445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के मालेगांव में दो सरायित बदमाश गिरफ्तार, देशी पिस्टल और कारतूस सहित
Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - नाशिकच्या मालेगावात दोन सराईत गुन्हेगारांना देशी कट्टा, आणि जिवंत काडतूसंसह अटक.. - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आयशानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचत दोन संशयीतांना ताब्यात घेतले. १) वसीम शेख इस्माईल, वय २८, रा. पाचपंजतन चौक, हलीमा गार्डनजवळ, मालेगाव २) मुशीर अली नुर अली सैय्यद, वय २९, रा. जाफरनगर, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक ताब्यात घेतलेले वरील दोन संशयीतांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जीवंत काडतूसे मिळून आले. सदर इसम हे विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्नीशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्यांचेविरूध्द आयशानगर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत.0
0
Report
वरूड तालुक्यात शेतात उष्माघात से किसान की मौत, इलाके में शोक
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या वरूड तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; परिसरात हळहळ, खबरदारी घेण्याचे आवाहन अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील सुरळी गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतामध्ये काम करत असताना शेतकरी प्रल्हाद तुळशीराम ब्राह्मणे यांचा उष्णघातामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हादराव हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी घरच्यांनी त्यांना फोन केला मात्र बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. अखेर त्यांनी शेतात धाव घेतली असता प्रल्हादराव मृत अवस्थेत आढळून आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेनंतर त्यांना वरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून आज सकाळी शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. परीक्षित रामपूरे यांनी दिली आहे. प्रल्हादराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे राहुल आणि अमोल ब्राह्मणे तसेच एक मुलगी असा परिवार आहे.0
0
Report
उल्हासनगर गोलीबारी मामले में नया मोड़, होटल व्यवसायी दीपक ठाकूर के कार्यालय पर हमला
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कैलासनगर गोळीबार प्रकरणाला नवे वळण आल्याची माहिती. गोळीबारानंतर दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचा दावा दुसऱ्या CCTV व्हिडिओत दिसला. दीपक ठाकूर यांनी ९ ते १० जणांविरोधात जीवघेणा हल्ला, गोळीबार आणि तोडफोडीचा आरोप केला आहे; त्यांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसऱ्या बाजूला भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी CBI चौकशी किंवा नार्को टेस्टची मागणी केली आहे. तपास पोलिस करतात. या आरोपांनंतर भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. घटनेच्या वेळी मी कार्यालयात होतो, फायरिंगची माहिती मिळाली; परंतु काय झालं ते माहीत नव्हतं. माझी CBI चौकशी किंवा नार्को टेस्ट करा, दोषी आढळल्यास शिक्षा स्वीकारेल असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजय राव, अजीत शेख, अदालत बद्दीन खान इत्यादींचा समावेश असलेल्या तपासात ४-५ अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. सागर पाटीलला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.0
0
Report
Advertisement
साखर निर्यात बंदी से बाजार गिरा, राजू शेट्टी ने सरकार पर लगाया आरोप
Barav, Maharashtra:- साखर निर्यात बंदीमुळे बाजार कोसळल्याचा आरोप - सरकारने कोणतीही ठोस गरज नसताना साखर निर्यातीवर अचानक बंदी घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. - अवघ्या १५ दिवसांपूर्वीच ५ लाख टन अतिरिक्त निर्यातीचा कोटा मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे अचानक बंदी घालण्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थिर असताना आणि जुना निर्यात कोटा पूर्ण न झालेला असतानाही घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात घबराट निर्माण झाली. - या निर्णयानंतर साखरेचे दर झपाट्याने घसरल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघांनाही आर्थिक फटका बसल्याचा त्यांनी म्हटले. - FRP थकबाकी आणि MSP वाढ न झाल्याने शेतकरी अडचणीत - गेल्या चार वर्षांत साखरेची MSP वाढवण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. - साखर उद्योग आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची FRP थकबाकी तब्बल ३ हजार कोटी रुपयांवर गेल्याचा दावा त्यांनी केला. - ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून सरकारचे चुकीचे धोरण याला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. - डिझेल आणि खत तुटवड्यावर केंद्र सरकारवर टीका - देशातील डिझेल आणि रासायनिक खतांच्या तुटवड्याला केंद्र सरकारचे आंतरराष्ट्रीय धोरण जबाबदार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. - इराणसारख्या मित्रदेशाला अमेरिकेच्या दबावाखाली दूर केल्याने भारताला स्वस्त क्रूड ऑईलचा पुरवठा कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला. - आता देशात इंधन टंचाई निर्माण झाली असताना अमेरिका किंवा इतर देश भारताच्या मदतीला आलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. - मान्सून काही दिवसांवर आला असताना शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. - सातबारासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप - डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितला जात असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले. - तलाठी जनगणनेच्या कामात व्यस्त असल्याने सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. - काही ठिकाणी सातबारासाठी पैशांची मागणी होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. - ‘डिजिटल इंडिया’, ‘ई-पीक पाहणी’ आणि सॅटेलाईट सर्व्हे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना सातबारासाठी का त्रास दिला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. - सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून थेट पेट्रोल पंपांना माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. - सदाभाऊ खोत यांच्यासोबतच्या भेटीबाबत स्पष्टीकरण - इंदापूर येथे सदाभाऊ खोत यांच्यासोबत झालेल्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले. - २०१२ मधील ऊस आंदोलन प्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन तारखेनिमित्त सर्वजण एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. - कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव चहा घेताना अनौपचारिक भेट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. - बाबुराव बोत्रे प्रकरणावरून तीव्र संताप - शिरूर मधील हार्डवेअर व्यापाऱ्याने साखर कारखाने आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. - अवघ्या काही वर्षांपूर्वी १७ ते १८ साखर कारखाने ताब्यात घेण्यासाठी कोणाचा राजकीय पाठिंबा होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. - पारंपरिक कारखानदार आर्थिक अडचणीत असताना एका व्यापाऱ्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात कारखाने कसे ताब्यात घेतले, याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. - शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.0
0
Report
मानसूनपूर्व भारी बारिश ने कण्हेरी क्षेत्र में लाखों का नुकसान किया
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मानसूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत कण्हेरी परिसराला अक्षरशः झोडपून काढलं आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहू लागले. ओढ्यांना अक्षरशा नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. कण्हेरी परिसरातील वीटभट्ट्यांवरील कच्च्या विटा भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे...असवली, कण्हेरी, लोहोम, कर्नवडी, घाडगेवाडी, अतिट, कवठे आणि जवळे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचेही नुकसान झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि वीटभट्टी चालक अडचणीत आले आहेत0
0
Report
येवला में वादळ से घर गिरा; दो बुजुर्ग महिलाएं व एक बच्चा घायल
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यात सलग दोन दिवसांपासून अवकाळी व वादळी पावसाने मोठे नुकसान केले काल सायंकाळच्या sुमारास येवला तालुक्यातील देवळाणे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंब यांच्या घराचे छत कोसळून दोन वृद्ध महिलां व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून जखमींवर अंदरसुल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीने व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च व शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले0
0
Report
Advertisement
अकोला के बलापुर में टीसी के बदले शारीरिक संबंध की मांग, महिला सुरक्षा पर सवाल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेकडे तेथील कर्मचाऱ्याने शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माहितीनुसार, बाळापूर येथील एका शाळेत पीडित महिला आपल्या मुलीचा टीसी काढण्यासाठी गेली होती. यावेळी शाळेतील मनीष शर्मा नामक कर्मचाऱ्याने महिलेशी अयोग्य वर्तन करत टीसी देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिला हादरली असून तिने तात्काळ बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
येवला में बरसात से शहर जाम पानी, खड्डे से मोटरसाइकिल दुर्घटना में युवक घायल
Yeola, Maharashtra:येवला शहरांमध्ये काल रात्री सुमारास आलेल्या पावसाने सकल भागात पाणी साचले होते दरम्यान फत्ते बुरुज नाका या परिसरात भर रस्त्यात असलेल्या एका खड्ड्यांमध्ये सायगाव येथील दोन तरुण मोटरसायकल सह कोसळून एक तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान या ठिकाणी अनेक अपघात होत असून अद्याप प्रशासनाने हा खड्डा बुजवला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे0
0
Report
यवला में दत्तप्रभू प्राणप्रतिष्ठा समारोह के समापन पर भक्तों को आमरस और मंड्या महाप्रसाद
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यात गेल्या सात दिवसांपासून साबरवाडी येथे भगवान श्री दत्तप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आठ दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाची सांगता प्रसंगी भाविकांना आमरस व मांड्याचा महाप्रसाद म्हणून देण्यात आला येवला तालुक्यातील शेकडो भाविकांनी या ठिकाणी भेट देऊन भगवान दत्तप्रभूंची दर्शन घेतले0
0
Report
Advertisement
सातारा के शाहू स्टेडियम में शिवेंद्रसिंहराजे भोसले का क्रिकेट चषक उद्घाटन, फटके की धूम
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषकाला सुरुवात झाली आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे उद्घाटन झाले असून यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बॅट हातात घेऊन चांगलेच फटके षटकार मारल्याचं पहायला मिळालं. जिल्ह्याच्या राजकारणात वेगळ्या पद्धतीने फटकेबाजी करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात देखील जोरदार फटकेबाजी केल्याने चाहत्यांनी एकच जल्लोष केला.0
0
Report
पुणे के अम्बेगांव में आंधी-बारिश से घरों के छप्पर उड़ें, पशु हताहत
Ambegaon, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याला वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाने झोडपल्याने वादळी वाऱ्याने अनेक घरांचे छप्पर उडालाय. आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे वादळाने गाई बैलांचा गोठाच अंगावरती कोसळल्याने घोडी बैल गाय या कंबरेट मोडल्याने जीवाच्या आकांकताने टाहो फोडत असून शेतकय्राचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा चे डोळे पानावलेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी.0
0
Report
अकोला के माना जिला परिषद स्कूल में तीन शिक्षक पद खाली, शिक्षा प्रभावित
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील माना येथील जिल्हा परिषद विद्यालयात शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये विद्यालयात तब्बल 236 विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिक्षण संवर्गाची एकूण आठ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी तीन पदे अद्याप रिक्त असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. माना येथील ही शाळा ग्रामीण भागातील असून येथे प्रामुख्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. माध्यमिक विभागात सर्वाधिक पटसंख्या असलेली ही जिल्हा परिषद शाळा मानली जाते. मात्र शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन बाधित होत असून त्याचा थेट परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत तर पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांबद्दलचा विश्वास कायम ठेवण्यासाठी माना जिल्हा परिषद विद्यालयात शिक्षक संवर्गाची तीन पदे कायमस्वरूपी भरावीत, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
सीएम सहायता निधि से 109 मरीजों को लाभ, 75 लाख 90 हजार रुपये की मदद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुख्यमंत्री सहायता निधीचा 109 रुग्णांना लाभ. 75 लाख 90 हजारांची मदत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आधार ठरत आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातून या निधीसाठी 161 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अत्यंत गरजू अशा तब्बल 109 रुग्णांना थेट प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळवून देण्यात कक्षाला यश आले आहे. त्यांना एकूण 75 लाख 90 हजार रुपयांची भरीव मदत रुग्णांच्या उपचारासाठी वितरित करण्यात आली आहे。0
0
Report
दापोली में विद्युत पोल पर काम करते युवक की मौत, चौंकाने वाला हादसा
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. दापोलीत वीज पोलवर शॉक लागून कंत्राटी कामगाराचा मृत्यू.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील मुरुड जवळील गव्हे ब्राह्मणवाडी येथे वीज पोलवर काम करताना एका तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. संकेत हरिश्चंद्र पवार (वय ३४) असे मृत कंत्राटी कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सहकाऱ्यांसोबत वीज दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसेला..0
0
Report
कांदा दरों के बीच किसानों की मांग: 2000–2500 रुपये, नाफेड दरों में बदलाव
Nashik, Maharashtra:दिलीप बनकर, आमदार, राष्ट्रवादी On कांदा कांद्याचे प्रश्न उठने पर हमने पवार साहेब और अजित दादांना मिलकर मुख्यमंत्री और प्रधानमंत्री तक चर्चा की। नाशिक जिला कांदा उत्पादन के लिए जाना जाता है। कांद्ये के दाम नीचे आ चुके हैं। 1 नंबर कांदा को 2000–2500 रुपये दर मिलना चाहिए, यही हमारी मांग है。 ताकि कांदा उत्पादक का रोष कम हो। अब नैफेड से मिलने वाला दर घटा है। दिलासा देने के लिए नैफेड के दरों में बदलाव चाहिए, यह हमारी मुख्यमंत्री से मांग है। नैफेड ने कांदा खरेदी मार्केट से ही करनी चाहिए।0
0
Report
Advertisement
