Back
जलना महापालिका चुनाव: भाजपा-शिवसेना-राकांपा के बीच कड़ी जंग
NMNITESH MAHAJAN
Dec 16, 2025 10:54:25
Jalna, Maharashtra
जालना : जालना शहरात हवा कुणाची.?(पॅकेज)
अँकर : राज्यातील महापालिका निवडणुक जाहीर झाली आहे.त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी निवडणुकिची तयारी सुरु केलीय.जालन्यात तब्बल 2017 नंतर निवडणुक होणार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. जालना महापालिका निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे,अर्जुन खोतकर,माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
व्हिओ :१:जालना महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेसाठी निवडणूक पार पडत आहे.त्यामुळं महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये..महापालिकावर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांविरोधात उभे राहणारे आमदार अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल हे आता गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीतील मित्र पक्षात आले आहेत.. महापालिका निवडणुकीचे बिगૂલ वाजल्यानंतरही अद्याप जालन्यात महायुती झालेली नाहीये.. युतीसाठी अर्जुन खोतकर यांनी भाजपला पहिला प्रस्ताव दिला..मात्र बराच काळ लोटूनही अद्याप भाजपने शिवसेनेच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे निवडणूक युतीत होणार की स्वबळावर लढवली जाणार हे अद्याप अनुत्तरित आहे. तर महाविकास आघाडी बाबत देखील अजून कोणताही निर्णय झालेला नाही.तर भाजपने इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप करत निवडणुक तयारीत आघाडी घेतलीय
बाईट- अर्जुन खोतकर, आमदार शिवसेना
बाईट- अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
व्हिओ 2- काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी कॉंग्रेसमधून काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय.गोरंटयाल यांच्यासोबत काँग्रेसच्या 28 पैकी 23 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं कॉंग्रेस समोर यावेळी नवीन उमेदवार शोधण्याचं आव्हान उभे राहिलंय.
दरम्यान महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानं भाजपने देखील निवडणुकीची तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप केलंय.दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती नंतर युती करायची की नाही हे ठरवू अस भाजपचे निवडणूक प्रमुख कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं आहे.
बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार (खुर्चीवर बसून घेतलेला बाईट)
व्हिओ- 3-शहरात तब्बल 65 जागांसाठी निवडणूक होणार आहे.2017 मध्ये शहरात 61 नगरसेवक होते आता ही संख्या वाढून 65 झाल्यानं राजकिय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. 2017 मध्ये निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेस 28,राष्ट्रवादी 9,शिवसेना 11 ,भाजप 11,अपक्ष 2 जागेवर विजयी झाले होते. तर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या पत्नी संगीता गोरंटयाल या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.मात्र गोरंटयाल यांनी काँग्रेसच्या 28 पैकी 23 नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केलाय.त्यामुळे काँग्रेसला यावेळी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. तर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानं या निवडणुकीत राजकिय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
बाईट : अहेमद नूर,राजकीय विश्लेषक( चेक्स शर्ट,चष्मा लावलेले)
समस्या ग्राफिक्स व्हिओ :4:
शहरातील समस्या
जालना हे व्यापारी शहर आहे.मात्र इथे समस्यांचा डोंगर पाहायला मिळतो. शहरात 8 -8 दिवस नळाला पाणी येत नाही.शहरातील सर्व रस्त्यांवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते.त्याच बरोबर शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला असून 4 महिन्यात 4 लहान मुलांचा बळी गेलाय.शहरातील कुंडलीका आणि सीना या प्रमुख नद्या प्रदूषित झाल्या असून या नद्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.त्याच बरोबर शहरात महात्मा फुले मार्केट पाडून ठेवलं आहे.मात्र त्याचे नव्याने बांधकाम झालेले नाही.शहरात मनोरंजनाचं एकमेव साधन असलेल्या मास्टर कृष्णराव फ़ुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालीय.शहरात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेल असून कचरा समस्या सुटलेली नाही.भूमिगग गटारे शहरात सर्व भागात झालेली नसल्यानं रस्त्यावर गटाराचे पाणी पहायला मिळत.मात्र या समस्या न सुटल्यानं शहरातील नागरिकांचा या निवडणुकीत रोष दिसून येण्याची शक्यता आहे.
बाईट : नागरिकांचे 2 बाईट आहेत(निळा शर्ट आणि लाल चेक्स शर्ट असलेली व्यक्ती)
व्हिओ:05:जालना शहराची लोकसंख्या 3 लाख 75 हजार इतकी असून या पैकी 2 लाख 2 लाख 45 हजार 929 इतके मतदार आहेत.एकूण मतदारांपैकी पुरुष मतदार 1 लाख 28 हजार 894 आहेत.तर महिलाअ 1 लाख 17 हजार आहेत.तर ईतर 34 मतदार आहेत.या मतदारांपैकी दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतदारांची संख्या जास्त असल्यानं हे मतदार कुणाच्या पारड्यात यावेळी मतदान टाकतात यावरच राजकिय पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
बाईट : सुरेश केसापूरकर,राजकिय विश्लेषक,पत्रकार(टक्कल असलेले)
व्हिओ :06:जालना शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत.त्याचबरोबर वेगवेगळ्या शेती पिकांचे बियाणे बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्यानं शहराला स्टील सिटी आणि सिड सिटी म्हटलं जातं.याच शहरात आता महानगरपालिका अस्तिवात आल्यानं ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 12:19:110
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:18:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 11:59:490
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:57:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 11:56:360
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:56:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 16, 2025 11:46:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 11:07:030
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:520
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report