445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापूर में किसानों को कर्जमाफी से राहत, घोटालों और राजनीति गरमाई
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रेस मुद्दे ऑन कर्जमाफी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्णय सरकारने घेतला.. कर्जमाफी थकीत राहिली तर शेतकरी अडचणीत येतील म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले..वीजबिल थकबाकी देखील सरकारने माफ केली. एका कोल्हापूर जिल्ह्यातील 1161 कोटी 2 लाख 55 हजार 168 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.. प्रत्यक्ष जिल्ह्यात कर्जमाफीची संख्या कमी आहे, पण अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्याची संख्या अधिक ऑन अपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांची कर्जमाफी अपूर्ण झालेली नाही. पण दोन लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे त्यांची कर्जमाफी होणारच. ऑन राजू शेट्टी वीज बिल माफी घोटाळा आरोप करणाऱ्यांनी त्यांनी तेांचे मुद्दे मांडावेत.. घोटाळा झाला असेल तर त्यांनी सांगावे.. सध्या देशात आणि राज्यात हवेत बार मारणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे.. ते म्हणतात घोटाळा झाला आहे, आम्ही म्हणतो घोटाळा झाला नाही.. ऑन गोकुळ निवडणूक अनेक संस्था ह्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात. स्वायत्त असणाऱ्या संस्थांमध्ये सरकारने हस्तक्षेप करायचा नसतो. सहकारांमधल्या निवडणुका घेण्यासाठी सहकार प्राधिकरण आहे. ते त्यांचे अधिकार आहेत. सहकार प्राधिकरणाला हायकोर्टाचा निर्णय पोहोचला. जर सहकार प्राधिकरणाला इतक्या घाई मध्ये निवडणुका घेणं शक्य नसेल तर ते कोर्टात जातील.. सहकार प्राधिकरण आधीच मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहे. कोर्टाने त्यांची विनंती फेटाळली तर त्यांना ओढाताण करून निवडणूक घ्यावी लागेल. याबाबत निवडणुका संदर्भात उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही, ती प्राधिकरणाची आहे. ऑन तुकाराम मुंढे तक्रार तक्रारी खऱ्या असतील तर त्याची दखल मुख्यमंत्री घेतील.. त्यांनी कुठे कुठे धाडी मारल्या.. काय कारवाई केली हे ठीक आहे.. पण दूध या विषयात या माणसाने बोगस दूध सर्व बंद केले. बोगस दुधामध्ये फक्त पाणी नाही तर शरीराला घातक असणारे अनेक रसायन आहेत. अस असताना देखील त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात.. ऑन अमित शहा राजीनामा लोकशाहीची ब्युटी अशी आहे.. तुम्ही देखील आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत.. आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही.. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे.. तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. ज्यांना पकडलं ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते त्याचं पोलिसांनी विश्लेषण केल आहे. पोलिसांनी सांगितल्या आहे, तिथे पडलेले प्रत्येक दगड उचलले आहे.. त्या दगडावर असणारे फुट प्रिंट आधारशी लिंक होतील. एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत.. अमित शहा यांनी हा लाठीचार्ज करायला लावला.. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांना देखील प्रूव्ह करावं लागेल आणि राहुल गांधी यांना देखील प्रूव्ह करावा लागेल. On हाताळण्यात गृहमंत्रालय अपयशी परदेशातील मदत.. काही बॅड एलिमेंट असणं.. अशी माहिती असल्यामुळेच आपण व्यवस्थित सर्व गोष्टी हाताळत होतो.. जोपर्यंत ते संसदेकडे गेले नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणी काही केले नाही... पण ज्या वेळेला ते संसदेकडे निघाले ही कळालं, त्यावेळी ते संसदेमध्ये घुसले असती तर काय स्थिती झाली असती, याचा विचार तुम्ही करा. ऑन राहुल गांधी इशारा माहित नाही याचा विचार करणारे करतील.. तुम्हाला आणि मला स्वतःला असं समजावता आलं पाहिजे.. आपल्याला शेतकरी कर्जमाफीवर बोलायला सांगितले आहे तर त्यावर बोलायचं.. शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं ठरला आहे तर त्यावरच दोघांनी बोललं पाहिजे. मला वाटतं कर्जमाफी हा विषयात शेतकरी जेवढा समाधानी आहे तेवढं तुम्ही देखील समाधानी आहात.. त्यामुळे तुम्हाला इतर प्रश्न विचारायचे असतील. ऑन ईचलकरंजी भाजपा अंतर्गत धुसफूस दोन जिवंत माणसे, जिवंतपणे काम करतात.. झोपा काढत नाहीत. त्यावेळी काहीतरी असतं.. त्यावेळी कुटुंबप्रमुख त्यांना बोलून घेतात आणि तोडगा काढतो. मग ते पेल्यातील वादळ ठरतं. ऑन मराठी भाषा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, जे जे करायला पाहिजे तो ते निर्णय घेतलाय. राज्य म्हणून निधीची मागणी करावी लागते. जिथं जिथं मराठीला सक्षम करावं लागणार आहे तिथे तिथे मराठी सक्षम केली आहे. पुण्यामध्ये जे साहित्य संमेलन घ्यायचं आहे, त्याला खूप मोठं बळ देण्याचाही सरकारने ठरवले आहे.0
0
Report
wardha: राजस्थान के दो शातिर चाकू दिखाकर लूट की कोशिश के आरोप में गिरफ्तार
Wardha, Maharashtra:चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांना अटक; राजस्थानातील दोन सराईत आरोपी वडनेर पोलिसांच्या जाळ्यात वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानातील दोन सराईत आरोपींना वडनेर पोलीसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, टोल नाक्यांवरील तपासणी आणि तातडीच्या नाकाबंदीच्या मदतीने ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली. विवो - गुणवंत वसंतराव झाडे (रा. छोटी आर्वी, ता. हिंगणघाट) हे पत्नीवर उपचार करून गावी परतत असताना अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यात आला आणि नाकाबंदी करून विशालसिंग दयालसिंग गवारिया (वय 26, रा. भिलवाडा, राजस्थान) व सांवरमल माधवलाल लोहार (वय 25, रा. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपी वाहनांची ओळख लपवण्यासाठी विविध राज्यांच्या नंबर प्लेटचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून महिंद्रा XUV-500 वाहन, विविध राज्यांच्या नंबर प्लेट, मोबाईल फोन, फास्टॅग तसेच धारदार चाकू असा एकूण ₹12.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.0
0
Report
सोलापूर विद्यापीठ दीक्षांत समारोह में सिनेट सदस्यों का गुस्सा, आसन-व्यवस्था पर हंगामा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात सिनेट सदस्यांचा गोंधळ - सोलापूर विद्यापीठातील सिनेट सदस्यांचा राज्यपालांसमोर संताप - सिनेट सदस्यांना आसन व्यवस्था न केल्यामुळे सिनेट सदस्यांचा व्यासपीठासमोरच ठिय्या - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात सिनेट सदस्यांची कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्यावर व्यक्त केली तीव्र नाराजी0
0
Report
Advertisement
मालेगाव रेल हादसे में दो लोगों की मौत, शवों की जांच जारी—पुलिस investigating
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर जिल्ह्यातील मालेगाव टाऊन भागात रेल्वेखाली येऊन अपघातात दोघांचा मृत्यू मालगाडी थोड्यावेळापूर्वी गेली असून दोघेही रेल्वे खाली आलेल्या अवस्थेत आढळले प्राथमिक अंदाजानुसार दोघे शेतात गेले होते, यात नेमका अपघात आहे की आत्महत्या तर्कवितर्क लावले जात आहे. सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल, नेमकं काय घडलं याची माहिती घेणं सुरू शरीराचे अवयव गोळा करून शवविच्छेदनास पाठवणार.. सावनेर पोलीस घटनास्थळी पोहोचून नेमकं काय घडलं याचा शोध घेणे सुरू...अद्याप काय झालं अस्पष्ट0
0
Report
नागपूर के मंदिर में दानपेटी चोरी: पुजारी ने हाथ जोड़कर माफी मांगी
Nagpur, Maharashtra:नागपूर मंदिराच्या दानपेटीतून चोरट्यांनी पैसे केले साफ मात्र तत्पूर्वी हात जोडून म्हटले देवा आम्हाला कर माफ... नागपूरातील चोरट्यांची मंदिरात चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही चित्रित लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मालधक्का रोडजवळ शीतला माता मंदिर व त्याच्या शेजारील मंदिरात 27 तारखेला सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले.. या मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 तारखेला सकाळी ते मंदिरात आले असता मंदिराचे कुलपे तुटलेली दिसली... यावेळी सीसीटीव्ही तपासले असता दोन चोरटे शीतला माता मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरत असल्याचे दिसून आले दानपेटीतून पैसे चोरी करण्यापूर्वी दोन पैकी एका चोराने आधी हात जोडून मागितली देवाची माफी आणि मग केले मंदिरातील दानपेटीतून पैसे साफ या घटनेनंतर लाकडकंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.. यापूर्वी सुद्धा मंदिरातून चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग की हालत बदतर, गड्ढे-चिखल से यात्री परेशान; टोल वसूल की तैयारी
Wada Thikanat, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्ग रखडलेलाच;खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य असूनही टोल वसुलीची तयारी! गेली १७ ते १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने कोकणवासीयांसह प्रवाशांचे प्रचड हाल होत आहेत... संगमेश्वर ते लांजा दरम्यान रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून उखडलेले रस्ते,भेगा आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे.. मंत्री आणि सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असून अनेक ठिकाणी काम ठप्प झाले आहे.. महामार्गाची ही दैना उघडी पडलेली असतानाच दुसरीकडे टोल वसुलीची तयारी सुरू असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
वाशिम जिले में बारिश नहीं, जल संकट गहराने की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.आज सकाळपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला,तरी जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्याची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे.१ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १७१ मिलीमीटरची तूट आहे. जिल्ह्यातील १६० लघु प्रकल्प आणि दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १२.७० टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात अवघा ४.५१ टक्के पाणीसाठा उरला आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून,जिल्ह्याला आता दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची नितांत गरज आहे。0
0
Report
मराठी बोलने से इनकार पर मनसे ने सुरक्षा रक्षक को धडा सिखाया, नौकरी रोकी
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: नवी मुंबई सीवूड्स मधील एनआरआय कॉम्प्लेक्स या सोसायटी मधील पुरुषोत्तम सिंग या परप्रांतीय सुरक्षारक्षकाने मराठी रिक्षा चालकासोबत वाद घालत मराठी बोलण्यास नकार दिला. "मैं मराठी बोलूंगा नहीं" असे उद्धटपणे बोलून व्हिडिओ काढणाऱ्या रिक्षा चालकाच्या मोबाईल वर फटका मारला. याची तक्रार रिक्षा चालकाने मनसे कडे केली असता मनसे कार्यकर्त्यांनी मग्रूर सुरक्षा रक्षकाला चांगलाच धडा शिकवला. सदर सुरक्षारक्षकाने मराठी चा अपमान केला म्हणून माफी मागितली असून मराठी शिकत नाही तोपर्यंत या सुरक्षा रक्षकाला कामावर घेऊन नाका अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलेय。0
0
Report
शिवसेना ठाकरे गट ने गुलाबराव पाटील के विवादित बयान के बाद राजीनामा की मांग तेज की
Pandharpur, Maharashtra:Anchor - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. माळशिरस तालुक्यातील संगम येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली0
0
Report
Advertisement
बीड नगर परिषद के सत्ता संघर्ष में आमदार संदीप क्षीरसागर का निशाना
Beed, Maharashtra:बीड़ नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. शहर विकासाच्या ठरावावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्येच मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या वादात आता बीड़चे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही उडी घेत थेट इशारा दिला आहे. कोणीही दंड थोपटू नये, भ्रमात राहू नका... जनतेने अजित पवारांकडे पाहून कौल दिला आहे.. त्यामुळे जनतेची कामे करा, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर निशाणा साधला. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी…0
0
Report
Ambegaon के मलिन गाँव में 12 साल बाद भी जख्म ताजा हैं
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... हे नाव उच्चारलं तरी आजही अंगावर शहारे येतात. ३० जुलै २०१४ च्या त्या दुर्दैवी पहाटे डोंगराची प्रचंड दरड कोसळली आणि संपूर्ण गाव काही क्षणांत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेत तब्बल १५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या थरारक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र या दुर्घटनेच्या जखमा आजही ताज्याच आहेत.0
0
Report
वंचित बहुजन आघाडी के प्रदेशाध्यक्ष और कार्यकारिणी सदस्य के लिए आज मतदान शुरू
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीला आज राज्यभर उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य पदांसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया पार पडत असून, अकोल्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिकृत व आजीवन सदस्य मतदानाचा हक्क बजावत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीसाठी आज राज्यभर लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या वतीने मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून कार्यकारिणी सदस्य पदासाठी एकूण २५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत सदस्य तसेच आजीवन सदस्य मतदानाचा हक्क बजावत आहेत.राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून झालेल्या मतदानाच्या मतपेट्या मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार असून तेथे मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा अंतिम निकाल २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणी सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.0
0
Report
Advertisement
मालेगांव के नोमानी पुल के पूरी नहीं होने से हादसा और नागरिकों की उग्र मांग
Nashik, Maharashtra:मालेगावच्या नोमानी पुलावरून पाय घसरून सात वर्षाचा बालक गेला वाहून.. पुलाचे काम अर्धवट असल्याने काम पूर्ण करण्याच्या मागणीवरून नागरिक उतरले रस्त्यावर... मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीवर आलेल्या नोमानी पुलाचेल्या गेल्या 4 वर्षा पासून रखडलेले काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी नदीवर असलेल्या छोट्या पुलावर धरणे आंदोलन सुरु केले. नदीवर छोटा पूल असून त्याला काठडे देखील नाही पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो चार दिवसा पूर्वी पुलावरून जाताना पाय घासरून सात वर्षाचा मुलगा वाहून गेला आज एक रिक्षा वाहून गेली या अगोदर देखील अशा घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जर पुलाचे काम पूर्ण झाले असते तर जीवित हानी झाली नसती त्यामुळे तातडीने अर्धवट असलेले पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे0
0
Report
शिर्डी साईं मंदिर में गुरु पूर्णिमा उत्सव का समापन, लाखों भक्त दर्शन के लिए जुटे
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गुरूपोर्णीमा उत्सवाची आज सांगता होत आहे.. साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते साईमंदिर परीसरातील गुरूस्थान मंदिरात पारंपारीक पद्धतीने रूद्राभिषेक करण्यात आला.. आज उत्सवाचा तीसरा दिवस असून काल्याच्या किर्तनानंतर साईमंदिरात दहिहंडी फोडून गुरूपोर्णीमा उत्सवाचा सांगता होणार आहे.गेल्या तीन दिवसात लाखो भक्तांनी साईमंदिरात दर्शनासाठी हजेरी लावलीय..0
0
Report
बुलढाणा में गैस टैंकर चोरी: काला बाजार के बड़े रैकेट का पर्दाफाश
Buldhana, Maharashtra:LPG गैस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरून काळा बाजार करणार रॅकेट पकडलं. मंत्रालयातील पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाची खामगाव शहरानजीक मोठी करवाई. बुलढाणा जिल्हा स्थानिक पुरवठा विभागाच्या नाकावर टिचून चालणारा एलपीजी गॅसचा काळाबाजार उघडकीस. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव शहरा नजीक सुदर्शन हॉटेल शेजारी असलेल्या एका पडक्या घरात महामार्गावरून एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅसची चोरी करताना अन्न व पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकून टँकर मधून एलपीजी गॅसची चोरी होताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी राज्यदक्षता पथकाला या अशाप्रकारे गॅस चोरीच परिसरात मोठ रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून हा गॅस चोरीचा व काळ्या बाजाराचा अवैध धंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा टँकर गुजरात भडुच येथून अकोला जिल्ह्यातील पणज येथे जात होता. मात्र वाटेवरच खामगाव शहरा नजीक असलेल्या सुदर्शन ढाब्यावर ठरल्याप्रमाणे चालक हा जेवणासाठी थांबला व त्याच ठिकाणी बाजूला असलेल्या एका पडक्या घरात उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात आलेल्या मशिनरीच्या सहाय्याने टँकरचं सील तोडून हा गॅस चोरी करून व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरल्या जात होता व हे व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारात विकल्या जात होते. बाईट - रुपेश बिजेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी. एकीकडे सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर हवा असल्यास अनेक प्रक्रियेतून जावं लागतं आणि महाग असलेला सिलेंडर घ्यावा लागतो मात्र अशा प्रकारे एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या या रॅकेटच्या सूत्रधारावर काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असेल. दक्षता पथकाने गॅस टँकर सह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक पुरवठा विभागाकडे सोपविला आहे स्थानिक पुरवठा विभागाचे अधिकारी व खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा व त्यानंतरची पुढील कायदेशीर प्रक्रिया करणार आहेत.0
0
Report
Advertisement
