Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

यवला नगर परिषद चुनाव प्रचार की शुरुआत: समीर भुजबळ ने नारियल फोड़कर प्रचार का उद्घाटन

SKSudarshan Khillare
Nov 24, 2025 06:31:40
Yeola, Maharashtra
येवल्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ स्टार प्रचारक समीर भुजबळ यांच्या हस्ते फुटला. गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, आरपीआय आणि इतर मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर राजेंद्र लोणारी यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
65
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 07:46:05
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 24, 2025 07:33:08
Latur, Maharashtra:लातूर स्टोरी.. AC ::- लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडून योग्य सहकार्य आणि पाठबळ मिळत नसल्याचा थेट आरोप या उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या निर्णयानंतर संपूर्ण निवडणूक समीकरण बदलून गेल्याचं राजकीय वर्तुळात स्पष्टपणे बोललं जात आहे. 2016 मध्ये रेणापूर नगरपालिका स्थापन झाली होती. 2017 ला निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत भाजपाने निवडून आलेल्या अपक्ष उमेदवाराला सोबत घेऊन सत्ता मिळवली. तीन वर्ष प्रशासकाचा काळ होता. मात्र आताच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही गट तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मैदानात आहेत. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अकरा लोकांनी माघार घेतल्याने निवडणुकीमध्ये आता वेगळीच चुरस पाहायला मिळते आहे. चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारांना पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अंतर्गत अडथळे आणि संघटनात्मक पाठबळाच्या कमतरतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे. 11 उमेदवारांच्या अचानक माघारीमुळे ठाकरे गटाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि निवडणुकीचा वेग पूर्णपणे बदललेला दिसतोय. याचदरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचीही या निवडणुकीत मजबूत तयारी दिसत आहे. भाजपाला सरळ टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने स्वतंत्र रणनीती आखल्याचं दिसतंय. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुखांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माघार घेतलेल्या उमेदवारांना भाजपाकडून ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे ही माघार नाराजीमुळे आहे की राजकीय डावपेचाचा भाग, यावर आता मोठी चर्चा रंगली आहे. आणि पुढचा फायदा नेमका कोणाला हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. रेणापूरमध्ये उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचं संपूर्ण चित्र उलथून गेलं आहे. ठाकरे गटाला बसलेला धक्का, जिल्हाप्रमुखांचे गंभीर आरोप, शिंदे गटाची नव्याने तयार झालेली आक्रमक भूमिका आणि भाजपाच्या गणितामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता समीकरण कोणत्या दिशेने वळतं—याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 24, 2025 07:32:38
Nala Sopara, Maharashtra:अँकर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईतील पेल्हार येथे पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या sुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे . भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट पादचारी पुलाला जाऊन धडकला. या भीषण धडकेत कंटेनरचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी पोलिसांना कळवत जखमी चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये सांगितले जात आहे. दरम्यान, या अपघातामुळे अहमदाबाद महामार्गावर गुजरात मार्गिकेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 24, 2025 06:32:42
Pandharpur, Maharashtra:राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय असंतोष स्पष्टपणे दिसत आहे. मात्र याची पेरणी विधानसभा निवडणुकीत झाली होती. याची कबुलीच सांगोला नगरपालिका निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. महायुती मधील नेत्यांची खदखद बाहेर येऊ लागली आहे. याचे निमित्त ठरले आहे नगरपालिका निवडणुकांमधील भाजपचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा हट्ट, सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत मध्ये भाजपने मित्र पक्षांच्या ताकती कडे दुर्लक्ष करून सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आपल्याकडे ठेवल्या आहेत. सांगोला नगरपालिका निवडणुकांतील नैसर्गिक मित्र शिवसेना असतानाही भाजपने शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत युती केली. त्यांनी जाहीर केलेला उमेदवाराला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा मध्ये घेऊन उमेदवारी दिली. हे सर्व करताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना कोणतेही महत्व दिले नाही. या राजकारणात एकटे पाडल्याची भावना निर्माण झालेल्या शहाजी बापू यांनी सुद्धा 23 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष स्वतंत्र शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला. यांनतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक एक गुपिते आपल्या विरोधात केलेल्या राजकारणाची कारस्थाने जाहीर पने सांगायला सुरुवात केली. भाजप नेत्यांवर दहशत दमबाजी ते थेट अबलेवर बलात्कार झाल्याची उद्विग्न होण्या पर्यंत वक्तव्य केली. आपण मरणाच्या दारात असतानाही लोकसभेला प्रामाणिक केल्याची आठवण सुद्धा भाजप नेत्यांना करून द्यावी लागली. तरीही भाजप नेतृत्वाने शहाजी बापू यांच्या बोलण्याला काडीची किंमत दिली नाही. त्यामुळे एकटे पडलेल्या शहाजी बापू साठी थेट एकनाथ शिंदे यांनी काल सांगोला येथे येऊन सभा घेतली. त्यांना वारंवार सांगावा लागलं बापू जखमी शेर आहे. त्यांनी एकटे पाडून कार्यक्रम झाला असल्याची भावना असल्यास तर एकनाथ शिंदे मागे असल्याची आठवण करून दिली. मी बाळासाहेबांचा चेला आहे. एक बार मैंने कमिट मेट करली तो मैं अपनी आप की भी नहीं सुनता म्हणत थेट भाजप नेत्यानं बापू साठी अंगावर घेतले आहे. सांगोल्याच्या जनतेपुढे काल शहाजी बापूंनी आपल्याला एकटे पाडल्याचे सांगत आक्रमक पने भाजप नेत्यांना उत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी आमचे कंबरडे मोडले होते. याची माहिती होती. विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी शेकाप आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराला कशा रकमा पोहोच केल्या याची टायमिंग सह माहिती आहे. असा उल्लेख शहाजी बापूंनी केला. त्यामुळे महायुती असतानाही शेकापचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप नेत्यांनी राजकीय खेळ्या केल्याच गुपित फोडले आहे. नगरपालिका निवडणुका प्रचार निमित्ताने सांगोल्यातून शहाजी बापू पाटील यांनी आपले तोंड उघडले आहे. आता प्रचार संपेपर्यंत शिवसेना भाजप मधील अनेक दिवसांची खदखद व्यक्त होण्याची शक्यता आहे
166
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 24, 2025 06:21:46
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत पाणीप्रश्न हा प्रमुख मुद्दा बनला आहे. “नागरिक चोरीचं पाणी पित आहेत” असा आरोप अनेक उमेदवारांकडून होत असून हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनेक वर्षांपासून शहराला हक्काचा पाणीपुरवठा न झाल्याची समस्या आता निवडणुकीत ज्वलंत ठरली आहे. बार्शीटाकळी येथे यंदा नगराध्यक्ष पद महिला आरक्षित आहे. 20,947 मतदारांपैकी नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार स्पर्धेत आहेत. शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई. अकोला शहराला काटेपूर्णा धरणातून जाणारी मुख्य पाइपलाईन बार्शीटाकळी मार्गे जाते, मात्र शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक बेकायदा पाईपलाईनला जोडून पाणी घेतात. अकोला महापालिकेने अनेक वेळा कारवाई केली असून त्यामुळे स्थानिकांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन विरोधकांनी सत्ताधारी काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे आणि प्रत्येक उमेदवार ‘हक्काचा पाणी’ मिळवून देण्याचा दावा करत आहे. रूपाली गोल्डे, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार; वनमाला मुळे, शिवसेना (यूबीटी) उमेदवार; समीना अंजुम, काँग्रेस उमेदवार. बार्शीटाकळी नगरपंचायत अद्यापही अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयूची सुविधा नाही, एमआयडीसी नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या सर्वांपेक्षा पाणीप्रश्न अधिक गंभीर असून त्याच्या निराकरणाचा दावा सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. पाणी समस्या गंभीर असल्याचे सत्ताधारी काँग्रेस पक्षही मान्य करतो. निवडून आल्यास शहरातील पाणीटंचाईसह महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे काँग्रेस उमेदवार सांगत आहेत. समीना अंजुम, काँग्रेस उमेदवार.
110
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 06:05:23
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे भाजपला अनुकूल वातावरण है...नगरपालिका निवडणुकीत 51 टक्के मतं महायुतीला मिळेल (राज ठाकरे-गाफिल) इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे... कुठंलीच निवडणूक शेवटची नसते... मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय स्तरासारखं विकसित करणे.. 2029,2035 आणि 2047 चा विकसित मुंबईचा आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला जात, पंथ, धर्म करून मत मिळणार नाही तर विकसित मुंबईच्या नावावर मत मिळतील (on अजित पवार मतं.. निधी) अजीत दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निधीचा निर्णय घेतात... एक न एक पैसा विकासाकरता जातो... आमचे तिन्ही नेते एकत्र बसतात... त्यांनी जे विधान केले ते कोणत्या कारणाने केले माहिती नाही.... कुठलाही विकास निधी समन्वयाने वाटप होत असतो. मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात... निवडणुकीच्या प्रचारात ते कुठेतरी बोलले असतात काँग्रेसला पराजय दिसत आहे... विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.... यावेळी ज्या ज्या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप झाले त्यावेळी महाराष्ट्राने क देवेंद्र फडणवीस यांना जिंकले आहे.. *दोन तारखेला किंचित काँग्रेस झालेली दिसेल* (on गडचिरोली वक्त्यव्य बावनकुळे) मी एवढेच म्हटले आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या.. त्यांना पन्नास शंभर चा एखादा पेंडॉल टाकला असता तर आम्ही निवडणूक आयोगाला त्याचा खर्च हिशोबा दिला असता या कार्यकर्त्याने चूक केली.. प्रदेश म्हणून खर्च देऊ आम्ही.. निवडणूक आयोगाला खर्चाचा हिशोब देऊ.. आणि मी नियमाच्या बाहेर करणार नाही हिशोब देऊ (मुंबई महायुती ) अजून तिथल्या निवडणुका लागली बसू.. आणि तिथ महायुती म्हणूनच लढू ( अन पंकजा मुंडे -Pa ) पंकजां मुंडे यांनी पोलिसांना नियमात आणि कायदेशीर कारवाई करायला सांगितले आहे (on MVA वेळ मागितली ) हे विकासावर बोलत नाही खोट्या पद्धतीने narretive करत असतात (2047 भाजपा) -- महाराष्ट्र आम्ही एक कोटी मताने जिंकले... 2029 ची निवडणूक आम्ही दीड कोटी मताने जिंकू 2034शी निवडणूक 2 कोटी मताने आणि 2039 ची निवडणूक आम्ही अडीच कोटी मताने... अजून मताने वाढेल कारण आम्ही विकासासाठी काम करतो (on चित्रा वाघ-मटण) भाषणात असे वक्तव्य केले की लोक टाळ्या वाजवत असतात (on शहाजी बापू आरोप ) निवडणूक संपली की अशा आरोपाचे लोक दखल घेतात... असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू ( ऑन महायुती कटूता ) मी महायुतीचा समन्वयक आहे एकदम एकत्र आहे... देवेंद्रजी कटूता न ठेवणारे नेते.. शिंदे दिलदार नेते आहे... सगळे एकदम एकत्र आहे
152
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 24, 2025 06:04:56
150
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 24, 2025 05:21:02
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये भाजप–शिवसेना आमने-सामने! युती फिस्कटली, शिवसेना आक्रमक चार नगरपालिकांत शिवसेना थेट भाजपविरोधात रणसंग्रामात भाजपविरोधी प्रचाराची शिवसेनेची जोरदार तयारी धाराशिव – नगरपालिका निवडणुकांत भाजप आणि शिवसेना थेट आमने-सामने आल्याने धाराशिव जिल्ह्यात राजकीय तापमान चढलंय. भुम, परांडा, धाराशिव आणि उमरगा—या चार महत्वाच्या नगरपालिकांमध्ये शिवसेना भाजपाच्या विरोधात उतरलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच युती फिसकटल्याने शिवसेनेने भाजपविरोधात रणशिंग फुंकलं. शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी पदाधिकारी–कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराची रणनीती आखली असून शिवसेनेने भाजपविरोधात जोरदार प्रचारालाही सुरुवात केलीय.
103
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 05:17:04
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिवलग मित्राने आत्महत्या केल्याचे समजताच दुःख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्रानेही केली आत्महत्या - दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात घडली हृदयद्रावक घटना - जिवलग मित्राने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त कानावर येताच दुसऱ्या मित्रानेही शेतात गळफास घेत केला आयुष्याचा शेवट - गोरख भोई याने पहिल्यांदा स्वतःला संपवले तर हे दुःख सहन न झाल्याने सुरेश भोई या जिवलगाने देखील स्वतःला संपवले - पहिल्या मित्राचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसऱ्या मित्राने उचलले टोकाचे पाऊल - गोरख भोई आणि सुरेश भोई यांची मैत्री संपूर्ण गावात जय वीरूची जोडी म्हणून ओळखली जायची - संपूर्ण घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे
178
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 24, 2025 05:05:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:तारा वाघिणीसाठी चांदोलीच्या जंगलात तब्बल ७९ चितळ सोडले. सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकतेच ताडोबातील चंदा अर्थात तारा वाघिणीला सोडण्यात आला आहे. त्या पाठोपाठ तारा वाघिणीसाठी खाद्य म्हणून चांदोलीच्या जंगलात एकूण ७९ चितळ सोडण्यात आली आहेत. चांदोली अभयारण्यासह सह्याद्री खोऱ्यात मुबलक खाद्य असल्याने चितळ येथे रुजण्याची अपेक्षा आहे. नुकतेच सोडण्यात आलेली तारा वाघीण आणि भविष्यात आणखी सात वाघ चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र सोडण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने त्यांच्यासाठी हे चितळ खाद्य म्हणून उपयुक्त ठरणार असल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रात्री उशिरा ७९ चितळ चांदोलीच्या अभयारण्यात यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास वाढविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून हे चितळ सोडण्यात आलेत.
152
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 24, 2025 05:04:50
Washim, Maharashtra:वाशिम जिले में चार नगरपरिषद और एक नगरपंचायत के चुनाव प्रचार में तेज़ी आई है. जिल्ह्यात महायुतीसह इतर पक्षांचे पारंपरिक समीकरण कायम असले तरी यंदाच्या उमेदवारीतील घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि मालेगाव या सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. या निर्णयामुळे प्रत्येक नगरपरिषदेत वेगवेगळ्या स्वरूपाची तिरंगी-चौरंगी लढत होणार आहे. विविध पक्षांनी जनसंपर्क मोहिमा, रॅल्या, पदयात्रा आणि घराघर भेटींचा वेग वाढवला असून स्थानिक पातळीवर थंडीच्या दिवसात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
106
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 24, 2025 05:03:16
Palghar, Maharashtra:पालघराच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंडर-16 फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे. सागर सोरती असं या खेळाडूचं नाव आहे. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. या खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, मात्र, या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
182
comment0
Report
Advertisement
Back to top