icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर के बोरामणी नाका चौक पर भयानक हादसा, 4 महीनों में 7 मौतें

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील बोरामणी नाका चौक बनला मौत का कुवा झालेल्या, 4 महिन्यात 7 जणांनी गमावला जीव. सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे टिपर चालकाची दुचाकीला धडक दिलीय. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सोलापुरातील बोरामणी नाका चौक बनला मौत का कुवा. नितीन भास्कर जगळघंटे असे अपघातात मृत्यू झालेल्या 33 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोलापुरातील बोरामणी नाका परिसरात वारंवार अपघात होतायत. मागील 4 महिन्यात या परिसरात 7 जणांनी आपला जीव गमावला आहे. नितीन जगळघंटे हा वाहनचालक म्हणून काम करतो, काल आपले काम संपवून तो मालकाच्या दुचाकीवरून घरी निघाला होता. बोरमणी नाका परिसरात आल्यानंतर एका टिपर वाहनाने नितीन याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. टिपरचे चाक नितीन याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून तपास करत गाडी मालकाशी संपर्क केला तेव्हा मृत व्यक्ती हा नितीन जगळघंटे असल्याचे समोर आले.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र दिवस: अकोला में भव्य परेड, शहीदों को श्रद्धांजलि

Akola, Maharashtra:आपल्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाराष्ट्र दिवस , हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे, हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात.अकोल्यात हा हा उत्सव मोठ्या थाटात पार पडलं..शहरातील शास्त्री स्टेडियमवर पोलिसद्वारे परेड संचालन करण्यात आले, यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते..या वेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेले 106 हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आकाश फुंडकर यांनी उपस्थित त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर त्यांनी विविध विभागांनी काढलेल्या परेड संचालनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. तसेच स्वातंत्र संग्राम सैनिक , पत्रकार व उपस्थित नागरीकांच्या भेटी घेतल्या. परेड संचालनामध्ये पोलीस विभागाचे 4 पथक , पोलीस विभागाचे महिला पथक, गृहरक्षक दलाचे महिला पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान वाहन, बिनतारी संदेश वाहन, महानगरपालीकेचे अग्नीशामक दलाचे वाहन यांचा समावेश होता.
0
0
Report
Advertisement

खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला; झंडा वंदन नाही, कारवाई की मांग

Bhandara, Maharashtra:खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला. ग्रामपंचायतीने झंडा वंदन केलाच नाही. सचिव सरपंच यांच्यावर होणार कारवाई - गृह राज्यमंत्री योगेश कदम. आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. पण भंडारा जिल्ह्यातील खोकरला ग्रामपंचायतीला विसर पडला आहे. प्रत्येक प्रशासकीय इमारतीवर ध्वजारोहण करणे अनिवार्य आहे. पण खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला. ग्रामपंचायतीला कुलूप लागला असून झंडा वंदन देखील करण्यात आला नाही. त्यामुळे अशा ग्रामसेवक व सरपंचावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे. यावर बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन सरपंच व सचिव यांना तत्काळ निलंबित करण्यात येणार असल्याचं सांगितले.
0
0
Report

राज्यसभा उम्मीदवारों की घोषणा से महाराष्ट्र की राजनीति गरमाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: - छत्रपती संभाजीनगर - मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑने शहरात आज नव्या कंपनीकडून कचरा संकलन. - हा महिना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आज महानगरपालिकेद्वारे खचरा संकलनासाठी जवळपास 400 गाड्यांचा लोकार्पण सोहळा आहे. - कचरा मुक्त हे शहर असल पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. - या महिन्यात आम्ही महत्त्वाचा पाण्याचा टप्पा पार करतोय, 15 तारखेपर्यंत पाण्याची परिस्थिती नॉर्मल होईल पाणी पोहोचळे असं एकत्रित वातावरण आहे. - 1 मेपर्यंत पाणी पोहोचणार होतं पण पोहोचलं नाही, त्यात टेक्निकल अडचणी आल्या आहेत. - आमच्या सगळ्यांचा प्रयत्न तर प्रामाणिक आहे यामध्ये स्वतः हायकोर्ट सुद्धा मॉनिटरिंग करत आहे. - टेक्निकल अडचणीमुळे दिले होतो त्याला काही नाही, ते आमच्या हातात नाही एखाद्या वेळेस एखादा पाईप फुटतो ते जाणीवपूर्वक नसतं. - 15 मे ला पाणी टाक्यांमध्ये चढेल ऑन मैत्रीपूर्ण वातावरणात विधानपरिषद, दानवे यांना बळ. - उद्धव ठाकरे साहेब ही निवडणूक लढवतील अशी सर्वांची अपेक्षा होती, काँग्रेसने त्याच पद्धतीने उबाटाला पाठिंबा दिला होता. - परंतु उद्धव साहेबांच्या मनामध्ये ऐनवेळेला कुठे घातपात झाला तर काय? अशी मनात शंका असावी म्हणून त्यांनी माघार घेतली असावी. - काल निवडणुकीत अचानक अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केलं आणि जी काही धावपळ झाली, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्या फोना फोनी मध्ये आहेत. - एका दगडात दोन पक्षी मारणं हा जो प्रकार आहे तो उबाटाने केला आहे. - येणारी राज्यसभा काँग्रेसला देणार हे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं याचा अर्थ संजय राऊत चा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित झालंय. ऑन सत्ताधाऱ्यांकडून दानवेंना बळ - बळ देण्याचं असं काही नाही, जनरली विधानपरिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा सगळ्यांचा मानस असतो. - आता तुम्ही गेल्या अनेक निवडणुका पाहिल्यात आता कुठे घोडेबाजार होताना दिसत नाही, नसता पूर्वी आमदार पळून घेऊन जाणे हा प्रकार सुद्धा महाराष्ट्राने पाहिला आहे. - गेल्या दहा पंधरा वर्षात हे सगळे प्रकार बंद झाले आहेत. ऑन बच्चू कडू यांच्यावर काय दबाव टाकला असा प्रश्न पुढे येत आहे. - बच्चू कडू पहिला आमचा तालुका प्रमुख होता, शिवसेना त्याचे मूळ आहे. - आता जर ते स्वगृही आले असतील, त्याच्या आक्रमकतेचा, दिव्यांग शेतकऱ्यांसाठी तो नेहमी लढत राहिला आहे. - असे लढवय नेते शिवसेनेत असले पाहिजे आमच्या एका फोनमध्ये आम्हाला एक सहकारी मिळाला. - कोणताही दबाव नाही कोणीही दबावमध्ये राजकारण करू शकत नाही बच्चू कडू यांनी दोन दिवसापूर्वीच गोड सिग्नल दिला होता. - त्यांनी सांगितले की दरवेळेला मला कडू म्हणतात गोड बोलण्याचा टाईम आता आला आहे. ऑन आक्रमक संघटना गुंडाळण्यात आली - संघटना गुंडाळण्यात आली नाही, ती संघटना ज्या पद्धतीने काम करायची तेच करणार आहे. - शिवसेनेचा भगवा त्यांनी घेतला आहे. ऑन बच्चू कडूला सत्ते शिवाय करमत नाही - प्रवीण तायडे - असं टीका केल्याने होत नाही, बाकी तुम्ही लोकांनी काय केलं ते तपासा, विनाकारण एखाद्यावर आरोप लावायचा त्यांनी पक्ष बदलला म्हणजे त्याला करमत नाही. - तुम्ही काही केलं तर चालतं असं दुप्पटी धोरण चालत नाही. ऑन महाराष्ट्रातल्या राजकारणांनी वाटोळ केले राज ठाकरे - वाटोळ करण्यात कोण कोण होतं याचे नाव सुद्धा त्यांनी जाहीर केले पाहिजे, परंतु एक लक्षात घ्या सामान्यज्ञाने प्रश्न सुटतो प्रश्न चिडवायचा असेल तर त्याला आपण अनेक कारणे देऊ शकतो. - चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व काही कोसळणार नाही परंतु आपण त्यांना एक धडा तरी घ्यावा लागेल जर मराठी माणूस जर उभा राहिला किंवा चिडला तर काही खरं नाही. - म्हणून मराठी बोलीभाषा ही आपल्याला अवलंबावी लागेल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. - महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे हा स्वाभिमान आम्ही पायदळी तुटू देणार नाही. ऑन गॅस फक्त जैन लोकांना एवढी हिंमत कशी- राज ठाकरे - मंगल प्रभात लोढासारख्या सीनियर असणाऱ्या मंत्र्यांनी असं बोलणं मला वाटतं थोडसं चुकलं परंतु त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी समज दिली असावी. ऑन पवार कुटुंब यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही - सुप्रिया सुळे - आता चार वर्षे इलेक्शन नाहीत, इलेक्शन आल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट तेव्हा त्याला महत्त्व असेल, परंतु आता त्याची मूर्तमेढ रवण्याचं काही कारण नाही
0
0
Report
Advertisement

सांगली में महाराष्ट्र दिवस धूम-धाम से मनाया गया; मंत्री ने ध्वजारोहण किया

Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये 67 वा महाराष्ट्रातील मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला, जिल्हाधिकारीांसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलिसातील उल्लेखनीय कामगिरी व जाणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत, माणसाचा विकास करण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचं, मत व्यक्त केले आहे.
0
0
Report

अमरावती के मोझरी में तेज कार दुर्घटना, यातायात सुचारू

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील मोझरी परिसरात कारचा विचित्र अपघात; भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन चढली कार. नागपूरकडून अमरावतीकडे येणारी भरधाव कार अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन चढली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले केले असून या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सध्या कार रस्त्याच्या बाजूला काढली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

करंदी बैलगाडा दौड़ में 41 वर्षीय युवक की मौत

Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे करंदी येथे बैलगाडा शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या प्रकाश महादू फटांगडे या ४१ वर्षीय तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला. करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या नावाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अनियंत्रित झाला. धावलेला बैल पकडण्यासाठी प्रकाश फटांगडे पुढे सरसावले. त्यावेळी बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन ते जमिनीवर कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचा भाऊ गोरक्ष महादू फटांगडे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top