Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील खचलेले रस्ते: कामाची गती अत्यंत संथ!

SMSarfaraj Musa
Jul 11, 2025 01:01:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरील खचलेल्या रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून संथ गतीने,कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्न ! अँकर - सांगलीच्या मिरजेमध्ये नागपूर- रत्नागिरी महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूला जवळ खचलेल्या रस्त्याचे काम दोन महिने उलटून गेले,तरी अद्याप पूर्ण झालेलं नाही. अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे,त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे.मात्र महामार्गावरील रस्ता अवघ्या 2 वर्षात खचल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे,धक्कादायक बाब म्हणजे महामार्गावरील या पुलाखालून मिरज -पंढरपूर रेल्वे वाहतूक सुरू असते,भराव अधिक खचला असता तर एखादी मोठी दुर्घटना घडली असती,अशी भीती व्यक्त केली जात आहे,महामार्गाच्या ठेकेदाराकडून आता खचलेला भराव पुन्हा टाकून महामार्गाच्या रस्त्याचं काम करण्यात येत आहे,मात्र गेल्या दोन महिन्यांपासून काम सुरू असून अत्यंत संथ गतीने हे काम चालू आहे,त्यामुळे काही अंतर वाहनधारकांना एकेरी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.ज्या पद्धतीने रेल्वे उड्डाण पुलावरील भराव खचला,ते पाहता महामार्गावरील इतर रेल्वे उड्डाणपूलांच्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज असल्याचं मागणी होत आहे,या नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील खचलेल्या रस्त्याचा आढावा घेतला आहे,आमची प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.. WKT
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top