445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आषाढ़ीवारी के लिए 1300 करोड़ का आराखड़ा मंजूर, 964 करोड़ स्वीकृत; 5000 मोबाइल शौचालय तैयार
Pandharpur, Maharashtra:मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीच्या पूर्व तयारी निमित्त बैठक घेतली आहे. पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विकास कामांसाठी एक हजार तीनशे तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी 964 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन्ही पालखी मार्गावरील स्वच्छता गृहासाठी सेफ्टी टॅंक, कमानीचे बांधकाम, जमीन सपाटीकरण, हायमास्ट पोल, संरक्षक भिंतीच काम, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे कामे पूर्ण झाली आहेत. मागील वर्षी जर्मन हँगर व्यवस्था केली होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या निवाऱ्याची चांगली सोय झाली होती. यंदाही अतिरिक्त प्रमाणात जर्मन हँगर ची संख्या वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. पालखी मार्गावर यंदा 5000 फिरती शौचालय पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.0
0
Report
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष ने नवी मुंबई जनसुनावणी में महिला सुरक्षा पर जोर दिया
Navi Mumbai, Maharashtra:story slug - महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत समिती आणि स्थानिक समितीचे सक्षमीकरण काळाची गरज;- विजय रहाटकर ftp slug - nm mahila surksha shots- byet- vijaya rahatkar reporter- swati naik navi mumbai anchor: महिलांना कामाच्या ठिकाणे सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, यासाठी 'अंतर्गत समिती' आणि 'स्थानिक समिती यांचे सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. कायदा मजबूत आहे, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संस्थांनी केवळ ऑडिट करून न थांबता 'पोस्ट ऑडिट'वर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नवी मुंबईत केले. vo 1- महिलांना आपल्या तक्रारी घेऊन दिल्लीपर्यंत येणे शक्य नसते, ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने 'जनसुनावणी' हा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी नवी मुंबईतील सिडको भवन येथे कोकण विभागाची जनसुनावणी पार पडली. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील महिलांच्या कौटुंबिक समस्या, मालमत्तेचे वाद आणि छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी विजया रहाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महिलांच्या प्रश्नांवर प्रशासन आणि संस्थांच्या संवेदनशीलतेवर विशेष भर दिला. बाईट- विजया राहटकर- राष्ट्रीय महिला आद्यक्षा vo2-अमरावती येथील प्रकरणाचा उल्लेख करताना रहाटकर यांनी सांगितले की, "मी स्वतः या प्रकरणाचा आढावा घेतला असून पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पीडित मुलींनी न घाबरता पुढे यावे, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. आपण सर्वांनी मिळून लढा दिला, तरच दोषींना कठोर शिक्षा मिळेल. असे स्पष्ट केले. बाईट- विजया रहाटकर- आद्यक्षा vo2- देशभरातील २०० जिल्ह्यांमध्ये स्थानिक समित्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. तक्रार करणाऱ्या महिलांना केवळ न्याय नव्हे, तर संवेदनशीलता आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक. महिलांच्या प्रश्नांमध्ये केवळ आयोगच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेने संवेदनशील राहून एकत्र काम करण्याची गरज आहे. काही त्रुटी असल्या तरी संपूर्ण व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील जनसुनावणीत एकूण ८० नोंदणीकृत तक्रारीपैकी ५२ तक्रारी पोलिसांनी सुनावणी पुर्वी निकाली काढल्याने २८ आणि सुनावणी दरम्यान आलेल्या ३५ अशा एकूण ६३ तक्रारीवर थेट सुनावणी झाली. बाईट- विजया रहाटकर - आद्यक्षा0
0
Report
धाराशिव में अनियमित वर्षा ने किसानों की द्राक्ष-आम बागें तबाह
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा तुळजापूर-धारूर भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष व आंबा बागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून द्राक्ष आणि आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हातात आलेले पीक वाऱ्याने व गारांनी जमीनदोस्त झाले. प्रशासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर के बल्लारपूर में टीवीएस शोरूम गोदाम में भीषण आग, 25 बाइक जलकर खाक
Chandrapur, Maharashtra:दुचाकींच्या गोदामाला भीषण आग , 25 वाहने जळून खाक , चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील घटना. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील टीव्हीएस शोरूमच्या गोदामात दुपारी भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, दूरवरूनही धुराचे लोट दिसत होते. बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर काटा गेटजवळ मलिक मोटर्सचे टीव्हीएस शोरूम आहे. या शोरूमच्या शेजारी त्यांचे गोदाम आहे. त्या गोदामात सुमारे २५ नवीन दुचाकी आणि ॲक्सेसरीज होत्या. गोदामाच्या बंद शटरमधून धूर निघताना दिसल्यावर अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले, पण तोपर्यंत आगीने गंभीर वळण घेतले होते. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत, शोरूमच्या गोदामातील सर्व माल, राखा झाला होत्या. अग्निशमन दलाच्या तीन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. धूर जवळच्या दुकानांमध्येही शिरला होता, सुदैवाने शेजारच्या दुकानांना आग लागली नाही. शोरूम मालकाच्या मते, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.0
0
Report
माधुरी मिसाल ने हिंजवड़ी IT पार्क की कंपनी पर धार्मिक प्रथाओं के आरोप लगाए
Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्याच्या नगर विकास परिवहन सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभाग मंत्री माधुरी मिसाळ यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील एक नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीवर गंभीर आरोप केलेत. नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील जेंट्स रेस्ट रूममध्ये एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधी करण्यात येतात आणि तिथे इतर कर्मचाऱ्यांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात येतात, असा गंभीर आरोप त्यांनी केلाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाकडे व्यक्त केली आहे.0
0
Report
नवी मुंबई में अतिक्रमण अधिकारी रिश्वत लेते पकड़े गए
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाशी संबंधित बिल प्रकरणात उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचार लचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कारभारावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में भ्रष्टाचार और महिला शोषण के खिलाफ कोयला कर्मियों का आंदोलन
Chandrapur, Maharashtra:भ्रष्टाचार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाविरोधात चंद्रपुरात कोळसा कर्मचाऱ्यांचं आंदोलन चंद्रपूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक कोळसा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक असून जवळजवळ 20 हजार कर्मचारी वेकोली या सरकारी कोळसा कंपनीत काम करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून वेकोलीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारासोबतच महिला कर्मचाऱ्यांचं शोषण केल्या जात असल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे.0
0
Report
गोडावऊन दस्तावेज़: रिकॉर्ड सुरक्षित रखने का दावा, अफवाहों पर लगाम
Shirdi, Maharashtra:समता नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोडावूनमधील कागदपत्रांवर अधिकृत खुलासा...पत्रकाद्वारे खुलासा 40 वर्षांची सेवा, लाखो ग्राहकांचा विश्वास असल्याचा दावा... पूरस्थितीच्या धोक्यामुळे महत्त्वाचे रेकॉर्ड 2 ते 3 सुरक्षित ठिकाणी हलवले... अकाउंट ओपनिंग फॉर्म, कर्ज फाइल्स, स्टेशनरीसह इतर कागदपत्रांचा समावेश.. निवारा येथे स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार करून कागदपत्रे सुरक्षित ठेवल्याची दिली माहिती... सप्टेंबर 2025 च्या पुरानंतर काही कागदपत्रे तातडीने स्थलांतरित.. सर्व रेकॉर्ड स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्येही सुरक्षित जतन केल्याचा दावा... गोडावूनमधील कागदपत्रांमध्ये कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नसल्याचे स्पष्टीकरण... काही अपप्रवृत्तींनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप... ग्राहकांनी афवांवर विश्वास ठेवू नये, विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन...0
0
Report
अकोला में सरकारी हड़ताल के बीच लग्न की नोंदणी: दूल्हा-दुल्हन ने कार्यालय-प्रवास किया
Akola, Maharashtra:लग्न म्हटलं की ढोल-ताशा, फुलांची सजावट आणि आनंदाचा जल्लोष… पण अकोल्यात एका लग्नाची गोष्ट थोडी वेगळीच ठरली. इथे नवरा-नवरीने लग्नाच्या मंडपाऐवजी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच फेऱ्या मारल्या! सोलापूरचा वर आणि अकोल्याची नवरी… दोन्ही कुटुंबांनी ठरवलं – “थेट नोंदणी विवाह करूया!” ऑनलाइन अर्जही भरला, 21 एप्रिलची तारीखही फिक्स… सगळं प्लॅनिंग रेडी! पण म्हणतात ना… “लग्नात काही ना काही ट्विस्ट असतोच!” ट्विस्ट होता – कर्मचाऱ्यांचा संप! लग्नासाठी सजून-धजून आलेले वर-वधू आणि वऱ्हाडी मंडळी थेट नोंदणी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले… पण तिथे मिळालं एकच उत्तर –“आज लग्न होणार नाही!” मग काय… नवरी-नवरदेवाने मंडपाऐवजी ऑफिस ते ऑफिस अशी फेरी सुरू केली!नोंदणी कार्यालयातून थेट जिल्हाधिकारी कार्यालय… तिथून अधिकाऱ्यांकडे… अगदी जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटले, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हतबलता दाखवली. पण शेवटी… ना मंगलाष्टक, ना हार… फक्त फाईल आणि चकरा..एकीकडे सरकार नोंदणी विवाहाला प्रोत्साहन देतंय…आणि दुसरीकडे, तारीख मिळूनही “संप”मुळे लग्नच होत नसेल, तर नवरा-नवरीने काय करायचं?आता या जोडप्याची अवस्था अशी झाली की “लग्न झालं नाही… पण सरकारी कार्यालयांची सगळी टूर मात्र पूर्ण झाली!” अकोल्यात लग्नाचा मुहूर्त ठरला… पण ‘सरकारी संप’ने अडथळा लागावा अशी गमतीदार चर्चा परिसरात रंगू लागली आहे.0
0
Report
Advertisement
पुणे की बहुराष्ट्रीय कंपनी में विश्राम कक्ष के धार्मिक उपयोग की जांच शुरू
Pune, Maharashtra:पुण्यातील त्या कंपनीच्या विश्रांती कक्षाच्या वापराबाबत चौकशी करा नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच पुणे पोलिस आयुक्तांना पत्र हिंजवडीतील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विश्रांती कक्षाचा विशिष्ट समाजाकडून धार्मिक विधीसाठी वापर? हिंजवडी परिसरातील कंपन्यांमध्ये विश्रांती गृहांचा वापर नियमित धार्मिक विधीसाठी होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत ही परिस्थिती खरी असेल तर इतर कर्मचाऱ्यांच्या समान hakkk आणि संस्थात्मक शिस्तीवर गंभीर परिणाम होत आहे संबंधित कंपन्यांमध्ये होत असलेल्या ह्या गोष्टींवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करा नाशिक येथील एका कंपनीत झालेल्या धर्मांतराच्या गंभीर घटनेचा दाखला देत माधुरी मिसाळ यांनी पोलिस आयुक्तांना दिलं पत्र मागच्या आठवड्यात पुणे आणि परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मिसाळ यांनीच घेतला होता पुढाकार तर आता नाशिकप्रमाणेच पुण्यातल्या आय टी क्षेत्रात कोणतीही चुकीच्या घटना घडू नये यासाठी वेळीच दक्ष राहण्याच्या पोलिसांना पत्र लिहून केली मागणी0
0
Report
पुणे के आप्पा बालवंत चौक पर PMPML बस दुकान में घुसी, हड़कंप
Pune, Maharashtra:पुणे आप्पा बळवंत चौकात PMPML बसचा अपघात रस्ता सोडून बस दुकानात घुसली ! पुणे: पुण्यातील अत्यंत वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या आप्पा पळून चौकामध्ये पुण्याची जीवन वाहिनी समजले आहे रस्ता सोडून पीएमपीएमएलची बस चक्क दुकानात घुसल्याचे चित्र पाहायला मिळाले. लग্নपत्रिकेच्या दुकानामध्ये कामगार काम करत असताना अचानकपणे बस रस्ता सोडून दुकानाच्या दिशेने वेगाने येताना दिसली. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने घाबरून दुकानाच्या मागच्या भागात धाव घेतली आणि धडाम असा आवाज झाला. या सगळ्यांमध्ये एक दुचाकी चकना चूर झालेली पाहायला मिळाली. दुकानदाराने माझे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. प्रत्यक्ष दर्शिणच्या सांगण्यानुसार बाजूने टँकर असल्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला परंतु नियंत्रण सुटले आणि बस थेट दुकानात घुसली. असे सगळे अंदाज बांधले जात असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीला सुरुवात केली आहे. बस चालकाचे मेडिकल केले जाणार असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर बाजीराव रोडवर ट्राफिक आस्था व्यस्त पाहायला मिळाली. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
पुणे मुलशी में रिंग रोड के लिए किसान की जमीन कब्ज, मुआवजे की मांग
Pune, Maharashtra:मुळशी, पुणे - पुण्याच्या मुलशी तालुक्यातील रिहे गावात रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या कारवाईदरम्यान एका पशुपालक शेतकऱ्याचे बांधकाम कोणताही मोबदला न देता जमीनदोस्त करण्यात आल्याचा शेतकऱ्याचा आरोप. सलग दुसऱ्या दिवशी शिंदे यांच्या उर्वरित घर आणि गोठ्यावर पोलिस बंदोबस्तात बुलडोझरने कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान उद्विग्न झालेल्या शिंदे ने घर तसेच सोडून दिले. गोठ्यातील गाई, घरातील साहित्य तसेच ठेवून “आता कुठेही झाडाखाली राहू” असे त्यांनी भावनिक वक्तव्य केले. यावेळी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीय अक्षरशः हतबल होऊन रडताना दिसले. रिहे गावचे पशुपालक शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांची सर्वे क्रमांक 578/4 मधील जमीन रिंग रोड प्रकल्पासाठी बाधित झाली आहे. शिंदे कुटुंब गेल्या 70 ते 80 वर्षांपासून ही जमीन कसत असून सातबाऱ्यावर त्यांची मालकी आहे. या जागेत त्यांनी आरसीसी घर, गोठा, दोन खोल्या आणि कुक्कुटपालन शेड उभारले असून गोठ्यात 15 गाई असल्याची माहिती त्यांनी दिली. काही हरकतींमुळे ही जमीन न्यायालयीन वादात असून आतापर्यंतचे निकाल आपल्या बाजूंना लागल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अद्याप कोणताही मोबदला त्यांना मिळालेला नाही. शिंदे यांच्या मते, संबंधित जमीन न्यायाप्रविष्ट असताना आणि आपल्या बाजूने निकाल लागण्याची आशा असतानाही प्रशासनाने कोणतीही दया न दाखवता कारवाई केली. त्यांनी किमान दोन दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती, मात्र तीही नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या कुटुंबासमोर निवाऱ्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बाधित शेतकऱ्याला तातडीने मोबदला आणि पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून बाधित शेतकऱ्याला न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में 34 नाबालिग माताओं के जन्म का रहस्य उजागर: प्रशासन और अस्पतालों पर सख्त कार्रवाई
Solapur, Maharashtra:सोलापुरात 34 बालमाता असल्याचा धक्काादायक प्रकार उघडकीस खाजगी संस्थेने माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत अनेक धक्काादायक खुलासे अल्पवयीन मुलींच्या सासर माहेरचांसह तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल महापालिका आरोग्य केंद्रासह अनेक खाजगी रुग्णालयांचा सदरच्या प्रकारात सक्रिय सहभाग सोलापूर जिल्हा हादरवून सोडणारे घटना समोर आलीय. सोलापूर महानगरपालिकेच्या काही आरोग्य केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल, महिला शासकीय रुग्णालय यासह अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये 34 अल्पवयीन मुली बाळंत झाल्याची धक्कादायक घटना दोन वर्षांनंतर समोर आलीय. मोहोळ मधील सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीवरून सोलापूर शहर पोलीस आता अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांसह, पती, सासू-सासरे, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांच्यावर थेट गुन्हे दाखल करत आहेत. सदर प्रकरणाबाबत शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले असून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील जेलरोड, जोडभावी, एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हे तब्बल 10 गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूर शहर पोलीस यांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे 9 एप्रिल 2026 रोजी मोहोळच्या एका सामाजिक संस्थेचे पत्र प्राप्त झाले. या पत्राची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय. बाईट - एम. राजकुमार ( पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ) सदर घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठे खळबळ माजली असून अत्यंत गंभीर प्रकरण हे एका सामाजिक संस्थेने उघड केलीय. तसेच पोलीस आयुक्तांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या विषयात लक्ष घालून दहा गुन्हे दाखल करण्याच्या दत्तक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही आणखी गहाईक तपासाची मागणी केलीय. सदर घटनेमध्ये बालमातेचा संसार जरी सुखाचा सुरू असला तरी त्यांनी कायदा मोडला आहे त्यामुळे यात अल्पवयीन विवाहितेच्या पती विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतोय. पुढील दोन दिवसांमध्ये आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. राज्य बालहक्क आयोगाने देखील लक्ष घातले असून संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकारींचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती समोर येतेय. 34 अल्पवयीन मुली बाळंत झाल्याच्या घटनेमध्ये मुलींचे सासर किंवा माहेर हे सोलापूर नाही तरी देखील उपचार येथेच घेतल्याने अनेक चर्चांना उधाण येतेय. सोलापूर महानगरपालिकेच्या दाराच्या प्रसूतीगृहामध्ये अनेक वेळा अल्पवयीन मुली बाळंत झाल्याने सदर ठिकाणी कोणते रॅकेट चालते की काय याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे...0
0
Report
गर्मी से सांगली जिले के जलाशयों में 25% पानी घटा; स्टोरेज 39% बचा
Sangli, Maharashtra:स्लग - बढ़ते गर्मी के कारण जिल्ह्यातल्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात 25 टक्क्यांची घट.. अँकर - सांगली जिल्ह्यातल्या साठवण तलावाच्या पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाणीसाठ्यात 25 टक्क्यांची घट झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 83 प्रकल्प साठ्यांमध्ये सध्या 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी 29 टक्के पाणीसाठा हा एप्रिल महिन्यामध्ये शिल्लक होता. गत वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाण्याचा साठा अधिकचा जरी असला तरी संभाव्य मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील 197 गावांना पाणीटंचाईचा फटका बसू शकतो, 77 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे,यासर्व प्रशासनाकडून 34 कोटी 80 लाखांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.0
0
Report
वाशीम में सरकारी कर्मियों की हड़ताल, पुरानी पेंशन और आयु 60 पर मांग
Washim, Maharashtra:जुनी पेन्शन योजना लागू करनेासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी,निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे,निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे तसेच भरतीवरील बंदी उठवणे अशा विविध मागण्या केल्या आहेत.या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
