Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

घराणेशाहीच्या आरोपांमध्ये अर्चना रोठे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 04:33:58
Amravati, Maharashtra
विरोधकांकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नसल्याने ते घराणेशाहीचा आरोप करतात; आमदार प्रताप अडसूळ यांच्या भगिनी अर्चना रोठे यांची विरोधकांवर टीका. धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार अरुण अडसूळ यांच्या कन्या तसेच भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. यावर अर्चना रोठे यांनी जोरदार टीका केली असून विरोधकांकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नसल्याने ते घराणेशाहीचा आरोप करत असल्याचा अर्चना रोठे यांनी म्हटल आहे. मी वयाच्या 18 व्या वर्षापासून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी पक्षाचं काम केलं असून पक्षाने आता मला ही जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पक्ष हे आमच कुटुंब असून कुटुंबानी दिलेली जबाबदारी मी पार पाडत असल्याचं अर्चना रोठे यांनी सांगितल. याविषयी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना रोठे यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
162
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 21, 2025 05:17:47
Nagpur, Maharashtra:नागपूर दत्ता भरणे (राज्य कृषी मंत्री) पर सलील देशमुख. ही माहिती मला आपल्या माध्यमातून मिळाली, मात्र कोणताही मोठा नेता येत असला तर त्याचं स्वागत केलं जातं. देशमुख घराणे या भागातील मोठे घराण असल्याने याबद्दल जो निर्णय घ्यायचा ते आमचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार घेतील. MSP भाव: एमएसपी पेक्षा कोणी कमी भाव देत असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार. स्वतः पणनमंत्र्यांचं यावर बारीक लक्ष असल्याने पणन विभाग आणि कृषी विभाग ही योग्य तो निर्णय घेईल. निसर्गाच्या संकटामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभे राहणार हे आमचं कर्तव्य आहे. पेरणी पासून ते कापणी पर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य करता येईल हे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नाफेड खरेदी: याबाबत निर्णय झाला असून लवकरात लवकर खरेदीला सुरुवात होईल. महेंद्र दळवी तटकरे टीका: महेंद्र दळवी काय टीका करतात यावर लक्ष देण्याची गरज नाही. तटकरे हे राज्याचे मोठे नेते असल्याने त्यांच्यावर कोण काय बोलने यावर बोलणे योग्य नाही. सलील देशमुख: प्रत्येकाला राजकारण करत असताना आपापलं स्वातंत्र्य असतं. सलील देशमुख यांना काही अडचणी आले असतील त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा. त्यामुळे यावर अजितदादा योग्य ते निर्णय घेतील. मालेगाव आरोपी फाशी: ही घटना अत्यंत दुखद आणि वेदनादायक आहे त्यामुळे अशा लोकांना शंभर टक्के फाशीच दिली गेली पाहिजे. शासकीय कर्मचारी आमदार सोबत वागणूक नियम: कोणताही लोकप्रतिनिधी असला तरी एक शासकीय प्रोटोकॉल असतो. आमदार देखील लोकप्रतिनिधी असल्याने प्रोटोकॉलमुळे या गोष्टी झाल्या असतील. हसन मुश्रीफ क्लीन चीट: आरोप करणे दोषारोप करणे ठीक आहे, मात्र त्यामध्ये दोषारोप सिद्ध झाला नाही. हसन मुश्रीफ आमचे नेते आहेत, कदाचित त्यांनी झालेले आरोप चुकीचे होते, त्यामुळे ते आता निर्दोष सुटले आहे. नागपूर दत्ता भरणे, कृषिमंत्री (on सलील देशमुख.. राष्ट्रवादी AJ पक्षात जाणार) याबाबतीत आमचे नेते अजित पवार निर्णय घेतील. प्रत्येकाला राजकारण करताना काही अडचणी असतात, त्यामुळे देशमुख साहेबांना काही अडचणी आले असतील. पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील. काही अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा. या बाबतीत अजितदादा योग्य तो निर्णय घेतील.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 05:16:37
Washim, Maharashtra:जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगर पंचायत निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगली असून थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. जिल्ह्यातील पाच नगरअध्यक्ष पदासाठी तब्बल 63 उमेदवार तर 69 प्रभागांतील 124 नगरसेवकांसाठी 827 उमेदवार मैदानात आहेत. आज नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्यामुळे सर्वच शहरांमध्ये उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रभागातून किती उमेदवार माघार घेतात आणि अखेरीस प्रत्यक्ष लढत कोणकोणात होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रभागांत एकाच पक्षाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याने स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. तिकीट न मिळाल्यामुळे काही जणांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मनधरणी,बैठका, चर्चा आणि मोठ्या नेत्यांची मध्यस्थी अशी घडामोडी जिल्ह्यात सुरू आहेत. आज संध्याकाळी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अध्यक्षपद आणि प्रभागनिहाय अंतिम स्पर्धेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 21, 2025 05:01:07
Beed, Maharashtra:बीड: आष्टी तालुक्यातील विविध भागात बिबट्याचा मुक्त संचार स्थानिकांकडून मोबाईल कॅमेऱ्यात कैद; वनविभागाने बंदोबस्त करावा स्थानिकांमधून मागणी बीडच्या आष्टी तालुक्यातील विविध भागात बिबट्या आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण, घाटा पिंपरी, माळींबा यासह पाटोदा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. अनेकांनी बिबट्याचा हा मुक्त संचार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. मागील महिनाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते आहे.
21
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 21, 2025 05:00:45
Satara, Maharashtra:सातारा - आज नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची समजली जाणारी सातारा नगरपालिका निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहे. हे अपक्ष बंडखोराचे बंड मोडीत काढण्यासाठी दोन्ही राजेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना काल झालेल्या दोन्ही राजेंनी संयुक्त घेतलेल्या पत्रकार परिषदेतून इशारा वजा दम दिला आहे. मात्र आज दुपारी एक वाजेपर्यंत अपक्ष उमेदवारी अर्ज मुदत असल्याने हे दोन्ही राजे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंड कसे थंड करतात हे पहावं लागणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
55
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 04:49:05
Dhule, Maharashtra:थंडीच्या लाटेचा परिणाम आता फळभाज्यांच्या दरांवर ही दिसू लागला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाटेचे दर विक्रमी वाढलेले आहेत. वाढत्या थंडीमुळे टमाट्याचे उत्पन्न कमी झालेला आहे. त्यामुळे टमाटे दर दुपटीने वाढलेला आहे. आठवड्यापूर्वी 20 किलो टमाट्याचे कॅरेट 400 ते 500 रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र तेच आता वीस किलोचे कॅरेट 1000 रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही कारण की, वाढत्या थंडीमुळे टमाट्याचे उत्पन्न कमी झालेला आहे. त्यामुळेयां दर वाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. येणारे काही दिवस थंडीचा परिणाम असाच कायम राहिलास दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
102
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 04:33:38
Washim, Maharashtra:HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी आता फक्त ९ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण वाशीम जिल्ह्यातील जवळपास ७० हजार वाहनांधारकांनी अद्यापही HSRP साठी नोंदणी केलेली नाही. बनावट नंबर प्लेट, नंबरमध्ये फेरफार आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ही प्लेट अनिवार्य केली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही प्लेट बसवणं बंधनकारक असून फक्त सरकारी मान्यताप्राप्त कंपनीकडून बसवलेली HSRPच वैध मानली जाणार आहे. इतर ठिकाणची नंबर प्लेट लावल्यास थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करत लवकरात लवकर HSRP बसवण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
137
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 21, 2025 04:05:53
Nashik, Maharashtra:डोंगराळे,मालेगाव.. डोंगराळे गावातील महिला व विद्यार्थिनींनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे घोषणाजी करीत त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन बालिकेला न्याय द्यावा.. गावातील महिलांचा आक्रोश.. आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करीत केली घोषणाबाजी..मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग... • मंत्री गिरीश महाजन बाईट मुद्दे.. - मुख्यमंत्री महोदयांशी मी यासंदर्भात बोलणार आहे... - फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याची मागणी करणार आहे... - अतिशय निर्दयी ही घटना आहे.. - आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे हीच मागणी आहे.. - कायद्याच्या तरतुदीनुसार निश्चितच त्याला फाशीची शिक्षा होईल.. - येणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निश्चितच चर्चा करू - आणि पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.. - कायद्याची तरतुदीप्रमाणे लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन आरोपीला शिक्षा देण्यात येईल.. - आम्ही सगळे पीडित कुटूबियांच्या सोबत आहोत.. - या परिसरात एक पोलिस चौकीची मागणी केली आहे.. - येत्या दोन दिवसात या भागात पोलिस चौकीची निर्मिती होईल... - गावकऱ्यांच्या संतप्त भावना आहे.. - त्याला चौकात सजा झाली पाहिजे.. - पण कायद्याच्या तरतुदी प्रमाणे त्याला शिक्षा मिळेल.. - उज्वल निकम यांच्याशी बोलणे झाले आहे... - त्याला शिक्षा होईल..
140
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 21, 2025 04:05:38
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जय भवानी - जय शिवाजी म्हणतात हे, कशाच्या जीवावर आईच नाव घेता? तुळजाभवानीच्या दरबारातून पहिल्या प्रचार सभेत आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा थेट हल्लाबोल. तुळजाभवानी मंदिराच्या विकासाला सत्तेत असताना एक रुपयाही दिला नाही, साधा प्रस्ताव पाठवला नाही, कशाच्या जीवावर बाता मारता? खासदार, आमदार यांनी एक पाकीटमार तरी पकडून दिला का, राणाजगजीतसिंह पाटील यांचा जाहीर सभेत ड्रग्ज प्रकरणातील टिकेवरून ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. भाजपची तुळजापुरात जंगी शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली. विनोद गंगणे यांच्या बद्दल खोट नाट बोलले खरं मी तुळजापुराला नाही तर महाराष्ट्राला सांगितलं. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने टीकेची झोड, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील नगरपरिषद प्रचारासाठी मैदानात.
157
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 21, 2025 04:01:34
Khed, Maharashtra:पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषदेत शिंदे गटाने महिला आरक्षित वार्डात अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली. अतुल देशमुखांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना पूर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असुन भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा, आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत असतानाही अतुल देशमुख यांनी मोठा डावपेच टाकत विचारावर चालणाऱ्या लोक कमी आहेत पण जी विचारावर चालतात ती घडतात असं म्हणत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले.
194
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 04:01:11
111
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 04:00:48
Nagpur, Maharashtra:नागपूर सलील देशमुख राजीनामा देत रात्री मुंबईला गेल आहे.. एकीकडे प्रकृतीचा राजीनामा दिल्याचं कारण पुढे केलं असताना सलील देशमुख तडकाफडकी मुंबईला गेल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहे... सलील देशमुख यांची मध्यंतरी प्रकृती खराब असताना रुग्णालयात अजितदादा पवार यांनी स्वतःहून त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता प्रकृतीचे कारण देत राजीनामा देणारे सलील देशमुख मुंबईला गेलेले सलील देशमुखची नवी वाटचाल चे संकेत देताय सलील देशमुख राजीनामा मागे असल्याची चर्चा काय? सलील देशमुख यांच्या राजीनामा देण्यामागे काटोलचे शेकापचे राहुल देशमुख यांच्या यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे. त्यांना राष्ट्रवादी sp चा पाठिंबा दिल्याने सलील देशमुख खरंतर नाराज असल्याने राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सलील देशमुख हे आमदारकीसाठी उमेदवार होते. त्यावेळी शेकापचे राहुल देशमुख यांनी विरोधात आमदारकिसाठी निवडणूक लढवली... चरण सिंग ठाकूर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. एकाीकडे सलील देशमुख पराभवासाठी शेकापचे राहुल देशमुख हे जबाबदार असताना. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिल्याने सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसल्याचे बोलले जात आहे. पण या सगळ्यांमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका मात्र अजूनही स्पष्ट झालेली नाही हे विशेष.
231
comment0
Report
Advertisement
Back to top