Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

नाशिक में युद्धजन्य स्थिति से पेट्रोल-डीजल के दाम बढ़े; निजी कंपनियों को झटका

VNVishal Nagesh More
Mar 27, 2026 09:21:20
Malegaon, Maharashtra
विशाल मोरे, मनमाड (नाशिक) - नाशिक जिल्ह्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलचे दर महागले. खाजगी पेट्रोल कंपन्यांना फटका, इंधनाच्या दरात केली वाढ. Anc: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती मुळे खाजगी पेट्रोल कंपन्यांना काही प्रमाणात फटका बसल्याचे पहावयास मिळत असून नायरा पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल व डिझेल च्या दरात रात्रीतून वाढ झाली आहे, पूर्वी 104 रुपये लिटर या दराने पेट्रोल मिळत असताना त्यात 5 रुपयाने तर डिझेल मध्ये 3 रुपयाने वाढ होऊन ते 93 रुपये झाले आहे, इंधनाच्या दरात वाढ झाली असली तरी त्याचा परिणाम ग्राहकांना जाणवत नसताना, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचे पेट्रोल पंप मालकाचे म्हणणे आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 10:17:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंधन भरण्यावरील मर्यादा अखेर उठवली. ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने दुचाकीसाठी 200 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 2 हजार रुपयांपर्यंत इंधन भरण्याची घालण्यात आलेली मर्यादा अखेर उठवण्यात आली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, राज्यातील सुमारे 10 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर घालण्यात आलेली बंधने देखील आजपासून पूर्णपणे मागे घेण्यात आली आहेत. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील पूर्वीचे आदेश रद्द करत नागरिकांना दिलासा दिला आहे. आता इंधन भरण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नसल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाईट : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
933
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 27, 2026 09:34:42
Pandharpur, Maharashtra:पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत केली माढा लोकसभा मतदारसंघातील मजबूत बांधणी जिल्हा परिषदेच्या तीन सभापती पदे माढा लोकसभा मतदारसंघात माढा लोकसभा मतदारसंघात जीवलग मित्र रणजीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. यानंतर आगामी लोकसभा निवडणूक साठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार बांधणी केली आहे. आज झालेल्या जिल्हा परिषद सभापती निवडीत माढा लोकसभा मतदारसंघात तीन सभापती पदे दिले आहेत l. माळशिरस मध्ये संस्कृती सातपुते यांना समाज कल्याण, माढा मधील अमृता वाघे यांना महिला बालकलाण, सांगोला मधील भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांना अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती पद दिले आहे.
1091
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 08:46:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - बापाच्या सैतानी कृत्याने जिल्हा हादरला..! चोरीच्या संशयाने मुलींना उलटे टांगून ठेवले,एका चिमुरडीचा मृत्यू तर एक अत्यावस्थेत.. अँकर - मुलींच्यावर शेजारच्यांनी चोरीचा संशय घेतल्याने,एका बापाने आपल्या पोटच्या दोन्ही मुलींचा अमानुष छळ करून एका मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या बनपुरी मध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. घरातल्या खुंटीला चिमूरड्या मुलींना उलट टांगुन ठेवल्याने हा प्रकार घडला आहे. ग्राफिक्स in आटपाडीच्या बनपुरी मध्ये एका बापाचा राक्षसी आवतार पोटच्या दोन चिमुकल्या मुलींवर बापाकडून अमानुष छळ दोरीने हातपाय बांधून घरातल्या खुंटीला रात्रभर उलट टांगून ठेवलं पाण्याविना तडफडून व उलटे टांगून राहिल्याने 9 वर्षीय चिमुरडी ऋतुजा दादू यमगरचा मृत्यू 11 वर्षीय बहीण अनुजा सरगरची प्रकृती चिंताजनक निर्दयी दादू यमगरला आटपाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या ग्राफिक्स आऊट व्ही वो - आटपाडीच्या बनपुरी मध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हा धरून गेला आहे.पोटच्या मुलींवर निर्दयी आणि निष्ठूर बापाने अमानुष अत्याचार केल्याने नववर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. ऋतुजा उर्फ सानिका दादू सरगर,असं या निष्पाप मुलीचे नाव आहे. तर बापाच्या या अमानुष्यमुळे अनुजा सरगर हे अत्यावस्थेत आहे. बाईट - विनय बहिर - पोलीस निरीक्षक - आटपाडी,सांगली. व्ही वो - बनपुरी मधील राहणाऱ्या यमगर दादू यमगर यांनी आपल्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय.शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या दोन्ही मुलींवर चोरीचा आळ घातला,या रागातुन दादू यमगर यांनी आपल्या दोन्ही मुलांचे हातपाय दोरीने बांधून रात्रभर घरात उलट टांगून ठेवले. व्ही वो - रात्रभर दोन्ही मुली उलट्या टांगून होत्या,दोन्ही मुलींना पाणी देखील देण्यात आलं नाही,त्यामुळेच पाण्याविना आणि उलट टांगून ठेवल्याने ऋतुजा सानिका हिने आपले प्राण सोडले,सकाळी ही सर्व गंभीर बाब समोर आल्यानंतर घरच्यांनी बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या अनुजाला आटपाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. व्ही वो - दुसरीकडे निर्दयी बापाकडून आपलं कृत्य लपवण्यासाठी ऋतुजावर अंत्यसंस्काराचा घाट घालण्यात आला, गुपचूपपणे अंत्यसंस्कार करण्यात येणार होता.मात्र तिकडे रुग्णालयात उपचार घेणारी अनुजा शुद्धीत आली,मग तिने बापाकडून करण्यात आलेल्या अमानुष छळचा पाढा वाचताच,डॉक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली, पोलिसांनाही घटनेची माहिती दिली, मग पोलिसांनी थेट बनपुरीत जाऊन अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या अनुजाचा मृतदेह ताब्यात घेत,मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला,याप्रकरणी निष्ठूर बापास अटक देखील करण्यात आली आहे. व्ही वो - आटपाडी पोलिसांनी प्राथमिक तपासात घरगुती कारणातून दादू यमगर यांच्याकडून निर्दयी कृत्य केल्याचं सांगण्यात आलंय,या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे देखील आटपाडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. व्ही वो - मात्र लहान मुलींच्यावर शेजारच्यांनी केवळ चोरीचा संशय घेतल्याचा,रागापोटी बापाने केलेला अमानुष कृत्य,थरकाप उडवणारच तर आहेत शिवाय संतापजनक देखील आहे..
981
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 08:34:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पोलिसांच्या वर्दीला भलेभले घाबरतात,त्यामुळे पोलिसांनी आपली दहशत निर्माण करावी, अँकर - पोलिसांच्या वर्दीला भलेभले घाबरतात,त्यामुळे पोलिसांनी आपली दहशत निर्माण करावी, अशा सूचना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी, सांगली पोलिसांना दिलेत. सांगली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं,यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी सांगली पोलीस दलाला ज्या-ज्या गोष्टी लागेल,त्या दिल्या जातील,असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील - पालकमंत्री.
985
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 27, 2026 08:20:32
Varasoli, Maharashtra:पोलादपूरात पेट्रोल पंपांवर खडखडाट; एकाच पंपावर पेट्रोलचा अपुरा साठा. डिझेल पेट्रोल संपल्यानं नागरिकांत संभ्रम. अँकर – आखाती युद्धामुळे देशातील इंधनाच्या पुरवठयावर परीणाम झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात देखील काही भागात इंधनाची टंचाई जाणवते आहे. दुर्गम डोंगराळ अशी ओळख असलेल्या पोलादपूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला आहे. चारपैकी तीन पंपांवर खडखडाट असून केवळ एकाच पंपावर पेट्रोल शिल्लक आहे. तेथील साठाही अपुरा असल्याचे सांगितले जाते. वाहनचालकांना 200 रूपयांच्या मर्यादेतच पेट्रोल दिले जात आहे. पेट्रोल, डिझेल संपल्याचे फलक पंपांवर पहायला मिळतात. इंधनाचा पुरेसा साठा आहे असे प्रशासनातर्फे सांगितले जाते पण इंधन टंचाई जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
1016
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 27, 2026 08:19:38
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे – मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना – या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या... रस्त्याची मोजणी... क्रमांक देणे आणि मग बांधकाम करणे – मात्र शासकीय पाणंद योजना अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केले आहे... त्यामुळे मागच्या शेतकऱ्यांना जाण्याकरता अडचण होते.. त्यामुळं शासनाने हा निर्णय घेतला.. पाणंद रस्ता अडवला तर त्या शेतकऱ्याचे संपूर्ण फार्मर ID बंद करणार आहोत... त्यामुळे त्यांना कोणती शासकीय योजना मिळणार नाही... – त्यामुळे क्शेत रस्त्यावर,पाणंद रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकावे... – हायवे और रेल्वेच्या कडेला सर्विस रोड बांधत आहोत..त्यामुळे शेतकऱ्याच्या राईट ऑफ वे गेला असेल तर आपण रस्ते रोड त्या प्रकल्पाला बंधनकारक केले आहे... – केंद्र पेट्रोल.. एक्सरसाइज ड्युटी – पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. ऐतिहासिक निर्णय आहे. महागाईचा फेरा कमी करण्याकरता एक्सरसाइज ड्युटी केंद्र सरकारने कमी केली – पुणे विभागात 155 जो अधिकार तहसीलदाराला आहे त्याचा त्यांनी गैरवापर केला.... तहसीलदाराला 155 मध्ये केवळ शुद्धलेखन दुरुस्तीचा अधिकार आहे.. नाव चूकले तर दुरुस्त करणे.... तेही शुद्धलेखन – मात्र 155 चा वापर करून काही तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी तुमची शेती यांच्या नावावर यांची शेती तुमच्या नावाने.... अधिकार नसताना... यांची शेती कमी करून यांना दिली.... एक मोठं स्कॅडल पुणे विभागात आढळल आहे.. जवळपास 400 प्रकरणं आढळले आहे.. 4हजार प्रकरण तपासले ..36 हजार प्रकरण आहे – राज्यात 155 चा दुरुपयोग करणाऱ्या संपूर्ण तपास करणार आहोत.... पुणे विभाग तपासले.. त्यामध्ये अधिकारी आहे . ही पहिल्या टप्प्यातील कारवाई आहे... सक्तीच्या रजेवर पाठवले आहे... विधी विभागाचा सल्ला घेणार आहोत... संपूर्ण राज्याचा आढावा घेणार ज्यांनी चुका केला.... ज्यांच्यावर अन्याय दूर करणार... संपूर्ण राज्याचा पुनर्वलोकन करणार – कोकणात 70 ब मध्ये बदमाशी केली आहे.. – कारवाईची संख्या फार मोठी असेल... दोषीवर कारवाई करू गरीबाचा हक्क मिळवून देऊ चंद्रशेखर बावनकुळे – कोणालाही क्लीनचीट दिली नाही. विकास खर्गे आणि आमच्या टीमने प्रचंड मेहनत करून हा अहवाल तयार केला आहे. कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. आमचे अधिकारी अडकले आहे.त्यांच्यावर कारवाई प्रपोज केली आहे . आमचा जो महसूलचा जो अधिकार आहे.आमची जमीन आम्ही परत घेतली आहे. प्रॉपर्टी कार्ड सरकारच्या नावाने केली आहे... आणि जी रजिस्ट्री खोटी झाली आहे... फोरजरी करून रजिस्ट्री केली आहे .. ती रद्द करण्याकरता सिविल कोर्टात गेलो – ती रजिस्ट्री आम्ही रद्द करणार..प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावर करणार.. ज्या अधिकारांनी चुका केल्या काही लोकांना तर आम्ही बडतर्फ केल आहे... सरकारी जमिनीचा जे जे लोक अशा पद्धतीने विल्हेवाट लावतील... सरकारी जमीन दुसऱ्याच्या घशात टाकतील... अशा लोकांना नोकरीत राहण्याचा अधिकार नाही... एका तहसीलदाराला आम्ही बडतर्फ करून टाकलं... आणि यानंतर या प्रकरणात जी आढळतील त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू... संपूर्ण कारवाई पारदर्शी झाली आहे.... आमच्या अहवाला नंतरचा भाग पोलिसांचा है... ते पोलीस करतील... – महाराष्ट्रात जेवढेही गव्हर्मेंट लँड आहे त्यांच्या सर्वांच्या सर्वेक्षण करून.... सगळ्यांना एका swebsite par आणून.. एका क्लिकवर सगळं पाहता येईल.... – अमिडीया कंपनीचा जो व्यक्ती त्या ठिकाणी रजिस्टर करायला गेला – आमच्या कायद्यात काय लिहिले आहे.रजिस्ट्री करून देणारा आणि रजिस्ट्री करून घेणारा... सरकारी जागेची विक्री करणारा आणि विकत घेणारा या दोघांवर गुन्हे दाखल केले आहे... – पुढचा जो स्कोप आहे तो फौजदारी गुन्ह्याचा.. त्यामध्ये कोणाकोणाला घेायचे आहे... ही फौजदारी कारवाई आहे – महसूलची कारवाई नियमप्रमाणे... अतिरिक्त कोण आहे हा पोलिसांचा भाग – कितीही मोठा व्यक्ती असला तरी कारवाई होईल. कोणालाही सोडल जाणार नाही. ही 3000 कोटीची जी प्रॉपर्टी आहे ती वाचवण्यात महसूल खात्याला यश आले आहे .. प्रॉपर्टी चे कार्ड आमच्या नावाने करून घेतले आहे.. रजिस्ट्रेशन सिव्हिल कोर्टात जाऊन आम्ही रद्द करत आहोत – विजय वडेट्टीवार – वडेट्टीवार यांनी रिपोर्ट योग्य वाचला असता तर त्यांनी अभिनंदन करायला हवे होते... च कमिटीने ज्या शिफारशी केल्या आहे.... खर्गे अत्यंत निष्ठावान आणि इमानदार अधिकारी आहे. कोणालाही कधी सोडून देण्याचे काम खरेदी करणार नाही... हे वडेट्टीवार यांची माहिती आहे – हा संशय घेणे ही राजकारणाकरता ते करत असतील... – त्यांनी चौकशीचा पूर्ण रिपोर्ट वाचावा – चाकणकर राजीनामा.. राष्ट्रवादी एकमत – त्या पक्षाच्या मी त्यांना निर्णय घ्यायचा आहे की त्यांना पदावर ठेवायचे आहे की नाही... मी भाजपाचा कार्यकर्ता मी त्यांना सूचना देऊ शकत नाही – महिला आयोग अध्यक्षपद भाजप की राष्ट्रवादी – अजित दादा होते तेव्हा त्यांनी सरकारमध्ये बसून काही गोष्टी केल्या होत्या.... त्या बदलण्याचा विचार मुख्यमंत्री करत नाही वा आम्ही करत नाही.त्यामुळे त्याबद्दल सर्वजण बसून निर्णय घेतीला... एकनाथजीं मुख्यमंत्री आणि सुनिता ताई एकत्र बसून निर्णय घेतील
988
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 27, 2026 08:16:26
Nanded, Maharashtra:नांदेड में बीएड CET ऑनलाइन परीक्षा चल रही थी। कुछ परीक्षा केंद्रों में गड़बड़ी हुई; कंप्यूटर चालू न हो पाने और लॉग इन होने वाले कई कंप्यूटर बंद पड़ने से विद्यार्थी परीक्षा से वंचित रह गए। मराठवाड़ा के centres में एक केंद्र पर 300 विद्यार्थियों की क्षमता के स्थान पर 600 विद्यार्थियों को केंद्र दिया गया। इसके कारण परीक्षा के दौरान कई विद्यार्थियों को केंद्र में रुकना पड़ा, और केंद्रों पर सुविधाओं की कमी भी सामने आई। ऑनलाइन परीक्षा के दौरान इंटरनेट कटा रहने से समस्या बनी और कई केंद्रों पर ऐसी स्थिति रही। इस केंद्र के अलावा शहर में दो से तीन अन्य केंद्रों पर भी ऐसा हुआ। छात्रों ने सुविधाओं के अभाव के कारण परीक्षा नहीं दे पाने और अगली परीक्षा लेने की मांग की।
1064
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 07:46:02
999
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 07:31:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला, पाणी प्रश्नावर अभिनंदन ठराव मांडले जात होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला मात्र ubt नगरसेवकांनी याला आक्षेप घेतला योजनेचे पैसे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर केले होते त्या मूळ त्यांचं अभिनंदन करावे अशी त्यांची मागणी होती मात्र हा ऐनवेळे आलेला प्रस्ताव आहे घेता येणार नाही अशी भूमिका महापौर यांनी घेतली , त्यामुळं महापौर यांच्या खुर्ची समोर ubt च्या नगरसेवक रशीद मामु यांनी वाद घालायला सुरुवात केली महापौर यानी कारवाईचा इशारा दिल्यावर ubt चे सर्वच नगरसेवक महापौर समोर आले आणि राजदंड ओढण्याचा प्रयत्न केला अखेर महापौर यांनी ubt च्या 6 उपस्थिती नगरसेवकांना बैठकीतून बाहेर काढण्याचा आदेश दिला, त्यानंतरही नफरसेवक बाहेर जात नव्हते तर सुरक्षा रक्षकांनी या नगरसेवकांना बाहेर काढले, यावेळी ubt नगरसेवकांनी महापौर आणि प्रशासनावर दादागिरी करत असल्याचा आरोप केलाय
975
comment0
Report
Advertisement
Back to top