Back
वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी बस आगारात शाळा भरून केला सरकारचा निषेध!
MAMILIND ANDE
FollowJul 14, 2025 13:06:05
Wardha, Maharashtra
वर्धा स्टोरी
SLUG- 1407_WARDHA_BUS_STORY
चक्क बस आगरातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा
गेल्या कित्येक दिवसांपासून बस खेडेगावात येत नसल्याने विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय
वर्ध्याच्या तळेगांव बस आगारातील धक्कादायक प्रकार
बसेस गावांत येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप
अँकर - वर्ध्याच्या आष्टी तळेगाव भागात ग्रामीण भागात बस पोहचत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आहेय. खेड्या पाड्यात बस येत नसल्याने विदयार्थ्यांनी तळेगाव श्यामजी पंत येथील आगारात निवेदने दिलीय. पण प्रश्न सुटला नाही अखेर विदयार्थ्यांनी तळेगावच्या बस आगारात शाळा भरवून लक्ष वेधले आहे. बसेस गावांत येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप आहेय.
बाईट- चैतन्य हिरूरकर विद्यार्थी ( काळी t-शर्ट)
बाईट- विद्यार्थिनी (गुलाबी ड्रेस)
विवो- गेल्या महिन्याभरापासून गावात बस आली नाही अनेक विध्यार्थांचे शाळा बुडाली..तळेगाव पारडी रस्ता खराब असल्याचे कारण गावात बस फेऱ्या बंद करण्यात आल्या.. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तळेगांव बस आगारात शाळा भरवून सरकारचा निषेध केला आहेय..सत्र सुरू व्हायला एक महिन्याचा अवधी लोटून वेळा मात्र बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे एक-एक महिन्याचं शैक्षणिक नुकसान होत आहेय...
बाईट- तुषार नायकुजी,पालक ( निळे चेक्स चे शर्ट)
विवो- गावात एक महिन्यापासून पारडी-तळेगांव बस फिरकली नाही..आगार प्रमुखाला याबाबत विचारले असता पारडी गावाच्या रस्त्याचे काम सुरू आहेय..पावसामुळे खड्डे तयार झाले त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाश्यांचे नुकसान होऊ शकते..रस्ता बदलवून बस सुरू असल्याची प्रतिक्रिया आगर प्रमुख यांनी दिली आहेय..
बाईट - आनंदी बेलूरकर,आगार प्रमुख, ( लाल ओढणी )
फायनल विवो - जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगांव-पारडी गावात बस पोहचली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगारात पोहचत शाळा भरवत आंदोलन केले...आर्वीच्या दोन्ही आमदार विद्यार्थाना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी असल्याचे दिसते
सरकार कडून शिक्षणाचा गाजावाजा केला जातोय...वर्ध्यात शालेय शिक्षण राज्यमंत्र्याचा जिल्ह्यात नेमकं चाललं तरी काय असा सवाल उपस्थित होत आहेय..
मिलिंद आंडे ZEE 24 तास,वर्धा
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 14, 2025 17:00:16Vasai-Virar, Maharashtra:
Date-14juky2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI DRAWN
Feed send by 2c
Type-AV
Slug- वसईच्या चिंचोटी धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
अँकर - वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या सहा तरुणांपैकी दोन तरुणांचा बुडवून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....
पावसाळ्यात सहलीचा आनंद घेण्यासाठी मुंबईतील गोरेगाव परिसरातून सहा तरुण होण्यासाठी वसईच्या चिंचोटीत धबधब्यावर आले होते..
यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला...
प्रेम सहजराव व सुशील ढबाळे अशी मयत तरुणांची नावे असून ते दोघेही गोरेगाव परिसरात राहणारे आहेत...
या घटनेची माहिती वसई विरार पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्नांनी दोघांचे बुडालेले मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत...
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 14, 2025 16:31:45Ambernath, Maharashtra:
मुलीला नोकरी मिळवण्यासाठी आदिवासी दांपत्याचे धडपड संपली
दाम्पत्यान विषप्राशन करून संपवली जीवनयात्रा
Murbad suicide
Anchor मुरबाड तालुक्यातील सुकाळवाडी येथील बारवी प्रकल्पग्रस्त आदिवासी दांपत्याने कीटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे, गेल्या दोन वर्षांपासून आपल्या मुलीला नोकरी मिळण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यालयात चकरा मारत होते, मात्र पदरी निराशा पडल्याने त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली
Vo बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर प्रकल्पपीडित सुकाळवाडी या आदिवासी पाड्यातील मंगल उघडा आणि त्यांची पत्नी संगिता उघडा हे प्रकल्पग्रस्त दाम्पत्य होते . त्यांचा मुलगा करण हा नवी मुंबई महापालिकेत प्रकल्पग्रस्त म्हणून कामावर रुजू झाला होता , मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचा अपघाती मृत्यू झाला , त्याच्या पश्चात त्याची शासकीय नोकरी आपल्या मुलीला वर्ग करण्यात यावी या साठी उघडा दाम्पत्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे अनेक पत्र्यवहार करीत पायऱ्या झिजवल्या. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली ,धक्कादायक म्हणजे उघडा दांपत्यांनी डोंबीवली येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करून आमच्या जगण्याचे एकमेव साधन अर्थात त्यांच्या मुलीला नोकरीत रुजू करून न घेतल्यास आम्हाला पती- पत्नी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले होते.
Byte प्रकाश उघडा, पुतण्या
vo एमआयडीसीच्या पायऱ्या झिजवुन निराश झालेल्या उघडा दाम्पत्याने अखेर घरातच कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. आता उघडा दांपत्यांचे त्यांच्या मुली शिवाय घरात कोणीच नाही,
Byte कल्पना उघडा- मुलगी
Vo जोपर्यंत उघडा दाम्पत्याला न्याय तहसील कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे
Byteयोगिता शिर्के, माहिती अधिकार कार्यकर्ती
vo या हृदयद्रावक घटनेनंतर आता तरी एमआयडीसीला जाग येते का असा सवाल विचारला जातोय
चंद्रशेखर भुयार , मुरबाड
4
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 14, 2025 16:04:13Pandharpur, Maharashtra:
14072025
Slug - PPR_KARMALA_BJP
feed on 2c
file.03
-----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आठ ते दहा जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेला नाही.
करमाळा भाजपा शहाराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपात खळबळ उडाली आहे. कोयत्याने आणि काठ्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचे कारण अद्याप समोर आले नाही. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 14, 2025 16:03:39Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--1407ZT_CHP_POLICE_MARCH
( single file sent on 2C)
टायटल:--- चंद्रपूर शहरात अंमली पदार्थविरोधी रूट मार्च, सात महिन्यात 125 गुन्हे, पोलिसांचा जनजागृतीचा निर्धार, अमली पदार्थाच्या विळख्याविरुद्ध चंद्रपूर पोलीस मैदानात, नागरिकांना 112 वर माहिती देण्याचे आवाहन
अँकर:--- चंद्रपूर पोलीसांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी आज शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढला. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. आजच्या पिढीला व्यसनाचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थांच्या वापरामुळे होणारे नुकसान याची जाणीव करून देत, पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा संदेश दिला.गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी तब्बल 125 गुन्हे दाखल झाले असून, नागरिकांनी अशा कोणत्याही हालचालीची माहिती पोलिसांना त्वरित द्यावी, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांनी केले. कोणतीही शंका अथवा माहिती मिळाल्यास तात्काळ 112 क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बाईट १) सुधाकर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 16:02:13Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशन तर्फे राज्य सरकारच्या जाचक करप्रणाली विरोधात निषेध आंदोलन.
जाचक करप्रणाली के खिलाफ निषेध आंदोलन
ftp slug - nm hotel owner association
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशन तर्फे राज्य सरकारच्या जाचक करप्रणाली विरोधात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दारू वरील वॅट दुप्पट केलाय, परवाना शुल्कात 15% वाढ आणि एक्साईज ड्युटी मध्ये तब्बल 60 टक्क्यांची वाढ केल्याने आज नवी मुंबई हॉटेल असोसिएशनने आपले हॉटेल एक दिवस बंद ठेवत या निर्णयाचा निषेध केलाय. यामुळे अवैध व्यवसायात वाढ होणार असून हॉटेल व्यवसायाला मोठं नुकसान होणार आहे. हॉटेल व्यवसाय आजही इंग्रज काळातील नियमांनुसार चालत असून नवीन नियमप्रणाली लागू करत हाटेल व्यवसायिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.
बाईट -: दयानंद शेट्टी - अध्यक्ष नवी मुंबई हॉटेल असोसिएशन
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 14, 2025 15:37:34Vasai-Virar, Maharashtra:
Date-14july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI HOTELS
Feed send by 2c
Type-AvB
Slug- वसईत हॉटेल व्यावसायिकांचे शासनाविरोधात आंदोलन
अँकर - राज्य उत्पादन शुल्क आणि वार्षिक उत्पादन शुल्का मध्ये शासनाने केलेल्या करवडीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायिक कडून एक दिवसीय आंदोलन करण्यात आले...
वसई विरार हॉटेल असोसिएशनने देखील या आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवून वसई दत्तानी मॉल येथे आंदोलन केले...
वसई तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांनी आज दुपारी वसई तहसील कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्याची तयारी केली होती.. मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाकडून या मोर्चाच परवानगी नाकारण्यात आली.. त्यामुळे सर्व हॉटेल व्यवसायिकांनी मोर्चा रद्द करत दत्तानि मॉल येथे एकत्र जमून शासनाच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला... 500 पेक्षा अधिक हॉटेल व्यवसाय या आंदोलनात सहभागी झाले होते...
शासनाने लादलेल्या करवाडी विरोधात फेरविचार करावा, अन्यथा आमचे हॉटेल चे परवाने सरकारकडे सरेंडर करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे मत हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केले...
4
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 14, 2025 15:37:25Mumbai, Maharashtra:
फ्लॅश:-
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू
या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे
सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे खालील दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अंधेरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवे बाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे.
अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे बंद असल्यामुळे वाहन चालक गोखले पुलाचा वापर करावी असा सूचना दिला जात आहे...
0
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 14, 2025 15:00:48Thane, Maharashtra:
गेल्या दहा दिवसापासून अहमदपूर ते मंत्रालय पायी खांद्यावरती नांगर घेऊन चालणाऱ्या सहदेव होनाळे या शेतकरीची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याला ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे
या शेतकऱ्यावर असणाऱ्या सहकारी गणेश सूर्यवंशी हा देखील त्याच्यासोबत आहे
शेतकऱ्यांचे कर्जमाफी पिकाला हमीभाव मिळावा यासाठी अहमदपूर ते मंत्रालय असा पाई प्रवास ...
शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील ठाणे जिल्हा मध्ये शेतकऱ्याला भेटण्यासाठी आले आहे....
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 14, 2025 14:31:49Yavatmal, Maharashtra:
Anchor : शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या २४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार आणि दोन ऑक्टोबरला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज यवतमाळच्या अंबोडा येथे समारोप झाला. यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील आणि सत्यपाल महाराज उपस्थित होते.
भाजप ने पुंण्यापेक्षा पाप जास्त केले. आणि हे पाप असेच वाढत जाणार आहे. शेतकरी एकवटत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही ताकद जातीवाद व धार्मिक वाद करून संपविल्या जाऊ शकते. आता कर्जमाफीसाठी बँकेचा मॅनेजर आला तर त्याला झोडून काढा.
जोपर्यंत कर्ज माफी नाही तोपर्यंत वसुली नाही.
कोणी वसुलीसाठी आल्यास बच्चू कडू स्वतः येऊन ठोकणार. असाही ईशारा त्यांनी दिला.
ही लढाई कर्जमाफीची असून पुढची लढाई हमीभावाची राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाईट : बच्चू कडू
आमदार रोहित पाटील यांनी सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर सडकून टीका केली. द्राक्ष उत्पादक मतदारसंघातून निवडून आलेल्या सध्याच्या कृषिमंत्र्याला द्राक्ष कसे उगवतात हे देखील कळत नाही त्यामुळे ज्याला शेतीतलं कळतं असाच कृषिमंत्री असायला हवा. कृषिमंत्रीकरतात, ढेकळ मातीत आहे की त्यांच्या बुद्धीत असा प्रश्न पडत असल्याची टीका रोहित पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे बच्चू कडून सोबत आपण आहोत, त्यासाठी रक्त सांडवण्याची गरज पडली तरी सोबत राहणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.
बाईट : रोहित पाटील
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 14:30:45Navi Mumbai, Maharashtra:
story slug - उरण मद्ये ओला चालक आणि रिक्षा यामद्ये वाद व्हायरल व्हेएडिओ
उरण मे ओला कॅब और रिक्षा मे भाडा लेने पर दंगा
FTP slug - uran ola & local auto isssu
shots- virel video
reporter- swati naik
navi mumbai
anchor - उरण रेल्वे स्थानक परिसरात स्थानिक रिक्षा चालक आणि ओला टॅक्सी चालकामध्ये वाद.
ग्राहकाने उलवे येथे जाण्यासाठी रिक्षा ऐवजी ओला टॅक्सी बुक केल्याने झाला वाद.
काहीवेळाने हा वाद भाषेवर येऊन ठेपला, स्थानिक रिक्षा चालकांनी मराठी बोलण्याचा केला आग्रह.
आमच्या एरिया मध्ये येऊन भाडे का घेतो असे म्हणत वादाला झाली होती सुरुवात.
उरण पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
gf-
--------------------------------
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 14, 2025 14:04:40Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_MLA_Audioclip
Feed on - 2C
--------------------------
Anchor - भाजपच्या आमदारांनी जिल्हा उपनिबंधकांना शिवीगाळ करत कपडे काढून मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी शिवीगाळ केलेली ही ऑडिओ क्लिप आहे. नरसी सेवा सहकारी सोसायटी बाबतच्या विषयावर बोलताना हा प्रकार घडलाय. मुखेड चे भाजपचे आमदार तुषार राठोड यांनी नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांना फोन केला होता. मला विचारल्याशिवाय कोणत्याही नियुक्त्या करायच्या नाहीत असे आमदार राठोड यांनी भिल्लारे यांना सांगितले. त्यानंतर आमदार राठोड यांनी आपला फोन आमदार राजेश पवार यांना दिला. राजेश पवार यांनी नरसी सहकारी सोसायटीच्या विषयावरून जिल्हा उपनिबंधक भिल्लारे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुम्ही शासन आणि आमदारांच्या विरोधात जाऊन लाच घेऊन चुकीचे निर्णय घेत आहात असे आमदार पवार या क्लिपमध्ये म्हणत आहेत. लाचेचे पैसे काय करणार असे म्हणताना पवार यांनी शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये आहे. शेवटी कपडे काढून मारण्याची धमकीही ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या नांदेडमध्ये व्हायरल होत आहे. रविवारी सायंकाळी मला आमदारांनी फोनवरून मारण्याची धमकी दिली. माझ्या जीवाला धोका असल्याने मी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांनी सांगितले. दरम्यान ही ऑडिओ क्लिप माझी नसून ए आय टेक्नॉलॉजी किंवा तत्सम यंत्रनेचा वापर करून ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात असल्याची तक्रार आमदार राजेश पवार यांनी केल्याचे पोलीस अधीक्षकांनी संगीतले. याबाबत चौकशी करून पुढील करावाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितली.
Byte - अशोक भिल्लारे - जिल्हा उपनिबंधक
Byte - अबिनाशकुमार - पोलीस अधीक्षक, नांदेड.
----------------
टीप - सुरुवातीला क्लिपमध्ये आमदार तुषार राठोड बोलत आहेत. त्यांनंतर त्यांनी आमदार राजेश पवार यांना फोन दिला.
4
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 14, 2025 13:36:30Beed, Maharashtra:
बीड : गायरान जमिनीच्या प्रश्नावर माजलगावात धडक मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग..!
Anc : बीड जिल्ह्यात सध्या गायरान जमिनींचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील गायरान जमिनींवर पवनचक्क्यांची उभारणी करण्यात आल्याचा निषेध करत मानवी हक्क अभियान यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नागरिकांनी वहितीमध्ये असलेल्या गायरान जमिनी संबंधित लाभार्थ्यांच्या नावे करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. गावागावातील शेतकऱ्यांना या जमिनीवर हक्क मिळावा, यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष रस्त्यावर उतरले होते.
बाईट: राजेश क्षीरसागर, मानवी हक्क अभियान
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 14, 2025 13:05:46Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाच्या कालावधीत साईंच्या चरणी भरभरून दान..*
साई संस्थानच्या वतीने करण्यात आलं होत तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाचे आयोजन...
गुरुपोर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी तब्बल 6 कोटी 31 लाख 31 हजार रुपयांचे दान..*
साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माध्यमांना माहिती..
गुरुपोर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त साईदरबारी...
*असं मिळालं साईबाबांच्या चरणी दान -*
रोख स्वरुपात 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 दक्षिणा पेटीत प्राप्त
देणगी काऊंटर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये प्राप्त
पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी 55 लाख 88 हजार 200 प्राप्त
डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून - 2 कोटी 5 लाख 76 हजार 626
सोने 668 ग्रॅम रक्कम रुपये 57 लाख 87 हजार 925 रुपये
चांदी 790.400 ग्रॅम रक्कम रुपये 5 लाख 85 हजार 879 रुपये
*एकूण रुपये - 6 कोटी 31 लाख 31 हजार 362*
bite - ceo gorskh gadilkar
1
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 14, 2025 12:37:53Ambernath, Maharashtra:
अंगावर पेट्रोल ओतून कर्जबाजारी तरुणाने जीवन संपवलं..
आंबरनाथच्या मलंगडच्या कुशिवली गावा जवळ केली आत्महत्या
ऑनलाईन गेमिंगमध्ये कर्जबाजारी झाल्याची प्राथमिक माहिती
Amb suicide
Anchor कर्जबाजारी झालेल्या तरुणाने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या कुशीवली गावाजवळ घडली आहे , किरण परब असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो कल्याण पूर्वेतील संतोष नगर मध्ये राहायला होता . किरणवर खाजगी बँकेचे कर्ज होते. तर आईच्या दागिन्यांवर देखील त्याने कर्ज घेतल होत. किरण ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झाला होता त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हिललाईन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना प्रकाराची माहिती देत मृतदेह शविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report