icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दिलीप वळसे पाटील का भोंदगिरी पर अंकुश, विकास और शिक्षा पर जोर

Ambegaon, Maharashtra:माणसाला देव बनवू नका; विकासासोबत विचारांचीही गरज” – दिलीप वळसे पाटील ANC :-“मी आता जगतो फक्त तुमच्यासाठी,” असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी पुढील काळात केवळ विकासाच्या घोषणा नव्हे, तर जनतेचे राहणीमान उंचावणे, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हेच खरे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. राजकारणात समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी सोशल मीडियातून चांगले-वाईट विचार लोकांच्या मनात रुजवले जात असल्याची खंत व्यक्त केली. मात्र, अध्यात्मावर आपला ठाम विश्वास असल्याचे सांगत त्यांनी कीर्तनातून मिळणाऱ्या शिकवणीचे महत्त्व मान्य केले, पण भोंदुगिरी आणि जादूटोण्यावर विश्वास नसल्याचे ठामपणे सांगितले. “आम्हाला कोणी महाराज म्हणत नाही,” अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी, माणसाला देव बनवू नका, आम्हीही सामान्य माणूस असून आमचं कुटुंब आणि सामाजिक आयुष्य आहे, असे स्पष्ट केले.तसेच, कीर्तन ऐकायला आवडत असले तरी भोंदुगिरीला विरोध असल्याचे सांगत, समाजात सकारात्मक बदल घडवणारे विचारच स्वीकारले पाहिजेत, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय... Sound Bytes:- दिलीप वळसे पाटील (माजी मंत्री आमदार)
0
0
Report

समरजित सिंह घाटगे 8 तारीख को बीजेपी में प्रवेश करेंगे

Kolhapur, Maharashtra:समरजितसिंह घाटगे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश येत्या ८ तारखेला होणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश प्रलंबित होता. मात्र आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे अस स्वतःच त्यांनी स्पष्ट केले आहे. नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी नाळ जोडलेलीच ठेवली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशनानंतर अधिकृत प्रवेशाबाबत प्राथमिक सहमती झाली होती. आता ८ तारखेला माझा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे. माझ्या मूळ पक्षात परत येत असल्याचा मला अभिमान आणि समाधान आहे,” असे घाटगे म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना घाटगे यांनी “देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. पक्षाबाहेर असतानाही मी अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पुन्हा संधी मिळत असल्याचा आनंद आहे अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, पालिका निवडणुकांनंतर डिसेंबर महिन्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून “मी पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे, हे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले उचलली आहेत,” असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नांदगांव चौक के उड़ान पुल में फिर खड्डा, भ्रष्टाचार के आरोप

Wardha, Maharashtra:नांदगांव चौक येथील उड्डाण पुलाला परत खड्डा पुलाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह;मोठा भ्रष्टाचार असल्याची चर्चा अँकर- हिंगणघाट येथील नांदगांव चौक येथील उड्डाण पुल काही वर्षा पूर्वी तयार करण्यात आला याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते.या उड्डाण पुलावर ही तिसरी घटना असून या अगोदर सुद्धा मोठे खड्डे पडले होते किती तरी दिवस पुलाची एक बाजू वाहतुकीस बंद ठेवण्यात आली होती. आता परत पुलाच्या दुसऱ्या बाजूस सुद्धा खड्डा पडला असून पुलाच्या दर्जेवर प्रश्न निर्माण होत आहे खड्डा पडल्यामुळे पुलाची एक बाजू बंद करून वरील सर्व वाहतूक रहदारीच्या चौक मधून जात असून त्याठिकाणी अपघात देखील होत आहे.यापुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी नागरिकांची प्रतिक्रिया असून संबंधित कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करून अश्या निस्कृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीचे यापुढे देण्यात आलेले सर्व प्रकल्प काढून घ्यावेत अशी सर्वत्र मागणी होत आहे.या कंपनीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तत्काळ कारवाई करून यापूलाच्या कामाची चौकशी तसेच दर्जा तपासून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी हिंगणघाट येथील नागरिकांची मागणी आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक सेक्स कांड: १२१ अश्लील व्हिडिओ मिळाल्याने तपासाला नवा मोड़

Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये गाजत असलेल्या तथाकथित “सेक्स कॅण्डल” प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. सुरुवातीला ब्लॅकमेलिंगचा बळी असल्याचा दावा करणारा फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे याच्याविरोधातच आता गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सातपूर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एरंडे यांच्या मोबाईल आणि टॅबमध्ये तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या आहेत. या व्हिडिओंचा कालावधी २००३ ते २०२५ असा असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओंमध्ये अनेक विवाहित महिलांसोबत गैरकृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. यापूर्वी एरंडे यांनी आपला मोबाईल आणि टॅब चोरीला गेल्याचे सांगत अज्ञात इसमांकडून ब्लॅकमेल होत असल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ऑफिस बॉय आकाश बकरे याच्यासह अन्य तीन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला होता... मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे चित्र पूर्णपणे बदलले. एरंडे यांच्याविरोधातच लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात संभाव्य पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, तपासासाठी स्वतंत्र महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरून पीडितांना सुरक्षित वातावरणात आपली बाजू मांडता येईल...रवींद्र एरंडे याला आज न्यायालयात हजर केलं असता माननीय न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे...
0
0
Report

कल्याण में आधार कार्ड के कारण प्रवेश नहीं मिला, जेईई परीक्षा रुक गई

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये जेईईच्या परिक्षा केंद्रावर आधार कार्डचे कारण देत आर. एन. नेत्रा या तरुणीला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे तिची परिक्षा हुकली. तिच्या आईसह इतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. आर. एन. नेत्रा हिची परिक्षा हुकल्याने तिच्या दोन वर्षांच्या अभ्यासाचा नुकसान झाले आहे. ठाण्यापासून आलेले पालक म्हणाले की, तिचे प्रवेश नाकारले गेले; त्यांनी सुरक्षा रक्षकांसमवेत केंद्र अधिकारी वर्गाकडे कागदपत्र मागितले. आधारकार्डची छायांकित प्रत दिली गेली तरीही प्रवेश नाकारला गेला.
0
0
Report
Advertisement

सातारा जिला परिषद चयन के बाद भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना में घमासान

Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठल्याचे पहायला मिळाले.भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. यानंतर घटनेनंतर साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी,शिवसेना संघर्ष पेटला आहे .या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर त्याचा विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात वाक्युद्धं रंगले आहे.पाहूया पाहूया विसंवेदनशीलता/गप्पा/गोडगळ-शब्ददारियाँ (नोट: खालील विभाग फालतू/गैर-समाचार सामग्री आहे, गुरुगरंथ-चालू) कायदा/राजकारण/विधेयक/घटनाक्रम वगैरे माहिती मुख्य संदर्भ विओ - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी नंतर आज सभापती निवडीवेळी पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद पेटल्याचे पहायला मिळाले.राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून आज होणाऱ्या सभापती निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत भाजप आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला आणि काही वेळात सभागृहातून बाहेर पडून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. आम्ही जी बोलतो ते करून दाखवतो असं सांगत आगे आगे देखो होता है क्या असा इशारा मंत्री देसाई यांनी केला आहे. विओ - मंत्री मकरंद पाटील यांनी देखील राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात ... आज आमचे सदस्य जरी फोडले असले तरी ही वेळ त्यांच्यावर येणार आहे.. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबात 50 ते 60 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे शंभर टक्के याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे. विओ - मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या टीकेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले आहे.मंत्री शिवेंद्रसिंहाराजे यांनी सातारा जिल्हा परिषदेत आमचं बहुमत असताना देखील आम्हाला जाणीवपूर्वक सत्ते पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्याकडे बहुमत असल्यामुळे आमचाच होणार...आज त्यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला हे सिद्ध झालं आहे असा टोला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे. विओ -मंत्री शंभूराज देसाई आरोप आमच्यावर करतात आणि धमकी देखील तेच देतात हे सातत्याने घडल आले आहे. आताही ते म्हणत आहेत अजून पाच वर्ष आहेत तर आम्हीही ते बघायलाच बसलो असल्याचे सडेतोड उत्तर यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे
0
0
Report

अकोल्यात मोर का रंगीला नृत्य, अधिकारी के सरकारी निवासस्थल पर मन मोह लिया

Akola, Maharashtra:अकोल्यात आज सकाळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या शासकीय निवासस्थानी एक मनमोहक नजारा पाहायला मिळाला. एका सुंदर मोराने पिसारा फुलवत केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने आज सकाळच्या आल्हाददायक वातावरणात मोराने रंगीबेरंगी पिसारा फुलवत नृत्य सादर केले. या नृत्याचा मोहक देखावा उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला. शहराच्या गजबजाटात असे निसर्गदर्शन दुर्मीळ असल्याची प्रतिक्रिया डॉ. शरद जावळे यांनी व्यक्त केली. मोराचे नृत्य पावसाच्या आगमनाचे संकेत मानले जात असून, या प्रसंगामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top