Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना, पिकांचे नुकसान वाढते!

GMGANESH MOHALE
Jul 12, 2025 07:33:55
Washim, Maharashtra
वाशिम : File:1207ZT_WSM_CROP_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: जून महिन्यात पावसाने दिलेला खंड आणि नंतर जुलैमधील अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 3.62 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली असून त्यातील 13,152 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.रिसोड तालुक्यात सर्वाधिक 9,450 हेक्टरवर, मालेगावमध्ये 2,380 हेक्टरवर, वाशिम तालुक्यात 700 हेक्टरवर तर मंगरूळपीरमध्ये 590 हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 25-26 जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव आणि रिसोडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्येही जोरदार पावसामुळे ही परिस्थिती गंभीर बनली आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top