icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नंदुरबार में माकड़ों के हमले से स्कूलों में दहशत, मोर भी शहर में दिखा

Dhule, Maharashtra:नंदुरबार शहातील शाळांना दोन माकडांनी वेठीस धरलं आहे. या माकडांची दहशत एवढी आहे कि, पालक मुलांना शाळेत पाठवला माघे पुढे पाहत आहेत. जंगलात अन्न-पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या माकडांनी शहराची वाट धरली आहे. मात्र नंदुरबारचे हे माकड शाळांनाच लक्ष करत असल्याने भीतीचे वातावरण आहे . माकड शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करत असल्याने भीतीचे वातावरण आहे. माकडाच्या भीतीमुळे शिक्षकांकडून विशेष खबरदारी घेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळांचे मुख्य दरवाजे आणि वर्गखोल्यांचे दरवाजे बंद ठेवून अध्यापन सुरू आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवलेले नाही. भीतीपोटी मूल घरीच आहेत. वन विभागाकडून माकडाला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून, अद्याप यश आलेले नाही. वन विभागासह वन्यजीव मित्रही माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे कमी कि काय, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर देखील नंदुरबार शहरात दाखल झाला आहे. माकडांनंतर आता मोराची शहरातील तांबोळी गालीच्या परिसरात दिसून आल्याने नंदुरबारमध्ये नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जंगलात अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास वन्य प्राणी आणि पक्षी मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जंगलातील जलस्रोत आणि नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार
0
0
Report

लासलगाव थाना के पास दिनदहाड़े रोड रॉबरी, व्यापारी के वाहन से 70 हजार नकद चोरी

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर भरदिवसा रोड रॉबरीची धक्कादायक घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील अभय किराणा दुकानाचे मालक आनंदा शांताराम घोडेगावकर हे किराणामाल खरेदीसाठी लासलगाव येथे आले होते दोन्ही ठिकाणांहून किराणामाल खरेदी केल्यानंतर औषध घेण्यासाठी व नाश्ता करण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एका रेस्टॉरंटमध्ये गेले असतात याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एमएच 15 जीआर 7801 क्रमांकाच्या त्यांच्या व्हॅगनार कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडली कारमध्ये किराणामालाशेजारी ठेवलेल्या कापडी पिशवीतील 70 हजार रुपयांची रोकड चोरून नेली घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून तपास सुरू केला मात्र गेल्या काही दिवसांपासून लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक चोऱ्यांचा अद्याप उलगडा न झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे
0
0
Report

शिर्डी साईं मंदिर में गुरु पूर्णिमा उत्सव का शानदार समापन, दही हांडी फोड़कर तीन दिवसीय आयोजन समाप्त

Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डीच्या साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहांडी फोडून तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली.. आज शेवटचा तिसरा दिवस असल्याने सकाळी काकड आरтаи�nंतर साईमुर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले.. त्यानंतर गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला.. उत्सवाचा सांगता दिवस असल्याने आज साईमंदिरासमोर काल्याचं किर्तन पार पडलं.. काल्याच्या किर्तनासाठी साई संस्थानचे अधिकारी, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.. किर्तनानंतर दही हांडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पडली आणि उत्सवाची सांगता करण्यात आली... गुरूपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात लाखो भाविक साईचरणी नतमस्तक झालेत...
0
0
Report
Advertisement

भंडारा में जून में दूध संकलन 16 हजार लीटर कम, क्या कार्रवाई का प्रभाव?

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात दूध संकलनात १६ हजार लिटरची घट; अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईचा परिणाम? दुग्धव्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पूरक व्यवसाय मानला जातो. भंडारा जिल्ह्यातही पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते आणि जिल्हा दुग्ध विकास संघामार्फत दररोज मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. मात्र यंदा जून महिन्यात दूध संकलनात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी धडक कारवाया आणि कडक उन्हाळ्याचा परिणाम दूध संकलनावर झाल्याचे समोर आले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... भंडारा जिल्हा दुग्ध विकास संघाच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात दूध संकलनात मोठी घट झाली आहे. यंदा जून महिन्यात सुमारे २ लाख २४ हजार लिटर दूध संकलित करण्यात आले. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत हे संकलन सुमारे १६ हजार लिटरने कमी असल्याचे दिसून आले आहे. सतत तीन महिन्यापासून दूध संकलन कमी होत आहे.. अधिकाऱ्यांच्या मते, यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात जनावरांच्या दूध उत्पादनात झालेली नैसर्गिक घट आणि दुसरे म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने दुधातील भेसळीविरोधात राबविलेल्या धडक कारवाया. या कारवाईनंतर भेसळयुक्त दूध पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसला असून आता केवळ दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण दूधच संकलन केंद्रांवर येत असल्याचे सांगितले जात असल्याचा चित्र समोर येत आहे.
0
0
Report

नांदेड में भारी बारिश, पुल की ऊँचाई बढ़ाने की मांग तेज; गांवों का संपर्क टूटने की समस्या

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - नांदेड जिल्ह्यात आज पहाटे पासून पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. माचणूर ते गंजगाव मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे माचणुर, गंजगाव, कुंडलवाडी गावांचा संपर्क तुटलाय. पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरीक शाळकरी मुलांना याचा मोठा फटका बसला. गंजगाव मार्गावरील या पुलाची उंची कमी असल्याने थोड्या पावसामुळे देखील पुलावरून पाणी वाहते. ही समस्या नेहमीची झाली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
0
0
Report
Advertisement

FDA कार्रवाई के बाद मसालों के पैकेट खुले में फेंके, वाशीम में आक्रोश

Washim, Maharashtra:अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर व्यापाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. वाशिमच्या शेलू बाजार मार्गावरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात मसाल्याच्या पुड्या फेकून दिल्याचे आढळून आले.या पुड्या मुदतबाह्य असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली, तरी कारवाईपासून बचाव करण्यासाठी हा माल टाकण्यात आल्याची चर्चा आहे. उघड्यावर खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावल्याने अस्वच्छता, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून,या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

यवतमाळ अर्णी में PWD की देरी से नाली जाम, दुकानों में पानी घुसा, नुकसान

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या आर्णी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका व्यवसायिकांना बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात रस्त्याच्या बाजूने नालीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पावसाळ्यात हाती घेण्यात आल्याने तसेच अतिशय संथ गतीने सुरू असून, पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. परिणामी नाली तुंबल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी माहूर मार्गावर असलेल्या बेसमेंट मधील दुकानांमध्ये शिरले परिणामी दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बांधकाम विभाग अथवा संबंधित कंत्राटदाराने व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

शिंदे गट के आ.बच्चू कडू ने दिव्यांग भाइयों के लिए स्टॉल का उद्घाटन किया

Shirdi, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाचे आ.बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधवांसाठी स्टॉलचे उद्घाटन.. स्टॉलच्या उद्घाटनानंतर आ.बच्चू कडू यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचे दर्शन.. आ.बच्चू कडू बाईट मुद्दे - ऑन स्टॉल उद्घाटन dिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी सरकारने आणि नगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या पाहिजे... या मागणीसाठी प्रहारच्या माध्यमातून सातत्याने आम्ही भांडत असतो... शिर्डी नगरपालिकेने दिव्यांग बांधवांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले , मी प्रशासन आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचे आभार मानतो... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील हा उपक्रम राबविला त्यांचे देखील मी आभार मानतो... नगरपालिका हद्दीतील एकूण दुकानांच्या पाच टक्के वाटा दिव्यांग बांधवांना मिळावा... या मागणीचे नवीन धोरण सरकारकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय... अधिवेशनात या मागणीचा प्रस्ताव आम्ही ठेवलाय... ऑन FDA कारवाई तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीच्या कारवाईबाबत जो निर्णय घेतलाय ज्या कारवाई सुरू आहे त्याबाबत मी त्यांचे आभारच मानले... एखाद्या पदार्थात भेसळ करणं हे एखादा खून करण्यासारखं... अन्नभेसळ करणाऱ्यांवर खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे... रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत पर्यावरण आणि भेसळीचे कारण आहे... पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री आहेत आणि तुकाराम मुंढे अन्न प्रशासन विभागाचे आयुक्त... दोनन्ही मुंडेनी व्यवस्थित काम करायला हवं.... तुकाराम मुंढे व्यवस्थित काम करताय , मात्र दुसऱ्या मुंडेंनी चांगल्या पद्धतीने काम केल्यास चांगले रिझल्ट बघायला मिळतील... ऑन कॉकरोच जनता पार्टी आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने जो मुद्दा हाती घेतला तो मुद्दा महत्त्वाचा... ते जरी सत्तेच्या विरोधात असतील तरी त्यांनी जो मुद्दा घेतलाय तो महत्वाचा... मी या आंदोलनाचं आणि मुद्द्याचं समर्थन करतोय... सरकारने या प्रश्नांवर दुरुस्ती करणे गरजेचे आहे... शेती मालाला भाव नाही , मोठ्या उद्योगमुळे छोटे व्यवसाय चालत नाही , युवकांना शासकीय नोकरीशिवाय पर्याय नाही... नोकरीमध्ये जर करप्शन होत असेल तर ते बंद झालं पाहिजे... सरकार विरोधात त्यांनी आंदोलन केलं म्हणजे ते आमचे विरोधक आहेत असं समजणारा मी नाही... हा देश आंदोलनातूनच उभा राहिला... सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाचा राग करणं योग्य वाटत नाही... तरुणांची शक्ती राष्ट्रीय कार्यासाठी कशी वळवता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे... ऑन ठाकरे बंधू काही बुवांनी संस्कृती नासवली त्यांच्याबद्दल काही शंकाच नाही.. खरात बुवा झाला आणि त्यांनी काय वाटोळं केलं हे राज्याला माहिती , अश्या बुवांना चटके दिले पाहिजे... ऑन बाबा रामदेव आपल्या भारताची व्यवस्था टिकवून आणि त्या व्यवस्थेला रोजगार देणे गरजेच... रामदेव बाबा जर मिरची पावडर काढत असतील तर छोट्या बचत गटाची मिरची पावडर कोण घेणार.? मोठ्या उद्योगपतींना बंधन टाकलेच पाहिजे... बंधन करण्यासाठी अशासकीय कायदा करावा अशी मागणी मी विधान परिषदेत करणार आहे... ग्राम उद्योग आणि लहान उद्योग छोट्या माणसाच्या हातून जाता कामा नये... श्रीमंताच्या हाती उद्योग गेल्यास छोट्या व्यवसायिकांना भेटणारा रोजगार देखील जातो... ऑन सत्ताधारी सत्ताधारी म्हणजे आम्हालाही दोन शिंग फुटत नाही... माध्यमांना असं वाटतं सत्तेचा झाला म्हणजे दोन शिंगं फुटले आणि तो मारायला बाहेर निघाला , अस काही होणार नाही... विचाराची लढाई ही कुठेही गेलं तरी विचार घेऊनच लढणार आहोत... शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दिव्यांगांचे प्रश्न असतील छोट्या व्यवसायिकांचे प्रश्न असतील जो व्यक्ती पीडित आहे त्याच्यासाठी मी सत्तेत आहे म्हणून बोलायचं नाही हे मला माझ्या आयाने शिकवलं नाही.... ऑन मनोज जरांगे आंदोलन मी ठरवलं आहे कुठल्याही आरक्षणाच्या आंदोलनात बोलू नये कारण मी शेतकरी.. शेतकरी सगळ्या जातीचे आहेत... आरक्षणाच्या एका बाजूने बोललं तर नाराजी होती त्यामुळे शेतकरी विषय सोडून कुणाच्याही आरक्षणाच्या आंदोलनात नाक खुपसणे बरोबर वाटत नाही... आरक्षणाच्या लढाई पेक्षा मोठी लढाई शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची हमीभावासाठी आम्ही लढू.. माध्यम प्रतिनिधींना देखील एका चांगल्या नावाचा रोग लागलेला दिसतोय ते नाव सोडून दुसरा विचार केला तर बरं होईल... मनोज जरंगे हे फक्त मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट करतात..? या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.. Byte - आ.बच्चू कडू , शिवसेना शिंदे गट
0
0
Report
Advertisement

मिरज पंचायत समिति के नामकरण पर महाविकास आघाडी और भाजपा के बीच विवाद

Sangli, Maharashtra:मिरजेच्या नूतन पंचायत समिती इमारतीला आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले. श्रेयवादाच्या राजकारणातून दोन वेळा उद्घाटन झालेल्या मिरज पंचायत समितीच्या नावावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.मिरज तालुक्यातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून मिरज पंचायत समितीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,असं नाव अचानकपणे देण्यात आले आहे.नुकतंच या इमारतीच्या लोकार्पण वरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगला होता,यातून जयंत पाटील विशाल पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्घाटन झालं होतं,त्यापाठोपाठ भाजपाकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं होते.या पंचायत समितीला नाव देण्यावरून देखील माहाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद सुरू होता,यावर मिरज तालुक्यातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या कार्यालयावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नावाची अक्षर लावून,पंचायत समितीला डॉक्टर भारतरत्न आंबेडकर असं नाव देण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
0
0
Report

ओबीसी हक़ों पर सरकार की धार, विरोध तेज, सड़क पर उतरेगा

Nagpur, Maharashtra:नागपूर - जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावात येऊन सरकराने ओबीसीच्या हक्कावर गदा आणली, तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल..सरसकटला आमचा विरोध - ५८ लाख नोंदी नव्या नाहीत, भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनच्या नोंदी आहेत - यापैकी ३८ लाख नोंदी विदर्भातल्या आहे. हे पिढीजात कुणबी आहें त्यांना आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालेय - जोपर्यंत वंशावळीनुसार कुणबी नोंद नाही, तोपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र देऊ शकत नाही - जरांगे पाटील ओबीसी समाजाची दिशाभुल करत आहे - चुकीच्या माणसांना कुणबी प्रमाणपत्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ देऊ देणार नाही
0
0
Report
Advertisement

श्रीरामपुर पुलिस स्टेशन के बाहर हिंसक हमला, दो अल्पवयस्क जख्मी

Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर शहर में कानून-व्यवस्था का प्रश्न फिर से सामने आ गया है. श्रीरामपुर पुलिस थाने के दरवाजे पर शिकायतकर्ता के साथ जबरदस्त मारपीट की घटना सामने आई. श्रीरामपुर शहर पुलिस थाना के प्रवेशद्वार पर दो युवकों पर धारदार हथियार से हमला किया गया. इस मारपीट में दोनों गम्भीर रूप से घायल हैं. दाखिल किए गए मुकदमे को वापस लेने के लिए आरोपी के परिवार वालों ने पिड़ित परिवार पर दबाव डालने की कोशिश की, इसी वजह से पिड़ित परिवार के युवक श्रीरामपुर पुलिस थाने पहुंचे थे. जख्मी दोनों अल्पवयस्क हैं; अस्पताल में उपचार जारी है. शहर पुलिस ने नौ लोगों के खिलाफ मारपीट का मामला दर्ज किया है; तीन को गिरफ्तार किया गया.
0
0
Report

कर्जमुक्ति योजना से 2.33 लाख किसानों को मिलेगा लाभ, ईकेवाईसी में सुगमता मांग

Ahilyanagar, Maharashtra:राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली आहे... अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 लाख 33 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यातील पहिल्या टप्प्यात 1 लाख 32 हजार 734 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे... यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण करायची आहे... जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे...केवायसी करण्यासाठी वेळ लागत आहे... इंटरनेटची समस्या किंवा सर्व्हरडाऊन या समस्यांमुळे शेतकऱ्यांना सेतू सुविधा केंद्रावर चार-पाच वेळेस हेलपाटे मारावे लागत आहेत... त्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे...सर्व्हर डाऊन समस्या लवकर कमी व्हावी आणि ई केवायसी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top