Back
गावात १०० कोटींची बँकिंग उलाढाल: काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप!
SRSHRIKANT RAUT
FollowJul 07, 2025 04:05:45
Yavatmal, Maharashtra
AVB
Anchor : गावात रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांचे बँकेत खाते उघडून त्यात मार्च ते जून २०२५ या तीन महिन्यांत तब्बल १०० कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे. यवतमाळच्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झालेली ही उलाढाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाल्याचा आरोप आहे. चोपण, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या तक्रारीनुसार मयूर चव्हाण याने आधार कार्ड आणि विविध कागदपत्र घेतले होते, त्यानंतर गावातील किरण राठोड याच्या खात्यात एक कोटी १६ लाख रुपये आले आणि काही वेळातच ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाल्याची माहिती मिळाली. हा प्रकार माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांना समजतात त्यांनी बँकेकडे विचारणा केली; असाच प्रकार शेकडो खात्यांमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला.
पांढरकवडा पोलीसांकडे या प्रकरणी तक्रार दिली मात्र पोलीसही कारवाई करीत नसल्याचा आरोप बोरेल यांनी केला आहे.
बाईट : विवेक जाधव : युवक
संतोष बोरेले : माजी नगराध्यक्ष
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowJul 10, 2025 04:01:44Nashik, Maharashtra:
nsk_tahsildaraarest
feed by 2C
anchor जन्मप्रमाणपत्र घोटाळ्यातील संशयित निलंबित नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना दाखल दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तहसीलदार विशाल सोनवणे यांनी जानेवारी २०२५ मध्ये छावणी पोलिस ठाण्यात बनावट जन्मप्रमाणपत्रप्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात नायब तहसीलदार धारणकर यांना आरोपी करण्यात आले आहे. पदाचा गैरवापर करत कागदपत्रांची शहानिशा न करता आर्थिक लाभासाठी जन्मप्रमाणपत्र दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्याने धारणकर दाम्पत्याला पोलिसांनी गेल्या महिन्यात नाशिकमधून अटक केली. सध्या पहिल्या गुन्ह्यात धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली हे न्यायालयीन कोठडीत होते.
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 10, 2025 04:01:35Ratnagiri, Maharashtra:
Anchor - कोकणात वर्षा ऋतूमध्ये निसर्ग अधिक बहरतो. त्याच उंच उंच कडेकपाऱ्या आणि डोंगर रांगांमधून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मारलेश्वर धबधब्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. पण याच धबधब्याला उंच उंच डोंगर रांगांमधून अनेक छोटे मोठे धबधबे येऊन मिळतात. लिंगाणा डोंगर इथून हा नजारा पाहण्यासारखा असतो. छोटे मोठे फेसाळत कोसळणारे धबधबे आणि त्यानंतर मारलेश्वरचा धबधबा असा नजारा पाहण्याचा अनुभव वर्णनीय असाच. हे दृश्य पाहताना मन अधिक संपन्न आणि प्रसन्न देखील होते. त्याचीच हि झलक...
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 04:01:25Pandharpur, Maharashtra:
10072025
Slug - PPR_GOPALKALA
feed on 2c
file 01
-------
Anchor - 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला' या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकर्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काल्यानंतर सायंकाळी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.30 वाजता गोपाळपुरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा सुमारे 350 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले. अशा भक्तिमय वातावरणात गोपाळकाला संपन्न झाला
0
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 10, 2025 03:36:06Kolhapur, Maharashtra:
Kop Nrushiwadi
Feed:- 2C
Anc::- आज गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.. कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दत्त मंदिर आधीच पाण्याखाली गेले आहे. तरीदेखील भाविक मोठ्या संख्येने नृसिंहवाडी इथे दाखल होऊन दत्त दत्त महाराजांचे दर्शन घेत आहेत.
3
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 10, 2025 03:35:58Pune, Maharashtra:
pimpri road
kailas puri Pune 10-7-25
feed by 2c
Anchor - स्मार्ट सिटी चा दावा करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून हायवे सह शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण केल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र हा दावा फुल ठरला आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका तर वाढला आहेच पण नागरिकांना मणक्याचे आजारही होऊ लागले आहेत.. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
kailas puri wkt+vis
4
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 10, 2025 03:35:47Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Fraud Marriage
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc' लग्नाचे आमीष दाखवून तरुणांची लूट करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले असून पोलिसांनी ८ आरोपींना जेरबंद केलंय, आरोपींनी जुन्नर पारनेर शिरूर तालुक्यात अनेक नागरिकांना खोटे लग्नाचे आमीष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातलाय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
2
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 10, 2025 03:35:40Buldhana, Maharashtra:
बुलढाणा
गुरु पौर्णिमेनिमीत्त गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी ..
प्रति पंढरपूर म्हणून शेगावची ओळख ..
anchor : विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त असंख्य भाविकांनी गर्दी केली आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असतानाही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरातमधून हजारो भाविक दर्शनासाठी शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण आहे.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 03:33:47Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेली बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा धो धो पावसामध्येही सुरू आहे. गाव खेड्यातील शेतकरी या यात्रेत सहभागी होत असून शेतकऱ्यांनो जाती धर्मात विभागू नका, लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. हिंदी सक्तीचा जीआर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी मरत असताना सरकार मात्र किंतु परंतु ची भाषा करीत आहे,
सरकारने शेतकऱ्यांचे उग्ररूप बघण्याआधीच कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास, ही पदयात्रा मुख्यमंत्र्यांच्या घराकडे वळवून त्यांना खांद्यावर घेऊन नाचू असेही बच्चू कडू म्हणाले.
उपोषण, पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू असाही ईशारा बच्चू कडू यांनी दिला.
बाईट : बच्चू कडू
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 03:33:28Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
शिर्डी मध्ये गुरूपोर्णिमेनिमित्त भाविकांची पहाटपासुनच अलोट गर्दी...
तिन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा...
साईभक्तांनी शिर्डी गजबजली...
नगर - मनमाड महामार्गावर भाविकांच्या लांबच लांब रांगा...
गुरूवार आणि त्यातच आज गुरूपोर्णिमा असल्याने भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी...
दर्शनासाठी लागतायत चार ते पाच तास...
संस्थान सुरक्षा रक्षकांची मोठी दमछाक...
साईनामाचा जयघोषात भाविक होतायत साईचरणी नतमस्तक...
उत्सवानिमीत्त आज साई मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन...
साई मंदिरात उत्सवानिमीत्त आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई...
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 10, 2025 03:33:15Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1007ZT_INDAPURUJJANI
FILE 5
उजनी धरण ९२% भरले.
उजनी धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे. उजनी धरण सध्या 92.79 % भरले आहे. तर उजनी धरणात वरील भागातून 20 हजार क्युसेक पाणी जमा होत आहे.
नीरा नदीवरील वीर धरणातून नीरा नदीत 5 हजार 479 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे.
----
ANCHOR:— पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण — म्हणजेच यशवंत सागर — सध्या ९२.७८ टक्के भरले असून, धरणातून १६ मोऱ्यांद्वारे १५ हजार क्यूसेकने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दौंड येथून २०३३६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, वीज निर्मितीसाठी देखील सध्या १६०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.
यासोबतच सीना-माढा बोगदा, दहिगाव उपसा सिंचन योजना, आणि मुख्य कालव्यातून देखील पाण्याचा बहिर्वाह सुरू आहे.सध्या पावसाचा जोर असाच राहिला, तर पुढील ४-५ दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.गेल्या ४५ वर्षांतील पहिल्यांदा, यंदा मे महिन्यात उजनी धरणाची पातळी उणेतून प्लसमध्ये पोहोचली होती.धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे शेतकरी, औद्योगिक क्षेत्र आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 10, 2025 03:31:19Kolhapur, Maharashtra:
Story:- Belgaum Sucide
Feed:- 2C
Anc :- बेळगाव शहरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये तीघांचा मृत्यू झाला असून, एकाची स्थिती गंभीर आहे. संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर, आणि मंगला कुराडेकर अशी मृताची नावे आहेत. तर सुनंदा कुराडेकर यांची स्थिती गंभीर आहे. ही दुर्दैवी घटना बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घडली. बेळगाव शहरातील शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे पण या कुटुंबीयांनी सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 03:31:11Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात पुन्हा लम्पि स्किन डिसिसचा शिरकाव झालाय,पूर्णा तालुक्यातील वझुर येथील रावसाहेब लांडे यांच्या 8 महिन्याच्या गोहऱ्याला लम्पि स्किनची लागण झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे बाधित जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप पिकांच्या मशागतीचे काम चालू असताना शेतकऱ्याचे गोधन संकटात सापडलय. 2023 साली परभणी जिल्ह्यातील 150 गावातील जनावरांना लम्पि स्किन या आजाराची लागण झाली होती,यामध्ये हजारो जनावरे दगावली होती. प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आठवडी बाजार बंद करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे विलगिकरण केले होते. लम्पी संसर्ग आढळून आलेल्या केंद्रापासून पाच किलोमीटर परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. पोळा सण साध्या पणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. आता पशुसंवर्धन विभागाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये बाधित जनावरांचे विलगीकरण, प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. लंपी आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
वझुर पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जनावरांच्या लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. या गंभीर आजारामुळे जनावरांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही उपचारासाठी मोठा खर्च येत असतो.
लिमला येथील चंद्रकांत रेवणवार यांच्या देखील बैलाला लंपीचा आजार झाल्याची माहिती आहे.
बाईट- रावसाहेब लांडे- शेतकरी
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 10, 2025 03:06:38Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_TIWASA_RAIN चार फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
सततधार पावसाचा पिकांचे फटका; तिवसा तालुक्यातील शेती पाण्याखाली, शेतीला तलावाचे स्वरूप
अँकर :– गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्य पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे नुकसान झाले असून तिवसा तालुक्यातील शेंदुर्जना बाजार येथील शेत पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. शेंदूरजना बाजार येथील गावाला लागत असलेले तीन एकर शेत संपूर्ण पाण्याखाली गेले आहे. सततधार पावसामुळे पाण्याखाली आल्याने शेताताला तलावाचे स्वरूप आले आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील लहान मोठ्या नाल्याना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरून नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
बाईट :- जितेंद्र चौधरी, नुकसानग्रस्त शेतकरी
13
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 10, 2025 03:04:11Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोटच्या शासकीय ज्वारी खरेदी प्रक्रियेची एसआयटीकडून चौकशी करण्याची घोषणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहेय..याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अ.प ) आमदार अमोल मिटकरी यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला होता..तर याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत चौकशीची मागणी केली होती..अकोट बाजार समितीत संगनमतातून कापूस खरेदीमध्ये तब्बल ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा मिटकरी यांनी केला..७ महिने उलटून गेल्यानंतरही अमरावती विभागाचे सहनिबंधक, जिल्हा निबंधक आणि अकोट तालुका उपनिबंधकया अधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय..प्रशासनातील ढिसाळपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहेय..
6
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 03:03:59Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह...
लाखोंच्या संख्येने साई भक्तांची गर्दी शिर्डीत उसळली...
वातानुकलीत दर्शन रांगेच्या बाहेर जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत साई भक्तांच्या रांगाच रांगा...
आज गुरु पौर्णिमेला साई मंदिर राहणार रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुल...
साईनगरीत भाविकांची अलोट गर्दी...
भाविकांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांची दमछाक...
साई मंदिर परिसरातील दर्शन रांगेच्या ठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
Wkt कुणाल जमदाडे शिर्डी
2
Share
Report