445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पूर्णा डैम के दो गेट खुले, नदी किनारे 77 गांव खतरे के घेरे में
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; प्रति सेकंद १५.७० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा. त्यामुळे पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रति सेकंद १५.७० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी काठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून चांदूर बाजार तालुक्यातील ७७ गावे पूररेषेच्या धोक्याच्या झोनमध्ये असल्याने तालुक्यातील शिरजगाव कसबा, तिवसळी, मधान, ब्राह्मणवाडा थडी, देवळवाडा, पिंपरी भुगाव, शिरजगाव बंड, कुरळ, जामपूर, बेलोरा, खरवाडी, घाटलाडकी आदी गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तहसीलदार यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि परिस्थिती गंभीर झाल्यास प्रशासन तातडीने उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे.0
0
Report
नागपुर: गौसिया कॉलोनी के खड़े पानी में बिजली के स्पर्श से मौत, नगर निगम कड़ाई से जवाबदेही
Nagpur, Maharashtra:नागपुर - गौसिया कॉलनीतील रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील पाण्यात आलेल्या वीजप्रवाहाने महिलेच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेची कारवाई - दास इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर ५ लाख रुपयांचा दंड 'अमृत २.०' पाइपलाइन कामातील निष्काळजी पणाबद्दल दंडात्मक कारवाई - भूमिगत वीजवाहिनीचे नुकसान करूनही माहिती न दिल्याचा ठपका - उघड्या विद्युत तारेच्या स्पर्शाने १ जुलै रोजी अफरोज बेगम खान यांचा मृत्यू झाला होता... - मनपाचा प्राथमिक चौकशीत कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा उल्लेख - फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत समिती करणार निर्णय, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबतही होणार विचार - दोषी असल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईची शक्यताही तपासली जाणार - अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन - समितीला सार्वजनिक आरोग्य, विद्युत विभाग आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचा समावेश - समितीला १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश - वेळेत दुरुस्ती झाली असती तर दुर्घटना टळली असती.0
0
Report
रत्नागिरी के कोळंबे हाईस्कूल के पास भूस्खलन, 400 विद्यार्थियों पर खतरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे हायस्कूलातील विद्यार्थी भूस्खलनाच्या छायेत. गेल्या काही दिवसांत पावसामुळे शाळेजवळच्या डोंगराचा भूस्खलन झाला. 5 ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या शाळेत 400 पेक्षा अधिक मुलं आहेत. मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या डोंगराची चुकीची कटाईमुळे शाळेला धोका. शाळा उभी असलेल्या डोंगराचा 150 मीटरचा भाग खचला. शाळा प्रशासनाकडून आवाज उठवूनही दुर्लक्ष. राष्ट्रीय महामंडळ प्राधिकरणाकडून शाळेची बाथरूम बंद करण्याच्या नोटिसा. मोठं भूस्खलन झाल्यास संपूर्ण शाळा गाडली जाऊ शकते; ढिगार्याखाली प्रशासनाने दुर्लक्ष मागणी.0
0
Report
Advertisement
परशुराम घाट पर भारी बारिश के बाद गेबियन वॉल क्षतिग्रस्त, दराड़ गिरने खतरा बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी परशुराम घाट पुन्हा धोक्याच्या छायेत! मुसळधार पावसानंतर गॅबियन वॉलला तडे; दरड कोसळण्याची भीती रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी गेल्या चार-पाच दिवसांच्या मुसळधार पावसाचे परिणाम आता समोर येत आहेत. परशुराम घाटाच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलखालील माती मोठ्या प्रमाणात सरकली असून, पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या संरचनेला तडे गेले आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या काही पायऱ्या वाहून गेल्या असून उर्वरित पायऱ्यांनाही भेगा पडल्याने घाटात दरड कोसळण्याचा धोका पुन्हर्ा वाढला आहे.0
0
Report
खेड तालुक्य के चिंचवली-गोटलवाडी डोंगर में बड़ी दरार, दराड़ गिरने का खतरा, ग्रामीणों में दहशत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गोटलवाडी येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वस्तीलगतच्या डोंगराला तब्बल दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मोठ्या भेगा पडल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा धोका आणखी वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि गरज पडल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे。0
0
Report
रत्नागिरी में बारिश का असर कम, चिपळूण के नदियाँ सतर्क, प्रशासन सक्रिय
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी रत्नागिरीत पावसाची उघडीप; चिपळूणची वशिष्ठी धोक्यापासून दूर, खेडची जगबुडी अद्याप इशारा पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असून बहुतांश तालुक्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. चिपळूणमधील वशिष्ठी नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली असून सकाळी ६ वाजता ती ३.२८ मीटर इतकी नोंदवण्यात आली. कोळकेवाडी धरणातून पाणी नियमन सुरू असून सध्या एक मशीन कार्यरत आहे. दरम्यान, खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीवर वाहत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा महामार्ग के भोस्ते घाट पर सड़क क्षतिग्रस्त, यातायात जोखिम बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:खेड/रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात महामार्गाला तडे; रस्ता खचण्याचा धोका, प्रवास धोकादायक अँकर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटातील एका अवघड वळणावर दरीकडील बाजूचा सिमेंट काँक्रीट रस्ता खचू लागला असून अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली, तरी धोका कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनचालकांनी भोस्ते घाटातून अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याबद्दल आसपासच्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.0
0
Report
नेवासे से पंढरपुर को ज्ञानेश्वरी पालखी यात्रा: हजारों श्रद्धालु जयकारे के साथ निकला
Shirdi, Maharashtra:संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा माऊली तुकाराम"च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान केले...माऊलींच्या कर्मभूमीत पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांचे पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत नेवासा बस स्थानक येथे उत्साही वातावरणात पार पडला.... यावेळी "माऊली माऊली"च्या गजराने नेवासा नगरी दुमदुमन गेली होती... माऊलींच्या निघालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी महिला - पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते...निघालेल्या पालखी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा नेवासा बसस्थानक प्रांगणात भक्तिमय वातावरणात वारकरी,टाळकरी, झेंडेकरींचे रिंगण पार पडले. तो माऊलींचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती...ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्यातील हे पहिले रिंगण वारकऱ्यांच्या दृष्टीने खास आकर्षण ठरले...0
0
Report
पंढरपुर शहर में अवैध रेत-वाहतुकी पर पुलिस ने बड़ी कार्रवाई, ₹16.18 लाख माल जप्त
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली आहे. एक टीपर आणि त्यामध्ये भरलेली वाळू असा सोळा lakh 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इसबावी रोड जुना अकलूज परिसरामध्ये या टिपर मधून वाळू वाहतूक केली जात होती. वाहनाचा चालक आकाश चव्हाण यांच्या विरुद्ध आणि गाडीच्या मालका विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे0
0
Report
Advertisement
अयोध्या राम मंदिर दान चोरी के आरोप: नागपुर में कांग्रेस का सत्याग्रह
Nagpur, Maharashtra:नागपूर अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी काँग्रेसकडून आंदोलन. नागपूरातील पोद्दारेश्वर राम मंदिर जवळ सत्याग्रह आंदोलन. रघुपती राघव राजाराम, भजन गाते टाळ वाजवत काँग्रेसचा सत्याग्रह आंदोलन. शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे आणि काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता अतुल लोंढे आंदोलनात सहभागी.0
0
Report
आषाढी एकादशी के लिए पंढरपुर जा रहे भक्तों के लिए 116 अतिरिक्त एसटी बसें
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर या चार आगारांतून २० ते ३० जुलैदरम्यान पंढरपूरसाठी ११६ जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.0
0
Report
सांगली महापालिका पर केंद्रीय जीएसटी ने 34 लाख का दंड लगाया
Sangli, Maharashtra:Sng_mnp_gst सांगली महापालिका को केंद्रीय जीएसटी विभागाकडून 34 लाखांचा दंड अँकर - सेवा कर वेळेत न भरल्यामुळे सांगली महापालिकेला केंद्रीय जीएसटी विभागाकडून 34 लाखांचा दंड ठोठावला आहे. सांगली महापालिकेकडून 2015 ते 2017 या काळात महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या दुकानगाळांवरील सेवाकर वेळेत भरला नव्हता.57 लाख रुपयांचा सेवा कर असताना केवळ 23 लाख रुपये महापालिकेकडून जमा करण्यात आले होते. उर्वरीत रक्कम भरण्याबाबतची नोटीस महापालिकेला बजावण्यात आली होती.मात्र ती अद्यापही भरली गेली नाही,त्यामुळे कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी विभागाकडून सांगली महापालिकेला 34 लाखांच्या दंडाची नोटीस बजावत,स्मरण पत्र ही जीएसटी विभागाकडून महापालिकेला देण्यात आल आहे.0
0
Report
Advertisement
भंडारदरा धरण क्षेत्र में जोरदार बारिश, रंधा जलप्रपात विकराल; पर्यटकों पर रोक
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचे जोरदार तांडव सुरू असून धबधबे ओसंडून वाहत आहेत.. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंधा धबधब्याने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलेय.. कळसूबाई शिखर परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णवंती नदि प्रवाहित झाली असुन प्रवरा नदित जावून मिसळत आहे.. प्रवरा नदिवर दरीत कोसळणारा रंधा धबधबा आज प्रवाहित झाला असून धबधब्याने विक्राळ रूप धारण केले आहे.. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांना तुर्तास बंदी घातलेली आहे..0
0
Report
श्रीरामपुर में धारदार हमला, समीर शाह घायल; 17 वर्षीय आरोपी ने सरेंडर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आलीय..शहरातील कायदा और सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय...शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील जयभीम चौक परिसरात काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला...भंगार व्यवसाय करणाऱ्या 32 वर्षीय समीर सुलतान शाह यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला...या हल्ल्यात समीर शाह गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...दरम्यान, या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच 17 वर्षीय मुख्य आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन सरेंडर केल्याची माहिती समोर आलीय...मागील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली...या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यातला आला आहे.विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत शहरात प्राणघातक हल्ल्यांच्या तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे श्रीरामपूरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.0
0
Report
हळदी के दाम बढ़े, किसान खुश, बाजार में आवक चार हजार क्विंटल
Washim, Maharashtra:वाशीम: हळदीच्या दरात वाढ झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली असून काल बाजार समितीत ४ हजार क्विंटल हळदीची आवक झाली. काल कांडी हळदीला प्रति क्विंटल १४ हजार २०० ते १५ हजार ८७५ रुपये, तर गट्टू हळदीला १२ हजार ८५० ते १३ हजार ७०० रुपये दर मिळाला. हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी काळात दर आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
