445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अम्बीवली-टिटवाड़ा के बीच लोकल सेवाएं ठप, सिग्नल फॉल्ट से यात्रियों के हालात खराब
Kalyan, Maharashtra:आंबिवली आणि टिटवाळ्याच्या दरम्यान सर्व लोकल सेवा ठप आहेत. आंबिवली आणि टिटवाल्यादरम्यान रेल्वे लोकलच्या लांबच लांबा रांगा. कसारा ला जाणारी चार वाजून चार मिनिटांची लोकल गेल्या अर्धा तासापासून कल्याण स्टेशन वरती उभी आहे. आंबिवली आणि टिटवळ्याच्या दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड असल्याचा रेल्वे प्रशासन कडून सांगण्यात येत आहे. साडेतीन वाजल्यापासून कासार कडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवा ठप्प झालेले आहेत.0
0
Report
अकोला बस स्टेशन पर नालों के पानी से बने नाश्ते का वीडियो वायरल, चिंता
Akola, Maharashtra:अकोला शहरातील मुख्य बस स्थानक चौकात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे हातगाडीवरील नाश्ता विक्रेत्यांकडून चक्क नाल्यातील पाण्याचा वापर होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवासी आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बस स्थानक परिसरात काही विक्रेते नाल्यातून पाणी भरून नेत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हे पाणी नेमके कशासाठी वापरले जातेय? पिण्यासाठी, नाश्ता तयार करण्यासाठी की भांडी धुण्यासाठी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जर या तिन्हीपैकी कोणत्याही कारणासाठी नाल्याचे पाणी वापरले जात असेल, तर तो सरळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर अकोला महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
नितेश राणे के बयान पर पुलिस स्टेशन में शिकायत, महाराष्ट्र राजनीति गरमाई
Thane, Maharashtra:आमदार संजय केळकर ऑन राष्ट्रवादी SP पोलिस स्थानक निवेदन पोलीस स्थानकात जाऊन निवेदन दिन हा लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे ज्यांच्याकडे देत आहे त्यांनी वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारचा अवमान महापुरुषांचे अपमान सभागृहात सभागृहाच्या बाहेर केले आहेत माफी देखील मागितले आहे त्यामुळे एका बाजूला तुमच्यासाठी अधिकार असला तरी देखील तुमच्या पायाखाली काय जळतंय हे देखील त्यांनी बघायला हवं .. नितेश राणे हे या राज्याचे मंत्री आहेत महाराष्ट्रभर निरनिराळ्या विषयांसाठी ते फिरत असतात.. ते एका मतदारसंघापूर्ती मर्यादित नाही.. *राणेंचे रक्त अजून त्यांना माहीत नाही ते नारायण राणे व इतर सर्वांना घेऊन येतील.. उगाचच्या उगाच आव्हान प्रती आव्हान करू नका तुमची वाट करा तुमची संघटना वाढवा परंतु उगाच अशा पद्धतीने एखाद्याला आव्हान देणे हे योग्य नाही*0
0
Report
Advertisement
बारामती चुनाव बिनविरोध के लिए महायुति ने आखिरी कोशिशें तेज कर दीं
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर मंत्री चंद्रकांत पाटील बाईट मुद्दे मंत्री चंद्रकांतदादा पाटील ऑन बारामती निवडणूक आज फक्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अजूनही वेळ आहे ज्यांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेले आहेत ते माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ शकते याचा अर्थ बिनविरोध साठी अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहे राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्या अशा परिस्थितीत भविष्यात काही मागायचे असते काही शब्द घ्यायचे असतात अजूनही खात्री आहे या दोन्ही निवडणुका बिनविरोधच आहेत बारामती तर वनवेच आहे आणि राहुरी मध्ये कर्डिले यांनी जे काम उभं केलेले आहे त्याच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक जिंकू निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत आहेत0
0
Report
चाकण में नकली नोटों से कार खरीदने वाला गिरोह गिरफ्तार; 42 लाख जाली नोट जब्त
Chakan, Maharashtra:बनावट नोटांनी कार खरेदी; चाकणमध्ये टोळी अटकेत, ४२ लाखांची बनावट रोकड जप्त पुण्याच्या चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. कार विक्रीनंतर दिलेल्या पैशांच्या बंडलमध्ये वर-खाली खऱ्या आणि मधोमध बनावट नोटा ठेवून फसवणूक करण्यात आली. प्रकार लक्षात येताच चाकण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. या कारवाईत ४२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून गणेश ठाकरे आणि समीर महल्ले यांच्यासह कार व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.0
0
Report
डोंबिवली में स्लैब गिरा: बुजुर्ग महिला समेत एक घायल
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पूर्वेतील गोपाळ नगर २ परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘आधार’ नावाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब अचानक कोसळून खालील घरावर पडला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून, इमारतीत अडकलेल्या एका वयोवृद्ध महिलेला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, इमारत रिकामी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंबिवली पूर्वेतील गोपाळ नगर २ परिसरात ‘आधार’ इमारतीत आज दुपारी अचानक दुर्घटना घडली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब कोसळून तो थेट तळमजल्यावरील घरावर पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या एका वयोवृद्ध महिलेला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने रेस्क्यू करत सुखरूत बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक, केडीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आणि संपूर्ण इमारत रिकामी करण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपास आणि संरचनात्मक पाहणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
Jalna में विद्युत पोल से लाव्हा निकलने की घटना, नागरिकों में डर
Jalna, Maharashtra:जालना | जमीनीतून लाव्हा बाहेर पडल्याने खळबळ. विद्युत पोल रोवलेल्या जागेतून लाव्हा निघत असल्याची माहिती महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिली गेली. पोल मधील विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर लाव्हा सदृश खडक वितळण्याचा प्रकार थांबला. पोल जवळ पाण्याचा ओलावा नसल्यामुळे आर्थिंग मिळालं नाही, ज्यामुळे खडक वितळल्याचे स्पष्ट झाले. आजपासून पोलमधून लाव्हा बाहेर येण्याचा प्रकार बंद झाल्याची माहिती दिली गेली. या घटनेची दखल आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली. घटनास्थळी 11 केव्ही क्षमतेचा विद्युत खांब असूनही वर्गातला लाव्हा वितळून बाहेर आल्याची चर्चा झाली. परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते परंतु महावितरणने भने केलं की घाबरण्याची आवश्यकता नाही.0
0
Report
बीड़ में गैस टंचाई: महिलाओं ने चूल्हे पर भाकरी पकाकर सरकार का ध्यान खींचा
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात गॅस टंचाईचा प्रश्न आता चिघळला असून महिलांनी थेट रस्त्यावर उतरून सरकारचं लक्ष वेधलं आहे. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम देशासह बीडमध्येही जाणवत असून गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. बुकिंग करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर काही ठिकाणी सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन सुरु केलंय... महिलांनी चक्क चुल पेटवत भाकरी थापून सरकारचा निषेध केला. “महिनाभर गॅस मिळत नाही, मग घर कसं चालवायचं?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.0
0
Report
वाशिम में मारपीट, 21 वर्षीय युवती ने विनयभंग का आरोप दर्ज कराया
Washim, Maharashtra:रिसोड येथील बीएलओ नवनाथ बोंडे यांना ३ एप्रिल रोजी मॅपिंगच्या कामादरम्यान तिघांकडून मारहाण झाली होती. या प्रकरणात आधी मारहाण व शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला. एका 21वर्षीय युवतीने बोंडे यांच्यावर व्हॉट्सअॅपवर अश्लील संभाषण करून विनयभंग केल्याची तक्रार केली असून त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करत असून तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले. या दुहेरी गुन्ह्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती का त्रिभाजन, राजनीति गरमाई
Sangli, Maharashtra:सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अखेर त्रिभाजन. त्रिभाजन संदर्भातले अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जारी. जत आणि कवठेमहांकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आता होणार वेगळया. अधिसूचना जारी होताच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त. सांगली कृषी उत्पन्न समितीवर आता प्रशासक राज. सांगली, मिरज, जत आणि कवठेमहांकाळ अशी एकत्रितपणे होती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची होती सत्ता. नुकतेच जयंत पाटील समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्याची सभापती पदी झाली होती निवड. भाजप आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून त्रिभाजनाची करण्यात झाली होती मागणी. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजीनानंतर महाविकास आघाडी आणि जयंत पाटलांना भाजपाचा धक्का. सांगली जिल्हा परिषदेतल्या कार्यक्रमाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परतफेड केल्याची राजकीय चर्चा.0
0
Report
रोजगार हमी योजना पर बैठक के बाद किसानों ने फलों की खेती से उत्साहित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण मधील शेतकऱ्यांनी जे काय फळबागे लावलेले आहेत ते बघून मला समाधान वाटले, मी कोकणातला माणूस आहे आमच्याकडे आंबे, फणस, काजू मोठ्या प्रमाणात असतात मात्र इकडे देखील शेतकऱ्यांनी केसर आंबा जो दोन प्रकारचा असतो तो इथे लावलेला आहे. ड्रॅगन फ्रुट लावलेले आहेत, डाळिंब आहेत, पेरू आहेत असे वेगवेगळ्या फळबागांची लागवड त्यांनी केलेली आहे. म्हणजेच कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न हे बघून मला समाधान वाटले. हापूस आंबा उत्पादन कमी. हवामानाच्या बदलामुळे मोहरावर परिणाम झाला, कोकणात देखील फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे, सभागृहात देखील याबद्दल चर्चा झाली मुख्यमंत्र्यांकडे देखील आम्ही मागणी केली आणि त्यांनी देखील शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे मदत करू असे आश्वासन दिले आहे, त्यामुळे आम्ही देखील मदत करू. खरात बाबा प्रकरण ते अत्यंत मोठं आहे, हे प्रकरण अगदी हाताच्या बाहेर आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वच त्याची सखोल चौकशी करत आहेत. त्यामुळे या चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याला त्या खरात बाबांने सामोरे जावो. आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार यांचा एकच अर्ज दिलेला आहे, भाजप असेल किंवा शिवसेना,NCP असेल त्यांनी सुनेत्राताईंचाच अर्ज भरण्याचा ठरवलं होतं. आता विरोधक जे काही अर्ज भरत आहे त्याबद्दल आम्ही कसं सांगणार आम्ही तर आम्हचं ठरवलेलं आहे. जरी कुणी उभे राहिले तरी सुनेत्राताईंनाच निवडून आणण्याचे काम सर्वांचे राहील. बैठक निर्देश. निर्देश असे दिलेले आहेत की जे आपल्या खात्याचे काम आहे ते जलद गतीने व्हावे. नवीन केंद्र शासनाने योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे, चार राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे दोन-तीन महिने मागेपुढे होतील, तसेच आमच्या योजनेच्या अंतर्गत जे काही लोकांना लाभ मिळतात याचा आढावा आणि त्याची आज बैठक घेण्यात आली. नितेश राणे भावनेच्या आहारी जाऊन त्या महाराजांनी ते वक्तव्य केलेले आहे, परंतु नितेश राणे यांनी त्याचे समर्थन केलेले नाही. रोजगार हमी निधी पेंडिंग जसे पैसे आले तसे आम्ही याला देत जातो, मध्ये 1100 कोटी आले होते, ज्यावेळेला केंद्र शासनाचा निधी येतो त्यात राज्य शासनाचा देखील निधी असतो, जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आता वाटले आहेत. थोडे राहिलेत 1000-1200 च्या आसपास राहिले आहेत ते पण आम्ही लवकरच देऊ.0
0
Report
सोलापुर में चार साल में 37,000 लोग मोकाट कुत्तों के काटने से दहशत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गेल्या चार वर्षात तब्बल 37 हजार सोलापूरकरांना मोकाट कुत्र्यांचा चावा - सोलापूरात गेल्या 4 वर्षात तब्बल 37 हजार जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा - एकीकडे नागरिक भयग्रस्त तर महापालिका सुस्त - दररोज दोनशे रुग्ण रेबीज इंजेक्शनसाठी रांगेत - लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या हल्ल्याचे बळी ठरत असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी सहजपणे दुचाकीवरून जाताना अचानकपणे मोकाट कुत्रे अंगावर आल्याने अपघात घडल्याच्या घटना आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य सोलापूरकर देखील मोकाट कुत्र्यांना चांगलेच वैतागले आहेत. - प्रशांत बाबर (सामान्य नागरिक) - मात्र एवढ्या गंभीर प्रश्नांवर महापालिका प्रशासनाची उपायोजना अपुरी ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोकाट कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी नसबंदी मोहीम राबवली जात असली तरी प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नियमानुसार फक्त पिसाळलेले किंवा रोबोट कुत्रे पकडण्याची परवानगी असल्याने इतर कुत्र्यांना पकडून नसबंदी केल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. परिणामी कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर, गल्लीबोळात, आणि वस्त्यांमध्ये नागरिकांवर हल्ले करत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका प्रशासन याबाबत नेमकं कशा पद्धतीने काम करते हे आपण ऐकूयात.... - सतीश चौगुले ( पशुवैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगरपालिका ) - प्राणी मित्रांच्या माहितीनुसार सोलापूर शहरात जवळपास 70 हजारपेक्षा अधिक मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. महापालिका एकीकडे नसबंदीचा प्रयोग करत असली तरी दुसरीकडे मात्र मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने यावर तात्कालिक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलीय. - इम्रान सगरी ( प्रणीमित्र ) ( पिवळा टी - शर्ट ) - End P2C - सोलापूर शहरातून मोकाट कुत्र्यांच्या बाबत आलेल्या धक्कादायक आकडेवारीमुळे शहरवासीय आणखी भयभीत झाले आहेत. - अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर0
0
Report
Advertisement
राष्ट्रवादी ने गोविंद मोकाटे को राहुरी विधानसभा उपचुनाव के लिए उमेदवारी दी
Ahilyanagar, Maharashtra:राष्ट्रवादी SP कडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी अहिल्यानगर च्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.... प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारी बाबत शेवटपर्यंत निर्णय न घेतल्याने मोकाटे यांना शरद पवार पक्षाकडून दिली उमेदवारी.... गोविंद मोकाटे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य... 2012 साली शिवसेना पक्षाकडून गोविंद मोकाटे झाले होते नगर तालुका पंचायत समिती सदस्य...0
0
Report
बरांज-मोकासा में अवैध कोयला खनन, लोकायुक्त ने पुनर्वसन सचिव को तलब किया
Chandrapur, Maharashtra:कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड साठी कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर खाणकाम उजेडात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज- मोकासा गावी ही कोळसा खाण आहे. या खाणीतून निघालेला कोळसा कर्नाटक राज्यात ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. मात्र कंपनीला अधिग्रहित न झालेली बरांज -मोकासा गावातील 84.41 हेक्टर वन जमीन बेकायदेशीररित्या खोदून काढण्याची रीतसर तक्रार राज्याचे लोकायुक्त आणि पुनर्वसन सचिव तुकाराम मुंडे यांना पाठविण्यात आली आहे. या जागेतून सुमारे 80 लाख मेट्रिक टन कोळसा काढून परस्पर विकण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि वन विभागाचे स्वतंत्र आणि स्वयं स्पष्ट अहवाल देखील आहेत. तक्रारीत कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व कोळसा उत्खनन कंपनी यांच्यात साटेलोटे असल्याने या भागातील गावांचे पुनर्वसन न करता कोळसा उत्खनन केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय. बाईट १) विशाल दुधे, तक्रारकर्ते, बरांज-मोकासा0
0
Report
सातारा में सफाई मजदूर यूनियन ने मांगें न पूरी होने पर आत्मदहन की चेतावनी दी
Satara, Maharashtra:सातारा - अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने राज्यातील प्रलंबित मागण्यांसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सफाई कामगार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरज सोलंकी यांनी शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर येत्या १५ दिवसांत आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे संघटनेने याबाबत शासनाकडे निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे।0
0
Report
Advertisement
