Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक पुलिस ने एमडी ड्रग्स विक्रेताओं के खिलाफ बड़ी कार्रवाई की

SGSagar Gaikwad
Nov 09, 2025 10:58:05
Nashik, Maharashtra
नाशिक पोलिसांची एमडी विरोधात धडक कारवाई नाशिकच्या नाशिक इन हॉटेलमध्ये एमडी ड्रग्स विकणाऱ्या टोळीसह हॉटेल मालकाला केली अटक नाशिक पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार करण्यात आली कारवाई कपिल देशमुख असं अटक केलेल्या हॉटेल मालकाचे नाव तर एमडी ड्रग्स विकणारे तीन जण अटकेत शोएब खान, शेख मुस्तफा ,मोफीज मुजम्मिल, असं अटक केलेल्या संशयतांची नावे 1 लाख 60 हजार रुपयाची 32 ग्राम वजनाची एमडी जप्त 2 लाख 23 हजार 380 रुपयांचा एकूण मुद्देमाल करण्यात आला जप्त उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुढील तपास सुरू
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 09, 2025 12:47:38
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 09, 2025 12:45:15
Dhule, Maharashtra:ANCHOR - अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावचे विद्यार्थी घेऊन देवगोई घाटातून बस परतत असताना अमली बरी जवळ हा भीषण अपघात झाला. अपघाता वेळी बस मध्ये जवळपास 40 विद्यार्थी असल्याची समोर आली आहे. यातील बस खाली दाबून दोघां विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या आश्रम शाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या. जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हालवले असून, दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या घाटामध्ये वारंवार अपघात होत असताना लोकांचा जीव जात असताना, प्रशासनाने सुरक्षेचे उपाय या ठिकाणी केलेले दिसून येत नाहीत. काही दिवसांपूर्वी अस्तंबा यात्रेतून परतणाऱ्या भाविकांचाही अपघात झाला होता. त्यातही अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. विद्यार्थ्यांच्या या अपघातामुळे सर्व पालकांमध्ये आक्रोश दिसून येत आहे व संतापाची लाटही आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 09, 2025 12:05:49
Parbhani, Maharashtra:सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात निकाल दिला आहे, याच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी यामागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू केली आहे, ज्यावेळी आम्ही सेवेत रुजू झालो त्यावेळी असला कुठला ही नियम नव्हता,त्यावेळची सर्व निययम पूर्ण करून आणि सेवेत रुजू झालोत, मग आता असा अन्याय कारक निर्णय आम्हा शिक्षकांवर का लादण्यात येतोय असा सवाल उपस्थित केलाय, 5 राज्यांनी या निर्णया विरोधात पुनरअवलोकन याचिका दाखल केलीय, आपल्या राज्यशासनाने ही आमच्या वतीने अशी पूर्णअवलोकन याचिका दाखल करावी या मागणीसाठी आज शिक्षक एकवटले होते,यावेळी शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तशी सरकारकडे मागणी केली.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 11:53:39
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील ११ नगर परिषद आणि १ नगरपंचायत मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या भाजपच्या उमेदवारीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोहोर उमटणार आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला अकलूज या ठिकाणी इच्छुक प्रत्येक उमेदवाराशी वन टू वन संवाद साधत आहे. निवडून येण्याच्या पात्रतेवर मिळणार भाजपची उमेदवारी दिली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा आग्रह धरलेला आहे. मित्र पक्षासोबत जर युती झाली तर त्या ठिकाणी त्यांना सामावून घेतले जाणार आहे. स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर त्यासाठी तयारी म्हणून आज पासून सांगोला अकलूज या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. प्रत्येक उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी काही दिवसात तयार होणार आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 09, 2025 11:34:09
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 11:32:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:बैलगाड़ी शर्यतीचा इतिहासातील सगळ्यात मोठ्या बैलगाड़ी शर्यतींचा थरार सांगलीच्या बोरगाव मध्ये पार पडत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आलंय आणि हजारो बैलगाडी बोरगाव इथल्या कोड्याच्या माळेराणावर धावत आहेत. बैलगाड़ी शर्यतींचा धुरळा या ठिकाणी उडाला असून कोड्याचं माळ हे लाखो बैलगाड़ी शौकिनांनी फुलून गेलेला आहे. बैलगाड़ी शर्यतींचा मैदान आणि त्या निमित्ताने या ठिकाणी लागलेले स्टॉल्स असतील, उसळलेला जनसागर असेल. हा सर्व अद्भुत असं दृश्य ड्रोनच्या माध्यमातून झी 24 तास च्या प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलोय. एखाद्या वसलेलं गाव आणि त्या ठिकाणी भरलेली जत्रा अशा पद्धतीचं स्वरूप या बैलगाड़ी शर्यतीच्या मैदानाला आलेला ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पाहूया डोळ्यांचे पारणे फेडणारे महा बैलगाड़ी शर्यतीचे मैदान.
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 09, 2025 11:11:08
Akola, Maharashtra:निवडणुका जवळ आल्या की रोहित पवार आणि अंजली दमानिया सारखे लोक सरकारवर टीका करत असतात. मात्र आज टीका करणारे रोहित पवारच सरकार येण्यापूर्वी महायुतीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत होते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.रोहित पवार यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले की, “महायुतीने नकार दिल्यानंतरच ते जाणीवपूर्वक अशा प्रकारे बोलू लागले आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.” अशा ट्विटमुळे फक्त मनोरंजनच होतं, असा टोला ही त्यांनी लगावला.सत्तेसाठी हापापलेले रोहित पवार इतक्या खालच्या पातळीवर येतील, अशी अपेक्षा नव्हती असेही मिटकरी म्हणाले..
2
comment0
Report
SKShubham Koli
Nov 09, 2025 10:58:49
Thane, Maharashtra:मनसे नेते अविनाश जाधव बाईट पॉइंटर ऑन रक्तदान शिबिर.. चार-पाच दिवस पुरले इतका रक्त साठा आहे एक ठाणेकर म्हणून एक जबाबदारी होती म्हणून आम्ही ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले सकाळपासूनच 500 पेक्षा अधिक राज्यांच्या बाटल्या ठाणेकरांनी जमा केले आहेत.. सर्वांनीच पक्ष विसरून रक्तदान करावे.. मातोश्री ड्रोन हे अतिशय वाईट आहे तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करू नका ड्रोन मातोश्रीच्या बाजूला जर फिरत असतील तर ती धोक्याची घंटा आहे सरकारने गृह खात्याने यावर लक्ष द्यावे यात म्हणू नका मुसलमानाने ते द्रोण उडवले आपल्याकडे काही भरोसे नाही कालची मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आहे व वक्फ बोर्डाची जमीन दुसऱ्याच्या घशात अरे काय चाललं आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीय रंग देत असाल तर ते योग्य नाही आम्ही मातोश्रीच्या बाबतीत जे काय चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करतो.. त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करतो.. ऑन कल्याण पक्ष प्रवेश.. या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातो आणि त्यातूनही पक्षप्रवेश होत आहेत त्यांची कुणाची इच्छा नाही जे काही चालू आहे ते विविध दबावापोटी चालू आहे जागेचे व्यवहार असतील इतर गोष्टी असतील प्रकरण बाहेर काढून जेलमध्ये टाकण्याचा धमक्या देऊन या गोष्टी सुरू आहेत... भारतीय जनता पक्ष जिंकत नाही तिथले जे नगरसेवक आहेत जे परंपरेनुसार जिंकत येतात ते जिंकतात भारतीय जनता पक्षामध्ये हिम्मत नाही जे स्वतःची पैदास उमेदवार म्हणून निवडून आणण्याची.. ही जी सर्व लोक आहेत त्यांचा मूळ पक्ष वेगळाच आहे भारतीय जनता पक्ष फक्त त्यांच्यावर स्टॅम्प मारते.. यांना निवडून आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही छाया नाही.. ऑन दुबार नावे आम्ही मतदानावर विश्वास का ठेवावा आज सकाळी व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये कचरा पेटीत ईव्ही पॅड टाकले आहेत कचरा पेटीमध्ये जर ईव्ही पाडच्या स्लिप पडल्या असतील तर कुठल्या निवडणुका आणि कोण जिंकून येणार याचा अर्थ बीहार निवडणुकीचा रिझल्ट लागला आहे.. ईव्ही पाड जर गायब असेल तर कुणावर विश्वास ठेवणार आम्ही.. या सर्व गोष्टी धोक्याच्या आहेत निवडणुक आयोग जो जर तुमचा मित्र असू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही ऑन प्रताप सरनाईक.. प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत घोडबंदर वसई विरार या भागात लोकांचा राग वाढत चालला आहे घोडबंदर मध्ये वाहतूक कोंडी स्वामींच मठ तिथले सर्व स्वामीभक्त आता एकत्र उभे राहिले आहेत त्यांचा मोर्चा निघणार आहे.. मीरा-भायंदर ल गेल्यानंतर तिथला टोलचा प्रश्न असेल प्रताप सरनाईकांबद्दल स्थानिक लोकांबद्दल राग वाढत चालला आहे त्यांचे भ्रष्टाचार, वन जमीन आहे त्यामध्ये प्रताप सरनाईकांचा प्रचंड प्रमाणात उत्खनाचा काम चालू आहे एक मंत्री इतक्या मोठ्या प्रमाणात वन जमीन खनु कशी शकतो त्याला परवानगी मिळाली कशी त्यातल्या अनेक परवानग्या अटींवर आहेत ती जर परवानगी आणली तर तुम्हाला परवानगी आहे.. मीरा-भाईंदर मध्ये ज्यावेळेस त्यांना परवानगी मिळाली त्यावेळेसचा जोआयुक्त होता तो किती भ्रष्ट होत आहे सर्वांना माहित आहे.. आम्ही येत्या एक दोन दिवसात या सर्व प्रकरणांच्या चौकशीची मागणी करणार आहोत प्रताप सरनाईकांनी जो काही डोंगर पोखरायला घेतला आहे चेना ब्रिजच्या आजूबाजूला बंगल्याचे काम चालू आहे त्या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होणार आहे..मी असेल किंवा संदीप देशपांडे आम्ही सर्वच या प्रकरणाविषयी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत.. पर्यावरणाची जी परवानगी आहे ती परवानगी आलीच नाही तरी देखील तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे प्रताप सरनाईकांनी त्या भागात जंगल राज चालवला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गुंडगिरी पसरवली आहे आदिवासींच्या जागा लाटल्या आहेत.. येत्या एक-दोन दिवसात वीत प्रूफ आम्ही पत्रकार परिषद घेणार अस काँग्रेसच्या नेत्यांनी देखील म्हटले आहेत 200 कोटींची जमीन तीन कोटींमध्ये घेतली ते म्हणाले प्रूफ द्या आम्ही प्रूफ देणार आहोत
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 09, 2025 10:56:54
Jalna, Maharashtra:जालना: चार दिवसापासून गायब असलेल्या महिलेसह तरुणाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या\nप्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय\nडोंगर पर्वतरांगांमध्ये असलेल्या एकाच झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या..\nमहिलेसह एका तरुणाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.38 वर्षीय जयाबाई गवळी आणि 24 वर्षीय गणेश वाघ अशी आत्महत्या केलेल्यांची नाव आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता दोघेही गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आलीय.दरम्यान ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पारध पोलीस अधिक तपास करतायत.
1
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 09, 2025 10:50:13
2
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 09, 2025 10:46:11
Amravati, Maharashtra:जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; बच्चू कडू यांच्याकडून गाडी फोडणाऱ्यांसाठी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर अँकर :- भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहे. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांच्या गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. फडवणीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करते आणि हे वाचाळविळ मंत्री आहे असे वक्तव्य करते शुकर माना लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 09, 2025 10:17:52
Jalna, Maharashtra:जालना : लघुशंका करताना व्हिडीओ व्हायरल,महेश आडे आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला अटक,ईतर आरोपींचा शोध सुरु अँकर : जालन्यातील महेश आडे प्रकरणातील एका संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केलीये.. अमेय जगताप राहणार पांडेपोखरी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, आज या आरोपीला परतुर कोर्टात हजर केलं जाणार आहेत.. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असून,आष्टी पोलीस त्याचा तपास करत आहेत.. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका महेश आडे आणि त्याच्या मित्राने केली होती, आणि त्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.. त्यानंतर महेश आणि त्याच्या मित्राने माफी मागून तो व्हिडीओ शेअर केला होता.. मात्र काही तरुणांकडून वारंवार महेशला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, त्यानंतर महेश ने चार दिवसापूर्वी आत्महत्या केलीये, दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..तसेच या प्रकरणातील एका आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केली असून, आणखी काही फरार असलेल्या आरोपीचा शोध आष्टी पोलिस करत आहेत..
5
comment0
Report
Advertisement
Back to top