445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापूर: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ने सांसद प्रणिती शिंदे को कानूनी नोटिस जारी किया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेना कायदेशीर नोटीस - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची अब्रूनुकसान केल्याचा आरोप करत मंत्री गोरेना कायदेशीर नोटीस. - खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधील स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात. - जयकुमार गोरे यांच्या बोलण्याचा स्पष्ट हेतू लैंगिक दृष्टिकोनातून टिप्पणी करण्याचा आणि एका महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा होता असा दावा या नोटीसीत करण्यात आलाय - खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन करणे, अपमानास्पद, बदनामीकारक आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे, मानहानीकारक विधान करणे आणि स्त्रीत्वाचा अपमान केल्याप्रकरणी नोटीस - नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसांच्या आत जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी - तसेच सामाजिक माध्यमांमध्ये तसेच मुद्रित माध्यमांमध्ये (प्रिंट मीडिया) सार्वजनिक माफी प्रकाशित करावी - अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे या कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेय. - खासदार प्रणिती शिंदेंच्या वतीने ऍड. असीम सरोदे, ऍड. श्रिया आवले, ऍड. आर्या राजेभोसले यांनी पाठवली नोटीस.0
0
Report
दळवटणे गांव ने 100% स्वगणना से रत्नागिरी में इतिहास रचा
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. जनगणनेत दळवटणे गावाची ऐतिहासिक भरारी; १००% स्वगणना पूर्ण करणारे रत्नागिरीतील पहिले गाव! रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने जनगणना २०२७ च्या मोहिमेत मोठी कामगिरी केली आहे.. १ ते १५ मे या कालावधीत राबवण्यात आलेल्या उपक्रमात गावातील सर्व ९ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली स्वगणना शंभर टक्के पूर्ण केली असून, असे यश मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.. या प्रक्रियेेमुळे गावाची लोकसंख्या आता २२६२ च्या घरात पोहोचल्याचे समोर आले असून, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाने मांडलेला हा लोकसहभागाचा आदर्श आता संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे॥0
0
Report
बीड़ केज थाना क्षेत्र में 3.5 वर्षीय बच्ची के साथ 75 वर्षीय नराधम ने दुष्कर्म का प्रयास
Beed, Maharashtra:बीड ब्रेक - केज पोलीस स्टेशन हद्दीत 75 वर्षीय नराधमा कडून साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. - बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर 75 वर्षीय नराधमाने आपल्या घरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. - हि प्रकार चिमुकलीच्या वडिलांनी पाहिल्याने घटना उघडकीस आली आहे. - वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. - पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के कलाकार ने पत्थर पर महाराज की हू-ब-हू प्रतिमा उकेरी, वायरल!
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दगडावर कोरले शंभूराजे! रत्नागिरीच्या सुपुत्राची कलेतून आगळीवेगळी मानवंदना.. अँकर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे.याच निमित्ताने रत्नागिरीतील युवा चित्रकार अजय पारकर याने आपली कला आणि भक्ती यांचा संगम घडवत एका दगडावर महाराजांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.. अतिशय कमी वेळात आणि नैसर्गिक दगडाचा वापर करून साकारलेली ही कलाकृती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.. आपल्या लाडक्या राजाला कलेच्या माध्यमातून दिलेली ही अनोखी मानवंदना सध्या सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल होत आहे..0
0
Report
संभाजी नगर में जयंती पर वाहन रैली नहीं निकली, उपमहापौर ने वजह स्पष्ट की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये संभाजी महाराज जयंती निमित्त शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी वाहन रॅली काढली होती इंधन वाचवा असे सर्व स्तरातून आवाहन होत असताना या वाहन रॅली बाबत चर्चा सुरू होत्या त्यावर हा पूर्व नियोजित कार्यक्रम होता जी लोक वेगवेगळी अभिवादनाला जातात ते फक्त एकत्र गेले प्रत्येक वर्षी 600 वर वाहनांची रॅली काढतो मात्र यंदा ती काढली नाही असा खुलासा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केला.0
0
Report
बाजीराव विहिरी के संरक्षण पर गडकरी ने की समीक्षा, कौतुक
Pandharpur, Maharashtra:भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण के कडून ऐतिहासिक बाजीराव विहिरी के जतन पर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी ने कौतुक किया। आळंदी- पंढरपूर पालखी महामार्ग के वाखरी ग्राम के पास बाजीराव विहीरी का इतिहास है। इस विहिरी के निर्माण 1811 में हुआ था। बाजीराव पेशवे ने आशाद्री वारी के समय पंढरपूर आकर विहिरी और 15 बीघे जमीन खाजगीवाले से ले कर विठ्ठल मंदिर को दान की थी, ताकि विहिरी के पानी से रोज की तुलसी व फूल की व्यवस्था देव के लिए की जा सके। इसके बदले खाजगीवाले को 400 रुपये दिए गए और 15 बीघे जमीन दी गई। पालखी महामार्ग की द scattering के दौरान केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी ने इस विहिरी की भी समीक्षा की और विहिरी के संवर्धन के लिए अधिकारी को सराहा।0
0
Report
Advertisement
12000 करोड़ बकाए के बीच निर्यात बंदी से साखर उद्योग और किसानों पर संकट
Kolhapur, Maharashtra:राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बंडू पाटील, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बाईट 2C ने पाठविले आहे. देशातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 12000 कोटी रुपये देणे बाकी आहे, अशामध्ये केंद्र सरकारने साखरेच्या निर्याती वर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील सर्वच साखर कारखान्याची स्थिती आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे. एकीकडे गेल्या चार वर्षापासून एमएसपी न वाढल्याने साखरेचे दर स्थिर राहिलेत, त्यामुळे साखर उद्योग कसा टिकणार ? असा प्रश्न साखर अभ्यासक विचारत आहेत. वाढलेले उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांना ऊसाला मिळणारा कमी भाव यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आधीपासूनच भरडला जातोय... तर दुसरीकडे साखर कारखानदारी देखील मोठ्या अडचणीत सापडल्या असल्यास चित्र आहे.. राज्यात वाढलेल्या साखर कारखान्याच्या संख्येमुळे साखर कारखान्याचा गाळप कालावधी कमी झालाय. परिणामी उत्पादन खर्च जास्त आणि शेतकऱ्यांना द्यावा लागणारा मोबदला अधिक अशा परिस्थितीत मार्ग काढायचा असा प्रश्न साखर कारखानदार याच्या पुढे उभा राहिलाय. संपूर्ण देशाचा विचार करता देशातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 12000 कोटी रुपये देणे बाकी आहे. एकीकडे हा परिस्थिती असताना केंद्राने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील साखर कारखान्याची स्थिति बिकट बनत चालली आहे असे अभ्यासक यांचे मत आहे. सध्या परदेशात साखरेला चांगला भाव मिळत आहे, अस असताना केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालून देशातील साखर कारखान्यांची अवस्था आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. कारखानदार आणि आमचं भांडण आहेच पण साखरेला दर मिळाला नाही तर कारखानदार तरी काय करणार ? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आणि भंपकपणाचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर ऊस उत्पादक शेतकरी यांनी देखील केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर टीका केली आहे. केंद्र सरकारने एफआरपी मध्ये वाढ केली तर त्याचा स्वागत करू.. पण त्या पटीने दुसरीकडे साखरेच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर कारखानदारी कर्जाचा डोंगराखाली दबली जाईल अशी भीती साखर अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. देशा बरोबरच राज्यातील अनेक साखर कारखान्यानी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे अशा साखर कारखान्यावर साखर आयुक्तानी कारवाईचा बडगा उगारलाय.. पण एकीकडे साखरेला भाव नाही, दुसरीकडे परदेशात साखरेला चांगला भाव मिळत असताना निर्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी हे भरडले जात आहेत. त्यामुळे केंद्राने साखर उद्योगाबाबत गांभीर्याने विचार करून तशी कृती करायला हवी, अन्यथा साखर कारखानदार आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी यामध्ये भरडला जाईल हे नक्की.0
0
Report
वाशीम के पाटणी चौक में चामुंडा दूध डेरी में मध्यरात्रि चोरी; CCTV फुटेज में कैद आरोपी
Washim, Maharashtra:वाशीम शहरातील पाटणी चौक परिसरातील चामुंडा दूध डेरीमध्ये मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर मालकाच्या निदर्शनास चोरीचा प्रकार आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.0
0
Report
जालना की कुंडलिका नदी दूषित, सांडपानी-कचरे से पानी अस्वच्छ; नगरपालिका से सफाई की मांग
Jalna, Maharashtra:जालना : CIVIC STORRY जालन्यातील कुंडलिका नदीत सांडपाणी आणि कचरा स्वच्छ नदी झाली दूषित वापरण्यायोग्य पाणी कचरा आणि सांडपाण्यामुळे झाले दूषित नदी स्वच्छतेकडे महानगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी (वाक थ्रू AVB) अँकर : जालना शहरातील कुंडलिका नदीची अत्यंत दुरावस्था झाली आहे.सलग 4 वर्ष सामाजिक संस्थांनी या नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून ही नदी स्वच्छ केली होती.त्यामुळे नदीतील पाणी देखील वापरण्यायोग्य होतं.मात्र आता या नदीच्या पात्रात सांडपाणी आणि केरकचरा फेकला जात असल्यानं नदी दूषित झाली.त्यामुळे नदीतील पाणी देखील वापरण्यायोग्य राहिलेलं नाही.परिणामी महानगरपालिकेने या नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केलीय. वाक थ्रू 121 विथ सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में ईंधन संकट से यात्रियों और रिक्शा चालकों की आपात स्थिति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे चिंता वाढली.. पेट्रोल डिझेल सह सीएनजी चा 15 जून पर्यंत पुरेसा साठा ठेवण्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारांच्या सूचना.. जिल्ह्यातील ठिकाणच्या पेट्रोल पंपावर इंधन तुटवड्याची समस्या निर्माण झाली असून जिल्हा वाशियांची चिंता वाढली आहे.. अनेक पेट्रोल पंपांवर अशा प्रकारच्या लांबच लांब रांगा दिसत असल्यामुळे इंधन साठा काही तासातच समाप्त होत आहे.. साठा संपल्यावर काही पंपांवर शिक्षक वाट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सीएनजी संपल्यानंतर ही चालक वाहने लावून तासनतास प्रतीक्षा करत आहे.. सध्या मे महिना सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांची पावले गावाकडे वळली आहेत. येताना ते वाहने घेऊनच आल्याने वाहनांच्या संकेत दुपटीने वाढ झाली आहे. यात सर्वात मोठं नुकसान रिक्षा चालकांचं होत आहे..त्यांना तासनतास इंधनाच्या प्रतीक्षेत उभे राहत राहावं लागत आहे.. दुचाकी स्वरांना केवळ दोनशे रुपयांचे तर चार चाकी वाहनांना 500 ते 1000 रुपयांचे पेट्रोल देण्यात येतयं..0
0
Report
गडकरी ने सोलापुर के घुलेवाडी में NHAI से जतन की गई विहीर का निरीक्षण किया
Pandharpur, Maharashtra:केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात माळशिरस तालुक्यातील घुलेवाडी येथील NHAI कडून जतन केलेल्या विहिरीची पाहणी केली. सदर विहीर अहिल्यादेवी यांनी वारकऱ्याना पानी पिण्यासाठी बांधल्याची माहिती आहे. त्यामुळे या पुरातन विहिरीचे जतन केले आहे.0
0
Report
SIDCO कार्यालय के बाहर पानी आपूर्ति को लेकर महिलाओं का ठिय्या प्रदर्शन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सिडको महानगर भागातील नागरिक पाणी प्रश्नावरून आक्रमक एमआयडीसी कार्यालयात महिलांचं ठिय्या आंदोलन २५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना कामावर सुट्या माराव्या लागतात.यामुळे संतप्त झालेले नागरिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले आहेत.अभियंत्यांच्या कार्यालयासोमार महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
संभाजी महाराज जयंती पर अहिल्यानगर के शिक्षक ने स्लेट पर खडूशिल्प से अभिवादन किया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरमधील कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी अनोखं अभिवादन केलंय...3 इंच खडूवर एक इंच छत्रपती संभाजी महाराजांचे खडूशिल्प साकारून त्यावर रंगकाम करून अनोखं अभिवादन केलं आहे. अतिशय बारकाईने हे काम करावं लागतं...प्रमोद उबाळे यांना छत्रपती संभाजी महाराजांचे खडूशिल्प साकारण्यासाठी तब्बल चार तास लागले आहेत0
0
Report
इंदापुर में धर्मवीर संभाजी महाराज की जयंती उत्साह के साथ मनाई गई
Rui, Maharashtra:इंदापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी इंदापूर तालुका व शहरातून शंभूभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान नगराध्यक्ष भरत शहा यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केला. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.0
0
Report
जायकवाड़ी डैम का जलस्तर 41.43% रहा, गर्मी में पानी बचाने की तैयारी तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून सध्या धरणात केवळ ४१.४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे... वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे... मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना याच धरणातून पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो... त्यामुळे आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे..0
0
Report
Advertisement
