icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजीनगर में अनियमित बारिश-गारपिट से किसानों की फसलें भारी नुकसान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. मुसळधार पावसासह गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठण, आडुळ, पाचोड या भागांत गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गहू, हरभरा, डाळिंब आणि मोसंबी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गव्हाची पिके आडवी झाली आहेत तर डाळिंब बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
0
Report

अमरावती जिले में अनावृष्टि बारिश से गेहूं, कांदा व फलों को भारी नुकसान

Amravati, Maharashtra:अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात ५७८ हेक्टरमधील पिके सपाट; ६२ गावांमध्ये सर्वाधिक नुकसान अँकर :- सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू व उन्हाळी कांद्यासह संत्रा, केळी व लिंबू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५७८ hेक्टर क्षेत्रास या पावसाचा फटका बसला असून मार्चमधील हा दुसरा फटका आहे. सर्वाधिक नुकसान अंजनगावसुर्जी व चांदूर बाजार तालुक्यात झाले आहे. विशेषतः गहू, कांदा व संत्रा या फळपिकांचे नुकसान अधिक प्रमाणांत झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटही झाली. रब्बी हंगामातील गव्हाची काढणी बहुतांश ठिकाणी झाली असून विलंबाने पेरणी झालेला गहू काढणीच्या स्थितीत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३५ गावांमधील १०६ हेक्टर चांदूर बाजार तालुक्यातील हेक्टर क्षेत्रातील गव्हाचे नुक झाले आहे. १५१ हेक्टर उन्हाळी कांद्याला फटका बसला आहे. त्यामध्ये अंजनगावसुर्जी तालুক्यातील ९०, चांदूर बाजारमधील ४०, अचलपूरमधील १५ हेक्टरचा समावेश आहे. संत्रा, लिंबू, आंबा, पपई या फळपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः चांदूर बाजार तालुक्यातील १३३ हेक्टरमधील संत्र्याला फटका बसला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात २९ हेक्टरमधील लिंबू पिकाचे नुकसान झाले आहे. ६० हेक्टरमधील केळीचे नुकसान या पावसाने झाले आहे. नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यास लवकरच प्रांरभ करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

वणी गढ़ यात्रा में दो श्रद्धालुओं की मौत, गर्मी से बेहाल हालत

Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, कळवण ( नाशिक ) - वणी गडावर जाणाऱ्या दो भाविकांचा मृत्यू... उष्णतेने चक्कर येऊन पडल्याने मृत्यू. वणी येथील सप्तशृंगी गडाकडे पायी वारी करत असताना दोन भाविकांचा वेगवेगळ्या ठिकाणी भोवळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परे sh धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. चोपडा) आणि राजेंद्र रामराव पाटील (४५, रा. जुवार्डी, ता. भडगाव) अशी या मृत भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. कळवण तालुक्यातील भेंडी येथे पदयात्रा पोहोचली असता भंडारा कार्यक्रमादरम्यान जेवणाच्या रांगेत उभा असलेल्या परेश पवार या युवकाला अचानक भोवळ आली. तो खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील राजेंद्र पाटील पालखीसोबत वणी गडाच्या दिशेने जात असताना मालेगाव तालुक्यातील शेरूळ परिसरात त्यांना अचानक भोवळ आली. त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाले.
0
0
Report
Advertisement

अक्कलकोट के आधुनिक बस स्टेशन का 90% कार्य पूर्ण, भक्तों की लंबी प्रतीक्षा खत्म

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बस स्थानकाचे 90% काम पूर्ण, गेल्या अनेक वर्षांपासूनची स्वामीभक्तांची प्रतीक्षा पूर्ण - अक्कलकोट शहरामधील नवीन अत्याधुनिक बसस्थानक बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात - अक्कलकोट शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नवीन बस स्थानकाचे 90 टक्के काम पूर्ण - स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये येणाऱ्या भाविकांना बस स्थानकाच्या माध्यमातून मिळणार अत्याधुनिक सुविधा - गेल्या अनेक वर्षांपासूनची स्वामीभक्त आणि अक्कलकोट वासियांची प्रतीक्षा अखेर पूर्ण - आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून 29 कोटी रुपये मंजूर करून हायटेक बस स्थानकाची उभारणी - भव्य बस स्थानकामध्ये 22 प्लॅटफॉर्म, प्रवासी प्रतीक्षालय, वातानुकूलित प्रतिक्षालय, कॅन्टीन, प्रसाधनगृह, अधिकारी विश्रांतीगृह, डॉरमेट्री रूम, हिरकणी कक्ष अशा अनेक कक्षांची उभारणी - नवीन बसस्थानकाचे लवकरच लोकार्पण होऊन नागरिकांच्या सेवेत रुजू होणार
0
0
Report

नागपुर के निजी बैंकों में सोने के जमानत घोटाले में 23 करोड़ का नुकसान

Nagpur, Maharashtra:नागपुरात सोने तारण कर्ज घोटाळा उघड, बनावट दागिन्यांवर कर्ज उचलून बँकेची फसवणूक खाजगी बँकेच्या ९ शाखांमध्ये फसवणुकीचा प्रकार, वार्षिक अंकेक्षणात घोटाळा समोर एकूण २३ कोटी १९ लाखांची फसवणूक झाल्यानं बँकेला मोठा आर्थिक फटका १५९ खातेदारांकडून बनावट सोने तारण ठेवत जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ कालावधीतील प्रकार खातेदार, मूल्यनिर्धारक, अंकेक्षक, अधिकारी संगनमत, बनावट दागिने खरे दाखवून कर्ज मंजूर बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांच्य चौकशीत घोटाळा उघडकीस आल्यानंतर धंतोली पोलिसात तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यात सखोल तपास सुरू बेलतरोडी परिसरातील प्रकरणानंतर उघडकीस आला घोटाळा, संपूर्ण शहरातील शाखांची तपासणी होणार गहाण सोनं त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून दागिन्यांची पडताळणी, त्यात मोठ्या प्रमाणात बनावट सोने आढळले बँकिंग प्रणालीतील मोठी पोकळी उघड झाली, आतील संगनमतामुळे घोटाळा वाढल्याचा अंदाज
0
0
Report
Advertisement

अजिंठा गुफाओं में मधमाशा हमला, 11 पर्यटक घायल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी येथे पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तब्बल ११ पर्यटक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील ही पाचवी घटना असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लेणी क्रमांक १० जवळील मोहळातून मधमाशा अचानक बाहेर पडून पर्यटकांवर तुटून पडल्या. या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. त्यानंतर तासाभरानंतर लेणी क्रमांक २६ जवळ पुन्हा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुसऱ्या घटनेतही पर्यटकांना चावे बसल्याने एकूण जखमींची संख्या ११ वर पोहोचली. या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला आणि लहान मुलांनाही या हल्ल्यांचा फटका बसत असल्याने प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून मधमाशांच्या मोहळांबाबत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही आता जोर धरत आहे.
0
0
Report

भंडारा पुलिस के श्वान नॉटी का निधन; 15 मामलों के खुलासे में भूमिका

Bhandara, Maharashtra:भंडारा पोलीस दलाची श्वान ‘नॉटी’चे दुःखद निधन भंडारा पोलीस दलाची शान असलेला, अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष श्वान ‘नॉटी’ याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. २०१५ साली पोलीस दलात दाखल झालेल्या ‘नॉटी’ने आपल्या सेवाकाळात तब्बल १५ गुन्ह्यांची उकल करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच ३३ इतर गुन्ह्यांच्या तपासातही त्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर ‘नॉटी’ने आपल्या चपळाई आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गुन्ह्यांच्या तपासाला योग्य दिशा दिली. केवळ गुन्हे उकलण्यातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही ‘नॉटी’ अव्वल ठरला. २०१८ आणि २०१९ मध्ये नागपूर येथे झालेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने सलग प्रथम क्रमांक पटकावला होता. आज त्याच्या अंत्यविधीला भंडारा पोलीस दलाकडून शासकीय इतमामात शोक सलामी देण्यात आली。
0
0
Report

नागपुर के रामदास पेठ में फर्नीचर फैक्ट्री में आग, दमकल ने समय पर नियंत्रण पाया

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरातील रामदास पेठ पंचशील चौक येथील बिग बाजारजवळील फिरदौस इमारतीत आगीची घटना रात्री 11 वाजताचा सुमारासची घटना फर्निचर कारखान्यात अचानक लागेल्या आगीचा भडका उडाला छतावरून ज्वाला आणि धूर दिसल्याने खळबळ, स्थानिकांनी तत्काळ प्रशासनाला दिली माहिती आग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले छतावर लाकूड आणि फर्निचर साठा त्यामुळे आग वेगाने पसरली होती बाजूलाच रुग्णालय असल्याने तणावचे वातावरण, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू
0
0
Report
Advertisement

Paithan में रात की बारिश से बिजली-जलापूर्ति ठप्प, शहर के कई हिस्सों में पानी संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण तालुक्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी आणि फारोळा येथील वीज यंत्रणेत बिघाड झाला. सुमारे ४ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने छत्रपती संभाजी नगर शहराला पाणी उपसणाऱ्या ७००, ९०० आणि १२०० मिमीच्या मुख्य जलवाहिन्या कोरड्या पडल्या. परिणामी, मंगळवारी सकाळपासूनच पाण्याचे टप्पे ५ तास उशिराने सुरु झाले असून, अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. पायठण आणि बिडकीन परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जायकवाडी पंपगृहाचा वीजपुरवठा दोन वेळा खंडित झाला. वीज नसल्याने पंपिंग बंद होते. त्यामुळे जलकुंभभरण्याची प्रक्रिया थांबली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पाणी मिळाल्याचा परिणाम सायंकाळच्या पुरवठ्यावर झाला आहे. मंगळवारी सायंकाळी पाणी येणार होते, ते टप्पे आता रद्द करण्यात आले असून, ते बुधवारी दिले जाणार आहेत. यामुळे सिडको, हडको आणि जुन्या शहरातील अनेक भागांत नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
0
0
Report

आईपीएस प्रशांत डगळे की टीम ने जुआ अड्डे पर छापा, 4.06 लाख रुपये जप्त

Pandharpur, Maharashtra:आयपीएस प्रशांत डगळे यांच्या पथकाची जुगार अड्डयावर कारवाई, ४ लाख ०६ हजार ६४० रू. चा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातून माळी वस्तीकडे जाणाऱ्या उजनी कॅनॉलच्या बाजुस दिनेश दिगंबर चव्हाण याचे शेतातील पत्रাশेड समोर काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला या छापा कारवाईत दिनेश दिगंबर चव्हाण, रियाज जावेद सय्यद, लतिफ दिलावर शेख ,तायाप्पा कृष्णा काळे, उमेश मच्छींद्र काळे, नवनाथ अंकुश गडदे, गोविंद विठ्ठल कोळेकर, बिरा पांडुरंग अनुसे , हाजु यासिन शेख हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांचे कडील ४,६४०/- रोख रक्कम, ०८ मोबाईल, ०७ मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असा एकुण ४, लाख ०६, हजार ६४০-०० रू. किंमतीचा मुददेमाल मिळून आला
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top