ज्ञांच्या मते शोषण झालेल्या महिलांनी स्वतःला दोष देऊ नये ही चूक नाही, तर विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आहे, ही जाणीव स्वीकारणे ही सावरण्याची पहिली पायरी आहे आपल्या जवळच्या व्यक्तींचा आधार घ्या समुपदेशन घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे सहानुभूतीने पाहा...त्याच बरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे कुठल्याही तक्रारदार महिलांनी टेन्शन घेऊ नये असं मत आणि अनिसच्या वतीने करण्यात येत आहे... अनिस तर्फे आम्ही या महिलांचे समुपदेशन करू आणि यासाठी एसआयटी आणि पोलिसांनी आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी देखील आणि सुरू करण्यात येते आहे.... बाईट-प्रा. आशा लांडगे, जिल्हा कार्याध्यक्ष, नाशिक अंनिस vio/03 नाशिकमधील हे प्रकरण केवळ गुन्ह्याचं नाही तर समाजातील मानसिक आणि भावनिक शोषणाचं भीषण वास्तव दाखवणारं आहे... अनेक नागरिक महिलांच्या अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर बिनधास्त व्हायरल करताना दिसताय.. याबाबत 65 पेक्षा जास्त व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केलीये तर साडेतीन हजार पेक्षा जास्त लिंक पोलिसांनी डिलीट केले आहेत... मात्र तरीदेखील अनेक लोक ह्या अत्याचारांचे व्हायरल व्हिडिओ करणाऱ्यांना सदबुद्धी येवो हीच माफक अपेक्षा..0
0
Report
भोंदू बाबा अशोक खरात पर लैंगिक अत्याचार: गर्भपात की दवाएं डॉक्टरों के साथ?
Nashik, Maharashtra:भोंदू बाबा अशोक खरात यांनी केलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत अनेक गंभीर बाबी समोर येत आहे....खरात ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता या महिलांना गर्भपात होण्यासाठी काही औषध गोळ्या देत असल्याची माहिती समोर आली आहे... याबाबत एसआयटी पथकाला सखोल चौकशी करताना अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत यात भोंदू बाबा अशोक खरात याला मदत करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी एसआयटी ने चौकशी केलीये.... भोंदू अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकातर्फे सोनोग्राफी सेंटरसह एक महिला व पुरुष डॉक्टरची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. खरातवर दाखल गुन्ह्यांपकी दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी ही तपासणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आता सुरू असून, याच गुन्ह्यात खरातला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत न्यायालयात सबळ पुरावे सादर करता येवो, या अनुशंगाने दोन दिवसांत ही तपासणी करण्यात आली. एसआयटी पथक खरातची पोलिस कोठडी वाढवून मिळावी यासाठी न्यायालयास विनंती करणार असून, खरातने पीडितेचा कुठे गर्भपात केला याचा तपास सुरू आहे. त्यामुळे सोनोग्राफी सेंटर तसेच डॉक्टरची केलेली चौकशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे... याबाबत देखील नाशिकच्या डॉक्टरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काही डॉक्टर आपल्या सामाजिक भान विसरून काही बाबाबुवांच्या नादी लागून चुकीचे काम करतात हे करणं चुकीचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी ज्या गोळ्या औषध दिली जातात त्यासाठी डॉक्टरने लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर च दिली जातात... आणि अशा प्रिस्क्रिप्शन कोणी गोळ्या औषध लिहून देत असेल तर ते साफ चुकीचं असल्याचं नाशिकच्या प्रसिद्ध असलेल्या स्त्री रोग तज्ञ मनीषा जगताप यांनी सांगितले... गोळ्या दिल्याने पेशंटला त्रास होऊ शकतो त्यामुळे हे करणं चुकीचं असल्याचं जगत डॉक्टर मनीषा यांनी म्हटले... अशा पद्धतीने आपल्या डॉक्टर पदवीचा गैरवापर कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटले.... बाईट- डॉ ..मनीषा जगताप स्त्री रोग तज्ञ भोंदू बाबा अशोक खरात यांनी मी देवताचा अवतार आहे आणि मी तुम्हाला सुख समृद्धी देऊ शकतो तुमचं जेवण सफल करतो असं म्हणून अनेक महिलांवर अत्याचार करत लैंगिक शोषण केला आहे... लैंगिक शोषण केल्यानंतर महिला जर गर्भवती झाली तर हाच भोंदू बाबा त्यांना गर्भपात होण्यासाठी काही गोळ्या औषध देत होता ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि ज्या डॉक्टर अशोक खरातला अशा गोळ्या पुरवत होता अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करत त्या डॉक्टरांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन च्या वतीने करण्यात आली आहे.... बाईट- कृष्णा चांदगुडे राज्य कार्यवाह अनिस.... काही डॉक्टर आपलं सामाजिक भान विसरून बुवाबाजीच्या नादी लागून अशा पद्धतीने भोंदू बाबांचा असाच साथ देत असेल तर डॉक्टरांना देव समजणारा रुग्ण हा कोणाकडे विश्वासाने पाहिल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे....ज्या डॉक्टरांनी भोंदू बाबा अशोक खरात याची साथ दिलीये त्या डॉक्टराची कसून चौकशी SIT ने केलीये... आता या चौकशी मधून काय निष्पन्न होईल हे पाहावं लागेल...0
0
Report
सीबीडी विभाग ने 68.85 लाख रुपये का माल लौटाते हुए 17 मामलों में बरामदगी की
Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर परिमंडळ-२ अंतर्गत असलेल्या सीबीडी, नेरुळ, एनआरआय सागरी आणि विमानतळ पोलिस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावून परत मिळविलेला तब्बल ६८ लाख ८५ हजार रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल बेलापूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. यात एकूण १७ गुन्हे आणि ३८ गहाळ प्रकरणांमधील एकूण ६८ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, वाहने आणि मोबाईल संच मालकांना परत करण्यात आले. यात २४ तोळे ३४ ग्रॅम सोने आणि ५३० ग्रॅम चांदी. तसेच १ रिक्षा आणि १२ दुचाकी. त्याचप्रमाणे ३७ मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा समावेश आहे. नागरिकांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.0
0
Report
Advertisement
