Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501
धाराशिव के शेतकों पर नोटिस का खतरा: बैंक ने कर्ज नवीनीकरण चालू किया
DPdnyaneshwar patange
Sept 30, 2025 06:32:38
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव ब्रेकिंग - DHARA_NOTICE धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना बँकांच्या कर्ज नूतनीकरणाच्या नोटीसा. कर्जमुक्ती नूतनीकरणाच्या नावाखाली कर्ज वसुलीचा तगादा शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा धाराशिव जिल्ह्यातील संचितपुर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज कर्ज नूतनीकरणाच्या बँकेच्या नोटिसा अतिवृष्टी आणि स्वतःच्या पावसामुळे शेतीचा मोठा नुकसान झालेलं असताना बँकांकडून वसुली सुरूच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकरी संकटात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संचितपुर गावातील शेतकऱ्यांची मागणी धाराशिव दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते जमा करण्याचे आदेश byt: शेतकरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Sept 30, 2025 08:16:11
Kolhapur, Maharashtra:Kolhapur Breaking *खासदार धनंजय महाडिक बाईट मुद्दे* *ऑन ओवेसी* महाराष्ट्र हा एका विचारणे चालणारा राज्य आहे ओवेसी यांच्यासारखे लोक जातीयवादी संघटना आणि पक्ष चालवतात ओवेसी यांच्या फसवणुकीच्या पद्धतीला महाराष्ट्र स्वीकारणार नाही महाराष्ट्रात ग्रामपंचायतीला सुद्धा त्यांचे एकही खाते उघडणार नाही चर्चेत राहण्यासाठी फक्त मोठ्या नेत्यांवरती टीका करायची ओबीसी यांच्याकडे फार गांभीर्यांना बघावा असं वाटत नाही महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे एका विचारण्यात चालणार आहे जातीयवादी संघटना चालवणाऱ्यांना इथं थारा मिळणार नाही *On पाकिस्तान* पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतपाणी घालणार देश आहे त्यांच्या देशात सैन्या पेक्षा जास्त दहशतवाद्याला महत्त्व आहे *On शेतकरी नोटीस* कालच मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना सूचना केलेले आहेत की कोणीही कर्जाची वसुली करायची नाही सर्वांना सरसकट मदत दिली जाईल कॅबिनेट बैठकीनंतर मदतीची सर्व रुपरेषा स्पष्ट होईल *On PM केअर* मुख्यमंत्र्यांनी राज्यात झालेली भयावह परिस्थिती पंतप्रधान मोदी यांना सांगितली आहे लवकरच केंद्र सरकार याबाबत मोठे पॅकेज जाहीर करेल यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळेल पी एम केअर बाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही विरोधकांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत प्रधानमंत्री संवेदनशील आहेत त्यामुळे लवकरच मदत जाहीर होईल अशी अपेक्षा आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 30, 2025 08:15:45
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 3009ZT_CHP_LOSS_FIGURESS ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीची आकडेवारी धक्कादायक, गेल्या चार महिन्यात 15 तालुक्यातील विविध महसूल मंडळात 65 वेळा झाली अतिवृष्टी, सध्या सप्टेंबर महिन्यातील 55 हजार 741 हेक्टर वरील शेत पिकांच्या नुकसानीचे केले जात आहेत प्रत्यक्ष पंचनामे     अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात 65 वेळा विविध महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे .चंद्रपूर जिल्ह्यात कापूस -धान- सोयाबीन -तूर ही प्रमुख पिके आहेत. याशिवाय भाजीपाला पिकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यात मॉन्सूनच्या सुरुवातीला जून आणि जुलै या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 7 कोटी 33 लाख रुपये भरपाई वितरणाचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय ऑगस्ट या एकाच महिन्यात जिल्ह्यात 14 हजार 600 हेक्टर वर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान सप्टेंबर महिन्यात झाले असून या महिन्यात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी 55 हजार 741 हेक्टरवर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामांची प्रक्रिया सुरू असून यानंतरच अंतिम आकडा जाहीर होणार आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा शेत पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्याची कंबरडे मोडणारी ठरली आहे बाईट १) शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 30, 2025 08:15:24
Nagpur, Maharashtra:नागपूर - - " शेतकऱ्यांना फायदा मिळाला,प्रदूषण कमी झालं, इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते" - "यामुळे ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले आणि माझ्याविरुद्ध पेड न्यूज सुरू केल्या" - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य - नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात उड्डाण पुलाच्या उदघाटन प्रसंगी गडकरींनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं - "मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून एक रुपया घेतला नाही,(भ... गिरी) केली नाही..म्हणून मला कॉन्ट्रॅक्टर घाबरतात" - "मी खोटी कामे केली नाही,त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होणार नाही" - "राजकारण हा ईर्ष्या,मत्सर,द्वेष आणि अहंकाराचा खेळ आहे,आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या अपेक्षेत लोक टीका करत असतात" साउंड बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 30, 2025 08:05:29
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 30, 2025 08:05:21
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 3009ZT_BARAMATICITY FILE 4 सततचे होणारे अपघात रोखण्यासाठी बारामतीत नागरिकांचा आंदोलन.... अवजड वाहनांना दिवसा शहरातून कायमस्वरूपी बंदीची मागणी Anchor _ बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातांमुळे काहींचे मृत्यू देखील झाले आहेत. बारामती शहरातून दिवसा अवजड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी यासोबतच अपघातास कारणीभूत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज बारामती प्रांताधिकारी कार्यालयावर स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत आंदोलन केलं.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 30, 2025 07:48:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा तर उबाठाचा काँग्रेसच्या कावळ्यांचा - ज्योती वाघमारे (((( Facebook LIVE LINK )))) https://www.facebook.com/share/v/1FN4mXtyJD/ https://www.facebook.com/share/v/16Rph9g8FH/ ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्ता --- शिवसैनिकसाठी दसरा मेळावा हा पंढरपूर वारीसारखा अतिवृष्टी झाली त्यामुळेच मोठं नुकसान झालं आहे पण तरीही स्फूरण घेण्यासाठी शिवसैनिक मुंबईला येतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व खालची शिवसेना ही खरी शिवसेना संपत्तीचे वारसदार खूप असतील पण विचाराचे वारसदार वकनाथ शिंदे आमचा दसरा मेळावा हा मावळयचा तर उबाठाचा काँग्रेसच्या कावळ्यांचा दसरा मेळाव्यात विचार मांडले जायचे पण उबाठाचा मेळावा म्हणजे पीजे मारतात त्यामुळे त्यांनी हसरा मेळावा साजरा करावा मनसेचे नेते म्हणतात मुंबईचा महापौर हा मनसेचे होईल तेव्हा राऊत काहीही बोलले नाही भाऊ एकत्रित येतायत ठिक आहे पण ते वेगळे का झालं यावर राऊत बोलत नाही राऊत यांची गाडी का फोडली होती? संजय राऊत यांनी त्यांचा मेळावा दिल्लीला घ्यावा त्यांचे हायकामंड दिल्लीमध्ये आहेत एका विमानात बसतील एवढंच लोकं राहलेले आहे त्यांनी सोनिया गांधीच्या अंगणात जाऊन मेळावा घ्यावा उबाठाच्या मेळावा मुसा का कोण तो अंतःकवादी होता तो प्रवक्ता आहे त्याला बोलवणार का? उद्या दाऊदला ही बोलावतील धर्माच्या आधारावर मतं राजकारण करण्याशिवाय ओविसी यांन काय केलं? पूर बाधित क्षेत्रात अत्यंत वाईट अवस्था आहेत महिला माझ्या गळ्यात पडून रडतायत बँकेचा नोटीस येतं असतील तर त्या बंद झाल्या पाहिजे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या बाबतीत सांगून ही सुलतानी वसुली थांबवा पूरग्रस्त भागात गेल्यानंतर लोकांच्या व्यथा ऐकून मी व्यथित झाले मी राजकीय नेता नसते सामान्य असते तरी तेच केलं असतं मी अशा ट्रोलिंग ला भीक घालत नाही आम्ही मान्य करतो जिल्हाधिकारी हुशार आहेत पण त्यांनी संवेदनशील पणे वागावं प्रशासनावर दबाव आहे मान्य आहे पण आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडतोय जर असं करताना अनेक वेळा टीका झाली तरी मला फरक पडतं नाही ऑन ओविसी नगर सभा --- महाराष्ट्र अतिवृष्टीशी झुंजतोय, पुरामुळे उध्वस्त झालेत अहिल्यानगरमध्ये त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषण करू नये आधीच अस्मानी संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्रला ह्या सभेनंतर काही झालं तर परवडणारे नाही त्यामुळे राजकीय नेत्यांकडून संवेदनशील पणे वागण्याची अपेक्षा करतोय LIVE LINK
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 30, 2025 07:47:58
Yeola, Maharashtra: अँकर:- भारतभर प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील दसऱ्याच्या घोडे बाजाराची साडेतीनशे वर्षांची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील आवारामध्ये देशातल्या विविध राज्यातून अश्वांची खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या विविध राज्यातून अश्वप्रेमी दाखल झाले आहेत. 25 हजार ते 7 लाख रुपये अशी अश्वांच्या प्रजातीनुसार या बाजारात बोली लावली गेली असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल येवल्याच्या प्रसिद्ध अश्व बाजारात पाहायला मिळाली .राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज शाहू शिंदे व अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या अश्व बाजाराला सुरुवात करण्यात आली. पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, आधी राज्यातून हजारोंच्या संख्येने अश्व व्यावसायिक व अश्वप्रेमी येवल्याच्या बाजारात दाखल झाले बाईट 1:-शाहू शिंदे, राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज, बाईट 2:-अविनाश शिंदे, राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज, बाईट 3-सम्राट जाधव, अश्वप्रेमी बाईट 4 :-रोहित डोंगरे, अश्वप्रेमी, P2C:-सुदर्शन खिल्लारे, झी 24 प्रतिनिधी, नाशिक ग्रामीण
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 30, 2025 07:47:36
Raigad, Maharashtra:स्लग - आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्‍गार ........ जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडक ......... बंजारा , धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश नको .... आंदोलकांची मागणी ........ अँकर - रायगड जिल्ह्यातील कोळी, आदिवासी समाजाचा आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला आहे. राज्‍यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्‍या आरक्षणात हक्‍क सांगण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यामुळे रायगड जिल्‍ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीला विरोध करण्‍यासाठी आज अलिबाग येथील रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चात समाज बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी, आदिवासी समाज अलिबागमध्ये एकवटला आहे. आपल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 30, 2025 07:35:29
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_TUSHAR_BJP चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अखेर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांचा निलंबन मागे; भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी अँकर :– अमरावती महानगरपालिकेचे सभागृह नेते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे भाजप विरोधात बंडखोरी केल्याने भाजपाने तुषार भारतीय यांना निलंबित केलं होत मात्र आज भारतीय यांचा निलंबन मागे घेत मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा तुषार भारतीय यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून भाजपने केलं निलंबन रद्द केलं आहे. तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू असून ते पुन्हा भाजपमध्ये परतल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत काय करिष्मा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 30, 2025 07:30:20
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहिलेला बोर्ड काढायला लावला FTP slug -nm airport bord issue shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई मनपा मुख्यालया जवळील उड्डाणं पुलावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लागणारा बोर्ड प्रकल्पग्रस्थानी काढायला लावला,दि बा पाटील यांच्या नावाची घोषणा झाली नसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नावं कसे देता म्हणत लावलेला बोर्ड भूमीपुत्रांनी काढायला लावला,सिबिडी बेलापूर पोलीसांनी यावेळी ताब्यात घेतले,दि बा पाटील यांच्या नावा शिवाय कोणताही बोर्ड लावू देणार नाही यावर भूमिपुत्र आक्रमक आणि ठाम असून, येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन होण्याची शक्यता असून यादृष्टीने प्रशासन तयारी करताना पाहायला मिळतेय. gf- ----------–---/-////////////
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 30, 2025 07:18:39
Washim, Maharashtra:वाशिम: File:3009ZT_WSM_COTTON_CROPS_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशी पिकावर मोठा परिणाम झाला असून,हजारो एकर क्षेत्र अतिपावसामुळं बाधित झालं आहे.अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने झाडांची वाढ खुंटली असून, कापसाच्या बोंडांना कुज येण्यास सुरुवात झाली आहे.कर्ज काढून उभी केलेली पिके डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हातबल झाले आधीच सोयाबीन पिकाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेला असताना आता कपाशीतील नुकसानामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नाचे गणित पूर्णपणे कोलमडले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणार नसल्याने रब्बीची पेरणी कशी करायची व वर्षभर संसाराचा गाडा हाकायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 30, 2025 07:18:15
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top