Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

आहिल्यानगर के बसों में सोने की चोरी: तीन महिलाएं गिरफ्तार, 90 ग्राम सोना बरामद

LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 04:46:08
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या बस आणि बस प्रवासदरम्यान प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तीन महिलांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या तीन महिलांकडून 90 ग्रम सोन्याचे लगड हस्तगत करण्यात आली असून त्यांनी केलेल्या 10 गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी महिलांमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सतीश भोसले याची पत्नी आणि भावजाई यांचा समावेश आहे या महिलांवर यापूर्वी देखील अहिल्यानगर, संभाजीनगर आणि बीड येथे गुन्हे दाखल आहेत पोलीस या महिलांची कसून चौकशी करत असून यांचा सोबत अजून किती मोठी टोळी कार्यरत आहे याचा तपास करत आहेत
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 25, 2026 07:19:53
Shirur, Maharashtra:गेली काही दिवसापासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय, सध्या कांद्याला किलोला ८ ते १२ रुपये पर्यंतचा बाजार मिळत असल्याने केलेला खर्च हि निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. मागील वर्षी ही वखारीत साठवलेल्या कांद्याला बाजार भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागला होता तर या वर्षी हि वातावरणातील बदलामुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने आणि कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागतोय याचाच लोणी बाजार समितीतून आढावा घेतलाय.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 07:19:21
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 25, 2026 07:04:59
Akola, Maharashtra:राज्य में अकोला जिल्ह्यासह एकच खळबळ उडाली आहे. अकोला पश्चिम के काँग्रेस विधायक साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शुभम लोणकर यांच्या नावाने हा कॉल आला होता. या घटनेमुळे आता आमदारांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात अकोला जिल्ह्यात बिश्नोई गँगचे जाळे पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना शुभम लोणकर या व्यक्तीकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आमदार साजिद खान पठाण यांना फोन करण्यात आला. हा कॉल बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर याच्या नावाने करण्यात आला असून, १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित कॉल कॅलिफोर्नियाहून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार. साजिद खान पठाण यांना मिळालेल्या या धमकीनंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ केली आहे. पठाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, ही सुरक्षा अपुरी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) संघटक सचिव जावेद झकेरिया यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पठाण यांना 'वाय प्लस' (Y+) सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. आमदारांनाच सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्यांचे काय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर पोलीस administration सतर्क झाले असून कॉलचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. राजस्थान आणि इतर राज्यांमधील बिश्नोई गँगच्या हालचालींचाही मागोवा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आमदार साजिद खान पठाण आणि धमकी देणाऱ्या शुभम लोणकर यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या संभाषणात समोरची व्यक्ती "मी शुभम लोणकर बोलतोय" असे सांगत दोन दिवसांत १० कोटी रुपये देण्याची मागणी करत आहे. धमकी देताना बाबा सिद्दिकी यांच्या प्रकरणाचे उदाहरण देऊन भीती घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "आज नाही तर उद्या, तुम्हाला किंवा तुमच्या निकटवर्तीयांना उडवून देऊ," अशी टोकाची धमकी या कॉलमध्ये देण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतर अकोला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अकोला मध्ये राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 07:01:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. - मी आज- उद्यमध्ये अंबादास दानवे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार - केलेल्या आरोपाचे दानवेनि उत्तर द्यावे, खासदार संदिपान भुमरे यांचे दानवेंना आव्हान - मी कधीही पत्रकार परिषद घेत नाही. मात्र माझ्यावर वारंवार खोटे आरोप होत असल्याने मी आज माध्यमांसमोर आलो आहे. - 1150 कोटी हा भाव कोणी काढला. कोणत्या आधारे आमच्यावर आरोप केले आहे. - यापूर्वी आ.विलास भुमरे यांना मारहाण झाल्याचा खोटा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्या प्रकरणी अब्रु नुकसानीचा दावा यापूर्वी दाखल आहे. त्याची पुढील तारीख 27 आहे. - आज मी वकीलकडे जाणार आहे.आता माझ्यावर अंबादास दानवे यांनी जो आरोप केला आहे. त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. - माझ्या चालकाने जर चुकीचे केले असेल तर त्यावर करावी करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. - काल जे माझ्यावर आरोप झाले, चालकावर झाले. ते माध्यमातून कळले. - त्यामध्ये असे सांगितले की जावेद यांनी1150 कोटीचा हिबानामा केला आणि तो माझा चालक आहे. माझा चालक आहे हे मी नाकारत नाही. अंबादास दानवे यांनी माहिती घेऊन आरोप करायला पाहिजे होते. ती कोण महिला आहे. तिला मी आणि माझा चालक ओळखत नाही. - माझ्या चालकाची जन्मतारीख 1984 आहे आणि हिबानामा 1971 मधे झाला आहे. त्यावेळी जावेद हा जगात होता ka? - बाई ही हिंदू आहे. जमीन मुस्लिम व्यक्तीची असल्याने हीबानामा होत नाही. - जर शासकीय यंत्रणेचा गैर वापर झाला असेल तर प्रकारांची चौकशी करा. - माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. - 174 हा गट क्रमांकच नाही. 154 गटाचे वाद सुरू आहे. त्याचे पैशे कोर्टात जमा आहे. गट फक्त 171 पर्यंतच आहे. मग 174 चा हिबानामा कसा होऊ शकतो. आणि जे 154 गटाचे कोर्टात वाद आहे.ते लोक पण वेगळे आहेत. - अंबादास दानवे हे खोटे बोलतात, त्यांच्यावर या अगोदरच अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. अंबादास दानवे यांचे संतुलन बिघडले आहे. जिल्हा हातातून गेला, आता ते आमदारही होत नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या लवाजमाची सवय त्यामुळे त्याचं संतुलन बिघडले.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 25, 2026 06:46:21
Malegaon, Maharashtra:पॅकेज स्टोरी: विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव महानगर पालिकेच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज पठणाची शहरात चर्चा - व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. - सदर प्रकरणाची किरीट सोमय्या यांच्या कडून दखल, दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन.. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्याकारणाने वारंवार महानगर पालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तेव्हा त्यांनी आणि तेथील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने त्यांनी त्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्याने हा आता शहरात चर्चेचा हा विषय बनला असून त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाइट: लुकमान कमाल, लोकसंघर्ष समिती अध्यक्ष VO 2: सदर प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेत शासकीय इमारतीत जे नमाज पठण झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करा अशा मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे. बाइट: किरीट सोमय्या, भाजप नेते VO 3: विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, हिंदू कर्मचारी पूजा करतात किंवा मुस्लिम नमाज पठण करतात हा विषय नसावा बाइट: अस्लम शेख, काँग्रेस नेते VO 4: दरम्यान मालेगाव हे काही ना काही कारणास्तव आता राज्यात चर्चेत येत आहे आता पुन्हा शासकीय कार्यालयात नमाज पठण झाल्याने नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे... विशाल मोरे, झी मीडिय मालेगाव
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 25, 2026 06:31:22
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 25, 2026 06:20:50
Chendhare, Maharashtra:राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी यांचं अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर. ज्यांना अजित दादा कळले नाहीत त्यांना पार्थ पवार कसे कळणार? अँकर - अंजली दमानिया यांना ओबेनसिव ऑप्शन्सिव्ह अँगार नावाचा आजार जडलाय. ज्यांना अजित पवार यांच्या कामाचे योगदान, त्यांची गुणवत्ता कळली नाही त्यांना पार्थ पवारांची गुणवत्ता, जनाधार कसा कळणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी उपस्थित केलाय. पार्थ पवार यांना state सभेवर पाठवण्यास आक्षेप घेत त्यांचं सामाजिक योगदान काय असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी दळवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पार्थ पवार यांची गुणवत्ता तुम्हाला सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे असही दळवी म्हणाल्या.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजुर येथून निघालेला लॉन्ग मार्च दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाला आहे राजूर येथून निघून अकोले येथे मुक्काम केल्यानंतर आज संगमनेर येथे हा मोर्चा पोहोचणार आहे हजारोंच्या संख्येने लाल बावटा हातात घेऊन आदिवासी, शेतकरी आणि कामगार या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत काल दहा हजाराच्या आसपास असलेल्या मोर्चेकर्‍यांची संख्या आज वाढण्याची शक्यता आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लाँगमार्च काढण्यात आला आहे दरम्यान सरकारकडून लाँगमार्चची दखल घेण्यात आली असून आज मंत्रालयात येथे विविध खात्यांचे मंत्री आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे बैठकीसाठी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे मात्र एकीकडे सरकारशी चर्चा, तर दुसरीकडे मोर्चा सुरू राहणार असल्याचं डॉक्टर नवले यांनी म्हटल आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Feb 25, 2026 05:32:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत पीसी एक जागा तर महाविकास आघाडी जर मिळणार असेल तर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागणार ना … नेत्यांनी एकत्र चर्चा करणं हे सगळे केलं पाहिजे .. या निवडणूकीची त्यारी देशभरात सुरू आहे महाराष्ट्रात ७ जागा आहे .. एका जागेवर आम्ही निर्णय घेऊ तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत .. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा ही अपेक्षा आहे शरद पवार साहेब निवडणूीला उभे राहणार की नाही हे नाही माहित .. ते जेष्ठ नेते आहेत .. त्यांनी इच्छा व्यक्त केली मग आम्ही एकत्र येऊन निर्णय घेऊ … आम्ही एक आहोत .. आणि आम्ही एकत्र लढणार आहे … अजित पवार गटा बाबत मी काय बोलणार .. त्यांचे नेतृत्व सुनित्रा ताई करत आहे आता या बाबत आम्ही काय बोलणार … पार्थ पवार या बाबत मी काय बोलणार .. त्यांच्या जमिनीचा विषयी संपली नाही .. पण मुख्यमंत्री पाठीशी आहेत म्हणून धडपडले जाऊन जात आहेत का .. तुम्ही सत्ताधारी एकत्र आहेत म्हणून ही गोष्ट समोर येत आहे .. माझ्याकडे या बाबत माहिती नाही … बावनकुळे कडे माहिती असेल तर त्यांनी सांगावं …. एक विमान DGCA ने उड्डान नकारली आहे रोहित पवार यांच्या विजयी आहे .. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे .. शोकसभेचे वातावरण आम्ही पाहिला .. पण त्यांचा कुटुंबातला नेता या आपघाच बाबत अभ्यास करत आहे या बद्दल आपण पाठीशी उभे राहिले पाहिजे … Trump बाबत कोणीच काही बोलत नाही .. RSS , पंतप्रधान मोदी या बद्दल कोणतेही वक्तव्य करत नाही . पण एक गोष्ट लक्षात असली पाहिजे .. ही trump यांना मोदीचा नेतृत्वावर प्रश्न उपसितथ केला आहे .. जेव्हा हिंदू मुस्लीम होतं तेव्हा ही मंडळी बोलतात … मराठी शाळा बाबत कोणीही एक व्यक्ती जवाबदार नाही .. शिक्षण मंत्री यांनी सांगतलं असेल तरीही ते एकते जव्बादार नाही .. अनेक आपली लोकं परदेशी शिक्षण घ्याला जात आहे हा आणि हे चुकीचं आहे …
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 25, 2026 05:23:13
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 25, 2026 05:16:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यात १५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान... पंचनामे अद्याप रखडले... औसा तालुक्यातील कारला येथे शेतकऱ्यांचा टाहो – “तात्काळ पंचनामे करा” शेतकऱ्यांची मागणी..... दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले… तब्बल जवळपास पंधरा हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे… पालकमंत्र्यांनी आणि कृषी मंत्री यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची घोषणा झाली… मात्र त्या आदेशाला जणू कृषी विभागाकडून केराची टोपलीच दाखवण्यात आली आहे… लेखी आदेश नसल्याचे कारण देत पंचनाम्यांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. दरम्यान, औसा तालुक्यातील कारला येथील शेतकऱ्यांनी संतप्त होत “तात्काळ पंचनामे करा” असा टाहो फोडला आहे…
0
comment0
Report
Advertisement
Back to top