Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

रत्नागिरीत तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का, दोघांचा मृत्यू!

PPPRANAV POLEKAR
Jul 18, 2025 09:06:16
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेल्याचा गावकऱ्यांचा आरोप महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ______________ रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली.. चंद्रकांत यशवंत तांबे आणि मृदुला वासुदेव वाडकर अशी विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे. या घटनेमुळे निवळी गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top