icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बुलढाणा जिला केंद्रीय सहकारी बँक के अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे निर्वाचित

Buldhana, Maharashtra:बुलढ़ाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची निवड; तब्बल १६ वर्षानंतर बँकेची निवडणूक तब्बल १६ वर्षानंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी १२ संचालक बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश होता. तर उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडलं. या निवडणुकीत सहकार पॅनलने ७ जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, आज झालेल्या निवडीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे परिवाराकडे तब्बल ३१ वर्षे सत्तेची धुरा राहिली आहे. बाईट : डॉ. राजेंद्र शिंगणे — नवनिर्वाचित अध्यक्ष
0
0
Report

जगतलाई आश्रम सर्पदंश मामले में संस्थापक समेत तीन की अटकपूर्व जमानत याचिका नागपुर खंडपीठ ने खारिज

Nagpur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश आणि त्यामुळे तीन मुलींच्या मृत्यू प्रकरणी आरोप लागलेले जपतलाई आश्रम शाळेचे संस्थाचालक आणि गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, त्यांचा मुलगा व संस्थेचे सचिव विश्वजीत कोवासे, महिला वसतिगृहाची अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार या तिघांना अटकपूर्व जामीन देण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिले आहे.... तिघांनी वकिलांच्या माध्यमातून खंडपीठांसमोर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले होते.. मात्र नागपूर खंडपीठाने त्यांच्या अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले... * 10 ऑगस्ट 2026 रोजी जगतालाई आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना घडली होती.. * त्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत आश्रम शाळेची मान्यता रद्द केली होती... * कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संस्थाचालक आणि अधीक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता... * त्याच प्रकरणी अटकपूर्व जामीन घेऊ पाहणाऱ्या मारोतराव कोवासे, त्यांचा मुलगा आणि वसतिगृह अधीक्षिका यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नागपूर खंडपीठाने फेटाळून लावले आहे...
0
0
Report

पर्यूषण के दौरान सेवेन स्क्वेअर अकॅडमी ने प्याज-लहसुन-बटाटा न लाने का आह्वान; मनसे ने किया आक्रामक रुख

Mira Bhayandar, Maharashtra:सेवन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पर्यूषण काळात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे पदार्थ डब्यात न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेसेजवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, विद्यार्थ्यांनी काय खावे हे ठरवणारे शाळा कोण, असा सवाल केला आहे. दरम्यान, शाळेतर्फे कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसून, केवळ पालकांना विनंती करण्यात आल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केले आहे. मिरा रोड पूर्वेतील सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सफ़ ् ग्रुपवर पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर एक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना विनंती करण्यात आली आहे. तसेच, पर्यूषण काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण आणि बटाट्याशिवाय खाद्यपदार्थ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा मेसेज मनसेचे सचिन पोपळे यांना पाठवला. त्यानंतर मनसेने या आवाहनावर आक्षेप घेतला आहे. मराठी माणसांची मुलं आणि विद्यार्थी काय खाणार, हे ठरवणारे शाळा कोण, असा सवाल सचिन पोपळे यांनी उपस्थित केला. ही शाळा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची असल्याचा दावा करत, उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू केली आणि गटारीच्या वेळी विद्यार्थ्यांना चिकन, मटण आणि अंडी आणण्यास सांगितले, तर ते मान्य केले जाईल का, असा प्रश्नही मनसेकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शाळेतर्फे कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. पर्यूषण हा पवित्र काळ असून, या काळात पशू आणि प्राण्यांवर अन्याय होऊ नये, त्यांची कत्तल होऊ नये, या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शाळेकडून व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात आलेल्या मेसेज मध्ये आम्ही विनंती केली आहे. कुठल्याही प्रकारची आम्ही सक्ती केलेली नाही असे त्याने स्पष्ट केले. या प्रकरणात दुसरा कोणताही उद्देश नसून, यामध्ये राजकारण करू नये, असे आवाहनही नरेंद्र मेहता यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

माध्यमिक शिक्षा मंडळ ने 2027 दहावी-बारावी परीक्षा केंद्रों की पुनर्रचना और कड़ाई तेज की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील दहावी, बारावी परीक्षेसाठी केंद्रांची पुनर्रचना केली जात आहे. विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्रांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर जिल्हानिहाय केंद्रांचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये गैरप्रकार आढळलेल्या केंद्रावरील कारवाई, पायाभूत सुविधा नसलेली परीक्षा केंद्रे बंद करणे, पर्यायी केंद्रांची निवड करणे आदींचा समावेश आहे. शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. परीक्षा केंद्रांवरील पायाभूत सुविधांबाबत मंडळाची नियमावली, निकष आहे. परंतु, त्याकडे बहुतांशी केंद्रांवर दुर्लक्ष होते.. विभागातील पाच जिल्ह्यांत ११०० परीक्षा केंद्रे आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसह केंद्रांवरील पायाभूत सुविधांवरही मंडळाकडून भर दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपीचे गैरप्रकार आढळले ती रद्द करणे, पर्यायी केंद्र निश्चित करणे यावरही काम सुरू आहे. गेल्या वर्षी  कारवाईत ५१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १०३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच विभागीय शिक्षण मंडळात २४ जणांवर गुन्हे दाखल केले असून गैरप्रकारातील केंद्रे रद्द करण्यात आली होती.
0
0
Report

गोंदिया के पुलिस कप्तान के घर 8 फुट सांप सर्प मित्र ने रेस्क्यू कर छोड़ा

Bhandara, Maharashtra:पोलिस अधिक्षक यांच्या घरी निघाला 8 फुटाचा साप.... सर्प मित्राने सापाचा रेस्क्यू करू जंगलात सोडले... गोंदिया जिल्ह्याचे पोलिस निरीक्षक गोरख भामरे यांच्या घरी 8 फीट लांबीचा धामण (रेट स्नेक) निघाल्याने एकच खळबळ उडाली तर याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ सर्प मित्र बंटी शर्मा यांना पाचारण करण्यात आले. सर्प मित्र बंटी यांनी मोठ्या शिफातीने सापाच्या रेस्क्यू केला व त्याला पकडून गोंदिया शहरातील बाहेर दहेगाव जंगलात त्या सापाला निसर्गाच्या सुखरूप सोडण्यात आले. तो पोलिस अधिक्षक यांच्या घरावर तैनात असलेल्या पोलिसांनी सर्प मित्र यांचा आभार मानले..
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर महापालिका: 25 नगरसेवक अपात्रता याचिका पर सुनवाई तेज, अगली तारीख जल्द तय

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या २५ नगरसेवकांविरुद्ध दाखल ३८ अपात्रता याचिकांवर मनपा प्रशासनासमोर सुनावणीचे सत्र सुरूच आहे. मुंबई महानगरपालिकेत अशाच प्रकरणांत जलदगतीने निर्णय झाल्याने छत्रपती संभाजीनगरातील तक्रारदारांनीही आपला पाठपुरावा अधिक तीव्र केला आहे. केवळ तारखांवर तारखा न देता या प्रकरणांचा निकाल कधी लागणार, असा थेट सवाल तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधित नगरसेवक व तक्रारदारांना पुढील सुनावणीची निश्चित तारीख कळवण्यात येईल. दोनपेक्षा जास्त अपत्ये असणे, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दाखल गुन्हे अशा विविध कारणांवरून हे २५ नगरसेवक अपात्रतेच्या फेऱ्यात अडकले आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे के वाघोली में पुलिस की दबिश: तडीपार आरोपी तानाजी जाधव गिरफ्तार, पिस्तौल-कारतूस बरामद

Shirur, Maharashtra:पुणे शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. याच दरम्यान वाघोली पोलिसांच्या तपास पथकाने मध्यरात्री केसरंद गावठाण परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तानाजी अर्जुन जाधव या २६ वर्षीय तडीपार आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीकडून ४१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून, त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

नागपुर में तान्हा पोळा: लकड़ी के नंदी बैल, 8 लाख तक कीमत

Nagpur, Maharashtra:नागपूर:- शेतकऱ्याचा सर्वात जवळचा, विश्वासू साथीदार असलेल्या बैलांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. मात्र,विदर्भात पोळा या सणाला एक आगळी- वेगळी परंपरा जोडलेली आहे आणि ती म्हणजे तान्हा पोळा. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदीबैलांचा पोळा भरवला जातो. या परंपरेला 237 वर्षांची परंपरा आहे.. 1789 मध्ये श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी बालगोपालांना बैलाची व कृषी संस्कृतीच्या महत्त्वाची जाणीव व्हावी या उद्देशाने लाकडी नंदीचा तान्हा पोळ्याला सुरुवात केली. यंदाच्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या या लकडगंज परिसरातील लकडा बाजारात लाकडी नंदीबैलांचा बाजार सजलेला असून,इथे शंभर रुपय ते 8 लाख रुपयांपर्यतचे लाकडी नंदीबैल हे विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत. च बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागलेली आहे. लहान-लहान मुलांसाठी नंदीबैल खरेदी करण्याची पालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या आवडीनुसार नंदीबैल निवडण्यासाठी ग्राहक कारागिरांच्या दुकानात मोठी गर्दी करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील रहिवासी रवींद्र मुकादम यांनी तब्बल 7 फूट 5 इंच उंच व 8 फूट लांबचा लाकडी नंदी बैल तयार केलाय. त्यांना या कामासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागलाय. रवींद्र मुकादम यांनी या लाकडील नंदी बैलाची किंमत 8 लाख रुपये निर्धारित केलेली आहे. हा नंदी बैल आतून पोकळ असून त्याचा उपयोग मंदिरात दानपेटी करिता देखील केला जाऊ शकतो. अतिशय बारीक नक्षीकाम यावर करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के मातंग समाज के महाअल्गार मोर्चे में महिलाओं की बड़ी भागीदारी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मातंग समाजाच्या महाआल्गार मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग Anchor - आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी सोलापूरात सकल मातंग समाजाच्या वतीने महाआलगार मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुनम गेट पर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट 2024 च्या निकालाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी तसेच आरक्षण उपवर्गीकरणाचा तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
0
0
Report

सोलापुर में विमान सेवा बंद, युवक कांग्रेस ने किया आक्रामक प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक सोलापूर विमानतळासमोर कागदाची आणि फुग्यांची विमाने उडवून करण्यात आला विमानसेवा बंद निषेध इंधन दरवाढीचे कारण पुढे करत स्टार एअरलाईन्स कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद केलीय यामुळे सोलापूरच्या विमानतळावरून सुरु असलेली प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा एकदा बंद झालीय ‘शासनाने केवळ निवडणूकपुरते आश्वासन देऊन विमानसेवा चालू केली मात्र निवडणुका संपताच विमानसेवा बंद करण्यात आलीय‘
0
0
Report

सिंदुदुर्ग में एमटीडीसी पर्यटन सूचना केंद्र का उद्घाटन, पर्यटकों को दिशा-निर्देश स्पष्ट

Oras Bk., Maharashtra:पर्यटन जिल्हा आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही दिशाभूल न होता त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पर्यटन स्थळाची अचूक माहिती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग ( चीपी ) विमानतळावर एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटक माहिती केंद्र उभारण्यात आलय त्याचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले असून यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल थांबेल व जिल्ह्याच्या विकासाला बळकटी मिळेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय.
0
0
Report
Advertisement

यशोधन अनाथ आश्रम ने रुक्मिणी भस्मे को नया सहारा दिया; खोज शुरू

Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_AAJI_UPDATE साताऱ्याात दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या रुक्मिणी भस्मे या निराधार वृद्ध मातेला साताऱ्यातील वेळे इथल्या 'यशोधन' अनाथ आश्रम संस्थेने मोठा आधार दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्या एका मंदिरात आश्रय घेऊन दिवस काढत होत्या. पोटच्या गोळ्यांनी नाकारले तरीही माउलीचे मन अजूनही आपल्या मुलांच्याच वाटेकडे डोळे लावून बसले आहे. याची 'यशोधन' अनाथ आश्रम संस्थेचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी तातडीने दखल घेत रुक्मिणी भस्मे यांच्या संपूर्ण सांभाळाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित दोन्ही मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
0
0
Report

सोलापूर में बारिश से अक्कलकोट के किसान की सोयाबीन बर्बाद, नुकसान भरपाई की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात पावसाने ओढ दिली; शेतकऱ्याने उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर पावसाने ओढ दिल्याने अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील शेतकरी पंडित शिवप्पा बादोले यांच्यावर उभ्या सोयाबीन पिकावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली. मोठ्या कष्टाने आणि अपेक्षेने उभे केलेले पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर गेल्याने अखेर त्यांनी पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर यंदा पावसांनी पाठ फिरवल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. डोळ्यांसमोर उभे पीक नष्ट करताना बादोले यांच्या वर्षभराच्या मेहनतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आणि कर्जफेडीची आशाही मातीमोल झाली. पावसाअभावी घोळसगावसह अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी पंडित शिवप्पा बादोले यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top