445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में आयचीत मंदिर बस स्टॉप के पास चाकू हमला, एक घायल
Nagpur, Maharashtra:नागपुरात आयचित मंदिर बस स्टॉप मागे एका गल्लीत एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याने खळबळ माजली होती.. आयचीत मंदिर बस स्टॉप मागे अंबिका देवी मंदिराजवळ हल्ल्याची ही घटना घडली.. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेला माणूस बडकस चौकाच्या दिशेने गेला. दरम्यान बडकस चौकातून सरसंघचालकांचा ताफा थोड्यावेळ आधीच तिथून निघून गेला होता . आकाश ढोमणे असे जखमीचे नाव असून हल्लेखोर गणेश वानखेडे आहे... एका महिलेशी संबंधित विषयावर दोघांमध्ये वाद होऊन हा चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे…0
0
Report
सुजात आंबेडकर ने राष्ट्रवादी की भूमिका पर सवाल उठाए, राजनीति में घुमाव बढ़ा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : राष्ट्रवादीची भूमिका ही कायम बेडगी होती आणि आहे - सुजात आंबेडकर - महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता आहे. evm बाबت शंका, SIR ची भिती मनात आहे - भाजप नको म्हणून लोकांनी विरोधी पक्षातील लोकांना निवडून दिले. - मात्र तेच लोकं भाजपत जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. - सुप्रिया सुळे आणि त्यांचे खासदार पंतप्रधानाना भेटले - ते सांगत आहेत की, महिला विधेयकासाठी आम्ही भेटतोय पण ते खोटे आहे. - डिलिमीटेशन बिल कसं लागू होऊ शकत त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट पंतप्रधानाना भेटले - एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे लग्न एका कट्टर RSS विचारसरणी असलेल्या व्यक्तीच्या मुलासोबत झाले. - त्यामुळे जो भाजपला विरोध करतोय तेच त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत. - वंचित बहुजन आघाडीने मराठा वि. ओबीसी यावर भूमिका घेतली. - जें भाजप सोबत हातमिळवणी करतात त्यांच्या विरोधात भूमिका घेतोय. - शरद पवार गट त्यांची काय भूमिका घेतो ते पाहणे महत्वाचे आहे. - भाजप सत्तेत आल्यापासून डिवाईड आणि रुल ही नीती वापरत आहे. - भाजपने हिंदू मुस्लिम नंतर मराठा विरुद्ध ओबीसी, मातंग विरुद्ध बौद्ध असा वाद निर्माण केला. - अभिजीत दिपके हे स्वतः एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्याना मी काय सल्ला देणार. - भाजपने राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार फोडले. - भाजप हे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांना शेल कंपनीप्रमाणे वापरते. - सुप्रिया sुळे या पंतप्रधानांना भेटायला गेले आहेत. डिलिव्हिटेशन बिल झाल्यानंतर कळेल राष्ट्रवादी SP गट कोणाच्या बाजूने आहे. - ऑन शरद पवार टीका : - राष्ट्रवादीची भूमिका ही कायम बेडगी होती आणि आहे. - अजित पवारांनी दोन-तीन वेळा सांगितले की पहाटेच्या शपथविधी शरद पवारांना माहिती होता. - शरद पवारांची भूमिका नेहमी नाटकी आणि खोटी होती. - महाराष्टाच्या पुरोगामी चळवळीत धूळफेक करणारी होती. - ऑन जयंत पाटील : जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा बुकिंग एजंट एक असेल. मला त्यामध्ये फार माहिती नाही. - ऑन जरांगे पाटील टीका : कोणाच्याही व्यंगावरून टीका केली नाही पाहिजे अशी माझी नेहमी भूमिका आहे. - BYTE : सुजात आंबेडकर ( नेते, वंचित बहुजन आघाडी)0
0
Report
गोकुळ दूध संघ के चुनाव के लिए सुप्रीम कोर्ट ने 60 दिन की मुदतवाढ दी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 60 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज गोकुळच्या निवडणुकीसाठी 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. विभागीय उपनिबंधक दुग्ध यांनी मुदतवाढ मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात गेले होते. या आधी सुप्रीम कोर्टाने 90 दिवसांमध्ये निवडणूक घेण्याबाबत आदेश दिले होते. दूध संस्थेच्या 1300 हून अधिक संस्थांच्या पात्र आपात्रतेचा मुद्दा निकाली निघाल्याने आणि मतदार याद्या तयार न झाल्याने विभागीय उपनिबंधक सुप्रीम कोर्टात गेले होते.0
0
Report
Advertisement
नागपुर: नाबालिग अपहरण-यौन अत्याचार-हत्या की कोशिश के आरोपी आकाश पाखरे जेल भेजे जाएंगे
Nagpur, Maharashtra:नागपूर - अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार व हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपी निर्मय उर्फ आकाश पाखरे कारागृहात रवानगी . - रुग्णालयातून सुटी मिळताच आरोपीची कारागृहात रवानगी. - नागपूर पोलिसांकडून ठाण्यातील आरोपीच्या घराची झडती. - झडतीत मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त. - सोशल मीडियावरील बनावट ओळख, चॅट, कॉल रेकॉर्ड आणि अन्य डिजिटल पुराव्यांची तपासणी होणार. - घटनेच्या वेळी आरोपीचे दोन मोबाईल पोलिसांनी आधीच जप्त केले होते. - आरोपी नागपुरात कोणत्या विमानाने आणि नेमका कधी आला, याचा तपास सुरू. - विमान तिकीट कोणी बुक केले, कोणता मोबाईल क्रमांक अथवा ई-मेल वापरला आणि पैसे कसे भरले, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. - इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून आरोपीच्या हालचाली आणि संपर्कांबाबत महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता.0
0
Report
सांताक्रुझ पुलिस ने घरफोड़ी आरोपी को बिहार से पकड़ा, 76.39 लाख संपत्ति बरामद
Mumbai, Maharashtra:सांताक्रुझ पोलिसांनी लाखो रुपयांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सराईत आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७६ लाख ३९ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत आणि गोठवण्यात यश मिळवलं आहे. सांताक्रुझ पश्चिम येथील जुहू तारा रोड परिसरात २० जून ते २७ जुलैदरम्यान ही घरफोडी झाली होती. घरमालक गैरहजर असल्याचा फायदा घेत आरोपीने खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा आणि कपाटाचा लॉकर फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि رولॅक्स घड्याळ असा सुमारे ५४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चंदन कमलेश मुखिया या २६ वर्षीय आरोपीचा शोध घेतला. आरोपी दरभंगा, बिहार येथे असल्याची माहिती मिळताच सांताक्रुझ पोलिसांचे पथक बिहारमध्ये रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करून न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे. तपासादरम्यान २०० ग्रॅम सोन्याची लगड आणि सुमारे ५ लाख रुपयांचे रोलॅक्स घड्याळ, अशी ३० लाखांची मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेतली. तर चोरीच्या पैशांपैकी ४६ लाख ३९ हजार रुपये बँक खात्यांमध्ये गोठवण्यात आले आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.0
0
Report
मराठवाडा में भाजपा ने युवाओं के लिए तिरंगा यात्रा की योजना घोषित की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात राजकीय तापमान तापलेले असताना आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन-झींच्या देशभक्तीचे कौतुक केलेले असतानाच, भारतीय जनता पार्टीन तरुणांना सोबत घेण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मागील दोन आठवड्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकीमुळे शहर राजकीय घडामोडींचे केंद्र बनले होते. त्यामुळं मराठवाड्यातील आपला राजकीय दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि तरुणाईला साद घातण्यासाठी भाजपने या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे...0
0
Report
Advertisement
जायकवाडी बैकवॉटर में डूबने से दो चचेरे भाई मृत, अमलेनेर में मातम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील अमळनेरवस्ती येथे जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये बुडून दोन लहान चुलत भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविंद्र मिसाळ व अविनाश मिसाळ या सख्ख्या भावांची शेती जायकवाडी बैंकवाटरलगत आहे. त्यामुळे कुटुंब शेतवस्तीवरच वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी तन्वी व आयुष ही दोन्ही मुले घराच्या अंगणात खेळत होती. खेळता खेळता कुटुंबीयांची नजर चुकवून ती शेजारी बॅकवाटरच्या पाण्याच्या दिशेने गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा अचानक तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. मुले सुरक्षित ठिकाणी खेळत असतील असा समज झाल्याने काही वेळ कुटुंबीयांचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. मात्र, मुले न दिसल्याने शोधाशोध सुरू केली. बँकवाटरच्या पाण्याजवळ मुले पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बालकांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले0
0
Report
Koina Dam: All gates closed, discharge controlled; 1050 cusecs released from Paitha Powerhouse
Satara, Maharashtra:सातारा : कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले असून, सांडव्यावरून होणाऱ्या विसर्ग थांबवण्यात आला आहे. मात्र पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातून कोयना नदीपात्रात १,०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.0
0
Report
फडणवीस ने राहुल गांधी पर इथेनॉल मुद्दे पर तीखी टिप्पणी, किसानों के मेळावे में नया मोड़
Kolhapur, Maharashtra:इथेनॉलच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खडसावल आहे. काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोल संदर्भात टीका करत आहेत, ते आपल्या गाडीचं झाकण उघडून काहीतरी दाखवत आहेत. आता ते झाकण उघडल्याने त्यांना काय दिसलं मला समजलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. इतकंच नव्हे तर इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे तुमची गाडी बिघडली अशा पद्धतीचा पुरावा द्या अस वहान कंपन्यानी आवाहन केले आहे, पण अजून तरी इथेनॉलमुळे गाड्या खराब झाल्याचं सांगायला कोणी पुढ आलेलं नाही असे टिप्पणी करत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते, त्यांच्यासमोरच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या इथूनाल संदर्भातल्या विधानावर टीका केलीय.0
0
Report
Advertisement
ठाणे के टिकोजीराव बनाम खोचटराव: सियासी टकराव तेज
Mumbai, Maharashtra:विषय : ठाण्याचे "टिकोजीराव" तर भांडुप चे "खोचटराव" भांडुपच्या "खोचट रावांना" दुसऱ्याची चेष्टा मस्करी, टिंगल टवाळी करता करता आपला नेता आणि आपला पक्ष कसा संपला हे कळले देखील नाही. टिकोजीराव या नावाचे ऐतिहासिक महत्त्व, नेतृत्व, कर्तबगारी, लोकप्रियता ही खोचटरावांना समजणार नाही. सुप्रिया सुळे त्यांच्या सहकारी त्यांना कशा फसविणार हे सुद्धा खोचटरावांना समजत नाहीये. सुप्रिया सुळे या हुशार आहेत. त्यांचा धूर्तपणा खोचटरावांना तोंड कशी पडल्यानंतरच कदाचित समजेल.0
0
Report
नासिक में भूकंप के झटके, प्रशासन ने अफवाहों से बचने की अपील की
Nashik, Maharashtra:नासिक जिले में शनिवार रात करीब 10 बजे भूकंप के झटकों से लोगों में दहशत का माहौल बन गया। सुरगाणा, नासिक, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, निफाड, चांदवड और येवला तहसील के कुछ इलाकों में भूकंप के झटके महसूस किए गए। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र के अनुसार इस भूकंप की तीव्रता रिक्टर स्केल पर 4.3 दर्ज की गई है। भूकंप का केंद्र गुजरात राज्य के हाथगढ़ पर्वत श्रृंखला के पास, जमीन से करीब 5 किलोमीटर नीचे बताया गया है। भूकंप के झटकों के बाद जिले के कई इलाकों में लोगों में डर का माहौल है। हालांकि, प्रारंभिक जानकारी के अनुसार जिले में किसी भी तरह की जनहानि नहीं हुई है। वहीं, कुछ स्थानों पर मकानों में दरारें आने की घटनाएं भी सामने आई हैं। संभावित खतरे को देखते हुए जिला प्रशासन ने नागरिकों से घबराने के बजाय सतर्क रहने की अपील की है। खासकर पत्थर और मिट्टी से बने कच्चे मकानों में रहने वाले नागरिकों से विशेष सावधानी बरतने का आग्रह किया गया है। ग्राफिक्स – जिला प्रशासन की महत्वपूर्ण अपील पहली सूचना: जिला प्रशासन और स्थानीय राजस्व विभाग संबंधित तहसीलों के लगातार संपर्क में हैं। दूसरी सूचना: नागरिक बिल्कुल भी घबराएं नहीं और प्रशासन को सहयोग करें। तीसरी सूचना: किसी भी तरह की अफवाहों पर विश्वास न करें। व्हॉट्सऐप, फेसबुक या अन्य सोशल मीडिया पर मिलने वाली अपुष्ट जानकारी और संदेशों को आगे प्रसारित न करें। चौथी सूचना: नागरिक केवल जिला प्रशासन द्वारा जारी की जाने वाली आधिकारिक जानकारी और निर्देशों पर ही भरोसा करें। पांचवीं सूचना: आवश्यकता पड़ने पर नागरिक नजदीकी तहसील कार्यालय, पुलिस पाटील, तलाठी अथवा ग्राम पंचायत कार्यालय से संपर्क करें। भूकंप के झटकों के बाद नागरिकों में डर जरूर है, लेकिन प्रशासन की ओर से स्थिति पर नजर रखी जा रही है। ऐसे में नागरिक सतर्क रहें, लेकिन अफवाहों पर विश्वास न करें और प्रशासन द्वारा जारी आधिकारिक सूचनाओं का ही पालन करें।0
0
Report
GMRT के पास मार्ग बदलने से पुणे-नाशिक रेल्वे पर आक्रोश, किसान-नेता सड़क पर
Nashik, Maharashtra:पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून आता संघर्ष पेटला आहे. पुणे–नाशिक रेल्वेमार्ग बदलण्याचा निर्णय झाल्यामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.. आज जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाशिक पुणे महामार्ग अडवल्याने महामार्ग जवळपास दोन ते तीन तास ठप्प झाला होता.. - पुणे आणि नाशिक या दोन औद्योगिक शहरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक अशी धावणार होती. या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यासह संगमनेर आणि सिन्नर परिसराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मार्गातील नारायणगाव नजीक असणाऱ्या GMRTच्या संवेदनशील वैज्ञानिक उपकरणांवर रेल्वे मार्गाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मूळ मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचा निर्णय जाहीर केला. नव्याने जाहीर करण्यात आलेला पर्यायी मार्ग पुणे–अहिल्यानगर–शिर्डी– नाशिक असा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयामुळे चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली असून राजकारणी नेत्यांसह शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत... आमच्या संगमनेरची समृद्धी तुम्ही घेऊ शकत नाही.. आमच्या हक्काची रेल्वे कोणाला घेऊ देणार नाही.. थोरात साहेबांच्या काळात मंजूर झालेला मार्ग सगळ्या त्यावेळी मान्य होता..अनेक शेतकऱ्यांना जागेचे पैसे देखील वाटण्यात आले..त्यावेळी GMRT ची परवानगी घेतली असेल ना ? पण आता वेळखाऊपणा सुरू आहे त्या विरोधात आपला लढा... सत्यजीत ला ताब्यात घेतलं असले तरी आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील ही विसरू नका अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी दिलीये... सत्यजीत तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन गेले... बाईट आंदोलक.. नाशिकच्या सिन्नर येथील गोंदे फाटा येथे देखील नाशिक पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळालं ज्यावेळी आंदोलन करतांना पोलीस ताब्यात घेत होते त्यावेळी सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन गेले... यावेळी अनेक आंदोलकांनी पोलीस वाहना अडवण्याचा प्रयत्न केला काही आंदोलकांनी पोलीस वाहनावर चढण्याचा देखील प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी बाळाचा वापर करत या सगळ्या आंदोलकांना पोलीस वाहनापासून बाजूला केलं.. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली... बाईट आंदोलक.. नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विचार आपल्यासमोर मांडला गेला GMRT बाबत अभ्यासासाठी अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात समितीची स्थापना केलीये... सरकार मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असताना आंदोलन करण्यात अर्थ नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चक्काजाम आंदोलनावरून निशाणा साधला... विनाकारण एखाद्या प्रश्नाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही.. आंदोलनाचा फार्स करण्याअपेक्षा समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेऊ... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया दिलीये... नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या ठरलेल्या मार्गात कोणताही बदल करू नये, तसेच प्रकल्पाबाबत केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता जनभावनेचाही विचार करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. नाशिक-पुणे रेल्वेसाठी नागरिक आणि तरुण रस्त्यावर उतरले असून, या आंदोलनामागे राजकीय हेतू नसल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. नाशिक-पुणे रेल्वेसाठी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रश्न मांडण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भात समिती नेमण्यात आली. या समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी तांबे यांनी केली. नाशिक-पुणे रेल्वेसाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया झाली असून, शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आल्याचा दावा तांबे यांनी केला. त्यामुळे आता अचानक JMRD चे कारण पुढे आले असल्याबद्दल त्यांनी सवाल उपस्थित केला."लाईन ठरली, कोण करणार हे ठरले, भूसंपादन झाले, पैसे दिले. आता JMRD चे कारण पुढे आले आहे. वरातीमागून घोडे आणल्यासारखी परिस्थिती आहे," अशी टीका सत्यजित तांबे यांनी केली.दरम्यान, नाशिक-पुणे रेल्वेसाठी नागरिकांना त्रास देणे हा आंदोलनाचा हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या माध्यमातून आपल्याला लेखी आश्वासन देण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. तसेच गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचेही त्यांनी नमूद केले.समृद्धी महामार्गाच्या प्रश्नावरही आंदोलन झाले होते, याचा दाखला देत जनभावना महत्त्वाची असल्याचे तांबे यांनी सांगितले. फक्त तांत्रिक कारणांचा विचार करू नये. जनभावनेचाही विचार झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.0
0
Report
Advertisement
नाशिक में विश्व आदिवासी दिवस पर भव्य शोभायात्रा, हजारों आदिवासी आकर्षक पोशाकों में
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा... - आदिवासी समाजातील पारंपारिक नृत्य वाद्यांवर ताल धरत शोभायात्रा ... - जागतिक आदिवासी दिनानिमित्त सभा यात्रेमध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी ... - आदिवासी पोशाख परिधान करून हातात तीर कामानं घेत अनेक आदिवासी बांधव शोभा यात्रेत सहभागी... अँकर : नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक मध्ये आज आदिवासी बांधवांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते हजारो आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेमध्ये तीर कमान घेऊन या शोभायात्रेत सहभागी झाले होते यावेळी आदिवासी समाजातील विविध रितीपरंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडले दरम्यान या शोभायात्रेत आदिवासी बांधवांची पारंपारिक वाद्य आणि नृत्यदेखील बघायला मिळाले याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
यवतमाल उमरी के स्मारक पर क्रांती दिन पर ध्वजारोहण, शहीदों को सम्मान
Yavatmal, Maharashtra:क्रांती दिनानिमित्त यवतमाळच्या उमरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकावर पालकमंत्री संजय राठोड यांचे उपस्थितीत स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना अभिवादन करण्यात आले. 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशासाठी प्राणाहुती देऊन हौतात्म्य पत्कारणाऱ्या यशवंत पाळेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सेनानींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उमरी येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. क्रांती दिननिमित्त पालकमंत्र्यांनी येथे ध्वजारोहण केले. यावेळी शहीद कुटुंबियांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जपल्या जाव्या अशी भावना पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.0
0
Report
तूकाराम मुंढे के बयान पर नागपुर में सावजी समुदाय में बवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर तुकाराम मुंढे यांच्या सावजीच्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मात्र या वादावर तुकाराम मुंडे यांनी टू द पॉईंट या मुलाखतीत रोखठोक भाष्य केले. तुकाराम मुंडे हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. माझ्या संदर्भात हे वक्तव्य केलं.. सावजी जेवण ओईली, solti हे फॅट आहे असं वक्तव्या त्यांनी केल्या. तसेच मी कोणत्याही कल्चर आणि कम्युनिटी बाबत बोललेलं नाही फूड हॅबिट संदर्भात विधान होतं असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले. त्यानंतर या या मुलाखतीनंतर नागपुरातील सावजी,हलबा समाजाने दिलेली प्रतिक्रिया सावजी -- (राजेंद्र नांदेकर चौपाल मधील पहिला बाईट ) -- टू द पॉईंट पहायले -- मुंढे साहेबांनी सॉल्टी म्हणाले... मीठ म्हटले तर खाऊ शकाल का? --- सावजी हा चवीचा विषय आहे --- सावजी ही चव, पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येते ( निकेश वाकोडिकर चौकटीचा शर्ट ) - मुंढे साहेबांच्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायिकांवर मोठं संकट आलेय.. त्यांनी क्षमा मागावी -- आमच्याकडे एकच ग्राहक अनेकदा येतो त्यांनी सावजी जेवण खाल्लं असतं आणि तब्येत बिघडली असती तर तर आले असते का ते? (राजेंद्र नांदेकर) -- जर ठाम आहे... मात्र त्यांनी निर्माण केलेल्या वादा नंतर सावजी खवय्ये येतात.. आमच्या सावजी मसाल्यामध्ये आयुर्वेदिक पदार्थ असतात आणि पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येतो -- तुम्ही एखाद्या गृहिणीकडे जाऊन त्यांची मुलाखत घ्या... मसाल्यामध्ये लवंग मिरे आणि इतर 26 गोष्टी असतात -- शरीराला अॅपायकारक असं अजिनोमोटो सारखे पदार्थ नसतात --- मूळ सावजी व्यतिरिक्तही अनेक जण सावजी नावाने व्यवसाय चालवतात... तिथे कदाचित मुंढे साहेब गेले असावे -- त्यांच्या मित्रांनी त्यांना सावजी आवडते म्हणूनच घेऊन गेले असावे... त्यांनी त्यांच्या मित्राला विचारावे की तुम्हाला असा तुमहाला अनुभव आला का? -- मुंढेनी य आमच्याकडे येऊन पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या सावजीचा आस्वाद घ्यावा... --- आमच्याकडे या झी24तास च्या माध्यमातून मी त्यांना निमंत्रण देतो0
0
Report
Advertisement
