Back
आदिवासी भागात एस टी बस आणि बोलेरो जीपचा भीषण अपघात!
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_Accident
Feed on - 2C
-------------------------
Anchor - एस टी बस आणि बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपचा चालक गाडीत अडकून पडला. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट च्या अंबाडी घाटात हा अपघात घडला. आज सकाळी 8 वाजेच्या सुमरास हा अपघात घडला. उनकेश्वर येथून एस टी बस मांडवी कडे जात होती. अंबाडी घाटात बोलेरो जीप आणि एस टी बसची समोरासमोर धडक झाली. बोलेरो जीपला एस टी बसने रस्त्याखाली फरफटत नेले. एस टी बसच्या समोरील भागात बोलेरो जीपचा चालकाच्या बाजूचा भाग अडकला. त्यामुळे चालक जिपमध्येच अडकून पडला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि नागरिकांनी चालकाला काढण्याचा प्रयत्न केला पण दोन तास उलटले तरी जि्पचालकाला बाहेर काढता आले नव्हते. जिपमध्ये केवळ चालकच होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
----------------------------
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Dhule, Maharashtra:
Anchor - महागाड्या बुलेट चोरणाऱ्या बुलेट राजाला त्याच्या साथीदारासोबत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हशवर्धन जगदाळे वय 22 व किरण कोळी या दोघांनी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा येथून चोरी केलेल्या 14 बुलेट पोलिसांनी जप्त केले आहेत. हर्शवर्धन हा स्वताला बुलेट राजा म्हणून गावात मिरवत होता. वेगवेगळ्या बुलेट त्यांच्याकडे असल्याने त्याच्यावर धुळे एलसीबी पथकाला संशय आला. हर्शवर्धन जगदाळे याला ताब्यात घेतले असता, त्याने त्याचा साथीदार किरण कोळी सोबत 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिली असून, लपवून ठेवलेल्या 14 बुलेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यां दोघांनी अजून कुठे अन्य गिन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
Byte :- श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- आज परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. पण परभणी तालुक्यातील पोखरणी फाटा येथिल चक्काजाम आंदोलन मात्र पावसा मध्येही सुरूच होते. भर पावसात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लाऊन धरली होती. तब्बल दोन तास परभणी गंगाखेड महामार्ग आंदोलकांनी आडवला होता. यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:-अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले असून नाशिक जिल्ह्यातला 60 टक्के कांदा खराब झाला आहे महाराष्ट्रात कांदा मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही याउलट कमी उत्पादन होत असलेल्या गुजरातमध्ये तेथील शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचे प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे गुजरात ने केले महाराष्ट्र केव्हा करणार असा सवाल कांदा उत्पादक संघटनेने उपस्थित केला असून महाराष्ट्र सरकारने तात्काळ पाचशे रुपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
ब्रेक
*भांडुप मधील महिंद्रा स्प्लेंडर या इमारतीमधील १५ वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा*
मित्राने मुलीला 21व्या माळ्यावरून ढकलल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड
अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल
दोघांमध्ये झालेल्या वादातून मुलाने मैत्रिणीला इमारतीवरून ढकलले
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME| 0107ZT_JALNA_ANDOLAN(2 FILES)
जालना | अतिवृष्टी अनुदान घोटाळयातील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहिक बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु
अँकर | जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळयातील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी सहभागी झाले आहेत.जिल्ह्यातील 63 हजार शेतकऱ्यांना रखडलेलं 2024 चं अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यात यावं. शेतकऱ्यांना व्हिके नंबर देण्यात यावा अशीही मागणी आंदोलकांनी केलीय.जोपर्यंत प्रशासन या मागण्यांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय.
बाईट : गजानन उगले शेतकरी
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0107ZT_WSM_BAD_PANDAN_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम तालुक्यातील देपुळ-आसेगाव शेत पांदण रस्ता पावसामुळे जल व चिखलमय झाला आहे.या मार्गावरून रोज शेकडो शेतकरी शेतकामासाठी ये-जा करत असून, महिलांसह वृद्ध व लहान मुलांनाही चिखमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास काही शेतकऱ्यांना शेतातच थांबावे लागते, तर काहींना पाण्यातून वाट काढावी लागते त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0107ZT_CHP_TADOBA_HIKE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणखी महागले ,सफारी दरात १ हजार रुपयांची प्रचंड वाढ , व्यवस्थापनाने ताडोबाचा कोअर भाग बंद होण्याच्या दिवशीच जाहीर केली दरवाढ, असंतोष टाळण्यासाठी केली चतुराई
अँकर:-- वाघांचे हक्काचे घर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प. मात्र या प्रकल्पात आता पर्यटन आणखी महागले आहे. व्याघ्र सफारीच्या दरात सरसकट १ हजार रुपयांची प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
आता एका फेरीसाठी
कोअर भागात सोम ते शनि प्रति जिप्सी 8800 रु.
शनिवार आणि रविवार 12,800 रु.
तर
बफर भागात
सोम ते शनि प्रति जिप्सी 6000 रु.
शनिवार आणि रविवार 7000 रु.
असे दर असतील.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कोअर भाग बंद होण्याच्या म्हणजेच 30 जून या दिवशीच ही दरवाढ जाहीर केली. पर्यटक- वन्यजीव प्रेमी आणि वाघ बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोअर भागातील पर्यटन आता थेट 1 ऑक्टोबर रोजी घडू शकणार आहे. अशा रीतीने असंतोष होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मात्र एक जुलै म्हणजे आजपासूनच बफर भागातील सहा प्रवेशद्वारातून होणारे पर्यटन नव्या दरानुसारच होणार आहे. व्यवस्थापनाने जिप्सी चालक आणि गाईड यांच्या सततच्या मागणीनुसारच ही दरवाढ तीही बैठक घेऊनच केल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे वन्यजीव प्रेमी व व्याघ्रप्रेमींनी आता ताडोबात जाऊच नये पर्यटन करूच नये अशा पद्धतीची ही दरवाढ असल्याची टीका केली आहे. ही दरवाढ करू नका, सामान्य लोकांना कमी किमतीत व्याघ्र दर्शन घडू द्या अशी मागणी ही केली जात आहे.
बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
बाईट २,)३) स्थानिक वन्यजीवप्रेमी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_UTTARAKHAND
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दहा ते बारा पर्यटक सहकुटुंब उत्तराखंड येथील चारधाम यात्रेसाठी गेले असून सध्या या ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या भागात 28 जून पासून अडकले आहेत.अनेक नदीवरील पूलांचे नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे.. जेवण खाण्याचं साहित्य कमी असल्यामुळे स्थानिक प्रशासन लवकरच यावर मार्ग काढू असा आश्वासन देत आहे मात्र यामध्ये महाराष्ट्र सरकारने देखील लक्ष घालून आम्हाला यातून सुखरूप बाहेर काढावे अशी विनंती पर्यटक करत आहेत
byte
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn rada av
vdo attached
जास्त हॉर्न वाजवला म्हणून ज्येष्ठ नागरिकांसोबत मुलीला धक्का बुक्की केल्याचा आरोप
संताप्त जमावाने तरुणाला दिला चोप, निराला बाजार येथील घटना
अँकर: नागमोडी पद्धतीने वाहन चालवत असल्याने चार चाकी चालकाने समोरच्या वाहनाला हॉर्न दिला. यावेळी वाहन चालकाने जेष्ठ नागरिक व महिलेला धक्काबुक्की केली. संतप्त झालेल्या जमावाने ज्येष्ठ नागरिक व तरुणीला धक्काबुक्की केली म्हणून चांगलाच चोप दिला. ही घटना निराला बाजार येथे घडली. काही नागरिकांनी तरुणाला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करीत आहेत.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
PKG
Sng_tadkadtai_pkg
स्लग - आली रे आली तडकडताई.. काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी तड्कडताईची अनोखे परंपरा .
अँकर - आली रे आली तड्कडताई..भुताची आई, अशी आरोळी सध्या सांगलीच्या रस्त्यांवर ऐकू येत आहे..ही तडकडताई पाहून मुलं धावत सुटतात.. काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप घेऊन रस्त्यावर धावणाऱ्या तडकडताईच्या मागे पुढे हजारो मुलांचा गलका असतो,ज्यामध्ये या तडकडताईच्या सुपांचा प्रसाद मुलांना खावा लागतो..पाहूया काय आहे,या सांगलीच्या तडकडताईची परंपरा..
व्ही वो - सांगलीच्या रस्त्यांवर सध्या तडकडताई प्रकट झाली आहे,त्यामुळे बाल गोपाळांची पाळता भुई थोडी झाली.अंगावर काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप,अशा रुपात प्रकट झालेली तडकडताई कोणा भुताचा अवतार नसून देवीचा अवतार म्हणून ओळखली जाते.दृष्टांचा संहार करणारी अश्या तडकडताईची ओळख आहे.
काय आहे तडकडताईची परंपरा..?
ग्राफीक्स इन
महिषासुर मर्दिनीचा अवतार म्हणून तडकताई ओळख आहे..
भावई यात्रेच्या निमित्ताने जोगण्या उत्सवाला सुरुवात होते.
जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्यनंतर सुरु होतो.
अमावस्येच्या दिवशी तडकडताईचा लग्न सोहळा पार पडतो.
त्यानंतर शहरातल्या गल्ली मधून तकडकड ताईचा संचार सुरू होतो.
अंगावर साडी,तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप असा तडकडताईचा अवतार असतो.
देवीचा अवतार आणि दैत्यांचा संहार करणारी म्हणून तडकडताईची ओळख आहे.
ग्राफीक्स आऊट
व्ही वो - तडकडताई भुताची आई,अशी आरोळी सांगली शहरातल्या गल्ल्या- गल्ल्यांमध्ये ऐकू येते आहे,हजारो मुलांचा गलका तडकडताईच्या मागेपुढे काळे म्हणत धावताना पाहायला मिळतो,काळी साडी, मुखवटा आणि हातात सूप घेऊन धावणारी ही तडकडताई मुलांना सुपांचा मार देखील देते.
बाईट - संजय चव्हाण - नागरीक,सांगली.
व्ही वो - सांगली शहरातल्या गावभाग येथील
कुंभार कुटुंबाकडून तडकडताईची परंपरा वर्षानुवर्ष जोपासली जात आहे,जेष्ठ महिन्यात अमावस्येला भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते.अमावास्यच्या दिवशी तडकड ताईचा जोगत्या त्याबरोबर विवाह पार पडतो आणि त्यानंतरही तडखळता येईल शहरातल्या कल्याणमध्ये संचार करू लागते.
बाईट - पार्वती कुंभार - परंपरा जोपसणारे कुटुंब - सांगली.
व्ही वो - खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपने प्रसाद देते,या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते, अशी अख्याइका आहे.अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते.तडकडताईचा दरारा हा खूप मोठा आहे.अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात.
बाईट - राहुल बोळाज - नागरिक - सांगली.
व्ही वो - तडकडताईची अश्या या परंपरेला कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा,मात्र संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आज २१ व्या शतकातही सांगलीकर मोठ्या उत्साहात जोपासता आहेत.
0
Share
Report