Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती से नया अकोला: काँग्रेस अभिवादन रैली में मुकुल वासनिक की सहभागिता

ADANIRUDHA DAWALE
Dec 06, 2025 06:50:55
Amravati, Maharashtra
अमरावती ते नया अकोला पर्यंत काँग्रेसची अभिवादन रॅली; खासदार मुकुल वासनिक रॅलीत सहभागी. गेल्या चार वर्षापासून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती ते नया अकोला पर्यंत काँग्रेस पक्षाच्यावतीने भव्य अभिवादन रॅलीचा आयोजन करण्यात येते. यंदाही या अभिवादन रॅलीचा आयोजन करण्यात आला असून या रॅलीध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार मुकुंद वासनिक सहभागी झाले आहे. नया अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने या अभिवादन रॅलीला विशेष महत्त्व आहे. या रॅलीमध्ये मला सहभागी होता आलं हे माझं भाग्य आहे. बाबासाहेबांनी दिलेली घटना ही फार मोलाची आहे आणि आमच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत ही राज्यघटना आम्ही सुरक्षित ठेवू असं मुकुल वाचले म्हणाले आहे. या अभिवादन रॅलीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले आहे. बाईट मुकुल वासनिक, काँग्रेस नेते व खासदार. बाईट : यशोमती ठाकूर माजी मंत्री
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 06, 2025 08:07:47
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या नव्या रेल्वे मार्गाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली आहे. २०१७ मध्ये सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा करून पायाभरणीही केली होती. पण २००५ पासून कोल्हापूरकरांची असलेली ही मागणी आजही मार्गी लागलेली नाही. या संपूर्ण प्रकल्पामुळे आयात–निर्यात, व्यापार आणि पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. पण केंद्र सरकार मात्र याकडे लक्ष देताना दिसत नाहीये. इतकच नाही तर मागील दोन अर्थसंकल्पात या मार्गाचा साधा उल्लेख आहे करण्यात आलेला नाही. त्यामुळेच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर वैभववाडी मार्गाचा प्रश्न उपस्थित केला.
64
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 06, 2025 07:54:31
Satara, Maharashtra:सातारा - 2022 मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला त्यामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि पर्यायाने भाजप ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठाव असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.आम्ही सत्ते मध्ये होतो पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती त्यात पुढे काय होणार आहे,बहुमत होणार आहे का नाही,युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही त्यामुळे या गोष्टीचा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.मंगलप्रभात लोढा यांनी काल 2014 पर्यंत भाजप राज्यात तेवढी ताकदवान नव्हती असं वक्तव्य केलं होते या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सुनावले आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 06, 2025 07:33:47
Yeola, Maharashtra:येवला शहरातील नांदगाव रोड परिसरात असलेल्या नागरे इंटरप्राईजेस या दुकानावर मध्यरात्री चोरीची धाडसी घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून 16 गिरण्या आणि 9 वॉटर प्यूरीफायर्स असा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शहरातील फत्तेबूरुज नाका येथील नाकोड मॉलमध्ये देखील चोरट्याने चोरी करत करत पैठणी साड्यांचे रोख रक्कम चोरी केली आहे.शहरात दोन ठिकाणी रात्रीच्या सुमारास दुकाना फोडून चोरट्यांनी चोरी केली असून नक्कीच चोरट्यांचा परत एकदा सुळसुळाटक दिसून दिसून येऊ लागला आहे. या आधी काही दिवसांपूर्वी देखील एस एस मोबाईल देखील चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता.
70
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 06, 2025 07:02:26
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - आजच्या दिवशी या जगात शोषितांच्या पीडितांच्या बहुजनाच्या एक शोककळा आली, हजारो वर्षांपूर्वीची जाती व्यवस्था वर्णव्यवस्था संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा बहुजनांना अधिकार दिला त्या महामानवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी महा‍परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आलोय - बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशात लोकशाही आहे, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत हुकूमशाही येणार नाही कारण भारताचा संविधान हे या बहुजनांचं सुरक्षा कवच आहे असे मी मानतो - हे सुरक्षा कवच बाबासाहेबांनी दिला आहे त्या महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, बळ मिळते On वडसाल हापूस मानांकन - - जर चेतक घोड्याची आई गुजराती असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं झालेलं तुम्हाला दिसेल, याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गड गुजरातचे झाले होते असेही म्हणतील, ते आता राजे आहेत काहीही बोलू शकतात, त्यावेळी म्हणून सर्व काही गुजरातने केला आहे, या देशाला स्वातंत्र्य गुजरात ने दिला आहे सगळं गुजरातचं वैभव आहे म्हणून आपण जगतो आहेत असं म्हणायला हरकत नाही On हिवाळी अधिवेशन - - अधिवेशनात विषय खूप मोठे आहेत, विदर्भात मागच्या अधिवेशनापासून आजच्या अधिवेशनापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 75 लोकांचा बळी गेला आहे वाघांचे हल्ले रोज होत आहेत, जंगल शाप की वरदान असं म्हणायची वेळ आली आहे - पर्यावरणाचा संतुलन राहताना माणसांचा जीव गेला तर सरकार काय करतोय,ड्रग्स चे हब नागपूर आणि मुंबई झाले आहे - विदर्भातून नोकरीच्या शोधासाठी खूप मुलं पलायन करत आहेत, अजूनही रोजगार का उपलब्ध झाला नाही, विदर्भातील सत्ता असून त्याचा उपयोग विदर्भातील तरुणांना आहे का? - कायदा सुव्यवस्थेचे विषय आहेत, घोटाळे खूप आहेत, सरकारचं कंट्रोल राहिलेलं नाही, सैराटपणे सरकार काम करत आहे - कामकाजाचे पाच दिवस मिळतील अशी अपेक्षा आहे, आता निरढावलेल्या सरकारला उत्तर देण्याची अपेक्षा नसेल तर मांडण्याचा प्रयत्न करू जनतेपर्यंत पोहोचवू - आधी कृषीप्रधान राज्य म्हणत होतो आता गुंडांचा राज्य झाला आहे, लाडके ठेकेदार झाले आहेत बिना टेंडर वाटून देत आहेत - त्र्यंबकेश्वर मध्ये एका मतासाठी 50 हजार वाटले गेले आहेत, त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही हिंदू-मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मजेत असं मागून संविधानाला संपवण्याचे हे सर्व षडयंत्र आहे - बाबासाहेबांचे लेकरू जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणाची हिंमत नाही की संविधानाला धक्का लावू शकते On मुंबई भाजप महापौर लोढा - - दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत ते बोलतील त्याप्रमाणे हे दोन्ही पक्ष वागतील - भीगी बिल्ली सारखी सहयोग पक्षांची अवस्था भाजपने केली आहे, अति चाललेला आहे, मुंबईचा महापौर बसवायचं आहे, तो वरूनच आदेश आहे, मुंबई सोडून त्यांना कसं परवडणार त्यामुळे आता दिल्लीत आहेत त्या आकांचा आदेश आहे की मुंबईचा महापौर भाजपचा करायचा On इंदू मिल एकनाथ शिंदे - - घोषणा झाली 2014 मध्ये, फार छाती ठोकली होती, पण आता ते कुठे आहेत किती टक्के काम झाला आहे किती पैसे दिले खर्च होत आहेत का आणि त्यामुळे आता किती वर्ष वाट पाहायची - दिरंगाई का केली, करायचं होतं तर दोन वर्षात काम पूर्ण झालं असतं, दहा वर्षे वाढवण्याची का गरज पडली असती On जामखेड आत्महत्या - - सगळे हिरोंची भरती झाली आहेत भाजपमध्ये, तर हिरोगिरी दाखवणं सुरू आहे आता जी सत्यादारांची हिंमत वाढली आहे मुलीवर बायकांवर अत्याचार करायची पळून न्यायचे - महिलांवर अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे गेला आहे, ही वर्षापूर्वी आहे का?यावर काय बोलणार, आंधळ दळतय कुत्र पीठ खातय असं सगळं झालंय
161
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 06, 2025 06:16:15
151
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 06, 2025 05:35:24
Yeola, Maharashtra:येवला शहरात भुरट्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून घर फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे फत्तेबुरुज नाका परिसरात नाकोड सुपर मार्केट हे दुकान फोडून चोरट्यांनी महागड्या पैठणी साड्या व दुकानातील साहित्य चोरून नेले आहे याआधी नगर मनमाड महामार्गावरील एस एस मोबाईल येथे देखील भुरट्या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान येवला पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहे दरम्यान येवला शहराची वाढती लोकसंख्या चोरटे व गर्दुल्ले यांचे वाढलेले आहे या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी पडत असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी आता तरी पोलीस बंदोबस्त वाढवून द्यावा अशी मागणी होत आहे
132
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 05:31:01
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरा शेजारी असणाऱ्या उजळाईवाडी इथ शेजारच्या घरावर चेंडू आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अफान असिफ बागवान असे मृत मुलाचे नाव आहे. शाळेला सुटी असल्याने तो सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीवर गेला. तो आणण्यासाठी तो टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या ११००० व्होल्ट क्षमतेच्या उच्चदब वाहिनीचा त्याला संपर्क झाल्याच जोराचा विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या इमारतीवरून विमानतळाला पुरवठा करणारी उच्चदब वाहिनी जाते. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
195
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 06, 2025 04:31:49
Ambegaon, Maharashtra:मंचर/पुणे अज्ञात चोरट्यांकडून महावितरणच्या दोन ट्रान्सफॉर्मरची तोडफोड व त्यातील ऑईल चोरी. आंबेगाव तालुक्यातील भरादी येथे महावितरणच्या दोन ट्रान्सफॉर्मरची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून मोठे नुकसान केलंय. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल चोरून नेले असून त्यामुळे महावितरणचे अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झालंय. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल पूर्णपणे काढून नेल्याने ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे निकामी झाले असून परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. परिणामी पीक व्यवस्थापन आणि सिंचनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
191
comment0
Report
Advertisement
Back to top