445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर में शिवसेना स्थापना दिवस पर शिंदे समर्थनीय जश्न, राजेश क्षीरसागर ने नेतृत्व किया समारोह
Kolhapur, Maharashtra:शिवसेनच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरात शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत जिलेबिच वाटप करण्यात आल आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात डान्स देखील केला, तर महिलांनी फुगडीचा फेर देखील धरला. यावेळी बोलताना शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे. मूळचे ते आमचे सहा खासदार आहेत चुकून ते तिकडे गेले होते, ते परत शिवसेनेत आलेत अशी प्रतिक्रिया दिली.0
0
Report
रत्नागिरी की नदियाँ सूखी, मॉनसून देरी से आया, गर्मी ने हालात बिगाड़े
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी पावसाअभावी घटली.. उष्णतेच्या तडाख्याने शास्त्री,सोनवी,मुचकुंडी,वाशिष्ठी,कोदवली नद्यांची पात्रे आटली.. जून महिन्याचा पंधरावा संपला तरी अद्याप रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सून ने दमदार हजेरी लावलेली नाही.. सुरुवातीला काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कडक ऊन पडत आहे.. या कडक उष्णतेच्या लाटेमुळे आणि पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे.. नद्यांचे पात्र कोरडे पडू लागले आहेत.. त्यामुळे आणखी पाऊस लांबला तर सर्वच नद्यांची पात्रे कोरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे..0
0
Report
नाशिक में पानी की भारी कमी, 659 ग्रामों को टैंकर से पानी दिया जा रहा
Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई अधिक तीव्र - 659 गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा - १८२ टँकरने 382 फेरांद्वारे पाणीपुरवठा सुरू - 31 ऑगस्ट पर्यंत पाणी वापरण्याचे प्रशासनासमोर आव्हान - जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 22 ते 23 टक्के पाणीसाठा शिल्लक - तर धरणातून अवैध उपसा करणाऱ्याांवर केली जाणार कारवाई - अवैध उपसा करणाऱ्याांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पथकाची स्थापना0
0
Report
Advertisement
सोलापुर में छह सांसदों के फुटी के विरोध पर शिवसेना के शिवसैनिकों का उग्र प्रदर्शन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - खासदार फुटी नंतर सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक. सोलapurात सहा खासदाराच्या फुटीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक. सहा खासदारांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या नावाने करण्यात आले पिंडदान. सहा खासदारांच्या कृत्याचा तीव्र शब्दात करण्यात आला निषेध. शहरातील गणपती घाट परिसरातील दशक्रिया विधीच्या जागी शिवसैनिकांचे आंदोलन. फुटीर खासदारांना सोलापूर जिल्ह्यात फिरून न देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा इशारा.0
0
Report
रत्नागिरी ने 2025-26 सीजन में सबसे अधिक समुद्री कासव घरटे दर्ज कराए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी ठरले कसवांचे माहेरघर.. हजारो पिल्ले झेपावली समुद्रात.. महाराष्ट्र शासनाचा कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्रांच्या संयुक्त प्रयत्नांना यंदाच्या २०२५-२६ हंगामात मोठे यश आले आहे.. राज्यातील ५६ समुद्रकिनारांवर राबविण्यात आलेल्या ऑलिव्हरीडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण १ हजार ७२४ घरट्यांची नोंद झाली..यातून तब्बल १ लाख ८ हजार ५९६ पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले.. या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.. रत्नागिरीत सर्वाधिक ९६४ घरटे नोंदवली गेली असून तब्बल ५४ हजार २२७ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले..0
0
Report
कोयना डैम के जलसाठे में स्टंटबाजी: गाड़ियाँ फंसीं, क्रेन से निकाली गईं
Satara, Maharashtra:सातारा -महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या जलसाठ्याने यंदा तळ गाठला आहे. जून महिना अर्धा संपला तरी पावसाने दडी मारल्याने धरणाचे पात्र अनेक ठिकाणी पूर्णपणे कोरडे पडले आहे.याच ठिकाणी काही हौशी पर्यटकांकडून स्टंटगिरी केली जाते आहे .असाच थरार हौशी पर्यटकांच्या चांगलाच अंगलट आला. धरणाचे पात्र वरून कोरडे दिसत असले तरी खाली असलेल्या दलदलीत अनेक महागड्या गाड्या रुटून बसल्या. या गाड्या बाहेर काढण्यासाठी आधी ट्रॅक्टर मागवण्यात आला, परंतु तो ट्रॅक्टरही या गाळात फसला. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर क्रेन पाचारण करून ही सर्व वाहने गाळातून बाहेर काढावी लागली. नेटकऱ्यांनी या घटनेचे व्हिडिओ शेअर करत अशा स्टंटबाजीवर चिंता व्यक्त केली आहे...0
0
Report
Advertisement
सतारा के पुसेगांव में एटीएम चोरी: सीसीटीवी में ब्रेज़ा कार से घटना
Satara, Maharashtra:पुषेगाव, सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवडी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. एटीएममधून किती रक्कम चोरीला गेली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. बँकेचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, एटीएम असलेल्या इमारतीतील रहिवाशांना संशयास्पद आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. संबंधित वाहन दहिवडीपर्यंत गेल्याची माहिती असून त्यानंतर ते फलटणच्या दिशेने निघून गेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी ब्रेजा कारचा वापर केल्याचे दिसून आले असून वाहनाचा क्रमांक शोधण्याचे आणि आरोपींचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
शिवसेना के उद्धव ठाकरे समर्थकों ने अम्बाबाई मंदिर में आरती, कार्यकर्ता बोले—साथ खड़े हैं
Kolhapur, Maharashtra:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आरती करण्यात आलीय। पक्षाच्या संकटात देखील उद्धव ठाकरे यांना लढण्याची ताकद दे असं साकडं करवीर निवासिनी अंबाबाईला घातलंय। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य घरातील तरुणांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री केले...त्याच पद्धतीने पक्षाचे काम करत असताना उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वसामान्य तरुणांना ताकद दिली, पण निवडून आल्यानंतर अनेकांनी धोका देत पक्षांतर केले. पण महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी दिली आहे0
0
Report
नालासोपारा में जैन मुनियों के लिए सफेद पट्टी विवाद: पुलिस ने कराया समझौता
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात जैन मुनींसाठी काढलेल्या पांढऱ्या पट्टीवरून वाद; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वादावर निघाला तोडगा नालासोपारा : मुंबईतील विद्याविहार परिसरातील व्हाईट लाईन वादानंतर आता नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर टॉवर सोसायटीतही असाच प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारात जैन मुनींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगविण्यात आल्यााची माहिती मिळताच मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा व पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक आणि सामायिक जागेत रहिवाशांची संमती न घेता धार्मिक कारणांसाठी अशा प्रकारे रंगकाम करण्यात आल्याचा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी नोंदवला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधितांना पांढरी पट्टी हटवून मूळ स्थिती कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रात्रीच पांढऱ्या रंगावर काळा रंग मारून ती पट्टी मिटविण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे संभाव्य वाद टळला असून परिसरात शांतता कायम आहे.0
0
Report
Advertisement
विरार में FSSAI की दबिश के बादExpired सामग्री सड़कों पर फेंकने का मामला सामने
Vasai-Virar, Maharashtra:विरार मध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे हॉटेल चालक आणि दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे..अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने विरार पश्चिमेच्या आगाशी परिसरात मुदत संपलेले लोणी आणि बुरशी लागलेले नूडल्स रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे... डिसेंबर 2025 ही मुदत असलेली हे ही सर्व पाकिटे होती, अलीकडेच अन्न व औषध प्रशासनाने वसई-विरार परिसरातील विविध हॉटेल्स, गोदामे आणि दुकानदारांवर धाडी टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठीच हा साठा गुपचूप रस्त्यावर फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी सांगितले की, रस्त्यावर फेकून दिलेले हे खाद्यपदार्थ गायी, म्हशी, कुत्रे, पक्षी व इतर भटक्या प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांना विषबाधा होऊन मृत्यूही होऊ शकतो. यामुळे सार्वजनिक आरोग्यासह पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.0
0
Report
बीड़ के आंबाचोंडी माता परिसर में मोर का मनमोहक नृत्य; जनता मंत्रमुग्ध
Beed, Maharashtra:बीड: आंबाचोंडी माता परिसरात मोराचा मनमोहक नृत्याविष्कार; नागरिक मंत्रमुग्ध ANC - बीडच्या धारूर येथील आंबाचोंडी माता परिसरात मोराने पिसारा फुलवून केलेला मनमोहक नृत्याविष्कार नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. निसर्गरम्य वातावरणात घडलेल्या या सुंदर दृश्याचे व्हिडिओ चित्रीकरण रोहन हजारी यांनी केले. मोराचा डौलदार पिसारा आणि आकर्षक हालचालींमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे. या प्रसंगातून वन्यजीव व निसर्गसंवर्धनाचा संदेशही अधोरेखित होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.0
0
Report
उल्हासनगर में बैनर लगाते समय बिजली का झटका: युवक की मौत
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील खेमानी चौकातील कॅनरा बँकेसमोर वाढदिवसाचा बॅनर लावत असताना विजेचा धक्का लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रवी मोरे या युवक रात्री सुमारास विजेच्या खांबावर चढला होता. यावेळी त्याच्या पायाचा संपर्क विद्युत वाहिनीशी आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्यामुळे तो खाली असलेल्या पत्र्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत रवी मोरे याला खाली उतरवलं आणि टेम्पोच्या साहाय्याने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी मीरा रुग्णालयात हलविण्यात आला. रवी मोरे हा कल्याणमधील खडेगोळवली परिसरातील रहिवासी असून तो बॅनर लावण्याची कामं करत होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून,0
0
Report
Advertisement
भीमाशंकर मंदिर में दर्शन के लिए ऑनलाइन पास की बाध्यता शिथिल, भक्तों की भीड़ बढ़ी
Shirur, Maharashtra:श्री क्षेत्र भीमाशंकरात आजपासून ऑनलाइन पासची सक्ती शिथिल करून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. धुक्याच्या वातावरणात अनेक वाहनेही भीमाशंकरकडे दाखल झाली. मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे सध्या सकाळी ७ ते ११ या चार तासांदरम्यानच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना पहाटेच येथे पोहोचावे लागत आहे. सर्वसामान्यांना दर्शनाची संधी उपलब्ध झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मर्यादित वेळेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
महिलाओं के हाथ में घर का नियंत्रण, यही सफलता की कुंजी: पाटील ने कहा
Ambegaon, Maharashtra:महिलांच्या व्यवस्थापन कौशल्याला आणि पाककलेला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अनोख्या शैलीत सलाम केला. “ज्या घराचा कारभार महिलेच्या हातात, तो कारभार सर्वात उत्तम,” असे सांगत त्यांनी महिलांच्या निर्णयक्षमता, संसार सांभाळण्याची कला आणि स्वयंपाकातील हातोटीचं तोंडभरून कौतुक केलं. याचवेळी ‘मॅगी-पिझ्झा’सारख्या पाश्चात्य खाद्यसंस्कृतीवर टीका करत, घरच्या शेवया, लोणचं आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचं महत्त्व अधोरेखित केलं. पुणे जिल्हा बँकेच्या राजगुरुनगर येथील कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महिलांच्या व्यवस्थापन कौशल्याचा गौरव केलं घरातील अर्थकारणापासून स्वयंपाकघरापर्यंत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद करत मोजमाप न करता केवळ अंदाजाने जेवणाला चव आणणाऱ्या गृहिणींची तुलना त्यांनी कोणत्याही मोठ्या व्यवस्थापकांशी केली. पाश्चात्य खाद्यपदार्थांच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं. महिलांच्या कष्ट, त्याग आणि कौशल्यामुळेच कुटुंबव्यवस्था भक्कम राहते, अशा शब्दांत त्यांनी महिलांना अभिवादन केलं.0
0
Report
भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना विजयाचा विश्वास; काँग्रेसच्या भूमिकेवर संशय
Amravati, Maharashtra:भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना विजयाचा विश्वास; संविधानाबद्दল काँग्रेसची भूमिका संशयास्पद, प्रवीण पोटे यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत आपल्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस हा सुज्ञ लोकांचा पक्ष असल्याचे सांगतानाच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत काँग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. गुप्त मतदानाच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतानाही काँग्रेसने कुणालाही मतदान करू नये अशी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असतानाही पक्षाने तटस्थ राहण्याचे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मतदान करणाऱ्या सर्व मतदारांनी संविधानाचा विचार करून मतदान केल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच या निवडणुकीत आपल्या विजयाची खात्री असल्याचा दावा करत नगरसेवकांनी सर्वपक्षीय पातळीवर सहकार्य केल्याचेही प्रवीण पोटे यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
