445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगांव बॉम्बस्फोट: चार आरोपींना महत्त्वपूर्ण दिलासा, निर्दोष मुक्तता से मामला आगे बढ़ा
Nashik, Maharashtra:मालेगाव 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात महत्त्वाचा निर्णय गेला. 2006 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयाने यांच्याविरोधात निश्चित केलेले आरोप रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटला समाप्तीच्या दिशेने असून आरोपींना दिलासा मिळाला आहे. प्रकरणातील तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. मालेगावच्या पीडित कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली. आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी यावर चर्चा केली. या बॉम्ब ब्लास्टमध्ये माझे मूल गेले. तो ब्लास्ट भगवा आतंकवादी, हिरवा आतंकवादी यांनी केला नसून सरकारने तिसरा कलर शोधून आणून त्यांना आरोपी बनवावं असा विचार करायला लागला. मग तो ब्लास्ट झाला कोण? मुलं कशी मारली गेली यावर आमच्या संशय आहेत. तपास यंत्रणा पोपटासारखी पिंजऱ्यात बंद आहे, अशी टीका पीडित कुटुंबांनी केली. या बॉम्ब ब्लास्टमध्ये 9 मुस्लिम संशयितांना निर्दोष मुक्तता झाली, तर आज चार जणांची निर्दोष मुक्तता झाली. मग या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली जाईल कोण? प्रकरणातील तपास यंत्रणांची भूमिका आत्ता काहीच स्पष्ट नाही. मालेगावकर विचारत आहेत. विशाल मोरे यांनी ही बातमी मालेगाव झी मिडिया येथे दिली.0
0
Report
ठाणे महापालिकेचे ऑनलाइन प्रक्षेपण: गटनेत्यांची लवकर बैठक
Thane, Maharashtra:ठाणे महापालिकेच्या महासभांच्या ऑनलाईन प्रक्षेपणाबाबत लवकरच गटनेत्यांची बैठक भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांच्या मागणीवर महापौरांचा निर्णय ठाणे महापालिकेतील महासभांच्या ऑनलाईन प्रक्षेपणाबाबत उपमहापौर व सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केले. भाजपाचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी पुढील महासभेपासून थेट प्रक्षेपण करण्याची आग्रही मागणी केली. या विषयावर भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी पहिल्या महासभेपासून पाठपुरावा सुरू केला आहे. महापालिकेच्या आजच्या महासभेचे कामकाज सुरू झाल्यावर भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी महासभेच्या ऑनलाईन कामकाजाच्या कार्यवाहीबाबत विचारणा केली. त्याला मृणाल पेंडसे यांनीही पाठिंबा दिला. त्यावेळी महापौर पिंपळोलकर यांनी अद्यापी कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून महासभा सर्वांसाठी खुली असली, तरी गोपनीयता राखण्याची तरतूद असल्याचे नमूद केले. त्याला भाजपाचे गटनेते मुकेश मोकाशी, भरत चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही आक्षेप घेतला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपण ऑनलाईन सभेची मागणी अनेक वर्षांपासून असल्याचे नमूद केले. मुंबईसह राज्यातील इतर महापालिकाांमध्ये सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन कामकाज सुरू असताना, ठाण्यामध्ये अडचणी का येत आहेत, असा सवाल केला. शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर व सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्याची सूचना केली. अखेर या विषयावर लवकरच गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे निर्देशन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले.0
0
Report
अकोला शिवसेना में बड़े पैमाने पर राजीनामे, आंतरिक मतभेद उजागर
Akola, Maharashtra:अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. अकोला शहरातील विविध विभाग, प्रभाग आणि शाखा स्तरावरील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा सादर केला आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या सामूहिक राजीनाम्यामुळे अकोल्यातील उबाठा शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे एकमात्र असलेले आमदार नितीन देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत..0
0
Report
Advertisement
लोणावळा में ऑनलाइन विला बुकिंग स्कैम से पर्यटकों में हड़कंप
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरीとして देशभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा ऑनलाईन व्हिला बुकिंग स्कॅम उघडकीस आला आहे. थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो टाकून ऑनलाइन भामटे सक्रिय झाले आहेत. बुकिंगच्या नावाखाळे २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते… इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. या वाढत्या फसवणुकीमुळे पर्यटक आर्थिक फटका सहन करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून रचले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करावा आणि सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. “ऑनलाईन बुकिंग करताना खात्री करूनच व्यवहार करा, अधिकृत माध्यमांचा वापर करा.” सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हिरवाईने नटलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा मोठा इशारा आहे. पर्यटन नगरीत फिरायला येण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंगच्या फंद्यात न पडता फसवणुकीपासून सावध रहा आणि थेट लोणावळ्यात आल्यावरच व्हीला, रिसॉर्ट, बुकिंग करण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे.0
0
Report
नाशिक के पंचवटी में सिगरेट मांगने पर आरोपी ने चॉपर से हमला कर राहुल राऊत की मौत
Nashik, Maharashtra:सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून संशयित आरोपीने चॉपरने हल्ला करत तरुणाचा जीव गमवावा लागल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडलीये... राहुल कृष्णा राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय... राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसोबत शनिवारी 18 तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर हा तेथे आला व त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या आहेरने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. मात्र राहुल याचा सोमवारी पहाटे दोनच्या sसमयी त्याचा मृत्यू झाला. मयताचे वडील कृष्णा हरी राऊत यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे... यात संशयित आरोपी रोहिदास आहेर सराईत गुन्हेगार असून कुणाच्या प्रयत्नात त्याला वर्षभरापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती... यावर तो जामीनावर काही दिवसांपूर्वीच सुटलेला होता... केल्यानंतर रोहिदास फरार असून हा संशयताला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथक रवाना केली आहे.... बाईट- सुनील पवार, पोलीस निरीक्षक0
0
Report
बदलापूर नगरपालिका सभा में हंगामा, नेता-कार्यकर्ताओं के बीच तीखी टकराव
Ambernath, Maharashtra:बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरी तुमरी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कार्यकर्त्यांची पालिका आवारात घुसखोरी बदलापूर पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आलीय. दरम्यान वातावरण तापलेलं असतानाच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. त्यामुळे पुढील राडा टळला. चंद्रशेखर भुयार , बदलापूर0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के ताडोबा-आंधारी वन क्षेत्र में मादा भालू ने पिल्लों को कंधे पर बिठाकर 2–3 किमी का अनोखा सफर किया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मादी अस्वलाने दोन पिल्लांना पाठीवर बसवून २ ते ३ किलोमीटरचा प्रवास केल्याचे अनोखे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मादी अस्वलाची आईपणाची ही जिवंत उदाहरणे वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकरांनी मोहर्ली कोअर झोनच्या जुनी विहीर मार्गावर टिपली. दाट जंगलातून सावधपणे मार्गक्रमण करताना तिने पिल्लांना सुरक्षित नेले. आई अस्वल किती सजग असते याचे प्रभावी उदाहरण या दृश्यातून पाहायला मिळाले.0
0
Report
यवतमाळ के रालेगांव में 34 लड़कियों की कथित बिक्री पर घमासान
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील ३४ मुलींच्या कथित विक्री प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगल्यााच आक्रमक झाल्या, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात फारसे तथ्य नसल्याचे सांगितले तर भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनीही भाजप जिल्हाध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झालेली बघायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघासह आदिवासी बहुल भागात हिंदू मुलींची विक्री होत असल्याचा दावा भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान यांनी केला. मुलींची विक्री लव जिहाद च्या कृत्यातून धर्मांतरणासाठी होत असल्याचा आरोप चौहान यांनी केला. त्यामुळे आक्रमक होत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटनांनी संताप व्यक्त करीत राळेगाव बंद पाळला. संशयित आरोपीच्या घरावर हल्ला चढविल्या गेला. या आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी न करता सोडून दिल्याचा आरोप करीत त्याला निलंबित करण्याची मागणी देखील भाजपा ने केली. पार्श्वभूमी: दो ऑडिओ क्लिपचा दाखला दिला, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील पोलीस ठाण्यात ठाण मारून बसले, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. परंतु ऑडिओ क्लिप मधील संभाषण करणारी तरुणी मात्र पोलिसांच्या चौकशीत काहीच बोलायला तयार नाही, मुलींची विक्री व लव जिहाद बाबतही कुठलीच तक्रार पुढे आली नाही. याउलट भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा भाजपचेच आमदार राजू तोडसाम यांनी खोडून काढला, यात एका बालविवाह खेरीज काहीच निष्पन्न झाले नाही. झालेल्या अपप्रचारामुळे आदिवासी समाजाची बदनामी झाल्याची खंत ते बोलून गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष, मंत्री आणि आमदार यांचीच एक वाक्यता नसेल तर मुलींच्या विक्री प्रकरणात ते कसे आणि किती गंभीर आहे हा प्रश्न उपस्थित होतो, भाजपचा डाव हा धार्मिक द्वेष पसरविण्यासाठी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तर भाजपा अंतर्गत चढाओढीच्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडल्या जात असल्याची चर्चा आता रंगत आहे.0
0
Report
कूलर इस्तेमाल और खरीदते समय किन बातों का ध्यान रखें? विशेषज्ञ की सलाह
Nagpur, Maharashtra:कूलर इस्तेमाल करते समय और खरीदते समय किन बातों का ध्यान रखना चाहिए? विशेषज्ञ की बात.0
0
Report
Advertisement
बारामती उपचुनाव के लिए कल 478 मतदान केंद्र, CCTV निगरानी के साथ मतदान
Rui, Maharashtra:बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान.... 478 मतदान केंद्रावरती होणार मतदान..... ..... मतदान केंद्रावरती असणार सीसीटीव्हीची करडी नजर..... Anchor _बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरुवारी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे एकूण 478 मतदान केंद्रांवर ती मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व मतदान केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे. आज या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवल्या जात आहेत. निवडणूक व्यवस्था, मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती,सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा,कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्त तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आलीय... बारामती तालुक्यात एकूण मतदार : ३लाख ८४हजार ५७९ मतदार असून पुरुष १,९३,८७१ आहेत. तर महिला १,९०,६८४,असून तृतीयपंथी २४ मतदार आहेत. तालुक्यात एकूण ४७८ मतदान केंद्रे आहेत.यामध्ये ईव्हीएम ४७८,बॅलेट युनिट्स ९५६, व्हीव्हीपॅट ४७८,यंत्रणा आहेत. तर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ६०,बॅलेट युनिट्स १२०राखीव यंत्रे ठेवण्यात आली आहेत.. एकूण वाहने १६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,वैद्यकीय संच उपलब्ध करू. देण्यात आले आहे. मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताबरोबरच ८ तपासणी नाके (चेक पोस्ट), १६ स्थिर पथके,८ भरारी पथके अशी एकूण ९६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुढील महिन्या ४ मे २०२६ रोजी याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदामात मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे.0
0
Report
संगमनेर के भोंदू राजेंद्र गडगे पर पुलिस का फिर छापा, लाखों रुपये जब्त
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम दरबाराची आज उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात आली.. गुह्या संदर्भात महत्वाचे पुरावे जमा करण्याचं काम पोलीसांकडून वेगाने सुरू आहे.. मंत्र तंत्राने असाध्य रोग बरे करण्याचा दावा करणारा संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे गजाआड गेला आहे.. सोमवारी पोलीसांनी दरबाराची झाडाझडती घेत त्याचा दत्तधाम सरकार दरबार सिल केला होता.. आज पुन्हा आरोपीला घेऊन पोलीस गडगेच्या घरी पोहचले आणी महत्वाचे दस्तऐवज, सिसीटिव्हीचे डिव्हीआर यासह लाखो रूपये जप्त केले आहे.. डॉ कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी..0
0
Report
राहुरी विधानसभा पोटनिवड: कल मतदान, 3,33,543 मतदाता, 374 केंद्र, सुरक्षा मजबूत
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्या नगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे... राहुरी मतदारसंघात 3 लाख 33 हजार 543 मतदार आहेत... मतदान प्रक्रियेसाठी एकूण 374 मतदान केंद्र आहेत तर मतदान प्रक्रियेसाठी 1745 कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहेत. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलीये... केंद्रासाठी लागणारे ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि इतर लागणारे साहित्य मतदान कर्मचाऱ्यांना थेट मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहे...उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
कोवाड गाँव के फलक पर नागर समस्या से शादी तय में अड़चनें, कोल्हापुर चर्चा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरविण्यात अडचणी?? कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील फलक लेखक स्वामीकार रणजीत देसाई यांचं गाव अशी कोवाडची ओळख ताम्रपर्णी नदी काठावरील कोवाड हे गाव रस्ते पाणी कचरा या समस्यांमुळे कोणी मुली देईनात... अज्ञातांनी लावलेला फलक जोरदार चर्चेत....0
0
Report
नागठाणे नदी के दूषित पानी से हजारों मछलियाँ मर गईं, स्थानीय लोग आक्रोशित
Sangli, Maharashtra:नागठाणे ओढ्यात दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीतल्या पलूस तालुक्यातील नागठाणे येथे ओढ्यात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप स्थानीय नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे हजारो मृत माशांचा खच ओढया पात्रात पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत नागरिकांकडून तक्रार करूनदेखील दुर्लक्ष होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.0
0
Report
सिंधुदुर्ग में टोल वसूली फिर शुरू, विपक्ष का तीखा हमला—गडकरी पर आरोप
Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या ओसरगाव येथील टोल नाक्याच्या शुभारंभाचे संकेत मिळाले आहेत. केंद्र शासनाने याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली असून 23 तारीख पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार असून 24 तारीख रोजी टोल वसुली साठी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. 2023 साली टोल वसुली सुरू करण्यात आली होती मात्र स्थानिक पदाधिकारी आणि प्रवासी संघटनांनी विरोध केल्यामुळे टोल वसुली थांबली होती. मात्र आता पुन्हा एकदा टोल वसुली केली जाणार असल्याने विरोधक आक्रमक झाले असून नितीन गडकरी हे सिंधुदुर्गात टोल सुरू करण्यासाठीच आले होते असा आरोप करत टोल वसुलीला आपला विरोधच राहील अशी भूमिका ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतलीय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या टोल वसुली नंतर राजकीय नेते व स्थानिक काय भूमिका घेतात या कडे आता सर्वांच लक्ष लागलेय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
