icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

खत विक्रेताओं के लाइसेंस निलंबित, 10 विक्रेताओं को कड़ी चेतावनी

Bhandara, Maharashtra:३६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित.... १० जणांना मिळाली सक्त ताकीद खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील १९७ खत विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने २१ एप्रिल रोजी ४६ विक्रेत्यांची सुनावणी घेण्यात आली. युरिया, डीएपीसारख्या अनुदानित खतांची ई-पॉस मशीनद्वारे विक्री न करणे, तसेच अन्य तक्रारींत तथ्य आढळल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी ३६ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले, तर १० विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
0
0
Report
0
0
Report

अँकर लासलगाव के डंपिंग ग्राउंड से बदबू, स्कूल-कॉलेज के आसपास स्वास्थ्य संकट

Yeola, Maharashtra:अँकर लासलगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या परिसराच्या अगदी जवळ शाळा आणि महाविद्यालये आहेत. डम्पिंग ग्राउंडवर साचणाऱ्या कचऱ्यामुळे आणि त्यातून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या त्रासाची तीव्रता अधिक वाढते. सध्या सुरू असलेले स्वच्छतेचे काम पाहता, प्रशासनाने यापुढेही या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू देऊ नयेत अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

भीषण गर्मी से किसानों के पेड़ सूखने लगे, जलस्तर घटने से नुकसान बढ़ रहा

Yavatmal, Maharashtra:उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उपयोगी फळझाडे जगविने कठीण झाले आहे. नवीन फळबागा देखील संकटात सापडल्या आहेत. या हंगामात लागवड झालेली रोपे जळाली असून, काढणीला आलेला आंबा तसेच संत्रावर्गीय पिकांवर काळे डाग पडत आहेत. उन्हाच्या प्रखरतेमुळे उभी झाडे करपू लागली आहे कारण भुजल पातळी देखील कमालीची खालवली आहे. परिणामी विहिरींनी तळ गाठला असून बोरवेल मधील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे शेतात बांधावर लावण्यात आलेले फळझाडे पाण्याअभावी वाळत आहे. पाणी नसल्याने फळबागधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे ही झाडे जळण्याच्या मार्गावर आहेत.
0
0
Report

हिंदी में headline: हिंगोली में गर्मी से जल संचय कम, 30 छोटे तालाब सूखे की कगार पर

Hingoli, Maharashtra:अँकर - राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम जलसाठ्यांवर होताना दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक लघु सिंचन प्रकल्प आणि तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली असून धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे जिल्ह्यात एकूण 30 छोटे-मोठे लघु सिंचन प्रकल्प असून त्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यांची पातळी झपाट्याने खाली येत आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 30 लघु सिंचन तलाव जोत्याखाली गेलेली पाणी पातळी – 9 तलाव पूर्णत कोरडे पडलेले तलाव-4 0 ते 25 टक्के पाणी साठा – 14 तलाव 26 ते 50 टक्के पाणी साठा – 1 तलाव व्हिओ - पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. काही ठिकाणी जिलजीवन मिशनच्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा ठरत आहे. पुढील काही दिवसांत पावसाळा येईपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोराड्या पडलेल्या तलावासमोरून याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी..
0
0
Report
Advertisement

कल्याण में देश की पहली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी के स्मारक का भूमि-पूजन

Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या देशातले पहिल्या स्मारकाचा असणार आहे या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या स्मारकाचे भूमीपूजन संपन्न झाले. या स्मारकासाठी विशेष प्रयत्न करणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत: आधुनिक जिम, विविध कौशल्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑडीटोरियम तसेच इतर महिला सक्षमीकरणाच्या सुविधा. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्मारक एक महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
0
0
Report

जुन्नर के भीषण एक्सीडेंट में नायब तहसीलदार की मौत

Barav, Maharashtra:Anchor: जुन्नर तालुक्यातल्या भीषण अपघातात जुन्नरच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर हायवा आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला.या अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर महसूल विभागातील कर्मचारी विजय खर्तोडे (वय ४८) हे गंभीर जखमी झाले असून तुषार भीमराव कोरडे (वय ३५) हे किरकोळ जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, महसूल अधिकाऱ्यांची Honda City (कार क्रमांक MH 12 FF 6423 ) बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात होती. त्याचवेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवाची(क्रमांक-MH 14 K00812) हा ایس कॉर्नरवर समोरासमोर जोरदार धडक झाली.अपघात इतका भीषण होता की कार फिरून उलट दिशेला वळली.घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.दरम्यान, गंभीर जखमी अनंता गवारी यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
0
0
Report
Advertisement

आदिवासी विकास मंत्री ने गडचिरोली में धान खरेदी के लिए तैयारी के निर्देश दिए

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी घेतला सविस्तर आढावा, पावसाळ्यापूर्वी सर्व धान उचल पूर्ण करण्याचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सविस्तर आढावा घेता. पावसाळ्यापूर्वी सर्व धान उचल पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे देण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. कोणत्याही परिस्थितीत धानाचे नुकसान होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याबाबत ते आग्रही होते. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेच्या आढावा बैठकीत विभागाचे उच्चाधिकारी उपस्थित होते. बैठकीत धान वाहतुकीसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार 100 टक्के जीपीएस यंत्रणा अनिवार्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या बाबतीत कोणतीही सूट मिळणार नसून सर्व वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि नियंत्रण राखण्यासाठी जीपीएस प्रणाली प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. धान साठवणुकीसाठी आवश्यक गोदामांची कमतरता लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश देत साठवण क्षमता वाढविण्यावर त्यांनी भर दिला. वनपट्टा धारकांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे, ई-पीक पाहणी 100 टक्के पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे आणि सोसायट्यांमार्फत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डॉ. उईके यांनी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी संवाद साधत कौतुक केले.
0
0
Report

धुळे के खардे में 1200 बिस्तर वाले तपनभाई पटेल मेमोरियल अस्पताल का उद्घाटन

Dhule, Maharashtra:मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील तपन पटेल मेमोरियल हॉस्पिटलच्या लोकार्पण केले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीश पटेल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. हे रुग्णालय 1200 खाटांचे आहे. उत्तर महाराष्ट्रात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. राज्यातील सीमावर्ती भागातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा, खर्दे बुद्रुक येथील 'एसव्हीकेएम' संस्थेचा 1200 खाटांचा 'तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल' हा प्रकल्प आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या सीमांवरील आदिवासी व वंचित घटकांसाठी 'कैशलेस' आरोग्य सुविधा पुरवणारा हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण में घर बुलाकर युवती का विनयभंग, आरोपी 35 वर्षीय आसिफ मिर्जा के खिलाफ मामला दर्ज

Kalyan, Maharashtra:घरात बोलावून तरुणीचा विनयभंग,कल्याणमधील धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये एका २० वर्षीय तरुणीचा घरात बोलावून विनयभंग करण्यात आलाय .या प्रकरणी ३५ वर्षीय आसिफ मिर्ज़ा यांच्या विरोधात कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरझाने शेजारी राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला त्याच्या मोबाईलमधील पीडीएफ फाइल समजत नसल्याचे सांगून मदतीच्या बहान्याने आपल्या घरी बोलावले. शेजारी असल्यामुळे तरुणी त्याच्या मदतीसाठी गेली. मिर्झा घरात एकटा असतांना त्याने अश्लील कृत्य करत तरुणीचा विनयभंग केला.या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ तेथेून पळ काढत आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी मिर्हाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top