Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में शिक्षकों के ट्रांसफर घोटाले में 268 पर बोगस प्रमाणपत्र लेने के आरोप

JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 01:45:23
Akola, Maharashtra
अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग (UDID) प्रमाणपत्रे तसेच खोट्या आजारांची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही गंभीर बाब माहिती अधिकारातून समोर आली असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी केला आहे. कुरई यांनी माहिती अधिकारातून काढलेल्या माहितीनुसार, तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे आणि खोट्या आजारांची कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुर्तीजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी याआधीच केली होती. त्यासाठी त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अनेकदा लेखी तक्रारही दिली होती. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान गैरप्रकार सिद्ध झाल्यास सुमारे 280 शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 25, 2026 02:48:42
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार नवीन एमआरआय मशीन. आ. देवेंद्र कोठे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची मागणी केली. आ. देवेंद्र कोठेच्या मागणी पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही करत याबाबतचे आदेश दिले आहेत. सध्या असलेली एमआरआय मशीन ही बारा वर्षे जुनी असून ती कालबाह्य झाली आहे. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, मराठवाडा, आणि तेलंगणा अशा अनेक राज्यातून उपचारासाठी रुग्ण सोलापुरात येत असतात. मात्र त्यांना एमआरआय करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते मात्र आता नवीन एमआरआय मशीनमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
556
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:45:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच १ एप्रिल रोजी रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर होतात. यंदाही या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं छत्रपती संभाजी नगरात  वाढीव मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी नागरिक ३१ मार्चपूर्वीच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहेत. नागरिकांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये शनिवार आणि रविवारसह सर्व शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन, बीड बायपास भागात दोन, अशी एकूण पाच नोंदणी कार्यालये आहेत...
497
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 02:45:31
Varasoli, Maharashtra:स्क्लग – रायगड जिल्‍हा परीषद विषय समिती सभापतीपद का चुनाव बिनविरोध पार पड़ा. परंतु खातेवाटप अद्याप जाहीर नहीं हुए हैं, सोशल मिडियावर नवनिर्वाचित सभापतींचे खातेवाटप काही उत्साही कार्यकर्ते वाटून मोकळे झाले आहेत. सभापतींचे खातेवाटप करून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सोशल मिडियावर फिरताहेत. या अफवांमुळे नागरीकांमध्‍यये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र याबाबत जिल्‍हा परीषदेत नवनिर्वाचित पदाधिकारयांनी भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. महिला बालकल्‍याण समिती व समाज कल्‍याण समिती वगळता अद्याप कुठल्‍याही खात्‍यांचे वाटप करण्‍यात आले नाही. वरिष्‍ठ पातळीवर याबाबत निर्णय होवून 7 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत ते जाहिर केले जाईल, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.
518
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 25, 2026 02:45:12
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरातील प्राचीन श्री पोद्ददारेश्वर राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोमात सुरू आहे.. विशेष म्हणजे यंदा मंदिरात तब्बल 17हजार नारळाची आकर्षक अशी आरास तयार करण्यात आलीय. मंदिराचे प्रवेशद्वार,सभामंडप या सर्व परिसरात तब्बल 17हजार श्री फळांनी ही आरासने सजावण्यात आलेय. सुमारे महिनाभर ही आरास तयार करण्याकरता अवधी लागला... नारळाची आरास बांधण्यासाठी मौली धाग्याचा वापरण्यात आलाय .. उत्सव झाल्यानंतर हे नारळ प्रसाद रुपात भक्तगणांना परत देण्यात येणार आहे.... दरम्यान प्रभू श्रीरामाच्या मंदिरात करण्यात आलेली आकर्षक अशी श्रीफळांची आरासचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
509
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:34:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पुन्हा छत्रपती संभाजी नगरात वातावरणात मोठा बदलाव होणार असून बुधवारी और गुरुवारी शहरावर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाचीही शक्यता आहे.. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर तापमानात वाढ होत असली तरी मंगळवारी संध्याकाळी शहराच्या आकाशात ढगांची दाटी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तवल्याचे संदेश पाठवले होते. या वर्षी शहरवासीयांना निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव येत असून ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, त्यानंतर थंडी आणि दुसऱ्याच दिवशी उन्हाचा कडाका असे विचित्र हवामान पाहायला मिळत आहे.
885
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:33:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी प्रशासनाने सोय उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये ये-जा करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार नाही. पीएम उषा प्रकल्पांतर्गत मिळालेल्या निधीतून खरेदी केलेल्या चार नवीन इलेक्ट्रिक गाड्यांचे लोकार्पण मंगळवारी झाले. विद्यापीठाला प्राप्त झालेल्या १०० कोटींच्या निधीतून सुमारे ४० लाख रुपये खर्च करून या गाड्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १४ आसन क्षमतेच्या २ गाड्या, तर ८ आसन क्षमतेच्या २ गाड्या अशा एकूण ४ गाड्यांचा समावेश आहे. फक्त विद्यापीठाचे आय कार्ड दाखवून या गाड्यांचा उपयोग करता येणार आहे.
1048
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 25, 2026 02:33:06
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या कामरगाव परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पुणे-अहिल्यानगर रोडवरील हॉटेलच्या पार्किंगमध्ये ३ एच.पी. गॅस टँकरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये विनापरवाना गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून चार आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ५७ टन गॅस, ३ मोठे टँकर, १ टेम्पो आणि भारत गॅस कंपनीच्या टाक्या असा एकूण २ कोटी १ लाख ९६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सचिन बोधले, माणिक गुट्टे, उल्हास कवडे आणि अमृत ठोकळ या चौघांना ताब्यात घेतलं आहे.
1029
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 15:49:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - पेट्रोल संपणार,या अफवांनी पेट्रोल भरण्यासाठ पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची झुंबड सांगली जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडाली आहे.आखाती देशातील युद्ध परिस्थिती मुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार ,अश्या अफवांचे पीक पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. ईश्वरपूर मधल्या एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकी सह चार चाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती,दरम्यान जिल्हा अधिकारी यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं सांगण्यात येत आहे,पण केवळ अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होत असल्याचं सांगण्यात आले आहे।
993
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 24, 2026 15:32:52
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये पुन्हा भटक्या कुत्र्यांचा हैदोस , विद्यार्थीनीवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका नागर ही नेहमीप्रमाणे आपल्या भावासोबत घरी जात असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याने तिला चावा घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या वंशिकावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास हा पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही ठोस उपाययोजना करण्यात उपयोगी ठरत नाही असे नागरिकांकडून दावा केला जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
1083
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 24, 2026 15:17:40
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड वर्ध्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी अँकर - वर्धा शहरातील बजाज चौक, आरती चौक आणि शांती नगर परिसरातील पेट्रोल पंपांवर आज अचानक मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी धाव घेतली. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.दरम्यान, या परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्टता दिली आहे. वर्धा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांवर ताण वाढल्याचेही दिसून आले. प्रशासनाच्या मते, सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या संदेशांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
1083
comment0
Report
Advertisement
Back to top