Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 17:45:31
Yeola, Maharashtra:यवला में कांदा व मका भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या येवल्यात प्रहार शेतकरी संघटनेचे नेते बच्चू कडू नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी गळ्यात कांद्या मका यांच्या माळा घालून कांदा व मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.तत्पूर्वी बच्चू कडू यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत पुरवगाव ते येवला अशी ट्रॅक्टर रॅली काढली.त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा संपन्न झाल्यानंतर मोर्चाला सर्वात झाली.मोर्चा प्रांत कार्यालयावर येतात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत बच्चू कडू यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर कांदे फेकून मारले.यावेळी बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयात कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला.प्रांत कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.जवळपास साडे तीन तासांपेक्षा जास्त वेळ बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयात ठिय्या मांडला होता.यावेळी कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या आवारातच पंगती धरून अल्पोहार केला.कांदा व मका प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक घेण्याचे आश्वासन पणन मंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
1089
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 23, 2026 17:01:00
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर में पेट्रोल मिलने संबंधी अफवाओं के कारण कई पेट्रोल पंपों पर लोगों की भीड़ लग गई है। जिला प्रशासन द्वारा एक प्रसिद्धि पत्रक जारी कर जिले में पेट्रोल का पर्याप्त स्टॉक होने की बात कही गई है और अफवाओं पर भरोसा न करने की अपील की गई है। पेट्रोल पंप संचालकों ने Four दिन बंद रहने की अफवाहें Incorrect मानते हुए कह दिया है कि पेट्रोल आपूर्ति रुकी नहीं है, लेकिन शहरी पंपों पर कभी-कभी पेट्रोल स्टॉक खत्म होने जैसी स्थिति हो रही है। पेट्रोल कंपनियों की ADVANCED PAYMENT नीति के कारण और शनिवार-रविवार के बैंकों के बंद होने के कारण कई पंपजाक चार दिवसों के लिए पेट्रोल दे नहीं पाए। समाचार के अनुसार अफवाहों से शहर में स्थितियाँ तनावपूर्ण हो गई हैं।
1072
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 16:48:42
Yeola, Maharashtra:बच्चू कडू on जन आक्रोश तोडगा - पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पत्र पाठवले की आम्ही लगेज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून... जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्या संदर्भात एमडीएम शी बोलणे झाले... अशा प्रकारचे डीएमओला आदेश देऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या जाईल... दुसरी गोष्ट जे स्थानिक प्रश्न आहे... मका खरेदीच्या बाबतीत किंवा नाफेड चा कांदा खरेदीच्या बाबतीत असेल... इतर काही पाणीपुरवठ्याचे जलसंपदाचे प्रश्न... या सर्व संदर्भात जिल्हा लेव्हलचे अधिकाऱ्यांना घेऊन उद्या साडेतीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दलात बैठक होणार... पणन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आज आम्ही कांदा मारला ऑफिसला निषेध नोंदवलाय... उद्या आम्ही कांदा भरू बसायला जागाच ठेवणार नाही या अधिकाऱ्यांना... येथे झाले नाही तर पणन मंत्र्यांच्या घरला कांदा मारू...
986
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 23, 2026 15:05:56
Malegaon, Maharashtra:मनमाड-येवला महामार्गावर 100 हुन अधिक मृत डुकरांच्या पिलांचा ढीग. परिसरात भीतीचे वातावरण. आफ्रिकन स्वाइन फिव्हर किंवा इतर एखाद्या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे पिल्ले दगावली की मारून टाकण्यात आली? मनमाड-येवला (इंदूर-पुणे) महामार्गावर अंकाई किल्ला परिसराजवळ रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने मेलेल्या डुकरांच्या पिलांचा खच आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला डुकरांच्या लहान पिलांचा खच पडलेला दिसून आला. ही पिल्ले साधारणतः एकाच वयोगटातील असून त्यांची संख्या १०० हून अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डुकरांची पिल्ले दगावल्याने हा प्रकार आफ्रिकन स्वाइन फिव्हर किंवा इतर एखाद्या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे घडला असावा का? असा संशय व्यक्त केला जात आहे. हे मृतदेह उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे मानवी वस्तीत रोगराई पसरण्याची bhiती निर्माण झाली आहे. महामार्गावर अशा प्रकारे मृतदेह टाकले जातले असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना किंवा प्रशासनाला याची खबर कशी लागली नाही, असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात वाहनातून हे मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आले असावेत, असा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. हे मृतदेह कोठून आले? ही डुकरांची पिल्ले आजारामुळे मेली की त्यांना मारून येथे टाकण्यात आले? याचा तपास संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
1090
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 14:31:50
Ahilyanagar, Maharashtra:आहिल्यानगर महानगरपालिका की नवनीत महापौर ज्योति गाडे ने पालिका के स्कूल को अचानक दौरा कर विद्यार्थियों के लिए अध्यापन का कार्य किया है। महापौर बनने के बाद ज्योति गाडे ने पालिका के विभिन्न विभागों पर ध्यान देना शुरू किया है। सुबह दस बजे ही पालिका में उपस्थित रहने के बाद देर से आने वाले कर्मचारियों को चेतावनी दी गई और आज उन्होंने पालिका की स्कूल का अचानक दौरा किया। शिक्षकों से स्कूल की समस्याओं के बारे में जानकारी ली, और फिर वे कक्षा में घुस कर विद्यार्थियों को पढ़ाने लगे। आप शिक्षा शास्त्र में डिग्रीधारक हैं, लेकिन राजनीतिक सफर के कारण आपको पढ़ाने का अवसर नहीं मिला; पालिका की शालाओं को सुधारकर अधिक से अधिक विद्यार्थियों को पालिका की शालाओं में पढ़ाने के प्रयास किए जाएंगे, ऐसा ज्योती गाडे ने कहा।
1033
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 23, 2026 14:21:30
Wardha, Maharashtra:वर्धा स्वर्गीय माजी खासदार दत्ताजी मेघे यांना शासकीय सन्मानात अखेरचा निरोप - दत्ता मेघे यांच्याच शेतात अखेरचा निरोप अँकर- माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनानंतर आज भावना येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत भावनिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मान्यवरांनी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण केली. दरम्यान, पोलीस विभागाकडून दत्ताजी मेघे यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यांच्या इच्छेनुसार आणि विधीनुसार भावना येथील त्यांच्या स्वतःच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
1080
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 13:32:42
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानि दावा दाखल केला आहे.28 डिसेंबर 2025 रोजी वडेट्टीवार यांनी नकली नोटा प्रकरणावरून राजू पाटील राजे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.हे आरोप खोटे असल्याचे सांगत पाटील राजे यांनी 3 जानेवारी 2026 रोजी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून 15 दिवसांत माफी मागण्यास सांगितले होते.मात्र,माफी किंवा खुलासा न झाल्याने 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला.या प्रकरणात वडेट्टीवार यांच्यासह आणखी चार जण आणि एका वृत्तवाहिनीचा समावेश असून न्यायालयाने दावा स्वीकारून संबंधितांना नोटीस बजावली आहे.असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
965
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 12:05:51
Yeola, Maharashtra:दिवसेंदिवस कांदा व मका पिकाचे कोसळत असलेले भाव यामुळे बळीराजा आक्रोश करत असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिकच्या येवल्यात भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून येवला प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पुरणगाव येथून 50 ट्रॅक्टर एकत्र करून रॅलीला सुरुवात झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः या ट्रॅक्टर रॅलीत उपस्थित असून या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या ट्रॅक्टरला कांदा व मका पिकांनी सजवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे.
1094
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 23, 2026 11:53:21
Nanded, Maharashtra:दोन गावांन वाद झाल्याची घटना काही नवीन नाहीत. मात्र चक्क शाळा कोणत्या गावाच्या हद्दीत आहे या विषयावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ आमनेसामने आले. हा वाद थेट पोलीसांच्या दारातही पोहोचला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द या दोन्ही गावात शाळेची वर्गखोली पाडण्यावरून वादाची ठिणगी पडली. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्दच्या सीमेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेपैकी जुनी झालेली खोली क्रमांक एक पाडण्यास काल सुरुवात झाली. पण वर्गखोली आमच्या हद्दीत असल्याचे सांगत खोली पाडण्यास लोणी बुद्रुकच्या ग्रामस्थानी विरोध केला. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द दोन्ही गावातील ग्रामस्थ एकमेकांसमोर आल्याने परिस्थिती तणावग्रस्त बनली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परवानगी नसताना वर्गखोली पाडण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेने अर्धापूर पोलीसात दिली. खोली पाडण्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले. लोणी खुर्द शाळेत प्रयोगशाळा बांधण्यासाठी निधी आला. त्या ठिकाणी जुनी वर्गखोली पाडण्यात येत होती. तसे आदेश आमच्याकडे असल्याचे लोणी खुर्द च्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गाव नमुना 8 मध्ये खाडाखोड करून दोन वर्गखोल्या लोणी बुद्रुकच्या ताब्यात असल्याचे दाखवण्यात येत असल्याचा दावा लोणी खुर्दच्या ग्रामस्थानी केला. याबाबत त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. पण लोणी बुद्रुक च्या हद्दीतील वर्गखोली पाडल्याचा आरोप लोणी बुद्रुक च्या ग्रामस्थानी केलाय. पाडकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून लोणी बुद्रुकचा रस्ताही अडवल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र शाळेच्या विषयावरून दोन गावं एकमेकां विरोधात उभे टाकली आहेत.
1069
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 11:16:35
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेची आज झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली; मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कडाडून विरोध केल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी शहरातील वाढत्या डासांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी सभेत केली. मात्र विषय वेळेवर उपस्थित केल्याचे कारण देत हा मुद्दा पुढील सभेत घेण्याची विनंती करण्यात आली. यामुळे विरोधी नगरसेवक संतप्त झाले आणि काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांनी आरोग्य अधिकाऱ्याला प्रतीकात्मक स्वरूपात मच्छर अगरबत्ती आणि दूषित पाण्याची बाटली भेट दिली. या प्रकारामुळे सभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
1064
comment0
Report
Advertisement
Back to top