Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में जायकवाडी पाइपलाइन टूटने से शहर को दो दिन पानी नहीं मिलेगा

NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 02:17:54
Jalna, Maharashtra
जालना : जायकवाडीची पाईपलाईन निसटली, शहरात दोन दिवस निर्जळी अँकर : जालना शहराला जायकवाडी येथील धरणातून पाणीपुरवठा होतो. दरम्यान, पैठण रोडवरील 900 एमएम पाइपलाईन निसटल्याने पाणी वितरण थांबवावं लागलं आहे. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 03:30  वाजता ही पाइपलाईन निसटली. यामुळे जालन्याला होणारं पाणी वितरण बंद झाले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे जालना शहराला दोन दिवस पाणी येणार नाही. दुरुस्ती झाल्यानंतर बुधवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
143
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Nov 18, 2025 03:49:46
Pune, Maharashtra:पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष जायदा राजू शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे... त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच, त्यांनी आपला राजीनामा दिला... त्यामुळे पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीनंतर पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे... खासदार लंके यांनी पारनेर नगरपंचायतीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी भाकरी फिरवली आहे... नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळताना शिवसेनेच्या जायदा शेख यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिली होती. नगराध्यक्ष नितीन आडसूळ यांनी ठरल्यानुसार,आपल्या पदाचा राजीनामा दिला...त्यानंतर,शेख यांनीही उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे...त्यानुसार उपनगराध्यक्षपदाच्या पदासाठी आघाडीतील 11 नगरसेवकांपैकी कुणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 18, 2025 03:49:30
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 18, 2025 03:49:01
Bhandara, Maharashtra:डिएमओच्या लेखी आश्वासनानुसार आत्मदहन रद्द... बोनस न मिळाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांत संताप... आत्मदहन करण्यासाठी जाणाऱ्या २४ शेतकऱ्यांना लाखांदूर पोलिसांनी स्थानाबद्ध केले. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेकडो धान उत्पादन शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेली खरीप हंगामातील हेक्टरी २० हजार रुपयांची बोनस रक्कम अद्याप न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आत्मदहन करण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना लाखांदूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. अखेर भंडारा जिल्ह्याचे जिल्हा पोषण अधिकारी संभाजी चंद्रे यांच्या प्रमुखतेखाली लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार व ठाणेदार सचिन पवार यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर डीएमओच्या लेखी आश्वासनानंतर आत्मदहन रद्द करण्यात आला.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 18, 2025 03:46:26
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 03:31:45
Dhule, Maharashtra:धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात तापमानाचा पारा 6.2°C नोंदवला गेलेला आहे. कमी होणाऱ्या तापमानामुळे कळाक्याची थंडी वाढलेली आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शाळांची वेळ बदलण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेला आहे. कळक्याच्या थंडीमध्ये मुलांना शाळेत यावं लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर वर्दळ कमी झालेली आहे. रात्री घराबाहेर पडणं कठीण झालेला आहे. शीतलहरीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. येणारे काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी.
23
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 18, 2025 03:16:22
Amravati, Maharashtra:मेळघाटात बालमृत्यू का तांडव शुरूच; 24 तासात चार बालकांचा व एका मातेचा मृत्यू. धारणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत चार बालकांचा व एका मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू तर रविवारी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. नर्मदा नारायण चीलात्रे सालाईबर्डी या महिलेला शनिवारी दुपारी दोन वाजता प्रसूतीसाठी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सिझरियन करताना या मातेचा व पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे. धुळघाट रेल्वे येथील कविता श्रीराम धांडे या महिलेच्या जुळ्या बाळांचा मृत्यू. कविता हिला धुळघाट वरून ॲम्बुलन्स मध्ये आणताना एका बाळाचा ॲम्बुलन्स मध्ये तर दुसऱ्या बाळाचा धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर जन्म झाला. मात्र प्रसुती नॉर्मल झाल्यावर दोन्ही जुळे मुले हे धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. धांडे यांच्या दोन्ही बालकांचा दोन तासाच्या फरकाने मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रीराम धांडे यांनी केला. बैरागढ येथील saba तनवीर मोहम्मद नदीम या महिलेला बाळाचा मृत्यू झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बालमृत्यू बाबत ताशेरे ओढले असले तरीही अजूनही आरोग्य यंत्रणा सुधारत नसल्याचा चित्र आहे. धारणीत वीस वर्षानंतर ही रुग्णालयात अपुऱ्या सोयी आणि सुविधा व डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या 40 जागा रिक्त असल्याचे भयाण वास्तव आहे.
118
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 03:16:04
133
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 18, 2025 03:02:58
Thane, Maharashtra:सोनाळे ग्रामपंचायतीवर आदिवासींचा मोर्चा... विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन... ॲंकर... सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी वस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत आदिवासी संघटनेने ग्रामपंचायत प्रशासनाला सविस्तर निवेदन سादर केले आहे, ज्यामध्ये मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कामगार संघटना - महाराष्ट्राने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतमधील आदिवासी वस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर केले. संघटनेने म्हटले आहे की सोनाळे, बैरपाडा, इंदळे पाडा, शिवराळ पाडा आणि इतर आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत, ज्यामुळे स्थानिक समुदायाला प्रचंड त्रास होत आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की सरकार आणि प्रशासनाला वारंवार विनंती करूनही समस्या कायम आहेत. आदिवासी समुदाय रस्ते, पाणी, शौचालये, वीज, पथदिवे, योग्य निवासस्थाने आणि सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित आहे. याचिकेत उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे १. गाव आणि घरपट्टी मंजूरी अनेक आदिवासी वाड्यांसाठी घरपट्टीची कागदपत्रे अद्याप नियमित केलेली नाहीत, ज्यामुळे रहिवासी सरकारी योजनांपासून वंचित आहेत. संघटनेने तातडीने मंजुरीची मागणी केली. २. शौचालय सुविधा अनेक घरांमध्ये शौचालये नाहीत किंवा अपूर्ण आहेत. "स्वच्छ भारत अभियान" अंतर्गत प्रत्येक घरात शौचालये उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. ३. पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक आदिवासी वाड्यांमध्ये अजूनही स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. जुन्या पाणीपुरवठा प्रकल्पांची दुरुस्ती आणि नवीन पाणी प्रकल्पांची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. ४. रस्त्यांची सुविधा बहुतेक वाड्यांकडे जाणारे रस्ते अत्यंत वाईट स्थितीत आहेत. पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. संघटनेने तातडीने रस्ते दुरुस्ती आणि नवीन रस्ते बांधण्याची मागणी केली. ५. वीज आणि इतर आवश्यक सुविधा अनेक घरांमध्ये वीज नाही, पथदिव्यांची तीव्र कमतरता आहे आणि आरोग्यसेवा आणि सांडपाणी व्यवस्था देखील उपलब्ध नाही. या सर्व सुविधांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनेचा इशारा श्रमजीवी संघटनेने स्पष्टपणे सांगितले की, जर ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरच निर्णय घेतला नाही आणि काम सुरू केले नाही तर आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठी मोठे आंदोलन उभारले जाईल. या विनंतीवर प्रदीप चौधरी (अध्यक्ष, भिवंडी शहर तहसील), तानाजी बडसांगे (सचिव), गौतम पाटील (खतवण गट अध्यक्ष) आणि गणेश साप्ते (खतवण गट सचिव) यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्य केल्या आहेत. संघटनेने आशा व्यक्त केली की प्रशासन आदिवासी समुदायाचे राहणीमान सुधारण्यासाठी या मूलभूत समस्यांवर त्वरित लक्ष देईल.
135
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 03:02:31
Dhule, Maharashtra:धुळ्यात कडाक्याच्या थंडीचा चोरही लाभ घेत आहेत. धुळे शहरात सध्या कडाक्याची थंडी पडलेली असताना, धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात जवळ अवघ्या शंभर फुटावरती हनुमान मंदिरामध्ये जबरी चोरी झालेली आहे. शहरातील सर्वात जुना ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरातून सात लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरात मध्यरात्री चोरी झाली असून, या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हनुमानाचा डोक्यावर असलेल्या 22 ग्रॅम सोन्याचा टिळक चांदीची छत्री त्याचबरोबर दानपेटी चोरट्यांनी लंपास केले. तब्बल सहा ते सात लाख रुपयाची चोरी असून, वाढलेल्या थंडीचा चोरट्यांनी फायदा घेतल्याच बोललो जात आहे. पहाटे मंदिराचे पुजारी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. धुळे शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथक हे मंदिरात दाखल झाला असून चोरांचा सिद्ध सुरु झाला आहे. मंदिरा सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचा काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
169
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 18, 2025 02:33:56
Beed, Maharashtra:बीड: पवनचक्की कंपनीकडून मनमानी, वहिती शेतात खड्डे खोदून पोल रोवले, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध...! बीडच्या चाकरवाडी शिवारात पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही विचारणा न करता उभ्या पिकात विद्युत पोल उभारण्यासाठी ऐन मधोमध दहा फुटांचे खड्डे करण्यात आलेत. शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे शेतकरी दहशतीत आहेत. याच पवनचक्की प्रकल्पाच्या प्रकरणावरून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले होते. मात्र आजही परिसरात परिस्थिती जैसे थेच आहे. पवनचक्की प्रकल्प कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा अशी याचना इथले शेतकरी करत आहेत. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असताना इतर पिकं शेतकऱ्यांकडून जोपासली जात आहेत. मात्र या पिकांचा कोणताही विचार न करता पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय. दरम्यान या प्रकाराबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिलाय तर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय
179
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 02:33:36
110
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 18, 2025 02:33:19
Nashik, Maharashtra:गोळीबारप्रकरणी लोंढेच्या दोघा साथीदारांना अटक नाशिक शहरातील सातपूरजवळच्या एका पबमध्ये खंडणी वसुलीसाठी पी. एल. टोळीने गोळीबार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या पुण्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे मानला जाणारा अट्टल गुन्हेगार मिळतात साळवे यांना पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून अटक केली....त्याचा दुसरा मित्र राहुल गायकवाड यालाही घेण्यात आले आहे...गोळीबारानंतर हे दोघेही राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत भटकंती करत होते...सातपूर येथील पबमधील गोळीबार प्रकरणात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संशयित प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक लोंढे व दहा ते बारा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार सराईत भूषण लोंढे हा अद्याप फरार असून, त्याचा माग काढला जात आहे...
138
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:33:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ नगर परिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणूक मैदानात महायुतीला तडे गेले. सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. १६० जागांसाठी तब्बल १३१२ उमेदवार मैदानात उतरले असून यातील कितीजण माघार घेतील आणि किती मैदानात कायम राहतील हे २१ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. ७ न.प.मध्ये १६० नगरसेवक आणि ७ नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. नगरसेवकपदासाठी पैठणमध्ये सर्वाधिक २९० उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी सिल्लोडमध्ये सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीन पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहेत. उद्धवसेनेने सिल्लोड, गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि कन्नडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसला वैजापूर आणि खुलताबादचे नगराध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती दिली.
185
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:31:35
170
comment0
Report
Advertisement
Back to top