445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
इचलकरंजी में सराईत अपराधियों के खिलाफ पुलिस ने धावा कर दी, दो गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींची शहरातील विविध भागांत धिंड काढली. खंडणी, चोरी, खून, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक झालेल्या आरोपींना पोलिसांनी नागरिकांसमोर फिरवत गुन्हेगारीविरोधात कडक संदेश दिला. इचलकरंजीतील रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत सहा वेळा कारवाई करण्यात अल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी एका वाहनचालकाला अडवून त्याच्याकडील वाहन आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट यांची भोनेमाळ, जवाहरनगर, गणपती कट्टा आणि परिसरातील इतर संवेदनशील भागांत धिंड काढली. या कारवाईमागचा उद्देश शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश देणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.0
0
Report
1 जुलाई 2026 से चिपळूण पोस्ट विभाग स्वतंत्र, पोस्ट सेवाओं में तेज़ी
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणकरांसाठी आनंदाची बातमी; १ जुलैपासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' सुरू उत्तर रत्नागिरीतील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर १ जुलै २०२६ पासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' कार्यरत होणार आहे. या नव्या विभागात चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांतील सर्व डाकघरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावरील पोस्टल कामांसाठी नागरिकांना रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार असून पोस्टल सेवाही अधिक जलद आणि प्रभावी होणार आहेत.0
0
Report
नीट के बाद टीईटी पेपर लीक: रत्नागिरी में कांग्रेस ने सख्त जांच की मांग
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी नीटनंतर आता टीईटीचा पेपर फुटला; सखोल चौकशीची रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी नीट परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप करत, सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन सादर केले. यावेळी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.0
0
Report
Advertisement
भर बारिश में चिचोंडे गाँव में शेड नहीं, villagers की कठिनाई बढ़ी
Chendhare, Maharashtra:अँकर - म्हसळा तालुक्यातील चिचोंडे गावात भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली है. गावातील एका व्यक्तीचे निधन झाले त्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र स्मशान भूमीवर शेड नसल्याने भर पावसात अंत्यविधी सह इतर धार्मिक विधी करावे लागले. म्हसळा तालुक्यातील पाभरे गावातील ही वाडी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून इथं स्मशानभूमीचा चौथरा बांधण्यात आला. मात्र ठेकेदाराने त्यावर शेडचे काम केले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते आहे. याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केलीय. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील हे गाव है.0
0
Report
कोल्हापुर के शहू भोसले थिएटर के गर्डल जलने पर उबाल, पुनर्निर्माण पर सवाल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीत शाहू महाराजांनी वापरलेले गर्डल भंगारात घातल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेच्या या कृतीमुळे शाहूप्रेमी कोल्हापूरकर संतप्त झालेत. नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर नाट्यगृहाचे नूतनीकरण केले जात आहे. पण हे नूतनीकरण करत असताना आगीची फारशी झळ न बसलेले गर्डल भंगारात घातल्याचे निदर्शनात झाले आहे. याचाच आढावा घेऊन कुस्तीप्रेमींशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या मामले में नया अपडेट: जुपिटर बाइक पुलिस ने की जप्त
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. चेतन पुण्याहून लोहगडवर ज्या ज्युपिटर दुचाकीवरून आला होता, ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले महत्त्वाचे वाहन म्हणून तिची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी आधीच संपूर्ण कट रचला होता. चारचाकी वाहनाने प्रवास केल्यास सोमाटणे फाटा आणि उर्से टोलनाक्यांवर वाहनाची नोंद होऊन पोलिसांना चालक व वाहनाचा माग काढणे सोपे जाईल, ही शक्यता लक्षात घेऊन चेतनने चारचाकीऐवजी ज्युपिटर दुचाकीने पुणे ते लोहगड असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे पोलीसानी याच MH 12 BW 1274 क्रमाका च्या दुचाकी वाहनावर मोबाईल वर बोलताना आढळल्याने १००० रुपयाचा दंड देखील आकारला आहे. ठरल्याप्रमाणे चेतन लोहगडवर पोहोचला. त्यानंतर केतनची हत्या करून तो त्याच दुचाकीवरून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. टोलनाक्यांवरील नोंदी टाळण्यात आरोपी यशस्वी झाले असले, तरी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चेतन आणि सिया यांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केला. रात्री उशिरा पोलिसांनी शोधमोहीम राबवून ही ज्युपिटर दुचाकी ताब्यात घेतली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, पुढील तपासात या वाहनाची निर्णायक भूमिका राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
गोवा के छह युवक नदी के उफान में फंसे, जंगल में बचाव दल ने सुरक्षित निकाला
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेले गोवा येथील सहा युवक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दोडामार्ग येथील जंगलात अडकून पडले होते. संपूर्ण रात्र जंगलात घालवल्यानंतर पहाटे वनविभाग और अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव मोहीम राबवून त्या युवकांची सुखरूप सुटका केली. दोडामार्ग येथील वझरा सकला धबधब्यावर हे तरुण आले होते. मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे युवक जंगलात अडकून पडले होते. नेटवर्क नसल्याने संपर्क ही तुटला होता. त्या युवकांनी आपला चित्तथरारक अनुभव व्हिडिओ द्वारे सोशल मीडियावर व्हायरल केलाय.0
0
Report
विदर्भ के ग्रामीण स्कूलों में पहले दिन बच्चों का बैलगाड़ी से खास स्वागत
Buldhana, Maharashtra:विदर्भात शाळांच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांचा 'किलबिलाट'! ग्रामीण भागात नवा उत्साह; चिमुकल्यांच्या स्वागतासाठी बैलगाडी सजवली0
0
Report
नाशिक के लासलगाव में चोरों ने जैन मंदिर व बैंक लूटपाट, 16 मोबाइल चुराए
Lasalgaon, Maharashtra:नाशिकच्या लासलगाव येथे चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत जैन मंदिर पाठोपाठ पंजाब नॅशनल बँक व शेजारी असलेले मोबाईलचे दुकान देखील फोडून 16 मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा लाखो लोकांचा ऐवज सुरू झाला आहे दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत किती रुपयांची चोरी झाली याबाबत अद्याप दुजोरा मिळाला नाही दरम्यान चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे .पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता होत आहे0
0
Report
Advertisement
वाशिम में खाद्य सुरक्षा अभियान का असर, 1031 नए आवेदन, 864 पंजीकृत
Washim, Maharashtra:राज्यात अन्नभेसळ आणि बेकायदेशीर खाद्यव्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा प्रभाव वाशिम जिल्ह्यातही दिसून येत आहे.कारवाईच्या धसक्यामुळे हॉटेल चालक,मिठाई व्यावसायिक,दूध विक्रेते व अन्य खाद्य व्यावसायिकांनी परवाना व नोंदणीसाठी मोठी गर्दी केली आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात खाद्यव्यवसाय नोंदणीसाठी१,०३१ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यात ८६४ नोंदणीकृत व परवानाधारक खाद्य व्यावसायिक आहेत.अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार परवाना किंवा नोंदणीशिवाय खाद्यव्यवसाय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, व्यवसाय बंद करण्याचे आदेश,परवाना निलंबन तसेच न्यायालयीन कारवाई होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.0
0
Report
आरोपी सिया गोयल के भाई साहिल गोयल को 10 करोड़ मानहानि नोटिस
Varsoli, Maharashtra:आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसान भरपाई ची कायदेशीर नोटीस बजावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने "माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत," असे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे. साहिल गोयलने खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देण्याचीही मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. आता या कायदेशीर नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
शिरूर स्वाभिमानी किसान विकास पैनल का प्रचार तेज, किसानों के हक की लड़ाई
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आता सुरू झालीय,तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत प्रचाराची रंगत शिगेला पोहचली असून 'स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल'ने माजी आमदार अशोक पवार आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली असून गावोगावी जाऊन ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक मतदारांशी संवाद साधताय.0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग में बारिश से भूस्खलन, वालावल गांव के घर पर पत्थर गिरा
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात मागील दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कुडाळ येथील वालावल गावात डोंगर खचण्याची घटना घडलीय. वालावल मुहूर्तळी वाडीत रात्रीपासून डोंगराची माती कोसळत होती. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने डोंगरातील एक दगड थेट घरावर आला. त्यामुळे घरच्या भिंतीला तडे गेले. सुदैवाने कोणती जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. मात्र ज्या घरावर दगड आदळला त्या घरातील रहिवासी भयभीत झालेत. पावसामुळे डोंगर भाग खचत चालला असून त्यामुळे येथील रहिवाश्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लागलीच उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.0
0
Report
वाशिम में 61,736 वाहनधारक HSRP पंजीकरण नहीं कराए, 1 जुलाई से दंड लागू
Washim, Maharashtra:अँकर:वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी)बसविण्यासाठी आज ३० जून अंतिम मुदत आहे.मात्र, वाशिम जिल्ह्यातील तब्बल ६१ हजार ७३६ वाहनधारकांनी अद्याप नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नाही.जिल्ह्यात १ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणीकृत सुमारे १ लाख २१ हजार वाहनांपैकी केवळ ५९ हजार २६४ वाहनधारकांनी एचएसआरपी बसविली किंवा त्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे.जिल्ह्यात एचएसआरपी बसविण्यासाठी १९अधिकृत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की,३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतल्याचा पुरावा वाहनधारकांनी जवळ ठेवावा.१जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या तसेच अपॉइंटमेंट न घेतलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.0
0
Report
भीमा नदी: जलपूजन से किसानों को पानी की राहत, खेड-शिरूर में उमंग
Khed, Maharashtra:खेड /पुणे सह्याद्रीच्या पर्वतरांगा भीमाशंकरच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे प्रवाहित भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करत भीमा नदीची ओटी भरून विधિવत जलपूजन सह्याद्रीच्या पर्वतरांगा भीमाशंकरच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे ओढे, नाले आणि जलस्रोत पुन्हा प्रवाहित होऊ लागले आहेत. भिमाशंकर येथून उगम पावणाऱ्या भीमा नदीच्या पात्रालाही प्रवाह सुरू झाला आहे. भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करत जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे व पंचायत समिती सदस्या मनीषा हिले यांच्या हस्ते भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन करण्यात आली. यावेळी चांगला पाऊस पडावा, जलस्रोत समृद्ध व्हावेत आणि परिसरातील पाणीटंचाई दूर व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. भिमा नदी प्रवाहित झाल्याने शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेड आणि शिरूर तालुक्यातील पाणी व शेती व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे0
0
Report
Advertisement
