Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर में पंडित दीनदयाल उपाध्याय कैंसर हॉस्पिटल का उद्घाटन 22 दिसम्बर को

AAASHISH AMBADE
Dec 16, 2025 05:50:38
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरात राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचे 22 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण आणि कर्क रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता हा हॉस्पिटल रुग्णसेवेच्या दृष्टीने ठामपणे काम करणार आहे. 280 कोटी रुपये खर्चून 140 खाटांचे हे रुग्णालय देशातील कॅन्सर उपचारातील अत्याधुनिक रुग्णालय ठरणार आहे. देशात प्रथमच कर्करोग उपचारांमध्ये हेलियम गॅसचा वापर न करता उपचार केले जाणार आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Dec 16, 2025 10:55:10
Pune, Maharashtra:राज्यातील महानगरपालिकांची बिगुल वाजला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या तीन-तीन पक्षांमुळे रंगत वाढते आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेत 2003 साली स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांचे महापौर राहिले आहेत. 2018-23 सत्तेवर असलेल्या महापौरांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रभाव दिसत होते; 2018 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटकांचे परस्पर बळ कमी-जास्त झाले. अहिल्यानगर महानगरपालिका (2018-23) एकूण नगरसेवक संख्या 68 होती. भाजपा 14, शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1, इतर 2 नगरसेवक राहिले. निवडणुकीनंतर पक्षीय बलाबलात बदल झाले असून सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे गणित दृष्टीने महाविकास आघाडीतील आणि आघाडीच्या स्थितीवर परिणाम होणार आहे. निवडणूक कार्यक्रम लागण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा समाचार घेतला जात आहे. आगामी दिवसांत प्रत्यक्ष वर्चस्व कोण ठरवतो, तेच स्पष्ट होईल.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 16, 2025 10:54:52
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- भाजप आणि काँग्रेस यांच्यात चंद्रपूरची मनपा निवडणूक ठरणार रंजक, एकीकडे मुनगंटीवार-जोरगेवार तर दुसरीकडे वडेट्टीवार-खा. धानोरकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई अँकर:-- अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत देखील विविध पक्षांचे नेते-कार्यकर्ते सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. ही लढाई भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राज्यातील महत्वाची लढत ठरणार आहे. एकीकडे मुनगंटीवार-जोरगेवार तर दुसरीकडे वडेट्टीवार-खा. धानोरकर यांच्यातील अंतर्गत कुरघोडीसह यात कोण बाजी मारते हे बघणं औत्सुक्याचे बनले आहे. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर बाईट २) नंदू नागरकर, काँग्रेस नेते,माजी नगरसेवक एकूण प्रभाग--- 17 एकूण नगरसेवक- 66 भाजपा- 36 शिवसेना-0 राष्ट्रवादी-0 अपक्ष--3 ------- काँग्रेस-12 UBT शिवसेना- 2 राष्ट्रवादी (शरद पवार) -2 मनसे - 2 ---- बसपा- 8 प्रहार - 1 आधी काँग्रेस आणि आता भाजप असा या महानगरपालिकेचा राजकीय लंबक फिरत राहिला आहे. राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या पळापळीनंतर नेमके दान कुणाच्या पारड्यात पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोण कसे लढणार, योग्य उमेदवाराला तिकीटवाटप, याशिवाय बंडखोरांची समजूत काढण्यात कुणाला कसे यश मिळेल या राजकीय गणिते अवलंबून आहेत. बाईट ३) प्रमोद काकडे, जिल्हा प्रतिनिधी, दै. सकाळ एकूण व्ही. ओ. ३) चंद्रपूर शहराला मोठा राजकीय इतिहास आहे. राज्याला 2 मुख्यमंत्री देणारा हा भाग राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग आहे. शहराला वळसा घालणारी ईरई नदी आणि बल्लारपूर वळण मार्गाला एकीकडे आणि दुसरीकडे मूल मार्गाला जोडणारे घनदाट जंगल ही याची चतुःसीमा आहे. सुमारे 3 लाख मतदार मनपातील कारभारी निवडणार आहेत. हे शहर राज्यात धूळ आणि प्रदुषणासाठी कुख्यात आहे. तापते ऊन आणि वन्यजीवांचा संचार यामुळे शहर-जिल्हा सतत चर्चेत आहे. 2017 ते 2022 या काळात भाजपची सत्ता असताना मनपातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यावर आसूड ओढणारे विरोधी बाकावरील नगरसेवक मात्र रखडलेली निवडणूक आणि गैरकारभार यामुळे प्रचंड नाराज आहे. बाईट ४) पप्पू देशमुख, विरोधी नगरसेवक व्ही. ओ. ४) मागील 5 वर्षात या शहरात मूलभूत विकासकामांच्या बाबतीत प्रगती झाली आहे मात्र राज्यात भाजपची सत्ता असताना ज्या प्रमाणात विकासनिधी अपेक्षित होता तो मिळाला नाही परिणामी 300 कोटींच्या अंदाजपत्रकापैकी केवळ 50-60 कोटी महसूल प्राप्ती असताना विकास योजना राबविताना तारेवरची कसरत होत आहे. मनपा हद्दीत राबविलेली अमृत पाणीपुरवठा योजना टप्पा 1 चे काम पूर्ण झालेले नाही मात्र टप्पा 2 साठी शहरात अनिर्बंध खोदकामे सुरू आहेत. याशिवाय शहराची 100 कोटी रु. खर्चून तयार मलनिस्सारण योजना  प्रभावी ठरलेली नाही. शहरातील अंतर्गत रस्ते वाईट स्थितीत आहेत. तर सार्वजनिक वाहतूक, पार्किंग आणि प्रसंधानगृहांची संख्या आणि स्थिती चिंताजनक आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरातील आरोग्य व्यवस्था खुद्द सलाईनवर असून कचरा संकलन सुविधा आणि शहर स्वच्छता सुधारण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात बगीचे आणि सौंदर्यीकरणाचे विविध प्रकल्प राबविण्यात आले ही यातील जमेची बाजू आहे. --------
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 16, 2025 10:54:25
Jalna, Maharashtra:जालना : जालना शहरात हवा कुणाची.?(पॅकेज) अँकर : राज्यातील महापालिका निवडणुक जाहीर झाली आहे.त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी निवडणुकिची तयारी सुरु केलीय.जालन्यात तब्बल 2017 नंतर निवडणुक होणार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. जालना महापालिका निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे,अर्जुन खोतकर,माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. व्हिओ :१:जालना महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेसाठी निवडणूक पार पडत आहे.त्यामुळं महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये..महापालिकावर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांविरोधात उभे राहणारे आमदार अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल हे आता गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीतील मित्र पक्षात आले आहेत.. महापालिका निवडणुकीचे बिगૂલ वाजल्यानंतरही अद्याप जालन्यात महायुती झालेली नाहीये.. युतीसाठी अर्जुन खोतकर यांनी भाजपला पहिला प्रस्ताव दिला..मात्र बराच काळ लोटूनही अद्याप भाजपने शिवसेनेच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे निवडणूक युतीत होणार की स्वबळावर लढवली जाणार हे अद्याप अनुत्तरित आहे. तर महाविकास आघाडी बाबत देखील अजून कोणताही निर्णय झालेला नाही.तर भाजपने इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप करत निवडणुक तयारीत आघाडी घेतलीय बाईट- अर्जुन खोतकर, आमदार शिवसेना बाईट- अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी व्हिओ 2- काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी कॉंग्रेसमधून काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय.गोरंटयाल यांच्यासोबत काँग्रेसच्या 28 पैकी 23 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं कॉंग्रेस समोर यावेळी नवीन उमेदवार शोधण्याचं आव्हान उभे राहिलंय. दरम्यान महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानं भाजपने देखील निवडणुकीची तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप केलंय.दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती नंतर युती करायची की नाही हे ठरवू अस भाजपचे निवडणूक प्रमुख कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं आहे. बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार (खुर्चीवर बसून घेतलेला बाईट) व्हिओ- 3-शहरात तब्बल 65 जागांसाठी निवडणूक होणार आहे.2017 मध्ये शहरात 61 नगरसेवक होते आता ही संख्या वाढून 65 झाल्यानं राजकिय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. 2017 मध्ये निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेस 28,राष्ट्रवादी 9,शिवसेना 11 ,भाजप 11,अपक्ष 2 जागेवर विजयी झाले होते. तर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या पत्नी संगीता गोरंटयाल या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.मात्र गोरंटयाल यांनी काँग्रेसच्या 28 पैकी 23 नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केलाय.त्यामुळे काँग्रेसला यावेळी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. तर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानं या निवडणुकीत राजकिय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बाईट : अहेमद नूर,राजकीय विश्लेषक( चेक्स शर्ट,चष्मा लावलेले) समस्या ग्राफिक्स व्हिओ :4: शहरातील समस्या जालना हे व्यापारी शहर आहे.मात्र इथे समस्यांचा डोंगर पाहायला मिळतो. शहरात 8 -8 दिवस नळाला पाणी येत नाही.शहरातील सर्व रस्त्यांवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते.त्याच बरोबर शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला असून 4 महिन्यात 4 लहान मुलांचा बळी गेलाय.शहरातील कुंडलीका आणि सीना या प्रमुख नद्या प्रदूषित झाल्या असून या नद्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.त्याच बरोबर शहरात महात्मा फुले मार्केट पाडून ठेवलं आहे.मात्र त्याचे नव्याने बांधकाम झालेले नाही.शहरात मनोरंजनाचं एकमेव साधन असलेल्या मास्टर कृष्णराव फ़ुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालीय.शहरात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेल असून कचरा समस्या सुटलेली नाही.भूमिगग गटारे शहरात सर्व भागात झालेली नसल्यानं रस्त्यावर गटाराचे पाणी पहायला मिळत.मात्र या समस्या न सुटल्यानं शहरातील नागरिकांचा या निवडणुकीत रोष दिसून येण्याची शक्यता आहे. बाईट : नागरिकांचे 2 बाईट आहेत(निळा शर्ट आणि लाल चेक्स शर्ट असलेली व्यक्ती) व्हिओ:05:जालना शहराची लोकसंख्या 3 लाख 75 हजार इतकी असून या पैकी 2 लाख 2 लाख 45 हजार 929 इतके मतदार आहेत.एकूण मतदारांपैकी पुरुष मतदार 1 लाख 28 हजार 894 आहेत.तर महिलाअ 1 लाख 17 हजार आहेत.तर ईतर 34 मतदार आहेत.या मतदारांपैकी दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतदारांची संख्या जास्त असल्यानं हे मतदार कुणाच्या पारड्यात यावेळी मतदान टाकतात यावरच राजकिय पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. बाईट : सुरेश केसापूरकर,राजकिय विश्लेषक,पत्रकार(टक्कल असलेले) व्हिओ :06:जालना शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत.त्याचबरोबर वेगवेगळ्या शेती पिकांचे बियाणे बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्यानं शहराला स्टील सिटी आणि सिड सिटी म्हटलं जातं.याच शहरात आता महानगरपालिका अस्तिवात आल्यानं ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 16, 2025 10:53:28
Yeola, Maharashtra:तलाठी कार्यालयात सेवा देण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले संगणक हे त्या तुलनेत जीर्ण झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहे तसेच ऑनलाईन काम करताना देखील मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असते त्यामुळे महसूल विभागाने तसेच लॅपटॉप, प्रिंटर व इतर आधुनिक साहित्य द्यावे या मागणी करता तलाठी व ग्राम महसूल अधिकारी यांनी संपाला सुरुवात केली असून अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार आहे दरम्यान तलाठी कार्यालयातील महत्त्वाच्या सेवा सुरू राहणार असून ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकला जाणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे या संदर्भात येवल्यातील तलाठ्यांसोबत बातचीत केली आहे
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 16, 2025 10:04:09
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 16, 2025 09:26:10
Amravati, Maharashtra:पृथ्वीराज चव्हाण यांचा बुद्धिभंश, त्यांना काहीही बोलायची सवय लागली; जगातील सर्वात मोठा भविष्यकार पृथ्वीराज चव्हाण – चंद्रशेखर बावनकुळे अँकर :– महिनाभरात मराठी पंतप्रधान होतील असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियायायला सुरुवात झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना बुद्धिभंश झाला आहे. त्यांना काहीही बोलायची सवय लागली कुठेही पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघतात असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं असून जगातील सर्वात मोठा भविष्यकार पृथ्वीराज चव्हाण झाले आहे असेही बावनकुळे म्हणाले आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 16, 2025 09:07:31
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 16, 2025 08:49:13
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागांवरून दावे-प्रति-दावे होत असून, महायुतीत रस्सीखेच स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. नेमकं गणित काय आहे आणि ही युती अखेर एकत्र लढणार की फुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. VO 1:- कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका जरी जाहीरपणे नेतेमंडळी मांडत असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. शिवसेना आणि भाजपकडून अधिक जागांची मागणी होत असताना, राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा दिल्या जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असणारा आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सलग दोन वेळेला सत्तेत असणारी राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या जाग्या दारासंदर्भात केल्या जाणाऱ्या काहीशी नाराज दिसत आहे.. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच उघड भूमिका मांडली आहे. Byte :- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी ( जुना बाईट ) VO 2:- भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी “मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर आमचाच क्लेम राहील. फक्त काँग्रेसच्या जागांवरच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होईल असं वक्तव्य करून राष्ट्रवादीची कोंडी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे हे विधान आणि दुसरीकडे महायुती म्हणूनच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असं धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर जागावाटपात स्थानिक आमदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार असल्याचं संकेत देत धनंजय महाडिक यांनी दिले आहेत. कोल्हापूर शहरात शिवसेनेचे आमदार क्षीरसागर असल्यामुळे त्या भागात शिवसेनेला झुकत माप दिलं पाहिजे, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपला प्राधान्य मिळालं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. यावरून भाजप कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘मोठा भाऊ’ च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. Byte:- धनंजय महाडिक, खासदार राज्यसभा VO 3 :- एकीकडे भाजपा खासदार धनंजय महाडिक असोत किंवा राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ असोत. हे दोघेही कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगत आहेत.. पण भाजपा आणि शिवसेना अधिक जागेवर मागणी करत राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल,” असा थेट इशारा देत त्यांनी दबाव वाढवला आहे. Byte:- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी VO 4 :- हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत होती. महानगरपालिकेचा दांडगा अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेटवर्कच्या जोरावर हसन मुश्रीफ आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत . त्यामुळे महायुती मध्ये पडद्यामागच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे नागपूर अधिवेशनादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊनच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोर जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त करत असल्याचं दिसतंय. पण एकीकडे एकत्र लढण्याची इच्छा, तर दुसरीकडे जागावाटपावरून मोठे दावे… जर राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर हसन मुश्रीफ यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी “एकला चलो” ची भूमिका घेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू शकतो. अशा परिस्थितीत महायुती एकसंध राहणार की जागावाटपाच्या तिढ्यातून फुटणार, याकडेच आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे. प्रताप नाईक झी २४ तास कोल्हापूर
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 08:17:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आगामी महापालिका निवडणुकीत संभाजीनगर मध्ये एमआयएम फॅक्टर महत्त्वाचा आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाला युतीची ऑफर दिली असल्याचा गौप्य स्फोट इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळे नक्की हा पक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे यावरून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने आणि शिंदेच्या शिवसेनेना चांगलीच टोलेबाजी केलीय... एमआयएम ला महाविकास आघाडीचा प्रस्ताव छत्रपती संभाजी नगरात एकत्र येण्याबाबत ऑफर राज्यात नाही तर शहरात कशाला एमआयएम ने ऑफर फेटाळली छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वच पक्ष आमची निवडणुका विरोधात आहे असं सांगत आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षांना एमआयएम ला प्रस्ताव दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली यामुळे चर्चांना उधाण आलय नक्की हा पक्ष काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे.. मात्र ही ऑफर फक्त शहरापूर्वी होती राज्यात नव्हती मग राज्यात नाही तर शहरात युती कशाला असं म्हणत आम्हीही ऑफर फेटाळली असल्याचं इम्तियाज यांचे   म्हणणं आहे आणि त्यामुळं संभाजी नगरात एकटे लढत किंगमेकर आम्हीच होणार असा दावा इम्तियाज जलील करत आहे... याबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे च्या शिवसेनेने काँग्रेसकडे बोट दाखवले आहे , काँग्रेसचे काही लोक असं करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मात्र काँग्रेसने असं करू नये असं खैरे म्हणाले तर महाविकास आघाडी मतांसाठी लाचार झाली आहे ते निश्चितपणे असा प्रस्ताव देऊ शकतात असं संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले... ऑफर नक्की कोणाची याबाबत इम्तियाज जलील सांगायला तयार नाही मात्र ज्या पद्धतीने चंद्रकांत खैरे अंगुली निर्देश करत आहे आणि शिरसाट सुद्धा असं होऊ शकतं असे सांगताय त्यामुळे निश्चितच काहीतरी झालंय यात वाद नाही.. मात्र तूर्तास एमआयएमची एकला चलो ची भूमिका आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमचा आव्हान दोन्ही पक्षाला असणार असेच दिसतंय...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 16, 2025 08:16:31
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे और पिंपरी चिंचवड में राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय. शरद चंद्र पवार पक्षाची 60 जागांची मागणी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पवार यांनी डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हात देण्यासाठी पवार पक्ष पुढे सरसावला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद असली तरी भाजपशी मुकाबला करणे सोपे नाही. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून कार्यकर्त्यांना पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. तसेच अजित पवार यांच्या कडे 60 जागांची मागणी केली गेली. निवडणूक कोअर कमिटीच्या सदस्यांनी पक्षाच्या बैठकीत समविचारी पक्षाशी युती करत भाजपला सत्तेपासून दूर राखण्याचा निर्णय घेतला. दूसरीकडे आणखी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला. राष्ट्रवादीचा बोध: एकत्र लढण्याच्या तयारीने वातावरण ढवळून निघालेय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 08:11:12
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 16, 2025 08:05:24
Amravati, Maharashtra:ठाकरे यांची मजबुरी असता, ठाकरे कुटुंब निवडणुकीमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत आहे; आमदार रवी राणा ठाकरेंवर बोचरी टीका. अँकर :– येत्या 18 तारखेला ठाकरे एकत्र येणार असून युतीची घोषणा होणार असल्याचा बोलला जात आहे. मात्र ठाकरे कुटुंबीय एकत्र येत असताना रवी राणा यांनी ठाकरे यांना चांगलच डिवचल आहे. ठाकरे कुटुंब हे निवडणुकीमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत असल्याच जनतेला समजते, आपल्या फायद्यासाठी व राजकीय हितासाठी ते एकत्र येतात मात्र हिंदुत्व एकनाथ शिंदे यांनी टिकून ठेवला आहे. मुंबईतील मराठी माणूस ठाकरेंच्या मजबुरीला बाजूला ठेवून, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना साथ देतील असेही आमदार रवी राणा म्हणाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणाविरुद्ध ठाकरे हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बाईट :– रवी राणा, आमदार. रवी राणा ऑन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दावा. दावे अनेक होत असतात मात्र पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,या राज्याला पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे व्हिजन आहे त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा म्हणते की पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले पाहिजे होते व ते राहतील. रवी राणा ऑन मराठी पंतप्रधान. मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे हे सर्वांची इच्छा आहे, पण नरेंद्र मोदी हे अजूनही दहा वर्ष पंतप्रधान राहतील,ते जेव्हा दहा वर्षानंतर राष्ट्रपती होतील किंवा अजून कोणत्या पदावर जातील तेव्हा मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे
0
comment0
Report
Advertisement
Back to top