445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कृष्णा नदी का जलस्तर अचानक बढ़ा; तीन बाँध डूबे, सांगली के गाँव सतर्क
Sangli, Maharashtra:कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र में पडणारा पाउस और कोयना धारनातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे, सांगलीतील आयुर्विन पुल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 24.6 इतकी झाली आहे. तर कृष्णा नदीवरील असणारे बहे, नागठाणे आणि सांगलीवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुथडी भरून कृष्णा नदी पुन्हा वाहू लागली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असून कोयना धरणाचा विसर्ग वाढवून रात्रीपासून 23 हजार 500 क्यूसेक करण्यात आला, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
जालना में भारी बारिश ने खरीप फसलों को बड़ी राहत दी
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा,पावसामुळे पिकांच्या वाढीस होणार मदत अँकर :जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग व उडीद या खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. जुलैअखेरपर्यंत झालेल्या बहुतांश पेरण्यांनंतर पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल. पিকांची वाढ जोमदार होईल. मूग-उडीदाची फुलधारणा चांगली होईल. विहिरी, कूपनलिका, शेततळी तसेच लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाणीस्थित्यात वाढ झाली आहे. पुढील काळात संरक्षित सिंचनासाठीही पाणी उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.0
0
Report
बारिश से कृष्णा व कोयना नदी में बाढ़, सातारा में जलस्तर उफान पर
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. या विसर्गामुळे आणि पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्या दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली आहे. या स्मशानभूमीतील अग्नी कुंड पाण्यात बुडाली आहेत. त्याचबरोबर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवत तो 23 हजार क्युसेक पर्यंत नेण्यात आला आहे. त्याचबरोबर उरमोडी, कण्हेर आणि धोम धरणातूनदेखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा कोयना, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहतायत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
पंढरपुर में भीमा नदी का जलस्तर बढ़ा, 60-70 परिवारों के स्थानांतरण की तैयारी
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दुपारनंतर सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरणार असल्याने प्रशासनाकडून 60 ते 70 कुटुंंबांच्या स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसानंतर भीमा नदीवरील उजनी धरण आणि नीरा नदीवरील वीर धरण 100 टक्के भरले असल्याने पूर नियंत्रण करण्यासाठी भीमा आणि नीरा नदीतून अनुक्रमे 80 हजार क्युसेक आणि 63 हजार क्यूसेक असा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे त्यामुळे पंढरपूर मध्ये दुपारनंतर भीमा नदीच्या पात्रात अंदाजे एक लाख तीस हजार ते 40 हजार क्युसेक पाणी वाहणार आहे यामुळे अंबाबाई झोपडपट्टी व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे पंढरपूर तहसील पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने येथील कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने वाळवंटातील सर्व मंदिर पाण्यामध्ये बुडाले आहेत नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरत आहे यामुळे शेतीचेही नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.0
0
Report
यवतमाळ में निळोणा डैम ओवरफ्लो: पर्यटक पानी के दृश्य देखने उमड़े
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निळोणा नंतर आता चापडोह धरण देखील लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. दरम्यान निळोणा ओव्हरफ्लो चे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी अनेकांनी धरणाकडे धाव घेतली. ओव्हरफ्लो मुळे खळखळ वाहणाऱ्या वाघाडी नदी आणि धरणातील पाणी साठ्याच्या काठावर बसूनही पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. यवतमाळ शहरापासून 11 किमी अंतरावर असलेल्या व निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी यवतमाळकरांची मागणी आहे.0
0
Report
भंडारा के मोहाड़ी नगरपंचायत उपाध्यक्ष के विरुद्ध अविश्वास प्रस्ताव बहुमत से मंजूर
Bhandara, Maharashtra:Anchor : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या सभेला उपाध्यक्ष सचिन गायधने हे अनुपस्थित होते. अविश्वास ठरावावर झालेल्या मतदानात १४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर केवळ १ नगरसेवकाने ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे स्पष्ट बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. उपाध्यक्ष सचिन गायधने हे सभेला अनुपस्थित असले तरी नियमानुसार मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.0
0
Report
Advertisement
अमरावती में भारी बाढ़: 39 तहसीलों में अतिवृष्टि, 1092 घर नुकसान, दो मौतें
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; 39 महसूल मंडळात अतिवृष्टी, 1092 घरांची पडझड, दोघांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून या आपत्तीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेड अलर्टदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे सुमारे 38 हजार हेक्टरवरील शेती पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बेंबळा नदीसह परिसरातील साखळी नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे 1,092 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला वेग दिला असून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
कोयना बांध में मुसलाधार बारिश से जलस्तर बढ़ा, रात 12 बजे दरवाजे खोले
Satara, Maharashtra:सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री १२ वाजत्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटांवरून ४ फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामधून २२ हजार ४७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीपात्रात एकूण २३ हजार ५२० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.0
0
Report
गोदावरी नदी के बीच सराला बेट मानसून में हरियाली और मंदिर से भरा पर्यटन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर, गोदावरी नदीच्या प्रवाहात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम आविष्कार घडवते. यंदाच्या मान्सूनमधील ५९ दिवसांच्या पावसानंतर चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, दाट हिरवळ आणि बेटाच्या मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल यामुळे सराला बेटाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच निसर्ग, भूगोल आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हे ठिकाण मराठवाड्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. श्रद्धेचे केंद्र असलेल्या या बेटावर जैववैविध्याचीही समृद्ध परिसंस्था पाहायला मिळते. गोदावरीच्या सततच्या प्रवाहामुळे येथे सुपीक गाळ साचतो, त्यामुळे बेटाभोवती हिरवाई आणि विविध वनस्पतींची समृद्ध वाढ झालेली दिसून येते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेले सराला बेट अधिकच मनोहारी दिसते. विशेष म्हणजे, ड्रोन किंवा आकाशातून पाहिल्यास गोदावरीचा विस्तीर्ण प्रवाह, सभोवतालची हिरवीगार शेती आणि मध्यभागी असलेले मंदिर यांचा मनमोहक मिलाफ पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतो. त्यामुळे सराला बेट हे श्रद्धा, निसर्ग आणि पर्यटन यांचा अद्वितीय संगम ठरते.0
0
Report
Advertisement
पुणे-इंदूर मार्ग के बस स्टॉप के पास गडढ़ा, पानी भी भरा; बस-यात्रा प्रभावित
Yeola, Maharashtra:येवला शहरातून जाणाऱ्या पुणे–इंदूर महामार्गालगत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला असून, पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दररोज हजारो प्रवासी तसेच अनेक एसटी बस आणि इतर वाहने याच मार्गाने बसस्थानकात ये-जा करतात. मात्र, अनेक दिवसांपासून हा खड्डा कायम असतानाही संबंधित प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गालगतच हा खड्डा असल्याने नाशिक सारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.0
0
Report
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार से नगरसेवकों की बैठक, 600 करोड़ निधि मांगी
Ahilyanagar, Maharashtra:बीड़ जिल्ह्याच्या दौऱ्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची भेट घेतली...आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवक सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी एकत्र आले होते, यावेळी नगरसेवकांनी विकास कामासाठी 600 कोटीच्या निधीची मागणी केली आहे... विकास कामासाठी लागणाऱ्या निधीच निवेदन सर्व नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांना दिल आहे जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात महापौर असून या महानगरपालिकेत निधी अभावी सध्या विकास कामाची गती कमी झाली आहे...नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या विकास कामाची माहिती देत असताना निधी अभावी काय कामे रखडले असल्याचं सांगत निवेदन देऊन भरीव निधी द्यावा अशी मागणी केली आहे... सुनेत्रा पवार यांनी देखील अजित दादांनी या महानगरपालिकेला चांगला निधी दिलेला आहे आणि यापुढेही शहरातील विकास कामासाठी आपण निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटल आहे.0
0
Report
रायगड़ जिले के किसानों को कर्जमुक्ति लाभ, पहली सूची में 7,544 लाभार्थी
Chendhare, Maharashtra:शेतकरी कर्जमुक्ती लाभाची प्रक्रिया वेगात ......12 हजार 682 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ ........ पहिल्या यादीत 7 हजार 544 पात्र शेतकऱ्यांना लाभ ........ अँकर - शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील शेतकयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, जिल्ह्यातील 12 हजार 682 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 7 हजार 544 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी आजपर्यत 1 हजार 980 इतक्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे उर्वरीत पात्र लाभार्थ्याने आपले आधार प्रमाणीकरण आणि अग्रिस्टेक तात्काळ करुन घेण्याचे अवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
अण्णाभाऊ साठे के भारतरत्न पर बहस तेज, समाज के आवाज़ बनते साहित्यकार
Sangli, Maharashtra:स्लग - "अण्णा भाऊ साठे : ज्यांचा गौरव सातासमुद्रापार,पण भारतरत्नाची प्रतीक्षा अजूनही कायम!" अँकर - आज आपण स्मरण करत आहोत अशा एका लोकशाहीराचे... ज्यांनी अक्षरशः रस्त्यावरून साहित्याच्या विश्वात झेप घेतली... ज्यांची लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी समाजाला आवाज मिळाला... ज्यांची शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ दिले... आणि ज्यांची साहित्याचा गौरव रशियापासून जगभर झाला...पण प्रश्न आजही कायम आहे...इतकं मोठं योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेना आजपर्यंत भारतरत्न का मिळालं नाही ? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... व्ही वो - १ ऑगस्ट...हा दिवस केवळ एका साहित्यिक जयंती नाही..तर हा दिवस आहे,संघर्षाचा... शोषित वंचित दिन दुबळ्यांचा कामगारांचा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या प्रेरणेचा...ते नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे... ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाशिवायही जगाला साहित्याची ताकद दाखवून दिली. व्ही वो - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव येथे एका छोट्याशा घरात अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला,जिथून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन संघर्षाच्या प्रवासाला सुरुवात झाली,तो संघर्ष अगदी मरेपर्यंत सुरू राहिला.. बाईट - मोहन साठे - ग्रामस्थ,वाटेगाव. व्ही बो - अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केलं. 'फकिरा'सारखी कादंबरी आजही मराठी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता,शेतकरी,कामगार,दलित,वंचित,आणि सामान्य माणसाचं आयुष्य.त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून त्यांची लोकप्रियता भारता बाहेरही पोहोचली. बाईट - प्रकाश साठे - ग्रामस्थ - वाटेगाव ( सफारी शर्ट ) व्ही वो - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास लिहिताना,अण्णा भाऊ साठेंचं नाव वगळणं अशक्य आहे.'लाल बावटा' कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी फिरत पोवाडे,लावण्या आणि लोकनाट्य सादर करत जनजागृती केली.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या शाहिरीने हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. बाईट - तानाजी साठे - ग्रामस्थ - वाटेगाव. बाईट - दीपक चव्हाण - ग्रामस्थ - वाटेगाव व्ही वो - अण्णाभाऊ साठेंचा गौरव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही.त्यांच्या साहित्याला सोव्हिएत रशियासह अनेक देशांत मान्यता मिळाली.त्यांच्या विचारांनी सीमा ओलांडल्या,पण विडंबना अशी की, जगभरात गौरव झालेल्या लोकशाहीर किंबहुना अण्णाभाऊच्या विचारांचा गौरव भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन का झाला असा सवाल साठे उपस्थित केला जातो. व्ही वो - दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न देण्याची मागणी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरावरून पुन्हा जोर धरते.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' सुरू करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.वाटेगाव येथे अण्णाभाऊंचे जीवन चरित्र शिल्प सृष्टीच्या माध्यमातून साकारले आहे, त्यांचं जन्म झालं ते घर देखील जतन केलं जात आहे.पण देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही अण्णा भाऊ साठेंचा गौरव व्हावा,हीच जनभावना आहे. End ऑफ - एका हातात डफ,दुसऱ्या हातात लेखणी, आणि मनात सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न,अशी ओळख असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी केवळ साहित्य निर्माण केलं नाही.तर समाजाला विचार,स्वाभिमान और संघर्षाची दिशा दिली...अश्या लोकशाहीर अण्णाभाऊनां भारतरत्न कधी मिळणार?0
0
Report
हेडगेवार निवास में विशेष डाक आवरण और मुहर का लोकार्पण
Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपूर येथील ऐतिहासिक निवासस्थान 'डॉ. हेडगेवार निवास नागपूर' याच्या विशेष आवरण, सूचना पुस्तिका आणि कव्हर, कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण आज झाले. यह अवसर पर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, राष्ट्रसेवा आणि व्यक्तिनिर्माणावर उद्बोधन केले. डॉ. हेडगेवार निवास पर आधारित विशेष आवरण, सूचनापુस्तिका एवं स्थायी सचित्र डाक मुहर का लोकार्पण नागपुर, 31 जुलाई 2026। भारतीय डाक विभाग, नागपुर द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक डॉ. केशव बलिराम हेडगेवार के ऐतिहासिक निवास "डॉ. हेडगेवार निवास, नागपुर" पर आधारित विशेष आवरण (Special Cover), सूचनापुस्तिका (Brochure) तथा स्थायी सचित्र डाक मुहर (Permanent Pictorial Cancellation) का लोकार्पण समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर अपने संबोधन में सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ने कहा कि डॉ. हेडगेवार और संघ एक-दूसरे से अभिन्न हैं। उनके जीवन में संघ कार्य और राष्ट्रकार्य के अतिरिक्त कोई दूसरा विषय नहीं था। इसी ऐतिहासिक भवन की ऊपरी मंजिल पर स्थित उनकी कोठरी में विजयादशमी के दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना हुई थी। उस समय संघ छोटा था, किंतु आज उसका कार्य देश-विदेश तक व्यापक रूप से पहुँचा है। उन्होंने कहा कि संघ के कार्य का विस्तार हुआ है और देश-विदेश में उसके प्रति उत्सुकता निरंतर बढ़ रही है। केवल जिज्ञासा ही नहीं, बल्कि मनुष्य निर्माण की संघ की कार्यपद्धति आज विकास के पथ पर अग्रसर अनेक देशों की आवश्यकता बनती जा रही है। व्यक्ति निर्माण की यह परिणामकारक पद्धति समाजों के लिए उपयोगी सिद्ध हो रही है। डॉ. भागवत ने कहा कि यह संघ के लिए गौरव का नहीं, बल्कि दायित्व और उत्तरदायित्व के बढ़ने का विषय है। संघ का कार्य राष्ट्रसेवा का कार्य है और संघ ने कभी प्रचार या प्रसिद्धि की अपेक्षा नहीं की। किंतु आज जब समाज और विश्व इसके प्रत्यक्ष परिणामों को देख रहा है, तब अनेक सज्जन लोग इसके विस्तार में सहयोग की भावना से आगे आ रहे हैं। उन्होंने भारतीय डाक विभाग का आभार व्यक्त करते हुए कहा कि विशेष आवरण, सूचनापुस्तिका एवं स्थायी सचित्र डाक मुहर जारी कर विभाग ने मनुष्य निर्माण के इस कार्य के प्रति अपनी सद्भावना व्यक्त की है। इससे संघ के कार्य और उसके उद्देश्य की जानकारी अधिकाधिक लोगों तक पहुँचेगी तथा समाज में इस कार्य को नई गति मिलेगी। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्र की अपेक्षाओं के अनुरूप चरित्रवान, सक्षम और सेवाभावी नागरिकों का निर्माण इस कार्य के माध्यम से और अधिक गति से होगा तथा समाज का सहयोग इस दिशा में महत्वपूर्ण भूमिका निभावेगा। कार्यक्रम में प्रांत सह संघचालक श्रीधरजी गाडगे, महानगर संघचालक श्री राजेशजी लोया, डॉ. सुधीरजी जाखेरे, डाक सेवाएँ, नागपुर क्षेत्र के निदेशक, श्री रामचंद्र जायभाये, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र एवं गोवा परिमंडल, डाक विभाग नागपुर के अधिकारी एवं कर्मचारी तथा डॉ. हेडगेवार स्मारक समिति, नागपुर के सदस्य उपस्थित थे。0
0
Report
इंदापूर के वडापुरी में संत तुकोबाराय का पालखी शोभा यात्रा पहुँची; भक्तों ने किया गर्मजोशी से स्वागत
Rui, Maharashtra:परतीच्या वाटेवर संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वडापुरीत विसावला. परतीच्या मार्गावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील श्रीनाथ मंदिरामध्ये पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला आहे. वडापुरी येथील श्रीनाथ मंदिर हे श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांच्या पद स्पर्शाने पावन झाले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. पालखी सोहळ्याचे वडापुरी गावात आगमन होताच गावकऱ्यांनी मोठ्या भक्ती भावात या सोहळ्याचे स्वागत केले.0
0
Report
Advertisement
