Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401
छगन भुजबळ: सेना-मनसे युतीची संभाव्यता वाढली!
SKSudarshan Khillare
Aug 07, 2025 06:03:25
Yeola, Maharashtra
*छगन भुजबळ ऑन सेना मनसे युती* मी असे म्हणालो होतो ते एकत्र आले पुढे पाहू या युती होते का त्यांच्या घरी येणे जाणे झाले मुंबईमध्ये त्यांची युती राहील बाहेर राहील की नाही मला शंका वाटते मात्र ते एकत्र यायला सुरुवात झाली आहे मी हे म्हटलं होतं की दोन ठाकरे एकत्र आले की त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळेल परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल. *छगन भुजबळ ऑन सामना ईव्हीएम टीका* या विषयावर पहिल्यापासून टीका होते आहे अनेक वेळा ते हायकोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं इलेक्शन कमिशन पुढे देखील चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा यात कुठे काय आहे आपल्या मतदारसंघात देखील विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी त्यांनी सांगितलेले पेटी उघडली मात्र जे काय आहे ते बरोबर निघाले *छगन भुजबळ ऑन अजित पवार दौरा धनंजय मुंडे गैरहजरी* कुठे गेले असतील आजारी वगैरे असतील कुठेतरी कामात गेले असतील प्रत्येक वेळेस कोणीतरी आला आहे कोणालातरी काम येतं अगोदरपासून काम नियोजित असतात *छगन भुजबळ ऑन कर्ज माफी बावनकुळे वक्तव्य* बावनकुळेच्या आता बोलताय ते मुख्यमंत्री आधी सुद्धा म्हणाले आहेत योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत *छगन भुजबळ ऑन उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा सुनील तटकरे भेट* मला याबाबत कल्पना नाही तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री बाबत चर्चा केली असेल तर मी असं म्हणेल तर त्यांनी नाशिकच्या पालकमंत्री बाबत सुद्धा चर्चा करायला पाहिजे *छगन भुजबळ ऑन नागपूर लाडक्या बहीण लाभ बाबत हायकोर्टात जाणार* ज्यांचे फार्म हाऊस आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही भारत सरकारच्या योजना असत किंवा राज्य सरकारच्या योजना असतील या गरिबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात आपण आता अन्नधान्य देत आहोत एक रुपया दोन रुपये तीन रुपये मध्ये कोणाला देतो आपण जे गरीब आहे त्यांना देतो तसेच या योजनेसाठी देखील काही गरीब मजूर शेतकरी महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना झाली आहे ज्यांच्याकडे गाड्या घोडे आहेत त्या भगिनींसाठी ही योजना नाही चुकीचा लाभ कोणी घेत असेल अशा या भगिनींचा शोध सुरू आहे सरकारने ज्यावेळेस लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला त्याच वेळेस सर्व माध्यमातून कुणाकुणाला हे लाभ मिळणार त्याची स्पष्ट सर्वांना दिली जाते मात्र काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतले जातात *छगन भुजबळ ऑन राजाभाऊ मुंढे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादी प्रवेश* प्रत्येक पक्ष आहे जो आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतो जेवढा निवडणुका जवळ येतात त्यावेळेला त्यावेळेस नेते स्थानिक अभ्यास करून इकडून तिकडे जात असतात अजितदादा पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीकडे लोकांचा ओढा वाढला आहे *छगन भुजबळ ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना सूचना* शिंदे मी जे केलं ते आपली उत्तम आहे कमी बोलले पाहिजे नाहीतर मला कल्पना नाही माहिती घेऊन बोलतो असे सांगितले पाहिजे परंतु बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द येता कामा नये अवमान होणारे शब्द येता काम नये ज्याच्यातून वादंग निर्माण होईल अशा प्रकारचे शब्द येता कामा नये *छगन भुजबळ ऑन मंडल दिन* वीपी सिंग साहेबांनी मंडल आयोग आम्ही स्वीकारतो हे जाहीर केले दिवस जो आहे भटक्या विमुक्तांना, लहान लहान समाजाला आरक्षण मिळाले तो हा दिवस आहे आम्हा सर्वांना या दिवसाचे महत्त्व आहे अजूनही कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात लढाया चालू ठेवाव्या लागतात. *छगन भुजबळ ऑन उद्धव ठाकरे खासदारांना आदेश* आम्हीही विरोधी पक्षात असताना हेच करत होतो त्यांनाही सांगायची गरज काय वाटली ? विरोधी पक्ष ही गोष्ट विसरले होते की काय आता त्यांना सांगावं लागते त्यांना प्रश्न तर मिळाले पाहिजे सरकार जर योग्य पद्धतीने काम करता येतात त्यांच्याकडे मुद्दाच नाही... ......*********........*******..... अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळा सुरू होईल युट्युब लाईव्ह फ्रेम येवला येथून Live link https://www.youtube.com/live/DHuoO1f-LxI?si=knjnqWxsGRMUk7mz
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 02:02:57
Jalna, Maharashtra:जालना : नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त(जनरल, पीकपाणी) अँकर : जालन्यातील भोकारदन तालुक्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 9 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.मात्र, परतीच्या पावसाने आणि अवकाळी ढगफुटीमुळे परिस्थिती बदलली. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचले. वाफेवरची वाढ थांबली. तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार 62 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले. शासनाने पंचनामे करून तातडीची मदत दिली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी थोडा आधार मिळाला. मात्र, खरी दिलासा देणारी पिकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरला. तरीही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी हालचाल नाही. त्यामुळे नाराजी वाढली आहे. पूर्वी ''एक रुपयात पिकविमा' योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. ही योजना बंद झाल्याने आता विमा हप्ता मोठा झाला आहे. आर्थिक अडचणीच्या काळात हा हप्ता भार बनतो. त्यात भर म्हणजे नुकसान असूनही भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पिकविमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या विमा कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत. पंचनामे झाले आहेत. नुकसान स्पष्ट दिसत आहे. तरीही विमा रक्कम मिळत असल्याने पीकविमा कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:01:51
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 01:45:47
41
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 10, 2025 01:16:04
Ambernath, Maharashtra:रस्ता 100 फुटांचा, गटार 20 फुटांवर बारवी डॅम रस्त्याच्या कामात प्रचंड घोळ नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा स्थानिकांचा आरोप बदलापूर ते बारवी रोड आज जवळपास 15 ते 20 छोट्या-मोठ्या गावांना जोडतो. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे वाहनांची ये-जा सुरू असते. एमआयडीसीने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कागदावर 100 फुटाचा रस्ता असूनही 20 फुटांच्या रस्त्याला मंजुरी का देण्यात आली असं स्थानिक नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट गटार असल्यामुळे हा रस्ता अरुंद होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. घाईघाईत रस्त्याचे काम उरकल्यानंतर भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी دوन्ही बाजूची गटारं तोडावी लागतील, त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जाईल असे ठामपणे म्हटले जाते. चंद्रशेखर भुयार, बदलापूर
188
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 09, 2025 17:00:18
Kalyan, Maharashtra:धावत्या एक्स्प्रेस मध्ये व्यापाऱ्याची साडे पाच कोटींचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास.. सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये घडली घटना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू. tपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांची तीन पथके तैनात सोलापूर ते कल्याण सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडे पाच कोटींचे सोने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांची तीन पथके या गुन्ह्याच्या तपसासाठी नियुक्त करण्यात अल्या असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.
182
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 09, 2025 16:15:48
Pune, Maharashtra:अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित ऑफिसच्या जागेचा वाद चांगलाच गाजला होता...जैन समाजाच्या स्वर्गीय मंगुबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेल्या जागेवर संग्राम जगताप यांनी आपले कार्यालय सुरूकेल्याचा आरोप करण्यात आला होता... याबाबत जैन समाजाचे आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती..दरम्यान अहिल्यानगर येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी या जागेबाबत मुळ भाडेकरू गणेश गोंडाळ आणि आमदार जगताप यांच्याशी आपलं बोलण झाल असून पुढील तीन महिन्यात ही जागा जैन समाजाच्या ट्रस्टकडे दिली जाईल असं वचन मला दिल्याच आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी म्हंटले आहे.
211
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 09, 2025 15:45:28
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरत सराईत गुंडावर चाकू हल्ला प्रकरण हल्ल्याचा सीसीटीव्ही आला समोर उल्हासनगरातील एक सराईत जयकिशन आलमचंदानी याच्यावर भर दुपारी चाकू हल्ला झाला होता, आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. जयकिशने वाद उकरून काढल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास जॅकी हा आपल्या दुचाकी ने जात आहताना समोरून एका कारने जयकिशनच्या Motorcycle ला कट मारल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर कारचालक गाडीत बसून परत जात असताना चालक सीटवर असलेल्या इसमाला जयकिशन याने खेचून बाहेर काढलं. त्यानंतर झालेल्या झटापटीत कार मधील एकाने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने जय किशन वर हल्ला केला यात जय किशन गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, प्राथमिक उपचारानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
146
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 09, 2025 15:33:38
151
comment0
Report
VKVijay1 Kumar
Dec 09, 2025 14:50:13
Noida, Uttar Pradesh:नोएडा में फेस वन थाना पुलिस ने साइबर सेल के सहयोग से ऑनलाइन गेमिंग/बैटिंग एप के माध्यम से ठगी करने वाले गिरोह का किया खुलासा। पुलिस ने कार्रवाई करते हुए 2 शातिर साइबर ठगों को किया गिरफ्तार। पुलिस ने मौके से 7 लैपटॉप, 8 मोबाइल, व अन्य सामान किया बरामद। मूल रूप से अलग अलग जनपदों के रहने वाले है आरोपी सचिन गोस्वामी व कुणाल गोस्वामी। शातिर अभियुक्त ऑनलाइन गेमिंग/बैटिंग एप के माध्यम से मोटा मुनाफा कमाने का झांसा देकर युवाओं को बनाते थे ठगी का शिकार। शातिर अभियुक्तों द्वारा अभी तक लाखों रुपए की ठगी को दिया जा चुका है अंजाम। नोएडा के फेस 1 थाना पुलिस ने थाना क्षेत्र के अंतर्गत सेक्टर 2 से किया गिरफ्तार。
156
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 09, 2025 13:34:19
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे नेते भाजपमध्ये जाणार - चंद्रकांत खैरे LIVE LINK (((( https://www.facebook.com/share/v/1HTuU3PqSk/ )))) शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे नेते भाजपमध्ये जाणार शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मोठा दावा “मला शिंदे सेनेतील काही आमदार भेटले होते तेच मला म्हणाले होते की आम्ही 22 नाही आम्ही 35 जण तयार आहोत‘’ ‘’सामंत यांच्या नेतृत्वात आम्ही जाणार आहोत, सामंत यांचे नाव त्याच दोन आमदारांनी मला सांगितलं‘’ ऑन महाविकास आघाडी --- सोलापुरातील स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, माकप, तसेच समाजवादी पार्टी देखील आमच्यासोबत सोलापुरात असणार आहे कुरकुर ही प्रत्येक पक्षात असते. आडम मास्तर, शिंदे साहेब यांना विनंती करून आम्ही सोलापूरात मोठा मेळावा आगामी निवडणुकीच्या संदर्भात घेणार आहोत आगामी निवडणुकीच्या संदर्भात जो कार्यकर्ता निवडून येईल असा वाटतोय त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असा मी ठरवला आहे पळवा पळवी करणारे भाजपवाले म्हणायचे की ही आघाडी होणारच नाही आणि ही आघाडी आता सोलापूरला झालेली आहे आणि महाराष्ट्राने पाहिला आहे. ऑन शरद कोळी प्रणिती शिंदे विधान शरद कोळी जे म्हणाले असतील ते त्यांच व्यक्तिगत मत आहे ते पक्षाचे मत नाही. पक्षाचा नेता मी आहे म्हणून या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे एकत्र असेल भाजपने निवडणूक मध्ये एवढे पैसे वाटले याकडे राज्य निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले ऑन आमदार महेंद्र थोरवे-तटकरे विधान त्यांचं म्हणणं म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा, त्यांच्यात आता भांडण सुरु झाली आहेत त्यांच्या भांडणमुळे देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा किती नर्व्हस झाला आहे त्यांच्यात आपसातली भांडण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांच्यात पैसे कोण जास्त वाटणार यामध्ये शर्यत लागली होती एकत्रित चहा पिणे वगैरे सगळं खोटं आहे, मनातून फाटाफूट झाली आहे ऑन विरोधीपक्ष नेते पद दोन आमदार असताना देखील काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पद दिले होते आता त्यांना मुद्दाम विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचा नाहीये लोकशाहीचा स्तंभ असताना विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचं नाही म्हणून सत्ताधारीवर आता फार मोठा मारा होणार आहे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं सुरु आहे आमच काय चुकतंय हे सांगणारा कोणी तरी असला पाहिजे अशी भूमिका आधीच्या सरकारची होती विरोधपक्ष नेता असेल तर राज्य करण्याची पद्धत आणखी मजबूत होईल ऑन वेगळं विदर्भ लोकसभेत ज्या वेळी हा मुद्दा आला होता त्याचं वेळी हा मुद्दा संपला होता, भाजपने असं काही करणार नाही असं उत्तरात सांगितले होत बावनकुळे यांनी आता मुद्दा पुन्हा उकरून काढलाय, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला बावनकुळे घाबरले आहेत त्यामुळे त्यांनी हा मुद्दा काढलाय ऑन वडेट्टीवार वेगळा विदर्भ पाठिंबा त्यांचं मतं हे स्वतःच असेल, काँग्रेसची भूमिका ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारतील मी तर महाराष्ट्र अभिमानी आहे, कोणी जर महाराष्ट्रचे तुकडे पडण्याची हिंमत दाखवत असेल आम्ही महाराष्ट्र अभिमनी लोकं ते कधीही सहन करणार नाही संयुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी 107 हुतात्मे झाले, हा महाराष्ट्र तोडण्याची कोणाची हिंमत आहे? शिंदे गटाच्या लोकांना विचारा आता त्यांची भूमिका काय आहे. बाईट : चंद्रकांत खैरे, माजी खासदार
163
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 09, 2025 13:20:37
Chendhare, Alibag, Maharashtra:अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्बवर शिवसैनिकांमध्ये संताप ...... दानवे यांच्या कृत्याचा रायगडात ठिकठिकाणी निषेध ...... अंबादास दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन ....... आमदार महेंद्र दळवी यांच्या बदनामीचे षडयंत्र ....... फेक व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा ...... दानवे यांच्या माफीनाम्याची मागणी ....... अँकर - ऐन नागपूर अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब टाकला. यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज अलिबागसह रोहा, मुरुड या ठिकाणी शिवसैनिकांनी दानवे यांच्या कृत्याचा निषेध केला. अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी यांना आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून त्यासाठी दानवे यांनी सुपारी घेतल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. आज अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले त्यात एक व्यक्ती रोकड मोजताना दिसते आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा शिवसेनेने केलाय. बाईट १ - राजा केणी, जिल्हाप्रमुख बाईट २- मानसी दळवी, महिला आघाडी
118
comment0
Report
Advertisement
Back to top