Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपूर के वरिष्ठ नेता दत्ता मेघे का निधन, उम्र 89 वर्ष
AKAMAR KANE
Mar 22, 2026 16:45:11
Nagpur, Maharashtra
नागपूर ज्येष्ठ राजकीय नेते दत्ता मेघे यांचे निधन मृत्यू समयी त्यांचे वय 89 वर्ष हिंगणा भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील दत्ता मेघे हे रामटेक वर्धा आणि नागपूर लोकसभा मतदारसंघात खासदार होते शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची भरीव कार्य
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 22, 2026 17:17:20
Nagpur, Maharashtra:विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे वयाच्या 89व्या वर्षी रविवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या मागे सागर व समीर ही दोन मुले, सुना. नातवंडे असा आप्त परिवार आहे. मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला. दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. त त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पांडे लेआउट येथील निवासस्थानी चाहत्यांनी एकच गर्दी केली. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली. त्त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा भाग होते. परंतु त्यापूर्वी 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.
947
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 22, 2026 14:20:05
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेतील कंत्राटी आणि ठोक मानधना वरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय. येणाऱ्या महासभेत आणि स्थायी समिती सभेत यासंदर्भातील ठराव आणण्यात येणार असल्यामुळे बहुमताने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय मंजूर होईल अशी आशा गणेश नाईक यांनी व्यक्त केली. क्रिस्टल हाऊस या कार्यालयात आयोजित कामगारांच्या बैठकीत गणेश नाईकांनी ही ऐतिहासिक घोषणा केली असून यामुळे वर्षानुवर्षे कंत्राटी आणि ठोक मानधना वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1015
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 22, 2026 12:21:19
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिला पुलिस शिपाई भर्ती के लिए 717 पदों की लिखित परीक्षा आज आयोजित की गई। मैदान पर फील्ड टेस्ट 14 फरवरी से 7 मार्च तक चले और उसी आधार पर 7003 उम्मीदवार लिखित परीक्षा के पात्र ठहरें। लिखित परीक्षा Gadchiroli शहर के 14 केंद्रों पर हुई और सभी केंद्रों पर कड़ा सुरक्षा बंदोबस्त रहा। 1000 कर्मियों की रणनीति में 166 पुलिस अधिकारी, 693 पुलिस अंमलदार, 132 शिक्षक व मंत्रालयीन कर्मचारी शामिल थे। कुल 7003 में से 6971 पुरुष और महिला उम्मीदवार परीक्षा में शामिल हुए। किसी प्रकार की ग़ैरमामूली गतिविधि रोकने के लिए सोशल मीडिया के माध्यम से दिशानिर्देश जारी किए गए, प्रत्येक केंद्र के Google Map लोकेशन और केंद्र के अनुसार बैठाने की व्यवस्था भी साझा की गई। प्रवेश के समय इलेक्ट्रॉनिक उपकरणों की चेकिंग के लिए मेटल डिटेक्टर का प्रयोग किया गया, उम्मीदवारों की बायोमेट्रिक पुनः पंजीयन भी किया गया ताकि प्रवेश के दौरान कोई गड़बड़ी न हो। सुरक्षा के लिए सिग्नल जामर कार का भी उपयोग किया गया था। दोनों पेपरों की उत्तर पत्रिकाओं को आज ही आधिकारिक वेबसाइट पर प्रकाशित किया गया है और किसी भी शिकायत का 24 घंटे के भीतर निस्तारण करने को कहा गया है।
1078
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Mar 22, 2026 11:47:42
999
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 22, 2026 11:34:33
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकावर थरार! OHE खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा जबरदस्त शॉक; रेल्वे सेवा विस्कळीत. Anc..कल्याण रेल्वे स्थानकावर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका तरुणाने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून सुमारे दीड तास धुमाकूळ घातला या घटने मुले एक आणि दोन वरील डाउन लाईन वरील विजपुरवठा बंद करण्यात आला होता पोलीस आणि अग्निशामक दलाला चकवा देत एका खांबावरून दुसऱ्या खांबावर उड्या मारणाऱ्या या तरुणाला अखेर विजेचा जोरदार धक्का लागला आणि तो खाली कोसळला. या थरारामुळे कल्याण स्थानकावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.पोलीस त्याला पकडण्यासाठी एका खांबावर चढले असता, त्याने हुलकावणी देत थेट दुसऱ्या खांबावर उडी मारली. यादरम्यान, साडेतीन वाजेच्या सुमारास खांबावरील सुरु असलेल्या विद्युत वाहिनीचा त्याला जोरदार शॉक लागला आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.​ अखेर दोन तासा नंतर रेल्वे लाईन पूर्व पदावर आली असून सर्व रेल्वे लाईन सुरु करण्यात आली या घटनेमुले दोन तास रेल्वे चा खोलबा झाला असल्यामुळे कल्याणच्या रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती सध्या या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अज्ञात इसमला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आला आहे
1020
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 22, 2026 11:20:54
Shirdi, Maharashtra:आमदार अमोल मिटकरी बाईट पॉइंटर.. बाईट ऑन मिटकरी ट्विट अशोक खरातच कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार... आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहीत झालं होतं.. मात्र मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही.. या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे.. सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी.. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली.. *अशोक खरात आणि अजित दादांचा अपघात याच्यात संबंध* गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय.. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे.. बाईट ऑन करंगळी TCR 4.00 संत परंपरा असलेल्या राज्यात कुणी करंगळ्या कापल्या.. माध्यमात आलेले फोटो खरे आहेत का ? या सगळ्याचा तपास निष्पन्न होईल.. कोणालाही सरकार पाठीशी घालणार नाही याचा मला विश्वास.. बाईट ऑन पाणी आरक्षण TCR 8.00 आता गाव सुद्धा बाबाच्या विरोधात गेले आहे.. राज्यात अनिसचा कायदा आहे.. एवढे प्रकार घडत असताना यांचे लक्ष असायला पाहिजे होत.. त्याला पाणी कसे दिले.. कोणाच्या काळात दिले. कोणकोणत्या मंत्र्यांनी सहकार्य केले..आता कोणकोण मंत्री आहेत.. महायुती असो किंवा महायुती जे कोणी आहेत ते सुटणार नाही बाईट ऑन अधिकारी संपर्क जर एखाद्या अधिकाऱ्याचे नाव आज समोर येत असेल तर धक्कादायक.. जर पाणी आरक्षित होत असेल तर तो साधासुधा बाबा नाही हे निश्चित.. निरक्षर लोकांना नाव ठेवण्यापेक्षा साक्षर लोक आहारी गेले हे वास्तव.. बाबाची प्रॉपर्टी दोन हजारापेक्षा जास्त.. हा पैसा आला कुठून.. अधिकाऱ्यांचे लागेबांधे काय होते हे आता समोर आलं पाहिजे.. समोर आलेले व्हिडिओ 57 नाही तर 500 च्या वर असे व्हिडिओ.. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बायका त्यात आहे का अजून कोणी हे बघाव लागेल.. बाईट ऑन अजित दादा निधन चुप्पी महायुती सरकारमध्ये शाहू फुले आंबेडकर हा विचार सांगणारा नेता.. अशा नेत्याबद्दल अर्थसंकल्प अधिवेशनात कोणी बोलायला तयार नाही.. कोणी पायऱ्यांवर बसून देखील मागणी केली नाही.. 296 या प्रस्तावाला देखील बगल दिली गेली.. अजितदादांनी ज्यांना मोठे केले ती मूग गिळून गप्प का ? आज हा विषय मागे देखील पडेल.. मात्र जनता उत्तर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.. अजित दादांना संपवण्याचे षडयंत्र समोर येईलच..
1067
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 22, 2026 11:02:43
Khed, Maharashtra:*खेड / पुणे* - खेड तालुक्यातील पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत चार घरांना भीषण आग. - आदिवासी समाजातील सोपान केदारी यांच्यासह इतर तीन जणांच्या घरांना अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहे. - या आगीत दोन पडव्या चार घरे, गवताची वळई, ५ ते ६ शेळ्या, करड, तसेच गाईचे वासरू जळून मृत्युमुखी पडले आहे. - या घटनेत चार कुटुंटांच्या मोठे नुकसान झाले असून, वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धан्य, संसारोपयोगी वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत. - आदिवासी नागरिकांवर मोठे संकट ओढवले आहे. - दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, सरपंच भरत रौंधळ आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा टँकर मागवण्यात आला आहे. - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा जळीताच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
1039
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 22, 2026 10:53:34
1025
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 22, 2026 10:50:03
1014
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 10:31:10
Bhandara, Maharashtra:ओबीसींच्या कार्यकर्ता म्हणून मी या मोर्चात सहभागी झालो. ओबीसीवर हे सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे. आज बेईमान सरकार आपण पाहतोय. बोलतो एक करतोय एक.... जुमले बाज म्हणतो अशी प्रवृत्ती या सरकारची आहे.... ओबीसींची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथं ओबीसींचा वेगळा कॉलमच नाही.... हे ओबीसींना न्याय देऊ शकत नाही.... अनेक प्रकारे ओबीसी वर अन्याय होत आहे.... आणि म्हणून सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रितपणे हा मोर्चा काढलाय... सरकारला या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेसाठी मागणी करत आहेत... ओबीसींच्या भरोशावर सत्ता मिळवून ओबीसींना विसरतात जराही लाज या सरकारला नाही हे खेदाने या ठिकाणी सांगतो.... खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे... खरात प्रकरणात काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. विरोधी पक्षांचे कोण कोण गेले त्यांच्या पुरावे मी देऊ शकतो असे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केला आहे... यावर भंडारा येथे विजय वडेट्टीवार यांनी या खरात प्रकरणात जे कोणी नेते असतील त्या सर्वांचे पुरावे दाखवा या भोंदू बाबाला कोण कोण बडी पडलेत सर्वांचे पुरावे द्यावेत. हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत असे वक्तव्य केले आहे. अशोक खरात प्रकरणांमध्ये तसे तर दोनशे व्हिडिओ आहेत.... 90 व्हिडिओ हे आक्षेपार्ह आहेत या प्रकरणामध्ये अनेक मंत्री आहेत आयएएस अधिकारी आहेत आणि आयपीएस अधिकाऱ्यात मोठमोठे पदावर असलेले अधिकारी आहेत या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे कारण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला जर अंधश्रद्धा पसरवणारे मंत्री असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही
1038
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 22, 2026 10:23:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत,एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचा आता उघडकीस आले आहे. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूस मध्ये धारदार Shस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या पार्किंग मध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली,त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी,मुलाने टोकदार शस्त्रांनी,परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
1005
comment0
Report
Advertisement
Back to top