icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई की सुबह की उड़ान रद्द, विधायक सीधे विधानसभा पहुँचकर कार्य सुचारू रखने को तैयार

Nagpur, Maharashtra:नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस - मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी आल्या. - विधानसभेचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे; या घटनेचा कामकाजावर परिणाम होऊनये. - अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात, त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नाही. - मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले असले तरी विधानभवनात पोहोचणे शक्य आहे. - कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध असून ते महत्त्वाचे आहेत. - विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो.
0
0
Report
Advertisement

हिंगोली के सवना के जिला परिषद स्कूल में शिक्षकों की कमी पर गांव वालों ने ताला लगाकर प्रदर्शन

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सवना येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आहे पाचवी चे दहावीपर्यंत असणाऱ्या या जिल्हा परिषद शाळेत केवळ तीन शिक्षक आहेत दोनशेच्या वर विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत मागील अनेक महिन्यापासून इंग्रजी विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे वारंवार विनंती करूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
0
0
Report

कल्याण स्टेशन पर भारी भीड़, मुंबई-ठाणे में लोकल ट्रेनों में देरी

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्टेशन वरती तूरळक गर्दी... मुंबई कडे जाणाऱ्या अप और डाऊन सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिल्याने मुंबईला जाणारे चाकरमानी यांनी घरीच राहणे प्रसन्न केले आहे त्यामुळे दररोज लाखो प्रवासी मुंबई ला प्रवास करतात मात्र आज घरीच राहणं पसंत केला आहे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावर तुलक अशी गर्दी पाहायला मिळत आहे तसेच मुंबईहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत तर काही वळवण्यात देखील आलेले आहेत खोपोली आणि लोणावळा दरम्यान रेल्वे रुलावर दरड कोसल्याने एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत तर काही प्रवाशी यांनी घरी जाणे पसंत केले आहेत तर काही प्रवासी हे रेल्वे स्थानकावरती वाट पाहताना दिसत आहेत याचा आढावा घेतलाय
0
0
Report
Advertisement

यवतमाळ से पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी दर्शन को सायकलवारी में भक्तिभाव की धारा

Yavatmal, Maharashtra:विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, रिंगणातील भक्तिभाव आणि सायकलच्या चाकांचा वेग… अशा भक्तिमय वातावरणात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपची ‘पंढरपूर सायकलवारी’ यवतमाळ येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे उत्साहात रवाना झाली. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकलवारीने शहरातील नागरिकांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेल्या ह्या सायकलवारीचे नागरिकांनी “माऊली… माऊली…”, “ग्यानबा तुकाराम…” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!” या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. “राज्यावरील अलनिनोचे संकट पूर्णपणे दूर होवो, राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात भरघोस पीक येवो आणि यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील समस्त जनतेला सुखी, समाधानी व निरोगी ठेव,” अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्याची विनंती भाजप नेते देवानंद पवार यांनी यावेळी वारकारी बांधवांना केली.
0
0
Report
Advertisement

वारणा नदी में जलस्तर बढ़ा, बाढ़ जैसे हालात; खेतों में फसलें डूबीं

Sangli, Maharashtra:स्लग- वारणा खोऱ्यात पाऊसाची संततधार.. अनेक छोटे बंधारे पाण्याखाली,वारणेचे पात्र बाहेर पडल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती.. अँकर - सांगलीच्या शिराळा व वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे,काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,चिकुर्डे ,मांगले येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.तर ऐतवडे खुर्द येथील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत आहे,त्याच बरोबर वारणा नदी काठच्या शेतात पाणी घुसले आहे,त्यामुळे भुईमूग,सोयाबीन, ऊस, भात, या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. तर बंधारयाचे दरवाजे न काढल्याने पाणी शेतात घुसल्याचे शेतकरयांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती जेल में कैदियों के बीच भारी मारामारी, तीन घायल

Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान मारामारी झाली; तीन कैदी गंभीर जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. ही घटना 4 जुलैच्या पहाटे बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये घडली असून न्यायालयीन बंदी जमील खान बिस्मिल्ला खान यांनी इतर तीन कैद्यांवर काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असून कारागृहात कैद्यांमधील वाद आणि हिंसक घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top