445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलढाणा में डीजे से ध्वनि प्रदूषण के आरोप, मलकापूर पुलिस ने पहली कार्रवाई
Buldhana, Maharashtra:बुलढ़ाणा जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव, मिरवणुका व इतर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजे चा वापर करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. काल मलकापूर शहरातील कर्णकर्कश व मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवणाऱ्या भुसावळ येथील डीजे मालक आशिष रवींद्र अडकमोल यांच्या विरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करत कलम 136 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.. यामुळे जिल्ह्यातील डीजे मालक व चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असून सर्वत्र डीजे बंदीची मागणी होत असताना मलकापूर मध्ये कारवाई झाल्याने खळबळ उडाली है.0
0
Report
अकोला में सूखे से सोयाबीन फसल डूबी, किसानों ने तात्कालिक मदद की मांग
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप पिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील विरहित परिसरात पावसाच्या दीर्घ खंडाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. ऐन फुलोऱ्यात असलेली सोयाबीनची उभी पिके पाण्याअभावी जागेवरच वाळून जात असल्याचं चित्र आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली असून फुले आणि शेंगाही सुकू लागल्या आहेत. पिकांना पाणी देऊन वाचवण्याचे शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू असले तरी अपुरा आणि खंडित वीजपुरवठा त्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पाऊस आणखी लांबला तर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे आता पाऊस झाला तरी करपलेल्या पिकांना त्याचा कितपत फायदा होईल, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.पावसाअभावी केवळ पिकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या आशाही कोमेजू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.0
0
Report
नारायणगाव बाजार में टमाटर के दाम गिरकर किसान परेशान: संकट गहराने लगा
Barav, Maharashtra:टोमॅटो उत्पादक बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या फेऱ्यात अडकलाय! एकीकडे पावसाने मारलेली दडी... दुष्काळाची भीषण परिस्थिती, तर दुसरीकडे टोमॅटोला मिळणारा कवडीमोल भाव! टोमॅटोचे हब मानल्या जाणाऱ्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर गडगडलेत. एका क्रेटला अवघा अडीचशे ते तीनशे रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. केलाproduक production खर्च तर सोडाच, पण मजुरी वाहतुकीचा खर्चही निघणं मुश्कील झालंय. याचाच नारायणगाव बाजारसमितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
नागपुर में विदर्भ ओबीसी बैठक: दिल्ली आंदोलन की रणनीति तय
Nagpur, Maharashtra:ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी, विजे-एनटी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक. जातिनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलम आणि राज्यस्तरावरील ओबीसींच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची रणनीती ठरणार. हिवाळी अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या दिल्लीतील देशव्यापी आंदोलनासह राज्यभरात तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर आंदोलनाची आखणी. केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्वतंत्र कॉलम न देऊन ओबीसी समाजाचा मोठा विश्वासघात केला आहे. या अन्यायाविरोधात देशभरातील ओबीसी समाजात प्रचंड असंतोष खदखदत असून दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी 'सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने राज्यभर व्यापक जनजागरण करण्यात येत आहे सकाळी १०:३० वाजता नागपूर येथील MTDC हॉटेल, सिव्हिल लाइन्स येथे विदर्भस्तरीय ओबीसी, विजे-एनटी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने १३ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे देशातील ६५ संघटनांच्या झालेल्या बैठकीतील निर्णयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर होणाऱ्या आंदोलनाची ठोस भूमिका व तारखा निश्चित करण्यात येतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आणि आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारचा पुढाकार स्पष्टपणे दिसत असताना, दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या महाज्योती', वनार्टी' संस्थांना लोकसंख्येच्या आधारावर निधी आणि इतर मॅट्रिकपूर्व तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींबाबत सरकारकडून सुरू असलेली जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाढूपणा आता ओबीसी समाज कदापि सहन करणार नाही, असा इशारा सकल ओबीसी महामोर्चाने दिला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींप्रमाणेच ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि राज्य स्तरावर ओबीसींना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम आखला पाहिजे, यावर या बैठकीत सखोल विचारमंथन होणार आहे.0
0
Report
श्रीरामपुर के जानता राजा गणेशोत्सव में मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने ढोल पर थिरककर मचाई धूम
Shirdi, Maharashtra:Anc - श्रीरामपूरच्या ‘जाणता राजा’ गणेशोत्सव मंडळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळाला.ढोलपथकाच्या दमदार वादनाने विखे पाटलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.ढोल-ताशांचा आवाज आणि तरुणाईचा जोश पाहून पालकमंत्र्यांनाही मोह आवरला नाही.थेट ढोलपथकात शिरत विखे पाटलांनी ढोल हाती घेतला आणि तालावर ताल धरला.पालकमंत्र्यांचा हा उत्साही अंदाज पाहून उपस्थितांनीही जोरदार दाद दिली.सध्या विखे पाटलांच्या ढोल वादनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय...0
0
Report
नागपूर का 8.9 किमी लंबा फ्लायओवर आज लोकार्पण, दक्षिण से उत्तर जुड़ेगा
Nagpur, Maharashtra:नागपूरातील दिघोरी चौक ते कमाल टॉकीज इंदोरा चौक हा दक्षिण आणि उत्तर नागपूरला जोडणारा उड्डाणपुलाचे आज लोकार्पण होतेय... 8.9 किमी लांबीचा हा उड्डाणपुल राज्यातील सगळ्यात लांब असा उड्डाणपूल ठरणार आहे... त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अमर काणे यांनी0
0
Report
Advertisement
गौरी गणपति सजावट स्पर्धा: महिलाओं के लिए मंच पर विविध सामाजिक नज़ारे की धूम
Yeola, Maharashtra:गणराया पाठोपाठ लाडक्या गौराईचे देखील आगमन येवल्यात मोठ्या थाटामाटात झाले असून गौराई पुढे विविध प्रकारचे देखावे सादर करण्याची परंपरा महिला वर्गाकडून सुरू आहे महिलांना व्यासपीठ मिळावे याकरता कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेदरम्यान विविध प्रकारचे सामाजिक देखावे सादर करण्यात आले आहेत.0
0
Report
गणराय स्थापना के तीसरे दिन बने देखावे; महंत संदीप गिरी महाराज ने उद्घाटन किया
Yeola, Maharashtra:गणरायाच्या स्थापनेनंतर तिसऱ्या दिवसापासून एवढ्यात विविध प्रकारच्या देखाव्यांना आता सुरुवात झाली असून येवल्यातील शिवशंभू वॉरियर्स मित्र मंडळाच्या वतीने तिरुपती बालाजी येथील देखावा साकारण्यात आला आहे ते देखावेचे उद्घाटन महंत संदीप गिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी येवलेकरांसाठी हा देखावा खुला झाला असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
औसा में दूषित पानी से स्वास्थ्य जोखिम, प्रशासन से तुरंत शुद्ध पानी की मांग
Latur, Maharashtra:औसा शहरात दूषित पाण्याचा पुरवठा शुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पाण्यामुळे आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगर पालिकेकडे केली आहे.0
0
Report
Advertisement
येवला में गणेशोत्सव के बाद देखावे, भीड़ उमड़ी; क्षत्रिय मित्र मंडळ ने कोल्हापुर दिखाया
Yeola, Maharashtra:गणरायाच्या स्थापनेनंतर येवला शहरात विविध प्रकारचे देखावे सादर करण्याची परंपरा असून चढाओढीने देखावे सादर केले जातात. येवल्यातील क्षत्रिय मित्र मंडळाने करवीर निवासिनी कोल्हापूरचा देखावा सादर केला असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. या संदर्भात आढावा घेतला आहे.0
0
Report
वाशिम में सूखा घोषित, खरीफ फसलें बर्बाद—किसानों को राहत की मांग तेज
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पावसाने तब्बल ५० ते ५५ दिवसांचा दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम अक्षरशःकरपून गेला आहे. जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं सोयाबीन आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना अनेक शेतांमध्ये वाळून गेलंय. यंदा या पिकातून उत्पादनाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. डोळ्यांसमोर उभं पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आहेत. त्यामुळे सरकारने वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा आणि नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.0
0
Report
सातारा के कोयना में प्रकाश भोसले ने तापोला-अहिर पुल की हूबहू प्रतिकृति बनाई
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील तेटली येथील प्रकाश भोसले यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी 'तापोला-अहिर पुला'चा हुबेहूब देखावा साकारला आहे. पुलाची रचना, आकार आणि परिसराचे बारकावे अचूक टिपून तयार केलेली ही आकर्षक प्रतिकृती पाहण्यासाठी स्थानिक नागरिक मोठी गर्दी करत आहेत. विभागातील विकासकामांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्र्यांवरील प्रेमापोटी साकारलेला हा कल्पक देखावा सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.0
0
Report
Advertisement
प्रतापगढ़ किले में मशाल महोत्सव की तैयारी तेज, उदयनराजे भोसले ने पूजा की
Satara, Maharashtra:सातारा: किल्ले प्रतापगड येथे १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवाच्या तयारीला आता जोरदार वेग आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे किल्ले प्रतापगड येथील मशाल महोत्सव समितीच्या मावळ्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हस्ते विधीवत मशाल पूजन पार केले. या पूजनानंतर उदयनराजेंनी मशाली तयार करणे, गडाची स्वच्छता, भव्य स्टेज उभारणी आणि महाप्रसाद अशा सर्व पूर्व तयारीचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि शौर्याला अभिवादन करणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त हजेरी लावत असतात.0
0
Report
8 महीने की चिमुकली के लापता होने से नांदगांव में हलचल, पुलिस जांच तेज
Nashik, Maharashtra:नांदगाव(नाशिक) विशाल मोरे - 8 महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याने खळबळ... नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथील (दि. 17) मध्यरात्रीची घटना.. मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान आई - वडिलांच्या अंथरुणावरून चिमुरडी गायब.. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणेसह स्थानिकांकडून चिमुरडीचा कसून शोध सुरु.. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी तळ ठोकून.. या प्रकरणी नांदगाव पोलिसात चिमुकलीच्या वडिलांनी दिली अपहरणाची फिर्याद.. केवळ आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याने विविध प्रश्न व शंका केल्या जाताहेत उपस्थित...0
0
Report
पुणे जिले के 13 लाख मतदाताओं को नोटिस, मतदाता सूची पुनरीक्षण की तैयारी शुरू
Pune, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील 13 लाख मतदारांना नोटीसा... एस आय आर मोहीम त्या गुरुवारपासून सुनावण्यांना सुरुवात... मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुननिरीक्षण मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी निश्चित करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १३ लाख ३२४१८ मतदारांना नोटीस बनवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोनवणे घेतल्या जाणाऱ्या सून 28 सप्टेंबर पासून प्रक्रिया नियमितपणे राबवली जाईल.0
0
Report
Advertisement
