Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

चव्हाण पर तंज: प्रताप पाटील चिखलीकर का तीखा जवाब, बीजेपी- कांग्रेस गर्माए

SMSATISH MOHITE
Nov 25, 2025 09:41:56
Nanded, Maharashtra
जिवंत असेपपर्यंत अशोक चव्हाण यांना भाजप कळाली तरी खूप झालं असे खोचक प्रतिउत्तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण यांना दिले. चिखलीकर यांची कन्या प्रणिता चिखलीकर भाजपामध्ये महिला महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यावरून अशोक चव्हाण यांनी काल टीका केली होती. बाप एका पक्षात आणि पोरगी एका पक्षात चालणार नाही असे चव्हाण म्हणाले होते. त्याला आता आमदार चिखलीकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. अशोक चव्हाण यांना कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांच्यावर गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आलीये. मी भाजपमध्ये पाच वर्ष होतो. भाजपमध्ये निर्णय घेण्याची पद्धत फार वेगळी आहे. प्रदेशाध्यक्ष, राज्याचे नेते फडणवीस आणि त्यांची टीम हे पक्षाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे अशोक चव्हाण यांना ते जिवंत असेपर्यंत भाजप कळली तरी खूप झालं असा टोला चिखलीकर यांनी लगावला. चव्हाण त्यांच्या मुलीसाठी चोरून भाजपामध्ये आले की अन्य कारणासाठी आले त्यांनी आगोदर खुलासा करावा. काँग्रेसने त्यांना काय असे कमी केले की ते काँग्रेसला बेईमान होऊन एका भीतीपोटी भाजपामध्ये आले असेही चिखलीकर म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 25, 2025 11:19:30
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 25, 2025 11:06:52
Akola, Maharashtra:नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरत असल्यामुळे अकोल्यातील हिवरखेड येथे आज हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट या तिन्ही नगरपरिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं असून मोदींनी राम मंदिरावर धर्मध्वजा फडकावली आहे. भाषणातून त्यांनी मतदारांना भावनिक साद घालत, “भाजपचा झेंडा लावणे हा उद्देश नसून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आमचं ध्येय आहे,” असे सांगितले. विरोधकांकडून ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप हित आल्याने "जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही,”असा आश्वासन त्यांनी महिलांना दिला. सभेला मोठी गर्दी उपस्थित राहिली असून निवडणूक प्रचाराला यामुळे आणखी वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
79
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 25, 2025 10:50:23
Kalyan, Maharashtra:डोंबिवली मतदार याद्यांतील गोंधळावरून शिंदे सेनेचा आंदोलनाचा इशारा.. आंदोलनाची दखल घेतली नाही तर कोर्टात जाऊ... विकास म्हात्रे. भाजपा नंतर शिवसेना शिंदे गट ही आक्रमक.. डोंबिवलीतील पॅनल २२ मध्ये मतदार याद्यांतील मोठ्या गोंडळाचा मुद्दा भाजपा नंतर शिवसेना शिंदे गटाने देखील मतदार याद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप केल्याने चांगलाच तापला असून शिंदे गटाचे मा. सभापती विकास म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला आहे. सविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून हिरावला जात असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयातही जाणार,असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. त्याच प्रमाणे त्यांनी सांगितले ४,५०० मतांची अदलाबदल झालेली आहे जर निवडून आयोगाने ही दुरुस्ती केली नाही तर यामागे कोणती अदृश्य शक्ती असेल तर ती आम्ही शोधून काढू असा टोला विरोधकांना लगावला आहे. प्रभाग २२ मधील तब्बल साडेचार हजार मतदारांची नावे जाणूनबुजून इतर प्रभागांत हलवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जर सीमावर्ती भागातील नावे हलली असती तर आम्ही मान्य केले असते, पण प्रभागाच्या मध्यभागातील मतदारांची नावेच दुसरीकडे कशी गेली? यात नक्कीच काहीतरी घोळ आहे,असा आरोप म्हात्रेांनी केला.
45
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 25, 2025 10:35:15
Nashik, Maharashtra:बाईट मुद्दे - महानगर पालिका आयुक्तांशी आम्ही तिन्ही आमदारांनी सविस्तर चर्चा केली - mngl ने ज्या लाईन टाकल्या त्याचे काम पूर्ण करून घ्यावे - 1837 किलोमीटर खोदाई करून अद्याप कनेक्शन दिले नाही - आता पालिका डांबरीकरण करणार आहे - नवीन परवानगी देणार नाही म्हणून आयुक्तांनी सांगितले - dlp च्या रस्त्यावर काम करण्यास सांगितले - पालिका त्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ते बुजविले जायचे - शासनाची sop आहे तसा जीआर आहे - 15 ते 20 मुद्दे आहेत - खड्डे बुजवितांना नियम पाळले पाहिजे - तसे काम होतांना दिसत नाही - आयुक्तांना हे सगळं निदर्शनास आणून दिले - कुंभ आयुक्त यांच्याशी चर्चा झाली - जे नवीन रस्ते धरले आहेत त्या सगळ्या लाईन आधीच टाकून घ्या - म्हणजे परत खोदाई होणार नाही - मागील आयुक्तांनी गैरकृत्य केली आहे - mngl चा फंड दुसरीकडे वापरला आहे - त्याची चौकशी झाली पाहिजे - आम्ही शासनाला विनंती करणार - खड्डे बुजविण्यासाठी निधीची मागणी करणार - कुंभ मंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री यांनाही सांगितले आहे - mngl चे अधिकारी येत नसतील आयुक्तांनी अधिकाराचा वापर करावा - मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना तक्रार करावी - गिरीश महाजन साहेब बोलल्या नंतर पावसाळा लांबला - दिवाळीनंतर पाऊस पडत होता - खड्डे बुजविता येत नव्हते - पाऊस पूर्ण गेला आहे - युद्धपातळीवर फिल्डवर जाऊन क्वालिटी काम करून घ्यावे ऑन अतिक्रमण - अतिक्रमण विषय गंभीर आहे - खाजगीकरण केले - अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना वेगळी कामे द्यायला पाहिजे ऑन शिंदे खड्डे अधिकारी इशारा - खड्डे बुजविले नाही तर - अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करू - पाऊस लांबला होता - त्रुटी होत्या - निदर्शनास आणून दिल्या आहेत
111
comment0
Report
SKShubham Koli
Nov 25, 2025 09:51:47
Thane, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यात घंटानाद सुरू झाला. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून मोदी यांच्या हस्ते आज ११:५५ मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यातील मंदिरांमध्ये तसेच काही घराघरात घंटानाद झाला. हा घंटानाद ११:५५ ते १२:१० असा २० मिनिटांचा होता. ठाण्यातील घंटाळी परिसरात असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक घंटाळी मंदिरात घंटानाद करण्यात आला. ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यावतीने ठाण्यातील मंदिर, मठ व्यवस्थापकांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकताच घराघरात तसेच मंदिरांमध्ये घंटानाद करावे. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील मंदिर, मठ तसेच काही घराघरांमध्ये घंटानाद होताना दिसून आले. या ठिकाणी प्राचीन घंटाळी मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, घंटाळी मंदिराचे व्यवस्थापक सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
179
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 25, 2025 09:36:03
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महापालिकने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या बाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडीने दावा केला की निवडणूक आयोग यादी बनवत आहे; भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून अशी यादी बनवली जाते असा आरोप महाविकास आघाडीने केला. अशा याद्या घेऊन आम्ही निवडणुकीला ka सामोरे जाऊं असं म्हणत प्रतिकात्मक याद्या जाळल्या आहेत. निवडणुक विभागाने याद्यामधील त्रुटी दूर कराव्या मगच निवडणुका कराव्यात अशी मागणी महाविकास आघाडीची.
129
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 09:35:37
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग - - नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघड - कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह डॉक्टर अडकले - चाळीसगावचे डॉ. बाळासाहेब पाटील यांच्यावर PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल - चारचाकीत पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं उघड - इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीत १७ मार्च रोजी प्रकार आला होता उघडकीस - सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल GE Healthcare कंपनीही सहआरोपी - पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र नाशिक पोलिसांकडून करण्यात आले होते जप्त - महापालिकेच्या चौकशीत कलम 3, 6, 18, 23, 25, 26, 29 अन्वये गुन्हा सिद्ध - दोषी ठरल्यास डॉक्टरला पाच वर्षांपर्यंत शिक्षा व वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता - आरोपी डॉक्टरांविरोधात पुण्यातही तक्रार दाखल - परवानगीशिवाय यंत्र विक्री व वाहतूक करत गुन्हेगारी केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ बाईट-विजय देवकर, वैद्यकीय अधिकारी...
151
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 25, 2025 08:45:30
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: सावंतवाडी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाषण मुख्य मुद्दे: सवसंतवादी नगरपरिषद निवडणूक महत्वाची असून येथील मतदार ठरविणार की, मत कुठल्या पारड्यात टाकायचे! या सावंतवाडीत दोडामार्ग असेल किंवा अन्य भागातून जवळपास २ लाख लोक या शहरात येतात. याचा सर्व बोजा या शहरावर पडतो. श्रद्धाताई येथून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. येथील प्रत्येक महिलेला रोजगार संधी प्राप्त करून देणार असे श्रद्धाताई यांनी आश्वासन दिले आहे. काही लोकांना विसरण्याची सवय असते. आपल्यासाठी मागे कोणी काय केले, हे ते विसरतात. आपल्या पुढील पिढीचे भविष्य शाश्वत करायचे असल्यास भाजपच्या उमेदवाराला मतदान करा कमळ बटण दाबणे म्हणजे विकासाला मतदान होय. येथील सभांना मुख्यमंत्री येणार होते; पण पुरेसा वेळ नसल्याने शक्य झाले नाही. येथील चारही ठिकाणी भाजपला सत्ता द्या असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असून त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतील. येत्या २ तारखेला भाजपला मतदान करून सावंतवाडीच्या विकासाला साथ द्या ! केवळ आश्वासने न देता आम्ही शाश्वत विकास करणार २ तारखेला होणारे मतदान पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, खासदार नारायण राणे, नितेश राणे आणि श्रद्धाताई यांना करा!
66
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 25, 2025 08:45:15
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: सावंतवाडी भाजपा सभा: पालकमंत्री नितेश राणे भाषण मुख्य मुद्दे: आजचा ट्रेलर भारी आहे; मग ५ वर्षातील पिक्चर काय असेल! पुढे ५ वर्षात श्रद्धाताई काय काम करतील ते पहा! सावंतवाडीचा विकास करायचा असेल तर या पॅनलपेक्षा भारी कोणीही नाही. पुढील ५ वर्षे तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कोणाकडे शमता आहे, ते पाहणे महत्त्वाचे आहे. ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची आहे. सावंतवाडीत दर्जेदार शिक्षण संस्था उभी राहण्यासाठी या घराण्याने पहिले प्रयत्न केले. राजघराणे म्हणून आपण आपल्या जनतेसाठी काय करू शकतो, याचा विचार त्यावेळी राजघराण्याने केला. ज्या लोकांनी आपल्यासाठी केले, त्यांच्या पाठीशी म्हणून आम्ही उभे राहणार ! मात्र, येथील काहींच्या मनात ही भावना निर्माण झाली नाही? या घराण्याने आजवर सावंतवाडी शहराला भरपूर दिले. म्हणून त्यांना मतदान करणे योग्य राजघराणे संपले!, असा शब्द वापरतात. त्यावेळी हा शब्द वापरता? राजकारण ३ तारखेपर्यंत आहे. पण हे राजघराणे वर्षानुवर्षे राहील केवळ अपमान करण्यासाठी या निवडणूक लढवायच्या. मला वाटले केसरकर साहेब प्रथम राजघराण्याला पाठिंबा देतील. नेहमीच राजघराणे म्हणतात. मग आता काय झाले? केसरकर यांना श्रद्धाताई मुलीसारखे आहेत. मग केसरकर यांनी असे काय केले? केसरकर यांनी उमेदवार उभा केला तरी त्यांचा गुपचूप पाठिंबा श्रद्धाताईंना होय ये अंदर की बात है, दिपकभाई हमारे साथ है! ही निवडणूक राजकारण्यांची नाही, ती येथील नागरिकांची आहे. आता तुमचे कर्तव्य २ तारखेला, आता सातबारा, मोती तलाव विकणे नंतर बघू! २ तारखेला आशीर्वाद द्या आणि ३ तारखेला काम सुरू आज राज्यात आणि केंद्रात आम्ही आहोत. मुख्यमंत्री, चव्हाण साहेब, मी आहे! विशाल आहे! काल कणकवलीत उदय सामंत आले. काल ते म्हणाले की, आम्हाला निवडून द्या, आम्ही निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ! थेट या ना! डायरेक्ट पालकमंत्र्यांना मत टाका ना! सगळे तुम्ही निश्चिंत रहा! २ तारखेला आम्हाला संदेश द्या! कमळसमोर बटण दाबा! आम्ही तुमच्या सोबत आहोत. येथील उप रुग्णालयात चांगली आरोग्य सेवा देऊ! मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल साठी प्रयत्न करणार जे आय लव सावंतवाडी बोलतात त्यांनी त्यांना सांगा की, सावंतवाडी राजघराण्याच्या बाबतीत आता बोलायचे नाही!
160
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 25, 2025 08:06:36
Kolhapur, Maharashtra:राज्यात नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल असं सर्वांनाच अपेक्षित होता. पण अनेक नगरपंचायतीमध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या पक्षांमध्येच थेट लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नगरपंचायतीमध्ये अशीच लढत पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी महायुती विरोधात महायुती यांच्यामध्ये प्रमुख लढत बहुतेक ठिकाणी महायुती मधील पक्षच एकमेकांच्या विरोधात. महायुती मधील घटक पक्षांमध्ये थेट लढत होत असल्याने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला फायदा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने महायुती म्हणून एकत्रित निवडणूक न लढवण्याचा निर्णय महायुतीच्याच पथ्यावर ?
167
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 25, 2025 08:05:46
Kolhapur, Maharashtra:राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे मुद्दे कोल्हापुरात 13 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महायुती कडून भाजप 4, जनसुराज्य 4, ताराराणी आघाडी 2, तर एक ठिकाणी भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हवर निवडणूक लढवत आहे 13 पैकी 11 ठिकाणी हि निवडणूक लढवत आहोत नगरपालिका, नगरपंचायतच्या 263 पैकी 87 ठिकाणी भाजप, 41 ताराराणी, 42 जनसुराज्य, तर 12 ठिकाणी जनसंघर्ष आघाडी निवडणूक लढवत आहे *ऑन महायुती लढत* सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी माझा पाठपुरावा सुरु आहे बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत, जिथं आघाडी झाली तिथे आमचेच लोक कोल्हापुरात 13 ठिकाणी महायुतीची सत्ता येईल, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल महाविकास आघाडीचा प्रभाव कमी झालेला आहे *ऑन प्रभाग रचना* प्रभाग रचनेमुळे मतदार यादीमध्ये गडबड झाली आहे, त्यामुळे उमेदवाराला फटका बसू शकतो त्यामुळे हे दुरुस्त झाले पाहिजे, पक्षाची जबाबदारी म्हणून आम्ही देखील घेतली आहे *ऑन महायुती एकत्र* वरिष्ठच्या सूचनेनुसार आम्ही लढत आहोत, पण कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी नेत्यांना काही भूमिका घ्यावी लागते निवडणुकनंतर सर्वजण एकत्र्क फिरताना दिसतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील जे काही बोललेेत ते रास्त आहे अर्थमंत्री पवार असल्याने तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत, मुख्यमंत्री भाजपचे असल्याने दादा देखील बोलले असतील दोघेही त्यांच्याठिकाणी योग्य आहेत *ऑन कागल समरजित घाटगे* कागल चा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे भाजपचे एकही उमेदवार स्वतंत्र उभा राहता कामा नये याची खबरदारी घ्या अशा सूचना त्यांच्याकडून आल्या होत्या वरिष्ठांचा आदेश आम्हाला मानावा लागतो भविष्यातील काही गोष्टींचा विचार करूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा कदाचित समरजीत घाटगे हे भाजपमध्ये येणार असतील, यावेत यामुळे हा मोठा निर्णय घेतला असावा मात्र नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी देऊ *On सभा* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी चंदगड मध्ये सभा येत्या दोन दिवसात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सभा घेणार आहेत मंत्री पंकजाताई मुंडे या देखील प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत
84
comment0
Report
Advertisement
Back to top