Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Oct 18, 2025 11:13:26
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 18, 2025 11:12:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय झाली आहे.रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना घेऊन जाताना रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर बनत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.कुपवाड शहरातल्या बामणोली येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. एक तरुण कामावर जात असताना चक्कर येऊन पडला त्यानंतर संबंधितांनी 108 रुग्णवाहिकाला याची माहिती दिल्यानंतर अर्ध्या तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली,त्यानंतर संबंधित रुग्णाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्या.मात्र या दरम्यान रुग्णाची प्रकृती ही आणखी गंभीर बनले.कारण 108 रुग्णवाहिका मधील ऑक्सीजन मशीन बंद तसेच प्रथमोपचाराचे सर्व साहित्य नादुरुस्त अवस्थेत असल्याना हा प्रकार घडल्याचा आरोप संबंधित नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वी 108 रुग्णवाहिकांच्या तत्परता आणि सुविधांबद्दल तक्रारी व प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत,त्यामुळे प्रशासन याच्याकडे गंभीरपूर्वक लक्ष देणार आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 18, 2025 11:06:48
Pandharpur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर ओबीसी मराठा आणि सर्व समाजाचा विश्वास आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोण टार्गेट करत आहे. कोण काय म्हणत याला महत्व नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भुजबळ यांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व समाजाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. सातत्याने तशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे यावर अनेक नेते प्रतिक्रिया देत असतात त्यांच्या बद्दल बोलले पाहिजे असे नाही. देवेंद्र फडणवीस सर्व संकटाना परतवून लावण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना कोण टार्गेट करत आहे असे भुजबळ म्हणाले असतील तर ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्यामुळे त्यांनी याची फार चिंता करण्याची आवश्यकत नाही. असे जयकुमार गोरे यांनी सुचवले आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 18, 2025 11:01:35
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 18, 2025 11:01:20
Chendhare, Alibag, Maharashtra:मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी. दिवाळीच्या तोंडावर चाकरमान्यांचा खोळंबा. सात ते आठ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा. आज सकाळपासून पुणे लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रिजपासून ते खोपोली एक्सिटपर्यंत सात ते आठ किमी लांब रांगा लागल्या आहेत. एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहने खोपोलीतुन मुंबई पुणे जुना महामार्गाने बोरघाटातून लोणावळा कडे जात आहेत. त्यामुळे दस्तुरी आणि अंडा पॉइंट जवळही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सलग सुट्टी आल्याने अनेकजण गावाकडे चालले आहेत तर काही हौसी पर्यटक हे लोणावळा-खंडाळा येथे फिरायला आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत; या वाहतूक कोंडाचा नाहक त्रासvehicle चालक, पर्यटक यांना सहन करावा लागतो आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 18, 2025 10:54:00
Pandharpur, Maharashtra:शिवसेना पक्ष सोडलेले माढा तालुक्यातील मातब्बर नेते प्रा शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेत दखल घेतली जात नसल्याने उप मुख्यमंत्री शिंदे यांची साथ सोडली. भाजपच्या प्रमुख नेते मंडळींशी भाजप प्रवेशासाठी काही वेळा चर्चा केल्या, भेटी घेतल्या. त्यांचे मागून माढा मधील माजी आमदार पुत्र रणजीत शिंदे आणि विक्रम शिंदे यांना भाजपने प्रवेशासाठी पायघड्या घातल्या आहेत. यामुळे प्रा. शिवाजीराव सावंत नाराज झाले आहेत. जर येत्या काळात लवकर भाजपा कडून सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर इतर पक्षाचे पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केले आहे. यानंतर तरी भाजप सावंत यांच्या नाराजीची दखल घेऊन त्यांना ग्रीन सिग्नल देणार की नाही हे आता आगामी काळात समजेल
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 18, 2025 10:50:32
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 18, 2025 10:50:14
Mumbai, Maharashtra:दिवाळी सणा निमित्त मुंबईतून अनेक जण आपल्या गावी जात असतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत असते यावर्षी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांना जाण्यासाठी प्रशासनाने चांगली तयारी केली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस च्या बाहेर मोठे तंबू लावण्यात आले आहे त्याचबरोबर प्रवाशांसाठी इतर सुविधा देण्यात आल्या आहेत प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये म्हणून ही रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांच्या रांगा वेगळ्या तसेच जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांच्या रांगा वेगवेगळ्या आहेत.त्यामुळे प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यावर बसण्याची झुंबड उडत नाही आर पी एफ चे अधिकारी कर्मचारी रांगेतच प्रवाश्यांना सोडतात.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधींनी मनोज कुळकर्णी यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 18, 2025 10:50:05
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 18, 2025 10:03:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : महाराष्ट्रात मतदार यादीत बोगस नाव असल्याचा, दुबार नाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत निवडणुकांची पुढे ढकलण्याची मागणी केली ,विरोधकांच्याकडून आरोप होत असताना आता सत्ताधारी सुद्धा या मतदार यादीतील दुबार नावा विरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र आहे, बुलढाणा छत्रपती संभाजीनगर ,मुंबई सगळीकडेच निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करण्याची मागणी होतेय... मतदार यादीतील घोळ बाबत विरोधकांसह सत्ताधाऱ्य आक्रमक मतदार यादीतील घोळ असल्याचा आरोप करत आहे , बुलढाण्यात शिंदें गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार यादीत एक लाख दुबार नाव असल्याचा आरोप केला आहे यातील काही नाव बोगस आहे मृत लोकांचीही आहे ही नाव हटवण्याची मागणी केली आहे तर बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी या आरोपाची री ओढत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असल्याची माहिती दिली आहे आणि लवकरच ही नाव काढावी अशी त्यांची मागणी आहे.. छत्रपती संभाजीनगर मध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात 36000 बोगस नाव असल्याचा आरोप केलेला आहे ही नाव तातडीने काढण्याची मागणी त्यांनी केली आहे तर छत्रपती संभाजीनगर मधीलच अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ म्हणजे सिल्लोड तालुक्यातही बोगस मतदार असल्याची तक्रार भाजपचा तालुकाध्यक्ष कमलेश कटारिया यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे आणि ही नावे वगळण्याची त्यांची मागणी आहे.. बेलापूर भाजपाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा मतदार यादीच्या घोळावरण टीका केली आहे अनेक वर्षांपासून तक्रार करूनही ही नाव वगळण्यात येत नसल्याचा आरोप त्यांचा आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला यावरून टोला लावलाय, हा प्रकार सगळीकडेच आहे सत्ताधाऱ्यांच्याही लक्षात येत आहे मात्र निवडणूक आयोग या टाळाटाळ करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मतदार याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा करत आहेत मात्र आता सत्ताधारी आमदार कडूनच मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे पुढे येत आहे त्यामुळे राज्य सरकार आता विरोधकांमुळे तर कोंडीत अडकली आहे सोबतच सत्तेतील सहका-या मुळे ही त्यांच्या अडचणी वाढल्या आहे असं चित्र दिसतंय
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 18, 2025 10:02:07
Washim, Maharashtra:अँकर: सकारात्मकता और प्रकाशाचे पर्व असणारा दिवाळी सणाला सुरुवात झाली असून वाशीम शहरातील फटाका बाजार विविध रंगीबेरंगी आणि आकर्षक फटाक्यांनी सजला आहे. मात्र, यंदा बाजारात ग्राहकांची गर्दी तुलनेने कमी दिसत असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीसोबतच फटाक्यांच्या दरवाढीमुळे विक्रीत घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 'गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याच्र दिसून येत आहे. दरवर्षी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळत असते; परंतु यंदा दिवाळी जवळ आली असली तरी मंदीचा परिणाम फटाका बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे. बाजारात काही नवीन आणि आकर्षक फटाके दाखल झाले असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका मिळत नाही. संपुर्ण बाजार सजलेला असला तरी विक्रीच्या अभावामुळे व्यापाऱ्यांचा दिवाळीचा उत्साह काहीसा फिका पडलेला दिसत आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 18, 2025 09:56:39
Latur, Maharashtra:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातून टीका होत असतानाच, त्यांच्या पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी सहकार मंत्र्यांची पाठराखण केली आहे. बाबासाहेब पाटील यांना सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेज दिलं आहे. त्यामुळेच ‘बँका म्हणजेच सरकार असं त्यांनी म्हटलं असावं. ते सरकारमधील मंत्री आहेत म्हणून त्यांनी ते विधान केलं असावं असं स्पष्टीकरण देत त्यांनी सहकार मंत्र्यांचा बचाव केला आहे. त्यामुळे आता अजित दादांच्या राष्ट्रवादीत एखाद्या आमदाराने किंवा मंत्र्याने वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचीच पाठराखण होत असल्याचं चित्र दिसत आहे.
1
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 18, 2025 09:48:37
Mumbai, Maharashtra:पोलिस परिमंडळ सात च्या अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशींवर कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने दहा बांग्लादेशींना अटक केली आहे. या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे यांना घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाच बांगलादेशी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी या ठिकाणी छापा टाकून या रिनी शेख, शुकरण मुल्ला जुई खान, नुसरत जहान शेख, अरीफुल इस्लाम यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण बांग्लादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. तसेच त्यांच्या आणखी नातेवाईक नवी मुंबई परिसरात असल्याची माहिती त्यांनी दिली. या माहितीच्या आधारे पैरी सरदर, जरीना मुल्ला, राकीब मुल्ला, जाहानारा शेख, इकबाल शेख या पाच जणांना या पथकाने अटक केली आहे. हे सर्व बांग्लादेश मधून गैर मार्गाने भारतात घुसखोरी करून मुंबईत आले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून आता त्यांना पुन्हा बांगलादेश ला पाठविण्यात येणार आहे. आता पर्यंत या पथकाने मागील काही महिन्यात अश्या प्रकारे १०० पेक्षा जास्त अनधिकृत बांगलादेशींवर कारवाई केली असल्याची माहिती या पथकाचे प्रमुखपोलीस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे यांनी दिली आहे.
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 18, 2025 09:48:13
Pandharpur, Maharashtra:ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे ठाकरे शिवसेनेने कडून विधानसभा लढलेल्या माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या भेटीला. आगामी काळात अनेक राजकीय फटाके फुटणार. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता बाकी. सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप प्रवेशासाठी मुंबईत भेट घेतली. यानंतर सांगोल्यातील माजी आमदार दीपक आबा साळुंखे सुद्धा भाजप प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यासाठीच गोरे यांनी साळुंखे यांची भेट घेतली. आज सांगोला येथे दोघांची भेट झाली. बंद दरवाजाआड एक तास चर्चा झाली. यातून आगामी निवडणुकात साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांना कसं सामावले जाणार, त्यांना मान सन्मान कसा दिला जाणार याची हमी मिळाल्यानंतर साळुंखे सुद्धा भाजपा मध्ये जातील. त्यामुळे पालकमत्र्यांनी दिवाळीत राजकीय फटाके फोडण्याची तयारी सुरू केली आहे.
4
comment0
Report
Advertisement
Back to top