Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 13:21:09
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात भाजप नेते बोराळकरांना साडेपाच लाखांचा गंडा ब्लिस्टर पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने कंपनीची फसवणूक गुजरातमधील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील के-११७ येथे शिरीष बोराळकर यांची यूनिव्हरल प्रोफिलॅक्टीक प्रा. लि. ही कंपनी असून येथे विविध कंपन्यांचे कंडोम तयार करून निर्यात केली जाते. कंपनीसाठी कंडोम पॅकिंगसाठी ब्लिस्टर पॅकिंग मशीन खरेदी करण्यासाठी अहमदाबाद येथील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीशी संपर्क साधण्यात आला होता. कंपनीचे संचालक आदित्य पांचाल व नितीन पांचाल यांनी २०२५ मध्ये कंपनीत येऊन मशीनबाबत माहिती देत व्यवहार ठरवला. त्यानुसार पूर्णपणे स्वयंचलित केपीएम-एएलव्ही ब्लिस्टर पॅकिंग मशीन आणि डीफॉइलिंग मशीनसाठी ११ लाख ७५ हजार रुपयांची ऑर्डर देण्यात आली. यासाठी अॅडव्हान्स म्हणून रक्कमही देण्यात आली होती. मात्र ४५ दिवसांत मशीन देण्याचे आश्वासन देऊनही मशीन न देता सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुजरात येथील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीचे संचालक आदित्य पांचाल आणि नितीन पांचाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 13:18:40
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- मार्च महिन्यात वाढलेल्या तापमानाचा पहिला परिणाम, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खाणीत लागली आग, लगतच्या सास्ती गावातील ग्रामस्थ संतप्त कोलबेंच व कोलस्टॉकला लागलेल्या आगीमुळे प्रदूषण वाढले अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या सरकारी कोळसा कंपनी वेकोली च्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खाण परिसरात कोलबेंच व कोलस्टॉकला आग लागली आहे. आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे सास्तीगावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. दोन दिवसांपासून येथे धूर व आगीचे प्रकार घडत असताना स्थानिक वेकोली प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सास्तीगाववासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी संतप्त होत चक्काजाम आंदोलन केले. या प्रदूषणामुळे सास्तीगावासह परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, तसेच इतर आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. गावावर सतत धुराचे सावट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने आग विझवून प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे, तसेच गावकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे。
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 13:16:25
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 10, 2026 13:16:14
Malegaon, Maharashtra:मालेगाव स्थायी समिती सभापतीपदी एजाज बेग यांची बिनविरोध निवड.. सत्ता स्थापनेत बेग यांनी सेक्युलर फ्रंटला दिली साथ.. सर्वांना सोबत घेऊन सर्वागीण विकास करणार नूतन सभापती बेग यांचे आश्वासन... नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकाअधिक तसेच पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती पदासाठी बेग यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. मालेगाव महापालिकलकेत काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडवून आले होते. सत्ता स्थापनेत सेक्युअर फ्रंटला पाठींबा दिला होता. त्यामुळे बेग यांना स्थायी समिती सभापती संधी देण्यात आली. सर्वांना सोबत घेऊन मालेगाव शहराच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना नूतन सभापती एजाज बेग यांनी बोलून दाखविली. यावेळी आयुक्त रवींद्र जाधव, नगरसचिव साजिद हसन अब्बास आदी उपस्थित होते. Byte:- एजाज बेग, स्थायी समिती सभापती..
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 10, 2026 12:35:10
Nanded, Maharashtra:Anchor - टोमॅटोला किरकोळ बाजारात केवळ पाच ते दहा रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. टोमॅटो लागवडीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यानी टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा लाल चिखल केला. शेतकऱ्याचा टोमॅटो कोणी फुकटही घेऊन जात नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये किलो टोमॅटो विक्री होत आहे. टोमॅटो तोडणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आणि व्यापारी देखील टोमॅटो घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथे टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी लाल चिखल केला. सरकारने टोमॅटोसह शेतीमालाला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 10, 2026 12:00:46
Nasik, Maharashtra:लवासा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. नाशिकचे विधीज्ञ नानासाहेब जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे, त्यांच्या पती सदानंद सुळे आणि Hindustan Construction Company के अजित गुलाचंद यांच्यावर सीबीआय चौकशीची मागणी आहे. प्रकल्पासाठी हजारो कोटींची मुद्रांक शुल्क माफी, 141.15 हेक्टर शासकीय जमीन कमी दरात देणे आणि 5,000 एकर जमीन खरेदीतील कथित अनियमितता हे आरोप आहेत. उच्च न्यायालयाने याचिका उशिरा दाखल झाल्याचे कारण देत फेटाळली होती. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे नाव याचिकेतून वगळण्यात आले आहे. नानासाहेब जाधव याचिकारता
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 10, 2026 11:55:59
Dhule, Maharashtra:इराण-अमेरिका तणावाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे..... युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण गेल्या आठवड्याभरात २٢٠० वरून १२०० वर केळीचे दर आलेत...... नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक अडचणीत; बाजारभाव घसरल्याने नुकसानाची भीती.....उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरले केळी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले..... इराण-अमेरिका तणावाच्या परिणामांचा फटका आता नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत असून केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी बाजारात सुमारे २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना सध्या तो घसरून जवळपास १२०० रुपयांपर्यंत आला आहे. दरातील या मोठ्या घसरणीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 10, 2026 11:45:25
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 10, 2026 11:37:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - मिरज पंचायत समिती सभापती निवडीत भाजपाला धक्का,महाविकास आघाडीने मारली बाजी.. सांगली जिल्हा परिषदेच्या तोंडावर पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाला मिरज पंचायत समिती मध्ये धक्का देत महाविकास आघाडी सोबत राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे.केवळ 3 जागा असणाऱ्या काँग्रेसने पंचायत समिती सभापती पदी बाजी मारली आहे.तर शिवसेना शिंदे गटाला उपसभापती पद मिळाले आहे.मिरज पंचायत समितीच्या 22 पैकी दहा जागावर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते,त्यामुळे भाजपाचा मिरज पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सोबत सभापती होईल आणि सत्ता येईल, अशी दाट शक्यता असताना,अत्यंत नाट्यमय्यारित्या घडलेल्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे,सभापती म्हणून काँग्रेसची तन्वी कमलेकर,ही 21 वर्षीय तरुणी सभापतीपदी निवडून आली आहे,तर शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजुळ या उपसभापती म्हणून विजयी झाल्या आहेत. खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून रोखठ मिरज पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे. बाईट - विशाल पाटील - खासदार बाईट - तन्वी कमलेकर - नुतून सभापती- मिरज पंचायत समिती बाईट --अजित घोरपडे -माजी मंत्री,राष्ट्रवादी अजित पवार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 11:21:56
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | पंचायत समिती सभापती निवडणूकीत भाजप ,शिवसेना ठाकरे पक्षात राडा (पॅकेज) फोडले सदस्य,पकडली कॉलर,झाला राडा! भाजपने ठाकरे सेनेचे 3 पंचायत समिती सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. दानवेंनी पकडली भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराची कॉलर,झाला राडा. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदान होण्याआधी भाजपने ठाकरे सेनेचे 3 सदस्य पळवल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. निवडणुकीदरम्यान दानवेची मतदान केंद्राजवळ एन्ट्री झाली आणि भाजप शिवसेनेत राडा झाला. नेमकं झालंय काय या निवडणुकीत पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती पंचायत समितीत एकूण 20 सदस्य आहेत. सभापती पदासाठी 11 सदस्यांची गरज लागणार होती. यात भाजपकडे स्वतःचे भाजप 6 आणि 1 पुरस्कृत असे एकूण 7 सदस्य होते. एकनाथ शिंदे शिवसेनेचे 6, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 1 तर प्रहारचा 1 सदस्य निवडून आला होता. शिवसेना शिंदे पक्षाचे 3 सदस्य भाजपसोबत असल्याची चर्चा होती. तर भाजपने ठाकरे गटाचे 3 सदस्य पळवून नेल्याचा आरोप दानवेंनी केला. ठाकरेच्या एकूण 4 पैकी 3 सदस्य भाजपने पळून नेल्याचा आरोप दानवेंनी केल्यानं ठाकरेकडे केवळ एकच सदस्य उरला. त्यामुळे दानवेंनी थेट भाजपच्या सभापती उमेदवाराची कॉलरच पकडली. या राड्यानंतर सभापती पदासाठी मतदान पार पडलं. या मतदानावेळी ठाकरे सेनेचे तीन सदस्य गैरहजर राहिले. तर शिंदे शिवसेनेतही एक खासदार संदीपान भुमरे यांचा तर दुसरा पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा. त्यामुळे कल्याण गायकवाड (भाजप उमेदवार) एकूण मतदान 09 (भाजप 7+शिरसाट समर्थक शिवसेना सदस्य 2) अनुराग शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार) मतदान 08 (ठाकरे गट 1+काँग्रेस 1+प्रहार 1+भुमरे समर्थक शिवसेना 4 आणि स्वतः 1). उपसभापती निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट झाले आणि शिवसेना शिंदे पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात उतरले: बाळासाहेब गाडे, शिंदेसेना (सिरसाट समर्थक) 10; बाबासाहेब राठोड, शिंदेसेना (भुमरे समर्थक) 7 मत मिळाली. त्यामुळे या अटी तटीच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली. कल्याण गायकवाड, नवनिर्वाचित सभापती, पंचायत समिती, छत्रपती संभाजीनगर. अनुराधा चव्हाण, आमदार, फुलंब्री, भाजपा. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात वेगवेगळ्या संस्थांमधील सत्ता स्थापनेवरून चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळतोय. तर शिवसेना शिंदे पक्षातही अंतर्गत कलह दिसून येतोय. त्याचाच फायदा आजच्या निवडणूकीत भाजपने घेतल्याचं समोर आलं पण या निमित्ताने राडा देखील पाहायला मिळाला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 11:10:10
Akola, Maharashtra:शेतकरी बंधूंनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अशाच प्रकारे कापूस खरेदीत फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे कापूस खरेदी व्यवहारात एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कापूस खरेदीदरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. कापूस खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ ९०० किलो वजनाच्या ट्रकमध्ये १०० किलो वजनाची मातीची पिशवी ठेवून वजन केल्यास काट्यावर १००० किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती माती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते. त्यामुळे आधीच्या वजनातील फरकामुळे व्यापाऱ्याला जास्त कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला. मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशा प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यापारी बाजार समितीत परवानाधारक असल्यास त्याचा परवाना रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करून व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top