icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

करंजी घाट के किसान दो महीनों से बारिश नहीं मिलने से संकट का सामना

Ahilyanagar, Maharashtra:पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत तरी राज्यातील अनेक भागांमध्ये म्हणावा असा पावस झालेला नाही अहिल्यानगरच्या करंजी घाट परिसरातील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत या परिसरात सुरुवातीपासून अत्यंत कमी पाऊस झाला थोड्या पावसावर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केली मात्र चांगला पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे पीक जगवण्याचं मोठं आव्हान उभा राहिला आहे करंजी घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत या फळबागांना उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात शेततळे देखील तयार करण्यात आली आहेत मात्र चांगला पाऊस पाऊस नसल्याने शेततळ्यांनी देखील तळ गाठला आहे परिसरातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत
0
0
Report
Advertisement

राम मंदिर चोरी के आरोप पर भास्कर जाधव का हमला; राज्य में हलचल

Ratnagiri, Maharashtra:गुहागर -रत्नागिरी.. रामाच्या नावावर सत्तेत आले अन् मंदिरातच चोरी केली!; गृहमंत्री अहंकारी; आमदार भास्कर जाधवांचा घणाघात.. गुहागरच्या रामपूर गुडे फाटा येथील राम मंदिरात रामरक्षा आंदोलनाच्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.. प्रभू रामचंद्राच्या नावाने जे सत्तेवर आले, त्यांनीच राम मंदिरात चोरी केली,असा थेट आणि गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.. एवढ्यावरच न थांबता, प्रभू रामचंद्र अशा लोकांचा नक्कीच निपटारा केल्याशिवाय राहणार नाहीत,असा टोलाही त्यांनी लगावला.. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी गृहमंत्र्यांवरही थेट निशाणा साधला.. राज्याचे गृहमंत्री अत्यंत अहंकारी झाले आहेत,अशी घणाघाती टीका त्यांनी केली.. गुहागरच्या रामपूर गुडे फाटा येथील राम मंदिरात रामरक्षा आंदोलनाच्या सभेत बोलताना भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में 30.29 लाख का गुटखा जप्त; तीन भाइयों के खिलाफ मोकोका मामला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या मोतीकारंजा, नवाबपुरा भागात गुटखा तस्करांच्या अड्ड्यांवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईत ३०.२९ लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी तीन भावांसह पुरवठादार, कंपन्यांविरुद्ध दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपिंविरुध्द 'मोकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्याची विनंती अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांना केली आहे. पथकाने मोतीकारंजात आरोपींच्या घरावर छापा मारला, तेव्हा तेथे रजनीगंधा, गोवा, बाजीराव, विमल, पानपराग, राजनिवास, डायरेक्टर, व्ही-१ मस्तानी सुगंधी तंबाखू या बॅण्डचा १४ लाख २ हजार ४०५ रुपयांचा साठा आढळून आला. या पथकाने तो साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या 3 छापेमारीचा कानोसा लागताच सय्यद वाजेद, सय्यद माजेद व सय्यद साजेद हे तिन्ही भाऊ फरार झाले. क्रांती चौक व जिन्सी पोलिसांनी या तीन गुटखा तस्करासह पुरवठादार, तसेच उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले
0
0
Report

श्रावण मास में घृष्णेश्वर मंदिर: सभामंडप में अभिषेक, भक्तों को दर्शन संभव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ च्या 12 वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रावणमासात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दि. ३० जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात अभिषेक न करता सभामंडपात अभिषेक करता येणार आहे. अभिषेक संपन्न झाल्यानंतर भाविकांना गाभाऱ्यातील जल, पंचामृत व बेलफूल थेट शिवलिंगावर अर्पण करता येईल व दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे गाभाऱ्यात अभिषेकासाठी होणारी गर्दी होणार नाही. तसेच भाविकांना गाभाऱ्यात प्रत्यक्ष शिवलिंगाचा स्पर्श व दर्शन घेता येईल. गाभाऱ्यात अभिषेक होणार नाही. या व्यवस्थेमुळे श्रावणमासात मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शनाचा लाभ मिळणार असल्याचे श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

स्कूल बस चालक के अचानक चक्कर से 40 विद्यार्थियों की बस दुभाजक पर चढ़ी, दुर्घटना टली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस दुभाजकावर; चालकाला अचानक चक्कर, मोठी दुर्घटना टळली ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव रोडवर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेच्या बसच्या चालकाला अचानक चक्कर आल्याने सुमारे ४० विद्यार्थ्यांनी भरलेली बस पिरॅमिड चौक ओलांडल्यानंतर दुभाजकावर चढली. काळा गणपती मंदिरासमोर अचानक चालकाला  चक्कर आल्याने बसवरील नियंत्रण सुटले. मात्र गाडीतील मावशीने तातडीने परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेत धावत जाऊन बस चा हॅन्ड ब्रेक ओढला,  सुदैवाने बसचा वेग कमी   होता, त्यामुळं बस नियंत्रित होऊन दुभाजकावर जाऊन थांबली आणि संभाव्य भीषण अपघात टळला. घटनेनंतर विद्यार्थी घाबरून गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱ्या चालकाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
0
Report

अमरावती: खाद्यान वितरण ट्रक ने दो-तीन दोपहिया को ठोका, चालक पकड़ा गया

Amravati, Maharashtra:अमरावती में खाद्यान वितरण ट्रक की दो-तीन दोपहिया वाहनों को टक्कर; चालक नागरिकों द्वारा चपत का accused अमरावती शहर के कठोरा नाका क्षेत्र में शाम को MH 40 CM 8150 नंबर के खाद्यान वितरण ट्रक का दुर्घटना हुआ। इस दुर्घटना में ट्रक ने दो-तीन दोपहिया वाहनों को टक्कर मारी—यह शुरुआती जानकारी है। सौभाग्य से इस घटना में किसी भी जीवित हानि की पुष्टि नहीं है। स्थानीय लोगों के अनुसार ट्रक चालक मद्यधुंद अवस्था में था। दुर्घटना के बाद उसने घटनास्थल से भागने का प्रयास किया, जिसे स्थानीय लोगों ने तुरंत ट्रक अड़ाकर पकड़ा। लोगों ने चालक को ट्रक से नीचे उतरने को कहा, लेकिन उसने फिर भागने का प्रयास किया। कुछ समय के लिए घटनास्थल पर तनाव का माहौल बना रहा। स्थानीय लोगों ने चालक को पुलिस के हवाले कर दिया। सूचना मिलते ही गाडगे नगर पुलिस घटनास्थल पर पहुंची और स्थिति नियंत्रण में लाई गई। इस प्रकरण की आगे जांच गाडगे नगर पुलिस कर रही है.
0
0
Report

शिर्डी गुरुपूर्णिमा उत्सव: भक्तों की भीड़, मंदिरों में रोशनी और मिरवणूक

Shirdi, Maharashtra:शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह... साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी... साईबाबांना गुरू स्वरूप माणून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक... आज उत्सावाचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी... साई मंदिराच्या दर्शन रांगा गर्दीने फुल्ल... साई समाधीसह गुरूस्थान मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले... उत्सवानिमित्त साई मंदिर , गुरूस्थान मंदिर , द्वारकामाई आणि चावडी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट... दाक्षिणात्य पद्धतीने केलेली सजावट भाविकांच लक्ष वेधून घेतेय.. आज मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले असणार... साईबाबांची प्रतिमा आणि पादूकांची सुवर्णरथातून निघणार मिरवणूक... गुरूस्थान मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

रायगढ़ पुलिस की साइबर अपराध मुहिम: मौल अकाउंट धारकों पर कड़ी कार्रवाई

Chendhare, Maharashtra:स्‍लग - रायगड पोलिसांची सायबर गुन्ह्यांविरोधात मोहीम संशयित ‘म्यूल अकाउंट’ धारकांवर कारवाई जिल्‍हयात आतापर्यंत 23 गुन्‍हे दाखल सर्व म्यूल अकाउंट धारकांवर कारवाईचे संकेत सायबर फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल अकाउंट’ धारकांविरोधात जिल्हाभर विशेष कारवाई सुरू करण्यात आली असून आता पर्यंत विविध पोलीस ठाण्‍यात 23 गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व संशयित म्यूल अकाउंट धारकांवर कायदेशीर कारवाईचे संकेत पोलीसांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार विविध आमिषे दाखवून नागरिकांकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार্ড आणि इतर आर्थिक साधनांचा गैरवापर करतात. अशा खात्यांमधून फसवणुकीची रक्कम वळवली जात असल्याने नागरिकांनी कोणालाही आपले बँक खाते किंवा संबंधित कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहून संशयास्पद व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0
0
Report

भीमा नदी में 60 हजार क्यूसेक पानी आया, पंढरपूर के लिए सुरक्षा उपायों की शुरूआत

Pandharpur, Maharashtra:उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले साठ हजार क्युसेक पाणी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकएन यांनी भीमा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीची पाहणी केली. पंढरपूरमध्ये अजूनही वारकरी असल्याने भीमा नदी काठावर लाईफ गार्ड बोटी तैनात करण्यात आले आहेत. घाटांना रस्ता बंद करण्यात आलं आहे. कोणत्याही भाविकांनी अंधारामध्ये पाण्यात उतरू नये; पाण्याला वेग असल्याने पाण्यात जाण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन झाले. भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीकाठावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. सध्या साठ हजार क्युसेक पाणी आला आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top