445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर में गणेशोत्सव पर लेजर लाइट और भारी ध्वनि उपकरण पर पूर्ण रोक
Chandrapur, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट आणि तीव्र ध्वनिक्षेपकांवर पूर्णपणे प्रतिबंध लावलाय तर डीजे बाबत देखील कडक नियम व अटी-शर्ती लागू केल्या आहेत. हा नियम आज मध्यरात्रीपासून लागू होणार असून 27 सप्टेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत हा नियम लागू असेल. आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशात्सव आणि गणेश विसर्जन असे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. यात नियमांचे उल्लंघन होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व कायदा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशातील ठळक वैशिष्ट्ये... # लेझर लाईटवर पूर्ण बंदी, मिरवणुकीदरम्यान तीव्र आणि अति तीव्रतेचे फ्लॅश लाईट व मानवी डोळयांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पुर्णतः बंदी # प्लाझ्मा सिस्टीम, मॉडीफाइड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर यासारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहील. # पोलिस अधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करू शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील # कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाउडस्पिकर, एम्प्लीफायर वापर करता येणार नाही. # रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यासारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. # नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियमन, 1951 चे कलम 70 अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा उपकरणे जप्त केली जातील. सोबतच न्यायालयात खटला दाखल केला जाईल. बाईट १) आयुष नोपानी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर0
0
Report
Sangamner में विज मीटर जाँच के दौरान महावितरण कर्मी पर हमला, तीन आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे विज मीटर तपासणीचे शासकीय काम सुरू असताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाणी झाल्याची घटना घडली आहे.. मारहाणीचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला असून, मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. धांदरफळ बुद्रुक येथील प्रदीप इंजिनिअर वर्क्स या दुकानात मीटर तपासणीचे काम सुरू असताना, महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली..0
0
Report
धनुष्यबाण चिन्ह चोरी मामला: उद्धव ठाकरे तात्काळ निर्णयाची मागणी
Nagpur, Maharashtra:नागपूर - (शिवसेना)उद्धव *बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे खासदार संजय राऊत*--- .नागपूर - (शिवसेना)उद्धव *बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे खासदार संजय राऊत*--- मुळात धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. त्याचा शिंदे-मिंडे किंवा अमित शहा यांच्याशी काहीही संबंध नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे परंपरागत चिन्ह धनुष्यबाण आहे. या लोकांनी कारस्थान करून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे चिन्ह चोरले आणि या चोरीचे नेतृत्व अमित शहा यांनी केले. कोणत्याही प्रकरणात चोरीची तक्रार केली जाते, तेव्हा पोलीस मुद्देमाल जप्त करतात. त्यामुळे या प्रकरणातही सर्वप्रथम मुद्देमाल जप्त केला पाहिजे. चोरीचा मुद्देमाल चोरांच्या हातात देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. शिंदे यांचे वकील केवळ वेळकाढूपणा करत आहेत. आम्ही आमच्या सुनावणीच्या वेळी दुपारी चार-पाच वाजेपर्यंत कोर्टात उपस्थित राहतो. उद्धव ठाकरे म्हणतात ते शंभर टक्के सत्य आहे. धनुष्यबाणाच्या निकालावर तात्काळ निर्णय झाला पाहिजे. कारण चोरलेल्या या धनुष्यबाणाच्या चिन्हावर या लोकांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवल्या आणि त्याचा त्यांना फायदा झाला. रक्ताचे पाणी करून उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घराघरात धनुष्यबाण पोहोचवला आहे. पण हे चोर हे चिन्ह घेऊन पळाले. दररोज सुनावणी घेऊन शिंदे यांच्या वकिलांनी हा विषय संपवला पाहिजे. त्यांची भूमिका जर सत्याची असेल, तर त्यांनी दररोज सुनावणी घेऊन हा प्रश्न आणि हा निकाल तातडीने निकाली लागावा, यासाठी सहकार्य केले पाहिजे. मात्र, त्यांची बाजू सत्याची नाही, हेच त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. अमृता फडणवीस यांच्या प्रतिक्रियेबाबत अमृता फडणवीस यांच्या मुस्लीम महिलांना गरब्यात येऊ द्यावे या भूमिकेचे मी स्वागत करतो. त्यांनी आपली भूमिका त्यांचे यजमान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावी. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील जे नवहिंदुत्ववादी टोळभैरव आहेत, त्यांनाही याची माहिती दिली पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा स्वातंत्र्याचा लढा असो, या सर्व लढ्यांमध्ये मुस्लिम समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. शाहीर अमर शेख यांच्यापासून असे अनेक लोक होऊन गेले, ज्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्मय पत्करले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे जे लाडके नवहिंदुत्ववादी आहेत, त्यांचे काउन्सेलिंग अमृता फडणवीस यांनी केले पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेही काउन्सेलिंग केले पाहिजे. नवरात्रीतील दांडिया हा लोकउत्सव आहे. हा लोकसहभागाचा उत्सव आहे. राहूल नाऱ्वेखर पक्षांतर बंद कायदा वक्तव्य— राहुल नार्वेकर यांनी पक्षांतरबंदी कायद्यावर बोलणे म्हणजे या कायद्याचा अपमान करण्यासारखे आहे. पक्षांतरबंदी कायद्याबाबत अशी भाषा नार्वेकरांच्या तोंडी शोभत नाही. अमृता फडणवीस यांच्या प्रतिक्रियेबाबत हिंदी जर देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन मशिदीत जातात, तिथल्या इस्लामिक देशांच्या प्रमुखांची गळाभेट घेतात आणि त्यांना “माय ब्रदर” म्हणजे “माझा भाऊ” असे म्हणतात, तसेच तिथल्या युवराजांची भेट घेऊन त्यांची गळाभेट घेतात, तर भारतातील मुस्लिमही त्यांचेच भाऊ आहेत. त्यामुळे परदेशातील मुस्लिम “ब्रदर” आणि भारतातील मुस्लिम “दुश्मन”, असे कसे चालणार? हा खरा प्रश्न आहे. मलिकार्जुन खरगे प्रकरण कथित उत्तराखंड येथील शुद्धीकरण करण्याच्या प्रकरणात जनतेच्या दबावामुळे सामाजिक विघटन करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. रोहित पवार यांचे वक्तव्य राष्ट्रवादी एकत्रीकरण- रोहित पवार योग्य बोलतात. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहे. भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका ही राज्याच्या आणि देशाच्या हिताची नाही. अजित पवार यांनी जी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली होती. ती त्यांच्या मजबुरीतून घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचाच पक्ष आहे, जसा शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे. विलीनीकरणाच्या गोष्टी आपण जेव्हा करतो, तेव्हा विलीनीकरण हे कधीही एकतर्फी होत नाही. शरद पवार साहेब कधीही भाजपसोबत जाणार नाहीत, असा माझा ठाम विश्वास आहे. प्यारे खान यांनी अबू सालेम याची कारागृहात भेट घेतली- प्यारे खान यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक कोणी केली? या सरकारनेच केली ना? फडणवीस यांच्या सरकारनेच केली ना? त्यामुळे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण किंवा त्यांच्या पक्षात काम करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववादीांना विचारला पाहिजे. तुम्ही नवरात्रीमध्ये मुसलमानांना येऊ देणार की नाही, असे प्रश्न उपस्थित करता. मग तुम्हीच नेमलेल्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याची तुरुंगात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग सुकर करू, असे वक्तव्य करतो. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला जाऊन भेटणे आणि त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा करण्याबाबत वक्तव्य करणे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. जरांगे भेटी बंद त्यांना मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे. मनोज जरांगे यांचा संघर्ष आणि त्यांची लढाई आता त्यांच्या गळ्याचा फास बनली आहे. त्यांचा उपयोग आता संपला आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा निवडणुक’ीتا राजकीय वापर करून घेतला. आज त्यांची प्रकृती खालावली असल्याचे ऐकले. ही अत्यंत अमानुष बाब आहे. सरकारच्या प्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा करावी, अशी आमची भूमिका आहे. ओबीसी किंवा मराठा समाजाचा विषय असेल, तर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून त्यावर चर्चा करावी आणि या प्रश्नावर मार्ग काढावा. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुरस्काराबाबत बापरे! तेथील लॉर्ड हा सर्वोच्च पुरस्कार आहे. बहुतेक त्यांना तो लॉर्ड पुरस्कार दिला जाईल आणि आपली भवानी तलवार घेऊन येताना ते ती सोबत घेऊनच येतील. त्यांनी भवानी तलवार घेऊन यावे, असे माझे आव्हान आहे. तुम्हीही विनोद करत आहात आणि लंडनमधील लोकही विनोद करत आहेत. महाराष्ट्रात मूर्ख लोक बसले आहेत, हेच आता दिसून येत आहे. कर्नाटकातील ईडीच्या कारवाईबाबत ते काँग्रेसचे मंत्री आहेत. महाराष्ट्रात आणि राम मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळा झाला तेव्हा ईडी कुठे होती? काँग्रेसच्या आणि माझ्यासारख्या लोकांच्या घरापर्यंत ईडी पोहोचत असते.0
0
Report
Advertisement
वरोरा पुलिस स्टेशन में फसवणूक आरोपी ने आत्महत्या की कोशिश; तीन पुलिसकर्मी घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील एका आरोपीने पोलीस कोठडी रिमांडदरम्यान स्वतःवर टोकदार लोखंडी टोच्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत आरोपीसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरोरा पोलीस ठाण्यात विनोद शामराव सोयाम (वय ४०) विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याला ९ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संध्याकाळच्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या परिसरात गणेश मंडळांची बैठक सुरू असल्याने तपास अधिकारी मनीष तालेवार यांनी आरोपीला तपास पथकाच्या खोलीत जाण्याचे आदेश दिले. तेथे आरोपीकडे चौकशी सुरू असताना आरोपीने, “तुम्ही काय पोलीस आहे, मी फसवणूक केलेली रक्कम शोधून काढा व रिकव्हर करून दाखवा,” असे आव्हानात्मक शब्द उच्चारले व यानंतर आरोपीने अचानक टेबलावर ठेवला लाकडी मुठीचा लोखंडी सळाखीचा टोकदार टोका हातात घेत स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीच्या पोटावर व मानेवर खरचटल्याच्या जखमा झाल्या. तसेच पोउपनि मनीष तालेवार यांच्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळ, पोहवा संदीप मुळे यांच्या उजव्या हाताच्या पंजावर आणि कर्मचारी विशाल राजुरकर यांच्या डाव्या हाताच्या पंजावर खरचटल्याच्या जखमा झाल्या आहेत.0
0
Report
मूर्तिजापूर में महिलाओं ने रेलवे गेट 51 खोलने की मांग पर आमदार के घर के सामने धरना दिया
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातून नागरिकांच्या दैनंदिन समस्येवरून संतप्त झालेल्या महिलांच्या आंदोलनाची बातमी समोर आली आहे. संत रविदास नगर, मराठा नगर और ग्रामसेवक कॉलनीतील महिलांनी बंद करण्यात आलेला रेल्वे गेट क्रमांक ५१ चा रस्ता पुन्हा सुरू करावा, अथवा पर्यायी सोयीचा रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.नेमकी काय आहे नागरिकांची मागणी और का संतप्त झाल्या महिल्या... पाहूया हा रिपोर्ट. मूर्तिजापूर शहरातील संत रविदास नगर, मराठा नगर और ग्रामसेवक कॉलनी परिसरातील महिलांचा हा आक्रोश आहे..आणि कारण आहे, शहरात ये-जा करण्यासाठीचा बंद करण्यात आलेला रस्ता.या परिसरातील नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील रेल्वे गेट क्रमांक ५१ हा शहरात ये-जा करण्यासाठीचा प्रमुख आणि सोयीचा मार्ग होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा मार्ग बंद केल्यानंतर नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीसाठी शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना या रस्ता बंदचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केलाय.रेल्वे प्रशासनाकडून पर्याय म्हणून उड्डाणपुलाचा मार्ग दाखवला जात असला, तरी या मार्गाने तब्बल चार ते पाच किलोमीटरचा अतिरिक्त फेरा पडतो. त्यामुळे दैनंदिन प्रवासासोबतच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात ने-आण करतानाही मोठी अडचण निर्माण होत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिक.. याच मागणीसाठी संत रविदास नगर, मराठा नगर और ग्रामसेवक कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि त्यांनी थेट आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला.यावेळी संतप्त महिलांनी आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करत, “बंद केलेला रस्ता तातडीने सुरू करा, अन्यथा नागरिकांना सोयीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या,” अशी मागणी केली. दरम्यान, नागरिकांची गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने बंद केलेला मार्ग पुन्हा सुरू करावा किंवा तत्काळ पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे. आता या आंदोलनाची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.0
0
Report
रांजणगांव महागणपती मंदिर परिसर में गणेशोत्सव से पहले विकास कार्य युद्धस्तर पर
Shirur, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अष्टविनायक तीर्थक्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिर परिसरात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, मंदिर परिसरातील विकास आराखड्याच्या कामांना प्रचंड वेग आला आहे. विकास आराखड्याची व्याप्ती खूप मोठी असल्याने उत्सवापूर्वी सर्वच कामे पूर्ण करणे शक्य नसले, तरी भाविकांच्या सोयीसाठी जी कामे तातडीने पूर्ण करता येतील, ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा ठाम मानस देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने हाती घेतला आहे. लाडक्या महागणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी गणेशोत्सवात लाखो भाविक रांजणगावात दाखल होतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी होणार हे स्पष्ट असल्यानं, येणाऱ्या भक्तांना सुरक्षित आणि विनाअडथळा दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासन पूर्ण ताकदीने कामाला लागलं आहे. मंदिर परिसरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या कमानी, दर्शन रांगेसाठीचे मजबूत शेड्स आणि सुशोभीकरणाचं काम रात्रंदिवस वेगाने सुरू आहे. हा संपूर्ण विकास आराखडा अतिशय भव्य असल्याने सर्व कामे पूर्ण होण्यास अवधी लागेल; मात्र ऐन गणेशोत्सवात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गर्दी नियंत्रणाशी आणि प्राथमिक सुविधांशी संबंधित महत्त्वाची कामे उत्सवापूर्वीच आटोपण्यावर प्रशासनाचा भर आहे. या विकास आराखड्यामुळे भविष्यात महागणपती मंदिराचा परिसर अधिक सुसज्ज आणि देखणा होणार आहे. पण सध्या तरी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि तात्काळ कामांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण शासकीय व ट्रस्टची यंत्रणा मैदानात उतरली आहे.0
0
Report
Advertisement
ग्राम्य परंपरा की शान: खपाले परिवार का सोन्या बैल देशभर में चमका
Pandharpur, Maharashtra:बैलजोडी हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. बैल जोपासण्याचा छंद अनेकांसाठी केवळ आवड असली, तरी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील खपाले कुटुंबाने याच छंदातून प्रगतीचा मार्ग निर्माण केला आहे. खपाले कुटुंबाचा लाडका 'सोन्या' बैल आज परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. आकर्षक बांधा, देखणे रूप आणि उत्तम संगोपनाच्या जोरावर सोन्या बैलाने विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैलांच्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी घेत अनेक वेळा प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. सोन्या बैलाच्या संगोपनासाठी खपाले कुटुंबीय Special मेहनत घेत असून त्याच्या आहारापासून आरोग्यापर्यंत आणि देखभालीपासून प्रशिक्षणापर्यंत सर्व बाबींवर बारकाईने लक्ष दिले जाते. त्यामुळेच आज सोन्या बैलाने केवळ खपाले कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले नसून, बैल जोपासण्याच्या छंदालाही एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक पशुपालन आणि बैलांविषयीची आवड जपताना त्यातून आर्थिक आणि सामाजिक प्रगती कशी साधता येऊ शकते. याच बैलांच्या मुळे त्यांनी एक टोलेजंग घर बांधायला काढले असून, त्यांच्या मुलांची शिक्षणे ही यामुळेच पूर्ण झाली आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोपळे येथील खपाले कुटुंब आणि त्यांचा लाडका सोन्या बैल ठरत आहे.0
0
Report
पैनगंगा नदी का जलस्तर घटा, मानसून में कमी से किसानों को सिंचाई संकट
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीची पाणीपातळी पावसाळ्यातच कमालीची खालावली आहे. टणका, ढिली आणि सोनगव्हण येथील बॅरेजमध्येही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने नदीची आवक घटली असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपातळी अशीच घटत राहिल्यास आगामी रब्बीहंगामा वरही परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने बॅरेज आणि जलसाठ्यांचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
कोल्हापुर दूध संघ के अधिकारियों को अवमानना नोटिस, 9 अक्टूबर पेशी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे तत्कालीन निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ आणि नारायण परजणे यांना न्यायालयाच्या अवमान प्रकरणी याचिका दाखल का करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये न्यायालयाने सुमोटो ही कारवाई केली. इतकेच नव्हे तर 9 ऑक्टोबरला अधिकाऱ्यांनी स्वतः कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दूध संस्था याचिकाकर्ते यांच्या वकिलाने सर्किट बेंच मध्ये युक्तिवाद करताना न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून संस्थांवर अन्याय केल्याचे कोर्टाला निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कोर्टाने तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक परजाने आणि मिसाळ यांना नोटीस बजावली.0
0
Report
Advertisement
रिसोड पुलिस ने कृषि सामग्री चोरी गैंग को गिरफ्तार किया; 4 लाख 45 हजार रुपये का माल बरामद
Washim, Maharashtra:रिसोड पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच दुचाकी, तीन मोटारपंप आणि चोरीचे साहित्य असा तब्बल ४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिबखेडा आणि मोठेगाव परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून कटर, हातोडी, टॉमी आणि वायर कटरही जप्त करण्यात आले आहेत. या चोरट्यांनी जिल्ह्यात कुठे कुठे चोरी केली आहे याचा अधिकचा तपास रिसोड पोलीस करीत आहेत.0
0
Report
14 अस्पतालों ने मुफ्त इलाज के नाम पर अधिक लिए पैसे; लौटे 1.9 लाख
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मोफत उपचारात रुग्णांची लुबाडणूक; समन्वय समितीच्या दणक्यानंतर जिल्ह्यातील १४ रुग्णालयांनी परत केले पावणेदोन लाख रुपये!.. अॅंकर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा असतानाही रुग्णांकडून जादा पैसे उकळणाऱ्या जिल्ह्यातील १४ रुग्णालयांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने मार्च ते ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या धडक भूमिकेमुळे संबंधित रुग्णालयांना सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये रुग्णांना परत करावे लागले आहेत.. उपचारात दिरंगाई,रुग्णांची अडवणूक किंवा अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय केली जाणार नाही,असा सज्जड दमही यावेळी जिल्हा प्रशासनाने दिला आहे..0
0
Report
कोल्हापुर–मुंबई उड़ान सेवा सप्ताह में 5 दिन चलती है; इंडिगो शनिवार-रविवार सहित सभी दिन चलती है
Kolhapur, Maharashtra:आता बातमी कोल्हापूरातील विमान प्रवाशांसाठी .. कोल्हापूर मुंबई, मुंबई कोल्हापूर विमान सेवा आता पाच दिवस सुरू राहणार आहे. स्टार एअरवेज कंपनीने आठवड्यातील पाचच दिवस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार आणि रविवार या दोन दिवशी ही सेवा उपलब्ध नसणार आहे. पण दुसरीकडे कोल्हापूर-नवी मुंबई, नवी मुंबई - कोल्हापूर ही इंडिगो विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.. त्यामुळे रविवार आणि मंगळवार या दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई पर्यंतच सेवा उपलब्ध असणार आहे.0
0
Report
Advertisement
दापोली में रानभाजी पाककृती प्रदर्शन, 40 से अधिक रानभाज्याओं के स्वाद प्रस्तुत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..दापोलीत 'रानमाया' रानभाजी प्रदर्शन; पारंपरिक भाज्यांच्या पाककृतींनी वेधले लक्ष.. रत्नागिरीतील दापोली येथे कृषी विभाग आणि रामराजे महाविद्यालयाच्या वतीने 'रानमाया' रानभाजी पाककृती प्रदर्शन भरवण्यात आले.नव्या पिढीला पारंपरिक रानभाज्यांची ओळख व पौष्टिक महत्त्व कळावे यासाठी आयोजित या प्रदर्शनात ४० हून अधिक रानभाज्या आणि त्यांपासून बनवलेली चवदार सूप्स व नवनवीन पदार्थ सादर करण्यात आले.फास्टफूडच्या काळात स्थानिक खाद्यसंस्कृती जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला..0
0
Report
गणेशोत्सव के मौके पर चाकरमान्यों के लिए पुल निरीक्षण, किरण सामंत ने किया दौरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आमदार किरण सामंत ॲक्शन मोडमध्ये; चिपळूणच्या बहादूरशेख नाका उड्डाणपुलाची केली पाहणी.. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या समावेत चिपळूण येथील बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.. सणासुदीच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे काम, सर्व्हिस रोडची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणा व संबंधित कंत्राटदारांना दिले.. चाकरमान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत..0
0
Report
उदयराजे भोसले ने भरतगाववाडी के नए रथ की कलाकारी पर प्रशंसा की
Satara, Maharashtra:सातारा : भरतगाववाडी येथील श्री गजानन भंडारा उत्सवासाठी तयार करण्यात येत असलेल्या नूतन मिरवणूक رथास खासदार उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत रथाच्या कलाकुसरीचे आणि कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक केले.भरतगाववाडीच्या ‘एक गाव, एक गणपती’ या २३५ वर्षांच्या परंपरेचे कौतुक करून उदयनराजेंनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे अभिनंदन केले. यावेळी रथाचे कारागीर सचिन भांडवलकर, नितीन भांडवलकर आणि आकाश सुतार यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.0
0
Report
Advertisement
