icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राज ठाकरे के जन्मदिन पर भांडुप में पेट्रोल 5 रुपये में वितरित, काटकर मनाया

Mumbai, Maharashtra:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस भांडुप मध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला भांडुप मधील पेट्रोल पंपावर पाच रुपये सवलतीच्या दरात पेट्रोलचे वितरण वाहनचालकांना करत मनसैनिकांनी हा वाढदिवस साजरा केला यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक हे त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून भांडुपच्या या पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने पाच रुपये सवलतीच्या दरात पेट्रोल देऊन मनसैनिकांनी केक कापत आपला निषेध व्यक्त केला आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.
0
0
Report

पिंपरी चिंचवड़ के रामकृष्ण मोरे नाट्यगृह की दुर्दशा पर कलाकार नाराज़

Pimpri-Chinchwad, Maharashtra:रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, कलाकारांनी व्यक्त केली नाराजी Pimpri natyagruh kailas puri Pune 14-6-26 feed by 2c Anchor - महाराष्ट्रात नाट्यगृहांची दुरावस्था या समस्येच्या सामना दीर्घ काळापासून रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना करावा लागतोय... अनेकदा कलाकारांनी याविषयी उघड भाष्य केले... पण सांस्कृतिक विभागाला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अद्यापही जाग आलेली नाही... अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकाच्या कलाकारांनी पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय अशा रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या दुर्दशेला वाचा फोडलीये... गेले कित्येक दिवसांपासून या नाट्यगृहात असुविधा मिळत असल्याने त्यांनी थेट प्रेक्षकांसमोर नाराजी व्यक्त करत असूविधांना वाचा फोडण्याची विनंती केली...
0
0
Report

बीड़ में MPPSC परीक्षा: 5 हजार से अधिक उम्मीदवार, जिलाधिकारी ने केंद्रों की निगरानी शुरू की

Beed, Maharashtra:बीड : एमपीएससी ची परीक्षेसाठी 5 हजारांहून अधिक उमेदवार; जिल्हाधिकाऱ्यांकडून केंद्रांची तपासणी आज राज्यभरासह बीड जिल्ह्यातही कडक बंदोबस्तात पार पडत आहे. बीडमधील 21 उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होते असून तब्बल 5 हजार 881 उमेदवार नशीब आजमावत आहेत. परीक्षेचे गांभीर्य आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेट देत पाहणी सुरू केली आहे. उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासन सतर्क झाले असून सर्व केंद्रांवर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में धारदार हथियार से युवक की हत्या, चार थाने की पुलिस तलाश में

Jalna, Maharashtra:जालना :धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील घटनेने परिसरात खळबळ. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना आज सकाळच्या sुमारास शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करत शेख रफिक याला गंभीर जखमी केले होते. त्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या हत्येच्या घटनेने जालना शहर हादरले असून आरोपीच्या शोधार्थ चार पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
0
0
Report

इस साल स्कूल सामग्री की कीमतें 20-25% बढ़ीं, अभिभावकों पर बढ़ा भारी बोझ

Yeola, Maharashtra:नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीचं विद्यार्थ्यांच्या आवश्यक असलेल्या शालेय साहित्याच्या किमतीत यंदा 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वह्या, पुस्तके, पेन , पेन्सिल, रंगसाहित्य तसेच इतर स्टेशनरी वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. मात्र यंदा बाजारात वह्या आणि पुस्तकांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी जिले में पिछले साल 6000 से अधिक अदखलपात्र अपराध दर्ज

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ६ हजारांहून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद.. अँकर रस्त्यावरून जाताना किरकोळ धक्का लागला, दुचाकी घासली किंवा शेजाऱ्याशी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली,तरी थेट पोलिस ठाणे गाठण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे.परिणामी,रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ६ हजारांहून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.बदलती जीवनशैली आणि कमी होत असलेली सहनशीलता यामुळे समाजात किरकोळ कारणांवरून वाद होण्याचं प्रमाण कमालीलं वाढलं आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी असल्याने दखलपात्र गुन्हे कमी नोंदविलेले दिसतात..
0
0
Report

प्रकाश सोळंके का आरोप: जिले के कुछ नेताओं ने पिछले चुनाव में मेरे खिलाफ षड़यंत्र रचा

Beed, Maharashtra:बीड - आपल्याच जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात मागच्या निवडणुकीत षडयंत्र रचलं होतं- आमदार प्रकाश सोळंके ANC- मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच जिल्ह्यातील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं. धनगर आणि मराठा समाजातील लोकांनी पुढे केलं गेलं. आणि काहींना निवडणूकीत उभं केलं गेलं असं वक्तव्य आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे आ.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला. ते माजलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
0
0
Report
Advertisement

ठाकरे गट के सांसद भाऊसाहेब वाकचौरे आज मुंबई में बैठक के संकेत

Shirdi, Maharashtra:ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल... भाऊसाहेब वाकचौरे यांचा काल सकाळपासून बंद... आज मुंबईत उद्धव ठाकरे घेणार पक्षाच्या खासदारांची बैठक... सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश... दुपारी साडेबारा वाजता बैठकीचे आयोजन... ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे ठाकरे गटाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष... शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मात्र सकाळपासून नॉट रिचेबल... पक्ष प्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीसाठी वाकचौरे उपस्थित राहणार की नाही..? तीन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत खा. वाकचौरे म्हणाले होते मौनम सर्वार्थ साधनम... याकडे लक्ष...
0
0
Report

कांदा खरीद दर 1650 क्विंटल, फिर भी नाशिक के किसान निराश

Yeola, Maharashtra:केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीचा दर वाढवून 1,650 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयानुसारही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाऐवजी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.सरकारी खरेदी प्रक्रियेत मर्यादित प्रमाणात खरेदी केली जाते, नोंदणी आणि जाचक अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे ही खरेदी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारसा फायदा करून देत नसून ती फसवी योजना असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक कांदा उत्पादकांनी दिली.
0
0
Report
Advertisement

धारावी पर कब्ज़े को लेकर महाराष्ट्र में सियासी घमासान, मराठी समुदाय घिरा

Mumbai, Maharashtra:धारावी के बारे में कहा गया कि बाबुराव माने माझ्या बाजूला खड़े हैं, माजी आमदार हैं, अस्वस्थ हैं. धारावी वाचवण्याचा हमारा प्रयास है. यह 30 से 35 वर्ष पुरानी व्यायाम शाळा है. कोई नोटिस नहीं है, उसे रातोरात गिरा दिया गया. अब उसकी शाळा तोड़कर मैदान पर कब्ज़ा करने की कोशिश है. मांग रहती है कि महाडाने लिजवार दी गयी जगह पर कब्ज़ा लिया जाए. मुख्यमंत्री क्या है, मराठी लोगों के दिल में तेज धार चुभ रहा है. धारावी ताब्यात लेने के लिए पाकिस्तान से गुंडे लाए गए क्या? मुझे जानकारी है, उध्दव ठाकरे को बताऊँगा. मोदी फ्रांस गए हैं वहां आदानी पहुंचेंगे टेंडर लेने के लिए. कल अगर रक्त का एक बूँद भी होगा तो प्रश्न पूछिए. कल दो बजे हम विमान-पोर्ट जाएँगे, वहां मेळावा है, वहां स्मग्लिंग शुरू है. मराठी आदमी का संघर्ष शुरू होगा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ में 106 मरे थे, 1006 मरेंगे. भाजपा में अगर मराठी माता-पिता होंगे तो उन्हें बुलायें. ऑपरेशन टायगर: हम यह ऑपरेशन लांडगा करेंगे. सभी लांडगे वहीं गए हैं. उसकी लायक़ी है क्या? पळकुटे और ठेकेदारों के दलाल हैं. शिवसेना चे सालगिरह पहली बैठक है 19 जून को. अमित शाह सत्ता में आने पर उनके चड्डी के नीचे आएंगे. वे पुलिस और पैसे की ताकत से हमसे लड़ना चाहते हैं. हिम्मत है गौतम अडाणी के सामने खड़े रहने की, हमारी हिम्मत है. यह सांसदों की बैठक है. पहली बार क्या होता है? आज कुछ सांसदों के घर कार्यक्रम है वे ऑनलाइन उपस्थित रहेंगे. ऑन पांढरी पट्टी: मराठी आदमी का वर्चस्व रहेगा, मराठी रहने को हम लड़ते रहेंगे. ऑन राज ठाकरे वाढदिवस: राज ठाकरे मेरे पुराने मित्र हैं. कुछ समय राजनीती में अलग होता था, पर फिर एक साथ आए. राज ठाकरे और उद्धव ठाकरे ने मिलकर देश का नेतृत्व करना है.
0
0
Report

समृद्धि महामार्ग पर प्रतिबंधित अफ्रीकी मांगूर मछली तस्करी का मामला सामने

Washim, Maharashtra:वाशीम: अफ्रिकन मांगूर माशांची तस्करी समृद्धी महामार्गावर उघडकीस आली. वाशिम जिल्ह्यातील पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर माशांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी झाल्याने हा प्रकार समोर आला. संभाजीनगरहून नागपूरकडे जाणारा ट्रक महामार्गावरील चॅनल क्रमांक 190 जवळ अपघातग्रस्त झाला. ट्रकमधील तीन टन माशांचा खच रस्त्यावर पडला होता. तपासणीदरम्यान हे मासे प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर जातीचे असल्याचे आढळून आले. घटनेनंतर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने मृत माशांची विल्हेवाट लावली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाचा वापर प्रतिबंधित माशांच्या तस्करीसाठी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top