icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अहिल्यानगर स्टेशन रोड पर विद्युत खंभे से स्पर्श, चार वर्षीय चिमुरडी की मौत

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहर के स्टेशन रोड परिसर में विद्युत खंभे को स्पर्श होने से चार वर्षीय चिमुरडी की दुर्दैवी मौत हुई है... प्रियंका गांगर्डे नामक व्यक्ति का विद्युत प्रवाह का झटका लगने से मासूम की मौके पर ही मौत हो गई है। संततधार बारिश के कारण विद्युत खंभे में प्रवाह उतरने की प्रारम्भिक जानकारी है। घटना के बाद पूरे क्षेत्र में हड़कंप मच गया है; बारिश के कारण पहले से विजली के प्रकरण चल रहे थे, अब एक चिमुकली की मौत से महावितरण के खिलाफ आक्रोश बढ़ गया है। राष्ट्रवादी नगरसेवक तथा पदाधिकारी महावितरण कार्यालय पहुँचकर ठिय्या आंदोलन कर मुली की मौत के जिम्मेदार कर्मचरियों के निलंबन की मांग कर रहे हैं।
0
0
Report

अकोला: 35 साल बाद हत्या के आरोपी की पकड़, खदान पुलिस की बड़ी सफलता

Akola, Maharashtra:अकोला शहरातील खदान पोलीसांनी तब्बल साडेतीन दशकांपासून कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या खून प्रकरणातील आरोपीला अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. १९९१ मध्ये पत्नीच्या खुनानंतर फरार झालेला आरोपी अखेर अकोल्यातच पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अत्यंत जुन्या गुन्ह्याचा तपास, आरोपीची ओळख आणि त्याचा माग काढणे हे मोठे आव्हान असतानाही खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. २९ मार्च १९९१ रोजी अकोला शहरातील गौतम नगर, जुना आरटीओ कार्यालय परिसरात पत्नी चित्रलेखा एकनाथ गायकवाड यांच्या खुनानंतर आरोपी पती एकनाथ सत्यमान गायकवाड हा फरार झाला होता. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल ३५ वर्षे आरोपीचा शोध सुरू होता.दरम्यान, अकोला न्यायालयाने आरोपीविरुद्ध स्टँडिंग वॉरंटही जारी केले होते. राज्यातील विविधठिकाणी शोधमोहीम राबवूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, आरोपी स्वतःची मालमत्ता विक्रीसाठी अकोल्यात येणार असल्याची गोपनीय माहिती खदान पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.३५ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपीची ओळखपटवणे आणि त्याचा मागोवा घेणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. तरीही सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात आली. तीन दशकांहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला अटक झाल्याने अकोला पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
0
0
Report

देहू की इंद्रायिणी नदी खतरे की पंक्ति पार, पालखी यात्रा के लिए सतर्कता बढ़ी

Varsoli, Maharashtra:हवेली तालुक्यात आज मुसळधार पावसाने अक्षरशः धुवाधार बॅटिंग केली असून, श्रीक्षेत्र देहूमधील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अवघ्या काही तासांवर संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ येऊन ठेपली असताना, संतनगरी देहूवर पावसाने हिरवाईची दुलई पांघरली आहे. इंद्रायणी नदी आपल्या नदीपात्रात दुथडीच्या वेगाने वाहताना दिसत आहे. देहू नगरीची विहंगम दृश्ये विविध ठिकाणी पाहण्यासारखी आहेत. मात्र, वाढलेल्या नदीपात्रामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला महापालिका क्षेत्र-१४ में दूषित पानी आपूर्ति से नागरिक चिंतित

Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात दूषित पानीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. नळाद्वारे गढूळ, पिवळसर आणि गाळयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.प्रभाग क्रमांक १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे गढूळ आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पाण्यामध्ये गाळ, मातीसदृश अशुद्धता आणि काही ठिकाणी दुर्गंधीही जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दूषित पाण्यामुळे अनेक कुटुंंबांना पाणी गाळून किंवा उकळून वापरावे लागत आहे. मात्र, त्यानंतरही पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेकांनी पिण्यासाठी स्वतंत्र पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चातही वाढ झाली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाण्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.दरम्यान, जलवाहिन्यांची तातडीने तपासणी करून गळती किंवा दूषित पाणी मिसळण्याचे कारण शोधावे आणि परिसरात स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी अकोला महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
0
0
Report

डोंबिवली अस्पताल निर्माण साइट पर दीवार टूटने से 30 परिवार होटल में; शिंदे चेतावनी दी

Kalyan, Maharashtra:झी 24 तास च्या बातमी ची दखल जेलमध्ये टाकून देईन, कंत्राटदाराला कडक इशारा दिला. नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेतले जाणार नाही.. कंत्रादळाला सज्जड दम.. खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवली टिळक रोड येथील केडीएमच्या कॅन्सर रुग्णालयाचे खोदकामचा काम सुरु असतांना बाजूला असंलेल्या दोन इमारतीचा संरक्षण भिंत कोसल्याने व कॉलम ला तडे गेल्याने इमारती मध्ये राहणाऱ्या तीस हुन अधिक कुटूंबांना हॉटेल मध्ये राहण्याची वेळ आली ही बातमी झी 24 तास ने दाखवल्या नंतर कॅन्सर रुग्णालय प्रकल्पस्थळी खासदार श्रीकांत शिंदे धडकले त्या ठिकाणची परिस्थिती पाहून कंत्राटदारावर चागलेच संतापले नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेतले जाणार नाही. थोडी तरी अक्कल वापरा नाहीतर जेलमध्ये टाकून देईन असा दम
0
0
Report
Advertisement

ईश्वरपूर में बिबट्या जेरबंद, तीन घंटे के रेस्क्यू के बाद राहत

Sangli, Maharashtra:सांगली के ईश्वरपूर में शिरे बिबट्या अखेर जेरबंद किया गया है। तीन तासों के अथक प्रयत्न के बाद शहर के भीतर घुसे बिबट्या को वन विभाग और प्राणी मित्रों की मदद से जेरबंद किया गया। ईश्वरपूर शहर के उरूण भाग स्थित संभूअप्पा बुवाफन मठ परिसर में दोपहर के समय बिबट्या घुसा, जिससे नागरिकों में दहशत फैल गई। बिबट्या शहर में आने की खबर मिलते ही प्राणी मित्र और वन विभाग के पथक घटनास्थल पर पहुंचे और रेस्क्यू ऑपरेशन शुरू किया गया। आखिरकार एक बंगले के पार्किंग में घुसने के बाद जाल बिछाकर बिबट्या को पकड़ लिया गया। इसके बाद परिसर के नागरिकों ने राहत की सांस ली, वन विभाग ने बिबट्या को शिराळा तालुुक्यात के चांदोली अभयारण्य में छोड़ दिया गया है।
0
0
Report

नाशिक-पुणे रेल मार्ग रद्दीकरण पर आंदोलन तेज, 9 अगस्त तक सड़क पर उतरेंगे लोग

Nashik, Maharashtra:*सत्यजित तांबे , आमदार बाईट पॉईंट* - नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाच्या मंत्रालयाने घेतला आहे त्याला विरोध करण्यासाठी मागच्या काळात आंदोलनाचा इशारा दिला होता जाहीर पण केलं होतं मात्र नाशिकच्या प्रशासनाने विनंती केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यामुळे आंदोलन स्थगित केले - मुख्यमंत्री महोदयांसोबत एक बैठक झाली आहे तज्ञांची समिती नेमण्याचे आश्वासीत केलेला आहे - नाशिक पुणे रेल्वे महामार्ग त्याचा नफा तोट्याचा विचार न करता सरळ मार्गाने करावी अशा पद्धतीची आपली मागणी - तसं न झाल्यास 9 ऑगस्ट ला नाशिक पुन्हा आणि समृद्धी महामार्गावर आंदोलनाचे नियोजन केले आहे - आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट आहे अनेक तालुक्यांमध्ये कृती समिती तयार झालेले आहे या रेल्वे कृती समित्या जिथे जिथे शक्य आहे महामार्गावर सकाळी नऊ वाजता लोक येतील आपल्या भावना व्यक्त करतील रास्ता रोको करतील आणि सरकारला जाब विचारतील *ऑन रेडिओ टेलिस्कोप* - जे एम आर टी चे कारण सांगून नाशिक पुणे रेल्वे मार्गाने जाण्याऐवजी नाशिक शिर्डी जात आहे ती अ व्यवहार्य आहे ती कधीही नफ्यात येऊ शकत नाही - कुठेतरी संशयाची सुई राजकारणाकडे जाते आमचं एवढंच सांगणं आहे की सर्वसामान्य माणूस याच्यात भरडला जाऊ नये - संशयासाठी पण संशोधन केलं पाहिजे कारण शेवटी ही रेल्वे व्हावी हे आमचं जास्त मत आहे - राजकारण आणि टिपा टिपण्यांमध्ये न देता रेल्वे मार्ग झाला पाहिजे *ऑन भूसंपादन* - ही सरळ प्रशासकीय चूक आहे महा रेल्वेने भूसंपादनाची प्रक्रिया केली 500 कोटीचे भूसंपादन झाले - त्याला महाराष्ट्र शासनाने पैसे दिले 50% राज्य शासनाने 50% केंद्र शासन मात्र पूर्णपणे गुंडाळून त्या ठिकाणी सेंट्रल रेल्वे ने ताब्यात घेतली त्याच्यामुळे राजकारणाचा संशय आहे *ऑन समृद्धी महामार्ग* - नाशिककरांना समृद्धीचा फायदा नाही नाशिक शहरातील लोकांना इगतपुरी पर्यंत जावा लागतं नाशिक मधून जर निघालो तर इगतपुरी समृद्धीचा टोल लागायला दीड तास लागतो - तिथे पोहोचल्यानंतर समृद्धीचा पण टोल भरावा लागतो दोन टोल भरावा लागतात - याचं ओरिजनल चे नियोजन आहे देवळाली कॅम्पमधून रस्ता भरवीर ला जाणार होता आणि त्या ठिकाणी कनेक्टर होत - त्याचा टेंडर देखील काढलं होतं भूसंपादन झालं मात्र ते रद्द करण्यात आलं परवाच्या कुंभमेळा शिखर समितीत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला - संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे असा प्रकल्प सुरू होणारा थांबला असेल तर तो पूर्ण करा - नाशिककरांसाठी वाडी वाऱ्याला जンク्शन करणार असल्याचे सांगितलं जातं हे सगळे कागदावरचे प्रकल्प आहेत तातडीने नाशिककर यांना न्याय देण्यासाठी बारावीचा कनेक्टर चालू करावे
0
0
Report
Advertisement

खेड बाढ़ के हालात का रामदास कदम ने किया निरीक्षण, तात्काल पंचनामा का आदेश

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत रामदास कदमांकडून खेडमधील पूरस्थितीची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे खेड शहराला पुराने वेढले असून, व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम प्रशासनाच्या संपर्कात राहून मदतकार्य राबवत होते. दरम्यान, पुराचे पाणी ओसरताच शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी खेड शहराचा दौरा केला. त्यांनी मुख्य बाजारपेठेत पायी फिरून व्यापारी आणि पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी रामदास कदम यांनी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, तसेच शिवसेना कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

पुणे-नाशिक हाईवे भारी बारिश से जाम, सात-आठ घंटे से फंसे सैकड़ों वाहन

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, याचा मोठा फटका पुणे-नाशिक महामार्गाला बसला आहे. चाकणजवळील सक्सेस पॉईंट परिसरात महामार्गावर नदीसारखं पाणी वाहू लागल्याने, पहाटेपासूनच या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता, महामार्गाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. तब्बल ७ ते ८ तासांपासून शेकडो वाहनचालक आणि नागरिक एकाच जागेवर अडकून पडले आहेत. पाऊस ओसरत नसल्याने आणि वाहतूक पुढे सरकत नसल्याने, अनेक नागरिक आता आपला जीव धोक्यात घालून या पाण्यातून प्रवास करताना दिसत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.
0
0
Report

चाकण में भीषण बारिश से पुणे-नाशिक highway जलमग्न, सैकड़ों लोग फंसे

Chakan, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः चाकण परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. महामार्गावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने गेल्या ८ ते १० तासांपासून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो प्रवासी आणि वाहनचालक एकाच जागेवर अडकून पडले आहेत. या अतिवृष्टीचा आणि प्रशासकीय नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह महिला आणि लहान मुलांना बसत असून, गेल्या अनेक तासांपासून लोक अन्न-पाण्याविना ताटकळत आहेत.याचाच पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top