Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 22, 2026 11:34:33
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकावर थरार! OHE खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा जबरदस्त शॉक; रेल्वे सेवा विस्कळीत. Anc..कल्याण रेल्वे स्थानकावर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका तरुणाने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून सुमारे दीड तास धुमाकूळ घातला या घटने मुले एक आणि दोन वरील डाउन लाईन वरील विजपुरवठा बंद करण्यात आला होता पोलीस आणि अग्निशामक दलाला चकवा देत एका खांबावरून दुसऱ्या खांबावर उड्या मारणाऱ्या या तरुणाला अखेर विजेचा जोरदार धक्का लागला आणि तो खाली कोसळला. या थरारामुळे कल्याण स्थानकावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.पोलीस त्याला पकडण्यासाठी एका खांबावर चढले असता, त्याने हुलकावणी देत थेट दुसऱ्या खांबावर उडी मारली. यादरम्यान, साडेतीन वाजेच्या सुमारास खांबावरील सुरु असलेल्या विद्युत वाहिनीचा त्याला जोरदार शॉक लागला आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.​ अखेर दोन तासा नंतर रेल्वे लाईन पूर्व पदावर आली असून सर्व रेल्वे लाईन सुरु करण्यात आली या घटनेमुले दोन तास रेल्वे चा खोलबा झाला असल्यामुळे कल्याणच्या रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती सध्या या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अज्ञात इसमला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आला आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 22, 2026 11:20:54
Shirdi, Maharashtra:आमदार अमोल मिटकरी बाईट पॉइंटर.. बाईट ऑन मिटकरी ट्विट अशोक खरातच कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार... आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहीत झालं होतं.. मात्र मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही.. या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे.. सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी.. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली.. *अशोक खरात आणि अजित दादांचा अपघात याच्यात संबंध* गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय.. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे.. बाईट ऑन करंगळी TCR 4.00 संत परंपरा असलेल्या राज्यात कुणी करंगळ्या कापल्या.. माध्यमात आलेले फोटो खरे आहेत का ? या सगळ्याचा तपास निष्पन्न होईल.. कोणालाही सरकार पाठीशी घालणार नाही याचा मला विश्वास.. बाईट ऑन पाणी आरक्षण TCR 8.00 आता गाव सुद्धा बाबाच्या विरोधात गेले आहे.. राज्यात अनिसचा कायदा आहे.. एवढे प्रकार घडत असताना यांचे लक्ष असायला पाहिजे होत.. त्याला पाणी कसे दिले.. कोणाच्या काळात दिले. कोणकोणत्या मंत्र्यांनी सहकार्य केले..आता कोणकोण मंत्री आहेत.. महायुती असो किंवा महायुती जे कोणी आहेत ते सुटणार नाही बाईट ऑन अधिकारी संपर्क जर एखाद्या अधिकाऱ्याचे नाव आज समोर येत असेल तर धक्कादायक.. जर पाणी आरक्षित होत असेल तर तो साधासुधा बाबा नाही हे निश्चित.. निरक्षर लोकांना नाव ठेवण्यापेक्षा साक्षर लोक आहारी गेले हे वास्तव.. बाबाची प्रॉपर्टी दोन हजारापेक्षा जास्त.. हा पैसा आला कुठून.. अधिकाऱ्यांचे लागेबांधे काय होते हे आता समोर आलं पाहिजे.. समोर आलेले व्हिडिओ 57 नाही तर 500 च्या वर असे व्हिडिओ.. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बायका त्यात आहे का अजून कोणी हे बघाव लागेल.. बाईट ऑन अजित दादा निधन चुप्पी महायुती सरकारमध्ये शाहू फुले आंबेडकर हा विचार सांगणारा नेता.. अशा नेत्याबद्दल अर्थसंकल्प अधिवेशनात कोणी बोलायला तयार नाही.. कोणी पायऱ्यांवर बसून देखील मागणी केली नाही.. 296 या प्रस्तावाला देखील बगल दिली गेली.. अजितदादांनी ज्यांना मोठे केले ती मूग गिळून गप्प का ? आज हा विषय मागे देखील पडेल.. मात्र जनता उत्तर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.. अजित दादांना संपवण्याचे षडयंत्र समोर येईलच..
922
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 22, 2026 11:02:43
Khed, Maharashtra:*खेड / पुणे* - खेड तालुक्यातील पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत चार घरांना भीषण आग. - आदिवासी समाजातील सोपान केदारी यांच्यासह इतर तीन जणांच्या घरांना अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहे. - या आगीत दोन पडव्या चार घरे, गवताची वळई, ५ ते ६ शेळ्या, करड, तसेच गाईचे वासरू जळून मृत्युमुखी पडले आहे. - या घटनेत चार कुटुंटांच्या मोठे नुकसान झाले असून, वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धан्य, संसारोपयोगी वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत. - आदिवासी नागरिकांवर मोठे संकट ओढवले आहे. - दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, सरपंच भरत रौंधळ आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा टँकर मागवण्यात आला आहे. - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा जळीताच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
1022
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 22, 2026 10:53:34
1023
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 22, 2026 10:50:03
945
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 10:31:10
Bhandara, Maharashtra:ओबीसींच्या कार्यकर्ता म्हणून मी या मोर्चात सहभागी झालो. ओबीसीवर हे सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे. आज बेईमान सरकार आपण पाहतोय. बोलतो एक करतोय एक.... जुमले बाज म्हणतो अशी प्रवृत्ती या सरकारची आहे.... ओबीसींची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथं ओबीसींचा वेगळा कॉलमच नाही.... हे ओबीसींना न्याय देऊ शकत नाही.... अनेक प्रकारे ओबीसी वर अन्याय होत आहे.... आणि म्हणून सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रितपणे हा मोर्चा काढलाय... सरकारला या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेसाठी मागणी करत आहेत... ओबीसींच्या भरोशावर सत्ता मिळवून ओबीसींना विसरतात जराही लाज या सरकारला नाही हे खेदाने या ठिकाणी सांगतो.... खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे... खरात प्रकरणात काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. विरोधी पक्षांचे कोण कोण गेले त्यांच्या पुरावे मी देऊ शकतो असे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केला आहे... यावर भंडारा येथे विजय वडेट्टीवार यांनी या खरात प्रकरणात जे कोणी नेते असतील त्या सर्वांचे पुरावे दाखवा या भोंदू बाबाला कोण कोण बडी पडलेत सर्वांचे पुरावे द्यावेत. हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत असे वक्तव्य केले आहे. अशोक खरात प्रकरणांमध्ये तसे तर दोनशे व्हिडिओ आहेत.... 90 व्हिडिओ हे आक्षेपार्ह आहेत या प्रकरणामध्ये अनेक मंत्री आहेत आयएएस अधिकारी आहेत आणि आयपीएस अधिकाऱ्यात मोठमोठे पदावर असलेले अधिकारी आहेत या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे कारण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला जर अंधश्रद्धा पसरवणारे मंत्री असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही
1038
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 22, 2026 10:23:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत,एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचा आता उघडकीस आले आहे. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूस मध्ये धारदार Shस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या पार्किंग मध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली,त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी,मुलाने टोकदार शस्त्रांनी,परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
1005
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 22, 2026 10:00:59
1079
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 22, 2026 09:09:07
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहती मध्ये उद्योगांना गॅस टंचाई बाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विखे यांनी उद्योगांना प्राधान्य क्रमानुसार गॅसची उपलब्धता होणार असल्याचं म्हटलं आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी औद्योगिक वसाहत क्षेत्र अधिकारी बीपीसीएल चे अधिकारी आणि उद्यöszजकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्योजकांनी गॅसमुळे उद्योगावर होत असलेला परिणाम आणि कामगारांच्या स्थलांतरांचे प्रश्न उपस्थित केले यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचं विखे यांनी सांगितलं आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात गॅसची अडचण नाही सध्या घरगुती गॅस आणि औद्योगिक क्षेत्रात कॅन्टीन साठी लागणारा गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला जात आहे. आगामी काळात प्राधान्यक्रमानुसार गॅस उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.
1067
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 22, 2026 08:16:14
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर महायुतीतीलच चार मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई ,मंत्री मकरंद पाटील तर दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. नेमकं काय झालं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवडीवरून यावरचा हा रिपोर्ट... व्हिओ 1- सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. महायुतीतील भाजप ने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेनेने राष्ट्रवादी ला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली.65 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 27 तर राष्ट्रवादीला 20,शिवसेनेला 15 जागांवर विजय मिळाला पण 33 जागांची मॅजिक फिगर कोणालाच गाठता आली नाही.त्या नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्याचे सदस्य फुटू नये यासाठी त्यांना निकालानंतर बाहेर अज्ञात स्थळी पाठवून दिले.таб्बल 45 दिवस हे सदस्य गायब होते.मात्र भाजपने राष्ट्रवादी चे 2 तर शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात यश मिळवले.मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा निवडीच्या दिवशी राष्ट्रवादीचा अजून एक सदस्य फोडत 2 राष्ट्रवादीचा सदस्यांना अपहरणाचा गुन्ह्यात सातारा पोलिसांनी अटक केली त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.या नाट्यमयी घडामोडी नंतर भाजपला 33 मॅजिक फिगर गाठता आली आणि त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा भाजपने ताब्यात घेतले.यावेळी राष्ट्रवादीचा दोन सदस्यांना पोलिस अटक करतेवेळी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले.या अटकेवेळी भाजपाने पोलिस बलाचा वापर केल्याचा आणि पोलिस भाजपचा घरगड्यासारखे वागल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे . बाईट - मंत्री शंभूराज देसाई व्हिओ 2- दोन मंत्र्यांच्या अंगावर पोलिस येत असतील तर या सारखे महाराष्ट्राचे दुर्दैव नसल्याची टीका मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे. बाईट -मंत्री मकरंद पाटील व्हिओ - तर अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील कसे घेऊन येऊ शकतात असा सवाल उपस्थित करत यांनी 45 दिवस त्यांनी त्यांचा सदस्यांना डांबून ठेवल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.त्याच बरोबर मंत्री देसाई पोलिसांना वेटीला धरण्याचे काम करतात असा आरोप देखील गोरे यांनी केला आहे. बाईट - मंत्री जयकुमार गोरे व्हिओ 4- पोलीसांच्या कारवाईत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी आडवे पडणे योग्य नव्हते आम्ही त्यांच्यावर हल्ला आम्ही केलेला नाही बाईट - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व्हिओ 5- एकूणच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून साताऱ्यातील महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे भविष्यात हा वाद विकोपाला जाणार की senior_midस्थी नंतर थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
1057
comment0
Report
Advertisement
Back to top