Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भरधाव ट्रैक्टर ने कार को टक्कर दी, तीन घायल, चालक फरार

PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:01:30
Bhandara, Maharashtra
भरधाव ट्रॅक्टरची कारला धडक... तिघे गंभीर जखमी... चालक फरार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे वरठी येथून देवरीकडे जात असलेल्या एका चारचाकी वाहनाला अज्ञात ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून जबर धडक दिली. या अपघातात कार चालकासह एकूण तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 10, 2025 03:16:02
Satara, Maharashtra:सातारा - महाराष्ट्र वन विभागाच्या ‘ऑपरेशन तारा’ उपक्रमाला मोठे यश मिळाले असून ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वर्षांची मादी वाघीण T7-S2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान, सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आले आहे. ही वाघीण ८ डिसेंबर रोजी ताडोबाच्या कोलारा कोअर रेंजमधून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने तिला आज सॉफ्ट रिलिज पद्धतीत कुंपणात सोडण्यात आले आहे. काही दिवसात स्थानिक भूभाग, भक्ष्य आणि पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकते. खुल्या जंगलात सोडण्यापूर्वीचा हा महत्त्वाचा टप्पा असून तिच्या सुरक्षित पुनर्स्थापनेसाठी उपयुक्त आहे. संपूर्ण प्रक्रिया भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली पार पडली. राष्ट्रीय स्तरावर NTCA या मोहिमेचे निरीक्षण करत आहेत. ही कारवाई ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त पथकांनी यशस्वीरीत्या राबवली.
23
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 03:00:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील २३ गृहप्रकल्प आणि ३१ प्लॉटिंग व्यावसायिकांनी 'यूडीसीपीआर' नियमांचे उल्लंघन केले आहे. या नियमांनुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका हद्दीत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांतील २० टक्के जागा म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक विकासकांनी गरिबांच्या वाट्याची २० टक्के जागा म्हाडाला न देता स्वतःच विकली आहे. यामुळे उशिराने जाग आलेल्या म्हाडाने या प्रकल्पांची रजिस्ट्री रोखण्याचे आदेश सहजिल्हा निबंधकांना दिले आहे तर गृहप्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला न देण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत. या प्रकल्पांत ८०९ फ्लॅट व ७२ हजार चौरस मीटर भूखंड आहेत. हे सगळे आता नियमात अडकणार आहेत.... या प्रकरणात म्हाडाने नोंदणी विभाग आणि महापालिकेच्या उपसंचालक यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. नियम पाळले नाहीत तर परवाने मिळणार नाहीत अशी पवित्रा प्रशासनाने घेतला आहे...
172
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 02:48:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमधील अनियमिततेचा मुद्दा आता अधिकच गंभीर बनला आहे. विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या तक्रारींनंतर सुरू झालेल्या चौकशीची व्याप्ती वाढत संवर्ग ३ मधील ९ शिक्षकांच्या निलंबनानंतर आता संवर्ग १ आणि २ मधील तब्बल ४९ शिक्षक चौकशीच्या रडारवर आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या बदल्यांची संपूर्ण कागदपत्रे तपासण्यासाठी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना १२ डिसेंबरला मुख्य कार्यालयात चौकशी समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील बदल्या प्रक्रियेत नेमकी कोणती अनियमितता झाली? जबाबदार कोण? आणि पुढील कारवाई काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
158
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 02:45:50
195
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 02:34:29
167
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 10, 2025 02:34:13
114
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 10, 2025 02:31:23
Nashik, Maharashtra:बालक विक्री प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन्ही आई-वडील घोटी पोलीस स्टेशन मध्ये स्वतःहून हजर झाले आहेत. या प्रकरणात सरकारने एक समिती गठन केली असून पोलिसांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन मध्यरात्री तपास केला. टाके देवगाव येथील बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या लोकांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर या घरातील असलेली लहान लहान मुलं यांच्याशी चर्चा केली. या कुटुंबातील ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुला मुलींना जन्म दिला, मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या १४ मुलामुलींपैकी ६ मुल आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोरं आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे
202
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:31:13
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवटा.... गृहिणीच्या डोक्यावर ताण वाढला...ग्राहकांची गॅस सिलेंडरसाठी धावाधाव... भंडारा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा घराघरांत जाणवू लागला आहे. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिलेंडर मिळत नसल्याने काहींनी तर चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. एकीकडे धुरामुळे डोळ्यांना आजार होत असल्यामुळे शासनाने प्रत्येक घरी उज्वला गॅस योजना दिली. पण आता सिलेंडर मिळत नसल्याने महिलांची हेळसांड होत आहे.. सिलिंडरचा नंबर लावूनही मिळत नसल्याने ग्राहक संबंधित गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. स्वयंपाकासाठी गॅस न मिळाल्यामुळे घरच्यांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपने मध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाल्याने गॅस सिलेंडर येत नाही आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलेंडर वितरीत होत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र एकीकडे घरगुती गॅस सर्व सामान्य लोकांना मिळत नाही पण दुसरीकडे हेच सिलेंडर व्यावसायिक लोकांकडे हॉटेल मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे गॅस वितरण एजन्सी यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
158
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 02:02:57
Jalna, Maharashtra:जालना : नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त(जनरल, पीकपाणी) अँकर : जालन्यातील भोकारदन तालुक्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 9 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.मात्र, परतीच्या पावसाने आणि अवकाळी ढगफुटीमुळे परिस्थिती बदलली. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचले. वाफेवरची वाढ थांबली. तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार 62 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले. शासनाने पंचनामे करून तातडीची मदत दिली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी थोडा आधार मिळाला. मात्र, खरी दिलासा देणारी पिकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरला. तरीही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी हालचाल नाही. त्यामुळे नाराजी वाढली आहे. पूर्वी ''एक रुपयात पिकविमा' योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. ही योजना बंद झाल्याने आता विमा हप्ता मोठा झाला आहे. आर्थिक अडचणीच्या काळात हा हप्ता भार बनतो. त्यात भर म्हणजे नुकसान असूनही भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पिकविमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या विमा कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत. पंचनामे झाले आहेत. नुकसान स्पष्ट दिसत आहे. तरीही विमा रक्कम मिळत असल्याने पीकविमा कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
185
comment0
Report
Advertisement
Back to top