445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वसई के सनसिटी में इंडिकेटर न दिखाने से हादसा, वृद्ध दंपति समेत दो युवक घायल
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या सनसिटी परिसरात भीषण अपघात! इंडिकेटर न देता स्कुटी आडवी आल्याने बाईकची जोरदार धडक अपघातात स्कुटी वरील वृद्ध दांपत्य गंभीर तर, बाईक स्वार किरकोळ जखमी ANC : वसईच्या सनसिटी परिसरात इंडिकेटर न देता अचानक स्कुटी आडवी घेतल्याने भीषण अपघात घडून वृद्ध दांपत्यासह दोन तरुण जखमी झाला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात वृद्ध दांपत्याने कोणताही इशारा न देता रस्त्याच्या मध्यभागी स्कुटी वळवल्याने मागून येणाऱ्या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या धडकेत मोटरसायकल चालक अमित आस्वेकर आणि त्याचा मित्र किरकोळ जखमी झाले, तर वृद्ध दांपत्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वाहन चालवताना इंडिकेटरचा वापर व वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
हिंगोली: बैंक के पास पांच दिन के शिशु को अज्ञात ने फेंका; मां की तलाश
Hingoli, Maharashtra:हिंगोली में बैंक के पास पांच दिन के शिशु को अज्ञात ने फेंका; मां की तलाश0
0
Report
तूर दाम 8000 से घटकर 7500 रुपए क्विंटल; किसान चिंतित
Washim, Maharashtra:खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावर वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण झाली आहे. अवघ्या आठवडाभरात तूरचा भाव प्रतिक्विंटल ८ हजार २०० रुपयांवरून ७ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला असून ७०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. खरिप पेरणीसाठी बियाणे, खते आणि मशागतीच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तूर विक्री करत आहेत. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तुरीच्या दर घसरणीमुळे चिंता व्यक्त केली जात असून तुरीला योग्य भाव मिळावा अशी मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
कोकण में मॉनसून सक्रिय, आज-कल येलो अलर्ट; किसानों के लिए सतर्कता जरूरी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात मान्सून सक्रिय.. आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट.. वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडात पावसाची शक्यता.. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसतात.. खरंतर कालपासूनच मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे.. मृगात शेतीयुक्त पावसाच्या सरी बरसात.. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे.. या दोन दिवसात शेतकऱ्यांना, नागरिकाांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.. जिल्हात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय.. त्यामुळे नक्कीच या वातावरणामुळे बळीराजा सुखावलाय..0
0
Report
बीड़ में तेज बारिश से गर्मी से राहत, किसानों में खुशी
Beed, Maharashtra:ANC - बीड जिल्ह्यातील काही भागांत काल सायंकाळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. आज देखील देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने वातावरणात लक्षणीय बदल जाणवला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून आगामी पावसाळ्यासाठी हा पाऊस सकारात्मक संकेत मानला जात आहे. दरम्यान जिल्ह्यात काही भागात पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे.0
0
Report
सोलापुर में बदला मौसम, बादलों के कारण तापमान 4.3°C घटकर 33.7°C पहुँचा
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापुरातील ढगाळ वातावरण - गारव्यामुळे तापमानात चार अंशांनी घट Temperature 33.7 अंशांवर पोहोचल्याने कडक उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
पिंपरी-चिंचवड़ में मानसून की प्रतीक्षा, ताप से लोग परेशान
Pimpri-Chinchwad, Maharashtra:जून महिना सुरू झाला असला तरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून शेतकरीही चिंतेत आहेत. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग देण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. नालेसफाई, रस्त्यांची दुरुस्ती आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे. सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.0
0
Report
कराड में इंजीनियर की हत्या: पत्नी व प्रेमी समेत चार गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड, सातारा - ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले या कराड येथील अभियंत्याच्या खुनाचा उलगडा करण्यात कराड पोलिसांनायश आल आहे. अभियंत्याच्या पत्नी, मेव्हुण्यानंतर आता अल्टो गाडीखाली चिरडणाऱ्या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलरना कराड पोलिसांनी अटक केली आहे. अभियंत्याची पत्नी सारिका मंडले हिने आपला 25 वर्षीय प्रियकर प्रथमेश थोरात याला तीन लाखाची सुपारी दिली होती. प्रियकराने आपला साथीदार आकाश होनसुरे यांच्या मदतीने अभियंता लक्ष्मण मंडले याला क्रूरपणे चिरडले. या खून प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून कॉन्ट्रॅक्ट किलराना पत्नीने माहिती पुरवली होती.0
0
Report
आळंदी में एम-परिवहन साइबर फ्रॉड: 4.76 लाख के गोरखधंदे पर GSTड
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदीतील 'एम-परिवहन' सायबर फसवणूक : ४.७६ लाखांचा गंडा ... आळंदी परिसरातील एका आयटी अभियंत्याला बनावट "एम-परिवहन" ट्रॅफिक चलनाच्या मेसेजद्वारे तब्बल ४ लाख ७६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणाला मोबाईलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा बनावट चलनाचा मेसेज आला होता. चलन तपासण्यासाठी त्याने मेसेजमधील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड झाले आणि सायबर गुन्हेगारांनी मोबाईलवर रिमोट ॲक्सेस मिळवला. काही मिनिटांतच त्याच्या बँक खात्यातून चार महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यात आले. या व्यवहारातून ४.७६ लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच चलनाची पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर NDPS: 52 ग्राम MD पावडर, दो गिरफ्तार, 2.29 लाख रुपए का माल बरामद
Nagpur, Maharashtra:नागपूर :- नागपूर पोलिसांनी ५२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली, एक दुचाकी सह एकूण ९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या NDPS पथकाने ही कारवाई केली. विजया रहांगडाले आणि शहबाज फिरोज शाह अशी आरोपींची नावे आहेत. एनडीपीएस पथक वाठोडा रिंग रोडजवळ पेट्रोलिंग करीत असताना आरोपी संचयितरित्या दिसून आले. त्यांच्याकडे अमली पदार्थ असण्याची दाट शक्यता वाटल्याने पोलيسांनी झडती घेतली. आरोपीजवळ ५२ ग्राम एमडी पावडर मिळून आल्याने पोलिसांनी दोन्हांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एमडी पावडर, मोबाईल, मोपेड व रोख असा २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. आरोपी विजय रहांगडाले हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरोधात हत्या, दरोडा, चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू आहे...0
0
Report
ऑनलाइन खत वितरण प्रणाली से किसान उथल-पुथल, ऑफलाइन बिक्री शुरू करने की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑनलाइन खत वितरण प्रणाली से किसान उथल-पुथल, ऑफलाइन बिक्री शुरू करने की मांग. खरी-प हंगामाची लगबग सुरू असतानाच केंद्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर आणलेली नवी ऑनलाईन खत वितरण प्रणाली शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' या नव्या ऑनलाईन ॲपमधील क्लिष्टता आणि गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी विक्रेते पुरते हैराण झाले आहेत. या जाचक प्रणालीविरुद्ध जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला असून, संतप्त शेतकऱ्यांचे कृषी केंद्रा चालकासोबत खटके उडत आहेत. त्यामुळे ही ऑनलाईन कटकट तत्काळ बंद करून पूर्वीप्रमाणेच 'ऑफलाईन' पद्धतीने सातबारा-आधार कार्डवर खतविक्री सुरू ठेवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.0
0
Report
सोलापुर में एक रात में 22 मिमी बारिश, किसानों के लिए राहत या फसल नुकसान?
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात एका रात्रीत 22 मिलिमीटर पावसाची नोंद रोहिणी नक्षत्राचा सोलापूर जिल्ह्यात एकूण 22 मिलिमीटर पाऊस पडला. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 69 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सोलापूर जिल्ह्यात एकूण 40 मिलिमीटर पावस पडल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलीय. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाडापासून मोठा दिलासा मिळालाय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
27 साल पूरे हुए मांडवी एक्सप्रेस: कोकण की प्रिय इंटरसिटी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण वासियांची लाडकी 'मांडवी' झाली 27 वर्षांची.. सकारात्मक बदलामुळे प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीस.. मांडवी एक्सप्रेस ही दिवसाची सेवा देणारी एकमेव एक्सप्रेस ठरली आहे.. मुंबई-मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून सुरू झालेल्या मांडवी एक्सप्रेसच्या सेवेची 27 वर्ष पूर्ण झाली आहेत.. कोकण मार्गावर नियमितपणे धावणारी मांडवी एक्सप्रेस नेहमीच हाउसफुल धावते.. मांडवी एक्सप्रेसची नियोजित वेळ सर्वच दृष्टीने प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने कोकण वासियांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.. रेल्वे प्रशासनाच्या पदरात सर्वाधिक उत्पन्न देणारी एक्सप्रेस म्हणून मांडवी एक्सप्रेसची नोंद झाली आहे..0
0
Report
लातूर के गरूड चौक में भीषण हादसा, दुचाकी सवार की मौत, CCTV कैद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूरच्या गरूड चौकात भीषण अपघात.. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू... लातूर शहरातील गरूड चौकात भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रावेल्सच्या मागून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या युवकाची गाडी अचानक घसरल्याने तो थेट ट्रॅव्हल्स बसच्या मागील चाकाखाली आला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृताची ओळख पटविण्याचे आणि अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
इचलकरंजी के लिए नई जल योजना: कृष्णा नदी से 60 एमएलडी पानी, 500 करोड़
Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या इचलकरंजी शहरासाठी नवी पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. शहरासाठी जुने दानवाड या ठिकाणाहून ही पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. नवे दानवाड इथल्या कृष्णा नदीपासून इचलकरंजीचे अंतर 26 किलोमीटर आहे. या योजनेच्या माध्यमातून 60 एमएलडी पाणी इचलकरंजी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. तर या योजनेसाठी सुमारे 500 कोटीचा खर्च येणार आहे. ज्या ठिकाणाहून पाणी उपसा केला जाणार आहे त्याच ठिकाणी पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे, त्यामुळे या योजनेला राधाकृष्ण योजना असं नाव देण्याचे निश्चित झाले आहे.0
0
Report
Advertisement
