445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
किसानों को 2 लाख तक की कर्जमाफी, 2026 के राहत पैकेज का ऐलान
Chandrapur, Maharashtra:कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या पोचल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे, याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026' जाहीर केली आहे. या योजनेत आता सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. पात्र शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या आहेत. याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 72 हजार 388 खातेदारांची माहिती पोर्टल वर अपलोड करण्यात आली असून यात 43 हजार 816 खातेदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तर 28 हजार 572 खातेदार हे राष्ट्रीयीकृत बँकेचे आहेत. यापूर्वी महात्मा ज्योतिराव फूले कर्जमाफी योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत त्यांच्या थकीत पीककर्जावर कोणतेही व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत.0
0
Report
NEET में कम अंक से छात्रा ने की आत्महत्या, परिवार ने कहा मानसिक तनाव के कारण
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये...नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे...अंकिता हिला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले... अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात तिने काल सायंकाळी साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे...अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात केलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती...बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले...त्यानंतर पोलीस प्रशासनाला माहिती कळवण्यात आली...याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अण्णा सांगळे यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.0
0
Report
नाशिक के गड्ढों ने चार महीनों में तीन लोगों की जान ली—ठेकेदार-प्रशासन पर सवाल
Nashik, Maharashtra:अँकर नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्ता खोदकामामुळे खड्यात पडून सातपूरमध्ये माजी सैनिक गायकवाड यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ अशा प्रकारे खड्यांमुळे गाडी आदळून अपघात झाल्याने गंभीर जखमी असलेल्या पंचवटीतील दीपाली बेळे यांची तब्बल ३९ दिवसांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचवटीत यापूर्वी उज्ज्वला गायकवाड यांचाही खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला त्यानंतर सातपूर येथेही दुर्घटना घडल्यानंतर आता हा तिसरा बळी आहे... गेल्या चार महिन्यात या खड्ड्यांमुळे तीन जणांचा बळी गेलाय तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.... दिंडोरीरोडवरील विकासकामांनंतर खोदलेले खड्डे योग्यप्रकारे न बुजविल्याने उज्ज्वला गायकवाड आणि दीपाली बेळे या दोघींचाही बळी गेला आहे. या दोन्ही घटनांना संबंधित ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असून, मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदत द्यावी, यासाठी लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असून, महासभेतही लक्षवेधी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली.याप्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक प्रवीण जाधव यांनी संबंधित ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर मंत्री नरहरी झिरवाळांनी देखील प्रतिक्रिया दिली असून शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याची कबुली हिरवळ यांनी दिलीये सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम हे अत्यंत उशिरा सुरू झाल्याचं देखील झिरवाड्यांनी म्हटलं तर अशी परिस्थिती उद्भवली नसती अशी प्रतिक्रिया मंत्री झिरवाळ यांनी दिली... मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील मखमलाबाद परिसरात राहत असून त्यांना देखील या खड्डेमुळे रस्त्यातूनच प्रवास करत लागत असल्याची दृश्य समोर आली आहे... याबाबत मंत्री नरहरी झिरवळ हे नाशिक महापालिका आयुक्तांना पत्र पाठवणार असल्याचे देखील म्हटलले रस्त्यांच्या खोदकामांमुळे नाशिककरांना खड्डेदुखीला सामोरे जावे लागत आहे. चार महिन्यांत या खड्ड्यांनी तिघांचा बळी घेतला आहे. तर दिलीप काळे नामक व्यक्तीची ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू आहे.0
0
Report
Advertisement
बालापूर की छात्रा की मौत: आरोपी पुलिस कर्मी पवन वडकावे की गिरफ्तारी मांग तेज
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाची लाट उगली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आजही नागरिक रस्त्यावर उतरले. पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अकोला नाक्यावर तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट... काही महिन्यांपूर्वी बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने एका विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने संबंधित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादम्यान मृत्यूशी झुंज देत असलेल्या या पीडित मुलीचा अखेर काल मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात झाला होता. आज अंत्यसंस्कारापूर्वी संतप्त नागरिकांनी अकोला नाक्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान, खासदार अनुप धोत्रे यांनी आंदोलनस्थळी भेट देत या प्रकरणाचा पाठपुरावा मुख्यमंत्री स्तरावर केला जाईल, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आणि सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके तयार केली असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे. आरोपीला लवकरच अटक करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्य्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता आरोपीला नेमके कधी अटक होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तपास किती वेगाने पुढे सरकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जयेश जगड, झी मीडिया, अकोला0
0
Report
नवी मुंबई मनपा शिक्षण विभाग के कामकाज पर बहस, विपक्ष चुप; गणवेश वितरण देरी
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: नवी मुंबई मनपामध्ये शिक्षण विभागाचा कारभार समोर सत्ताधारी आणि विरोधक देखिल हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन गप्प बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नवी मुंबई मनपाच्या शाळा सुरु होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेय. शिक्षण विभाग आणि सत्ताधारी भाजपातर्फे गणवेशाचे वाटप सुरु असल्याचे सांगण्यात येतं असले तरी किती विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले याचा आकडा मात्र कळत नाही . गणवेश वाटपाच्या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करत असून यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र अतोनात हाल होताना पहायला मिळत आहेत.0
0
Report
नाशिक की सड़कों पर खड्डे, कुंभ कार्यों से आवागमन प्रभावित
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - नाशिकमधल्या रस्त्यांच्या विरोधात राज्याचे मंत्री आणि सत्तेतील नगरसेवक एकवटले पालिका प्रशासना विरोधात ... - नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांची चाळण... - मंत्री नरहरी झिरवाळांचा घराचा रस्ता खड्डेमय, मंत्री झिरवळ नाशिक मनपा प्रशासनाला पाठवणार पत्र... - महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना नगरसेवकांचा पालिका प्रशासना विरोधात शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा... - पंचवटीतील मखमलाबाद रोडवर दररोज घडतात अपघात... - नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश...0
0
Report
Advertisement
अकोला दुर्घटना: मोहसीन शेख की मौत, आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे अकोला जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदेचे माजी जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांच्यावर गंभीर आरोप करत तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. अकोला शहरात झालेल्या अपघातात शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये मोहसीन शेख हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. मृत्यूनंतर मोहसीन शेख यांचा मृतदेह खदान पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मंगेश काळे हेच संबंधित चारचाकी वाहन चालवत होते आणि त्यांनीच हा अपघात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.0
0
Report
उजनी डैम में पानी 108 टीएमसी तक पहुंचा: 100% क्षमता तक पहुंचने के लिए अभी 8 टीएमसी बचे
Rui, Maharashtra:48 तासात उजनी धरणात 10 टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला. दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात 55 हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह. उजनी धरणात सध्या 108 टीएमसीहून अधिक पाणीसाठा. उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी केवळ आठ टीएमसी पाण्याची गरज. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळीतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय, शिवाय पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पाऊस देखील झाला यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात सध्या 55 हजार 319 क्युसेकने पाण्याचा येवा येतोय, परिणामी गेल्या 48 तासात उजनी धरणात 10 पूर्णांक 7 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. 24 जुलै रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरणात 96 पूर्णांक 7 टीएमसीइतका पाणी साठा होता तर आज दुपारी 12 वाजता उजनी धरणात 108 पूर्णांक 56 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. उजनी धरण सध्या 83 पूर्णांक 82 टक्के क्षमतेने भरलं आहे. एकूण गेल्या 48 तासात उजनी धरणात 10 टीएमसी हून अधिक पाणीसाठा वाढला आहे. आता उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरण्यासाठी आठ टीएमसी पाण्याची आवश्यकता है.0
0
Report
मेळघाट आश्रम में 70 आदिवासी विद्यार्थियों को विषबाधा, मंत्री और अधिकारियों पर हो सकती है कार्रवाई
Amravati, Maharashtra:अमरावती के मेळघाट में 70 आदिवासी विद्यार्थियों को विषबाधा की घटना घटी है, टीटंबा स्थित शासकीय आदिवासी आश्रम शाळे में रात के खाने के बाद विषबाधा की पुष्टि हुई है. धारणी उपजिल्हा रुग्णालय में उपचार चल रहे हैं और सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई जा रही है. मेळघाट दौरे पर आए महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे के लौटने के क्षणों में यह घटना उजागर हुई है. इसके बाद भारी हंगामा मचा हुआ है. इस धक्कादायक घटना के बारे में खासदार बळवंत वानखडे ने आश्रम शाळे की झाडाझडती करके विद्यार्थियों के उपचार की स्थिति की जानकारी ली और शाळा प्रशासन के रवैये पर सवाल उठाए. उन्होंने ठोस कार्रवाई की मांग की और कहा कि शिक्षण संस्थाओं में विद्यार्थियों को ठीकठाक भोजन और अधिकार मिले, इसके लिए आवश्यक कदम उठाने होंगे. अदिती तटकरे ने कहा कि मेळघाट के टिटवा आश्रम शाळे में फूड पॉइजनिंग की घटना सामने आई है; उन्होंने डॉक्टरों से बातचीत की है और सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई. केंद्रीय किचन से क्या बना भोजन लाया गया था, इसकी भी जांच के निर्देश दिए गए हैं. उन्होंने आदिवासी मंत्री के साथ इस मामले पर आगे की चर्चा की बात भी कही है. बारिश के मौसम के साथ मेळघाट में ऐसी घटनाओं के पुनरुत्पादन पर सरकार ने कठोर कार्रवाई की मांग की है और सभी संबंधित अधिकारियों पर कड़ी निगरानी और जवाबदेही की बात कही है.0
0
Report
Advertisement
इंदापुर: किसानों के लिए कर्जमाफी का पहला कदम, कृषि मंत्री भरणे का ऐलान
Rui, Maharashtra:इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बायट आरोग्य शिबिर... ऑन् आरोग्य शिबिराचा फायदा या तालुक्यातील गोरगरीब जनतेला होईल.. ऑन् कर्जमाफी.. कर्जमाफी संदर्भात पहिली स्टेप झाली आहे, तीन ते चार स्टेप होतील, पहिल्या स्टेपला पुणे जिल्ह्याला साधारण साडेपाचशे कोटी रुपये रक्कम मिळाली आहे. तीन स्टेप मध्ये ही कर्जमाफी होणार आहे साधारण तीन स्टेप मध्ये 40 हजार कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील. कृषिमंत्र्यांची नवी डेडलाईन... आज पहिली स्टेप झाली आहे, साधारण पुढच्या महिन्यापर्यंत शेवट पर्यंत सर्व होईल. ऑन प्रधान राजीनामा तो वरिष्ठांचा निर्णय आहे, केंद्राच्या निर्णयाबद्दल आपण काय सांगू शकतो मोदी साहेबांना जे वाटलं त्याप्रमाणे केलं असेल ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली वारी. याबाबतीत मी तुमच्याकडूनच ऐकतोय मी माहिती घेतल्यानंतर बोलेल.....0
0
Report
नाशिक में गोदावरी नदी के किनारे पानवेली फैलने से बाढ़ का खतरा बढ़ा
Nashik, Maharashtra:रामकुंड परिसरातील सगळे छोटे मोठे मंदिर पानवेल्याच्या विळख्यात... अँकर गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात पाऊस सुरू होता.यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली होती... गंगापूर धरणातून तब्बल १९००० किंवा पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला होता यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता....त्यात परिसरात असलेल्या पानवेलिया थेट वाहत गोदा घाट परिसरामध्ये आल्यात... रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिर या पानवेलने वेढलेले आहे... गोदावरी नदीपात्रात पानवेली गोदावरी नदी पात्रातून काढावे अशी विनंती देखील करण्यात आली होती...मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या पानविले मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या...दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे हा संपूर्ण पानवेली गोदा घाट परिसरात अडकून पडले आहेत... या संदर्भात गोदा घाट परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
गोरेगांव के 20 हजार लाभार्थी अब घर-घर आधार-कार्ड पाएंगे, शिंदे का नया कदम
Mumbai, Maharashtra:मुंबई | गोरेगाव ज्या पद्धतीने नागरिक नाही विद्यार्थी सुद्धा शिवसेना जनतेच्या दारी शामिल झाले आहेत 20 हजार लाभार्थी याच दाखल्याच वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणार आहे नागरिक विद्यार्थी यांच्या गरजा त्या शिवसेनेनी ओळखल्या आहेत गरजा थेट पोचवण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम इथे नाही थांबणार दर 3 महिन्यांनी हा उपक्रम होणर आधार कार्ड ,पण कार्ड ,उत्पन्नाचा दाखल या दाखल्यासाठी तहसीलदार ऑफीस कडे जाव लागत ते आता घरपोच करून देणार आहोत जनतेला हेच पाहिजे त्यांचा वेळ वाचावा आणि शासनाच्या दारी फेरफटका मारू नये शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम हाती घेतला आहे रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत भविष्यात ड लिमिटेशन झालं पक्षाने संधी दिली तर नकीच दिल्लीत जायला आवडेल ब्रेक सिद्धेश कदम यांचं खासदारकी बाबत मोठ विधान सिद्धेश कदम यांनी खासदारकी बाबत व्यक्त केली इच्छा गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांन सोबत संवाद साधताना व्यक्त केली इच्छा भविष्यात डीलिमिटेशन झालं पक्षाने संधी दिल्ली तर दिल्लीत जायला आवडेल रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव से पहले चिपळूण पुल खुलने की उम्मीद धूमिल, अप्रोच रोड देरी में
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूण उड्डाण पुलाचे गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात; मात्र ॲप्रोच रोडमुळे गणेशोत्सवाची डेडलाईन हुकणार मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील वशिष्ठ नदीवरील आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या बहादूर शेख नाका येथील अखेरचा ४0 मीटर लांबीचा गर्डर चढविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे संकेत दिले होते. मात्र पुलाचे मुख्य काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी ॲप्रोच रोडचे काम अद्याप रखडले असल्याने गणेशोत्सवापूर्वी पूल सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या पुलावरून डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
सोलापुर में दो दिन में तापमान 4.1 डिग्री बढ़ा, दबाव घटने से बारिश की संभावना
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूरचा तापमानात दोन दिवसात 4.1 अंशांनी वाढ, हवेचा दाब कमी झाल्याने पावसाची शक्यता0
0
Report
गोदावरी में बाढ़ घटने के बाद पानी कम होना शुरू, रामकुण्ड मंदिर अभी पानी में
Nashik, Maharashtra:नाशिक - - गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात - गोदावरी नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होण्यास झाली सुरवात - मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातील मंदिरे अद्यापही पाण्यात - दैनंदिन पूजा विधि सह नदीकाठ परिसरातील व्यवसायावर पूरपरिस्थितीमुळे परिणाम - तर पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आले पाणी - धरणातूनही पाण्याचा निसर्ग करण्यात आला आहे कमी या संदर्भात रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
Advertisement
