icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक के वैणी गड मंदिर से 22 किलो चांदी के गबन का खुलासा

Nashik, Maharashtra:*सप्तशृंगगडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे २२ किलो चांदीची तफावत समोर आल्याने मोठी खळबळ - २२ किलो चांडीचा अपहार झाल्याचा संशय - माहिती अधिकार कार्यकर्ते तथा तक्रारदार विठोबा ध्यानध्यान यांच्या तक्रारी नुसार विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश - चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी असणे आवश्यक , प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी - सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी गायब असल्याचे समोर - या प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर संशय मोठ्या अपहाराची शक्यता *बाईट: तक्रारदार - विठोबा ध्यान ध्यान*
0
0
Report

प्राजक्ता तनपुरे ने भाजपा में जाने से इनकार, तटस्थ रहने का निर्णय दोहराया

Shirdi, Maharashtra:प्राजक्त तनपुरे यांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क... मी भाजपात जाणार नाही , मी शरद पवार साहेबांच्या सोबत... तनपुरे यांचं मोठं वक्तव्य... यावेळी उमेदवारी न घेता तटस्थ राहण्याचा घेतला होता निर्णय.. शहरातील प्रगती विद्यालयात बजावला मतदानाचा हक्क... नगराध्यक्ष ते माजी मंत्री असा राजकीय प्रवास... कालच इडिकडून मिळाला तनपुरे यांना दिलासा... मिळालेल्या मुद्दे प्राजक्त तनपुरे - मी अजून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहे.... मी भाजपमध्ये जाणार अशी जी चर्चा सुरू होती त्यात तथ्य नाही , मी कुठलाही पक्षप्रवेश केला नाही.... ही निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक नव्हती... मी वेळोवेळी सांगितलं पोटनिवडणूक असल्याने मी स्थानिक प्रश्न बघून या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला...- तनपुरे मी पक्ष सोडलेला नाही आणि नवीन पक्षात प्रवेश केलेला नाही... ऑन पाठिंबा स्पष्टता मी थांबलो हीच माझी मोठी भूमिका होती... मी राहुरीतील माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला म्हणून मी संपूर्ण विचार करून निर्णय घेतला... ऑन सोशल मिडिया पत्र गावोगावच्या कार्यकर्त्यांना मी त्यांचा आदर राखत मोकळीक दिली होती... गाव पातळीवरील संघटनांची मते बघून मतदान करावं असं सांगितलं होतं... ऑन भाजपमध्ये जाणार मी भाजपमध्ये जाणार असे कधीही म्हणल नाही... मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आज आहे... मी या निवडणुकीपूरती तटस्थ भूमिका घेऊन माघार घेतलीय... मी निवडणुकीतून माघार घेण्याचे कारण मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे... मी भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही... प्राजक्ता तनपुरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेनंतर प्राजक्त तनपुरे यांची माध्यमांना प्रतिक्रिया... ऑन सुजय विखे मी निवडणुकीत थांबल्याबद्दल सुजय विखे यांनी आभार मानले हे मी समजू शकतो... बाकी माझ्याबाबत त्यांचं काय मतं हे त्यांना विचारलेलं बरं राहील... मी या निवडणुकीत कुठलंही मतं व्यक्त केलेलं नाही , मी कुठल्याही राजकीय मंचावर गेलेलो नाही..त्यामुळे याचा अर्थ असा नाही की मी भाजपात गेलो आहे... ऑन ED न्यायालय निकाल ED न्यायालयाच्या निकालाचा आणि या निवडणुकीचा कोणी संबंध लावत असेल तर याचा कुठलाही संबंध नाही... ED ची केस माझ्या एकट्यावर नव्हती , राज्यातील बरेच जण या केस मधे होते... एक वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने यामध्ये क्लिनचीट दिली होती आणि क्लोजो रिपोर्ट सादर केला होता... जेव्हा आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजो रिपोर्ट दिला तेव्हा शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झालेलं नव्हतं... त्यावेळी पोटनिवडणूक लागेल असा कुठलाही विषय नव्हता... या क्लीनचिटचा स्वीकार न्यायालयाने दोन-तीन महिन्यापूर्वी केला... या आधारावर ED च्या न्यायालयाने निकाल दिला... ED निकाल आणि निवडणुकीचा कुठलाही संबध नाही... वर्षभरापूर्वी सादर केलेल्या क्लोजो रिपोर्टला तांत्रिक दृष्ट्या वेळ लागला... त्यामुळे काल निकाल आला... ऑन उमेदवार म्हणतात प्राजक्त तनपुरे आमच्या सोबत... मी कुठल्याही राजकीय मंचावर गेलेलो नाही... कार्यकर्त्यांनी गावातील स्थानिक राजकारण बघून निर्णय घेतला आहे... कृपया माध्यमांनी माझा भाजप प्रवेश करू नये , प्राजक्त तनपुरे यांनी माध्यम प्रतिनिधींना हात जोडत केली विनंती... मी आजही पवार साहेबांसोबत आणि त्यांचा कार्यकर्ता... तनपुरे यांची प्रतिक्रिया... ऑन शरद पवार गट उमेदवार मी माझ्या निर्णयाबाबत पक्षाच्या वरिष्ठांना कळविल होतं... पक्ष शेवटच्या क्षणी उमेदवार देईल याची कल्पना मला नव्हती... बारामतीची निवडणुük ज्या पद्धतीने बिनविरोध करण्याची ठरवली त्याच पद्धतीची भूमिका राहुरीच्या बाबतीत राहील असं मला वाटलं होतं... कदाचित काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याचा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार दिला... राहुरीच्या निवडणुकीत माघार घेतलेल्या शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया... Bite - प्राजक्त तनपुरे , माजी मंत्री
0
0
Report

नाशिक में भोंदू बाबों के नए मामले से अंधविश्वास का पर्दाफाश

Niphad, Maharashtra:* अँकर इंट्रो : नाशिक जिल्ह्यात भोंदू बाबांच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. मिरगाव येथील अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच, आता निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे आणखी एका भोंदू बाबाचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या बाबावर करण्यात आला असून, लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. --- व्हॉइस ओव्हर (VO) 1 : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे राहणारा महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे हा स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. कौटुंबिक अडचणीत असलेली एक महिला त्याच्या आश्रमात मदतीसाठी गेली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, या बाबाने तिच्यावर भूतबाधा झाल्याचं सांगत विविध पूजा-विधी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करत, उपचाराच्या नावाखाली तिला नाशिक शहरातील त्र्यंबक रोड परिसरातील एका लॉजवर नेण्यात आलं. याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे, तर आरोपीने महिलेचे अश्लील फोटोही काढल्याचं समोर आलं आहे. --- बाईट - पीडित तक्रारदार महिला VO 2 "माझ्या गळ्यात रुद्राक्ष माळ आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, त्यामुळे माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही," अशा धमक्या देत आरोपीने महिलेवर दबाव टाकल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यामुळे भीतीपोटी महिलेने बराच काळ तक्रार देणं टाळलं. दरम्यान, मिरगाव येथील भोंदू अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने संबंधित महिलेनं धाडस दाखवत अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बाईट :- दीपक पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन VO 3 या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. अशा घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. --- अँकर आऊट्रो : भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नका, संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा — हीच वेळेची गरज आहे. P2c सुदर्शन खिल्लारे प्रतिनिधी निफाड/ नाशिक
0
0
Report
Advertisement

निंबा गांव के बाबा पर बाल सुरक्षा कानून के उल्लंघन का मामला दर्ज

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात लहान मुलांच्या आजारांवर अघोरी पद्धतीने उपचार करणाऱ्या बाबावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन मुळे उर्फ गुलालशेश महाराज असे या बाबाचे नाव असल्याचं त्याच्याविरोधात बाल कल्याण समितीच्या सदस्या अंजली जयस्वाल यांनी फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी या बाबाचा एक धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो उपचाराच्या नावाखाली एका लहान बाळाला आपल्या दातात धरून फिरवत असल्याचे दिसून आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून निंबा गावात दर सोमवारी या बाबाचा दरबार भरत होता आणि आजार बरे करण्याच्या नावाखाली अशा प्रकारचे अघोरी उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.
0
0
Report

गोदा से नर्मदा यात्रा शुरू, चोंडी से दूसरी यात्रा CM के उद्घाटन के साथ

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:25 तारखेपासून गोदा ते नर्मदा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, त्रंबकेश्वर येथून यात्रा सुरू होणार आहे, मुख्यमंत्री यांच्या हस्ते यात्रा सुरू होईल. दुसरी यात्रा त्याचवेळी चोंडी येथून निघेल, त्याची सुरवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील....30 नद्यांचे पाणी आपण कलश एकत्र शिर्डीत येतील... ऑन महापालिका पत्र, पाणी टंचाई आली नो परिणामबాబत अलर्ट येत आहे. आम्ही सर्व धरण पाणीसाठा नियोजन नकरून 31 अक्टोबर पर्यंत पाणी नियोजन करत आहे. महानगरपालिका यांना देखील पाणी नियोजन करण्याचे सांगितले आहे. उपलब्ध साठा कमी झाला किंवा पाऊस कमी झाल्यास निर्णय घ्यावे लागतात. शेती पाणी कपात करत होत नाही. पाणी काटकसरीने वावरले पाहिजे याचे सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश कारखाना कोर्टात वाद आहे, त्यात काँग्रेस भाजप असे नाही... ऑन राहुरी निवडणूक & तनपुरे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे एकत्र अहो, तनपुरे भाजपमध्ये येतील नाही येतील, राहुरी विकास करिता एकत्र आल्यास वावग नाही, तनपुरे यांनी चांगली भूमिका घेतली आहे, स्वागत आहे... ऑन मनोजन जरांगे जरांगे पाटील काही गैरसमज असतील, मी अध्यक्ष राहिले पाहजेच असे नाही, जरांगे पाटील यांना अहवाल पाठवले आहे, पण काही गोष्टी गेल्या नसतील म्हणून गैरसमज झाले असेल, मी बोलेले त्यांना... कुणबी समिती स्थापन करण्याची गरज नाही, सर्व कारवाई सुरू आहे. आमदार खासदार यांनी देखील कारवाई करून घ्यावी, त्यांना फक्त निवडणूकपूरते जरांगे पाटील हवे असल्यास चुकीचे है, पाटील गैरसमज दूर करू... बारामती पवार विरुद्ध मी काही भाष्य करणार नाही, दोन्ही पवार एकत्र यावे, त्यावर काय बोलू... ऑन आमदार गायकवाड पानसरे यांनी पुस्तक लिहले आहे, आमदार गायकवाड यांना विनंती आहे की ,त्यांनी जुन्या विषयात जाऊ नयेत...
0
0
Report
Advertisement

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर 11 बजे ब्लॉक, 12 बजे से काम शुरू, वजह सुरक्षा

Varsoli, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : MAVAL File.name : 2304ZT_MAVAL_EWAY_BLOCK Total files : 05 Headline -पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर 11 वाजताच ब्लॉक सुरु, 1 तास आधी ब्लॉक सुरु करण्याचं कारण ही समोर...! Anchor: पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर अकरा वाजताच ब्लॉकला सुरुवात झालीये. प्रत्यक्षात बारा वाजता कामाला सुरुवात करायची असल्यानं खबरदारी म्हणून अकरा वाजता ब्लॉक सुरु करण्यात आलाय. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिलीये. यावेळी वाहतूक जुन्या पुणे-मुंबईकडे वळवण्यात आलीये. आज पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र खुलीच असेल. बाईट : सुनील अवसरमोल - एपीआय महामार्ग (file no.04) बाईट : संजय वारे - प्रोजेक्ट डायरेक्टर मिसिंग लिंक (file no.05)
0
0
Report

नांदेड जिले में भीषण दुर्घटना: मां, बेटे और आंटी सहित तीन की मौत, दो घायल

Nanded-Waghala, Maharashtra:दोन दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. एका दुचाकीवरील आई, मुलगा आणि आत्या असे तिघेजण ठार झाले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसनी जवळ काल रात्री दहाच्या sुमारास हा अपघात घडला. निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हा आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांना घेऊन दुचाकीवरून जात होता. हडसनी गावाजवळ येताच भरधाव वेगातील स्वीफ्ट कार आणि दुसरी एक दुचाकीसोबत भीषण धडक झाली. धडक एव्हढी भीषण होतिकी दुचाकीवरील तिघेजण दुरवर फेकल्या गेले. या धडकेत आई, मुलगा आणि अत्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील एकजण आणि कारामधील एकजन असे दोघे गंभीर जखमी झाले. जखमीवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
0
0
Report

सातारा-लोणंद मार्ग पर भीषण ट्रक दुर्घटना, चालक की सूझबूझ से बड़ा नुकसान टला

Satara, Maharashtra:सातारा-लोणंद राज्य महामार्गावर आज भीषण अपघात घडला आहे… पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कण्हेर डाव्या कालव्यात कोसळला… पाटखळ गावच्या हद्दीत ही घटना घडली .सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही… चालक आणि क्लिनर दोघेही सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे… जखमींवर उपचार सुरू आहेत…दरम्यान, कालव्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले… या दरम्यान काहीवेळ कण्हेर आणि उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग तात्पुरता बंद करण्यात आला होता… ट्रक बाहेर काढल्यानंतर विसर्ग पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे…
0
0
Report
Advertisement

आज सोलापुर के बालमाता मामले पर महिला बालहक्क आयोग में सुनवाई—34 अल्पवयीन माताएं सामने

Solapur, Maharashtra:सोलापुरातील बालमाता प्रकरणांची महिला बालहक्क आयोगापुढे आज होणार सुनावणी सोलापुरातील बालमाता प्रकरणांची राज्य महिला बालहक्क आयोगाने घेतली गंभीर दखल बालमाता प्रकरणांची महिला बालहक्क आयोगाकडे आज होणार महत्त्वपूर्ण सुनावणी सम्बंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या 84 पैकी 34 माता अल्पवयीन असल्याचे निष्पन्न धक्कादायक म्हणजे सोलापूर महापालिकेकडून तब्बल 15 प्रकरणांची माहिती पोलिसांना कळविण्यात आले नसल्याचे समोर सदरच्या विषयामध्ये आत्तापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल तर आणखी गुन्हे वाढण्याची दाट शक्यता
0
0
Report

प्रकाशक प्रशांत आंबी ने शिवसेना विधायक संजय गायकवाड़ की धमकी के बाद CM से कार्रवाई की मांग

Kolhapur, Maharashtra:शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना सत्तेचा माज आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापुरातील प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रताप नाईक यांनी. प्रशांत आंबी, प्रकाशक संघर्षा बुक गॅलरी गोविंदराव पानसरे यांनी हे पुस्तक 1988 ला लिहिले. तत्पूर्वी कर्नाटक मधील ग कृ कुऱ्हाडे यांनी 1939 साली शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात प्रामुख्याने गोविंदराव पानसरे यांनी... 1) साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला तरी देखील सामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य करणारा या राजामध्ये काय वेगळेपण होते याची मांडणी या पुस्तकामध्ये आहे. 2) अनेक राजे होऊन गेले शिवाजी महाराजांनी असं काय काम केलं की लोक त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार होते याची मांडणी या पुस्तकांमध्ये आहे 3) स्वतः स्वराज्याची स्थापना केली वडिलोपार्जित गादीवर आयता बसलेला राजा नव्हता हे प्रामुख्याने मांडले आहे. 4) रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी भूमिका राजेंची होती हे पानसरे यांनी ठळकपणे मांडले आहे. 5) सामान्य रयत जीव द्यायला तयार होती राजांसाठी कारण सामान्य रयतेला स्वराज आपलं राज्य वाटावं असे राजांचे आचरण होत असं पानसरेनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे. 6) परस्त्रीला मातेसमान मान दिला, स्वतःच्या धर्माचा अभिमान होताच पण कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही हे ठळकपणे मांडले आहे. 7) स्वतःच्या सरदाराने स्त्री ची अब्रु लुटली तर त्याचे हात पाय शिवाजी महाराजांनी तोडले हे देखील सांगितले. 8) कर पद्धती , दुष्काळात शेत सारा माफ अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या. याबद्दल पुस्तकात सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. 9) शिवाजी महाराजांच्या दरबारात मुस्लिम सरदार, चाकर, सैन्य होते. त्या काळात झालेल्या लढाया फक्त हिंदू मुस्लिम मध्ये झालेल्या नाहीत हे देखील पानसरेंनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
0
0
Report

रिसोड–मालेगाव मार्ग पर पिकअप पलटी, आंबे बिखरे; भीड़ ने आंबे उठाने पर जोर दिखाया

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील रिसोड–मालेगाव मार्गावरील दापुरी गावाजवळ आंबे वाहतूक करणारी पिकअप गाडी पलटी होऊन अपघात झाला.या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. अपघातानंतर गाडीतून खाली पडलेले आंब्यांचे कॅरेट तसेच गाडीत असलेले आंबे उचलण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.काही जण आंबे पोत्यांमध्ये व कॅरेटमध्ये भरून नेताना दिसले, तर काही जण विखुरलेले आंबे गोळा करत होते.अपघातग्रस्त वाहनाला मदत करण्यापेक्षा आंबे उचलण्यालाच काही नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top