Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव में पाझर तलाव टूटे: सांसद ओमराजे निंबाळकर का ताबड़तोड़ दौरा

DPdnyaneshwar patange
Sept 21, 2025 06:03:32
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव: DHARA_MP_VISIT भूम परिसरात पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकरांकडून पाहणी दुचाकीवर प्रवास करत खासदार ओमराजे निंबाळकर थेट शेतकऱ्याच्या बांधावर साबळेवाडी पाझर तलाव फुटल्याने भोनगिरी शिवारात शेकडो एकर शेत जमिनीचे नुकसान शेतातलं उभं पीक वाहून गेलं, शेतात दगड गोट्यांचा खच, विहिरी बुजल्या, पाईपलाईन उघड्या पडल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नुकसानीची पाहणी करत अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळून देण्याचं आश्वासन
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 21, 2025 07:04:26
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2109ZT_CHP_DEVI_PREP ( single file sent on 2C) टायटल :--- नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्तीवर फिरविला जातोय अंतिम हात, सजावटीसाठी कार्यकर्त्यांची लगबग  अँकर :---  शारदीय नवरात्रोत्सवासाठी चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात देवीच्या मूर्तीवर अंतिम हात फिरविला जात आहे.  कारागीरांनी मातीतून व शाडूमातीपासून आकर्षक अशा मूर्ती साकारल्या आहेत. कार्यशाळांमध्ये रंगकाम व सजावटीची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागीर नवीन डिझाईन्स, सुबक आकार आणि भक्तांच्या श्रद्धेला साजेशा मूर्ती घडवत आहेत. पारंपरिक तसेच आधुनिक सजावटीच्या देवींची मोठ्या उत्साहात निर्मिती सुरू आहे. बाजारपेठेत पुजेच्या साहित्याची खरेदी होत असून, भक्तांच्या उत्साहामुळे मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. बाईट १) ,२) मूर्तिकार  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 21, 2025 07:04:07
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 07:03:56
Beed, Maharashtra:बीड: मंत्री पंकजा मुंडे, दसरा मेळावा 121 pointers - भगवान भक्ती गडावरील मेळाव्याची तयार लोकच करतात. मी सध्या पीक पाहणी मध्ये आहे. दसरा मेळाव्यासाठी आम्ही अनेक गाड्या लावल्या आहेत असे ग्रामीण भागातून मला तरुणांचे फोन येत आहेत. त्यांच्या तयारीपासून मला नतमस्तक व्हावेच लागते. - आमचा मेळावा सीमिलोलंघनाचा आहे. त्याची प्रथा आहे. अनेक वर्षापूर्वीचा परंपरेचा आमचा मेळावा आहे. हा मेळावा आधीपासूनच आहे. आता काही विशिष्ट कारणासाठी म्हणून हा मेळावा आयोजित नाही. - आम्ही विचारांचं सोनं लुटतो... पुढची दिशा घेतो आणि जातो - भगवान भक्ती गडावरील मेळाव्याला लोक स्वतःहून येतात. - 370 चा निर्णय झाला होता तेव्हा आम्ही अमित शाह यांना बोलावले होते. यंदा कोणाला बोलवायचे ते आणखीन ठरले नाही. -
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 21, 2025 06:47:35
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 21, 2025 06:35:23
Pandharpur, Maharashtra:21092025 slug - PPR_SENA_WAAD file 03 ----- Anchor -सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत कलह सुरूच आहे. करमाळा येथील शिवसेना ( शिंदे गट) पदाधिकाऱ्यात सुरू असलेला वाद पोलिस स्टेशन पर्यंत गेला आहे. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेनेचे 2024 चे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या विरोधात पोलिसात दमबाजी केल्याची तक्रार करमाळा पोलिसात दाखल केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात असल्याने नुकतेच प्रा शिवाजीराव सावंत यांनी शिवसेना सोडली आहे. पोलीस तक्रारीत महेश चिवटे यांनी म्हटले आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे हे पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील खडकी येथे आले होते. त्यावेळी समोरून आलेले दिग्विजय बागल यांनी माझ्यापासून फूटभर अंतरावर थांबले आणि स्वतःच्या हातातील घड्याळ काढून एका समर्थक कार्यकर्त्याकडे देऊन आज याच्याकडे बघूनच घेतो म्हणत दमबाजी केली. यावेळी भाजपचे रामा ढाणे हे महेश चिवटे यांच्या बाजुला उभा राहिले त्यामुळे वादाचा प्रसंग टळला गेला. ढाणे समोर येताच दिग्विजय बागल मागे सरकले.मिशीवर ताव मारणे,कॉलर ओढणे,हात जोडणे अशा कृती करून तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे दमबाजीचा प्रकार सुरू होता. असे महेश चिवटे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याबाबत महेश चिवटे यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसात तक्रार नोंदवून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांच्याकडे सोपविला आहे. ------ PPR_SENA_WAAD_1 दिग्विजय बागल
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 21, 2025 06:34:58
kolhapur, Maharashtra:Ngp rss wkt live u ने फीड पाठवले( मराठी आणि हिंदी WKT आहे ) -------- ---- या पथसंचलनाबाबत माहिती देणारा आढावा घेणाराwkt केला आहे GFX IN *27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन* *नागपुरात आत्तापर्यंत झालेले सगळ्यात मोठे पथसंचलन असणार* *कस्तूरचंद पार्क,हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम येथून निघणार पथक* *व्हेरायटी चौकात तिन्ही पथक येणार एकत्र* *27 सप्टेंबर 1925 ला झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना* GFX Out नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचच्या स्वयंसेवकांचे नागपुरात 27 सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा शताब्दी वर्ष निमित्याने दोन ऑक्टोबरला विजयादशमी भव्य असा सोहळा होणार आहे... मात्र तत्पूर्वी 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठे पथसंचलन होणार आहे... 27 सप्टेंबर 1925 लाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.त्याऔचित्याने या पथसंचलनाच आयोजन करण्यात आले आहे... तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील...एक पथक कस्तुरचंद पार्क येथून दुसरे पथक यशवंत स्टेडियम आणि तिसरे पथक हॉकी मैदान येथून मार्गक्रमण सुरु करतील.. व्हेरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ तिन्ही पथक एकत्रीत दिसतील ... यावेळी सरसंघचालकही या पथसंचालनाचे अवलोकन करणार आहे..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 21, 2025 06:32:30
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2109ZT_CHP_NO_BAG_STORY_1_2 ( 2 file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर मनपाच्या वतीने दर शनिवारी दप्तरविना शाळा उपक्रम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे "दप्तरविना शाळा" हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरा विना शनिवार हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येतो. यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून थोडी विश्रांती देऊन आनंदाने व खेळकर पद्धतीने शिक्षण घडवणे हा आहे.शाळांत शब्द शोध कोडे ,समान वस्तू शोधणे,समान चित्रांमधील फरक शोधणे,शब्दकोडे सोडवणे,चित्र रंगवणे इत्यादी कुतूहल वाढविणारे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना अधिक उत्साहवर्धक व सृजनशील अनुभव देण्यासाठी काही अनोखे उपक्रम देखील घेण्यात आले. त्यामध्ये डोळे बंद करून डोक्यावरील बाटली न पडता चालण्याचा खेळ,कृतीयुक्त गीत सादरीकरण,टोपी बनवणे,"माझ्या जीवनातील मजेशीर प्रसंग" या विषयावर लेखन करणे असे उपक्रम विविध शाळांत घेण्यात आले. या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. खेळता-खेळता त्यांनी विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा उत्तम वापर करून आनंद लुटला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. मुलांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त करून खेळता-खेळता शिकविणे हीच खरी नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती आहे. असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे. बाईट १) लता कुमरे, मुख्याध्यापिका आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 21, 2025 06:23:03
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2109ZT_CHP_TIGER_CAGED ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली येथे धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद, हल्ल्यात महिला शेतकऱ्याचा गेला होता जीव अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते. 18 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने लावारी परिसरात पिंजरे लावून वनपथके तैनात केली होती. वनविभागाच्या या प्रयत्नांना यश आले. वाघाला जेरबंद केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून वन्यजीव शुश्रुषा केंद्रात रवाना करण्यात आले. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 21, 2025 06:20:50
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri ss ubt kailas puri pune 21-9-25 feed by 2c अजित पवारांचं परिवार मिलन, संजोग वाघेरेंच्या पत्नीशी चर्चा. उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? Anchor : पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्याच्या दृष्टीने अजित पवार कंबर कसतायेत. याचं दृष्टीने अजित पवार आता उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आज अजित पवार शहरात आहेत आणि परिवार मिलन घडवत आहेत. याचं प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंच्या पत्नी उषा वाघेरेंशी अजित दादा आज चर्चा करणार आहेत. त्यामुळं संजोग वाघेरे मशालीच्या हाती पुन्हा एकदा घड्याळ बांधतील अशी चर्चा रंगलेली आहे. मुळात मी शिवसेनेत असलो तरी माझ्या पत्नी आज ही राष्ट्रवादीतचं आहेत आणि मी तूर्त तरी शिवसेनेत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पाहुयात, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाचे संकेत ही दिलेत. त्यांच्याशी संवाद साधलाय कैलास पुरी यांनी...! kailas 1 to 1 : संजोग वाघेरे - शहराध्यक्ष, ठाकरेंची शिवसेना
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 21, 2025 06:00:45
Thane, Maharashtra: आरोग्य विभागाच्या ‘स्वस्थ नारी - सशक्त परिवार’ अभियानांतर्गत खर्डी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन... ॲंकर... देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय, खर्डी येथे ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत एक विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पोषण जागरूकता, तसेच विविध तपासण्या आणि लसीकरण यांचा समावेश होता. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे ‘Nutrition Corner’, ज्यामध्ये विविध फळे, भाज्या आणि अन्नघटकांमधील जीवनसत्त्वांची माहिती चार्टच्या माध्यमातून देण्यात आली. शिबिरादरम्यान हिमोग्लोबिन, C.Y.T.B., सिकलसेल, रक्तशर्करा, ब्लड ग्रुप तपासणी,स्तन, गर्भाशय, मुख व दंतरोग तपासणी, गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, झिरो ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात मोठ्या प्रमाणावर महिला रुग्ण, विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावकरी यांची उपस्थिती लाभली. या अभियानाचा लाभ आजुबाजूच्या भागातील 300 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 21, 2025 06:00:32
kolhapur, Maharashtra:GFX IN *27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन* *नागपुरात आत्तापर्यंत झालेले सगळ्यात मोठे पथसंचलन असणार* *कस्तूरचंद पार्क,हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम येथून निघणार पथक* *व्हेरायटी चौकात तिन्ही पथक येणार एकत्र* *27 सप्टेंबर 1925 ला झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना* GFX Out नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचच्या स्वयंसेवकांचे नागपुरात 27 सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा शताब्दी वर्ष निमित्याने दोन ऑक्टोबरला विजयादशमी भव्य असा सोहळा होणार आहे... मात्र तत्पूर्वी 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठे पथसंचलन होणार आहे... 27 सप्टेंबर 1925 लाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.त्याऔचित्याने या पथसंचलनाच आयोजन करण्यात आले आहे... तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील...एक पथक कस्तुरचंद पार्क येथून दुसरे पथक यशवंत स्टेडियम आणि तिसरे पथक हॉकी मैदान येथून मार्गक्रमण सुरु करतील.. व्हेरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ तिन्ही पथक एकत्रीत दिसतील ... यावेळी सरसंघचालकही या पथसंचालनाचे अवलोकन करणार आहे..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 21, 2025 06:00:25
kolhapur, Maharashtra:Ngp wadetiwar byte live u ने फीड पाठवले =--------- नागपूर बाईट -विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते *ऑन अदानी सिंमेट कंपनी* राज्यात शेतकरी विरोधी भुमिका कशी असू शकते ते सरकार दाखवून देत आहे... अदानी अबूजा सिमेंट ला शेतकऱ्यांची खरेदी करायची होती जनसुनावणी झाली पण ती जमिनी खरेदी करायला पाहिजे होतं पण कोरपना तालुक्यातील लोक सुनवावीत जमिनी घेतल्या असत्यात तर त्यांना नोकऱ्या द्याव्या लागल्या असत्या... शेकडो शेतकऱ्याची फसवणूक करण्याचे काम सरकार करत आहे.... खाजगी कंपन्यानी 100 कोटी रुपये कमावलं आहे... महसूल मंत्री कुठे झोपले आहे.. प्रशासन कुठे झोपले आहे *ऑन जरांगे दंगली* हात होता म्हणूनच दंगली घडल्या नाहीत... हात नसता आणि होता म्हणूनच दंगली घडल्या नसाव्यात असे आमचे मत आहे. *ऑन लक्ष्मण हाके*. तो व्हिडिओ मी पूर्णपणे पाहिला.. लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करीत आहे. सगळीकडे त्यांना लोक बोलवत आहे. एखादी सभेसाठी जर पैसे मागितले असेल तर या चुकीच काय आहे. त्याला बदनाम करण्यासाठी त्या नालायकाने षडयंत्र रचले आहे.. लक्ष्मण हाके यांनी स्वतःहून पैसे मागितले नाही.. यात चूक काय आहे ओबीसीचे एवढे आंदोलन झाले... यांनी पैसे घेतले नाही का हे फुकट थोडी झाले.... *ऑन चंद्रशेखर बावनकुळे मराठा जीआर* गैरसमज त्यांनी करू नये ओबीसींना फसवण्यासाठी... आमची विनंती आहे बावनकुळे साहेबांना उद्याची पिढी यांना माफ करणार नाही कारण हे सत्तेत आहेत.. गैरसमज आमचा झाला नाही. तर तुमचा झालेला आहे. जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाका... ओबीसीची उद्याची पिढी उध्वस्त होईल. उध्वस्त पिढी जर झाली तर जबाबदार तुम्ही असाल... *ऑन संजय गायकवाड* ज्याला जशी सवय तशी वक्तव्य... खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे बोके म्हणजे बोकड... त्यांच्या पोटात होतं... ते ओठात आलं.. संजय गायकवाड हे सत्य बोलतात.. आणि सत्य करतात 3 कोटी रुपये आणि 100 बोकड.... किती बोकडा पोसुन ठेवले आणि किती कोटी जमा केले आणि किती कोटी वाटणार आहेत.. आम्हाला निवडणूक आयोगाला सांगावा लागेल... की यांच्यावर लक्ष ठेवा किती कोटी देतो तीन कोटी की चार कोटी देतो.. शंभर बोकडा देतो की दोनशे बोकड देतो... लक्ष ठेवायसाठी पत्र लिहायला लागेल... *ऑन स्वबळाची तयारी* प्रदेशाध्यक्ष यांनी भूमिका ठरवली आहे. बैठकीमध्ये जे ठरवलं आहे. स्थानिक स्तरावर जिथे आघाडी असेल तिथे आघाडी करा. त्या संदर्भात आमची उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बैठक झाली आहे या चर्चेमध्ये.. स्थानिक पातळीच्या नेत्यांनी बैठक घेऊन चर्चा करावी असं ठरलं... *ऑन अतिवृष्टी* भिकारी झालेलं सरकार आहे संपूर्ण महाराष्ट्राला या सरकारने लुटलेला आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची आहे.... ज्या सरकारने महाराष्ट्र लुटलेला आहे .कर्जबाजारी केलेला आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी त्यांनी केला पाहिजे नियम गुंडाळून कायदे गुंडाळून ते केलं आहे. तिजोरीची परवा न करता ते सत्तेत आले... महाराष्ट्र विकून त्यांना सत्तेत यायचं होतं ते आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही.. सरकारची शेतकऱ्याबद्दल भूमिका हि दुप्पटी असल्याचे समजत आहे. 32 लाख हेक्टरच्या नुकसान अनेक भागांमध्ये झालेला आहे. अनेक पिकं खरिपाची हातातून गेली आहे.. त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती.. निवडणूक पूर्वी तीन हेक्टर पर्यंत मदत हवी होती.. मात्र आता यांनी जीआर बदललेला आहे. आता हि सरकार एक हेक्टरवर आले आहे.. ते पैसे कधी मिळतील याचा आता भरोसा नाही. उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे.50 हजार हेक्टर मदत जर केली तर शेतकरी सावरेल. पण बिल्डरांना पोसनारं सरकार... धन बलाढ्यांचा मागे उभे असणारे हे सरकार. ठेकेदाराकडून पैसे खाणार सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार.
0
comment0
Report
Advertisement
Back to top