445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अभिजित बिचुकले बोले: आषाढ़ी वारी का खर्च सरकार उठाएगी, एकता दिखे वारकरी
Satara, Maharashtra:सातारा - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अभिजित बिचुकले यांनी वारकरी संप्रदायाच्या एकतेचे कौतुक करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व जाती-धर्मांचे वारकरी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांनी वारकऱ्यांकडून एकतेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेते अभिजित बिचुकले आले होते.वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या स्वागत कमानींवर टीका करत, हा निधी वारकऱ्यांच्या अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांवर खर्च केला असता त्याचा अधिक फायदा झाला असता, असेही त्यांनी म्हटले. शासन वारकऱ्यांच्या सेवेत कमी पडत असल्याचा आरोप करत, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर आषाढी वारीचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलणार आणि वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देणार नाही,अशी घोषणा अभिजित बिचुकले यांनी केली.0
0
Report
लोडशेडिंग के विरोध में किसानों का आक्रोश, खामखेडा में बिजली उपकेंद्र के पास प्रदर्शन
Nashik, Maharashtra:- लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचा हुंकार... - नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा अंधार जनआक्रोश मोर्चा गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतशिवारातील वारंवार होत असलेल्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी देवळा तालुक्यातील खामखेडा येथील ३३/११ केव्ही महावितरण वीज उपकेंद्रावर "अंधार जनआक्रोश मोर्चा" काढत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. हातात मेणबत्त्या आणि टेंभे घेऊन काढण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी लोडशेडिंगच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत “अंधार नको, वीज हवी!”, “लोडशेडिंग बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.0
0
Report
दापोली के सुतारवाडी में दराड-खतरे से लोग सुरक्षित स्थानों पर रवाना
Ratnagiri, Maharashtra:दापोली/ रत्नागिरी दापोलीत सुतारवाडीवर दरड कोसळण्याचे संकट दोन किलोमीटरपर्यंत भेगा; डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांचे स्थलांतर सुरू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत भेगा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी या भेगांची खोली दोन ते चार फूट असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. संभाव्य दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करत नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी-कोकण में मानसून फिर सक्रिय, दस दिनों के बाद भारी बारिश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकणात पहाटेपासून आषाढ सरी जोरदार बंगालच्या उपसागरात कमी दबाच्या पट्ट्यामुळे कोकणात मॉन्सून पुन्हा सक्रिय दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात दमदार पावसाच्या सरी कालपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 46.90 मिलिमीटर पावसाची नोंद सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात 94. 42 मिलिमीटर पावसाची नोंद दापोली चिपळूण आणि मंडणगड तालुक्यात 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद बावनदी सुद्धा सध्या दुथडी भरून0
0
Report
लातूर के रेणापुर में FDA ने बेकरी पर बड़ी कार्रवाई, लाइसेंस निलंबित
Latur, Maharashtra:लातूरच्या रेणापूर शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकत, एका बेकरी वर मोठी कारवाई केली आहे, तपासणी दरम्यान बेकरीत अस्वच्छता आढळली असून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरात येणारे साहित्य बाहेर दिसल्याने FDA च्या अधिकाऱ्यांनी बेकरीचा परवाना जागेवरच निलंबित केला आहे, परंतु परवाना निलंबित करूनही बेकरी राजरोसपणे सुरू आहे0
0
Report
चंद्रपूर में फिर टस्कर हत्ती: किसान दहशत में, प्रशासन सतर्क
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाला आहे. हा हत्ती सामदा-सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आला. सध्या या हत्तीने सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे. या हत्ती पाठोपाठ कळपातील इतर हत्ती सुध्दा परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात हत्ती दाखल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 महिन्यांपूर्वी 30 रानटी हत्तींच्या कळपाने उमरी तलाव क्षेत्रातील जंगलात ठिय्या मांडला होता. 1 जुलैला इतर हत्ती वैनगंगा नदीला पार करून गडचिरोली जिल्ह्यात परत गेले. त्यातील टस्कर हत्ती सुद्धा परतीच्या मार्गावर असतांना त्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. उमरी जंगल परिसरात 3 मोठे तलाव आणि घनदाट जंगल असल्यामुळे हत्तीसाठी पोषक वातावरण आहे. कदाचित त्याच कारणामुळे हत्ती पुन्हा याच परिसरात परत आले असावे असा अंदाज वन विभागाद्वारे वर्तविला जात आहे. खरीप हंगाम सुरू असतानाच हत्तींच्या आगमनामुळे पिकांवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हत्तींच्या आगमनामुळे शेतजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या जंगल परिसरात पाथरी , आसोला- चक, उसरपार- चक, उसरपार/ तुकूम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा ही गावे आहेत. हत्तीच्या आगमनाने गावांतील सामान्य नागरिकांचेही दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.0
0
Report
Advertisement
आषाढ़ी एकादशी के लिए 225 विशेष बसें, पंढरपूर यात्रा सुरक्षित
Akola, Maharashtra:आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून ७ विशेष एसटी बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण अकोला विभागासाठी एकूण २२५ विशेष बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले असून, यात्रेच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने या बस सेवा उपलब्ध राहणार आहेत. अकोला, अकोट, मूर्तिजापूर, कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, व तेल्हारा आगारांमधून या बस चालविण्यात येणार आहेत. तसेच ४५ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास आगाऊ आरक्षणासह गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रेकरूंनी वेळेत आरक्षण करून सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.0
0
Report
रत्नागिरी के आंबा घाट में भीषण दुर्घटना, अज्ञात वाहन ने दुचाकी चालक रामा बाळू माशाळ की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा घाटात भीषण अपघात;अज्ञात वाहनाच्या धडकेत विजापूरचा दुचाकीस्वार जागीच ठार.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात आज पहाटे एक भीषण अपघात घडला. मिठ्या-नागपूर महामार्गावरील दक्खन बस थांब्यापासून जवळच एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, जि. विजापूर) हा तरुण जागीच ठार झाला. तो सापुचेतळे येथून विजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त तरुणाला तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देवरुखचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या असून, अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत..0
0
Report
चंद्रपूर पुलिस पर मानसिक उत्पीड़न और रिश्वतखोरी के गंभीर आरोप, CID मामले में हस्तक्षेप
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर पोलिसांवर मानसिक छळ आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करत दिलीप यादव नामक तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण CID सोपविण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, रुपेश पराते आणि महिला शिपार्ड भावना रामटेके या तिन्हीं पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने शहर पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. मृत दिलीप यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात त्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरून CID तपासाचे आदेश देण्यात आले असून CIDची चमू कालच चंद्रपुरात दाखल झाली आहे. घटना अत्यंत संवेदनशील असल्याने मृतकाच्या शवविच्छेदन प्रक्रिया ಮॅजिस्ट्रेटच्या समक्ष आणि प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडली. आता या प्रकरणात मॅजिस्ट्रेट और CID यांच्या तपासणी兩यंत्रणा द्वारे केली जाईल, साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांची तपासणी स्वतंत्रपणे केली जाईल.0
0
Report
Advertisement
वीरधरण के पानी ने चंद्रभागा में भक्तों को स्नान का आनंद दे दिया
Pandharpur, Maharashtra:चंद्रभागा नदीच्या पात्रात नीरा नदीवरील वीर धरणाच्या पाण्याने वारकऱ्यांनी लुटला स्नानाचा आनंद, वारकऱ्यांच्या स्नानासाठी नीरा माई धावली सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप पावसाने मनावा तसा जोर धरला नाही त्यामुळे चंद्रभागेच्या पात्र कोरडं होतं पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे निरा नदीवरील वीरधरणातून सोडलेले पाणी पंढरपूर मध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे चंद्रभागा नदीमध्ये वारकऱ्यांना स्थानासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे पंढरपूर मध्ये आलेले वारकरी या पाण्यात स्नानाचा आनंद घेत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार १८ जुलै रोजी उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी सोडलेले पाणी एक-दोन दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर चंद्रभागा नदीत भाविकांसाठी मोठ्याप्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे0
0
Report
शिंदे गुट में छह सांसदों के विलयन पर संजय देशमुख ने वाशिम में बयान
Washim, Maharashtra:वाशीम : File:1907ZT_WSM_MP_DESHMUKH रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटात झालेल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानंतर यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी वाशिममध्ये प्रतिक्रिया दिली.हा निर्णय पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हिओ:विकासकामांना गती देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा असून सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून,कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर सहा खासदारांनी हा निर्णय घेतल्याचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.लोकसभा अध्यक्षांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले.तसेच, लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून विकासकामांसाठी केंद्राकडून सहकार्याचे आश्वासन मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. बाईट:संजय देशमुख,खासदार, यवतमाळ-वाशिम.0
0
Report
वाशिम के रिसोड-माले गाव क्षेत्र में हल्की बारिश से किसानों को मिली नई उम्मीद
Washim, Maharashtra:वाशिमच्या रिसोड व मालेगाव तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पावसाचा आगमन झाले पंधरा दिवस पावसाने उघडीस दिल्यानंतर आज या रिमझिम पावसामुळे काही प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळणार. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे。0
0
Report
Advertisement
मुंबई कांदिवली की रिफ्रेंस लॉन्ड्री में दिनदहाड़े मारपीट, FIR पाँच दिन बाद दर्ज
Mumbai, Maharashtra:मंबईच्या कांदिवलीतील लोखंडवाला परिसरातील रिफ्रेंस लॉन्ड्रीमध्ये भरदिवसा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ग्राहकाने थेट लॉन्ड्रीत घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्याने चाकूऐवजी हल्लेखोराच्या हातातील कात्री पकडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉन्ड्रीच्या मालकिणीच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली होती. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. अखेर स्थानिक व्यापारी आणि नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
रत्नागिरी बैंक घोटाला: कदम के आरोपों पर जाँच की मांग, मंत्रिमंडल हस्तक्षेप की मांग
Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी ब्रेकिंग रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; शिवसेना नेते रामदास कदम यांचा गंभीर आरोप रामदास कदम यांच्या आरोपांमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सहकार क्षेत्रात मोठी खळबळ. कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि सहकार आयुक्त यांना निवेदन. कथित गैरव्यवहाराशी संबंधित ११ प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी. बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील_sाखर कारखान्यांना_sुमारे २५० कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचाही केला आरोप. उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कुटुंबातील पाच ते सहा सदस्यांची नुकत्याच झालेल्या भरतीत नियुक्ती झाल्याचा दावा. बँकेत मनमानी कारभार सुरू असल्याचा रामदास कदम यांचा गंभीर आरोप. संदीप आंब्रे नावाच्या व्यक्तीला परस्पर जामीनदार ठेवल्याचा आरोप. सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी. कथित गैरव्यवहारासंदर्भातील कागदपत्रे पुराव्यांसह निवेदनाला जोडल्याचा दावा. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार नकली सोने, नोकरभरती आणि कर्जवाटप प्रकरणांत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप. जिल्हा परिषदेसह रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शासकीय खाती काढून घेण्याची मागणी. या प्रकरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचीही दिली माहिती बाईट: रामदास कदम, शिवसेना नेते0
0
Report
सोलापुर में डी मार्ट के पास दोपहिया दुर्घटना का वीडियो वायरल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील एखाद दुचाकी अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सोलापूर शहरा जवळ असलेल्या सोलापूर - तुळजापूर रस्त्यावरील डी मार्ट जवळ एका दुचाकीच्या झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. तो काही अंतर गेल्यानंतर उजव्या हाताजवळील डिव्हायडरला जाऊन धडकतोय. हा व्हिडिओ मागून येणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. सध्या या व्हिडिओमध्ये जखमीचे नाव समजू शकले नसून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोलापुरातील डी मार्ट जवळचा असल्याचा बोलल जात आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.0
0
Report
Advertisement
