Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Sept 18, 2025 02:46:55
Pandharpur, Maharashtra:18092025 Slug - PPR_KARAMLA_VISIT file 02 ---- Anchor- करमाळा तालुक्यातील गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानंतर नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जय कुमार यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. करमाळा तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी 9 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच सीना नदीला पूर येऊन खडकी, निलज, बोरगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री), वाघाचीवाडी, आळजापुर, बाळेवाडी आदी गावात पुराचे पाणी शिकल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खडकी व बिटरगाव या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने त्वरित करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी खडकी येथे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून येथील नुकसानग्रस्त शेतकरी श्री. लोहार यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बंधाऱ्याचे दरवाजे बंद असल्याने दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे शेती पिके व मातीही खरडून वाहून गेली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले. पालकमंत्री श्री गोरे यांनी बिटरगाव श्री येथील नुकसानीची पाहणी केली. बिटरगाव श्री येथील पूर्ण रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याची पाहणी केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 02:46:46
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 02:46:23
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Amabai Mandir Feed:- File Anc:- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याच्या भूसंपादनाचा अहवाल प्रशासनाने भूसंपादन समितीला सादर केला आहे. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर भूसंपादनाच्या पर्यायांची निश्चिती केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर भूसंपादनात येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुमारे 900 कोटीचे भूसंपादन होणार आहे. पण हे भूसंपादन रक्कम देऊन करायचे की अन्य पर्यायांचा विचार करायचा हे ठरवण्यासाठी नगरी विकास खात्याचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली आहे. यानुसार ही सर्व प्रक्रिया सुरू आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 18, 2025 02:46:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 02:33:33
Kolhapur, Maharashtra:Kop Zp Sunavani Feed:- File Anc:- कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखडा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये सुनावणी सुरू आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेला विभागीय आयुक्त स्वतःच्या निर्णयाला स्वतःच कशी मान्यता देऊ शकतात ? अशी विचारणा कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्तींनी राज्य निवडणूक आयोगाला विचारले आहे. दरम्यान आज या संदर्भात पुढील सुनावणी होणार आहे . ही सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंच समोर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने एडवोकेट अतुल दामले आणि एडवोकेट सचिन शेटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे यापूर्वी युक्तिवाद केला होता. जिल्हा परिषद प्रारूप आराखडा तयार करत असताना सूडबुद्धीने रचना करण्यात आली आहे असा अर्ज कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 02:33:27
Kolhapur, Maharashtra:Kop Mahadevi Elephant Feed:- File Anc:- नांदणी मठातील महादेवी हत्ती मठाकडे परत यावी यासाठी आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नांदणी मठाचे महास्वामी यांच्याकडून याबाबत अर्जावर स्वाक्षऱ्या झाल्या असून नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराकडून adv .मनोज पाटील हे उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात महादेवी हत्ती प्रकरणी सुनावणी झाली त्यामध्ये राज्य सरकारचे वकील adv. धर्माधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महादेवी हत्तीनीला वनतारा कडे पाठवले आहे , पण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकार, वनतारा यांनी नांदणी मठाशी समन्वय साधून नांदणी मठाच्या जागेमध्ये वनताराच्या मार्गदर्शनाखाली तातडीने हत्ती पुनर्वसन केंद्र उभारून त्या ठिकाणी हत्तीवर उपचार करण्याचे ठरले आहे असा युक्तिवाद केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या संदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घ्यावा असा आदेश दिला, त्यानुसार नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा कडून आज उच्चस्तरीय समितीकडे महादेवी हत्ती परत मिळावा यासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 02:33:19
Jalna, Maharashtra: FEED NAME : 1809ZT_CSN_SURVEY(5 FILES) छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू,शेतकऱ्यांना दिलासा अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, सोयगाव आणि पैठण तालुक्यांत गेल्या चार दिवसांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. महसूल, पंचायत आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आमदार, नेतेही पाहणीसाठी बुधवारी बांधावर पोहोचल्याचं दिसून आलं.सोयगाव तालुक्यात 78 कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली असून पंचनामांना सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 02:33:06
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1809ZT_CSN_COMMISSIONER(1 FILE) छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरणातील बाधितांना म्हाडाची घरे मोफत द्या,महापालिका प्रशासकांची राज्य सरकारकडे मागणी अँकर :रस्ता रुंदीकरणातील बाधितांना म्हाडाची घरे मोफत द्यावीत अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका प्रशासकांनी राज्य सरकारकडे केल्याची माहिती समोर आली आहे.भविष्यात प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळी तरतूद ठेवावी लागेल. त्याशिवाय रस्ते रुंद होणार नाहीत,असंही महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. यामध्ये अनेक नागरिकांची घरे गेली. त्यांना बेघर व्हावे लागले. त्यांच्यासाठी म्हाडाची घरे उपलब्ध करून द्यावीत, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १५० घरे उपलब्ध होतील. निर्वासितांना ही घरे दिली जातील, असेही प्रशासक म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आणखी घरांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती देखील समोर आली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 02:32:51
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्हा पोलीस दलाच्या कमांड अँड कंट्रोल कक्ष, त्रिनेत्र प्रकल्प व रक्षा प्रकल्प या महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.अकोला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.शहरातील महत्त्वाच्या तसेच संवेदनशील चौकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने कमांड अँड कंट्रोल कक्षातून शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर प्रभावी नजर ठेवता येणार असून कायदा व सुव्यवस्थेचे संनियंत्रण अधिक सक्षम होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक स्थळाची सुस्पष्ट प्रतिमा मिळणार असून गुन्हेगारी नियंत्रण व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.या उपक्रमामुळे अकोला पोलिसांना कार्यक्षमता वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 02:31:34
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1809ZT_CSN_SUCIDE(5 FILES) छत्रपती संभाजीनगर: ब्रेकिंग मराठवाड्यात तब्बल आठ महिन्यांत 707 शेतकऱ्याच्या आत्महत्या 270 शेतकऱ्यांच्या पावसाळ्यात आत्महत्या अँकर : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि मागील तीन महिन्यांत पावसाने मराठवाड्यात घातलेला थुमाकूळ, यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आठ महिन्यांत मराठवाड्यात तब्बल 707 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात जुन, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत 270 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जानेवारी महिन्यात विभागात 88, फेब्रुवारी महिन्यात 75, मार्च महिन्यात 110, एप्रिल 88, मे महिन्यात 78 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. गतवर्षी 948 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 01:15:57
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 01:15:37
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील सोनाळा - अंदुरा दरम्यान मोर्णा नदीवर असलेला पूल अपुरा आणि कमी उंचीचा असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठी हालअपेष्टा सहन करावी लागत आहेत.पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आजारपणात रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेता न येणे, वयोवृद्धांना औषधोपचारांपासून वंचित राहणे – या सर्व गंभीर अडचणींनी लोकांचे आयुष्य थांबून राहिले आहे.ग्रामस्थांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी प्रशासनाच्या संबंधित विभागाने “आम्ही तातडीने पाठपुरावा करू” असे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर त्या वेळचे उमेदवारांनी “पहिल्याच बैठकीत प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी तोडगा काढू” अशी ग्वाही दिली होती. यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला होता मात्र विधानसभा निवडणुकीला बरेच काळ लोटूनही परिस्थिती जसंच्या तशी आहे. या सर्व परिस्थितीवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकमताने ठाम भूमिका घेतली आहे जोपर्यंत पुलाच्या उंची वाढवण्याबाबतचे अधिकृत पत्र प्रशासनाकडून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत मतदान होणार नाही असा निर्णय समस्त गावकऱ्यांनी घेतलाय.
1
comment0
Report
Advertisement
Back to top