445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पाथर्डी पुलिस स्टेशन के सामने ठिया आंदोलन; विठ्ठल खर्चन की मौत पर पुलिस-लापरवाही के आरोप
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के पाथर्डी पुलिस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन... विठ्ठल खर्चन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार... पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे विठ्ठल खर्चन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप... अत्याचार पीड़ित तक्रारदार महिलेच्या सोबत आलेल्या विठ्ठल खर्चन यांचा पोलिस स्टेशन समोर झाला आहे मृत्यू... दोन दिवसांपूर्वी झाला होता विठ्ठल खर्चन यांचा मृत्यू... संबंधीत अधिकारीांवर कारवाई करून पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करावी अशी आहे आंदोलकाची मागणी...0
0
Report
गोवा सीमा पर AI ऑटो स्कैन से कागदपत्रों की सतर्कता, प्रवेश जल्द
Oras Bk., Maharashtra:अँकर गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय? मग आधी तुमच्या वाहनाची कागदपत्रं व्यवस्थित आहेत का ते नक्की तपासा… कारण आता गोवा सीमेवर वाहनांची तपासणी अधिक हायटेक झाली आहे. महाराष्ट्र-गोवा तसेच कर्नाटक-गोवा सीमेवरील चेकपोस्टवर एआय आधारित ऑटो स्कॅन सिस्टीमद्वारे वाहनांचे नंबर स्कॅन करून आरसी, विमा, पीयूसीसह इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. वाहनाचे कागदपत्र वैध नसल्यास अतिरिक्त दंडाचा फटका बसू शकतो, तर सर्व कागदपत्रे ओके असतील तर गोव्यात प्रवेश अधिक सुलभ होणार है. विशेष म्हणजे, एकदा सीमारेषेवर वाहनाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर विनाकारण कागदपत्र तपासणीसाठी वारंवार अडवले जाणार नाही. प्रायोगिक तत्वावरील ही यंत्रणा भविष्यात प्रत्येक राज्यात कार्यान्वित होईल हे निश्चित आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी.0
0
Report
हसन मुश्रीफ मुद्दों पर बीजेपी-शिवसेना-राष्ट्रवादी की संयुक्त बैठक
Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ Byte मुद्दे ऑन कार्यकारणी मला यातील काही माहिती नाही पण यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीवर होतो. कालच आमची बैठक झाली आहे या बैठकीमध्ये सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते.. या सर्वांनी सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑन तटकरे नाराजी. अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलीली नाही, त्यांनी वहिनींच्या शपथविधीनंतर आपल्याला टार्गेट केले गेलं अशा भावना व्यक्त केल्या. पक्ष एकसंघ असल्यामुळे आमची, कार्यकर्त्यांची, सर्वांची आणि कुटुंबियांची वहिनीनी शपथ घ्यावी अशी इच्छा होती. पण शपथ घेतल्यानंतर त्या दोघांनाच टार्गेट करण्यात आलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.. ऑन अर्थ खाते अर्थ खात हे आमचं होतं.. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बजेट येणार होत, त्यामुळे ते नंतर देतो असं सांगण्यात आलं.. पण त्या अद्याप मिळालेलं नाही.. आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत, त्यामुळे याचा निश्चितपणे निर्णय होईल.. भारतीय जनता पक्ष याचा निश्चितपणाने सन्मान राखेल.. ऑन स्वबळ निवडणूक सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात.. पण मला असं वाटतंय भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढतील.. ऑन राष्ट्रवादी वाद संपला का पेल्यामधील वादळ पेल्यामध्ये संपलेला आहे.. प्रफुल्ल भाई आपल्या कामानिमित्त बिझी होते. ऑन प्राजक्ता तनपुरे भाजप प्रवेश विधानसभेला त्यांनी निवडणूक लढवली नाही , त्याच वेळेला ते सिद्ध झालं होतं. ऑन गोकुळ निवडणूक कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संस्थाकडे ठराव जाणे आणि संस्थेने संबंधित व्यक्तीच्या नावे ठराव देणे ही प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर निवडणूक लागेल. ही निवडणूक सप्टेंबर महिन्यात लागण्याचा अंदाज आहे. ऑन गोकुळ निवडणूक महायुती महायुती मधून निवडणूक लढवणार हे सातत्याने स्पष्ट केलेल आहे.. माझे मित्र सतेज पाटील यांनी बारा हजार वेळेला हसन मुश्रीफ महायुतीमधून निवडणूक लढवणार असं उच्चारले आहे.. ऑन सतेज पाटील निवडणूक आघाडी त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे.. आम्ही युतीने काय करावा हा आमचा प्रश्न आहे.. आमचं ठरलेलं आहे. गोकुळची निवडणूक लढवणे आणि जिंकणे.... महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे.. ऑन गोकुळ जागावाटप फॉर्म्युला जागावाटप आज होणार नाही.. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया होणार नाही.. मतदार यादी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न सुटेल.. एवढ्या जागा तेवढ्या जागा असं कुठेही ठरलेलं नाही, हा मतदार यादीनंतरचा कार्यक्रम. ऑन निवडणूक पुढे ढकलणाऱ्यांना चपराक चपराक असे म्हणता येणार नाही.. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वेळेवर घ्या असं सांगितले आहे, त्यामुळे निवडणूक वेळेवर होत आहे.. ऑन हलाल सर्टिफिकेट मी यासंदर्भात माहिती घेतली आहे.. गोकुळला अनेक दिवसापासून अजरबैजान आणि आखाती देशामध्ये तूप लोणी पाठवतो. अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते.. ते सर्टिफिकेट 2022 सालीच काढले आहे.. नाविद मुश्रीफ हे तर आत्ता चेअरमन झाले आहेत.. कशाला काहीही जोडलं जात आहे. मला त्याचा आश्चर्य वाटत आहे. इंटरनॅशनल व्यापार करत असताना त्यांनी अट आहे.. जे गोकुळ निवडणूक लागणार नाही असं म्हणत होते, त्यांना अशा गोष्टी काढाव्या लागत आहेत.. वास्तविक तुम्ही प्रशासकांना जाऊन विचारलं पाहिजे.. ऑन सी पी आर नूतनीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.. या सर्व अधिकाऱ्यांनी शांत रहावे.. तिथं सिव्हिल सर्जन बसत होते हे खरा आहे.. तिथली मालमत्ता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. मी आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर साहेब बसून यावर मार्ग काढू. ऑन रायगड विधान परिषद जागा तडजोड आपण जे सांगितलं ते मीही ऐकले आहे प्रसारमाध्यमात.. त्याची निश्चित माहिती घेऊन बोलेन. स्वबळ निवडणूक भुजबळ सगळ्या निवडणुक्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपली तयारी करावी लागते.. कुस्तीच्या आधी पैलवान व्यायामाची तयारी करतो.. उठाबशा काढतो. तस असतं.. पण महायुती म्हणूनच लढाई होईल.. ऑन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा दोन प्रश्नांसाठी ते दिल्लीला गेलेले आहेत.. कांदा आणि साखर. कांदा स्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे.. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे.. मला एक साखर कारखानदार म्हणाला "आता सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आली आहे" इतक्या पद्धतीने साखर उद्योगासमोर अडचणी तयार झाल्या आहेत.. बँकांच्या अडचणी तयार झाल्या आहेत. साखरेच्या अडचणी झालेत.. त्यामुळे या बैठकीमध्ये साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देणं, लोन रीस्ट्रक्चरिंग करणे, साखरेचे दर वाढवणे, इथेनॉलचे दर वाढवणे अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं वाटतं.0
0
Report
Advertisement
नासिक में गावठी कट्टा लेकर युवक गिरफ्तार, पुलिस ने दबिश देकर गिरफ्तार किया
Nashik, Maharashtra:Nashik पंचवटीत गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला अटक आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई मानूर स्मशानभूमीजवळ सापळा रचून आरोपीला पकडलं पोलिसांना पाहताच संशयिताचा पळून जाण्याचा प्रयत्न फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आरोपीकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त प्रेम विजय आहेरविरुद्ध आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल0
0
Report
भाईंदर नवघर में नशे में दो युवक, कार रोककर लोगों ने बड़ा हादसा टाला
Mira Bhayandar, Maharashtra: brothers ब्रेक भाईंदर नवघर परिसरातील ओम शांती चौका जवळ रात्रीच्या वेळेस नशेत धुंद असलेल्या दोन तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणातviral होत आहे... एका ब्रिझा कार मध्ये दोघेही तरुण नशेत असलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता .. अर्ध्या तासाहून अधिक वेळ कार चालक नशेत गाडी चालू असतान एक्सेटरवर पाय ठेवून असल्याने आजुबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते... याच अवस्थेत जर गाडीचा गिअर पडला असता तर गाडी भर वेगात सुटून मोठा अपघात होण्याची भीती होती.. मात्र उपस्थित नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारची काच फोडली व सुरू असलेली गाडी प्रथम बंद केली.... अखेर नवघर पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न केले.. हे दोघेही तरुण वेगाने पसरणाऱ्या झोंबी ड्रग्स नशेत होते ka असा प्रश्न उपस्थित केला जातोय..0
0
Report
शिरपूर में किसानों ने रात में महामार्ग रोका; बिजली आपूर्ति इमरजेंसी लोडसेडिंग से बाधित
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या संतप्त शेतकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्ग रोखला होता. शेतीसाठी देण्यात आलेल्या विद्युत पुरवठा इमर्जन्सी लोडसेडींग च्या नावाने खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. इमर्जन्सी लोडसिडींग मुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा रात्रीच्या वेळेस मोर्चा धडकल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. महावितरण अधिकारींना शेतकऱ्यांचा घेराव लक्षात घेता अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्गावर बभळाज गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला होता. महामार्ग रोखल्यानंतर शेतीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.0
0
Report
Advertisement
खेड के युवक ने डूबती वृद्ध महिला की जान बचाई, देवदूत बना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला वाचवले.. खेड शहरातील खारी गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली एक वृद्ध महिला पाण्यात बुडत असल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र स्थानिक युवक स्वयंम शिबे यांने प्रसंगावधान राखत धाडसी पाऊल उचलले आणि वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पुलाखालील खोल पाण्यात अडकून बुडत होती. ही बाब स्वयंम शिबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ खाडीमध्ये उडी घेतली. पाण्याचा वेग आणि खोली अधिक असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी बचावकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्वयंम शिबे यांच्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला असून त्यांच्या या मानवतावादी आणि धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेड शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून “देवदूत बनून आला तरुण” अशा शब्दांत नागरिकांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.0
0
Report
गोंदिया में LCB ने 38.5 किग्रा गांजे के साथ दो आरोपी गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार परिसरात एलसीबी पथकाने मोठी कारवाई करत 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह एक थार कार, चार मोबाईल असा एकूण 54 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.0
0
Report
रत्नागिरी कोकण LSG चुनाव: महायुती का पलड़ा भारी, शिवसेना को 305 मतदाताओं का लाभ
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राजकीय रंगत वाढली महायुतीत उमेदवारीपरून रस्सीखेच असताना शिंदे शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांनी घेतला उमेदवारी अर्ज रत्नागिरीतल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून दोन अर्ज विकत घेतल्याची माहिती तर उद्धव ठाकरे सेनेकडून माजी आमदार बाळ माने यांनी घेतले चार अर्ज तर या निवडणुकेंत रायगडमधील शेतकरी कामगार पक्ष देखिल उमेदवार देण्याच्या तयारीत शेकापकडून चार उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती, अरविंद म्हात्रे आणि अनिल चोरडा यांनी घेतले उमेदवारी अर्ज विधानसभेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महायुतीचे पारडे जड, शिंदे शिवसेनेकडे सर्वात जास्त म्हणजे ३०५ मतदार त्याखालोखाल भाजपकडे २७६ आणि अजित पवार राष्ट्रवादीकडे १२७, उद्धव ठाकरे सेनेकडे ५५ तर कॅग्रेसकडे ५० मतदार महायुतीक़डे एकत्र आल्यास ७०८ मतांची मॅजिक फिगर पण शह काटशह याच्या राजकारणात कुणाचे पारडे जड राहणार याची उत्सुकता0
0
Report
Advertisement
तुमसर अस्पताल में पानी की भारी किल्लत, 45°C तापमान में मरीज और गर्भवती महिलाएं परेशान
Bhandara, Maharashtra:तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट; ४५°C तापमानात रुग्ण आणि गरोदर मातांचे हाल! लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष.... प्रशासनाच्या मनमानी कारभार चव्हाट्यावर,0
0
Report
सीबीआई ने नीट पेपर 10-12 लाख में बेचे जाने का मामला लातूर में उजागर किया
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट चा पेपर दहा ते बारा लाखाला विकला... सीबीआय तपासातून धक्कादायक माहिती समोर... नीटचे केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि प्रा शिवराज मोटेगावकर यांनी नीट परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार CBI च्या तपासात उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रा. कुलकर्णी व प्रा मोटेगावकर या दोघांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे आपल्या सर्कलमधील अन्य लोकांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंत ते विक्री केल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये हा पेपर नीट परीक्षेच्या आधीच आल्यानंतर, प्रा. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांनी मिळून हे पेपर विकले असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे पथक लातुरात ठाण माडून आहे...0
0
Report
वाशीम-कोंडाळा रेलवे पुल का कार्य धीमा, किसानों को 10-12 किमी अतिरिक्त सफर
Washim, Maharashtra:वाशीम ते कोंडाळा मार्गावरील भूमिगत रेल्वे पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतःपावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तब्बल १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्चही वाढत आहे. दुसरीकडे पुलाखाली दोन्ही बाजूंना पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे ये-जा करणे आणखी कठीण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतीचा हंगाम आणि पावसाळा तोंडावर असताना संबंधित यंत्रणांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होतं आहे.0
0
Report
Advertisement
स्वच्छता दूत वामन इंगळे की साइकिल यात्रा से महाराष्ट्र में जागरूकता फैल गई
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील स्वच्छता दूत वामन इंगळे यांनी संत-महात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रभर सायकलद्वारे स्वच्छता यात्रेला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सायकलवर छोटेखानी ग्रंथालय उभारले असून गावोगावी फिरत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम सुरू केले आहे.ज्या गावात त्यांचा मुक्काम असेल त्या गावात संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार स्वच्छता अभियान राबवून नागरिक,युवक आणि महिलांना वाचनाची प्रेरणा दिली जात आहे. महापुरुषांच्या विचारांची पुस्तके उपलब्ध करून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.या यात्रेचा कालावधी निश्चित नसला तरी स्वच्छता आणि वाचन संस्कृतीचा संदेश देत वामन इंगळे महाराष्ट्र भ्रमंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट: वामन इंगळे,स्वच्छता दूत0
0
Report
रात के अंधेरे में गैस सिलेंडर वितरण, ब्लैक मार्केटिंग का शक—भंडारा लाखनी
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या लाखनीत रात्रीच्या अंधारात गॅस सिलेंडर वाटप..... ब्लॅक मार्केटिंगचा संशय.... हे सिलेंडर अधिकृत नोंदीवर वितरित झाले की अवैधरीत्या, याबाबत मात्र स्पष्टता नाही. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या कारभारामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवून याबाबत विचारणा केली असताहा प्रकार गंभीर व चुकीचे असल्याचे सांगत वरिष्ठांकडे अहवाल पाठवून कारवाईचे संकेत दिले आहेत.0
0
Report
टाकळी में पेयजल की मांग पर महिलाओं ने ग्राम पंचायत के सामने घागर मोर्चा निकाला
Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. टाकळी गावात पाणी पुरवठा सुरळीत होत, नसल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी हातात घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली, यावेळी संतप्त महिलांनी ग्रामविकास अधिकारीांना घेराव घालत धारेवर धरले. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
