445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ठाकरे गुट के सांसद ओम राजे निंबाळकर का शिवसेना छोड़ना बन गया राजनीतिक हंगामा
Dharashiv, Maharashtra:ओम राजे निंबाळकर यांच्या निर्णयावर शिवसैनिक नाराज. दादा परत या घातली भावनिक साद. शिवसेनेने तुम्हाला काय कमी केलं. ओमराजे यांना विचारला जातो आहे प्रश्न. ओम राजे यांना विचारला जातो आहे प्रश्न. धाराशिव चे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेची साथ सोडत शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय मात्र ठाकरेंच्या शिवसैनिकांना काही पटलं नसल्याचे चित्र आहे उंब्रज निंबाळकर यांच्या या निर्णयाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली आहे ठाकरेंनी अर्थात शिवसेनेने तुम्हाला काय कमी केलं असा प्रश्न त्यांना विचारला जातो आहे. तर दादा परत या अशी भावनिक साद शिवसैनिक ओम राजे यांना घालताना दिसत आहेत0
0
Report
उद्धव ठाकरे के छह सांसद अलग गुट बनाकर छोड़ने की चर्चा, परभणी सांसद संजय जाधव भी शामिल
Parbhani, Maharashtra:अँकर -ऑपरेशन टायगर वरून दिल्लीमध्ये घडामोडींना मोठा वेग आला आहे उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार त्यांना सोडचिठ्ठी देत वेगळा गुट स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव देखील सहभागी आहेत संजय जाधव अचानक उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन वेगळ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेनंतर परभणीच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली असून यासंदर्भातपरभणीकरांना काय वाटतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी0
0
Report
ऑपरेशन गुवाहाटी और टायगर से सत्ता के खेल पर विपक्ष पर दबाव बढ़ा
Satara, Maharashtra:देशाच्या राजकारणात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्षाच्या माध्यमातून काम करत असतात. मात्र, ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, असा नारा देणारा भाजप स्वतःच्या ताकदीवर निवडून न येता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे पक्ष फोडण्याचे काम करत आहे. सत्तेचा गैरवापर करून आमिषे दाखवून आणि दबाव आणून चालवलेले हे ऑपरेशन टायगर देशाच्या लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे निवडणुका झाल्यानंतर डी-लिमिटेशनचा विषय समोर आला आहे. येणाऱ्या काळात देशामध्ये जी राजकीय अस्थिरता आणि नाराजीचा सूर आहे, त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. ३५० ते ४०० पारचा नारा देणाऱ्यांना दोन पक्षांच्या आधारावर सरकार बनवावे लागले. आताच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल किंबहुना केंद्रातील सत्ता जाऊ शकते अशी भीती भाजपला आहे. म्हणूनच डी-लिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील आणि राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणला जात असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता "सत्तेचा आणि यंत्रणांचा वापर करून 'हुक अँड क्रूक' या पद्धतीने काहीही करायचे असा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतलेला दिसतोय. पवनराजे निंबाळकर यांच्या बाबतीत ते एक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, पण आता त्यांच्या नाव या सगळ्यात आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही आश्चर्य वाटत आहे. सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर जे जमले नव्हते ते आज भाजप पूर्णपणाने वापरत आहे आणि त्यामुळेच राजकीय समीकरणे बदलत आहेत. ऑपरेशन गुवाहाटी आणि ऑपरेशन टायगर'मध्ये फक्त नावे बदलली शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे आणि तानाजी सावंत यांनी हे 'ऑपरेशन' राबवल्याच्या आणि चार्टर प्लेनचे नियोजन केल्याच्या चर्चेवर बोलताना शशिकांत शिंदे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, "त्यांनी काय ऑपरेशन केले यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितले आहे की, ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. त्यामुळे 'ऑपरेशन गुवाहाटी' असो वा 'ऑपरेशन टायगर', यात काही फरक नाही. फक्त त्यातील नावे बदलली आहेत, ऑपरेशन मात्र तेच आहे. कोणाचाही स्वाभिमान किंवा प्रेम यासाठी कारणीभूत नसून, मोठी आमिषे आणि दबाव यातूनच हे सगळे घडवून आणले जात आहे." दरम्यान, 'ऑपरेशन टायगर'नंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात 'ऑपरेशन तुतारी'ची धास्ती आहे का? या प्रश्नावर त्यांनी "आमच्या पक्षात अशी कोणतीही धास्ती किंवा चर्चा नाही. या विषयावर पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे अधिक बोलू शकतील. बाईट: शशिकांत शिंदे (शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष)0
0
Report
Advertisement
Solapur में उबाठा शिवसैनिकों का जोरदार प्रदर्शन: छह सांसदों के गुट निर्माण के विरोध में घोषणाबाजी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सहा खासदारांच्या गट स्थापनेच्या चर्चेनंतर सोलापूरात उबाठाच्या शिवसैनिकांची रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी. गट स्थापन करण्याच्या तयारीत असणाऱ्या 6 खासदारांच्या विरोधात सोलापुरात उबाठाचे शिवसैनिक आक्रमक. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे फुटणारे आहेत त्यांना चपलीने ठोका, त्यामुळे सोलापूरचे शिवसैनिक वेगळे आहेत. फुटणाऱ्यांचे श्राद्ध घालण्याचा उबाठा शिवसैनिकांचा इशारा. वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. याविषयी उबाठाच्या शिवसैनिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
ऑपरेशन टायगर पर घमासान, अनिल देशमुख के आरोपों की सच्चाई क्या?
Nagpur, Maharashtra:नागपूर अनिल देशमुख, माजी गृहमंत्री. अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, शिंदेसेनेचे नेते बोलताना मात्र दिसत नाही, पश्चिम बंगालमध्ये खासदार गेले म्हणून अशी फक्त चर्चा आहे, काही नेते, खासदार येऊन बोलले तर बघू, खरोखरच सत्यता असेल तर बघू, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही.. संजय राऊत यांनी स्वतः सांगितलं, उद्धव ठाकरे यांनी बैठक झाली त्यावेळीच सांगितले 15 कोटी नगरसेवक घेतात हा आकडा काहीतरी चुकला असेल, काही ठिकाणी 15 कोटी नगरसेवकाचा भाव आहे, नगरसेवकांना पैसे दिले.. हिंगण्यात नगरसेवक एकत्रित आहे, महाविकास आघाडीचे सर्व नगसेवक एकत्र आहे, आम्ही नगरसेवकाना कुठेच पाठवल नाही, 100 कोटी "100 कोटी रेट आहे तिकडे तुम्हाला माहित आहे का?" गृहमंत्री असतांना 100 कोटीचा आरोप झाला होता, माझ्यावर आरोपाची चौकशीची मागणी केली होती... त्यावर चांदीवला आयोगाची चौकशी केली.. त्याचा रिपोर्ट जो पडून आहे तो लोकांसमोर आणावा, शासनाला पत्र दिले, 11 वेळा पत्र दिले, माझ्यावर झालेल्या आरोपाचा अहवाल का? लपवून ठेवला आहे, 11 वे पत्र लिहिले आहे, राज्य सरकारला पत्र लिहिले, गव्हर्नर यांना पत्र दिले आहे, ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे... ऑपरेशन टायगर - जोपर्यंत सत्यात पुढे येत नाही तर काय बोलणार0
0
Report
संजय दिना पाटील के घर के बाहर सुरक्षा व्यवस्था बढ़ी
Mumbai, Maharashtra:ईशानी मुंबई खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर जे खासदार चर्चेत आहेत त्यांच्या घराबाहेर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे0
0
Report
Advertisement
नांदणी में महादेवी हाथी के घर वापसी की तैयारी तेज, सुविधाओं की जाँच जारी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी हत्तिणीच्या घरवापसीच्या हालचालींना आता वेग आला आहे. गुजरातमधील ‘वनतारा’ची टीम नांदणीत दाखल झाली असून, हत्तिणीसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थानाची आणि इतर सुविधांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. नांदणी मठ आणि वनतारा फाउंडेशनच्या वतीने महादेवी निवासाची व्यवस्था युद्धपातळीवर उभारली जात आहे. या सर्व कामांचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा अंतिम निर्णय होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महादेवी हत्तिणीच्या पुनरागमनाची मागणी स्थानिक नागरिक आणि भक्तांकडून सातत्याने केली जात होती. आता या मागणीला यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुजरातमधील वनतारा फाउंडेशनची तज्ज्ञ टीम नांदणीमध्ये दाखल झाली असून, हत्तिणीच्या वास्तव्याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पाहणी करत आहे. नांदणी मठ परिसरात माधुरीसाठी निवासस्थान उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हत्तिणीच्या देखभालीसाठी आवश्यक असलेली जागा, खाद्यव्यवस्था, आरोग्य सुविधा आणि इतर बाबींचा आढावा घेतला जात आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठवला जाणार आहे. समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होणार आहे.दरम्यान, महादेवी हत्तिणीच्या परतीच्या हालचालींमुळे नांदणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
रत्नागिरी के भाजपा के पक्षबांधन के लिए बड़े दौरे, शिवसेना के नेता भाजपा में शामिल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. भाजपच्या जिल्ह्यात पक्ष बांधणीच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.. या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून काहींचा प्रवेश झाला आहे.. माजी सभापती व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सहदेव बेटकर यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष,महामंत्री आमदार निरंजन डावखरे,आमदार योगेश सागर,आमदार प्रमोद जठार माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्यासह उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव ही उपस्थित होते..0
0
Report
डोंबिवली में लिफ्ट विवाद पर मारपीट, वीडियो वायरल, पुलिस ने दर्ज किया मुकदमा
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत लिफ्टच्या वादातून राडा!सोसायटीची लिफ्ट सुरू करण्यास सांगितल्याने संतप्त शेजाऱ्यांनी केली बेदम मारहाण मारहाणीचा विडिओ सोशल मीडियावर वायरल ,टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पोलीस तपास सुरू. डोंबिवली पूर्वेतील एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीची लिफ्ट सुरू करण्यास सांगितल्याचा राग आल्याने काही शेजाऱ्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
डिंडोरी के जानूरी में मिठाई की दुकान में आग, लाखों का नुकसान
Dindori, Madhya Pradesh:डिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे ग्रामपंचायत इमारतीच्या शेजारी असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सर्व दुकानातील फर्निचर जळून भस्मसात झाले आहे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान ओझर व एच ए ल येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे0
0
Report
वर्धा में अवैध शराब तस्करी के खिलाफ पुलिस ने 6.59 लाख का माल जप्त
Wardha, Maharashtra:वर्ध्यात दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई - वर्धा जिल्ह्यात दारूबंदी पथकाने अवैध मद्यवाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 6 लाख 59 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनापानी चौक पुलाजवळील सर्व्हिस रोडवर गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. पोलीसांनी मयूर प्रकाश मांद्रीले (वय 25, रा. स्नेहल नगर, वर्धा) यास ताब्यात घेतले. आरोपीकडून टॅंगो पंच देशी दारूच्या 200 शिश्या, ट्यूबर्ग बिअरच्या बाटल्या व कॅन, बडवाईसर बिअरच्या बाटल्या तसेच मद्यवाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनासह संपूर्ण मुद्देमालाची किंमत 6 लाख 59 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दारूबंदी पथकाच्या या धडक कारवाईमुळे अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.0
0
Report
ऑपरेशन टायगर की चर्चा के बीच ठाकरे गुट के सांसद शिवसेना में प्रवेश की अटकलें
Washim, Maharashtra:यवतमाळ: अँकर:शिवसेना शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना ठाकरे सेनेचे सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.याच पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे इतर खासदारांसह दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथील निवासस्थानी आज शांतता दिसून आली. नेहमी नागरिकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असणाऱ्या या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.ठाकरे सेनेचे सहा खासदार दिल्ली दौऱ्यावर गेल्याने नेमकी कोणती राजकीय घडामोड घडणार,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय देशमुख यांच्या घरासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..0
0
Report
Advertisement
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे पर ‘जीरो डेथ’ अभियान: मानवी साखळी से जागरूकता
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘झिरो डेथ’ अभियान; पोलिसांची मानवी साखळी, नागरिकांना गुलाब देत जनजागृती; अंबरनाथ जवळ मोरीवली गावात रेल्वे क्रॉसिंग करताना आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू; अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या मोरीवली गाव परिसरात रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत या परिसरात तब्बल 40 जणांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. हे अपघात थांबवण्यासाठी मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिसांकडून मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्यात आली. अशा अपघात थांबवण्यासाठी रेल्वे कडून‘झिरो डेथ’ संकल्पना राबवण्यात येत आहे. रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असून नागरिकांनी सुरक्षित मार्गाचा वापर करावा, यासाठी रेल्वे पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मोरीवली गाव परिसरात पोलिसांनी मानवी साखळी तयार करून नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडू नका, असे आवाहन केले. रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून गुलाबाचे फूल देण्यात आले आणि जीव धोक्यात घालून रुळ ओलांडू नये, असा संदेश देण्यात आला. रेल्वे अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहন रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.0
0
Report
ठाकरे-शिंदे के गुटों के बीच महाराष्ट्र की राजनीति में नया मोड़
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर संजय पवार उपनेते ठाकरे शिवसेना दोन दिवसापासून आम्ही लक्ष ठेऊन आहे अजून ते १०० टक्के गेले नाहीत ते जाणार नाहीत हे खात्री आहे आताच बोलणे उचित नाही ऑपरेशन टायगर मुळे देशाचे राजकारण कोणत्या थराला गेले हे कळेल याला लोकशाही म्हणतात का आम्ही रान तयार करायचे आणि तुम्ही ते दादागिरीवर पिक कापून घेऊन जायचे हे काय चालले आहे संजय राऊत ना पैशाच्या बाबत टिप मिळाली असेल त्या शिवाय बोलणार आहेत बॅड पॅच सगळ्यांना असतात याचा अर्थ आम्ही संपलो असे नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही झेप घेऊन मातोश्री आमची आहे हे दाखवून देऊ मुख्यमत्री पदावर डोळा ठेऊन एकनाथ शिंदे यांची खेळी सुरू आहे आपली ताकद दाखवून त्याना मुख्यमंत्री व्हायचे आहे पण फडणवीस हलतील का ? याचा विचार करावा आपले कुटुंब अडचणीत असताना प्रमुखना सोडून जाणे शोभते का , त्याना जनता धडा शिकवेल उद्धव ठाकरे हे हिंदूहृदय सम्राटाचे पुत्र आहेत ते खचून जाणारे नाही छातीवर पाय ठेऊन उभे राहतील.0
0
Report
ठाणे में विकास फंड्स को लेकर शिवसेना सांसद पर चर्चा का कयास
Nashik, Maharashtra:प्रकाश वाजे - राजाभाऊ वाजे यांचे वडील. - शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आले आहे ऑपरेशन टायगर अशी काही चर्चा सुरू आहे. - त्यांनी मला सांगितलं आहे, एक कमिटी आली होती - दीड वर्षापूर्वी ही त्यांना ठाण्याला बोलवले होते त्यांनी वडीलांशी बोलून अस सांगितलं होत. - आम्हाला शिवसेनेने आमदार आणि खासदार सांगितले - मी उद्धव ठाकरे त्याच्याशी बोलो त्यांना सांगितले कोण तुमच्यासोबत राहील माहीत नाही पण वाजे तुमच्यासोबत राहील असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले. - आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. - विकास काम कोणाच्या खिशात होत नाही - ठाण्याचे मंडळी आले होते त्यांनी मला ऑफर दिली आम्ही आमचा निर्णय नाही सांगितले.0
0
Report
Advertisement
