Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

नंदूरबार में भाजप मंत्री जयकुमार रावल ने स्वबल से जीत का दावा किया

PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 03:22:03
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायच्या की स्वतंत्र याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्या, रावल यांनी स्पष्ट केल आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्ते स्वतंत्र लढू इच्छितात त्या ठिकाणी युती होणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र भाजपाची सत्ता येईल असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत, मात्र मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री जो निर्णय घेणार तो मान्य राहणार आहे, असा सांगत बैठकीत रावल यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. नंद्युरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागले असून, भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहादा येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला पक्षाने दिलेल्या आदेशाच्या पालन करणार असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री युती बाबत निर्णय घेतील, मात्र आम्ही स्वबळावर देखील निवडणूक लढू याची तयारी देखील आमचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. शहादा नगरपालिका वर भाजपाची एक हाती सत्ता येण्यासाठी सर्वेच कार्यकर्ते आणि उमेदवार कामाला लागले आहेत निवडणुकीचे बिगुल वाजला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती नगर पालिका आणि महानगरपालिकेंवर भाजपाची एक हाती सत्ता राहणार आहे कारण गल्लीपासून तो दिल्लीपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते असून आणि लोकांच्या विश्वास फक्त आता भाजपावर राहिला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पूर्ण ताकतीने समोर ज्यांना असून आणि निवडणूक ही जिंकणार असल्याचे विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला,
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Oct 13, 2025 05:46:53
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदन नगर परिषदेच्या मतदार याद्यांमध्ये सावळा गोंधळ समोर आलाय. अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागा ऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहेत. प्रारूप मतदार यादी बघून मतदारांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. यासाठी 13 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. मतदार याद्या संदर्भात नगरपरिषद प्रशासन बीएलओचे नाव सांगत आहे. मात्र, शहरातील दहा प्रभागांची रचना आणि त्याप्रमाणे मतदार संख्या जुळविणे हे काम नगर परिषदेनेच केल्याचा आरोप आहे. नगरपरिषद प्रशासन ही चूक मात्र बीएलओची सांगत आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भोकरदन शहरातील नागरिकांची नावे त्यांच्या रहिवासी प्रभागा ऐवजी दुसऱ्याच प्रभागात पळवण्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत याबाबत 650 पेक्षा जास्त मतदारांनी याबाबत तक्रारी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. भोकरदन नगर परिषदेच्या अंतिम मतदार यादीनुसार शहरात 20,916 मतदारांची संख्या आहे. नवीन प्रभाग रचनेप्रमाणे भोकरदन नगर परिषद निवडणुकीसाठी 20 प्रभाग करण्यात आले आहेत. 2016 च्या निवडणुकीत 17 नगरसेवक होते. आता 20 सदस्य संख्या झाली आहे. नवीन प्रभाग रचना ही नागरिकांना विश्वासात घेता करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच धक्कादायक प्रकार म्हणजे एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलं, सुना यांची नावे दुसऱ्याच प्रभागांमध्ये परस्पर टाकल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव बघितले त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. अनेक नागरिक याबाबतीत अजूनही अनभिज्ञ आहेत. दरम्यान, शहरातील मतदार यादी ही तत्कालीन बीएलओ यांनी बनवली होती. तर बहुतेश बीएलओ हे शिक्षक नगर परिषदेचे कर्मचारीही होते. त्यांच्या पैकी अनेकांच्या बदल्या झाल्याने तेथे आता दुसरे बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रभाग यादीतील नागरिकांच्या नावाच्या गोंधळाला जबाबदार कोण असा सवाल त्रस्त मतदारांनी केला आहे.दरम्यान, घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जाऊन कारवाई केली जाईल असं मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी म्हटलं आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 13, 2025 05:46:06
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : रवींदर दंगेकर पहिले सुटारू होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल - प्रवीण दरेकर - ऑन वाढदिवस पूरग्रस्त मदत : - आज महाराष्ट्रतला शेतकरी उध्वस्त झालंय, जमिनी खरवडलं आहेत, गुरा-ढोराचं नुकसान झालं - त्यामुळे वाढदिवस उत्सव साजरा करणे मला संयुक्तिक वाटलं नाही - म्हणून धाराशिव जिल्ह्यातील वागेगव्हाण नावाचे गाव आहे, जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारून त्या गावात आम्ही मदत करतोय - तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, तिथल्या परिस्थितीची पाहणी करून सरकारने दिलेली पॅकेजबद्दल माहिती देने - शेतकऱ्यांच्या सूचना या फडणवीस साहेबापर्यंत पोहोचवणे, या साठी आजचा दौरा करतोय - ऑन हर्षवर्धन सपकाळ : - एकदम एका मंडल अध्यक्ष एवढं पण हे नेतृत्व वाटतं नाही - त्यामुळे त्यांनी बोलणं हे महाराष्ट्रमध्ये कोण सिरीयस घेत नाही - अशा प्रकारे जर ते बोलले नसते तर त्याची बातमी देखील तुम्ही केली नसती - त्यामुळे असं कायतर वायफळ बोलायचं आणि बातमीत राहायचं, शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं यांचं काम आहे - देवेंद्रजी अशा वायफळ बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देतं नाही, आम्ही ही देतं नाहीत - देवेंद्रजीची मोडस काय आहे हे महाराष्ट्र 20-25 वर्षांपासून पाहतोय - मागच्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं त्याची कार्यपद्धत महाराष्ट्रला माहिती - दोन्ही पक्षाना सोबत घेत महाराष्ट्र विकासाकडे नेतायत हे सगळ्यांना माहिती आहे - सपकाळच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आम्ही त्याची दखल घेत नाही - ऑन गोपीचंद पडळकर मुस्लिम : - मी काही ते विधान ऐकलेले नाही, तो संदर्भ तपासून मग मी यांसदर्भात बोलेन - ऑन कर्नाटक संघ बंदी : - देशहिताचे, राष्टभक्तीचे चांगले विषय असतील आणि त्याचं शिक्षण कुठं दिलं जातं असेल तर पोटात दुखायचे काही कारण नाही - शेवटी सरकारं हे देश हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी काम करतात - आणि जर चांगले विचार हे केवळ संघाच्यामाध्यमातून येतायत म्हणून नाक मुरडण्याचं कारण नाही, चांगल्या विचारांचे स्वागत केलं पाहिजे - ऑन एकनाथ शिंदे योजना : - घरं-संसार चालवताना बजट बघतो आणि त्याप्रमाणे नियोजन करतो - राज्यसरकार हे एक कुटुंब आहे, त्यांना कुटुंब चालवायचं असतो - ते चालवायचं असताना आजची प्रयोरिटी काय हे प्रयोरिटी बघून निर्णय होतात - शेतकरी आज उध्वस्त झालंय त्यामुळे त्यांच्यासाठी तीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय - लोकांच्या पैशातून लोकांना द्यायचं असतं, त्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्याने सुरु होतात त्याचं राजकारण करण्याची गरज नाही - सगळ्या योजना पून्हा पुन्हा त्या ताकदीने जनतेसाठी असतील. B - ऑन संग्राम जगताप विधान : - त्याच्या मागच्या भावना ही स्वदेशीला महत्व द्या, आत्मनिर्भर व्हा त्यातून आलेली ती प्रतिक्रिया आहे - स्वदेशी करताना स्थानिक लोकांकडून स्थानिक वस्तू घ्या, ह्या देशात स्थानिक किंवा हिंदुस्थानमध्ये आपण हिंदू म्हणतो तसं ते हिंदूकडून घ्या असं म्हणाले असतील - त्यामुळे सर्वजण आत्मनिर्भर होतील अशा अनुषंगाने केलेले त्यांचे विधान असावे असं माझं आकलन आहे - ऑन संग्राम जगताप नोटीस : - अजित पवार हे त्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्या आमदारांना काय करायचं त्यांचा लूकआउट आहे. त्याचे उत्तर काय मिळतं ते पाहू. - ऑन संग्राम जगताप भाजप निवडणूक : - आता तर आम्ही महायुतीत आहोत. मित्र पक्षाचा आमदार आमच्याकडून लढणार किंवा येणार हे संयुक्तिक नाही. - महायुती म्हणून आम्ही लढत आहोत आणि लढणार.. - मित्र पक्षाच्या आमदाराबाबतीत मी बोलणं उचित नाही. - ऑन नथुराम गोडसे वक्तव्य : - काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे डोके फिरले आहे. तेच माथे फिरू सारखे वल्गना आणि वक्तव्य करत आहे - एवढा बालिश आणि अपरिपक्व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रने कधी पाहिला नाही.. - ऑन ठाकरे बंधू भेट : - ठाकरे बंधूंच्या भेटीचा अजिबात परिणाम होणार नाही - त्याचं कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने जनाधार दिला आहे - मुंबईत महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे.. - मुंबई झपाट्याने बदलत आहे. मुंबईत मेट्रो रेल, कोस्टल रोड प्रकल्पांच्या माध्यमातून प्रगती होत आहे. यातून मुंबईचा चेहरा बदलत आहे. - ठाकरे यांना 30-35 वर्षे लोकांनी तपासला आहे. - यांनी ना बाळासाहेबांची विचारसरणी जोपासली. ना मुंबई आणि मराठी माणसांचे प्रेम राहिले* - मला आश्चर्य वाटतं. तसं काय युती, आघाडी महाराष्ट्रात कधी झालीच नाही. त्याच्याकडे पाहिलं जात आहे. - दोन भाऊ असणे स्वाभाविक आहे. दोन पक्ष आणि दोन नेते आहेत. ही लोकशाहीत असणारी प्रक्रिया आहे. - महायुतीत पण तीन आणि महाविकास आघाडीत पण तीन पक्ष आहेत. यात वेगळं काय घडत आहे. - वीस वर्षे झालं कुटुंब एकत्र नव्हतं ते जर एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या काडीचाही परिणाम होणार नाही. - ऑन अंबादास दानवे : - आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशाचे नियोजन करतो. - शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले याचा विचार करून सरकार नियोजन करत असतात. - शेतकरी आज अडचणीत आहे त्यापेक्षा मोठं प्राधान्य आहे का? घराच्या घर उध्वस्त झाले आहेत. - शेतकऱ्याला जगायचं कसं हा प्रश्न आहे अशावेळी शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडा फार तान तिजोरीवर येतो. - मात्र पुन्हा हे सरकार योजना सुरळीत करेल. - ऑन वर्षा गायकवाड : - काँग्रेसची नाराजी असते जाते त्यांना वाटतं ते करतात. - नेत्यांच्या नाराजीचा काही नाही कारण जे हाय कमांडला वाटतं तेच होतं. - आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करणार यातच काँग्रेसने अस्तित्व संपवून टाकलं. - ऑन वडेट्टीवार व्हायरल व्हिडीओ: - प्रत्येकाचं सोयीचं राजकारण सुरू आहे. जाते राजकारण होऊ नये. - सरकार योग्य भूमिका घेत असून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करते. - मात्र काही लोकांना राजकीय दुकानदार करायच्या आहेत ते लोक आधी एक आणि आता एक अशी भूमिका घेत आहेत.* - विजय वडेट्टीवार हे जसं वारं वाहील त्याप्रमाणे वाहत असतात.* - ऑन बदलापूर शिंदे गट धक्का : - महायुतीच्या संदर्भात तीनही नेते, पक्ष आग्रही आहोत. ती आमची भूमिका आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली की महायुती म्हणून लढायचं आहे. - स्थानिक लेवलला सगळेच तुल्यबळ असतील तर सामोपचाराने त्या निवडणुका लढवल्या जातील. - मात्र कोणावर काही ठिकाणी होणार नाहीत अशी समंजस भूमिका तीनही पक्षांची आहे. - आमची सर्वांची मानसिकता सर्व ठिकाणी युती म्हणून लढायची आहे. - ऑन धर्मराव आत्राम : - भाजपने कुरघोडी केली याबाबत यांच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्याची गरज आहे. - कोणी स्टेटमेंट दिलं की ते झालं असे मानायचं कारण नाही. - राजकारणात भाजपचा इतिहास तपासला तर सोबत राहून कधीच कुरघोड्या करणार नाहीत. - राज्याचे समंजस नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महायुती सरकार चालवायचं असते तेव्हा सर्वांना विश्वासात घेऊन कामं करावं लागतं, देवेंद्र फडणवीस ते करत आहेत. - ऑन रवींद्र धंगेकर : - रवींद्र दंगेकरांना वेसन घालण्याची आवश्यकता होती. पहिले सुटारू होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल. - ऑन छटपूजा सवलती : - हिंदूंचे प्रत्येक सण उत्सव साजरे झाले पाहिजेत. - आपल्या उत्सवांनी ताण पडतो मात्र शेवटी ताण हाताळण्याची क्षमता मुंबई महापालिकेत आहे. - पूजा उत्सव करणाऱ्यांनी चांगलं नियोजन करून यंत्रणांवर ताण पडला नाही पाहिजे हे पहावं. Byte : प्रवीण दरेकर ( भाजप नेते)
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 13, 2025 05:34:55
Beed, Maharashtra:बीड : आष्टीत हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, शरीराचे अनेक भाग गायब... परिसरात दहशतीचे वातावरण Anc : आष्टी तालुक्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बावी दरेवाडी येथे हिंस्र प्राण्याच्या हैदोस पाहायला मिळाला आहे. गुरे चारण्यासाठी गेलेला राजू विश्वनाथ गोल्हार हा तरुण घरी परतलाच नाही. मात्र सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अस्वस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराचे अनेक भाग गायब दिसून आले. शिवाय शरीरावर दात आणि नखांचे व्रण आढळून आल्याने हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सध्या त्याचा मृतदेह आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच सदरचा प्रकार समोर येणार आहे. दरम्यान पाच वर्षापूर्वी याच परिसरात एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला चढवला होता. त्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हल्ला देखील बिबट्याने केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 13, 2025 05:20:36
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील नामांकित यशवंत बैंक में 112 करोड़ 10 लाख 57 हजार 481 रुपए का गैरव्यवहार हुआ है. इस प्रकरण में बैंक के तत्कालीन अध्यक्ष और राज्य सहकार परिषद के माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर सहित 50 लोगों के खिलाफ कराड शहर पुलिस थाने में FIR दर्ज कराई गई है. भाजपा सांसद मेधा कुलकर्णी ने कुछ दिन पहले इस प्रकरण पर आवाज उठाई थी. शेखर चरेगावकर को मंत्री चंद्रकांत पाटील के निकटवर्ती माना जाता है. लेखापरीक्षण में 9 अगस्त 2014 से 31 मार्च 2025 के बीच अध्यक्ष, निदेशक और कर्मचारियों ने मिलकर बोगस कर्ज बनाए, चिट्ठे-प्रमाण नहीं होने पर कर्ज वितरण किया और दस्तावेजों में फेरबदलकर बैंक के निधि को तीसरे पक्ष के पास मोड़ा. यह शिकायत सरकार के सीनियर अकाउंटेंट मंदार देशपांडे ने कराड शहर पुलिस के पास दर्ज कराई है.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 13, 2025 05:03:28
Bhandara, Maharashtra:पैसे चिल्लरसाठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली. प्रवाशाला लाता बुक्याने मारताना बस स्थानकावर प्रवाशांनी व्हिडिओ काढला व व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या घटनेनचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लर साठी मारहाण करणाऱ्या महिला कंडाक्टर वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टर कडून मारहाणीची दुसरी घटना आहे. आठ दिवस आधी एका महिला कंडाक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना समोर आल्याने प्रवाशांन मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टर वर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवानकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 13, 2025 05:00:30
Washim, Maharashtra:रिसोड येथील ‘राधिका लेडीज ड्रेसेस’ या कपड्यांच्या दुकानात तीन महिलांनी लहान मुलांचे कपडे दाखवण्याच्या बहाण्याने दुकानातील महागडे कपडे चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकान मालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ रिसोड पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत या सराईत तीन महिला चोरट्यांना पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.या घटनेबाबत रिसोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तीन महिलांवर अकोला,जळगाव खान्देश आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 13, 2025 04:49:19
Amravati, Maharashtra:सहा फाइल आहे पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना दिवाळी पूर्वी माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा मदतीचा हात ही माहिती: काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 25 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला होता. आणि आज त्याच पूरग्रस्त कुटुंबियांसाठी दिवाळीपूर्वी अमरावतीहून जवळपास तीन ट्रक किराणा साहित्य माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या पी.आर. पोटे एज्युकेशन ग्रुप तर्फे पाठवले जात आहे. यामध्ये सुमारे 4,500 किराणा किटचा समावेश आहे. तीन ट्रक हे किराणा साहित्य आहे जे धाराशिव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पाठवले जातील. किटमधील साहित्य या किटमध्ये 10 किलो गहू, 10 किलो आटा, 5 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 3 किलो साखर, पोहे, तेल, रवा, बेसन, मुरमुरे, चहा आणि पाच दिवे यांचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवे समाविष्ट करून, त्यांच्या जीवनातील अंधार दूर व्हावा हा यामागचा हेतू आहे. सामाजिक बांधिलकी जपत पी.आर. पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप आणि प्रवीण पोटे यांच्याकडून ही मदत सामाजिक जाणीव ठेवून केली जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रकला हिरवी झेंडी दाखवत रवाना करणार आहेत या किटच्या माध्यमातून गरजू लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 13, 2025 04:47:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_dhind स्लग - दहशत व लुटमार करणाऱ्या नशेखोरांच्या मूसक्या आवळत शहरातून काढण्यात आली धिंड.. अँकर - नशा करून दहशत माजवणारयांना सांगलीच्या मिरजेत पोलिसांनी चांगलीचं अद्दल घडवली आहे,अशी मध्ये प्रवासी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी उद्धट वागणाऱ्या पाच नशीखोरांच्या मुस्कया आवळत शहरातून धिंड काढली. मिरज बस स्थानक व रेल्वे स्टेशन परिसरातुन नशेखोरांची वरात काढली.गेल्या काही दिवसांपासून नशेखोरांकडुन प्रवाशांना लुटण्याचा व दमदाटी करण्याचा प्रकार सुरू होता,महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून याला कोरोनावर कारवाईचा प्रयत्न करण्यात आला असता नशीखोरांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी उद्धट वागण्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी नशेखोरांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवून शहराच्या प्रमुख मार्गावरून धिंड काढली. तर पोलिसांच्या कारवाईचा मिरज शहरातून स्वागत करण्यात आले
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 13, 2025 04:30:29
Ratnagiri, Maharashtra:खेडमें उद्धव गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार भाषण... रामदास कदम हा माणूस सत्तेसाठी लाचार, तू कोणाचाही होऊ शकत नाही... स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचा होऊ शकत नाही. रामदास कदम यांची काय लायकी होती?? बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला आमदार केलं मंत्री केलं. विनोदी पक्षनेता आणि पर्या मंत्री म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची उडवली खिल्ली... बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल रामदास कदम यांनी केलेले भाषण हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही... सत्तेसाठी खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणारा रामदास कदम... गेली 40 वर्ष कोणीच 67 टीएमसी पाणी कोकणात आणायच्या गप्पा करणाऱ्या रामदास कदमांनी स्वतःच्या मतदारसंघात पाण्याच्या आणि रस्त्याचे प्रश्न बघावेत. रामदास कदम यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगाही वेड्यासारखं बोलतो.... खेडमधील सुसेरी गटात शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी पुन्हा उद्धव गटात प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांचे खेडमधील खाडी विभागात जोरदार भाषण. रामदास कदम यांची मिमिक्री करत भास्कर जाधवांनी केला हल्लाबोल. रामदास कदम यांची उंची दीड फूट आणि मुलग्याची उंची पाच फूट हे विधान करणाऱ्या संजय कदम यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे रामदास कदम हे सत्तेसाठी किती लाचार आहेत हे दिसतं.... संजय कदम यांनी रामदास कदम यांची पुढून मागून उभे आडवे काहीही ठेवले नाही माझ्यासारख्या माणसाने संजय कदमला कधीही माफ केलं नसतं. खेडच्या भाषणात भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत केला जोरदार हल्लाबोल.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 13, 2025 03:51:20
Vasai-Virar, Maharashtra:आदर सुनील राऊतांचं नाव सांगून महिलेकडून रो रो सेवा वेठीस वसई भाईंदर रो रो सेवेत घडला प्रकार अँकर - आ सुनील राऊत यांचे नाव सांगून, एका फॉर्च्युणार कार मधून आलेल्या एका महिलेने रो रो सेवेतून जाण्यासाठी रांगेत उभे असणाऱ्या सर्वच वाहनधारकांना वेठीस धरले... वसई ते भाईंदर चालणाऱ्या रो रो सेवेत रविवार संध्याकाळची ही घटना आहे ... महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने रोरो सेवेवर वाहतुकीचा ताण आला होता, या सेवेसाठी वाहन चालकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या असताना ही महिला VIP ट्रीटमेंट साठी पुढे आली होती...मात्र तिथे सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी तिला अडवले.. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याच वाहनांच्या रांगेत उभा असणाऱ्या एका जागरूक नागरिकाने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेर्यात कैद केला असून, त्यात एक रो रो सेवेचे तिकीट घेणारा व्यक्ती आ सुनील राऊत यांची गाडी आहे असे सांगतो, रांगेत अडकून तासंतास अडकलेली महिला रडताना दिसत आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रोरो सेवेने मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 03:50:19
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 03:47:56
Nashik, Maharashtra:Anchor भारतीय लष्कराच्या गरजेनुसार नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये बांधणी करण्यात आलेले तेजस हे लढावू विमान भारतीय वायुदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झालेय. ऐन दिवाळीया पार्श्वभूमीवर 17 ऑक्टोबरला वायुदलात समाविष्ट होणार आहे. एचएएल येथील हे विमान तयार करण्यासाठी लागणाऱ्या तिसऱ्या प्रॉडक्शन लाइन्सचे या निमित्ताने केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. अमेरिकन कंपनीकडून इंजिनपुरवठ्यास विलंब झाल्याने हे तेजस वेळेत मार्च महिन्यातच वायुदलाकडे हस्तांतरित पूर्ण होऊ शकले नाही. हे विमान गेल्या होणे अपेक्षित होते. मात्र, आता विलंब झाला होता आता हे विमान शुक्रवारी वायुदलाकडे हस्तांतरित होईल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे लढाऊ विमानांच्या ९७ विमान तयार येथील कारखान्याची क्षमतादेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे ओझर वाढणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top