445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अम्मा की पढ़ाई कार्यक्रम: 693 विद्यार्थ्यांचा गौरव, मार्गदर्शनाचे संदेश
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर: 'अम्मा की पढ़ाई' उपक्रमाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन चंद्रपरात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात 10 वी आणि 12 वी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते यजुर्वेद महाजन यांची उपस्थिती होती. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश मिळवण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. त्यासाठी जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करून ज्ञान मिळवा, वेळेचे व्यवस्थापन शिका आणि अपयशाला घाबरू नका. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता आहे. असेही ते म्हणाले। आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
भंडारा मोहाडी तहसील में युवक कांग्रेस का बड़ा मोर्चा, मांगों पर निर्णय की मांग
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयावर आज तुमसर-मोहाडी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रफुलजी बिसने व भूपेंद्रजी साठवने यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात युवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करणे, ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, रिक्त शासकीय पदभरती, ग्रामीण सुविधा सुधारणा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला.0
0
Report
सोलापुर बार्शी रोड पर पति ने पत्नी की हत्या; आरोपी ने थाने में हाजिरी दी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग बार्शीत भररस्त्यात पतीने केला पत्नीचा निर्घृण खून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर शहराजवळील बार्शी परांडा रोडवर भररस्त्यात पतीने केला पत्नीचा निर्घृण खून खून करताना पत्नीवर 50 वार केल्याची माहिती चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची प्राथमिक माहिती ऋषिकेश पाटील खून करणाऱ्या पतीचे नाव तर धनश्री पाटील असे मृत पत्नीचे नाव घटनेनंतर आरोपीने स्वतःहून बार्शी शहर पोलीस ठाण्यात लावली हजेरी0
0
Report
Advertisement
कोकण की अर्थव्यवस्था सिर्फ आम और काजू नहीं, प्रमोद जठार के बयान से नया विवाद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात केवळ आंबा,काजू आणि पर्यटनावर अर्थव्यवस्था मर्यादित.....त्या भागांवर फक्त एक कुटुंब विकसित होईल कोकण नाही. अणुऊर्जा प्रकल्पावरून प्रमोद जठार यांच्या विधानामुळे वादाची शक्यता. कोकणातील आंबा काजू आता बदलत्या हवामानामुळे धोक्यात निसर्गावर अवलंबून उद्योगावर अवलंबून राहिलो तर आपण अडचणीत येऊ....भाजपच्या विधान परिषदेचे आमदार यांचे विधान. अणुऊर्जा प्रकल्प व्हायला पाहिजे असेल तर समुद्र लागतो आणि समुद्र म्हटलं की कोकण..... अणुऊर्जा प्रकल्पावरून भाजपाचे आमचे आमदार प्रमोद जठार यांचे सूचक विधान मुख्यमंत्री आम्हाला सांगून प्रकल्प करत नाही....जठार प्रकल्पबाबत आम्ही सार्वजण बसून निर्णय घेऊ.... जठार आंबा-काजूवर कोकण चालणार नाही; प्रमोद जठारांच्या विधानाने नवा वाद पेटणार? उद्धव ठाकरे मला उमेदवारी देणार होते; प्रमोद जठारांचे दावे आणि विकासावरून नवा वाद कोकणातील अर्थव्यवस्थेबाबत भाजप आमदार प्रमोद जठार यांचे चिपळुणातील पत्रकार परिषदेत मोठे विधान केवळ आंबा, काजू आणि पर्यटनावर कोकणची अर्थव्यवस्था मर्यादित राहू शकत नाही: जठार या व्यवसायातून एखादं कुटुंब विकसित होईल, संपूर्ण कोकण नाही: जठार बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादन धोक्यात येत असल्याचा दावा निसर्गावर अवलंबून उद्योगांवर राहिलो, तर आपण अडचणीत येऊ: जठार अणुऊर्जा प्रकल्पावरही प्रमोद जठारांचे सूचक विधान0
0
Report
सांगोल तालुक के जुनोनी गांव के पास भक्तों की गाड़ी दुर्घटना, दो श्रद्धालुओं की मौत
Pandharpur, Maharashtra:अधिक मास निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या गाडीला सांगोला तालुक्यातील जुनोनी गावा जवळ भीषण अपघात झाला. यात दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे सर्व भाविक सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॅरिकेटीवर जाऊन आदळली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.0
0
Report
विरार पश्चिम में नाबालिग पर मारपीट वीडियो वायरल; आरोपी फरार, पुलिस ने मामला दर्ज किया
Vasai-Virar, Maharashtra:विरार पश्चिम येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये अल्पवयीन मुलाला कॉलर पकडून कानशिलात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, संबंधित आरोपीविरोधात बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील एका सोसायटीमध्ये मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मारहाण करणारी व्यक्ती ही संबंधित मुलाच्या वडिलांची मित्र असल्याचे समोर आले असून, जुन्या रागातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती अल्पवयीन मुलाला पकडून मारहाण करताना दिसत आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सोसायटी परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून, ही घटना अंतर्गत वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली0
0
Report
Advertisement
रामदास पेठ पुलिस ने चोरी मामले में काम कराने वाली महिला गिरफ्तार, 5 लाख बरामद
Akola, Maharashtra:अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेने केलेल्या चोरीचा अवघ्या काही तासांत छडा लावत मोठी कारवाई केली आहे.या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून चोरीतील पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. घरात काम करणाऱ्या महिलेने घरातील तब्बल ७ लाख ६७ हजार ४९० रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली. पुढील तपास रामदास पेठ पोलिस करत आहेत.0
0
Report
रत्नागिरीके पूर्णगड में अंबानी के अणु ऊर्जा प्रकल्प के खिलाफ ग्रामीणों का जोरदार विरोध
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे प्रस्तावित असलेल्या अंबानी यांच्या अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. कोकणात कोणताही विनाशकारी प्रकल्प नको या भूमिकेवर ठाम राहत पूर्णगड, मेर्वी, पावस, गावखडी आणि मावळंगे परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारवर स्थानिकांवर प्रकल्प लादल्याचा आरोप करण्यात आला असून, या विरोधात लवकरच एक सर्वपक्षीय 'संघर्ष समिती' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक सरपंच आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे आता प्रकल्पाविरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान,या वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आता काय भूमिका घेतात,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.0
0
Report
नASHik के मालेगाव तालुक़े में तेज आंधी, गारपीट और बारिश से फसलों को नुकसान
Nashik, Maharashtra:नाशिक के मालेगाव तालुक़े में तेज आंधी, गारपीट और बारिश से फसलों को नुकसान0
0
Report
Advertisement
आंबे में विषबाधा: सात परिवार अस्पताल पहुँचा, कैलक्शियम कार्बाइड के इस्तेमाल का शक
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के शेवगाव में आंबे से एक ही परिवार के सात जण विषबाधित हो गए. सातों को समय रहते उपचार मिल गया और उनकी हालत अब ठीक है. बाजार से लाये गए आंबे के रस को पीने के कारण परिवार के सदस्य अचानक चक्कर आने लगे. यह घटना पिछले हफ्ते की है. अभिजीत जायभाय और परिवार के अन्य सदस्य शहर के हॉस्पिटल में प्राथमिक उपचार के बाद अहिल्यानगर स्थित साई एशियन हॉस्पिटल में उपचार के लिए भेजे गए. डॉक्टर सचिन पांडुले ने बताया कि जल्दी पिक करने और स्टोर करने के लिए व्यवसायिक रसायनों के प्रयोग से फलों में विषाक्तता के लक्षण दिखते हैं; आजकल बाजार में मिलने वाले फलों में ऐसी रसायनों की अधिक संभावना रहती है. लोगों को किन फलों को कैसे खरीदा जाए, इस पर सतर्क रहने की जरूरत है.0
0
Report
लातूर के ट्यूशन एरिया पर प्रशासन की कार्रवाई, क्लासेस और हॉस्टेल बंद
Latur, Maharashtra:AC :- नीट पेपरफुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या लातूरच्या तथाकथित ‘ट्युशन एरिया’वर आता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्राने औद्योगिक वापरासाठी मंजूर गाळ्यांमध्ये सुरू असलेले क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयांनंतर क्लास चालक, हॉस्टेल व्यावसायिक, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तर आता या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे...पाहूयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट... VO 01 :- लातूरचा ‘शिक्षण पॅटर्न’ राज्यभर चर्चेत राहिला आहे. शिक्षणासाठी राज्यातील विविध भागांतून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये दाखल होतात. मात्र आता याच ट्युशन एरियावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. औद्योगिक वापरासाठी मंजूर जागांमध्ये सुरू असलेले क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात एका तक्रारदाराने प्रशासनाकडे सातत्याने पाठपूरावा केल्यानंतर प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. बाईट :- मल्लिकार्जुन भाईकट्टी (तक्रारदार) VO 02 :- प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आता क्लासेस चालक, हॉस्टेल व्यावसायिक, खानावळ चालक आणि छोटे व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत. क्लासेस एरियामधील व्यावसायिकांनी प्रशासनाच्या नोटिसीची होळी करत निषेध आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. या निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. आधीच नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि मानसिक तणावाचं वातावरण आहे. त्यात आता क्लासेस, हॉस्टेल आणि अभ्यासिकांवर कारवाई झाली तर विद्यार्थ्यांनी राहायचं कुठे, अभ्यास करायचा कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तो ट्युशन एरिया शहराबाहेर गेल्यास मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होईल, अशी चिंता पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बाईट :- महिला पालक बाईट :- व्यवसायिक बाईट :- वस्तीगृह चालक बाईट :- विद्यार्थी बाईट :- अभय साळुंखे (काँग्रेस जिल्हाध्यक्ष) VO 03 END :- एकीकडे औद्योगिक जागांचा मूळ उद्देश कायम ठेवण्यासाठी प्रशासन कारवाई करत आहे. तर दुसरीकडे या निर्णयाचा परिणाम विद्यार्थी, क्लासेस आणि छोट्या व्यावसायिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रशासन पुढे काय भूमिका घेणार, आंदोलनाची दिशा काय असणार आणि या प्रश्नावर नेमका तोडगा काय निघणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS | लातूर0
0
Report
पंढरपूर भाळवणी में दो करोड़ की फर्जीवाड़ा: महिलाएं-पुरुष धोखे के शिकार
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शंभर ते दीडशे महिला आणि पुरुषांची जवळपास अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. काही महिन्यात दाम दुपट रक्कम करून देण्याच्या आमिषाला हे लोक बळी पडले त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी परिसरातील मोलमजूरी करणाऱ्या तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचा विश्वास संपादन करून राजू निराळे नावाच्या व्यक्तीने त्यांना तुमची गुंतवलेली रक्कम दाम दुपट करून देतो अवघ्या काही महिन्यांमध्ये तुम्हालाही रक्कम मिळेल असं अमित दाखवलं त्यांना विश्वास पटावा म्हणून कोरे चेक तसेच स्टॅम्प पेपर सुद्धा बनवून दिले यामुळे या महिला आणि पुरुषांनी यामध्ये आपले पैसे गुंतवले मात्र बराच कालावधी लोटला तरी आपले पैसे मिळेना हे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांना समजलं आज या फसवणूक झालेल्या महिला आणि पुरुषांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
सीबीआई ने पेपरफुटी मामले में लातूर के शिवराज मोटेगावकर को गिरफ्तार किया
Latur, Maharashtra:सीबीआई ने लातूर के शिवराज मोटेगावकर को नीट पेपरफुटी मामले में गिरफ्तार किया है। इसके बाद मोटेगावकर का एक पुराना वीडियो अब सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। पेपरफुटी के विरोध में कठोर कार्रवाई की मांग करने वाला मोटेगावकर अब खुद नीट पेपरफुटी प्रकरण में गिरफ्त में हैं, जिसके चलते नई चर्चाएं शुरू हो गई हैं।\n\nमहाराष्ट्र के नीट 2026 पेपरफुटी प्रकरण में सीबीआई ने कारवाई कर लातूर के शिवराज मोटेगावकर को गिरफ्तार किया है। इस कारवाई के बाद राज्य के शिक्षा क्षेत्र में बड़ी चर्चा शुरू हो गई है। इस बीच मोटेगावकर का पुराना इंटरव्यू फिर से सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। "लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपौन कोरडे पाषाण" जैसे कहावत के अनुसार पेपरफुटी करने वालों को "मृत्युदंड या आजन्म कारावास" की सजा होनी चाहिए, ऐसी मांग करने वाला मोटेगावकर अब खुद नीट पेपरफुटी प्रकरण में गिरफ्तार है। इस वीडियो में वह कह रहे हैं कि "शिक्षण जैसे पवित्र क्षेत्र में गैरप्रकार करने वालों को मृत्युदंड या आजन्म कारावास सजा होनी चाहिए" साथ ही "वन नेशन, वन एक्झाम... फिर वन नेशन, वन पेपरफुटी चालणार का?"\n\nवायरल बाइट :- शिवराज मोटेगावकर\n\nअंबादास दानवे ने मोटेगावकर के पुराने वायरल वीडियो पर टिप्पणी की है और कार्रवाई की मांग की है।\n\nजुनी भूमिका... सध्याची परिस्थिती... और फिर वायरल हुआ वीडियो... इस पूरे प्रकरण की चर्चा अब बढ़ रही है। एक समय पेपरफुटी के खिलाफ कठोर भूमिका लेने वाले शिवराज Motegavakar के पुराने वीडियो अब फिर चर्चा में है। लोकसंवेग ...0
0
Report
नीट पेपरफुटी: लातूर में डॉक्टरों की गिरफ्तारी, CBI जांच का नया मोड़
Latur, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात नवा धक्कादायक ट्विस्ट... पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नीट परीक्षेशी संबंधित काही कागदपत्रे आणि निट चा पेपर लातूर मधील सीबीआयच्या रडारवर असलेल्या दोन डॉक्टरांनी रद्दीमध्ये शिकल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता तपासाची दिशा बदलली असून, रद्दी खरेदी-विक्री करणाऱ्यांची देखील आता CBI चौकशी करणार आहे त्यामुळे रद्दी विकणारे ही आता सीबीआयच्या रडारवर आलेत. पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट नीट' पेपरफुटी प्रकरणात सुरवातीला प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने ताब्यात घेतले. त्यानंतर या कुलकर्णी पाठोपाठ लातूर मधील बड्या खासगी क्लासेस चालक शिवराज मोटेगावकर यालाही अटक झाली. यानंतर CBI चौकशीत लातुरातील एका बालरोगतज्ज्ञांचे नाव समोर आले.आता लातुरातील इतर तिघा डॉक्टरांची नावेही उघड झाली. आतापर्यंत चार डॉक्टरांची सीबीआयने कसून चौकशी केली. त्यांच्याकडे असलेली संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेले साहित्य पुण्याला पाठविले. पुण्यातील तपासामध्ये हाती येणाऱ्या धोग्यादोऱ्यांवरच आता लातुरातील तपासची चक्रे फिरू लागली आहेत सीबीआयच्या चौकशीत दोन डॉक्टराची चौकशी करून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये सीबीआयला नीट परीक्षेशी संबंधित काही कागदपत्रांच्या व्यवहाराचा तपास समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्या डॉक्टरांनी निटचा पेपर आणि त्याची नोट्स विकत घेतले ते पेपर झाल्यानंतर नीट घोटाळ्याची माहिती समोर आल्यानंतर ते सर्वच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रद्दीमध्ये विकण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. संबंधित डॉक्टरांच्या दवाखान्यात सीबीआयचे पथक चौकशीसाठी पोहोचल्यानंतर या संदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणातील पुरावे, कागदपत्रे आणि संबंधित व्यवहारांची सखोल पडताळणी तपास यंत्रणांकडून सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता पुराव्यांच्या साखळीचा शोध घेण्यावर सीबीआयचा भर असल्याचे दिसत आहे. रद्दीमध्ये विकण्यात आलेली कागदपत्रे नेमकी कोणती होती, ती कुठून आली आणि या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, याचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. लातूर शहरातील रद्दी खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक व्यक्तींची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पुण्यातील तपासातून समोर येणारे धागेदोरे आणि लातूरमधील चौकशी यांची सांगड घालतात आता सीबीआय संपूर्ण नीट पेपर फुटीचे जाळे उलगडण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे....0
0
Report
बदलापूर की जांभळे महंगाई की चपेट में, कीमत पाव किलो 100 रुपये
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या जांभळांना महागाईची झळ पावकिलो जांभळांना 100 रूपयांचा भाव जांभळांच्या विक्रीसाठी आदिवासी महिलांची तगमग बदलापूरच्या जांभळाला अधिकृतपणे भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळालाय. मात्र महागाईमुळे यंदा जांभळप्रेमींना खिशाला चाट द्यावी लागत आहे. बदलापूरच्या आसपास अनेक छोटी-मोठी गावं असून याठिकाणी हलवा, काला खट्टा, गिरवी ही जांभळं विशेष लोकप्रिय आहेत. या जांभळांना बाजारात मोठी मागणी असते. उन्हाळ्यात आदिवासी बांधव जांभळा आणि करवंद हा रानमेवा गोळा करून त्याची बाजारात विक्री करत असतात. दिवसभरातल्या विक्रीतून संध्याकाळी त्यांच्या घरची चूल पेटते. युद्धामुळे पेट्रेल-डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका सर्वच गोष्टींना बसलाय. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. वाहतूक खर्चही वाढल्याने महागाईची झळ बदलापूरच्या जांभळांनाही बसलीय. किरकोळ बाजारात जांभळांचा दर 400 रूपये किलो इतका झालाय. जांभळांची एक पाटी अडीच ते तीन हजार किलोंना असल्यामुळे स्वस्त दरात जांभळविक्री परवडत नसल्याचं आदिवासी महिलांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी याच जांभळांचा दर 50 रूपये पाव इतका होता. यंदा मात्र जांभळप्रेमींना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. अर्थात जांभळ खरेदी करताना ग्राहक मोलभाव करत असले तरी हे फळ वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे बदलापूरच्या जांभळांना ग्राहक पसंती देत असल्याचं पाहायला मिळतंय.0
0
Report
Advertisement
