445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
देवठाणा में पिकअप दुर्घटना: पति और दो बेटियाँ मौत, पत्नी घायल
Washim, Maharashtra:वाशीम–कनेरगाव रोडवरील देवठाणा फाट्याजवळ आज भीषण अपघात घडला. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकल ला जोरदार धडक बसून एका कुटुंबावर काळाचा घाला आला. इस हृदयद्रावक अपघातात पती आणि दोन्हीं मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली है. मृतांमध्ये ज्ञानेश्वर निवृत्ती खडसे, किर्ती खडसे और केतकी खडसे यांचा समावेश है. प्रामुख माहितीनुसार, मृत मुलींमध्ये एक 3 वर्षांची तर दुसरी 7 वर्षांची होती. हे कुटुंब देवठाणा येथील असल्याची माहिती समोर आली है. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गंभीर जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवठाणा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
पाथर्डी थाने के सामने विवाद से मौत, पीड़िता पर अत्याचार का नया मामला
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्या समोर तक्रार देणाऱ्या महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीडित महिलेची तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली...तणावपूर्ण वातावरणात पीडित महिला आणि तिच्या मुलाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून प्रयत्न केला...दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले विठ्ठल खर्चन हे अचानक जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले , त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषीत केले...संबंधित व्यक्ती पीडित महिलेसोबत पोलीस ठाण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे...संबंधित पीडित महिलेवर एक महिन्यापूर्वी गावातीलच काही जणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे...दरम्यान पीडित महिलेची तक्रार नोंदवून घ्यावी यासाठी सोबत आलेल्या खर्चन यांचा मृत्यू झालाय या सर्व घटनेला पोलीस जबाबदार असल्याचे नातेवाईकांनी घेतले आहे0
0
Report
बारामती पुलिस ने नकली नियुक्ति पत्र देकर करोड़ों की ठगी करने वाले गैंग पर चोट, तीन आरोपी गिरफ्तार
Rui, Maharashtra:शासकीय नोकरीचं आमिष दाखवून कोट्यावधींना गंडा घालणारा गजाआड.... बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई.... बनावट नियुक्त पत्र देत एक कोटी छत्तीस लाखांना गंडा घालणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड. Anchor _ शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या या टोळीतील आणखी एका आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केल आहे. सुरज तिमयया असदकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी आतापर्यंत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीच दौंड येथील अजिंक्य पाठक आणि येरवडा येथील सुधाकर सोळंकी यांना अटक केली असून या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम के रिसोड में आंधी-बारिश से पेड़ गिरने और बिजली आपूर्ति बाधित, नुकसान
Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या रिसोड शहरासह परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. शहरातील विश्वा लॉन येथे उभारण्यात आलेले लोखंडी व सजावटीचे डिजाईन कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडली त्यावेळी परिसरात काही नागरिक उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
सोलापुर में गन्ना किसान आक्रमक, दो साल से बिल बकाया के कारण उपवास-रास्ता रोको
Solapur, Maharashtra:सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक - सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक - बेमुदत सुरू असलेल्या उपोषणाचे रास्ता रोकोत रूपांतर - गोकुळ साखर कारखान्याने मागील दोन वर्षापासून ऊस बिले न दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे - मात्र पोलिसांनी आंदोलकांना मंडप उखडून फेकू अशी भाषा केल्याने शेतकरी आक्रमक - संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही रस्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा - मागील वर्षीचे 2 कोटी तर यंदाच्या वर्षीचे 130 कोटी थकवल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे - जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततेत सुरू असलेल्या उपोषणातील शेतकरी आक्रमक - जिल्हा परिषदे बाहेरील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली - दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल - तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली - मात्र शेतकरी आक्रमक असून माफी मागितल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका0
0
Report
रायगढ़-उरण कांग्रेस में नाराजगी, 50 पदाधिकारियों ने राजीनामे दे दिए
Navi Mumbai, Maharashtra:रायगड उरण च्या काँग्रेसमध्ये नाराजी; ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे रायगड उरण च्या काँग्रेसमध्ये नाराजी; ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे कॉग्रेस च्या अध्यक्षपदावरून महेंद्र घरत यांना दूर करून जिल्ह्याची उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा भडका उडाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन सामूहिक राजीनामे सुपूर्द केल्याची माहिती उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रायगड जिल्ह्याची पुनर्रचना करून उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. दीड ते दोन महिन्यांपासून काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षक रागिणी नायर यांच्या रायगड दौऱ्यानंतर जिल्ह्यातील संघटनात्मक बदलावांच्या चर्चाना वेग आला होता. मात्र, महेंद्र घरत यांना पदावरून दूर करून जिल्ह्याची विभागणी केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग में Nilesh Rane पर आरोप, Vaibhav Naik ने पुलिस प्रमुख पर निशाना साधा
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ---- निलेश राणे यांचं संरक्षण कमी केल्याच्या कारणावरून निलेश राणे पोलीस अधीक्षकांवर आरोप करत असल्याची माजी आमदार वैभव नाईक यांची टीका.... सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक श्री दहीकार देत असलेला पाठिंबा मला जनतेसमोर ठेवावा लागणार. अशा आशयाचे निलेश राणेनी केलंय ट्विट त्यावर बोलताना वैभव नाईक यांनी रानेंवर साधला निशाणा एवढे दिवस तुम्ही झोपले होते का? वैभव नाईक यांनी केले निलेश राणे यांना सवाल0
0
Report
राज्य सरकार फिश वेन्डिंग ई-रिक्शा योजना शुरू करेगी; 90% अनुदान संभव
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मत्स्यविक्रीला आधुनिकतेची जोड..राज्य सरकार आणणार 'फिश वेंडींग ई-रिख्शा' योजना!.. अँकर राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ,आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकार ‘फिश वेंडींग ई-रашылықा’ हे नवे मॉडेल राबविणार आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असून प्रति लाभार्थी अंदाजे ४ लाख रुपयांचा प्रकल्प खर्च प्रस्तावित आहे.या ई-रिक्षा मॉडेलमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मत्स्यविक्री साखळी अधिक सक्षम होईल,ग्राहकांना दर्जेदार मासळी मिळेल आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे,अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली..0
0
Report
रत्नागिरी समुद्र में अवैध ईंधन भंडारण के संकेत, 5 मछुआरों को हिरासत में लिया गया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- इंधन टंचाई असताना समुद्रात आढळला बोटीवर इंधनाचासाठा.. रत्नागिरीच्या कस्टम विभागाची मोठी कारवाई, कस्टम विभागाने पकडलेल्या बोटीचे नाव शहाना.. जयगडच्या समुद्रात इंधन साठा आढळणाऱ्या मच्छिमारी बोटीची झाडाझडती.. मच्छिमारी बोटी वर अवैधरित्या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याचा संशय.. मच्छिमारी हंगाम संपत आला असताना बोटीवर एवढा साठा कशासाठी.. कस्टम विभागाकडून इंधनाचा साठा सापडलेली बोट चौकशीसाठी घेतली ताब्यात.. सापडलेली बोटीवर इंधनाचे 30 हून अधिक बॅरल, मच्छिमारी बोट गुहागर पडवे इथली असल्याचा संशय.. बोटीवरील 5 जणांना घेतले चौकशीसाठी ताब्यात, सर्व जणांना चौकशीसाठी रत्नागिरीत आणल्याची माहिती- सुत्रांची माहिती0
0
Report
Advertisement
गडचिरोली में हाथियों का क़तार नदीपात्र से गाँव की ओर, भय का माहौल
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या कळपाची नदीपात्रातून गावाकडे कूच, गडचिरोली तालुक्यातील साखरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अँकर: गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींच्या कळपाने नागरिकांची झोप उडवलीये. गडचिरोली तालुक्यातील साखरा गावाजवळ तब्बल 15 ते 20 हत्तींचा कळप थेट गावाच्या दिशेनं येत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतातून आणि नदीपात्रातून मार्ग काढत हा कळप गावाजवळ पोहोचल्याची माहिती समोर आलीये. रात्रीच्या वेळी हत्ती गावाजवळ दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली. सध्या शेतीपूर्व मशागतीची कामं सुरू असताना शेतकरी पहाटेपासून शेतात जातात. मात्र हत्तींच्या सततच्या वावरामुळे आता शेतात जाणंसुद्धा धोकादायक बनलंय. वन विभागाकडून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.0
0
Report
अकोला में गर्मी की लहर: प्रशासन ने जारी किए मार्गदर्शक निर्देश
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो, भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
कल्याण में विवाहिता की हत्या, पिता पर संदेह जाहिर
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये विवाहितेची हत्या, बाप पसार घटना: कल्याणमध्ये विवाहितेची हत्या झाली असून बाप पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. गायत्री शिंदे हा हत्या झालेल्या विवाहितेचं नाव आहे. तिचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच ती कल्याणमधील आपल्या घरी बाहेर आली होती; मात्र तिची घरातच हत्या झाली. हत्या बापानेच केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हत्या झाल्यानंतर तो घरातून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गायत्रीची आई कामाला गेली होती, त्यामुळे हत्येचा संशय बळावलाय.0
0
Report
Advertisement
अकोला में महिला कांग्रेस ने महंगाई-गैस दाम के विरोध में प्रदर्शन किया
Akola, Maharashtra:वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात देशभरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात महिला काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असल्याचे सांगत महिलांनी हातात प्रतीकात्मक गॅस सिलेंडर घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी लाडकी बहीण योजनेत सरकारने घातलेली नवीन अट तात्काळ रद्द करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच वाढती महागाई आणि इंधन दरवाढ त्वरित कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडत अकोला जिल्हा बंदचा इशारा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे.0
0
Report
चंद्रपूर में ट्रैफिक व्यवस्थे के लिए 100 गृहरक्षा दल के जवान तैनात; दुर्घटनाओं को रोकने का निर्णय
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियमनासाठी 100 गृहरक्षक दलाचे जवान झाले तैनात, दररोज एक या गतीने होणाऱ्या जिल्ह्यातील अपघात मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय. दररोज होणारी वाहतूक कोंडी ,बेशिस्त वाहन चालवणे याबाबत चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियमनासाठी 100 गृहरक्षक दलाचे जवान तैनात झाले आहेत. दररोज एक या गतीने होणाऱ्या जिल्ह्यातील अपघात मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिने हा प्रकल्प शहरात राबविला जाणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान जुजबी प्रशिक्षणानंतर चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. बेशिस्त वाहन चालवणे , पार्किंग, रॉंग साईड वाहन चालवणे, यााबाबत गृहरक्षक दलाचे जवान वाहतूक पोलिसांना कारवाईत मदत करणार आहेत. गृहरक्षक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. याशिवाय या औद्योगिक जिल्ह्यात महामार्गांवर अवजड वाहनांबाबत पोलीस आणखी सातर्कतेने कारवाई करून बेशिस्त वाहना विरोधात धडक कारवाई करत आहेत. या नव्या प्रकल्पाचे नक्की नियमनात काय होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे0
0
Report
विदर्भ में गर्मी से अलर्ट: 47°C तक ताप, तैयार रहें नागरिक
Chandrapur, Maharashtra:विदर्भातील मोबाईलवर आज मंत्रालयातील अलर्ट मेसेज धडकला. लाखो मोबाईलवर अति उष्ण तापमानाचा फ्लॅश संदेश झळकला. पुढील काही तास दिवस आणि रात्रीचे तापमान अति उष्ण राहणार असल्याचा सावधानतेचा इशारा यात देण्यात आलाय. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर -गडचिरोली -वर्धा- नागपूर या जिल्ह्यांबाबत मंत्रालयाने हा इशारा दिला आहे या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती जारी केली आहे. हवामान विभाग, प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक 26 ते 27 मे 2026 दरम्यान जिल्ह्यात काही भागांत उष्ण लहरसोबतच उष्ण रात्रींचीही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला असून तहान लागली नसली तरी नियमित अंतराने पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कपड्याचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. हलकी, सैल व सुताची कपडे वापरावीत तसेच प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी किंवा नागरिकांनी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याबावी. पाळीव प्राणी व गुरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. घर थंड राहण्यासाठी पडदे, शटर, सनशेड यांचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात, असेही प्रशासनाने म्हटले आहे. तसंही नागरिकांनी दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे. जड व गडद रंगाचे कपडे वापरू नयेत. अतिश्रमाची कामे शक्यतो टाळावीत तसेच लहान मुल किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि उष्मालाटेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे。0
0
Report
Advertisement
