Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
Kolhapur में LPG-CNG दरों के बढ़ते बोझ के विरोध में रिक्शा चालकों ने किया मोर्चा
PNPratap Naik1
Mar 24, 2026 06:19:36
Kolhapur, Maharashtra
एलपीजी और CNG गैस दर बढ़ोतरी के विरोध में कोल्हापुर के दसरा चौक पर रिक्षा चालक आक्रामक हो गए; उन्होंने सड़क पर उतरकर आंदोलन शुरू कर दिया है. बढ़ते ईंधन दरों के कारण व्यवसाय पर पड़ रहे प्रभाव के चलते रिक्षाचालक कोल्हापूर के दसरा चौक से जिलाधिकारी कार्यालय तक मोर्चा निकाल रहे हैं. एलपीजी के साथ ही सीएनजी गैस दर तुरंत कम करने की मांग उठाई जा रही है. LPG गैस के दाम 43 रुपये से बढ़कर 85 रुपये प्रति लीटर तक पहुंचने से जीवन यापन कठिन होने की जताई गई है. इस विरोध से जुड़ी बातचीत हमारे प्रतिनिधि प्रताप नाईक कर रहे थे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 24, 2026 07:34:28
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 07:30:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या बिरोबा यात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून बिरोबा देवस्थानची ओळख आहे. आरेवाडी बनाच्या परिसरात यात्रेनिमित्ताने यात्रा कमिटी व प्रशासनाकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात यात्रेच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधीचा कार्यक्रम पार पडला, पुढील पाच दिवस,या ठिकाणी यात्रा पार पडणार असून यात्री निमित्ताने सुमारे दोन हजारांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागली आहेत.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 24, 2026 07:21:38
768
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 07:07:06
Shirdi, Maharashtra:भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई केल्यानंतर अनेक काळे कारनामे बाहेर आलेत.. एकीकडे नाशिक मध्ये ऑफिस थाटून काळे उद्योग करणारा अशोक खरात प्रसिद्ध झोतात आला तो ईशानेश्वर मंदिरामुळे.. सिन्नर तालुक्यातील मिरगाव जवळील हे ईशान्येश्वर मंदिर.. साधारण 2008 मध्ये या मंदिराचे काम सुरू झालं आणि 16 ऑगस्ट 2010 मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झालं... याच दरम्यान 2009 मध्ये शिवनिका ट्रस्ट स्थापन करून अशोक खरातने मंदिराचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.. 2010 पासून प्रसिद्ध होतात आलेल्या या मंदिरात गेल्या सोळा वर्षात दररोज गर्दी व्हायची.. राजकीय नेते असो अधिकारी असो की उच्चपदस्थ श्रीमंत वर्ग... हा सगळा भक्तगण असलेल्या या मंदिर मात्र आता गेल्या चार दिवसांपासून ओस पडलय.... मंदिर आणि मंदिर परिसरात कोणताही फक्त येत नाही. इथे आहे फक्त स्मशान शांतता आणि पक्षांचा किलबिलाट..या मंदिराजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
892
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 24, 2026 07:06:37
969
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 24, 2026 06:16:48
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपারা West मध्ये कुत्ते के काटने से रेबीज झालेल्या 9 वर्षीया मुलीचा मृत्यू झाला आहे. कशिश सहानी असे या मुलीचे नाव आहे. पाच महिन्यापूर्वी तिला कुत्रा चावला होता परंतु तिने घाबरून इंजेक्शन झाला नकार दिला होता. कशीश सहानी (9) ही मुलगी नालासोपारा पश्चिमेच्या श्री प्रस्थ येथील सुबोध सागर इमारतीत आपल्या आई वडिल आणि आजोबा सोबत राहत होती. ती मदर मेरी शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत होती. पाच महिन्यांपूर्वी कशिश ही आपल्या आजोबा बरोबर घराजवळ फिरायला गेली होती. एका कुत्र्याला बिस्कीट देत असताना तिला कुत्रा चावला होता.. आजोबा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती जोरात रडू लागल्याने तिला इंजेक्शन न देता घरी आणले. याशिवाय दुसऱ्या दिवशी ती जखम ही सुकून गेल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र चार दिवसांपूर्वीच तिची प्रकृती अचानक बिघडली. तिचे डोळे ही लाल झाले होते. घरच्यांनी कशीश ला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
1014
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 24, 2026 06:05:42
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याचा पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात आग लागल्याने शंभर एकर गव्हाचे पीक जळाले - काही क्षणांत उभा हंगामातील गव्हाचा पिकाची राख रांगोळी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट - वाऱ्याच्या वेगामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, शेतातून शेतात झपाट्याने पसरली आग - अनेक शेतकऱ्यांचे एकरच्या एकर गव्हाचे पीक भस्मसात, आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ - कन्हान-पिपरी, कामठी, कांद्री, महादुला येथून अग्निशमन दलाच्या चार गाड्यांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात मात्र पिकाची राख रांगोळी.. - डोळ्यांसमोर पीक जळाले शेतकऱ्यांची हळहळ, नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी.
1055
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 24, 2026 06:03:07
Niphad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात कपडे धुण्यासाठी पालखेड कालव्यात गेलेल्या ऐका 18 वर्षीय मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,बोकडदरे शिवारात राहणाऱ्या 18 वर्षीय ज्योती अनिल शेकरे ही तरुणी पालखेड कालव्यावर धुणे धुण्यासाठी 21 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान गेली होती मात्र पाय घसरल्याने ती पाण्यात पडली,दरम्यान मुलगी घरी न आल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली असतानाच आज दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह पालखेड कालव्याच्या डोंगरगाव शिवारात सापडला,मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक तसेच आपत्ती विभागाने प्रयत्न केले,मृतदेह सापडताच पंचनामा करून तो निफाड येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून निफाड पोलीस अधिक तपास करीत आहे
1091
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 24, 2026 06:02:43
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये पालिकेच्या फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा विरोध ? आधी हॉकर्स झोन जाहीर करा, मगच कारवाई करा!" म्हणत फेरीवाल्यांसाठी मनसे उतरली रस्त्यावर प्रभाग कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंगाच्या गजरात जोरदार आंदोलन.. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन एकीकडे नागरिकांकडून कारवाईची मागणी, तर दुसरीकडे मनसे फेरीवाल्यांच्या बाजूने कारवाई कराची का नाही या दुहेरी भूमिकेमुळे पालिका अधिकारी संभ्रमात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यासाठी पालिकेने फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कल्याण पश्चिमेकडील साई चौक परिसरात झालेल्या कारवाईनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी शेकडो फेरीवाल्यांसह आज पालिकेचे 'ब' प्रभाग कार्यालय गाठले. नेहमीच्या घोषणाबाजीला फाटा देत मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच ढोलकी आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन गात प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या मांडला. "फेरीवाल्यांवर कारवाई करा, पण ती न्याय्य असावी," अशी भूमिका मनसेने घेतली आहे.यावेळी बोलताना उल्हास भोईर यांनी प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले. "पालिका संपूर्ण शहरात कारवाई का करत नाही? केवळ साई चौकातच कारवाई कशासाठी? अधिकारी या विशिष्ट भागातील फेरीवाल्यांविरोधात कोणाची तरी 'सुपारी' घेऊन काम करत आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित
1037
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 24, 2026 06:00:16
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव (नाशिक) - मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरु... आज मनमाडच्या गर्डरशॉप भागात रेल्वे लाइन जवळ असलेल्या जमिनीचे मोजमाप केले सूरू... मालेगाव, नांदगाव, धुळे जिल्ह्याच्या पट्ट्यात लोकसंघर्ष समिती करणार विरोध... महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनतेसाठी महत्वपूर्ण ठरणारा मात्र काही वर्षा पासून रखडलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्यास सुरुवात झाली असून रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरु केली या अंतर्गत आज मनमाडच्या गर्डरशॉप भागात रेल्वे लाईन जवळ असलेल्या वसाहतीच्या घरांच्या भूमीची मोजमाप करण्यात आली. जमीन मोजमाप करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध होता या अगोदर दोन वेळा लोकांनी मोजमाप करू दिले नव्हते मात्र आज त्यांच्या विरोधाला न जुमानता कडक पोलिस बंदोबस्तात भूमी अभिलेखा विभागाने जमीन मोजमाप सुरु केले. 309.43 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनते सोबत व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणारं आहे. दरम्यान मालेगाव, नांदगाव, धुळे जिल्ह्याच्या पट्ट्यात लोकसंघर्ष समिती या कामाला पुन्हा विरोध करणार असल्याचे समितीचे प्रमुख शेखर पगार यांनी सांगितले.
1013
comment0
Report
Advertisement
Back to top