445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Shirur DP theft hits farmers as cables stolen; approx. 3 lakh loss
Shirur, Maharashtra:ऐन दुष्काळाच्या सावटात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. घोडनदीवरील विद्युत रोहित्र म्हणजेच डीपी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही, तर या भागातील सुमारे २० हून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबलही चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या चोरीत शेतकऱ्यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुष्काळामुळे आधीच शेतकरी संकटात असताना, आता या चोरीमुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, या भागात चोरण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, शेतकऱ्यांनी पोलिसांकडे वारंवार रात्रगस्त घालण्याची मागणी केली होती. मात्र, टाकळी हाजी पोलिसांना या घटनांचे गांभीर्य नसल्याचा संतप्त आरोप आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जातोय. पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार? असा सवाल आता उपस्थित होतोय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
यवतमाळ में उद्धव ठाकरे की रैली: शिवसेना प्रमुख आज संबोधित करेंगे
Yavatmal, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज यवतमाळ येथे दोघ असून, ते सभेला संबंधित करणार आहेत0
0
Report
पिंपरी-चिंचवड पुलिस ने अवैध हथियार के साथ दो शस्त्रधारी आरोपी गिरफ्तार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने बेकायदा शस्त्रांविरोधातील कारवाईत यश मिळवत दोन सराईत आरोपींना अटक केलीय. या कारवाईत आरोपींकडून तीन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. आरोपी बावधन परिसरात शस्त्रांसह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आर्यन जाधव आणि ओमकार मोरे या दोघांना ताब्यात घेतले. ओमकार मोरे याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्टसह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
धाराशिव में मल्हार पाटील ने ओमराजे निंबाळकर को चुनौती दी; MP2029 बैनर विवाद
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुञ मल्हार पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचले मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे धाराशिव शहरात लावले बॅनर खासदार ओमराजे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून MP2029 अशी केली बॅनरबाजी मल्हार पाटलांकडून ओमराजे निंबाळकर यांना खासदारीला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झाल्याची शहरभर च चर्चा मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढण्याची तयारी?0
0
Report
कराड बस स्ट Stand पर धमकी देकर मंगलसूत्र झपटे; दंपति गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड बसस्थानक परिसरात महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पती-पत्नीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. या बंटी बबली आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, तपासादरम्यान या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. आरोपी श्रावण कांबळे आणि त्याची पत्नी पूनम कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
भंडारा के मातोश्री पांदण रस्तों में गुणवत्ताहीन काम, आरोपित ठेकेदार और भ्रष्टाचार
Bhandara, Maharashtra:अंदाजपत्रकाला डावलून मातोश्री पांदण रस्त्यांची कामे?... निकृष्ट दर्जाच्या कामांवर ग्रामस्थांचा आक्षेप.... पांदण रस्ते ठरत आहेत कंत्राटदाराचे कुरण.... Anchor : भंडारा जिल्ह्यात मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम, मनरेगाच्या नियमांचे उल्लंघन आणि यंत्रसामग्रीचा वापर केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. VO : ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मातोश्री पांडण रस्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांवर मुरूम व खडी टाकण्याची कामे केली जात आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप होत आहे. मजुरांना रोजगार देण्याऐवजी यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच बोगस मजूर दाखवून केवळ फोटो काढले जातात आणि प्रत्यक्ष काम यंत्रांद्वारे केले जाते, असा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक गरजू मजूर रोजगारापासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. तुमसर तालुक्यातील रूपेरा आणि मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील नागरिकांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी‑ंकडे लेखी तक्रार सादर केली आहे. या योजनेतील कामे काही कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांसाठी 'कुरण' ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. BYTE : मनोहर बिसने, तक्रारदार रूपेरा BYTE :- रत्न पुंडे, ग्रामपंचायत सदस्य नवेगाव VO : तांत्रिक मंजुरीनुसार पांदण रस्त्याच्या कामात प्रथम ६ इंच जाडीचा मुरूम टाकून त्याची योग्य दबाई करणे आवश्यक असते. त्यानंतर ८० एमएम व ४० एमएम खडीचे थर टाकून दबाई आणि शेवटी घोटाई करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी या निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असून कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. BYTE : प्रशांत पडोळे, खासदार Vo : ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
एमआईडीसी के लिए अरापुर के पास जमीन माप पूरी, किसान मुआवजे पर चर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रस्तावित एमआयडीसीसाठी आरापूर जवळपास दीड महिन्यानंतर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता दरनिश्चितीच्या वाटाघाटी होणार असून या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सुलतानाबाद, आरापूर आणि गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांची ही बैठक सकाळी ११ वाजता होईल. नमोजणीदरम्यान काही शेतकऱ्यांनी फळझाडे आणि बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला होता. 'आधी जमिनीचे दर निश्चित करा, मगच मोजणी करा,' अशी मागणी त्यांनी केली होती. आता मोजणी पूर्ण झाली असली तरी मोबदल्याची योग्य रक्कम मिळावी यावर शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही त्यांची जमीन एमआयडीसीतून वगळणार का, हा प्रश्नही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर समेत जिले में मानसून सक्रिय, बारिश और आंधी की संभावना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाचा जोर आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जून रोजी शहरात दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. आगामी २८ जून ते २ जुलै या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ राहणार0
0
Report
शिवसेना ने मंत्री संजय राठोड को राष्ट्रीय नेता नियुक्त कर विमुक्त-भटक्या समाज के सशक्तिकरण का लक्ष्य दिखाया
Yavatmal, Maharashtra:विमुक्त व भटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेने मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केलीयानंतर मसानजोगी, पारधी, बंजारा, लोहार, गवळी, गोंधळी, जोशी, बहुरूपी आदी भटक्या समाजाकडून राठोड यांचे पारंपारिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भटक्या विमुक्त जमातीतील ही मंडळी आपापल्या पारंपारिक वेशभूषेत आले होते. यावेळी संजय राठोड यांनी किंगरी घंटा खजेरी आदी वाद्य वाजवून यापुढील काळात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा व्यापक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरण हेच पुढील ध्येय असल्याचे देखील संजय राठोड म्हणाले.0
0
Report
Advertisement
मराठवाड़ा में जून तक मानसून की बारिश उम्मीद के मुताबिक नहीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित वेगाने पाऊस बरसत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 60.9 टक्के पाऊस झाला आहे. विभागाची जून महिन्याची सरासरी 116.1 मिमी असताना प्रत्यक्षात केवळ 70.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 96 मिमी पाऊस झाला होता. जिल्हानिहाय पाहता धाराशिवमध्ये सर्वाधिक 94.8 मिमी (86.2%) पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 80.7 मिमी (72.5%) पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर लातूरमध्ये सर्वात कमी 59.8 मिमी (51%), परभणीत 61.9 मिमी (49.2%), नांदेडमध्ये 71 मिमी (52.7%), हिंगोलीत 76.2 मिमी (52%), छत्रपती संभाजीनगरमध्ये 63.1 मिमी (58.2%) आणि जालना जिल्ह्यात 66.9 मिमी (58.2%) पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्या, उगवण आणि पुढील शेतीकामांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.0
0
Report
कळमजापूर के खेत में बिजली गिरने से महिला की मृत्यु, छह महिलाएं अस्पताल में भर्ती
Amravati, Maharashtra:कळमजापूर येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू; सहा महिला जखमी काल झालेल्या वादळी पावसात कळमजापूर येथील शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत सुनंदा नरेश सहारे (वय ३७, रा. कळमजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी जखमी महिलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.0
0
Report
यवतमाड़ दौरे पर राठोड की तीखी टिप्पणियाँ, सरकार पर दबाव बनाए रखने का दावा
Yavatmal, Maharashtra:जो गरजते है वो बरसते नही अशा शब्दात मंत्री संजय rाठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवा बाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिपणी केली तरी त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ. आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता, त्याचे 60 आमदार झालेो अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक जण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील... त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू असे संजय राठोड यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग: बरसात में न्हावानकोंड झरना पहली बार प्रवाहित, पर्यटक आकर्षित
Oras Bk., Maharashtra:वर्षा पर्यटन के बारे में कहा जाए तो कोकण तथा तळकोकण के पर्यटक बारिश के मौसम में खास आकर्षण के पात्र होते हैं। सिंधुदुर्ग जिले में कई झरने प्रवाही हो जाते हैं और पर्यटक इन्हें देखने के लिए आते हैं। देवगड तालुक के न्हावानकोंड झरना प्रवाहित हुआ है, जो जिले का यह पहला झरना है जो पूर्ण रूप से प्रवाहित हुआ है। हमारे प्रतिनिधि उमेश परब ने इस स्थिति का अवलोकन किया।0
0
Report
नागपुर के महाल शिवतीर्थ में शिवराज्याभिषेक दिवस धूमधाम से, प्रतिनिधियों ने लिया आढ़ावा
Nagpur, Maharashtra:नागपुरात महाल शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत आहे तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
नवी मुंबई में 56 करोड़ के ड्रग्स नष्ट, अभियान को मिली तेज़ रफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:नशामुक्त नवी मुंबई अभियानाला अधिक बळ देत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून तब्बल 56 कोटी 69 लाख 55 हजार 192 रुपये किमतीचे जफ्त केलेला अंमली पदार्थाचा साठा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट केला. समाजातील अमली पदार्थांचे वाढते जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तळोजा येथील शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रकल्पात हा अमली पदार्थाचा साठा शास्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत आतापर्यंत 166 गुह्यांची नोंद करण्यात आली असून, त्यामधील जवळपास 57 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करुन ते नष्ट करण्यात आले आहे. त्याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून 26 गुह्यांतील जप्त अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.0
0
Report
Advertisement
