Back
बजरंग दलाने संभाजीनगरमध्ये त्रिशूळ वाटप, लव्ह जिहाद विरोधात ठरला संकल्प!
VKVISHAL KAROLE
FollowJul 18, 2025 07:04:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn trishul av
feed attached
बजरंग दलाच्यावतीने संभाजीनगरमधे त्रिशूळचे वाटप.....
Anc...
छत्रपती संभाजीनगर मधील खडकेश्र्वर मंदिर परिसरात बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी लव्ह जिहाद, धर्मांतरण रोखण्याचा संकल्प घेण्यात आला.खडकेश्वर मंदिरात बजरंग दलाच्यावतीने १५० जणांना 5 इंच आकाराचे त्रिशूळ वाटप करण्यात आले.दिल्ली येथील केंद्रातून हे त्रिशूळ पाठवण्यात आले होते. त्रिशूळ हे सेवा, संस्काराचा प्रतीक आहे.आगामी काळात प्रत्येक गाव, तालुक्यात अशा त्रिशुळांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली......
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJul 18, 2025 11:33:38kolhapur, Maharashtra:
2c को बाईट attach किया है
--------
बाईट --ब्रिगेडियर विद्याधर गोळे, डिफेन्स एक्स्पर्ट
---मेरा स्पष्ट मानना है.. किसी भी क्षेत्र मे.. निजी यां टीम, देश के स्तर पर किसी पाकिस्तानी को अपने बराबर का दर्जा देना यह आतंकवादी को अपने बराबर का दर्जा देने के समान है.. यह कभी करना नहीं चाहिए
2
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 11:10:06Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KUSGAON
सातारा - वाई तालुक्यातील कुसगाव येथील ब्लॅक जेम स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या लॉंग मार्चला थांबवण्यासाठी तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हाधिकारी रजेवर असल्यामुळे सोमवारी चर्चा होईल, तोपर्यंत क्रशरवरील सर्व प्रक्रिया थांबवण्याचे लेखी आश्वासन देण्याचे सांगितले.आंदोलनकर्त्यांनी यावर लेखी पत्राची मागणी केली. मात्र तहसीलदारांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पत्रात फक्त जिल्हाधिकारी सोबतच्या बैठकीचा उल्लेख होता; क्रशरवरील प्रक्रिया थांबवण्याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. हे लक्षात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली आणि लॉंग मार्च सुरू ठेवला.या प्रकारामुळे तहसीलदारांची भूमिका संशयास्पद ठरत असून, आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची फसवणूक सुरू असतानाच, क्रशरवर उत्खनन सुरुच असल्याने संताप वाढत आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 11:00:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_BYTE
*उदयनराजे बाईट पॉईंटर*
आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर उदयनराजेंनी असा वाद होऊ नाही असं मत व्यक्त करून हा वाद कोणामुळे झाला कोणी केला यापेक्षा लोक तुम्हाला निवडून देतात त्यांच्या अपेक्षा असतात. लोकप्रतिनिधींकडून कामे झाले पाहिजेत. अशा फालतुगिरी बाजूला ठेवून या लोकांनी विकास कामावर जोर दिला पाहिजे... कोणाची चूक आहे याच्यापेक्षा हे घडलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चुकीची मांडणी करत असल्याचे उदयनराजे म्हणाले
बाईट- उदयनराजे भोसले
मी उदयनराजे भोसले बोलतोय असे सांगून आमिर खान यांची फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील अली अमानत शेख या अज्ञात व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी "आमिर खान माझे चांगले मित्र आहेत कोणीही असं वागू नये. जर वागत असतील तर या मागचा हेतू नेमका काय आहे.. हे पोलीस तपासामध्ये समोर येणे गरजेचे आहे. एखादं कर्तुत्व बनवायला वेळ लागतो. जे कोणी माझ्या नावाचा गैरवापर करत असतील त्यांना शासन झालं पाहिजे. असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलंय
बाईट -उदयनराजे भोसले
आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन बसाव अशी माझी मनापासून इच्छा असल्याचे स्पष्ट करत हा निर्णय मी एकटा घेणार नाही. स्थानिक पातळीवर राजकारण आणू नये. मी कधी आयुष्यात राजकारण केलेले नाही.मी जास्तीत जास्त लोकांची सेवा केली आहे. राजकारण करायला अक्कल लागत नाही. नगरपालिकेच्या साठी मनोमिलन झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. पण सध्या शिवेंद्रराजे बिझी आहेत कारण ते मिनिस्टर आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी उदयनराजेंनी दिली
बाईट - उदयनराजे भोसले
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 18, 2025 10:42:48kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे
------
नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो परिचारिका आज पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे... काल परिचारिकांकडून एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आले होते.. आज पासून मात्र बेमुद्दत संपाला सुरवात झाली आहे. एक दिवसीय लाक्षणिक संप करून ही प्रशासनाने मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे परिचारिकांनी आजपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू केला आहे.. सातव्या वेतन आयोगमधील वेतन त्रुटी दूर करावी अशी परिचारिकांनी प्रमुख मागणी आहे.. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी विविध सोयी बद्दलच्या मागण्या ही आहेत.. त्यामुळे परिचारिकांकडून संप करण्यात आला आहे.. नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालय या तीन रुग्णालयातील शेकडो परिचारिका संपावर गेल्यामुळे तीनही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे... काल लाक्षणिक संपाच्या दिवशीही होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या अर्धी झाली होती.. त्यामुळे बेमुदत संपाच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो...
----------------
Byte - नूतन बांते
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 10:41:10Pandharpur, Maharashtra:
18072025
slug - PPR_MANDAP_HOUSE
feed on 2c
file 01
------
Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन रांग टेंडर घोटाळ्याचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. आर्थिक देवाणघेवाण ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली तरीही मंदिर समिती कडून फक्त तक्रार आली नाही या कारणावरून कोणतीही कारवाई केली जात नाही असा मुद्दा उपस्थित केला
-----
sound clip - आमदार अभिजीत पाटील
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 10:40:58Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KAAS
सातारा - सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेवक आणि महिला पदाधिकारी यांच्या हस्ते आज कास तलावाचे ओटी भरण करण्यात आले.या कास तलावाची उंची सातारा नगरपालिकेच्या वतीने वाढविण्यात आली आहे त्यामुळे याची पाणी पातळी देखील वाढली आहे.जून महिन्यातच हा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 18, 2025 10:40:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1807_BHA_RAIN
FILE - 3
भंडाऱ्यात पुन्हा पावसाची हजेरी..... शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात आठवडाभरा आधी दमदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता भंडारा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात रोवणीच्या कामाला लागला असल्याने पावसाची आवश्यकता होती आणि अशा दमदार पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीवर्ग सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 18, 2025 10:40:30Ambernath, Maharashtra:
बदलापूरात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक
जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घातला दुग्धाभिषेक
Bdl ncp agitation
Anchor काल विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली या घटनेमुळे विधिमंडळाचे नाव देशात बदनाम झालं आहे. वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाहक बदनामी केली जात असून त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते यामुळे आज राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून त्यांना समर्थन दर्शविले , तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांचा फोटो वर मै हु गुंडा असे लिहून त्यांचा निषेध केला ,
Byte अविनाश देशमुख
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 18, 2025 10:02:43Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1807ZT_WSM_EBIKE_FIRE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम च्या काकडदाती परिसरातील साई लिला नगर मध्ये राहणाऱ्या गोविंद गाभणे यांची जॉय कंपनी ची इलेक्ट्रिक स्कुटी आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.गोविंद गाभणे यांचा मुलगा आदित्य गाभणे याने या इलेक्ट्रिक स्कुटी ला चावी लावताच तिला अचानक आग लागली.सुदैवाने आदित्य गाभणे हा वेळीच बाजूला गेल्याने अनर्थ टळला मात्र आग लागून काही मिनिटातच ही जॉय कंपनी ची स्कुटी जळून खाक झाली आहे.या आगीत परिसरातील एअर कंडिशनर आणि इतर साहित्य ही जळाले आहे.आगीत स्कुटी जळून नुकसान झाल्याने जॉय कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गोविंद गाभणे यांनी केली आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 18, 2025 09:34:48Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन उपायुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... कुक्कुट खाद्याच्या बँगांवर अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी उपायक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पोल्ट्रीतील पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
3
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 09:32:03Akola, Maharashtra:
Anchor : राज्यभरातील शासकीय परिचारिकांनी आजपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहेय..या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोठा अडथळा आलेला आहेय..अकोल्यात शासकीय रुग्णालयात सुद्धा सामान्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत..सध्या फक्त अतिदक्षता आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया सुरू आहेत,तर अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत... हे आंदोलन रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम टाकू शकते, त्यामुळे प्रशासनाला या प्रश्नावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहेय.. परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत जेणे करून रुग्णांचे होणारे हाल थांबतील...
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 09:06:29Pandharpur, Maharashtra:
18072025
Slug - PPR_CLEAN_WORKER
feed.on 2c
file 02
-----
सफाई कामगार जल्लोष व्हिडिओ
सफाई कामगार काम करताना व्हिडिओ
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 18, 2025 09:06:16Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील घटना
महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेल्याचा गावकऱ्यांचा आरोप
महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
______________
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली.. चंद्रकांत यशवंत तांबे आणि मृदुला वासुदेव वाडकर अशी विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे. या घटनेमुळे निवळी गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे..
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 09:06:03Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Leopard
File:01
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc :- जुन्नर तालुक्यातील ओझर येथे बिबट विहिरीत पडल्याची घटना घडली
Vo :- यावेळी विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टिमने सुखरुप बाहेर काढले यावेळी बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आलेय बिबट्याच्या विहिरीत पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असुन शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 09:05:53Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Lampi Bullock Cart Stop
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc:उत्तर पुणे जिल्ह्यात लंम्पी आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने ३१ जुलै २०२५ पर्यंत बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.
Vo :- या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सर्व गाडेमालकांना शर्यतीत सहभागी होऊ नये, असे आवाहन करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाडेमालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
असे असतानाही आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे नियम धाब्यावर बसवत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून सलग दोन दिवस या शर्यती होणार आहेत. लंम्पी संसर्गाचा धोका लक्षात घेता या शर्यती आयोजनावर टीका होत असून, सहभागी होणाऱ्या गाडेमालकांना पुढील कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाने या शर्यतीत भाग घेऊ नये, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
1
Share
Report