icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

साड़ी नहीं मिली, पति की हत्या: कुकर से घातक हमला

Ambernath, Maharashtra:साडी दिली नाही म्हणून पतीची डोक्यात कुकर घालून हत्या! बदलापूरच्या शिरगावातील धक्कादायक घटना पोलिसांनी ठोकल्या आरोपी पत्नीला बेड्या बदलापूरच्या शिरगाव परिसरात 35 वर्षीय हरेराम सिंग हा पत्नी सुनीता देवी आणि सात वर्षांच्या मुलासोबत राहत होता. हरेराम हा अपंग असल्याने अंथरुणाला खिळलेला होता. त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. अशातच त्यांच्यात साडी देण्यावरून पुन्हा एकदा वाद झाला आणि याच वादात सुनीताने हरेरामच्या डोक्यात कुकर घातला. त्यानंतर त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. यानंतर तिने पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सात वर्षांच्या मुलाचा जबाब घेतल्यानंतर सत्य समोर आलं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पत्नी सुनीताविरोधात गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

NEET मामले पर विरोधी आंदोलन ने बदनाम किया, नेताओं की राजनीति उजागर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत Delhi आंदोलन: आंदोलनाच्या ठिकाणी राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले. जेवढे नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील पक्ष आहेत, त्यांचे प्रमुख या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन केवळ NEETपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्याचे काम सर्व विरोधक करत आहेत. विरोधकांना यात काहीही यश येणार नाही. स्वतःचा पक्ष संपत असताना दीपक यांच्या नावावर स्वतःच्या पक्षाची उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. On सर्वोच्च न्यायालय टिपण्णी: सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले, यावर आपण इथे बसून चर्चा करू शकत नाही. अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लाठीचार्जला शिवसेना समर्थन करत नाही. लाठीचार्जमध्ये मार लागलेल्यांमध्ये नेते कोणी होते का? त्यामध्ये कोणतेही नेते नव्हते. CJPचा प्रवक्ता त्या ठिकाणी बर्गर खात होता. CJP कोणत्या मार्गाने जात आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनीही केला पाहिजे. NEETच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या आंदोलनात पक्षांचे नेते येऊन मार्गदर्शन करत आहेत. या मुलांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपल्या देशासाठी योग्य नाही. On शरद पवार–मोदी भेट: ही एक प्रक्रिया आहे. शरद पवारांनी भेट घेतली, हा राजकारणातील संस्कार आहे. बाकीचे संपलेले पक्ष CJPच्या आंदोलनावर स्वार होत आहेत. आपण विद्यार्थ्यांसाठी मोठे काम करत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसची सत्ता असतानाही दोन-दोन्हां महिन्यांनी पेपर फुटायचे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना त्यात राजकारण नको. या आंदोलनावर आरूढ होऊन अनेक लोक आपल्या पोळ्या भाजत आहेत. ते महाराष्ट्राला आणि देशालाही कळत आहे. On उद्धव ठाकरे: एक महिन्यानंतर उद्धव ठाकरे तिथे गेले, खूप चांगले आहे. आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी कदाचित ऑनलाइन बोलले असते. पण ते गेले, आम्हाला आनंद आहे. (असे म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.) डाव्या विचारांत आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही सामील होत आहे. काँग्रेसदेखील डाव्या पक्षांमध्ये सामील झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळ्या ट्रॅकवर आणले गेले आहे. याला जबाबदार एनडीएच्या विरोधातील सर्व पक्ष आहेत. On सरकार भूमिका: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हा एक राजकीय दृष्टिकोन आहे. CJPच्या आंदोलनात RSSविरोधी घोषणा होतात. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा होतात. CJPला समर्थन देताना उद्धव ठाकरे गट एवढा खाली गेला की दादरमधील आंदोलनात औरंगजेब आमचा आयडॉल आहे, असे फलक दाखवण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन कोणत्या मार्गाने जात आहे, ते पहा. औरंगजेब हा नेता म्हणून जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि CJP एकत्र जाणार असतील, तर पुढची पिढीने काय घ्यायचे? दीपक यांचे आंदोलन विरोधकांच्या ट्रॅकवर आले आहे. हे सरकारच्या लक्षात आले. एनडीएविरोधात टोकाची भूमिका घेणारेच या आंदोलनात सहभागी झाले. मुलांच्या आंदोलनाचा फायदा इंडिया आघाडी घेत आहे. On हिंदू पेपर: चौथ्या स्तंभाचा मला आदर आहे。 बाहेरुन आलेल्या विरोधी पक्षांच्या घुसखोरांनी सर्वप्रथम पोलिसांना मारहाण केली. म्हणूनच लाठीचारдж झाला. लाठीचार्ज होण्याचे सर्वात मोठे पाप विरोधकांचे आहे. आंदोलनात घुसखोरी झाली नसती, तर कधीच लाठीचार्ज झाला नसता. On सरकार प्रतिमा: सुधारण्यासाठी राजीनामे नाही NEET पेपरफुटी प्रकरणात राजीनाम्याची मागणी केली जात आहे. कुठल्याही भ्रष्टाचाराच्या संदर्भात राजीनामा मागितला जात नाही. मुद्दा मंत्र्यांना टार्गेट करण्याऎक्षा व्यवस्था सुधारण्याचा असला पाहिजे. आणि ती व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. On आंदोलनाचा फायदा: आंदोलनाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे होता. विरोधक विद्यार्थ्यांच्या आडून या आंदोलनावर स्वार झाले. त्यामुळे हे आंदोलन बदनाम झाले. दीपक यांच्या बाबतील भूमिका नक्कीच सहानुभूतीची आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता विद्यार्थी बोलू लागले आहेत की, ज्या आंदोलनासाठी आलो होतो, त्या NEETबाबत कुणीच बोलत नाही. विरोधक फूस लावत आहेत. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. On अजित पवार; अजित पवार यांनीच मला प्रशासन चालवायला शिकवले. On मनोज जरांगे: जरांगे पाटील शुद्ध हेतूने आंदोलनस्थळी गेले. त्यांना पक्ष काढायचा नाही किंवा कोणतेही मंत्रिपद भूषवायचे नाही. बाकीच्यांच्या भावना शुद्ध नव्हत्या. बाकीच्यांची भावना, हा कधी खाली येतो आणि मी कधी बसतो, अशी आहे. हा भारताला बदनाम करण्याचा डाव आहे.
0
0
Report

देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर 57 हजार किसानों के लिए दुर्घटना बीमा योजना शुरू

Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ च्या उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातील 57 हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. स्वातंत्र्य सैनिक स्व. बंकटलालजी भूतडा ट्रस्टच्या माध्यमातून प्रति शेतकरी दोन लक्ष रुपये प्रमाणे 1140 कोटी रुपयांचा हा अपघात विमा 22 ऑगस्ट पर्यंत काढण्यात येणार आहे. यातील 100 शेतकऱ्यांना 'विमा करार पत्राचे वितरण आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. शेती काम, रस्ता अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश आणि विंचू दंश अशा सर्व प्रकारच्या अपघाताचा समावेश या योजनेत आहे. या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

अंधेरी वेस्ट में संदिग्ध बैग मिला, सुरक्षा टीमें पहुंची, जांच शुरू

Mumbai, Maharashtra:मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर बेवारस बॅग आढळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची नाकेबंदी करून बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर बॅगेमध्ये कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
0
0
Report

मनचर थाना में अजित पवार की जयंती पर श्रद्धांजलि कार्यक्रम

Ambegaon, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्यातही जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंचर पोलीस ठाण्यात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान, प्रशासनातील कामकाजाची शैली आणि जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला.
0
0
Report
Advertisement

जालना में BJP-Congress भिड़ंत: कल्याण काळे के कार्यालय के पास प्रदर्शन

Jalna, Maharashtra:जालना : काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालया समोर भाजपचं आंदोलन जंतर मंतर वरील आंदोलनाला कॉंग्रेसची फुस-गोरंटयाल भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते आमने-सामने दोन्हीही पक्षां कार्यकर्त्यांच्या एकमेकांविरोधात घोषणा अँकर : जालन्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या जालन्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते समोरा समोर आले.यावेळी दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते समोरे समोर आल्यानं दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधी घोषणा बाजी केली.त्यामुळे काहीसा तणाव काळे यांच्या कार्यालया समोर पाहायला मिळाला.काळे यांच्या कार्यालया समोर भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फुल्या मारलेल्या प्रतिमा हातात घेऊन आंदोलन केलं.तसेच काँग्रेस नेते आणि पक्षाविरोधात जोरदार आंदोलन केलं.तसेच जय श्रीराम अशी घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासाबाहेर कॉंग्रेसने काल केलेल्या आंदोलनाचा जाहीर निषेध नोंदवला.दरम्यान जंतर मंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने फुस लावल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे.कॉंग्रेसचे कार्यकर्ते पप्पू असल्याचं सांगत लोकसभेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याऐजी पंतप्रधानांच्या घरासमोर यांनी आंदोलन केलं.त्याचा आम्ही निषेध करत असल्याचं गोरंटयाल म्हणाले. बाईट : कैलास गोरंटयाल माजी आमदार बाईट भास्कर दानवे, महानगर जिल्हाध्यक्ष भाजपा
0
0
Report

राहुल गांधी की नौटंकी पर भाजपा नेताओं का तीखा हमला

Nagpur, Maharashtra:नागपूर - आ परिणय फुके - भाजप नेते नागपूर - आ परिणय फुके - भाजप नेता का बयान नागपूर - आज का कार्यक्रम संदीप जोशी यांच्या माध्यमातून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. हजारो ماڻهو शुभेच्या आणि आशिर्वाद देण्यासाठी आलेत. आजचा दिवस सेवा दीन म्हणून साजरा होतोय.. राज्यात बहुजन समाज और ओबीसी समाजाच्या हितासाठी आतापर्यंत 56 जीआर निघाले त्यापैकी 54 जीआर देवेंद्र फडणवीस यांनी काढलेत.. म्हणून ते बहुजन नायक आहेत.. ते नेहमी बहुजन समाजासाठी झटत असतात.. राहुल गांधी आंदोलन - काँग्रेसचे अस्तित्व आज संपुष्टात आला आहे.. राहुल गांधींची ही नौटंकी आहे.. काँग्रेसकडे क्षमता, नेता, कार्यकर्ता आणि त्यांचा विश्वास संपलेला आहे.. त्यांनी विद्यार्थ्यांचा सहारा घेऊन नौटंकी करत आहेत.. त्यांची क्षमता असती तर ते स्वतः आंदोलन उभारून स्वतः पुढाकार घेतला असता.. जेव्हा विरोधी पक्ष संपुष्टात येतो तेव्हा असे काहीतरी स्वयंपूर्तिने विषय घेऊन विरोधक आंदोलन करतात.. हा राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षांचा अपयश आहे.. उद्धव ठाकरे केजरीवाल भेट - उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांचं राजकीय अस्तित्व संपला आहे.. तीन खासदार घेऊन दुसऱ्या आंदोलनाचा सहारा घेऊन स्वतः चर्चेत राहण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.. मला त्यांची दया येते.. अशा आंदोलनातून कोणताही फायदा होणार नाही.. केजरीवाल हे आंदोलनातून समोर आले आहे.. भ्रष्टाचाराचा आरोप करत ते स्वतः भ्रष्टाचारात विलीन झाले.. म्हणून अशा आंदोलनाचा मतदानात काही फरक पडत नाही..
0
0
Report

कांदिवली वेस्ट के लोखंडवाला में आइसक्रीम दुकान में रात हुई मारपीट, दुकानदार-कर्मचारियों में दहशत

Mumbai, Maharashtra:कांदिवली पश्चिमेतील लोखंडवाला परिसरातील नॅचरल आईस्क्रीमच्या दुकानात रात्री उशिरा घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानाचे मालक अनिल पई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एका ग्राहकाने आईस्क्रीम खरेदीसाठी दुकानात प्रवेश केला. मात्र त्याने मागितला फ्लेवर उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर संबंधित ग्राहक संतापला. कर्मचाऱ्याने माफी मागून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही ग्राहकाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ग्राहकाने कर्मचाऱ्याचा व्हिडिओ चित्रीत करत त्याचे गाव विचारले. कर्मचारी उत्तर प्रदेशातील असल्याचे समजताच ग्राहक अधिक आक्रमक झाला आणि त्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्याला मराठी भाषा येत नसल्याने तो काहीही बोलू शकला नाही. त्यानंतर ग्राहक दुकानाबाहेर गेला, परंतु काही वेळाने पुन्हा परत येत थेट दुकानाच्या स्टाफ रूममध्ये घुसला आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दुकानाचे मालिक अनिल पई यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप या घटनेत एफआयआर नोंदविण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

नंदुरबार से धुळे जा रही शिवशाही बस में अचानक आग, शॉर्टसर्किट से लगी आग; कोई घायल नहीं

Dhule, Maharashtra:धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबार वरून धुळे्याकडे येणाऱ्या एका शिवशाही बसने अचानक पेट घेतला. आगीमध्ये बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती वाहन चालकाने दिली. बस चालकाच्या प्रसंग अवधानामुळे सुदैवाने कोणतीही चिवित हानी झालेली नसली, तरी बसचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबांना तात्काळ पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे.
0
0
Report

ब्रेक फेल से BMW कार का हादसा; चालक समेत दोनों सुरक्षित

Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. ब्रेक फेल झाल्याने नवशी पूल फाट्याजवळ BMW कारचा अपघात; दोघेही सुखरूप खेडकडून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या एका BMW कारचा आज सकाळी सुमारे १०:०० वाजण्याच्या सुमारास नवशी पूल फाट्याजवळ अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील बॅरिगेटला जाऊन जोरदार धडकली. अपघातात कारचे नुकसान झाले असून वाहनात प्रवास करणारे दोघेही सुखरूप बचावले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top