icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जेवनाळा की जिल्हा परिषद डिजिटल स्कूल में प्रवेश परीक्षा, ग्रामीण शिक्षा का नया मॉडल

Bhandara, Maharashtra:जिल्हा परिषद शाळेत ‘हाऊसफुल’ची परिस्थिती.... जेवनाळा डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी परीक्षा.... गुणवत्तेमुळे ग्रामीण शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा राज्यात एकीकडे विद्यार्थीसंख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येत आहे… शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जावे लागत आहे… मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे… येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला चक्क प्रवेश परीक्षा घ्यावी लागत आहे. यजवणाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे. शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधील यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. परिसरातील 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील गावांमधून विद्यार्थी येथे प्रवेशासाठी येत आहेत. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनाने प्रवेश परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील ही शाळा इतर जिल्हा परिषद शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0
0
Report

राज्य के सार्वजनिक ट्रस्ट अधिनियम में बड़ा बदलाव, 1 मई से लागू

Nashik, Maharashtra:Breaking राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट कायद्यात मोठा बदल; १ मेपासून अंमलबजावणी देवस्थानांचे नियंत्रण दिवाणी न्यायालयांकडून धर्मادाय आयुक्तांकडे ट्रस्ट व्यवस्थापन, विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेत बदल त्र्यंबकेश्वर, सप्तश्रुंगी, काळाराम मंदिरांसह अनेक मंदिरांचा समावेश विश्वस्त नियुक्ती व कामकाजावरून वाद वाढल्याची पार्श्वभूमी न्यायालयांवरील ताण कमी करण्यासाठी सरकारचा निर्णय ट्रस्टमधील गैरव्यवहार, पारदर्शकतेअभावी कारवाईस गती त्र्यंबकेश्वर विश्वस्त संस्थांमधील गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरून वादाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत संरचनेत बदल कायमस्वरूपी विश्वस्तांवर २५% मर्यादा लागू करण्याचा नियम
0
0
Report
Advertisement
Advertisement

बीड के धारूर में गोठे में आग, वृद्ध की मौत और पशु झुलसे: जाँच जारी

Beed, Maharashtra:बीड: कोठ्याला आग लागून वृद्ध जळून खाक.. पशुधन देखील आगीच्या भक्षस्थानी.. आगीचे कारण मात्र अस्पष्ट..! ANC- एक बातमी भीषण है.... बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील रेपेवाडी येथे एका शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत एका वृद्धाचा जळून कोळसा झालाय. रामभाऊ रेपे असे मयताचे नाव आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.... कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.... आगीत वृद्धासह अनेक शेळ्या आणि कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि तहसील प्रशासन तब्बल चार तासानंतर पोहचले... यावेळी वृद्धाचा केवळ सांगाडा दिसून आला. आग लागली किंवा कोणी लावली का याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र या प्रकरणात पोलिस अद्याप माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. यामुळे या घटनेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

साई रिसॉर्ट मामले में अनिल परब समेत सभी आरोपी निर्दोष मुक्त

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना मोठा दिलासा.. खेड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता!.. अनिल परबांसह सर्व आरोपींची सुटका.. मुरुडच्या गाजलेल्या 'साई रिसॉर्ट' प्रकरणावर कायदेशीर पडदा.. पुराव्याअभावी सर्व आरोप फेटाळले.. किरीट सोमय्यांनी गाजवलेल्या प्रकरणात परबांना 'क्लीन चिट'. एंकर.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची खेड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे... गेल्या दोन-तीन वर्षांपासून राजकीय वर्तुळात गाजलेल्या या प्रकरणावर आता कायदेशीर पडदा पडला आहे.. या प्रकरणात बनावट कागदपत्रे, सीआरझेड नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते... मात्र, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुधीर बुटाला यांचा 'जमीन आणि बांधकाम स्वतंत्र घटक' असल्याचा तांत्रिक युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.. पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका केली आहे.. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत राहिले होते.
0
0
Report

कल्याण पुलिस ने 107 किलोग्राम गांजा पकड़कर तीन तस्करों को गिरफ्तार किया

Kalyan, Maharashtra:कल्याण अंमली विरोधी पथकाने १०७ किलो गांजा पकडला, तीन तस्करांना अटक. कल्याणच्या खडकपाडा भागात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती अमली विरोधी पथकाला मिळाली, त्यानुसार सापळा रचून वसीम खान, दिनेश कुमार आणि मोहित वर्मा यांना अटक केली, शिवाय त्यांच्या कडून १०७ किलो अमली पदार्थ गांजा हस्तगत केला. दरम्यान हे तिघेही अमली पदार्थाच्या खरेदी विक्रीतील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील मुंबई आणि उपनगरांमध्ये त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय ते हा गांजा कोणाला विक्री करण्यासाठी आले होते, या टोळीमध्ये कोणती मोठी टोळी सक्रिय आहे ka याचा तपास पोलीस करत आहेत
0
0
Report
Advertisement

नागपुर महापालिका ने 12वीं में टॉप करने वालों को नकद पुरस्कार और सोने के सिक्के दिए

Nagpur, Maharashtra: नागपूर महानगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज सत्कार करण्यात आलेल्या 11 गुणवंत विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थिनी आहेत., शाळांत परीक्षेत उत्तीर्ण होत प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता मनपाद्वारे त्यांना अनुक्रमे 25 हजार,15 हजार व 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रथम येणाऱ्या विद्यार्थांना सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्यक्रमात प्रविण्याप्राप्त विद्यार्थांना महापौर यांच्याहस्ते पारितोषिक वितरण केल्या जाणार आहे.
0
0
Report

अकोला अस्पताल के पास खंडहर बंगला में भीषण आग, दमकल ने काबू पाया

Akola, Maharashtra:अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारितील मेडिकल सुपरिटेंडन यांच्या जुना व खंडर अवस्थेतील बंगला परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली.सदर बंगला अनेक वर्षांपासून पडझड अवस्थेत असून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांसह कचरा साचलेला होता. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या झाडांना अचानक आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घटनास्थळ उपस्थित नागरिकांनी सुरुवातीला स्वतः आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याने तात्काळ अग्निशामक विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानि झाली नाही. मात्र काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top