Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

भोकरदन बस स्टेशन पर सुरक्षा रक्षक की मारहाण से 60 वर्षीय वृद्ध की मौत

NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 12:06:46
Jalna, Maharashtra
जालना : सुरक्षा रक्षकाकडून 60 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; मध्यरात्री गुन्हा दाखल, भोकरदन बस स्थानकावरील घटना अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बसस्थानकामध्ये सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीत 60 वर्षीय मजीद खा अन्वर खा या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. मजीद खा लघुशंकेसाठी जात असताना सुरक्षा रक्षक सुरेश वनारसे याला संशय आला. त्याने कोणतीही चौकशी न करता लाठीने वृद्धाला बेदम मारहाण केली.यानंतर गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.या घटनेची माहिती पोलिसांना रात्री उशिरा मिळाली, त्यानंतर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र उपचारादरम्यान पहाटे मजीद खा यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक आणि नातेवाईकांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 14:01:17
Nashik, Maharashtra:नाशिक - गिरीश महाजन, मंत्री बाईट मुद्दे ऑन रस्ता पाहणी - आज नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली - गेल्या वर्षी रुंदीकरण होऊ शकले नाही - मोठी ट्राफिक या रस्त्यावर होते आहे - नॅशनल हायवेच्या नुसार 50 मीटर मोकळा करायचा आहे - नियमानुसार काढली पाहिजे - गावकरी आग्रह करत आहे - घरं आहे, दुकान आहे - वाहनांची संख्या वाढली आहे - कुंभ दीड वर्षावर आला आहे - 50 मीटर रस्ता मोजला त्यानुसार अनेक घरं काढावी लागणार है - 25 ते 30 मीटर पर्यंत घ्या अशी त्यांची मागणी - आचारसंहिता लागली आहे - किती पदरी रस्ता करावा असा प्रश्न आहे - मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलणार आहे - उद्या याबाबत निर्णय होईल - सुवर्णमध्य काढू - लोकांना त्रास होणार नाही - मोबदला देण्याबाबत आश्वासित केले आहे - कुंभात ट्रॅफिक होईल - नियम पण आहे - सुवर्णमध्य काढला जाईल - उद्या निर्णय होईल ऑन कुंभ कामे - आचारसंहिता लागली आहे - नियम पाहुन करू - मुख्यमंत्री तारीख देतील - खड्डे बुजवायचे काम सुरू - नवीन टेंडर काढले आहे - रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार - तोडगा काढला आहे - मुख्यमंत्री सांगितले आहे ऑन अंबादास दानवे आरोप - अतिशय हास्यास्पद आहे - इथं असलेले सगळे नगरसेवक निकटवर्तीय आहे - पण ते स्टेटमेंट हास्यास्पद - कोणत्याही आमदाराची सुपारी दिली नाही - कुठल्याही नगरसेवकाने केलं नाही - काहीही स्टेटमेंट करतात - त्यांनी पुरावे द्यावे - कुठलीही तक्रार नाही - हवेत गोळीबार करतात - संभ्रम पसरविला तरी काहिही उपयोग होणार नाही - वोटचोरी वरूनही नकाहीही होणार नाही ऑन महायुती - आम्ही युतीत लढणार - फार काही ठिकाणी टोकाचे मतभेद असेल तर मैत्रीपूर्ण लढू ऑन शरद पवार युती - एकटे लढले तर सुफड साफ होईल - म्हणून कोणाबरोबर युती करतील ऑन उद्धव ठाकरे दौरा - कोरोना काळात बाहेर पडले नाही - आता सगळं झाल्यावर बाहेर पडले - मोठा पाऊस झाला तेव्हा आम्ही सगळे तिथं होतो - पुटना मावशीचे प्रेम ऑन दुबार नोंदनी - मुद्दाम सुरू आहे - गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे - ट्रम्प चे नाव टाकायचे काय काम - यादीत नाव टाकायचे काम भाजप करत नाही - जपानच्या रशिया, ब्राझील च्या बाबत नाव टाकायचे काम ते करतात - मुस्लिम भागातील नाव का सांगत नाही - भामरे साहेब 3 हजार मतांनी पडले - 50 हजाराच्या वर दुब्लिकेट नवे आहे - जाधव पाटील चौधरी यांचे नाव सांगायचे - विधानसभेला पडले म्हणून बोलत आहे ऑन साटम दावा - ठराविक लोकांवर बोलत आहे - भाजपचा संबंध नाही - नावात चूक आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे - इलेक्शन कमिशनचे काम आहे - रडत बसू नका - पराभव दिसत आहे म्हणून बोंबलत आहे ऑन कॉल सेंटर कारवाई - चर्चा आहे - कोणी करत असेल तर कारवाई होईल ऑन शेतकरी आत्महत्या - पिकांवर बुरशी आली - द्राक्ष आले नाही - शासन मदत करेल - उत्पन्न गेले आहे - नुकसान होईल त्यास शासन मदत करेल
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 05, 2025 13:59:35
Pandharpur, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोहिते पाटील यांच्या ताब्यातील तीन सहकारी संस्था मधील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्याचे सहकार आणि पणन प्रधान सचिवांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश माळशिरस तालुक्यातील भाजप मंडल उपाध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जयसिंह मोहिते पाटील चेअरमन असलेल्या सुमित्रा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे दाखवून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.याबात मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिलेआहेत. तसेच शंकर सहकारी साखर कारखान्यातील ऊस उत्पादक शेतकरी सामान्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या चौकशीचे मागणी सुद्धा केली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही पालवे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकार आणि पणन सचिवांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूम्यावर मोहिते पाटलांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 05, 2025 13:58:39
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकींग - हर्षवर्धन सपकाळ ऑन व्होट चोरी / मनसे आघाडी (राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स) राहुल गांधी यांनी आरोप केला नसून पुरावे दिलेय... निवडणूक आयोगाचा दस नंबरी कारभार आहे, तो स्पष्ट करण्यासाठी ज्याचं नाव जितक्यांदा आहे तितक्यादा मतदार यादीत स्टार लावावे निवडणूक आयोगासमोर एव्हडा मोठा दस्तऐवज ठेवल्यानंतरही निवडणूक आयोग झोपेतून जागं होत नाही आता पुरावे द्या, पुरावे द्या आता पुरावे दिले तर त्यावर बोलत नाही, निवडणूक आयोग दबावात काम करत आहे, मतदार यादीत फार मोठा तांत्रिक घोटाळा आहे... मनसे न कोणत्याही प्रकारचा आघाडीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे दिला नाही, त्यामुळं आघाडीचा प्रश्नच उदभवत नाही मनसेच्या आघाडी संदर्भात राहुल गांधींना प्रस्ताव देण्याचा प्रश्नच उदभवत नाही टिळक भवनात संघटनात्मक चर्चा झाली, युती, आघाडीची कोणत्याही प्रकारे चर्चा झाली नाही... स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांना देण्यात आलीय शेतकऱ्यांची फसवणूक फडणवीस सरकारने केली आहे, या दरम्यान पॅकेज जाहीर केलं पण लिकेजस किती आहे बघितलं नाही बच्चू कडूना दिलेलं आश्वासन फोल ठरू नये, त्यांना कर्जमाफी मिळावी हिच अपेक्षा आहे...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 05, 2025 13:32:05
Dharashiv, Maharashtra:धाराशिव अतिवृष्टीतील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी धाराशिवच्या परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे पाहाणी धाराशिव – अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेती, रस्ते, सार्वजनिक तसेच वैयक्तिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखालील हे पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, आज परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला असून, शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 13:27:19
Jalna, Maharashtra:या फूटेजमध्ये मयत तरुणाचे व्हिडीओ आणि फोटो आहे तसेच त्याच्या काकांचा एक बाईट आहे\n\nजालना : ब्रेकिंग\n\nछत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन वरील पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या तरुणाची आत्महत्या\n\nमहेश आडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव\n\nमाफी मागूनही व्हिडीओ व्हायरल होत असल्याने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन\n\nव्हिडिओ व्हायरल आणि फोन करून धमकी देणारांवर कारवाईची मागणी\n\nअँकर- काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथल्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील एका तरूणाने विहिर्ही उडी घेत आत्महत्या केलीये.. महेश आढे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी आहे..\nमहेश आढे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करत होते. तिथे एका तरुणाने त्यांचा व्हिडीओ काढला. तेव्हा हे दोन तरुण नशेत असल्याचं कळलं. लघवी करतानाचा या तरुणांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला नंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफीचा एक व्हिडीओ आला.. ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.. पण तरीही यांचे व्हिडीओज sगळ्या इंस्टाग्राम वर व्हायरल केले.या व्हिडीओमध्ये या तरुणाचे पत्ते आणि फोन नंबर टाकण्यात आला होता. या मुलांना रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. त्यामुळे महेश आडे या तरुणाने काल-परवा घरी आणि मित्रांना सांगितलं की मी जीव देईन मला हे सगळं सहन होत नाही. म्हणून त्याने आज गावच्या जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन संपवले.दरम्यान ज्यांनी कुणी त्याचे व्हिडीओ व्हायरल केलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे...महेश याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह परतूर येथील रुग्णालयात पडून होता.जोपर्यंत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ईशारा मयत महेशच्या नातेवाईकांनी दिला आहे\n\nबाईट : ज्ञानेश्वर आडे,मयत महेशचे काका
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 13:25:54
Ratnagiri, Maharashtra:राजेश सावंत हे चांगले कार्यकर्ते आहेत. पण ते सध्या अडचणीत आले. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. ती सध्या रत्नाकरती सध्या रत्नागिरीतील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना कुठेही अडचण नको. याचमुळे राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मला मिळाला असून मी आणि वरिष्ठ यावरती विचार करू आणि निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. चिपळूण येथे राजेश सावंत यांनी चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेला राजीनामा कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 13:25:33
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो लोकवस्तीस उग्र रासायनिक दुर्गंधी आणि श्वसनाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. एमपीसीबीने केमिकल सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अम्बरनाथच्या लोकनगरी बायपासच्या बाजूने वाहणारा नाला गोविंद पूलमार्गे शिवगंगानगर, स्वामी देवप्रकाश गार्डन, मोहनपुरम, गुरुकुल शाळेच्या मागून वाहतो. काही दिवसांपासून कोणतीही प्रक्रिया न केलेलं रासायनिक सांडपाणी नालेत सोडलं जातंय; त्यामुळे नाल्याचं पाणी रंगात बदलेल. नाल्यातून केमिकलचा उग्र वास येतोय. या दुर्गंधीमुळे नागरिकांनी पोलिस, अग्निशमन दल आणि एमपीसीबीकडे धावा केल्या आहेत. सामाजिक संस्थांनी प्रदुषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे एमपीसीबीने अंबरनाथ शहर प्रदूषित करणाऱ्यांवर कागदी कारवाई न करून ठोस कारवाई करण्याची गरज आहे. चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 05, 2025 13:11:56
Nagpur, Maharashtra:नागपूर वृष्टी जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण 3 तारखेला उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लोकांचा मृत्यू झाला होता... आणि तेथील स्मशान घाटात त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते... चार तारखेला त्यांचं कुटुंब अस्थि विसर्जना करता अस्थि करता तिथे गेले होते... मात्र त्यांना तिथे अस्थि ( राख ) भेटली नाही. म्हणून त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार केली.. आम्ही त्या वर गुन्हा दाखल.. अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला उमरेड पोलीस या प्रकरणी तपास करत आहे... आजूबाजूच्या सर्व स्मशानभूमी चेक केले आहे... CCTV ची मदत घेत आहे... तांत्रिक वगैरे आहे का या दृष्टीने ही तपास सुरू आहे अंधश्रद्धेमुळेच हे झालं असेल असा आम्हाला संशय आहे... त्या अनुषंगानेच आम्ही तपास करत आहोत
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 05, 2025 13:03:09
Kalyan, Maharashtra:डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल ! पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी आरोप करत विचारला जाब.. Anc. ठाकुर्ली खबाळपाडा परिसरातील फेरीवाले, दुकानदार, रिक्षा चालक, वॉचमनला टिळकनगर पोलीस स्टेशन मधील एका पोलिस कडून नागरिकांना व फेरीवाल्याना दारू पिऊन पैसे मागितले जाते पैसे दिले नाहीत तर त्रास दिलं जात असल्याचे तेथील नागरिकांनी आरोप केला आहे याबाबत मनसे च्या एका कार्यकर्तेने पोलीस हवालदार ला जाब विचारत व्हिडिओ वायरल केला आहे या या पोलिसाने नागरिकांना त्रास द्यायचा थांबवलं नाही तर त्या पोलिसा विरोधात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा दिल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 05, 2025 12:41:34
Kalyan, Maharashtra:शहाड पुलाच्या कामामुळे कल्याण शहर ठप्प; वालधुनी–अशोकनगर–शिवाजी नगर–रामबाग–सिंडिकेट परिसरात भीषण ट्रॅफिक, रुग्णवाहिकाही अडकल्या शाहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. वाल्धुनी, अशोकनगर, शिवाजी नगर, रामबाग आणि सिंडिकेट या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या ट्रॅफिक जामचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांबरोबरच आपत्कालीन सेवांना बसला असून रुग्णवाहिकाही तासन्‌तास कोंडीत अडकल्या. पीक अवर दरम्यान तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. साधारण 10 ते 15 मिनिटांचा मार्ग पार करण्यासाठी 45 मिनिटांपासून तब्बल एक तास लागल्याची तक्रार नागरिकांनी केली. शाळेच्या बसेस, दुचाकी, चारचाकी, ऑटो–रिक्षा सर्व वाहने कासवचालीने रेंगत होती. काही मुख्य चौकांवर वाहतूक पोलिसांनी कोंडी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र भगवान मेडिकल चौकात वाहतूक पोलिसांचा अभावामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या ठिकाणी नेहमीच कोंडी होते, त्यामुळे येथे वाहतूक पोलीस तैनात करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 12:29:36
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीजवळ 'नागेपल्ली' येथील आशीर्वाद हॉस्टेलवर ऐतिहासिक कारवाई, मान्यता नसताना ख्रिश्चन संस्थेने चालविले होते अवैध हॉस्टेल, बहुतांश आदिवासी मुलेमुली होती दाखल, शासकीय पथकाने 91 बालकांचे केले स्थानांतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, पोलीस आणि बालकल्याण विभागाची संयुक्त कारवाई. बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि अनधिकृत संस्थांवर कारवाईचा बडगा उगारत, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने अहेरी तालुक्यात मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. शासकीय सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील आय. टी. आय. (ITI) जवळ असलेले 'आशीर्वाद हॉस्टेल' हे अनधिकृत बालगृह असल्याचे उघड झाले. या संस्थेवर धाड टाकून 49 मुली व 42 मुले अशा एकूण 91 निराधार बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या सुटका करण्यात आली आहे. ही संस्था बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम तरतुदींचे सर्रास उल्लंघन करून विनापरवाना चालवत होती. अशा विनापरवाना संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांचे शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक शोषण होण्याचा धोका असल्याने, प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घेतली. 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या हॉस्टेलमध्ये एकूण 90 मुले (48 मुली, 42 मुले) दाखल असल्याचे आढळले. संस्थेकडे कोणतीही अधिकृत मान्यता किंवा नोंदणी प्रमाणपत्र नव्हते. या संस्थेत केवळ ख्रिश्चन धर्म प्रसाराचे साहित्य आढळून आले. अनधिकृत संस्थेतील सर्व संबंधित दस्तऐवज तातडीने ताब्यात घेण्यात आले. सर्व बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तात्पुरत्या निवारा आणि पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top