Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 18, 2025 04:04:14
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 18, 2025 04:03:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 18, 2025 04:03:31
Nagpur, Maharashtra:नागपूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 22 जागाची मागणी केलीय... निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत नागपुरात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाला 15 टक्के जागा मिळाव्या वा 22 जागा महायुती मिळाव्या अशी मागणी लावून धरली आहे.. एकीकडे भाजपाकडून गेल्या वेळेस जेवढी ताकद तेवढ्यात जागा सोडण्याची तयारी असल्याचे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस करता एकच जागा सोडण्याची तयारी दाखवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून 22 जागांच्या मागणीमुळे नागपुरात महायुतीत चर्चेपूर्वीच जागावाटपाचा समीकरण अवघड असल्याचं दिसून येतेय... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कडून अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी असल्याची इशाराही देण्यात आलाय... महायुतीत जागावाटपांचा निर्णय मात्र वरिष्ठ स्तरावर होणार असल्याचेही जैनांनी सांगितले... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी..
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 18, 2025 03:54:36
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळेत बिबट्याची दहशत एकाच रात्रीत बिबट्याने चार गुरांना केलं ठार याापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. ही गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेली असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आलं. मिरजोळे सोनारवाडीतील गुरांवरील या हल्ल्यामुळे संपूर्ण मिरजोळे आणि लगतच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 18, 2025 03:31:31
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 03:22:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची बुधवारी क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठीकाठा, लाठांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घात घालत होती. यात पठाण यांचा मृत्यू झाला. याबाबत रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत. पठाण यांच्या कुटुंब मूळ ओव्हरगावचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांच्या जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठीकाठ्या, रॉडने हल्ला केला. दादा पठाण जागीच मरण पावले.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 18, 2025 03:20:33
Parbhani, Maharashtra:अँकर- महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या असून सध्या युती आघाडीसाठी नेत्यांकडून प्रयत्न चालले आहेत. पण इच्छुक मात्र उमेदवारीसाठी नेत्यांकडे गळ घालून टाकून बसले आहेत. त्यामुळे युती आघाडी नको रे बाबा अशीच काहीशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याची पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडी जर झाली तर तिकीट कटण्याची भीती इच्छुकांना वाटू लागलीय. महायुती आणि महाविकास आघाडीकडे तीन-तीन पक्ष एकत्र आल्याने मोठी भाऊ गर्दी झालीय,मागील आठ वर्षापासून निवडणुका न झाल्याने अनेकजण मनपा निवडणूक लढण्यास तयार झाली आहेत. अनेकांनी आप आपल्या प्रभागात निवडणूक लढण्याची तयारीही सुरू केली आहे. पण जर युती किंवा आघाडी झाल्यास आपलं तिकीट कटण्याची इच्छुकांना भीती वाटू लागलीय...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 18, 2025 03:20:05
Latur, Maharashtra:लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली. AC - लातूर बाजार समितीत सोयाबीनचे खुल्या बाजारातील भाव स्थिर असल्याचा थेट परिणाम दिसून येतोय. अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या सर्वसाधारण दरात कोणतीही वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकडे पाठ फिरवली आहे. बाजार समितीत सोयाबीनची केवळ १२ हजार ३२८ क्विंटल इतकीच आवक झाली आहे. सोयाबीनचा कमाल दर ४ हजार ७२१ रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर ४ हजार ५०० रुपये इतका राहिला. दरम्यान, इतर कडधान्यांचे दर पाहिले तर उडदाला ४ हजार ८००, मूग ६ हजार २५०, हरभरा ५ हजार, तूर ७ हजार तर करडईला ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने येत्या काळात आवकेत वाढ होणार की घटच कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 18, 2025 03:08:45
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 18, 2025 03:08:32
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – मला उमेदवारी मिळायलाच हवी अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला पक्ष जबाबदार, भाजपा कार्यकर्त्याचा थेट नेत्यांनाच दम सोलापूर शहर भाजपकडून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्ते ठरणार डोकेदुखी सोलापूर शहर भाजपमध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारीवरून थेट पक्षातील नेत्यांनाच दिला सज्जड दम सोलापूर महापालिकेसाठी भाजपकडून 102 जागांसाठी सुमारे 1200 हून अधिक अर्ज दाखल अनंत धुम्मा यांनी मला उमेदवारी मिळायलाच हवी, अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन, त्याला पक्ष जबाबदार असल्याचा प्रतिक्रिया दिल्याने शहरात एकच खळबळ अनंत धुम्मा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी भावनेच्या भरात विधान केलं असल्याचा खुलासा मात्र भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला सर्व कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं मात्र काही निर्णय पार्टीचे असतात कोणीही कायदा हातात घेऊन शहराचे वातावरण न बिघडवण्याचे भाजपा शहराध्यक्षांचे आवाहन
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 18, 2025 03:08:15
Jalna, Maharashtra:जालना : 965 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, अँकर : सन 2024-25 या वर्षाच्या खरीप हंगामात खरीप गावांची तसेच ज्या रब्बी गावांत दोन तृतीयांशपेक्षा जास्त खरिपात पेरणी केलेली आढळली आहे, त्या गावांची अंतिम पैसेवारी देखील खरीप हंगामात जाहीर करण्यात करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील खरीप पिकांच्या पैसेवारीमध्ये खरीप गावे एकूण 667 आणि रब्बी गावे 298 अशा एकूण 965 गावांची खरीप अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. जिल्ह्यातील 971 गावांपैकी 667 खरीप गावे आणि 298 रब्बी गावे असे एकूण 965 गावांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 03:04:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रिक्षाच्या अपघातावरून जोरदार राडा झाला असून, दोन गटात मारहाण झाली आहे. सुसाट वेगात जाणाऱ्या रिक्षा व कारचा अपघात झाल्यानंतर जखमींच्या मदतीसाठी धावलेल्या एका माजी नगरसेवकाला रिक्षा मालकाच्या मुलाने अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न केला. त्यानंतर घडलेल्या प्रकारात वाद वाढून माजी नगरसेवकासह दोन ते चार जणांच्या गटाने तरुणाला बेदम चोप दिला. बुधवारी रात्री ११ वाजता सूतगिरणी चौक ते शहानूरमियाँ दर्गा रस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला आहे. तर दोन गटातील मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top