icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिरगांव के खेत में दिन से लापता महेश यादव का शव मिला, खलबली

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime शिरगाव येथे शेतात आढळला बेवारस मृतदेह; अलोरे येथील बेपत्ता व्यक्तीची ओळख पटली ​चिपळूण: शिरगाव येथे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; आकस्मिक मृत्यूची नोंद ​गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अलोरे येथील व्यक्तीचा शिरगावात आढळला मृतदेह.. अँकर चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील महेश राजाराम यादव (वय अंदाजे ४० ते ४५) यांचा मृतदेह शिरगाव येथील शिगवण महाराज मठामागील शेतात सडलेल्या अवस्थेत आढळून आला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.​महेश यादव हे गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. बुधवार, ३ जून रोजी त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.​या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

नवी मुंबई में महंगाई विरोधी जन आंदोलन, सुप्रिया सुळे, रोहित पवार शिंदे की उपस्थिति

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे महागाई विरोधात मोठं जन आंदोलन करण्यात येतंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आणीबात्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असल्यामुळे सामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडा मोडला आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये हे आंदोलन करण्यात आले असून हजारो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी थाळी वाजवत चूल पेटवत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
0
0
Report

नासिक में भारी बारिश ने नगरपालिका पूर्व मानसून तैयारी फेल होने के संकेत दिए

Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. काल अवघ्या तीन तासांत सुमारे 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले, तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये थेट पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पावसाळापूर्व नालेसफाई आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे प्रश्न कायम असल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिह्न उपस्थित होत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report
Advertisement

सांगली-मतरे समेत इलाके में मान्सून पूर्व जोरदार बारिश, गर्मी से राहत

Sangli, Maharashtra:सांगली-मिरजेसह परिसरात मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी.. सांगली व मिरज शहरासह परिसरात मुसळधार असा पावस पडला आहे. सकाळपासून सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र ११ वाजल्यानंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भाग व रस्त्यावर पाणी साचले. तर अचानक पडलेल्या पावसामुळे सांगलीकरांची मात्र पुरतीच दैना उडाली. मान्सून पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने सांगलीकरांना दिलासा देखील मिळाला आहे.
0
0
Report

नांदेड विधान परिषद चुनाव में महायुती बनाम महाविकास आघाडी की संघर्ष जारी

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड विधान परिषदेत महायुतीची बाजू भक्कम दिसत असली तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील संघर्षामुळे निवडणुकीत रंगत येणार अशी चर्चा सुरु आहे. आमदार चिखलीकर यांनी नांदेडची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणीही केली होती. त्यामुळे चव्हाण आणि चिखलीकर यांच्यातील बेबनावाचा फायदा महाविकास आघाडीला होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली. भाजपच्या उमेदवाराने उम Vedारी दाखल केली त्या दिवशी सकाळी आमदार प्रताप पाटील आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांची दोन तास भेट झाली. उमेदवारी दाखल करताना मात्र दोनघांनीही दांडी मारली त्यामुळे बेबनाव स्पष्ट दिसतं असल्याचे रामदास पाटील म्हणाले. काँग्रेसमधून आलेल्या अमर राजूरकर यांना उमेदवारी दिल्याने भाजमधील अनेकजण नाराज असून त्याचाही फायदा होईल असेही पाटील म्हणाले.
0
0
Report

वर्धा नगर निगम के इंजीनियर को रिश्वत लेते गिरफ्तार; एसीबी ने खुलासा

Wardha, Maharashtra:वर्धा नगरपालिकेच्या अभियंता २ लाखांची लाच स्वीकारताना जेरबंद ॲकर - वर्धा नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बांधकाम विभागाचे अभियंता संदीप डोईजळ यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एका कामाच्या देयकाचे इस्टिमेट तयार करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नगरपालिकेतील या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

नागेश भोसले SIT जांच कराएं, फत्तेपूरकर उमेदवारी मामले में दबाव बना रहा

Pandharpur, Maharashtra:Congress उम्मीदवार आदित्य फत्तेपूरकर के उमेदवारी अर्ज पर की गई सही बनावट है, इस प्रकरण की SIT चौकशी करवावी की मांग नागेश भोसले ने की है. नागेश भोसले ने मेरी सही बनावट होने का प्रतिज्ञापत्र देते हुए फत्तेपूरकर का उमेदवारी अर्ज बाद किया है. इसके बाद फत्तेपूरकर ने मुंबई उच्च न्यायालय में दाद मागने की स्पष्ट किया है. नागेश भोसले ने SIT चौकशी करके उचित कार्रवाई की मांग की है. मेरे ऊपर किसी का दबाव नहीं है. मैं खुद प्रतिज्ञापत्र प्रस्तुत किया हूँ. उचित समय पर इन सब पर उत्तर दूँगा. बनावट से سولापुर में राजनीति ताप गई है. बायट – नागेश भोसले
0
0
Report

आदिवासी महिलाओं के सोने की ठगी: किनवट के सोनार पर पुलिस मामला दर्ज

Nanded-Waghala, Maharashtra:आदिवासी महिलांच्या अशिक्षितपनाचा फायदा घेऊन एका सोनाराने त्यांच्या फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. फसवणूक झालेल्या एका आदिवासी महिला डॉक्टरने हा प्रकार समोर आणला असून सोनारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुका असलेल्या किनवट मधील हा प्रकार आहे. आदिवासी तालुक असल्याने इथली घरे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे आपल्याकडील सोने आणि इतर एवज अनेकदा रहिवाशी सोनाराकडे किंवा सावकाराकडे सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून ठेवतात. पण त्याचाच फायदा एका सोनाराने घेतल्याचा आरोप आहे. वाळकी येथील रहिवाशी शिल्पा वाळकीकर यांनी आपल्याकडील तीस तोळे सोने 2013 साली इस्लापूर येथील सतीश सकवान या सोनाराकडे सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून दिले होते. पण सोने परत मागितल्यावर सकवान याने टाळाटाळ केली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सोनाराच्या वडिलांनी 12 तोळे सोने 2022 रोजी परत दिले पण 18 तोळे सोने देण्यास पुन्हा टाळाटाळ सुरु केली. सोने परत देण्याची मानसिकता दिसत नसल्याने अखेर शिल्पा वाळकीकर यांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुरावा म्हणून त्यांनी सोनारासोबतच्या कॉल रेकॉर्डिंग, सोन्याच्या पावत्या आणि काही इतर पुरावे दिले. त्यांनतर पोलिसांनी सतीश सकवान विरोधात गुन्हा दाखल केला. शिल्पा वळकीकर यांनी पुढे येऊन तक्रार दिल्यावर फसवणूक झालेल्या इतर दोन जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीये. सकवान याचा एक भाऊ नगरसेवक तर एक भाऊ मंत्रालयात कारकून असून ते पोलीस आणि फिर्यादीवर दबाव आणत असल्याचा आरोप शिल्पा यांनी केलाय. या सोनाराने असंख्य आदिवासी महिलांची फसवणूक केली असून याची सी आय डी किंवा एस या टी गठीत करून चौकशी करावी अशी मागणीही शिल्पा यांनी केलीये.
0
0
Report
Advertisement

कोयना जलविद्युत परियोजना में पानी घटा, चारों केंद्र अस्थाई बंद, विद्युत संकट की संभावना

Satara, Maharashtra:सातारा - राज्यातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्प असलेल्या कोयना धরণातील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. धरणात केवळ 15 टीएमसी पाणी शिल्लक असून जिवंत पाणीसाठा 10 टीएमसीवर आला आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोयना प्रकल्पातील चारही वीज निर्मिती केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. ज्या वेळी राज्याला गरज असेल त्याच वेळी कोयना धरणातून वीज निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यंदा कोयना प्रकल्पातून 3 हजार 271 दशलक्ष युनिट इतकी विक्रमी वीज निर्मिती झाली असली तरी मात्र आता पाण्याअभावी वीज निर्मितीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच वीज निर्मिती केली जात असून त्यानंतर केंद्रे पुन्हा बंद केली जात आहेत. अतिरिक्त पाण्यासाठी कृष्णा लवादाकडे मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्राला परराज्यातून वीज खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मान्सून लांबल्यास राज्यासमोर पुन्हा वीज संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

कोकण किनारपट्टी से 9 हजार करोड़ की उलाढाल, महाराष्ट्र ने सागरी उत्पादन में दबदबा बना लिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मत्स्य उत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याचा दबदबा.. कोकण किनारपट्टीवर 9 हजार कोटींची उलाढाल.. रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या स्थानी.. युद्ध परिस्थिती आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली विविध आव्हाने यावर मात करत भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्य_exports_तने आर्थिक वर्ष 2025-26 यामध्ये 72 हजार 325.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.. मरीन प्रोडक्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या आकडेवारीनुसार देशाच्या या यशात महाराष्ट्राच्या विशेषता कोकण किनारपट्टीचा सिंहाचा वाटा आहे.. राज्य मत्स्य व्यवसाय विभाग आणि सेंट्रल मरीन फिशरीष रिसर्च इन्स्टिट्यूट या अहवालानुसार महाराष्ट्राच्या सागरी नियर निर्यातीमुळे देशाच्या तिजोरी तब्बल 7 हजार 343 कोटी 41 लाख रुपयांचे परकीय चलन जमा झाले आहे.. या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचे एकूण सागरी मत्स्य उत्पादन 3 लाख 10 हजार 777 मॅट्रिक टनांवर पोहोचले असून कोकणात सुमारे 8 हजार 500 ते 9 हजार कोटी रुपयांची भव्य आर्थिक उलाढाल झाली आहे..
0
0
Report

रत्नागिरी में स्थानीय निकाय चुनाव: 12 आवेदन वैध, आख़िरी माघारण कल तय

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: सर्व १२ अर्ज वैध; गुरुवारी कोण माघार घेणार? रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे.. मंगळवारी झालेल्या छाननीत दाखल झालेले सर्व ६ उमेदवारांचे एकूण १२ अर्ज वैध ठरले आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. आता सर्वांचे लक्ष उद्या,गुरुवार ४ जून या अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे.त्यामुळे अखेरच्या दिवशी कोण माघार घेणार आणि निवडणुकीचे अंतिम चित्र काय असणार,याबाबत कोकणवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
0
0
Report
Advertisement

मान्चर में तूफानी बारिश से प्याज भंडारण ढहाव, किसान संघर्ष बढ़े

Shirur, Maharashtra:मान्चर क्षेत्र में पिछले कुछ दिनों से प्याज के बाजार भाव गड़बड़ रहने के कारण प्याज उत्पादक किसान कठिन परिस्थितियों में हैं। इस बीच राज्य भर में प्याज की कीमतों के बढ़ाने के लिए आंदोलन चल रहा है, ताकि किसानों को अच्छा मूल्य मिल सके। वादळी हवा और बारिश के कारण वखारी में रखे प्याज की हालत खराब होने लगी है। आंबेगाव तालुक्यात खड़की क्षेत्र में वादळी प्‍यसाच्या पावसाने प्याज चाळी के छप्पर उड़ने से लगभग 900 पिशवी प्याज भीग गए, जिससे किसानों के सामने आय और बच्चों की शिक्षा जैसी स्थानीय जरूरतों को लेकर चिंता बढ़ गई है। इस नुकसान की समीक्षा हमारे प्रतिनिधि Hemant Chapude ने की।
0
0
Report

चांदवड के श्री रेणुकामाता मंदिर में अधिक महिनों में महिला-पुरुष भक्तों की भारी भीड़

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त महिला भाविकांची मोठी गर्दी होत आहे हिंदू धर्मपरंपरेनुसार तीन वर्षांनी येणारा अधिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, दानधर्म तसेच लेक-जावयाला घरी बोलावून पुरणपोळीचे जेवण देण्याची परंपरा आहे यावेळी लेक आणि जावयाला कपडे भेट देत तेहतीस बत्तासे किंवा अनारशांचे वाण देण्याची प्रथा देखील पाळली जाते याचबरोबर भाविक आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊन देवीची ओटी भरतात आणि तेहतीस बत्तासे किंवा अनारशांचे वाण अर्पण करतात या पार्श्वभूमीवर चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात महिला भाविकांसह पुरुष भाविकांचीही मोठी गर्दी होत देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महिला भाविकांकडून ओटी भरणे, वाण अर्पण करणे आणि विशेष पूजाविधी करण्यात येत आहेत अधिक महिन्याच्या निमित्ताने दररोज सुमारे १० ते १५ हजार भाविक चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे
0
0
Report

सांगली-सातारा विधान परिषद: अभयसिंह जगताप महाविकास आघाडी के शरद पवार गुट के आधिकारिक उमेदवार

Sangli, Maharashtra:सांगली सातारा विधान परिषद निवडणूक - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असणार अभयसिंह जगताप.. बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज ठरला अवैध. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अब अभयसिंह जगताप असणार आहेत.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगतاپ आणि सांगलीच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस व जयंत पाटलांचे खाद्य समर्थक बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,मात्र अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरला आहे,तर अपक्ष अर्ज वैध ठरला आहे,त्यामुळे आता सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत अभयसिंह जगताप हे महाविकास आघाडीकडुन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत,तर उद्या अर्ज माघार प्रक्रियेऊन त्यानंतरच निवडणुकीचा खरं चित्र स्पष्ट होणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top