Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

शिंदे गट की माया मुंडे शेवगाव नगरपरिषद की नगराध्यक्ष बनीं

LBLAILESH BARGAJE
Dec 22, 2025 12:03:39
Pune, Maharashtra
नगरपरिषद निवडणुकीत अनेक लढती लक्षवेधी ठरल्या, त्यातच अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या माया मुंडे या नगराध्यक्ष झाल्यात...विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरूण मुंडे यांच्या त्या पत्नी आहेत...भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी करत विजय मिळवला.. नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर शहरातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचे पहिलं काम करणार असल्याचं माया मुंडे यांनी म्हटलं आहे तर आपण पक्षश्रेष्ठीवर नाराज नसून स्थानिक लोकप्रतिनिधीने आपल्याला उमेदवारी मिळू दिली नाही असं अरुण मुंडे यांनी म्हटलं आहे मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी 121- माया मुंडे, अरूण मुंडे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 13:39:45
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदात झालेल्या मोठ्या विजयानंतर काँग्रेसने शहर मनपासाठी इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या. शहरातील सभागृहात घेण्यात येत असलेल्या मुलाखतीत पक्षनिरीक्षकांसह खा. धानोरकर व विजय वडेट्टीवार यांच्यासह दिग्गज झाले सहभागी झाले. जिंकणे हा उमेदवारीचा निकष आहेच मात्र पक्षकार्य आणि सामाजिक बांधिलकी देखील महत्वाची असेल असे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर शहर मनपात काँग्रेस विचारांची नवी पिढी घडवण्यासाठी आपण कार्यरत असल्याचा विश्वास बडेट्टीवार यांनी बोलून दाखविला. ताज्या विजयानंतर उत्साहीत विजय वडेट्टीवार यांनी मनपा निवडणुकीत विशेष लक्ष घातल्याचे चित्र पुढे आले आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 22, 2025 13:24:31
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 22, 2025 13:24:05
Dhule, Maharashtra:मध्यप्रदेशच्या खंडवा येथील कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्रीच्या मुलाला महाराष्ट्र पोलिसांनी मध्यप्रदेशच्या खंडवा येथून ताब्यात घेतले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांच्या हद्दीतील जंगलात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दीड लाख दिल्यानंतर पाऊस न पडल्याने वाद झाल्यामुळे गोळीबाराची घटना घडली होती. त्या प्रकरणात माजी मंत्री स्वर्गीय हिरालाल सिलावट यांचा मुलगा कॉंग्रेस पक्षाचे माजी युथ काँग्रेस प्रदेश महासचिव यशवंत सिलावट याला अटक करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा दुर्गम भागात मांत्रिक पैशाचा पाऊस पाडतो, असे कर्णोपकर्णी ऐकून गणेश रामदास चौरे (वय ३० रा. बऱ्हाणपूर) व त्याच्या सहकाऱ्यांनी कथित मांत्रिक गुलजारसिंग पारसिंग पावरा (वय ५७) याच्याशी संपर्क साधला होता. शिवाय पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार विधी करून घेणारा गणेश चौरे व सोबत इतरांनी गुलाजारसिंग याला पैसे दिले. ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री जंगलात विधी करण्याचे ठरले. त्यासाठी गुलजारसिंग व त्याचा सहकारी शिवा सीताराम पावरा (वय ३०) हे पळासनेर येथील सातपुडा पर्वत रांगेतील जंगलात आले. त्यांच्यासोबत गणेश चौरे व इतर काही जण होते. विधी पूर्ण झाल्यावर पैशांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे वाद. शिवाय विधीसाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. या वेळी गुलाजरसिंगने केवळ ५० हजार रुपये परत करण्याचे सांगितले. त्यातून वाद विकोपाला गेला. गुलजारसिंग व इतरांना मारहाण करत गोळी झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर जंगलात पसार झाले. गुलजारसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. गोळीबारात गुलजारसिंग पावरा व शिवा पावरा हे जखमी झाले. खासगी रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासह जखमींना रुग्णालयात दाखल केले. संशयितांच्या शोधासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या पथकाने ब्रहाणपूर व खंडवा येथून गणेश चौरे, रतीलाल गणपत तायडे (वय ५०), अंकित अनिल तिवारी (वय २५), विशाल करणसिंग कश्यप (वय ३९) यांना अटक केली होती तर गुलजारसिंग व त्याला मदत करणारा शिवा पावरा यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्याबद्दल दोघांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखलण्यात आला होता. खंडवा येथील काँग्रेस नेते यशवंत सिलावट यांना महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेश येथील खंडवा येथे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात यशवंत सिलावट सहभागी झाले होते. सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानच कोतवाली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटकेनंतर सिलावट यांना खंडवा कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे काही काळ चौकशी केल्यानंतर महाराष्ट्राती धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) या गंभीर गुन्ह्यात केली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 13:16:00
Pandharpur, Maharashtra:अकलूज नगरपालिका के पराभवानंतर माजी आमदार राम सातपुते यांचा मोहिते पाटील आणि आमदार जानकर यांच्यावर पलटवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल घायल हू इसिलिये घातक हू असे धुरंदर मधील डायलॉग म्हणत विरोधकांसाठी इशारा दिला होता. यावर माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिले आहे. अशा प्रवृत्ती समाजासाठी घातकच असतात. दम है कितना तेरे दामन मे देखेंगे असे म्हणत अकलूज नगरपालिका निवडणुकीत 41 टक्के मते घेतली आहेत. 10 हजार मतदारानी भाजपला मतदान केले आहे. एका एका मतासाठी मोहिते पाटील यांना गल्लीबोळात फिरायला भाग पाडले आहे अशी टीका केली. आमदार उत्तम जानकर हे काहीही बोलत आहे. सध्या त्यांच्या उपचार सुरू आहेत. त्यांना गोळ्या सुरू आहेत. आमदार जानकर हे माळशिरस मध्ये एक चेष्टेचा विषय आहेत. म्हणून त्यांची खिल्ली उडवली आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 22, 2025 13:08:28
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचणी सुरू केलीली आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया खुद्द खासदार डॉक्टर शोभा बच्छाव घेत आहेत. निवडणूक प्रभारी म्हणून डॉक्टर दीपक बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या मुलाखतींसाठी पहिल्याच दिवशी 40 पेक्षा अधिक उमेदवारांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने शहरात नवीन जोडलेला ग्रामीण भाग, अल्पसंख्यांक समाज आणि जुने धुळे परिसरातील इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. विकासाच्या अजेंडा वर आपण ही निवडणूक लढणार असून, भाजपाच्या भ्रष्ट शासनाला जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे विजय निश्चितच महाविकास आघाडीचा होईल असा विश्वास डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलेला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 22, 2025 12:15:26
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 22, 2025 11:55:27
Baramati, Maharashtra:जेजुरीत भंडाऱ्यामुळे उडाला भडका.. जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर....भंडाऱ्यातील भेसळ दूर करण्याचे होतेय मागणी. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत काल रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला भंडाऱ्याचा भडका उडाला. या घटनेत तब्बल नवनिर्वाचित दोन नगरसेवकांसह 16 जण भाजले आहेत. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरी मध्ये ऐरणीवर आलाय. जेजुरी नगर परिषदेची मतमोजणी पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जेजुरी परिषदेवरून निर्विवाद सत्ता मिळवली. यानंतर विजयाचा जल्लोष सुरू असतानाच जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असताना अचानक आगीचा भला मोठा भडका उडाला. यात एक-दोन नव्हे तर तब्बल 16 जण भाजले गेले. या आधीच नेमकं कारण हे जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या आठ महिन्या खाली मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी यासंदर्भातील आवाज उठवला होता. जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप करीत या भेसळ रोखावी अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिल होत. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जेजुरीचा खंडेराया अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मोठ्या भक्ती भावना महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी तेच असतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत या ठिकाणी भंडार खोबऱ्याची उधळण केली जाते. जेजुरीत येणाऱ्या भंडाऱ्यात भंडारा निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून भेसळ केली जात असावी अशी शक्यताही वर्तवली जाते. मात्र हा भंडारा नक्की कोठून येतो हे निश्चित नाही. व्यापारी ही यावरी बोलायला तयार नाहीत. ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल तर अन्न व औषध प्रशासन विभागाने याची तपासणी करावी शासन या भेसळयुक्त भंडाऱ्यावर जी कारवाई करेल त्याला श्री मार्तंड देवस्थान पाठबळ देईल असेही मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी म्हटल आहे. याच घटनेवरून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी एक्स हँडल वरती पोस्ट करत म्हटलं आहे की जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजलेाची घटना घडली. यात विजयी उमेदवारांचाही समावेश आहे. घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. दरम्यान,जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापुर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या. परंतु दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे. शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करुन या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
0
comment0
Report
Advertisement
Back to top