Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
आंबादास दानवे ने ठाकरे बंधुओं की एकीकरण पर खुशी जताई, महाराष्ट्र राजनीत बदलेगी
VKVISHAL KAROLE
Dec 24, 2025 09:03:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केलाय आज खूप मोठा दिवस आहे,  खऱ्या अर्थाने ही नवी सुरवात आहे त्यामुळे आनंद होत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले निश्चितपणे महाराष्ट्राचा राजकारण या एकी मुळे बदलेल असे अंबादास  म्हणाले त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Dec 24, 2025 10:27:06
Thane, Maharashtra:एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जगवाटपाबाबत बिघाडी पाहायला मिळत असताना ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आव्हाडांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कळव्यातील पारसिकनगर प्रभागातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून अभिजीत पवार आणि पूजा शिंदे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठे शक्तिप्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. आव्हाडांच्या कळवा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या नगरसेवकांची संख्या मोठी असतानाही मागच्या काळात अनेक माजी नगरसेवकांनी जितेंद्र आव्हाडांच्या साथी सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कळव्यात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का सहन करावा लागला होता. मात्र आता पुन्हा आव्हाडांची महापालिका निवडणुकीसाठी चांगली कंबर कसलेली पाहायला मिळते. त्यामुळे या निवडणूक प्रचारात जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यात केलेला विकास हाच आमच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे. तसेच आव्हाड यांच्या जो जो誰 साथ सोडली त्यांना त्यांची जागा दाखवन hाच आमचा अजेंडा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 24, 2025 10:26:00
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया; दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अँकर:– अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळातून मातीमिश्रित पाणी येत असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. पाणी उकळूनही रंग-वास जात नसल्याने नागरिक पाणी पिण्यास नकार देत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठांना आजारांचा धोका वाढला असून पाणीपट्टी भरूनही शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान जलशुद्धीकरण केंद्र व पाईपलाईन देखभालिकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून तात्काळ उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 24, 2025 10:09:35
Wardha, Maharashtra:वर्ध्या के कारंजा परिसर में डुप्लिकेट विदेशी दारू की निर्मिती का पर्दाफाश किया गया है। प्रहार जनशक्ती संघटने के विधानसभा प्रमुख जयकुमार बेलखडे ने डुप्लिकेट दारू के कारखाने का पर्दाफाश कर कारंजा तालुक्यात बड़ी खलबली मचाई है। MD प्रकरण के बाद कारंजा फिर से डुप्लिकेट दारू के चर्चाओं में है। कारंजा परिसर के सावळी बुजुरग के पास निसर्ग ढाबे के पीछे पिछले एक से डेढ़ वर्ष से डुप्लिकेट विदेशी दारू बनाने का आरोप लगाया गया है। नागपूर–अमरावती महामार्ग के पास यह अवैध उद्योग चल रहा बताया जा रहा है। दारूबंदी वाले जिले में भी डुप्लिकेट दारू के कारखाने चलने के खुलासे से प्रशासन के कार्यपद्धति पर प्रश्नचिन्ह लगाए गए हैं। डुप्लिकेट दारू बनाने के लिए इस्तेमाल होने वाले काँच के Bottles, गोवा विस्की और बनावट स्टिकर्स प्रहार ने पकड़ लिये। पूरा मामला वीडियो के रूप में सोशल मीडिया पर वायरल हुआ है और इसकी गहन जांच की मांग उठ रही है।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 24, 2025 09:34:00
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 24, 2025 09:31:09
kolhapur, Maharashtra:नागपूर बाईट - विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते - On ठाकरे बंधू युती - - आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सगळ्यात मोठा भाऊ काँग्रेस ठरलेला आहे, हे आता सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि त्यामध्ये काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि *त्यात मिळालेली एकूण मत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक असतील या दोन्ही पक्षापेक्षा अधिकच यश आम्हाला मिळालं* - *यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी न करता लढण्याची आहे* - मुंबईत दोन भाऊ एकत्र येत असतील तर नक्की आम्हाला आनंद आहे, एक कुटुंब एकत्र येऊन निवडणुकीत एकत्र लढत असतील त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही - आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या निवडणुकीत यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो - पण *एक लक्षात घ्या काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना आहे मनसे बरोबर जाण्याची नव्हती, शिवसेनेसोबत जाण्याची आणि शरद पवारांसोबत जाण्याची कालही भावना होती आणि आजही आहे* (On मराठी माणूस चुकला-- उद्धव ठाकरे ) ---- महाराष्ट्रावर मराठी माणूस काय विचार करून तो निर्णय घेईल पण मराठी माणूस महाराष्ट्रात भाषेवर आणि प्रांतावर अतिक्रमण चाललेल आहे - *मी काँग्रेसचा असलो तरी ती वस्तूस्थिती आहे*, *मुंबई बळकावण्याचा मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे* - मुंबईची वाट लावण्याचा काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्ण कंट्रोल करण्याचा जे दिसते ते गुजरातच दिसतोय - म्हणून *मराठी अस्मिता, मराठी माणसाच्या हक्काचा संरक्षण करायचा असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभा राहिल पाहिजे ही त्यांची आणि आमची ही भावना आहे* (On उद्धव ठाकरें लोकसभा) - महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्यांची मोट बांधण्याचा काम झाला होता - इंडिया आघाडीचे ते आजही सदस्य आहेत, लोकसभा विधानसभा निवडणुकीचा संबंध स्थानिक स्वराज्य संस्था सोबत जोडणे याचे उत्तर आमच्याकडे नाही - या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, तो निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा असतो त्यामुळे आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मांडण्याचं कारण नाही (On उद्धव ठाकरे -महाविकास आघाडी अबाधित) - --- उद्धवजी जे बोलले ते बरोबर बोलले.. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचा उत्तर दिले आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच आहोत (On ओपन स्पेस - ) --- आमच्याकडून तो विषय संपलेला आहे,मुबंईत काँग्रेस आणि वंचितला घेऊन आम्ही लढण्याचा विचार झाला आहे त्यामुळे तिथे पुन्हा फार काही स्कोप आहे असं वाटत नाही (On वंचित - जागा) - जागा मागण्याचा अजून काही ठरलेलं नाही जो काही प्रस्ताव दिला तो काही अर्ध्या-अर्ध्याचा प्रस्ताव नाही, अनेक ठिकाणी आघाडी करण्यासाठी किंवा युती करण्यासाठी बोलणे सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. पण 50-50 फॉर्मुला कुठेही वंचित ने दिलेला नाही (On अकोला वंचित - ) - जे काही आमचे परमनंट युती किंवा लोकसभा किंवा विधानसभेपासून आलेली नाही. राजकारणात आघाड्या बनवूनच निवडणुका लढल्या जातात त्यामुळे वंचित ने अकोल्यात काय भूमिका घेतली तर, महाराष्ट्राची युती आहे म्हणून तिथे झाली नाही. अशातला भाग नाही काही ठिकाणी झाली काही ठिकाणी झाले नाही (On बावनकुळे - ) - बावनकुळे यांचा पक्ष देश पातळीवर मोठा पक्ष आहे, त्यांना निवडणुका मतं चोरी करून... हारत असताना घोषित करून घ्यायचे सवय लागले तर त्यांना काही फरक पडणार नाही, पण आता पैसा आहे प्रचंड यंत्रणांचा वापर आहे त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही कोणी कितीही सोबत आले तरी कारण निवडणुका जिंकाव्या कशा आणि कशाचा आधार घ्यावा कोण सोबतीला असावे - निवडणूक आयोगापासून सर्व यंत्रणा सोबतीला असल्याने काय फरक पडणार आहे (On चंद्रपूर ऑपरेशन लोटस - ) - आमचे गट तयार झाले आम्हाला प्रचंड बहुमत आहे पुढे पुढे चा काय विषय आणि फोडले तर बघू (On नवनीत राणा - चार मुलं) - 3-4 अपत्ये करायला पाहिजे आणि नवनीत राणा यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजे आणि त्यांचा पालन पोषण करण्याचे जबाबदारी त्यांना दिली पाहिजे (On मुंबई वगळता आघाडी - ) - अनेक ठिकाणी चर्चा आहे त्यामुळे अनेक महानगरपालिका मध्ये अशी आघाडी होईल अशी शक्यता आम्हाला आहे... चंद्रपूर, अकोला अमरावती येथे चर्चा सुरु आहे (On उद्धव महापौर) - महापौर ते म्हणतात... आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही असेल त्या परिस्थितीत आमचा महापौर करून आणि आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करू (On उद्धव मराठी - ) - काँग्रेसचे मागे सर्व जाती धर्माचे लोक आहेत, आम्ही कधीही प्रांतीयवाद जातीयवाद भाषावाद मानत नाही, प्रत्येक माणूस या देशाचा मालक आहे या भावनेतून आम्ही काम करणारे आहोत, आमचे विचार सर्वांना घेऊन चालणारे विचार आहेत त्यामुळे आमची भावना हीच असणार मराठी किंवा गैर मराठी असू दे देशाच्या अस्मितेसाठी आणि आमच्यातील समन्वयासाठी आमच्या पाठीमागे उभे राहावे अशीच आमची साद असणार आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 24, 2025 09:05:46
Akola, Maharashtra:Anchor : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे युतीची अधिकृत घोषणा केली. आगामी निवडणुकांमध्ये उबाठा आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून, ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीच्या घोषणेनंतर राज्यभरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, अनेक ठिकाणी जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.अकोला शहरातही मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून, घोषणा देत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आगामी निवडणुकांत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 24, 2025 09:05:18
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 24, 2025 09:02:47
Mumbai, Maharashtra:महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांच्यात उत्साह आहे.यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आणि सचिव शिरीष सावंत यांच्याशी अविनाश अभ्यंकर फक्त महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक नाही तर सत्ताधारी सुद्धा युतीचे वाट पाहत होते. तेही घाबरले होते युती होणार की नाहीमराठी माणसावर मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर जो घाला घातला गेला आहे मराठी माणसाला गृहीत धरलेला आहे. भाग्यवान आहेत. ऑन आशिष शेलार त्यांनी असेच विचार करावे लागणार आहे ही युती प्रत्येकाला प्रश्न टाकणारी आहे बोलणं सोपं आहे ही भीती आहे हे दर होना जरुरी आहे त्यांचे प्रश्न विचारण्याचे काम आहे उत्तर आम्ही देऊ कोणासमोर लोटांगण घालणारे प्रश्न नव्हतं. शिरीष सावंत आता जबाबदारी कमी झाली आहे एकच एक मिळाले आहेत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे बळ मिळालेला आहे विजय मिळवायला सोप झाला आहे. जिथे जिथे शक्य असेल विचाराने एकत्र आलो आणि एकत्र लढणार प्रत्येक महानगरपालिकेत वेगवेगळी ठेवणं आहे पूर्ण प्रयत्न राहणार आहे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू मुंबई महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना युतीचा महापौर बसणार. चौपाल अविनाश अभ्यंकर आणि शिरीष सावंत मनोज कुळकर्णी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 24, 2025 08:45:50
Akola, Maharashtra:राज्यभरात भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याची भूमिका पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी स्पष्ट केली होती. मात्र कोणत्याही पक्षाला युतीसाठी डेडलाईन देता येणार नसल्याचंही त्यांनी कालच नमूद केलं होतं. मात्र, आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे वंचित यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणूकित काँग्रेस सोबत जाणार नाही. या घोषणेमुळे अकोल्यात वंचित आणि काँग्रेस यांच्यात युती होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने वंचितने ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, भाजप आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांसाठी युतीचे दरवाजे खुले असल्याचं वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज आपल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणूक रणशिंग फुंकलं आहे, यामध्ये काँग्रेस आमदार साजिद खान पठाण या या प्रभागातून सर्व प्रथम वंचितने उमेदवार जाहीर केलं आहे. उमेदवार जाहीर करून वंचितने निवडणुकीचा ‘नारळ फोडत’ थेट मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 24, 2025 08:24:15
Kalyan, Maharashtra:आज प्रतीक्षा संपली . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा होताच कल्याण मध्ये सेना मनसेचा जल्लोष.. अनेक वर्षा पासून दोन्ही भाऊ एकत्र यावेवे यासाठी सेना मनसे च्या कार्यकर्त्याची इच्छा होती मात्र आज दोन भाऊ एकत्र आल्याने कल्याण डोंबिवलीत उबाठा आणि मनसे कार्यकाऱ्यांचा एकत्रित जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी ढोलच्या तालावर नाचत,पेढे भरवत आनंद वेक्त केला मराठी माणसाची अनेक वर्षाचे प्रतीक्षा संपली आहे अक्षर आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे येत्या निवडणुकीत निश्चितच कल्याण डोंबिवली महापालिकेत आमचीच सत्ता येणार अशी खात्री वेक्त करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top