icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जयकुमार गोरे ने मित्र पक्षों को सूचक इशारा देकर हिशोब की नसीहत दी

Sangli, Maharashtra:स्लग - राजकारणामध्ये हिशोब ठेवायला शिकवलय-मंत्री जयकुमार गोरेंचा मित्र पक्षांना सुचक इशारा.. राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो,हे आम्हाला देवेंद्र फडणीस यांनी शिकवलंय,अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगली-सातारा विधानसभेतील मत फुटींवर सूचक इशारा दिला आहे.राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो,पण तो निवडणुकीपूर्वी करायचा असतो,अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडतो हा वेगळा विषय आहे,पण राजकारणात हिशोब ठेवायला देवेंद्र फडणवीस यांनी शिकवलं आहे,असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटली आहेत,यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे. बाईट - जयकुमार गोरे - ग्रामविकास मंत्री.
0
0
Report

वाशिम में शिंदे गट प्रवेश से राजनीतिक हलचल तेज; ठाकरे 27 जून दौरे पर

Washim, Maharashtra:वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २७ जून रोजी वाशिम दौऱ्यावर येणार असून वाशिम जैन भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या तयारीसाठी झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय देशमुख यांच्यासोबत एकही प्रमुख पदाधिकारी जाणार नसल्याचा दावा सहसंपर्कप्रमुख सुधीर कव्हर यांनी केला असून, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास व्यक्त केला.
0
0
Report

चंद्रपुर में भारी बारिश ने गर्मी से राहत दी; ऑरेंज अलर्ट जारी

Chandrapur, Maharashtra:टायटल:---दीर्घ कालावधीनंतर चंद्रपुरात बरसला मुसळधार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा अँकर:-- आज सकाळपासून चंद्रपूरचे तापमान उष्ण असताना दुपारी अचानक आभाळ भरून येत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेले 20 दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या चंद्रपूरकरांना पावसाने चिंब भिजविले. सात जून हा चंद्रपुरात पावसाचा आगमनाचा दिवस असताना यंदा पहिला मुसळधार पाऊस आज बरसलेला दिसला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या विविध भागात पाणीटंचाई तीव्र होत असताना जूनमध्ये पाऊस हजेरी लावणार की नाही अशी शंका शेतकरी व नागरिकांच्या मनात होती. मात्र आज सुमारे अर्धा तासापासून जोरदार पाऊस बरसत असून त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस असाच सातत्याने बरसत राहावा अशीच नागरिकांची इच्छा आहे. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता तो प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

यवतमाळ के नेताजी मार्केट में अतिक्रमण हटाओ के विरोध में व्यापारी मोर्चा जिला कार्यालय पर धावा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या नेताजी मार्केट मधील फुटपाथ दुकानदारांवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात विदर्भ अन्याय निवारण समितीच्या क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. "आधी पुनर्वसन, मगच कारवाई!" अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. मोर्चात शेकडो अतिक्रमणधारक तसेच व्यापारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. "यवतमाळ शहरातील शासकीय भूखंड बिल्डर लॉबीला विकण्यासाठी भूमाफियांच्या संगनमताने डाव आखला जात आहे," असा खळबळजनक आरोप यावेळी व्यापारी वर्गाकडून करण्यात आला. नेताजी मार्केटमधील ४०-५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या शेकडो लघु दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून, सुमारे २०० कुटुंबे आणि ३०० हून अधिक बेरोजगार तरुण यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही पुनर्वसन न करता थेट बुलडोजर कारवाई करणे अमानवी असल्याचा आरोप करण्यात आला.
0
0
Report

पंढरपुर की विठ्ठल-रुक्मिणी मूर्ति का रासायनिक लेपन अगले आदेश तक रोक

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीस प्राणप्रतिष्ठापना केली आहे वारकऱ्यांच्या भावनेनुसार मूर्ति मध्ये प्राण आहेत त्यामुळे या मूर्ति ला रासायनिक लेप लावणे चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबत पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात लेपन प्रक्रिया थांबवण्याबाबत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेचा निकाल आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही लेपन प्रक्रिया करू नये असे न्यायालयाने म्हटले आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिर येथील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर केला त्या बाबी ऐकून घेतल्यानंतर या लेपन प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप आपल्याकडे कोणतीही प्रत प्राप्त झालेली नाही त्यामुळे ते प्राप्त झाल्यावर आपण याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. ---- Byte - धनंजय रानडे , वकील रामकृष्ण वीर, वारकरी पाईक संघ गणेश लंके याचिका कर्ते राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
0
0
Report
Advertisement

खेडशी में डंपर ने बाइक को टक्कर दे दी, महिला की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडशी येथे डंपरने दुचाकीला उडवले; डंपरखाली सापडून महिला ठार अँकर मुंबई - गोवा महामार्गवरील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर खेडशी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव येणाऱ्या डंपरने समोर असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेल्या जाकादेवी येथील पांचाळ कुटुुंबापैकी महिला डंपर खाली सापडून ठार झाली आहे. अपघातानंतर डंपर महामार्गावरून थेट दहा फूट खाली कोसळला. याच डंपर खाली सापडून महिला ठार झाली. अपघातानंतर या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातापूर्वी याच ठिकाणी रिक्षाचा देखील अपघात झाला होता.
0
0
Report
Advertisement

ठाणे: सुलेखा चौहान के जाति प्रमाणपत्र मामले में कार्रवाई के आदेश

Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील बहुचर्चित बिनविरोध निवडून आलेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद धोक्यात.. बोगस जात प्रमाणपत्र बाबत धुळे जात पडताळणी विभागाने सुलेखा चव्हाण यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सदरची घटना निदर्शनात आणून देत कारवाईचे आदेश देखील दिले आहे.. लकी जाधव अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवक अध्यक्ष यांनी ही घटना उघडकीस आणली असून येणाऱ्या काळात कारवाई न झाल्यास शिंदे सेना व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले... या बाबत लकी जाधव यांना ठाकरेंच्या सेनेने देखील पाठिंबा दिला आहे... केदार दिघे UBT ठाणे जिल्हा प्रमुख
0
0
Report

टीडीसीसी चुनाव प्रचार के बीच हितेंद्र ठाकूर ने हार्दिक राऊत पर तीखा हमला

Vasai-Virar, Maharashtra:टीडीसीसी बँणडणूक : सहकार पॅनलच्या सभेत हितेंद्र ठाकूरांचा संताप ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापले आहे. वसई येथे झालेल्या सहकार पॅनलच्या प्रचार सभेत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाशी बंडखोरी करून विरोधी पॅनलमधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यावर तीव्र टीका केली. “ज्यांना आपण सर्व काही दिले, तीच माणसे आज विरोधात उभी आहेत,” असे म्हणत ठाकूर यांनी राऊत यांच्यावर मतांसाठी कार्यकर्त्यांकडे याचना केल्याचा आरोप केला. तसेच “जे गेले ते मेले, आता कोणतीही तडजोड नाही,” असा इशारा देत त्यांनी भर सभेतच हार्दिक राऊत यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्याचे आदेश ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांना दिले. दरम्यान, ठाकूरांच्या आदेशानंतर राऊत यांच्यावरील कारवाईचे पत्र लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ पाटील यांनी दिली. या घडामोडींमुळे टीडीसीसीची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. बाईट- हितेंद्र ठाकूर,
0
0
Report

ओमराजे के बगावत से महाविकास आघाड़ी को बड़ा झटका; बसवराज पाटील की जीत

Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका? विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तब्बल 150 फुटली . भाजपाचे बसवराज पाटील मराठवाड्यात सर्वाधिक मताधिकांनी विजयी. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी तब्बल 720 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला आहे. बसवराज पाटील यांना 844 मते, तर महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना केवळ 125 मते मिळाली. या निकालानंतर महाविकास आघाडीची सुमारे 150 मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीत प्रवेशानंतर ही क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावा महायुतीकडून केला जात असून, ओमराजेंच्या निर्णयाचा हा पहिला राजकीय परिणाम मानला जात आहे. मात्र, या मतफुटीबाबत महाविकास आघाडीतील नेते अद्याप अधिकृत भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आता या निकालानंतर धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top