445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारामती में सुनेत्रा पवार के मुख्यमंत्री बनने के बैनर से उत्साह
Rui, Maharashtra:बारामतीत सुनेत्रा पवारांचे "होय मुख्यमंत्रीच" आशयाचे बॅनर..... Anchor _ बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा "होय मुख्यमंत्रीच" अशा आशयाचा बॅनर झळकला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनर वरती लिहिण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे.0
0
Report
नाले में क्रिकेट खेलते हुए मनसे ने कल्याण-डोंबिवली में नाला सफाई पर आंदोलन
Kalyan, Maharashtra:नाले सफाईबाबत मनसेचं अनोखं आंदोलन कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरातील जरीमरी नाल्यातील साचलेल्या कचऱ्यात चक्क क्रिकेट खेळत मनसेने अनोखं आंदोलन केलं. केडीएमसी प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल करण्यासाठी मनसेने हे आंदोलन केलं. पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अद्यापही नालेसफाई सुरू झालेली नाही. पॅनल नंबर ९ च्या मल्हार नगर परिसरातील गणेश नगर, जोशी बाग, जरी मरी त्याचबरोबर झुंजारराव मार्केट इथल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आहे. दरम्यान हि नाले सफाई वेळेवर न झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होईल. शिवाय अनेक ठिकाणी नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत, मग या बंदिस्त नाल्यात नालेसफाई कशी होईल अशा अनेक मुद्द्यांना घेऊन मनसेने हे आंदोलन केलं. ही नालेसफाई लवकर झाली नाही तर महापौरांच्या दालनात जाऊन कचरा टाकण्यात येईल अशा इशारा मनसेने दिला आहे.0
0
Report
शिक्षण मंत्री पंकज भोयर ने जनगणना और विज्ञान प्रदर्शनी के मोके पर निर्देश जारी किए
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - पंकज भोयर,राज्यमंत्री (शालेय शिक्षण/गृह) On शिक्षक जनगणना/SIR कार्य - राज्यात सध्या जनगणना, एसआयआर हे काम सुरू आहे आणि बीएलओ नियुक्तीच्या शिक्षकांची झाली आहे, त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा काम शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल होता - तापमान वाढलेला आहे, कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे सगळंच काम करणं शक्य नव्हतं त्यामुळे काही शिक्षक संघटना आमच्याकडे आल्या, त्यामुळे सूचना दिले आहेत जनगणना आणि एसआर च काम सुरू असल्याने प्रशिक्षणाचा काम पुढे ढकलण्यात यावं On शालेय विद्यार्थी नासा भेट - राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाची,विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तालुका जिल्हास्तरावर बालविज्ञान प्रदर्शनीचा आयोजन करण्यात येतं, या विद्यार्थ्यांना अजून चांगला एक्सपोजर मिळावा, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जून 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव दिला होता - विद्यार्थी जिल्हा सायन्स सेंटर मध्ये भेटी देतील, इस्रो मध्ये भेट देतील आणि विज्ञानाचे अजून चांगले माहिती मिळावी यासाठी नासा येथील केंद्राला भेट देण्याची विनंती देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे - तालुका आणि जिल्हास्तरावर वर्धा जिल्ह्यातून सुरुवात केली, येणाऱ्या सत्रातील विद्यार्थी प्रदर्शनी राज्यस्तरावर होते त्यानंतर राज्यातील विद्यार्थी नासामध्ये जातील On NCRB आकडेवारी - - गुन्हे करणारे हे व्यक्ती विकृत असतात, यामध्ये सामाजिक सहभाग वाढवतो, सामाजिक जागृती झाली पाहिजे, पोलीस प्रशासन काम करतच आहे पण जोपर्यंत सामान्य नागरिकांनी सामाजिक संस्थाचा सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घालू शकणार नाही On सुनेत्रा पवार मुख्यमंत्री - - राजकारणात प्रत्येकाची इच्छा असते, एका पदावर जाण्याची आणि अपेक्षा बाळगणे चुकीचं नाही, कुठलेही स्पर्धा महायुतीत नाही ते नाही पक्षचे नेते एकत्रितपणे काम करत आहेत On ncrb आकडेवारी - - हे आकडेवारी सतत चेंज होत असते मात्र गुन्हेगारांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत On विदर्भ शाळा चालू - - शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सिलॅबस कम्प्लीट झाला पाहिजे यासाठी हा टाइम टेबल राज्यस्तराचा करण्यात आलाय, परंतु त्या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय पुढील काळात घेण्यात येईल On निदा खान अटक - - अशा पद्धतीचे जबरदस्तीचे धर्मांतर होणे यासाठी कायदा पास केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत, म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना होणे याच्यावर सप्तशती कारवाई करण्यात येईल On शालार्थ शिक्षक पगार - - यामध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, झालेला घोटाळा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच पद्धतीने ते निर्दोष आहेत त्यांचा पगार झाला पाहिजे, राज्य सरकार देखील याबाबतीत सकारात्मक आहेत, ज्यांचा दोष नाही त्यांचे पगार लवकर होतील - या संपूर्ण प्रकरणाचे सखोल चौकशी करण्याकरिता एसआयटीचा गठन करण्यात आला आहे, यासाठीचा अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येत आहे परंतु या शिक्षकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही त्यांचे पगार नियमितपणे On आज दहावी निकाल - - दिवसेंदिवस स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, पालकांना माझा आव्हान आहे अति महत्वकांशी अपेक्षा पाल्याकडून बाळगू नये, पाल्यांना समजून घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित कौन्सिलिंग शिक्षकाने पालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पाहिजे On पुणे अत्याचार घटना - - अशा पद्धतीच्या घटना काही विकृत लोकांमुळे होतात, लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम व्यापक झाली पाहिजे0
0
Report
Advertisement
विरार के नारंगी पुल का उद्घाटन, यातायात से राहत; श्रेय बंटवारे की राजनीति
Vasai-Virar, Maharashtra:विरार मध्ये रखडलेला नारिंगी उड्डाणपूल अखेर सुरू पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण भाजप, बवीआ च्या पदाधिकार , कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाची लढाई रखडलेल्या पुलामुळे विरार शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत होत होती, अनेक तास वाहने पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर अडकून पडायची मात्र नारंगी येथील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात अल्याने विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे... या उद्घाटनावरील बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली... नवीन पुलावरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे0
0
Report
लोणावळा स्कायवॉक परियोजना में सौ वर्षों पुराने पेड़ काटने का विरोध
Varsoli, Maharashtra:पर्यावरणप्रेमींकडून याचा तीव्र विरोध Anchor: सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळा पर्यटन नगरीला निसर्गानं नैसर्गिक सुंदरता बहाल केली असून याच लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पादरम्यान कुमार चौक ते टायगर पॉईंट येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे होणार आहेत. लोणावळ्यातील नंदनवन असलेल्या रायवूड येथील शेकडो वर्षापूर्वी ची झाडे तोडण्याचा मानस या प्रकल्पात आखला असून यासाठी पर्यावरणप्रेमी जागृत झाले आहेत. स्कायवॉक प्रकल्पाला विरोध नसून येथील झाडे तोडण्याला जोरदार विरोध होऊ लागलाय रस्ता रुंदीकरणाच्या नावाखालचे होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… हिरव्यागार लोणणावळ्यातील झाडे वाचवलीच पाहिजेत, असा ठाम पवित्रा घेत पर्यावरण रक्षणासाठी कडक भूमिका घेण्यात आली आहे. पर्यटननगरी लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा शहर ते टायगर पॉइंट दरम्यान सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे रायवुड परिसरातील हिरवळ धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष नासिर शेख यांनी पीएमआरडीएला निवेदन देत पर्यावरण संरक्षण कायद्यांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. ट्री सर्व्हे रिपोर्ट, पर्यावरणीय परिणाम अहवाल (EIA) आणि सार्वजनिक सुनावणी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाचे अलाइनमेंट बदलून शेकडो वर्षांपूर्वीची झाडे वाचवावीत, तसेच अपरिहार्य परिस्थितीत झाडतोड करावी लागल्यास 1:10 प्रमाणात वृक्षारोपण आणि ट्रान्सप्लांट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या प्रकरणी कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.0
0
Report
आंधी-तूफान से कांदा किसान की दर्दनाक मौत, नाशिक में दुख की लहर
Nashik, Maharashtra:कांदा वाचविण्याच्या धडपडीत शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत... वादळी वाऱ्याने झाडाची फांदी कोसळली... नाशिकच्या बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापु जाधव यांचा जागीच मृत्यू बदलत्या वातावरणामुळे आधीच चिंतेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. शेतातील उघड्यावर ठेवलेला कांदा झाकण्यासाठी, वाचवण्यासाठी दुचाकी वर धाव घेतलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोटे-आखतवाडे रस्त्यावर सदर घटना घडली असून यात बापु सखाराम जाधव (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत असल्याने त्यांच कुटुंब आता उघड्यावर पडल आहे.0
0
Report
Advertisement
लोणावळा में पिता ने नाबालिग बेटी के साथ दुराचार, दीड वर्ष बाद मामला दर्ज
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यात धक्कादायक घटना. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल. पर्यटननगरी लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना समोर आली असून ही घटना ऑगस्ट २०२४ मध्ये घडली होती. याप्रकरणी आता तब्बल दीड वर्षानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपी पित्याने दारूच्या नशेत आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. सध्या तिचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, मात्र या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायम होती. अखेर तिने धाडस करून या कृत्याबाबत वाचा फोडण्याचे ठरवले. पीडितेने सुरुवातीला ३ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकरणाची फिर्याद दिली होती. मात्र, घटनेचे ठिकाण लोणावळा असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Indorikar Maharaj’s daughter’s wedding: thieves loot jewelry, two arrested
Shirdi, Maharashtra:प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे.. पोलिसांनी 2 लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली.. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला.. उपस्थितांमधील एकाचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याने त्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.. चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी दोन जण मोटार सायकलवर राहाता तालुक्यातील ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.. पथकाने सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्या कडून दिड लाख रुपये किमतीचे साडेअकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.. सागर सुरेश कांबळे आणि अब्दुल इब्राहिम पिंजारी अशी आरोपींची नावे असून, साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.. सर्व आरोपी हे श्रीरामपूर शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय.. पोलिस या चोरीच्या घटनेचा अधिकचा तपास करत असून आरोपींकडून चोरीच्या इतर काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे..0
0
Report
नांदेड में सड़क सुरक्षा अभियान: हेल्मेट-सीट बेल्ट पर इनाम, नियम पालन का आह्वान
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत वाहनधारकांना प्रोत्साहन दिले. जे वाहनधारक हेल्मेट वापरताहेत आणि सीट बेल्ट लावताहेत अश्या वाहधराकांना थांबवून त्यांना जिल्हाधिकारीांनी गिफ्ट दिले. अपघातातमध्ये मृत्यु होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकी अपघातात अनेकांचा जीव जातो. चार चाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट न लावल्याने अनेकाचे बळी जातात. वाहनधारकांना या नियमांची जाणीव व्हावी यासाठी नांदेडमध्ये रोड सेफटी मोहीम चालवली जात आहे. या अंतर्गत शाळा महाविद्यालयात जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड शहरातील आय टी आय चौकात वाहनधारकांमध्ये जनजागृती केली. दुचाकीवर हेल्मेट लावणाऱ्या वाहनधारकांना थांबवून त्यांना गिफ्ट देण्यात आले. जे वाहनधारक कारमध्ये सीट बेल्ट लावलेले आढळले अश्या वाहणधारकांना थांबवून त्यांनाही जिल्हाधिकारीांच्या हस्ते गिफ्ट देण्यात आले. वाहणधारकांनी हे छोटे छोटे नियम पाळल्यास जीवितहानी कमी होईल त्यामुळे सर्वानी नियम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. Byte - राहुल कर्डीले - जिल्हाधिकारी0
0
Report
Advertisement
नाशिक के विहीर हादसे: नौ लोगों के खिलाफ FIR, ठेकेदार सहित अधिकारी गिरफ्तार
Nashik, Maharashtra:दिंडोरी विहीर अपघात; नऊ जणांवर गुन्हा दाखल... अधिकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव... अँकर गेल्या महिन्यात नाशिकच्या दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या भीषण विहीर अपघात प्रकरणात दिंडोरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नगरपंचायतीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.... या प्रकरणातील ठेकेदार मानसी निरगुडे यांना पोलिसांनी अटक केली असून संबंधित प्रशासकीय अधिकारी फरार असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतलीये...गेल्या महिन्यात एका क्लासचे गॅदरिंग आटोपून कारने घरी परतत असताना वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांसह इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या प्रकरणी सुरुवातीला दिंडोरी पोलिसांनी विहीरमालक राजेंद्र राजे व मयत कार चालक सुनील दरगोडे यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला होता. राजे यांचेवर कारवाई करण्यात आली होती मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारचालक, विहीरमालक यांचेसह तत्कालीन मुख्याधिकारी नागेश येवले, तत्कालीन अभियंता सुनील पाटील, ठेकेदार मानसी निरगुडे, तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तत्कालीन भुकरमापक तसेच काम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या अभियंत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलाय...0
0
Report
हिंगोली के कलगाव फाटे पर ट्रक दुर्घटना, नुकसान भारी
Hingoli, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या कलगाव फाट्याजवळील वळन रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय ट्रक वाशीमकडून हिंगोली मार्गे सोयाबीनच्या बॅगा घेऊन येत असताना चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन पडला यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे...0
0
Report
तुळजापूर में युवक पर धारदार हमला, आरोपी फरार, शहर में भय बढ़ा
Dharashiv, Maharashtra:तुळजापूरात पुन्हा तरुणावरती जीवघेणा हल्ल्याची घटना, मध्यरात्री तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला अज्ञात हल्लेखोराने पार्थ कन्हाडे या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर वार होताच बचावासाठी हात पुढे घेतल्याने युवकाच्या हाताच्या शिरा तुटल्या गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोर अद्याप फरार असून पोलिसांकडून तपास सुरू चार दिवसाखालीच तुळजापूर मध्ये एका तरुणाचा झाला होता खून तुळजापूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी0
0
Report
Advertisement
मालेगांव महापालिका ने मानसून पूर्व नाला सफाई शुरू की; वार्ड में 25 कर्मी
Malegaon, Maharashtra:*Fast - नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे* - मालेगाव महापालिकेकडून शहरात मन्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात. - पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासून नियोजनबद्ध करण्याच्या सूचना - प्रत्येक प्रभागासाठी २५ कर्मचारी, ५ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध. Anc: मालेगाव शहरात पावसाळ्यात पाणी साचू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मालेगाव महापालिकेकडून मन्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नाले आणि गटारांची साफसफाई नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. याअंतर्गत प्रत्येक प्रभागासाठी २५ कर्मचारी, ५ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी यंत्रसामग्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.0
0
Report
हिंगोली के किसान ने गर्मी से डाळिंब बचाने के लिए क्रॉप कव्हर अपनाया
Hingoli, Maharashtra:डाळिंबाच्या बागा करपून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, हिंगोलीच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने यावर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. हिंगोलीच्या माळसेલू येथील शेतकरी राजेंद्र पाटील याच्या चार एकर डाळिंबाची बाग सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतेय. वाढत्या उन्हामुळे डाळिंबाची फळे काळी पडतात, त्यावर उन्हाची थेट किरणे फळावर पडत असल्याने डाग पडतात आणि पर्यायाने फळांचा दर्जा घसरतो. बाजारात अशा फळांना भाव मिळत नाही. हे संकट टाळण्यासाठी राजेंद्र पाटील यांनी आपल्या 1100 डाळिंबाच्या झाडांना चक्क 'क्रॉप कव्हर'चे अस्तरीकरण केले आहे यामुळे उष्णतेपासून या बागेचा बचाव होत आहे0
0
Report
रत्नागिरी में आंधी-बारिश ने मचाई तबाही, पेड़-झाड़ियाँ गिरने से नुकसान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्याला वादळी पावसाचा तडखा. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाविली ही होत असतानाच काल गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पुन्हा धुमाकूळ घातला. संगमेश्वर देवरुख आणि चिपळूण पट्ट्यात ढगांच्या गडगडात आणि विजांच्या कडकडात सह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले; सातत्याने पडणाऱ्या अवकाळी मुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. संगमेश्वरतालुक्यातील बुरंबित वीज कोसळून नारळाच्या झाडाने पेट घेतल्याची घटना घडली तर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
