Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

आंचल मामीलवार- सक्षम ताटे केस: आत्मदहन के प्रयास के बाद पुलिस कार्रवाई की मांग तेज

SMSATISH MOHITE
Dec 24, 2025 13:40:55
Nanded, Maharashtra
राज्यभर गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आज उसकी प्रेमिका आंचल मामीलवार और मयत सक्षम के माता ने जिल्हाधिकारी कार्यालय के सामने अंग पर पेट्रोल डालकर आत्मदहन का प्रयास किया. वहाँ उपस्थित पुलिस कर्मियों ने उन्हें रोक लिया. इस दौरान आंचल मामीलवार और सक्षम ताटे के परिवार के साथ पुलिस की धक्का‑मुक्की हुई. आंतरजातीय प्रेम प्रसंग से 27 नवंबर को नांदेड़ शहर के जुनागंज भाग में सक्षम ताटे युवक की हत्या की गई थी. आचल मामीलवार के पिता और भाई ने साथियों के साथ सक्षम की हत्या की थी. इस मामले के सभी आरोपी पहले ही गिरफ्तार हैं. लेकिन घटना के दिन इतवारा थाने के पुलिस कर्मी मोहिदासरवाड और धीरज कोमूलवाड ने आचल के अल्पवयीन भाई को सक्षम की हत्या के लिये प्रवृत्त किया ऐसा आरोप है. इन दोनों के विरुद्ध कारवाई की मांग को लेकर आंचल मामीलवार और सक्षम ताटे के परिवार ने वरिष्ठ अधिकारियों को ज्ञापन देकर मांग की थी. आत्मज्ञान का इशारा भी दिया गया था. लेकिन कार्रवाई नहीं हुई, इसलिए आज आंचल मामीलवार और सक्षम ताटे की माँ ने जिल्हाधिकारी कार्यालय के सामने आत्मदहन का प्रयास किया. अगर आज भी कारवाई नहीं हुई तो हम अपना जीवन समाप्त करेंगे, ऐसा इशारा दोनों ने दिया.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 24, 2025 13:39:04
Kolhapur, Maharashtra:नागपूर–रत्नागिरी महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंकली ते चोकाक दरम्यान भूसंपादनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या महामार्गासाठी भूसंपादन होणाऱ्या जमिनीसाठी शासनाने चौपट मोबदला देण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला है. या आधी दुप्पट दराने मोबदला दिला असता एकूण खर्च सुमारे 94 कोटी रुपये झाला असता. मात्र चौपट दराने मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याने हा खर्च 171 कोटी रुपये इतका होणार आहे. त्यामुळे 937 शेतकऱ्यांना एकूण 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा या निर्णयामुळे होणार आहे. अनेक वर्षांपासून योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबवले होते. त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची भूमिका मांडल्यानंतर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात आला आणि जीआर निघाला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 24, 2025 13:38:44
Navi Mumbai, Maharashtra:अत्याधुनिक ग्रीनफिल্ড विमानतळ म्हणून नावजले गेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीवर उद्या 25 डिसेंबर रोजी पहिलं प्रवासी विमान उतरणार आहे. सकाळी 8 वाजता इंडिगोचे 6 E 460 हे विमान बंगळूरू येथून दाखल होणार आहे. यानंतर सकाळी 8.40 वाजता इंडिगोचेच 6 E 882 हे विमान हैदराबादकडे रवाना होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारं हे पहिलं विमान असणार आहे. यासोबतच मालवाहतूक सेवा (कार्गो) ही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज सिडको भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या दिवशी 30 विमानं ची आवाक जावक होणार आहे। दिवसभरात 4 हजार प्रवासी वाहतूक राहणार आहे. तर 15 जानेवारी पर्यंत हा आकडा वाढत दररोज 48 विमान उड्डाण करणार आहेत. या विमानतळावरून दरवर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील. सध्या केवळ देशांतर्गत असलेली ही विमानसेवा मार्च महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आह. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका यामुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे विमानतळ सर्व मार्गांनी जोडले जाणार आहे. हा मार्ग चिरले इथं पोहोचून विमानतळाकडे जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. गुगल मॅपमध्येही याबाबत माहिती देण्यात आली असल्याचंही सिंघल यांनी सांगितलं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 24, 2025 13:18:10
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 24, 2025 12:53:17
Parbhani, Maharashtra:अँकर परभणी वसमत महामार्गावरील पूर्णा नदीवर पात्रावर असलेल्या राहाटीच्या पुलावरून एका मातेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. आत्महत्येचा प्रयत्न ही महिला आपल्या सोबत एक तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा घेऊन परभणी वसमत महामार्गावरील राहाटीच्या पुलावर मुलांसह आत्महत्या करण्याच्या उद्यष्याने पोहोचली, पण लहान मूल बघून तिला त्यांना पाण्यात टाकू वाटलं नसल्याने सदर महिलेने पुलावरून भरलेल्या पाण्याच्या पात्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केल्याचं प्रत्यक्षदर्शी कडून सांगितलं जातं आहे, पण यावेळी वसमत तालुक्यातील बळेगाव येथून मिस्त्री काम आटोपून परभणीकडे घरी जात असलेल्या तीन तरुणांनी हा प्रकार बघताच पाण्यात उतरून या महिलेचे प्राण वाचविलेत, त्यामुळे त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे. सदर महिला ही परभणीच्या धसाडी या गावातील असल्याचे समजते, पाण्यातून बाहेर काढल्या नंतर नागरिकांनी शेकोटी करून त्यांना गरम ऊब देण्याचा प्रयत्न केलाय, सदर महिला कोणाला बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांचं नाव मात्र अद्याप समजू शकले नाहीये, त्यामुळे सदर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलाय हे मात्र समजू शकले नाहीये, मोहम्मद असिफ, शेख अस्लम आणि शेख फरीद असे महिलेचे प्राण वाचविणार्या तरुणांचे नाव आहेत.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 24, 2025 12:50:21
Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिकेत युती नक्कीच होणार आहे. या संदर्भातली बैठक आमच्या वरिष्ठान सोबत झालेली आहे. नजीकच्या काळात युती संदर्भातली जी काही घोषणा आहे ती लवकरच केली जाईल. ठाणे महानगरपालिका मध्ये जो युतीचा फॉर्मुला ठरला आहे ते एकमेव हेच आहे. ते युतीचा महापौर बसवणं त्यासाठी आमच्या युतीमध्ये 100 पेक्षा जास्त जागा वर नगरसेवक निवडून आणणं हा फॉर्मुला एकत्रित ठरलेला आहे. आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं हे लोक एकत्र होते. त्यांची आपापसा मधील जे काही युती होती. नगरपालिका च्या निवडणुकीमध्ये युती असतानाही. भरभरून भारतीय जनता पार्टीला आणि युतीला हे मतदान केलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे. महाराष्ट्र मध्ये जो विकास चालू आहे जो विकासाला जे काही प्रगती भेटली आहे. मुळात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भेटल आहे. ते सातत्याने काम करत आहेत. राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी लोकांनी विश्वास ठेवून नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतदान दिलेला आहे. राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष हे भारतीय जनता पार्टी आहे. त्याच पद्धतीचा निकाल महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसेल. या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यासोबत युतीचे देखील नगरसेवक निवडून येतील हे मला विश्वास आहे. शंभर पेक्षा जास्त नगरसेवक हे युतीचाच महापौर असेल. ते कुठेतरी स्वप्नांच्या नंदनवनात फिरताहेत. या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शंभर पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येणार आहे. निश्चितपणे महापौर ही महायुतीचा बसणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 24, 2025 12:31:38
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील तुमरकोटी हे गाव आजही विजेविना अंधारात चाचपडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच प्रशासकीय अनास्थेचा कळस पाहायला मिळत असून, वीज नसतानाही हातात पडणाऱ्या बिलांमुळे येथील आदिवासी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या तुमरकोटी गावाचा संघर्ष मोठा आहे. ४५ उंबरे आणि २०० लोकसंख्या असलेल्या या गावात विद्युत खांब उभे राहिले आहेत. महावितरणने घराघरांत मीटरही बसवले आहेत. मात्र, अद्याप या उपकरणांतून वीज प्रवाहित झालेली नाही. जर ऊन नसेल, तर या दुर्गम भागातील नागरिकांचा संपर्क जगाशी पूर्णपणे तुटतो. गावातील तरुणांच्या हाती मोबाईल आहेत, पण ते चार्ज करायचे कुठे? हा मोठा प्रश्न आहे. गावातील लोक घरावरील छोट्या सोलर प्लेट्स किंवा बॅटरीवर मोबाईल चार्ज करण्याचा प्रयत्न करतात. या गावाला सुरक्षा हेतु नवीन पोलीस स्टेशन स्थापन झाले आहे. महावितरण विभागाची यंत्रणा सक्रिय झाली असली तरीही गावाचा अंधार दूर करण्यास आणखी प्रयत्नांची गरज आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 24, 2025 11:49:44
Ambernath, Maharashtra:बदलापुरात भरदिवसा गर्दुल्ल्यांचा राडा एरंजाडजवळच्या कृष्णधाम सोसायटी परिसरात जोरदार हाणामारी हाणामारीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचे धिंडवडे याठिकाणी चार ते पाच गर्दुल्ले नेहमीच गोंधळ घालतात आणि हाणामारीचे प्रकार घडतात असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. काल याच ठिकाणी पुन्हा एकदा गर्दुल्यांनी हाणामारी केली. त्यानंतर पोलिसांनी या गदुल्यांना ताब्यात घेतलंय. मात्र पोलीस आरोपींवर कडक कारवाई करत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सततच्या या हाणामारीच्या घटनांमुळे बदलापूर पोलिसांचा गुन्हेगारांना धाकच राहिला नाही का? असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 24, 2025 11:49:09
Pandharpur, Maharashtra:नवीन वर्षामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पूजा करण्यासाठी भाविकांना आता 26 डिसेंबरपासून ऑनलाईन पूजांचे नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पूजा पाद्य पूजा तुळशी अर्जुन पूजा महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात एक जानेवारी 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील पूजेची ऑनलाईन नोंदणी होती 26 डिसेंबर पासून मंदिर समितीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. यासाठीचे सर्व माहिती या संख्येत स्थळावर उपलब्ध आहे
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 24, 2025 11:48:41
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 24, 2025 11:35:30
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 24, 2025 11:09:12
Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे १ जानेवारी अनुषंगाने जयस्तंभ परिसराचा आढावा,अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची भेट ANC… १ जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कायदा व सुव्यवस्था अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्या आज जयस्तंभ परिसरास भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या सुरक्षाव्यवस्था, नियोजन व प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जयस्तंभ परिसर, येण्या-जाण्याचे मार्ग, अनुयायांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा तसेच संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 24, 2025 10:27:06
Thane, Maharashtra:एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जगवाटपाबाबत बिघाडी पाहायला मिळत असताना ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आव्हाडांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कळव्यातील पारसिकनगर प्रभागातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून अभिजीत पवार आणि पूजा शिंदे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठे शक्तिप्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. आव्हाडांच्या कळवा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या नगरसेवकांची संख्या मोठी असतानाही मागच्या काळात अनेक माजी नगरसेवकांनी जितेंद्र आव्हाडांच्या साथी सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कळव्यात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का सहन करावा लागला होता. मात्र आता पुन्हा आव्हाडांची महापालिका निवडणुकीसाठी चांगली कंबर कसलेली पाहायला मिळते. त्यामुळे या निवडणूक प्रचारात जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यात केलेला विकास हाच आमच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे. तसेच आव्हाड यांच्या जो जो誰 साथ सोडली त्यांना त्यांची जागा दाखवन hाच आमचा अजेंडा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 24, 2025 10:26:00
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया; दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अँकर:– अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळातून मातीमिश्रित पाणी येत असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. पाणी उकळूनही रंग-वास जात नसल्याने नागरिक पाणी पिण्यास नकार देत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठांना आजारांचा धोका वाढला असून पाणीपट्टी भरूनही शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान जलशुद्धीकरण केंद्र व पाईपलाईन देखभालिकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून तात्काळ उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top