icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिवसेना का ट्रैक्टर मार्च: बीड में किसानों की कर्जमाफी की मांग

Beed, Maharashtra:बीड : शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेना आक्रमक; जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला बीड मधील ट्रॅक्टर मोर्चा..! शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आज मराठवाडाभर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर "नको अटी - नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती" या घोषवाक्याखाली आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले आहेत. राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारीपणा, पिकांना मिळणारा कमी दर, खतांचा तुटवडा, अपुरा वीजपुरवठा आणि विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरीांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही धडक ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान जर सरकारने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्राचा नेपाळ होईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी दिला आहे...
0
0
Report

लातूर में रविकांत तुपकर के उपोषण के समर्थन में किसान, कर्जमाफी बिना शर्त की मांग

Latur, Maharashtra:লातুর 브েকিং न्यूज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपोषण आंदोलनाला लातूर मधून पाठिंबा... शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा तीव्र.... शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी संघटनेने लातूरमध्ये आंदोलन केलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशावर शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या अध्यादेशाची प्रतीकात्मक होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.
0
0
Report
Advertisement

पंढरपुर: भाजपा शुद्धीकरण के बाद किसान आक्रामक, गोमूत्र-चंद्रभागा पर नाराजगी

Pandharpur, Maharashtra: Anchor - पंढरपुरात भाजपच्या शुद्धीकरण कार्यक्रमानंतर सर्वसामान्य शेतकरी आक्रमक, भाजपला शेतकऱ्यांची एलर्जी आहे काय ? पंढरपुरातील आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या जागेच्या ठिकाणी गोमूत्र आणि चंद्रभागेचे पाणी टाकून शुद्धीकरण केलं यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी बसलेली जागा अपवित्र असू शकते का असा सवाल या शेतकऱ्याने भाजपला विचारलेला आहे. गोरक्षणापर्यंत असलेला विषय गोमुत्रापर्यंत आणलेला आहे हे सहन केले जाणार नाही शेतकऱ्यांची चेष्टा सुरू झाली आहे. भाजपने अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या लोकांना आवरलं नाही तर शेतकऱ्याकडे सहा बैलांचा नांगर असतो त्या नांगरा सहित आम्हाला तुमच्या दारात यावं लागेल असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.
0
0
Report

शिवसेना-शिंदे और भाजपा विटा में बैठक, नाराज़गी नहीं; स्नेहभोजन भी

Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप नेत्यांची सांगलीच्या विटा येथे बैठक पार पडणार आहे. शिवसेना नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार असून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ही बैठक होणार आहे. बैठकीमध्ये मतदान कसं करावं, याबाबत मार्गदर्शन होणार आहे. उद्या विटा येथेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे.
0
0
Report

नाशिक की तपोवन रोड पर सुटकेस में महिला का शव मिला, पुलिस जांच शुरू

Nashik, Maharashtra:नाशिकच्या तपोवन रोडवर गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेला नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. हा मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली जात असून फॉरेन्सिक टीम कडून तपास केला जात आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीचा मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अधिकचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
0
Report
Advertisement

सोलापुर के मंत्री जयकुमार गोरे ने नए शिवसेना गुट को बधाई, महायुती में हलचल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिवसेनेच्या नवीन गटाला माझ्या शुभेच्छा - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे (पालकमंत्री,सोलापूर) *ऑन माळशिरस अपघात* माळशिरसच्या अपघाताचा कारण आपल्या सर्वाना माहीत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला पण त्या विहिरीला संरक्षण कठडा असला असता अपघात झाला नस्ता. संबंधित जो ठेकेदार आहे त्याला अनेकदा नोटीसा पाठवल्या दिल्या होत्या. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला आहेत त्या ठेकेदाराला सोडलं जाणार नाही राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या जवळच्या विहिरींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विहीरीना संरक्षण कटडे करावे लागतील तर काही विहिरी बुजवावी लागतील. कुठल्याही विभागाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. *ऑन ठाकरे गट खासदार(स्वतंत्र गट)* *नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत.* *असा कोणता नवीन गट तयार होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू...* मी जिल्हा पातळीवरील छोटा कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी चालतात याची मला कल्पना नाही. ज्यांनी नारीवंदन विधेयकाचा विरोध केला त्यांना त्याचे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प केला आहे. जे जे घटक नारिवंदन विधेयक मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्या पक्षामध्ये असंतोष आहे. भविष्यात हे बिल मंजूर होईल आणि महिला भगिनींना न्याय मिळेल. *ऑन विधानपरिषद निवडणूक व्हीप* व्हीप बजावणे ही पक्षाची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भाजप कोणाला घाबरत नाही.भाजप उमेदवाराचे सर्व मतदार ठाम आहेत. भाजपकडे जेवढे मत आहेत त्याहून 200 अधिक मते घेऊन आम्ही निवडून येऊ विरोधक झोपतात म्हणून त्यांना घरी बसण्याची वेळ आलीय. *ऑन सातारा विधान परिषद निवडणूक* पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. शिवसेनेचा निर्णय आजउद्यापर्यंत होणे अपेक्षित आहे,तोही निर्णय होईल. महायुती मजबूत आहे अजिबात चिंता करू नका.. भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था करायची आहे ती केलेली आहे. शिवसेना आणि आम्ही सोबत आहोत,शिवाय हा जर तरचा विषय आहे. *ऑन शंभूराजे देसाई* साताऱ्यात निधी देण्याचा अधिकार हा शंभूराजे यांनाच आहे.त्यामुळे ते निधीवरून बिलकुल नाराज नाही. आम्ही महायुती म्हणून शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस आणि आणखी छोटेछोटे पक्षही आमच्या सोबत राहतील. *ऑन विधान परिषद गृहपाठ* मिरीटचा विद्यार्थी कधीही पुस्तकं बाजूला ठेवत नाही,मिरीटचा विद्यार्थी हा नेहमी पुस्तकं घेऊनच अभ्यास करत असतो. या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही,मग ती राजकीय शाळा असो किंवा आणखी कोणतीही असो.. *ऑन अभिजित दिपके मारहाण* आम्ही या गोष्टीची समर्थन करणार नाही,का झाले याच्या खोलात मी जाणार नाही.आपण सर्वांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. *ऑन शिवसेना निधी* जो निधी आम्हाला साताऱ्यात शिवसेनेकडून मिळाला त्याच्या दहापट निधी आम्ही सोलापुरात शिवसेनेला दिलेला आहे. त्याताली शिवसेनेतील एखाद्या नेत्याला अपेक्षित असणारे काम झालेलं नसेल तर ते भविष्यात आम्ही करू *ऑन रोहित पवार आंदोलन* हे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होत की प्रसिद्धीसाठी याच उत्तर शोधलं पाहिजे.. बाईट - जयकुमार गोरे (पालकमंत्री)
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर महापालिका में कांग्रेस गुटों के बीच गटनेता चयन को लेकर विवाद बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर (चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस वाद) - चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच वाढला आहेय... धानोकर गटाकडून वेगळ्या गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश अडुर यांच्या विरोधात १६ नगरसेवक एकवटले आहे. त्यांनी धानोरकर यांचकडून वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केल्याची सूत्रांची माहिती आहे... त्यामुळे गटनेता बदलासाठी आज विभागीय आयुक्तांची भेट घघेत आहे. महानगरपालिका सत्ता स्थापन करतानाही गटनेता धानोरकर किंवा वडेट्टीवार गटाचा होणार यासाठी चांगलाच वाद तापला होता... त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आणि मध्यस्थी करून वाद मिटवला होता...मात्र आता हा वाद पुन्हा उफाळला आहे.. २७ पैकी १६ नगरसेवकांचा अडूर यांच्याविरोधात दावा चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर-वडेट्टीवार गटांतील संघर्ष पुन्हा उफाळला बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग
0
0
Report

उद्धव ठाकरे की शिवसेना ने किसानों के पूर्ण कर्जमुक्ति के लिए ट्रैक्टर मोर्चा निकाला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि ऑनलाईन खतांची पद्धत बंद करण्यासाठी ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला.. क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध केला संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळेस या आंदोलकांनी दिला,  विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तूर्तास आंदोलनाची सांगता झाली आहे मात्र सरकारने गांभीर्याने घ्यावा सरकार शेतकऱ्यांसाठी गंभीर नाही असा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला आणि संपूर्ण कर्जमुक्ती शिवाय सरकारची सुटका नाही असा इशाराही यावेळी दिला...
0
0
Report
Advertisement

मानसून देरी के बावजूद किसान खरीप तैयारी में जुटे, लागत बढ़ी चिंता

Shirdi, Maharashtra:मान्सूनला उशीर होत असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. एल निनोमुळे पावसाबाबत अनिश्चितता कायम असताना शेतकरी बियाणे, खते आणि शेती साहित्य खरेदीत व्यस्त आहेत. जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. मात्र युरियासाठी शेतकऱ्यांना रांगांमध्ये उभे राहावे लागत असून खतांसह शेती साहित्याचे दरही वाढले आहेत. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला योग्य दर कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. पावसाची प्रतीक्षा सुरू असली तरी शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेत मशागत, बियाणे आणि खत खरेदीसाठी सध्या लगबग वाढली आहे. जिल्ह्यात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. मात्र युरियासाठी खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खत, बियाणे आणि औषधांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. आता वेळेत आणि चांगला पाऊस पडून खरीप हंगाम यशस्वी होण्याचीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला देखील योग्य दर द्यावेत अशी मागणी राहता तालुक्यातील शेतकरी करत आहेत...
0
0
Report

चारित्र्य के शक पर नेरुल में पति ने पत्नी और सासू की हत्या

Navi Mumbai, Maharashtra:चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची आणि सासूची चाकूने वार करून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नेरुळ मध्ये घडलीय. आरोपी आयुषला आपल्या पत्नीच्या चरित्र्यावर संशय होता. त्यात सासू आणि बायको मिळून त्याला बिनकामाचा म्हणून टोमणे मारत होते. सासूच्या घरीच राहत असलेल्या आयुषचे घरात भांडण झाल्याने त्याला घरातून बाहेर काढले होते. मात्र 3 दिवसापूर्वीच पुन्हा घरी परतलेल्या आयुषने धारदार चाकू घेतला आणि रात्री सासू मालन गोसावी आणि पत्नी अपर्णा गोसावी यांच्यावर चाकूने सपासप 20 ते 25 वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपी आयुषला नेरुळ पोलीसांनी त्याच्या घरातूनच अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top