Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

कैप्टन अशोक खरात मामले में रंग, नार्को टेस्ट और मंत्रियों के नाम की मांग

JJJAYESH JAGAD
Mar 21, 2026 01:16:11
Akola, Maharashtra
कैप्टन अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. या प्रकरणी खरात याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी केली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतल्याचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी न्यायालयीन पद्धतीने व्हावी आणि गरज पडल्यास कॅप्टन अशोक खरात तसेच त्याच्यासोबत ज्या नेत्यांचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत, खरात यांच्या संपर्कात ८ ते ९ मंत्री होते असा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्या मंत्र्यांची नावे जनतेसमोर आणावीत, अशी मागणीही मिर्झा यांनी केली आहे. याचबरोबर मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे कॅप्टन अशोक खरात राहत असल्याचं माहिती समोर आली असून त्या हॉटेलमधील वास्तविक्यासंदर्भातही चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 21, 2026 02:49:04
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 21, 2026 02:48:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ११ हजार ५७२ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८,४५५.७८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, मक्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशाच्या उत्तर भागातील हवामानातील अनपेक्षित बदलांचा परिणाम महाराष्ट्रासह मराठवाड्यात दिसतो आहे. हवामान विभागाने १७ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त केली होती. जिल्हा--------/बाधित शेती , हेक्टर मध्ये संभाजीनगर. ८४५५.७८ जालना. १३६४.२० नांदेड. ३४.२५ बीड. १५६.०० लातूर. ५२.०० धाराशिव. १५०९.९० एकूण. ११५७२.१३
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 21, 2026 02:48:18
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 21, 2026 02:18:22
Kalyan, Maharashtra:दिवसा मिस्त्रीचे काम, रात्री बाईक चोऱी.. पोलिसांनी ठोकल्या चोरट्याला बेड्या मिस्‌تریचे काम करुन पैसे कमावितो. परंतू नशेखोरीकरीता पैसा कमी पडतो. त्यासाठी त्याने बाईक चोरीचे काम सुरु केले. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ललित देवरे या ३३ वर्षीय तरुणालाई बेडया ठोकल्या आहे. धक्कादायक म्हणजे ललित देवरे याने आत्तापर्यंत चोरलेल्या चार बाईк पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या शोधासाठी विशेष मोहिम सुरु केली आहे. डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली पथक तयार कारण्यात आले आहे कल्याणमध्ये एक बाईक चोर हा नाशिकजवळील सिन्नर परिसरात राहतो. अशी माहिती मिळताच त्याठीकाणी ललित देवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी ललित याच्याकडून चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. एक बाईक त्याने जळगाव येथे विकली होती. ललित हा मिस्त्रीचे काम करतो. नशा करण्यासाठी त्याला जास्तीचे पैसे हवे होते. त्यामुळे त्याने चोरीचा धंदा सुरु केला. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आत्तापर्यंत त्याने किती चोऱी केल्या आहेत. याचा पोलिस तपास करीत आहेत.
1021
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 21, 2026 01:00:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथनगरीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न.. अँकर - "नागनाथाच्या नावानं चांगभलं"च्या गजरात सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागनाथनगर येथे बगाड पळविण्याचा सोहळा पार पडला आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड पळवण्याची परंपरा जोपासण्यात आली. विटा नजीकच्या नागनाथनगर येथील ग्रामदैवत आणि जागૃત देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहेे. या यात्रेनिमित्त बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा आहे, नवस फेडण्यासाठी लाकडी चाकांच्या बैल जोडीला नारळाचे तोरण बांधून बगाड पळवण्यात येतात. गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आज देखील जोपासण्यात येत असून गुलाल व भंडार्‍याची उधळण करत पार पडलेल्या पगार पळवण्याच्या सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी नागनाथ नगरीत उपस्थिती लावली होती.
1065
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 20, 2026 17:01:15
Virar, Maharashtra:हितेंद्र ठाकूरांबाबत महासभेत अपशब्द, बविआ- भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले विरार वसई विरार महापालिकेची महासभा सुरू असताना बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना भाजपा नगरसेवकांनी अपशब्द उच्चारल्याने तणाव निर्माण झाला होता. संतप्त बविआ आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले. यामुळे महासभेचे कामकाज ठप्प झाले होते. वसई विरार महापालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विषय सुरू होता. प्रकल्पबाधीत लोकांचे पुर्नवसन करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. ते झाल्यानंतर भाजप नगरसेवकांनी देश का नेता कैसा हो..नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा दिल्या. त्यावेळी बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याबाबत भाजप नगरसेवकांनी अपशब्द उच्चारले. त्याांना नगरसेवक निशात चोरघे यांनी आक्षेप घेतला आणि एकच गोंधळ उडाला. सर्व सदस्य आपल्या आसनावरून उठले आणि एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने कामकाज सुमारे १५ मिनिटे ठप्प झाले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत नियंत्रणात आणले. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.
1077
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 15:30:49
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या हायव्होल्टेज ड्राम्यात आता नाट्यमय वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ठिकाणी पोहोचत असताना त्यांना दारातून स्थानिक गुन्हे शाखेने अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर त्यांना महाबळेश्वर मध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी झुंडशाहीचा استخدامها करून आपल्याला मारहाण केली आणि मतदानापासून वंचित ठेवले,असा खळबळजनक आरोप या दोन्ही सदस्यांनी केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना अनिल देसाई यांनी संताप व्यक्त केला. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी ही अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केवळ दडपशाहीच केली नाही, तर आम्हाला मारहाणही केली आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार असताना अशा प्रकारे पोलीस बळाचा वापर करणे म्हणजे झुंडशाही आहे.
1085
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 15:17:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेने आणखी एका बिबट्याला जखमी केले आहे. या महामार्गावर भरगाव वेगातील वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या जखमी वा मृत होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. घनदाट जंगलाचा परिसर असलेल्या या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे वन्यजीव उपशमन योजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अपघाताची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले. घनदाट जंगलाच्या परिसरातल्या या राष्ट्रीय महामार्गावर जखमी अवस्थेतील बिबट्याला तज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्धीचे इंजेक्शन मारून त्याला निपचित करण्यात आले. या बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवाना करण्यात आले आहे. वन्यजीवप्रेमीनी या मार्गावर वन्यजीव अपघात टाळण्यासाठी निश्चित केलेल्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी रेटली आहे.
1090
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 13:48:44
Bhandara, Maharashtra:भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील... अशोक खरात प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य... नाशिक मध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिसाला अटक केली असून या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांच्या वतीने केली जात आहे.. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन दिले.. तर अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले..
1029
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 13:33:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांचा,जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांना इशारा एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,अजून लई बाकी आहे..अश्या शब्दात मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत एवढा अट्टाहास कशासाठी आणि हा ट्रम्पचा पराभव केलाय का ? आणि आमचा पराभव करायला तीन पिढ्याच वैर विसरून एकत्र यावे लागेल,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांना लगावत,सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकी वेळी आमच्याकडून काही चुका,अरेरावीची भाषाअसेल अशा गोष्टी घडल्याचा पराभव झाला,अशी प्रांजल कबुली मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी देत,पण यापुढे तुम्ही तुमच्या खासदारकीची आणि आमदारकीची चिंता करा,असा इशारा देखील पाटील यांनी विशाल पटल्ा व जयंत पाटलांना दिला आहे,ते सांगलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील - पालकमंत्री, सांगली.
1042
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 20, 2026 12:31:28
Ambernath, Maharashtra:बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणार. कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला मंजुरी. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलावूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल. याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीतमुळे वांगणी-बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराची लोकसंख्या जवळपास 10 लाखांच्या घरात आहे. या शहरातील नागरिकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे मार्गे रेल्वेने प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी जवळपास दीड तास लागतो. त्यामुळे वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान कासगाव रेल्वे स्थानक तयार करून कासगाव-कामोठे नवा रेल्वे मार्ग तयार केल्यास हे अंतर अवघ्या अर्ध्या तासांत पार करता येणं शक्य आहे. तशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी लावून धरली होती. नुकताच नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती राम पातकर यांनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा वांगणी, बदलापूर अंबरनाथ तसेच उल्हासनगर पर्यंतच्या प्रवाशांना होऊन वेळेत मोठी बचत होईल असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केलाय.
1062
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 20, 2026 12:17:03
Wardha, Maharashtra:- ग्रामपंचायत भवनात राष्ट्रनेत्यांचे फोटो नसल्याने आमदार राजेश बकाने संतप्त - ४८ तासांत फोटो लावण्याचे आदेश; निष्काळजीपणावर तीव्र नाराजी - ग्रामपंचायत भवनांमध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांची अधिकृत छायाचित्रे लावलेली नसल्याचे आमदार राजेश बकाने यांच्या निदर्शनास आले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बकाने यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ जाब विचारला. शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रनेत्यांची छायाचित्रे लावणे आवश्यक असताना ती अनुपस्थित आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे तक्रार नोंदवली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सर्व ग्रामपंचायत भवनांमध्ये आवश्यक छायाचित्रे लावण्याचे कडक निर्देश दिले. - ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करत, अशा प्रकारची हलगर्जीपणा पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार बकाने यांनी दिला.
1033
comment0
Report
Advertisement
Back to top