445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मंचर में सचिन आहिर के समर्थकों के बीच महायुती की नई चुनौती
Manchar, Maharashtra:मंचर पुणे... सचिन आहिर उपसभापती विधान परिषद भीमाशंकर दर्शन व विकासकामे: - गेल्या अनेक वर्षांपासून मला भीमाशंकरची ओढ आहे. पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा घडावी हीच प्रार्थना केली. मंदिराच्या विकासकामांचा आढावा घेतला असून पुजाऱ्यांचे प्रश्न आणि भाविकांच्या सुविधांबाबत चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा बैठक घेऊन प्रशासकीय आढावा घेतला जाईल, जेणेकरून आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. मराठा आरक्षण व वक्तव्यांवर प्रतिक्रिया: - व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा त्यांनी मांडलाला विषय महत्त्वाचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर काम केले आहे. उदय सामंत आणि शंभूराज देसाई सातत्याने चर्चा करत आहेत. कोणावरही वैयक्तिक किंवा एकेरी टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सर्वांनीच संयम बाळगला पाहिजे. सहकार क्षेत्र आणि मुंबई जिल्हा बँक निवडणूक: - ठाणे जिल्हा बँकेप्रमाणेच सहकार क्षेत्रात (दूध संघ, बाजार समित्या, पतसंस्था) पक्षाचा विस्तार झाला पाहिजे. यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. मुंबई बँकेतही पक्षाचे संचालक किंवा पॅनेल उभे करता येईल का, याबत प्रारंभिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. पुणे जिल्हा दौरा आणि निधी वाटपातील नाराजी: - पुणे जिल्ह्याशी माझा जुना संबंध आहे. जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करताना निधी वाटपाबाबत तक्रारी समोर आल्या. सत्ताधारी असो वा विरोधक, विकासकामांसाठी सरसकट निधी मिळायला हवा. आगामी डी-लिमिटेशनमुळे मुंबई Pune्यात मतदारसंघांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे पक्षविस्तारासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. महायुतीतील स्थानिक समन्वय व दुरावा: - महायुती म्हणून काम करताना स्थानिक पातळीवर दुरावा नसावा. स्थानिक नेत्यांनी मोठे मन दाखवून समन्वयाचा हात पुढे केला, तर आम्हीही दोन पावले पुढे जाऊ. एकतर्फी संवाद होऊ शकत नाही. Byte: सचिन अहिर (उपसभापती ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...0
0
Report
नागपुर के संविधान चौक पर आदिवासी अधिकार बचाव आंदोलन जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात संविधान चौकात ट्रायबल रिपब्लिक आदिवासी अधिकार बचाव आंदोलन करण्यात येतेय आदिवासी विभागाने लक्ष्मण मानकर ट्रस्टसोबत 490 वस्तीगृह व्यवस्थापनबाबत केलेल्या सांमजस्य करार रद्द करावा आणि इतर मागण्या विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येय यावरून आदिवासी विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केले असून याबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत... 490 वसतिगृहांना खाजगी संस्थांकडे देण्याचा षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.0
0
Report
कोल्हापुर में ठाकरे शिवसेना ने मराठा मांगों के पालन की मांग की
Kolhapur, Maharashtra:मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरात ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलीय. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करत शहरातील दसरा चौकात ही घोषणाबाजी करण्यात आली. प्रत्येक वेळी सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसत असेल तर ते योग्य नाही अशी भूमिका ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.0
0
Report
Advertisement
विदर्भ में अगस्त में बारिश 58% नीचे, नागपुर सहित जिलों में भारी कमी
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात केवळ ऑगस्ट महिन्यातच पावसाची 58% तूट... ( 297.1 MM सरासरी पाऊस... 125.5 MM बरसलेला पाऊस ) तर यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिना मिळून एकूण 22 टक्के विदर्भात पावसाची तूट --- विदर्भात कमी पावसामुळे चिंता वाढल्या -- पुढील काही दिवसात पाऊस मात्र पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता कमीच *ऑगस्ट महिन्यात विदर्भात कमी झालेला पाऊस जिल्हानिहाय* ( किती टक्के ऑगस्ट महिन्यात कमी पावस झाला ते ) अकोला (-84%) अमरावती (-82%) यवतमाळ (-78%) वर्धा (-73%) वाशिम (-71%) नागपूर (-71%) बुलडाणा (-61%) चंद्रपूर (-55%) गडचिरोली (-32%) गोंदिया (-28%) दरम्यान विदर्भातील कमी पावसाबाबत माहिती जाणून घेतली आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे हवामान तज्ञ प्रवीण कुमार यांच्याकडून0
0
Report
ओबीसी आरक्षण-यूपीएससी घोटाळा: कांग्रेसचा आरोप और सुप्रीम कोर्टी निकालों पर चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते (on अभिजित दिपके.. विद्यार्थी गुन्हे मागे घेतले नाही...) -- ते आंदोलन विद्यार्थ्यांसाठीच होते.. ----------मोदींच्या काळात मोठा अन्याय OBCवर होतोय . 2016 ची UPSC परीक्षा झाली... 314 OBC विदयार्थी पास झाले.. मात्र क्रिमीलीअर सर्टिफीकेटवरून त्यांना वगळले --या मुलांना OBC मध्ये टाकून कमी मार्क घेणाऱ्या ओपन विद्यार्थांना घेण्यात आलं... हाय कोर्टचे चार निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने लागले...1000 ते 1100 विद्यार्थी असे अधिकसंख्या दाखवून पोस्टिंग द्या.... जॉइन करा -- मात्र हे सरकार OBC मुलांवर उठणार सरकार आहे...याबाबत सर्वोच्च न्यायलयात अपील केले... नरेंद्र मोदींनी या विद्यार्थ्यांचा गळा घोटायच काम केल -- ओबीसीचा मतदान घ्यायचे मात्र ओबीसीच्या मुलं आयपीएस होऊ नये असे काम करतात हे सरकार मनुवादी आहे... ओबीसीच्या धने ( उत्तराखंड, राहुल गांधी गुन्हा ) हे पागलपणाचे लक्षण आहे. असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आयोजकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.. शुद्धीकरण केले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ---भागवत अमेरिकेत जाऊन वेगळे बोलतात आणि देशात मात्र दलितांवर अन्याय होत असतात.... मनुवादी विचारधारा यांच्या डोक्यात आहे... यांचे दिवस भरले आहे... सत्तेची मस्ती आहे त्यामुळे असे पाऊल उचलतात... (on जात पडताळणी ऑनलाईन ) --- याच स्वागत आहे.. ऑनलाइन प्रक्रियेच मी स्वागत करतो.. (on सुळे ) --- संजय राऊत सर्वोच्च न्यायालयावरून जे बोलले ते पाहिलं.... सुप्रियाताई म्हणताय ते बरोबर आहे.. पक्षाला अशा पद्धतीने घेता येत नाही... राज्यात राष्ट्रवादीला जन्माला घालण्याचं काम शरद पवार यांनी केले. तोच पक्ष तुम्ही फूट पाडून ताब्यात घेण्याचं काम करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जो काही शिवसेनेच्या बाबतीत झाला तो निकाल आता पेंडिंग आहे.. शिवसेनेबाबत तसंच केलं. राष्ट्रवादी निकाल देण्याकरता सर्वोच्च न्यायाल थांबत आहे.. त्याचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने होत असेल तर ते निषेध आहे.सुप्रिया सुळे म्हणताय ते 100% सत्य आहे (on समृद्धी महामार्ग ) -- समृद्धी महामार्ग आता सुरक्षित राहिला नाही... अपघातात अगोदर लोकांचा जीव गेला होता दिवसा दढवळ्या दरोडे पडत आहे.सरकार दरोडेखोरांना संपवणार आहे की सरकारचा वरदस्त यांच्यावर आहे. कायद्याचा वाचक नाही त्यामुळे दिवसाढवळ्या अशा घटना घडल्या नसत्या (on भागवत अमेरिका ) भागवत यांनी अमेरिकेचे बोलले त्याचे स्वागत करतो... मात्र त्यांनी भारतात त्यांनी बोलावे ... अमेरिकेत जे बोलत यावर लोकांनी काम करावं.. उठले सुटले हिंदू-मुस्लीम करत असतात... जो कोणी एकमेकांच्या धर्माविरुद्ध बोलेल तो गुन्हेगार ठरेल.. सहीष्णूता म्हणतात सांगलीत मस्जिदमध्ये इंजिनियर मुलाचा खून करता... (on भागवत Toranto भागवत वक्तव्य ) देशात दिल्ली ते गल्ली हिंदू सरकार आहे... यांची पॉलिसी डुप्लिकेट आहे.. आपल्या विचाराचे लोक बादशहाच्या दरबारात आणि इंग्रजांच्या दरबारातही होते... प्रत्येक धर्माने सहीष्णुतेच्या आधारावर काम करावे.. देशात एक बात आणि हिंदुस्तानच्या बाहेर एक बात करू नये -- बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते ऑन – पावसाची परिस्थिती - राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत पाऊस आला. काही नद्या भरून वाहिल्या, तर काही नद्या भरल्या sुद्धा नाहीत. नद्या वाहायला sुद्धा नाहीत, अशी परिस्थिती अनेक भागांमध्ये आहे. विहिरी खोलवर गेलेल्या आहेत. पुढच्या काळात काय होईल, हे आत्ताच सांगता येत नाही. - परभणीतून एका शेतकऱ्याचा फोन आला. “आमचं सर्व काही गेलं असतं,” त्यांनी सांगितलं. पिकांना अळीमुळे संकट आलेलं आहे. दुबार पेरणीला सुद्धा पाणी लागतं. याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नद्या कोरड्या आहेत. ही परिस्थिती पाहता भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. आतापासून सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी काम केलं पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन पुढची योजना केली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकारने उभं राहिलं पाहिजे. राज्याची तिजोरी सदा उघडी असली पाहिजे. (on महागाई वाढली आहे) - महागाई वाढली आहे. दूध, साखर वाढलेली आहेत. पेट्रोल 112 रुपये झालेलं आहे. खाण्याचं तेलसुद्धा वाढलेलं आहे. डाळ वाढली आहे. गॅस सिलेंडरसुद्धा वाढलेला आहे. यामुळे सर्वसामान्य गावातील माणूस रस्त्यावर आलेला आहे. गावात लाकडावर भोजन बनवण्याची व्यवस्था आता होऊ लागली आहे. सरकारची मानसिकता नाही आहे गरीबाच्या घरी सिलेंडर मिळावं म्हणून... दूध महागल्यामुळे लहान मुलांनासुद्धा याचं संकट पाहावं लागणार आहे. मध्यमवर्गीयांची परिस्थिती सध्या गंभीर झाली आहे. ( आदिवासी -- खाजगीकरण ) - लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट संघाशी संबंधित आहे. अनेक आश्रमशाळा आहेत, संघाच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. डुपिकेट देशप्रेमींना सांगावं लागेल .. आदिवासी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू असेल, तर ही सुरुवात आहे. - शाळेमध्ये प्रवेश कराल, त्यांचे व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून संघाची माहिती दिली जाणार, नॉनव्हेज खाऊ नका, व्हेज खा, असे सांगण्यात येईल.... ड्रेस कसा असावा, हे रुजवण्याच्या काम करतील त्यानंतर त्यांच्या डोक्यात संघाचे विचार रुजवण्याचं काम करतील. आदिवासी विद्यार्थ्यांवरकंट्रोल मानकर ट्रस्ट करेल. या माध्यमातून एक षडयंत्र सुरू आहे. (ऑन – लोकसेवा आयोग MPSC ) - २०२५ राज्य उत्पादन शुल्क जी परीक्षा, पेपर लीकच्या तक्रारी आहेत. असा आहे की, १०० गुणांचा पेपर होता, विद्यार्थ्यांना ८४ मार्क कसे मिळू शकतात? एमपीएससीमध्ये होऊ शकत नाही. शंभर टक्के गोंधळ निर्माण झालेला आहे. - ज्या व्यक्तीने पेपर लिक केला त्याच्याकडे शंभर कोटींची संपत्ती सापडली गेली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या ज्यांच्याकडे संपत्ती सापडली तो सत्ताधारी पक्षाच्या माणसाशी संबंध आहे... - ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे.एमपीएससीच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहणार नाही. ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय सेवेत पैसे घेऊन लिक करून सिलेक्शन होत असेल, तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल. महाराष्ट्राच्या टॅलेंटला व्हॅल्यू नसणार. येणाऱ्या काळात फार मोठी अराजकता निर्माण होईल. - एमपीएससीवर बोर्ड आहे. एमपीएससी मधील संचालक मंडळ आहे, हे इमानदार आहेत की नाही, त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करून यामध्ये पारदर्शकता आणावी. अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं लागेल.0
0
Report
कोल्हापुर विधायक राजेश क्षीरसागर ने राजू शेट्टी को धमकी दी
Kolhapur, Maharashtra:चोपून काढणारे राजू शेट्टी हे काय राक्षस आहेत का ? सरकारने एकदा मनात घेतले तर शेट्टींना उलटे टांगू असा सज्जड दम कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपून काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता, त्याला प्रत्युत्तर देताना हे कायद्याचं राज्य आहे इथे दमबाजी चालणार नाही असंच शिवसेना आमदार क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांना सुनावले आहे.0
0
Report
Advertisement
शिंदे सरकार के मंत्रिमंडल से नाराज MLA ने बदली की मांग की
Kolhapur, Maharashtra:सरकार स्थापन होताना शिंदे सेनेत ज्यांना मंत्रीपदे दिली नाहीत त्यांच्यात आता खदखद सुरू आहे. कोल्हापूरात आमदार राजेश क्षीरसागर आणि पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्यात यावरून संघर्ष सुरू आहे. ज्यांना मंत्र्यांनी चांगले काम आणि संघटना वाढीसाठी काम केले नाही त्याना बदलण्याची गरज आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलीय. या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड बघून अडीच वर्षांनी मंत्रीपदे बदलण्याचा दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी पाळावा अशी मागणी त्यांनी केलीय. पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या पेक्षा आपल्या दारात लोकांची कामासाठी रांग असते त्यामुळे जे राज्याच्या हिताचे काम करत नाहीत त्याना बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय.0
0
Report
कोल्हापुर में आज पानी की आपूर्ति कम दबाव के साथ बाधित
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात आज अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. काळम्मावाडी धरण परिसरात असणाऱ्या उपसा केंद्रावर आयसोलेटर बसवण्याचे काम करण्यात येत असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा न झाल्याने आज कोल्हापूर शहरातील अनेक भागांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झाला आहे.0
0
Report
सुप्रिया सुळे ने भीमाशंकर में विकास-उद्योग और किसान नीति पर सरकार को घेरा
Shirur, Maharashtra:खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद पॉईंटर... भीमाशंकर परिसरातील दुरवस्था व भाविकांचे हाल: भीमाशंकर येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि अर्धवट पडलेली विकासकामे यावर तीव्र नाराजी व्यक्त केली; यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. चाकण एमआयडीसी आणि उद्योगांचे स्थलांतर: पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे चाकणसह राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा आरोप केला. दावोस दौऱ्यांवर टीका करत स्थानिक उद्योगांना 'रेड कार्पेट' देण्याची आणि चाकणच्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली. शेतकरी प्रश्न, कांदा व sakhar धोरण: केंद्र政府च्या अस्थिर आयात-निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला. sakhareche धोरण आणि shetmālalā योग्य भाव न मिळण्यावरून सरकारवर टीका केली. अंगणवाडी पोषण आहार व दूध भेसळ प्रकरण: लहान मुलांच्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. आंबेगाव व परिसरात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे स्वागत करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांचे आंदोलन व पेपरफुटी: आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, एमपीएससी व इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. आंदोलने व सरकारच्या भूमिकेवर टीका: मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध घटकांना आपल्या मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरावे लागत असून, सरकार संवाद साधण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला.0
0
Report
Advertisement
शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ताओं के मेळावे के संदर्भ में जिल्हा प्रमुख की उपस्थिति में बैठक
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अकलूज आणि सांगोला तालुक्यात होणाऱ्या आगामी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले.0
0
Report
पुणे में मराठा आरक्षण के बैनर दिखे, SEBC आरक्षण कैसे टिकेगा?
Pune, Maharashtra:पुण्यातही झळकले मराठा आरक्षणाचे बँनर कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांचे एसईबीसी आरक्षण कसं टिकवणार? तिकडे जरांगे कुणबी दाखल्यांसाठी उपोषणाला बसले असताना इकडे पुण्यात वेगळीच मागणी समोर एसईबीसी आरक्षण कसं टिकवणार? कालच मराठा क्रांती मोर्चाने याच आशयाचॆ दिलं होतं पञ0
0
Report
नागपूर में स्कूलों और सरकारी कार्यालयों को धमकी, पुलिस हाई अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरातील 18 सीबीएससी शाळांसह काही सरकारी कार्यालयांना बॉबने उडवून देण्याची धमकीचा ईमेल 18 ऑगस्टला आला होता. या ईमेलमध्ये 31 ऑगस्टचा उल्लेख होता... या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आज हाई अलर्टवर आहेत. काही शाळांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. काही शाळा व्यवस्थापनांनी आज शाळांना सुट्टी ही जाहीर केली आहे... तर काही शाळा ऑफलाइन क्लासेस घेत आहेत0
0
Report
Advertisement
यवत में ओबीसी मोर्चे को पुलिस ने अनुमति नहीं दी, हाके ने रुख दिखाया
Rui, Maharashtra:ओबीसींच्या मोर्चा मुंबईकडे एक सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. पोलीसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी नाकारली असून लक्ष्मण हाके यांना नोटीस दिली गेली आहे. यवत पोलीस ठाण्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. आम्ही मोर्चावर ठाम असून मुंबईकडे जाणार असल्याचे हाके यांनी म्हटले. जरांगे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली. सरकारला त्यांनी आरक्षण दिले असल्यामुळे मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील आझाद मैदान येथे पोलिसांची परवानगी आवश्यक असून ती मिळाली नाही त्यामुळे हाके यांच्या मोर्चाला अद्याप परवानगी दिली नाही. ज्या गाड्या या मोर्चाला जाणार आहेत त्यामुळे कायदा व्यवस्थितीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; नव्याने अर्ज करून मागणी करण्याचा विचार दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांनी व्यक्त केला.0
0
Report
धुळे में शरद पवार को कृतज्ञता सम्मान, श्रद्धेय नेता उपस्थित
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळेस शास्त्रज्ञान डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांचा कृतज्ञाता सन्मान केला. यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. संस्थेने केलेल्या या सत्कार सोहळ्या बद्दल शरद पवार यांनी आभार व्यक्त करत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी इतिहास संशोधनांमध्ये मोठे योगदान दिलं असून, त्यांचे योगदान हे येणारे पिढ्यासाठी मार्गदर्शक आहे, असं शरद पवार यांनी सांगितल. तर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना, अनेक संस्थांना शरद पवार यांनी मदत केली, मात्र त्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही, असं सांगितले.0
0
Report
अनुमति न मिलने के बावजूद ओबीसी महामोर्चा 1 सितंबर को पटस से मुंबई रवाना
Pune, Maharashtra:परवानगी नाकारली तरीही १ सप्टेंबरचा ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणारच असा निर्धार ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. तसेच नियोजनात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक तारखेला सकाळी दहा वाजता ओबीसी समाजबांधवांनी पाटस टोल नाक्यावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही हाके यांनी केले आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसींच्या विविध प्रश्नावरती प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाने महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा पाटसहून निघणार असून तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र सोशल मीडियामध्ये काही ओबीसी समाजाचे विरोधक या मोर्चा संदर्भात अफवा पसरवत आहेत. असा आरोप हाकेंनी केला दरम्यान पाटस येथे पोलीस प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक झाली असून कायद्याच्या चौकटीत राहून, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करत हा मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
