Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेन: प्रवास 12 तासांचा, आनंदाची बातमी!
AKAMAR KANE
Aug 10, 2025 08:03:57
kolhapur, Maharashtra
Ngp CM byte live u ने फीड पाठवले -- नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट ( नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना दिलेला बाईट ) --- आज आमच्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे.. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना विनंती केली होती .... की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे. नागपूर पुढे अनेक वेळा खाजगी बसेस चे भाडे पाच हजार रुपये पर्यंत जातात.. लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो.. म्हणून आपण एक वंदे भारत ट्रेन सुरू केली पाहिजे.. त्याला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता... आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेन ची सुरुवात झाली आहे.. *देशामध्ये नागपूर- पुणे वंदे भारत चा रूट हा सगळ्यात लांब पल्याचा रूट आहे* 881 km ची वंदे भारत ट्रेन कुठलीच सुरू नव्हती... --- अतिशय चांगल्या वेगाने आणि सुविधेने नागपूर आणि पुणे प्रवाशाना 12 तासात प्रवास होणार आहे... त्यापूर्वी 16-17 तास लागायचे... मात्र आता आरामदायी प्रवास होईल --- आज रेल्वेच्या ऑथॉरिटी सोबत मी चर्चा केली आहे.... आत्ता नगरवरून ट्रेन दौंडला जाते आणि तिथून पुण्याला जाते. सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर डी रुटीन करण्यात येतं.... म्हणून मी त्यांना सुचवले की नगरवरून थेट पुण्यापर्यंत लाईन करू (रेल्वे )... त्यामुळे वेळ आणि अंतर वाचेल.. याबाबत रेल्वे मिनिस्ट्रीशी बोलून हे काम आम्ही करू --- त्याशिवाय आपण अजून एक काम करत आहे.. छत्रपती संभाजी नगर ते पुणे असा नवा एक्सप्रेस वे होत आहे.. त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला ही रेल्वे करता आली. (समांतर ) तर नागपूर पुणे रेल्वेचे डिस्टन्स 100 किलोमीटरपेक्षा जास्त कमी होईल.. ---- अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा आहे... त्याच्या पलीकडे पुण्याहून आता तीन लाईन आहे त्या पाच लाईन करण्याचं काम सुरू आहे.... JNPT पोर्ट अशी कनेक्टिव्हिटी करावी... याबाबत मीणा जे मध्य रेल्वेचे आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे.... ते जर आपण केलं तर नवीन freight (मालवाहतूक) कॉरिडॉर आपण तयार करू... ( ऑन संभाजीनगर टू पुणे ) -- त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे. त्यांना आम्ही आमची अलाइनमेंट ऑफर देऊ.... आमचे लँड एक्वेजशन त्या स्टेजला आहे.. आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो... हे दोन्ही इंटिग्रेट झाले तर. नव्याने लँड एक्वेजीशन न करता इंटिग्रेट करता येईल (on समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन ) --- समृद्धी महामार्गाला लागून जी समांतर ट्रेन असेल ती हाय स्पीड ट्रेन राहावी... जी अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी असेल... मागे रेल्वे मिनिस्ट्रीने नागपूर मुंबई रेल्वे ट्रेन चा अभ्यास केलेला आहे त्यावेळी समृद्धी बनत होता... त्या अभ्यासाला समृद्धी सोबत इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केला.. मात्र समृद्धीच्या नंतर आम्ही इंटिग्रेट केला तर आमच्या लक्षात आले 78% राईट ऑफ वे आमच्या सोबत आहे.. बावीस टक्के राईट ऑफ हवे जो स्टेशन सोबत इंटिग्रेट करावे लागेल.. जो आमच्या सोबत नाही आहे... त्याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मिनिस्ट्री सोबत आम्ही चर्चा करू
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:31:13
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवटा.... गृहिणीच्या डोक्यावर ताण वाढला...ग्राहकांची गॅस सिलेंडरसाठी धावाधाव... भंडारा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा घराघरांत जाणवू लागला आहे. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिलेंडर मिळत नसल्याने काहींनी तर चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. एकीकडे धुरामुळे डोळ्यांना आजार होत असल्यामुळे शासनाने प्रत्येक घरी उज्वला गॅस योजना दिली. पण आता सिलेंडर मिळत नसल्याने महिलांची हेळसांड होत आहे.. सिलिंडरचा नंबर लावूनही मिळत नसल्याने ग्राहक संबंधित गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. स्वयंपाकासाठी गॅस न मिळाल्यामुळे घरच्यांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपने मध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाल्याने गॅस सिलेंडर येत नाही आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलेंडर वितरीत होत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र एकीकडे घरगुती गॅस सर्व सामान्य लोकांना मिळत नाही पण दुसरीकडे हेच सिलेंडर व्यावसायिक लोकांकडे हॉटेल मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे गॅस वितरण एजन्सी यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 02:02:57
Jalna, Maharashtra:जालना : नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त(जनरल, पीकपाणी) अँकर : जालन्यातील भोकारदन तालुक्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 9 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.मात्र, परतीच्या पावसाने आणि अवकाळी ढगफुटीमुळे परिस्थिती बदलली. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचले. वाफेवरची वाढ थांबली. तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार 62 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले. शासनाने पंचनामे करून तातडीची मदत दिली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी थोडा आधार मिळाला. मात्र, खरी दिलासा देणारी पिकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरला. तरीही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी हालचाल नाही. त्यामुळे नाराजी वाढली आहे. पूर्वी ''एक रुपयात पिकविमा' योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. ही योजना बंद झाल्याने आता विमा हप्ता मोठा झाला आहे. आर्थिक अडचणीच्या काळात हा हप्ता भार बनतो. त्यात भर म्हणजे नुकसान असूनही भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पिकविमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या विमा कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत. पंचनामे झाले आहेत. नुकसान स्पष्ट दिसत आहे. तरीही विमा रक्कम मिळत असल्याने पीकविमा कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
114
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:01:51
104
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 01:45:47
151
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 10, 2025 01:16:04
Ambernath, Maharashtra:रस्ता 100 फुटांचा, गटार 20 फुटांवर बारवी डॅम रस्त्याच्या कामात प्रचंड घोळ नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा स्थानिकांचा आरोप बदलापूर ते बारवी रोड आज जवळपास 15 ते 20 छोट्या-मोठ्या गावांना जोडतो. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे वाहनांची ये-जा सुरू असते. एमआयडीसीने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कागदावर 100 फुटाचा रस्ता असूनही 20 फुटांच्या रस्त्याला मंजुरी का देण्यात आली असं स्थानिक नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट गटार असल्यामुळे हा रस्ता अरुंद होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. घाईघाईत रस्त्याचे काम उरकल्यानंतर भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी دوन्ही बाजूची गटारं तोडावी लागतील, त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जाईल असे ठामपणे म्हटले जाते. चंद्रशेखर भुयार, बदलापूर
188
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 09, 2025 17:00:18
Kalyan, Maharashtra:धावत्या एक्स्प्रेस मध्ये व्यापाऱ्याची साडे पाच कोटींचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास.. सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये घडली घटना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू. tपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांची तीन पथके तैनात सोलापूर ते कल्याण सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडे पाच कोटींचे सोने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांची तीन पथके या गुन्ह्याच्या तपसासाठी नियुक्त करण्यात अल्या असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.
182
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 09, 2025 16:15:48
Pune, Maharashtra:अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित ऑफिसच्या जागेचा वाद चांगलाच गाजला होता...जैन समाजाच्या स्वर्गीय मंगुबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेल्या जागेवर संग्राम जगताप यांनी आपले कार्यालय सुरूकेल्याचा आरोप करण्यात आला होता... याबाबत जैन समाजाचे आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती..दरम्यान अहिल्यानगर येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी या जागेबाबत मुळ भाडेकरू गणेश गोंडाळ आणि आमदार जगताप यांच्याशी आपलं बोलण झाल असून पुढील तीन महिन्यात ही जागा जैन समाजाच्या ट्रस्टकडे दिली जाईल असं वचन मला दिल्याच आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी म्हंटले आहे.
211
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 09, 2025 15:45:28
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरत सराईत गुंडावर चाकू हल्ला प्रकरण हल्ल्याचा सीसीटीव्ही आला समोर उल्हासनगरातील एक सराईत जयकिशन आलमचंदानी याच्यावर भर दुपारी चाकू हल्ला झाला होता, आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. जयकिशने वाद उकरून काढल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास जॅकी हा आपल्या दुचाकी ने जात आहताना समोरून एका कारने जयकिशनच्या Motorcycle ला कट मारल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर कारचालक गाडीत बसून परत जात असताना चालक सीटवर असलेल्या इसमाला जयकिशन याने खेचून बाहेर काढलं. त्यानंतर झालेल्या झटापटीत कार मधील एकाने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने जय किशन वर हल्ला केला यात जय किशन गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, प्राथमिक उपचारानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
146
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 09, 2025 15:33:38
151
comment0
Report
VKVijay1 Kumar
Dec 09, 2025 14:50:13
Noida, Uttar Pradesh:नोएडा में फेस वन थाना पुलिस ने साइबर सेल के सहयोग से ऑनलाइन गेमिंग/बैटिंग एप के माध्यम से ठगी करने वाले गिरोह का किया खुलासा। पुलिस ने कार्रवाई करते हुए 2 शातिर साइबर ठगों को किया गिरफ्तार। पुलिस ने मौके से 7 लैपटॉप, 8 मोबाइल, व अन्य सामान किया बरामद। मूल रूप से अलग अलग जनपदों के रहने वाले है आरोपी सचिन गोस्वामी व कुणाल गोस्वामी। शातिर अभियुक्त ऑनलाइन गेमिंग/बैटिंग एप के माध्यम से मोटा मुनाफा कमाने का झांसा देकर युवाओं को बनाते थे ठगी का शिकार। शातिर अभियुक्तों द्वारा अभी तक लाखों रुपए की ठगी को दिया जा चुका है अंजाम। नोएडा के फेस 1 थाना पुलिस ने थाना क्षेत्र के अंतर्गत सेक्टर 2 से किया गिरफ्तार。
156
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 09, 2025 13:34:19
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे नेते भाजपमध्ये जाणार - चंद्रकांत खैरे LIVE LINK (((( https://www.facebook.com/share/v/1HTuU3PqSk/ )))) शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे नेते भाजपमध्ये जाणार शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मोठा दावा “मला शिंदे सेनेतील काही आमदार भेटले होते तेच मला म्हणाले होते की आम्ही 22 नाही आम्ही 35 जण तयार आहोत‘’ ‘’सामंत यांच्या नेतृत्वात आम्ही जाणार आहोत, सामंत यांचे नाव त्याच दोन आमदारांनी मला सांगितलं‘’ ऑन महाविकास आघाडी --- सोलापुरातील स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, माकप, तसेच समाजवादी पार्टी देखील आमच्यासोबत सोलापुरात असणार आहे कुरकुर ही प्रत्येक पक्षात असते. आडम मास्तर, शिंदे साहेब यांना विनंती करून आम्ही सोलापूरात मोठा मेळावा आगामी निवडणुकीच्या संदर्भात घेणार आहोत आगामी निवडणुकीच्या संदर्भात जो कार्यकर्ता निवडून येईल असा वाटतोय त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असा मी ठरवला आहे पळवा पळवी करणारे भाजपवाले म्हणायचे की ही आघाडी होणारच नाही आणि ही आघाडी आता सोलापूरला झालेली आहे आणि महाराष्ट्राने पाहिला आहे. ऑन शरद कोळी प्रणिती शिंदे विधान शरद कोळी जे म्हणाले असतील ते त्यांच व्यक्तिगत मत आहे ते पक्षाचे मत नाही. पक्षाचा नेता मी आहे म्हणून या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे एकत्र असेल भाजपने निवडणूक मध्ये एवढे पैसे वाटले याकडे राज्य निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले ऑन आमदार महेंद्र थोरवे-तटकरे विधान त्यांचं म्हणणं म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा, त्यांच्यात आता भांडण सुरु झाली आहेत त्यांच्या भांडणमुळे देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा किती नर्व्हस झाला आहे त्यांच्यात आपसातली भांडण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांच्यात पैसे कोण जास्त वाटणार यामध्ये शर्यत लागली होती एकत्रित चहा पिणे वगैरे सगळं खोटं आहे, मनातून फाटाफूट झाली आहे ऑन विरोधीपक्ष नेते पद दोन आमदार असताना देखील काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पद दिले होते आता त्यांना मुद्दाम विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचा नाहीये लोकशाहीचा स्तंभ असताना विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचं नाही म्हणून सत्ताधारीवर आता फार मोठा मारा होणार आहे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं सुरु आहे आमच काय चुकतंय हे सांगणारा कोणी तरी असला पाहिजे अशी भूमिका आधीच्या सरकारची होती विरोधपक्ष नेता असेल तर राज्य करण्याची पद्धत आणखी मजबूत होईल ऑन वेगळं विदर्भ लोकसभेत ज्या वेळी हा मुद्दा आला होता त्याचं वेळी हा मुद्दा संपला होता, भाजपने असं काही करणार नाही असं उत्तरात सांगितले होत बावनकुळे यांनी आता मुद्दा पुन्हा उकरून काढलाय, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला बावनकुळे घाबरले आहेत त्यामुळे त्यांनी हा मुद्दा काढलाय ऑन वडेट्टीवार वेगळा विदर्भ पाठिंबा त्यांचं मतं हे स्वतःच असेल, काँग्रेसची भूमिका ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारतील मी तर महाराष्ट्र अभिमानी आहे, कोणी जर महाराष्ट्रचे तुकडे पडण्याची हिंमत दाखवत असेल आम्ही महाराष्ट्र अभिमनी लोकं ते कधीही सहन करणार नाही संयुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी 107 हुतात्मे झाले, हा महाराष्ट्र तोडण्याची कोणाची हिंमत आहे? शिंदे गटाच्या लोकांना विचारा आता त्यांची भूमिका काय आहे. बाईट : चंद्रकांत खैरे, माजी खासदार
163
comment0
Report
Advertisement
Back to top