445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
राजदेरवाडी में पहाड़ी से पत्थर गिरा, 52 वर्षीय इंदूबाई देवरे की मौत
Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इंदुबाई संतोष देवरे (वय ५२, रा. दरेगाव) या नातेवाईकांकडे राजदेरवाडी येथे आल्या होत्या. पहाटे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेल्या असता, डोंगरावरून अचानक मोठा दगड कोसळून त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.या परिसरात सध्या पावसाची सारखी रिप रिप सुरू असल्याने डोंगरावरून माती दगड येत असतात त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे0
0
Report
अमरावती से पंढरपूर: 50 वारकरी साइकिल रैली में महिलाओं सहित 600 किमी यात्रा
Washim, Maharashtra:अँकर:आषाढी एकादशी निमित्त अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने 50वारकरी सायकलने पंढरपूर वारीसाठी निघाले आहेत.यंदा या सायकल रॅलीचा चौथं वर्ष असून दिवसेंदिवस सायकलवारीमध्ये वारकऱ्याची संख्या वाढत आहे.या वारीत13महिलांसह 40 ते 80 वयोगटातील वारकऱ्यांचा समावेश आहे.अमरावतीहून 7 जुलै रोजी निघालेल्या या वारकऱ्यांनी रात्री वाशिमच्या मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.दररोज 100 ते 120 किलोमीटर प्रवास करत हे वारकरी 600 किलोमीटर अंतर पार करून 12 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहेत.पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनाचा संदेश देणारी ही सायकल वारी मागील चार वर्षांपासून सुरू असल्याचे वारकरी सांगत आहेत。0
0
Report
सातारा जिले में भारी बारिश से बाढ़, भू-स्खलन और नदी-घाटों पर जलभराव
Satara, Maharashtra:सातारा -गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिला है त्याचबरोबर काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागले आहे. एकूणच सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढून जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी जनावरे देखील दगावली आहेत, घाटमाथा परिसरात दरड कोसळली आहे त्याचबरोबर रस्ते खचले आहेत, अनेक गावात भूस्खलन झाले आहे, एकूणच जिल्ह्यातील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी....0
0
Report
Advertisement
मूसलाधार बारिश से वांगणी-बदलापूर का राज्य मार्ग बंद, यातायात प्रभावित
Ambernath, Maharashtra:मुसळधार पावसामुळे वांगणी-बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद काजगाव जवळ राज्य महामार्गावर पाणीच पाणी उल्हास नदी ओव्हर फ्लो0
0
Report
अहिल्यानगर पुलिस ने गैंग्स के खिलाफ कार्रवाई कर 68 सराईत अपराधियों को तड़ीपार किया
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या और सराईत गुन्हेगारांविरुद्ध कार्रवाई मोडवर येत, झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे। राहाता, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, नेवासा यासह श्रीरामपूर पोलीस उपविभागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६८ सराईत गुन्हेगारांना हद्दपार म्हणजेच तडीपार केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलीय.0
0
Report
कोल्हापुर में कसारी नदी का पानी राजापूर मार्ग पर, ड्राइवर पानी में वाहन पार कर रहे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या कासारी नदीचे पाणी कोल्हापूर राजापूर राज्य मार्गावर आल आहे. त्यामुळे वाहनचालक याच पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत. गेल्या तीन दिवासांपासून या मार्गावर पाणी असल्याने वाहतुकीला काही प्रमाणात अडचणी येत आहेत. ज्यांना पाण्याचा अंदाज येत नाहीत त्याचा अपघात देखील घडत आहेत. हीच दृष्ये कॅमेरात कैद झाली आहेत.. याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
बारिश से सिन्नर के समृद्धि महामार्ग किनारे प्राकृतिक झरने लोगों को आकर्षित कर रहे हैं
Sinnar, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात सुरूलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र धबधबे प्रवाहित झाले असून सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. रस्त्याच्या कडेला कोसळणारे हे मनमोहक धबधबे वाहनधारक आणि प्रवाशांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाचे हे मोहक रूप अनुभवता येत असल्यून प्रवासात नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत आहेत. सततच्या पावसामुळे सिन्नर परिसरातील हा निसर्गरम्य नजारा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.0
0
Report
बारिश से बदला चिखलदार घाट: पर्यटक जान जोखिम में डालकर फोटोग्राफी
Amravati, Maharashtra:धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असल्याच पाहायला मिळत आहे तर काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अतीउत्साही पर्यटक चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला0
0
Report
महाराष्ट्र–कर्नाटक सीमा मुद्दे पर CM फडणवीस की अध्यक्षता में उच्चअधिकार समिति मुंबई में बैठक
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चअधिकार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे बेळगावसह सीमा भागातील बांधवांच्या नजरा लागून राहिल्यात. येत्या काळात सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. विधानभवनामधील मंत्रिमंडळ सभागृहात दुपारी दीड वाजता ही बैठक होणार आहे.0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी का जलस्तर 24 फुट पर पहुँचा, सांगली में खतरे के संकेत
Sangli, Maharashtra:सांगली में कृष्णा नदी के जलस्तर में वृद्धि जारी है। कृष्णा नदी का जलस्तर 24 फुट पर पहुँच गया है, जो आयर्विन पुल के पास है। एक दिन में जलस्तर में सात फुट की वृद्धि दर्ज की गई। राहत की बात यह है कि कृष्णा नदी जलग्रहण क्षेत्रों में बारिश का जोर कमजोर हुआ है। सातारा जिले में वर्षा का प्रचंड दबाव अभी भी बना हुआ है, जिसके कारण कृष्णा नदी के जलस्तर में वृद्धि हो रही है। हमारे प्रतिनिधि सरफराज सनदी ने इसका आढ़ावा लिया।0
0
Report
अहिल्यानगर जिले में यलो अलर्ट, भारी बारिश जारी
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हयास यलो अलर्ट ; जिल्हयात सर्वदूर पावसाची हजेरी... दोन दिवसांपासून पावसाची संततधार , मुसळधार पाऊस सुरू.. शिर्डी , अकोले , संगमनेर ,कोपरगाव , नेवासा, राहुरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी... तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी... भंडारदरा , मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ... भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा.. खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त... गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके रखडली... अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
मुंबई में भारी बारिश से अंधेरी सबवे पानी में, सुरक्षा कारणों से अस्थायी बंद
Mumbai, Maharashtra:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव तो वाहतुकीसह नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी सबवे बंद झाल्याने कार्यालयीन कर्मचारी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय झाली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना गोखले पूल मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई समेत बोरीवली में बारिश, यातायात धीमा; रेलवे सेवाएं सामान्य
Mumbai, Maharashtra:मुंबईसह बोरीवली परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. रेल्वे सेवा सध्या सुरळीत सुरू असली तरी प्रवाशांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे तसेच पाणी साचलेल्या भागातून जाताना काळजी घ्यावी.0
0
Report
यवतमाल में सोयाबीन की बुवाई के बाद उग नहीं, किसान चिंतित, जांच की मांग
Yavatmal, Maharashtra:चालू खरीप हंगामात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेली सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता व त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. बाभुळगाव तालुक्यातील मिटणापूर येथील शेतकरी रणजीत दांडगे यांनी आपल्या शेतात सोयाबीन ची लागवड केली होती. मात्र त्यांनी लागवड केलेल्या 11 एकर शेत जमिनीवरील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे त्यांना शेतात पुन्हा नांगर फिरवून दुबार पेरणी करावी लागत आहे. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. दांडगे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्यांच्या माथी कृषी केंद्रांमधून बोगस बियाणे मारल्या गेले असावे अशी शक्यता आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कराव्या असे आवाहन जिल्हा कृषी अधीककांनी केले आहे.0
0
Report
नाशिक में भारी बारिश, जलाशयों में पानी का स्तर तेज़ी से बढ़ा
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; धरणसाठ्यात वाढ • नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद. • सर्वाधिक पाऊस अंबोली 224 मिमी, इगतपुरी 205 मिमी, त्र्यंबक 148 मिमी, गौतमी-गोदावरी परिसर 121 मिमी, नाशिक शहर 88 मिमी. • पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू. • दारणा धरण 36 टक्के , गंगापूर 53.34%, कश्यपी 40.93%, कडवा 49.64%, करंजवण 23.07%, चणकापूर 60.20% वर • नाशिक पाटबंधारे विभागातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 37.96%, गेल्या वर्षीपेक्षा अद्याप कमी, मागील वर्षी याच दिवशी तो 71.91% होता. • गौतमी-गोदावरी धरणातून 1,280 क्युसेक, तर चणकापूर धरणातून 4,732 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. • धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.0
0
Report
Advertisement
