icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राज्यसभा उम्मीदवारों की घोषणा से महाराष्ट्र की राजनीति गरमाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: - छत्रपती संभाजीनगर - मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑने शहरात आज नव्या कंपनीकडून कचरा संकलन. - हा महिना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आज महानगरपालिकेद्वारे खचरा संकलनासाठी जवळपास 400 गाड्यांचा लोकार्पण सोहळा आहे. - कचरा मुक्त हे शहर असल पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. - या महिन्यात आम्ही महत्त्वाचा पाण्याचा टप्पा पार करतोय, 15 तारखेपर्यंत पाण्याची परिस्थिती नॉर्मल होईल पाणी पोहोचळे असं एकत्रित वातावरण आहे. - 1 मेपर्यंत पाणी पोहोचणार होतं पण पोहोचलं नाही, त्यात टेक्निकल अडचणी आल्या आहेत. - आमच्या सगळ्यांचा प्रयत्न तर प्रामाणिक आहे यामध्ये स्वतः हायकोर्ट सुद्धा मॉनिटरिंग करत आहे. - टेक्निकल अडचणीमुळे दिले होतो त्याला काही नाही, ते आमच्या हातात नाही एखाद्या वेळेस एखादा पाईप फुटतो ते जाणीवपूर्वक नसतं. - 15 मे ला पाणी टाक्यांमध्ये चढेल ऑन मैत्रीपूर्ण वातावरणात विधानपरिषद, दानवे यांना बळ. - उद्धव ठाकरे साहेब ही निवडणूक लढवतील अशी सर्वांची अपेक्षा होती, काँग्रेसने त्याच पद्धतीने उबाटाला पाठिंबा दिला होता. - परंतु उद्धव साहेबांच्या मनामध्ये ऐनवेळेला कुठे घातपात झाला तर काय? अशी मनात शंका असावी म्हणून त्यांनी माघार घेतली असावी. - काल निवडणुकीत अचानक अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केलं आणि जी काही धावपळ झाली, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्या फोना फोनी मध्ये आहेत. - एका दगडात दोन पक्षी मारणं हा जो प्रकार आहे तो उबाटाने केला आहे. - येणारी राज्यसभा काँग्रेसला देणार हे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं याचा अर्थ संजय राऊत चा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित झालंय. ऑन सत्ताधाऱ्यांकडून दानवेंना बळ - बळ देण्याचं असं काही नाही, जनरली विधानपरिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा सगळ्यांचा मानस असतो. - आता तुम्ही गेल्या अनेक निवडणुका पाहिल्यात आता कुठे घोडेबाजार होताना दिसत नाही, नसता पूर्वी आमदार पळून घेऊन जाणे हा प्रकार सुद्धा महाराष्ट्राने पाहिला आहे. - गेल्या दहा पंधरा वर्षात हे सगळे प्रकार बंद झाले आहेत. ऑन बच्चू कडू यांच्यावर काय दबाव टाकला असा प्रश्न पुढे येत आहे. - बच्चू कडू पहिला आमचा तालुका प्रमुख होता, शिवसेना त्याचे मूळ आहे. - आता जर ते स्वगृही आले असतील, त्याच्या आक्रमकतेचा, दिव्यांग शेतकऱ्यांसाठी तो नेहमी लढत राहिला आहे. - असे लढवय नेते शिवसेनेत असले पाहिजे आमच्या एका फोनमध्ये आम्हाला एक सहकारी मिळाला. - कोणताही दबाव नाही कोणीही दबावमध्ये राजकारण करू शकत नाही बच्चू कडू यांनी दोन दिवसापूर्वीच गोड सिग्नल दिला होता. - त्यांनी सांगितले की दरवेळेला मला कडू म्हणतात गोड बोलण्याचा टाईम आता आला आहे. ऑन आक्रमक संघटना गुंडाळण्यात आली - संघटना गुंडाळण्यात आली नाही, ती संघटना ज्या पद्धतीने काम करायची तेच करणार आहे. - शिवसेनेचा भगवा त्यांनी घेतला आहे. ऑन बच्चू कडूला सत्ते शिवाय करमत नाही - प्रवीण तायडे - असं टीका केल्याने होत नाही, बाकी तुम्ही लोकांनी काय केलं ते तपासा, विनाकारण एखाद्यावर आरोप लावायचा त्यांनी पक्ष बदलला म्हणजे त्याला करमत नाही. - तुम्ही काही केलं तर चालतं असं दुप्पटी धोरण चालत नाही. ऑन महाराष्ट्रातल्या राजकारणांनी वाटोळ केले राज ठाकरे - वाटोळ करण्यात कोण कोण होतं याचे नाव सुद्धा त्यांनी जाहीर केले पाहिजे, परंतु एक लक्षात घ्या सामान्यज्ञाने प्रश्न सुटतो प्रश्न चिडवायचा असेल तर त्याला आपण अनेक कारणे देऊ शकतो. - चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व काही कोसळणार नाही परंतु आपण त्यांना एक धडा तरी घ्यावा लागेल जर मराठी माणूस जर उभा राहिला किंवा चिडला तर काही खरं नाही. - म्हणून मराठी बोलीभाषा ही आपल्याला अवलंबावी लागेल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. - महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे हा स्वाभिमान आम्ही पायदळी तुटू देणार नाही. ऑन गॅस फक्त जैन लोकांना एवढी हिंमत कशी- राज ठाकरे - मंगल प्रभात लोढासारख्या सीनियर असणाऱ्या मंत्र्यांनी असं बोलणं मला वाटतं थोडसं चुकलं परंतु त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी समज दिली असावी. ऑन पवार कुटुंब यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही - सुप्रिया सुळे - आता चार वर्षे इलेक्शन नाहीत, इलेक्शन आल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट तेव्हा त्याला महत्त्व असेल, परंतु आता त्याची मूर्तमेढ रवण्याचं काही कारण नाही
0
0
Report

सांगली में महाराष्ट्र दिवस धूम-धाम से मनाया गया; मंत्री ने ध्वजारोहण किया

Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये 67 वा महाराष्ट्रातील मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला, जिल्हाधिकारीांसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलिसातील उल्लेखनीय कामगिरी व जाणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत, माणसाचा विकास करण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचं, मत व्यक्त केले आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती के मोझरी में तेज कार दुर्घटना, यातायात सुचारू

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील मोझरी परिसरात कारचा विचित्र अपघात; भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन चढली कार. नागपूरकडून अमरावतीकडे येणारी भरधाव कार अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन चढली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले केले असून या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सध्या कार रस्त्याच्या बाजूला काढली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

करंदी बैलगाडा दौड़ में 41 वर्षीय युवक की मौत

Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे करंदी येथे बैलगाडा शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या प्रकाश महादू फटांगडे या ४१ वर्षीय तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला. करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या नावाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अनियंत्रित झाला. धावलेला बैल पकडण्यासाठी प्रकाश फटांगडे पुढे सरसावले. त्यावेळी बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन ते जमिनीवर कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचा भाऊ गोरक्ष महादू फटांगडे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

बीड़ में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने ध्वजारोहण किया, भावुक दृश्य

Beed, Maharashtra:बीड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण; माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार भावुक..! ANC- 67 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त बीड शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाचा बीड दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या. अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. बाईट: सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
0
0
Report

शिरूर के होटल उद्योग पर गैस कीमतों का भारी असर, 19kg सिलेंडर में 993 रुपये वृद्धि

Shirur, Maharashtra:व्यावसायिक गैस सिलेंडरमध्ये तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायावर परिणाम ANC:घरगुति गैस दर स्थिर असताना १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. VO: १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २०९३ रुपयांवरून थेट ३०८६ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच एका सिलेंडरमागे तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत नसतानाच ही दरवाढ करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.गॅस दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असून, खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशालाही मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.याचाच आढाव घेत हॉटेल व्यावसायिकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To दत्ता बाबर (हॉटेल व्यावसायिक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
0
Report
Advertisement

वाशिम में 67वें स्थापना दिवस पर ध्वजारोहण और शासकीय समारोह

Washim, Maharashtra:वाशिममध्ये महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होतं. वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर हा मुख्य शासकीय समारंभ पार पडला.राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक तसेच शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्यात आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता असून नागरिकांनी त्यासाठी सज्ज राहावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केलं
0
0
Report

रशीदपुरा के अवैध गर्भपात रैकेट का मुख्य एजेंट गिरफ्तार, शिर्डी से पकड़ा गया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंट मंगेश सुखदेव थोरात याला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे समजताच तो शिर्डी येथे जाऊन लपला होता. महिलांना गर्भपातासाठी पोहोचवण्यासाठी तो तब्बल १५ हजार रुपये कमिशन घेत असल्याचे पुढं आले होते, रशीदपुरा प्रकरणात २८ एप्रिल रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची धरपकड सुरू झाली होती. कारवाईची धास्ती घेऊन थोरातने थेट शिर्डी गाठली होती आणि तेथील देवस्थानच्या एका खोलीत तो लपून बसला होता. मात्र, जवळचे पैसे संपल्याने घरून पैसे घेण्यासाठी तो शहरात परतणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात त्याला अटक झाली...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top