Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 09:37:24
Chakan, Maharashtra:अजित पवार चाकण सभा पॉईंटर - काही वर्षांनी चाकणची महानगरपालिका करावी लागणार आहे. ( अजित पवारांची पुन्हा एकदा घोषणा ) - आम्ही जाती-जातीत तेढ निर्माण करत नाही. शिव-शाहू-फुले- आंबेडकर विचारांवर चालणारे आहोत. त्यामुळं तुमचं बहुमूल्य मत आम्हाला द्या. ( जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर निशाणा ) - ज्याचं जळतं, त्याला कळतं. आपण पुणेचे, बाहेरच्यांना आपल्या समस्या कळणार नाहीत - मी पण पुणे जिल्ह्याचा अन तुम्ही पण पुणे जिल्ह्याचा. त्यामुळं मला आपल्या प्रश्नांची जाण आहे. आता बाहेरच्या जिल्ह्याचे येतील अन आम्ही हे करु, ते करु म्हणतील. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. - *बारामतीत कसली लाट, फक्त दादा...!* - बारामतीने मला 35 वर्षे निवडून दिलं, त्यामुळं तिथला कायापालट कसा झालाय. हे अख्खा देश पाहतोय. कसली लाट अन कसलं काय. फक्त दादा. तिथं फक्त घड्याळ दिसतं, म्हणून तिथं विकासाची गंगा वाहते. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
111
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 09:37:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ पैठणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा झाली, यावेळी पैठण हा शिवसेनेचा गड असल्याचा सांगत ही नगरपरिषद शिवसेना जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांचा इथं डिपॉझिट जप्त होईल असं म्हणत भाजपाला टोला लगावला... एकनाथ शिंदे यांचे पैठण येथील सभेतील भाषण... ही विधानसभेची निवडणुकीआ आहे की नगरपरिसदेचे (गर्दी पाहून विधान) एव्हढे लोक रस्त्यावर उतरले तर पुढच्याच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलो, वारकरी ज्या ओढीने पंढरपूरला जातो तसं मी पैठणला आलो एकीकडे एकनाथ सागर, दुसरीकडे नाथसागर, आणि समोर बसलेला जणसागर आहे. इथे सगळे माणसं, प्रेमामुळे आहे आहे, भाड्याने आणलेली माणसं नाही, दहशٽيमुळे आलेली माणसं नाही, ताई आज तुमचा विजय झालेला आहे आपल्याला धनुष्याबानासमोरील बटण दाबायचा आहे, मराठवाडा शिवसेना बालेकिल्ला आहे आणि पैठण तर आपला गड आहे त्यामुळे नगराध्यक्ष जर आपला झाला तर ट्रिपल इंजिन होईल उद्याच मतदान म्हणजे पैठणचा विकास घडवायचं मतदान आहे, इथे विरोधकांची शिजणार नाही डाळ...शिवसेना राष्ट्रावादी फोडणार विजयाची ढाल मला अनुभव आहे,ज्याच्यामागे महिला तो उमेदवार पहीला लाडक्या बहिणी उपस्थित आहे, मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून फिरलो, अनेक योजना आणल्या माझी सगळ्यात आवडती योजना म्हणजे लडकी बहीण योजना कोणीही मयिका लाल आलं तर लडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्ही विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी काय करता येईल तर लडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणींन या योजनापुरते मर्यादित ठरवणार नाही लखपती कराचा आहे मी शब्द दिला तर मागेच ठेवत नाही, मैने एकबार कमिटमेन्ट की तो मै खुदकी भी नही सुनता एकदा धनुष्यातून बाण गेला तर वापस येतं नाही, एका मुलीने पैसे नसल्याने आत्महत्या केली त्यावेळी माझ्या मनाला वेदना झाल्या त्यामुळे मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर सत्तेचा् काही उपयोग नाही त्यामुळे त्यांच्यासाठी योजना आणली किती पैसा कमावला हे नाहीतर किती माणसं कामावली हे माझ्यासाठी महत्वाचा आहे ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिला त्यांना निवडून आणण्यासाठी आज महाराष्ट्रात मी फिरत आहे काही लोक बोलत असतात त्यांच्याकडे बघू नका इलाखा किसीका भी होगा धमाका तो इनका होंगा इथे भुमरे मामाशिवाय काहीच चालत नाही, कोणीही टिव टिव करून फायदा नाही पैठण ने कधीही शिवसेनाची साथ सोडली नाहीय याचा अनुभव आणि अभिमान आहे.. लडकी बहीण यावेळी धनुष्यबाना च्या पाठीमागे उभं राहणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही ओळख माझ्यासाठी मोठी नाही मला सगल्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ मी तुम्हाला पाणी पुरवठा्यातून पाणी देणार, तुम्ही विरोधकांना पाणी पाजणार का? मुख्यमंत्री असताना किती लोक माझ्याकडे आले मी किती सह्या केल्या आस्तिल हे सुद्धा मला माहित नाही, आतापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्याचं रेकॉर्ड मोडलं असेल 3 डिसेंबर ला एकच आवाज घुमला पाहिजे तो म्हणजे भूम.... भूम.... भुमरे आम्ही उठाव केला तेव्हा तेव्हा सिरसाठ आणि भुमरे मामा माझ्यासोबत होते भुमरे मामानी जनतेचं प्रेम कामावला त्यामुळे हे लोक इथे आले आहे. भुमरे मामा भोळा माणूस आहे, मी त्यांना कधी कधी रागावतो मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि पुढेही करणार आहे... सगळ्यांनी उद्या धनुष्य बाण चिन्ह समोरील बटण दाबा
116
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 01, 2025 09:31:31
Nanded, Maharashtra:नांदेड मध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे तरुणाचा खून झाला. त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षम ताटे याच्या पार्थिव देहाची विवाह केला. एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेडला येऊन सक्षम ताटे त्याच्या कुटुंबियांची भेट घेत घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सक्षम ताटे याची जातीयवादातून क्रूरपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी जो एफआयआर केला , त्यात अनेक उनिवा आहेत. त्यामुळे फिर्यादी आणि साक्षीदार यांची जबाब घेऊन दुसरा विचार दाखल करण्यात यावा अशी मागणी सदावर्ते यांनी केली. घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धीरज کوलमवाड याने आरोपी हिमेश मामीडवार याला हत्येसाठी प्रवृत्त केले. तुझी बहीण लफडे करती , आणि त्याला मार नंतर पोलीस स्टेशनला ये असं पोलीस कर्मचारी धीरज कोमलवाड म्हणाला , त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे .. त्याला खून प्रकरणात आरोपी केल पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्त यांनी केली. हत्येच्या दिवशी अल्पवयीन आरोपी हिमेश मामीडवार याने आंचलला देखील धमकी दिली. त्याच्यावर देखील दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सक्षमचे आई-वडील आणि आंचल त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. या मागण्या मान्य झाल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे सदावर्ते म्हणाले. आंचल हीच धाडस आणि प्रेम पवित्र आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे. सक्षमचे आई-वडील आणि आँचलने मागणी केली तर , एडवोकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सरकारी वकील म्हणून खटला लढण्यास तयार आहेत , असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
37
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 01, 2025 09:08:08
Oros, Maharashtra:उद्याचा आशीर्वाद जनतेने आम्हाला द्यावा अशी विनंती सावंतवाडी करांना करण्यासाठी आज प्रचार रॅली काढली सावंतवाडी चा इतिहास राजकारणाच्या माध्यमातून घडलेला आहे आता पुढे घडावा त्यासाठीची संधी उद्या चालून आली आहे श्रद्धा ताईंना मतदान म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मतदान श्रद्धा ताईना मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण नारायण राणे यांना मतदान आम्हचे सगळे टीम निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी निधी कमी पडू देणार नाही जबाबदारी मी घेतो ही निवडणूक वैयक्तिक हेवेदावे दाखवण्याची नाही कोणी उनिधुनी काढण्याची निवडणूक नाही ज्या राजघराण्याने सावंतवाडीला सुंदर वाडी अशी ओळख निर्माण करून दिली त्याच राजकारणातील एक व्यक्ती तर मागत असेल राजकारण करण्याची वेळ नाही राजकारण करत असताना माणुसकी नजरेसमोर ठेवून काम केलं पाहिजे राजघराणे विकास करण्याची संधी मागते जोड आमची आहे सावंतवाडीचा विकास गतिमान पद्धतीने होईल दीपक केसरकर किती बोलले तरी त्यांचा आशीर्वाद श्रद्धा ताईंनाच आहे तीन तारीख चा गुलाल उधळण्यासाठी दीपक केसरकर आमच्या खांद्याला खांदा लावून असतील ऑन एकनाथ शिंदे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे शेवटची सही मुख्यमंत्र्यांचीच असते हे त्यांना माहित आहे कोणाला निधी द्यायचा कोणाची यादी नक्की करायची हे सगळे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सही ने होतात अजित दादा पवार एका भर सभेत बोलले होते मी अर्थमंत्री असलो निधी बाबतचे अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतात महाराष्ट्रात सबकुछ अगर देवा भाऊ असतील तर दुसऱ्यांना मतदान करण्याचा फायदा काय राज घराण्याने दीपक केसरकर यांना अनेक वेळा साथ दिली आहे याचा विचार दीपक भाईंनी करावा पुन्हा केव्हातरी ही दोन आणि üç तारीख येईल याचा देखील विचार करावा आणखी वेळ गेली नाही आज रात्री दीपक केसरकरांनी आमच्या उमेदवार श्रद्धा ताईंना पाठिंबा जाहीर करावा लँड माफिया म्हणजे कोण नाव घ्यावेत जो बाण आमच्याकडे येत नाही त्याचं उत्तर आम्ही का देऊ आमच्या देशात बाबासाहेबांचे संविधान चालतं नुसते आरोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात मोती तलावावरची केस आमच्या श्रद्धा ताई नगराध्यक्ष झाल्या तर त्या केस मध्ये मदत करणारच ना केसरकर साहेब नकारात्मक विचार का करायला लागले कळत नाही नेहमी श्रद्धा आणि सबुरी बोलणारे आमचे केसरकर साहेब व नाकावर ठेवून विसरकर साहेब अचानक राजकीय चष्म्यातून का बघायला लागले ज्य्या ज्या केसेस आहेत त्या सोडवण्याची ही संधी आहे दीपक केसरकरांसारखा अनुभवी माणूस असे चुकीचे बोट कसे ठेवू शकतो केसरकर साहेबांचं खरंच सावंतवाडी वर प्रेम असतं तर ही संधी सोन्यासारखी वाटली असती केसरकारांचा अंडरग्राउंड सपोर्ट आहे की नाही हे तुम्हाला उद्या समजेल दीपक केसरकर यांनी उद्या कमळासाठी मत मागितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको अंदर की बात शोधण्याचं काम तुमचं राजघराण्यातील व्यक्ती सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर बस्ती तेव्हा प्रश्न सुटतील सगळी पद आमच्याकडे आहेत खूप मोठी ताकत असताना कोणते प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत ही सुवर्णसंधी आहे सब जगा कमल ओन राने शिंदे भेट राजकारणा पलीकडे संबंध जोपासणारा आमचा महाराष्ट्र आहे तशीच कालची भेट होती कोण पैसे वाटत आहे असं केसरकर साहेब बोलत असतील तर त्यांनी ते पुरावे द्यावेत राज्य नियोगा आयोगाकडे पुरावे द्यावेत ऑन दीपक केसरकर एक माजी मंत्री स्थानिक आमदार पैसे वाटप होते हे स्वीकारतात ही गंभीर बाब आहे असंच…
77
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 09:07:40
32
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 01, 2025 09:06:50
Dharashiv, Maharashtra:ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार शासकीय लेखा परीक्षणातून उघड : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा आरोप धाराशिव मागील काळात धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, त्यांचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले आहेत., एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या दोनशे प्रकरणांत तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून याला काय प्रत्युत्तर मिळत हे पाहावे लागेल.
53
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 08:12:01
Pandharpur, Maharashtra:सांगोला नगरपालिका मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना धाड सत्र, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आरोप तर विरोधकांनी सुद्धा दिले जोरदार प्रत्युत्तर सांगोला नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. तर भाजप , शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. काल रात्री माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी निवडणूक भरारी पथक, LCB पथक यांनी तपासणी केली. यामुळे शहाजी बापू यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर आरोप केले आहेत. या दोघांचं हे कारस्थान असल्याचे ते म्हणतात. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी याला जोरदार उत्तर दिले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू माझ्यामुळे आमदार झाला तेव्हा मी चाललो. शहाजी बापूला आता वेड्याच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. त्यांचा लबाड बोलण्यात एक नंबर माणूस आहे. कांगावा करण्याची त्यांच्या जुनी सवय आहे. पराभव दिसत असल्याने ते अशी विधाने करून सहानुभूती मिळवत आहेत. आता सत्ता नाही टक्केवारीच राजकारण त्यांनी आमदार असताना केले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी पाटील यांच्यावर घर फोडण्याचा आरोप केला आहे. बंधू डॉ अनिकेत देशमुख याचे कान भरून गणपतराव देशमुख यांच्या नातवात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. धाड पडल्याचे सहानुभूती मिळवण्यासाठी ते वापर करत आहेत. सांगोला शहरात सर्वच राजकीय कार्यालयाची तपासणी झाली आहे. यात वेगळे काही नाही.
134
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 01, 2025 08:08:52
Nashik, Maharashtra:बिहार आणि कॅनडातुन कुरियरने पाठविला 'ट्रीपल तलाक' अँकर - शहरातील मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विवाहितेला तिच्या पतीने थेट बिहार आणि कॅनडामधून 'ट्रीपल तलाक'चे स्वहस्ताक्षरातील लेखी कागद कुरियरद्वारे पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या पतीसह सासु, सासऱ्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झाल्यानंतर २४ जानेवारी २०२२ ला विवाहितेचा मुस्लिम पद्धतीनुसार संशयित आरोपीसोबत विवाह (निकाह) झाला होता तेव्हापासून आजपर्यंत पीडितेचा पतीसह तिचे सासू-सासरे यांनी बिहार व कॅनडामध्ये शारिरिक-मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता माहेरच्यांकडून विवाहितेने पैसे आणून दिले नाही, म्हणून सासु-सासऱ्यांसह पतीने शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. तसेच लग्नात मिळालेले आठ तोळ्यांचे दागिनेदेखील बळजबरीने अंगावरुन काढून घेत हाकलून दिले. त्यानंतर पतीने लेखी स्वरुपात स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह ट्रीपल तलाकचे पत्र कुरियरद्वारे पत्र पाठविले. त्यानंतर पीडित महिलेने महिला सुरक्षा शाखेकडेही अर्ज केला होता. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यांतर्गत कलम ४ आणि भारतीय न्यायसंहिता कलम ८५ नुसार विवाहितेला कुरपणे वागविणे, तिचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलााय. बाईट -
197
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 01, 2025 07:18:48
Kalyan, Maharashtra:पत्निचा खून करून पतीची आत्महत्या डोंबिवली येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या पोलीस तपासात आरोपीची ओळख पटली; तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय Anc..डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एका ३९ वर्षीय पतीने आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर, स्वतः ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे घटन समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पोपट दिलीप दहिज असे आरोपी मयत पतीचे नाव असून २६ नोव्हेंबर रोजी त्याने घरात झालेल्या किरکوळ वादातून पत्नी ज्योती दहिज हिच्यावर धारदार Shस्त्राने हल्ला करत तिचा गळा दाबून तिची हत्या करत तिचा मृतदेह घरात ठेवून तो फरार झाला होता मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी हत्याचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीचा शोध सुरू केला होता याच दरम्यान पोलिसांना भांडुप रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीने ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीचा तपास करत माहिती मिळवली असता पत्नीचा हत्या करणारा तोच आरोपी पोपट असल्याची माहिती मिळाली आणि या हत्याचा गुन्ह्याचे उघड झाली सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे
90
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 07:15:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया. निवडणूक आयोग रेड. चौकशी होईल त्यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही. फडणवीस भेट. मी अगोदर आलो होतो मुख्यमंत्री नंतर आले, पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत... फोनवर आमची चर्चा होत असते. आमची चर्चा रोज चालू असते. महायुती आरोप प्रत्यारोप. आरोप प्रत्यारोप मी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. डेव्हलपमेंट वर आमचा प्रचार सुरू आहे. निवडणुका स्थगिती. निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाही पण यावेळेस निवडणुका थांबवल्या गेल्या त्यावर मी माहिती देतो. संजय राऊत 35 आमदार फुटणार. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नावर हात जोडले आणि हसले, त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया दिली.
187
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 01, 2025 07:00:50
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में कल चुनाव: 9 नगर परिषद और 1 नगर पंचायत के लिए मतदान. जिल्ह्यात उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 9 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. मतदान असलेल्या नगर परिषद, पंचायत क्षेत्रात मतदान कर्मचारी सुरक्षा दले आणि क्षेत्रीय अधिकारी यांची तैनाती सुरू झाली आहे. विविध वाहनांच्या माध्यमातून पथके पोचविली जाणार असुन प्रत्यक्ष मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलली आहे. घुग्गुस येथे आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
249
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 01, 2025 06:47:43
Akola, Maharashtra:अकोट नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अकोट शहरात तणाव वाढवणारी घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 15 ‘अ’च्या एमआयएम पक्षाच्या अधिकृत उमेदवार उज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे यांच्यावर कालवाडी रोडवरील रामनारायण फार्मजवळ अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी पाठीमागून हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत राजेश तेलगोटे यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना निवडणूक प्रचार चूरशीला पोहोचलेल्या काळात घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. सुरक्षा वाढविण्यात आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या घटनेमुळे प्रभाग 15 ‘अ’ मध्ये तणावाचे वातावरण असून एमआयएमच्या प्रचारावरही याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हा एक राजकीय हल्ला असल्याचा एमआयएम ने शक्यता वर्तविली आहे.
125
comment0
Report
Advertisement
Back to top