Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
बेसमेंट से ज़मीन तक: महाराष्ट्र में बाढ़ से किसानों की तकलीफ बदस्तूर जारी
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:22:04
Nagpur, Maharashtra
लिंक असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केली आहे ----- नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री On अतिवृष्टी नुकसान - - रोजच एवढा पाऊस पडत आहे की शेतकऱ्यांनी शेतात जाणं बंद करून टाकलं शेतकरी शेतात गेला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे संपूर्ण पंचनामे करण्यावर आणि कुठलाही शेतकरी पंचनामे शिवाय राहू नये त्याबद्दल त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याच्या कार्य आणि मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून या सर्व पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू आहे - जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत किती नुकसान आहे याचा अंदाज येत नाही, पण खूप मोठा नुकसान आहे, महाराष्ट्र सरकार महसूल खातं, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग आम्ही सर्व शेतकऱ्यांचे सोलापूर, धाराशिव, जालना, महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत On राहुल गांधी - - आम्ही मदत नाही करणार तर कोण करणार, राहुल गांधी मदत करणार? आमचं सरकार आहे आम्हीच मतदान करणार ती आमची जबाबदारी आहे - शेतकरी संकटात आहे आणि शेतीला नुकसान झालाय तर सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, आम्हीही जबाबदारी पार पाडून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल - जसजसे पंचनामे सरकारकडे येत आहेत तसे तसे मदत पुनर्वसन विभाग काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले की मायनस अकाउंट मध्ये जिल्हाधिकारी पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देताय असे निर्णय शासनाने घेतले आहे On केंद्र सरकार मदत - - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आपत्तीत मदत केली आहे, मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधानांकडे गेले या आपत्तीत महाराष्ट्र सरकारला मदत मिळावी म्हणून - मुख्यमंत्र्यांनी जी काही नुकसान भरपाईच्या विषय आकडेवारी निश्चित मांडली असेल, कारण मुख्यमंत्री करत असतात - महाराष्ट्राला मोठी मदत केंद्राकडून मिळेल महाराष्ट्राच्या पाठीशी नेहमीच पंतप्रधान मोदी राहिले आहेत आम्ही आमचे वचन पूर्ण करू On 50 हजार मदत मागणी - - विरोधकांचे कामच आहे मागणी करण्याचे, सरकार पूर्ण क्षमतेने मदत करण्यास तयार आहे त्यामुळे विरोधकांनी जी काही मागणी केली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकार नियमाप्रमाणे पूर्ण करेल - शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं बांधावर जाऊन खटाखट पन्नास हजार रुपये देऊ मात्र कधीच दिले नाही - आमचे सर्व मंत्री फिल्डवर आहेत, सोयाबीनवर येलो मोझाक आला आहे, कपाशी गेली आहे संत्र मोसंबीचे नुकसान आहे, तर कोणीही शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये याची काळजी घेतल्या जात आहे On नागपूर नुकसान - - आज नागपूर ग्रामीण मध्ये जातोय, शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होणे आणि व्यवस्थित त्यांना मदत मिळणे हे सर्वांची प्रायोरिटी आहे, शेतकरी शेतमजुरांना नैसर्गिक आपत्तीची मदत करणे हे महाराष्ट्र सरकारचा एकच काम सुरू आहे On लक्ष्मण हाके - - लक्ष्मण हाकेजींची मी पोस्ट बघितली आहे, ते दुखी दिसून येत आहेत, त्यांना सपोर्ट मिळत नाही, ते समाजाकरिता लढत आहेत - मला त्यांचं मन का नक्की झालं हे माहिती नाही मी त्यांना मागे विनंती केली होती ओबीसी सब कमिटीचा चेअरमन असल्याने त्यांना काही म्हणणं मांडायचं असेल तर मंत्रालयातून माझ्याकडे द्या, मी बैठक लावेल अशी विनंती मी त्यांना केली होती पण नंतर त्यांचा माझा काही संपर्क झाला नाही On I Love Mohammad - - जाती जातीत तणाव निर्माण करून या पद्धतीचं तेढ निर्माण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत, या समाजकंटकांना सरकारने त्यांना जेरबंद केलं पाहिजे - केवळ बॅनर पुरत नाही तर दगडफेक करतात, सामाजिक हल्ले त्या ठिकाणी करतायेत हे काही योग्य नाही त्यामुळे महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रात सरकार बंदोबस्त करेल आणि उत्तर प्रदेशात होत असेल तर ते सरकार बंदोबस्त करेल -
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Sept 27, 2025 10:39:48
Kolhapur, Maharashtra:Kop MLA Kshirsagar Byte Feed:- Live U Anc:- येत्या काही दिवसात कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारा अन्यथा येत्या अधिवेशनात कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असा इशारा कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय. कोल्हापुरातील रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, तरीदेखील कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी याकडे लक्ष देत नाहीयेत असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील सर्किट हाऊस मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये अधिकाऱ्यांना चांगलंच झापले.. पाहूया क्षीरसागर नेमकं काय म्हणाले ते. Play Byte:- राजेश क्षीरसागर, शिवसेना आमदार कोल्हापूर उत्तर
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 10:39:41
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे शहर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धुळे जिल्ह्यात पोलिसांनी दोन लाखांचा सहायता धनादेश सुपूर्त केला. मुख्यमंत्री सहायता निधीत धुळे पोलीससांचे दोन लाखचे योगदान देण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या कडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धनादेश सुपूर्त केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ असतांना मुख्यमंतत्र्याचे स्वागत गुलाबाचे फुल देऊन न करता, धुळे पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून “ २ लाख रुपये “ गोळा करून Chief Minister’s Relief Fund चा चेक मुख्यमंत्री महोदयांच्या हाती पोलिस अधीक्षक धुळे जिल्हा श्रीकांत धिवरे यांनी सुपूर्त केला. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 10:39:20
Parbhani, Maharashtra:अँकर - यंदाच्या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे, हाता तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय, गोदावरी, दुधना,पूर्णा,पैनगंगा या नदीच्या पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती वाया गेली असून शेतीचा जिवंत स्तर खरडून गेलाय,त्यामुळे शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे. तर पिकांचा अक्षरशः चिखल झालाय. त्यामुळे अन्नदाता शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याच नाव घेत नाहीये. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. आता पुढचं वर्ष कसं काढायचं लेकरा बाळाची शिक्षण,मुला मुलींची लग्न कशी करायची याची चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे. या शेतकऱ्याच्या परिस्थितीवर परभणी येथील ग्रामीण कवी राजकुमार नायक यांनी केलेली टीव्हीवाले साहेब जरा ऐका धीराणं - भिजलेल्या सोयाबीनची बातमी कराणं ही कविता समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. या कवितेच्या माध्यमातून राजकुमार नायक यांना आता सरकारपेक्षा पत्रकार अधिक जवळचे वाटतायेत,टीव्हीवाल्यांनी आपली दुःख मांडली तरच शेतकऱ्यांना मोबदला मिळेल अशी आशा आहे,त्यामुळे कवितेच्या माध्यमातून कवी मीडियाला शेतकर्यांची दुःख दाखविण्यासाठी आर्त हाक घालीत आहेत. या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दुःख मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून केलाय... बघुयात ग्रामीण कवी राजकुमार नाईक यांची टीव्हीवाले साहेब जरा ऐका धिराणं भिजलेल्या सोयाबीन ची बातमी करा ना धमाल कविता.... कविता लावणे- राजकुमार नायक- ग्रामीण कवी,परभणी
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 27, 2025 10:38:44
Nashik, Maharashtra:*भूषण गवई भाषण पॉईंट्स* - नाशिक न्यायालयाची अतिशय सुंदर आणि आधुनिक इमारत आपल्याला मिळाली - माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यात एवढी सुंदर इमारत पाहिलेली नाही - आतून पूर्ण कार्पोरेट लूक, शासकीय इमारतीत प्रवेश करत अस कुठेच वाटत नाही - चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या चेंबरपेक्षा नाशिकच्या मुख्य न्यायाधीशांचे चेंबर मोठे आहे - ज्या इमारतीचं भूमिपूजन करण्याची आणि उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद - या इमारतीसाठी अनेकांचं योगदान - लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच काम सुरू होणार आहे - महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयीन विकासाठी सकारात्मक राहिलेत - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मदत केली - आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तितकेच सकारात्मक - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी येता आलं नाही - न्यायालयीन वास्तू उभारतांना सर्वांना सामावून घेण्याचा विचार केला - नाशिकच्या इमारतीत केवळ न्यायाधीश आणि वकीलच नाही तर पक्षकारांसाठी देखील सुविधा - *शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण नाशिकची इमारत पहिली तर नाशिककरांनी आपल्या खटल्यासाठी नव्हे तर सुंदर इमारत पाहण्यासाठी तरी कोर्टाची पायरी चढावी, कोर्ट पाहायला यावं* - महाराष्ट्रात सुरू असलेला लीगल एज्युकेशन प्रोग्राम देशभर सुरू करण्याचा विचार - भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य, बंधुत्व, समता दिलीय - *बाबासाहेब आंबेडकर नेहमीच महात्मा फुलेंना त्यांचे गुरु मानायचे* - फुले शाहूंचे विचार फार थोर - ४ नोव्हेंबर १९४८ ला बाबासाहेबांनी राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट समितीला दिला - काही अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या, काही ना मंजूर केल्या गेल्या - बाबासाहेब म्हणाले, एक व्यक्ती, एक मत या आधारावर राजकीय लोकशाही स्थापन झाली - मात्र जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही उपयुक्त ठरणार नाही - राजकीय स्तरावर आपण समान आणली, मात्र सामाजिक स्तरावर चार कंपार्टमेंटमध्ये विभागला गेलाय - एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जाणं शक्य नाही - बाबासाहेब म्हणायचे, सामाजिक आणि आर्थिक समानता आणत नाही तोवर देशाचा लोकशाहीचा भव्य डोलारा कार्यरत राहण्यास अपेक्षित यश येणार नाही - मागील 75 वर्षात देशाचा प्रवास अतिशय सकारात्मक - पार्लमेंटने असे अनेक कायदे केले की ज्यामध्ये सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केलाय - 1973 नंतर भारतीय न्यायव्यवस्थेने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतलेत - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते, की देशाच्या सर्वात गरीब नागरिकाला कमी वेळात आणि कमी पैशात न्याय मिळेल असं काम सर्वोच्च न्यायालय आणि सर्व देशभरातील न्यायालयात होत आहे किंबहुना ते व्हावं ही अपेक्षा
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 27, 2025 10:19:35
Mumbai, Maharashtra:मार्केटिंग स्टोरी  अँकर -- मुंबईत BKC त प्रॉपर्टी एक्स्पो सुरू आहे.यात किच कंपनीचे कार्पोरेट आणि घराला लागणाऱ्या साहित्याचे स्टॉल लावण्यात आलं आहे.अभिनेता अजय देवगण कीच  चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.कीच चे साहित्य ४२ देशात निर्यात केले जाते.कीच चे साहित्य ज्यात रेलिंग,बाथरूम साहित्य,डिजिटल लॉक, दरवाजे त्याचे साहित्य असून आंतरराष्ट्रीय मानकानुसार तयार करण्यात आले आहेत.दिल्लीतील सेंट्रल विस्टा,बुलेट ट्रेन या ठिकाणी रेलिंगचे साहित्य वापरण्यात येते आता सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी लागणे साहित्य देण्यात येत असल्याचे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भरत हपानी यांनी सांगितले आहे.अभिनेता अजय देवगण यांचे चित्रपट सृष्टीत १९९१ मध्ये पदार्पण झाले आणि कंपनीची स्थापना १९९२ मध्ये झाल्याने त्याला ब्रँड ॲम्बेसेडर करण्यात आल्याचेही भरत हपानी यांनी सांगितले. Byte - भरत हपानी मॅनेजिंग डायरेक्टर कीच  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८२ Slug -- Kitch Marketing story 
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 10:19:26
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 10:19:17
Hingoli, Maharashtra:अँकर- हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ४ वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अलर्ट‌ देण्यात आला असून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड‌ जिल्ह्याला रेड अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळापैकी 19 मंडळात माध्यरात्री अतिवृष्टी झालीय, वसमत आणि हयातनगर मंडळात 128 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर सकाळ पासून पावसाला खंड नाहीये, आज दुपारी चार वाजे पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सर्व धरण, साठवण तलाव तुडुंब भरले असून सर्व नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक महत्त्वाचे महामार्ग बंद पडलीयेत. तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय, वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात मधुमती नदीचे पाणी शिरल्याने गावातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे.. हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी १९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हयातनगर मंडळात १२८.८ मिलीमिटर, वसमत १२८.८, आंबा ११२, गिरगाव ६७.५, हट्टा ७३, टेंभूर्णी ७८.३, कुरुंदा १०४.८, औंढा ७७.८, हिंगोली ८०, सिरसम ८०, डिग्रस कऱ्हाळे ७१.३, माळहिवरा ८०, कळमनुरी १०३.८, वाकोडी १०७, डोंगरकडा ७०, येहळेगाव ७१.३, साळणा ६६.३, जवळा ६६.५ मिलीमिटर पाऊस झाला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 27, 2025 10:08:46
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे कापसाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परतीच्या पावसामुळे शेतात फुटलेला कापूस ओला राहून सडत आहे, त्यामुळे बोन्ड सडण्याचे प्रमाण वाढले आहे. Vo 1 : दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ‘सीतादही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या तोडणीला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाचा जोर कमी न झाल्याने आणि हवामान अनुकूल न ठरल्याने कापसाची तोडणी सुरूच होऊ शकलेली नाही. शेतात पिकलेला व फुटलेला कापूस ओलसर राहिल्यामुळे कापसाची गुणवत्ता घटली असून बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळण्याची शक्यता नाही. Byte : सचिन बोदडे , शेतकरी Vo 2 : याशिवाय, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततचा पाऊस, ओलसर हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोग व कीड नियंत्रणात येत नाही. कपाशी पिवळी पडली असून शेतकऱ्यांच्या हंगामभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. Byte : मनोज गावंडे , शेतकरी. Vo 3 : कापूस हा विदर्भातील शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. मात्र, यंदा अतिवृष्टी, बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदलामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी हंगामभर कर्ज काढून शेती करतात. परंतु पिकाचे उत्पादन घटल्याने व बाजारात भाव न मिळाल्याने त्यांना कर्ज परतफेडीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.परिस्थिती लक्षात घेता अकोला जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली जात आहे. शेतकरी संघटना व स्थानिक नेतेही शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी, अशी जोरदार मागणी करीत आहेत. Byte : दिलीप नाईक , शेतकरी . Final Vo: या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 27, 2025 10:08:21
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 10:01:06
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 27, 2025 10:00:11
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:49:22
Nagpur, Maharashtra:Ngp Wadetiwar byte live u ने फीड पाठवले ----- नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On नुकसान * आता झालेला अंदाजे नुकसान 50 लाख हेक्टरच्या जवळपास आहे.. * पावसामुळे मराठवाड्यातील जिल्हे उद्बसत झाले, जनावर वाहून गेले, शेतकरी,जमीन उध्वस्त झाली.. * शेतीतील कांदा, मका टोमॅटो, पाऊस आणि येलो मॅजिक रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला.. * शंभर टक्के पीक नष्ट झाली..त्यामुळे आता केवळ आम्ही पंचनामे करू असे म्हणण्यापेक्षा शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवून केंद्राची टीम बोलवा.. आणि मदत बोलवा... On बावनकुळे * त्यांना माझे म्हणणे आहे...पंजाबमध्ये आम आदमीची सरकार आहे. त्यांना 50 हजार रुपये हेक्टर मदत शक्य आहे तुम्हाला का नाही... * मग लोकांना तोंड दाखवायला कश्याला बांधावर गेलात.. इथे शंभर टक्के नुकसान झाल्याने मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे... * पंजाब सरकारला शक्य आहे ते तुम्हाला के शक्य नाही.. तुम्ही गोट्या खेळताय का..? On राहुल गांधी दौरा... * आम्ही महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे.. ज्यावेळी त्यांची दौरा ठरेल त्याची काही नक्की माहिती सांगता येणार नाही.. On लक्ष्मण हाके नाराज * लक्ष्मण हाके यांना काल मी बोललो, त्यांच्या कार्यकर्त्यांना हल्ले, प्रचंड मारहाण होत आहे. * ओबीसी मरत असताना सरकारची मदतीची मानसिकता नाही.. * सात ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली.. * मराठा समाजाच्या काही खोडसाळ, विचित्र मुलाकडून मारहाण झाली.. * मात्र त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही... कायद्या हातात घेऊन चालू असलेली दादागिरी का थांबविली जात नाही... * बीड मध्ये होणाऱ्या मेळाव्यात हाकेना का बोलवलं नाही.. तो मेळावा सत्ताधारी लोकांचा मेळावा आहे का..? * भुजबळ, धनंजय मुंडे, पडळकर त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.. On बीड ओबीसी मेळावा रद्द * त्या भागातील शेती उध्वस्त होत असताना.. मेळावा रद्द केला.. ही चांगली गोष्ट आहे..याचा आम्ही स्वागत करतो.. On आय लव्ह मोहम्मद, महादेव * नितेश राणेंना मंदिर मज्जिद तेच हव, आणि भाजपला देखील तेच पाहिजे.. कोणी बोर्ड लावला त्याच्यावर कारवाई करून वाद संपवायला पाहिजे.. * परंतु जाणून बुजून असे धंदे आपणच करायला लावायचं, आणि आपसात भांडण लावायचे आणि सत्तेची पोळी खायची असे हे चालबाज आहे... * काही न करता हिंदू मुस्लिम , मोहम्मद ,महादेव करत राहिला तर लोक मदत करत राहतील.. म्हणून हे सगळं सरकार पुरस्कृत आहे असा आमचा थेट आरोप आहे..
1
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top