445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
GI टैग से लोणावळा चिक्की को वैश्विक संरक्षण मिला, परंपरा सुरक्षित
Varsoli, Maharashtra:लोणावळ्याची चिक्की ही केवळ गोड पदार्थ नाही... तर शंभर वर्षांहून अधिक इतिहास जपणारी परंपरा आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या घाट विभागाचं बांधकाम सुरू असताना कामगारांना झटपट ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार होणारा हा पौष्टिक गोड पदार्थ विकला जात होता. पुढे स्थानिक व्यावसायिकांनी त्याला व्यापारी स्वरूप दिलं... आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे लोणावळा चिक्की देशभर प्रसिद्ध झाली. कालांतराने "लोणावळा चिक्की" हे नावच एक विश्वासार्ह ब्रँड बनलं. आज लोणावळ्यात शेंगदाणा, काजू, बदाम, पिस्ता, तीळ, नारळ, ड्रायफ्रूट अशा अनेक प्रकारच्या चिक्की तयार केल्या जातात. दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येतात आणि परतीच्या प्रवासात चिक्कीची खरेदी आवर्जून करतात. आता GI टॅग मिळाल्यामुळे या चिक्कीच्या अस्सलपणाला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे बनावट उत्पादनांवर आळा बसण्यास मदत होईल, तर स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होणार आहे. GI टॅगमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, निर्यातीला चालना मिळेल आणि लोणावळ्याच्या पारंपरिक उद्योगाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. पर्यटकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. लोणावळ्याला भेट म्हणजे चिक्कीची खरेदी, हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. आता GI टॅगमुळे जगभरातील ग्राहकांना अस्सल लोणावळा चिक्कीची खात्री मिळणार आहे, अशी भावना चिक्कीप्रेमी आणि पर्यटक व्यक्त करत आहेत. लोणावळ्याची ओळख फक्त निसर्गसौंदर्यापुरती मर्यादित नाही... तर चिक्कीमुळेही ती जगभर पोहोचली आहे. आता GI टॅग मिळाल्यामुळे या शंभर वर्षांच्या परंपरेला अधिकृत संरक्षण मिळालं आहे. त्यामुळे स्थानिक उद्योग, व्यापारी आणि ग्राहक या तिघांनाही याचा मोठा फायदा होणार आहे..0
0
Report
यवला के नागडे में बिबट्या पकड़, इलाके में हड़कंप के बीच वन विभाग ने पिंजरा लगाकर जेरबंद किया
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नागडे येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीमुळे येवला वनविभागाला नागडे परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती दरम्यान वनविभागाने आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असून सर्वांनी सुटकेचा निष्वास टाकला Yावेळी पिंजऱ्यात असलेला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे0
0
Report
यवतमाल में नकली बीज-ख़ाद से किसान परेशान, आत्महत्याएँ बढ़ीं; राजू उंबरकर लगाए सरकार पर आरोप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारल्या गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी सरकार सोबतच कृषी विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेता राजू उंबरकर यांनी केला आहे. वाणी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी दौरा करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. ज्या शेतकऱ्यांची फसगत झाली त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात, जेणेकरून मनसैनिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग बोगस बियाणे व खतांच्या कंपन्यांशी हात मिळवणी करून असल्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ दर्जेदार बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे अन्यथा मनसैनिकांच्या रोशाला समोर जावे असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
गोंदिया में 5 वर्ष की बच्ची पर भटकते कुत्तों का वीडियो CCTV में कैद
Bhandara, Maharashtra:6 कुत्र्यांनी केला 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला.... घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..... गोंदिया शहरात एका 5 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला आहे.. ही मुलगी रोडवर उभी असताना अचानक 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिला चावा देखील घेतला मुलगी मोठ्याने ओरडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने कुत्रे पाळले. सुदैवाने मुलीला गंभीर इजा झाली नसली तरीही तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे....0
0
Report
स्वामी समर्थ मंदिर चोरी: 7–8 लाख के सामान, CCTV DVR भी चोरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बजाजनगर परिसर स्थित स्वामी समर्थ मंदिर में अज्ञात चोरों ने चोरी करते हुए लगभग 7 से 8 लाख रुपए मूल्य का सामान चुरा लिया। चोरों ने मंदिर की CCTV DVR भी साथ ले गए। चोरी में 1.5 किलो वजन की चांदी की चरण पादुकाएं, स्वामी समर्थ के 1 तोला सोने का लॉकेट और दानपेटियों से लगभग 2 लाख रुपए की नकद राशि भी चोरी हो गई। आज सुबह 5 बजे सफाई कर्मचारी मंदिर पहुंचे तो मुख्य दरवाजे का ताला टूटा हुआ पाया गया। सेवा कर्मचारियों ने पुलिस को सूचित किया। जानकारी मिलते ही वाळूज MIDC पुलिस टीम घटनास्थल पर पहुंचकर जांच में जुटी है।0
0
Report
जवाहरनगर थाने में PSI हरिश खटावकर के खिलाफ शिक्षिका से बलात्कार का मामला दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहर पोलीस दलातील एका पीएसआय ने एका खाजगी शाळेत कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय विवाहित शिक्षिकेला धमकावून, हॉटेल आणि घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ५३ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) हरीश खटावकर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने विरोध केला असता तिला धावत्या कारमध्ये बेदम मारहाण करून, तिचा मोबाईल हिसकावून मध्यरात्री रस्त्यावर सोडून देण्यात आले. आरोपी पीएसआय हरीश खटावकर आणि पीडितेची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. याचा गैरफायदा घेत खटावकरने मे २०१५ मध्ये तिला एका हॉटेलमध्ये बोलावून पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये घराच्या इंटिरिअरचे काम पाहण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. हे जाहीर केल्यास कुटुंबात बदनामी करण्याची धमकी देऊन तो पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होता.. या गंभीर गुन्ह्यानंतर उपायुक्त कार्यालयाने पोलीस यांच्याकडे कठोर कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे...0
0
Report
Advertisement
सोलापुर में धनंजय मुंडे के जन्मदिन पर ग्रामदैवत मंदिर में 51 किलो मोतीचूर लड्डू वितरित
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात करण्यात आली आहे 'लाडूतुला' सोलापुरात माजी मंत्री धनंजय मुंडेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने करण्यात आला साजरा.. धनंजय मुंडेचे कार्यकर्ते सन्नी देवकातेने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेची केली *'लाडूतुला'* सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात करण्यात आली आहे 'लाडूतुला' धनंजय मुंडे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 51 किलो मोतीचूर लाडुची करण्यात झाली तुला लाडूतुला झाल्यानंतर सिद्धरामेश्वर मंदिरातील भक्तांसाठी प्रसाद म्हणून लाडूचे करण्यात आले वाटप0
0
Report
यवतमाळ की सूतगिरणी ने उच्च गुणवत्ता से रोजगार बढ़ाए; धागा चीन तक गया
Yavatmal, Maharashtra:विदर्भातील इतिहास पाहता बऱ्याच सूतगिरण्या पंजीबद्ध होऊन ही उत्पादनाखाली आल्या नाही परंतु दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी ही 2019 मध्ये पंजिबद्ध होऊन 2025 मध्ये उत्पादनाखाली आलेली आहे आणि अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे सूत तयार करणारी अव्वल दर्जाची गिरणी ठरली आहे. गिरणीतील उत्कृष्ट धाग्याच्या गुणवत्तेमुळे हा धागा थेट चायना च्या बाजारपेठेत जहाज मार्गे रवाना झाला. परिणामी मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे. कापसावरील प्रक्रिया उद्योग निश्चितच कापूस उत्पादक जिल्ह्यांसाठी वरदान ठरू शकतो, सूतगिरणीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यवतमाळ मध्ये तयार झालेला धागा, थेट साता समुद्रा पार पोहोचला आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ मधील कापसाचा धागा हा उच्च प्रतीचा असतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे.0
0
Report
लोणावळा में फिर से तेज बारिश, पर्यटन नगरी में हरियाली लौट रही है
Varsoli, Maharashtra:Headline: विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी Anchor: ६ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने लोणावळा अक्षरशः जलमय झाला होता. पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शहर पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा पर्यटननगरीत दमदार पुनरागमन केले आहे. या सरींचे पर्यटकांनीही उत्साहात स्वागत केले असून, हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि बहरलेला निसर्ग लोणावळ्याच्या सौंदर्यात पुन्हा भर घालत आहे..0
0
Report
Advertisement
राज्य सरकार ने 7.5hp तक के कृषिपंपधारक किसानों का बिल माफ किया
Washim, Maharashtra:राज्य सरकारने साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे जुने थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली असून राज्यभरातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे तब्बल ४८हजार कोटी रुपयांचे जुने वीज बिल माफ करण्यात येणार आहे.या निर्णयाचा वाशिम जिल्ह्यातील ६६ हजार ८६० शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर असलेली १ हजार १२ कोटी ५२लाख रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. या संदर्भातील शासनाचे अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर महावितरणमार्फत जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार पावसाची अनिश्चितता,वाढलेला शेती खर्च आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आधार होणार आहे。0
0
Report
सिडकोत मध्यरात्रि मेडिकल शॉप चोरी; CCTV में कैद चोर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सिडकोत मध्यरात्री मेडिकल शॉप फोडून चोरी; चोरटे CCTV मध्ये कैद ANC : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील एन-५ येथे मध्यरात्रीच्या सुमारास मेडिकल शॉपचे शटर उचकटून चोरीची घटना घडली. चारचाकी वाहनातून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, दुकानात शिरतानाचे आणि गल्ल्यातून पैसे चोरतानाचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच तांत्रिक पुरावे देखील पोलिसांनी जमा केले आहेत.0
0
Report
अमरावती के खोलापुर में वर्षा कमी से फसल नहीं उगी, किसान ने किया आत्महत्या
Amravati, Maharashtra:पेरलेले पीक न उगवल्याने शेतकऱ्याने गळफास घेत केली आत्महत्या; अमरावतीच्या खोलापुरात पावसाअभावी दुबार पेरणीच संकटाने, बोगस बियाण्याचा फटका मिळालेल्या माहितीनुसार हरिभाऊ श्रीराम गाडे (वय ५५, रा. कोळीपुरा, खोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. १५ जुलै रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यंदा पावसाअभावी पेरलेले पीक उगवले नसल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच आर्थिक विवंचना आणि कर्जाच्या वाढत्या ताणामुळे नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
मुरदोली में कुएं में वाघ शव पर वन विभाग ने किसान हिरासत में लिया
Bhandara, Maharashtra:विहिरीत वाघाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी शेतकरी ताब्यात... गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील शेतातील विहिरीत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळल्याप्रकरणी वन विभागाने एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.0
0
Report
पंढरपुर में बारिश के दौरान सुरक्षा और सफाई के कदम, गोरे ने बताए
Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना स्नान साठी 18 जुलैपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. संतांच्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या पायगुणामुळे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे एक दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. किती मोठी संकटा आले तरी वारकाऱ्यांची आणि विठुरायाची शक्ती मुख्यमंत्र्यांना त्यातून मार्ग काढण्याचा बळ देईल. असे म्हणत वारी मुळे वरुण राजा सुद्धा बरसला असल्याचे सांगितले. काल पावसामुळे पंढरपुरात काही ठिकाणी पाणी साठलं पालखीतळावर काही प्रमाणात चिखल झाला होता त्यामुळे काही व्यवस्था करणे गरजेचे होतं त्यासाठी आपली तब्येत बरी नसताना सुद्धा आपण आलो मात्र विठुराया आपल्यालाही काम करायला ऊर्जा देतो त्यामुळे आजारी असले तरी काही अडचण नाही असे मंत्री गोरे म्हणाले सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शन जलद होण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केली आहे जर कोणी व्हीआयपी दर्शन देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा थेट इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प होत असताना इथल्या इथल्या माणसाचं समाधान होत नाही तोपर्यंत कॉरिडॉर काम सुरू होणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यामुळे कॉरिडॉर बाधित नागरिकांनी निश्चित राहावे. असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. वारी काळामध्ये स्वच्छ त्याला फार मोठा महत्त्व ग्राम विकास विभागांना दिलेला आहे ज्या गावातून वारीचा प्रवास पुढे जातो त्या ठिकाणी स्वच्छतेची टीम जाऊन पूर्ण स्वच्छता करते. त्यामुळे तिथे साथीचे आजार पसरणार नाहीत आणि पंढरपूर मध्ये सुद्धा वारे संपल्यानंतर पंढरपूर स्वच्छ राहील तिथे कोणी आजारी पडणार नाही असा विश्वास मंत्री गोरे यांनी दिला. पंढरपूर वाखरी दरम्यान असणारा पुलाचा भाग खचल्याच समोर आलं होतं मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा पुल खचला नसून त्याला टाकलेला भराव होता तो पावसामुळे वाहून गेला आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. पंढरपूर मध्ये सुरू असलेल्या रस्त्याची काम निकृष्ट सुरू असल्याचे तक्रार समोर आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याचे दखल घेत जर अशी काम सुरू असतील तर त्याचं बिल काढले जाणार नाही त्याला पुन्हा रस्ता करायला लावू असा इशारा दिला आहे0
0
Report
बाजार जाते समय पिकअप-बोलेरो की टक्कर से तीन वर्षीया बच्ची की दर्दनाक मौत
Bhandara, Maharashtra:वडिलांसोबत बाजारात जाणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीचा पिकअप-बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू.. बालमाटोला येथील रहिवासी लक्ष्मीचंद सेवाईवार हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील आठवडी बाजारात गेले होते. अचानक, भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात मालवाहू बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली आणि ती गाडी रस्त्यावरून पळून गेली. वडील आणि गावकऱ्यांच्या मदतीने मुलीला दासगाव प्राथमिक उपकेंद्रात दाखल करण्यात आले, जिथे मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी एका अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.0
0
Report
Advertisement
