445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रामदास कदम के विवाद पर CID जांच की मांग, महाराष्ट्र राजनीति गरम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शिवसेना नेते रामदास कदम on रामदास कदम on संजय राऊत राऊत साहेब ज्याला कावीळ होते त्याला सर्व जग पिवळं दिसतं तुमचे नेते आदित्य ठाकरे राजकिय नेते आहेत, म्हणून हा विषय राजकिय प्रेरित आहे, यामध्ये राजकारण आम्ही आणलं नाही, न्यायालयाने ऑर्डर दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे 20 पानं होती की 50 पानं होती हे तुम्हाला माहिती, तुम्ही पत्रकार आहात, संपादक आहात, तो विषय तुमचा आहे आदित्य ठाकरे दोषी आहेत की नाही, का त्यांच्यावर fir दाखल करण्याच्या सुचना दिल्या याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी केलं पाहिजे त्या मुलीला न्याय देण्याचं काम सुरू आहे, अब्रूचे धिंडवडे नाहीत ती आमची मुलगी आहे, महाराष्ट्राची मुलगी आहे, त्यामुळे तिला न्याय देण्याचं काम झालं पाहिजे तिच्या अब्रूचे धिंडवडे नाहीत हे राजकीय पुढाऱ्यांच्या अब्रूचे धिंडवडे आहेत, त्यामुळे संजय राऊत यांची अडचण झालीय असं माझं ठाम मत आहे या प्रकरणाची CID कडून वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे बाळासाहेबनी काय केलं आणि त्यांची मागची पिढी काय करतेय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना ठाकरे कुटुंबीयांचं नाव खूप मोठं होतं dिल्लीतला प्रत्येक पुढारी मातोश्रीवर यायचा, आता वेगळं झालंय आता उद्धव ठाकरे यांना केजरीवालांना भेटायला जायला दिल्लीत जायला लागतं, राहुल गांधी दिल्लीत त्यांना भेटत नाहीत, त्यामुळे नाव आता मोठं आहे की छोटं झालं आहे याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी केलं पाहिजे शिवसेनाप्रमुखांचं नाव मोठं होतं, त्यांनी मोठं केलं होतं.. आता सर्व संपलंय 60 आमदार होते ते 20 झाले जनतेच्या न्यायालयात जाऊनही झालं काय हे गणित राऊत साहेबांना कळत नाही असं मला वाटतं.. की त्यांनी सोंग घेतलंय कुणाच्या ताटातलं काढून कोणाला द्यायचं नाही, ही भूमिका शासनाची आहे, एकनाथ शिंदे आणि आमची देखील तीच भूमिका आहे 16 पैकी 14 मागण्या मान्य झालेल्या आहेत, अजूनही त्यावर काम चालू आहे जरांगे पाटलांनी शासनावर थोडा विश्वास ठेवला पाहिजे मी म्हणेन तेच सर्व झालं पाहिजे असं होतं नाही त्यांनी थोडं समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे पण ओबीसिंवर अन्याय करून काहीही दिलं जाणार नाही काँगेस आकाश एवढं फाटलंय तर ठिगळ कसं लावणार तुम्ही लोकांना फसवलंत, काय शिल्लक राहणार तुमच्याकडे ऑपरेशन टायगर सर्व गोष्टी आधी बोलायच्या , मग ऑपरेशन कसलं तुम्ही विचाराल आणि आम्ही सर्व सांगू, असं होतं नाही आगे आगे देखो होता है क्या योग्य वेळेला सर्व होईल, तुम्ही चिंता करू नका.. तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील सुनिल तटकरे - शिवसेना वाद तटकरे हा स्वार्थी माणूस आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वांना वापरून घेतो आणि स्वतःचं हित संपलं की समोरच्याच मुळावर उठतो अंतुलेंना संपवायचं काम तटकरेनीच केलं हा कोणाचाही होऊ शकत नाही आपण जे पेरतो ते उगवतं पुढच्या निवडणुकीच्या वेळी लक्षात येईल याचं काय होईल ते दापोली- मंडणगड नगरपंचायत जसं खेड नगर पालिकेत झालं तसंच या दोन्ही ठिकाणी होईल लोकांचा विकासावर विश्वास आहे0
0
Report
पटवर्धन घराने में आरती को लेकर वारसदारिता का विवाद, भाग्यश्री बनाम अभ्यंकर
Sangli, Maharashtra:स्लग : अभिनेत्री भाग्यश्रीची आरती अन् पटवर्धन घराण्यात विघ्न! अँकर - गणरायाच्या आराध्य नगरीत यंदा गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच... सांगलीच्या पटवर्धन घराण्यात कौटुंबिक विघ्न निर्माण झाला आहे.! अभिनेत्री भाग्यश्री दासानी-पटवर्धन यांच्या आरतीवरून ही वादाची ठिणगी पडली आहे.. मात्र या वादातून पटवर्धन घराण्याच्या उत्तराधिकारीपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. नेमकं काय घडलं ? आणि या वादामागचं कारण काय? पाहूया,हा स्पेशल रिपोर्ट.. व्हीओ - सांगलीच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे.आणि या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे,पटवर्धन घराणं !शेकडो वर्षांची परंपरा,गणपती पंचायतन संस्थान आणि दरबार हॉलमधला गणेशोत्सव...मात्र यंदा याच ऐतिहासिक घराण्यात आता वादाची नवी किनार निर्माण झालीय. व्हीओ - पटवर्धन घराण्याचे वारसदार म्हणून सध्या विजयसिंह राजे पटवर्धन गादी चालवत आहेत. त्यांना तीन कन्या आहेत.अभिनेत्री भाग्यश्री, मधुवंती राजे आणि पूर्णिमा राजे. मात्र दीड वर्षांपूर्वी विजयसिंह राजेंनी आदित्य अभ्यंकर यांना दत्तक घेत,त्यांना पटवर्धन घराण्याचा आणि गणपती पंचायतन संस्थानचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं. आणि इथूनच सुरू झाली..वारसदाराच्या हक्काची नवी चर्चा! व्हीओ - यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेदरम्यान अभिनेत्री भाग्यश्रीने दरबार हॉल येथे गणेश आरती केली... आरतीनंतर गाभाऱ्यात प्रवेश केल्याने वादाची ठिणगी उडाली. गणपती पंचायत संस्थांचे मॅनेजर ज्ञानदीप अभ्यंकर यांनी भाग्यश्रीच्या आरतीला अक्षय घेतला आणि यामुळे भाग्यश्री आणि मॅनेजर अभ्यंकर यांच्यात खटके उडाले,यावेळी युवराज आदित्यराजे पटवर्धन उपस्थित असतानाही हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय.. [भाग्यश्री – मॅनेजर वादाचा व्हिडिओ] व्हीओ - या प्रकारानंतर विजयसिंह राजे पटवर्धन आणि राणी राजलक्ष्मी यांनी नाराजी व्यक्त केली.‘मुलगी आहे म्हणून सर्व काही चालणार नाही’,अशी भूमिका घेत विजयसिंह राजेंनी आदित्यराजे हेच पटवर्धन घराण्याचे वारसदार असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. बाईट – विजयसिंहराजे पटवर्धन - प्रमुख पटवर्धन घराणे -सांगली व्हीओ - मात्र भाग्यश्री यांची भूमिका वेगळी आहे...वडिलांची प्रकृती खालावत असल्याने पटवर्धन घराण्याची आणि गणपती पंचायतन संस्थानची परंपरा पुढे नेण्यासाठी आम्हा तिघी मुलींमधून कुणीतरी पुढे येणं गरजेचं होतं,असं भाग्यश्री यांनी स्पष्ट केलं. बाईट – भाग्यश्री दासानी-पटवर्धन - कन्या व्हीओ - दरम्यान,गणपती पंचायतन संस्थानच्या कारभारावरून यापूर्वीही मतभेद झाल्याचं सांगितलं जातं.भाग्यश्री आणि त्यांच्या पती हिमालय दासानी यांच्याकडे संस्थानच्या कारभाराची जबाबदारी होती... मात्र पुढे मतभेद झाले आणि त्यांनी कारभारातून माघार घेतली. बाईट – राणी राजलक्ष्मी पटवर्धन - व्हीओ - यानंतर राजे विजयसिंह पटवर्धन यांनी राणी राजे लक्ष्मी यांच्या माहेरच्या नात्यातील असणारया ज्ञानदीप अभ्यंकर यांची गणपती पंचायतन संस्थानच्या व्यवस्थापनात नियुक्ती झाली...आणि पुढे त्यांच्याच मुलगा आदित्यला दत्तक घेऊन उत्तराधिकारी जाहीर केलं. एन्ड व्हीओ - गेल्या काही वर्षांपासून सांगलीपासून दूर असलेल्या अभिनेत्री भाग्यश्री यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा सांगलीत एंट्री झाली...आणि त्याचवेळी आरतीवरून वादाची ठिणगी पडली! आरतीचा वाद की वारसदाराच्या हक्काची लढाई?गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात पटवर्धन घराण्यातील हा वाद आता चांगलाच रंगला आहे.0
0
Report
अळणगांव के 1 किमी मार्ग पर गड्ढे, नागरिकों ने तात्कालिक मरम्मत की मांग
Amravati, Maharashtra:रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? अळणगाव पुनर्वसनचा रस्ता धोकादायक; तीन ते चार वर्षांतच झाली रस्त्याची चाळण शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहनचालकांचा जीव धोक्यात अळणगाव पुनर्वसन गावाला जोडणाऱ्या अवघ्या एक किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तीन चार वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या या रस्त्यावर आज ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याच मार्गावरून शाळकरी विद्यार्थी ऑटोने प्रवास करतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे आणि बाभळीमुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून झाडी झुडपे साफ करावीत अशी मागणी अळणगाव पुनर्वसनच्या नागरिकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम के किसानों का आक्रोश मोर्चा: 45 दिन बारिश नहीं, फसल बर्बाद, राहत की मांग
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिके करपून गेली आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी साठी जिल्ह्यात कारंजा तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधवार जाऊन शेतकऱ्यांशी संवाद करीत शेतकऱ्याचा व्यथा जाणून घेतल्या आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा कारंजा शहरातील ज्ञायक पाटणी यांच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा बैलगाडी घेऊनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.हेक्टरी ५० हजार रुपये मदत,पीक विम्याची रक्कम, शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत आणि शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी,अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाकडे दुष्काळी मदतीची मागणी करण्यात अली.0
0
Report
रत्नागिरी के राज्यमंत्री योगेश कदम की माँगें पूरी, FIR के मुद्दे पर ताजा कदम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राज्यमंत्री योगेश कदम जरांगे यांच्या मागण्या आम्ही जवळपास पूर्ण केलेल्या आहेत शिंदे साहेब आणि फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असे निर्णय आजपर्यंत महाराष्ट्रात कधी कोणी घेतलेले नाहीत आम्ही राजकारण न करता देऊ करतोय मनोजजी जरांगे यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारणार नाही त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता आजही आम्ही सकारात्मक आहोत संजय राऊत- दिशा FIR पब्लिक होतं ते कोणीही कुठनही काढू शकतं FIR मध्ये त्यांचं नाव का घ्यावं लागलं हा प्रश्न विचारला पाहिजे संशय आहे म्हणून FIR आहे खेड शासकीय विश्रामगृह शासकीय विश्रामगृहांच्या कामांची क्वालिटी मेन्टेन्ट होत नाही ही वस्तुस्थिती आहे ठेकेदाराने 6 वर्ष लावली त्या कामाला त्यामुळे ते काम रुकडलं ol उर्वरीत कामासाठी ठेकेदार बदललेला आहे0
0
Report
वर्धा-रायपुर बाघ हल्ला मामला: वार्ता विफल, आंदोलनकारियों ने किया आक्रामक प्रदर्शन
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या रायपुरातील वाघ हल्ला प्रकरणात तिढा कायम. प्रशासन व आंदोलनकर्त्यातील वाटाघाटी फिस्कटल्यानं आंदोलनकर्ते झाले आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. अमर काळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी मांडलाय ठिय्या. गेल्या सहा दिवसापासून भगवान धुर्वे यांचा मृतदेह शवागारात. पालकमंत्री, जिल्हा प्रशासन, वनमंत्र्यांवर खासदार काळेची टीका. पालकमंत्र्याला पुष्पाचा डान्स घरात करता आला पण रायपूर गावाला भेट दिली नाही-खासदार काळे. आंदोलनस्थळावरून खासदार अमर काळे यांच्याशी बातचीत केलीय आमचे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी0
0
Report
Advertisement
PVC पाइप से बनी अनोखी गणेश मूर्ति सुरगाणा के बोर्घाव में आकर्षण का केंद्र
Nashik, Maharashtra:गणपती स्पेशल ... सुरगाणा ( नाशिक ) विशाल मोरे - पाईप, फिटिंग्जपासून साकारला अनोखा गणराय; - नाशिकच्या सुरगाण तालुक्यातील बोरगावात गणेशमूर्ती ठरतेय आकर्षण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सुरगाण तालुक्यातील बोरगाव येथे पीव्हीसी पाईप व विविध प्लंबिंग साहित्याचा वापर करून साकारण्यात आलेली अनोखी गणेशमूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. युवा उद्योजक विशाल पवार यांच्या संकल्पनेतून पारंपरिक साहित्याला फाटा देत उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून गणरायाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.0
0
Report
अँकर-नाशिक के मनमाड के अंकाई किल्ले पर ऋषि पंचमी पर महिलाओं की भारी भीड़
Yeola, Maharashtra:अँकर-नाशिकच्या मनमाड जवळील प्रसिद्ध अशा अंकाई किल्ल्यावर ऋषी पंचमी निमित्ताने महिलांची मोठी गर्दी झाली होती. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि रामायणात महत्व असलेल्या अंकाई किल्ल्यावर ऋषीपंचमीच्या दिवशी किल्ल्यावरील अगस्ती ऋषींच्या दर्शनाला महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनापूर्वी किल्ल्यावरील असलेल्या तलावातील कुंडा मध्ये स्नान करत ऋषीपंचमी साजरी केली जाते,0
0
Report
यवल्यात गणेश प्रतिमा के जरिए कांदा उत्पादक किसानों के लिए भाव बढ़ाने की मांग
Yeola, Maharashtra:गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले असून घरगुती गणपतीपुढे वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन आरास करण्याची परंपरा येवलेकरांनी जपली असून नाशिकच्या येवल्यातील INNERSUL येथील डॉ.तुषार भागवत व डॉ.शितल भागवत या दांपत्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या संदर्भात देखावा सादर करून बळीराजाच्या शेतीमालाला भाव मिळावा असे साकडे गणरायाला केले आहे या देखाव्यात कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार, कांदा चाळ, रेल्वे रोको आंदोलन असे चलचित्र या देखाव्यातून दाखवण्यात आले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के गोकुळ दूध उत्पादक संघ के चुनाव: महायुति के उमेदवारों ने नामांकन दाखिल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिला दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाली आहे. आज पासून नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळचे सर्वच दिग्गज नेते निवडणूक कार्यालयांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत. महायुतीच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांनी आज पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते मात्र भाजपचा एक ही प्रतिनिधी यावेळी पाहायला मिळाला नाही त्यामुळे गोकुळ बाबत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे असं सध्याच्या घडीला दिसत नाही.0
0
Report
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर सरकारी पद का दुरुपयोग, वीडियो वायरल; रोहित पवार ने बर्खास्तगी की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिमच्या रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शासकीय पद आणि कार्यालयाचा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप होत आहे. तहसील कार्यालयात ‘प्रोफेशनल सिनेमॅटिक रील’ शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून तहसीलदारां वर जोरदार टीका केली आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असताना तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याऐवजी रील बनवण्यात वेळ घालवला,असा आरोप पवार यांनी केला.या प्रकरणात केवळ निलंबन न करता संबंधित तहसीलदारांना बडतर्फ करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.0
0
Report
गोकुळ महायुति में नामांकन शुरू, दिग्गज संचालक उमेदवारी दाखल करने पहुंचे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळचे सर्वच दिग्गज संचालक निवडणूक कार्यालयांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत. त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. नावेद मुश्रीफ , गोकुळचे माजी चेअरमन; शशिकांत चुयेकर, संचालक गोकुळ; विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक गोकुळ0
0
Report
Advertisement
गणपतीपुळे में ऋषीपंचमी के पावन अवसर पर श्री के चरणों में फूलों की आरास
Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे: ऋषीपंचमी निमित्त श्रींच्या चरणी मनमोहक फुलांची आरास!.. भाद्रपद गणेशोत्सवातील ऋषीपंचमीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीच्या मंदिरात विविधरंगी आणि सुगंधी फुलांची विलोभनीय आरास साकारण्यात आली आहे. बाप्पाचे हे देखणे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.0
0
Report
खेड के बोरज में भक्ती-पर्यावरण का संगम; सनगरे परिवार ने वटवृक्ष प्रतिकृति साकार की
Ratnagiri, Maharashtra:कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना खेड तालुक्यातील बोरज येथील सनगरे परिवाराने घरगुती गणेशोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे. सनगरे परिवाराने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि पवित्र वटवृक्षाची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, यातून 'झाडे लावा, पर्यावरण वाचवा' हा संदेश देण्यात आला आहे..धार्मिक महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाचा सुंदर मिलाफ साधणारा हा देखावा पाहण्यासाठी सध्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे..0
0
Report
रत्नागिरी के स्टोन आर्टिस्ट अजय पारकर ने पर्यावरण-पूरक गणेश सजावट से बना नया रिकॉर्ड
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..दगडांवर फुलली चित्रकला! रत्नागिरीत स्टोन आर्टिस्ट अजय पारकर यांची अनोखी पर्यावरणपूरक गणेश सजावट.. या दगडी चित्रकलेमध्ये कशेळी पॉईंट,लोटेश्वर यांसारखी पर्यटन स्थळे तसेच ग्रामदैवत श्री भैरी देवासह विविध देवदेवतांच्या प्रतिमा जिवंत करण्यात आल्या आहेत.. याशिवाय चाफा, हापूस आंबा, काजू आणि मोदक यांसारखी हुबेहूब थ्री-डी (3D) स्टोन पेंटिंग्ज सध्या भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून ही कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे..0
0
Report
Advertisement
