Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

नंदूरबार मेडिकल कॉलेज का नाम बिरसा मुंडा के नाम पर रखा गया

PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:03:04
Dhule, Maharashtra
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाव महानायक बिरसा मुंडा देण्यात आलं आहे. बिरसा मुंडा यांच्या नाव दिल्याने बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असल्याने, फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसीन मुश्रीफ यांच्या आभार आमदार राजेश पाडवी यांनी मानला, नंदूरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावात रूपांतर करण्यात आल्याने महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब असून आरोग्य सेवा आणखीन बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा लढला होता यामुळे गेल्या दोन महिन्यापूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री असून यांच्याकडे बिरसा मुंडा यांच्या नाव देण्याची मागणी केली होती आज अखेर ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आभार आमदार राजेश पाडवी यांनी मानले,
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 06:19:56
1
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 06, 2025 06:19:50
Mumbai, Maharashtra:अत्यंत प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती ही वेगळी आहे या प्रत्येक महानगरपालिके वरती आमच्या चर्चा होत आहेत ठाणे जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधव बैठक आमच्या कालच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सुळे देखील होत्या MVA आमच्या सोबत आहेच MVA चे अस्थित्व कायम आहे त्यामुळे कुठे कोणाला सामावून घेऊ शकतो ही साधी प्रोसेस नाही आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार आहेत मुंबई, नाशिक, नवी मुंबई, ठाणे या प्रमुख महानगरपालिकेवरती काम करावं लागणार आहे असे अनेक महानगरपालिका आहेत काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे या सर्वांचा विचार पुढे करावा लागणार आहे महापौर मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो अस्सल भगवा रंगाचा असेल मराठी बाणाचा दिल्लीचा जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही हा बाणाshivसेना आणि मनसे या दोन पक्षात आहे ठाकरे बंधूंचाच महापौर होणार ही युती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी ہوئی है फक्त राजकीय युती नाही आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली आहे व स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी वेगळे गणित निर्माण करू यात कोण कुठे असेल याचा आम्ही नक्की अभ्यास करू On राज ठाकरे आवाहन MVA महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही आहे महाविकास आघाडी प्रमुख तीन पक्षांची बनलेली आहे मनसे हा स्वतंत्र बाणाचा पक्ष आहे या शनी शिवसेना मनसे यांच्यात चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत On राज ठाकरे व उद्धव ठाकरे येण्याने काही फरक पडत नाही विरोधी नेते शिंदे हा भाजपचा पक्ष आहे ही बेनामी कंपनी आहे अमित शहांची 90 टक्के अमित शहांचे आहेत अजित पवार यांचा पक्ष देखील अमित शहांचा आहे या सर्व बेमानी कंपनी अमित शहांचे आहे On अमित शहा पूरग्रस्त मदत याचा अर्थ अमित शहाणी देवेंद्र फडणवीस यांचा गुरखा फाडला त्यांना तोंडावर आपटले मुख्यमंत्री यांनी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव अजून पाठवलेला नाही सरकारने घाई केली पाहिजे मदतीसाठी याचा अर्थ मुख्यमंत्री अ कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत यांच्यावर शिक्का मोरतक केला आहे अमित शहाणे उघडपाडले सरकारला जर सरकारने प्रस्ताव पाठवला नसेल तरी महाराष्ट्र देखील तुमचाच एक भाग आहे ना या आधी गुजरातला मदत केली आहे महाराष्ट्राला देखील मदत केली पाहिजे विमानात बसताना मोदींनी आणि शहाणे हजारो कोटी जाहीर केले महाराष्ट्र विषयी तुमच्या मनात कोणता राग आहे एवढा महाराष्ट्र बद्दल तुमचा मनात द्वेषका आहे शिवसेना तुम्हाला मुंबईतील ड्युटी मध्ये अडथळा पडत आहे म्हणून तुम्ही अशाप्रकारे मराठी माणसासोबत वाद निर्माण करत आहेत का On शरद पवार विरोध ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर तुम्ही हा भार लादीण्यापेक्षा महाराष्ट्र व आखा देश ताब्यात दिला आहे व घशात घातला आहे गौतम अदानी त्यांच्यावर भार लावा त्याला एफएसआय फुकट दिला त्याला तेल कंपनी फुकट दिली त्याला मिठागर फुकट दिला मग गौतम अडाणी कडून तुम्ही भार का नाही लावत शेतकरी वर भार लावण्या पेक्षा तुम्ही अदानी, अंबानी, लोढानवर भार लावा गौतम अदानी यांची बेनामी कंपनी आहे मुंबईतील सर्व बिल्डर वर भार लावा आमचा शेतकरी अडचणीत आहे उद्या आम्हाला 50% कोटी तुम्ही ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था मोडून काढत आहात On राजन तेली सिंधुदुर्ग मधील जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज घोटाळा बाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ED कडे सोपवले पाहिजे कोकणातील सहकारी बँका अनेक वर्ष राणेंच्या ताब्यात आहे या बँका कोण लुटत आहे हे दिसत नाही आहे का राजन तेलींनी पत्र लिहिले आहे मी ते पत्र वाचले आहे राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत पोलिस महासंचालक यांनी रश्मी शुक्ला यांनी ॲक्शन दाखवावी त्यांना आता एक्सटेन्शन मिळाले आहे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजन तेलींच्या पत्रावर त्यांनी ॲक्शन घ्यावी
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 06, 2025 05:56:25
Kalyan, Maharashtra:कल्याण शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा .. सख्या काकां-पुतण्याच्या कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी दगडफेक!..लोखंडी हत्याराने वार थरारक दृश्यं CCTV मध्ये कैद! कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून राडा झाला.या हाणामारीत पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण करण्यात आली असून, ही घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून विनोद दत्तात्रेय कोट हा गंभीर जखमी झाला आहे .विनोद हा हा आपल्या आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहत असून, त्यांच्या नातेवाईक काकांसोबत त्याचे गेल्या काही काळापासून वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरु आहे.शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराच्या टेरेसवर वडील दत्तात्रेय कोट हे साफसफाई करत असताना, त्याचाच गैरसमज काकांना झाला.काकांनी टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत वाद सुरू केला.वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले.काका विष्णू कोट, काकू लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली सुरू केली यावेळी मध्यस्थी करणाऱ्या विनोदला लोखंडी टोकदार हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केला या नंतर दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली ज्यात तीन जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल करू आपला तपास सुरू केला आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 06, 2025 05:55:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 05:34:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पवार पत्रकार परिषद पॉइंटर - शेतकरीअतिवृष्टी प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा असल्याने आम्ही आमच्या पक्षाचा मोर्चा घेतला नाही... ऑन नुकसान पंचनामे - ऑनलाइन पंचनामे करण्याच्या सूचना आहेतं. मात्र काही ठिकाणी रेंज नाही. ऑन शहा.. - गृहमंत्री शहा म्हणतात आमच्याकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवा.याचा अर्थ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आणि अजून दिल्लीला महाराष्ट्राकडून प्रस्ताव ही गेलेला नाही. - अजूनही पाऊस पडत आहेत. पंचनामे सातत्याने सुरू असताना मदत जाहीर करायला पाहिजे होती.. - 5 हजाराची तोकडी मदत केली... ऑन शहा वक्तव्य - देशात बनियांचा राज्य आहे. असे सांगायचे का? काटकसर करून देश चालवायचा असे सांग्याच का... ऑन शेतकरी आत्महत्या - सहा शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली आहे. हे पाप आहे. हे खून आहे. - मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करित आहे आणि मदत जाहीर होत नाही. - सरकार खुनी आहे. - निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करतील अशी मला शंका आहे.. - मुख्यमंत्री म्हणाले होते, कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना मदत करू, दुसऱ्या बाजूला निकषसह अधिकारी पंचनामे करतात. ऑन शिधा बंद. - एकीकडे लाडक्या बहीण सारख्या योजना सुरू केल्या तर आनंदाचा शिधा बंद करत आहे. - एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती म्हणून बंद केली असावी असे राजकारण सुरू असू शकते... ऑन ऊस,कारखाने कपात - ज्यांनी शेतकऱ्यांना अडचणीत आणून कारखाने बंद केले त्यांना पॅकेज जाहीर करतात... दम देऊन पक्षात घेतात.. - शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्याकडून १५ रुपये घेतले जाऊ नये. - शेतकऱ्याचे नाव न घेता कारखानेकडून यांनी पैशे काढले पाहिजे असे आदेश काढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या बिलातून काढू नये. ऑन अखंड भारत संघचालक वक्तव्य. - अखंड भारतात तुटफुट पडायला लागली आहे. देशात अशांतता आहे. अखंड भारत म्हणजे कोण? सर्व धर्माच्या लोकांना घेऊन अखंड भारत आहे की नाही याची व्याख्या सांगावे.. - अखंड भारताच्या नावाने एक सौम्य राजकारण करायचे आहे.. वीज बिल - एकाबाजूला वीजबिल माफी करायची आणि दुसऱ्या बाजूला मोठी बिल द्यायची.. - राज्यात सौरऊर्जा निर्माण केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना मोफत वीजबिल देतील अशी अपेक्षा आहे. साखर दर कमी - जागतिक बाजार धोरण असते. ही क्षेत्र उभारण्यामध्ये पवार हे देखील एक आहे. मला असे कळाले आहे केंद्र सरकारने frp चे तीन टप्पे केले.. अजितदादा यावर काहीही बोलत नाही. शेतकऱ्यांना जी रक्कम दिली जाणार त्याचा खुलासा करावा... पांडुरंग पूजा वाद - अख्ख्या सरकारमध्ये लोच्या ,घोळ आहे. विधी न्याय वाले काय निर्णय घेणार ते मी आज सांगतो.. हे मुख्यमंत्री ठरवतील. ऑन निवडणुका. - आमची बैठक झाली तेंव्हा मी पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन संवाद साधला आहे. आघाडीच्या माध्यमातून चर्चा करावी. सहकार्याची भूमिका घेऊन आघाडीचा निर्णय घेऊ. ऑन ठाकरे बंधू - त्यांचा निर्णय अगोदर जाहीर होऊ द्या, निर्णय झाल्यावर पुढचा निर्णय घेऊन ऑन प्रताप सरनाईक हिंदी वक्तव्य. - सत्तेची मस्ती दाखवत आहे, यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार...
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 06, 2025 05:15:13
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 05:03:28
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 05:03:00
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यां पाठोपाठ कांदा उत्पादक शेतकरी ही निसर्ग आणि बाजारपेठेची मार सहन करत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केलं असताना, कांद्याला भाव मिळत नसल्याने आता कांदा उत्पादक शेतकरी ही हदबल झाल्याच दिसून येत आहे. मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. मे महिन्यात साठवून ठेवलेल्या कांद्याला तेव्हाही दर नव्हता आणि आताही दर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याला चाळीतच अंकुर फुटायला लागलेले आहेत. त्यामुळे बहुतांश कांदा सडत असून उर्वरित कांदाला अंकुर फुटत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादित कांद्याला आता उकिरड्यावर टाकल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी आता शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षात आहेत. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थेट सप्टेंबर महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल अतोनात नुकसान सरकार कसं भरून काढेल याकडेच आता शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:31:58
Dhule, Maharashtra:धड़गाव तालुक्याच्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथे डोंगरदऱ्यांतून, नागमोडी पायवाटा ओलांडत शाळेत जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रवाहात राहणे ही मोठी कसरत असते. परंतु या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांनी राबवला एक अनोखा प्रयोग सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. धड़गाव तालुक्याच्या काल्लेखेत पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे २६० विद्यार्थी दररोज तीन ते चार किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत पोहोचतात. या प्रवासाचा शैक्षणिक दृष्टीने उपयोग होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून, प्रत्येक गटाला एक ‘पाढा नेता’ दिला आहे. शाळेत जाताना हे विद्यार्थी तालासुरात पाढे म्हणत, गाणी गात किंवा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून गणिताचा सराव करतात, मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, तर लहानगेही आत्मविश्वासाने पाढे म्हणताना दिसतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती आणि अचूकता वाढली असून आत्मविश्वासही दुणावला आहे. फक्त गणित शिकवण्यापुरता मर्यादित न राहता हा उपक्रम विद्यार्थ्यांना चिकाटी, सहकार्य आणि सर्जनशीलतेचा धडा देत आहे. त्यामुळे पायी पायी पाढे ही छोटीशी कल्पना आता इतर दुर्गम भागातील शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 04:31:38
Washim, Maharashtra:अँकर: श्री संत गुणवंत महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील इंझोरी येथे भक्तिभावाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या निमित्ताने गावात पारंपारिक पद्धतीने पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.भक्तांनी आकर्षक सजावट केलेल्या बैलगाडीत संत गुणवंत महाराजांची मूर्ती ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली.बैलगाड्यांना रंगीबेरंगी लाइटिंगची शोभिवंत सजावट करण्यात आली होती. पालखीच्या पुढे मृदुंग वादक,महिलांची दिंडी तसेच पुरुषांची सांप्रदायिक मंडळं उत्साहाने सहभागी झाली होती.पारंपारिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “जय जय संत गुणवंत महाराज की जय” अशा जयघोषात संपूर्ण इंझोरी गाव भक्तिरसाने न्हाऊन निघाले. संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 06, 2025 04:31:07
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात साप पकडताना झालेल्या सर्पदंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू, बल्लारपूर शहरातील धक्कादायक घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात साप पकडताना झालेल्या सर्पदंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू झालाय. ही घटना बल्लारपूर शहरात झाली. महेंद्र भडके असं 32 वर्षीय मृतक सर्पमित्राचं नाव आहे. भडके बल्लारपूर शहरातील विद्यानगर भागात राहतात. बल्लारपूर शहरातील बी टी टी एल नर्सरी परिसरात नाग दर्शन झाल्याने स्थानिकांनी याची माहिती भडके यांना दिली. ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र नाग पकडण्याचा प्रयत्नात त्यांना 2 वेळा सर्पदंश झाला. त्याना बल्लारपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले गेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भडके यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 04:30:41
Nashik, Maharashtra:अँकर - आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आली असून रविवारी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मेळावाही पार पडला. दरम्यान या मेळाव्यात नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डयांचा मुद्दाही चांगलाच गाजला. नाशिक शहर तात्काळ खड्डेमुक्त करू असे आश्वासन शिंदेंनी तर दिलेच मात्र महापालिका आयुक्तांशी मी बोलतो आणि खड्डयांना जबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन करतो असा ईशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे महापालिका या नगरविकास खात्याच्याच अंतर्गत येतात हे देखिल सांगायला शिंदे विसरले नसून एकनाथ शिंदेंनी हा भाजपला खास करून गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या प्रत्येक विषयात लक्ष घालणाऱ्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनाच हा ईशारा दिला आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील खड्डयांची पाहणी करत पाऊस थांबताच खड्डे तात्काळ बुजवले जातील असं स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान नाशिकला पालकमंत्री अद्याप मिळाले नसून त्यावरून महायुतीतील शीतयुद्ध मात्र अजून सुरूच असल्याचं बघायला मिळतंय.. भाषण - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 06, 2025 04:20:26
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात अगदी थोडक्यात बचावले दुचाकीस्वार, सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावरील घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावर कैद झाली. शिवनी येथून नवरगावकडे एका चारचाकी वाहनाने काही लोक जात असताना त्यांना पुलावर वाघ उभा असलेला दिसला. त्यामुळे त्यांनी चार चाकी गाडी तिथेच थांबवली. मात्र त्याचवेळी मागून एक भरधाव दुचाकी पुलाकडे निघाली. दुचाकीस्वारांना तिथे वाघ असल्याचे लक्षात आले नाही. दुचाकी अगदी जवळ आल्यावर वाघाने हल्ल्याचा पवित्रा घेतला मात्र दुचाकी वेगात असल्याने तिथून पुढे निघून गेली. ही सर्व घटना चारचाकी मध्ये बसलेल्या लोकांनी मोबाईल मध्ये चित्रित केली ती समाज माध्यमावर वायरल झाली आहे. ----- वाघ दुचाकीस्वारावर झडप घालण्याच्या बेतात असल्याचे vis-----
4
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top