445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अहिल्यानगर जिले के सांदनदरी क्षेत्र में भारी बारिश के कारण पर्यटन बंद
Shirdi, Maharashtra:पर्यटक आणि ट्रेकर्सचे आकर्षण असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सांदनदरी परिसरात सध्या पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा परिसरातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरू असल्याने, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाने पर्यटकांना सांदनदरी परिसरात जाण्यास मज्जाव केला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे अतिशय खोल अशी ही सांदन दरी आहे. पावसाळ्यात पाण्याच्या अती प्रवाहामुळे किंवा दरडी कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो, त्यामुळे हा परिसर सध्या पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे.0
0
Report
बिटरगाव में रेत माफियाओं ने युवक पर हमला कर घायल, अस्पताल में उपचार
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील बिटरगाव येथे वाळू माफियांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिटरगाव येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी केल्याने वाळू माफियानी बालाजी नागटिळक या तरुणाच्या हात आणि पायावर वार केले आहेत. जखमी तरुणावर मिरज मधील दवाखान्यात सध्या उपचार सुरू आहेत.0
0
Report
सणसवाडी बैलगाडा हादसा: विवादाच्या वादानंतर युवकावर कारने मारण्याचा प्रयत्न CCTV मध्ये कैद
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील बैलगाडा शर्यतीच्या वादातून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालशिरस येथील बैलगाडा शर्यतीदरम्यान मोडक आणि हरगुडे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाच्या रूपानंतर हिंसक हल्ल्यात झाले. चेतन हरगुडे याला कारने जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत चेतन हारगुडे आणि त्याचा चुलत भाई अथर्व हारगुडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हा संपूर्ण थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में बारिश रुकने से फसल बुवाई ठप, किसान बचाव के उपाय खोज रहे
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या केलेली पेरणी उगवेल की नाही अशी स्थिती असताना शेतकरी लागला डवरणी च्या कामाला नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्केच पेरण्या झाल्या, जवळपास ४० टक्के क्षेत्र अजुन पावसाच्या प्रतीक्षेत.. नागपूर विभागात सरासरी १९ लाख ५ हजार ७४० हेक्टरवर पेरणीयोग्य क्षेत्र.. आतपर्यंत ९ लाख ९९ हजार ३९० हेक्टरवर म्हणजे ५२ टक्के पेरणी झाली.. यामध्ये कापूस ५ लाख ४५ हजार ७६३ हेक्टर, सोयाबीन १ लाख ९८ हजार ७५५ हेक्टर, तूर १ लाख २२ हजार २८० हेक्टर तर भात पिकाची १ लाख २८ हजार ४७५ हेक्टरवर पेरणी झाली. पावसाने दडी मारली असली तरी हाती असलेल पीक जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू0
0
Report
ATS ने चिपळुण में दो युवकों से पूछताछ, शहजाद भट्टी के सोशल मीडिया लिंक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ए टी एस कडून चिपळूणात दोन तरुणांची चौकशी.. अल्पवयीन मुलांना लक्ष.. सोशियल मीडियाचा वापर.. पथक सतर्क अँकर पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाद्वारे भारतीय अल्पवयीन तरुणांचे ब्रेन वॉश करून दहशतवादी कारवायांसाठी वापर करत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.. या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादी विरोधात दहशत विरोधी पथकाने राज्यभर मोहीम राबवली आहे.. या पथकाकडून चिपळूण येथे अशा तरुणांचा शोध सुरू असून आतापर्यंत दोघाजणांची चौकशी करण्यात आली आहे.. यात आणखी कोणाचा संबंध आहे का हेही तपासले जात आहे..एटीएसचे 14 युनिट मधील 58 पथकांनी राज्यात एकाच वेळी 150 ठिकाणी शोध मोहीम राबवली.. प्राथमिक तपासात शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार फेसबुक,इंस्टाग्राम,टेलिग्राम व व्हाट्सअप ॲप द्वारे तरुणांची संपर्क साधत असल्याचे उघड झाले..0
0
Report
श्रीरामपूर बंद: तीसरे दिन में व्यापक बंद, व्यापारी और छात्र समर्थन करते दिखे
Shirdi, Maharashtra:सलग तिसऱ्या दिवशी श्रीरामपूर बंदला उस्फूर्त प्रतिसाद... हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर दिली आहे बेमुदत बंदची हाक... आरोपींसह आरोपींना मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कायद्यान्वये कारवाईची मागणी.. आजच्या बंदमध्ये शाळा सहभागी.. अनेक शाळा बंद ठेवत दिला शहर बंदला पाठिंबा... सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांचा देखील बंदला पाठिंबा.. मागणीसाठी उद्या श्रीरामपूर मध्ये महामोर्चाचे आयोजन...0
0
Report
Advertisement
नागपुर के गजानन उद्यान में गांजा के पौधे: 16–19 आयु के युवाओं पर चौकसी बढ़ी
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात आढळली चक्क गांजाची झाडे नागपूरच्या अजनी परिसरातील गजानन उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गजानन उद्यानात 16 ते 19 वयोगटातील मुले आणि तरुण गांजा पिऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती परंतु तपासात कोणीही आढळून आले नाही या प्रकाराची अधिक चौकशी केल्यावर उद्यानात चक्क गांजाची झाडे लावले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आला या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होतं आहे0
0
Report
पंढरपुर की आषाढ़ी एकादशी: वारक़ों की चरणसेवा और ज्ञानोबा-तुकाराम जयघोष
Shirdi, Maharashtra:आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात अनेक पालख्या मार्गक्रमण करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी, वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करत चरणसेवा केली. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाची विचारपूस केली आणि सुखरूप वारी पूर्ण होऊन सर्वांना विठ्ठल-रुक्मिणीचे मंगल दर्शन लाभावे अशी प्रार्थना केली.0
0
Report
रामनगर के राम मंदिर में ठाकरे-भाजपा के धार्मिक आयोजनों की संभावना
Nagpur, Maharashtra:रामनगर येथील राम मंदिराच्या प्रांगणात 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून 'लक्ष्मी नृसिंह महायज्ञ' केला जाणार आहे. विशेष म्हणजे या राम मंदिरात 18 जुलै रोजी रामरक्षा पठण करण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नियोजन आहे; यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते नागपुरात येणार आहेत. जर ठाकरे गटाचे राम रक्षा पठण रामनगर येथील राम मंदिरात झाले तर चार दिवसांनीच त्या मंदिराच्या प्रांगणात भाजप कार्यकर्त्यांकडून महायज्ञ केले जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उद्दिष्टाने ka होईना, योगायोगाने शिवसेना ठाकरे गट आणि भाजप या दोघांचे धार्मिक आयोजन रामनगर के राम मंदिरात होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी का सातारा में आगमन, लोणंद में स्वागत की तैयारी पूरी
Satara, Maharashtra:सातारा - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असून लोणंद नगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे. 'बाजार पटांगण' मैदानावर माऊलींचा एक दिवसाचा मुक्काम असणार असून, नगरपंचायत व जिल्हा प्रशासनाने येथे चोख व्यवस्था केली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी,भाविक या ठिकाणी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून मैदानावर बॅरिकेड्स देखील लावण्यात आले आहेत. त्याच बरोबर मैदानावर विद्युत रोषणाईची कामे अंतिम टप्प्यात आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होई नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण परिसराची तयारी पूर्ण केली आहे.0
0
Report
अमरावती में बारिश गायब, किसानों के सामने नई दिक्कतें
Amravati, Maharashtra: AMT_NO_RAIN पाच फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यात पावसाने मारली दडी; आठ दिवसांपासून पाऊस पेबत्ता, तुषार सिंचनावर पिकं जगवण्याची शेतकऱ्यावर वेळ अँकर :- अमरावती जिल्ह्यात पावसाने मारली दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आधी सोयाबीनच्या बोगस बियाणेमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून आता पाऊस बेपत्ता झाल्याने तिबार पेरणीची शेतकऱ्यावर वेळ येण्याची शक्यता आहे. बोगस बियाणे पेरल्या नंतर आता शेतकऱ्यावर निसर्गही कोपला असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसापासून पाऊस बेपत्ता झाल्याने पिके जगवण्यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची धडपड सुरू असून भर पावसाळ्यात शेतकरी शेतात सिंचन करून सोयाबीन कपाशीला देत आहे पाणी देत आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून पाऊस बेपत्ता झाल्याने पिके कोमजू लागली आहे. बाईट :- शेतकरी0
0
Report
बारिश के बावजूद कोकण के किसान लावणी के सुरों से भात रोपण जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाऊस रुसला तरी सूर रंगला! संकट विसरून कोकणात घुमतोय पारंपरिक लावणीच्या गाण्यांचा नाद! कोकणात ऐन लावणीच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने भात शेतीवर संकट ओढवले आहे. पावसाअभावी भाताची सुवर्ण रोपे पिवळी पडू लागल्याने बळीराजा चिंतेत आहे.. पण अशा कठीण परिस्थितीतही कोकणचा शेतकरी डगमगलेला नाही.. निसर्गाच्या अवकृपेवर मात करत जिद्दी शेतकऱ्यांनी थेट विहिरीतून पाणी आणून, शेतात चिखल करत भात लावणीची कामे सुरू ठेवली आहेत.. विशेष म्हणजे, डोक्यावरचे चिंतेचे ढग बाजूला सारून शेतामध्ये पारंपरिक गाणी गात अत्यंत उत्साहात आणि आनंदाने ही लावणी केली जात आहे.. संकंटाशी दोन हात करत कोकणच्या हिरव्यागार शेतात घुमणारा बळीराजाचा हाच सुरेल आवाज आणि उनकी जिद्द दाखवणारी ही एक थेट झलक झी २४ तास वर ...0
0
Report
Advertisement
शिक्षकों पर गैर-शैक्षणिक भार बढ़ा, बच्चों की पढ़ाई पर असर
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांवर वाढलेल्या अशैक्षणिक कामांच्या भाराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे चित्र आहे. एसआयआर, बीएलओ, प्रशिक्षण आणि इतर शासकीय कामांमध्ये शिक्षक व्यस्त असल्याने वर्गात शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार पालकांच्या केली जात आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने उपलब्ध शिक्षकांनाच अनेक वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून दिलासा देऊन वर्गात अधिक वेळ देता यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.0
0
Report
रत्नागिरी में बारिश नहीं, किसान बेहाल—फसलें करपने लगीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसाची दडी.. पिके करपली.. लावणीच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर.. कोकणात चिंतेचे ढग गडद झाले आहेत,पण ते पावसाचे नव्हे तर दुष्काळाच्या सावटाचे! मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा वरुणराजाने दडी मारली आहे.. ऐन लावणीच्या (भात लागवडीच्या) महत्त्वाच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी कमालीचा चिंतातूर झाला है.. कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे शेतातील कोवळी पिके आता करपून जाऊ लागली आहेत.. बियाणे,खते आणि मशागतीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.. पावसाने दडी मारल्याने आपल्या सुकलेल्या शेतात शेतकरी विहिरीच्या पाण्यावर आपल्या शेतात चिखल करून लावणी करत आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
सांगली नदी में मगरी के हमले से 61 वर्षीय व्यक्ति घायल
Sangli, Maharashtra:कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची घटना सांगलीमधील घडली. जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार झाले आहेत. साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माई घाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आराडा-ओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदी धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे साळुंखे हे बाल-बाल बचावले आहेत. घटनेनंतर जखमी झालेल्या साळुंखे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय, मात्र या घटनेने शहरात भीतीच वातावरण निर्माण झाला असून नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबर द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.0
0
Report
Advertisement
