icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवला धोखाधड़ी मामला: करोड़ों रुपये की ठगी में आरोपी गिरफ्तार, 24 जून तक पुलिस कोठडी

Yeola, Maharashtra:अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोनं देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. येवला तालुक्यातील नगरसुलचा सुप्रसाद प्रमोद दीक्षित याला पुण्यातून सिनेस्टाईल कारवाई करत अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. आज येवला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक, पुणे आणि संभाजीनगर सह अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर जिला परिषद ने 90 स्कूलों में कक्षा वृद्धि मंजूर की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांकडून वर्गवाढीसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्तावाची छाननी करून तब्बल ९० शाळांना वर्गवाढ करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने यावर्षी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी सूचना दिल्यात. त्यात आवश्यक त्याठिकाणी शाळांना वर्गवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शाळांकडून प्रस्तावही मागवले. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांचा छाननी करण्यात आली. पात्र ठरलेल्या ९० शाळांमध्ये वर्गवाढीस मंजुरी दिली. त्यामध्ये चौथीपर्यंत असलेल्या २६ शाळांना पाचवीचा वर्ग असेल. त्याशिवाय ८ शाळांमध्ये सहावीचा वर्ग, ३ शाळांमध्ये सातवीचा, २८ शाळांमध्ये आठवीचा, १९ शाळांमध्ये ९ वीचा आणि सहा शाळांमध्ये दहावीचा वर्ग वाढवण्यात आला.
0
0
Report
0
0
Report

मराठवाड़े में मॉनसून देरी: किसानों के पेराई सीजन पर संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मौसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे मराठवाड्यात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीये जून महिना संपायला आला पेरण्या कधी करायचा असा प्रश्न बळीराजाला सतावतोय..
0
0
Report
Advertisement
Advertisement

गोंदिया में अवैध वाळू उपसा रोकथाम के आदेश का उल्लंघन, प्रशासन सवालों के घेरे में

Bhandara, Maharashtra:जिल्हाधिकारीयांच्या आदेशाची अवहेलना..... १० जून नंतर नदीपात्रातून वाळू उपसा बंद असताना देखील बिनधास्त पने वाळू उपसा.... Anchor : गोंदिया जिल्हा सध्या तीव्र उष्णतेच्या झळा सहन करत आहे. नद्यांमधील पाण्याची पातळीही चिंताजनक स्थितीत आहे. यावर्षी मान्सूनला सुरुवात झाली असून पाऊस मात्र बेपत्ता झाला आहे.. या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील सर्व वाळू घाट बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, या आदेशानंतरही वाळू चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. नदीपात्रातून वाळू माफिया बिनधास्त पने वाळूचा उपसा करताना दिसत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात महसुली अधिकारी काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील वळू माफियानी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आता या वाळू उपसा वर कोण लगाम घालेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
0
0
Report

स्मार्ट सिटी योजना बंद: 176 करोड़ खर्च के बाद छत्रपति संभाजी नगर में संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून १७६ कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी नगर शहरात ७०० सीसीटीव्ही आणि 'कमांड अँड कंट्रोल सेंटर' उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च रोजी 'स्मार्ट सिटी' प्रकल्प अधिकृतपणे गुंडाळल्याने या प्रकल्पांतर्गत सुरू असलेली सर्व अपूर्ण कामे आता महापालिकेच्या गळ्यात पडली आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या देखभालचे कंत्राट लवकरच संपणार असून हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्मार्ट चालवण्यासाठी सिटीचे प्रकल्प महापालिकेला वार्षिक ३५ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. यावर निर्णय घेण्यासाठी येत्या २९ जून रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली
0
0
Report

भंडारा में ड्राय स्पेल से खरीफ पेराई रुकी, किसानों में बढ़ी चिंता

Bhandara, Maharashtra:एल निनो'चा प्रभाव भंडारा जिल्ह्यात 'ड्राय स्पेल'चे सावट, खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत... जून महिन्यात अपेक्षित ११८.५ मिमी पावसापैकी अवघा २२.८ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात केवळ १९.२ टक्के पावसाची नोंद... दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी सावध... २४ जूननंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता, हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन... सध्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील आठवडाभरात दमदार पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास पेरण्या, उत्पादन आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में मौसम ने बदला रंग: तापमान 38-40°C और आर्द्रता ऊंच

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाच्या दांडी ने छत्रपती संभाजीनगर सध्या विचित्र हवामानाला सामोरे जात आहे.. शहरात शुक्रवारी कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. सकाळी हवेतील आर्द्रता ६९ टक्के होती, जी सायंकाळपर्यंत ३१ टक्क्यांवर आली. दरम्यान, हवामान विभागाच्या पुढील ५ दिवसांच्या अंदाजानुसार तापमानाचा पारा ३८ ते ४০ अंशांच्या दरम्यान राहील. शनिवारी कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २१ जूनचा अपवाद वगळता, उर्वरित सर्व दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह विजा चमकण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सुदैवाने, शहरात पावसाची कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. मात्र, हवेतील आर्द्रतेत मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रता ६९ टक्के इतकी होती, ज्यामुळे सकाळच्या सत्रात प्रचंड उकाडा आणि घाम निघत होता. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही आर्द्रता ३१ टक्क्यांवर गेली होती...
0
0
Report

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापुर दौरे में विकास योजनाओं का शुभारंभ करेंगे

Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर, इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर आहे. कोल्हापुर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक,विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार त्यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत. मंदिरातील विकास कामाच्या शुभारंभानंतर पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिर परिसरातील परिसराची ते पाहणी करणार आहेत. गेली अनेक शतके भाविकांचे धार्मिक केंद्र असणाऱ्या या मंदिराच्या मूळ वैभवाला पुन्हा उभारण्यासाठी महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मंदिराच्या किरणोत्सवासाठी पूरक व्यवस्था, सुविधा निर्माण करण्याचीही तरतूद आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे. मंदिर आराखड्यावर चर्चा व पाहणी केल्यानंतर दुपारी ११.३० च्या सुमारास कोल्हापूर शहरातील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित केलेल्या जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात ४ वाजताच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास कलाप्पांना आवाडे टेक्सस्टाईल पार्क मैदान इचलकरंजी इथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गृहमंत्री कोल्हापूरहून पुन्हा परतणार आहेत.
0
0
Report

अल निनो से जल-संकट के बीच दिंडीयात्रा के लिए निधि बढ़ी, सुरक्षा-व्यवस्था कड़े

Ahilyanagar, Maharashtra:या वर्षी ‘अल निनो’मुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिंडी प्रमुखांना केले आहे...आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडी चालक यांच्यासोबत पालकमंत्री विखेंनी बैठक घेतली या बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या 200 दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते... गेल्यावर्षी दिंड्यांचे नियोजन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेला २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता... यावर्षी हा निधी वाढवून ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आलाय...या माध्यमातून वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंगल कार्यालयांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत... तसेच पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यात पालख्या पोहचल्यानंतर तिथे गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही समन्वय साधला जाणार असल्याचे विखेंनी सांगितले...दिंडीत आजारी पडणाऱ्या वारकऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top