Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Feb 25, 2026 01:16:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या विटा-तासगाव रस्त्याची चाळण,रस्त्यातील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय.. सांगलीच्या तासगाव विटा रोडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे झाले आहेत, रस्त्यावरच्या या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय,खड्डे चुकवताना अपघाताचे देखील प्रकार घडत आहेत,यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांच्या मधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तासगाव मधून विटा कडे जाणारा हा राज्यमार्ग असून शिरगाव पासून विटा शहरा पर्यंत खड्डेयुक्त रस्ता झाला,मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे。
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 25, 2026 01:15:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आधी ड्रेनेज करा मगच ट्रिमिक्स रस्ता करा ,संतप्त डॉक्टरांनी रस्त्यावरच ठिय्या मारून रस्त्याचे काम पाडले बंद. मिरज शहरात करण्यात येत असलेले काँक्रीट ट्रिमिक्स रस्त्याचे काम डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत बंद पाडले,मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंतचा रस्ता काँक्रीटचा ट्रिमिक्स करण्यात येत आहे.रस्त्याचे काम देखील सुरू झालेला आहे,मात्र रस्ता करण्याआधी ड्रेनेजचे काम पूर्ण करावं मगच रस्ता करावं,अशी भूमिका घेत डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत, रस्त्याचे काम बंद पडले,यावेळी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मारत आंदोलन करण्यात आलं.ट्रिमिक्स रस्ता झाल्यावर ड्रेनेज कामासाठी पुन्हा खुदाई केली जाणार,त्यामुळे कोट्यवधी खर्च करून केलेल रस्ता पुन्हा खराब होणार, अशी भूमिका घेत डॉक्टरांनी हे आंदोलन केले.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 25, 2026 01:15:29
Buldhana, Maharashtra:राष्ट्रपतींच्या हस्ते शेगावात 'आयुष' मेळाव्याचे आज भव्य उद्घाटन. देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६' चे भव्य उद्घाटन होणार आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू ह्या श्री संत गजानन महाराजाँचं दर्शन घेणार असून सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनाच्या वेळेत थोडे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे आज सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार नाही. दुपारी १२:३० नंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत होईल.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Feb 24, 2026 16:18:32
Mumbai, Maharashtra:गेले अनेक वर्ष पवई च्या तलावात दररोज सोडण्यात येणारे १८ दशलक्ष लिटर सांडपाणी आता बंद होणार आहे. मुंबई मनपाच्या वतीने भांडुप आणि पवई मधील इतर ठिकाणी ते वळविण्यात येणार आहे. तसेच काही लिटर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते तलावात सोडण्यात येणार आहे. पवई तलावात मगर, मासे आणि इतर जीव आहेत. त्याच बरोबर अनेक पानवनस्पती आहेत. त्याच बरोबर अनेक पक्षी या तलावावर आपल्याला दिसून येतात. मात्र या तलावात आजू बाजूच्या परिसरातून सांडपाणी सोडल्याने या जैव वैविध्यतेचे मोठे नुकसान होत होते. या बाबत विविध निसर्गप्रेमी संस्थांनी तक्रारी केल्यावर पालिकेच्या वतीने येथे सोडले जाणारे सांडपाणी आता योग्य ठिकाणी वळविण्याचे काम सुरू असून मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. आता या सांडपाण्यावर उपाय योजना होणार असल्याने या तलावातील जैववैविध्यतेचे रक्षण होणारआहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 24, 2026 16:02:06
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 15:03:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधी च्या जमिनी बळकावली असल्याचा आरोप केलाय... त्यांचा ड्राइवर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबनामा करून त्या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला होता. अंबादास दानवे यांनी केलेले या सर्व आरोपांना आता संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी उत्तर दिला आहे. आपण असला कोणताही हिबानामा केला नसून आपल्या बाबत दानवेंनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आपण आता दानवेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून, तशी नोटीस देखील त्यांना पाठवणार असल्याचा जावेद यांनी म्हटले आहे. तर अंबादास दानवे यांनी उल्लेख केलेले गट नंबरच त्या गावात अस्तित्वात नसल्याचा दावा जावेद शेख यांच्या वकिलांनी केला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 24, 2026 14:30:48
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 24, 2026 14:04:00
Yeola, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड मध्ये भरदुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे.चांदवड-निफाड रस्त्याने मुलांना शाळेतून घेण्यासाठी पायी जात असतांना भरधाव जाणा-या क्रेटा कारने स्वाती कृष्णा कुंभार्डे या २९ वर्षीय महिलेसह एका दुचाकी स्वाराला चिरडल्याने त्यात महिलेचा जागीच म-त्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला,पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी जखमीला पोलिस व्हॅन मध्ये टाकून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले,दरम्याने अपघाता नंतर कार चालक मात्र गाडी गाडी घेऊन फरार झाला,गणूर,परसूल,भाटगाव मार्गे तो मुंबई-आग्रा महामार्गावर पोहचला आणि मालसाने येथे गाडी सोडून फरार झाला विशेष म्हणजे कारचे एक टार फुटलेले असतांना भरधाव वेगाने तो घटनास्थळावरुन पळून गेला.दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.या घटनेमुळे चांदवड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 24, 2026 14:02:12
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं आहे. एका दलालामार्फत तो आपल्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे. आरोपी पित्याचा शोध घेतला जात आहे. नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. तेव्हा १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता यामागे याच मुलींचा नराधम बाप असल्याचं उघड झालं. મેળવलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहणारा हा नराधम पिता आपल्याच मुलींचा सौदा करत होता. याप्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत असून, नराधम पिता फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 24, 2026 13:36:01
0
comment0
Report
Advertisement
Back to top