Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 18, 2025 11:21:12
Satara, Maharashtra:सातारा - बामणोली परिसरातील कथित ड्रग्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांनी जे बेछूट आरोप केलेले आहेत, सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत त्यामुळे त्यात सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न अंधारे असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दूरान्वयेही कोणताही संबंध नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी असून, केवळ राजकीय हेतूने नाव घेऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ही देसाई यांनी सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे–नাশिक येथे घडलेल्या ड्रग्स प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना पाटण न्यायालयात हजर राहावे लागले होते. सुषमा अंधारे यांनी केलेली वक्तव्ये न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम करणारी ठरू शकतात, त्यामुळे अशा विधानांद्वारे न्यायालयाचा अवमान होत नाही ना, याची त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा इशाराही देण्यात आला. जर हे आरोप मागे घेतले गेले नाहीत, तर जसे नाशिक प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते, तसेच या प्रकरणातही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा देसाई यांनी दिला है.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 11:20:15
Akola, Maharashtra:Anchor : विदर्भात आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यात आले असून, दोन ते तीन नगरसेवक प्रत्येक महानगरपालिकेत मनसेचे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले.येत्या महापालिका निवडणुकांमध्ये यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये मनसेसाठी सध्या चांगले वातावरण असून, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे उंबरकर यांनी नमूद केले. अकोल्यात मनसेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची उबाठे सामोरं आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत बैठका झाल्या असून, एकत्र निवडणूक लढण्याबाबत जवळपास निश्चितता झाल्याचेही त्यांनी सांगितले.उबाठासोबत जागावाटपाबाबत चर्चा करून सक्षम आणि चांगले उमेदवार देण्यात येतील, आणि त्यातून निश्चितच विजय मिळवू, असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 18, 2025 11:01:59
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई कांग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश के कारण रिक्त पद पर रामचंद्र दळवी को प्रभारी अध्यक्षपद दे दिया गया है। ऐन चुनावी समय में जिल्हाध्यक्ष के द्वारा ही पार्टी प्रवेश होने से 15 दिनों पहले नए जिल्हाध्यक्ष की नियुक्ति की नामुष्की कांग्रेस पर आ गई है। इसके बावजूद नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी ने आगामी मनपा चुनावों में कांग्रेस पार्टी के मजबूत प्रदर्शन की स्पष्ट बात की है। उन्होंने केंद्र और राज्य सरकार की खोटेपणा के खिलाफ लड़ने वालों को साथ लेने से चुनाव का सामना करने की रणनीति बताई और कहा कि कांग्रेस के बिना Navi Mumbai Manpa का महापौर नहीं बनेगा, ऐसी आश्वासन भी दिया है।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 18, 2025 10:46:18
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता असताना ठाकरे शिवसेना मात्र जागा वाटपावरून आक्रमक झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील दबाव आणत देखेंगे सोचेंगे दिलाएंगे अशी भूमिका घेणार असेल तर शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू असा थेट इशारा दिलाय.. यामुळे कोल्हापुर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अभेद्य राहणार का? हे पहावं लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली असून काँग्रेस नेते सतेज पाटील दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी केला आहे. इंगवले यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जोरदार तिढा निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे. आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल असं महाविकास आघाडीचे नेत्यांनी स्पष्ट केला है. पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाचा तिढा समोर आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना काँग्रेस नेते सतेज पाटील उमेदवारी देणे टाळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वामध्ये असंतोष वाढला आहे. सतेज पाटील यांनी मात्र शिवसेनेकडून प्रस्ताव आलाय. कशाप्रकारे ऍडजस्टमेंट होते ते पाहून पुढे जाऊ अशी सकारात्मक प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेत असल्याचा दिसून येत आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 18, 2025 10:46:00
Satara, Maharashtra:सातारा - फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढत पहायला मिळत आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. लोकसभा त्यानंतर विधानसभा आणि आता फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकमेकांचा विरोधात उभे ठाकले आहेत. पाहूया यावरचा हा रिपोर्ट या फलटण नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर त्यांचा विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. या दोन्ही निंबाळकरांनी आणि पक्षांनी देखील आपली ताकद पणाला लावली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली आहे. या प्रचारात रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगत कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा त्यावेळी नक्की करू असा दम देखील दिला होता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास सुरू आहे मात्र या प्रकरणात राजकारण आणून मुद्दाम टार्गेट केलं जात आहे. या प्रकारात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दूरणावय संबंध नसल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर हे शकुनी मामा ची भूमिका बजावत असल्याची टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. या व्हिडिओमध्ये एकूणच दुर्दैवाची बाब म्हणजे ही फलटण नगरपालिका निवडणुकीत ही विकासाचा मुद्द्यावर न होता डॉक्टर महिला आत्महत्या खेळली जाते आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 10:21:40
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली होती. संबंधित मेलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी देत दुपारी दोन वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला होता. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ रिकामे करण्यात आले होते तर सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले होता तर आपत्ती व्यवस्थापन विभागासह बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून सखोल तपास करण्यात आला. अखेर पोलिसांनी संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने तपासले. शेवटी कोणतीही आपत्तीजनक वस्तू न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलीस आता सायबर टीमच्या मदतीने ई-मेल करणाऱ्याचा शोध घेत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 18, 2025 10:19:31
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 18, 2025 10:18:40
Jalna, Maharashtra:जालना | ब्रेकिंग जालना महायुतीसाठी बावनकुळेंची मध्यस्थी जालना महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी असे वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश जालन्यात भाजपचं एक पाऊल मागे आदेशाचे पालन करत भाजपने बोलावली महायुतीची बैठक अर्जुन खोतकरांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन अँकर- जालन्यात महायुती व्हावी यासाठी भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी मध्यस्थी केलीये. जालना महापालिका निवडणुकीत शिवसेना विरोधात भाजप आमने- सामने आल्याचं चित्र बघायला मिळत होत.. मात्र राज्यात महायुती होत असून जालन्यातही महायुती म्हणून निवडणुका लढवाव्यात असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळं भाजपने जालन्यात एक पाऊस मागे घेत महायुतीची पहिली बैठक बोलावली असून आज सायंकाळी ही बैठक होत आहे..भाजपचे जालना शहर महानगर प्रमुख भास्कर दानवेंच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 18, 2025 10:06:23
Wardha, Maharashtra:- देवळीत लाडकी बायको योजना, कार्यकर्त्यांना सोडून नेत्यांनी घरीच घेतली उमेदवारी - माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रचार सभेत टिका - भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा तडस यांच्यावर टिका - कार्यकर्त्यांना सोडून स्वतःच्या घरीच रामदास तडस यांनी घेतली भाजपाची उमेदवारी, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या ठाकूर यांची टिका - देवळीत आयोजित सभा प्रचारार्थ यशोमती ठाकूर यांनी टीका केली, भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांची लढत थांबवताना मुखपाठकांची बैठक - देवळीत भाजप व काँग्रेसमध्ये लढत असून अपक्ष उमेदवार सुद्धा आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे - निवडणूक ठाकूर यांच्या टीकेची पाळेमुळे चुरशीची ठरणार असं सांगितलं जातं - यशोमती ठाकूर, माजी मंत्री
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 10:04:50
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात अँकर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. चंद्रपूर मनपासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आमदार चैनसुख संचेती या मुलाखती घेत आहे. चंद्रपूर शहरातील एका हॉटेलमध्ये या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी जवळजवळ 700 इच्छुक उमेदवार मुलाखती देणार आहेत. प्रत्यक्ष तिकीटवाटप हे निवडून येण्याच्या निकषावर केल्या जाणार असून कुठल्याही गटा-तटाच्या राजकारणात आम्ही पडणार नाही असं म्हणत आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार या पक्षांतर्गत संघर्षाचा मुलाखतींवर परिणाम होणार नाही असा दावा निवडणूक प्रभारी चैनसुख संचेती यांनी केला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 18, 2025 09:45:47
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On प्रज्ञा सातव - हा धक्का वगैरे अजिबात नाही.. स्वार्थी लोक आहेत, खरंतर आमचे कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्यांना विधान परिषदेला पूर्णवेळ दिलं... एवढं सगळं काँग्रेसने दिलं ---- कुटुंबाकडे राहुल गांधी यांचे एक भावनिक संबंध होते पण मला वाटत नव्हतं की हे सर्व विसरून प्रज्ञाताई हा निर्णय घेतील, त्यामध्ये नेमका काय राजकीय स्वार्थ आहे हे कळत नाही ---- पाच वर्षाची आमदारकी शिल्लक होती, अशा परिस्थितीत हा निर्णय घेणार कुठेतरी काही अडचण आहे का आता आम्ही त्यापर्यंत गेलो नाही, तो विषय आमच्या पुढे सध्या नाही पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला, असं एक समर्पित काँग्रेसचे घराणं होतं ---- प्रज्ञाताई सोबत फार कार्यकर्ते गेले असं नाही, त्यांचं संघटनेतही फार योगदान आहे असं नाही, पण राजीव सातव यांची अर्धांगिनी म्हणून तेवढाच एक त्यांचा संबंध पक्षाशी आहे (On काँग्रेस परिषद विरोधीपक्ष नेते दावा - जाणार) ---- हे तर आता अडवण्याचा काम आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे,... विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचा आहे असा त्यांना प्रयोग करायचा आहे.. m त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनामे मागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता हा काँग्रेस पासून दूर नेता येईल ---- तिथे काही अट नव्हती, आमदारा आमच्याकडे होते, या अधिवेशनात ते करू शकले असते, हे ठीक आहे खाली अडचण आहे दहा टक्के ची अट पूर्ण होऊ शकत नाही पण वर कुठे होते ---- दानवे गेल्यानंतर एवढा वेळ का घालवला (On अशोक चव्हाण आरोप नाना पटोले त्यावेळेस राजीनामा दिला म्ह्णून वेळ आली) --- यामध्ये अर्धसत्य आहे.. की त्यावेळ त्यांनी (नाना पटोले) राजीनामा दिला नसता तर ही घटना घडली नसती असं म्हटलं जातं...., परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळी शिवसेना फोडली त्यामुळे हा विषयच नाही, त्यामुळे याला फार काही या भूमिकेला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही (On कोकाटे - सिडको) ---- कोकाटे संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही... कायदा पायदळी तुडवण्याची भूमिका आहे न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे. संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत.. आम्ही कोणालाही जो मानत नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करू अशी ती भूमिका आहे --- जर सुनील केदार यांचा आमदारकी 24 तासाच्या आत रद्द केल्या जाऊ शकते, राहुल जी चे घर खाली केल्या जाऊ शकते.. तर जे काही अभय दिल्या जातात या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल आणि महाराष्ट्रातील जनतेपुढे त्यांचे मान नक्कीच खाली झुकलेली आहे ---- त्या पलीकडे जाऊन सांगतो इथे काहीही करा, उद्या कोणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील, कारण कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे तो अनेक केस मध्ये आहे (On धनंजय मुंडे शहा भेट... -तटकरे यांना माहित नाही) - ---सर्वांना सर्वच माहित आहे..पण राजीनामा मागील कोण आणि घेईल कोण? राहिला धनंजय मुंडे यांचा विषय त्यांचा रिप्लेस म्हणून घेत असतील तर त्यांचा प्रश्न आहे - त्यांना राजीनामा का द्यावा लागला? येथून नव्याने सुरुवात करावी लागेल, परंतु आज तरी मला वाटतं की त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठे स्पष्ट भूमिका नाही (On मुंबई शरद पवार- ठाकरे युती - काँग्रेस एकटी) ---- यातून भूमिका पुढे येताना दिसतंय, आमच्या मुंबईच्या लोकांना वाटते की आम्ही मनसे -shivaji sena सोबत आघाडी करायची नाही..त्यांनी ती भूमिका स्वीकारली आहे, मुंबईला स्वतंत्र प्रदेश अध्यक्षपद आहे, वर्षा ताईंची तन् नेत्यांबरोबर बैठक झाली त्यांनी एक नाही दोन नाही तीनदा ही भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे काय होईल कोण कोणाबरोबर जाईल कोणाची नव्याने युती होईल कोणती नवी आघाडी होईल त्यापेक्षा काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे - प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यांचा (वर्षा गायकवाड) अनुभव वेगळा आहे, त्यांनी त्यांचा अनुभव क्लिअर केलाय उलट पक्षाला मनसेमुळे नुकसान होईल अशी त्यांची भूमिका मांडली आहे (On नाशिक मनसे -काँग्रेस युती - ) --- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळी भूमिका तिथली मंडळी सोयीनुसार घेतात, ती कदाचित त्यांच्या सोयीची आहे, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली असावी (सanjay raut. on.शरद पवार-अजित पवार हातमिळवणी) - 2014 पासून महाराष्ट्रातला राजकारण नासावल गेल आहे, हे सडक राजकारण झालय, राजकारणाला संस्कार राहिले नाहीत, कृती राहिली नाही, इमानदारी नाही राहिली, मैत्री राहिली नाही ...- राजकारणात आता गुन्हेगारी सुद्धा जवळची वाटायला लागली आहे, त्यामुळे परिस्थितीनुसार सोयीने सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, हे महाराष्ट्राच्या Rajakiya संस्कृतीला खड्ड्यात घालणार आहे हे आता स्पष्ट होत आहे (On शरद पवार मनसेसोबत जा सूचना) - मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो (On संजय शिरसाट /सातव - ) - संजय शिरसाट यांना माहिती कुठून मिळाली हे माहित नाही, ज्यांना निवडून न येता आहे ती आमदारकी विधान परिषदेची मिळत असेल, वाढलेलं ताट मिळतं, स्वयंपाक करायची गरज नाही आणि हाताला काही चटके लावून घेण्याची गरज नाही (On सिडको - कंत्राटदार) --- मला माहित नाही मी काही त्यातला मेंबर नाही, आणि मी काही घरं घेतली नाही, मी एकदाच आमदाराला जे मिळतं म्हाडाच्या घरातून ते घर एकदा घेतलाय, एकच वेळा कारण माझा मुंबईत कुठलाही घर नव्हता त्यामुळे कुठली कोणती सोय घेतो सोय न करतो - आता विदर्भातील एका आमदाराने केला आहे, त्याच्यावर गुन्हाही दाखल झालाय आणि हायकोर्टात केसही आहे, त्यामुळे अनेक जणाला ती माहिती आहे, तो चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आहे आणि त्यांनी सुद्धा असाच फायदा घेतलेला आहे आणि त्याचे केस हायकोर्ट पेंडींग आहे, त्यामुळे कोण काय करतो --- सत्तेत राहून सगळं चालतं, विरोधात अजिबात चालत नाही, महाराष्ट्र लुटून खाल्ला तरी सत्तेत ऑल बेल आहे परंतु विरोधकांनी छोटीशी चूक केली तरी त्याला सोडता कामा नये हे नव राजकारण महाराष्ट्रात प्रचंड रुजत चाललेला आहे (On महापालिका निवडणूक विदर्भ - ) - नागपूर- चंद्रपूर मध्ये आम्ही समाविचारी पक्षांशी वाटाघाटी सुरू आहेत.. आणि दोन-तीन दिवसात त्या संपूर्ण वाटाघाटी पूर्ण होतील - वंचित सोबत देखील चर्चा सुरू आहे =On चंद्रपूर आमदार घर) - मला वाटतं त्यांना विचारावं त्यांचे उत्तर मी काय देऊ शकेल (On सिडको -) - आता सगळं चाललेला आहे आभाळ फाटलेला आहे शिवणार कुठून चादर फाटली तर शिवता येईल आभाळ फाटलेला आहे आणि आभाळा एवढं सगळं काम चाललेलं आहे - सगळी स्वायत्तता संपुष्टात आली आहे आणि जे मिळेल सरकार ते अधिकारी करतात काँट्रॅटदीय करतात त्यामुळे महाराष्ट्र हे एकदम स्वच्छ कारभार करणारा महाराष्ट्र अशी बिरुदावली लावून घेण्यासाठी सगळे मोकळे आहेत
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 18, 2025 09:45:17
Baramati, Maharashtra:बारामती नगरपरिषद निवडणूक जेडीईव्हेडीत तपशील: बारामतीतील उमेदवारांचे मतांमध्ये परिवर्तन आणण्याचा विश्वास. आमच्या उमेदवारांना निवडून द्या तर पाणीपट्टी, घरपट्टी थांबवण्याचे पहिले आश्वासन असेल. बारामतीत विकासाचा दिसणारा भाग असला तरी आतमध्ये विकास झालेला नाही; स्थानिक नगरसेवकांनी वर्षे काहीच केले नाही. परदेशात जसे हॉकर्सचे क्वालिटी झोन तयार करण्याचा आशय, कमी खर्चात जागा देण्याचे प्रयत्न, कचरारोगी वाहने वेळेवर येईल याचे काम. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष आणि मित्र पक्ष बारामतीकरांसाठी पर्याय म्हणून उभे आहेत. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे आणि विरोधी निवडून गेली तरच नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील. उद्या सांगता सभा, शशिकांत शिंदे व मेहबूब शेख उपस्थित असणार.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 18, 2025 09:40:53
Kalyan, Maharashtra:मनसे नेते राजू पाटील यांची आमदार वरुण सरदेसाईची भेट. येणाऱ्या निवडणुकीतच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते ची भेट. ठाकरे गट–मनसे केडीएमसी निवडणूक एकत्र लढविण्याची इच्छा लवकरच निर्णय होणार - आमदार वरूण सरदेसाई यांची माहिती ठाकरे गट आणि मनसे केडीएमसीची आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढवन्याच्या हालचालीना वेग याच पार्श्वभूमीवर आमदार वरूण सरदेसाई यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले की, केडीएमसीची निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीने लढवणार आहोत. मनसेला आणि शिवसेनेला मतदान करणारा मोठा वर्ग आहे. कल्याण डोंबिवली मध्ये आहे लोकसेभा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात मतदान सेनेला झालं होतं ठाकरें बंधूंवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कल्याण–डोंबिवलीत राहतो. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याची ताकद नक्कीच दिसून येईल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top