icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे के आंबेगाव में पोल्ट्री फार्म में 3600 मुर्गियों की मौत, किसान ने सहायता मांगी

Ambegaon, Maharashtra:अँकर: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल ३,६०० बॉयলर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष पोंडे असे या बाधित शेतकऱ्याचे नाव असून, ते गेल्या १५ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये एकूण ३,७०० कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सायंकाळी खाद्य टाकण्यासाठी गेले असता, त्यांना कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या. या दुर्दैवी घटनेत ३,७०० पैकी केवळ १०० कोंबड्या जिवंत राहिल्या असून, तब्बल ३,६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा अचानक मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कृषी अधिकारी... घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे पोंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे。
0
0
Report

वसई में राशन घोटाले के आरोप; 120 क्विंटल धान्य जब्त

Vasai-Virar, Maharashtra:वसईमध्ये पुरवठा विभागाने रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. वसई पश्चिमेतील झेंडा बाजार परिसरातील एका रेशन दुकानातून ग्राहकांना मिळणाऱ्या धान्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाचे अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत तब्बल १२० क्विंटलहून अधिक धान्यसाठा जप्त केला. या प्रकरणी इम्तियाज असीम शेख आणि त्याच्या साथीदाराविरोधात पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शासनाकडून लाभार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर करून त्याची काळाबाजारात विक्री केल्याचा आरोप संबंधितांवर आहे. दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित कार्डधारक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पुरवठा विभागाने दिला आहे.
0
0
Report

अंबरनाथ में आग: आशिर्वाद अस्पताल के सामने खड़ी पांच मोटरसाइकिलें जलकर खाक

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ पश्चिमेतील उलन चाळ परिसरात आशीर्वाद हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल पाच दुचाकी जळून भस्मसात झाल्या. पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास गॅरेजबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्रर रूप धारण केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अंबरनाथ अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत पाच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
0
0
Report
Advertisement

नालासोपारा नगरपालिका अस्पताल में तीन दिन से शव पड़ा; दुर्गंध से मरीज-परिजनों में हंगामा

Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा महापालिका रुग्णालयात तीन दिवस मृतदेह पडून; दुर्गंधीमुळे रुग्ण व नातेवाईक त्रस्त नालासोपारा पूर्व येथील तुळींज परिसरातील महापालिका रुग्णालयात एका नायजेरियन नागरिकाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून ठेवण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. मृतदेह दीर्घकाळ पडून राहिल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आणि संपूर्ण रुग्णालय परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले. दुर्गंधीमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांनी बाहेरून मास्क खरेदी करून ते परिधान करत रुग्णालयात थांबण्याचा पर्याय निवडला. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. , संबंधित मृत व्यक्ती नायजेरियन नागरिक असल्याने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे ... या घटनेमुळे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थापन आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह विल्हेवाट प्रक्रियेच्या सुविधांबाबत उपाययोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.. बाईट- रुग्णालयात आलेले नागरिक.
0
0
Report

शिंदे के नेतृत्व में विधायक-सांसद एकजुट, संजय राऊत पर आरोपों की राजनीति तेज

Nagpur, Maharashtra:नागपूर नरेंद्र भोंडेकर, शिवसेना आमदार, भंडारा (on ऑपेरेशन टायगर ) -- तिकडचे आमदार, खासदार अस्वस्थ आहे --- तर इकडे शिंदेंकडे सगळे चांगल्या पद्धतीने समन्वयामध्ये आहे... --- त्यामुळे त्यांना आपण पण इकडे यावं असे वाटत आहे -- आमदारांना विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते आणि शिंदे ते उत्तम पद्धतीने करतात -( लोकसभेत खासदारांसोबत होतय ते आमदारांसोबत होणार का?) -- का नाही होऊ शकत.... चांगलं नेतृत्व मिळत असेल --- ते त्यांना वेळ येत नाही... समजून घेत नाही अडचण सोडवत नाही... त्यांच्यासोबत समन्वय होत नाही (on raut ट्विट ) --- संजय राऊत यांना फक्त आरोप करायला आवडते..... आपल्या चुकांमध्ये कधीच सुधारणार की नाही?.... त्रास होत असेल म्हणून ते जात आहे -- राऊत साहेब तुम्ही आरोप करण्यापेक्षा जे जात आहे त्यांना थांबवू शकत नाही ही तुमची कमतरता आहे.... तुमची कमतरता लपोरण्या करता आपणा सपना मनी मनी सारखे आणि पन्नास खोके सारखे आरोप करताय --- भविष्यात संजय राऊत पण इकडे येतील... त्यांचेही शिंदे साहेबांसोबत चांगले संबंध -- शिंदे साहेब हे मॅग्नेट आहे काम करणारा मॅग्नेट आहे... काही होऊ शकत
0
0
Report
Advertisement

रोहा में सरकारी अनुदान के खाद की बड़े पैमाने पर कालाबाजारी का पर्दाफाश

Chendhare, Maharashtra:रोह्यात काळाबाजार उघड. कृषी सेवा केंद्र मालकावर गुन्हा रोहा तालुक्यात शासकीय अनुदानावर वितरित करण्यात आलेल्या खतांचा मोठा काळाबाजार उघडकीस आला आहे. ३ लाख ५४ हजार ५१३ रुपये किमतीचा खतसाठा गायब झाल्याप्रकरणी कृषी सेवा केंद्राच्या मालकाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा शहरातील शेतकरी कृषी सेवा केंद्र’ या दुकानात शासकीय अनुदानावरील खतसाठा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या पथकाने दुकानाची तपासणी केली असता, नोंदीनुसार उपलब्ध असणे अपेक्षित असलेला संपूर्ण खतसाठा गायब असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय खत खरेदीची चलने, साठा नोंदवही, विक्री रजिस्टर तसेच पीओएस मशीनशी संबंधित आवश्यक अभिलेखही उपलब्ध नव्हते. त्यामुळे संबंधित खतसाठा अधिकृतपणे शेतकऱ्यांना न विकता औद्योगिक वापरासाठी किंवा काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केल्याचा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
0
0
Report
Advertisement

शिक्रापुर में ट्रक-बस टक्कर: टेम्पो पलटा, मुसाफिरों को हल्की चोट, पुलिस कर रही जांच

Shirur, Maharashtra:पुणे AHilyaNagar महामार्ग पर भीषण हादसा हुआ। तेज गति से आ रही निजी ट्रैवल बस ने शिक्रापुर के बजरंगवाड़ी के पास टेम्पो को पीछे से जोरदार धक्का दिया, जिससे टेम्पो महामार्ग पर पलट गया। पुणे से अहिल्यानगर की दिशा में जा रही ट्रैवल बस ने टेम्पो की पिछली तरफ जोरदार टक्कर दी, जिससे यातायात पर व्यापक जाम लग गया। हादसे में किसी की जान नहीं गई, लेकिन ट्रैवल बस के यात्रियों और टेम्पो चालक को हल्के-फुल्के जख्म आए। घटना का पूरा दृश्य CCTV में कैद हुआ है और मामले की आगे की जांच शिक्रापूर पुलिस कर रही है।
0
0
Report

लातूर में बिजली चोरी रोकने गयी महावितरण टीम पर हमला; इंजीनियर मारपीट का शिकार

Latur, Maharashtra:AC. ::- वीज चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी वाडीत घडली आहे. अनधिकृत वीज जोडण्या तोडत असताना उपकार्यकारी अभियंता शकील लदाफ यांना लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाणी करण्यात आली. एवढेच नाही, तर पुन्हा गावात आल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वीज चोरांच्या मुजोरीमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
0
0
Report

कोल्हापुर महापालिका सभा में पानी-घटावट और अवैध निर्माण पर हंगामा की संभावना

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा, शहरात प्रवेश कर आकारणे, पाणीपट्टीत वाढ करणे, गांधीनगर अवैध बांधकाम आदी मुद्यावरुन आज होणारी कोल्हापूर महानगरपालिकेचे सभा वादळी होण्याची शक्यता आहे. हरिओमनगरच्या मागील बाजूला असलेल्या सात हेक्टर जागा हिरव्या पट्टयातून पिवळ्या पट्टयात घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सभेच्या अजेंड्यावर मंजूरीसाठी ठेवला आहे. परंतु, काँग्रेस आघाडीसह सत्तारूढ आघाडीतील नगरसेवकांचा या प्रस्तावाला विरोध आहे. शासकीय पातळीवर मात्र हा प्रस्ताव मंजूर करण्या-बाबत दबाव टाकण्यात आला आहे. तर ठाकरे गटाचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी शहरात प्रवेश कर आकारण्यासंदर्भात प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा, असा सदस्य ठराव दिला आहे. प्रशासनाने कसलाही प्रस्ताव दिला नसला तरीही प्रवेश कराला बहुतांश नगरसेवकांचा विरोध आहे त्यामुळे सभागृहात हा ठराव नामंजूर केला जाईल अस दिसतंय. कोल्हापूर शहरात शेजारी असणाऱ्या गांधीनगर अवैध बांधकाम प्रकरणी सर्व माहिती सभागृहाला द्यावी, अशी सूचना महापौर व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास केली होती. पण प्रशासन यासंदर्भात कारवाई करत असताना कोणतीही माहिती देत नसल्याचा रागही काही नगरसेवकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आज अकरा वाजता होणाऱ्या सभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून मोठा गदारोळ होईल अस एकूण दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

कराड में बिबट्या पकड़ा गया: वन विभाग ने जाल में फंसाया

Satara, Maharashtra:कराड,सातारा -कराड तालुक्यातील कोळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी... गेल्या महिनाभरापासून परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. कोळे येथील कराळे मळा परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून विशेष मोहीम राबवली होती. याच मोहिमेला यश मिळत बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे..या बिबट्याने यापूर्वी दोन शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने हालचाली करत बिबट्याचा मागोवा घेतला आणि बिबट्याला पकडण्यात यश मिळवले.वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. बिबट्या जेरबंद झाल्याने कोळे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत वनविभागाचे आभार मानले आहेत.
0
0
Report

Amravati Legislative Council election: Sunil Deshmukh's sharp comment fuels political heat

Amravati, Maharashtra:हर्षजित देशमुख हा ॲटम आमच्यासाठी संपला आहे त्यांची उमेदवारी आम्ही गांभीर्याने घेत नाही; काँग्रेस नेते सुनील देशमुख यांचे मोठे वक्तव्य मतदानाला उरले केवळ 24 तास तरी देखील काँग्रेसचा निर्णय नाही; अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला केवळ 24 तास उरले आहे त्यापूर्वी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हा ॲटम आमच्यासाठी संपला आहे त्यांची उमेदवारी आम्ही अजिबात गांभीर्याने घेत नाही असं कडक शब्दात त्यांनी सुनावलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान झाले. तर दुसरीकडे वंचितचे बहुजन निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा द्यायचा याबात अद्याप निर्णय झाला नाही आज सकाळी पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता अमरावती महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळ पर्यंत नेमकी काय भूमिका घ्यायची याचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. गटनेत्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, किंवा तटस्थ राहण्याची भूमिका काँग्रेस आज निर्णय घेऊ शकतो अशी माहिती सूत्राने दिली आहे.
0
0
Report

खामगाव में किसानों के उग्र आंदोलन में एसडीओ कार्यालय जलाने की कोशिश

Buldhana, Maharashtra:रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा भडकला! खामगावात "एसडीओ" कार्यालय जाळण्याचा प्रयत्न! पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळले... शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता चांगलाच भडकला आहे. ठीक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीचा जीआर जाळत आहेत. काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्री किनगाव जट्टू येथे बस पेटवल्याची घटना ताजी असताना आता खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. मध्यरात्री २ ते अडीच वाजेच्या sुमारास अज्ञात आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर १५ जूनपासून त्यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. विविध स्थरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान आता आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. काल, दिवसभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत जीआर जाळले. रात्री किनगाव जट्टू येथे देखील एसटी बस पेटल्याचा प्रकार समोर आला, मात्र पोलिसांकडून बस शॉर्टसर्किटने पेटल्याचा दावा केला जात असला तरी संतप्त शेतकरी आंदोलकांनीच बस पेटवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान रात्री खामगाव येथील एसडीओ कार्यालय पेटवण्याचा अज्ञात आंदोलकांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे चिखली खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर रात्रीच्या सुमारास संतप्त शेतकरी आंदोलकांनी भर रस्त्यावर टायर पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top