445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कटेपुरणा वन्यजीव अभयारण्य में बौद्ध पूर्णिमा पर मचान से वन्यजीव गणना हुई सफल
Washim, Maharashtra:वाशीम: बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात मचान प्राणी गणना उत्साहात पार पडली. वन विभागाने उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या निरीक्षणासाठी कोअर व बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारले होते. सर्व मचान लॉटरी पद्धतीने भरले गेले असून प्रत्येक ठिकाणी गाईड व सुरक्षा रक्षक तैनात होते. कृत्रिम पाणवठ्यांजवळ रात्रीभर निरीक्षण करताना सायाळ, हरिण, चितळ, बिबट, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे तसेच विविध पक्ष्यांचे दर्शन झाले. या उपक्रमातून वन्यजीवांची संख्या, हालचाली व सवयींचा अभ्यास करण्यास मदत होणार असून अभयारण्यात जैवविविधतेच्या संवर्धनाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.0
0
Report
लोणावळा के मिसिंग लिंक पर प्रवेश मार्ग को लेकर मनसे का विरोध
Varsoli, Maharashtra:मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर मिसिंग लिंक ला मावळ तालुक्यातील मनसेने विरोध केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे करण्यासाठी तसेच मिसिंग लिंक तयार करण्यासाठी मावळ तालुक्याच्या भूमीपुत्रांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या, मात्र लोणावळा शहरासाठी मिसिंग लिंक वर जाण्यासाठी सोयीस्कर प्रवेश नाही, लोणावळा परिसरातील नागरिकांना मिसिंग लींक वर सोयीस्कर प्रवेश नसल्याने हा मिसिंग लिंक लोणावळा शहराचं पर्यटनाच्या फायद्याचा नाही, हा मिसिंग लिंक एक प्रकारे लोणावळा शहराचं पर्यटन कमी करण्याचा डाव आहे असा आरोप मावळ मनसेने केला आहे. राज्य सरकारला मिसिंग लींक सुरू ठेवायचं असेल तर त्यांनी लोणावळा आणि परिसरातील नागरिकांना मिसिंग लींक वर सोयीस्कर प्रवेश देणारा रस्ता कायमस्वरूपी तयार करून द्यावा अशी मागणी मावळ तालुक्यातील मनसेने केली आहे.0
0
Report
वसई के बद्रीनाथ मंदिर में भक्तों की भीड़ सुबह से रात तक दर्शन के लिए
Vasai-Virar, Maharashtra:वसईत बद्रीनाथ मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी – सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी रांगे वसई पश्चिमेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या बद्रीनाथ मंदिरात दिवसेंदिवस भक्तांची प्रचंड गर्दी वाढताना दिसत आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी या भव्य मंदिराचे प्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून, तेव्हापासूनच भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उत्तरांचल मित्र मंडल वसई यांच्या अथक परिश्रमातून आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून हे मंदिर साकार झाले आहे. आज, शुक्रवार दिनांक १ मे रोजी पहाटे ६ वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. दिवसभर अखंडपणे भक्तांची रांग लागलेली असून, संध्याकाळ उलटूनही हजारो भाविक बद्रीनाथ भगवानाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. स्थानिक भक्तांसह दूरवरूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.0
0
Report
Advertisement
मालेगांव के ज्वेलर्स दुकान से सोने-चांदी भरी बैग चोरी, चोर फरार
Nanded-Waghala, Maharashtra:ज्वेलर्स दुकान उघडून सफासफाई करताना चोरट्याने सोने चांदी भरलेली बॅग लंपास केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मालेगाव मध्ये घडली. काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिवशक्ती ज्वेलर्सचे मालक सचिन उडानशिव हे आपले दुकान उघडुन मंदीरात गेले. त्यांच्या वडीलांनी दुकानात सोने-चांदी असलेली बॅग ठेवली आणि ते झाड-झुड करत होते. पाळत ठेवुन असलेल्या अज्ञात चोरट्याने सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. या बॅगेत अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे दागिने होते. चोरटे वसमत मार्गे दुचाकीवरून वेगाने फरार झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्यांचा पाठलाग केला परंतु भररस्त्यात पोलिसांना चकवा देण्यात चोरटे यशस्वी झाले. दुकानातून बॅग पळवून नेण्याची घटना cctv कॅमेऱ्यात कैद झालीये.0
0
Report
च chipळूण-रत्नागिरी: मिरजोळे में छह महीने की मादा बिबटिया जेरबंद
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. मिरजोळे येथे सापडलेल्या बिबट्या वनविभागाकडून जेरबंद.. ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने वन विभागाची कार्यवाही.. 6 महिन्यांचा बिबट्या वनविभागच्या देखरेखीखाली.. रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांत वाडी येथील भाई कोलगे यांच्या किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचा खाली लावलेल्या जाळीत बिबट्या अडकल्याचे ग्रामस्थांना दिसल्यानंतर तातडीने वनविभागाला पाचरण करून वनविभागाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने सहा महिन्यांच्या मादी बिबट्याला सुरक्षित रित्या जेरबंद करण्यात आले..0
0
Report
इंद्रायणी नदी में डूबकर युवक की मौत, खोज-Team ने शव बरामद
Varsoli, Maharashtra:इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. मावळ तालुक्यातील पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्रांच्या तत्परतेने मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. मावळ तालुक्यातील सालुंब्रे-गहुंजे येथील जुन्या दगडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ गाव उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असून, तो साळुंब्रे येथील काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता. तो पवना नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ शोध आणि बचावकार्य राबवत मृतदेह बाहेर काढला. यानंतर शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या उपस्थितीत विरा ॲम्बुलन्सच्या माध्यमातून मृतदेह पवना हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
नसरापुर में बाल लैंगिक शोषण और हत्या: बाजार बंद, भारी भीड़ नारेबाजी
Pune, Maharashtra:पुणे. नसरापुर मधील चार वर्षे चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरण. काल भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नसरापूर गावात कडकडीत बंद. कडकडीत बंद पाडून करणारं निषेध व्यक्त. नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि समस्त ग्रामस्थ नसरापूर आज कडकडीत बंदचं आवाहन. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. सकाळी 10 वाजता गावातील भैरवनाथ मंदिर येथून घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार. नसरापूरच्या नागरिकांवर दुःखाचा डोंगर. महिला आक्रमक सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू. घटना सांगताना नसरापूरच्या महिला डसाडसा रडल्या. संशयीत आरोपीला फाशी होऊ द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या आम्ही शिक्षा करतो. नसरापूर गावात फॉरेन्सिकची टीम दाखल. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू, गावातील नागरिक आक्रमक मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात.0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर 15 जुलाई तक वृक्षारोपण की गारंटी, प्रशासन ने लिखित आश्वासन दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गावर वृक्ष लागवडीसाठी 15 जुलै डेडलाईन.. अँकर गेल्या चार वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने संतप्त झालेल्या चिपळूण वासियांबरोबरच हायवे वृक्ष लागवड हक्क समितीचे शहानवाज शहा यांनी महामार्ग उपविभाग कार्यालयासमोर थेट भू-समाधी आंदोलन छेडले.या आंदोलनानंतर प्रशासनाने 15 जुलैपर्यंत इंदापूर ते तळेगाव दरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्ष लागवड केली जाईल अशी लेखी हमी आंदोलन कर्त्यांना दिली..0
0
Report
पवई में कल दर्दनाक हादसा: तेज टेम्पो की टक्कर से 3 मजदूर घायल
Mumbai, Maharashtra:काल पवई येथे दुर्दैवी घटना घडली मुंबई महापालिका कडून नेमण्यात आलेला कॉन्ट्रॅक्टर नि काल पवई येथे मोरारजी नगर येथील नाले साफ करण्यात साठी कामगारांना आणले असताना एक भरधाव टेम्पो ने दिली कामगारांना धडक साफसफाई करत असताना भरधाव टेम्पो ने दिली धडक आणि टेम्पोचालकाने काढला पळ या घटनेत 3 कामगार गंभीररित्या जखमी आहे सध्या त्यांचा वर उपचार सुरू आहे0
0
Report
Advertisement
कल्याण-भिवंडी पडघा मार्ग पर ट्रैफिक जाम से एंबुलेंस फंस, नागरिक यातायात संभाल रहे
Kalyan, Maharashtra:कल्याण-भिवंडी पडघा मार्ग पर ट्रैफिक जाम है. सड़कों पर गाड़ियों की लंबी लाइने हैं. ट्रैफिक जाम के कारण एम्बुलेंसAffected. सुबह ट्रैफिक जाम के कारण गांधारी पुल पर एम्बुलेंस फंस गई. कल्याण की तरफ आने वाले और भिवंडी पडघ्याके जाने वाले मार्ग पर बड़े पैमाने पर ट्रैफिक जाम. ट्रैफिक पुलिस न होने के कारण नागरिक ही यातायात सुचारू कर रहे हैं.0
0
Report
चिपळूण में अवैध भंगार पर प्रशासन की चुप्पी: नागरिकों ने उपोषण से जताया विरोध
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी च Chipळूण में अवैध भंगार व्यवसायांचा सुळसुळाट झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचे रूपांतर 'स्क्रॅप सिटी'मध्ये होत असल्याचा आरोप होत आहे. सर्वेक्षणानुसार हे व्यवसाय अवैध ठरूनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. या निषेधासाठी 'हिंदु राष्ट्र समन्वय समिती' च्या वतीने चिपळूण नगरपालिका परिषदेसमोर साखळी उपोषण करण्यात आले. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात असून, अवैध भंगार दुकानांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
परळी नगर निगम ने सोमबार से मांस विक्री बंद रखने का फैसला लिया
Beed, Maharashtra:बीड : दर सोमवारी मांसविक्री बंदीचा निर्णय; परळी नगरपालिकेचा ठराव..! बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्ल Ling म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी परळी पालिका पहिली पालिका ठरली आहे. नगरपालिकेच्या स्थायी समितीने एकमताने हा ठराव मंजूर केला. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के शीळ मिरजोळे क्षेत्र में पुलिस ने धावा, देसी शराब की भट्ठी उद्ध्वस्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीतल्या शीळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई.. अँकर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकणनगर चौकीच्या पथकाने रत्नागिरीतल्या शीळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई करत गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
नाशिक के येवला में भीषण पानीटंचाई, ग्रामीण टैंकर पर पानी के लिए भटक रहे
Yeola, Maharashtra:नाशिक के येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे डिसेंबर, जानेवारी ऐवजी मार्च महिन्यात टँकरची मागणी करण्यात आली मात्र उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे विहिरींनी आताच तळ गाठल्याने मार्च महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आले आहे तालुक्यातील पन्हाळसाठे गावात शासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून महिलांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे लग्न होऊन 40 ते 50 वर्षे झाली पण दरवर्षी अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण होते हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते, अशी व्यथा गावातील महिलांनी व्यक्त केली पन्हाळसाठे गावाप्रमाणेच येवला तालुक्यातील तब्बल 36 गावे आणि 37 वाड्या-वस्त्यांना सध्या शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे0
0
Report
वाशीम में तिल की फसल भीषण तापमान से सूखने के कगार पर, किसानों को नुकसान
Washim, Maharashtra:अँकर :वाशिम जिल्हा मध्ये यंदा उन्हाळी तिळाच्या पिकावर तापमानवाढीचा मोठा परिणाम दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या या पिकासाठी पाण्याची पातळी घटल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक शेतांमध्ये फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले तिळाचे पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली असतानाच वाढलेल्या तापमानामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे。0
0
Report
Advertisement
