icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशिम: अमरावती-करंजा हाईवे पर मध्यरात्रि ट्रैक्टर-ट्रक हादसा, Ek की मौत, एक घायल

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील अमरावती-कारंजा महामार्गावर मध्यरात्री भीषण आणि विचित्र अपघात झाला. कामरगावजवळील टाकळी फाट्यावर भरधाव ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धडकेनंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मागून येणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याखाली पलटी झाला. सुदैवाने ट्रक चालक बचावला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे अमरावती-कारंजा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अपघातात ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

वैजपूर में ग्राम पंचायत भ्रष्टाचार के विरोध में प्रदर्शन के दौरान आरोपी ने आत्मदहन का प्रयास; पुलिस ने की समय रहते हस्तक्षेप

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदार किरण भागिनाथ पवार यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने चौकशी सुरू केली नसल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा येथील रहिवासी किरण भागिनाथ पवार यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत अनेक तक्रारी केल्याचा दावा केला आहे. तक्रारीनंतरही कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई होत नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना रोखलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी सीट पर महायुती बनाम शिवसेना-राष्ट्रवादी के बीच पेच

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच.. गुरु-शिष्य येणार आमने-सामने.. शिंदे शिवसेनेसह राष्ट्रवादीत चढाओढ.. अँकर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या रिक्त जागेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.. यापूर्वी या जागेचे प्रतिनिधित्व खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी केले होते,मात्र आता राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षनिहाय संख्याबळ पाहता या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने आपलें वर्चस्व वाढविले आहे..त्यामुळे ही जागा शिवसेनेने आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर महायुतीत या जागेवर मोठा पेच निर्माण होणार आहे.. कोकण विभागात या मतदार संघात शिवसेनेचे पारडे जड आहे.. रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण 831 मतदार सदस्य आहेत.. यामध्ये एकट्या शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांची संख्या 219 वर पोहोचली आहे..अशा परिस्थितीत ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ आहे त्याच पक्षाचा उमेदवार विधानपरिषदेवर जावा असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्यांची राजकीय लढाई.. खासदार सुनील तटकरे हे मंत्री उदय सामंत यांचे राजकीय गुरू मानले जातात,मात्र आता राजकीय अस्तित्वाची वेळ आल्यावर उदय सामंत आपल्या शिवसेनेसाठी ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. सुनील तटकरे आपल्या मुलासाठी पुन्हा एकदा आग्रही राहणार आहे हे निश्चित मानले जात आहे.. परंतु शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही पाडलेल्या संख्याबळाच्या जोरावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केल्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे.. त्यामुळे महायुतीत या जागेवर मोठा पेच निर्माण होऊ शकतो
0
0
Report

कोल्हापुर में कंटेनर से 40 लाख के दारू का भंडाफोड़, चालक गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:Anc:- परवाना औषधाचा असताना कंटेनर मधून तब्बल 40 लाखाचा दारू साठा वाहतूक करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या मजले गावाजवळ कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत हा कंटेनर पकडला आहे. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला औषधाचा परवाना असताना कंटेनर मधून अवैधरीत्या दारू साठा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोल्हापूर सांगली रोडवर असणाऱ्या मजले गावाजवळ सापळा लावला.. संबंधित कंटेनर जात असताना वाहकाकडे कागदपत्रांची मागणी. त्यावेळी वाहकाने औषधांची वाहतूक करत असल्याची कागदपत्रे दाखवली. पण पथकाला संशय आल्याने गाडीची झडती घेतली. त्यावेळी कंटेनर मध्ये तब्बल 40 लाखाचा दारू साठा सापडला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाडी जप्त करत राजस्थानचा चालक भलाराम भीष्मोई याला अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने चाळीस लाखाची दारू आणि 25 लाखाचा कंटेनर असा एकूण 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
0
Report
Advertisement

उच्च शिक्षा विभाग ने प्रवेश शुल्क स्पष्ट जानकारी के लिए महाविद्यालयों के फलक अनिवार्य किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काची स्पष्ट माहिती मिळावी म्हणून उच्च शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. आता प्रत्येक महाविद्यालयाने कॉलेजच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर प्रवेश शुल्काची अद्ययावत माहिती लावणे अनिवार्य आहे. यासंबंधीचे थेट आदेश उच्च शिक्षण सहसंचालक यांनी काढले आहेत. महाविद्यालयांना त्यांच्या अधिकृत प्रवेश माहितीपुस्तिकेतही शुल्काची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे..
0
0
Report

Kolhapur के Puikhadi घाट पर विराट गौतम ने आत्महत्या; परिवार की मौत से बढ़ा दुख

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातल्या पुईखडी इथल्या घाटात सापडलेल्या मृतदेह संदर्भातली एक धक्कादायक आणि तेवढीच भावनिक माहिती आता समोर आलीये... विराट गौतम असं मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव असून या व्यक्तीच्या परिवारातील तिघांचा नोव्हेंबर 2023 मध्ये याच कोल्हापुरातल्या पुईखडी इथं ट्रॅव्हलच्या अपघातात मृत्यू झाला होता... विराट गौतम यांचं परिवारावरती इतकं प्रेम होतं शेवटी दोन वर्ष त्यांनी त्या तिघांशिवाय आयुष्य काढले.. मात्र तरीही त्यांचा विरह सहन झाला नसल्याने शेवटी त्यांनी टोकाचे पाऊल उचललं आणि याच पुईखडी घाटात ज्या ठिकाणी बस अपघातात परिवारातल्या तिघांचा मृत्यू झाला होता त्याच ठिकाणी येऊन आपलं जीवन संपवलं.. त्यांचा मृतदेह काही वाहनधारकांना दिसला.. त्यानंतर काहींनी पोलिसांना माहिती दिली... या संदर्भातला अधिक तपास पोलीस करत आहेत...दरम्यान विराट गौतम हा मागील अडीच वर्षांपासून विरहात होता... नेहमीच अधून मधून तो याच पुईखडी इथल्या घाटात येऊन ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं हार फुले वहायचा... आत्महत्या करण्यापूर्वी सुद्धा याच घाटामध्ये 3 हार एका ठिकाणी पाहायला मिळाले.. जेव्हा ही विरहाची कहाणी अनेकांना ऐकायला मिळाली त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आलं..
0
0
Report
Advertisement

मनपा ने मतीन पटेल की 2 मकान-दुकान-कार्यालय पाड़े; १८ मई को सुनवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपा से १२ मे रोजी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर नियमानुसार कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या याचिकेवर १८ मे रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु, १३ मे रोजी मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मतीन पटेल यांची २ घरे, दुकान व कार्यालय पाडले. निदा खान थांबली ते घरही पाडले. याविरोधात खंडपीठात ३ स्वतंत्र याचिका दाखल आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने मनपाच्या या कारवाईसंबंधी आश्चर्य व्यक्त केले. याचिकाकर्त्यांना या बाबी मांडण्यासाठी दिवाणी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून १८ मे रोजी तिन्ही याचिकांवर पुढील सुनावणी होईल.
0
0
Report

शहर के विकास आराखड़े में 22 सड़कों के अलाइनमेंट को लेकर विवाद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्य शासनाने छत्रपती संभाजी नगर शहराचा विकास आराखडा ईपीसह गुरुवारी मंजूर केला. या ईपीमध्ये २२ रस्ते लहान केल्याचे निदर्शनास आले. त्यापूर्वीच मनपा प्रशासकांनी विकास आराखड्यातील २२ रस्ते मोठे ठेवण्याचा ठराव घेऊन शासनाला पाठवला होता, परंतु शासनाने मनपाच्या ठरावाकडे दुर्लक्ष करीत ईपीमध्ये २२ रस्त्यांची अलाइनमेंट बदलून ते रस्ते लहानच ठेवल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळं त्या रस्त्यावर उगाच पाडा पाडी झाली का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत...ब३३ वर्षांनंतर हा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यातही अशा प्रकारे शहर विकासाचा विचार केला गेला नसेल तर ते भविष्यासाठी त्रासदायक होईल, अशी ही चर्चा रंगतेय...
0
0
Report
Advertisement

नागपुर, अमरावती और वर्धा में तापमान अलर्ट: 16–18 मई को येलो अलर्ट जारी

Nagpur, Maharashtra:नागपूर , अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेच्या अलर्ट देण्यात आलाय... 16 ते 18 मे पर्यंत उष्णतेचा हा यलो अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जारी केला आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. हवामान विभागाच्या हीट वेव्ह संदर्भात सकाळी अकरा ते दुपारी sाडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये तसेच विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या असे सक्त निर्देश देण्यात आले.
0
0
Report

जात पंचायती के विवाद में महिलाओं पर अमानवीय मारपीट, बाल काटकर धिंड निकाला—उल्हासनगर

Ambernath, Maharashtra:जात पंचायती के विवाद में महिलाओं को अमानवीय मारहाण हुई; उल्हासनगर में घटनास्थल पर उनके बाल काटे गए और धिंड निकालने जैसी घिनौनी घटना सामने आई है। पुलिस ने इस मामले में सात आरोपियों के खिलाफ धारा मारहाणी के तहत मामला दर्ज किया है। जात पंचायती के निर्णयानुसार राजपूत परिवार के सदस्य मंदिर में प्रवेश नहीं कर पाए, जिन्हें ‘बुरे काम करते हैं’ के आरोप पर सामाजिक बहिष्कार का सामना करना पड़ा। एक युवक के मंदिर प्रवेश के बाद विवाद बढ़ गया। घटना के दौरान परिवार के लोग धोखा देकर अन्य लोगों के बीच आकर लाठी डंडों से हमला कर रहे थे। विशेषकर महिलाओं पर अमानवीय अत्याचार किया गया और उनके बाल काटे गए। सीसीटीवी फुटेज और वायरल वीडियो सोशल मीडिया पर व्यापक रूप से चर्चा में आए हैं। बाद में मामला मध्यवर्ती थाने में seven आरोपियों के खिलाफ मारहाणी के जुर्म में दर्ज किया गया है। क्षेत्र में हमला-आक्रोश का माहौल है और कठोर कारवाई की मांग उठ रही है।
0
0
Report

हवामान बदल से सुपारी-नारियल पर बड़ा नुकसान, किसान फसल बीमा मांगेंगे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. हवामान बदलाने सुपारी - नारळीही अडचणीत.. अवकाळी पावसाने नुकसान.. कोकणची ओळख असलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकाला हवामान बदलाचा मोठा फटका बसल्याने पर्याय शेती म्हणून अनेक शेतकरी शाश्वत उत्पन्नासाठी सुपारी बागायतींकडे वळले.. मात्र आता सुपारी आणि नारळ पिकांची स्थिती बिकट झाली असून उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.. गेले काही दिवस सातत्याने हवामान बदलाने सुपारी नारळ ही अडचणीत आले आहे.. नारळ - सुपारीवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्या प्रमाणात फळगळतीही होत आहे.. या पार्श्वभूमीवर आंबा, काजू पिकांप्रमाणेच सुपारी आणि नारळ पिकांनाही पीक विमा संरक्षण मिळावे अशी मागणी शेतकरी करत आहेत..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top