Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल वाणी में डकैती: मास्टरमाइंड महिला वैशाली वाघमारे समेत तीन गिरफ्तार, 13 लाख का माल बरामद

SRSHRIKANT RAUT
Dec 06, 2025 06:16:15
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी येथे सराफा व्यापारी संजय कोंडावार यांच्या घरी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील तीन आरोपींना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील मास्टर माईंड महिला वैशाली वाघमारे ही नागपूर येथील रहिवासी असून तिने हा गुन्हा कबूल करत इतर सहा जणांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे सांगितले आहे. दरोड्यातील चार आरोपी फरार असून ऋतिक गेडाम व सागर धोंगडे यांना अटक करण्यात आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 06, 2025 07:02:26
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - आजच्या दिवशी या जगात शोषितांच्या पीडितांच्या बहुजनाच्या एक शोककळा आली, हजारो वर्षांपूर्वीची जाती व्यवस्था वर्णव्यवस्था संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा बहुजनांना अधिकार दिला त्या महामानवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी महा‍परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आलोय - बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशात लोकशाही आहे, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत हुकूमशाही येणार नाही कारण भारताचा संविधान हे या बहुजनांचं सुरक्षा कवच आहे असे मी मानतो - हे सुरक्षा कवच बाबासाहेबांनी दिला आहे त्या महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, बळ मिळते On वडसाल हापूस मानांकन - - जर चेतक घोड्याची आई गुजराती असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं झालेलं तुम्हाला दिसेल, याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गड गुजरातचे झाले होते असेही म्हणतील, ते आता राजे आहेत काहीही बोलू शकतात, त्यावेळी म्हणून सर्व काही गुजरातने केला आहे, या देशाला स्वातंत्र्य गुजरात ने दिला आहे सगळं गुजरातचं वैभव आहे म्हणून आपण जगतो आहेत असं म्हणायला हरकत नाही On हिवाळी अधिवेशन - - अधिवेशनात विषय खूप मोठे आहेत, विदर्भात मागच्या अधिवेशनापासून आजच्या अधिवेशनापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 75 लोकांचा बळी गेला आहे वाघांचे हल्ले रोज होत आहेत, जंगल शाप की वरदान असं म्हणायची वेळ आली आहे - पर्यावरणाचा संतुलन राहताना माणसांचा जीव गेला तर सरकार काय करतोय,ड्रग्स चे हब नागपूर आणि मुंबई झाले आहे - विदर्भातून नोकरीच्या शोधासाठी खूप मुलं पलायन करत आहेत, अजूनही रोजगार का उपलब्ध झाला नाही, विदर्भातील सत्ता असून त्याचा उपयोग विदर्भातील तरुणांना आहे का? - कायदा सुव्यवस्थेचे विषय आहेत, घोटाळे खूप आहेत, सरकारचं कंट्रोल राहिलेलं नाही, सैराटपणे सरकार काम करत आहे - कामकाजाचे पाच दिवस मिळतील अशी अपेक्षा आहे, आता निरढावलेल्या सरकारला उत्तर देण्याची अपेक्षा नसेल तर मांडण्याचा प्रयत्न करू जनतेपर्यंत पोहोचवू - आधी कृषीप्रधान राज्य म्हणत होतो आता गुंडांचा राज्य झाला आहे, लाडके ठेकेदार झाले आहेत बिना टेंडर वाटून देत आहेत - त्र्यंबकेश्वर मध्ये एका मतासाठी 50 हजार वाटले गेले आहेत, त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही हिंदू-मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मजेत असं मागून संविधानाला संपवण्याचे हे सर्व षडयंत्र आहे - बाबासाहेबांचे लेकरू जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणाची हिंमत नाही की संविधानाला धक्का लावू शकते On मुंबई भाजप महापौर लोढा - - दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत ते बोलतील त्याप्रमाणे हे दोन्ही पक्ष वागतील - भीगी बिल्ली सारखी सहयोग पक्षांची अवस्था भाजपने केली आहे, अति चाललेला आहे, मुंबईचा महापौर बसवायचं आहे, तो वरूनच आदेश आहे, मुंबई सोडून त्यांना कसं परवडणार त्यामुळे आता दिल्लीत आहेत त्या आकांचा आदेश आहे की मुंबईचा महापौर भाजपचा करायचा On इंदू मिल एकनाथ शिंदे - - घोषणा झाली 2014 मध्ये, फार छाती ठोकली होती, पण आता ते कुठे आहेत किती टक्के काम झाला आहे किती पैसे दिले खर्च होत आहेत का आणि त्यामुळे आता किती वर्ष वाट पाहायची - दिरंगाई का केली, करायचं होतं तर दोन वर्षात काम पूर्ण झालं असतं, दहा वर्षे वाढवण्याची का गरज पडली असती On जामखेड आत्महत्या - - सगळे हिरोंची भरती झाली आहेत भाजपमध्ये, तर हिरोगिरी दाखवणं सुरू आहे आता जी सत्यादारांची हिंमत वाढली आहे मुलीवर बायकांवर अत्याचार करायची पळून न्यायचे - महिलांवर अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे गेला आहे, ही वर्षापूर्वी आहे का?यावर काय बोलणार, आंधळ दळतय कुत्र पीठ खातय असं सगळं झालंय
84
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 06, 2025 06:50:55
Amravati, Maharashtra:अमरावती ते नया अकोला पर्यंत काँग्रेसची अभिवादन रॅली; खासदार मुकुल वासनिक रॅलीत सहभागी. गेल्या चार वर्षापासून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती ते नया अकोला पर्यंत काँग्रेस पक्षाच्यावतीने भव्य अभिवादन रॅलीचा आयोजन करण्यात येते. यंदाही या अभिवादन रॅलीचा आयोजन करण्यात आला असून या रॅलीध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार मुकुंद वासनिक सहभागी झाले आहे. नया अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने या अभिवादन रॅलीला विशेष महत्त्व आहे. या रॅलीमध्ये मला सहभागी होता आलं हे माझं भाग्य आहे. बाबासाहेबांनी दिलेली घटना ही फार मोलाची आहे आणि आमच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत ही राज्यघटना आम्ही सुरक्षित ठेवू असं मुकुल वाचले म्हणाले आहे. या अभिवादन रॅलीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले आहे. बाईट मुकुल वासनिक, काँग्रेस नेते व खासदार. बाईट : यशोमती ठाकूर माजी मंत्री
130
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 06, 2025 05:35:24
Yeola, Maharashtra:येवला शहरात भुरट्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून घर फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे फत्तेबुरुज नाका परिसरात नाकोड सुपर मार्केट हे दुकान फोडून चोरट्यांनी महागड्या पैठणी साड्या व दुकानातील साहित्य चोरून नेले आहे याआधी नगर मनमाड महामार्गावरील एस एस मोबाईल येथे देखील भुरट्या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान येवला पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहे दरम्यान येवला शहराची वाढती लोकसंख्या चोरटे व गर्दुल्ले यांचे वाढलेले आहे या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी पडत असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी आता तरी पोलीस बंदोबस्त वाढवून द्यावा अशी मागणी होत आहे
132
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 05:31:01
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरा शेजारी असणाऱ्या उजळाईवाडी इथ शेजारच्या घरावर चेंडू आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अफान असिफ बागवान असे मृत मुलाचे नाव आहे. शाळेला सुटी असल्याने तो सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीवर गेला. तो आणण्यासाठी तो टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या ११००० व्होल्ट क्षमतेच्या उच्चदब वाहिनीचा त्याला संपर्क झाल्याच जोराचा विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या इमारतीवरून विमानतळाला पुरवठा करणारी उच्चदब वाहिनी जाते. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
195
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 06, 2025 04:31:49
Ambegaon, Maharashtra:मंचर/पुणे अज्ञात चोरट्यांकडून महावितरणच्या दोन ट्रान्सफॉर्मरची तोडफोड व त्यातील ऑईल चोरी. आंबेगाव तालुक्यातील भरादी येथे महावितरणच्या दोन ट्रान्सफॉर्मरची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून मोठे नुकसान केलंय. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल चोरून नेले असून त्यामुळे महावितरणचे अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झालंय. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल पूर्णपणे काढून नेल्याने ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे निकामी झाले असून परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. परिणामी पीक व्यवस्थापन आणि सिंचनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
191
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 04:17:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी आमदार खासदार इम्तियाज जलील यांच्या बहिणीकडे चोरी छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-१२ परिसरात दुबईला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी मोठ्या रकमेसह दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिन्हाज अहमद खान आणि सीमा मिन्हाज खान हे आपला मुलगा दुबईत असल्याने ४ ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून परदेशात गेले होते. ४ डिसेंबर रोजी दुपारी स्वच्छता कर्मचारी महिला घरात आली असता मुख्य दरवाजाचे आणि कंपाउंडचे कुलूप तुटलेले आढळले. शेजाऱ्यांनी तातडीने मालकांना माहिती देताच त्यांचा भाचा अखिल मजीद यार खान घटनास्थळी धावला. घरात प्रवेश केल्यावर सर्व बेडरूमची कुलपे तुटलेली आणि सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. चोरट्यांनी ८५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
167
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 06, 2025 04:17:31
Nagpur, Maharashtra:नागपूर एसटीच्या शिवशाही बस आणि स्कूल बसचा लॉ कॉलेज चौकात अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास झाला अपघात... अपघातात एसटी बस मधील काही प्रवासी जखमी.... दोन्ही बसचे मोठे नुकसान... स्कूल बस मध्ये शालेय विद्यार्थी नसल्याची प्राथमिक माहिती --------------- नागपूरच्या लॉ कॉलेज चौकावर एसटीच्या शिवशाही आणि एका शाळेच्या बसचा जोरदार अपघात... अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान... शिवशाही बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी.. * नागपूरचे लॉ कॉलेज शिवशाही बस आणि दिल्ली पब्लिक स्कूलच्या बसचा अपघात झाला. * सकाळी झालेल्या या अपघातात दोन्हीं बसचे मोठे नुकसान झाले आहे. * सुदैवाने अपघात झाला तेव्हा दिल्ली पब्लिक स्कूलच्या बस मध्ये विद्यार्थी नव्हते. * शिवशाही बस मधील प्रवासी तसेच स्कूल बस मधील कर्मचारी मात्र या अपघातात किरकोळ जखमी झाले आहे..
171
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 06, 2025 03:46:52
Satara, Maharashtra:सातारा-‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ हे गीत मनोजराजा गोसावी यांनी लिहिले आहे . ते गीत त्यांनी आणि कडूबाई खरात यांनी गायले आहे. या गाण्याच्या ओळीप्रमाणे भाकरीवर बाबासाहेबांची छबी रेखाटण्याचा प्रयत्न पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची शब्दचित्रे, स्केच, रांगोळी, रंगीबेरंगी कागदाचे तुकडे, संविधान उद्देशिका, पेन्सिल, कलिंगड इत्यादी प्रकारात चित्रे साकारली आहेत. नावीण्यपूर्ण चित्रे तयार करण्याचा डाॅ. डाकवे यांचा हातखंडा आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे. या चित्राची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
91
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 06, 2025 03:46:16
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या स्ट्रॉंग रूम परिसरात एस आर बी आणि स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त..... भंडारा नगर परिषदेची निवडणूक पार पडली त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या वैनगंगा सभागृह येथे स्ट्रॉंग रूम तयार करून नगरपरिषद हद्दीतील सर्व ईव्हीएम मशीन तेथे सुरक्षित ठेवण्यात आल्या. या परिसरात एस आर बी आणि स्थानिक पोलीस अशा एकूण 20 पोलिसांचा बंदोबस्त स्ट्रॉंग रूम परिसरात आहे. तर महसूल विभागाच्या माध्यमातूनही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात चहूबाजूंनी एकुण वीस سیसीटीव्ही کॅमेरांची निगराणी बसवण्यात आली आहे. तर दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या सह्या असलेले सील पेपर दरवाजावर लावण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या व लोखंडी जाळीचे सुरक्षा कठडे सुद्धा सभोवताली बसवण्यात आले आहेत. अगदी सुरक्षित व चोख असा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
81
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 06, 2025 03:37:54
Latur, Maharashtra:नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडून गावाकडे परततांना दोघा युवकांच्या कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील दोघेही जागीच मृत्यू झाले. अहमदपूर बायपास परिसरात मध्यरात्री हा धडकचा थरार CCTV मध्ये कैद झाला. रविकुमार दराडे व सागर ससाने अशी मयत दोघे युवकांची नावे आहेत. ते ते लातूररोड रेल्वेस्टेशनला गेले होते नातेवाईकांना हैदराबादकडे पाठवण्यासाठी. नातेवाईकांना रेल्वेमध्ये बसविल्यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शिरुर ताजबंद मार्गे परतत होते. त्यांच्या कारच्या पुढे ट्रक होता. त्या वेळी कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि क्षणार्धात कार ट्रकच्या पाठीमागे घुसली. या भीषण अपघातात चालक रविकुमार दराडे व सागर ससाने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
199
comment0
Report
Advertisement
Back to top