icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भीमाशंकर मंदिर 15 जून तक बंद, भक्तों को दर्शन नहीं मिलेगा

Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचा विकास आराखड्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करता, आता हे मंदिर आगामी १५ जूनपर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सुरुवातीला ९ जानेवारी ते ९ एप्रिल आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काम अद्याप प्रलंबित असल्याने आता तिसऱ्यांदा या मुदतवाढीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनाविनाच माघारी फिरावे लागत आहे. याचा थेट फटका स्थानिक आदिवासी बांधव आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या रोजगाराला बसलाय. आगामी पावसाळ्यात भीमाशंकर परिसरात होणारी प्रचंड अतिवृष्टी पाहता कामाचा वेग आणि मंदिराची दारे भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने कधी खुली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच मंदिर परिसरातून एक्सक्लिजीव आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

FDA ने वर्धा के गोसंवर्धन गोरस भंडार पर दबिश देकर नमूने जप्त

Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या गोसंवर्धन गोरस भंडारावर FDA ची धडक कारवाई; तूप व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने जप्त अँकर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने वर्धा येथील गोसंवर्धन गोरस भंडारवर धडक कारवाई करत तूप व इतर दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधीयुक्त वातावरण व अस्वास्थ्यकारक परिस्थिती आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तुपाचा साठा दीर्घकाळ ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले. साठवलेल्या तुपाच्या गुणवत्तेबाबत तसेच त्यातून येणाऱ्या तीव्र वासाबाबतही तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या काही उत्पादनांवर उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक व इतर आवश्यक माहिती नमूद करण्यात त्रुटी आढळल्याची नोंद केली आहे. याशिवाय गोरसपाक व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीत वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित संस्थेवर यापूर्वीही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. 2020 मध्ये FDA च्या तपासणीनंतर नियमभंग प्रकरणी संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. दूध, तूप, खवा, पेढे व गोरसपाक यांसारखे पदार्थ थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. FDA कडून जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात FDA आयुक्त यांनी सांगितले की, “शुद्ध अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
0
0
Report
Advertisement

संगमेश्वर बसस्टैण्ड में स्वच्छता सुधार: मंत्री ने निरीक्षण किया

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर - रत्नागिरी.. परिवहन मंत्र्यांची अचानक भेट.. एंकर एसटी बसस्थानक म्हटलं की डोळ्यांसमोर येणारं अस्वच्छतेचं चित्र बदलत असल्याचा सुखद प्रत्यय नुकताच रत्नागिरीतील संगमेश्वर बसस्थानकात आला.. कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी रात्री अचानक संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली.. न्वयने उभारलेल्या या आधुनिक बसस्थानकातील स्वच्छता आणि सुविधांची पाहणी केली प्रवाशांशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाने उपस्थित सर्वसामान्यांची मने जिंकली असून,ही भेट एसटीच्या बदलत्या आणि सुधारेलल्या चेहऱ्याची साक्ष देणारी ठरली आहे..
0
0
Report

मालेगांव में नार-पर नदी जोड़ प्रकल्प की किसानों ने निरीक्षण के बाद संतोष जताया

Nashik, Maharashtra:- शेकडो शेतकरी यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत केली नार पार नदी जोड प्रकल्पाची पाहणी... - गेल्या 40 वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या प्रकल्पाला प्रत्यक्षात मालेगाव तालुक्यातून सुरुवात.. - कसमादे पट्ट्यासह, उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारा हा नदी जोड प्रकल्प.. नार- पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी एकत्र करून ते गिरणा खोऱ्यात सोडून नार पार नदी जोड प्रकल्प ही गेल्या 40 ते 45 वर्षाची मागणी होती. तेव्हा मंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्यातून या कामाची वर्क ऑर्डर निघाली. त्याचाच एक भाग म्हणून मोसम साळ कालव्याचे मातीचे काम मालेगाव तालुक्यातील तळवाडे, अजंग येथून एक महिन्या पासून सुरू झाले. आज परिसरातील शेकडो शेतकरी यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित त्याची पाहणी केली. प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
0
0
Report

चिमाजी आप्पा की विजय का प्रतीक: पंढरपुर के विठ्ठल मंदिर में प्राचीन भारी घंटा स्थापित

Pandharpur, Maharashtra:थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पांनी वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची साक्ष म्हणून श्रीमंत चिमाजी आप्पांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला एक भव्य घंटा अर्पण केली होती. सदर घंटा आजही मंदिरात पाहायला मिळते. इ.स. १७३९ मध्ये पेशवा थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला जिंकला. हा मराठा साम्राज्यातील अत्यंत अभिमानास्पद आणि कठीण विजय मानला जातो. या विजयानंतर चिमाजी आप्पांनी तेथील पोर्तुगीज चर्चमधील मोठ्या आणि सुबक घंटा उतरवून घेतल्या. युद्धात मिळाल्या या घंटा चिमाजी आप्पांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रमुख मंदिरांना भेट म्हणून दिल्या. त्यापैकीच एक मोठी आणि वजनदार घंटा त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला अर्पण केली. सदर घंटेचे वैशिष्ट्य म्हणजे या घंटा युरोपियन बनावटीच्या असून, त्या तयार करण्यासाठी काही धातूंचे मिश्रण वापरले गेले आहे, ज्यामुळे त्यांचा आवाज अत्यंत गंभीर आणि ऐकण्याजोगा येतो. या घंटांवर अनेकदा युरोपियन किंवा ख्रिश्चन धार्मिक चिन्हे कोरलेली असायची. मराठ्यांनी त्या घंटा मंदिरांमध्ये बसवताना अनेक ठिकाणी त्यावर हिंदू धार्मिक चिन्हे किंवा स्वस्तिक कोरून घेतले. चिमाजी आप्पांनी केवळ पंढरपूरलाच नव्हे, तर वाईचे गणपती मंदिर, भीमाशंकर मंदिर, महाडचे विरेश्वर मंदिर, आणि नाशिकचे काळाराम मंदिर येथेही अशाच पोर्तुगीज घंटा अर्पण केल्या होत्या, ज्या आजही तिथे पाहायला मिळतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ही ऐतिहासिक घंटा आजही चिमाजी आप्पांच्या शौर्याची आणि विठ्ठलभक्तीची आठवण म्हणून जतन करून ठेवण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

रेलवे मैदान पर मिट्टी डालने के निर्णय के विरोध में खिलाड़ियों और नगरसेवकों ने मैदान रोक दिया

Kalyan, Maharashtra:डोंबिवली रेलवे मैदान पर अचानक रेलवे प्रशासन ने मिट्टी डालकर काम शुरू कर दिया। इससे खेलाडियों को इस मैदान में खेलना कैसे संभव होगा, यह सवाल उठ खड़ा हुआ। दौरान खिलाड़ियों और शिवसेना विधायक राजेश मोरे, भाजपा जिलाध्यक्ष दीपेश म्हात्रे और सभी दलों के नगरसेवकों ने पदाधिकारी एकत्र आकर आज रेलवे के इस काम को रोक दिया। रेलवे के इस मैदान से अजिंक्य रहाणे, निलेश कुलकर्णी जैसे खिलाड़ी उभरकर सामने आए हैं। अब रेलवे प्रशासन यह कहकर मैदान को अपना कह रहा है कि यहां मिट्टी भराव डालकर काम हो रहा है, जिससे खिलाड़ियों के लिए मैदान नहीं है, इसलिए यह काम नहीं होने देंगे—यह संयुक्त निर्णय लिया गया है। यह जगह रेलवे ने भले उनकी मानी हो, पर स्थानीय भूमि पुत्रों ने रेलवे को किराए पर दी है, इसलिए यह मैदान खिलाड़ियों के लिए ही रहेगा। साथ ही आने वाले कुछ दिनों में भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान, सांसद श्रीकांत शिंदे रेलवे के DRM के साथ बैठक कर समाधान निकालेंगे। यदि रेलवे प्रशासन ने सुना नहीं तो जन आंदोलन किया जाएगा—यह चेतावनी शिवसेना विधायक राजेश मोरे और दीपेश म्हात्रे ने दी है।
0
0
Report

मनोज जरांगे के उपोषण पर सरकार को चेतावनी, नहीं मानी तो आंदोलन फिर भड़केगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उपोषण अवघ्या 15 तासात सुटले मात्र कठोर उन्हातान्हात उपोषण होते हे पण लक्षात घ्या असे मनोज जरांगे म्हणाले, तर सरकार फसवले मात्र लक्ष ठेवून काम करून घ्यावे लागते आता ही सरकारला वेळ दिली आहे आणि फसवले तर पून्हा भडका उडेल हे ही सरकारला महिती असल्याचे मनोज जरांगे म्हणाले, आणि मागण्या मान्य केलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा भडका उडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला सोबतच धनंजय मुंडे आमच्या समाजाचे आमचे जिवावर उठला आहे त्यामुळे त्याची आणि माझी नारको टेस्ट करावी धनंजय मुंडे ची सगळीच पाप उघड होतील असेही मरोज जरांगे म्हणाले एकूणच उपोषण आणि इतर सर्व विषयांवर मनोज जरंगे यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी केलेली बातचीत पाहुयात..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में कड़ाके की ठंड और असमय बारिश से आम-काजू की फसलों को नुकसान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी कडाक्याची थंडी व अवेळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान.. रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी कडाक्याची थंडी व अवेळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त आंबा, काजू पिकाचे पंचनामे करण्याचं काम गेला दीड महिना सुरू होतं. आतापर्यंत जिल्ह्यातील ५६ हजार ४२० शेतकऱ्यांचे ४८ हजार ७९१.८८ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे स्पष्ट झालं आहे. ८५ टक्के पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप १५ टक्के पंचनामे शिल्लक आहेत. बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे अपूर्ण आहेत. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top