Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 01, 2025 01:47:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये जुन्या शहरातील शाहाबाजार परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत असल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी सायंकाळी समीर खान इनायत खान ऊर्‍फ मालेगाव या तरुणाचा तलवारीने वार करून निघृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे, परिसरात तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी २८ ऑक्टोबर रोजी एका तरुणावर केलेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी समीर खानसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल होता. दरम्यान, गुन्हे शाखेसह सिटी चौक पोलिसांनी आरोपी शोएब काला, इसार खान, नसिर ईता आणि असलम चाऊस या पाच जणांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सायंकाळी समीर खान निशान दर्गा परिसरात उभा होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी त्याच्यावर कोयत्याने धारदार शस्त्राने वार केले. आरोपींनी समीरचा गळा चिरून टाकला आणि काही क्षणांत घटनास्थळावरून फरार झाले. आसपासच्या नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्याला उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. Byte पंकज अतुलकर, डीसीपी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 01, 2025 01:31:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मध्ये ऊस आंदोलन पुन्हा चिघळले. आंदोलने अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगेव यांच्यासह सहकाऱ्यांच्यावर श्रीदत्त कारखाना समर्थकांच्याकडून मारहाण. शिरोळ मधील शिवाजी चौकात रात्री ऊस रोखत असताना धनाजी चुडमुंगेव यांना मारहाण करत बाजूला केले. कारखाना समर्थकानी मारहाण केल्याचा धनाजी चुडमुंगेव यांचा आरोप. धनाजी चुडमुंगेव यांच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू. श्रीदत्त कारखाना प्रशासनाने ऊसाचा दर जाहीर न करता ऊसतोड सुरू केल्याने आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आक्रमक. महाराणीचा निषेध म्हणून शिरोळ तालुका बंद ठेवण्याची हाक. ऊसाला पहिली उचल 4000 रुपये द्यावी अशी आंदोलन अंकुशची मागणी.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 01, 2025 01:31:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग- ओव्हरटेक बेतला जीवावर..टँकर व कारच्या अपघातात दोन जण ठार .. अँकर- सांगलीच्या पलूस तालुक्यातील हजारवाडी येथे दुधाचा टँकर आणि चार चाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये दोन तरुण जागीच ठार झाले आहेत, तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे. भिलवडी स्टेशन जवळ असणाऱ्या हजारवाडी येथील HP गॅस प्लांट रोशन अपघात घडला आहे. अधिक शिंदे व ओंकार हिंगमीरे असे मृत तरुणांचे नाव असून हे दोघेही तासगाव तालुक्यातल्या बोरगाव येथील आहेत. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला, ज्यामध्ये चार चाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघाताची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास भिलवडी पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 01, 2025 01:31:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्वाभिमानीची साखर कारखान्यांवर धडक सुरू... 10 नोव्हेंबर पर्यंत एफआरपी जाहीर करावा यासाठी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर धडक देण्यात येत आहे. 3751 रुपये जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागणीचा निवेदन साखर कारखान्यांना देण्यात येत असून विटा येथील उदगीरी शुगर कारखान्यावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसरात दणाणून सोडला, तसेच ऊसाला प्रति टन 3751 रुपये दर द्यावा अन्यथा धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी उदगिरी कारखान्याला निवेदनाद्वारे दिला आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 01, 2025 01:31:18
Palghar, Maharashtra:पालघर मध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरूच आहे. डहाणू विधानसभेतील भाजप मधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, पालघर मधील अनेक उबाठा कार्यकर्त्यांनीही शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला असून यावेळी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अमित नहार यांनी देखील धनुष्यबाण हाती घेतला आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी भाजप और शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असतानाच अमित नहार यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशामुळे डहाणू नगर परिषद हद्दीत गुजराती,मारवाडी मतांचा फायदा शिवसेना सेनेला होईल असं विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 31, 2025 17:01:13
Pune, Maharashtra:अहिल्यानगर मनोज जरांगे बाईट पॉइंटर मनोज जरांगे पाटील यांनी घेतली भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट गोरगरिबांचे प्रश्न असतील आणि रक्षाबंधन केलं राजकारणाच्या पलीकडे लढवय्या माणूस कर्डिले साहेबांचे आम्हाला देखील अनुभव आंदोलन संदर्भात असतील किंवा गरिबांचे काय समस्या असतील एक चांगला माणूस गेल्याचं दुःख आहे या सरकारचा नेमकं करायचं काय याचा विचार लोकांनी करावा तुम्हाला फुकटच दिल त्याचा काय, तुमचं सरकार या जनतेने फुकट दिल आहे तुम्ही अपमानास्पद बोलत असाल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आपल्याला फुकट खाताय म्हणताय असे अर्वाच्य शब्द वापरत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांचे पूर्ण लोक पाडले पाहिजे शेतकऱ्यांची धास्ती निर्माण झाली पाहिजे जो माणूस बोलेल त्याला पाडलं पाहिजे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घेतली पाहिजे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 31, 2025 16:50:18
Pune, Maharashtra:अहिल्यानगर मनोज जरांगे पाटील यांनी घेतली भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट गोरगरिबांचे प्रश्न असतील आणि रक्षाबंधन केलं राजकारणाच्या पलीकडे लढवय्या माणूस कर्डिले साहेबांचे आम्हाला देखील अनुभव आंदोलन संदर्भात असतील किंवा गरिबांचे काय समस्या असतील एक चांगला माणूस गेल्याचं दुःख आहे या सरकारचा नेमकं करायचं काय याचा विचार लोकांनी करावा तुम्हाला फुकटच दिल त्याचा काय, तुमचं सरकार या जनतेने फुकट दिल आहे तुम्ही अपमानास्पद बोलत असाल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आपल्याला फुकट खाताय म्हणताय असे अर्वाच्य शब्द वापरत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांचे पूर्ण लोक पाडले पाहिजे शेतकऱ्यांची धास्ती निर्माण झाली पाहिजे जो माणूस बोलेल त्याला पाडलं पाहिजे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घेतली पाहिजे शेतकऱ्यांना सरकारने फसवलं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी डाव साधला शेतकऱ्यांना पद्धतशीर फसवलं मी जर आत्ता आजारी असेल तर मला आत्ताच दवाखान्यात न्यावे लागेल सहा महिन्याने काय उपयोग आता मदतीची गरज मात्र तुमच्या बोलबच्चन मुळे शेतकऱ्याचे पोट भागणार नाही शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलं आहे देवेंद्र फडणीस यांनी योग्य वेळी शेतकऱ्यांना फसवलं
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 31, 2025 16:17:05
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 31, 2025 16:16:52
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला.... दोघे गंभीर जखमी....पंचायत समिती आवारात पिसाळलेल्या लांडग्यांची दहशत .... परिसरात भीतीचं वातावरण.... AC ::- लातूर जिल्ह्यात देवणी पंचायत समिती परिसरात एका पिसाळलेल्या लांडग्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या लांडग्याच्या हल्ल्यात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून, यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्ला एवढा वेगवान होता की, तो लांडगा होता की चित्ता, हे कोणालाच समजू शकले नाही. क्षणात हल्ला करून तो प्राणी नजरेआड झाला. त्यामुळे, परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 31, 2025 15:46:07
Pimpri-Chinchwad, Maharashtra:मी काल बीडमध्ये असताना माधवी खंडाळकर यांनी एक व्हिडिओ काढला होता तो डिलीट केला होता माधवी खंडाळकर आणि तिचा बंधू माझी बहीण यांनी एकमेकांच्या समजते मी तक्रारी मागे घेतल्या होत्या बहिणीने त्यांचे सगळ्यांचे शूटिंग केलं होतं, तो काल विषय संपला होता आज अचानकपणे दुपारी ते महिला दुपारी येते परत गुन्हा दाखल करतात, त्यात माझं नाव आहे असं मला कळले, स्वतःला अटक करून घ्यायला आले मला कळू द्या तर कायद्याचा किती पोरखेळ चालवला आहे. मारलेल काय होते माझ्यावर गुन्हा दाखल नाही,माझ्यावर गुन्हा दाखल करावा, माझ्या कुटुंबावर विनाकारण गुन्हा दाखल केला जात आहे काल तक्रार घेतली नाही माझ्या फॅमिली वर रूपाली चाकणकर माधवी खंडाळकर यांचे प्रकरण पुढे आणले आहे, पदावर असताना गैरवापर चाकणकर यांनी केला आहे गैरवापर करून गुन्हा दाखल केला जात आहे राज्य महिला आयोग 2019 ला शहराध्यक्ष खंडाळकर जाधव नेत्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकारी होत्या ही महिलांना त्रास देत होत्या खोटे व्हिडिओ करत होते याचा नंतर खूप शिफारसी करताना दिसत आहे रूपाली पाटील ठोंबरे यांच्या कुटुंंबावर गुन्हे दाखल झाले तर चाकण कर यांच्यावर एक गुन्हे दाखल झालेले दिसते, आयोगावर असताना अनेक चुकीची काम केले आहेत चाकणकर यांनी सुरू केलेले वॉर रूपाली पाटील ठोंबरे संपवणार सुनील तटकरे यांनी यावर निर्णय घ्यावा राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा मागते माझी विकेट काढायच्या असेल तर आता गाठ माझ्याशी आहे माझ्या कुटुंबाशी असे कोणी काही करत असतील तर मी गप्प बसणार नाही माझ्या दोन बहिणी आणि मावशीवर गुन्हे दाखल झाले आहे माधवी खंडाळकर यांच्यासह दोन्‌य जणांवर गुन्हे दाखल केले आहेत चाकणकर आणि मी आता समोरासमोर लढणार आहे
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 31, 2025 14:04:42
Palghar, Maharashtra:पालघर – बोईसर शहरातील गणेशनगर परिसरात आज दुपारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर येथील चतुर्भुज ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चोरट्यांनी दोन राऊंड फायरिंग केले. सुदैवाने ज्वेलर्सचे मालक गोळीबारात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. फायरिंग केल्यानंतर चोरटे घटनास्थळी गावठी कट्टा (रिव्हॉल्व्हर) सोडून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराला वेढा घालून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून कट्टा जप्त केला आहे. घटनेनंतर पालघरचे पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांचा मागोवा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या फरार आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांच्या हाती CCTV फुटेज हाती लागले असून तपासणीला सुरुवात केली आहे. मात्र या घटनेमुळे बोईसर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 31, 2025 13:03:42
Ambernath, Maharashtra:रेल्वे स्थानकावर बंद असलेल्या सरकत्या जिन्याना वाहिली श्रद्धांजली बदलापूर रेल्वे स्थानकावर महाविकास आघाडीच अनोखा आंदोलन Anchor बदलापूर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याच पंधरा दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आलं , मात्र उद्घाटनानंतर अवघ्या तीन दिवच हे सरकते जिने सुरू राहिले , त्यामुळे आज रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या सरकत्या जिन्याला श्रद्धांजली वाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख आंदोलन केलं ,तसेच  यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला तसेच  प्लॅटफॉर्म  क्रमांक 2 वर लावण्यात आलेल्या संरक्षण जाळ्या  लवकरात लवकर  काढून  टाकाव्यात अशी मागणी केली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 31, 2025 12:47:27
Thane, Maharashtra:‘रन फॉर युनिटी’मधून कल्याण ग्रामीण मध्ये एकतेचा जयघोष.. नागरि‍कांचा उत्स्फूर्त सहभाग... देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमला परिसर... ॲंकार... राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज टिटवाळ्यात ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनच्या माध्यमातून एकतेचा, अखंडतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला गेला. कल्याण तालुका पोलिस ठाणे (ग्रामीण) यांच्या वतीने आयोजित या धावस्पर्धेत तरुण, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी वाजपेयी चौकातून धावेला सुरुवात झाली. गणपती मंदिर चौक येथे ही मॅरेथॉन संपन्न झाली. एक भारत, श्रेष्ठ भारतच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशभक्तीचे गीत, तिरंगा आणि जोशपूर्ण घोषणांनी टिटवाळ्याचे वातावरण दणाणून गेले. कार्यक्रमादरम्यान सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय सुविधा यांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होते. प्रत्येक सहभागीच्या चेहहऱ्यावर देशभक्तीचा भाव आणि एकतेचा संदेश झळकत होता. या उपक्रमातून “एकता आणि अखंडता हीच भारताची खरी शक्ती” असा संदेश समाजमनात रुजविण्यात आला. ‘रन फॉर युनিটি’मुळे आज टिटवाळा देशभक्तीच्या लहरींनी न्हावून निघाले. पोलिस ठाण्याच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेबद्दलची जाणीव दृढ झाली असून हा उपक्रम देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला. डॉ.डी.एस.स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, अनमोल मित्तل अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण आणि अनिल लाड उपविभागीय पोलीस अधीकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज गिरी पोलीस निरीक्षक, कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या नियोजनाखाली तसेच कल्याण तालुका पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top