icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में सरकारी कर्मचारियों की हड़ताल से सेवाएं ठप, आंदोलन जारी

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या संपाचा आज चौथा दिवस असून,वाशीम जिल्ह्यातील महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम व तहसीল कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.जुनी पेन्शन योजना व इतर १७ मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.संपकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. आता शासकीय रुग्णालयातील परिचारिकाही संपात सहभागी झाल्याने आरोग्यसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले。
0
0
Report
Advertisement

उरण में 58 लाख जमीन: गिरफ्तारी के दिन भी निबंधन, SIT जांच की मांग

Navi Mumbai, Maharashtra:भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन, अटकेच्या दिवशीच नोंदणी करार झाल्याने अधिकारी संशयाच्या फेऱ्यात. भोंदूबाबा अशोक खरातने उरण येथील चाणजे गावात देखील जमीन खरेदी केल्याचे उघड झालेले आहे. ज्या दिवशी अशोक खरात याला अटक केली गेली त्याच दिवशी त्याची फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहाराने केवळ महसूलच नव्हे, तर निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. 12 मार्च रोजी अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कल्पना खरात यांच्या नावावर घेण्यात आली असून हा व्यवहार सुमारे 58 लाख 50 हजार रुपयांचा झाला असल्याचे समोर आलेय. अटकेच्या दिवशीच नोंदीची प्रक्रिया झाली आणि यानंतरही व्यवहाराचा वेग थांबला नसून 13 एप्रिल 2026 रोजी फेरफार क्रमांक 8351 मंजूर करण्यात आला. म्हणजे, संपूर्ण व्यवहाराची महसूल नोंद प्रक्रिया अवघ्या एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आलेय. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, दुय्यम निबंधक व महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

बारामती में अजित पवार विमान हादसे की जांच फास्ट ट्रैक से कराने की मांग

Rui, Maharashtra:बारामती अमोल मेटकरे बाइट पॉईंटर ... अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जलद गतीने व्हावा अमोल मेटकरे.. ईशानेश्वर मंदिर आणि बारामतीतील अघोरी पूजा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा... Anchor : बारामतीत सुनेत्रा वहिनींचा प्रचारासाठी फिरत असताना अनेक गावांमध्ये तेवढे केले त्यावेळी गावकऱ्यांनी अजित पवारांचे विमान अपघाताचा तपास लागावा अशी मागणी केली... मुख्यमंत्र्यांनी तसे बोलून दाखवले सुनेत्रा पवार देखील बोलल्या. हा विषय फास्टट्रॅक वर आला पाहिजे.. काही अंधश्रद्धेचे प्रकार देखील काही लोकांनी माझ्यासमोर निदर्शनात आणून दिले .. {
0
0
Report

ठाणे में 73 करोड़ रुपये के घोटाले की चर्चा; CM से कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील मोठा घोळ उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. झी 24 तासच्या चौकशीत कागदोपत्री राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये तब्बल 73 कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कागदोपत्री योजना राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात निधीचा घोळ होणे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच या गंभीर प्रकरणाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जबाबदारांना तंबी द्यावी, अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

पलूस तालुक़े में पानी संकट, दक्षिण आरफळ कैनॉल एक माह से सूना

Sangli, Maharashtra:सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावांत आता पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.आंधळी येथील दक्षिण आरफळ कॅनॉल गेल्या एक महिन्यापासून पाणी नसल्याने कोरडा ठणठणीत पडला आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून आता संताप व्यक्त होऊ लागलाय.कॅनॉलच्या पाण्या अभावी आंधळी,मोराळे,राजापूर, बांबवडे, पलूस आणि सांडगेवाडी या पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाण्या अभावी पिके वाळू लागली आहेत,तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण करण्याची वेळ आली असून तातडीने दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी सोडावे,अन्यथा रास्ता रोको प्रसंगी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकू,असा इशारा आंधळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
0
0
Report

इंदापुर में मनोज जरांगे पाटील का दौरा: स्मारक निरीक्षण और पुष्पवर्षी

Rui, Maharashtra:मनोज जरांगे पाटील इंदापुरात दाखल झाले. इंदापूरच्या बाह्यवळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची पाहणी जरांगे पाटलांकडून झाली. इंदापुर करांकडून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी झाली. Anchor _मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर शहरात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची पाहणी केली आहे. इंदापुरात दाखल होताच इंदापूरकरांकडून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे दिव्य स्वागत करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत इIndapur शहरातील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात संवाद मेळावा पार पडणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top