Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

च chandpur governmentagar me 40-vrashiya ghar 4 foot upar uthakar pani se bacha gaya

AAASHISH AMBADE
Nov 22, 2025 07:32:16
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर शहरातील सरकारनगर भागात 2200 चौरस फुटाचे 40 वर्ष जुने घर चक्क 4 फूट वर उचलले, या घरात लगतच्या नाल्याचे पावसाळी पाणी शिरत असल्याने घरमालक सुभाष लिंगावार यांनी घेतला निर्णय अँकर: चंद्रपूर शहरातील सरकारनगर भागात 2200 चौरस फुटाचे 40 वर्ष जुने घर जॅक लावून 4 फूट वर उचलले जात आहे. शहरातील हा भाग एका मोठ्या नाल्याच्या पुराने सतत बाधित होतो..अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आणि तोकड्या नाल्या यामुळे पावसाचे 4 महिने हा भागातील नागरिक धास्तावले असतात. अनेकदा घरात पाणी शिरून मौल्यवान चिजवस्तूंचे नुकसान झाले आहे. सुभाष लिंगावार यांच्या घरात लगतच्या नाल्याचे पावसाळी पाणी शिरत असल्याने त्यांनी संपूर्ण घर पाडकाम करून पुन्हा बांधण्याऐवजी घर नव्या तंत्राने जॅक लावून 4 फूट वर उचलून समस्या निकाली. काढण्याचा निर्णय घेतला. आपल्या आर्किटेक्टशी सल्लामसलत करून हरियाणा येथील कंपनीला काम दिले. हे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. संपूर्ण घर तोडफोड न करता वर उचलले जात असल्याने खर्च आणि वेळेत बचत झाली असून समस्याही निकाली निघाली आहे.
58
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 08:02:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अजित पवार वक्तव्य मला वाटते सौदाबाजी किंवा धमकी आहे. निधी अजित पवार यांच्या घरचा नाही, निधी करातून येतो घरातून येत नाही, अजित पवार मतासाठी धमकी देत असेल तर निवडणूक आयोग काय करत आहे, की निवडणूक आयोग अजित पवार यांच्या घरी पाणी भरण्यासाठी जाणार का? स्थानिक निवडणूक आहेत, याचा गणित आघाडीला लावणे योग्य होणार नाही, फरकाही राजकीय घेऊ नयेत ऑन शरद पवार शिवसेना भूमिका आहे, कुणाची मस्ती जीरावयाची आहे त्यासाठी आपल्यात विभाजन होऊ नयेत ऑन गणेश नाईक अमित ठाकरे गुन्हा मागे घेण्याने अमित ठाकरे यांना फरक पडत नाही, तुमचं सरकार गुन्हा दाखल करतो आणि तुमचीच म्हणतात... दुप्पटी भूमिका कशासाठी आहे, गणेश नाईक बोलण्याने गुन्हा मागे होत नाही ऑन भाजप 100 जागा निवडून आल्या.... भाजपने प्रचंड दबाव तंत्र, आणि प्रशासनाचा गैरवापर केला. सत्तेचा मस्ती आणि माज भाजपला चडला आहे, भाजपच्या नेत्यांची नातेवाईक का बिनविरोध निवडून येतात....भाजपचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाही... ऑन ठाणे नगरसेवक नाव वगळले मतदार यादी जाहीर झाल्या, मतदार याद्यात मोठा घोळ आहे, हजारो ठिकाणी वार्ड रचना गोधळ आहे... वार्ड रचना करून वार्ड बाहेरील मतदार येतात कसे... सर्वच ठिकाणी अशीच बोंब आहे, मुंबई,ठाणे, पुणे अनेक ठिकाणी असेच घडले आहे. निवडणूक आयोग म्हणत आहे व्यक्तीने तक्रार करावी, प्रचंड गोधळ मतदार यादीत असून, आम्ही तक्रार करणार आहे. ऑन धाराशिव वाद कुठे ओरिजनल भाजप धाराशिवमध्ये राहिली आहे, याला कारण राणा जगजीतसिंह आहे, मोठं ध्रुवीकरण झाले आहे, आमची शिवसेना लढत आहे, काही ठिकाणी ऍडजस्टमेंन झाले आहे ऑन जयकुमार गोरे नातेवाईक पाठीशी आहे, गोरे खरे भाजपचे आहेत का? सत्तेचा मिस युज करून निवडून येतात. विकास कोणता साधला भाजपने, ऑन शेतकरी नुकसान भरपाई 40 टक्के लोकांना नुकसानभरपाई आली असेल, पण जी जाहीर झाली ती अजून आलेली नाही. आता जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही पंचनामा करणार आहे. ऑन महेश सावंत ठाकरे आणि महाविकास आघाडी वेगळी आहे का? उद्धव ठाकरे यांनी म्हाविकास आघाडी बनवली आहे. ऑन शिंदे मंत्री भाजपमध्ये जाणार आहे. आत्ताच्या घडीला शिंदे यांचे कित्येक मंत्री ऐकत नाही, त्यांना फडणवीस ऑपरेटिंग करत आहे, उदय सामंत त्यांचे लीड करत आहे. जसे सामना सांगत आहे तसे होऊ शकतात. आज नाहीतर उद्या हे लोक भाजपमध्ये जाणार आहे. गद्दार आमच्याकडे प्रवेश नाही. ऑन मनसे दुबार योजना आरोप मतदार यादी चुकल्या आहे, महानगरपालिका यादी अधिक चूक आहे. वार्ड बाहेरील लोकांचे नाव आहे. सीमारेषा बाहेरील नावं आहे. निवडणूक आयोग झोपले आहे, एक स्टार नाही, दोन स्टार नाही.... ऑन केशव उपाध्य केशव उपाध्य साधा माणूस नाही, त्यांना घरात बसून बोलणे, ठाकरे अजून भल्यााभल्यानं कळली नाही, त्यांना काय कळणार.. ऑन बावनकुळे ऑन महाविकास आघाडी महाविकास आघाडी मुंबईत महायुतीला चित करेल...
101
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 22, 2025 08:02:29
Jalna, Maharashtra:जालना:परतूर,जालना अजित पवार पॉईंटर : *अर्थ खाते माझ्याकड आहे.जेवायला पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे.मि वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो आहे आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.* : याआधीही आपण वेगळ्या निवडणुका लढवल्या.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लवकर झाली नाही याची मला खंत : नऊ वर्ष निवडणूक झाली नाही.लोकसभेची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी असते.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्थानिक पातळीवरील असते. : 30 वर्ष एखाद्या पालिकेत सतत निवडून येणं सोपं नाही जे जेथलिया यांनी करून दाखवल आहे.. : *स्व.यशवंतराव चव्हाणांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,अजित पवारांनी केली भाषणात चूक,नंतर भाषणातच मागितली माफी* *छत्रपತಿಯ शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.माफ करा-अजित पवार* : नियोजनबद्ध पध्दतीने विकास करून चालत नाही,सर्वसमावेशक विकास असला पाहिजे [: चांगल्या विचारांच्या उमेदवारांना निवडून द्या-अजित पवार : महायुतीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे,विकास झाला पाहिजे : *चांगलं काम करण्यासाठी अधिकारी टिकणं महत्वाचं.अधिकारी टिकत नाही याचा अर्थ टाळी एका हाताने वाजत नाही,आमच्याकडे एकदा अधिकारी आला की 3 वर्ष जात नाही* : *राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या,5 वर्ष निधी कमी पडू देणार नाही.ज्याला पुढारपण करायचं आहे त्याने कॉन्ट्रॅक्टरशिप करू नका.,अजित पवारांचा उमेदवारांना सल्ला* : *अजित पवारांचा राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराचे पती बाबू हिवाळे यांना व्यासपीठावरून टोला, म्हणाले आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराच्या पतीचे फॅमिली प्लॅनिंग जोरात,त्याला दोन मुलं आहे, साडेतीन एकर शेती करतो,पण नगर परिषदेचा कारभार त्याची पत्नी बघेल* : *विकासकाम कधीच पूर्ण होत नाही.लोकांच्या गरजा वाढतात तशी काम वाढतात* : *अर्थ खाते माझ्याकड आहे.जेवायला पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे.मि वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो आहे आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. : *आमचे उमेदवार निवडून द्या.आम्हाला साथ द्या.परतुरला निधी मिळण्यात अडचणी येऊ देणार नाही-अजित पवार*
59
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 22, 2025 08:00:49
74
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 22, 2025 07:32:29
Navi Mumbai, Maharashtra:घाटकोपर के CGS कॉलोनी क्षेत्र में गुरुवार एक भांडण से एक व्यक्ति की हत्या हो गई। मृतक का नाम सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर है, वे विक्रोळी पार्कसाइट क्षेत्र में रहते थे। आरोपी अमन श्रीराम वर्मा, 19 वर्ष, को पुलिस ने लगभग पांच घंटे में गिरफ्तार कर लिया। सुरेंद्र घाटकोपर रेलवे स्टेशन परिसर में घूम रहे थे; CGS कॉलोनी के पास चल रहे थे, तभी उनके साथ धक्का-झगड़ा शुरू हुआ और मारपीट हुई। आरोपी ने पास में लोहे की रॉड उठाकर सुरेंद्र के सिर पर मार दी, जिससे सिर को गंभीर चोट आई और वह गिर पड़े। स्थानीय लोगों ने पुलिस को सूचना दी; घाटकोपर पुलिस मौके पर पहुंची और जख्मी सुरेंद्र को नजदीकी निजी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष जाधव के मार्गदर्शन में पथक ने लगभग 80 CCTV कैमरों की जांच कर पांच घंटे के भीतर रमाबाई कॉलोनी से आरोपी को गिरफ्तार किया.
56
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 22, 2025 07:18:30
174
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 07:04:45
Nashik, Maharashtra:*नाशिक @ गणेश ताठे - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ* *पत्रकार परिषद मुद्दे:-* - १४ ऑगस्ट २०२५ ला किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्निर्मिती करण्यात आली - ६७ शेड्युल आहे त्यानुसार किमान वेतन देण्यात येते - हे मंडळ शासनाला वेतानाबाबत शिफारस करण्यात येते - समतोल राखून वेतन देण्यात येण्यासाठी आमचा प्रयत्न - आम्ही काल नाशिकमधील कंपन्यांना भेटी दिल्या - मॅनेजमेंटसोबत आम्ही चर्चा केली - मंडळाचा महत्वाचा उद्देश आखला आहे - अतिकुशल कामगाराचे वेतन निर्धारित करावे असा आमचा प्रयत्न - कामगार आणि उद्योजक यांचा समतोल राखण्यासाठी हे मंडळ - चार पाच कंपन्यांना भेटी दिल्या तिथं अनुचित प्रकार आढळून आला नाही - वेतनाची चोरी करत असल्यास गय केली जाणार नाही - मंडळ त्यांची दहा पटीने रिकव्हरी करेल - वेतन चोरी करत असल्यास लेखी तक्रार द्यावी - किंवा ईमेल आयडीवर तक्रार पाठवा - अनुचित प्रकार करत असेल तर शासन त्यावर कारवाई करेल - किमान वेतन निर्धारित करायची आहे - त्यानुसार सूचना आणि हरकती मागविल्या जातात - जनजागृती आम्ही करणार आहोत - मंडळाचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे - प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे - काल महिंद्रा आणि महिंद्रा, ग्लेन मार्क, जेनिथ, इनोव्हा रबर इथं भेटी दिल्या - कामगारांचे मतही जाणून घेतली - आयुक्तलयाने अजून फलक लावले नाही - आठ दिवसांपूर्वी इतिवृत्त निघाले - पुढील आठ दिवसांत किमान वेतनाचे फलक लावलेले दिसतील
108
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 06:51:02
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी यंदा महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वारसा लाभलेल्या आठ महिला उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे.दोन कॅबिनेट मंत्र्यांचा राजकीय वारसा असलेल्या अकोट शहरात नेहमीच राजकारणाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.अकोट नगर परिषद अध्यक्षिता کان्ग्रेसकडून अलका बोडखे यांना उमेदवारी देण्यात आली अलका बोडखे या माजी मंत्री रामदास बोडखे यांच्या सून असून, त्यांचे पती संजय बोडखे हे माजी नगराध्यक्ष आहेत. शहरातील प्राथमिक गरजा, आरोग्य सुविधा आणि नगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर त्यांनी भर दिला आहे. अलका बोडखे, काँग्रेस उमेदवार. मागील विधानसभेत भाजपविरोधात काम केल्याच्या आरोपांनंतर स्वाती चिखले यांचे पती मंगेश चिखले यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांनी भाजप मधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. मंगेश चिखले हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.महिला आरक्षण लागू झाल्यानंतर स्वाती चिखले आता मैदानात आहेत. शहराच्या विकासासाठी साडेचार हजार कोटी येऊनही ‘विकास कुठे दिसत नाही’ असा सवाल करत त्यांनी भाजपवर भ्रष्टाचार आणि अपयशाचा आरोप केला. महिलांचे शौचालय, रोजगार, शेतकरी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.माया धुळे, भाजप उमेदवार. भाजपने त्यांच्या माजी नगरसेविका माया धुळे यांच्यावर विश्वास ठेवत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्यापुढे महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांचे सुद्धा आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ.प ) गाजिया बानो मो. बद्रुजन्मा आणि भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या चंचल पितांबरवाले या देखील भाजपपुढील महत्त्वाचं आव्हान ठरत आहेत.शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा करीत त्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रतिवाद केला आहे.
123
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 22, 2025 06:07:15
Nagpur, Maharashtra:बरोबर है माल घेणारा कोण आहे ? तेजवानी कडून जमीन घेणारा माणूस त इतका मोठा आहे की त्याला जमीन विकणारी घेणारी गरीब कशी ... जो व्यवहार 300 करोडचा होता. आजकाल संपत्ती पाहून ट्रीटमेंट मिळत असेल तर गरिबांनी न्यायाचीच अपेक्षा करू नये.. न्याय दुरापस्थ झाला आहे.. पोलीस स्टेशनची पायरी चढू शकत नाही अशी अवस्था.. गरीब कोर्टामध्ये न्यायासाठी जाऊ शकत नाही.. ही अवस्था देशात निर्माण झाली आहे. त्याचाच तो एक भाग आहे. त्यामुळे तेजवानीला एक ट्रीटमेंट आणि इतरांना वाईट ट्रीटमेंट... हे सगळं प्रकरण यांची मिलीभगत आहे... हे आता सिद्ध झाल आहे... हे थोडसं पुढे आलं म्हणून नाहीतर आत्तापर्यंत 1800 कोटीची जमीन घशात घातली असती... अशा करोडच्या जमिनी घशात घातले आहे... आमची माहिती मागवणे सुरू आहे
166
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 22, 2025 06:05:50
114
comment0
Report
Advertisement
Back to top