Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

युद्ध से भारत के कृषि उत्पादों के निर्यात पर भारी असर, बंदरगाह अड़चन और शुल्क बढ़े

HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 08:18:46
Junnar, Pune, Maharashtra
इराण इजराइल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भारतातील शेतीमालाला मोठा फटका बसला असून या युद्धामुळे भारतात शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत तर दुसरीकडे भारतातून आखाती देशांमध्ये पाठवलेला शेतीमाल हा समुद्र लाईनमध्येच अडकल्याने शेकडो कोटींचं नुकसान झालंय... भारतातून दररोज शेकडो कोटींचा शेतीमाल आखादी देशात पाठवला जातो,जवळपास 60 ते 70 टक्के भाजीपाल्यासह खाद्य पदार्थ हे आखाती देशात निर्यात केले जातात मात्र सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातदारांसह शेतकय्रांनी पाठवलेल्या शेकडो कोटींचा शेतीमाल हा इराण,ओमान च्या समुद्र सीमांवरती अडकून पडलाय तर दुसरीकडे शिपिंग कंपन्यांनी या मालवाहतूक कंटेनर वरती वॉर सर चार्ज म्हणून चार हजार डॉलर (भारतीय रूपयांत 3 लाख 75 हजार रूपये) अतिरिक्त शुल्क आकारलंय, त्यामुळे निर्यातदारां सह शेतकऱ्यांच आधीच शेतीमाल समुद्र लाईन मध्ये अडकल्याने कोट्यावधी रूपयांचं नुकसान झालेलं असताना या अतिरिक्त शुल्काचा बोजा हो त्यांच्या डोक्यावरती पडलाय,महत्वाचं म्हणजे यातील सर्वाधिक शेतीमाल हा नाशवंत असल्याने हा शेतीमाल कंटेनर मध्येच खराब होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीतीही निर्माण झालीय. यातील पुढे नाशवंत शेतीमाल जर जहाजांमध्येच कंटेनर मध्ये खराब झाला तर हा शेतीमाल पुन्हा त्या देशांमध्ये नष्ट करण्यासाठी निर्यातदारांना अधिकच शुल्क मोजावं लागेल आणि हे शुल्क प्रतेक देशामध्ये कमी अधिक प्रमाणात वेगवेगळं आहे किंवा तो शेतीमाल पुन्हा रिएक्सपोर्ट करून पुन्हा माघारी आणावा लागेल त्याचा ही मोठा खर्च निर्यातदारांना सहन करावा लागत असताना या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच मोठा तोटा सहन करावा लागत असताना शिपिंग कंपन्यांनी लावलेले अधिकचे वॉर चार्ज हे हटवण्याची मागणी निर्यातदार शेतकरी करत आहेत, अन्यथा आम्ही पूर्णपणे उध्वस्त होऊ संपून जाऊ असं निर्यातदार सांगत आहेत. भाजीपाला हा फार काळ टिकणारा नसल्याने या नाशवंत शेतीमालाच्या मालाचे मुंबई मध्ये JNPT बंदरावरती अडकलेल्या हजारो कंटेनर मधील शेतीमाल हे खाली करण्याचे आदेश हे शिपिंग कंपन्यांनी निर्यातदारांना दिलेत... आखाती देशात गेलेले हार्मोस सामुद्र ध्वनी ओमान ईरान सिमेवरती समुद्र लाईन मध्ये जवळपास 2500 ते 3000 हजार कंटेनर हे अडकून पडल्याची हि माहिती समोर येतेय. तर दुसरीकडे आखाती देशांना पाठवलेला शेतीमाला तिकडेच समुद्रात अडकून पडलाय तर मुंबईतील जेएनपीटी बंदरावरती अडकून पडलेला शेतीमाला शिपिंग कंपन्यांनी खाली उतरवण्याचे आदेश दिलेत तर दुसरीकडे सध्या भारतातील सर्वच फार्म प्रोडूसर कंपन्या कोल्ड स्टोरेज ही हाउसफुल(पुर्ण क्षमतेने) भरल्याने नवीन शेतीमाल साठवण्याची क्षमता संपल्याने हा शेतीमाल थेट आता निर्यात होण्याऐवजी भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ लागल्याने सर्वच शेतीमालांचे बाजारभाव गडगडल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकय्रांना बसतोय. End Vo... या महायुद्धाची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतेय त्यामुळे लवकरात लवकर ही युध्दजन्य परिस्थिती सुधारून पूर्ववत यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हीच माफक अपेक्षा...प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 01:30:15
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर :भर रस्त्यावर पार्किंग, केवळ दुचाकीवर कारवाई, चारचाकी वाहनांवर कारवाई नाही,महापालिकेचे दुर्लक्ष अँकर : ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरची ओळख आता 'वाहतूक कोंडीचे शहर' अशी होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंगची कोणतीही शिस्त उरलेली नाही. महापालिका मुख्यालय ते रोशन गेट या 50 फुटी रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे केवळ  मोठ्या रुग्णालयासमोरही थेट रस्त्यावरच वाहने उभी असल्याने गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही तासं तास अडकून पडावे लागत आहे. -दुटप्पी कारवाईने नागरिक संतप्त रस्त्यावर लावलेल्या दुचाकी उचलून नेण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांची पथके तत्पर दिसतात. मात्र, - ही कारवाई केवळ दुचाकीस्वारांपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप नागरिक - करत आहेत. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. यामुळे चारचाकी चालकांना पोलिसांचा धाक उरलेला नसून दुर्लक्षामुळे मोठ्या गाड्यांचे मालक वाटेल तेथे पार्किंग करत आहेत.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Mar 09, 2026 01:16:43
Karjat, Maharashtra:कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची नेमणूक असतानाही ते प्रत्यक्षात दुसरीकडे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचा पगार कर्जत रुग्णालयातूनच दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुळ्यात, कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूतीतज्ञ डॉ. रामदास तरपेवाड यांना २०२३ साली उसनवारी तत्वावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र ते आजही माणगाव येथेच कार्यरत असून कर्जत रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जत तालुका हा आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्याने अनेक गरोदर महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयातच होते. मात्र गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने महिलांना खोपोली, उल्हासनगर किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागत असल्याने त्यांच्या आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, याबाबत भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत कर्जतच्या महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 01:16:23
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | लहान मुलांच्या लसींचा तुटवडा, पालकांमध्ये चिंता छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकाेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींचा साठा संपुष्टात आल्याने लसीकरण सेवांवर परिणाम झाला आहे. शहरातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मागील दहा ते पंधरा दिवसांपासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुलांचे लसीकरण करण्यासाठी आलेल्या पालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. शहरात महापालिकेची एकूण 39 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दर महिन्याला साधारण 100 ते 150 युनिट लसींची आवश्यकता असते. मात्र, सध्या लसींचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे अनेक केंद्रांमध्ये लसीकरण पुढे ढकलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बालकांना डीपीटी, आयपीव्ही, रोटा तसेच इतर महत्त्वाच्या लसी दिल्या जातात. यातील काही लसींचा साठा कमी झाल्यामुळे नियमित लसीकरणाच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. परिणामी पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 09, 2026 01:01:25
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 08, 2026 17:16:11
Navi Mumbai, Maharashtra: भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपाने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात रुग्णालयाच्या मुद्द्यावरून सभागृह नेते सागर नाईक यांच्यासह महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांना भावनिक आवाहन केलेय. विरोधाला विरोध करू नका रुग्णालय हातातून जाऊ देऊ नका आपल्या आपसातील भांडणाचा लाभ दुसऱ्याला होऊ देऊ नका असा सल्ला यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलाय. यासोबतच साडे आठ एकर खेळाचं मैदान कोणी देईल का असा सवाल उपस्थित करत सिडको 1, 2 एकर देऊन बाकीचा प्लॉट विकेल म्हणजे मी सांभाळून ठेवलेला प्लॉट देखिल तुम्हाला मिळणार नाही. मी दोहरी पायांनी अपंग असताना दिल्लीवाऱ्या करून सर्व परवानग्या आणल्या असून माझी तुम्हा सगळ्यांना साथ आहे फक्त बघण्याचा चष्मा बदला सगळं काही बदलेल असे भावनिक आवाहन आमदार मंदा म्हत्रे यांनी केलेय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 08, 2026 14:47:09
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 08, 2026 14:32:49
Oros, Maharashtra:आज 8 मार्च महिला दिनापासून सुरू झालेल्या जल महोत्सव येत्या 22 मार्च जागतिक जल दिनापर्यंत सुरू राहणार आहे. कुर्ली येथील आयोजित कार्यक्रमात जल कुंभाची मिरवणूक, जलकुंभ पूजन आदी कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र नंबर एक वर आहे. येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात शुध्द पेयजल प्रत्येक घरात पोहोचवणार आहोत. एकही घर यापासून वंचित राहणार नाही. जल जीवन मिशनची यशस्विता इतकी आहे की इतर देशदेखील आता त्याचे अनुसरण करू लागले आहेत. अशा शब्दात जल जीवन मिशन बाबत गौरव उद्गार केंद्रीय रेल्वे तथा जल आपूर्ति राज्यमंत्री व्हि. सोमण्णा यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुर्ली गावामध्ये जल महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी देखील मोदी सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल 1 लाख 17 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदीजी नेहमी रेल्वे रस्ते आणि पाणी योजनांना अग्रक्रम देतात. मोदीजींचे काम, व्हिजन विकसित भारत 2047 आपण पाहतो आहोत आणि यातून झालेला विकास केवळ महाराष्ट्र, कर्नाटक किंवा दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात दृष्टीस पडत आहे, असे ते पुढे म्हणाले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 08, 2026 14:15:53
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर ” अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग ” या अभंगाची प्रचिती आली. वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंत पंचमी पासून रंगपंचमी पर्यंत दररोज विठूरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असतो. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. रंगपंचमी दिवशी दुपारी 4.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपुजा केली देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला. नंतर डफाची पुजा करुन नामदेव पायरी- तुकाराम भवन - पश्चिम द्वार - चौफाळा - पश्चिम द्वार - व्हीआयपी गेट - नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानकऱ्यांना प्रसाद देवून वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्साहात मंदीर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
0
comment0
Report

AKAMAR KANE
Mar 08, 2026 14:01:50
Nagpur, Maharashtra:
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 08, 2026 13:48:04
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह चौथे दिवशी लोटांगण आंदोलन, लोहारडोंगरी खाण विरोध आणि जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या मागण्या रेटल्या अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्र संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज चौथ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी 'लोटांगण आंदोलन' करण्यात आले. लोटांगण आंदोलन मधे सहभागी डझनभर आंदोलक सहभागी झाले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-कऱ्हांडला तसेच नवेगाव-नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमणमार्गातील प्रस्तावित ‘लोहारडोंगरी’ लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या 'सेव्ह लोहारडोंगरी, सेव्ह ताडोबा' या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने २५,००० स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे. बाईट १) किशोर जामदार, आंदोलक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 08, 2026 13:00:21
Beed, Maharashtra:बीड: विवाहित महिला महीने में तीन बार बिक्री; जबरदस्ती तीन विवाह, लातूर के विवाहित महिला ने विष पिलाकर आत्महत्या का प्रयास... अहिल्यानगर में उपचार जारी। आंचलिक खबर: लालच के चलते मानवीय तस्करी का चौंकाने वाला मामला बीड जिले में सामने आया। लातूर जिले के एक गाँव की रहने वाली महज 23 वर्ष की विवाहित युवती की एक महीने में तीन जगह बिक्री कर उसे जबरदस्ती तीन बार विवाह कराए जाने की घटना सामने आई है। पुणे और तुळजापूर के एजेंटों ने लाखों रुपये का सौदा कर युवती का व्यापार किया गया, ऐसा आरोप है। आष्टी में भी विवाह लाने का प्रयास हुआ। इसके बाद मानसिक उत्पीड़न और इस अमानवीय प्रथा से तंग आकर पीड़िता ने विष पिलाकर आत्महत्या का प्रयास किया। उसके उपचार अहिल्यानगर जिले के मिरजगाव में चल रहे हैं। इस मामले में आष्टी पुलिस ने चार संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज किया है और आगे की जाँच जारी है。
0
comment0
Report
Advertisement
Back to top