Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

बच्चू कडूचा इशारा: २४ तारखेला महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन!

SRSHRIKANT RAUT
Jul 14, 2025 14:31:49
Yavatmal, Maharashtra
Anchor : शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या २४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार आणि दोन ऑक्टोबरला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज यवतमाळच्या अंबोडा येथे समारोप झाला. यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील आणि सत्यपाल महाराज उपस्थित होते. भाजप ने पुंण्यापेक्षा पाप जास्त केले. आणि हे पाप असेच वाढत जाणार आहे. शेतकरी एकवटत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही ताकद जातीवाद व धार्मिक वाद करून संपविल्या जाऊ शकते. आता कर्जमाफीसाठी बँकेचा मॅनेजर आला तर त्याला झोडून काढा. जोपर्यंत कर्ज माफी नाही तोपर्यंत वसुली नाही. कोणी वसुलीसाठी आल्यास बच्चू कडू स्वतः येऊन ठोकणार. असाही ईशारा त्यांनी दिला. ही लढाई कर्जमाफीची असून पुढची लढाई हमीभावाची राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट : बच्चू कडू आमदार रोहित पाटील यांनी सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर सडकून टीका केली. द्राक्ष उत्पादक मतदारसंघातून निवडून आलेल्या सध्याच्या कृषिमंत्र्याला द्राक्ष कसे उगवतात हे देखील कळत नाही त्यामुळे ज्याला शेतीतलं कळतं असाच कृषिमंत्री असायला हवा. कृषिमंत्रीकरतात, ढेकळ मातीत आहे की त्यांच्या बुद्धीत असा प्रश्न पडत असल्याची टीका रोहित पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे बच्चू कडून सोबत आपण आहोत, त्यासाठी रक्त सांडवण्याची गरज पडली तरी सोबत राहणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. बाईट : रोहित पाटील
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top