Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Mar 02, 2026 04:20:43
Malegaon, Maharashtra:*होळी निमित्त साखरेच्या गाठी माळा, कंगन यांना मोठ्या प्रमाणावर मागणी... बाजारपेठेत रंगीबेरंगी गाठि माळा विक्रीसाठी दाखल.. होळी, गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस sakhरेचे पदार्थ बनविण्याच्या व्यवसायाला येते तेजी Homili के अनुकूल महाराष्ट्रातील बाजारपेठेत साखरेच्या पारंपारिक गाठीकडे आणि साखरेच्या माळा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गुजरातवरून आलेली स्वस्त मळीची साखर आणि स्थानिक पातळीवर बनवलेली शुद्ध साखर गाठी अशी दोन्ही प्रकारची रेलचेल बाजारात दिसते, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या गाठींचे भाव स्थिर असले तरीकाही ठिकाणी महागाईची किनार दिसते... साखर गाठी, कंगन, नारळ अशा प्रकारचे साखरेचे विविध, रंगिबेरंगी पदार्थ तयार केले जातात. होळी, गुढीपाडवा या वेळेस 15 दिवस या व्यवसायाला तेजी असते. *बायट: युवराज मदनवाल, व्यावसायिक*
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 02, 2026 04:20:29
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्वप्नील पानकुरे (किल्लारी)याचा वाईस मेसेज जोडलं आहे..... रमजानमध्ये उमराहसाठी लातूरमधून ११५ भाविक सौदी अरेबियात अडकल्याची माहीती समोर.... फिरायला गेलेले लातूर जिल्ह्यातील ६ युवक दुबई मध्ये अडकले.... रमजान महिन्यात पवित्र उमराह यात्रेसाठी लातूर जिल्ह्यातून ११५ भाविक सौदी अरेबियातील मक्का, मदिना येथे रवाना झाले आहेत. ते भाविक तिथंच अडकून पडले आहेत. यात कोणी १५ दिवसांच्या यात्रेसाठी तर कोणी ४० दिवसांसाठी गेले आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर लातूर जिल्ह्यातील सहा युवक दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मच्छिंद्र सुडके (खुटेगाव), मनोज कोरे (निलंगा), स्वप्नील पानकुरे (किल्लारी), सचिन पाटील (वलांडी), शुभम पवार (रेणापूर) आणि राहुल कदम (लातूर) हे सहाजण एका कंपनीच्या टुरनिमित्त दुबईत येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे तेथेच अडकून पडले आहेत. युद्धकधी थांबेल आणि आपण सुखरूप आपल्या गावी कसे जाणार, याची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे. सध्या तिथल्या सर्व सेवा बंद आहेत. फक्त मोबाईल वरून वाईस मेसेज जात असल्यामुळे नातेवाईकांमध्ये इयत्ता चिंता व्यक्त केली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील जे नागरिक अडकून पडले आहेत किंवा मदतीची गरज आहे, अशा कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडे संपर्क करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 04:18:14
Washim, Maharashtra:वाशीम के मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ही परिसरातील गावाची महत्त्वाची बाजारपेठ असून दररोज 30 ते 40 गावांतील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापारी विविध कामांसाठी येथे येत असतात. बाजारपेठेत दिवसभर मोठी वर्दळ असताना मुख्य चौकात बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा सध्या बंद अवस्थेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरूहेगहाण घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले होते मात्र ते कार्यरत नसल्याने चौकातील हालचालींची कोणतीही नोंद होत नाही. अलीकडे चोरी व दागिने हिसकावण्याच्या घटनांघडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिस तपासातही अडचणी येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 02, 2026 04:18:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिन्ग - झी 24 तासच्या बातमीनंतर श्री स्वामी समर्थांची नगरी होणार मावामुक्त, अक्कलकोट नगरपरिषदेचा मावा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय - झी 24 तासच्या बातम्यानंतर सोलापूर जिल्ह्यात मावा बंद करण्याच्या हालचालींना incroyable वेग - श्री स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी मावा मुक्त करण्यासाठी नगरपरिषदेचे मोठे पाऊل - नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मावाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय - तरुणपिढी कॅन्सर सारख्या भयंकर रोगापासून वाचण्यासाठी आणि शहर स्वच्छ - सुंदर ठेवण्यासाठी उचलण्यात आली महत्त्वाची पावलं - नगरपरिषदचे आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे आणि पोलिसांनी शहरातील मावा विक्रेत्यांवर केली कारवाई - अक्कलकोट नगर परिषदेकडून झी - 24 तासच्या माव्याविषयीच्या विशेष बातमीचे कौतुक
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 02, 2026 03:47:20
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:46:00
Washim, Maharashtra:अँकर:होळी व धुलीवदंन सणाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील बाजारपेठ गजबजली असून पांढऱ्या शुभ्र बत्ताश्यांच्या गाठींना विशेष मागणी वाढली आहे. विविध आकार आणि पॅकिंगमध्ये बत्ताशे विक्रीसाठी उपलब्ध असून सध्या त्यांना किलोमागे १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. साखरेच्या दरवाढीचा किंमतीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी खरेदीवर त्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. होळीच्या दिवशी एकमेकांना बत्ताश्यांच्या गाठी देण्याची परंपरा विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. लहान मुलांना भेट म्हणून या गाठी दिल्या जातात. तसेच काही कुटुंबांत गाठी गुढी पाडव्यापर्यंत जपून ठेवून गुढीला बांधण्याची प्रथा पाळली जाते. त्यामुळे बाजारात सणासुदीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:30:46
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:16:55
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 03:04:58
Amravati, Maharashtra:नियमित सफाई कामगार द्या अन्यथा उलटे टांगून मारू; साफसफाईच्या मुद्द्यांवरून भाजपाचे नगरसेवक ऋषिकेश देशमुख आक्रमक अँकर :- अमरावती महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील स्वच्छते विषयी विशेष सभा चांगली गाजली असून स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलं धारेवर धरत शहरातील स्वच्छते विषयी जाब विचारला आहे. नवसारी प्रभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख हे स्वच्छतेच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले असून प्रशासनातील अधिकारी हे पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी गेल्या आहे. मी पाच अतिरिक्त सफाई कामगारांची मागणी केली होती मात्र ती अजून पर्यंत पूर्ण करण्यात आली नसून त्याविषयी मला उत्तरही देण्यात आला नाही त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता पाच सफाई कामगार उपलब्ध करून द्यावे अन्यथा जे सफाई कामगार कामावर येतात त्यांना उलटे टांगून मारू असा इशारा भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी दिला आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top