445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोंकण में चार महीनों में लाचखोरी के 34 मामले सामने
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लाचखोरीत कोकण चिंताजनक.. चार महिन्यात 34 प्रकरणे उघड.. ठाणे आघाडीवर..रायगडात 4 कारवाया.. अँकर टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय सरकारी काम होत नाही असा प्रत्येक नागरिकांना वेळोवेळी येत असून भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे.. कोकण विभागात एक जानेवारी ते 22 एप्रिल 2026 या पावणेचार महिन्यांच्या कालावधीत लाचखोरीची 34 प्रकरणे उघडकीस आली आहेत.. यामध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईत आघाडीवर असून १४ सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत.. तर रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4 प्रकरणात कारवाई केली आहे.. सिंधुदुर्ग आणि पालघर विभागात प्रत्येकी तीन प्रकरणात सापळे रचून सर्वात कमी कारवाई करण्यात आली आहे.. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभाग कार्यरत असला तरी लाचखोरी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे..0
0
Report
अकोला रेलवे क्रॉसिंग पर ग्रीन नेट से गर्मी में राहत
Akola, Maharashtra:विदर्भात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेले असून अकोल्यात पारा 46 अंशांवर पोहोचला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात नागरिकांना दिलासा देणारे एक प्रेरणादायी उदाहरण अकोल्यात पाहायला मिळत आहे. अकोला शहराला न्यू तापडिया नगरशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंगचा वापर नागरिकांना करावा लागतो. मात्र रेल्वे गाडी येताच गेट बंद होत असल्याने नागरिकांना प्रखर उन्हात बराच वेळ उभं राहाव लागतं. हीच अडचण ओळखून समाजसेवक निलेश देव यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या ठिकाणी दुचाकी चालकांसाठी ग्रीन नेटच्या माध्यमातून सावलीची व्यवस्था उभी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते सातत्याने हा उपक्रम राबवत असून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नागरिकांसाठी दिलासा निर्माण करत आहेत. न्यू तापडिया नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेली ही ग्रीन नेट सावली सध्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. कडक उन्हात गेट उघडण्याची वाट पाहणाऱ्या शेकडो दुचाकी चालकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही निलेश देव यांच्या या कार्याचे कौतुक होत असून, “खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय” याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिली जात आहे.0
0
Report
रत्नागिरी में जनशताब्दी एक्सप्रेस में अवैध शराब पकड़ी गई; 191 बोतलें जब्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये मद्याचा महापूर.. रत्नागिरीत १९१ बाटल्यांसह दोघे गजाआड.. अँकर कोकण रेल्वेमार्गावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि 'सी अँड आय' विभागाने अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे.मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी स्थानकावर ही धाड टाकण्यात आली. संशयास्पद हालचालींवरून दोन प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली असता १९१ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.. याप्रकरणी दोन प्रवाशांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.. हा मद्यसाठा गोवामार्गे मुंबईत विक्रीसाठी नेला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे... रेल्वे प्रशासनाने या कारवाईनंतर प्रवाशांना कडक इशारा दिला असून,रेल्वेतून प्रतिबंधित वस्तूं抵ँच वाहतूक केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे स्पष्ट केले आहे..0
0
Report
Advertisement
चिपळूण में बागेश्वर बाबा के विरोध पर शिवप्रेमियों ने banner पर रोष जताया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये 'बागेश्वर बाबा' विरोधात संताप; बॅनरला घातला जोड्यांचा हार!.. अँकर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवप्रेमींचा प्रचंड संताप पाहायला मिळाला...बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.. चिपळूणच्या वडनाका परिसरात संतापलेल्या नागरिकांनी धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ बॅनर लावले.. या निषेधाचे स्वरूप इतके तीव्र होते की,नागरिकांनी या बॅनरला जोड्यांचा हार घालून आपला रोष व्यक्त केला.. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.. स्थानिक शिवप्रेमींनी अशा वक्तव्यांचा जाहीर निषेधान केला असून,संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे...0
0
Report
हातकणंगले में प्रेम जाल में फंसाकर युवतियों के साथ अत्याचार, SIT जांच की मांग
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पुलाची शिरोली मधील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुमारे 10 हून अधिक तरुणींवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शाहीद समीर सनदी (वय २२, रा. पुलाची शिरोली) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लॉजवर नेऊन अश्लील व्हिडीओ तयार केले. या व्हिडीओच्या आधारे बदनामीची धमकी देत त्याने संबंधित तरुणींचे वारंवार शारीरिक व मानसिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुरुवात राजारामपुरी पोलीस ठाण्यात २० वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीतून झाली. तक्रार मिळताच हातकणंगले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील आणखी अनेक तरुणी या जाळ्यात अडकल्याचा दावा हिंदुत्ववाद्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला जात असून, पीडितांना पुढे येण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेत काहींकडून ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला असून कोणताही निष्कर्ष अद्याप जाहीर केलेला नाही. असे असले तरी पुलाची शिरोली ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवले आहे. त्याचबरोबर आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली आहे.. भाजपा आमदार अमल महाडिक यांनी आंदोलन स्थळी भेट ठेवून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.0
0
Report
सीएम फड़णवीस का सोलापुर दौरा: महापूजा के बाद सार्वजनिक सभाओं पर जोर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंतांच्या महापूजेचे आयोजन महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर शहरातील जाहीर सभेकडे होणार रवाना सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्थानिक पदाधिकाऱ्यांचा होणार सत्कार सत्कारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष0
0
Report
Advertisement
यवतमाड़ जिले में 10 ग्राम पंचायतों में मतदान शुरू; 3 सरपंच व 15 पंचायत सदस्य पदों के लिए चुनाव
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतील चार सरपंच आणि 79 सदस्यांची पदे विविध कारणामुळे रिक्त आहेत. त्यापैकी दहा ग्रामपंचायतीमध्ये तीन सरपंच आणि 15 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनी पाठ फिरवल्याने 67 सदस्यांच्या जागा रिक्तच राहणार आहेत.0
0
Report
पंढरपुर में जेल से छूटे अपराधी का जुलूस, सार्वजनिक शांति भंग के आरोप
Pandharpur, Maharashtra:खुनासारख्या गंभीर कलमाच्या गुन्ह्यातून कारागृहाबाहेर सुटल्याचा पंढरपुरात जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आतषबाजी झाली. मिरवणूकही काढली गेली. यातून सार्वजनिक शांतता भंग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पंढरपूरात 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या जल्लोषाचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत. लखन उर्फ पिंटू ढावरे हा सन 2017 साली पुणे येथे झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात नागपूर काराग्रहात शिक्षा भोगत होता. कारागृहातून सुटल्यानंतर लखन दुसऱ्याच दिवशी पंढरपुरात आला. याचवेळी त्याच्या साथीदारांनी विनापरवाना मोटारसायकल रॅली व मिरवणूक काढली. डोक्यावरून फटाक्याची पेटती माळ फिरवत लोकांच्या जीवितास धोका देखील निर्माण केला. याच बाबत पोलीस हवालदार सचिन हेंबाडे यांच्या फिर्यादीनुसार 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
युद्ध विराम के बाद कलिंगड के दाम उछले, भारतीय किसानों को मिली राहत
Yeola, Maharashtra:अमेरिका-इजरायल इराण युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारतीय शेती उद्योगाला मोठा फटका बसला होता; निर्यात होणाऱ्या अनेक फळे भाजीपाला पिकांचे दर कोसळले गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. युद्ध काळापूर्वी 20 ते 25 रुपये प्रति किलोने विकले जाणारे कलिंगड युद्धकाळात अवघे 5 ते 6 रुपये प्रति किलोने विकले गेले मात्र आता अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर कलिंगडाच्या निर्यातीला वाव मिळाल्याने कलिंगडाचे दर पुन्हा सुधारले आहेत; सध्या बाजारात कलिंगडाला 15 ते 16 रुपयांचा प्रति किलो दर मिळत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के ब्रह्मपुरी अस्पताल की पंजीकरण रद्द, ऑपरेशन थिएटर सील; तीन मरीजों की दृष्टि चली
Chandrapur, Maharashtra:टायٹل:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ख्र cristanंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द, जिल्हा प्रशासनाने ऑपरेशन थियेटर केले सील, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ३ रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची होती तक्रार अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द करत जिल्हा प्रशासनाने ऑपरेशन थिएटर सील केले आहे. रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ३ रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोमवारी या रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर सील केले. १९ फेब्रुवारी ला या हॉस्पिटल मध्ये ३ रुग्णांवर मोतिबिंदूचं ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर या तिघांची दृष्टी गेल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे अलीकडेच करण्यात आली होती. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानुसार ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्ररोग विभाग मंजूर नसतांनाही तिथे अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात असल्याची आणि या ठिकाणी ऑपरेशन केल्या जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी दिली आहे. त्यामुळे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ख्रिस्तन रुग्णालय हे या भागातील अत्यंत नामांकित आणि सेवाभावी रुग्णालय आहे. ख्रिस्त मिशनरीतर्फे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयात अल्प दरात सेवा मिळत असल्याने रुग्णांचा मोठा ओघ असतो. या कारवाईने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
अजीत पवार के निधन के तीन महीने पूरे, युगेंद्र पवार ने स्मृति स्थल पर श्रद्धांजलि दी
Rui, Maharashtra:राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी बारामतीत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाच दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय स्मृतिस्थळ परिसरात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.0
0
Report
नागपूर पुलिस अधिकारी शिवाजी ननवरे ने धौलागीरी शिखर फतह किया
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केला धौलागिरी शिखर जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे नेपाळमधील धौलागिरी शिखर यशस्वीरीत्या शिवाजी ननवरे यांनी सर केले आहे या शिखराची उंची 8,167 मीटर इतकी असून अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलीस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत शिवाजी ननवरे यांनी यापूर्वी जगातील अनेक उंच आणि आव्हात्मक शिखरे सर केली आहेत यात माउंट एवरेस्ट, माउंट लोहात्से, माउंट मकालू आणि माउंट मनास्लो या शिखरांचा समावेश आहे0
0
Report
Advertisement
वाशीम में सिंचन की कमी से फसलों का क्षेत्र घटा, ज्वारी की बुवाई बढ़ी
Washim, Maharashtra:यंदा सिंचनाच्या टंचाईमुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. वाढते तापमान आणि रब्बी हंगामातील जादा पाण्याच्या वापरामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.या परिस्थितीत उडीद, मका, बाजरी आणि सोयाबीन पिकांचे क्षेत्र कमी झाले. मात्र ज्वारीच्या पिकाने चांगली वाढ नोंदवली आहे. सरासरी ६३२ हेक्टरच्या तुलनेत यंदा ९७२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून सुमारे ३४० हेक्टरने वाढ झाली आहे.कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी आणि तिळाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.0
0
Report
वन्यप्राणी रात में पानी के लिए निकलते, 11 मचान से वॉटर होल सेंसेस
Washim, Maharashtra:वाशीम-अकोला सीमेवरील काटेपूर्णा अभयारण्य येथे १ मे रोजी होणाऱ्या वॉटर होल सेन्सससाठी वनविभागाने तयारी पूर्ण केली आहे. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या या उपक्रमासाठी कोअर व बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारण्यात आले आहेत. उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे आटत असल्याने वन्यप्राणी रात्री पाण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे अचूक नोंद घेण्यासाठी मचानांजवळ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी होणाऱ्या या सेन्ससमधून वन्यप्राण्यांची संख्या, वर्तन व हालचालींचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे संवर्धनासाठी महत्त्वाचे नियोजन करता येते.0
0
Report
सातारा के कुरकुंभ मंदिर से नया दस्तावेज: शिवाजी महाराज ने ध्वज मंडप बनवाया
Satara, Maharashtra:सातारा: पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील श्री फिरंगाई माता देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उजेडात आला आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी १६९८ मध्ये दिलेले एक आज्ञापत्र नुकतेच मोडी लिपीत वाचण्यात आले असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिरात 'ध्वज मंडप' बांधल्याचा आणि देवस्थानच्या नंदादीपाची व्यवस्था केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळला आहे. या शोधामुळे शिवकाळातील या जागृत देवस्थानाच्या महतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कुरकुंभ येथील देवीचे पुजारी मच्छिंद्र भगत यांनी पुणे पुरालेखागारातून या पत्राची प्रत प्राप्त केली होती. या पत्रातील गुढ आणि अप्रकाशित माहिती मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी प्रकाशात आणली आहे. यांच्या मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी सातारच्या राजघराण्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. आणि या विषयाची पूर्ण माहिती देऊन एकदा या मंदिराला भेट द्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
