Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

औरंगाबाद HC: बालगृह सुरक्षा पर केंद्र-राज्य से विस्तृत शपथपत्र मांगा

VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 02:45:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
बालगृहात सज्ञान झालेल्या मुलींच्या निवारागृहासाठी काय केले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारकडे केली. यासंबंधी केंद्र आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कठोर शब्दांत ताशेरे ओढताना केंद्र, राज्याने नव्याने ८ जानेवारी २०२६पर्यंत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले. पुढील सुनावणी १२ जनवरी २०२६ रोजी ठेवली आहे. औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेत अमयकास क्युरी नियुक्ती करत सुनावणी घेतली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Dec 10, 2025 04:18:34
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 04:05:08
79
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 10, 2025 04:03:39
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri mahayuti kailas puri Pune 10-12-25 feed by 2c Mahayuti पार्श्वभूमीवर शहरात एकमेकांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयावरून चर्चा सुरू असून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. भाजपकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात असून आतापर्यंत आठशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत; राष्ट्रवादी काँग्रेसकडेही अनेक पदाधिकारी अर्जदार आहेत. महापौर पद, भूषवलेल्या शकुंतला धराडे, विधी समिती अध्यक्षपद भूषवलेले प्रसाद शेट्टी व अन्य ४० माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याच संदर्भात भाजप शहराध्यक्ष शत्रुघन काटे यांच्याशी चर्चा केली गेली.
79
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 10, 2025 04:01:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलपुरातील होम मैदानावर क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नरेंद्र गुडशेलू असे 42 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. काल संध्याकाळी गुडशेलू हे सोलापुरातील होम मैदान येथे आपल्या मित्रासह क्रिकेट खेळत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले. सोबत असलेल्या मित्रानी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
79
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 10, 2025 04:00:50
Shirur, Maharashtra:पुणे–अहिल्यानगर हायवे पर शिरूर तालुक्यात कासारी फाटा में भीषण अपघात हुआ। अहिल्यानगर से पुणे की ओर जा रहे फूलों से भरे पिकअप वाहन को पीछे से आए एक टेम्पो ने जोरदार धक्का दिया। धक्के के कारण पिकअप पलट गया और टेम्पो रस्ते के किनारे स्थित टपरी शेड में घुस गया। इसी दौरान पुणे से अहिल्यानगर की तरफ जा रही कीया कार को भी टेम्पो ने ठोकर दी। साथ ही दो–तीन दुपहिया वाहन भी टेम्पो के नीचे आ गए। घटनास्थाल पर कुछ यात्रियों के घायल होने की जानकारी है, फिलहाल जानमाल की भारी हानि नहीं बताई गई। पुणे–नगर हायवे पर यातायात काफ़ी जाम था जिसे स्थानीय पुलिस ने मौके पर पहुँचकर नियंत्रण में लिया और ट्रैफिक हटवाए।
69
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 03:51:33
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कारंजा,मंगरूळपीर ,रिसोड या तीन नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली.मात्र वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषदेतल्या दोन प्रभागांवरील न्यायालयीन अपील प्रलंबित असल्याने येथे सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.सुधारित कार्यक्रमानुसार,वाशिम नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.त्यानंतर उद्या ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.आयोगाच्या पत्रातील चार मुद्द्यांमुळे आणि अपील प्रलंबित असल्याने वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.या घडामोडींमुळे वाशिम शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.रिसोड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५-ब आणि १०-अ या दोन जागांसाठीही सुधारित कार्यक्रम जाहीर झाला असून,२० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.आता सर्व प्रमुख पक्षांनी आपला प्रचार या दोन प्रभागांवर केंद्रित केल्याने आगामी काळात राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
104
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 10, 2025 03:49:55
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केळीला दर मिळत नाहीत आणि करपाच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकीकडे बाजारात केळीचे दर कोसळले असून उत्पादन खर्च देखील न निघण्याची अवस्था आली आहे. तर दुसरीकडे करपाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीच्या झटक्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे करपा रोग झपाट्याने पसरत असून अनेक बागांची वाढ ठप्प झाली आहे. पानांवर काळपट डाग, कुज, वाळणे यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. करपा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीचा मोठा खर्च करावा लागत आहे. मात्र सतत बदलणारे हवामान, वाढती आर्द्रता आणि फवारणीच्या खर्चात झालीले वाढ यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत चालले आहेत. शेतकरी संघटनांनी सरकारकडे तातडीने मदत, योग्य दर हमी, तसेच करपा नियंत्रणासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि अनुदानित फवारणी योजना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. हंगामाच्या मध्यावर आलेल्या या दुहेरी संकटामुळे केळी उत्पादक शेतकरी हतबल झाले असून पुढील काही दिवस परिस्थिती सुधारली नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे. बाजारात योग्य दर नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केळी खरेदीसाठी पोहचत नसल्याने परिणामी बागेतच झाडावर केळी पिकून जाऊ लागली आहेत. वेळेवर तोडणी न झाल्याने फळांचे वजन कमी होत असून दर्जाही खालावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी तोटा सहन करावा लागत आहे
133
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 03:49:34
118
comment0
Report
Advertisement
Back to top