icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Nashik Legislative Council election: Mahayuti campaigns for Darade led by Samir Bhujbal

Yeola, Maharashtra:नाशिक विधानपरिषद निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे उमेदवारी करत आहेत. गीतांचे बंड शांत झाले असले तरी कोणताही धोका नको म्हणून आमदार दराडे बंधू तर्फे मोर्चे बांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने महायुतीच्या नगरसेवकांची मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाचे बैठक बोलावण्यात आली होती. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी समीर भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडून गेली. येवल्याच्या राजकारणात भुजबळ व दराडे यांचे शीत युद्ध हे सर्वांना परिचित आहे मात्र राजकारणात काहीही घडू शकते का? येवल्यात पाहायला मिळाले. समीर भुजबळ यांनी आम्ही महायुتيचा धर्म पाळणार असून नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
0
0
Report

ठेकेदारों के बकाए दो वर्षों से अदा नहीं: महाअधिवेशन में चेतावनी

Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडले. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांत पूर्ण झालेल्या कामांची देयके अद्यापही ठेकेदारांना मिळालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यभरात सुमारे 80 ते 90 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण होऊनही त्यांचे पैसे थकीत असल्याने ठेकेदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही शासनाने याची दखल घेतलेली नसल्याने पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्यातील चार लाखांहून अधिक ठेकेदार विविध शासकीय विभागांची कामे करत आहेत. ही कामे करण्यासाठी अनेकांनी महागडी यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साधनसामग्री कर्जावर घेतली आहे. मात्र, कामांची बिले वेळेत न मिळाल्याने कर्जफेड करणे कठीण झाले असून अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे महासंघाने सांगितले. राज्य शासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अशी प्रमुख मागणी या अधिवेशनातून करण्यात आली. तसेच शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यभरातील ठेकेदारांचा वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
0
Report

सातारा-सांगली विधानपरिषद चुनाव में नया ट्विस्ट: बीजेपी सांसदों को अज्ञात जगह भेजने की तैयारी

Satara, Maharashtra:साताऱ्यातील विधानपरिषद निवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. साताऱ्यातील भाजपचे सर्व सदस्य अज्ञात स्थळी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. या सदस्यांना भेटायसाठी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे स्वतः आज साताऱ्यातील शेंद्रे येथे उपस्थित झाले होते. एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणतीही जोखीम घेण्यास भाजप तयार नसण्याचा चित्र आपल्याला मिळत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत होते त्यामुळेच भाजपने स्वतः कोणती जोखीम न उचलेता स्वतःचे सदस्य अज्ञात स्थळी पाठवत असल्याची तयारी सुरू केली आहे. साताऱ्यातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
0
Report
Advertisement

शिरूर के चांडोह में जापान केसरी बैलगाडा रेस धमाकेदार, भीड़ ने मचाई धमाल

Shirur, Maharashtra:शिरूरच्या चांडोहमध्ये 'जपान केसरी' बैलगाडा शर्यतीचा थरार; पाहा कडक नियोजन आणि तोबा गर्दी! अँकर: शिरूर तालुक्यातील चांडोह येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य 'जपान केसरी ट्वेंटी-ट्वेंटी' बैलगाडा शर्यतीचा कडक थरार पाहायला मिळाला! लाखो रुपयांची बक्षिसे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे या मैदानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील दिग्गज बैलगाडा मालकांनी यात मानाचा तुरा रोवण्यासाठी आपला दम दाखवला, तर हजारो शर्यतप्रेमींनी मैदानात तोबा गर्दी करत या चित्तथरारक शर्यतीचा आनंद लुटला. वारेमाप उत्साह आणि बैलांचा वेग... हेच या 'जपान केसरी'चे सर्वात मोठे आकर्षण ठरले! याचे ड्रोन एक्सक्लिझीव व्हिडिओ आपण झी24तास वरती पाहत आहात. झी मिडीया शिरूर पुणे...
0
0
Report

सातारा-सांगली विधानपरिषद चुनाव: भाजपा नेताओं की संयुक्त यात्रा की तैयारी तेज

Satara, Maharashtra:सातारा - सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना एकत्र पर्यटना साठी जाणार आहेत पण मी त्याची माहिती घेती नाही. आमची कोवर कमिटीची बैठक काल झाली त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली या बैठकीत जो होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील. सदस्यांचा मत काय आहे हे समजून घेतलं तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर पुढचे धोरण ठरेल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकी ला मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते याबाबत विचारले असता. पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुंकिंवेळी मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचे दोन्ही मंत्री यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळी तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हाला ही विचार करावा लागणार ना? असं सांगत आपली खदखद व्यक्त केली आहे. आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे.
0
0
Report

नितेश राणे के नेतृत्व में स्कूल प्रवेशोत्सव: पूरे राज्य में शिक्षा उमंग जगाने

Oras Bk., Maharashtra:शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी राज्य शासनातर्फे शाळा प्रवेशोत्सव अनुषंगाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जातेय. संपूर्ण राज्यभर सुरू असलेले अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कणकवली येथील कलमठ जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे मंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शासकीय दृष्टिकोनातून एक क्रांतिकारी कार्यक्रम हाती घेतलाय. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचा आजचा महत्वाचा दिवस आहे. शाळा आणि शिक्षणाच महत्व वाढावं यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. त्यासोबत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ नये. यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर-गॅझेट 100% लागू कराने के लिए मनोज जरांगे पाटील का बड़ा दावा

Kolhapur, Maharashtra:आज आई अंबाबाईचे दर्शन घेतलं, सरकारला सद्बुद्धी देऊ दे असं साकडं घातलं शेतकरी संकटात आहे पाऊस लवकर पडू दे यासाठीही अंबाबाई चरणी प्रार्थना केली हा विषय आपण आधीपासूनच घेतलाय, हैदराबाद गॅझेट झालं आता सातारा गॅझेटचा विचार सुरू आहे हळूहळू सगळ्यात गॅझेटचा विचार होणार.. काही संकट अडचणी येतात, काही लोक आडवं पडणारी असतात मात्र जिथे मिळतं तिथेच जाऊया पण जरा दमान टप्प्याने जाऊया कोल्हापूर आपली राजगादी आहे आपण कधीच विसरत नसतो, मी असं कधीच होऊ देणार नाही, खासदार शाहू महाराज साहेबांनी हाक द्यावी आणि आम्ही उभ राहावं उपोषण संपल्या संपल्या लगेच महाराज साहेबांना भेटायला आलो आता सातारा गॅझेट घेत आहेत, कोल्हापूर बाबत पण अभ्यास सुरू आहे खासदार शाहू महाराजांशी चर्चा करून त्यांच काय म्हणणं आहे हे सरकारला सांगू याआधी सरकार आम्हाला नक्कीच फसवत गेलं मात्र आता थोडासा विश्वास बसला आहे, सरकारने आतापर्यंत शासन निर्णय, 58 लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे... बळी केलेल्या कुटुुुुुुुुुुुुुुुुुुं… (हिंडोळा) आंदोलनातील गुन्हा मागे घेतले यामुळे थोडासा विश्वास बसला आहे विश्वास ठेवणं आमची जबाबदारी याचा अर्थ असा नाही वाटोळं केलं तरी शांत बसेल एखादी गोष्ट दिली तरी आभार मानणाऱ्यातला मी नाही, फसवलं तर सोडणार सुद्धा नाही, तुम्ही दगा फटका केला तर आंदोलन करण्याऐवजी आम्ही 2029 ची तयारी करू, आम्ही 100 टक्के पाडू प्रत्येक वेळेस आपल्यावर अन्याय होतो ज्यावेळी अन्याय लोकांच्या लक्षात येतो, अंबाबाई मंदिरात ही भाविकांनी कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी केली ही वेदना आहे कोल्हापूरसह हैदराबाद सातारा गॅझेट 100% लागू होणार फक्त लोकांनी एकजूट राहावे मुख्यमंत्री फडणवीस माझी वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय करणार आहेत, तुम्ही माझ्यावर आरोप करताय मात्र तुम्ही लोकांना काय दिलं असा माझा विरोधकांना सवाल आहे आपलेच असून माझ्यावर टीका करणार असाल तर लाज वाटते माझ्या समाजाचा तुम्हाला म्हणण्याची यश येईल का नाही माहित नाही मात्र लढत राहिले पाहिजे अशी माझी भूमिका माझ्या विरोधात कितीही टीका केली तर मी थांबणार नाही समाजातील मुलांना अधिकारी झालेलं मला पहायचं आहे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे असं छक्के पंजे तुम्ही करू नका मी तुमच्या हाताला कधीच लागणार नाही, तुमचा कधी न होणारा देव्हारा होईल, तुमचं न होणार वाटोळ माझ्या हातून होईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नये राधाकृष्ण विखे पाटील आमदार लाड यांच्या माध्यमातून जी गरिबांची काम करत आहेत ती करावी, यामागे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी केली पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी करावे आमचं आणि मुख्यमंत्र्यांचे वैर नाही आहे, मराठा समाजाशी वैर म्हणून वागू नये, आई अंबाबाईच्या पावित्र्य भूमीतून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आमचं तुमचं वैर नाही, मराठ्यांवर अन्याय करून वैर घेऊ नका आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्यांचा रोष भयानक अवघड असणार आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं चांगलं काम करा राजकारणाची आम्हाला गरज नाही, मराठ्यांपुढे सरकारच्या शहाणपण चालत नाही
0
0
Report

समीर भुजबळ की मौजूदगी में नाशिक के स्कूल प्रवेशोत्सव में शानदार स्वागत

Yeola, Maharashtra:शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026 - 2027 या वर्षाकरिता शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा राज्यभरात साजरा होत असताना नाशिकच्या येवल्यातील अंदरसुल या ठिकाणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माझे खासदार समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पा देऊन त्यांचे स्वागत केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेतून प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी विद्यार्थ्यांना फेटे बांधून शाळेमध्ये वाजत गाजत करण्यात आले या अनोख्या प्रवेश सोहळ्यामुळे विद्यार्थी देखील भारावून गेले होते
0
0
Report

सरकार कहे बिना पेराई न करें किसान, रवि राणा ने खेत में नागरणी की

Amravati, Maharashtra:सरकार कहे बिना पेराई न करें किसान; आमदार रवि राणा यांनी स्वतः ट्रॅक्टरी चालवत शेतात नागरणी केली. अँकर :- जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटून गेला तरी अमरावती जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या कोळंबल्या आहे मात्र समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नये असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतीची मशागत करत शेतात नागरणी करत संपूर्ण शेत पेरणीसाठी तयार केलं. यावर्षी पाऊस उशिरा येणार आहे त्यामुळे सरकार सांगत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी आपल शेत संपूर्णपणे नागरणी करून तयार ठेवाव आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीच संकट शेतकाऱ्यावर ओढवू शकते अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में आज स्कूल खुले, पहली कक्षा के विद्यार्थियों का बैलगाड़ी से स्वागत

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडी मधून मिरवणूक.... AC ---- लातूर जिल्ह्यात आज सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावात जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा या शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून बैलगाडीमध्ये गावात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यास आल्याचे केंद्रप्रमुख पांडुरंग मस्के यांनी सांगितले. या केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले....
0
0
Report

सिंधुदुर्ग में आठवड़ी बाजार का उद्घाटन, कोकणी व्यंजनों का स्वाद लोगों के लिए खुला

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग वासियांना आता अस्सल कोकणी मेव्याची चव चाखता येणार आहे. सिंधुनुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आलेय. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. मंत्री नितेश राणे यांनी आठवडी बाजाराची पाहणी करत काही पदार्थ देखील चाखले. या बाजारात मिळणाऱ्या सर्वच गोष्टी ह्या आरोग्यदायी असतात. आणि ह्या आठवड़ी बाजारामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण अर्थ कारण वाढेल. आणि जिल्ह्याच दरडोई उत्पन्न वाढण्यास हातभार लाभेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
0
0
Report

मोदी-नड्डा के बयान से प्रादेशिक पार्टियों पर दबाव, अयोध्या दान घोटाले पर भी बहस

Nagpur, Maharashtra:प्रादेशिक पक्ष - भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी और पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे प्रादेशिक पक्ष संपविण्याचे काम करत आहेत. जनभावनांकडे दुर्लक्ष करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार दबाव और भीती दाखवून प्रादेशिक पक्ष फोडण्याचे काम करत आहे. मोदी सरकार लोकशाही मानत नाही, त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे. अयोध्या मंदिर दान घोटाळा - राम मंदिरासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. नागरिकांनी त्या समितीवर आरोप केले आहेत. भाजप सरकारला दिलेल्या पैशांचा हिशोब आम्हाला मिळालेला नाही. धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो राजकीय कामांसाठी खर्च केला जात आहे. अखिलेश यादव यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे. मोहन भागवत - मोहन भागवत यांना पाकिस्तानबद्दल प्रेम निर्माण झाले आहे, तर नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे. ज्या देशांमध्ये भारताचा अपमान कला जातो, त्या देशांबद्दल या लोकांना प्रेम वाटते. नरेंद्र मोदी त्यांचे आभार मानतात, तर मोहन भागवत शत्रूराष्ट्रांसोबत जवळीक साधत आहेत.
0
0
Report
Advertisement

शिवसेना में फूट और भाजपा-त्रिण्मूल के बीच घमासान, सांसदों की बैठक का नतीजा

Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन खासदार आमच्या पक्षात बैठकीत काय सुरू आहे. यावर उगाच अफवा पसरवण योग्य नाही. शिवसेना खासदारांची काल मातोश्रीवर बैठक झाली मुंबईतील तिन्ही खासदार उपस्थित होते. नाशिकचे खासदार होते. उर्वरित 5 खासदारांनी आधीच चर्चा झाली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली शिवसेना फुटली ज्यांच्यावर संशय नव्हता तीच आधी गेली संशय कोण ठेवणार कोणी ठेवायचा ? आमचा आमच्या खासदारांवर पूर्ण विश्वास संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे भाजप असे करत असत आम्ही ऑपरेशन बुल्फ करू.. वाघ तुम्हाला हात लावू देईल का ? वाघ जंगलात मोकळा फिरत आहे. 19 जून ला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार हिरक महोत्सव आशा कार्यक्रमाला आमंत्रण द्यायचं नसत आपला कार्यक्रम आहे. जे येतात त्यांच्या साठी खुर्च्या ठेवल्या जातील. ऑन 20 खासदार तृण्मुल कधी आपण या पार्टीचे नाव ऐकलं का? ही त्रिपुराची पार्टी या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मतं मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये काही जागा लढले तिथे यांची डिपॉझिट गेली हजार मते देखील पडली नाही अमित शहा कुठून कुठून असे पक्ष तयार करतात. आणि पटलावर आणतात आणि एखाद्या गुलामांना हाता पायात बेड्या बांधून कोथडीत ढकला व तसा ढकलतात 22 खासदार भाजपत जायला निघाले त्यांना Ncrt पक्षात अमित शहा यांनी ढकल आहे. विहिरीत ढकलल्यासारखं त्याच्यामुळे पार्टी मर्ज झाल्यामुळे तृण्मुल काँग्रेस वरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा संपलेला आहे जय महाराष्ट्र मध्ये व्हायला पाहिजे होतं पण इथे एक वेगळा आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना विलीन होणं हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्र मधलं जो काही शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेके द्यायचे आहे आम्ही त्यासाठीच म्हणतो तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे तरी तृणमूल मध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फूठले आहेत इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटले नव्हते तरी त्यांना एका पक्षामध्ये दिली व्हावं लागलं आपली खासदारकी वाचवण्यासाठी महाराष्ट्रात तुलनेत कमी आकडा असून ते शिवसेना मिरवत आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातून नेत्यांचा दिल्ली पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल पुण्यात गरीब राजकारणी असल्यामुळे इथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे तिथे समृद्धी मार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा अन्य त्यांच्याकडे त्यांच्या ulc खात नसल्यामुळे ते त्या गरीब बिचाऱ्या आमदार आणि खासदारांना कुठल्यातरी पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झढकलूनत्यांच्या कडे एकनाथ शिंदे असते तर त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं असतं जर त्यांच्याकडे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता तर तृणमूल पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळाले असते कायदेशीर लढाई ही पहिल्या दिवशी आमची सुरू झाली आणि तेव्हाच आम्हाला विजय मिळला पाहिजे होता तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती तृणमूल इतके आमदार आणि खासदार त्यांची आमदारकी आणि खासदारकी वाचवण्यासाठी एका अशा पक्षात प्रवेश केला त्याच पक्षाचा अस्तित्व नाही पण या इथे मात्र तुम्हाला मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह दिल मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा चिन्ह दिल हे देशाच्या न्यायव्यवस्थेतील कायद्यातील आणि निवडणूक आयोगातील तफावत पहा न्याय देण्याची ऑन पाकिस्तान संवाद नारायण राणे यांचे चिरंजीव याला पाकिस्तानी त्याला पाकिस्तानी म्हणता म मोहन भागवत यांना पाकिस्तानी म्हणतील का ? पाकिस्तानला ही चिरडून टाका शिवसेनेची भूमिका आहे तुम्ही ऑपरेशन सिन्दुर मधून माघार घेतली तेव्हा तुम्ही, भाजप पाकिस्तानी झालात.
0
0
Report

बीजेपी के नगरसेवक गोवा से मुंबई में प्रशिक्षण के लिए पहुंचे, 16-17 तारीख तक चलेगा कार्यक्रम

Nagpur, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी भाजप के सभी नगरसेवक गोव्या से तीन दिन के लिए मुंबई पहुंचे और अब प्रशिक्षण हेतु मुंबई में हैं। रामभाऊ म्हाळगी में उनका प्रशिक्षण वर्ग होगा। मतदानपूर्व 17 तारिख को वे मुंबई से नागपुर पहुँचेंगे। पहले भाजप नगरसेवक और माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे ने प्रतिक्रिया दी। भारतीय जनता पार्टी के सभी नगरसेवकों का रामभाऊ माळगी में प्रशिक्षण है। आज दुपहार डेढ़ बजे से यह प्रशिक्षण शुरू होगा। 16 तारीख तक यह प्रशिक्षण रहेगा। जो नवनियुक्त नगरसेवक हैं वे जनता के साथ कैसे व्यवहार करें, और जनता की समस्याओं और विकास कार्यों के दृष्टिकोण से समग्र प्रशिक्षण दिया जाएगा। हमारे नगरसेवक घूमने के लिए नहीं गए थे; प्रशिक्षण वर्ग पहले से तय था, और प्रशिक्षण वर्ग 16-17 तारीख तक है।
0
0
Report

देवदर्शन के बाद बावचे परिवार पर दुखद हादसा, आठ लोग बचे

Pandharpur, Maharashtra:सहा महिन्याचं बाळ कायम आजारी असतं म्हणून देवदर्शन करायला गेले आणि कुटुंबाचा घात झाला. पंढरपुरातील संदीप आणि बालाजी बावचे बंधू यांनी कष्टातून आपलं एक छोटसं विश्व तयार केलं होतं. दोन बंधू बांधकाम व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते यातून त्यांची चांगली प्रगती झाली होती. पंढरपूर मधील अनिल नगर मध्ये राहत असताना त्यांनी कष्ट करून पुणे रस्त्यावरील परिसरात चांगल घर बांधले होते. मात्र नियतीला त्यांचा हा सुख पहवल नाही. घरामध्ये आई दोन भाऊ त्यांच्या पत्नी आणि मुले असा सगळा संसार होता. मात्र अवघ्या काही क्षणात सगळ पाण्यात बुडाले सहा महिन्यापूर्वी बालाजी आणि पूजा यांना लहान बाळ झाले मात्र जन्मल्यापासून सतत हे बाळ आजारी पडायचे यासाठी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र तरीही त्याला म्हणावा तसा फरक पडत नव्हता म्हणून बावचे कुटुंबाने देवदर्शन करण्यावर आपला विश्वास ठेवला होता. यापूर्वीही त्यांनी गाणगापूर तुळजापूर अशा ठिकाणी जाऊन देवदर्शन केलं होतं. मात्र तरीही बाळाच्या तब्येतीमध्ये म्हणावा असा फरक पडत नव्हता. बावचे कुटुंबाने आपले कुलदैवत असलेले सातारा जिल्ह्यातील मसवड येथील सिद्धनाथ जोगेश्वरी च्या दर्शनाला जाण्याचा नियोजन केलं रविवारी अमावस्या असल्याने या दिवशी दर्शन घ्यावं असं त्या सर्व कुटुंबाने ठरवलं. संदीप आणि बालाजी यांच्या सोबत त्यांची मावस बहीण तिचा पती आणि त्यांची मुलं यांनाही त्यांनी सोबत घेतलं. सकाळी दहा वाजता निघाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला गोंदवले महाराज यांचे दर्शन घेतलं त्यानंतर सिद्धनाथ जोगेश्वरीच्या दर्शनाला ते आले त्या ठिकाणी कुटुंबासह त्यांनी फोटो काढला आणि आपल्या सोशल मीडिया खात्यावर सुद्धा ठेवला. आजारी बाळाला निदान कुलदैवताच्या आशीर्वादाचा फरक पडून त्याची तब्येत बरी होईल आणि हसत खेळत मोठा होईल अशी अपेक्षा बावचे कुटुंबाला होते मात्र ज्य अमावस्येच्या निमित्ताने बावचे कुटुंब दर्शनाला गेले होते त्याच अमावस्येच्या दिवशी त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवी संकट आले या अपघातात संदीप आणि बालाजी हे दोन सख्खे भाउस बालाजी ची दोन वर्षाची जिया आणि अडीच वर्षांचा आरव , वाहन चालक सागर चौगुले, शशिकला जाधव सह आठ जण दैव बलवत्तर म्हणून वाचले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top