icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोकुळ दूध संघ चुनाव: राष्ट्रवादी बड़ा भाई बनकर सत्ता पाया क्या?

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय समीकरणांवरूनही दावे-प्रतिदावे सुरू झालेत. केंद्रात आणि राज्यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. पण दुसरीकडे गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलय. मुश्रीफ यांच्या या विधानामुळे गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोकुळची सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून आपलं राजकीय वजन दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे…गोकुची निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पायाला भिंगरी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांची समविचार आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, जनसुराज्य आणि राष्ट्रवादी हे चार प्रमुख घटक पक्ष आहेत. मात्र, गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी म्हणाले की राज्यात महायुती सरकारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, तर केंद्रातही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. अशा परिस्थितीत गोकुळमध्ये राष्ट्रवादी पक्ष मोठ्या भाऊच्या भूमिकेत असल्याचं हसन मुश्रीफ यांचे विधान गोकुळाच्या निवडणुकीत जागा वाटपात कोण वरचढ ठरणार हे अधोरेखित करतं... गोकुळच्या निवडणुकीत जागावाटपाचा प्रश्न महायुतीसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे गेल्या 5 वर्षाच्या काळातील गोकुळच्या राजकारणाचा अनुभव आणि मजबूत संस्थात्मक नेटवर्क आहे, तर भाजपकडूनही गोकुळच्या सत्तेत आपला वाटा वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे. पण भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका Shau.mika Mahadik ने मात्र जागा वाटपाचा फॉर्मुला वरिष्ठ नेते बसून ठरवतील असं सांगत त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.
0
0
Report

यवतमाळ के आकाश पलण में बेरिंग फँसने से महिला के बाल खिंचे, खोपड़ी घायल

Yavatmal, Maharashtra:Anchor : जत्रेत, मीना बाजार किंवा अम्युझमेंट पार्कमध्ये गेल्यावर आकाश पाळण्यात बसत असाल तर खबरदार, आकाश पाळणा किंवा कोणत्याही वेगवान चक्राकार फिरणाऱ्या पाळण्यांमध्ये 'बेरिंग' आणि 'गिअर्स' उघडे असतात. जेव्हा कोणी महिला मुलगी लांब केस मोकळे ठेवून झुल्यात बसते, तेव्हा हवेच्या वेगामुळे केस त्या फिरत्या भागांमध्ये अडकण्याचा मोठा धोका असतो. केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्यास केस मुळासकट ओढले जातात, ज्यामुळे डोक्याची त्वचा सोलून निघण्याची अत्यंत वेदनादायक आणि भयानक दुर्घटना घडू शकते. VO 1 : यवतमाळच्या फुलसावंगी येथे आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेअरिंग मध्ये अडक्ल्याने तिच्या केसांसह डोक्याची चामडी निघाली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. बाली टाळीकोटे असे जखमी महिलाेचे नाव असून, ती पुणेश्वर मंदिर येथील यात्रेत गेली होती. तेथील आकाश पाळण्यात बसून ही महिला झोका घेत असताना तिचे केस पाळण्याच्या बेअरीिंगमध्ये अडकले, त्यामुळे तिचे केस डोक्याच्या चामडीसह ओढल्या गेले. या अपघातानंतर पाळणा थांबविण्यात आला, महिलेला उपचारासाठी पुसद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. VO 2 : महिला आणि मुलींनी पाळण्यात बसण्यापूर्वी आपले केस व्यवस्थित आणि घट्ट बांधून घ्यावेत, केस मोकळे ठेवणे किंवा हवेत उडतील असे सोडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. ओढणी, साडीचा पदर, स्कार्फ पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घ्या. पाळणा चालू असताना किंवा संथ गतीने फिरत असतानाही कधीही उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करू नका. आनंद घेण्यासाठी गेलेल्या ठिकाणी एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे अशा ठिकाणी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.
0
0
Report

उमदी के कुएं में पानी के साथ पेट्रोल-जैसा पदार्थ, ग्रामीणों में हड़कंप

Sangli, Maharashtra:स्लग - विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोल !.पाण्याला उग्र पेट्रोलसदृश्य वास.. काडीपेटी ओढताच भडका ! अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे सांगण्यात येत होत,मात्र काल सायंकाळी पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थचे तवंग स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीतील पाणी शेतात सोडण्यात आले असता, पेट्रोलचा वास आणि तवंग मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी काडीपेटी ओढल्यावर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.ज्या ठिकाणापर्यंत पाणी गेले होते, त्या भागातही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून देखील घटनास्थळी धाव घेत नेमका हा प्रकार कशामुळे घडत असल्याचं तपासण्यात येत आहे. विहिरीच्या समोरच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप पासून त्या ठिकाणाहून गळती होऊन विहिरीत पेट्रोल येत आहे,का याचा देखील शोध घेण्यात येत आहे.मात्र पाण्यासोबत पेट्रोल सदृश्य पदार्थ येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव से पहले फूलों के दाम तेज़ी से बढ़े, मार्केट में भीड़ बढ़ी

Kalyan, Maharashtra:गणेशउत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव वाढले.. फुलमार्केट मध्ये फुल घेण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी.. गणेशोत्सवात विविध फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवामध्ये निमित्त मुंबईच्या दादर फुलमार्केट नंतर ठाण्यातील कल्याण फुलमार्केट मध्ये गर्दी पहायला मिळत आहे. गणेश उत्सव दोन दिवसांवर आल्याने फुलांचे दरात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडू, शेवती, गुलाब, काकडा चे भाव कोसळले होते. मात्र गणेश उत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने फुलांची मागणी वाढलीय. झेंडू 60 ते 70 रुपये शेवती 150, गुलाब 300 रुपये भाव वाढले आहेत तर उद्या आणखी भाव वाढण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले. यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. कल्याण
0
0
Report

बारिश न होने से सोयाबीन सूखा, किसान स्मशान में राख, प्रदर्शन, मदद की मांग

Washim, Maharashtra:वाशिम: घोटा गावात पावसाअभावी सुकलेल्या सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत होळी केली आहे. तालुक्यात गेल्या ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने खरिपाची पिकं पूर्णतः सुकून गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सुकलेलं सोयाबीन स्मशानभूमीत जमा करून सरकारचा निषेध केला. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मदत लवकर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला दिला आहे.
0
0
Report
Advertisement

भरणे ने कहा: इंदापूर में हर्षवर्धन पाटील के साथ पुणे जिला बैंक चुनाव में फायदा होगा

Rui, Maharashtra:आता हर्षवर्धन पाटील सोबत आहेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फायदा होईल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं मत. भरणेवাডीस निवासस्थानी पार पडली सोसायटीच्या प्रतिनिधींची बैठक. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थानी सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पूर्वी आपण वेगळं होतो परंतु आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपण सगळे एकत्र आहोत त्यामुळे पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मध्ये म्हटलं आहे. बँकेत काम करताना संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि आपण स्वतः कधीही राजकारण केलं नाही,कधीही कोणाची अडवणूक केली नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही दोघांनीही घेतली असंही मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे. साऊंड बाईट _कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
0
0
Report

लातूर में किसान आंदोलन: सूखा राष्ट्रीय आपदा घोषित कर हेक्टेयर 1 लाख मुआवजे की मांग

Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन... कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी... पावसाअभावी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय... या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले... जवळपास तासभर हे आंदोलन चालले... कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा, पीक कापणी प्रयोग गावनिहाय घ्यावे, अश्या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेने केल्या
0
0
Report
Advertisement

मनोज जरांगे के मुंबई प्रस्थान पर गिरफ्तारी की मांग तेज, पुलिस कार्रवाई के संकेत

Pandharpur, Maharashtra:मनोज जरांगे यांच्या मुंबई कडे जाण्याची घोषणा करताच, प्रा लक्ष्मण हाके आक्रमक यांना आज उद्या जरांगे यांना अटक करावी त्यांना कायद्याचा बडगा दाखवा आजच पोलिसांनी उचलावे, प्रा लक्ष्मण हाके यांची मागणी आता शासन काय करते आम्ही पाहत आहे. आमचा मोर्चा थांबवण्याची विनंती केली आम्ही त्यांना प्रतिसाद दिला. आता जरांगे यांच्या बाबत रेड कार्पेट टाकत की काय करते बघावे लागेल. सरकला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. गणेश उत्सव टायमिंग साधतात. मुंबईला जाणे म्हणजे सरकला वेठीस धरणे आहे. त्यांनी आता दिल्लीत जावे कारण मुंबई मध्य त्यांचं कोणी ऐकणार नाही. पंडित नावाच्या व्यक्तीला लगेच अटक होते. मग मनोज जरांगे यांची भाषा कशी आहे कारवाई का होत नाही. अमृता ताई त्यांना गोड भाषेत समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे. मनोज दादा आरक्षण सामाजिक मागासच आहे अस त्यांनी सांगाव एवढे दिवस उपोषण करूनही जरांगे ठीक आहे. सलाईन घेत होते की अजून काही त्यातून घेत होते.
0
0
Report

सातारा स्टेशन पर सामान रखने की सुविधा नहीं, अमेरिकी पर्यटक का अनोखा विरोध

Satara, Maharashtra:सातारा : सातारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सामान कक्ष (क्लॉक रूम) उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या अमेरिके पर्यटक टोनी बाबावाला यांनी अनोखे आंदोलन केले. डोक्यावर कपड्यांची बॅग ठेवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पर्यटनासाठी साताऱ्यात आलेल्या टोनी यांना अतिरिक्त सामान सुरक्षित ठेवण्यासाठी सुविधा नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी स्थानकातील प्रवाशांशी संवाद साधून सुविधांच्या अभावाबत माहिती घेतली आणि त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केले. परदेशी पर्यटकाला सामान ठेवण्यासाठी साधी सुविधाही उपलब्ध नसल्याने सातारा रेल्वे स्थानकातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे : सातारा रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून सामान कक्षासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. स्थानकाचा ‘अमृत भारत योजने’त समावेश झाला असून, नव्या स्थानकात सामान कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिलीJ जाईल, अशी माहिती स्टेशन मास्तर गणपत चव्हाण यांनी दिली.त्याच बरोबर या परदेशी टोनी पर्यटकाने साताऱ्याचा अनेक पर्यटनस्थळा भेट देऊन या स्थळांचे कौतुक केले आहे.
0
0
Report

वाशिम में बारिश से गणेश मूर्तियों का बाजार प्रभावित, छोटी मूर्तियां प्रचलन में

Washim, Maharashtra:वाशिममध्ये गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या पृष्ठभूमीचा परिणाम आता गणेश मूर्तीनां बाजारावर दिसून येत आहे. वाशिमच्या शेलूबाजारसह जिल्ह्यातील नदी-नाले आणि जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भक्तांकडून मोठ्या मूर्त्यांऐवजी लहान मूर्त्यांना पसंती दिली जात आहे. याचा फटका मोठ्या मूर्तिकारांना बसला असून, अनेक महिने मेहनत घेऊन तयार केलेल्या मूर्तींची विक्री कशी होणार, याची चिंता त्यांना लागली आहे. प्रशासनाने कृत्रिम विसर्जन कुंड आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे-बेंगलूर राष्ट्रीय राजमार्ग पर सातारा-खंडाळा क्षेत्र में भारी ट्रैफिक जाम

Satara, Maharashtra:सातारा :पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा परिसरात सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मुंबईहून गणेश भक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जात असतात.सातारच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, प्रवाशांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.मह महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि महामार्ग यंत्रणेने उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे。
0
0
Report

अमृता फड़णवीस ने महाराष्ट्र के लिए दिल्ली दौरे और आरक्षण पर स्पष्ट टिप्पणी की

Ahilyanagar, Maharashtra:सणवाराचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचं ते शांतीपूर्वकच करतील असं अमृताअ फडणवीस यांनी मनोज जरंगे पाटील यांना उद्देशून म्हटल आहे. मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईला येण्याचा इशारा दिला होता यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिले आहे. अहिल्यानगर येथे समर्पण चतुर्मास कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळे त्या माध्यमांशी बोलत होत्य/, मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्ली दौरा करतात, त्यामुळे भविष्यात ते दिल्लीमध्ये जाऊन राजकारण करतील अशा राजकीय चर्चा सुरू असतात... याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्यात की ते दिल्ली दौरा करतात मात्र महाराष्ट्रासाठी अनेक योजना मंजूर करून आणायचे असतात ते महाराष्ट्रासाठी झटतात याचा मला अभिमान आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस ऑन बँक कर्मचारी संप पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत, यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबदाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार याबत मार्ग काढेल... आंतरराष्ट्रीय बँका या शनिवार आणि रविवार सुट्टी देतात मात्र आपल्याकडे खाजगी आणि सरकारी बँक अद्याप सुट्ट्या देत नाही मात्र हा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top