icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ऐरोली क्षेत्र में चलती स्कूटी पर युवती का विनयभंग, आरोपी गिरफ्तार

Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली विभागात चालत्या स्कुटीवरून एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. ऐरोली परिसरात 22 वर्षीय तरुणी मैत्रिणीच्या घरी जात असताना एका नराधमाने चालत्या स्कुटीवरून तिचा पाठलाग करत विनयभंग केला. सदर कृत्य केल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या संदर्भात तरुणीने तक्रार देतात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रबाळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. कृष्णा महेंद्र कनोजिया असे आरोपीचे नाव असून आरोपीने अशाच प्रकारचे इतर गुन्हे केल्याची कबुली दिल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
0
0
Report

महापौर पाटिल ने मोरबे डैम का निरीक्षण कर पानी भंडारण का जायजा लिया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका की महापौर सुजाता पाटील ने नवी मुंबई शहर को जलापूर्ति करने वाले मोरबे डैम का निरीक्षण दौरा किया। मोरबे डैम अभी तल पर पहुँत रहा है और 72 मीटर तक जल संग्रहण बना हुआ है। नवी मुंबई शहर को जलापूर्ति के लिए मोरबे डैम में केवल 17 प्रतिशत यानी 60 दिन तक का जल उपलब्ध है। महापौर ने डैम का आकलन किया और जल पीने का पानी बेहद स्वच्छ बताया। जलवाहिनी की मरम्मत के कारण कुछ जगह गंदा पानी供 हुआ था पर नागरिकों ने चिंता न करते हुए पानी को साफ बताया गया। जुलाई तक पर्याप्त जल ذخیره हो यह सुनिश्चित करने हेतु नागरिक जल संचय करें ताकि जल संकट न हो।
0
0
Report

रामदास आठवले का सुझाव: हाथभट्टी दारू पर सरकार दे परवानगी ताकि नियंत्रण हो सके

Sangli, Maharashtra:हातभट्टी दारू पर कडक कारवाई करावी नसेल तर हातभट्टी दारूला शासनाने परवानगी द्यावी, ज्यामुळे हातभट्टी दारूवर नियंत्रण ठेवलं जाऊ शकेल, पुण्यात विषारी दारू पिऊन बारा जणांचा मृत्यू झाला आहे, यावर रामदास आठवलेंनी हातभट्टी दारू प्रकरणी बोलताना सरकार हा सल्ला दिला आहे. पुण्यातील सर्व अवैद्य हातभट्टी दारू अड्डे पोलिसांनी बंद करावेत, पण दुसरीकडे हातभट्टीची दारू किती वेळा बंद केली तरी ती स्वस्त मिळत असल्याने पिणारे हातभट्टीची दारू पितात, मात्र हातभट्टीची दारू बंद केली पाहिजे, नसेल तर सरकारने हातभट्टी दारूला परवानगी देऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, असं विधान रामदास आठवले यांनी केले आहे, ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते.
0
0
Report
Advertisement

महामुंबईकरों ने साल भर में तीन लाख टन आलू खा डाले; डिमांड सबसे अधिक

Navi Mumbai, Maharashtra:anchor- देशातील बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होत असले तरी सर्वाधिक खप मात्र महामुंबईमध्येच होतो. मुंबईकरांच्या आवडीचा वडापाव, पावभाजीसह विद्यार्थी व नोकरदारांच्या दररोजच्या डब्यासाठीही बटाट्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यामुळेच सामान्यांच्या भाजीचा राजा अशीहीボटाट्याची ओळख निर्माण झाली आहे. vo1 - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभरात तब्बल ३ लाख २१ हजार २३२ टन बटाट्यांची विक्री झाली आहे. महामुंबईकरांनी प्रतिदिन सरासरी ८८० टन बटाटा फस्त केल्याची नोंद झाली आहे. येथील बाजार समिती ही देशातील बटाट्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. बाईट- राजीव - बटाटा व्यापारी ( लाल टीशर्ट) vo2- सद्यःस्थितीत प्रतिदिन ८०० ते १२०० टन बटाट्याची विक्री होत आहे. बटाट्याची सर्वाधिक आवक उत्तर प्रदेशमधून होत असते. यानंतर मध्य प्रदेश व गुजरातवरूनही बटाटा विक्रीसाठी मुंबईत येतो. महाराष्ट्रात पुणे, सातारा व इतर काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन होते; पण ते तुलनेमध्ये खूपच कमी आहे. शासनाने थेट पणन योजना सुरू केली असल्यामुळे आता बटाटा व्यापारावरील बाजार समितीची मक्तेदारी संपली असली, तरी किरकोळ विक्रेत्यांकडून अद्याप बाजार समितीला प्रथम प्राधान्य मिळत आहे. सद्यःस्थितीत होलसेल मार्केटमध्ये बटाटा ६ ते १२ व किरकोळ मार्केटमध्ये १५ ते २५ रुपये किलो दराने विकला जात आहे. चिप्ससाठी 'एलआर'चा होतोय अधिक वापर चिप्स बनविण्यासाठी लेडी रोझेटा अर्थात एलआर बटाट्याला पसंती दिली जाते. या बटाट्याची साल लालसर व गर पांढरा व घट्ट असतो. एलआर बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होत असते. येथील बनासकांठा, साबरकांठा आणि अरवली परिसरात याचे उत्पादन होते. उत्तर प्रदेश व इतर ठिकाणांवरूनही चिप्ससाठीच्या बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. दररोजच्या आहारात बटाट्याचा सर्वाधिक वापर दररोजच्या आहारात बटाटा भाजीला सर्वाधिक पसंती मिळते. याशिवाय वडापाव, समोसा, पावभाजी, डोसा, भजी, पराठा, फ्रेंच फ्राइज, कटलेट, उपवासाची खिचडी यासाठीही बटाट्याचा उपयोग केला जातो. बाईट- संजीव मण्यार - व्यापारी
0
0
Report

करजत-खोपोली मार्ग पर अज्ञात महिला का शव: इलाके में हड़कंप, मौत की वजह जांच

Karjat, Maharashtra:कर्जत-खोपोली मार्गावर एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पळसदरी परिसरात रस्त्यालगतच्या खड्ड्यात हा मृतदेह सापडला असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पळसदरी परिसरात स्थानिकांना तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मृत महिला अंदाजे ३५ ते ४० वर्षांची असून तिचा मृतदेह सुमारे आठ दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेने कुर्ती व निळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तिच्या उजव्या हातात एक बांगडीही आढळून आली आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हत्या आहे की अन्य काही कारण, याचा तपास कर्जत पोलीस करीत आहेत. तसेच महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
0
0
Report
Advertisement

करमाला पुलिस ने अवैध इंजेक्शन बिक्री के आरोप में दो को गिरफ्तार, 150 इंजेक्शन जब्त

Pandharpur, Maharashtra:करमाळा पोलिसांनी टर्मीन इंजेक्शनच्या एकुण १५० बाटल्या जप्त केल्या आहेत. करमाळा मधील कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ पोलिसांनी साध्या वेशात जावून सदर इंजेक्शन विक्रीस आणलेल्या इसमांवर पाळत ठेवून सदर पथकांनी प्रतिबंधित इजेंक्शन विक्री करीत असलेल्या दोन व्यक्तींना जागीच मुददेमालासह पकडुन प्रतिबंधित इंजेक्शन ताब्यात घेतले. सदर इंजेक्शन परिशिष्ठ एच प्रवर्गात मोडत असल्याने ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिठ्‌ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, व त्याचे खरेदी बिल नसताना अवैद्य मार्गाने प्राप्त करुन अशा औषधाचे वापरामुळे स्वास्थास जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातील विषारी द्राव्याचे दुष्परीणाम होवून इंजेक्शन घेणारे व्यक्तींचे जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर दुखापत होवू शकते हे माहीत असताना नमुद इंजेक्शन अवैधरीत्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्या उददेशाने अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा प्रयत्न झाला आहे. सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे
0
0
Report

अकोला अदालत ने 15 साल बाद साजिद खान पठाण समेत 10 आरोपी को निर्दोष मुक्त किया

Akola, Maharashtra:अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने तब्बल 15 वर्षांपूर्वी घडलेल्या आंदोलन प्रकरणात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 2010 मध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे. 2010 मध्ये काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक पुतळा जळण्यात आला होता. त्यानंतर आरएसएस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनात सध्याचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण तसेच माजी महापौर मदन भरगड ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ) यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आणि आरएसएस कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलकां मध्ये आणि अर्जच कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये जळालेला पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता.या घटनेत काही आरएसएस कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ सुरू होती. अखेर सुमारे 15 वर्षांनंतर अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह दहा आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के वाणी में गोठे की आग, आठ बकरियाँ जलकर मर गईं; कारण साफ नहीं

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वाणी तालुक्यातील बेसा येथे आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधून ठेवलेल्या आठ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार ह्यांच्या ह्या बकऱ्या होत्या. सकाळी बकऱ्यांना चारून आणल्यानंतर त्यांना गावातील गोठ्यात बांधून ते घरी परतले. त्यानंतर काही वेळातच गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला चारा असल्याने आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले. त्यानंतर वणी येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठ्यात बांधलेल्या आठ बकऱ्या जिवंत जळाल्या होत्या. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
0
0
Report

यवतमाळ: साहेबराव कांबळे ने अपक्ष नामांकन दाखल किया, महा-आघाडी को कड़ा मुकाबला

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणूकिसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 चे संख्याबळ आहे, परंतु आपण स्थानिक चे उमेदवार असल्याने आणि निवडणूक ही गोपनीय असल्याने विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी केला. साहेबराव कांबळे हे कॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस असून त्यांनी २०२४ मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला होता. कांबळे यांच्या विरोधात महायुती कडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे. बाईट : साहेबराव कांबळे : उमेदवार
0
0
Report

कल्याण मेट्रो मॉल परिसर में मद्यपान से आतंक, होटल चालक पर हमला CCTV में

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी आणि नशेखोरांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेट्रो मॉल परिसरात थंड पाण्याची बाटली न दिल्याने दारूच्या नशेत धुंद असलेल्या तरुणांनी एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे. ही महाराणीची घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे. मेट्रो मॉल परिसरात रात्री उशिरापर्यंत काही व्यक्ती रस्त्यावर बसून मद्यपान ,नशा करतात. मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा, शिवीगाळ तसेच जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे.
0
0
Report
Advertisement

मोदी के इंधन बचत के आह्वान के बीच राठोड के हेलीकॉप्टर दौरे पर विरोधाभास

Washim, Maharashtra:अँकर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा आवाहन केलेलं असतांना मंत्री संजय राठोड यांचा हेलिकॉप्टर दौरा आणि शासकीय वाहनांचा मोठा ताफा वाशिमच्या पोहरादेवी बघायला मिळाला होता यावर संजय राठोड यांनी सर्व सर्व केली असून माध्यमांनी प्रश्न विचारला असता आम्ही वाहनांचा ताफा निम्मा केलाय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला आम्ही सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रतिसाद देत असल्याचे सांगितलं प्रत्यक्षात मात्र संजय राठोड यांच्या ताफ्यात 20 ते 22 शासकीय वाहन असल्याचं समोर आलंय.
0
0
Report

केडीएमसी ने 12 घंटे पानी आपूर्ति बंद की चेतावनी: कब और कहाँ?

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2 जूनला मंगळवारी 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत येत्या मंगळवार दि. ०२ जूनला १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.येत्या मंगळवारी बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणी पुरवठा सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरावर याचा परिणाम होणार आहे.दरम्यान महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report

ठाणे के डॉ. ओंकार पावसकर के क्लिनिक में दूसरी बार चोरी, CCTV में चोर की हलचल कैद

Thane, Maharashtra:ठाण्यातील कावेसर येथील डॉ. ओंकार पावसकर यांच्या प्राण्यांच्या दवाखान्यात वर्षभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्याने दवाखान्याचे शटर उचकटून रोकड व मांजरींचे खाद्य असा सुमारे 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्याने सीसीटीवी कॅमेरेही फोडले. मात्र एका कॅमेरात त्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.यापूर्वी एप्रिल 2025 मध्येही याच दवाखान्यात चोरी झाली होती. दोन्ही घटनांतील चोर एकच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन दिवस उलटूनही आरोपी फरार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top