Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
वन्यप्राणियों के बिहेवर में बदलाव से मानवीय संघर्ष बढ़ा; विभाग की क्षमता पर सवाल
AKAMAR KANE
Nov 19, 2025 10:11:03
Nagpur, Maharashtra
-- वन्यप्राण्याच्या बिहेवियर मध्ये झालेले बदल चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया ही वन्यजीव अभ्यासकांनी दिलीय -- स्थलांतर किंवा नसबंदी कायमस्वरूपी तोडगा नाही.. -- मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यात वनविभागाच्या वनविभागाच्या यंत्रणेच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.... अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांचे मानवावर जीव घेणे हल्ले च्या घटना समोर येत आहे
127
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Nov 19, 2025 11:25:06
Navi Mumbai, Maharashtra:आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महानगरपालिकेमध्ये लढवण्यात येणाऱ्या प्राथमिक जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील २२७ ही जागांचा आढावा मनसेच्या senior नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ६५ ते ७० जागांवर मनसेचे प्राबल्य आहे असं निरीक्षण मनसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या सगळ्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि शहराध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युतीच्या निर्णयापूर्वी मनसेकडून मुंबईतील प्रत्येक वॉर्डच्या संख्याबळाचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती. २२७ वार्ड चा आढावा आणि याबाबतची माहिती मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांनी मागवली होती. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार शिवसा िनग आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेला ७५ जागा देण्यास ठाकरे गटाची तयारी असल्याची माहिती पुढे येत आहे. यूनिटीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही मात्र जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज कुळकर्णी
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 19, 2025 11:20:49
Navi Mumbai, Maharashtra:मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे महानगर गॅस पाईपलाईन फुटली होती यात ४ दुकाने जळून खाक झाली.मोठी दुर्घटना टळली कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. मुबारक कॉम्प्लेक्सजवळ गॅस पाईपलाईनला लागलेल्या आगीत तीन ते چار दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दुर्घटना दुपारच्या सुमारास घडली. मुबारक कॉम्प्लेक्सजवळ सांडपाण्याचया नाल्याचे काम सुरू होते. उत्खनन दरम्यान, जेसीबी मशीनने एमजीएल गॅस पाईपलाईन फुटली, ज्यामुळे मोठी आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरल होत. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की त्या लवकरच आसपासच्या दुकानांमध्ये पसरल्या. तथापि, स्थानिक लोकांनी तातडीने कारवाई करत इमारती रिकामी केल्या आणि रस्त्यावरील वाहनांची वाहतूक थांबवली. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तैनात करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर  आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सर्वात मोठा दिलासा म्हणजे लोकांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दल या अपघाताची कारणे आणि नुकसान याची सविस्तर चौकशी करतील。
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 19, 2025 11:03:34
Kolhapur, Maharashtra:Kop Kagal Binvirodh Feed:- WhatsApp Anc:- आता बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेची. कालच मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजी झाल्यानंतर आज मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्नुशा सेहरनिदा मुश्रीफ कागलच्या नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालीय. प्रभाग क्रमांक नऊ मधून सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवड झाली आहे. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ चे पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या पत्नी आहेत.. सेहरनिदा मुश्रीफ यांच्या विरोधात शिंदे गटाच्या नूरजहा नायकवडी यांनी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने बिनविरोध निवड झाली आहे.
104
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 10:52:28
Bhandara, Maharashtra:पार्थ पवार नाही तर संपूर्ण सरकार जमीन प्रकरणात लिप्त आहे... जमीन प्रकरणात आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, महाराष्ट्र वीकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आता सध्या महाराष्ट्रच आहे... .. Anchor :- पुणे जमीन प्रकरणात चौकशी समितीने आपलं अहवाल सादर केला आहे. पण यात पार्थ पवारांचा कुठलाही उल्लेख नाही यावर विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्ला बोल केला आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं विकास खरगेची समिती या समितीवर काय दबाव असू शकतो आणि काय त्याच्यामध्ये रिपोर्ट येऊ शकतो ते आम्हाला आधीच कळलं होतं... म्हणून आम्ही सांगितलं होतं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी असं आमच म्हणणं होत.. कोरेगावचा जमिनीचा नाहीतर तर मी पुन्हा पुन्हा सांगतो मुंबईतील बीकेसी मधील भारत नगर मधील जमीन, सी लिंक बाजूला रस्त्या विकास महामंडळाची जमीन आणि नवी मुंबईतील मार्केट यार्ड जमीन या सगळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्या गेलेला आहे.... अजित दादाचा मुलगा नाही तर सरकारच पूर्ण अडलेली आहे... जमीन घोटाळ्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई महाराष्ट्र वीकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आता सध्या महाराष्ट्रच आहे... जनतेची दिशाभूल या सरकारने केलेली आहे सगळे मुद्दे आमच्या जवळ आहे. पुढच्या अधिवेशनात आम्ही सगळे मुद्दे सरकारच्या समोर मांडून आणि सरकारला तिथून उत्तर द्यावे लागेल ....
19
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 19, 2025 10:50:29
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 19, 2025 10:37:00
Dharashiv, Maharashtra:धाराशिव भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र ड्रग्ज प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांना समोरासमोर चर्चा करण्याचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे आवाहन भाजपामध्ये प्रवेश करणारे संतोष कदम परमेश्वर हे तुमच्याच पक्षांमध्ये होते. तरीही त्यांच्यावर काही कारवाईका? नाही झाली अगित दादा पवार आणि सुनेत्रा पवार ज्याप्रमाणे माझ्या जवळचे नातेवाईक आहेत त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्या जवळचे नातेवाईक आहात आपल्या वक्तव्यामुळे श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्राची बदनामी होत आहे. ड्रग्ज प्रकरणातील वस्तुनिष्ठ माहिती आपण घ्यावी फक्त मीडिया ट्रायाल म्हणून किंवा राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन आरोप करू नयेत तुळजापूर ड्रज प्रकरण हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानेच उघडकीस आणले आहे अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबई येथील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला दोन-तीन वेळा निविदा मागवल्यानंतर कोणी सहभाग न घेतल्याने त्यानंतर तेरणा ट्रस्ट त्यामध्ये सहभागी झाले आपणाला अजूनही काही शंका असतील तर समोरासमोर बसून चर्चा करू वस्तुनिष्ठ माहिती दाखवण्याची माझी तयारी आहे.
58
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 19, 2025 09:45:32
Ratnagiri, Maharashtra:*उदय सामंत byte पॉईंट* हा माहोल बघितल्यानंतर सात ही नगरपालिका किंवा नगरपंचायती वरती महायुती झेंडा असेल - सामंत जे फॉर्म मागे घेणार नाही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल - सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता धुसर दोन्ही पक्षांनी प्रचार चालू केला आहे... राणे साहेबांच्या शब्दासाठी आम्ही शेवटपर्यंत थांबलो... एकनाथ शिंदे यांचे देखील आदेश होते.... राणीसाहेबांनी सिग्नल दिल्यानंतर आम्ही फॉर्म भरले - सामंत कुणी कार्यक्रमाला हजर नाही याचा अर्थ नाराजी असा होत नाही - सामंत (( कालपासून घडत असलेल्या घटनावर )) भाजप आणि शिवसेना यांच्यातील उमेदवारांना घेऊ नका असे आदेश काल दिलेले आहेत... त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे - सामंत विनायक राऊत तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग विसरले नाहीत.. त्यांच्या मनातील मनसुबे पूर्ण होणार नाहीत... संवाद साधने म्हणजे नाराजी नाही... या सगळ्या गोष्टींचा असुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हे काल तुम्ही बघितले - सामंत (( भाजपने शिवसेनेची कबर खोदायला सुरुवात केली आहे असं विनायक राऊत बोलले होते.. त्यावर उत्तर )) अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र... त्यांना बॉस बदलायचा असेल त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल... चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही... ते माझ्या मित्र म्हणून मी त्यांच्या मनातील बोलतोय त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल... ते बॉस बदलण्याचा प्रक्रियेमध्ये आलेले असावे - सामंत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आणि युतीची संकल्पना मांडली.. ती संकल्पना रत्नागिरी पूर्ण करत है.. असंच बॉण्डिंग कायमस्वरूपी असावा... एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बॉण्डिंग आहे... पण काही बालिश लोक यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतात... त्यामुळे भक्कम नेते बाजूला होणार नाहीत... उलट 232 आमदार निवडून आलेल्या धक्क्यातून त्या अद्याप सावरले नाहीत... महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नाही... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याची परिस्थिती तुम्हाला येईल - सामंत राजू शिंदे यांनी सांगितले म्हणून भाजप किंवा बीजेपी संपेल असं तुम्हाला वाटते का?... राजू शिंदे भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे त्यांनी शांत रहावं... आतातयीपणा केला तर ते अडचणीत येतील... त्यांच्या बोलण्याची दखल घेण्याची गरज नाही - सामंत
199
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 19, 2025 09:39:32
Nashik, Maharashtra:नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी उभारल्या जाणाऱ्या साधूग्राममध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता आहे… आणि यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. तब्बल १०० हून अधिक हरकती पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी यावर सुनावणी होणार आहे. नाशिक शहरात वैष्णव संप्रदायासाठी तपोवनात 1200 एकर परिसरात साधूग्राम उभारला जाणारे… त्याच नियोजन करण्यासाठी पालिकेने १८०० पेक्षा जास्त झाडांची मोजणी केलीये. यातील ४० टक्क्यांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याने नाशिककर वृक्षप्रेमी सध्या आक्रमक झाले आहेत. यात बहुतेशी पन्नास ते शंभर वर्ष असलेली घनदाट झाडे आहेत. त्यामुळे आज तपोवनात या निर्णयाचा निषेध करत महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उफराटा कारभाराबाबत नाराजी व्यक्त केलीय. नाशिक शहरात सध्या तापमानाचा पारा दिसवेदिवस वाढताना दिसत आहे. हिरवेगार नाशिक हळूहळू काँक्रिट जंगल बनत आहे. तोयामुळं साधुग्राम नियोजनासाठी वृक्षतोड आता आंदोलनाचे रूप घेत आहे. शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून पालिकेकडे १०० हरकती दाखल झाल्या आहेत. तपोवनातील पालिकेच्या ताब्यातील ५४ एकर जागेतील झाडांची मोजणी पूर्ण झाली आहे. काही झाडांची छाटणी, काहींचे प्रत्यारोपण तर काही झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अंतिम निर्णय हरकतींच्या सुनावणीनंतरच होणार आहे नाशिक: भारतीय संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या कुंभमेळ्यात झाडांची तोड सुरू असेल तर जगाला कोणता संदेश जाणार, असा सवाल पर्यावरण कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. तपोवनातील ही वृक्षतोड थांबते का, पर्यावरणप्रेमींच्या हरकतींना न्याय मिळतो का… याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे. सागर गायकवाड
157
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 19, 2025 09:39:14
Ambernath, Maharashtra:बदलापुरात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव शिंदे गटात सामील भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतला शिंदे गटात प्रवेश बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पळवा पळवी सुरू आहे. यातच बदलापुरातील शहर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला, दोनच दिवसापूर्वी संजय जाधव यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसच यावेळी अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
162
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 19, 2025 09:16:11
Oros, Maharashtra:मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद सावंतवाडीकरासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सावंतवाडी करांचे ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीत आलोय. चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सावंतवाडी शहर आदर्श शहर बनाव हे शहर रोल मॉडेल बनाव या हेतूने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. सावंतवाडीतील राजघराण्याला परंपरा आणि इतिहास आहे त्याला आता सत्तेची जोड देऊन पुढच्या पाच वर्षात भाजपच्या माध्यातून सावंतवाडीचा विकास करू. जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या माझ्या हातात आहेत. सावंतवाडी शहर अतिशय महत्वाचं शहर आहे. हे शहर विकसित करण्याची संधी आम्हाला मिळतेय. ऑन दीपक केसरकर (युती) — युती बाबत सगळ्या गोष्टी वरिष्ठ पातळीवर ठरतात. ज्येष्ठ नेते चर्चा करतील कार्यकर्ते म्हणून जी दिशा आम्हाला दिलीय त्यावर आम्ही चालतोय. वरिष्ठांकडून जो आदेश मिळालाय त्यावर आम्ही काम करतोय. राजघराण जेव्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत तेव्हा दीपक केसरकर यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा होती. त्यांचे राजघराण्यासोबत अतिशय जुने संबंध आहेत केसरकर साहेबांना ह्या घराण्याने वांरवार आशीर्वाद दिला आहे. ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहणं गरजेचं होत ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. ऑन केसरकर (बिनशर्त) राजघराण्यासोबत केसरकरांचा असलेले सबंध आणि नेहमी राजघराण कोणतीही अपेक्षा न ठेवता केसरकर यांच्या सोबत राहील आहे. केसरकर साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे होता. सावंतवाडीची अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून बसली तर सावंतवाडीचा विकास गतिमान पद्धतीने होईल. सगळ्या राजकीय पक्षांनी राजघराण्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा. अजून दोन दिवस आहेत. सावंतवाडीला ओळख देणार राज घराणं आहे. त्याच घराण्याला मतदान करण्याचं संधी मिळतेय. नारायण राणेंच्या वेळी ज्या भावनेतून मतदान केलं त्याच भावनेतून आता मतदान करावं. ही निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे. महायुती (केसरकर समजूत) — दीपक केसरकर यांची समजूत काढण्या एवढा मी मोठा नाही.. राज घराण्याबाबत मी सांगाव एवढा मोठा आणि अनुभवी मी नाही पण राजघराण्याचे आपल्याला जे काही दिलंय ते बघतील पाहिजे. प्रत्येकाने भावना व्यक्त करून एक निवडणूक बिनशर्त करून द्यायला हवी. पालकमंत्री फसवणूक — आमच्या श्रद्धा ताई निवडणून आल्यानंतर कोणती काम करावी ह्याची आठवण ठाकरे पक्षाने करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कणकवली (शहरविकास आघाडी) — कणकवली मध्ये हे नवीन नाही जेव्हा जेव्हा सगळे राणे साहेबांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा जनता राणे साहेबांच्या पाठीशी राहिली आहे. शिंदे आणि ठाकरेना एकत्र आणणे हे कोणाला जमल नाही ते राणे साहेबांच्या कणकवली ने करून दाखवलंय. कोणी कोणासोबत लढावं ह्याबत मला काही आक्षेप नाही. कोणीही मनसोक्त प्रचार करावा. प्रत्येक स्वातंत्र्य आहे त्याच मी स्वागत करतो. आम्ही राजकीय टीका करणार नाही आम्ही केवळ विकास बाबत बोलणार. सावंतवाडी विकास — पाण्याचा आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवला त्याच संस्थांनाच्या घरातील सदस्य निवडणूक लढवत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आलीय श्रद्धा ताई सोबत आम्ही सगळे आहोत. श्रद्धा भोसले (मराठी ट्रॉल) — त्यांनीं आपली संस्कृती स्वीकारलीय, भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याच कौतुक झालं पाहिजे. निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातील माता बघिनींचा अपमान कोणी करू नये. दीपक केसरकर यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना समज द्यावी अशा पद्धतीने अपमान कोणी करू नये आम्ही ते सहन करणार नाही. ह्याच उत्तर दोन तारीखला सावंतवाडी कर देतील. त्यांची मराठी चांगली आहे ह्याच कौतुक झालं पाहिजे आज प्रत्येक घरात त्या जात आहेत. ऑन निलेश राणे यांचा पक्ष समोर — प्रत्येकाला हक्काने निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लढविणार आहोत. कोणी काय कारण कोणी प्रचार करावा त्याचा विषय आहे. आदरणीय निलेश राणे तर शिवसेनेचे नेते आहेत. शिंदे गटाने तर शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर निलेश राणेंना प्रचारात उतराव लागेल. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीवाले आहोत. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षात १०० टक्के देतो निष्ठा ठेवतो. निलेश जी 100 शिवसेनेला न्याय देत आहेत. त्याचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी... प्रत्येकाने आपल्या पक्षाचं उमेदवारासाठी प्रचाराला यावं आणि आलाच पाहिजे. ऑन शिवसेना आमदार नाराजी — वरिष्ठ नेते बघतील.
207
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 19, 2025 09:13:26
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिल्‍हयात नागरीकांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले किंवा विरसलेले 24 मोबाईल पोलीसानी शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. रायगड पोलीसांच्‍या सायबर पोलीस ठाण्‍याने ही कामगिरी बजावली आहे. बुधवारी या मोबाईल्‍स मुळ मालकांना हस्‍तांतरीत करण्‍यात आले. या मोबाईलची किंमत 3 लाख 47 हजार 500 रूपये इतकी आहे. यावेळी पोलीस अधिक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, उपस्थित होते. मोबाईल हस्‍तगत करण्‍यात रायगड पोलीस दल राज्‍यात अव्‍वल आहे. आपला मोबाईल हरवला तर तत्‍काळ जवळच्‍या पोलीस ठाण्‍याशी संपर्क साधावा तसेच या संदर्भातील अॅपवर आपली तक्रार नोंदवता येईल असे आंचल दलाल यांनी सांगितले.
124
comment0
Report
Advertisement
Back to top