Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नैसर्गिक फवारणी से तूर ने किया कमाल, माधव चिंतले की सेंद्रिय खेती चर्चा में

SMSATISH MOHITE
Dec 22, 2025 10:52:26
Nanded, Maharashtra
नैसर्गिकरित्या औषधांची फवारणी करून एका शेतकऱ्याने तुर चांगली बहरवलीये. नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील टाकळी इथल्या माधव चिंतले या शेतकऱ्याने नैसर्गिकरित्या पिकवलेली तूर सध्या शेंगांनी लगडली आहे. केवळ सेंद्रिय खते आणि औषधांचा वापर करून पिकवलेली तूर आता बहरली आहे. रासायনিক खते आणि औषधांना फाटा देत या शेतकरी पिकवलेल्या तुरीचे पीक सध्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलंय. गत तीन वर्षांपासून हा शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत असून त्यातून फायदा होत असल्याचे शेतकरी माधव चिंतले यांनी सांगितले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Dec 22, 2025 12:15:26
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 22, 2025 12:03:39
Pune, Maharashtra:नगरपरिषद निवडणुकीत अनेक लढती लक्षवेधी ठरल्या, त्यातच अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या माया मुंडे या नगराध्यक्ष झाल्यात...विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरूण मुंडे यांच्या त्या पत्नी आहेत...भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी करत विजय मिळवला.. नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर शहरातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचे पहिलं काम करणार असल्याचं माया मुंडे यांनी म्हटलं आहे तर आपण पक्षश्रेष्ठीवर नाराज नसून स्थानिक लोकप्रतिनिधीने आपल्याला उमेदवारी मिळू दिली नाही असं अरुण मुंडे यांनी म्हटलं आहे मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी 121- माया मुंडे, अरूण मुंडे
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 22, 2025 11:55:27
Baramati, Maharashtra:जेजुरीत भंडाऱ्यामुळे उडाला भडका.. जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर....भंडाऱ्यातील भेसळ दूर करण्याचे होतेय मागणी. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत काल रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला भंडाऱ्याचा भडका उडाला. या घटनेत तब्बल नवनिर्वाचित दोन नगरसेवकांसह 16 जण भाजले आहेत. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरी मध्ये ऐरणीवर आलाय. जेजुरी नगर परिषदेची मतमोजणी पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जेजुरी परिषदेवरून निर्विवाद सत्ता मिळवली. यानंतर विजयाचा जल्लोष सुरू असतानाच जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असताना अचानक आगीचा भला मोठा भडका उडाला. यात एक-दोन नव्हे तर तब्बल 16 जण भाजले गेले. या आधीच नेमकं कारण हे जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या आठ महिन्या खाली मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी यासंदर्भातील आवाज उठवला होता. जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप करीत या भेसळ रोखावी अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिल होत. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जेजुरीचा खंडेराया अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मोठ्या भक्ती भावना महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी तेच असतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत या ठिकाणी भंडार खोबऱ्याची उधळण केली जाते. जेजुरीत येणाऱ्या भंडाऱ्यात भंडारा निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून भेसळ केली जात असावी अशी शक्यताही वर्तवली जाते. मात्र हा भंडारा नक्की कोठून येतो हे निश्चित नाही. व्यापारी ही यावरी बोलायला तयार नाहीत. ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल तर अन्न व औषध प्रशासन विभागाने याची तपासणी करावी शासन या भेसळयुक्त भंडाऱ्यावर जी कारवाई करेल त्याला श्री मार्तंड देवस्थान पाठबळ देईल असेही मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी म्हटल आहे. याच घटनेवरून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी एक्स हँडल वरती पोस्ट करत म्हटलं आहे की जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजलेाची घटना घडली. यात विजयी उमेदवारांचाही समावेश आहे. घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. दरम्यान,जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापुर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या. परंतु दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे. शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करुन या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 22, 2025 11:03:52
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 10:53:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नुकताच उद्धव ठाकरेच्या उपस्थितीत संभाजीनगरचे माजी महापौर राजी मोचुद्दीन राहि? यांची उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश झालाय, त्याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध दर्शवलाय. आज राजी मामू आणि चंद्रकांत खैरे यांची शिवसेना भवन जवळ सामोरे आले यावेळेस खैरे यांनी राजी मामुला माझा तुझ्या प्रवेशाला विरोध आहे असं सांगितलं. यावेळेस राजी मामू आणि खैरे मध्ये शाब्दिक भांडण सुद्धा झाले. माझा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला असल्यास राजी मामू यांनी सांगितलं. दरम्यान अंबादास दानवे यांनी राजी मामू यांच्या प्रवेशाचे जोरदार समर्थन केले. शिंदे सेनेत किती लोकांवर आरोप आहे, सत्तााऱ्यावर कुठं कुठले आरोप आहेत असा सवाल त्यांनी केला. सोबतच अजित पवार यांच्या सोबत असलेले मुंब्र्याचा मुल्ला नवाब मलिक यांचेही पाहावे असे दानवे म्हणाले.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 22, 2025 10:51:35
Chendhare, Alibag, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती. रायगड जिल्ह्यातील तीन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली तर महाड, श्रीवर्धन, कर्जत, खोपोली, पेण, रोहा, माथेरान व मुरूड मध्ये राष्ट्रवादी चे नगरसेवक निवडून आले. या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सुतारवाडीतील कार्यालयात पार पडला. या वेळी मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुुभाष केकाणे उपस्थित होते. श्रीवर्धन आणि खोपोली मधील नगराध्यक्ष पराभूत कोणत्या कारणांमुळे झाले याचे आत्मपरीक्षण करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 22, 2025 10:48:21
kolhapur, Maharashtra:नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी येथे नागपुरातील विजय नगराध्यक्षांचा गौरव करण्यात आला... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते देवेंद्र फडणवीस:-मुख्यमंत्री, -नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले आहे -नागपूर जिल्हा भाजपचे अभिनंदन,२७ पैकी २२ ठिकाणी आपले नगराध्यक्ष झाले, -तील अत्यंत उत्तम निकाल आपल्याला मिळाला आहे,नागपूर क्षेत्रातील जनतेचे आणि मायदारांचे आभार -निकालाने एक बाब स्पष्ट झाली आहे,महाराष्ट्रात नंबर १ चा पक्ष भाजप आहे -७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत,२१० नगराध्यक्ष निवडून आलेत महाविकास आघाडीचे केवळ५० नगराध्यक्ष आले, त्यांचा सफया केला -সर्वाधिक स्राईक रेट आपला है. मागच्या निवडणूकित १५०० नगरसेवक होते यावेळी ३००० हजार झाली आहे. - गेल्या ३० वर्षात एवढे नगरसेवक कुणाचे निवडून आलेले नाहीत - जनतेने आपल्याला कामाची पावती दिली आहे. - १८ नगर पालिका अश्या आहेत जिथे आपले नगरसेवक निवडणूक आलेत,पण नगराध्यक्ष येऊ शकले नाही नागपूरात अनेकांचे किल्ले उध्वस्त केले - सावनेर नगर पालिका काँग्रेस मुक्त केली आहे - बावनकुळे यांनी चँग बांधला होता, वाडी आणि कामठी नगर पालिकेत ऐतिहासिक विजय मिळाला - रामटेक काँग्रेस मुक्त झाला आहे - २२ आपले आणि पाच मित्रपक्षांचे शहर कश्या प्रकारे विकसित करता येईल या ---विजयाचा रथ सुरू राहील,जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत हा रथ घोडदौड करेल - विजयाने माजनार नाही आणि मातनार नाही याची दक्षता घ्या. चंद्रशेखर बावनकुळे:- - नागरिकांचे आणि मतदारांचे आभार - विकसित नागपूर जिल्हा करिता भाजपला मतदान झालं - जनतेला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यावर विश्वास आहे. - नागपूर जिल्हाला ६५०० कोटी रुपये विकास कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत - 1250 कोटी रुपयांची डीपीसी दिली आहे - एवढी एकसंघ भाजप बघायला मिळाली, एकही कार्यकर्ते घरी बसून राहिला नाही,जबाबदारी वाढली आहे. - ज्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागतो - महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे -नागपूर महानगरपालिकेत उच्चांक गाठला जाईल त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेत आपला अध्यक्ष बसेल
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 22, 2025 10:21:29
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तरुणांनो लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंकचे सेवन करताय खबरदार. लाल एनर्जी ड्रिंकमुळे तरुणांना जडतायत पोटाचे विकार? शरीराला घातक ठरणाऱ्या लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंकची तरुणांमध्ये क्रेझ. बाजारपेठेत अगदी 20 - 30 रुपयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंक पिण्याची तरुणांमध्ये मोठी क्रेझी निर्माण झाली आहे. शरीराला घातक समजल्या जाणाऱ्या या लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंक मधील घातक कन्टेन्टमुळे तरुणांच्या जीवावर उठते की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सहज उपलब्ध होणाऱ्या लाल एनर्जी ड्रिंक वीस ते पस्तीस वयोगटातील तरुणांच्या आकर्षणाचा जीवनावश्यक भाग बनली आहे. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी अगदी किशोरवयीन मुले या लाल एनर्जी ड्रिंक च्या आहारी जात असल्याचं समोर येतंय. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या टपऱ्या, किराणा दुकान, शॉपिंग मॉल अशा अनेक ठिकाणी उपलब्ध असणारी ही वस्तु आहे. अत्यंत सहज रीतीने उपलब्ध होणाऱ्या आणि शरीराला तात्पुरती ऊर्जा देणाऱ्या या लाल एनर्जी ड्रिंक ची युवकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. लाल एनर्जी ड्रिंक चे व्यसन असणारा तरुण हा दिवसभरात किमान 3-4 वेळा तरी पितोच. हे एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर शरीराला खूप आराम मिळतो, स्ट्रेस निघून जातो आणि एनर्जी प्राप्त होते असं काही तरुणांचं मत आहे. आकर्षक दिसणारे आणि चवीला तात्पुरते चांगले लागणारे हे लाल रंगाचे एनर्जी ड्रिंक किती घातक आहे याबद्दल तरुणांना पुसटशी देखील कल्पना नाही. लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंकमुळे स्वादुपिंड, हृदय, पोटाचे विकार वाढल्याचं समोर आलंय इतकंच नव्हे तर लिव्हर डॅमेज होण्याचे प्रकारही तज्ज्ञांच्या उपचारातून निदर्शनास आले आहेत. एनर्जी ड्रिंक मध्ये असलेल्या साखर कॅफिन आणि इतर घटकांमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. यामुळे फॅटी लिव्हर रोगही होऊ शकतो. म्हणजेच जे अल्कोहोल पीत नाहीत त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. त्याने यकृतामध्ये अधिकची चरबी जमा होते आणि यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो. हे लाल रंगाचे एनर्जी ड्रिंक किती घातक आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या तोंडूनच ऐकूयात. किशोरवयीन मुलांसाठी लाल रंगाचे एनर्जी ड्रिंक जीव घेणा ठरते का? याकडे सरकारने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
comment0
Report
Advertisement
Back to top