व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.
यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.