Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 12:48:24
Washim, Maharashtra:वाशिम: इरान,इस्रायल और अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून वाशिम जिल्ह्यातील टरबूज उत्पादकांना फटका बसत आहे. निर्यात ठप्प झाल्याने टरबूजाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना माल अवघ्या 6 रुपये किलो दराने विकावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टरबूजाचे उत्पादन झाले; मात्र निर्यात बाजारपेठेवर परिणाम झाल्याने स्थानिक बाजारात आवक वाढून दरात घसरण झाली. काही ठिकाणी व्यापारी माल खरेदीसाठी पुढे येत नसल्याने टरबूज शेतातच पडून राहत आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाने मदत करावी,अशी मागणी होत है.
48
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 15, 2026 12:47:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत आता थेट सामना रंगणार आहे. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी गटाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक वसंत देशमुख यांनी तर सत्तारूढ गटाकडून भाजप आघाडीतील उद्धवसेनेच्या नगरसेविका मनस्वी गिन्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांकडे प्रत्येकी ८-८ असे संख्याबळ असल्याने निकाल ईश्वर चिठ्ठीची शक्यता बळावली आहे. महापालिका स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असून, सत्तारूढ गटात भाजपचे ६ आणि उद्धवसेनेचे २ सदस्य आहेत. दुसरीकडे विरोधी गटात काँग्रेसचे ७ तर मित्रपक्ष भाशेकापचा १ सदस्य आहे. असे समसमान संख्याबळ आहे. यापूर्वी उपमहापौर पदाची निवडणूकही ईश्वर चिठ्ठीतूनच झाली होती. त्यावेळी नशिबाने उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे यावेळीही राजकीय समीकरणांपेक्षा नशिबाचा फेरा निर्णायक ठरणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
99
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 12:16:53
149
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 12:15:44
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : कुणबी प्रमाणपत्राबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती, मंत्री राधाकृष्ण विखेंसह मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरून आता नवा वाद उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे या दोघांविरोधात छत्रपती संभाजीनगर क्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजात तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात 12 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली होती, मात्र हा आकडा फसवा असून प्रत्यक्ष वाटप अत्यंत कमी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी 4 कोटी 22 लाख मराठा समाज कुणबी आरक्षणात गेल्याचे अनधिकृत आणि खोटे वक्तव्य केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या विधानांमुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अनावश्यक संशय आणि जातीय तणाव वाढत असून, हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोप विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्याची शांतता धोक्यात येत असून मंत्री विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील याच्याकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय.
190
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 12:15:29
:पुणे.. वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी आरोपीने मारलेला कोयता विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाघोलीमधील रायसोनी कॉलेजसमोर ही भीषण घटना घडली. नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रासोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारت आरोपींनी अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले. हल्ला इतका भयानकर होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेला त्याचा मित्र सिद्धेश यालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
234
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 15, 2026 11:32:52
Bhandara, Maharashtra:पवनीत सिलेंडरवर चालणाऱ्या ओमनी वॅनला अचानक आग लगली; नागरिकांच्या प्रयत्नांनी अनर्थ टळला. भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील गांधी चौकात रविवारी दुपारी सिलेंडरवर चालणाऱ्या एका ओमनी वॅनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग वेगाने पसरत असताना नागरिकांनी तत्परता दाखवत पाणी व अन्य साधनांच्या मदतीने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अवैधरित्या गॅस सिलेंडरवर चालवली जाणारी वाहने किती धोकादायक ठरू शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
113
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 11:19:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दिपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झालेय दिपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून निवडून आले आहेत. दिपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुुंबातील व्यक्तिमत्व म्हणून दिपक वैद्य यांची ओळख आहे माजी आमदार राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 झेडपी गट आणि 16 पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मोठी चूरस पाहायला मिळाली होती. मात्र अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारत झेडपी अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे खेचून आणले आहे
166
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 11:16:24
Beed, Maharashtra:सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांच्या हस्ते आज परळीतील श्री साई मंदिराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय सिरसाठ बाईट पॉइंटर्स श्री साई मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर आज श्रद्धा सबुरीचा संदेशाचा प्रत्यय आला. ऑन बीड मधील महिला अत्याचार बीड मधल्या महिला अत्याचाराच्या घटना संताप जनक आणि चिंताजनक आहेत. अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्याला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवू नये. महिलेला बांधल्याचा प्रकार ऐकूनच अंगावर शहारे येतात. अशा लोकांना सोडता कामा नये त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडून येण्यासाठी ही सरकार काम करेल. ऑन पुण्यातील घटना पुण्यातील प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीकडून झालेला आहे. यावर पोलीस कारवाई करत आहे. अशा घटना आपल्यावर सुद्धा कलंक आहे. ऑन ॲट्रॉसिटी कायदा ॲट्रॉसिटी बद्दल तुमच्या काही लोकांचे काही गैरसमज झाले आहेत. मी उद्या विधानसभेत त्याच्यावर निवेदन करणार आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. मला कायद्यात बदल करायचे अधिकार नाहीत. चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. मी यावर समिती नाहीतर आयोग नियमाचे म्हणालो आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही आयोग स्थापन करणार आहोत. त्या आयोगामध्ये अध्यक्ष आयपीएस अधिकारी अशी ती कमिटी असणार आहे जे दलित बांधावावर अत्याचार होतात आणि जे प्रकरण पेंडिंग आहेत त्याबाबत काम करेल. आयोगाची निर्मिती समाजाच्या हितासाठी असेल. ऑन राज्यातील गुन्हेगारी पोलिसांना कुठलाही दोष देता येणार नाही पोलिसांनी जलद गतीने काम करायला सुरुवात केली आहे. कुठलाही गुन्हा झाला तर 24 तासाच्या आत सर्व घटनेचा तपास केला जात आहे. आरोपीला तात्काळ अटक सुद्धा केली जाते. ऑन नितेश राणे यांचे वक्तव्य कुंभमेळ्यात कोणी स्टॉल लावायचे हे तिथल्या प्रशासनाचा प्रश्न आहे. स्टॉल लावायला एखाद्याला बंदी घालणं योग्य होणार नाही. ऑन अबू आझमींच्या इफ्तार पार्टीला संजय राऊत यांची उपस्थिती संजय राऊत कुठेही जातील उद्या ओबीसी ने इफ्तार पार्टी दिली तरी जातील त्याचं काय. त्यांना पक्ष राहिला ना धर्म राहिला ना नीतिमत्ता राहिली. अशा पद्धतीचे त्यांनी कितीही चांगुलपणा केला तरी मुस्लिम मत त्यांना मिळणार नाहीत. बाईट - संजय सिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
215
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:43
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नासल्येची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा परिषदेसह काही खासगी शाळांमध्येही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात वाढत असलेल्या विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि शाळांमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे. जिल्ह्यात सुमारे हजारो सरकारी व खासगी शाळा असतानाही अनेक ठिकाणी कॅमेरे नसल्याने शाळांमधील घडामोडींवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. शासनाने जिल्हा नियोजनाच्या निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले असले, तरी काही ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला त्यामुळे शासनाच्या आदेशांचे पाय मल्ली केली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
165
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:29
109
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 15, 2026 10:39:24
153
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 15, 2026 10:35:21
128
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 15, 2026 10:34:25
Vasai-Virar, Maharashtra:वसईत घरगुती गॅसचा हॉटेल मध्ये वापर; लजिज हॉटेलवर पुरवठा विभागाची कारवाई वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरात असलेल्या लजिज हॉटेलवर वसई पुरવठा विभागाने कारवाई केली आहे. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमिरवर हॉटेलमध्ये घरगुتی गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पथकासह हॉटेलवर धाड टाकून तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात पेट्रोलियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. गॅस टंचाईच्या काळात कोणीही घरगुंत गॅस सिलेंडरचा गैरवापर करत असल्यास तत्काळ पुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
118
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 15, 2026 10:04:14
Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी गुन्हेगारी घटना टळली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, चाकू, शस्त्रसामग्रीसह महिंद्रा XUV 500 कार असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोला शहरातील वाशीम बायपासजवळील अंबिका नगर परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेल्या महिंद्रा XUV 500 कारवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक चाकू, लोखंडी सरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँडग्लोव्हज, मोबाईल फोन आणि बनावट नंबर प्लेट असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासात या आरोपींवर अपहरण, खंडणी, चोरी, घरफोडी आणि दंगा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
153
comment0
Report
Advertisement
Back to top