445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भीषण बारिश से मलंगगड चक्कीनाका क्षेत्र जलमय, कल्याण-डोंबिवली मार्ग पर यातायात बाधित
Kalyan, Maharashtra:कल्याण श्री मलंगगड चक्कीनाका मार्ग जलमय. कल्याण डोंबिवलीत दोन तासापासून मुसळधार पावसामुळे श्री मलंगगड कडून कल्याणकडे येणारा मार्गावरील चक्कीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चेतना स्कूल परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याखालून मार्ग काढत दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करत असून काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या मार्गावरील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.0
0
Report
मानसून सक्रिय, कोल्हापुर धामोड़ में छात्रों ने खेत बीच शिवार क्लास का अभ्यास किया
Kolhapur, Maharashtra:राज्यभरात मान्सून सक्रिय झालेल्या असून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशा वातावरणात राधानगरी तालुक्यातील धामोड येथील कोते माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि अनुभवाधारित शैक्षणिक उपक्रम राबवला. वर्गखोलीत नव्हे, तर थेट शेताच्या बांधावर विद्यार्थ्यांचा ‘शिवार वर्ग’ भरवण्यात आला. बळीराजाच्या सोबतीने विद्यार्थ्यांनी चिखलात उतरून भात शेतीतील तरवा काढणी आणि रोपलावणीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके केली. डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, पायाखाली मऊ चिखल आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शेतीची कामे प्रत्यक्ष अनुभवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ शेतीची माहिती मिळाली नाही, तर अन्नदात्या शेतकऱ्याच्या कष्टांचीही जाणीव झाली. आधुनिक शिक्षणासोबतच पारंपरिक शेतीचे महत्त्व समजून घेण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. सर्वच शाळांनी अशा प्रकारचे शिवार शिक्षण राबविल्यास विद्यार्थ्यांना निसर्ग, शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी अधिक जवळून परिचित होण्याची संधी मिळू शकते.0
0
Report
वाशीम में खाद्य सुरक्षा विभाग ने होटल्स पर कार्रवाई, तीन होटलों की चेकिंग में उल्लंघन पाया
Washim, Maharashtra:वाशीममध्ये अन्न सुरक्षा विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांवर धडक कारवाई केली आहे.शहरातील तीन हॉटेलांची तपासणी करण्यात आली.अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने साई ढाबा चा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला,तर हॉटेल गणेश आणि हॉटेल चिंतामणी यांना त्रुटी दूर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नसून,नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अन्न सुरक्षा प्रशासनाने दिला आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर नगरपालिका ने संपत्ति कर बकायेदारों के खिलाफ सख्त कार्रवाई का बड़ा फैसला
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय. वाणिज्यिक मालमत्ताधारकांनी थकीत कर न भरल्यास महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येणार. जीएसटी विभागाच्या मदतीने संबंधितांची बँक खात्यांची माहिती घेऊन खाते गोठवण्याची कारवाई. १० जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम राबवली जाणार आहे. कर देयके वितरित करण्यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात येणार. सफाई कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा. उपद्रव शोध पथकात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशुद्ध पाणी, खोदकामाची दुरुस्ती आणि नाले-नद्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी जनजागृतीवरही भर .0
0
Report
रत्नागिरी-कोल्हापुर अम्बा घाट में दराड़ गिर, भारी बारिश से यातायात प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली.. मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्स्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर!.. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील प्रसिद्ध आंबा घाटातून प्रवाशांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. आंबा घाटात पुन्हा एकदा गणेश मंदिराजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे.. घाट माथ्यावर सध्या पावसाचा जोर प्रचंड वाढला असून, सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे घाट मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्या दगडी आणि ढिगारे रस्त्यावर आले आहेत.. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव कमालीचा धोक्यात आला आहे.. घटनचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासन तातडीने अलर्ट मोडवर आले असून, दरडी हटवण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.. प्रवाशांनी सध्या या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..0
0
Report
शिराळा तालुक्य में विद्यार्थियों ने 22 हजार पौधे रोपण किया—पर्यावरण की मिसाल
Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यात पर्यावरण रक्षण वृक्ष संवर्धन संदेश घेऊन विद्यार्थ्यांकडून तब्बल 22 हजार वृक्ष बियांचे रोपण करण्यात आले आहे.आरळा, कोकरूड,भाष्टेवाडी डोंगर व विद्यालय परीसरात विद्यार्थी व शिक्षकांकडून बियांचे रोपण करण्यात आला आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून बियांचे संकलन करण्यात आले होते,ज्यामध्ये आंबा,फणस, जांभुळ,करंज व इतर बियांचा समावेश होता.आरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडुन हा उपक्रम राबवण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
गडचिरोली में स्मार्ट मीटर मुद्दे पर कांग्रेस का आक्रामक प्रदर्शन, महावितरण कार्यालय घेराव
Chandrapur, Maharashtra:टायटल:---स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर गडचिरोली काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत स्मार्ट मीटर धोरणाविरोधात घोषणाबाजी गडचिरोलीत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. चामोर्शीतील महावितरण कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढत सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीजबिले कमी करावीत आणि वीज ग्राहकांवरील अन्याय थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. सरकारने स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.0
0
Report
नागपूर विभाग में बारिश से खरीफ पेरणी तेज, 29% क्षेत्र पर पेरणी पूरी
Nagpur, Maharashtra:- नागपूर - जून महिनाभर दडी मारल्यानंतर नागपूर विभागात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस. - पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा; खरीप पेरणीच्या कामांना वेग. - नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी १६५.७ मि.मी. पावसाची नोंद. - वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक १९४.५ मि.मी., तर नागपूरमध्ये १७१.४ मि.मी. पावस. - विभागात आतापर्यंत २७ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण. - यंदा खरीपासाठी १८.९५ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन; ५.१६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी. - वर्ध्यात ४५%, चंद्रपुरात ४०% आणि नागपुरात २९% पेरणी पूर्ण. - पुढील काही दिवसांत पाऊस कायम राहिल्यास पेरणीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता.0
0
Report
वाशिम में चलती कार में आग, ड्राइवर की सूझबूझ से बड़ा हादसा टला
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगावजवळण्ण् महामार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मुंबईहून नागपूरकडे चार प्रवासी कारने प्रवास करत असताना चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वजण वेळेत कारबाहेर उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. काही क्षणांतच कार आग लागल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती के मोर्शी में बुस्टर सोयाबीन बियाणे नहीं उगे, किसान मुआवजे और मुफ्त बीज मांग
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मोर्शीत बुस्टर कंपनीच्या हुतूतू सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याने शेतकरी संकटात; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी आर्थिक संकटात अँकर :- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात बुस्टर कंपनीच्या हुतूतू सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याचा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा आरोप केला आहे. पेरणीनंतर 10 दिवसांहून अधिक कालावधी लोटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवण झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी लाडकी, कशीमपूर आणि खोपडा परिसरातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली असून बुस्टर कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे。0
0
Report
वसई-विरार में भारी बरसात से कचरा प्रबंधन अस्त-व्यस्त, प्रमुख रास्ते जलमग्न
Vasai-Virar, Maharashtra:ANC : वसई विरार शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वसई महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर झाला आहे. शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाल्यामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबून ठेवण्याची वेळ आली आहे. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आल्यामुळे अनेक वाहन रस्त्यात अडकून पडत आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांसह महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील याचा फटका बसला आहे.0
0
Report
गोसीखुर्द डैम के 33 गेट 0.5 मीटर खोले, पानी बढ़ा, प्रशासन अलर्ट
Bhandara, Maharashtra:गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.5 मीटरने उघडण्यात आली आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.5 मीटरने उघडण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे गेट उघडले असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीवर वाढ झाली आहे... त्यामुळे गोसीखुर्द धरणात देखील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.5 मीटरने उघडण्यात आली आहे... त्यांनी नदी पात्रा लगतच्या गावाना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे....0
0
Report
Advertisement
क्या सिया ने शुरू से केतन हत्या की साजिश रची? चैट स्क्रीनशॉट सामने
Varsoli, Maharashtra:ANC: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून, आता आरोपी सिया गोयल आणि तिच्या मैत्रिणीमधील एक कथित चॅट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. VO: २३ आणि २४ मे दरम्यान झालेल्या या संभाषणात सियाने तिच्या मैत्रिणीकडे लग्नाच्या बुकिंगचे कारण सांगत तिचे आधार कार्ड मागितले होते, मात्र त्याच वेळी लग्न तर होणार नाही, तरी तू आधार कार्ड पाठवून दे असा धक्कादायक मेसेजही तिने केला होता. या वादग्रस्त मेसेजमुळे सिया केतनला संपवण्याचा कट आधीपासूनच रचत होती का, असा बळकट संशय आता निर्माण झाला असून, या कथित चॅटमधील सत्यता किती टक्के आहे आणि त्यामागील खरा हेतू काय होता, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.0
0
Report
जालना: राज्य परिवहन महामंडळ की दो बसें आमने-सामने टकराईं, 35-40 यात्री घायल
Jalna, Maharashtra:जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसचा समोरा समोर अपघात 35 ते 40 प्रवासी जखमी अंबड येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू अंबड तालुक्यातील शहापूर जवळची घटना अँकर : जालना जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसचा समोरा समोर अपघात झालाय.या अपघातात 35 ते 40 प्रवासी जखमी झाले आहेत.जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापूर येथे ही घटना घडली आहे.अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिकांनी मदत करत जखमी प्रवाशांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलंय.अंबडहुन बीडला जाणाऱ्या आणि बिडहुन अंबडकडे येणाऱ्या बसेस बसेसचा हा अपघात झालाय.शहापूर येथे पुलाचनं काम सुरू आहे.या दरम्यान दोन्हीही बसेसच्या चालकांचं बस वरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितल जातंय.0
0
Report
अमरावती में 4–19 जुलाई से सुबह स्कूल, बीएलओ के लिए मतदाता डेटा संकलन निर्देश
Amravati, Maharashtra:आजपासून सकाळच्या सत्रात भरणार शाळा; ४ ते १९ जुलैदरम्यान नियम लागू, शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्व शाळांना पत्र या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत सर्व बीएलओ यांना घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करणे, गणनापत्राच्या दोन प्रती भरून घेणे तसेच त्याचे डिजिटायझेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मोहिमेची व्याप्ती मोठी असून प्रत्येक बीएलओकडे लक्षणीय मतदारसंख्या असल्याने हे काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील अनेक बीएलओ हे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वसुली लिपिक, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी सहाय्यक आदी विविध विभागांतील कर्मचारी असल्याने त्यांना नियमित कार्यालयीन जबाबदाऱ्यांबरोबरच एसआयआर मोहिमेचे काम पार पाडावे लागत आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश देत आपल्या अधिनस्त बीएलओ यांना दररोज दुपारी २ नंतर एसआयआर कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यास सांगितले आहे. कोणत्याही बीएलओला कार्यमुक्त करण्यात अडथळा निर्माण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कार्यालय प्रमुखांना जबाबदार धरून निवडणूक नियमांनुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. याशिवाय सर्व बीएलओ शिक्षकांनीही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील पूर्णवेळ एसआयआर संदर्भातील कामकाज करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः शिक्षक बीएलओ मोठ्या संख्येने कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ४ जुलै ते १९ जुलै या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
