445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
टीपू सुलतान प्रतिमा विवाद: उच्च न्यायालय में सुनवाई, दालन गणेश विसर्जन के बाद खुलेगा
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - मालेगावात टीपू सुलतान प्रतिमा वादाला न्यायालयीन वळण - उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांची उच्च न्यायालयात याचिका - प्रतिमा हटविण्याच्या महापालिका आणि पोलिसांच्या पत्रांना आव्हान - महाराष्ट्र सरकार, महापालिका आणि पोलिसांना 3 आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश.. - शान ए हिंद यांचे उपमहापौर दालन अद्याप बंदच ; गणेश विसर्जनानंतर दालन होणार खुले.. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या कार्यालयातील टीपू सुलतान यांच्या प्रतिमेवरून निर्माण झालेल्या वादाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी प्रतिमा हटविण्यासंदर्भातील महापालिका आणि पोलिसांच्या पत्रांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बुधवारी ( दि. 16 ) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, महापालिका आणि पोलिसांना तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत..या उत्तरानंतर याचिकाकर्ते शान ए हिंद यांना देखील आपले म्हणणे मांडता येणार आहे...दरम्यान, टिपू सुलतान यांच्या फोटोवरून निर्माण झालेल्या वादानंतर शान ए हिंद यांच्या उपमहापौर दालन अद्याप बंदच असून गणेश विसर्जनानंतर हे दालन खुले होणार असल्याचे शान ए हिंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..0
0
Report
महाराष्ट्र में आवारा कुत्तों का आतंक: पांच साल में 4.7 लाख घायल, मौत 134
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी महाराष्ट्रात भटक्या श्वानांची दहशत: पाच वर्षांत ४७ लाख नागरिकांना चावा; १३४ जणांचा मृत्यू.. अँकर राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत राज्यात तब्बल ४७ लाख ३७ हजार ७६३ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला असून, यामध्ये १३४ जणांचा मृत्यू झाला आहे.. धक्कादायक बाब म्हणजे,राजधानी मुंबईत सर्वाधिक ५ लाख २९ हजार ६५० श्वानदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे..0
0
Report
Kolhapur में शुद्ध धारोष्ण दूध परंपरा को दर्शाते अनोखे गणेश दृश्य
Kolhapur, Maharashtra:ANC :- भेसळयुक्त दुधाविरोधात राज्यभर कारवाई सुरू असताना, कोल्हापुरातील शुद्ध धारोष्ण दुधाची परंपरा अधोरेखित करणारा अनोखा गणेश देखावा साकारण्यात आला आहे. शनिवार पेठेतील गवळी समाज मित्र मंडळाने हा देखावा तयार केला आहे. संस्थान काळापासून कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये दूध कट्ट्यावर शुद्ध धारोष्ण दूध मिळत आहे. याच परंपरेचा संदेश देण्यासाठी गणरायाला गवळ्याच्या रूपात साकारण्यात आले असून, उंदीरमामाही दूध पितताना दाखवण्यात आला आहे. बालचमूंना दुधाचा प्याला हातात घेऊन गणरायासोबत फोटो काढण्याची संधीही या देखाव्यातून देण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
UPI शुल्कवाढी के विरोध में नागपूर में कांग्रेस का बड़ा प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:नागपूरात काँग्रेसने UPI शुल्कवाढीबाबत आंदोलन केले. सेंट्रल एवेन्यूवर गांधी पुतळ्यापाशी काँग्रेस व्यापारी आघाडीने UPI शुल्क वाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. UPI शुल्कवाडी मुळे व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे मोठे नुकसान असल्याचा आरोपही केला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.दरम्यान आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनी0
0
Report
राष्ट्रीय महामार्ग भू-संपादन मामला: पुराने जमीनधारकों के खाते में करोड़ों जमा?
Khopoli, Maharashtra:महामार्गाच्या भू-संपादनात मोबदल्याचा घोळ? खालापूर : हाळ-पळसदरी राष्ट्रीय महामार्गासाठी अंजरुण येथे झालेल्या भूसंपादनात 1 कोटी 29 लाख 80 हजार 117 रुपयांचा मोबदला जुन्या जमीनधारकांच्या खात्यावर जमा झाल्याचा आरोप शेतकरी अशोक गोपाळ पिंगळे यांनी केला आहे. आपण जमीन खरेदी करून ताब्यात घेतली होती, मात्र भूसंपादनाच्या नोंदीत जुन्या जमीनधारकांची नावे असल्याचा त्यांचा दावा आहे. खरेदीखत डावलून निर्णय घेतल्याचाही आरोप पिंगळे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रांत अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी शेतकऱ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, भूसंपादनाची प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचे स्पष्ट केले आहे.0
0
Report
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का कोल्हापुर दौरा: भूमिपूजन और किसान मेळावे की योजना
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा 19 आणि 20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन केले जाणार आहे. याच दरम्यान ते शेतकऱ्यांचे देखील संवाद साधणार आहेत. ज्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मेळावा होणार आहे त्या ठिकाणीचा आढावा घेऊन कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजप आमदार राहुल आवाडे याच्याशी बातचीत केलीय.0
0
Report
Advertisement
नाशिक में आईआईटी बॉम्बे के विशेषज्ञ मनपा लैब की जाँच, सड़क निर्माण परीक्षणों पर मार्गदर्शन
Nashik, Maharashtra:* आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून मनपाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी * डांबरी रस्त्यांच्या कामांपूर्वीच्या विविध तांत्रिक चाचण्यांचा घेतला आढावा * रस्ते विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा मनपाचा प्रयत्न * मिश्रणाची घनता तपासणाऱ्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन * वॉल्यूमेट्रिक एनालिसिस अंतर्गत मिश्रणातील घटक व पोकळ्यांचे प्रमाण तपासणी * मार्शल स्टॅबिलिटी चाचणीद्वारे रस्त्याच्या मिश्रणाची भार सहन क्षमता तपासणी * चाचण्यांची पद्धत, उपकरणांचा वापर आणि निष्कर्षांच्या मूल्यमापनावर सविस्तर मार्गदर्शन0
0
Report
वाशीम में 50-55 दिन बारिश से खरीफ फसल बर्बाद, सोयाबीन प्रभावित; सूखा घोषित कर मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पावसाने तब्बल ५० ते ५५ दिवसांचा दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम अक्षरशःकरपून गेला आहे. जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं सोयाबीन आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना अनेक शेतांमध्ये वाळून गेलंय. यंदा या पिकातून उत्पादनाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. डोळ्यांसमोर उभं पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आहेत. त्यामुळे सरकारने वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा आणि नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.0
0
Report
गडचिरोली पुलिस ने आत्मसमर्पित नक्सलियों के लिए बड़ा जनजागरण मेळावा आयोजित किया
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित नक्षल सदस्यांसाठी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन, गडचिरोली मुख्यालय आणि अहेरी येथील मेळाव्यात दिला योजनांचा लाभ अँकर: सन 2005 पासूनच्या आत्मसमर्पित नक्षल सदस्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्डसह पुनर्वसन निधी धनादेशाचे वितरण करण्यात आले. यासोबतच उपस्थित सदस्यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 819 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली व प्राणहिता या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच पूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल सदस्यांच्या प्रलंबित समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासोबतच, शासनाच्या विविध पुनर्वसन योजना व उपलब्ध सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 313 आत्मसमर्पिताना याचा लाभ देण्यात आला.0
0
Report
Advertisement
डिंबे माणिक डोह बोगद्याला मंजूर, विरोधात वळसे पाटील; किसानों के लिए पानी की लड़ाई
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग यांच्यात पाण्याच्या संघर्ष कायम पाहायला मिळत आला आहे कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी डिंबे माणिक डोह बोगदा प्रकल्पाला मंजुरी मिळाली है मात्र याच बोगद्यासाठी आता अहिल्यानगर जिल्ह्याला संघर्ष करावा लागत है प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आंबेगाव चे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला है जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रकल्पाला स्थगिती देण्याची विनंती केली है डिंबे माणिक डोह प्रकल्पातील महत्त्वपूर्ण असलेला हा बोगदा झाला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा कर्जत या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचं पाणी देणार आहे वळसे पाटलांकडून बोगद्याला विरोध झाला तर लाभ क्षेत्रातल्या सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र करून आंदोलन करणार असल्याचं श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी म्हटला आहे0
0
Report
ध्वनि नियम के अनुसार डीजे बजाने की अनुमति मांगते साउंड सिस्टम धारक आंदोलन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय के सामने साउंड लाईट, जनरेटर असोसिएशन की तरफ से शासन द्वारा निश्चित ध्वनि मर्यादा और समय के नियमों का पालन कर डीजे बजाने की अनुमति मांगी जा रही है. इसके लिए आंदोलन शुरू किया गया है. साउंड और ध्वनि यंत्रणा पर समस्त बंदी, अनावश्यक निर्बंध तुरंत हटाने के साथ-साथ सार्वजनिक रथ-यात्रा को छोड़कर विवाह समारोह, शुभकार्य पर पुलिस प्रशासन द्वारा अनुमति की अंधरक्षा शिथिलता की मांग की जा रही है. साउंड लाईट असोसिएशन के द्वारा किए गए आंदोलन में बड़ी संख्या में डीजे साउंड सिस्टम धारक शामिल हुए और प्रतिक्रिया दी है. हमारे प्रतिनिधि लैलेश बारगजे ने बातचीत की.0
0
Report
पत्नी ने स्कूल पहुंचकर शिक्षिका को दिखाया सबक; प्रेमकथा ने मचाया तूफान
Shirdi, Maharashtra:रात्रंदिवस नवऱ्याशी चालणारे व्हॉट्सप चॅटिंग, नियमित होणाऱ्या भेटीगाठी आणि कौटुंबिक शांतता भंग झाल्याच्या रागातून एका संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळा गाठून संबंधित प्राथमिक शिक्षिकेला चांगलाच धडा शिकवल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.. भरदिवसा आणि शाळा सुरू असतानाच हा हायव्होल्टेज ड्रामा घडल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे..0
0
Report
Advertisement
गडचिरोली पुलिस ने अवैध सगंधित तंबाखू तस्कर गिरफ्तार, 45 लाख के माल की जब्ती
Gadchiroli, Maharashtra:प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केली अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत एकूण 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त अँकर:-- गडचिरोली पोलीसांनी सुगंधित तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणा-या आरोपींवर मोठी कारवाई केली आहे. आरमोरी पोलिस ठाणे हद्दीतील मौजा कुरखेडा ते आरमोरी रस्त्यावर एक संशयीत सहाचाकी वाहन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू साठा वाहतूक करणार आहे, अशी गोपनीय माहिती होती. पोलीस पथकाने मौजा कुरखेडा ते आरमोरी रोडवर सापळा रचून पाळत ठेवली. यात एक आयशर सहाचाकी ट्रक संशयास्पदरीत्या येताना दिसून आला. पोलीस पथकाने वाहनास थांबविले.या वाहनाची पाहणी केली असता पोत्यात भरून असलेला एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमत असलेला तंबाखू आणि आयशर कंपनीचा मालवाहू सहाचाकी ट्रक असा एकूण 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यात शाहु धर्मेशकुमार इंदेरमन, वय 28 वर्षे, रा. जोशीलमती, गेंदाटोला, जि. राजनांदगाव, छत्तीसगड याला ताब्यात घेण्यात आले आहे. सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
उद्धव ठाकरे बनाम शिंदे संघर्ष में महाराष्ट्र की राजनैतिक बयानबाजी तेज
New Delhi, Delhi:उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात एक त्यानांना शेतकऱ्यांचा एवढी काळजी असेल तर त्यांनी आपल्याकडील एखादा टक्का बाहेर काढावा एकनाथ शिंदे यांनी काही चांगल केल तर त्यांना पोटदुखी होते लंडन मधे एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच कौतुक झाल म्हणून यांन पोटदुखी होते आणि हे बिलातून बाहेर येऊन टीका करत आहेत उद्धव ठाकरे यांना काही कळत नाही अस मी नाही तर शरद पवार यांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे उसण अवसान आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी करू नये dेशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाहिराती दिल्या तर यांची पोटदुखी का? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी फाफडा जिलेबी कार्यक्रम सुरू केला होता कार्यक्रम गुजराती होता म्हणून दोन ओळी गुजराततीत बोलले यांनी मराठी भाषेच प्रेम आम्हाला शिकवू नये राजकीय पक्ष मारण्याचा काहीही विषय नाही lokशाहीत बहुमताला आधार असतो dोन वेळा निवडणुकीत आम्ही सिद्ध केल आहे की शिवसेना आमची आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाजूला गेला आहे त्यांनी तत्व सोडली म्हणून पक्ष आमच्याकडे आला आहे nिवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला आहे त्यावर बोलणे योग्य नाही त्या त्या ठिकाणी गणपती मंडळ असतात तिथे देखावे असतात मला याची कल्पना नाही, देखाव्याची माहिती घेऊन यावर मी बोलतो0
0
Report
उपमुख्यमंत्री शिंदे गणेशोत्सव पर Daregaon पहुंचे, दगडुशेठ गणपति प्रतिमा और फूलों से सजावट
Satara, Maharashtra:सातारा ,दरे :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस सहकुटुंब दरेगावात आले आहेत. दरे गावातील निवासस्थानी दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीची प्रतिकृती पाहायला मिळत असून आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी गौराईचे आगमन झाले असल्यामुळे आकर्षक गौराईची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे याविषयीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
