Back
हार्बर मार्गावर वाहतूक सुरळीत, लोकल ट्रेन सुरू!
Navi Mumbai, Maharashtra
story slug - हर्भर मार्गावरील वाहतूक सुरळीत
हार्भर मार्ग की लोकल शूरु
ftp slug - nm local train start
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor- नेरूळ - सिवूड रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे ट्रॅक वरून इंजिन गाडीचे चाक खाली उतरल्याने रात्री हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होते अखेर आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून,
सध्या पनवेल ते सीएसएमटी व पनवेल - ठाणे लोकल ट्रेन ८ ते १० मिनिटे उशिरा सुरू आहे
gf-
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Shirdi, Maharashtra:
Anc - एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून "ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी"ने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाले आहेत.. शिर्डीत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलं असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
V/O - पैसे दुप्पट होण्याच्या आमिषामुळे अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची जवळपास 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय.. भूपेंद्र सावळे या ठगसेनाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केलाय.. शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले आहे.. शिर्डीत देखील या महाठगाने अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केली आहे.. शिर्डी आणि परिसरातील 21 गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.. 21 गुंतवणुकदारांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
V/O - या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी , काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते.. मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. "गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल" असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले आणि याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली.. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले आहे..भूपेंद्र सावळे याने आपला साखरपुडा करत त्या साखरपुड्यात लाखों रुपयांचा खर्च केल्याचं व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर गुंतवणूकदारांचे लक्ष पोलिस तपासाकडे लागले आहे.. भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि अशा आमिषांना बळी पडू नये असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0707ZT_JALNA_FARMER(10 FILES)
जालना |जालना-नांदेड समृद्धी बाधीत शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत बसून आंदोलन
मुल्यांकनाच्या पाच पट मावेजा देण्याची मागणी
देवमूर्ती येथे मागच्या दोन महिन्यांपासून सुरु आहे धरणे आंदोलन
अँकर | जालन्यात नांदेड-जालना समृद्धी बाधीत शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केलंय.. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला मुल्यांकनाच्या पाच पट मावेजा देण्यात यावा. या मागणीसाठी देवमूर्ती येथे मागच्या दोन महिन्यांपासून समृद्धी बाधीत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप या आंदोलनाची कोणतीही दखल सरकारने घेतलेली नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज कोरड्या विहिरीत बसून सरकारचा निषेध केलाय.जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जमीन संपादित करू देणार नसून हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.
बाईट- दिलीप राठी, आंदोलक शेतकरी
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_121 दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे अमरावती 9503131919
आम्हाला आंदोलन करायची हौस नाही; बच्चू कडू यांची बावनकुळेंवर टीका, भर पावसात बच्चू कडूंच्या पदयात्रेला सुरुवात
अँकर :– प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. आजपासून बच्चू कडू 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. यात्रा काढली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावा पर्यंत ही पदयात्रा निघाली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनावर बावनकुळे यांनी टीका करत बच्चू कडू यांची भूमिका जूतापी असल्याचा म्हटला आहे याला बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिला आहे. पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही पदयात्रा सुरू राहणार असल्याच यांनी सांगितला आहे. आम्हाला आंदोलन करण्याची हाऊस नाही आमच्या मागण्या सरकारने मान्य करावे ही पदयात्रा जल्लोष यात्रा म्हणून असेही बच्चू कडू म्हणाले आहे. याविषयी पदयात्रेतून बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
121 :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेक
भर पावसात रखडलेले अनुदानासाठी शेतकरी बसले तहसीलच्या चिखलात....
तहसीलदार मात्र गायब.. शेतकऱ्यांचा आरोप
Anchor - मोताळा तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी भर पावसात ठिय्या दिला! "साहेब, पावसात उभं राहून तुमच्या सहीची वाट पाहतोय!" असं म्हणत बळीराजाने प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलंय. सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अद्यापही मिळालेलं नाही, यामुळे संतप्त शेतकरी आज मोताळा तहसील कार्यालयात पोहोचले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे, शेतकरी तिथे पोहोचल्यावर तहसीलदार मात्र 'गायब' झाले! असा आरोप शेतकरी शुभम घोंगटेनी केलाय. मोताळा तहसील बाहेर शेतकऱ्यांनी दिलेला ठिय्या हा केवळ अनुदानासाठी नव्हता, तर प्रशासनाच्या या असंवेदनशील वृत्तीचा निषेध होता. "बळीराजाला उपाशी ठेऊन, सरकारला दिवाळी साजरी करायची आहे का?" हा बोचरा प्रश्न आता मोताळ्याच्या पावसात भिजलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतोय.
byte - शुभम घोंगटे, शेतकरी
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0707_BHA_WATER_IN_HOUSE
FILE - 1 VIDEO
सिहोरा येथे पावसाचा पाणी शिरला घरात...
Anchor :- हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलं आहे.. तर रात्री पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील अरविंद राऊत यांच्या घरात पावसाचा पाणी शिरला असून संपूर्ण घर जलमय झाला आहे.. तर आणखी पावसाची संततधार सुरू राहिली तर जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत....
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_bjppraveshpkg
Feed by live u 51
Anchoe सध्या राज्यात महापालिका निवडणुकांसाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगलीय. भाजपाने शिंदे सेनेच्या नैसर्गिक स्पर्धक असलेल्या उबाठा वर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांना साम दाम दंड भेद नीती वापरत आपल्या पक्षात घेतले जातेय. नाशिक शहरात सध्या ही स्पर्धा टोकाला गेलीय.
Vo 1नाशिक शहरात सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी होताच महानगरप्रमुख मामा राजवाडे यांना नियुक्त करण्यात आले..मात्र त्यांच्यासह त्यांचे गुरु उपनेते सुनील बागुल यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले... त्यानंतर ते फरार झाले मात्र तीनच दिवसात भाजपा प्रवेश करण्यासाठी मुंबईत दिसले.. मात्र गुन्हेगारांना प्रवेश देण्यात येत असल्याचा राजकीय गदारोळा झाल्यामुळ हा प्रवेश टाळण्यात आला. यापूर्वीही सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या मुलावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर त्याचा प्रवेश झाल्याने भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. नाशीमध्ये उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते वसंत गीते यांनी याबाबत आरोप करत दबावणीती चा वापर होत असल्याचं सांगितले आहे
Byte वसंत गीतेज्येष्ठ नेते उबाठा
GFX 2017 महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 122 जागांवर 67 जागा जिंकून भाजप नंबर वन
शिवसेना 34 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 6 जागा तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर
मनसे घसरगुंडी होऊन पाचव्या स्थानावर
Vo 2 नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या 122 नगरसेवक आहेत.. यामध्ये उभा त्या गटातील 30 पेक्षा अधिक नगरसेवक हे शिंदे सेनेत गेले आहेत.. त्यामुळे भाजप आपली बाजू मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.. नाशिक महापालिकेत शत प्रतिशत भाजपचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे
Byte गिरीश महाजन वा राजकीय विश्लेषक
Vo 3 जसा जसा निवडणुका जवळ येतील तस तशी ही स्पर्धा टोकाला जाऊ शकते. मग त्यात पोलिसांचा वापर असो की चाणक्य नीति...भविष्यात नाशिक प्रमाणेच राज्यामध्ये चारही महानगरांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळू शकते
0
Share
Report
Akola, Maharashtra:
10 फाईल्स आहेत..PKG
Anchor : अकोल्यातील १३५ वर्षे जुनी ऐतिहासिक ' कच्छी मशिदी ' आता तंत्रज्ञानाशी जोडल्या गेली आहेय...मुस्लिम बांधवांना आता रोज होणारी अजान थेट मोबाइलवर एकता येणार आहेय..
Vo 1 : अकोल्याच्या १३५ वर्षे जुन्या ऐतिहासिक कच्छी मशिदीने “ कच्छी मशिदी अजान ॲप ” लाँच करून डिजिटल युगाकडे एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहेय...गुगल प्ले स्टोअर मधून “ कच्छी मशिदी अजान ॲप ” डाउनलोड केल्यानंतर आता या ॲपद्वारे शहरात, देशात किंवा परदेशात कुठेही उपस्थित असलेल्या व्यक्तीला मशिदीतून थेट अजान ऐकता येईल, ज्यामुळे वेळेवर नमाज अदा करणे शक्य होईल..सध्या देशात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहेय..आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी-मर्यादा मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढाकार घेत ही ॲप विकसित करण्यात आलीय..धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, कच्छी मशिदी ट्रस्टने पर्यावरण आणि सामाजिक सौहार्द लक्षात घेऊन ध्वनी प्रणाली नियंत्रित केली आहेय तसेच, नमाज्यांना सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आलाय..
Byte : जावेद झकेरिया ,कच्छी मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष..
Vo 2 : अजानचा आवाज प्रत्येक नमाज्यापर्यंत पोहोचावा यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहेय..
अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये :
* मशिदीशी जोडलेले पाचही वेळेचे थेट अजान..
* किब्ला दिशा जाणून घेण्याची सुविधा - कुठूनही योग्य दिशा..
* रमजान, जुमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांबद्दल वेळेवर माहिती..
* अचूक वेळेनुसार मशिदीशी थेट कनेक्शन..
* सोपा आणि स्मार्ट इंटरफेस..
* कार्यक्रमांची सूचना सुविधा
* तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल..
कच्छी मशिदीने सुरु केलेल्या या ॲपचा फायदा इतरही मशिदींनी घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहेय..
Byte : साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार..
Vo 3 : कच्छी मशीद ही विदर्भातील पहिली मशीद आहे, ज्याने नावीन्यपूर्णतेचाच एक भाग म्हणून हे मोबाइल अॅप सादर केले आहेय..
हुडाज टेक्नॉलॉजीज, पुणेने ही ॲप तयार केली आहेय.. इतर समाजाने देखील आता कच्छी मशिदीने सुरु केलेल्या या ॲपचे स्वागत केले आहेय..
Byte : प्रभतसिंग बछेर , स्थानिक नागरिक
Final Vo : कच्छी मशीदने ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध म्हणून विशेष ॲप विकसित केले आहेय...या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करत सामाजिक बांधिलकी जपण्यास सक्षम होणार हे मात्र निश्चित..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
*वर्धा स्टोरी*
SLUG- 0707_WARDHA_SUCIDE_PKGR1
- वर्ध्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीची 12 वी च्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने गळफास लावून आत्महत्या
- वर्ध्याच्या लोणसावळी गावातील धक्कादायक घटना
- घटनेमुळे लोणसावळी गावात उडाली खळबळ
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
*वर्धा स्टोरी*
SLUG- 0707_WARDHA_SUCIDE_PKG
- वर्ध्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीची 12 वी च्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने गळफास लावून आत्महत्या
- वर्ध्याच्या लोणसावळी गावातील धक्कादायक घटना
- घटनेमुळे लोणसावळी गावात उडाली खळबळ
अँकर - एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केल्या जातं आहे तर दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी बारावीची अदयाप प्रवेश न घेतल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावात घडलीय.सोनिया वासुदेव उईके(वय 17 वर्ष) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.या घटनेमुळे सर्वत्र लोणसावळी गावात खळबळ उडाली आहे.. पाहुयात पैशांअभावी सोनिया उईकेचा रिपोर्ट...
विवो - वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे वासुदेव उईके हे आपल्या पत्नी, मुलगा आणी मुलगी सोबत राहतात. वासुदेव हे शेतमजूरीचे काम करून आपली उपजीविका चालवतात तर त्यांचा मुलगा सुद्धा बाहेर कामावर जातो. वासुदेव यांची सतरा वर्षीय मुलगी सोनिया हि वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती व ती वर्धेतील आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत होती.सोनियाचे अकरावीचे अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्याने ती गावांत वडिलांकडे आली. सोबतच सण वारला सुद्धा ती घरी यायची. एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु न झाल्याने ती घरीच होती.यावर्षी ती बारावीत गेल्याने व शाळा सुरु झाल्याने वडिलांना वारंवार शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती. वडील आर्थिक अडचणीत असल्याने ते तू काही दिवस होस्टल मध्ये राह पैश्याची व्यवस्था करून प्रवेश करतो असं सांगत होते. मात्र अश्यातच आई, वडील व भाऊ कामावर गेल्याने घरी कोणीच नसल्याची संधी साधतं तिने पैश्या अभावी अद्याप प्रवेश न झाल्याने हाताश होऊन घरातील बाथरूमच्या टिनच्या अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केलीय.
बाईट- 121 वासुदेव उईके,विद्यार्थिनीचे वडील
विवो - वडील कामावरून परतल्यावर घरातील समोरचे दार उघडे दिसलें. वडिलांनी पाहणी केली असता घरात कोणी दिसलें नाहीय. तेवढ्यात मुलगा सुद्धा कामावरून आला आणी घरातील मधले दार लावून असल्याचे पाहिले. मुलगा हा घराच्या मागील बाजूने जाऊन पहले असता बाथरूममध्ये मुलगी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलीय. लागलीच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलीय. पोलिसांनी आकास्मिक मृत्युंची नोंद केली असून पुलगाव पोलीस तपास करत आहे.
बाईट - राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगावं
विवो- आत्महत्या करणाऱ्या सोनिया उईकेची हालकीची परिस्थिती होतीय..वडिलांना काम नसल्याने एका आठवड्यात प्रवेशासाठी पैसे देतो.. मात्र सोनिया जास्त डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या केली..जिल्ह्यात पाच आमदार आहेय.. पाच खात्याचे राज्यमंत्री लाभलेले असून पालकमंत्री देखील जिल्ह्यातच आहेय..एकही लोकप्रतिनिधी अजून पर्यंत कुटुंबाला भेटायला आला नाही..आदिवासी मंत्री उईके आहे आणि सोनिया उईके त्याचा समाजाची आहे पण मंत्र्यांनी अजून पर्यंत दखल घेतली नाही..शिक्षणाच्या नावावर काळाबाजार आहे.. पैशाअभावी आत्महत्या करावी लागत असेल तर शासनाने गंभीरतेने बघायला पाहिजे.. अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी केली आहेय..
बाईट- चंद्रशेखर मडावी,प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद
विवो- खासदार अमर काळे यांनी आत्महत्याग्रस्त उईके कुटूंबाला भेट देऊन सात्वन केले..आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या मात्र विध्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे हे शोकांतिका आहेय..जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेच शिक्षण खातं आहे..शिक्षण विभाग, प्रोजेक्ट अधिकारी,कोणत्याच अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही.. त्याची खंत देखील बोलून दाखविली आहेय..निर्लज्य सरकार आहे याची ही प्रचिती आहेय..झोपलेलं सरकार आहे या घटनेच्या माध्यमातून तरी कुंभकर्णी झोपेतून उठतील त्यानिमित्ताने मी करतो...या घटनेची आदिवासी मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला मदत करावी.. अशी दुसरी सोनिया घडू नये अशीच अपेक्षा मी करतोय अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहेय..
बाईट- अमर काळे, खासदार, वर्धा
फायनल विवो- विद्यार्थीनीला 12 व्या वर्गाच्या पैशासाठी आत्महत्या करावी लागत असेल तर पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं की सरकारच अपयश म्हणावं काही कळायला मार्ग उरला नाही..
मिलिंद आंडे ZEE 24 तास, वर्धा
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले!
धावत्या व्हॅनमधून विद्यार्थी पडताना सीसीटीव्हीत कैद
बेजबाबदार स्कुल व्हॅन चालकांवर आता तरी कारवाई होणार का?
Amb school van
Anchor अंबरनाथमध्ये धावत्या स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. स्कुल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खासगी अवैध स्कुल व्हॅन चालकांवर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जातोय.
Vo : अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी स्कुल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती. नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कुल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कुल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला, मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हे विद्यार्थी पडले. त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता, तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते. खासगी स्कुल व्हॅनच्या डिक्कीत अक्षरशः २०-२० मुलांना कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते, त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, आता तरी या अवैधरित्या स्कुल व्हॅन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कारवाई होते? की आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून देतात? हे पाहावं लागणार असून यानंतर पालकांमधून मात्र संताप व्यक्त होतोय.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report