Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 21, 2026 03:34:41
Amravati, Maharashtra:जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर, रुग्ण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह अँकर :- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा मुक्तपणे वावर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवरही टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील अपघातकक्ष २४ तास कार्यरत असतो. येथे अपघातग्रस्त, गंभीर अवस्थेतील तसेच विषप्राशन केलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र अशा संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडक फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी काही रुग्णांवर उपचार सुरू असतानाच एक भटका कुत्रा बेडजवळ फिरताना दिसला. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः जखमी रुग्णांसाठी अशा अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. स्थानिक नागरिकांच्या मते, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नियंत्रण नसल्याने भटकी जनावरे सहज आत येतात. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून अपघात कक्षात कुत्र्यांचा वावर नियमितपणे दिसत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अपघात कक्षासह संपूर्ण रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करणे, स्वच्छता राखणे आणि भटक्या प्राण्यांचा प्रवेश रोखणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 21, 2026 03:34:30
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 21, 2026 03:34:20
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 21, 2026 03:33:53
Washim, Maharashtra:अँकर वाशीम जिल्ह्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी हंगामात घेतले जाणारे चिया पीक काढणीस आले असताना हवामान बदलामुळे नुकसानाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने चिया पिकांची काढणी वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चिया पिकाचे यंदा चांगले उत्पादन मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र बदलत्या वातावरणाचा फटका चिया पिकाला बसला असून उत्पादनात घट येतं आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने अनेक शेतकरी अनेक सकाळपासून चिया काढणीची लगबग सुरू आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 21, 2026 03:30:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटळांच्यावर टीका करताना, संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना भाजपासोबत पाठवलं होतं असं विधान केले होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी या गौप्यस्फोटात सांगितले, जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार आपण आहोत. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे असे आव्हान देखील त्यांनी दिले. या प्रकरणी जयंत पाटलांची राजकारण अडचणीत आणणारा चर्चा आली असून, त्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे या-type इशाऱ्यांचा समावेश आहे. बाइट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार बाइट - संजयकाका पाटील - माजी खासदार - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 21, 2026 03:18:21
Beed, Maharashtra:ANC - शिरूर तालुक्यातील खालापुरी गावात सागर लोंढे याच्या गँगकडून दहशत निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तलवार व बंदुकीचा धाक दाखवत या गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हात बंदूक आणि दातात कोयता ठेवून सागर लोंढे हा सोशल माध्यमात फोटो शेअर करतो.. त्यामुळे ग्रामस्थ आणखीन भीतीच्या सावटाखाली आहेत. या प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. खालापुरी येथील तलाठी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
679
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 21, 2026 03:18:07
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिके तर्फे शिक्षण रूपांतर धोरणाचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे. सदर धोरणा नुसार नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबई मनपाच्या सर्व मराठी शाळा या बंद करुन त्याऐवजी सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक मांडणार आहेत. यामध्ये मराठी विषय हा सक्तीचा असला तरी सरसकट सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या केल्यास मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जे मराठी माध्यमाचा आग्रह धरतात त्यांनी स्वतःच्या मुलांना कुठल्या माध्यमात शिकवलंय हे पाहून घ्यावं असे म्हणत गरिबांच्या मुलांना ही इंग्रजी मद्धमातून शिकण्याचा हक्क असल्याची प्रतिक्रिया यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी व्यक्त केलेय.
724
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 21, 2026 03:17:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या तासगाव तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसा व गारपीटमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षांची पंढरी म्हणून तासगाव तालुक्याची ओळख आहे,हंगामातील उरल्यास सूरल्या द्राक्षबागांना अवकाळीचा फटका बसला असून द्राक्षबाग शेतकऱ्यांचे मोठ आर्थिक नुकसान झाला आहे.या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी पाहणी केली आहे. तासगाव तालुक्यातील तुरची,ढवळी, जरंडी येथील द्राक्ष बागांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत, नुकसानीची आढावा देखील घेत,कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देत, राज्य सरकारने द्राक्षबाग शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी यावेळी केली आहे.
519
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 21, 2026 03:17:06
Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी अपहार प्रकरणात शाळांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी अँकर बनावट शालार्थ आयडी तयार करत शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत शासनाची तब्बल दीडशे कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकमधील काही शाळांमध्ये शिक्षकांची चौकशी सुरू केलीये..बोगस शालार्थ आयडी तयार करून ८४१ बोगस शिक्षक भरती करत शासनाची दीडशे कोटी फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन उपसंचालक नितीन उपासणी, बी. बी. चव्हाण, नितीन बच्छाव यांच्यासह धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार येथील शिक्षण संस्थेचे संचालक, लेखाधिकारी, मुख्याध्यापक आणि तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखલ आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पथकांनी नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शाळा, आश्रम शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांची माहिती घेतली. काही शाळांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आलीये...
575
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 21, 2026 03:16:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत यंदा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यंदा प्रथम विद्याथ्यपिक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असून, छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात ४३ तर अमरावतीमध्ये २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. राज्यात १०३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंडळाच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये दहावीच्या परीक्षेत ९३ तर बारावीच्या परीक्षेत ३६४ अशा ४५७ गैरप्रकारांची नोंद झाली होती. यंदा झालेल्या परीक्षांदरम्यान दहावीच्या परीक्षेत ७४ तर बारावीच्या परीक्षेत २३७ अशा एकूण ३११ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. आता या सर्व गैरप्रकारांची सुनावणी २३ मार्चपासून होणार आहे.
696
comment0
Report
Advertisement
Back to top