Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

हैदराबाद गेज़ेट के आधार पर बंजारा समाज का ST आरक्षण मोर्चा बीड़ में

MMMahendrakumar Mudholkar
Sept 15, 2025 09:33:05
Beed, Maharashtra
बीड : हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या... बंजारा समाजाचा भव्य मोर्चा Anc : हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज आज बीडमध्ये रस्त्यावर उतरतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला आहे. मोर्चात पारंपरिक वेशभूषा करून महिला मुलींसह बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज या मोर्चाला हजेरी लावली होती. आरक्षणाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 11:19:37
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात आदिवासी आरक्षण बचाव आंदोलन चिघळल्याने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत. अकोल्यात आदिवासी समाजाच्या आरक्षण बचाव आंदोलनाला काही काळ तणावपूर्ण वळण मिळाले. शांततेच्या मार्गाने सुरू झालेलं हे आंदोलन अचानक उग्र बनले, जेव्हा आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले, त्यावेळी ते बैठकीत व्यस्त असल्यामुळे निवेदन स्वीकारण्यात विलंब झाला.या विलंबामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी दालनाकडे मोर्चा वळविला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ संघर्षजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन शांततेत संपवले. दरम्यान, प्रशासन आणि आंदोलकांमध्ये समन्वयाचा अभाव मुळे हे परिस्थिती निर्माण झाल्याचा दिसून आलं..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 11:16:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_TIGER_DEATH ( single file sent on 2C)  टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा भिमणी नदीत मृतावस्थेत आढळलेला वाघ वनपथक पोचण्याआधीच गेला वाहून, वनविभागात खळबळ, वनाधिकारी प्रकरणावर मौन अँकर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी नदी पात्रात वाघ मृतावस्थेत दिसून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाघाचा मृतदेह मुसळधार पावसाच्या सोबत नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सध्या वनविभागाने मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतकरी व मजूर शेतातील कामे आटोपून परतत असताना त्यांना भीमणी नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगणारा वाघ मृतावस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाकडून ग्रामस्थांनाही मृतदेह दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाघांच्या मृत्यूच्या मालिकेत ही नवी भर पडल्याने वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वरीष्ठ वनाधिकारी मात्र प्रकरणावर मौन आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 11:16:14
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_EMPLOYEE(14 FILES) जालना :पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील 1 हजार 400 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले,17 सप्टेंबरपासून आंदोलनाचा ईशारा अँकर | जालना जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 400 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी,कार्यालयीन लिपिक यांचा समावेश आहे.तब्बल 5 महिन्यांपासून पगार थकल्यानं ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयीन कामकाजा बरोबरच रोजंदारीने जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचं समोर आलंय. बाईट :बाबासाहेब शेळके,ग्रामपंचायत कर्मचारी, डोमेगाव(कार्यालया बाहेर केलेला बाईट) बाईट : संदीप पंडित,ग्रामपंचायत कर्मचारी आणि जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, जालना
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 15, 2025 11:01:32
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे शहर विधानसभा निवडणुकीत तब्बल 45 हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा आरोप शिवसेना ऊबाठा चे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानावरून अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल 27 हजार बोगस मतदारांचा मतदार यादी समावेश केल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. बोगस मतदार नोंदणीसाठी बीएलओ यांचा वापर केला गेला असून एकाच व्यक्तीची चार चार पाच पाच वेळा नावांची नोंदणी झाल्याचा दावाही गोटे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत सात ते आठ टक्के बोगस मतदान झाल्याचा आरोप अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद केला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत गोटे यांनी कोणत्याही राजकीय पक्षावर कोणताही आरोप न करता निवडणूक यंत्रणेला लक्ष केल आहे. Byte- अनिल गोटे माजी आमदार प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 15, 2025 10:49:19
Thane, Maharashtra:वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ बाईट पॉइंटर* *ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ बाईट पॉइंटर* - आपण एक तारखेपासून या सिस्टम बसवलेल्या आहेत त्याच्यानंतर दहा तारखेला आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत गेलो होतो - आपण या ठिकाणी एटीएस आणि एआय तंत्रज्ञानाची कॅमेरे आहेत ते त्या ठिकाणी बसवलेले आहेत वाहतूक त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची - सुरुवातीला जे चलन दर होते ते आपल्याला त्याचे प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालं होतं - विदाऊट हेल्मेट चा जर बघितला बऱ्यापैकी कमी झालेला आहे - दहा तारखेपासून लोकांमध्ये जनजागृती झाल्यापासून आता खूप बारकाईने शोधावा लागतो बघावा लागतं खूप कमी प्रमाणात विदाऊट हेल्मेट नऊच्या बरोबर आपल्याला आता बघायला मिळतात - लोकांमध्ये जनजागरण चांगल्या प्रमाणे झाला आहे चांगला मेसेज केलेला आहे *ऑन वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिक वाद* - कॅमेराच आता इमेज जनरेट करणार आहे त्यामुळे ते प्रोसेस आता सुरू आहे - त्यामुळे जंक्शनवर होणारे वाद आता थांबला जाईल - त्यामुळे वाद विवादाचा प्रकार आता थांबला जाणार आहे *ऑन वाहन चालक दंड* आता पर्यंत 6900 चलन जनरेट झालेले आहेत - 210 लोकांनी आतापर्यंत चलन भरलेले आहेत - हे पहिल फेस होत त्यात एक जंक्शन होतं याच्यापुढे आपण विविध ठिकाणी कॅमेरे बसवणार आहोत - 14 जंक्शन आपण निवडलेले आहेत पुढच्या पंधरा दिवसात त्या ठिकाणी कॅमेरा लावले जाते *ऑन ठाणेकर आव्हान* - ठाणे करायला या माध्यमातून आव्हान करतो की आपल्याला जर ट्राफिक मधून निघायचं असेल तर यु फर्स्ट तो पुढे असेल त्याला पुढे जायला म्हणा - इंनलिगल लीगल जे कट कमी करण्यासाठी विरोध करू नका - आणि वाहतुकीचे नियम पाळा आपण यातून सर्व या मुसिबत मधून बाहेर पडू *ऑन लोक अदालत* - 13 तारखेची जी लोक अदालत झाली त्यामध्ये वाहतुकीची जवळपास दहा हजार केसेस जवळपास निकाली लागले आहे - कोर्टात दो शासन भरण आपण केलेला आहे तो जवळपास 1 कोटी 52 लाख महसूल कोर्टात जमा केलेला आहे..
4
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 15, 2025 10:46:01
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1509ZT_MAVAL_SARNAIK Total files : 03 Headline : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट स्वच्छता, प्रवासी सुविधा आणि बसेस वेळेवर धावाव्यात यावर भर Anchor : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज लोणावळा बसस्थानकाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. या वेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक येथील प्रसाधनगृह, उपहारगृह तसेच प्रतिक्षालयाची पाहणी केली. मंत्री भेट देणार आहेत म्हणून केवळ एका दिवसापुरते स्वच्छतेचे नाटक नको. प्रवाशांना दररोज स्वच्छ, टापटीप बसस्थानक, निर्जंतूक प्रसाधनगृहे आणि वाजवी दरात खाद्यपदार्थ मिळणे आवश्यक आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. प्रतिक्षालयात असलेल्या प्रवाशांशी संवाद साधताना काही प्रवाशांनी वेळापत्रकानुसार बसेस उपलब्ध होत नसल्याची तक्रार मांडली. लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळावर दररोज हजारो प्रवासी येत असल्याने बसस्थानकाच्या सुविधा दर्जेदार ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी अधोरेखित केले.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 15, 2025 10:45:31
Ratnagiri, Maharashtra: लोकेशन - चिपळूण भास्कर जाधव byte पॉइंटर भारतीय जनता पार्टीचे दिखाऊ पणा राष्ट्रीय प्रेम दुसऱ्याला उपदेश करण्याकरता राष्ट्रभक्ती आणि आम्ही कसे राष्ट्रभक्ती आहोत आम्ही कसे देशप्रेमी आहोत आणि बाकीचे कसे पाकिस्तानचे हितचिंतक आहेत हे सातत्याने राज्याला दाखवून राजकीय आयुष्य एकाच विषयाकरता रचलं त्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा समोर आलाय काल दुबई मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान झालेल्या क्रिकेट मॅचेस मधून बाहेर पडलेल आहे भाजप चा चेहरा भारतीय जनता पार्टी सारखी बोगस पार्टी,पाकिस्तान धार्जिणी पार्टी,बंडल पार्टी पुऱ्या देशांमध्ये शोधून सापडणार नाही फिल्मी डायलॉग मारणारे भारतीय जनता पार्टीचे लोक.. भारतीय जनता पार्टीने भारत पाकिस्तान सामना खेळून पाकिस्तान ला हजार कोटी रुपये कमवून देण्याचे काम केलं.. भारतीय जनता पार्टी ही देशभक्त नाही ही देश विरोधक आहे.. हे राष्ट्रभक्त नाही तर हे किती पैसा भक्त आहेत हे किती तकलादू आहेत हे कालच्या मॅच वरून जगाला दाखवून दिलं.. भारतीय जनता पार्टी ही फक्त दुसऱ्याला दोष देणं टीका करणे आरोप करणे आणि आपली कशी पार्टी विथ डिफरन्स आणि आपणच कसे सभ्य,सज्जन आहोत ते दाखवण्याचे काम भारतीय जनता पार्टी करते.. भास्कर जाधव ऑन ऑन सरकार GR ओबीसी कुणबी प्रमाणपत्र हे अगोदरच त्यांच्याकडे होतं मग आतापर्यंत का डावळलं गेलं.. एका बाजूला सरकार आरक्षणासंदर्भात जीआर करण्याचं काम करताय तर दुसऱ्या बाजूला हे सरकार ओबीसी समाजाच्या माध्यमातून या जीआर ला विरोध करण्याचे काम करतेय.. दोन्हीही सरकार मधलेच मंत्री.. एक मंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणारा तर दुसरा मंत्री याच आरक्षणाला विरोध करणारा आणि तिसरा मंत्री लांबून मजा बघणारा.. जाणीवपूर्वक ओबीसी वर्सेस मराठा,हिंदू वर्सेस मुसलमान अशा पद्धतीने समाजामध्ये भेद करण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीने सुरू केलेल आहे.. भास्कर जाधव
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 15, 2025 10:37:34
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 10:35:35
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_RATHOD_BYTE(4 FILES) जालना | एका महिन्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र न दिल्यास मुंबई,दिल्ली जाम करणार आमदार राजेश राठोड यांचा ईशारा अँकर | बंजारा समाजाच्या वतीने आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.बंजारा समाजाला ST प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे,अन्यथा संपूर्ण मुंबई जाम करू असा ईशारा यावेळी विधानपरिषदेचे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी दिला आहे.बंजारा समाज पूर्वीपासूनच आदिवासी प्रवर्गात येतात,त्यामुळे राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेऊन तातडीने असा जीआर काढावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे. बाईट: आमदार राजेश राठोड(लाल कोट असलेले) बाईट : अविनाश चव्हाण,आंदोलक(काळा जॅकेट असलेले)
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 10:35:10
Nashik, Maharashtra:शरद पवार - - काळ्या आईशी इमान राखणारा भाऊ बहिण अस्वस्थ आहे - कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो - अतिवृष्टी झाला त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर झाला - संकट आल्यावर राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते - *जबाबदारी घ्यायला आजचे राज्यकर्ते तयार नाही* - *गेल्या २ महिन्यात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या* - शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो - *संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही* - म्हणून जीव देण्याचा विचार शेतकरी करतोय - मी शेती खात्याचा मंत्री होतो - माझ्या वाचनात आलो शेतकरी आत्महत्येची घटना वाचली - पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली - शेतकरी जीव देतो ते समजून घेतले पाहिजे - दिल्लीत बसून होणार नाही - जिल्ह्यात जाऊन समजून घेऊ असे सांगितले - पंतप्रधान सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती यवतमाळला गेलो - आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आम्ही भेट घेतली - शेतकऱ्यांची बायको ढसाढसा रडतेय - मी विचारलं का रडतेय - सोसायटीचे कर्ज काढले होते ते थकले - खाजगी सावकारकडील कर्ज थकले - भांडे घेऊन गेला, मालकाला सहन झालं नाही - रडता रडता जीव गेला - *कर्जबाजारी हा मोठा रोग* - *त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली* - नाशिकचा कांदा जगात जातो - पैसे आल्यावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करतो - त्यात सरकारने निर्यातीला बंदी केली - किंमत देत नाही बाहेर विकू देत नाही - तीच गोष्ट सोयाबीन आणि इतर शेतीची - *राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही* - *देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुमचर पोस्टर लावले* - शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले - *शिवाजी महाराजांच्या काळात फाळ नव्हता त्याला सोन्याचा फाळ दिला होता* - बळीराजा उपाशी राहत कामा नये - *तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केलं नाही* - *राज्यकर्ते बळीराज्यकडे लक्ष देत नाही* - *शेतकऱ्यांचा मोर्चा दखल घेतली नाहीतर मोर्चा आणखी उग्र स्वरूपात होईल* - *नेपाळमध्ये काय घडलं आहे, त्याच्या खोलात मी जात नाही* - *देवाभाऊ शहाणपणा घेतील अशी विनंती* - मोर्चात सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार - *महिना दीड महिन्यात बघुयात काय घडतं*
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 15, 2025 10:33:22
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- आमदार दिपक केसरकर byte --- on संजय राऊत --- काल झालेली क्रिकेट मॅच ही आशिया कप ची होती. भारत आणि पाकिस्तान ने आयोजित केलेली मॅच नहोती.. उगाच जनतेची दिशाभूल करायची.. आंतराष्ट्रीय स्थरावर त्यांच्या नियमनुसार सामने व्हावे लागतात.. त्याच्यावर राजकारण करुन वेडेवाकडे बडबडत राहायचं ह्याला अर्थ नाही. ह्यांचं डोकं तपासण्याची वेळ आलेली आहे. पराभव पाचवण्याची ह्यांची ताकद नाही.. भारतीय संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले पाहिजे on संजय राऊत ( कुंकू ) --- संजय राऊत तुमच्यात पाकिस्तान विरोधात ऍक्शन घ्यायची हिंमत नाही ?? ती हिमंत मोदी साहेबांनी दाखवलीय. त्याची थोडी तरी लाज बाळगा. काँग्रेसच्या काळात मंत्रालयावर हल्ला झाला तेव्हा काय ऍक्शन घेतली होती.. कुठल्याही फालतू गोष्टीची तुलना सैन्याच्या पराक्रमाशी करणं योग्य नाही
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 15, 2025 10:30:30
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---- मंत्री योगेश कदम byte ---- ऑन संजय राऊत ( कोटींचा जुगार ) --- संजय राऊत यांनी पुराव्यानिशी बोलाव. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले होते तेव्हा किती जुगार झाला त्याची आकडेवारी समोर आणावी. उगाच वायफळ चर्चा कराव्यात. सिन्दुर सारखं ऑपरेशन आपल्या सैन्याने केले. आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान आहे.. जे आज पर्यंत कुणाला जमल नाही ते आपल्या सैन्याने केलंय. आपल्या भारताची बदनामी करायची पाकिस्तान ने सटयामध्ये किती कमवले ते हे बघायला गेले होते का?? वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हाच प्रयत्न संजय राऊत यांचा असतो. त्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही ऑन एकनाथ शिंदे --- आज आम्ही महायुतीमध्ये आहोत. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागत. त्याची चर्चा आपण बाहेर करत नसतो. महायुती मध्ये एकत्र राहून राज्याचा विकास करायचा आहे. शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनाच पालन आमच्या कडून होईल. आणि महायुती अजून मजबुतीने समोर येईल. ऑन लक्ष्मण हाके --- प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. समाजाकरीता संघर्ष करण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपल्या मागण्या लावून धरा त्याबाबत आमचं दुमत नाही. तक्रार नाही पण अन्य समाजाच्या भावना दुखावतील अस वक्तव्य कोणी करू नये. कायदा मोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होईल . ऑन गिरीश महाजन --- प्रत्येक नेते आपला पक्ष मजबूत कसा होईल त्यासाठी प्रयत्न करत असतात. कार्यकर्ते जेव्हा वाढतील तेव्हा पक्ष वाढणार. पक्ष वाढीकरिता अन्य पक्षाचे कार्यकर्ते घेण्यास काही हरकत नसावी ऑन संजय राऊत ( बूट चाटणे ) --- दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे सोनिया गांधींचे तळवे चाटण्यापेक्षा समोर आरसा ठेवून विचार करावा. 370 कलम हटविण्याची हिंमत कधी काँग्रेस ने नाही केली उलट ते हटवत असताना विरोध केला. त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला आठवण झाली नाही का? काँग्रेस सोबत जवळीक बाळासाहेबांना मान्य होती का? ? याच उत्तर राऊत यांनी हो की नाही मध्ये द्याव Byte ---- योगेश कदम
0
comment0
Report
Advertisement
Back to top