Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जलगांव के जिल्हाधिकारी आयुष प्रसाद को MPDA कानून के गलत इस्तेमाल पर 2 लाख रुपये का दंड

VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 02:49:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 'एमपीडीए' कायद्याचा बेकायदेशीर वापर केल्याबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि - न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या - खंडपीठाने हा कठोर निर्णय दिला असून, हा दंड जिल्हाधिकारीांच्या वैयक्तिक पगारातून वसूल करून, तो पीडित व्यक्ती, दीक्षांत ऊर्फ दादू देविदास सपकाळे, यांना देण्याचे आदेशात नमूद केला आहे. जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन' केल्याचं खंडपीठाने आपल्या आदेशात, शासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 05:03:28
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 05:03:00
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यां पाठोपाठ कांदा उत्पादक शेतकरी ही निसर्ग आणि बाजारपेठेची मार सहन करत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केलं असताना, कांद्याला भाव मिळत नसल्याने आता कांदा उत्पादक शेतकरी ही हदबल झाल्याच दिसून येत आहे. मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. मे महिन्यात साठवून ठेवलेल्या कांद्याला तेव्हाही दर नव्हता आणि आताही दर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याला चाळीतच अंकुर फुटायला लागलेले आहेत. त्यामुळे बहुतांश कांदा सडत असून उर्वरित कांदाला अंकुर फुटत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादित कांद्याला आता उकिरड्यावर टाकल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी आता शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षात आहेत. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थेट सप्टेंबर महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल अतोनात नुकसान सरकार कसं भरून काढेल याकडेच आता शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:31:58
Dhule, Maharashtra:धड़गाव तालुक्याच्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथे डोंगरदऱ्यांतून, नागमोडी पायवाटा ओलांडत शाळेत जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रवाहात राहणे ही मोठी कसरत असते. परंतु या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांनी राबवला एक अनोखा प्रयोग सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. धड़गाव तालुक्याच्या काल्लेखेत पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे २६० विद्यार्थी दररोज तीन ते चार किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत पोहोचतात. या प्रवासाचा शैक्षणिक दृष्टीने उपयोग होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून, प्रत्येक गटाला एक ‘पाढा नेता’ दिला आहे. शाळेत जाताना हे विद्यार्थी तालासुरात पाढे म्हणत, गाणी गात किंवा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून गणिताचा सराव करतात, मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, तर लहानगेही आत्मविश्वासाने पाढे म्हणताना दिसतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती आणि अचूकता वाढली असून आत्मविश्वासही दुणावला आहे. फक्त गणित शिकवण्यापुरता मर्यादित न राहता हा उपक्रम विद्यार्थ्यांना चिकाटी, सहकार्य आणि सर्जनशीलतेचा धडा देत आहे. त्यामुळे पायी पायी पाढे ही छोटीशी कल्पना आता इतर दुर्गम भागातील शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 04:31:38
Washim, Maharashtra:अँकर: श्री संत गुणवंत महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील इंझोरी येथे भक्तिभावाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या निमित्ताने गावात पारंपारिक पद्धतीने पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.भक्तांनी आकर्षक सजावट केलेल्या बैलगाडीत संत गुणवंत महाराजांची मूर्ती ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली.बैलगाड्यांना रंगीबेरंगी लाइटिंगची शोभिवंत सजावट करण्यात आली होती. पालखीच्या पुढे मृदुंग वादक,महिलांची दिंडी तसेच पुरुषांची सांप्रदायिक मंडळं उत्साहाने सहभागी झाली होती.पारंपारिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “जय जय संत गुणवंत महाराज की जय” अशा जयघोषात संपूर्ण इंझोरी गाव भक्तिरसाने न्हाऊन निघाले. संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 06, 2025 04:31:07
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात साप पकडताना झालेल्या सर्पदंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू, बल्लारपूर शहरातील धक्कादायक घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात साप पकडताना झालेल्या सर्पदंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू झालाय. ही घटना बल्लारपूर शहरात झाली. महेंद्र भडके असं 32 वर्षीय मृतक सर्पमित्राचं नाव आहे. भडके बल्लारपूर शहरातील विद्यानगर भागात राहतात. बल्लारपूर शहरातील बी टी टी एल नर्सरी परिसरात नाग दर्शन झाल्याने स्थानिकांनी याची माहिती भडके यांना दिली. ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र नाग पकडण्याचा प्रयत्नात त्यांना 2 वेळा सर्पदंश झाला. त्याना बल्लारपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले गेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भडके यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 04:30:41
Nashik, Maharashtra:अँकर - आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आली असून रविवारी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मेळावाही पार पडला. दरम्यान या मेळाव्यात नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डयांचा मुद्दाही चांगलाच गाजला. नाशिक शहर तात्काळ खड्डेमुक्त करू असे आश्वासन शिंदेंनी तर दिलेच मात्र महापालिका आयुक्तांशी मी बोलतो आणि खड्डयांना जबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन करतो असा ईशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे महापालिका या नगरविकास खात्याच्याच अंतर्गत येतात हे देखिल सांगायला शिंदे विसरले नसून एकनाथ शिंदेंनी हा भाजपला खास करून गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या प्रत्येक विषयात लक्ष घालणाऱ्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनाच हा ईशारा दिला आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील खड्डयांची पाहणी करत पाऊस थांबताच खड्डे तात्काळ बुजवले जातील असं स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान नाशिकला पालकमंत्री अद्याप मिळाले नसून त्यावरून महायुतीतील शीतयुद्ध मात्र अजून सुरूच असल्याचं बघायला मिळतंय.. भाषण - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 06, 2025 04:20:26
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात अगदी थोडक्यात बचावले दुचाकीस्वार, सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावरील घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावर कैद झाली. शिवनी येथून नवरगावकडे एका चारचाकी वाहनाने काही लोक जात असताना त्यांना पुलावर वाघ उभा असलेला दिसला. त्यामुळे त्यांनी चार चाकी गाडी तिथेच थांबवली. मात्र त्याचवेळी मागून एक भरधाव दुचाकी पुलाकडे निघाली. दुचाकीस्वारांना तिथे वाघ असल्याचे लक्षात आले नाही. दुचाकी अगदी जवळ आल्यावर वाघाने हल्ल्याचा पवित्रा घेतला मात्र दुचाकी वेगात असल्याने तिथून पुढे निघून गेली. ही सर्व घटना चारचाकी मध्ये बसलेल्या लोकांनी मोबाईल मध्ये चित्रित केली ती समाज माध्यमावर वायरल झाली आहे. ----- वाघ दुचाकीस्वारावर झडप घालण्याच्या बेतात असल्याचे vis-----
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:18:30
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाला असून, यात सर्वाधिक नुकसान पपई आणि केळीच्या झाला आहे. मात्र या नुकसानाची भरपाई कधी मिळेल याची वाट न पाहता शेतकरी जगदीश माळी यांच्याकडून वाचलेलं पीक जगवण्यासाठी धडपड करत अनोखी शकल लढावत पीक जगवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. जगदीश माडी यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे जवळपास पूर्ण चार एकर पपई उध्वस्त झाली आहे मात्र काही प्रमाणावर फळ झाडावर राहिले आहेत त्यामुळे ते फळ वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून, पपईच्या झाडावर राहिलेलं फळ जगण्यासाठी औषधांच्या वापर करून प्लास्टिक आणि गोणपाट लावून फळांना संरक्षण दिलं जात आहे. यामुळे काही प्रमाणावर जगण्याची आशा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. चार एकर क्षेत्राला शेतकरी जगदीश माळी यांनी ३५ हजार रुपये खर्च केला आहे मात्र पीक वाचणार का याची काहीही शाश्वती नाही आहे. मात्र पीक हे आपले मूलप्रमाणे असल्याने त्यांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी राजा धडपड करताना दिसून येत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून तातडीने नुकसानाची भरपाई द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या नुकसानीला सरकारच्या देखील हातभार लागणार आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:03:04
Dhule, Maharashtra:नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाव महानायक बिरसा मुंडा देण्यात आलं आहे. बिरसा मुंडा यांच्या नाव दिल्याने बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असल्याने, फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसीन मुश्रीफ यांच्या आभार आमदार राजेश पाडवी यांनी मानला, नंदूरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावात रूपांतर करण्यात आल्याने महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब असून आरोग्य सेवा आणखीन बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा लढला होता यामुळे गेल्या दोन महिन्यापूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री असून यांच्याकडे बिरसा मुंडा यांच्या नाव देण्याची मागणी केली होती आज अखेर ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आभार आमदार राजेश पाडवी यांनी मानले,
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 06, 2025 04:02:54
Amravati, Maharashtra:संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेच्या झालेल्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यापीठाला संलग्न महाविद्यालयांना आपले नामफलक फक्त मराठी भाषेतच लावणे बंधनकारक केलं आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये हा नियम सक्तीने लागू होणार आहे. या निर्णयामुळं विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या नामफलकांवरून इंग्रजी किंवा इतर भाषांचे वर्चस्व संपुष्टात येणार असून मराठी भाषेचे स्थान अधिक दृढ होईल. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या या उपक्रमामुळं मराठी भाषा संवर्धनाच्या दिशेने एक भक्कम टप्पा गाठला गेला आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 06, 2025 03:47:10
Satara, Maharashtra:सातारा:फलटण येथील राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. विकासाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये कायम आरोप प्रत्यारोप होतात मात्र मागील दोन दिवसापूर्वी दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चेवर रामराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही विकासाचे राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल. हा निर्णय लोकांच्या हातात आहे. असं त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती यावर फलटण येथील एका कार्यक्रमात भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी आज त्याला प्रत्युत्तर दिलय.... शेतकऱ्याला नडणाऱ्या व्यक्ती सोबत दोस्ती करायची नाही. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या तालुक्यात अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यामुळे यापुढील काळातही माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर कायम राहणार असल्याचे पाहायला मिळते...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 06, 2025 03:46:18
Nagpur, Maharashtra:Ngp Pankaj Bhoyar live u ने फीड पाठवले नागपूर पंकज भोयर, गृहराज्यमंत्री. On परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी - ज्या ठिकाणावर मागणी पूरग्रस्त भागात असले, त्या ठिकाणी वर्ग पूर्ण होऊ शकले नाही, किंवा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्या ठिकाणाहून मागणी आल्यास, तिकडल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या त्या संदर्भात सजारत्मक निर्णय घेतला जाईल. On 12 परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख बारावीच्या परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धत, होईल, दहावीची तशी मागणी नसल्यामुळे त्या अनुषंगाने निर्णय झाला आहे. On विधिमंडळ समिती दौरे रद्द - मराठवाड्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती पुढे रस्त्या बंद झाले होते अतिवृष्टीमुळे पाण्याचा वेळा होता त्यामुळे काही दिवस विधिमंडळ समितीचे दौरे काही दिवस रद्द केले होते परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने आता पुढील दौरे सुरू होईल. - विधिमंडळ समितीतील सर्वे सदस्य आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतात सर्व सदस्यांची प्रायोरिटी ही आपला मतदारसंघ असतो त्यामुळे त्यांची मागणी होती की आमच्या भागात आम्हाला दौरे करू द्या. On आनंदाची शिधा - यासंदर्भात उचित निर्णय घेतील आणि निश्चित निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. On नवीन कोर्स - महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासद्वारे अनेक प्रोग्राम राबवण्यात येते..सीएम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.. त्यामध्ये पोलीस विभागातील पोलीस कुटुंबातील पाल्यांना आणि पोलीस पाटलाच्या पाल्यांना सीएम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. On गौतमी पाटील - गौतमी पाटील प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्या सगळ्या संदर्भात चौकशी करेल...त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जितेंद्र आव्हाड यांच वैयक्तिक मत काहीही असलं तरी मात्र कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करेल. On राज ठाकरे - उद्धव ठाकरे - निवडणुकीच्या अनुषंगाने भेटी वाढल्या आहे. पण महाराष्ट्राची जनतेला हे माहित आहे, महायुती सरकारने हे विकासाची कामे केलेले आहे...त्यामुळे महायुतीकडेच जनतेचा कल असणार आहे. On पुणे ड्रग न्यायाधीश बडतर्फ - मादक पदार्थांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्री यांच्या स्पष्ट सूचना आहे. त्या प्रकरणात कुठल्याही निष्काजीपणा करू नये या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - tet अनुषंगाने शिक्षक संघटनेची बैठक घेतली, त्यांच्या मागणीनुसार सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका सरकारच्या वतीने टाकण्यात येईल.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top