Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

धक्कादायक खुलासे: कृष्णा आंधळे की तलाश में पुलिस की असफलता पर बड़ा सवाल

MMMahendrakumar Mudholkar
Feb 21, 2026 10:12:15
Beed, Maharashtra
धनंजय देशमुख यांनी धक्कादायक खुलासे केले. - कृष्णा आंधळे सापडत नाही हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. - तीन-चार वेळेस कृष्णा आंधळे गावाकडे आला त्याची माहिती धनंजय देशमुख यांनी सीआयडीला दिली. मात्र तो सापडत नाहीयाचा अर्थ पोलीस यंत्रणेतीलच अधिकारी त्याचा बचाव करतायत असा निष्कर्ष काढायला काय हरकत नाही. - मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की यामध्ये तुम्ही लक्ष घालून तपासी यंत्रणेला सक्त आदेश द्यावेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Feb 21, 2026 11:48:09
Nagpur, Maharashtra:बॉयट --शिवलिंग पटवे उच्च माध्यमिक नागपूर विभाग मंडळ पॉईंटर ----- रसायनशास्त्राच्या पेपरच्या दिवशी 18 तारखेला साधारणता एक साडेदहाच्या नंतर आणि अकराच्या दरम्यान एका मुलीच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका सदृश मटेरियल उपलब्ध झालेला आहे. ही मुलगी साडेदहा वाजता स्वतःच्या परीक्षा कक्षामध्ये पेपर द्यायला गेली होती. आणि तो मोबाईल तिच्या बॅगमध्ये होता साडे दहा ते अकराच्या दरम्यान ती आतमध्ये होती. अकरा वाजता तिला प्रश्नपत्रिका दिली,वर्गातील पर्यवेक्षकांनी. आणि तिने उत्तरही लिहिली. साधारणतः बाराच्या सुमारास ती वाशरूमला जायचं म्हणून वर्गातून बाहेर निघाली. नॉर्मली वॉशरूमला गेलेले विद्यार्थी पाच मिनिटांमध्ये परतात. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळे वर्गातील ज्या परिवेक्षकि़ना होत्या त्यांना लक्षात आलं की ही काहीतरी बाहेरून जाऊन मटेरियल सोबत घेऊन आलेली आहे. त्यांनी तिची जर बॉडी लँग्वेज बघितली आणि तिची तपासणी केली. तिच्या पॉकेटमध्ये मोबाईल आठवण आला त्यानंतर त्या परिवेक्षकांनी आपल्या केंद्र संचालकांच्या निदर्शनाची बाब आणून दिली. त्यानंतर पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांनी तातडीने पुढची कार्यवाही केली. बोर्ड म्हणून आम्ही तातडीने पोलिसांना लेखी आमचं निवेदन दिलं आहे. त्यावर पोलिसांच्या लेव्हलवर ते कार्यवाही करत आहेत. ह्या मुलीन हा पेपर बारा वाजताच्या सुमारास पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याला आपण विद्यार्थ्यांना पेपर फुटून मिळालेला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. एखाद्या वैयक्तिक विद्यार्थ्याला हा 11 च्या नंतर पेपर मिळालेला असण्याची शक्यता आहे. आणि तो अकरा वाजता तसाही पेपर आपल्याला विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो. तर यामध्ये जे कोणी दोषी आहे त्या सगळ्या दोषींवर आपण मंडळातील नियमावली आहे. सोबतच महाराष्ट्राचा कायदा माल प्रॅक्टिसच्या विरोधात त्या कायद्यानुसार आपण कार्यवाही करत आहोत. आणि कोणीही यामध्ये दोषी विषय असेल त्याला आपण शिक्षा कशी होईल याची काळजी घेतोय. ह्या च्यामध्ये पेपर शाळेमध्य शाळेमधल्या स्टाफने हे पकडून दिले आहे. गैरप्रकार त्यांना दिसून आला. फक्त आपण पर्यवेक्षक यासाठी बदलवले कारण भविष्यामध्ये एक मेसेज यामार्फत देणे आहे त्याच्यातला आपला पार्ट होता. आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भविष्यामध्ये कोणीही गैरप्रकार करू नये त्यासाठी आपण घेतलेले हे पाऊल आहे. जर मुलीची जी आहे या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची बोर्डाची नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार याच्यामध्ये चौकशी अधिकारी नियुक्त होऊन तो चौकशी करत असतो. यात जर विद्यार्थी दोषी आढळला तर त्याच्यावर तीन वर्षासाठी प्रतिबंध असेल अशा पद्धतीने आपण काम करत असतो. विद्यार्थी दोषी असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे. पोलिसांकडे प्रकरण दिलं आहे मोबाईल नंबर आहे त्यांच्याकडे ते तपास करतील... आणि दोषींवर कारवाई करतील
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 21, 2026 11:46:02
Malegaon, Maharashtra:राऊत साहेबांनी प्रचंड मला मदत केली आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे... त्यांच्यावर जो खटला झाला तो माझ्यामुळेच झाला होता ही वस्तुस्थिती आहे... संजय राऊत यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत.. त्यांनी जी मला मदत केली ते मी त्यांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही.. मंत्री महोदयांनी मोठ्या मनाने ही याचिका मागे घेतली मी त्यांचेही आभार मानतो.. या प्रकरणी केस जी आहे ती न्याय प्रविष्ट आहे.. त्यावेळी या केसचा दूध का दूध पाणी का पाणी होईल.. जर या केसमध्ये तथ्य नसत तर मग ही केस 2017 पर्यंत चालू का होती ? या केसचा निकाल का लागला नाही.. संजय राऊत यांनी सांगितलं की अद्वय हिरे हे आता भारतीय जनता पार्टीत गेले त्यांना या केससाठी शुभेच्छा आहेत... या केसच्या प्रकरणी माझी माहिती जर खोटी असली तर ते निकालात येईल, कोर्ट ठरवेल..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 21, 2026 11:37:52
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर/पुणे Anc:किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियातून ट्रोलिंग सुरू आहे. मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभे ठेवत त्यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचे दिसते.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे दृश्य राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घडले असल्याने नेटकऱ्यांनी बुचके यांच्यावरून संताप व्यक्त केला. यामुळे कार्यक्रमाच्या शिस्तीवर आणि राजकीय शिष्टाचारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जन्मोत्सव सोहळा सुरू असताना "पाळणा" म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलून बुचके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर फोटो साठी पोझ दिल्याचे दिसते. हे वर्तन शिवजयंतीच्या साजऱ्याला अयोग्य ठरत असून, सोशल मीडियावर मीम्स आणि टीका सुरू आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 11:31:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या विटा मध्ये भाजपच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्यात आले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्गात काम करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी गुहागर-कराड राष्ट्रीय मार्गाचे काम बंद पाडले. 30 फूट रस्ता असताना विटा नगरपालिका ने 21 फूट रेखांकन केले आहे, त्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम करण्यात येत आहे, मात्र यामुळे विटा शहरातील रस्ता अरुंद होणार असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचाLeadershipाखाली रस्त्याचे काम बंद पाडत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 21, 2026 11:19:31
Shirur, Maharashtra:रांजणगाव गणपतीत दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याचा प्रयत्न फसलाय. रांजणगाव गणपती येथे दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याचा प्रयत्न फसलाय. रांजणगाव येथील नरवडे हॉस्पिटल शेजारी असलेल्या पिसाळ सुपर मार्केटमध्ये दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोघांनी महिलेला लक्ष्य करत मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित महिलेने धाडसाने प्रतिकार करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला. या घटनेत मंगळसूत्र सुरक्षित राहिलं असून दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 11:08:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अंजनी गांव के गहूं उत्पादक किसान दत्तात्रय पाटील के खेत में एक फुट लोंबी वाला गहूं उगा है। सांगली जिले के तासगांव तालुक्‍ये अंजनी में प्रगतिशील किसान दत्तात्रय पाटील ने गहूं के पिक से भरपूर उत्पादन किया है। उनके खेत में 35 गुंठे क्षेत्र में आधुनिक गव्ही वैरायटी के साथ योजना बनाकर उत्पादन किया गया है। लगभग 25 क्विंटल गहूं उत्पादन की उम्मीद है, इसके लिए लगभग 21 हजार रुपए खर्च आया है और 12–13 लाख रुपए का उत्पादन मिलने की संभावना है, ऐसी अनुमान दत्तात्रय पाटील ने व्यक्त किए हैं। पाटील के इस गहूं के पिक की आमदार रोहित पाटील ने भी नजर देखी और किसान दत्तात्रय पाटील की प्रशंसा की। इस विक्रमी गहूं की लोंबी देखने के लिए किसान भीड़ जुटते हैं।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 21, 2026 11:01:13
Kolhapur, Maharashtra:भारत दौऱ्यावर असणाऱ्या फ्रान्सचे अध्यक्ष इम्युन्युएल मॅक्रान यांना व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापूर जिल्ह्यातील ठिपकुर्लीच्या बर्फीने भुरळ घातली आहे. अस्सल दुधाच्या गोड बर्फीची चव या दोन्ही नेत्यांनी चाखली. कोणत्याही कृत्रिम रंगाचा न वापर करता पारंपारिक पद्धतीने बर्फी तपासण्याचे टप्पे पार केल्यानंतर पाहुण्यांना आणि शिष्टमंडळाला कोल्हापूर जिल्ह्यातील ठिपकुर्लीच्या बर्फीने तृप्त केले. फ्रान्सचे अध्यक्ष इम्युन्युएल मॅक्रान यांच्यासाठी भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची ऑर्डर देण्यात आली होती, त्यामध्ये कोल्हापूरच्या ठिपकुर्लीच्या बर्फीचा देखील समावेश होता. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर ही बर्फी बनवून घेण्यास सांगितले, आणि त्यानंतर ही बर्फी पाहुण्यांच्या पाहुणचारात पोहोचली.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 21, 2026 10:49:10
Navi Mumbai, Maharashtra:प्रभाग समित्यानवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात जुम्पली. नवी मुंबई मनपाच्या 8 प्रभाग समित्यांची घोषणा करण्यात आलेय. मात्र या प्रभाग समित्या जाहीर करताना शिवसेना शिंदे गटाला केवळ 1 प्रभाग समिती मिळेल याची काळजी घेत इतर सर्व प्रभाग समित्यावर भाजपाचे वर्चस्व असेल अशी रचना करण्यात आलेय. पॅनल क्रमांक 1, 6 आणि 14 मिळून प्रभाग समिती बनविण्यात आली असून यावर तीव्र आक्षेप विरोधीपक्षाने घेतलाय. केवळ शिवसेनेला प्रभाग समिती मिळू नये म्हणून पॅनलची मोडतोड करण्यात आली असून प्रभाग समिती तुम्हाला ठेवा पण नागरिकांची कामं होतील अशी रचना करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी केलेय. तर निवडणुकीत प्रभाग करताना अनेक ठिकाणी मोडतोड करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना गैरसोय होणार नसून ज्यांना काम करायचेय ते सदस्य नक्कीच काम करू शकतील अशी प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 21, 2026 10:47:11
Buldhana, Maharashtra:ही घटना सरकारला देखील काळीमा फासणारी गोष्ट आहे सरकार चां देखील अपमान आहे शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरण हात बाहेर जाऊ देऊ नये सगळ्यांवर मोका लावणे गरजेचे आहे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे आज सहा वाजेपर्यंत सर्व आरोपीवर गुन्हे दाखल झाले नाही तर पंचवीस तारखे नंतर सर्व राज्याचे मराठे या गावात येऊन आंदोलन करतील अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे त्याच्या कुटुंबाला वाटत असेल तर चौकशी झाली पाहिजे आमचा चांगला माणूस यात गेला आहे महादाव मुंढे चे प्रकरणात नार्को टेस्ट झाल्यावर सगळ पुढे येईल धन जय मुंढे आणि यांनी असे प्रकार केले आहेत देशमुख कुटुंबाचे प्रकरण खूप गंभीर घ्यावे लागेल नाही तर देशमुख कुटुंबाला धोका होईल वाल्मीक कराड ने सुप्रीम कोर्टात जावे की ट्रम्प कडे जावे त्यांना सुटीच नाही
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 21, 2026 10:34:54
Akola, Maharashtra:मोबाईलवर सध्या रील्सचा मोठा ट्रेंड सुरू आहे. स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी अनेक जण समाजमाध्यमांचा आधार घेत आहेत. मात्र एका रीलची किंमत तब्बल २० लाख रुपये मोजावी लागेल, याची कल्पना अकोल्यातील एका महिलेलाही नव्हती. हो… २० लाखांची रील, ऐकून धक्का बसलाच ना? अकोला शहरातील जुन्या शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ फेब्रुवारी रोजी एका घरात मोठी चोरी झाली. घरातून तब्बल १९ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ९० हजारांची रोकड असा एकूण जवळपास २० लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या ९ दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी धक्कादायक होत्या. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेने विश्वास संपादन केला आणि दोघी मिळून रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशीही रील बनवण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेंनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावलं आणि रील शूट करताना तिने फिर्यादीचे लक्ष विचलित केले आणि संधी साधत अलमारीतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे २० लाखांचा ऐवज चोरला. यानंतर आरोपी महिलेने चोरीचे दागिने आणि रोकड आपल्या मित्रांकडे लपवून ठेवली आणि सर्व काही सामान्य असल्याचे भासवत शांत बसली. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांची चौकशी सुरू केली. सखोल तपасानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या शहर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून एक महिला आणि तिच्या तीन साथीदारांना अटक करून पुढील तपास करत आहे. Final Vo : रीलच्या बहाण्याने मैत्री, आणि मैत्रीच्या आडून विश्वासघात… अकोल्यातील ही घटना सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावासोबत सावध राहण्याचा इशारा देणारी ठरते.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 10:33:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:देशातील उत्पादकता हळूहळू कमी होण्याची भीती आहे - मंत्री आशिष शेलार. देशातल्या वाढत्या डिजिटल ऍडीकशनमुळे देशातील उत्पादकता, नाविन्यपूर्णता आणि उद्यमशीलता हळूहळू कमी होतय,का काय अशी भीती निर्माण झाल्याचं मत राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला, सांगलीच्या मिरजेमध्ये गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने फ्लोक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशाच्या आर्थिक अहवालामध्ये डिजिटल ऍडीकशन मुळे उत्पादकता हळूहळू कमी होते का काय आणि हे देशाच्या आर्थिक प्रगतीत गतिरोधक बनतय की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं, भीती मंत्री शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 21, 2026 10:22:10
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेची पहिलीच महासभा मोठ्या गोंधळात पार पडली. सत्ताधारी भाजपने स्थापित केलेल्या तदर्थ समिती वरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. कोरोना काळात प्रशासकीय कार्यकाळात नगररचना, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग तसेच या विभागा व्यतिरिक्त इतर विभागाने केलेल्या कामांची इतंभूत माहिती मिळवून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने या समितींची स्थापना करण्यात आलेय. मात्र महासभेतील ठरावावर देखिल एक तदर्थ समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती म्हणजे आयुक्त आणि सर्व सदस्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असून वेळ पडल्यास या समिती विरोधात शासनाकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी व्यक्त केलेय. तर प्रशासकीय कार्यकाळातील माहिती नवी मुंबईकर जनतेला कळावी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी या समित्या असून महासभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी तदर्थ समिती स्थापन केली असल्याची प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 21, 2026 10:03:49
Ambernath, Maharashtra:गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी बदलापुरातील धक्कादायक प्रकार पोलिसांकडून तीन महिलांना अटक आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय Anchor - बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. हे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय Vo बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं. त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या बादलापुरातील अंडाशय तस्करीमागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात 300हून अधिक महिला पीडित असून त्यांना अंडाशयामागे वीस हजार रुपये दिले. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येत असल्याचा संशय आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. पोलिसांनी मात्र या संपूर्ण तस्करी बद्दल काहीही बोलण्यास नकार दिलाय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top