Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 03, 2025 11:02:24
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले में खंडणी प्रकरण में कांग्रेस के युवा नेता की गिरफ्तारी चंद्रपूर जिले के पोंबहर्णा क्षेत्र के चेक वेऴवा–अंधारी नदी घाट पर रेती घाट के काम में बाधा डालकर खंडणी मांगने के आरोप में कांग्रेस के युवा नेता वैभव पिंपळशेंडे के खिलाफ खंडणी का मामला दर्ज कर रामनगर पुलिस ने गिरफ्तारी किया। इस प्रकरण से जिले में बवाल मच गया है। रेती घाट ठेकेदार की ओर से पिंपळशेंडे ने ऑनलाइन पद्धति से विभिन्न तारीखों पर 1,43,000 रुपये लिए. इसके अलावा उनकी सुपरवाइजर से 1,00,000 रुपये नकद वसूल करने का दावा किया गया है. कुल मिलाकर 2,43,000 रुपये की खंडणी लेने की जानकारी शिकायतकर्ता ने पुलिस को दी. इस प्रकरण की आगे की जांच चंद्रपुर रामनगर पुलिस कर रही है.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 03, 2025 10:54:32
Satara, Maharashtra:सातारा - राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात अनेक त्रुटी होत्या. एखादी केस न्यायालयात प्रलंबित असेल तर निवडणुका पुढे जाणार हे मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला माहीत नव्हते का? फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याचा आदेश असल्यामुळे घाई गडबडीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हे निवडणूक आयोगाचे आणि राज्य सरकारचे फेल्युअर असल्याचं राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सांगितले आहे. महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखी अवस्था ही निवडणूक आयोगाची झाली आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने मिळूनच हे सगळं केलं आहे का? सामान्य लोकांचा देखील या निवडणुकीवर विश्वास राहिलेला नाही. लोकांचा असा आरोप आहे की या वीस दिवसात मशीन मध्ये घोळ केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच जर लोकांचा या ईव्हीएम मशीन वर विश्वास नसेल तर सरकार का हट्ट करते असा सवाल देखील शिंदे आणि उपस्थित केलाय.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 03, 2025 10:52:25
Nanded, Maharashtra:जात वर्चस्ववादातून सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी दिली. अंजलीताई आंबेडकर यांनी आज नांदेडमध्ये पीडित ताटे कुटुंबीयांची भेट घेतली. सक्षम आणि आंचलची मैत्री तोडण्याचा प्रयत्न मामिलवार कुटुंब आधीपासून करत होते. आंचल चे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असताना तिला सक्षम विरोधात तक्रार देण्यास बळजबरी करून पोकसो चा गुन्हा दाखल करायला लावण्यात आला होता. असे प्रकरण घडल्यानंतर युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा बाऊ केला जातो आणि घडलेल्या गुन्ह्याचे क्षुल्लकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो ते होऊ नये असेही अंजलीताई म्हणाल्या. गुन्ह्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे तो लवकर जामीनावर बाहेर येऊ शकतो. त्यामुळे आंचल आणि ताटे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी ही अंजलीताई यांनी केली. आंचलच्या शिक्षणाचा सर्व खर्च वंचित बहुजन आघाडी उचलेल असेही त्यांनी जाहीर केले. आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची आंचल ची मागणी योग्य असल्याच्या त्या म्हणाल्या. आंचल ने जे धाडस दाखवल ते अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इतर मुलींनी दाखवले असते अंतरजातीय बळी पडलेल्या अनेक मुलांना न्याय मिळाला असता असे अंजलीताई म्हणाल्या.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 03, 2025 10:51:34
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 03, 2025 09:31:27
Akola, Maharashtra:अकोला शहरात गेल्या १८ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा सुरू असलेला शोध अखेर यशस्वी ठरला. अकोला पोलिसांनी अपार परिश्रम घेत, सात तालुक्यांत शोधमोहीम राबवत हा मुलगा सुरक्षितपणे पंढरपूरहून शोधून काढला. २१ दिवसांनी आपल्या आई-वडिलांना भेटलेल्या मुलाला पाहून परिसर क्षणभर भावनांनी भरून गेला. उपस्थितांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. ११ नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे मनात दुखावलेला हा मुलगा घरातून निक्षून गेला. कुटुंबाने खदान पोलिसात तक्रार नोंदवली होती. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी पोलिस तपासात मुलगा मनात राग धरून घराबाहेर पडल्याचं स्पष्ट झालं. विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः तपासात उतरले. त्यानंतर पोलिसांनी सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलाच्या हालचालींचा मागोवा घेतला. दोन स्वतंत्र पथकांनी राज्यातील सात तालुक्यांत शोधमोहीम राबवली. मुलाकडे मोबाइलसारखं कोणतंही संपर्क साधन नसल्याने तपास अधिक कठीण ठरत होता.या सर्व प्रयत्नांत निर्णायक धागा मिळाला तो अकोला रेल्वे स्टेशनवर. मुलगा कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत चढताना दिसला आणि या माहितीच्या आधारे कोल्हापूर आणि पंढरपूर परिसरात त्याचा फोटो देऊन शोध सुरू झाला. अखेर पोलिसांनी मुलाला पंढरपूरहून सुरक्षित ताब्यात घेतलं. आज मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केलं गेलं. २१ दिवसांनी आईच्या कुशीत विसावलेल्या मुलाला पाहून आई, वडील आणि पोलिसांनाही भावनांचा बांध फुटला. त्या क्षणी सारे वातावरण भाऊक झालं. अकोला पोलिसांच्या या अथक प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे. संयम, तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि मानवी संवेदना यांच्या आधारे एका कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणाऱ्या पोलिस दलाचे नागरिकांकडून मनापासून अभिनंदन केले जात आहे.
106
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 03, 2025 09:19:15
Parbhani, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या औंंडा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद गावात बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून ग्राम पंचायत मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार तहसीलदार हरीष गाडे यांच्याकडे केली आहे. आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पेरजाबाद हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. परंतु गावामध्ये अनुसूचित जमातीचे नागरिक राहत नाहीत. गावातील काही जणांना हाताशी धरून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी बीएलओकडे बनावट कागदपत्रे बनवून सादर केले जात आहेत. बनावट कागदपत्रांची योग्य तपासणी करून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी औंंडा तहसीलदारांकडे केली आहे.
67
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 03, 2025 09:09:10
Shirur, Maharashtra:शिरूर मतदान केंद्रात आजी-माजी आमदारांची शाब्दिक बाचाबाची शिरूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन दबाव तंत्र वापरल्याचा आरोप शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला आहे. मतदार नसताना मतदान केंद्रात जाणे हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, संविधानिक पदावर असले तरी ते अयोग्य असल्याचे पवार म्हणाले. आमदार कटके दिवसभर अनेक केंद्रांवर गेले आणि कार्यकर्त्यांवर दबाव टाकला, असा आरोप करत 'लोकप्रतिनिधी आहात, कायद्याने वागा' असे म्हणत पवार आक्रमक झाले. यावेळी निवडणुकी आयोगाकडे तक्रार करणार, कारवाईची मागणी केली. शिरूर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव दिसत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप विद्यमान आमदार माऊली कटके यांनी केला आहे. निवडणुकीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने 'पायाखालची वाळू सरकली का?' असे म्हणत पवार आक्रमक झाल्याचे कटके म्हणाले. माझ्याबद्दल काही तक्रारी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे कराव्यात, अशोक पवार यांनी राजकारणातून अलिप्त व्हावे आणि निवृत्ती घ्यावी, असा सल्ला आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी माजी आमदार अशोक बापू पवार यांना दिला आहे.
138
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 03, 2025 09:08:47
140
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 03, 2025 09:08:09
Beed, Maharashtra:बीड : स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा तगडा पहारा, उमेदवारांची पहाटेपासूनच स्ट्रॉंग रूम कडे धाव परळीतील माजी नगराध्यक्षाची अनोखी मागणी बीड जिल्ह्यात सहा नगरपरिषदांचा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.. आज निवडणुकीचा निकाल लागण्याची उत्सुकता सर्वांना होती मात्र न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया ठेवल्याने जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील स्ट्रॉंग रूम वरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. तर दुसरीकडे रात्रीपासून ते सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उमेदवार नगर परिषदेकडे धाव घेत आपलं भविष्य ज्या स्ट्रॉंग रूम मधील मतपेटी मध्ये कैद आहे.. त्याला पहारा देण्यासाठी येत आहेत... तर आम्हाला इथे अंथरून पांघरून घेऊन येत राहण्याची मुभा द्यावी किंवा आमची व्यवस्था करावी अशी अनोखी मागणी परळी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे..
118
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 03, 2025 09:07:51
137
comment0
Report
SKShubham Koli
Dec 03, 2025 08:38:54
Thane, Maharashtra:उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला पुन्हा एकदा सुनावले.. ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात तब्बल 18 जणांनी रस्तेअभावी त्यांचा जीव गमावला आहे. घोडबंदर मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी जड अवजड वाहने रस्त्यावरील खड्डे व त्यावर केलेले पॅचवर्क या कारणांमुळे घोडबंदरवासीय व त्या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार या घोडबंदर मार्गावर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येते; तरीही खड्ड्यांचा प्रश्न जसाच असून या खड्ड्यांमध्ये पडून जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात 18 जणांनी जीव गमावला आहे. उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेडून लपवा-लपवी केल्याचे सांगितले. ठाणे महानगरपालिका याकडे गांभीर्याने का दखल घेत नाही असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
171
comment0
Report
Advertisement
Back to top