445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई में बारिश से यातायात भारी जाम, दहिसर से अंधेरी तक हालत बिगड़ी
Mumbai, Maharashtra:मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून दहिसर ते अंधेरीदरम्यान वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कार्यालयीन वेळ असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहने संथ गतीने पुढे सरकत असून प्रवाशांचा प्रवास खोळंबला आहे. वाहतूक पोलीस परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.0
0
Report
दिल्ली में राजीनामे मांग पर सोनम वांगचुक की हिरासत, सरकार पर दबाव बढ़ा
Ahilyanagar, Maharashtra:दिल्ली में केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान के राजीनामे की मांग के दौरान सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक को दिल्ली पुलिस ने हिरासत में लेकर अस्पताल दाखिल कराया गया है। इस मामले पर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने प्रतिक्रिया दी है। सोनम वांगचुक पिछले बीस दिनों से उपवास कर रही थीं; उन्हें उपवासस्थल से हिरासत में लेकर अस्पताल में भर्ती कराया गया। हालांकि, इस कारवाई का सरकार से कोई संबंध नहीं है, यह जलसंपदा मंत्री ने स्पष्ट किया। उच्च न्यायालय के निर्देशानुसार ही यह कार्रवाई हुई है, और न्यायालय ने सोनम वांगचुक के वैद्यकीय परीक्षण का रिपोर्ट अदालत में प्रस्तुत करने के निर्देश दिए हैं — क्या इससे न्यायालय के निर्देश या मंशा पर शक होता है, यह सवाल उन्होंने उठाया। अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांबाबत राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अनेक अधिकारींचा देखील निर्माण झाला आहे. जलजीवन मिशन योजनेत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत. सरकारने केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला असून योजनेतील त्रुटी दूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर जल स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल, असे विखे पाटील यांनी व्यक्त केले. मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेमध्ये काही BELO यांनी काम करण्यास नकार दिल्याच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. SIआर अंतर्गत मतदारांचे मॅपिंग सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच मतदारांची योग्य ओळख निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडे किंवा प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; परंतु पावसामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही चांगला पाऊस पडेल, अशी आशा असून दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.0
0
Report
मुंबई में बारिश शुरू, अंधेरी वेस्ट मिल्लत नगर में पेड़ गिरा; रास्ता बंद
Mumbai, Maharashtra:मुंबईत पावसाची सुरुवात; अंधेरी पश्चिमेतील मिल्लत नगरमध्ये मोठे झाड कोसळले मुंबईत पावसाची सुरुवात होताच अंधेरी पश्चिम येथील मिल्लत नगरमधील दीप टॉवर इमारतीच्या आवारात एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे इमारतीच्या परिसरातील रस्ता पूर्णपणे बंद झाला. झाड कोसळल्यानंतर नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला आणि काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.0
0
Report
Advertisement
डोंबिवली डॉक्टरों के हमले के विरोध में 24 घंटे राज्यस्तरीय बंद का आह्वान
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण ; येत्या सोमवारी आयएमएने पुकारला राज्यस्तरीय बंद कल्याणातील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या डॉक्टर मारहाणप्रकरणी महाराष्ट्र आयएमएने आक्रमक भूमिका घेत येत्या सोमवारी २४ तासांच्या राज्यस्तरीय बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र आयएमएच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ राजेश राघव राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यानंतरही शासनाकडून कोणतीही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्यापासून बेमुदत बंदचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेकडून यावेळी देण्यात आला आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ६ जुलै रोजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना घडली होती. ज्याचे कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर प्रशासनाकडून या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध झालेली कायदेशीर कारवाई असमाधानकारक असल्याचे सांगत महाराष्ट्र इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे येत्या सोमवारी 20 जुलै 2026 रोजी बंदची हाक दिली आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत शासनाने तयार केलेला कायदा अधिक कडक करणे, डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न होण्यासाठी एस ओ पी तयार करणे, भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शासनाकडून एक समुपदेशन समिती तयार करणे आदी आमच्या मागण्या असल्याचे डॉ. राजेश राघव राजू यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे शाम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य अभिजीत ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉ. राहुल काळे, केंपस्वा सुभाष कदम, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. किरण टोकेकर, आय एम ए कल्याणचे डॉ. हिमांशु ठक्कर हेदेखील उपस्थित होते. दरम्यान या 24 तासांच्या बंदमध्ये राज्यातील आपत्कालीन सुविधा सुरू राहतील मात्र सर्व डॉक्टर आपली ओपीडी बंद राहणार असल्याचेही यावेळी डॉक्टर संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले. तर यानंतरही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्याच्या 9 ऑगस्टपासून बेमुदत बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.0
0
Report
अण्णा हजारे ने सोनम वांगचुक के आंदोलन पर कहा—संवाद से समाधान निकालना चाहिए
Ahilyanagar, Maharashtra:सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू असून सरकारने त्याचा अंत पाहण्याची भूमिका घेऊ नये, असे त्यांनी म्हटले. संवादातून मार्ग काढत आंदोलनावर तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.0
0
Report
उल्हासनगर FDA ने बड़ी कार्रवाई: 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त
Ambernath, Maharashtra:FDA ने उल्हासनगरात मोठी कारवाई केली आहे. म्हशींना जादा दूधासाठी दिली जाणारी 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त झाले. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात प्रकाश वाधवानी यांच्या तबेल्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जादा दूध उत्पादनासाठी वापरली जाणारी 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन तसेच त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ऑक्सिटोसिनचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो. इतकेच नव्हे, तर अशा दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, बेकायदेशीरपणे जनावरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
रामरक्षा पर उद्धव ठाकरे के साथ जयकुमार गोरे का तीखा हमला
Pandharpur, Maharashtra:रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती उद्धव ठाकरेना आले आहे म्हणूनच त्याचा रामरक्षा म्हणू लागलेले आहेत असं खोचक टोला राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूर मध्ये रामरक्षा म्हणण्याचा आंदोलन सुरू केला आहे त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. राम भक्तीत काय ताकद आहे याची ठाकरे यांना अनुभव ती आली आहे राम भक्तीतून बाजूला गेल्यावर जी फळ मिळाली आहेत. त्यातून ते काहीतरी शिकतील. प्रभू आम्हाला त्यांना आता चांगली बुद्धी द्यावी आणि आता तरी त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं अशा पद्धतीच वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केला आहे0
0
Report
मावळ में प्रशासन-प्रतिनिधि संघर्ष से जनता मुश्किल में
Varsoli, Maharashtra:Headline : मावळात पुन्हा 'टाळेबंदी'चं राजकारण प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्षात जनतेचीच कोंडी Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांच्या दालनांना टाळे ठोकण्याच्या सलग घटनांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोणावळा नगरपरिषदेनंतर आता पंचायत समितीतही अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित असले, तरी कार्यालयीन कामकाज ठप्प करून प्रश्न सुटतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. या संघर्षाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वयातून जनहिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत..0
0
Report
श्रीरामपुर होटल व्यवसायी आकाश दुबैया हत्या के बाद पुलिस ने 28 कारवाइयां, शिकायतें सुलझाईं
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर शहरातील हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैय्या यांच्या हत्येनंतर पोलिस प्रशासन अँक्शन मोडवर आले असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने पोलिस कारवाया सुरू आहेत...व्यापारी आणि जनतेमधील गुंडाची दहशत संपवण्यासाठी विविध उपाययोजना पोलिस अधिक्षक मुम्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहेत...वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षकांनी तक्रार निवारण केंद्र सूरू केले असून नागरिकांनी पहिल्याच दिवशी उस्फूर्त असा प्रतिसाद दिलाय... जून्या आणि नवीन तक्रारींचे अवलोकन करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच पोलिस अधिक्षक एम सुदर्शन यांनी म्हणटलय...अवैध धंदे तसेच वॉंटेड गुन्हेगार अशा 28 कारवाया करण्यात आल्या असून आज 55 तक्रारदारांचे समाधान केलय...दोषी पोलिसांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलिस अधिक्षकांनी दिलय...0
0
Report
Advertisement
हिंदीHeadline: सोलापुर के मंत्री जयकुमार गोरे ने वारकड़ यात्रियों के लिए सुविधाओं के विस्तार पर जोर दिया और साफ-सफाई पर पूर्ण ध्यान देने की बात कही
Kolhapur, Maharashtra:पंढरपूर नगरी वारकऱ्यांचे स्वागत करत आहेत.. पंढरपूर मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना अधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेवर अधिक भर दिल्याचेही जयकुमार गोरे यांनी सांगितल आहे.. आज जयकुमार गोरे हे विठुरायाच्या मंदिरातील सोयी सुविधाचा आढावा घेण्यासाठी बुलेट वरून गेले. यावेळी त्यांच्या बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..0
0
Report
चंद्रपुर में भाजपा विधायक किशोर जोरगेवार के नेतृत्व में सेवा सप्ताह और रक्तदान शिविर
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 22 जुलै दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. 56 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 56 रक्तदान शिबिर, योग शिबिर यांचेही आयोजन होत असून 56 मंदिरात राज्याच्या सुखसमृद्धीसाठी पूजा अर्चना कार्यक्रम होत आहेत. महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने चंद्रपुरातील एक हजार लाभार्थ्यांना विविध उपयोगी शासकीय प्रमाणपत्र दिली जाणार असून 19 जुलै रोजी शहरात मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.0
0
Report
डोंबिवली स्टेशन पर नाग की एंट्री, टिकट काउंटर पर मची घबराहट
Kalyan, Maharashtra:डोंबिवली स्टेशनवर नागाची एंट्री, तिकीट खिडकीसमोर गोंधळ. तिकीट काउंटर वरती नागरिकांची पळापळ. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला. तिकीट खिडकीवर भला मोठा नाग फणा काढून बसल्याने डोंबिवली स्टेशनवर एकच खळबळ उडाली. नाग दिसताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथून सुरक्षित अंतर घेत सर्पमित्रांना पाचारण केले. दरम्यान, तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. नागामुळे काही काळ तिकीट वितरणावर परिणाम झाला असून डोंबिवली स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सर्पमित्रांच्या मदतीने नागाला सुरक्षितपणे पकडून स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.0
0
Report
Advertisement
अकोला: MIDC गोदाम में नकली गुटखा निर्माण मामले में नई जानकारी सामने, लगभग 2 करोड़ रुपए के माल जब्त
Akola, Maharashtra:अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस आलेल्या बनावट गुटखा निर्मिती प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाचा विस्तार सुरू आहे. Vo : अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाने एमआयडीसी भागातील एका गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि इतर साहित्य जप्त केले होते. या कारवाईत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध आणि तपास सुरू आहे. या प्रकरणात अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अभिषेक घई यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घई हे माजी महापौर विनोद मापारी यांचे भाचे आहेत. तसेच, ज्या गोदामात बनावट गुटखा तयार केला जात होता ते गोदाम अभिषेक घई यांच्या मालकीचे असून ते भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. यासाठी संबंधित भाडेकरारासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, या प्रकरणात गोदाम मालकाची नेमकी जबाबदारी काय, तसेच त्यांना या बेकायदेशीर कारवायांची माहिती होती का, याचा तपास पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणातील पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.0
0
Report
उत्तर नगर में फिर से बरस पड़े बादल, किसानों को मिली हल्की राहत
Shirdi, Maharashtra:उत्तर नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले असून सध्या रिमझीम पाऊस सुरू आहे. उशिरा आलेल्या मान्सूननंतर गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरिपातील पिके धोक्यात आली होती. 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, त्या काळात पावसाने साथ दिली नाही. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. ज्या भागात थोड्याफार प्रमाणात पाण्याची उपलब्धता होती, त्या ठिकाणी टँकर आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसून आले. मात्र, जिरायती भागात परिस्थिती अधिक गंभीर होती, कारण तेथे पावसाव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. आता पुन्हा एकदा रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही बळीराजा अद्याप दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाच्या प्रतीक्षेत आहे.0
0
Report
अकोला में नकली नोटों के धंधे के आरोपियों की गिरफ्तारी, मुख्य आरोपी फरार
Akola, Maharashtra:अकोला शहरात बनावट नोटांच्या व्यवहारावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी १७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह तीन आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेक्कर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितावर नजर ठेवून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३४ बनावट नोटा, म्हणजेच एकूण १७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपीने या बनावट नोटा दुसऱ्या एका व्यक्तीकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटचा तपास सुरू केला असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.0
0
Report
Advertisement
