445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में शिक्षक के आक्षेपार्ह भाषे पर शिवराज मोटेगावकर फिर चर्चा में
Latur, Maharashtra:शिवराज मोटेगावकर चा कथित आक्षेपार्ह भाषेत व्हिडीओ समोर... विद्यार्थ्याना शिकवत असताना अश्लील भाषेचा वापर... व्हिडिओ व्हायरल... लातूरमध्ये मोटेगावकर पुन्हा चर्चेत... AC::- नीट पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या शिवराज मोटेगावकर याच्याबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा कथित व्हिडिओ आता समोर आला आहे. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसमोर शिकवताना आक्षेपार्ह भाषा वापरलयाचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे संताप व्यक्त केला जात असून, शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांची जबाबदारी यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
संभाजीनगर में धूलभरी आँधी से शहर हाहाकर, तेज हवाओं ने लोगों को भयभीत किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. शनिवारी शहरवासीयांना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचा सामना करावा लागला. ऐन दुपारी ४ ते ५ या तासाभराच्या कालावधीत शहर परिसरात सरासरी ३९ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. या वादळी वाऱ्यामुळे शहराच्या अनेक भागांत धुळीचे लोट उसळले. प्रामुख्याने बीड बायपास, सातारा आणि देवळाई परिसरात या वादळाची तीव्रता अधिक जाणवली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शहर परिसरात वाऱ्याचा सर्वोच्च वेग ताशी ६१.२ किलोमीटर इतका नोंदवला गेला. दुपारी ४ ते ५ या वेळेत आलेल्या या वादळामुळे क्रांती चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक आणि कोकणवाडी या भागांतील मोठमोठे बॅनर्स फाटले. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील धूळ आणि पालापाचोळा हवेत उडत राहिला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत या धुळीच्या वादळाने भर घातल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली, आज ही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, पावसाचा अंदाज ही व्यक्त केला आहे.0
0
Report
वाशिम में बड़ा धक्का: शिवसेना नेता सुरेश मापारी भाजपा में प्रवेश, राजनीति गर्म
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला वाशिम मध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.त्यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.सुरेश मापारी हे माजी जिल्हा परिषद सदस्य,अर्थ व बांधकाम सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत.ग्रामीण भागात त्यांचे मजबूत कार्यकर्ते जाळे असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सुरेश मापारी हे सुमारे २०० ते २५० पदाधिकारी,सरपंच आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले.तब्बल २९ वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सकाळी ९ वाजता त्यांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.यापूर्वी सुरेश मापारी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या,मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी सहित कोकण में मानसूनपूर्व बारिश से गर्मी राहत, किसानों में खुशी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी 코कणात मान्सूनपूर्व सरींची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणसह कोकणात अनेक ठिकाणी आज पहाटेचपासूनच मान्सूनपूर्व सरीं कोसळल्या आहेत.. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.. आगामी काळात अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना वेग येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..0
0
Report
ईंधन संकट के बावजूद व्यापारी भाड़ा बढ़ाने के आरोप, सरकार करे कड़ी कार्रवाई
Ahilyanagar, Maharashtra:राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे याचाच गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक भाडेवाढीच्या नावाखाली वस्तूंचे दर वाढवत आहेत पेट्रोल डिझेलची टंचाई असली तरी कुठलीही भाडेवाढ झाली नसल्याचं अहिल्यानगर येथील ट्रान्सपोर्टेशन महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आला है अहिल्यानगर जिल्ह्यातून देशाच्या सर्व भागांमध्ये भाजीपाला साठवला जातो सर्वत्र जाणारा माल हा पूर्वीच्याच भाड्यामध्ये पाठवला जातो कोणतीही भाडे वाढ मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी केलेली नाही त्यामुळे साठेबाजी करणारे व्यावसायिक भाडेवाढ झाली असं सांगून महागाई वाढवू शकतातGovernmentने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी ट्रान्सपोर्टेशन महासंघाने केला आहे0
0
Report
वाशिम में चिया सिड्स के दाम 19,600 से गिरकर 19,000 रुपए, किसान निराश
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड झालेल्या चिया सिड्सच्या दरात घसरण होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. काल वाशिम बाजार समितीत चियाला १९ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्यानंतर बाजारात आवक वाढली. परिणामी, दरात ६०० रुपयांची घसरण होऊन भाव १९ हजार रुपयांवर आले.दर घसरल्याने चिया उत्पादक शेतकरी काहीसे निराश झाले आहेत.0
0
Report
Advertisement
परभणी मानवत में पेट्रोल पंप पर दो गुट भिड़े, वीडियो वायरल; तीन पर मामला दर्ज
Parbhani, Maharashtra:परभणीच्या मानवत तालुक्यातील कैलास पेट्रोल पंप वर दोन गटात राडा. पंपावर इंधन भरतांना युवकांचा एका व्यक्तीला धक्का लागल्याच्या कारणावरून झाला राडा. प्लास्टिक कॅन आणि लाकडी दांड्याने एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर तीन जणांविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..0
0
Report
पवना डैम का जल स्तर केवल 28.93% तक सिकुड़ा, नागरिकों से पानी की बचत का आह्वान
Varsoli, Maharashtra:Headline : पवना धरणात केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन Anchor: मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरण पाणलोट क्षेत्रात 28.93 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असून उष्णतेच्या झळा बसू लागल्यात त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन पाणी पातळी कमी होऊ लागलीये. सध्या धरणातील पाणीसाठा हा जून महिन्यापर्यँत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्याने काढला आहे. तरी वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाई ला सामोरे जावं लागेल त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पवना पाटबंधारे खात्याने पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.0
0
Report
मावळ के तळेगाव दाभाडे मंदिर से चांदी का मुकुट चोरी, सीसीटीवी में कैद संदिग्ध
Varsoli, Maharashtra:Anchor: मावळातील तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. देवीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक अज्ञात व्यक्ती दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात दाखल झाला. सुरुवातीला त्या व्यक्तीने अत्यंत शांतपणे देवीचे दर्शन घेतले. हातात नारळ घेऊन देवीला कुंकूही वाहिलं. त्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यालाही त्याच्यावर कोणताही संशय झाला नाही. मात्र काही क्षणातच आरोपीने संधी साधली. पुजाऱ्याचं लक्ष दुसरीकडे जाताच आरोपीने देवीचा सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट रुमालात लपवला आणि मंदिरातून पळ काढला. दरम्यान, ही घटना लक्षात येताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. मास्क आणि टोपी घालून आलेल्या या अज्ञात चोरट्याचा शोध घेणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे..0
0
Report
Advertisement
वाशीम: डीज़ेल टैंकर पलटा, चालक फँसा; 45 मिनट बाद क्रेन से रेस्क्यू
Washim, Maharashtra:वाशीम: डिझेल घेऊन जाणारा टँकर कारंजा-मूर्तीझापूर रोडवरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. अपघातात चालक केबिनखाली अडकला होता. डिझेल गळतीमुळे आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. कारंजा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने 45 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर चालकाची सुटका केली. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
गोंडिया: वृद्ध माता-पिता को घर से बाहर निकालने वाले बेटे को 15 दिन में आदेश
Bhandara, Maharashtra:आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला जिल्हाधिकारीांचा दणका... 15 दिवसांत घर खाली करण्याचे मुलाला आदेश.... ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार .... या निर्णयामुळे वृद्ध नागरिकांना दिलासा.... वृद्ध आई-वडिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात गोंदियाच्या जिल्हाधिकारीांनी कठोर निर्णय दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या निर्णयात संबंधित मुलाला 15 दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया शहरातील गौतमनगर परिसरातील ही घटना असून या निर्णयाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. गोंदिया शहरातील गौतमनगर बाजपेयी वॉर्ड येथे राहणारे हरिराम धाडू मंदारकर वय 86 आणि कौशल्या हरिराम मंदारकर वय 79 हे वृद्ध दाम्पत्य स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होते. संबंधित घर हे कौशल्या मंदारकर यांच्या नावावर असून वृद्धापकाळात शांततेने आयुष्य जगण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांचाच मुलगा दिनेश मंदारकर हा मालमत्तेच्या कारणावरून सतत आई-वडिलांशी वाद घालत होता. शिवीगाळ, धमक्या आणि सततच्या भांडणामुळे वृद्ध दाम्पत्याचे जीवन असह्य झाले होते. इतकेच नव्हे तर मोठ्या भावासोबत झालेल्या वादानंतर संतापाच्या भरात दिनेश मंदारकर याने आई-वडिलांना घराबाहेर काढत त्यांच्या वस्तूही घराबाहेर फेकून दिल्या. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. या घटनेनंतर हरिराम मंदारकर यांनी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. सुनावणीदरम्यान घर हे वृद्ध दाम्पत्याच्या स्वमालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत संबंधित मुलाला 15 दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरात सन्मानाने आणि सुरक्षितपणे राहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाविरोधात प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
अकोला के खदान पुलिस ने दुचाकी चोरी के चोर को गिरफ्तार किया; सात गाड़ियाँ जब्त
Akola, Maharashtra:दुचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अकोल्यातील खदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या सात गाड्या जप्त केल्या आहेत,या चोरट्याकडून एकूण चार लाख पाच हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे..या चोरट्याने अकोल्यातील विविध भागात वाहने चोरीचा सपाटा लावला होता.. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपास करित अखेर या चोरट्याला बेड्या ठोकल्या असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.. सोहेल कुरेशी असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे..0
0
Report
Advertisement
हिंगोली के भोगाव-धानोरा में अनियमित बारिश से केला बाग बर्बाद, किसान भारी नुकसान
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.. वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे शेतकरी मुंजाजी गव्हाणे यांच्या दोन एकर शेतीमधील केळीची बाग संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीची झाडे आडवी झाल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हातात तोंडाशी आलेली केळीची बाग डोळ्यासमोर उध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे..0
0
Report
अवैध सावकारी के खिलाफ छापेमारी: 10 ठिकानों पर कार्रवाई, 100 अधिकारी शामिल
Akola, Maharashtra:अकोला शहरासह विविध 10 ठिकाणी अवैध सावकारी प्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालय तर्फे कारवाई करण्यात आली है.. प्राप्त तक्रारीवरून शंभर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही संयुक्तिक कारवाई केली आहे.. या प्रकरणी आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आले असून चौकशी नंतर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.. सावकारांन विरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अन्वये धाड कार्यवाही करण्यात आली असून सदर कार्यवाही करतेकामी एकूण तीन पथकाची नेमणीक करण्यात आली होती...या धाड कार्यवाहीमध्ये मोठ्याप्रमाणात आक्षेपार्ह दस्तऐवज कोरे धनादेश, नोंदवही, खरेदीखत, स्थावर सौदा चिठ्ठी लेख, खरेदीच्या छायाप्रती, कोरे स्टॅम्पपेपर, भाडेकरारनामा, बँक पासबुक इत्यांदी जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येत आहेय..0
0
Report
यवतमाळ विधान परिषद चुनाव: महायुती के दावों के बीच शिवसेना ने एकतर्फी जीत का दावा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती कडून उमेदवारीसाठी भाजप आणि शिवसेनेने दावेदारी केली असल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि सेनेची मतदार संख्या देखील बरोबरीची आहे, त्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार ही निवडणूक महायुतीतून लढेल आणि एकतर्फी विजय होईल असा दावा शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पराग पिंगळे यांनी केला आहे. शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे आठ ते नऊ इच्छुकांनी उमेदवारी देखील मागितली असून निर्णय हे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेतील असे त्यांनी सांगितले. तर 2019 मध्ये झालेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडी मधून निवडणूक लढली होती, शिवसेना उमेदवाराविरोधात भाजपाने उमेदवार दिला होता. सध्या भाजपाची मतदार संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा उमेदवारीसाठी आग्रह असून पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी केली असल्याचे जिल्हाप्रमुख प्रफुल चौहान यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही महिन्यात भाजप सेनेतील सुरू असलेला संघर्ष पुन्हा उफाळतो का याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
