445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मलकापूर में मध्यरात्री दो गुटों के बीच तनाव; पुलिस की सतर्कता से स्थिति शांत
Buldhana, Maharashtra:मलकापुरात मध्यरात्री दोन गट आमने-सामने; पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तणाव निवळला अब्दुल हमीद चौकात मध्यरात्री दोन गटांत निर्माण झालेल्या वादामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलीस प्रशासन आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून सध्या शहरात पूर्णपणे शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल हमीद चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांतील युवकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली। या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या वादात झाले आणि दोन्ही बाजूंकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही मध्यस्थी केली। पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले。 घटनेची गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
शिरळा में शिवम-शौर्य सुरक्षा अभियान: बच्चों को बिबट्या-रानडुकर से स्व-रक्षा सिखाई जाएगी
Sangli, Maharashtra:स्लग - हिंस्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी शिवम शौर्य अभियानाचा शुभारंभ. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिबट्याची वाढती दहशत आणि वाढणारे हल्ले तर पार्श्वभूमीवर शिवम-शौर्य सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये हिंस्र प्राण्यांपासून स्वरक्षण कसं करावं,याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. मांगले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधून अभियानाचा शुभारंभ झाला आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना बिबट्या, रानडुकर गवा रेडा पासून स्वरक्षण कसे करावे, याबाबतची प्रात्यक्षिका देण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य विराज नाईक यांच्या माध्यमातून मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान व वन विभागाच्यावतीने शिवम -शौर्य अभियान शिराळा तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे.0
0
Report
बाहुबली हत्ती का अचानक दर्शन: मोर्ले की सड़क पर हड़कंप, इलाके में दहशत
Oras Bk., Maharashtra:दोड़ामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे मुख्य रस्त्यावर ‘बाहुबली’ नावाचा टस्कर हत्ती अचानक अवतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळी हत्ती थेट रस्त्यावर आल्याने ग्रामस्थ, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांची काही काळ अक्षरशः घाबरगुंडी उडाली. हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून राहील्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने काही वेळाने हा हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मोर्ले परिसरात सध्या पाच हत्तींचा कळप वावरत आहे. मात्र बाहुबली हा टस्कर या कळपापासून वेगळा झाला असून तो सध्या एकटाच या भागात मुक्तपणे फिरत आहे. बाहुबली हत्तीचा वावर तसा शांत असला तरी त्याच्या अनिश्चित हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के मंगरुळपीर में गर्मी की फसल की बुवाई दोगुनी, वर्षा ने अच्छा आधार दिया
Washim, Maharashtra:वाशीम: मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सिंचनाला चांगला आधार मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मंगरुळपीरमध्ये उन्हाळी पिकांची पेरणी अधिक प्रमाणात झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ८१.२९ टक्के उन्हाळी पेरणी पूर्ण झाली असून, यंदा विशेषतः तिळाच्या आणि उन्हाळी ज्वारी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगरुळपीर तालुक्यात सरासरी १४२५.७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षात ११५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.0
0
Report
नांदेड के उमरी में भंडारे के दौरान विषाक्तता से दो मरीज अस्पताल
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्हयातील उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे भंडाऱ्याच्या जेवनातून तब्बल दोन जणांना विषबाधा झाली. गावातील भवानी माता मंदिरावर भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आंबीलमधून विषबाधा झाली. या सर्व रुग्णांना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यवस्थ चार रुग्णांना नांदेडला हलवण्यात आले. उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे काल 7 एप्रिल रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. दुपारी बारा वाजेपासूनच मंदिरासमोर भंडाऱ्याला सुरुवात झाली. सायंकाळी अनेक भाविकांना पोटदुखी, जुलाब, उलटी होऊ लागली. काही जणांनी जवळच्या खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. औषधी, गोळ्या घेऊन हे सर्व रुग्ण परत घरी गेले. रात्री रुग्णांची संख्या वाढतच गेली. अनेकांना त्रास जाणवू लागला. उमरी ग्रामीण रुग्णालयात महिला, पुरुष, लहान बालके मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल झाले. रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना कारेगाव , धर्माबाद , सिंधी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी गावात दाखल झाले. सद्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्या बाहेर आहे. अनेक रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कावलगुडा गावातील मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात आंबिल करण्यात आले होते या आंबिलासाठी वापरण्यात आलेल्या दहीच्या माध्यमातून ही विषबाधा झाल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे.0
0
Report
कोल्हापुर नगर में भूमाफियाओं की साजिश: आरक्षण बदलने का खेल उजागर
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील लँड माफिया शहरातील अनेक जागांचे आरक्षण बदलण्याचा घाट घालत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापूरकर चांगलेच संतापलेत. कोल्हापूर शहराची तिसरी विकास योजना तयार करण्यात येत आहे. ही विकास योजना तयार करत असताना जागा नसल्याच्या कारणावरून अनेक आरक्षणे वगळण्याचे, अनेक आरक्षण नव्याने टाकण्याचे घाट घातला जात आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर शहरात हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी हिरवा पट्टा आवश्यक आहे. असा असताना तो बदलून पिवळा पट्टा करण्याचा घाट कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी कारभार्यानी घातला आहे. त्यामुळे हा घाट उलथवून लावण्यासाठी कोल्हापुरकर पुढे सरसावले आहेत.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर की डॉक्टर वैदेही लोया MBBS सुवर्णपदक जीत चुकीं, राष्ट्रपति सम्मान मिलने वाला दिन
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर की डॉक्टर वैदेही लोया ने MBBS में सुवर्णपदक जीत लिया है। उन्होंने एम्स नागपुर से सर्वश्रेष्ठ अंकों के साथ MBBS उत्तीर्ण किया है और सामान्य चिकित्सा विषय में डॉ. संजय पैठणकर द्वारा सुवर्णपदक प्राप्त किया गया है. 15 अप्रैल को नागपुर में हो रहे एम्स के दीक्षांत समारोह में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू की उपस्थिति में वैदेही को राष्ट्रपति के हाथों सम्मानित किया जाएगा. वैदेही के पिता जुगल लोया नागपुर महामार्ग पर पडोली के छोटे चाय के दुकान चलाते हैं और उनके परिवार में पत्नी और दो बेटियां हैं. वैदेही अभी एम्स नागपुर में MD के प्रथम वर्ष की पढ़ाई कर रही हैं. उन्होंने शिक्षण जीवन में उत्कृष्ट प्रदर्शन किया है; Chandrapur के Vidya Niketan स्कूल से दशम और बारहवीं में उल्लेखनीय परिणामों के बाद नीट में भी चार जिलों में प्रथम स्थान प्राप्त किया था. MBBS में सुवर्णपदक की घोषणा के बाद परिवार ने खुशी व्यक्त की है. बाइट 1: डॉ. वैदेही लोया, सुवर्णपदक प्राप्त डॉक्टर. बाइट 2: जुगल लोया, वैदेही के पिता.0
0
Report
आमदार कथोरे पर गैंगस्टर को मारने की सुपारी देने का आरोप; पनवेलकर ने दावा
Ambernath, Maharashtra:आमदार किसन कथोरे यांच्या कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप अंबरनाथचे उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांनी केलाय. स्वतः लकडावाला याने जेलमधून ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत याबाबतची माहिती दिल्याचा दावा पनवेलकरांनी केला असून या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्योजक विश्वनाथ पनवेलकर आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. या सगळ्या आरोपांबाबत अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांना विचारलं असता त्यांनी हे संवेदनशील प्रकरण असल्याचं सांगत काहीही बोलण्यास नकार दिलाय. तर आमदार किसन कथोरे हे मुंबईला असल्यानं त्यांनी अद्याप आपली बाजू मांडलेली नाही. या आरोपांवर आता आमदार किसन कथोरे काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.0
0
Report
वाशीम के किसानों को महाभूमी साइट के कारण कर्ज प्रस्ताव नहीं मिल पा रहे
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असतानाच डिजिटल सातबाऱ्याच्या अडचणींमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सातबारा, आठ अ व इतर आवश्यक कागदपत्रांसाठी शेतकरी सेतु केंद्रावर जात असले तरी महाभूमी वेबसाईट बंद राहणे व सुरू झाल्यानंतरही व्यवस्थित काम न करणे, याामुळे कागदपत्रे मिळण्यात अडथळे येत आहेत.या परिस्थितीमुळे बँका कर्ज प्रस्ताव स्वीकारत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.नियमित कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने महाभूमी साईट तातडीने सुरळीत करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर सर्किट बैंच में गोकुळ दूध संघ मामले में आज सुनवाई, चुनाव स्थिति स्पष्ट होगी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ मधील दूध संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बँक मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिके संदर्भात आज सुनावणी होणार आहे.. दूध संघातील संस्था पात्र अपात्र ठरविण्यासह आणि अन्य याचिकांची सुनावणी एकत्रित होण्याची शक्यता आहे. गोकुळची निवडणूक तोंਡावर असताना सर्किट बेंच मध्ये एक एक करून याचिका दाखल होत आहे. न्यायालयाने अद्याप निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही, तरीही दूध संस्थांकडून ठराव मागणीसह निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. मे महिन्यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे, त्यामुळे गोकुळ दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणुक वेळेवर होणार की प्रशासक राज येणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार असं सगळे लक्ष लागून राहिले आहे.0
0
Report
वाशीम में फल-भाजी विक्रेताओं के खिलाफ पुलिस ने कार्रवाई शुरू कर दी
Washim, Maharashtra:वाशीम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौक परिसरात फळ व भाजीपाला विक्रेत्यांमुळे राहदारीत वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची समस्या समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वाशीम शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांवर, तसेच हातगाडीधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधित सर्व हातगाड्या जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सुरळीत प्रवास करता यावा, याासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.0
0
Report
अमेरिका-इस्त्राइल-इराक संघर्ष में दो सप्ताह का युद्ध-विराम, वैश्विक बाजारों में उम्मीद जगी
Nagpur, Maharashtra:अमेरिका, इस्त्राईल विरुद्ध इराक युद्धामध्ये दोन आठवड्यासाठी युद्धविरामचा निर्णय झालाय.... या युद्धविरांमुळे जागतिक स्तरावर सकारात्मक परिणाम होतील... कोणत्या अटी शर्तींवर हे युद्ध विराम व शस्त्र संधी होतेय....0
0
Report
Advertisement
वैजापुर में भीषण सड़क दुर्घटना: 58 वर्षीय व्यक्ति की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर एकनाथ पठाडे, वय 58 वर्षे, रा. सवंदगाव हे आपल्या दुचाकीने जात असताना जरुळ फाटा येथे भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पठाडे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर उपस्थितांनी तत्काळ मदत करत जखमी पठाडे यांना रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.0
0
Report
संजय शिरसाट के पुत्र के लिलाव मामले पर समिति की रिपोर्ट सरकार के पास
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने रेल्वे स्टेशन रोडवरील जागा व हॉटेल लिलावात खरेदी केल्याप्रकरणी नियुक्त उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या या लिलाव प्रक्रियेत दबावामुळे अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हॉटेल आणि लगतच्या जागेचे बाजारमूल्य १५० कोटींच्या घरात असताना मंत्र्यांच्या दबावामुळे ती ६५ कोटींत विकली गेल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता तर विधानसभेत हा मुद्दा गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शिरसाट यांनी मुलाला माघार घेण्यास सांगितले होते. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील ८ सदस्यांच्या समितीने तांत्रिक बाबी आणि पारदर्शकतेची तपासणी केली आहे. हा अहवाल आता महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून त्यावर सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
वाशिम के 21 स्कूलों को अनुदान समाप्ति खतरा, संचालक खुद खर्च पर चलेंगे
Washim, Maharashtra:21 शाळांमधील 39 तुकड्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.शासनाकडून वेळोवेळी मूल्यांकन करूनही या शाळांना शासकीय अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.राज्य शासनाने गुरुवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला.या निर्णयानुसार, संबंधित शाळांना मान्यता टिकवून ठेवायची असल्यास संस्थाचालकांना त्या शाळा स्वतःच्या खर्चावर,म्हणजेच स्वयंअर्थसहायित तत्त्वावर चालवाव्या लागणार आहेत.यासाठी केवळ एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित शाळांतील शिक्षक,कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
