icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बारिश से हल्दी उत्पादन घटा, किसान आर्थिक संकट में

Washim, Maharashtra:वाशीम: शिरपूर व परिसर हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, यंदा हजारो एकरात लागवड झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. साधारण 30–35 क्विंटल प्रति एकर मिळणारे उत्पादन यंदा 15–20 क्विंटलपर्यंत घसरले आहे. पावसामुळे कीड व बुरशीचा प्रादुर्भाव वाढून हळदीची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. काढणी अंतिम टप्प्यात असून उकडणी व घासणी प्रक्रियेतही अडचणी येत आहेत. उत्पादन घट, निकृष्ट दर्जा आणि कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून खर्च वसूल होईल का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चप्पल बदली के विवाद में 18 वर्षीय युवक की हत्या, चार आरोपी गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत. रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौघान परिसरातील सोना ब्रिक्स वीट भट्ट्यावर वादातून 18वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवार रात्री सुमारे घडली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी काही तासांत चार आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव समीर राजू ध्रुव (वय 18, रा. ढाबाडी, जि. बडोदाबाजार, छत्तीसगड) असे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामनवमी निमित्त 26 मार्च रोजी काही तरुण रामटेक गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराबाहेर ठेवलेल्या चपलांपैकी एका तरुणाने दुसऱ्या चप्पल परिधान केल्याने गैरसमज निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये वाद सुरू झाला.हा वाद पुढे वाढत गेला आणि रविवारी रात्री विकोपाला गेला.. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी संतापाच्या भरात समीर ध्रुव याच्यावर विटा व काठ्यांनी हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ वादातून झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक नगर निगम के लोगो का दुरुपयोग: फर्जी संदेश से बिल भरवाने की धमकी

Nashik, Maharashtra:मनपाच्या नावाने बनावट संदेश; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल... नाशिक महानगरपालिकेच्या लोगोचा गैरवापर करून प्रलंबित पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याबाबत धमकीवजा व्हॉट्सअॅप संदेश पसरविण्याचा प्रकार समोर आलाय.. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय..अनोळखी व्यक्तींनी नाशिक महानगरपालिकेचा अधिकृत लोगो वापरून नागरिकांना प्रलंबित पाणीपट्टी आणि घरपट्टीची बिले तत्काळ भरण्याचा इशारा दिला. या संदेशात बिले न भरल्यास पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच बिले अपडेट करण्यासाठी ६२९७०१९७९२ या क्रमांकावर 'अंकित अग्रवाल' नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. इंग्रजी भाषेत पाठविण्यात आलेल्या या संदेशामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारीांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलीये....संशयितांनी मनपाची ओळख चोरून अधिकृत लोगोचा वापर व्हॉट्सअॅपच्या डीपीवर केला आणि खोटे संदेश प्रसारित केले. सायबर पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सअॅपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करताय... तर महानगरपालिकेने अशा प्रकारच्या संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अधिकृत माहिती केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमांद्वारेच दिली जाते, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केलंय...
0
0
Report

NTCA मंजूरी: विदर्भ के 5 बाघ सह्याद्री में स्थलांतर, पर्यटन को मिलेगा बढ़ावा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सह्याद्रीची डरकाळी वाढणार!..विदर्भातील ५ वाघ कोकणात स्थलांतरित होणार.. अँकर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आता वाघांचा संचार वाढणार आहे.विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने,आता वन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.. विदर्भातील अतिरिक्त ५ वाघांना आता 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात' आणले जाणार आहे.. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (NTCA) या स्थलांतरासाठी हिरवा कंदील दिला असून प्रक्रियेला वेग आला आहे.. सह्याद्री प्रकल्पात सध्या १० वाघ आहेत,या नव्या पाहुण्यांमुळे ही संख्या आता १५ वर पोहोचणार आहे.. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.. विदर्भातील 'वाघांचा हा प्रवास' सह्याद्रीचा मान नक्कीच वाढवेल..
0
0
Report

रत्नागिरी के पंकज चवंडे को महाराष्ट्र खो-खो चयन समिति में नियुक्ति

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीचे पंकज चवंडे यांची राज्य खो-खो निवड समितीवर नियुक्ती.. जिल्हा असोसिएशनकडून अभिनंदनाचा वर्षाव.. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ च्या आगामी हंगामासाठी आपल्या निवड समितीची आणि राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची घोषणा केली आहे..यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रत्नागिरीचे अनुभवी राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची महाराष्ट्र राज्याच्या 'किशोर-किशोरी' गटाच्या निवड समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे,पंकज चवंडे यांची ही या समितीवरील तिसरी टर्म असून, यापूर्वीही त्यांनी दोन वेळा निवड समितीचे सदस्य म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.. तसेच,महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा अनुभव दांडगा आहे.. या निवडीनंतर रत्नागिरीत आनंदाचे वातावरण आहे..
0
0
Report
Advertisement

थकीत वेतन के बदले 52 हजार की रिश्वत: डईओ समेत तीन गिरफ्तार

Nashik, Maharashtra:थकीत वेतन बिलासाठी शिक्षक दाम्पत्याकडूनच स्वीकारली लाच.. ५२ हजार स्वीकारताना जि. प. कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यासह, गट शिक्षणाधिकारी, शिक्षक जाळ्यात... दिंडोरी येथील गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, निगडोळ येथील प्राथमिक शिक्षक नीलेश निंबा भारती आणि जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद चैत्राम पाटील यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५२ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले. दिंडोरी येथे काल दुपारी ही कारवाई करण्यात आलीये.. तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षण असून ते 'पेसा' या विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सन २००२ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या एकस्तर वेतनश्रेणीतील थकीत फरकाच्या रकमेबाबत त्यांनी पंचायत समिती दिंडोरी येथे बिल सादर केले होते. या बिलाची रक्कम तक्रारदारासाठी सुमारे ६ लाख ५७ हजार ८०८ रुपये तर त्यांच्या पत्नीसाठी सुमारे ६ लाख ५५ हजार ६०० रुपये इतकी होती. ही रक्कम मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक होते तक्रारदाराने या प्रक्रियेसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपी गट शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी बिल पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात एक टक्का लाच स्वीकारलिये....
0
0
Report

नागपुर नगर निगम ने जनगणना में धांधली पर FIR दर्ज, 10 कर्मियों पर कार्रवाई

Nagpur, Maharashtra:नागपूर - जनगणना कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करत नागपूर महानगरपालिकेकडून थेट FIR दाखल - जनगणनेच्या कामात टाळाटाळ केल्यानं 10 जणावर गुन्हा दाखल.. - १ एप्रिलपासून देशभरात जनगणना सुरू कामात सहभाग न घेतल्यामुळे कठोर पाऊल - सतरंजीपुरा झोन अधिकाऱ्यांची तक्रार, यशोधरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद - जनगणना 2026-27 कामाला नकार, आदेश घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप - प्राचार्य, चार शिक्षक,लेखपाल असे , एकूण १० कर्मचाऱ्यांवर कारवाई - राष्ट्रीय कर्तव्यात हलगर्जीपणा गंभीर मानला, महानगरपालिकेची कठोर भूमिका - IPC कलम 187 अंतर्गत FIR दाखल, फौजदारी कारवाईला सुरुवात - जनगणना कामात सहकार्याचे आवाहन, प्रशासनाचा इशारा
0
0
Report

कोकण के होटेलों पर गैस संकट से पर्यटन उद्योग में भारी नुकसान

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. युद्धाची झळ आणि गॅसचा तुटवडा.. कोकणच्या पर्यटन हंगामाला 'ब्रेक', हॉटेल व्यावसायिक संकटात! अँकर कोकणचा निसर्ग आणि तिथल्या पाहुणाचाराचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, मात्र यंदा चित्र काहीसं वेगळं आहे. आखाती देशांमधील युद्धाचे सावट आता थेट रत्नागिरीच्या पर्यटन व्यवसायावर पडल्याचं पाहायला मिळत आहे... एरवी हाउसफुल असणारी रत्नागिरीतील हॉटेल्स यंदा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल मालकांना चुलीचा आधार घ्यावा लागताय.. चुलीवर अन्न शिजायला वेळ लागत असल्याने पर्यटक ताटकळत न थांबता निघून जात आहेत.. एकीकडे जागतिक युद्धाचा परिणाम आणि दुसरीकडे इंधनाची टंचाई, अशा दुहेरी कात्रीत कोकणातील हॉटेल व्यावसायिक अडकले असून त्यांना या हंगामात मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.. पर्यटनावर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे...
0
0
Report
Advertisement

खस गवत से खेती में जल-संरक्षण और उपज बढ़ोतरी

Washim, Maharashtra:अँकर:अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि घटणारी भूजलपातळी यामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील सोमठाना येथील शेतकरी पंकज राऊत यांनी खस गवताच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. राऊत यांनी १५ एकरपैकी ५ एकरात ३० फूट अंतरावर खस गवताची लागवड करून मृद व जलसंधारण प्रभावीपणे साधले. खसच्या खोल मुळांमुळे मातीची धूप कमी होते, पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि भूजलपातळी वाढण्यास मदत होते. तसेच खस गवताचा वापर चारा व मल्चिंगसाठी केल्याने जमिनीतील ओलावा टिकतो, तणांची वाढ कमी होते आणि उत्पादनात वाढ होते. फळबाग, बांबू आणि हंगामी पिकांसोबत त्यांनी ‘तण देई धन’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

ताडोबा-अंधकारी में 12 प्रवासी पक्षियों के टैगिंग से प्रवास अध्ययन को मिला नया मोड़

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- स्थलांतरित पक्ष्यांवरील वैज्ञानिक संशोधनाला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) नुकतेच १२ स्थलांतरित पक्ष्यांना केले टॅगिंग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) सहकार्याने हाती घेण्यात आला उपक्रम, आजवर अनेक न उलगडलेल्या रहस्यांची होणार उकल अँकर:-- स्थलांतरित पक्ष्यांवरील वैज्ञानिक संशोधनाला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) नुकतेच १२ स्थलांतरित पक्ष्यांना टॅगिंग केले आहे. हा उपक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) सहकार्याने हाती घेण्यात आलाय. भारत दोन प्रमुख जागतिक स्थलांतर मार्गांवर वसलेला आहे. मध्य आशियाई फ्लायवे (CAF) आणि पूर्व आशियाई-ऑस्ट्रेलियन फ्लायवे (EAAF) अशी त्यांची नावे आहेत. मध्य आशियाई फ्लायवे मार्गे हिवाळ्यात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने प्रजनन न करणारे स्थलांतरित पक्षी येतात. यामध्ये पॅसेरीन, किनारी पक्षी, बदके, शिकारी पक्षी आणि क्रौंच यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे. TATR ची बफर क्षेत्रे, त्यांच्या विविध अधिवासांमुळे, विशेषतः समृद्ध पक्षीवैविध्याला आधार देतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ब्लॅक-टेल्ड गॉडविट, नॉर्दर्न पिंटेल आणि नॉर्दर्न शोव्हलर यांसारख्या निवडक स्थलांतरित पाणपक्ष्यांवर जीएसएम टॅगिंग केले जात आहे. पहिल्या टप्प्यात, एकूण १२ पक्ष्यांना यशस्वीपणे टॅग करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परत सोडण्यात आले. या अभ्यासातून निर्माण होणारा डेटा या प्रजातींचे स्थलांतर मार्ग, थांबा स्थळे, अधिवासाचा वापर आणि हालचालींच्या परिसंस्थेबद्दल मौल्यवान माहिती देणार आहे. ही माहिती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर संवर्धन धोरणे मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

गोसेखुर्द प्रभावित 34 गाँवों का भव्य मोर्चा: 13 अप्रैल जिलाधिकारी कार्यालय के समक्ष प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्त संघर्ष समितीचा जिल्ह्यात भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर आणि पैदल यात्रा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार... 34 गावातील कुटुंबांना शासनाकडुन सामुग्रह अनुदान देण्यात यावे; 1994 ते 2013 पर्यंत प्रकल्पग्रस्त घरांचा व जमिनीचा मोबदला देण्यात आला असून तो मोबदला खूप कमी रक्कमेच्या स्वरुपात दिला असून अमरावती जिल्ह्यातील बेमठा प्रकल्पाच्या धरतीवर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे पूर्णताः बाधित 34 गावांमधून नेरला व खापरी रेहपाडे हे गाव संपादित असून अजूनयर्पत नवीन गावठान तयार करण्यात आलेला नाही. अनेकदा बैठका होवूनही त्यागावाचा पुनर्वसनाचा विषय प्रलंबित आहे.तो ताक्ताळ पूर्ण करण्यात यावा. व त्या गावांना न्याय देण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार निर्णयानुशार 50% धरती वर विशेष भरती राबविण्यात यावी शासकीय सेवेत तसेच 5% आरक्षण वरुण 15% आरक्षण देण्यात यावे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या 34 पुनर्वसन गावात 18 नागरिक सुविधा अपुऱ्या आहेत त्या ताक्ताळ पूर्ण करण्यात याव्या उदा. नाली, रस्ते, विद्युत खांबे, स्मशान भूमी व इतर अशा 20 मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त न्याय व हक्कासाठी भव्य बैलगाडी ट्रॅक्टर व पैदल यात्रा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 एप्रिल ला धडकणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top